Wednesday, 31 March 2021

अंधश्रद्धा: प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम - प्रश्न ३६

 

*_प्रश्न ३६ - अ) अंगात आलेली बाई हातावर आग खेळवून ती खाताना आम्ही पाहिले आहे. तसेच रिकाम्या हातातूत या बायका कुंकू काढतात. हळदीचे कुंकू व कुंकवाचा बुक्का सर्वांच्या डोळ्यादेखत काढतात_* .

 *_ब) अंगात आलेल्या काही व्यक्ती नदीत उलट्या उभ्या राहतात. देवीच्या शक्तीशिवाय हे कसे शक्य आहे?_*

 

 *उत्तर*    ) अंगात आलेल्या बाईने आग खेळविणे. रिकाम्या हातातून कुंकू काढणे वा अन्य चमत्कार करणे यासाठी देवीच्या शक्तीची गरज नाही. शरीराचा कोणताही अवयव ३ सेकंदापेक्षा जास्त अग्नीच्या सान्निध्यात राहिला तरच भाजण्याच्या वेदना होतात. हातावर आग खेळवणारी बाई पेटता कापूर या हातातून त्या

हातात नाचवीत असते. त्यामुळे हाताची कातडी ३ सेकंदांपेक्षा कमी वेळ अग्नीच्या सान्निध्यात राहते. यामुळे हाताला भाजत नाही. आमचे कार्यकर्ते तरुण-तरुणी अग्नी खाण्याचा प्रयोग सहजतेने करतात. यासाठी दैवी शक्तीची गरज नाही.रिकाम्या हातातून कुंकू काढणे ही हातचलाखी आहे. कुंकवाची गोळी दोन बोटांमध्ये दडवून व अंगात आल्यावर चलाखीने तळहातावर आणून फोडली जाते; इतर युक्त्याही वापरल्या जात असतील. लपविलेले कुंकू काढता येईल. कुंकवाची दैवी शक्तीने निर्मिती करणे शक्य नाही. हळदीचे कुंकू वा कुंकवाचा बुक्का करणे ही रासायनिक युक्ती आहे. हळदीमध्ये चुना अगर निरमा पावडर मिसळली, तर हळद लाल होते. कुंकवात निरमा पावडर मिसळली तर कुंकू काळे पडते. या रासायनिक प्रक्रिया आहेत; देवी हे करत नाही. हळदीचे कुंकू करणाऱ्या बाईला आपल्या जवळची हळद दिली व तिचे हात तपासून धुवून हाताला अल्कली पदार्थ नाही, अशी खात्री करून घेतली तर ही चलाखी अंगात आलेल्या बाईला करता येणार नाही.

 

ब) अंगात आलेल्या व्यक्ती नदीत उलट्या उभ्या राहातात, याची तपासणी झाली पाहिजे. अशी तपासणी झालेली नाही. कमी पाण्यात न गुदमरता जेवढा वेळ नाक पाण्यात ठेवता येईल, तेवढा वेळच अशी व्यक्ती पाण्यात उलटी राहू शकेल; जास्त वेळ नाही.

 

*डॉ. नरेंद्र दाभोलकर व प्रा. प. रा. आर्डे*

*यांनी लिहिलेल्या 'अंधश्रद्धा: प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम' या पुस्तकातून साभार*

https://mikamblemahesh.blogspot.com/

Tuesday, 30 March 2021

अंधश्रद्धा: प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम - प्रश्न ३५

 *_प्रश्न ३५- बायकांच्या अंगात जास्त का येते?_*

 

