*_प्रश्न ३६ - अ) अंगात
आलेली बाई हातावर आग खेळवून ती खाताना आम्ही पाहिले आहे. तसेच रिकाम्या हातातूत या
बायका कुंकू काढतात. हळदीचे कुंकू व कुंकवाचा बुक्का सर्वांच्या डोळ्यादेखत काढतात_* .
*_ब) अंगात आलेल्या काही व्यक्ती नदीत
उलट्या उभ्या राहतात. देवीच्या शक्तीशिवाय हे कसे शक्य आहे?_*
*उत्तर* अ) अंगात आलेल्या बाईने आग खेळविणे. रिकाम्या हातातून कुंकू काढणे वा अन्य चमत्कार करणे यासाठी देवीच्या शक्तीची गरज नाही. शरीराचा कोणताही अवयव ३ सेकंदापेक्षा जास्त अग्नीच्या सान्निध्यात
राहिला तरच भाजण्याच्या वेदना होतात. हातावर आग खेळवणारी बाई पेटता कापूर या
हातातून त्या
हातात नाचवीत असते. त्यामुळे हाताची
कातडी ३ सेकंदांपेक्षा कमी वेळ अग्नीच्या सान्निध्यात राहते. यामुळे हाताला भाजत
नाही. आमचे कार्यकर्ते तरुण-तरुणी अग्नी खाण्याचा प्रयोग सहजतेने करतात. यासाठी
दैवी शक्तीची गरज नाही.रिकाम्या हातातून कुंकू काढणे ही हातचलाखी आहे. कुंकवाची
गोळी दोन बोटांमध्ये दडवून व अंगात आल्यावर चलाखीने तळहातावर आणून फोडली जाते; इतर युक्त्याही वापरल्या जात असतील. लपविलेले
कुंकू काढता येईल. कुंकवाची दैवी शक्तीने निर्मिती करणे शक्य नाही. हळदीचे कुंकू
वा कुंकवाचा बुक्का करणे ही रासायनिक युक्ती आहे. हळदीमध्ये चुना अगर निरमा पावडर
मिसळली, तर हळद लाल होते. कुंकवात निरमा पावडर
मिसळली तर कुंकू काळे पडते. या रासायनिक प्रक्रिया आहेत; देवी
हे करत नाही. हळदीचे कुंकू करणाऱ्या बाईला आपल्या जवळची हळद दिली व तिचे हात
तपासून धुवून हाताला अल्कली पदार्थ नाही, अशी
खात्री करून घेतली तर ही चलाखी अंगात आलेल्या बाईला करता येणार नाही.
ब) अंगात आलेल्या व्यक्ती नदीत उलट्या
उभ्या राहातात, याची तपासणी झाली पाहिजे. अशी तपासणी
झालेली नाही. कमी पाण्यात न गुदमरता जेवढा वेळ नाक पाण्यात ठेवता येईल, तेवढा वेळच अशी व्यक्ती पाण्यात उलटी राहू शकेल; जास्त वेळ नाही.
*डॉ.
नरेंद्र दाभोलकर व प्रा. प. रा. आर्डे*
*यांनी लिहिलेल्या 'अंधश्रद्धा: प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम' या पुस्तकातून साभार*
https://mikamblemahesh.blogspot.com/
No comments:
Post a Comment