Tuesday, 10 October 2023

समाधीला अपायकारक असणाऱ्या राहण्याच्या जागा

 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_समाधीला अपायकारक असणाऱ्या राहण्याचे ठिकाण_*

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

   🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 

_आवासो च कुलं लाभो गणो कम्मं च पंचमं ।_

_अद्धानं जति आबाधो गन्थो इद्धीति ते दस ।।_  

*_महावासं नवावासं जरावासञ्च पन्थनिं ।_*

_*सोण्डिं पण्णञ्च पुप्फञ्च फलं पत्थितमेव च ।।*_

_*नगरं दारुना खेत्तं विसभागेन पट्टनं ।*_ 

*_पच्चन्तसीमासप्पायं यत्थ मित्तो न लब्भति ।।_* 

*_अठ्ठारसेतानि ठानानि इति विञ्ञाय पण्डितो ।_* 

*_आरका परिवज्जेय्य मग्गं पटिभयं यथा ।।_*

                                          *_- विसुद्धीमग्ग_*

           _कुशल चित्ताच्या एकाग्रतेसाठी / समाधीसाठी पंचशिलांचे रक्षण करणे अत्यंत आवश्यक आहे. पंचशीलांचं योग्य पद्धतीने आचरण केले तरी पण योग्य ठिकाणी / परिसरात किंवा योग्य परिस्थितीत राहता आले नाही तर समाधी साध्य होण्यास अडचणी येऊ शकते._

_*आवास म्हणजे राहण्याची जागा. ती राहण्यास / समाधीसाठी अयोग्य कशी होते ?*_

_*१) महावास* म्हणजे ज्या ठिकाणी बरेचसे लोक एकत्रित राहत असतात , जिथे मोठ्या प्रमाणात गोंगाट होत असतो अशी जागा. उदा. आपण एका बैठ्या चाळीत राहत असू तर तेथेवेगवेगळ्या प्रांतांची संस्कृतींची माणसे राहत असतात, ते त्यांच्या सणाला, आनंदी क्षणाला स्पीकरवर गाणी लावत असतात. अश्या ठिकाणी जर समाधीचा अभ्यास केला तर तो होणार नाही, कारण सातत्याने होणारा गोंगाट, आपल्या दरवाज्यात जर कोणी घाण केली तर ती जागा आपल्यालाच स्वच्छ करावी लागणार हा सातत्याने येणारा विचार त्यामुळे अशी जागा समाधीस योग्य नाही._

_*२) नवावास* म्हणजे जेथे नवीन काम चालू असते. अश्या जागेवर सुतार, गवंडी, इतर कामगार यांच्याकडून समाधी साधनेत अडचण येऊ शकते. अश्या ठिकाणी इमारतीचे डागडुजी करीत असतांना पडलेले रॅबिट, सैरावैरा पडलेले साहित्य त्यामुळे समाधी साधनेत / चंक्रमन करीत असताना बाधा येत असते.

_*३) जरावास* म्हणजे जीर्णशाला. एखाद्या जुन्या-पडक्या इमारती मध्ये राहू लागलो तर तेथे बर्याच अडचणी येत असतात. उदा वरचे छत बरोबर नसल्यामुळे पावसाळ्यात पाणी आत शिरते, भिंतींवरचे पापुद्रे खाली पडत असतात, वाळवी लागते, अश्या ठिकाणी उंदरांचा आणि इतर जीवजंतू फिरत असतात. अश्या पडक्या ठिकाणी घराची चिंता लागून राहिली असता समाधीत चित्त कसे लागणार?_

_*४) पन्थनी* म्हणजे मोठ्या रस्त्याच्या / नाक्याच्या जवळची जागा. अशा ठिकाणी गाडीवाले गाड्या उभ्या करून पाणी मागण्यासाठी येतात, प्रवासी विश्रांतीसाठी येऊन बसतात, व गप्पागोष्टी करतात, मोटारींच्या हॉर्नच्या आवाज या व इतर कारणांमुळे त्रास होण्याचा बराच संभव आहे._

_*५) सोण्डी* म्हणजे हौद / सार्वजनिक तलाव. याठिकाणी अनेक लोक पाणी पिण्यासाठी अगर अंघोळी करण्यासाठी येतात, व अशा ठिकाणी योगाभ्यास करण्यास कठीण जाते._

_*६) पण्ण किंवा पर्ण* म्हणजे शाकभाजीत उपयोगात येणारी पाने, अशा ठिकाणी बायकामुले पाने गोळा करण्यासाठी येतात, मोठ्याने गप्पागोष्टी करतात - गातात._

