Thursday, 26 October 2023

सल्लसुत्तं

            🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 

‌‍*_!! सल्लसुत्तं !!_**

_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

            🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

_अनिमित्तमनञ्ञातं, मच्चानं इध जीवितं ।_

_कसिरं च परित्तं च, तं च दुक्खेन सञ्ञुतं । । १ ।।_

*_मर्त्याचे इहलोकीचे जीवित बेभरवशाचे आणि अज्ञात आहे. ते कष्टमय, अल्प व दुःखाने मिश्रित आहे. (१)_*

_न हि सो उपक्कमो अत्थि, येन जाता न मिय्यरे ।_

_जरsम्पि पत्वा मरणं, एवं धम्मा हि पाणिनो ।। २ ।।_

*_कारण, असा काही उपाय नाही की जेणेकरून जन्मलेले (प्राणी) मरणार नाहीत. म्हातारे होऊन तरी ते मरणारच. कारण, हा प्राण्यांचा स्वभाव आहे. (२)_*

_फलानमिव पक्कानं, पातो पतनतो भयं ।_

_एवं जातानं मच्चानं, निच्चं मरणतो भयं || ३ ||_

*_पिकलेल्या फळांना जसे सकाळी खाली पडण्याचे भय तसे जन्मलेल्या मर्त्यांना नेहमीच मरणाचे भय आहे. (३)_*

_यथा'पि कुम्भकारस्स, कता मत्तिकभाजना ।_

_सब्बे भेदनपरियन्ता, एवं मच्चानं जीवितं ॥ ४ ॥_

*_कुंभाराने केलेल्या मातीच्या भांड्याचे जसे फुटण्यात पर्यवसान होते, तसे मर्त्याच्या जीविताचे (मृत्यूत) पर्यवसान होते. (४)_*

_दहरा च महन्ता च, ये बाला ये च पण्डिता ।_

_सब्बे मच्चुवसं यन्ति, सब्बे मच्चुपरायणा ||५||_ 

*_लहान व मोठे, मूर्ख आणि पंडित हे सर्व मृत्यूला वश होतात. हे सर्व मृत्युपरायण आहेत. (५)_* 

_तेसं मच्चुपरेतानं, गच्छतं परलोकतो ।_

_न पिता तायते पुत्तं, ञाति वा पन ञातके || ६ ||_

*_मृत्यूने ग्रासलेले ते परलोकी जात असता पिता पुत्राचे किंवा आप्त आप्ताचे रक्षण करू शकत नाही. (६)_*

_पेक्खतं येव ञातीनं, पस्स लालपतं पुथु ।_

_एकमेको व मच्चानं, गो वज्झो विय निय्यति । ॥७॥_

*_पहा, आप्त पहात असता व अनेक प्रकारे शोक करीत असता मर्त्यांपैकी प्रत्येक जण वध्य गाईप्रमाणे नेला जातो. (७)_*

_एवमब्भाहतो लोको, मच्चुना च जराय च ।_

_तस्मा धीरा न सोचन्ति, विदित्वा लोकपरियायं ॥ ८ ॥_ 

*_याप्रमाणे मृत्यूने आणि जरेने हा लोक अभ्याहत झाला आहे. म्हणून हा एक लोक-प्रकार आहे हे जाणून सुज्ञ शोक करीत नसतात. (८)_*

_यस्स मग्गं न जानासि, आगतस्स गतस्स वा ।_

_उभो अन्ते असम्पस्सं, निरत्थ परिदेवसि ।।९।।_

_*ज्याचा आलेला किंवा गेलेला मार्ग तुला ठावूक नाही व ज्याचे दोन्ही अन्त दिसत नाहीत, (अशाविषयी) तू वृथा शोक करतोस. (९)*_

_परिदेवयमानो चे, कन्चिदत्थं उदब्बहे ।_

_सम्मूळ्हो हिंसमत्तानं, कयिर चेनं विचक्खणो ।।१०।।_

*_शोकापासून जर काही फायदा होण्यासारखा असेल, तर संमूढ होऊन व आपणाला कष्टवून, शाहाण्या माणसाने शोक करावा. (१०)_*

_न हि रूण्णेन सोकेन, सन्तिं पप्पोति चेतसो ।_

_भिय्यस्सुप्पज्जते दुक्खं, सरीरं चुपहञ्ञति ||११||_

*_पण रडण्याने किंवा शोकाने त्याच्या चित्ताला शांती मिळत नाही, दुःख वाढते व शरीरावर वाईट परिणाम होतो. (११)_*

_किसो विवण्णो भवति, हिंसमत्तानमत्तना ।_ 

_न तेन पेता पालेन्ति, निरत्था परिदेवना । | १२||_

*_आपणच आपणाला त्रास देणारा तो कृष आणि निस्तेज होतो. त्यायोगे मृतांना काही संरक्षण प्राप्त करून घेता येत नाही. म्हणून शोक व्यर्थ होय. (१२)_*

_सोकमप्पजहं जन्तु, भिय्यो दुक्खं निगच्छति ।_

_अनुत्थुनन्तो कालकतं, सोकस्स वसमन्वगू | | १३ ||_

*_शोक न सोडणारा प्राणी, मेलेल्याची आठवण काढीत, शोकाला वश होऊन अतिशय दुःख भोगतो. (१३)_*

_अञ्ञा'पि पस्स गमिने, यथा कम्मूपगे नरे ।_ 

_मच्चुनो वसमागम्म, फन्दन्ते चिध पाणिनो ।। १४ ।।_ 

*_मृत्यूला वश होऊन तडफडणान्या व आपल्या कर्मानुसार जाणाऱ्या दुसऱ्यांही मनुष्य-प्राण्याकडे पहा. (१४)_*

_येन येन हि मञ्ञन्ति, ततो तं होति अञ्ञथा।_

_एतादिसो विनाभावो, पस्स लोकस्स परियायं ||१५||_ 

*_आपणास हे असे असावेसे वाटते, पण ते भलतेच होते. अशा या विपरीत गोष्टी होतात. हा एक लोक-प्रकारच आहे हे पहा. (१५)_*

_अपि चे वस्ससतं जीवे, भिय्यो वा पन मानवो।_

_ञातिसंघा विना होति, जहाति इध जीवितं ॥ १६ ॥_

*_जरी मनुष्य शंभर वर्षे किंवा त्याहून जास्त जगला, तरी आप्तसमूहापासून निराळा होतोच; इहलोकीच प्राण सोडतो. (१६)_*

_तस्मा अरहतो सुत्वा, विनेय्य परिदेवितं ।_

_पेतं कालकतं दिस्वा, न सो लब्भा मया इति ||१७||_

*_म्हणून अर्हन्ताचे वचन ऐकून, मेलेल्याकडे पाहून व हाता मिळणे कठीण असे जाणून शोक सोडून द्यावा. (१७)_*

_यथा सरणमादित्तं, वारिना परिनिब्बये ।_

_एवम्पि धीरो सप्पञ्ञ, पण्डितो कुसलो नरो ।_

_खिप्पमुप्पतितं सोकं, वातो तूलं'व धंसये ।। १८ ।।_

*_जसे पेटलेले घर पाण्याने विझवावे, त्याप्रमाणे धैर्यवान्, सुज्ञ, पंडित आणि कुशल माणसाने उत्पन्न झालेला शोक- वारा कापसाला ज्याप्रमाणे उडवितो तद्वत- झटदिशी नाहीसा करावा. (१८)_*

_परिदेवं पजप्पं च, दोमनस्सं च अत्तनो ।_

_अत्तनो सुखमेसानो, अब्बहे सल्लमत्तनो ।। १९ ।।_

*_आपणास सुख व्हावे अशी इच्छा धरणाऱ्याने आपला शोक, प्रजल्प आणि दौर्मनस्य हे जे अन्तःकरणाचे शल्य ते उपटून टाकावे. (१९)_* 

_अब्बूळ्हसल्लो असितो, सन्तिं पप्पुय्य चेतसो ।_

_सब्बसोकमतिक्कन्तो, असोको होति निब्बुतो'ति ।। २० ।।_

*_हे शल्य ज्याने काढून टाकलेले आहे व जो अनासक्त आहे, तो चित्ताची शान्ती मिळवून व सर्व शोकांचे अतिक्रमण करून अशोक होतो आणि परिनिर्वाण पावतो. (२०)_*

_*| सल्लसुत्तं निट्ठितं ।*_

*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_महेश कांबळे_*

*_दिनांक :- २६/१०/२०२३_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2023/10/blog-post_26.html

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼



Friday, 20 October 2023

वसलसुत्तं

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_!! वसलसुत्तं !!_*

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

_कोधनो उपनाही च, पापमक्खी च यो नरो । विपन्नदिट्ठि मायावी, तं जञ्ञा वसलो इति ॥ १।।_

*_रागीट, सूड उगविण्याची बुद्धी धरणारा, पापी, गुणीजनांस दोष लावणारा, मिथ्या-दृष्टी आणि मायावी अशा माणसास वषल समजावे. (१)_* 