 *उत्तर*    बायकांच्याच अंगात जास्त येते हे खरे. पण विशेषतः गरीब ागासवर्गीय स्त्रियांच्याच अंगात येण्याचे प्रमाण जास्त आढळते. मनाचा कोंडमारा व त्यातून ढळणारे मनाचे संतुलन हे अंगात येण्याचे कारण. आपल्या देशात स्त्रियांचे कुटुंबातील स्थान दुय्यम असते. त्यामुळे स्त्रिया सतत तणावाखाली वावरत असतात. मूल न होण्याचे खापर स्त्रीच्या माथी मारले जाते. विधवापण येण्यास स्त्रीला जबाबदार धरले जाते. मागासवर्गीय व गरिबाघरच्या स्त्रिया तर सर्वस्वी पराबलंबी असतात. शिक्षण नसतेच. स्त्रियांना लैंगिक दडपणाखाली जगावे लागते. विधुर परस्त्रीशी संबंध ठेवू शकतो. विधवेला ते स्वातंत्र्य नसते. सगळ्यांच्या तीक्ष्ण नजरा तिला काबूत ठेवू पाहतात. यामुळे अतृप्त लैंगिक वासनेचा मनावर येणारा ताण पुरुषांपेक्षा स्त्रियांवर अधिक असतो. निसर्गाने पुरुषापेक्षा स्त्रीवर मातृत्वाची अधिक जबाबदारी टाकलेली आहे. गरोदरपणात स्त्रियांच्या शारीरिक व मानसिक अवस्थेत बदल होतात. सातत्याने येणाऱ्या बाळंतपणामुळे ह्या अवस्था पूर्ववत होत नाहीत. दुर्बल मनोवस्थेमध्ये मानसिक धवका देणारी घटना घडली, की अंगात येण्याला योग्य परिस्थिती तयार होते व अंगात येण्याचा प्रकार चालू होतो. अंगात आलेल्या स्त्रियांना पाहून स्त्रियांच्याच अंगात येऊ शकते, असा बघणाऱ्या स्त्रियांचा समज होतो. त्यामुळे पुरुषांपेक्षा स्त्रियांच्या अंगात येण्याच्या घटना जास्त आढळतात. स्त्रियांच्या अंगात येणे, हा प्रकार सामाजिक व सांस्कृतिक दृष्ट्या मान्यताप्राप्त आहे.स्त्रियांच्या अंगात येणे हे अशिष्ट वा गैरवर्तन मानले जात नाही. या सामाजिक मान्यतेमुळेच व आजूबाजूच्या वातावरणाच्या प्रभावामुळे स्त्री संमोहन अवस्थेत जाते.मात्र त्यांच्या अंगात येते, असे बघणारे लोक मानतात.

 

*डॉ. नरेंद्र दाभोलकर व प्रा. प. रा. आर्डे*

*यांनी लिहिलेल्या 'अंधश्रद्धा: प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम' या पुस्तकातून साभार*

https://mikamblemahesh.blogspot.com/

Monday, 29 March 2021

अंधश्रद्धा: प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम - प्रश्न ३४

 *_प्रश्न ३४- दैवी शक्ती अंगात खेळण्याचा काळ व भुताने झपाटण्याचा काळ अमावास्या पौर्णिमेलाच घडतो, हे कसे?_*

 

 *उत्तर*    येरवडा मेंटल हॉस्पिटलमध्ये काही हजार मनोरुग्णांच्या गेली अनेक वर्षे केलेल्या पाहणीमध्ये असे काहीही आढळून आलेले नाही किंवा अन्यत्र कोठेही पाहणीत असा निष्कर्ष निघालेला नाही.अंगात येणाऱ्या व्यक्ती दुसऱ्याच्या कलाने चालणाऱ्या असतात. अशा व्यक्ती पटकन सूचना स्वीकारतात. आजूबाजूच्या लोकांचा अमावास्या-पौर्णिमेला अंगात येते. हा पूर्वापार चालत आलेला पूर्वग्रह असतो. असे लोक सूचना देतात, "बघ, उद्या अमावास्या, हिच्या अंगात येणार", आणि दुसऱ्या दिवशी बाईच्या अंगात येते. अंगात येणारे मांत्रिक, देवऋषी हे अमावास्या पौर्णिमेलाच अंगात आणतात. त्यांचे अंगात येणे ढोंग असते. असे मांत्रिक मनोरुग्ण व्यक्तीला भूत लावतात व त्याचे भूत काढतोच असेही सांगतात. मांत्रिकाच्या सूचना मनोरुग्णांनी स्वीकारलेल्या असतात.आपणास भूत लागले असा त्यांचाही समज होतो. मांत्रिकांना त्या दिवशी उपचारासाठी येणाऱ्या मनोरुग्णांना मांत्रिक सूचना देऊन त्यांच्या अंगात आणतात व काही वेळा मनोरुग्णांनी स्वत:च ती सूचना आधी स्वीकारलेली असते आणि अमस्वास्या-पौर्णिमेला ते घुमू लागतात

 