_*७) पुप्फ किंवा पुष्प* म्हणजे फुलांचा मळा. येथेही फुले एकत्र करण्यासाठी बायकामुले येत असतात. ते इकडेतिकडे बागडत असतात, खेळत असतात._

_*८) फल* म्हणजे फळांची बाग. तेथेही वरच्याप्रमाणेच त्रास होतो._

_*९) पत्थित किंवा प्रार्थित* म्हणजे प्रार्थनेची / यात्रेची जागा. प्रार्थनेची / यात्रेची जागा जरी रमणीय असली तरी तेथे येणारा जनसमुदाय हा शांत बसत नाही, तो उत्साहाने समाधी करणाऱ्या बाजूला जातात त्यांना हा कोणीतरी सत्पुरुष असावा, अशा समजुतीने यात्रेकरू योगाभ्यास करणाऱ्या माणसापाशी येऊन त्याला अनेक प्रश्न विचारतील, किंवा आदरसत्कार करून त्याचे स्तोम माजवतील._

_*१०) नगर* म्हणजे नगराच्या जवळ असलेली जागा. येथे गाड्यांचा आणि मनुष्यांचा वारंवार त्रास पोचल्यावाचून रहात नाही._

_*११) दारु* म्हणजे इमारतीला उपयोगी पडणाऱ्या लाकडांचे जंगल. अशा ठिकाणी लांकुडतोडे येऊन काम करीत असतांना ते शांतपणे काम करीत नाहीत सोबत त्यातील ९०% पेक्षा जास्त हे नशापान करणारी असतात अश्या ठिकाणी समाधी करणे योग्य नव्हे._

_*१२) खेत्त किंवा क्षेत्र* म्हणजे शेतीची जागा. अशा ठिकाणी शेतीच्या कामासाठी शेतकरी येऊन गडबड करतात; पक्षी शेतातले अन्नधान्य खाऊ नये म्हणून ते पिकांवर बसू नये यासाठी आरडाओरड करावी लागते._

_*१३) विभाग* म्हणजे जेथे परस्परविरोधी लोक राहतात. अशा ठिकाणी दोन किंवा जास्त गटामध्ये कधीही भांडणं होऊन त्याचे पर्यवसन हाणामारीत होऊ शकते._

_*१४) पट्टन* म्हणजे बाजार भरण्याची जागा, मोठमोठी जहाजे थांबण्याची जागा, जेथे मासोळी व इतर वस्तूंचा बाजार भरतो अशी जागा. ही वर्दळीची जागा असल्याने येथे शांतता मिळत नाही._

_*१५) पञ्चन्त किंवा प्रत्यन्त* म्हणजे जंगली - रानटी लोक राहतात अशी जागा. तेथे लोकांना समाधी अभ्यासाची किंमत माहीत नसल्यामुळे ते निवासस्थानाच्या आसपास शिकार करून किंवा अशाच अन्य प्रकाराने समाधीला पुष्कळ अडचणी आणीत असतात._

_*१६) सीमा* म्हणजे राज्याची सीमा. अशा ठिकाणी हा कोणीतरी गुप्तहेर असेल अशी शंका येऊन दोन्ही देशातील सैनिकी अधिकाऱ्यांपासून त्रास होऊ शकतो._

_*१७) असप्पाय* म्हणजे अपथ्यकारक जागा. ह्या ठिकाणी व्यवस्थित जेवणखाण मिळत नाही, अश्या ठिकाणी कामोद्दीपक विषय पाहण्यात ऐकण्यात येत असते._

_*१८) मित्त किंवा मित्र* म्हणजे समाधिमार्गात उपयोगी पडणारा मित्र, ज्याने प्रयत्नाने समाधि साध्य केली असेल, ज्याला समाधिमार्गांतील अडचणी माहीत असतील असा मित्र तेथे राहत नसेल._

            _याप्रमाणे ही अठरा स्थाने सदोष समजली जातात. या ठिकाणी जी समाधीस उपयुक्त असणारी शांतता, समाधीस पोषक वातावरण नसते त्यामुळे समाधी करणार्यास बर्याच अडचणी येत असतात. अशास (अपवाद वगळता) समाधी करता येत नाही._

*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_महेश कांबळे_*

*_दिनांक :- ०९/१०/२०२३_*

*_संदर्भ :-_*

*_१) विशुद्धीमग्ग - लेखक आचार्य बुद्धघोष

https://mikamblemahesh.blogspot.com/2023/10/blog-post_10.html

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

No comments:

Post a Comment

कोलित सुत्त

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_कोलित सुत्त_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_41.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼  _'कोलित सुत...