_एकजं वा द्विजं वापि यो'ध पाणं विहिंसति । यस्स पाणे दया नत्थिं, तं जञ्ञा वसलो इति ॥ २ ॥_

*_जरायुज किंवा अंडज प्राण्याचा जो वध करतो, ज्याला प्राण्यांची दया नाही, त्याला वृषल समजावे. (२)_*

_यो हन्ति परिरुन्धति, गामानि निगमानि च । निग्गाहको समञ्ञातो, तं जञ्ञा वसतो इति ।। ३ ।।_

*_जो गावे आणि शहरे यांना वेढा घालून लुटतो, उध्वस्त करतो, ज्याला लुटारू म्हणून ओळखतात, त्याला वृषल समजावे. (३)_*  

_गामे वा यदि वा'रञ्ञे, यं परेसं ममायितं । थेय्या अदिन्नं आदियति, तं जञ्ञा वसतो इति ॥ ४ ॥_

*_गावात किंवा अरण्यात जो इतरांच्या मालकीची वस्तू, न दिली असता, घेतो त्याला वृषल समजावे. (४)_*

_यो हवे इणमादाय, चुज्जमानो पलायति । न हि ते इणमत्थी ति, तं जञ्ञा वसलो इति ॥ ५ ॥_ 

*_जो ऋण घेऊन, ते परत मागितले असता, 'तुझे मी देणेच नाही' असे म्हणून पळ काढतो, त्याला वृषल समजावे. (५)_*

_यो वे किञ्चिखकम्यता, पंथस्मिं वजतं जनं । हन्त्वा किञ्चिक्खेमादेति,  तं जञ्ञा वसलो इति ।। ६ ।।_

*_जो कोणत्याही पदार्थाच्या इच्छेने वाटमारेपणा करून लोकांना लुटतो, त्याला वृषल समजावे. (६)_*  

_यो अत्तहेतु परहेतु, धनहेतु च यो नरो। सक्खिपुट्टो मुसा ब्रूति, तं जञ्ञा वसलो इति । । ७ ।।_

*_जो मनुष्य आपणासाठी, दुसऱ्यासाटी किंवा पैशासाठी प्रत्यक्ष विचारले असतांना खोटी साक्ष देतो, त्याला वृषल समजावे. (७)_*

_यो ञातीनं सखानं वा, दारेसु पटिदिस्सति । सहसा सम्पियेन वा, तं जञ्ञा वसलो इति ॥ ८ ॥_ 

*_जो जबरदस्तीने किंवा प्रेमाने आपल्या आप्त-इष्टांच्या स्त्रियांशी वाममार्गाने आचरण करतांना दिसतो, त्याला वृषल समजावे. (८)_*

_यो मातरं पितरं वा, जिण्णकं गतयोब्बनं । पहु सन्तो न भरति, तं जञ्ञा वसलो इति ॥ ९ ॥_

*_जो समर्थ असून आपल्या वयातीत वृद्ध आईचे किंवा बापाचे पालन-पोषण करीत नाही, त्याला वृषल समजावे. (९)_*

_यो मातरं वा पितरं वा, भातरं भगिनिं ससुं। हन्ति रोसेति वाचाय, तं जञ्ञा वसलो इति ।।१०।।_

*_आई-बाप, भाऊ-बहिण किंवा सासू यांस जो मारत किंवा वाणीने चिडवितो, त्याला वृषल समजावे. (१०)_* 

_यो अत्थं पुच्छितो सन्तो, अनत्थमनुसासति । । पटिच्छन्नेन मन्तेति, तं जञ्ञा वसलो इति ।। ११।।_

*_फायद्याचा उपाय विचारला असता जो हानिकारक उपाय सांगतो, किंवा सन्दिग्ध बोलतो, त्याला वृषल समजावे. (११)_*

_यो कत्वा पापकं कम्मं, मा मं जञ्ञा'ति इच्छति । यो पटिच्छन्नकम्मन्तो, तं जञ्ञा वसलो इति ।। १२।।_

*_जो पापकर्म करून ते लोकांनी जाणू नये अशी इच्छा करतो, ज्याची कृत्ये गुप्त रीतीने चालतात, त्याला वृषल समजावे. (१२)_*

_यो वे परकुलं गन्त्वा, भुत्वान सुचिभोजनं । आगतं न पटिपूजति, तं जञ्ञा वसलो इति ।। १३ ।।_

*_जो परक्याच्या घरी जाऊन चमचमीत भोजनाचा पाहुणचार घेतो, पण आपल्या घरी आल्यावर त्या गृहस्थाचा आदरसत्कार करीत नाही, त्याला वृषल समजावे. (१३)_*

_यो ब्राह्मणं वा समणं वा, अञ्ञं वापि बनिब्बकं । मुसावादेन वञ्चेति, तं जञ्ञा वसलो इति ।। १४ ।।_

*_जो ब्राह्मणाला, श्रमणाला किंवा दुसऱ्या एखाद्या गरीब माणसाला खोटे बोलून ठकवितो, त्याला वृषल समजावे. (१४)_*

_यो ब्राह्मणं वा समणं वा, भत्तकाले उपट्ठिते । रोसेति वाचा न च देति, तं जञ्ञा वसलो इति ।। १५ ।।_

*_दुपारी जेवणाच्या वेळी घरी आलेल्या श्रमणाला किंवा ब्राह्मणाला जो रागे भरतो व काही देत नाही, त्याला वृषल समजावे. (१५)_*

_असतं यो'ध पब्रूति, मोहेन पलिगुण्ठितो । किञ्चिक्खं निजिगिंसानो, तं जञ्ञा वसलो इति ।। १६ ।।_

*_मोहाने वेढलेला, जो थोड्याबहुत फायद्याचा हव्यास धरून भलत्यासलत्या गोष्टी सांगतो, त्याला वृषल समजावे. (१६)_*

_यो चत्तानं समुक्कंसे, परं चमवजानति । निहीनो सेन मानेन, तं जञ्ञा वसलो इति ।। १७ ।।_

*_जो अहंमन्यतेने पतित होऊन आत्मस्तुती आणि लोकांचा तिरस्कार करतो, त्याला वृषल समजावे. (१७)_*

_रोसको कदरियो च, पापिच्छो मच्छरी सठो । अहिरिको अनोत्तप्पी, तं जञ्ञा वसलो इति ।। १८ ।।_

*_जो दुसऱ्यावर रागावणारा, कृपण, असदिच्छ, मत्सरी, शठ, निर्लज्ज व लोकापवादभयरहित असतो, त्याला वृषल समजावे. (१८)_*

_यो बुद्धं परिभासति, अथ वा तस्स सावकं । परिब्बाजं गहट्टं वा, तं जञ्ञा वसलो इति । । १९ ।।_ 

*_जो बुद्धांना, त्यांच्या श्रावकाला अथवा (इतर) परिव्राजकाला किंवा गृहस्थाला शिव्या देतो, त्याला वृषल समजावे. (१९)_*

_यो वे अनरहा सन्तो, अरहं पटिजानति । चोरो सब्रह्मके लोके, एस खो वसलाधमो । एते खो वसला वुत्ता, मया वो ये पकासिता ।। २० ।_

*_जो अरहन्त नसून आपणास अरहन्त म्हणवितो ते सर्व जगात चोर होय; तो वृषलाधम होय. हे वृषल आहेत, हे मी तुम्हाला सांगून समजावून दिले आहे. (२०)_*

_*न जच्चा वसलो होति, न जच्चा होति ब्राह्मणो । कम्मुना वसलो होति, कम्मुना होति ब्राह्मणो ।। २१ ।।*_

*_जन्माने वृषल होत नाही व जन्माने ब्राह्मण होत नाही; कर्माने वृषल होतो व कर्माने ब्राह्मण होतो. (२१)_*

_तदमिना'पि जानाथ, यथा में'दं निदस्सनं । चण्डालपुत्तो सोपाको, मातङ्गो इति विस्सुतो ।। २२ ।।_

*_याला मी एक उदाहरण देतो. त्यानेही ही गोष्ट समजून येण्याजोगी आहे. कुत्र्याचे मांस खाणारा चांडालपुत्र मातंग प्रसिद्ध होऊन गेला. (२२)_*

_सो यसं परमं पत्तो, मातङ्गो यं सुदुल्लभं । आगञ्छ्रं तस्सुपट्ठानं, खत्तिया ब्राह्मणा बहू ।। २३ ।।_

*:त्या मातंगाला अत्यंत श्रेष्ठ आणि अत्यंत दुर्लभ यश मिळाले. त्याच्या सेवेला पुष्कळ क्षत्रिय आणि ब्राह्मण हजर असत. (२३)सो_*

_देवयानमारूय्ह, विरजं सो महापथं । कामरागं विराजेत्वा, ब्रह्मलोकूपगो अहु । न नं जाति निवारेसि ब्रह्मलोकूपपत्तिया ।। २४ ।।_ 

*_निष्पाप व श्रेष्ठपथवर्ती देवयानांत बसून व विषयवासनेचा क्षय करून तो ब्रह्मलोकास गेला. ब्रह्मलोकी जन्मण्याला त्याला त्याची जात आड आली नाही. (२४)_*

