🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_३ संयोजने / निवारणे ?_*
*_(धम्मचक्षू उत्पन्न होणे)_*
*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
_तथागतांचे धम्म प्रवचन ऐकता ऐकता प्रवचन ऐकणाऱ्यांचे धम्म चक्षू उत्पन्न झाले असे आपण बऱ्याच वेळा साहित्यांचा अभ्यास करीत असताना, प्रवचनांमध्ये वाचतो ऐकतो. *पण हा धम्म चक्षू आहे तरी काय? त्याचा नेमका अर्थ काय आहे?*_
_*बुद्धांकडून किंवा प्रज्ञावंत - शिलवंत संघाकडून धम्म श्रवण ऐकल्यानंतर त्याचे चिंतन-मनन केल्यानंतर, त्यानुसार आचरण केल्यानंतर धम्म चक्षू उत्पन्न होऊ शकतो.* त्यासाठी पुढील तीन गोष्टीचे चिंतन-मनन व्हायला हवे जर ते झाले तर *उपासकांमध्येही (मिलिंद प्रश्न - उपासकांचे गुण कोणते हे पहावे) धम्म चक्षू उत्पन्न होऊ शकतो.*_
_*जेंव्हा तथागतांनी सारनाथ येथे आषाढ पौर्णिमेला धम्म चक्क पवचन केले तेंव्हा सर्वात प्रथम, कौण्डिण्य यांना तो धम्म समजला अर्थात त्यांच्यात प्रथम धम्म चक्षू उत्पन्न झाला. धम्म चक्षू उत्पन्न झाला म्हणजे चित्तामध्ये असलेले तीन विकार/तीन बंधने तुटून पडतात.* हि तीन प्रकारची बंधने अशी आहेत जी मनुष्याला दुःखाकडे - अंधश्रद्धेकडे नेतान, अंधभक्तीकडे नेतात, मिथ्यादृष्टीकडे नेतात तसेच ती विकारे धम्माचे आचरण करू देत नाहीत. केवळ धम्मच माझे जिवन बदलवू शकते, तेच मला दु:खमुक्तीकडून सुख समाधानाचे जीवन देऊ शकते हा गाढा विश्वास तेंव्हाच निर्माण होतो जेंव्हा हि तीन निवारणे / बंधने आपल्या चित्तामधून निघून जातात._
_भगवान बुद्धांनी उपासकांना / बहूजणांना हि तीन बंधने / निवारणे आपल्या चित्तामधून निघून जाण्यासाठी धम्मचक्षू उत्पन्न व्हावा यासाठी वेळोवेळी उपदेश केला आहे. तीन बंधने| निवारणे पुढील प्रमाणे :-_
_*१) विचिकिच्छा : म्हणजे शंका, एखाद्या वस्तूवर, व्यक्तीवर, त्रिरत्नांच्या गुणांवर - शिकवणुकीवर इं. शंका घेणे.* काहि लोकांच्या मनात आजही अशी शंका आहे कि बुद्ध-धम्म-संघ हे काही माझे कल्याण करणार नाहीत, *ज्यांना बुद्धांचे - धम्माचे- संघाचे तत्वज्ञान / ज्ञान, त्यांनी दिलेला उपदेश माहित नाही, त्यांना त्रिरत्नांबद्दल कधीही श्रद्धा उत्पन्न होत नाही, त्यामुळे ते त्रिरत्नांच्या शिकवणुकीचे आचरण करीत नाहीत.कारण त्यांचा मनात शंका आहे.* तर असे शंका असणारे तथागत हयात असतांनाही होते आणि बाबासाहेब हयात असतांनाहि होते आणि आत्ता ते दोघेही नाहीत तरीही त्रिरत्नांवर शंका घेणारे, बाबासाहेबांच्या ज्ञानावर शंका घेणारे आजही आहेत._
_तथागतांनी सर्वांना उपदेश देतांना हेच सांगितले कि, हे एक बंधन आहे. प्रथम ते आपल्या चित्तातून बाहेर काढले पाहिजे. विचिकिच्छा म्हणजे शंका जी बुद्धांबद्दल शंका ठेवते त्यांनी दिलेल्या धम्मावर त्यांनी स्थापन केलेल्या संघावर शंका निर्माण करने ते प्रथम दूर केली पाहिजे. ज्यांच्या चित्तात त्रिरत्नांबद्दल विचिकिच्छा असेल ते धम्माचे आचरण करू शकत नाहीत. *ज्यांना दुःखमुक्ती हवी आहे अशांनी त्रिरत्नांबद्दलची असलेली शंका दूर केली तर ते धम्माचे आचरण करण्यास सुरवात करतील आणि एक-एक बंधने तोडून ते दुःखमुक्त होतील.*_
