*_भिक्षु - भिक्षुनी संघ मध्यान्हानंतर भोजन करीत नाहीत_*
उत्तर : त्याला दोन कारणे आहेत-
(१) भिक्षा मागून उपजीविका करणाऱ्या भिक्खूंना रात्री भिक्षा मागण्यास जाणे सोईस्कर नसते.
(२) अल्पाहार सुखकर असतो.
एकदा भगवान काशी देशात विहार करीत असता भिक्खूंना उपदेशून म्हणाले : 'भिक्खूंनो! मी रात्रीचे भोजन वर्ज्य मानतो. रात्री भोजन न केल्यामुळे आरोग्य, उत्साह, बल, सुखपूर्वक विहार यांचा मी अनुभव करतो म्हणून भिक्खूंनो, तुम्हीही रात्रीचे भोजन वर्ज्य करा म्हणजे तुम्हालाही असाच अनुभव येईल'.
भिक्खूला मध्यान्होंत्तर पेय भिक्षा प्राप्त झाली असल्यास ते ग्रहण करू शकतात.
एकदा केणीय जटील मध्यान्होत्तर पेयपदार्थ तयार करून भगवंतांकडे गेला आणि त्यास ग्रहण करण्याची त्यांना विनंती करू लागला. भगवंत म्हणाले, 'केणीय! भिक्खूंना दे. भिक्खू संकोचवश तो ग्रहण करावयास मागेपुढे पाहू लागले. तेव्हा भ. बुद्ध म्हणाले, 'भिक्खुनो, आठ प्रकारचे पेयपदार्थ ग्रहण करण्याची अनुज्ञा देतो:-
(१) आंब्याचा रस,
(२) जांभळाचा रस,
(३) चिंचेचा रस,
(४) केळाचा रस,
(५) मधुपेय,
(६) अंगूर पेय
(७) सालूक- (कोईच्या मुळ्या) आणि
(८) फारूसक (फालसा) पेय.
भिक्खूंनो! धान्याच्या रसाला - सोडून सर्व फळ रसांची अनुज्ञा देतो. मोहांच्या फुलांच्या रसाला सोडून बाकीच्या सर्व पुष्प- रसांची अनुज्ञा देतो'.
No comments:
Post a Comment