_अज्झायककुले जाता, ब्राह्मणा मन्तबन्धुनो। ते च पापेसु कम्मेसु, अभिण्हमुपदिस्सरे ।। २५।।_

*_स्वाध्याय-सम्पन्न कुळात झालेले नामधारी वैदिक ब्राह्मण पुष्कळदा पापकर्मे आचरीत असलेले दिसून येतात. (२५)_*

_दिट्ठे' व धम्मे गारय्हा, सम्पराये च दुग्गतिं । न ते जाति निवारेति, दुग्गचा गरहाय वा ।। २६ ।।_ 

*_ते इहलोकी निंद्य होतात व परलोक दुर्गतीला जातात. त्यांचा जन्म दुर्गतीपासून किंवा निन्देपासून त्यांचे रक्षण करीत नाही. (२६)_*

*_न जच्चा वसलो होति, न जच्चा होति ब्राह्मणो । कम्मुना वसलो होति, कम्मुना होति ब्राह्मणाति ।। २७ ।।_*

*_(म्हणून) जन्माने वृषल होत नाही व जन्माने ब्राह्मण होत नाही; कर्माने वृषल होतो व कर्माने ब्राह्मण होतो. (२७)_*

                           *_। वसलसुत्तं निट्ठितं ।_*

*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_महेश कांबळे_*

*_दिनांक :- २१/१०/२०२३_*

*_संदर्भ :-_*

*_सुत्तपिटक » खुद्दकनिकाय » सुत्तनिपातपाळि » उरगवग्गो »  वसलसुत्तं_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2023/10/blog-post_20.html

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

Thursday, 19 October 2023

संघ मध्यान्हानंतर भोजन करीत नाहीत

 *_भिक्षु - भिक्षुनी संघ मध्यान्हानंतर भोजन करीत नाहीत_*

 उत्तर : त्याला दोन कारणे आहेत- 

(१) भिक्षा मागून उपजीविका करणाऱ्या भिक्खूंना रात्री भिक्षा मागण्यास जाणे सोईस्कर नसते. 

(२) अल्पाहार सुखकर असतो. 

एकदा भगवान काशी देशात विहार करीत असता भिक्खूंना उपदेशून म्हणाले : 'भिक्खूंनो! मी रात्रीचे भोजन वर्ज्य मानतो. रात्री भोजन न केल्यामुळे आरोग्य, उत्साह, बल, सुखपूर्वक विहार यांचा मी अनुभव करतो म्हणून भिक्खूंनो, तुम्हीही रात्रीचे भोजन वर्ज्य करा म्हणजे तुम्हालाही असाच अनुभव येईल'.

भिक्खूला मध्यान्होंत्तर पेय भिक्षा प्राप्त झाली असल्यास ते ग्रहण करू शकतात. 

एकदा केणीय जटील मध्यान्होत्तर पेयपदार्थ तयार करून भगवंतांकडे गेला आणि त्यास ग्रहण करण्याची त्यांना विनंती करू लागला. भगवंत म्हणाले, 'केणीय! भिक्खूंना दे. भिक्खू संकोचवश तो ग्रहण करावयास मागेपुढे पाहू लागले. तेव्हा भ. बुद्ध म्हणाले, 'भिक्खुनो, आठ प्रकारचे पेयपदार्थ ग्रहण करण्याची अनुज्ञा देतो:- 

(१) आंब्याचा रस, 

(२) जांभळाचा रस, 

(३) चिंचेचा रस, 

(४) केळाचा रस, 

(५) मधुपेय, 

(६) अंगूर पेय 

(७) सालूक- (कोईच्या मुळ्या) आणि

(८) फारूसक (फालसा) पेय. 

भिक्खूंनो! धान्याच्या रसाला - सोडून सर्व फळ रसांची अनुज्ञा देतो. मोहांच्या फुलांच्या रसाला सोडून बाकीच्या सर्व पुष्प- रसांची अनुज्ञा देतो'.



Wednesday, 18 October 2023

३ संयोजने कोणती

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_३ संयोजने / निवारणे ?_* 

*_(धम्मचक्षू उत्पन्न होणे)_*

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

               _तथागतांचे धम्म प्रवचन ऐकता ऐकता प्रवचन ऐकणाऱ्यांचे धम्म चक्षू उत्पन्न झाले असे आपण बऱ्याच वेळा साहित्यांचा अभ्यास करीत असताना, प्रवचनांमध्ये वाचतो ऐकतो. *पण हा धम्म चक्षू आहे तरी काय? त्याचा नेमका अर्थ काय आहे?*_

                 _*बुद्धांकडून किंवा प्रज्ञावंत - शिलवंत संघाकडून धम्म श्रवण ऐकल्यानंतर त्याचे चिंतन-मनन केल्यानंतर, त्यानुसार आचरण केल्यानंतर धम्म चक्षू उत्पन्न होऊ शकतो.* त्यासाठी पुढील तीन गोष्टीचे चिंतन-मनन व्हायला हवे जर ते झाले तर *उपासकांमध्येही (मिलिंद प्रश्न - उपासकांचे गुण कोणते हे पहावे) धम्म चक्षू उत्पन्न होऊ शकतो.*_

                   _*जेंव्हा तथागतांनी सारनाथ येथे आषाढ पौर्णिमेला धम्म चक्क पवचन केले तेंव्हा सर्वात प्रथम, कौण्डिण्य यांना तो धम्म समजला अर्थात त्यांच्यात प्रथम धम्म चक्षू उत्पन्न झाला. धम्म चक्षू उत्पन्न झाला म्हणजे चित्तामध्ये असलेले तीन विकार/तीन बंधने तुटून पडतात.* हि तीन प्रकारची बंधने अशी आहेत जी मनुष्याला दुःखाकडे - अंधश्रद्धेकडे नेतान, अंधभक्तीकडे नेतात, मिथ्यादृष्टीकडे नेतात तसेच ती विकारे धम्माचे आचरण करू देत नाहीत.  केवळ धम्मच माझे जिवन बदलवू शकते, तेच मला दु:खमुक्तीकडून सुख समाधानाचे जीवन देऊ शकते हा गाढा विश्वास तेंव्हाच निर्माण होतो जेंव्हा हि तीन निवारणे / बंधने आपल्या चित्तामधून निघून जातात._

_भगवान बुद्धांनी उपासकांना / बहूजणांना हि तीन बंधने / निवारणे आपल्या चित्तामधून निघून जाण्यासाठी धम्मचक्षू उत्पन्न व्हावा यासाठी वेळोवेळी उपदेश केला आहे. तीन बंधने| निवारणे पुढील प्रमाणे :-_

_*१) विचिकिच्छा : म्हणजे शंका, एखाद्या वस्तूवर, व्यक्तीवर, त्रिरत्नांच्या गुणांवर - शिकवणुकीवर इं. शंका घेणे.* काहि लोकांच्या मनात आजही अशी शंका आहे कि बुद्ध-धम्म-संघ हे काही माझे कल्याण करणार नाहीत, *ज्यांना बुद्धांचे - धम्माचे- संघाचे तत्वज्ञान / ज्ञान, त्यांनी दिलेला उपदेश माहित नाही, त्यांना त्रिरत्नांबद्दल कधीही श्रद्धा उत्पन्न होत नाही, त्यामुळे ते त्रिरत्नांच्या शिकवणुकीचे आचरण करीत नाहीत.कारण त्यांचा मनात शंका आहे.* तर असे शंका असणारे तथागत हयात असतांनाही होते आणि बाबासाहेब हयात असतांनाहि होते आणि आत्ता ते दोघेही नाहीत तरीही त्रिरत्नांवर शंका घेणारे, बाबासाहेबांच्या ज्ञानावर शंका घेणारे आजही आहेत._

           _तथागतांनी सर्वांना उपदेश देतांना हेच सांगितले कि, हे एक बंधन आहे. प्रथम ते आपल्या चित्तातून बाहेर काढले पाहिजे. विचिकिच्छा म्हणजे शंका जी बुद्धांबद्दल शंका ठेवते त्यांनी दिलेल्या धम्मावर त्यांनी स्थापन केलेल्या संघावर शंका निर्माण करने ते प्रथम दूर केली पाहिजे. ज्यांच्या चित्तात त्रिरत्नांबद्दल विचिकिच्छा असेल ते धम्माचे आचरण करू शकत नाहीत. *ज्यांना दुःखमुक्ती हवी आहे अशांनी त्रिरत्नांबद्दलची असलेली शंका दूर केली तर ते धम्माचे आचरण करण्यास सुरवात करतील आणि एक-एक बंधने तोडून ते दुःखमुक्त होतील.*_

_बाबासाहेबांनी धम्म दीक्षा देतांना आपल्या अनुयायांना २२ प्रतिज्ञा दिल्या होत्या त्यापैकी काही प्रतिज्ञा पुढीलप्रमाणे :-_

_*प्रतिज्ञा क्र. ७) मी बौद्ध धम्माच्या विरुद्ध, विसंगत असे कोणतेही आचरण करणार नाही.*_

_*प्रतिज्ञा क्र. ११) मी भगवान बुद्धांनी सांगितलेल्या अष्टांग मार्गाचा अवलंब करीन.*_