*डॉ. नरेंद्र दाभोलकर व प्रा. प. रा. आर्डे*

*यांनी लिहिलेल्या 'अंधश्रद्धा: प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम' या पुस्तकातून साभार*

https://mikamblemahesh.blogspot.com/

Sunday, 28 March 2021

अंधश्रद्धा: प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम - प्रश्न ३३

 *_प्रश्न ३३- अंगात आलेली व्यक्ती लोकांच्या प्रश्नांची उत्तरे कशी देते?_*

 

 *उत्तर 👉*  अंगात आलेल्या व्यक्तीने ज्यांच्या ्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली ती सर्व अचूक आली, याचा संख्याशास्त्रीय अभ्यास झालेला नाही. त्यामुळे *वरील विधानाला शास्त्रीय आधार नाही.* ज्यांना आपल्या प्रश्नांची उत्तरे अचूक आली, असा अनुभव आला आहे त्यांच्या बाबतीत शक्यता (Low of Probability) सिद्धांतानुसार उत्तरे खरी आली असतील.

संख्याशास्त्रात शक्यता सिद्धांत (Low of Probability) आहे. हा सिद्धांत सर्व प्रकारच्या बुवाबाजीत उपयोगी पडतो. नाणे उंच फेकले, तर छाप किंवा काटा वर येतो. इथे छाप येण्याची शक्यता निम्मी ( ५० %) आहे. म्हणजे १०० वेळा नाणे फेकले तर ५० च्या आसपास छाप येईल. किंवा १०० नाणी वर फेकली तर त्यातील ५० नाण्यांच्या बाबतीत छाप येईल. ह्या नियमाचा अंगात आलेल्या व्यक्तीला अगर बुवा मांत्रिकाला कसा कायदा होतो ?

सर्वसाधारणपणे अंगात आलेल्या व्यक्तीला ज्या प्रमाणे उत्तर 'होय' किंवा 'नाही' असे येईल, असेच प्रश्न विचारले जातात. उदा. मला मुलगा होईल की मुलगी? दोनच शक्यता असतात. त्या व्यक्तीला मुलगा होईल किंवा मुलगी. मुलगा झाला तर आपल्या प्रश्नाचे उत्तर अचूक मिळाले, असा त्या व्यक्तीचा समज होणार. १०० व्यक्तींनी अशा प्रकारचे प्रश्न विचारले तर काहीजणांचे अचूक उत्तर मिळणार हे उघड आहे. ज्यांच्या प्रश्नांची उत्तरे बरोबर निघतात ते अंगात आलेल्या व्यक्तीला त्याचे श्रेय देतात. पण अनेक जणांच्या प्रश्नांची उत्तरे चुकीची आलेली असतात. त्यांचे काय? अशा व्यक्ती आपल्या नशिबाला दोष देत गप्प बसतात. म्हणून अंगात आलेली व्यक्ती प्रश्नांची उत्तरे बिनचूक देते, याची शास्त्रीय तपासणी झाल्याशिवाय त्यावर विश्वास ठेवणे चुकीचे होईल. 'होय' किंवा 'नाही' अशा स्वरूपाचे प्रश्न विचारण्याऐवजी अंगात आलेल्या व्यक्तीने दुसऱ्या प्रकारच्या प्रश्नांना उत्तरे दिली पाहिजेत. अशा व्यक्तीने चाचणी घेणाऱ्या कार्यकर्त्याच्या खिशातील नोटेचा नंबर ओळखून दाखवावा. एवढ्या एकाच प्रश्नाचे उत्तर अचूक मिळले, तर अंगात आलेल्या व्यक्तीचे सामर्थ्य आम्ही मान्य करू.

 

*डॉ. नरेंद्र दाभोलकर व प्रा. प. रा. आर्डे*

*यांनी लिहिलेल्या 'अंधश्रद्धा: प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम' या पुस्तकातून साभार*

https://mikamblemahesh.blogspot.com/

Saturday, 27 March 2021

अंधश्रद्धा: प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम - प्रश्न_३२

 *_प्रश्न_३२-अंगात आलेली व्यक्ती दहा जणांना आवरत नाही. उंच झाडाच्या शेंड्यावर सरासरा चढून जाते हे मी स्वत: पाहिलेले आहे. हे कसे घडते?_*

 