_बाबासाहेबांनी धम्म दीक्षा देतांना आपल्या अनुयायांना २२ प्रतिज्ञा दिल्या होत्या त्यापैकी काही प्रतिज्ञा पुढीलप्रमाणे :-_
_*प्रतिज्ञा क्र. ७) मी बौद्ध धम्माच्या विरुद्ध, विसंगत असे कोणतेही आचरण करणार नाही.*_
_*प्रतिज्ञा क्र. ११) मी भगवान बुद्धांनी सांगितलेल्या अष्टांग मार्गाचा अवलंब करीन.*_
_*प्रतिज्ञा क्र.१२) मी भगवान बुद्धांनी सांगितलेल्या दहा पारमिता पाळीन.*_
_*प्रतिज्ञा क्र.२०) तोच सधम्म आहे, अशी माझी खात्री पटलेली आहे.*_
_या वरील प्रतिज्ञांवर आपण कोणतीही शंका | विचिकिच्छा करीत नाही. बाबासाहेबांनी वरील प्रतिज्ञांद्वारे त्रीरत्नांवर, त्यांनी दिलेल्या शिकवणूकीवर कोणतीही शंका न धरता त्यांचे आचरण केले आणि म्हणून बाबासाहेब आपल्या पुढील प्रतिज्ञेत म्हणतात :-_
_*प्रतिज्ञा क्र. २१) माझा नवा जन्म होत आहे असे मी मानतो / मानते.*_
_म्हणजे तथागतांच्या धम्मचक्क पवत्तनाचा उपदेश ऐकून पाच परिव्राजकांपैकी कौण्डिण्य यांचा प्रथम धम्म चक्षू उत्पन्न होऊन ते निर्वाणाचा आस्वाद घेऊ लागले आणि त्यांचाप्रमाणे इतर अश्वजीत, वप्प, महानाम आाणि भद्दिय यांनीहि त्यांच्या त्यांच्या निवारणांचा / बंधनांचा त्याग करून अर्हत पद प्राप्त करून निर्वाणाचा आस्वाद घेत समाजाची सेवा करीत राहिले._
_या पाच परिव्राजकांनीही तथागतांवर सुरुवातीला जेंव्हा ते सारनाथ येते होते किंवा जेंव्हा त्यांनी तपश्चर्या सोडून अन्न भक्षण केले तेव्हा त्यांच्यावर शंका निर्माण केली होती पण जस जसे तथागतांनी त्यांना आपला धम्म सांगितला तस-तस त्यांच्यात जी काही निवारणे / बंधने होती, त्यांनी धम्माचरणांनी स्वतःत बदल घडवून आणला आणि त्या बंधनांचा त्याग करून, तोडून टाकून त्यांना अर्हन्त पद प्राप्त झाले, ते दुःखमुक्त झाले._
_त्रीरत्नांवर कोणत्याही परिस्थितीत शंका निर्माण न करता ज्या महान महामानवाने आपल्या सर्वांना जे सर्वश्रेष्ठ रत्न आहे - त्रिरत्न, त्यांना आपल्याला आपल्या सुखासाठी - दु:खमुक्तीसाठी दिली आहेत. त्यांचे आचरण करण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला त्यांच्यावर गाढ श्रद्धा ठेवावी लागणार आहे आणि त्यासाठी विचिकिच्छा हे पहिले बंधन आपल्या सर्वांना तोडावे लागणार आहे._
_*२) सक्काय दिठ्ठी :- आपले जे शरीर आहे त्याबद्दल असणारी आसक्ती / अज्ञान.* हे जे शरीर आहे ते माझे आहे, हे मी आहे. डोक्यापासून ते पायापर्यंत हे जे काही आहे ते मी आहे. हे जी काही इंद्रिये आहेत - डोळे - नाक-कान- इ. माझे आहे. तथागतांनी सांगितले कि हे दुःखाचे कारण आहे. बुद्धांनी जे सर्वोच्च सत्य सांगितले *'अनित्य'* उदा. माझे हे सौंदर्य आहे ते सदैव टिकणार आहे हि जी मिथ्यादृष्टी आहे त्याला तथागत सांगतात कि हे नित्य नाही, अनित्य आहे. हे सौंदर्य पुढे जाऊन संपणार आहे, तुम्ही हि म्हातारे होणार आहात, म्हणून तथागत 'स्वतःच्या शरीराबाबत आसक्त राहू नका असे सांगतात. दैनंदिन जिवनात जीवंत राहण्यासाठी आवश्यक त्या गोष्टी अवश्य करा पण अतिरेक करू नका अशी शिकवण ते देत असतात. सक्कायदिट्ठी हे बंधन असे शिकविते कि मी व माझे या बंधनातून मुक्त व्हायचंय, कोणी मला बोलला... अरे पण मी असे इथे काहीच नाही हिथे सर्वच अनित्य आहे._
