Friday, 31 January 2025

पाली वाङ्‌मयातील तत्त्वज्ञान : आजच्या सामाजिक समस्यांवरील उत्तर

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

*_पाली वाङ्मयातील तत्त्वज्ञान : आजच्या सामाजिक समस्यांवरील उत्तर_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2025/01/blog-post_33.html

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

_मानवाच्या प्रगतीचा आलेख एकसारखा उंचावत जाताना दिसतो. अलिकडच्या काळातील विज्ञान-तंत्रज्ञानाने तर त्याची गती अधिकच तीव्र केली आहे. एकीकडे प्रगत तंत्रज्ञान, तर त्याच्या विरुद्ध दिशेने तितक्याच गतीने निर्माण होणाऱ्या समस्या, असे विचित्र वास्तव आज जगभरात दिसते आहे. केवळ भौतिक सुविधांनी माणूस पूर्णतः सुखी होऊ शकत नाही हा पुरातन काळापासून चालत आलेला सिद्धान्त आजच्या अतिप्रगत वैज्ञानिक सुविधांच्या रेलचेलीतही पुनः पुन्हा अधोरेखित होताना दिसतो. सुखाच्या शोधाकरिता माणूस आपोआपच धर्म आणि तत्वज्ञानाकडे वळतो. कारण सुख-समाधान ही मानवी मनाशी संबंधित असलेली प्रवृत्ती आहे. *जेव्हा मानवी मनाच्या विश्लेषणाचा, चिकित्सेचा, समस्यानिवारणाचा प्रश्न उपस्थित होतो तेव्हा बुद्धांची भूमिका अग्रगण्य ठरते. बुद्ध मानवी मनाचे श्रेष्ठ विश्लेषक होते. त्यामुळेच जग बुद्धांना केवळ एक धर्मप्रवर्तक न मानता मानवी मनाचे 'सुपर-सायंटिस्ट' म्हणून गौरविताना दिसते.*_

_बुद्धांनी मनाला सर्व प्रवृत्तीचे उगमस्थान असे म्हटले आहे. धम्मपद या बहुचर्चित ग्रंथातील यमकवग्गातील पहिलीच गाथा मनाच्या श्रेष्ठत्वाची ग्वाही देते._

*_मनोपुब्बङ्गमा धम्मा, मनोसेट्ठा मनोमया।_*

*_मनसा चे पदुट्ठेन, भासति वा करोति वा।_*

*_ततो नं दुक्खमन्वेति, चक्कं व वहतो पदं ।।_*

_(मन सर्व प्रवृत्तीचे उगमस्थान आहे. मन श्रेष्ठ आहे. जो कुणी कलुषित मनाने बोलतो किंवा वागतो तर ज्याप्रमाणे गाडी ओढणाऱ्याच्या मागे गाडीची चाके धावतात त्याप्रमाणे दुःख त्याच्या मागे लागते.)_

किंवा

*_अक्कोच्छि में अवधि में अजिनि में अहासि मे ।_*

*_ये तं न उपनय्हन्ति वेरं तेस सम्मति ।।_*

_(त्याने मला शिव्या दिल्या... मला मारिले, मला जिंकिले... लुटले रे. मनात बांधी गाठ अशी जो वैर न त्याचे फिटले रे)_

_बुद्धवाणीत असंख्य ठिकाणी मनोविश्लेषणाशी संबंधित उपदेश सापडतात. प्रत्येक गोष्ट मनाशी संबंधित असल्यामुळे बव्हंशी समस्यांची उकल करण्याकरिता आपल्याला बुद्धवाणीचा आधार देणे अपरिहार्य ठरते._