_*प्रतिज्ञा क्र.१२) मी भगवान बुद्धांनी सांगितलेल्या दहा पारमिता पाळीन.*_ 

_*प्रतिज्ञा क्र.२०) तोच सधम्म आहे, अशी माझी खात्री पटलेली आहे.*_

           _या वरील प्रतिज्ञांवर आपण कोणतीही शंका | विचिकिच्छा करीत नाही. बाबासाहेबांनी वरील प्रतिज्ञांद्वारे त्रीरत्नांवर, त्यांनी दिलेल्या शिकवणूकीवर कोणतीही शंका न धरता त्यांचे आचरण केले आणि म्हणून बाबासाहेब आपल्या पुढील प्रतिज्ञेत म्हणतात :-_

_*प्रतिज्ञा क्र. २१) माझा नवा जन्म होत आहे असे मी मानतो / मानते.*_

                 _म्हणजे तथागतांच्या धम्मचक्क पवत्तनाचा उपदेश ऐकून पाच परिव्राजकांपैकी कौण्डिण्य यांचा प्रथम धम्म चक्षू उत्पन्न होऊन ते निर्वाणाचा आस्वाद घेऊ लागले आणि त्यांचाप्रमाणे इतर अश्वजीत, वप्प, महानाम आाणि भद्दिय यांनीहि त्यांच्या त्यांच्या निवारणांचा / बंधनांचा त्याग करून अर्हत पद प्राप्त करून निर्वाणाचा आस्वाद घेत समाजाची सेवा करीत राहिले._

           _या पाच परिव्राजकांनीही तथागतांवर सुरुवातीला जेंव्हा ते सारनाथ येते होते किंवा जेंव्हा त्यांनी तपश्चर्या सोडून अन्न भक्षण केले तेव्हा त्यांच्यावर शंका निर्माण केली होती पण जस जसे तथागतांनी त्यांना आपला धम्म सांगितला तस-तस त्यांच्यात जी काही निवारणे / बंधने होती, त्यांनी धम्माचरणांनी स्वतःत बदल घडवून आणला आणि त्या बंधनांचा त्याग करून, तोडून टाकून त्यांना अर्हन्त पद प्राप्त झाले, ते दुःखमुक्त झाले._

                _त्रीरत्नांवर कोणत्याही परिस्थितीत शंका निर्माण न करता ज्या महान महामानवाने आपल्या सर्वांना जे सर्वश्रेष्ठ रत्न आहे - त्रिरत्न, त्यांना आपल्याला आपल्या सुखासाठी - दु:खमुक्तीसाठी दिली आहेत. त्यांचे आचरण करण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला त्यांच्यावर गाढ श्रद्धा ठेवावी लागणार आहे आणि त्यासाठी विचिकिच्छा हे पहिले बंधन आपल्या सर्वांना तोडावे लागणार आहे._

_*२) सक्काय दिठ्ठी :- आपले जे शरीर आहे त्याबद्दल असणारी आसक्ती / अज्ञान.* हे जे शरीर आहे ते माझे आहे, हे मी आहे. डोक्यापासून ते पायापर्यंत हे जे काही आहे ते मी आहे. हे जी काही इंद्रिये आहेत - डोळे - नाक-कान- इ. माझे आहे. तथागतांनी सांगितले कि हे दुःखाचे कारण आहे. बुद्धांनी जे सर्वोच्च सत्य सांगितले *'अनित्य'* उदा. माझे हे सौंदर्य आहे ते सदैव टिकणार आहे हि जी मिथ्यादृष्टी आहे त्याला तथागत सांगतात कि हे नित्य नाही, अनित्य आहे. हे सौंदर्य पुढे जाऊन संपणार आहे, तुम्ही हि म्हातारे होणार आहात, म्हणून तथागत 'स्वतःच्या शरीराबाबत आसक्त राहू नका असे सांगतात. दैनंदिन जिवनात जीवंत राहण्यासाठी आवश्यक त्या गोष्टी अवश्य करा पण अतिरेक करू नका अशी शिकवण ते देत असतात. सक्कायदिट्ठी हे बंधन असे शिकविते कि मी व माझे या बंधनातून मुक्त व्हायचंय, कोणी मला बोलला... अरे पण मी असे इथे काहीच नाही हिथे सर्वच अनित्य आहे._

           _जे आपल्या शरीराबद्दल आसक्ती बाळगतात त्यांना सक्कायदिठ्ठी हे बंधन कधीच सुखी बनवू देत नाही म्हणून हे दुसरे बंधन सर्वांना तोढायचे आहे. जेव्हा मी व माझे असे काहीच नाही हे सत्य जेव्हा आपल्या समजेल तेंव्हा बुद्धांच्या 'अनित्यनेचा' सिद्धांत / तत्त्वज्ञानाची माहिती आपल्याला समजून येईल आणि तसे आचरण होईल तेव्हा आपण दु:खमुक्तीच्या मार्गातील अजून एक पाऊल पुढे टाकू._

_*३) सिलबत्त परामास : शिलाचे बंधन, शिल पालन करण्याचा अहंकार उत्पन्न करणे. गंगेत मी जर एक डुबकी मारली तर माझे सर्व पापकर्म धूवून निघेल हि जी 'अंध' श्रद्धा बाळगून वावरणे, किंवा त्याप्रमाणे वागणे, त्याप्रकारचा अहंभाव निर्माण होणे.* काहिंना श्रीमंतीचा अहंभाव असतो तर काहींना शिल पालनाचा अहंभाव असतो पण बुद्धांनी हे सुद्धा एक बंधन आहे असे सांगितले आहे._

_उदा. क्र १) काही जण विपश्यना शिबीरात जात असतात (सन्मानीय अपवाद वगळता) तेथे ते किती प्रामाणिकपणे अभ्यास करीत असतात हा एक प्रश्नच आहे पण ते सांगतांना मी अमुक एवढे - एवढे शिबीरे केली आहेत, तुम्ही एकपण शिबीर केले नाही असा कुत्सितपणे प्रश्न विचारतात. शिबीर करण्याचा एक अहंभाव त्यांच्यात निर्माण होतो त्यामुळे सामान्य उपासक त्यांच्या बाजूला जात नाहि किंवा ते जे सांगत असतात त्यांना गांभिर्याने हि देखील घेत नाहीत._

_उदा क्र २) आज बरेच बौद्धाचार्य (सन्मानीय अपवाद वगळता) काही गाथा पाठ करून ते धार्मिक विधी करीत असतात तर काही प्रवचने हि देत असतात पण त्यांच्याकडे पाहता क्षणीच किंवा त्यांच्या सानिध्यात आलो तर त्यांच्या बोलण्यातून एक प्रकारचा अहंभाव दिसून येतो._

_उदा क्र ३) एक उपासक (सन्मानीय अपवाद वगळता) जो अष्टशिलांचे पालन करतो, उपोसथ व्रत धारण करतो त्या उपासकांत ही अशाच प्रकारचा अहंभाव निर्माण होत असतो. तो इतरांना कमी लेखतो._ 

             _जीवनात शील पालन करण्याचा अहंभाव निर्माण होणे यालाच सिलबत्त परामास म्हणतात याच बंधनाला आपल्याला तोडून टाकायचं आहे._

              _*या तीन बंधनातून १) विचिकिच्छा २) सक्कायदिट्ठि ३) सिलबत्त परामास यामधून आपल्याला मुक्त व्हायचे आहे. धम्माचे आचरण करून या ३ निवारणांपासून आपण मुक्त झालो पाहिजे. जेव्हा एक अनुयायी त्रिरत्नांच्या शिकवणुकीचे आचरण करीत असतो म्हणजेच त्रिरत्नांप्रती श्रद्धा उत्पन्न करीत असतो,  जो या ३ बंधनामुक्त झाला, ज्याने हि ३ बंधने तोडली, ज्याचे चित्त या ३ बंधनातून मुक्त झाले त्याच्या चित्तामधून धम्म चक्षू उत्पन्न होतो. यालाच म्हणतात धम्मवान होणे, धम्मचक्षूवान होणे. ज्यावेळी आपण असे वाचतो - ऐकतो कि तथागतांचे प्रवचन ऐकूण उपस्थित उपासकांतील / संघातील व्यक्तीचा धम्म चक्षू उत्पन्न झाला तर काय झाल? त्याच्या चित्तातील हे तीन बंधने तूटून पडतात.*_

         _बाबासाहेबांनी आपल्याला धम्मदिक्षा देण्यापूर्वी किंवा आत्ताही काही प्रमाणात समाजातील काही मते अशी आहेत की त्यांचा उद्धार-जीवनातले दुःख फक्त न फक्त त्यांच्या देवी-देवताच करू शकतात कारण आजही त्यांची अशी श्रद्धा आहे की तेच आमचे सुखकर्ता आणि दुःखहर्ता आहेत._