 *उत्तर 👉*  एकाच कल्पनेने झपाटलेल्या व्यक्तीच्या बाबतीत उन्मादा वस्थेत वर उल्लेख केलेल्या गोष्टी शक्य आहेत, *केंद्रित मनःसामर्थ्याचा तो आविष्कार आहे* . केंद्रित मनःसामर्थ्याचे ज्ञात उदाहरण प्रसिद्ध आहे. मोटारीखाली एक मुलाचा पाळीव कुत्रा सापडतो. सर्व ताकद एकवटून तो मुलगा मोटर उचलतो व कुत्र्याला बाहेर निघणे शक्य होते. रायगडाचे दरवाजे बंद झाल्यावर हिरकणी अवघड डोंगर रात्रीच्या वेळी उतरून बाळाच्या ओढीने घरी आली रायगडासारखा अवघड किल्ला अंधारात ती कशी उतरली? बाळाच्या ओढीने *मन:शक्ती एकवटली त्यामुळेच ते शक्य झाले.झपाटलेल्या आत्म्याने दिलेल्या कौशल्यामुळे नव्हे.*

शरीराच्या क्षमतेत जे करता येणे शक्य आहे तेच केंद्रित मनःसामर्थ्याने साधता येईल.

त्यामुळे दहाजणांना न आवरणे अगर उंच झाडाच्या शेंड्यावर चढणे हे अंगात आलेल्या व्यक्तीस अशक्य नाही, यासाठी आत्म्याच्या मदतीची गरज नाही.

दुसराही भाग असू शकतो. अंगात आलेल्या व्यक्तीने सारासार विवेक गमावलेला असतो. झाडावर चढण्यात सराईत असलेली व्यक्तीही झाडाच्या शेंड्यावर जात नाही.कारण त्या ठिकाणी चढल्यास पडण्याची भीती आहे हा विवेक तिच्याकडे असतो. हा विवेक गमवला असल्याने अंगात आलेली व्यक्ती झाडाच्या शेंड्यावर चढत जाते. जर देव असेल व खरोखरच व्यक्तीच्या अंगात येत असेल, तर *उंच झाडावर चढणारी व्यक्ती हवेत उडत का नाही* ? देवाला हे शक्य व्हावयास हवे. पण अशी व्यक्ती हवेत कधीही उडू शकत नाही.एवढेच नव्हे, तर *ज्यासाठी प्रशिक्षित कौशल्याची गरज आहे, अशा गोष्टी अंगात आलेल्या व्यक्ती करू शकत नाही.* उदा. अंगात आलेल्या व्यक्तीने पूर्वी सायकल चालविली नसेल, तर अंगात आल्यावर तिने सायकल चालवावी, हे घडत नाही, कारण सायकल चालविण्यासाठी किमान प्रशिक्षणाची जरुरी असते.अंगात आलेली व्यक्ती बराच वेळ वेगाने घुमली व नाचली तर अंगातील गेल्यावर ती बराच वेळ निश्चल पडून राहते, कारण शरीर सामर्थ्याच्या थोड्या वेळात केलेल्या अतिरिक्त वापराने ती दमून जाते. देव अंगात येत असता तर असे थकण्याचे कारणच नव्हते.

 

*डॉ. नरेंद्र दाभोलकर व प्रा. प. रा. आर्डे*

*यांनी लिहिलेल्या 'अंधश्रद्धा: प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम' या पुस्तकातून साभार*

https://mikamblemahesh.blogspot.com/

Friday, 26 March 2021

अंधश्रद्धा: प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम - प्रश्न ३१

 *_प्रश्न ३१- अंगात येण्याचा प्रत्येक प्रकार ही लोकांची जाणूनबुजून केलेली फसवणूक असते काय?_*

 *उत्तर*    अंगात आलेली व्यक्ती-

१. फसवणूक करणारी ढोंगी असेल किंवा

२. ती मनोरुग्ण असेल

यावरून अंगात येणारी प्रत्येक व्यक्ती ही जाणूनबुजून फसवणूक करणारी असते, असे समजणे हे चूक ठरेल.

 

अंगात आलेली व्यक्ती फसवणूक करणारी असेल, तर अशी व्यक्ती लुबाडणूकीचा धंदा सुरू करते. लोकांच्या प्रश्नांची उत्तरे देणे, प्रश्नांवर उतारा सांगणे यामधून पैसा मिळतो. लोक पाया पडत्तात. प्रतिष्ठा मिळते.देवऋषी, दरबार भरवून प्रश्नांची उत्तरे देणाऱ्या देव्या या प्रकारात मोडतात. फसवणूक करणाऱ्या ढोंगी व्यक्तीने अंगात आणले, तर दोन थापडांत त्याचे अंगात येणे बंद होईल. अशा व्यक्तीच्या हातावर जळता कापूर ठेवला अगर शरीराला आग आणणारी खाजखुजली त्यास लावली तर त्याचे अंगातील झटकन बंद होते.