_जे आपल्या शरीराबद्दल आसक्ती बाळगतात त्यांना सक्कायदिठ्ठी हे बंधन कधीच सुखी बनवू देत नाही म्हणून हे दुसरे बंधन सर्वांना तोढायचे आहे. जेव्हा मी व माझे असे काहीच नाही हे सत्य जेव्हा आपल्या समजेल तेंव्हा बुद्धांच्या 'अनित्यनेचा' सिद्धांत / तत्त्वज्ञानाची माहिती आपल्याला समजून येईल आणि तसे आचरण होईल तेव्हा आपण दु:खमुक्तीच्या मार्गातील अजून एक पाऊल पुढे टाकू._
_*३) सिलबत्त परामास : शिलाचे बंधन, शिल पालन करण्याचा अहंकार उत्पन्न करणे. गंगेत मी जर एक डुबकी मारली तर माझे सर्व पापकर्म धूवून निघेल हि जी 'अंध' श्रद्धा बाळगून वावरणे, किंवा त्याप्रमाणे वागणे, त्याप्रकारचा अहंभाव निर्माण होणे.* काहिंना श्रीमंतीचा अहंभाव असतो तर काहींना शिल पालनाचा अहंभाव असतो पण बुद्धांनी हे सुद्धा एक बंधन आहे असे सांगितले आहे._
_उदा. क्र १) काही जण विपश्यना शिबीरात जात असतात (सन्मानीय अपवाद वगळता) तेथे ते किती प्रामाणिकपणे अभ्यास करीत असतात हा एक प्रश्नच आहे पण ते सांगतांना मी अमुक एवढे - एवढे शिबीरे केली आहेत, तुम्ही एकपण शिबीर केले नाही असा कुत्सितपणे प्रश्न विचारतात. शिबीर करण्याचा एक अहंभाव त्यांच्यात निर्माण होतो त्यामुळे सामान्य उपासक त्यांच्या बाजूला जात नाहि किंवा ते जे सांगत असतात त्यांना गांभिर्याने हि देखील घेत नाहीत._
_उदा क्र २) आज बरेच बौद्धाचार्य (सन्मानीय अपवाद वगळता) काही गाथा पाठ करून ते धार्मिक विधी करीत असतात तर काही प्रवचने हि देत असतात पण त्यांच्याकडे पाहता क्षणीच किंवा त्यांच्या सानिध्यात आलो तर त्यांच्या बोलण्यातून एक प्रकारचा अहंभाव दिसून येतो._
_उदा क्र ३) एक उपासक (सन्मानीय अपवाद वगळता) जो अष्टशिलांचे पालन करतो, उपोसथ व्रत धारण करतो त्या उपासकांत ही अशाच प्रकारचा अहंभाव निर्माण होत असतो. तो इतरांना कमी लेखतो._
_जीवनात शील पालन करण्याचा अहंभाव निर्माण होणे यालाच सिलबत्त परामास म्हणतात याच बंधनाला आपल्याला तोडून टाकायचं आहे._
_*या तीन बंधनातून १) विचिकिच्छा २) सक्कायदिट्ठि ३) सिलबत्त परामास यामधून आपल्याला मुक्त व्हायचे आहे. धम्माचे आचरण करून या ३ निवारणांपासून आपण मुक्त झालो पाहिजे. जेव्हा एक अनुयायी त्रिरत्नांच्या शिकवणुकीचे आचरण करीत असतो म्हणजेच त्रिरत्नांप्रती श्रद्धा उत्पन्न करीत असतो, जो या ३ बंधनामुक्त झाला, ज्याने हि ३ बंधने तोडली, ज्याचे चित्त या ३ बंधनातून मुक्त झाले त्याच्या चित्तामधून धम्म चक्षू उत्पन्न होतो. यालाच म्हणतात धम्मवान होणे, धम्मचक्षूवान होणे. ज्यावेळी आपण असे वाचतो - ऐकतो कि तथागतांचे प्रवचन ऐकूण उपस्थित उपासकांतील / संघातील व्यक्तीचा धम्म चक्षू उत्पन्न झाला तर काय झाल? त्याच्या चित्तातील हे तीन बंधने तूटून पडतात.*_