_समग्र बुद्धवाणी पाली भाषेत आढळते. पाली भाषेतील तिपिटकामध्ये बुद्धोपदेश संग्रहित केलेले आहेत. है तिपिटक म्हणजेच पाली वाङ्मय होय. तिपिटकाचे तीन प्रमुख भाग आहेत. सुत्तपिटक, विनयपिटक आणि अभिधम्मपिटक. विनयपिटकात भिक्षुच्या आचरणाचे नियम आहेत. अभिधम्मपिटकात मनोविश्लेषणाशी संबंधित उपदेश आहेत. सुत्तपिटकाचे दीघनिकाय, मज्झिमनिकाय, अंगुत्तरनिकाय, संयुत्तनिकाय आणि खुद्दकनिकाय हे पाच विभाग आहेत त्यांना निकाय असे म्हटले जाते. या प्रत्येक निकायाचे उपविभाग आहेत. सर्वाधिक उपविभाग खुद्दकनिकायाचे असून त्यात धम्मपद, उदान इतिवुत्तक, सुत्तनिपात, थेरगाथा, थेरीगाथा, चरियापिटक इत्यादी ग्रंथ आहेत. समग्र बुद्धवाणी मानवाच्या सर्वांगीण उन्नतीचे मार्गदर्शन करते. *आजच्या समस्यांवरील उत्तर शोधण्याकरिता या पालि वाङ्‌मयाचा निश्चितच उपयोग होतो.*_

_भारत देश आज असंख्य समस्यांनी ग्रासलेला दिसतो. शिक्षणाचे खाजगीकरण, रोजगाराचा अभाव, दारिद्र्य, अनारोग्य, शेतीउद्योगाची वाताहात, बोकाळलेला भ्रष्टाचार, व्यापारातील अनीती, गळेकापू जीवघेणी स्पर्धा, अमर्याद हव्यास, सामाजिक विषमता, पर्यावरणाचा हास... अगणित समस्या आणि याहून चिंतेचा विषय म्हणजे या समस्यांचे निराकारण करणाऱ्या यंत्रणेचा अभाव, सर्वत्र एक भीषणता उम्र रूप धारण करते आहे आणि सामान्य माणूस हतबल होऊन अगतिकतेने तिचा शिकार होतो आहे. या स्वरुपाच्या समस्यांवर बुद्धांनी वेळोवेळी भाष्य केल्याचे आपल्याला पाली वाडमयात दिसते._

_आज शिक्षणाचे खाजगीकरण झाले आहे. ज्यांच्याकडे भरपूर पैसा आहे त्यांची मुलं भरमसाठ फी असलेल्या महागड्या खाजगी शाळांमध्ये शिकतात आणि मध्यमवर्गीय सामान्य लोकांची मुलं शासकीय शाळांमध्ये पाठवली जातात. शासकीय शाळांमध्ये कोणत्याही शालेय सुविधा नाहीत. शिक्षणाला दर्जा नाही. मूल्यमापनाचे निकष नाही. शिक्षकांना पुरेसे वेतन नाही. सर्वार्थाने दुर्लक्षित असलेल्या या शासकीय शाळा आणि सर्व सुविधांनी युक्त अशा महागड्या खाजगी शाळा शैक्षणिक विषमतेबरोबरच सामाजिक विषमताही निर्माण करीत आहेत. ज्यांच्याकडे पैसे नाही ते आपोआपच शिक्षणापासून वंचित राहत आहेत. *शिक्षणव्यवस्थेसमोर ही मोठीच समस्या आहे. बुद्धपूर्वकाळातही थोड्याशा फरकाने अशीच शिक्षणव्यवस्था होती. शिक्षण केवळ उच्चवर्णीयांनाच उपलब्ध होते. गुरुकुल शिक्षणपद्धतीत विद्यार्थ्याला गुरुच्या घरी राहून शिक्षण घ्यावे लागत असे. हीनवर्णाची व्यक्ती गुरुकुलात राहण्यास अपात्र असल्याने केवळ उच्चवर्णीयांनाच शिक्षणाची संधी उपलब्ध होती. तसेच मुलीला दुसऱ्याच्या घरी ठेवणे सुरक्षित नसल्याने स्त्रीशिक्षण आपोआपच संपुष्टात ओले होते. अशा पार्श्वभूमीवर बुद्धांनी भिक्षु आणि भिक्षुणीसंघाची स्थापना केली. सर्व जातीच्या सर्व वर्णांच्या, सर्व थरातील लोकांना या भिक्षुसंघात प्रवेश दिला. सर्वाकरिता समान नियम, समान दर्जा आणि समान शिक्षणाचा प्रारंभ केला. तथागत बुद्धांनी शिक्षणव्यवस्थेत बदल करुन सार्वत्रिक, सामुहिक आणि समान शिक्षणाची सुरुवात केली. हे शिक्षणही संस्कृतसारख्या प्रमाणभाषेत न देता लोकभाषेत देण्याचा आग्रह धरला.*_