मागच्या प्रश्नात मानसिक संतुलन ढळल्यामुले अंगात येण्याच्या प्रकाराचा तपशील दिला आहे. अशा व्यक्ती ढोंगी नसतात. त्यांचे अंगात येणे बंद करण्यासाठी वरील उपाय करणे चूक ठरेल. *अशा मनोरुग्णांना मनोविकार तज्ज्ञाकडे नेऊन उपचार करून घेतले पाहिजेत.*

 

*डॉ. नरेंद्र दाभोलकर व प्रा. प. रा. आर्डे*

*यांनी लिहिलेल्या 'अंधश्रद्धा: प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम' या पुस्तकातून साभार*

https://mikamblemahesh.blogspot.com/

Thursday, 25 March 2021

अंधश्रद्धा: प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम - प्रश्न ३०

 *_प्रश्न ३०- झपाटलेली व्यक्ती जन्मात कधी न बोललेली भाषा बोलू शकते. हे आम्ही पाहिलेले आहे.याचा काय खुलासा द्याल?_*

 

 *उत्तर 👉*  दुसऱ्याआत्म्यानेझपाटल्यामुळेअगरभुतानेझपाटल्यामुळेअगरमागच्याजन्मातीलस्मृतीमुळे व्यक्ती न बोललेली भाषा बोलू शकते, हा समज खरा नाही. न बोललेली भाषा बरळणे ही पूर्वग्रहातून आलेली मानसिक विकृती आहे. या विकृतीस Glassolalia असे म्हणतात. या विकृतीमध्ये व्यक्तीत शारीरिक बदल होत नाहीत. केवळ बोलण्यात बदल होतो. अशा व्यक्तीचे निरीक्षण केल्यास खालील गोष्टी आढळून येतात.

 

१. अशी व्यक्ती कधी न बोललेली भाषा बोलू शकते हे खरे नसते. त्या भाषेतील ऐकलेले काही शब्द तुटकपणे बोलले जातात. पण त्याचे वर्णन मात्र अतिरंजितपणे केले जाते. अशा व्यक्तीचे बोलणे टेप केले व ती भाषा येणाऱ्या दुसऱ्या व्यक्तीस ऐकविले, तर दोन-चार शब्दांपलीकडे कोणत्याही प्रकारचे सारखेपण त्यात आढळत नाही.

२. अशी व्यक्ती जन्मात कधी न ऐकलेली भाषा बोलू शकत नाही. भारतातील व्यक्ती हिंदी, कन्नड, गुजराती तुटकपणे बोलू शकेल पण (अपवाद वगळता) जर्मन, संस्कृत, फ्रेंच भाषा बोलू शकणार नाही. कारण ती भाषा कानावर पडणे व समजणे याची शक्यता फारच कमी असते.

अंगात आलेला आत्मा अगर देव कोणत्याही भाषेत बोलू शकला पाहिजे. पण असे घडत नाही. अब्राहम कोवूरांच्या २२ आव्हानांपैकी १४ वे आव्हान या संदर्भात आहे ते खालीलप्रमाणे-

पुनर्जन्मामुळे अगर पवित्र वा दुष्ट आत्म्याने झपाटल्यामुळे पूर्वी न ऐकलेली भाषा एखादी व्यक्ती बोलू शकत असेल, तर अशा व्यक्तीस १ लाख रुपयांचे आव्हान कोवूरांनी दिले आहे. हे आव्हान आजतागायत कोणीही स्वीकारलेले नाही.