_बाबासाहेबांनी आपल्याला धम्मदिक्षा देण्यापूर्वी किंवा आत्ताही काही प्रमाणात समाजातील काही मते अशी आहेत की त्यांचा उद्धार-जीवनातले दुःख फक्त न फक्त त्यांच्या देवी-देवताच करू शकतात कारण आजही त्यांची अशी श्रद्धा आहे की तेच आमचे सुखकर्ता आणि दुःखहर्ता आहेत._
_पण धम्मदिक्षा मिळाल्यानंतर त्रीरत्नांच्या शिकवणूकीनुसार आचरण केल्यानंतर जे खरे दु:खमुक्तीचे चित्र दिसत आहे ते पाहून जे त्रीरत्नांच्या शिकवणुकीवर / बाबासाहेबांच्या ज्ञानावर विचिकिच्छा / शंका उपस्थित करीत होते ते आता त्रीरत्नांवर / बाबासाहेबांवर डोळसपणे श्रद्धा व्यक्त करीत आहेत, त्यांच्यातली शंका / विचिकिच्छा दूर होत आहे._
_तथागतांच्या 'अनित्यतेचा' सिद्धांत समजल्यावर मी व माझे असे काहीच नाही ह्याची जी बंधन होते - सक्काय दिठ्ठि हे तोडून टाकतो. हे तोडून टाकल्यानंतर जो अहंभाव / अहंकार निर्माण झाला होता - शिल पालनाचा त्यामुळे निर्माण झालेली अंधभक्ती/ अंधश्रद्धा हि बंधने तोडल्यावर आपण हि आपला धम्मचक्षू उत्पन्न करू शकतो, धम्मचक्षूवान बनू शकतो._
_*यासाठी बाबासाहेबांनी दिलेला मार्ग, तथागतांनी दिलेली शिकवण आत्मसात करून त्यानुसार आचरण करावे लागणार आहे. आणि हया तीन निवारणातून आपण मुक्त होऊ शकतो आणि अशा व्यक्तीस पाली साहित्यात 'श्रोतापन्न' असे म्हणतात. श्रोत म्हणजे प्रवाह, म्हणजे जसा नदीचा प्रवाह असतो आणि पन्न म्हणजे पडणे. ज्या धम्म अनुयायीने आपल्या जीवनातील हि तीन निवारणे तोडून टाकली, ज्याचे चित्त हया तीन निवारणातून मुक्त झाले तो व्यक्ती खऱ्या अर्थाने 'श्रोतापन्न' झाला, म्हणजेच प्रवाहामध्ये प्रतिष्ठित झाला. दु:खमुक्तीच्या मार्गात प्रतीष्ठित झाला.*_
_*यापूढील पायऱ्या सकृतागामी, अनागामी, अर्हत अशा आहेत.*_
_*या तीन निवरांसोबत इतर सात अधिक निवारणे आहेत म्हणजेच एकून १० निवारणे आहेत -*_
*४) कामराग (कामवासना)*
*५) पटीघ (क्रोध)*
*६) रूपराग (अरूप देवलोक प्राप्तीची इच्छा)*
*७) अरूपराग (अरूप देवलोक प्राप्तीची इच्छा)*
*८) मान (अहंकार)*
*९) उद्धंच (भ्रांतचित्तता)*
*१०) अविज्जा (चार आर्य सत्यांचे अज्ञान)*
_ही पुढील निवारणे जसं जसं धम्माच्या मार्गात अधिक प्रतीष्ठित होत जाऊ तस तशी ती निवारणे तुटून जातील आणि निब्बाणाची सर्वोच्च पातळीचा आनंद प्रत्येक व्यक्तीला घेता येऊ दे अशी मङ्गल कामना - मङ्गल मैत्री व्यक्त करतो._
*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*
*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_महेश कांबळे_*
*_दिनांक :- १९/१०/२०२३_*
*_संदर्भ :-_*
*१) वर्षावास २०२३ काळातील मान्यवर संघाची प्रवचने*
*२) बाबासाहेबांनी दिलेल्या २२ प्रतिज्ञा*
*३) भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म लेखक डॉ बाबासाहेब आंबेडकर*
*४) बुद्ध धर्मावरील चार निबंध लेखक धर्मानंद कोसंबी*
*५) बौद्ध प्रश्नोत्तरी लेखक कर्नल एच एस ऑलकॉट*
https://mikamblemahesh.blogspot.com/2023/10/blog-post_18.html
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
No comments:
Post a Comment