        _पण धम्मदिक्षा मिळाल्यानंतर त्रीरत्नांच्या शिकवणूकीनुसार आचरण केल्यानंतर जे खरे दु:खमुक्तीचे चित्र दिसत आहे ते पाहून जे त्रीरत्नांच्या शिकवणुकीवर / बाबासाहेबांच्या ज्ञानावर विचिकिच्छा / शंका उपस्थित करीत होते ते आता त्रीरत्नांवर / बाबासाहेबांवर डोळसपणे श्रद्धा व्यक्त करीत आहेत, त्यांच्यातली शंका / विचिकिच्छा दूर होत आहे._

         _तथागतांच्या 'अनित्यतेचा' सिद्धांत समजल्यावर मी व माझे असे काहीच नाही ह्याची जी बंधन होते - सक्काय दिठ्ठि हे तोडून टाकतो. हे तोडून टाकल्यानंतर जो अहंभाव / अहंकार निर्माण झाला होता - शिल पालनाचा त्यामुळे निर्माण झालेली अंधभक्ती/ अंधश्रद्धा हि बंधने तोडल्यावर आपण हि आपला धम्मचक्षू उत्पन्न करू शकतो, धम्मचक्षूवान बनू शकतो._

        _*यासाठी बाबासाहेबांनी दिलेला मार्ग, तथागतांनी दिलेली शिकवण आत्मसात करून त्यानुसार आचरण करावे लागणार आहे. आणि हया तीन निवारणातून आपण मुक्त होऊ शकतो आणि अशा व्यक्तीस पाली साहित्यात 'श्रोतापन्न' असे म्हणतात. श्रोत म्हणजे प्रवाह, म्हणजे जसा नदीचा प्रवाह असतो आणि पन्न म्हणजे पडणे. ज्या धम्म अनुयायीने आपल्या जीवनातील हि तीन निवारणे तोडून टाकली, ज्याचे चित्त हया तीन निवारणातून मुक्त झाले तो व्यक्ती खऱ्या अर्थाने 'श्रोतापन्न' झाला, म्हणजेच प्रवाहामध्ये प्रतिष्ठित झाला. दु:खमुक्तीच्या मार्गात प्रतीष्ठित झाला.*_ 

_*यापूढील पायऱ्या सकृतागामी, अनागामी, अर्हत अशा आहेत.*_

_*या तीन निवरांसोबत इतर सात अधिक निवारणे आहेत म्हणजेच एकून १० निवारणे आहेत -*_

*४) कामराग (कामवासना)* 

*५) पटीघ (क्रोध)* 

*६) रूपराग (अरूप देवलोक प्राप्तीची इच्छा)*

*७) अरूपराग (अरूप देवलोक प्राप्तीची इच्छा)* 

*८) मान (अहंकार)* 

*९) उद्धंच (भ्रांतचित्तता)* 

*१०) अविज्जा (चार आर्य सत्यांचे अज्ञान)*

               _ही पुढील निवारणे जसं जसं धम्माच्या मार्गात अधिक प्रतीष्ठित होत जाऊ तस तशी ती निवारणे तुटून जातील आणि निब्बाणाची सर्वोच्च पातळीचा आनंद प्रत्येक व्यक्तीला घेता येऊ दे अशी मङ्गल कामना - मङ्गल मैत्री व्यक्त करतो._

*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_महेश कांबळे_*

*_दिनांक :- १९/१०/२०२३_*

*_संदर्भ :-_*

*१) वर्षावास २०२३ काळातील मान्यवर संघाची प्रवचने*

*२) बाबासाहेबांनी दिलेल्या २२ प्रतिज्ञा*

*३) भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म लेखक डॉ बाबासाहेब आंबेडकर*

*४) बुद्ध धर्मावरील चार निबंध लेखक धर्मानंद कोसंबी*

*५) बौद्ध प्रश्नोत्तरी लेखक कर्नल एच एस ऑलकॉट*

https://mikamblemahesh.blogspot.com/2023/10/blog-post_18.html

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

Tuesday, 10 October 2023

समाधीला अपायकारक असणाऱ्या राहण्याच्या जागा

 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_समाधीला अपायकारक असणाऱ्या राहण्याचे ठिकाण_*

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

   🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 

_आवासो च कुलं लाभो गणो कम्मं च पंचमं ।_

_अद्धानं जति आबाधो गन्थो इद्धीति ते दस ।।_  

*_महावासं नवावासं जरावासञ्च पन्थनिं ।_*

_*सोण्डिं पण्णञ्च पुप्फञ्च फलं पत्थितमेव च ।।*_

_*नगरं दारुना खेत्तं विसभागेन पट्टनं ।*_ 

*_पच्चन्तसीमासप्पायं यत्थ मित्तो न लब्भति ।।_* 

*_अठ्ठारसेतानि ठानानि इति विञ्ञाय पण्डितो ।_* 

*_आरका परिवज्जेय्य मग्गं पटिभयं यथा ।।_*

                                          *_- विसुद्धीमग्ग_*

           _कुशल चित्ताच्या एकाग्रतेसाठी / समाधीसाठी पंचशिलांचे रक्षण करणे अत्यंत आवश्यक आहे. पंचशीलांचं योग्य पद्धतीने आचरण केले तरी पण योग्य ठिकाणी / परिसरात किंवा योग्य परिस्थितीत राहता आले नाही तर समाधी साध्य होण्यास अडचणी येऊ शकते._

_*आवास म्हणजे राहण्याची जागा. ती राहण्यास / समाधीसाठी अयोग्य कशी होते ?*_

_*१) महावास* म्हणजे ज्या ठिकाणी बरेचसे लोक एकत्रित राहत असतात , जिथे मोठ्या प्रमाणात गोंगाट होत असतो अशी जागा. उदा. आपण एका बैठ्या चाळीत राहत असू तर तेथेवेगवेगळ्या प्रांतांची संस्कृतींची माणसे राहत असतात, ते त्यांच्या सणाला, आनंदी क्षणाला स्पीकरवर गाणी लावत असतात. अश्या ठिकाणी जर समाधीचा अभ्यास केला तर तो होणार नाही, कारण सातत्याने होणारा गोंगाट, आपल्या दरवाज्यात जर कोणी घाण केली तर ती जागा आपल्यालाच स्वच्छ करावी लागणार हा सातत्याने येणारा विचार त्यामुळे अशी जागा समाधीस योग्य नाही._

_*२) नवावास* म्हणजे जेथे नवीन काम चालू असते. अश्या जागेवर सुतार, गवंडी, इतर कामगार यांच्याकडून समाधी साधनेत अडचण येऊ शकते. अश्या ठिकाणी इमारतीचे डागडुजी करीत असतांना पडलेले रॅबिट, सैरावैरा पडलेले साहित्य त्यामुळे समाधी साधनेत / चंक्रमन करीत असताना बाधा येत असते.

_*३) जरावास* म्हणजे जीर्णशाला. एखाद्या जुन्या-पडक्या इमारती मध्ये राहू लागलो तर तेथे बर्याच अडचणी येत असतात. उदा वरचे छत बरोबर नसल्यामुळे पावसाळ्यात पाणी आत शिरते, भिंतींवरचे पापुद्रे खाली पडत असतात, वाळवी लागते, अश्या ठिकाणी उंदरांचा आणि इतर जीवजंतू फिरत असतात. अश्या पडक्या ठिकाणी घराची चिंता लागून राहिली असता समाधीत चित्त कसे लागणार?_

_*४) पन्थनी* म्हणजे मोठ्या रस्त्याच्या / नाक्याच्या जवळची जागा. अशा ठिकाणी गाडीवाले गाड्या उभ्या करून पाणी मागण्यासाठी येतात, प्रवासी विश्रांतीसाठी येऊन बसतात, व गप्पागोष्टी करतात, मोटारींच्या हॉर्नच्या आवाज या व इतर कारणांमुळे त्रास होण्याचा बराच संभव आहे._

_*५) सोण्डी* म्हणजे हौद / सार्वजनिक तलाव. याठिकाणी अनेक लोक पाणी पिण्यासाठी अगर अंघोळी करण्यासाठी येतात, व अशा ठिकाणी योगाभ्यास करण्यास कठीण जाते._

_*६) पण्ण किंवा पर्ण* म्हणजे शाकभाजीत उपयोगात येणारी पाने, अशा ठिकाणी बायकामुले पाने गोळा करण्यासाठी येतात, मोठ्याने गप्पागोष्टी करतात - गातात._

_*७) पुप्फ किंवा पुष्प* म्हणजे फुलांचा मळा. येथेही फुले एकत्र करण्यासाठी बायकामुले येत असतात. ते इकडेतिकडे बागडत असतात, खेळत असतात._

_*८) फल* म्हणजे फळांची बाग. तेथेही वरच्याप्रमाणेच त्रास होतो._

_*९) पत्थित किंवा प्रार्थित* म्हणजे प्रार्थनेची / यात्रेची जागा. प्रार्थनेची / यात्रेची जागा जरी रमणीय असली तरी तेथे येणारा जनसमुदाय हा शांत बसत नाही, तो उत्साहाने समाधी करणाऱ्या बाजूला जातात त्यांना हा कोणीतरी सत्पुरुष असावा, अशा समजुतीने यात्रेकरू योगाभ्यास करणाऱ्या माणसापाशी येऊन त्याला अनेक प्रश्न विचारतील, किंवा आदरसत्कार करून त्याचे स्तोम माजवतील._