 

*डॉ. नरेंद्र दाभोलकर व प्रा. प. रा. आर्डे*

*यांनी लिहिलेल्या 'अंधश्रद्धा: प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम' या पुस्तकातून साभार*

https://mikamblemahesh.blogspot.com/

Wednesday, 24 March 2021

अंधश्रद्धा: प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम - प्रश्न २९

 *_प्रश्न २९- अंगात येणे व भुताने झपाटणे ह्या एकाच स्वरूपाच्या मनोविकृती वा ढोंगबाजी आहेत काय?_*

 

 *उत्तर*    अंगात येणे भुताने झपाटणे हे मनाचे आजार आहेत, हे खरे आहे. माणसांना अनेक प्रकारच्या तणावांतून जावे लागते. परीक्षेची भीती, लैंगिक तणाव, सततचे आजारपण, मूल न होणे इत्यादी अंतर्मनातील ताण बाह्य मन नियंत्रित करते. हे नियंत्रण सुटले, की मनाचा तोल ढासळतो. त्यातून अंगात येणे अगर भुताने झपाटणे या विकृती उद्भवतात. मात्र दोन्हीत काही बाबतींत वेगळेपण आहे.

 *भुताने झपाटलेल्या व्यक्तीत ढोंगबाजी बहुधा नसतेच. त्याचा मानसिक तोल पूर्णपणे गेलेला असतो.* ते वेड लागणेच असते. भुताने झपाटणे हा मानसिक आजार आहे. झपाटण्याची क्रिया व्यक्तीच्या इच्छेविरुद्ध घडते. अंगांत येणे हा प्रासंगिक प्रकार आहे अंगात येऊन गेल्यावर ती व्यक्ती इतरांसारखीच वाटते. अंगात येणे यात तीन शक्यता आहेत.

१ . ती ढोंगबाजी असू शकत्ते. अंगात येण्याचे फायदे लक्षात आल्याने हे ढोंग केले जाते. मांत्रिक, देवॠषी, प्रश्नांची उत्तरे देणाऱ्या देव्या यांचे अंगात येणे हे ढोंग असते.

२. अंगात येण्याचा दुसरा प्रकार म्हणजे अंगात येण्याच्या काळापुरता कोणी देवाने, देवीने स्वत:चा ताबा घेतला आहे असे त्या व्यक्तीला वाटते. देव असा अंगात येतो, हा त्या व्यक्तीवर लहानपणापासून झालेला संस्कार असतो. व्यक्तीची मानसिक ताणतणावाची अवस्था व हा संस्कार यांमधून काही काळ अंगात येते. याचा व्यक्तीला उपयोग होऊन तिचे मानसिक ताण कमी होतात. समाजात काही मान्यता मिळण्याची शक्यता असते. या व्यक्तीना अशा मान्यतेची फार गरज असते.

३. अंगात येण्याचा तिसरा प्रकार म्हणजे विशिष्ट वेळी असे अंगात येणे; हे सामाजिक, सांस्कृतिक दृष्ट्या मान्यताप्राप्त वर्तन असते. ते देवाच्या पूजेसारखेच चांगले मानले जाते. नवरात्रीला देवीसमोर अंगात येणाऱ्या काही स्त्रियांच्या बाबतीत तरी ढोंगबाजी वा मनोविकृतीच्या ऐवजी हे कारण असू शकते.

अंगात आलेल्या व्यक्तीच्या खालील प्रकारच्या अवस्था दिसून येतात.

१. वास्तवतेपासून पूर्ण दूर गेलेली व्यक्ती. अशा व्यक्तीच्या शारीरिक संवेदना पूर्ण बधिर झालेल्या असतात; संपूर्ण चेहऱ्यावरचा भाव आणि आवाज बदललेला असतो. अशा माणसाला  लवकर भानावर आणता येत नाही.

२. व्यक्ती अर्धवट शुद्धीत असते. संवेदना काही प्रमाणात बधिर असतात. आवाजात बदल नसतो.

३. व्यक्ती पूर्ण शुद्धीवर असते. चेहऱ्यावरील भावात अगर आवाजात बदल नसतो. थोड्या प्रयत्नात ती भानावर येते. अंगात येणारी ढोंगी माणसे, देवर्षी व अंगात येणाऱ्या अन्य स्त्रिया या सर्वांच्या मध्ये याच स्वरूपाच्या अवस्था दिसत असल्याने मांत्रिकांच्या ढोंगीपणाला लोक फसतात. प्रत्यक्षात या अवस्था संमोहनातील वेगवेगळ्या अवस्थांच्या सारख्याच आहेत.

 

*डॉ. नरेंद्र दाभोलकर व प्रा. प. रा. आर्डे*

*यांनी लिहिलेल्या 'अंधश्रद्धा: प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम' या पुस्तकातून साभार*

https://mikamblemahesh.blogspot.com/

कोलित सुत्त

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_कोलित सुत्त_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_41.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼  _'कोलित सुत...