_*त्याकाळी संस्कृत भाषा प्रचलित असली तरी ती लोकभाषा कधीच नव्हती.* त्यामुळे संस्कृत ग्रंथातील ज्ञान बहुजन समाजापर्यंत पोहचू शकले नाही आणि संस्कृत जाणणाऱ्या पंडित पुरोहितांचा वर्ग तयार झाला व त्यांनी धर्माच्या नावावर लोकांना भ्रमात ठेवून स्वार्थासाठी त्याचा वापर केला. त्यामुळे सर्वसामान्य लोकांना प्रत्यक्ष धर्मग्रंथाचे अध्ययन अशक्य कोटीतील गोष्ट ठरली. ही अडचण आणि कुचंबणा लक्षात घेऊन भगवंताने संस्कृत भाषेच्या वर्चस्वाला झुगारून देऊन, तत्कालीन लोकभाषा पालीचा पुरस्कार आणि वापर केला. *भिक्षुनी छान्दस् (वैदिक) भाषेत बुद्धवचन शिकण्याची परवानगी मागितली असता भगवान बुद्धाने त्यांना नकार दिला आणि म्हटले, भिक्षुनो! बुद्धवचनाला छान्दस् भाषेत परिवर्तीत करू नये. जो करील त्याला दुष्कृत्य दोष लागेल. भिक्षुनो, आपल्याच भाषेत बुद्धवचन शिकण्याची मी परवानगी देतो. यामागे बुद्धाच्या मनात संस्कृतचा तिरस्कार नव्हता, तर सामान्य जनतेला धर्मज्ञान उपलब्ध व्हावे, हा सद्‌हेतू होता. स्त्रियांनाही आपल्या प्रगतीची संधी मिळावी म्हणून भिक्षुणींचा वेगळा संघ करून स्त्रीशिक्षणाचा पाया घातला. अनेक शतके दुर्लक्षित असलेला स्त्रीवर्ग शिक्षण घेण्यास पात्र ठरला.*_

_बुद्धांनी केवळ शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली नाही, तर शिक्षणाचे महत्त्व वेळोवेळी पटवून दिले. *तिपिटकातील खुद्दकनिकायच्या धम्मपदात नागवग्गातील गाथेत तथागतांनी शिक्षणाचे महत्त्व विशद केले आहे.*_

*_दन्तं नयन्ति समितिं दन्तं राजाभिरुहति ।_*

*_दन्तो सेट्ठो मनुस्सेसु योतिवाक्यं तितिक्खति ।।_*

_(प्रशिक्षित हत्तीलाच युद्धासारख्या महत्त्वाच्या कामात घेवून जातात. राजासुद्धा प्रशिक्षित हत्तीवर विराजमान होतो. माणसांमध्ये शिक्षित माणूसच श्रेष्ठ आहे/शिक्षणाने माणसाची प्रगती होते, माणसाला प्रतिष्ठा प्राप्त होते. त्यामुळे प्रत्येकाने शिक्षण घेतलेच पाहिजे असा उपदेश तथागतांनी दिला.)_

_शिक्षण असेल तर कौशल्य प्राप्त होईल. कौशल्य असेल तर समृद्धी मिळेल. त्यामुळे विविध क्षेत्रात प्राविण्य मिळविण्याचा उपदेश तथागतांनी दिला. *तिपिटकातील खुद्दकनिकायच्या सुत्तनिपात या ग्रंथाच्या चूल्लवग्गच्या द्वितीय भागातील महामंगलसुत्तात तथागतांनी गृहस्थयांकरिता उपदेश देताना सांगितले.*_

*_बाहुसच्चं च सिप्पं च, विनयो च सुसिक्खितो।_*

*_सुभासिता च या वाचा, एतं मङ्ग‌लमुत्तमं ।।_*

_(अनेक प्रकारच्या कला आणि शिल्पकौशल्य आत्मसात करणे, सुशिक्षित असणे, वाचा सुभाषित असणे हे उत्तम मंगल आहे.) जर अंगी कौशल्य असेल तर रोजगार प्राप्ती होऊन अर्थार्जनाचा प्रश्न सुटू शकेल असे बुद्धवाणीतून दिसते._