_*१०) नगर* म्हणजे नगराच्या जवळ असलेली जागा. येथे गाड्यांचा आणि मनुष्यांचा वारंवार त्रास पोचल्यावाचून रहात नाही._

_*११) दारु* म्हणजे इमारतीला उपयोगी पडणाऱ्या लाकडांचे जंगल. अशा ठिकाणी लांकुडतोडे येऊन काम करीत असतांना ते शांतपणे काम करीत नाहीत सोबत त्यातील ९०% पेक्षा जास्त हे नशापान करणारी असतात अश्या ठिकाणी समाधी करणे योग्य नव्हे._

_*१२) खेत्त किंवा क्षेत्र* म्हणजे शेतीची जागा. अशा ठिकाणी शेतीच्या कामासाठी शेतकरी येऊन गडबड करतात; पक्षी शेतातले अन्नधान्य खाऊ नये म्हणून ते पिकांवर बसू नये यासाठी आरडाओरड करावी लागते._

_*१३) विभाग* म्हणजे जेथे परस्परविरोधी लोक राहतात. अशा ठिकाणी दोन किंवा जास्त गटामध्ये कधीही भांडणं होऊन त्याचे पर्यवसन हाणामारीत होऊ शकते._

_*१४) पट्टन* म्हणजे बाजार भरण्याची जागा, मोठमोठी जहाजे थांबण्याची जागा, जेथे मासोळी व इतर वस्तूंचा बाजार भरतो अशी जागा. ही वर्दळीची जागा असल्याने येथे शांतता मिळत नाही._

_*१५) पञ्चन्त किंवा प्रत्यन्त* म्हणजे जंगली - रानटी लोक राहतात अशी जागा. तेथे लोकांना समाधी अभ्यासाची किंमत माहीत नसल्यामुळे ते निवासस्थानाच्या आसपास शिकार करून किंवा अशाच अन्य प्रकाराने समाधीला पुष्कळ अडचणी आणीत असतात._

_*१६) सीमा* म्हणजे राज्याची सीमा. अशा ठिकाणी हा कोणीतरी गुप्तहेर असेल अशी शंका येऊन दोन्ही देशातील सैनिकी अधिकाऱ्यांपासून त्रास होऊ शकतो._

_*१७) असप्पाय* म्हणजे अपथ्यकारक जागा. ह्या ठिकाणी व्यवस्थित जेवणखाण मिळत नाही, अश्या ठिकाणी कामोद्दीपक विषय पाहण्यात ऐकण्यात येत असते._

_*१८) मित्त किंवा मित्र* म्हणजे समाधिमार्गात उपयोगी पडणारा मित्र, ज्याने प्रयत्नाने समाधि साध्य केली असेल, ज्याला समाधिमार्गांतील अडचणी माहीत असतील असा मित्र तेथे राहत नसेल._

            _याप्रमाणे ही अठरा स्थाने सदोष समजली जातात. या ठिकाणी जी समाधीस उपयुक्त असणारी शांतता, समाधीस पोषक वातावरण नसते त्यामुळे समाधी करणार्यास बर्याच अडचणी येत असतात. अशास (अपवाद वगळता) समाधी करता येत नाही._

*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_महेश कांबळे_*

*_दिनांक :- ०९/१०/२०२३_*

*_संदर्भ :-_*

*_१) विशुद्धीमग्ग - लेखक आचार्य बुद्धघोष

https://mikamblemahesh.blogspot.com/2023/10/blog-post_10.html

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

Sunday, 8 October 2023

भिक्षुणीने एकटे राहू नये

 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_भिक्षुणीने एकटे राहू नये_* 

*_(एका आरोपाचे खंडन)_*

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

   🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼           

              _तथागतांनी भिक्षु संघाची स्थापना केल्यानंतर बर्याच कालावधीनंतर भिक्षुनी संघाची स्थापना केली. पण जेव्हा भिक्षुनी संघाची स्थापना झाली तेंव्हा बुद्धांनी त्या काळच्या परिस्थितीनुसार काही *अधिक नियम* घालून दिले होते. *बौद्ध धर्मावर कित्येक निराधार आरोप करण्यात येत असतात त्यापैकीच एक हा की बुद्धांनी स्त्री- स्वातंत्र्याला विरोध केला. विनयपीटकातील भिक्षु व भिक्षुनी यांच्या नियमांची / विनयांची संख्या पाहता हा आरोप वरकरणी खरा वाटू शकतो.*_

             _इतर धर्मामध्ये प्राचीन काळात स्त्रियांना आणि शूद्रांना वेदाधिकार नव्हता. असा प्रकार काही बौद्ध धर्मामध्ये स्थापनेपासून ते आजतागायत नाही. *बौद्ध धम्मात स्त्रियांना सर्व धर्मग्रंथ वाचण्याचे अभ्यास करण्याचे स्वातंत्र्य आहे.* ब्रह्मदेशात त्रिपिटक ग्रंथाचे अध्ययन केलेल्या आणि करणाऱ्या पुष्कळ स्त्रिया आहेत. इंग्रज सरकारच्या तर्फेने ब्रह्मी राजाच्या पद्धतीस अनुसरून पालिभाषेतील बौद्ध वाङ्मयाची परीक्षा घेऊन काही बक्षिसे वाटण्यात येत होते. या परीक्षेत उत्तीर्ण होऊन बऱ्याच स्त्रियांनी बक्षिसे मिळविली होती आणि आजही मिळवित आहेत._

            _भिक्षुस एकटे राहण्याची अनुमती देत असतांना तथागत भिक्षुणीस एकटे राहण्याची अनुमती देत नाही हे वरवर पाहता हा भिक्षुणीं संघावर अन्याय आहे असे वाटते. ह्यावर उत्तर देत असताना आपण प्रथम तथागतांचा स्त्री विषयक दृष्टिकोन कसा होता हे आपण काहीं उदाहरणें घेऊन पाहूया_

         _*मङ्गलसुत्तांत आणि सिगालसुत्तांत गृहस्थांनी गृहिणींचा आदर करण्याविषयी बुद्धांनी उपदेश केला आहे.

*_उदाहरण क्र १_*

_*नकुलमाता नावाच्या एक प्रमुख उपासिकेस उपासिकावर्गात अग्रस्थान का मिळाले होते?* त्याची थोडक्यात माहिती पुढीलप्रमाणे:-_

             _भर्गदेशात शिशुमारगिर या ठिकाणी भगवान् बुद्ध रहात होते. तेथे त्या वेळी नकुलपिता नावाचा गृहस्थ फार आजारी होता. त्याचा मरणकाळ समीप आहे असे सर्वांस वाटत होते. तेव्हा त्याची पत्नी त्याला म्हणाली "हे गृहपति, प्रपंचासक्त होऊन - तू मरता कामा नये. अशा प्रकारचे सापेक्ष (प्रपंचाच्या तळमळीने आलेले) मरण दुःखकारक आहे, असे भगवंताने सांगितले आहे._ 

           _हे गृहपति, कदाचित् तुझ्या मनात अशी शंका येईल की, 'मी मेल्यावर, नकुलमाता मुलांचे पालन करू शकणार नाही, प्रपंचाचा गाडा हाकू शकणार नाही.', परंतु गृहपति, अशी शंका तू मनामध्ये आणू नकोस. कारण मला कापसाचे सूत काढण्याची कला माहिती आहे, व मला लोकर तयार करता येत आहे. या कलेने मी तुझ्या मरणानंतर मुलांचे पोषण करू शकेन. म्हणून है गृहपति, प्रपंचाची तळमळ मनामध्ये ठेवून तुला मरण येऊ नये, असे माझे म्हणणे आहे._

        _हे गृहपति, दुसरी तुला अशी शंका येण्याचा संभव आहे की, 'नकुलमाता माझ्या पाठीमागे पुनर्विवाह करील,' परंतु ही शंका तू सोडून दे. *मी आज सोळा वर्षे गृहस्थब्रह्मचर्य (उपोसथव्रत) पाळीत आहे हे तुला ठाऊकच आहे. मग मी तुझ्या मृत्यूनंतर पुनर्विवाह कसा करीन?*

      _*हे गृहपति, तुझ्या मरणानंतर मी बुद्धभगवंताचा आणि भिक्षुसंघाचा धर्मोपदेश श्रवण करण्यास जाणार नाही अशी तुला शंका येण्याचा संभव आहे; पण तुझ्या मागे पूर्वीप्रमाणेच बुद्धोपदेश ऐकण्याच्या कामी माझा आदर राहील, अशी तुझी पक्की खात्री असू दे; आणि म्हणून तळमळीवाचून तुला मरण येऊ दे.*_ 

         _*हे गृहपति, तुझ्या पाठीमागे मी बुद्धोपदिष्ट शीलाचे यथासांग पालन करणार नाही, अशी तुला शंका येण्याचा संभव आहे. पण ज्या उत्तम शीलवती बुद्धोपासिका आहेत, त्यापैकी मीहि एक आहे, हे तू खात्रीने समज आणि म्हणून तळमळीवाचून तुला मरण येऊ दे.*_

            _हे गृहपति, *मला समाधिलाभ झाला नाही अतएव तुझ्या मरणाने मी फार दुःखी होईन- असे तू समजू नकोस. ज्या कोणी बुद्धोपासिका समाधिलाभिनी असतील, त्यापैकी मी एक आहे असे तू समज* आणि मनाची तळमळ सोडून दे._

       _हे गृहपति, *बौद्धधर्माचे तत्त्व मला अद्यापि समजले नाही अशीहि तुला कदाचित् शंका येईल. परंतु ज्या कोणी तत्त्वज्ञ उपासिका असतील त्यापैकीच मी एक आहे, हे तू पक्के ध्यानात ठेव* आणि मनाची तळमळ टाक."*

         _या नकुलमातेच्या सांत्वनाने नकुलपित्याच्या मनाचे समाधान झाले आणि त्याचा तो आजार लवकरच शमला. आजारातून बरा झाल्यावर तो बुद्धदर्शनास गेला. तेथे *बुद्धांनी त्याला म्हटले “हे गृहपति, तू मोठा पुण्यवान् आहेस नकुलमातेसारखी उपदेश करणारी आणि तुझ्यावर प्रेम करणारी पत्नी तुला मिळाली आहे. हे गृहपति, उत्तम शीलवती अशा ज्या काही उपासिका आहेत, त्यापैकी ही एक आहे, अशी पत्नी तुला सापडली हे तुझे भाग्य होय !"*_

*_उदाहरण क्र २_*

      _सिगालसुत्तात भगवंत सिगालास उपदेश देतांना म्हणतात, हे गृहपतिपुत्र ! पाच गोष्टीनी पतीने पश्चिम दिशा जी पत्नी तिची पूजा करावी:_ 

_*(१) तिला मान द्यावा*_

_*(२) कोणत्याहि तऱ्हेने तिचा अपमान होऊ देऊ नये*_

_*(३) अन्य स्त्रीशी संबंध ठेवू नये (एक पत्नीव्रत आचरावे)*_

_*(४) घरचा कारभार तिच्यावर सोपवावा*_

_*(५) तिला वस्त्राच्छादनाची कमतरता पडू देऊ नये*_

             _या पाच गोष्टीनी जर पतीने पत्नीची पूजा केली तर ती पतीस पाच प्रकारानी उपकारक होते :_ 

_*(१) घरात चांगली व्यवस्था ठेवते*_

_*(२) नोकरचाकराला प्रेमाने संभाळते*_

_*(३) पतिव्रता होते*_

_*(४) पतीने मिळविलेल्या संपत्तीचे रक्षण करिते (उघळेपणा करीत नाही)*_

_*(५) सगळ्या गृहकृत्यात उद्योगी आणि दक्ष होते. याप्रमाणे जर पतीने पश्चिमदिशा जी भार्या तिची पूजा केली तर ती त्याला सुखावह होते.*_

*_उदाहरण क्र ३_*

               _*मल्लिक्का सुत्तात राजा पसेनदी यांस कळते की त्याच्या पत्नीने राणी मल्लिक्काने कन्येस जन्म दिला. हे ऐकून तो दुःखी होतो तेंव्हा भगवंत त्याला  स्त्री कशी श्रेष्ठ असते  समजावून सांगतात.*_

*_उदाहरण क्र ४_*

_*लोहिच्च सुत्तात लोहिच्च ब्राह्मण असे म्हणतो की स्त्री आणि शूद्र यांना शिक्षण देणे चुकीचे आहे. तेंव्हा तथागत लोहिच्च ब्राह्मणाचा धिक्कार करतात आणि तो कसा चुकीचा आहे हे त्याला समजावून सांगतात.*_

      _*हे व अशा कित्येक उदाहरणावरून भगवंतांना स्त्रियांची योग्यता किती वाटत होती, ये स्त्रियांचा किती आदर करीत होते हे आपणास समजून येते.*_

           *_स्त्री स्वातंत्र्य जर बुद्धाला पसंत होते, तर भिक्षुणीसाठी त्यांनी कडक नियम केले हे कसे? याचे उत्तर थोडक्यात द्यावयाचे म्हटले म्हणजे, त्या काळच्या समाज परिस्थितिला पाहून हे नियम बुद्धांना करावे लागले._* 

          _*भिक्षुणीने एकटे राहू नये असा बुद्धांनी नियम केला, असा निर्बंध भिक्षूंस नव्हता. अर्थात् हा नियम स्त्रीस्वातंत्र्यविघातक आहे; असे सकृतदर्शनी कोणालाहि वाटण्याचा संभव आहे. पण त्या काळच्या समाजरचनेकडे लक्ष्य दिले असता हा नियम योग्य होता असेच म्हणावे लागेल.* हे स्पष्ट करण्यासाठी आपण हे शुभा नावाच्या भिक्षुणीची गोष्ट पाहूया :-_

           _शुभा भिक्षुणी एके दिवशी जीवक वैद्याच्या आम्रवनास एकटीच जात होती. वाटेत तिला एका लबाड मनुष्याने गाठले. तिच्या सुंदर रूपाकडे पाहून तो भुलून गेला, आणि आपली दुष्ट वासना तृप्त करण्यासाठी तिचे मन वळवू लागला. तिने त्याला अनेक प्रकारे उपदेश केला; परंतु त्या कामांध माणसावर त्याचा काही एक परिणाम झाला नाही. शेवटी तो बलात्कार करण्यास सुद्धा तयार आहे असे जेव्हा शुभेला दिसून आले, तेव्हा ती त्याला म्हणाली “अरे, तू मला का अडवीत आहेत?" तो पुनः तिच्या नेत्रादि सुंदर अवयवांचे वर्णन करू लागला, आणि म्हणाला "हे सुंदरि, हे तुझे सुंदर नेत्रयुग्म पाहून मी कामविकाराने पीडित झालो आहे. सुंदरि, तुझ्यावाचून प्रियतर असे मला या जगामध्ये काही नाही." शुभा म्हणाली, "एवढेच ना? या माझ्या डोळ्यांचीच तुला गरज. काही हरकत नाही. घे हा डोळा." असे म्हणून बोटाने डोळा उपटून तो तिने त्याच्या हातावर ठेवला. हे तिचे साहसी कृत्य पाहून तो मनुष्य घाबरून गेला, आणि त्याने तिला साष्टांग प्रणिपात करून तिची क्षमा मागितली.

            *_आजच्या आधुनिक युगात एकटी स्त्री ही सुरक्षित नाही हे सत्य आपण स्वीकारतो. आपण अंदाज लावू शकतो की, भारतासारख्या प्रगतशील राष्ट्रात दर दिवसाला एक बलात्कार होत आहे जर आजच्या युगात स्त्री ही सुरक्षित नाही तर २६०० वर्षांपूर्वी परिस्थिती कशी असेल याचा निदान अंदाज तरी लावला तरी हे कळून येईल की त्यावेळची एकटी स्त्री ही खूपच असुरक्षित होती._*

           *_भिक्षु जीवन म्हणजे गृहत्यागाचे जीवन. एखाद्या जंगलात-वनात-विहारात एकटे राहून निब्बान प्राप्त करण्यासाठी त्यांना अभ्यास करावा लागतो त्यावेळी (आणि आजही) भिक्षु-भिक्षुणींना संसार त्यागावा लागतो आणि निब्बाण प्राप्तीसाठी अभ्यास करावा लागतो पण अशावेळी कोणत्याही भिक्षुणीवर जसा शुभा भिक्षुणीवर प्रसंग आला तश्या  प्रकारचा प्रसंग येऊ नयेत एवढ्यासाठी त्यांनी एकाकी राहू नये, असा बुद्धांनी नियम केला असला पाहिजे._*

*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_महेश कांबळे_*

*_दिनांक :- ०९/१०/२०२३_*

*_संदर्भ :-_*

*_१) मङ्गल सुत्त_*

*_२) सिगालसुत्त_*

*_३) विनय पिटक_*

*_४) बुद्ध धर्मावरील चार निबंध, लेखक धर्मानंद कोसंबी_*

*_५) मल्लिका सुत्त_*

*_६) लोहिच्च सुत्त_*

*_७) भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2023/10/blog-post_8.html

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

Saturday, 7 October 2023

श्रामणेर प्रवज्जा

 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_श्रामणेर प्रवज्जा_* 

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

             _सिद्धार्थ गौतम भगवान बुद्ध झाल्यानंतर खूप काळानंतर राजगृहातुन कपिलवस्तूला आले होते, तेथे ते *निग्रोधारामात* रहात असे. एके दिवशी तथागत व त्यांच्या संघास शुद्धोदन राजाने भोजनाचे निमंत्रण दिले. भोजनासाठी जेंव्हा तथागत शुद्धोदनाकडे गेले तेंव्हा, राहुलची आई त्यांना पाहून राहुल कुमाराला म्हणाली, "राहुल, हे तुझें पिता आहे. त्याजवळ जाऊन आपले दायाद्य माग." तेव्हा राहुल बुद्धांपुढे जाऊन उभा राहिला आणि म्हणाला, "हे श्रमणा, तुझी सावली सुखकर आहे." भगवान् आसनावरून उठून चालते झाले, व राहुल "मला दायाद्य द्या. दायाद्य द्या." असे म्हणून मागोमाग गेला. *विहारात गेल्यावर राहुलाला दायाद्य द्यावयाच्या उद्देशाने सारिपुत्राला बोलावून तथागतांनी त्याला प्रवज्जा देण्यास सांगितले.*_

           _राहुलला आपण कशाप्रकारे प्रवज्जा द्यावी अशी सारिपुत्राने तथागतांकडे विचारणा केली, तेव्हा भगवान ह्या प्रकरणी भिक्षूंना गोळा करून म्हणाले, “भिक्षुहो, तीन शरण गमनांनी श्रामणेर प्रवज्जा देण्यात यावी. ती अशी:-_

*_१) प्रथम त्या मुलाचे क्षौर करावे._*

*_२) त्याला काषायवस्त्रे नेसवावी_* 

*_३) भिक्षूंच्या पाया पडावयास लावून उकिडव्याने हात जोडून बसवावे* व ही वचने त्रिवार उच्चारावयास लावावी -_

*_बुद्धं सरणं गच्छामि, धम्मं सरणं गच्छामि, संघं सरणं गच्छामि_*

_ह्या तीन वचनांनी श्रामणेराला प्रवज्जा द्यावी." ह्याप्रमाणे सारिपुत्राने राहुलला प्रवज्जा दिली._

         _राहुलची श्रामनेर दीक्षा झाल्याची पाहून शुद्बोदन राजास अतीव दुःख झाले आणि ते भगवंताजवळ येऊन म्हणाले, “मी भगवंताजवळ एक वर मागतो.” बुद्ध म्हणाले, "तथागत वर देत नसतात." शुद्बोदन-"जो वर योग्य असून अनवद्य आहे तो भगवंत देतील की नाही ?" भगवंत-"असे असेल तर बोला. " शुद्बोदन -“भगवंताने प्रवज्जा घेतली तेव्हा मला अत्यंत दुःख झाले. त्यानंतर नंद भिक्षु झाला त्या वेळी ही झाले व आता राहुल श्रामणेर झाला तेव्हा तर विचारूच नये. पुत्रप्रेम असे आहे की, ते कावडी, मांस, स्नायु व हांडे ह्यांनाहि भेदून जाते. तेव्हा *आजपासून आईवडिलांनी परवानगी दिल्याशिवाय कोणालाहि श्रामणेर किंवा भिक्षु करण्यात येऊ नये."* शुद्धोदन राजा निघून गेल्यावर *भगवान संघास उद्देशून म्हणाले' "आजपासून आईवडिलांनी परवानगी दिल्यावाचून मुलाला प्रव्रज्या देऊ नये."*_

          _कपिलवस्तूहून बुद्ध श्रावस्तीला आले. तेथे बरेच श्रामणेर गोळा झाले होते. आपणास पाळावयाचे नियम कोणते अशी त्यांना शंका आली; तेव्हा खालील दहा नियम पाळण्यास शिकावे अशी भगवंतांनी त्यांना परवानगी दिली :-_ 

*_(१) प्राणघातापासून विरति_* 

*_(२) अदत्तादानापासून विरति_* 

*_(३) अब्रह्मचर्यापासून विरति_* 

*_(४) असत्य भाषणापासून विरति_* 

*_(५) सुरापानादिक मादक पदार्थांपासून विरति_*

*_(६) विकाल- भोजनापासून विरति_*

*_(७) ग्राम्य नृत्य गीत वाद्यांपासून विरति_*

*_(८) पुष्पमाला गंधविलेपन भूषणे इत्यादिकांपासून विरति_* 

*_(९) उंच आणि उंची शय्येपासून विरति_*

*_(१०) सोने आणि रुपे ग्रहण करण्यापासून विरति_*

     *_हे श्रामणेरांनी पाळण्यायोग्य दहा नियम आहेत. ते पाळण्यास त्यांनी शिकावे._*

           _त्या काळी *काही श्रामणेर भिक्षूंचा आदर ठेवीत नसत. तेव्हा त्यांना दंड करण्याची बुद्धांनी परवानगी दिली. तो दंड असा:-*_

*_१) त्यांना आपल्या उठण्या - बसण्याच्या खोलीतून बाहेर जाण्यास सांगावे. परंतु विहाराच्या आवाराबाहेर घालवून देऊ नये._* 

*_२) त्यांना जेवणा खाणाची मनाई करू नये._* 

*_३) जो श्रामणेर प्राणघात, चोरी, अब्रह्मचर्य, असत्य भाषण किंवा मद्यपान करील, अथवा बुद्धाची, धर्माची किंवा संघाची निंदा करील, मिथ्यादृष्टि घेऊन बसेल, किंवा भिक्षुणीशी असभ्य व्यवहार करील त्याला श्रामणेर ठेवू नये, संघातून बाहेर करावे_*

*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_महेश कांबळे_*

*_दिनांक :- ०८/१०/२०२३_*

*_संदर्भ :-_*

*_१) भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म, लेखक डॉ बाबासाहेब आंबेडकर_*

*_२) बुद्ध धर्मावरील चार निबंध, लेखक धर्मानंद कोसंबी_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2023/10/between-two-farmers-1.html

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼


Tuesday, 3 October 2023

दोन शेतकऱ्यांमधील संवाद

 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_Conversation between two farmers _*

*_दोन शेतकऱ्यांमधील संवाद_* 

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

_1. Good morning. *सुप्पभातं ।*_

_2. It is good of you to have come here: *सुन्दरं तथा कतं इध आगच्छन्तेन।*_ 

_3. I hoped that you would come as I was anxious to meet you; *अहं तया समागन्तुं इच्छन्तो तब आगमनं पच्यासिंसन्तु वसिं ।*_

_4. Why have you been away so long ? *कस्मा त्वं चिराय इध नागतो सि?*_

_5. I could not go anywhere for about a month as I was ill; *गेलञ्ञेन आभिभूतोऽहं एक मासमत्तं कत्थचि पि गन्तुं नाखक्खिं ।*_

_6. Was your harvest fruitful ? *तव सस्सं निप्फन्नं वा नो वा?*

_7. My crop was destroyed by an excess of water, only a small quantity left unharmed; *अधिक जलेन मम सस्सं विनस्सि; थोकं एवं अविसिट्ठं अहोसि*_

_8. What about your own crop ? *का भवती सस्से पवत्ति?*_

_9. At first, some cattle broke the fence and ate the young plants, and then the remainder died of drought; *पठमं गावो वत्तिं भिन्दित्वा तरुणासस्सं खादिंसु अथावसिट्ठं अनोदकेन मिलायि*_

_10. If it is so how will you feed your family  *यज्जेवं, कथं त्वं अत्तनां कुटुम्बं पोसेतुं सक्कोसि ?*

_11. I will earn my living by selling pot-herbs brinjals, pumpkins, etc, *अहं साकपण्णाणि च भण्डाकीकुमाण्डादीनि च विक्किणित्वा जीविकं कप्पेस्सामि ।*_

_12. Are there many orange trees in your garden; *सन्ति वब उय्याने बहु जम्बीररुक्खा ?*_

_13. There are twenty trees in my garden; *वीसति रुक्खा मम उय्याने रोपिता होन्ति।*_

_14. How many fruits do you gather from those trees in one crop? *एकस्मिं वारे तेहि कित्तकानि फलानि ओचिनासि ?*_ 

_15. I get about two thousand fruits in one crop *एकस्मिं फलवारे द्विसहस्समत्तानि फलानि लभामि।*_ 

_16. When do you wish to plough your field; *कदा तव खत्तं कसितुं इच्छसि*_

_17. I will plough it when I get oxen and plough : *यदा गोणे च नाङ्गलानि च लभिस्सामि तदाहं कसिस्सामि*_ 

_18. How many mowers do you need in reaping? *लायने कित्तका लायका इच्छितब्बा ?*_

_19. Ten reapers with ten scythes will be able to reap my harvest; *दस लायका दसहि दात्तेहि मम सस्सं लायितुं सक्खिस्सन्ति।*_

_20. Having heaped them on the threshing floor, how many oxen do you need for threshing ? *खले रासिकत्वा कतीहि गोणेहि महापिस्ससि?*_ 

_21. Having got them threshed by eight oxen and having removed straw and chaff, I will bring home the grain after getting it dried: *अट्टाहि गोणेहि मद्दापेत्वा पलालं उध्दरिता भुसं पप्फोटेत्वा सुक्खापेत्वा च धाञ्ञं गेहं आनेस्सामि ।*_

*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_महेश कांबळे_*

*_दिनांक :- ०२/१०/२०२३_*

*_संदर्भ :- Dr Babasaheb Ambedkar: Writings & Speeches Vol .......?_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2023/10/between-two-farmers-1.html

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

कोलित सुत्त

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_कोलित सुत्त_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_41.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼  _'कोलित सुत...