_रोजगाराचा अभाव जसा बाह्य परिस्थितीशी उपस्थितीशी संबंधित आहे तसाच तो माणसाच्या स्वभावाशीही संबंधित आहे. एखादी व्यक्ती जर आळशी असेल तर रोजगार उपलब्ध असूनही ती त्या संधीचा फायदा घेऊ शकणार नाही. परिणामी तिला दारिद्रयाला सामोरे जावे लागेल. त्याकरिता माणसाने आळस झटकून कार्यमग्न होणे गरजेचे आहे. निष्फळ गप्पागोष्टीमधून काहीही साध्य होत नाही तर वेळ वाया जातो. *तिपिटकातील खुद्दकनिकायच्या सुत्तनिपात या ग्रंथाच्या उरगवग्ग या प्रथम पराभवसुत्तात तथागतांनी माणसाच्या अवनतीची कारणमीमांसा केली आहे.*_

*_निद्दासीली सभासीली, अनुट्ठाता च यो नरो ।_* 

*_अलसो कोधपञाणो, तं पराभवतो मुखं ।।_*

_(जी व्यक्ती निद्राळु आहे, निष्फळ गप्पागोष्टी करण्यात मशगूल आहे, परिश्रम करायला तयार नाही, आळशी आणि क्रोधी आहे अशी व्यक्ती स्वतःच्या अवनतीला कारणीभूत आहे)_

_त्याउलट जर एखादी परिश्रम करणारी, धैर्यवान असेल, तर त्यास धनसंपदा आणि यश प्राप्त होते असा विश्वास तथागतांनी *खुद्दकनिकायच्या सुत्तनिपात या ग्रंथामधील आळवकसुत्तात कथन केला आहे.*_

*_पतिरुपकारी धुरवा, उध्दाता विन्दते धनं ।_*

*_सच्चेन कित्तिं पप्पोति, ददं मित्तानि गन्धति ।।_*

_(योग्य काम करणाऱ्या धैर्यवान आणि परिश्रमी व्यक्तीस धन आणि संपत्ती प्राप्त होते. अशी व्यक्ती सत्य मार्गाने यश प्राप्त करते) बेरोजगारी आणि दारिद्रयासारख्या समस्यांवरील उपाय आपल्याला पाली वाङ्‌म‌यात आढळतो)_

_सत्य मार्गाने यश मिळेल की नाही याची शंका असल्याने लोक भ्रष्टाचाराकडे वळतात. झटपट श्रीमंत होण्यासाठी लोक गैरमार्गाचा अवलंब करतात. लोकांची फसवणूक करून संपत्ती मिळविण्याचा प्रयत्न करतात. व्यापारी आपल्या व्यापारात अनीतीने वागतो. पदार्थामध्ये भेसळ करतो. वजन मापात फसवणूक करतो. त्यातून त्याची मानसिकता तर बिघडतेच परंतु सामाजिक स्वास्थ्याच्या दृष्टीनेही गंभीर प्रश्न निर्माण होतात. *व्यापारासंबंधी तथागतांनी अगुंत्तरनिकायच्या दशम निपातमधील उपालिवग्ग या भागातील उपालिसुत्तात सांगितले आहे,*_

*_कय विक्कया पटिविरतो होति, तुला कूटकं सकुट मानकूटा पटिविरतो होति ।_*

*_उक्कोटन वत्वन निकतिसा चियोगा पटिविरतो होति।_* 

*_छेदन वध बन्धन विपरामोस अलोप सहसाकारा पटिविरतो होति ।।_*

_(वजनमापांची फसवणूक, धातु किंवा वस्तुंची फसवणूक, लाच घेणे-देणे, धोखा देणे, फसवणूक करणे यापासून अलिप्त राहावे) सामाजिक स्वास्थ्याचा विचार करता योग्य व्यापार उदीम अतिशय आवश्यक आहे असे स्पष्ट प्रतिपादन तथागतांनी केले आहे._

_व्यापारातील अनीती किंवा सर्वत्र बोकाळलेला भ्रष्टाचार या समस्यांमागे राजकीय यंत्रणेचा मोठा हात असतो. भ्रष्टाचार का बोकाळतो? याचे कारण शोधताना असे लक्षात येते की भ्रष्टाचार करणाऱ्यांना मिळणारा राजाश्रय हे त्यामागचे खरे कारण आहे. *अगुंत्तरनिकायच्या तिक-निपातमधील चूल्लवग्ग या भागातील महाचोरसुत्तात सांगितले आहे,*_

*_कथञ्च, भिक्खवे, महाचोरो बलवनिस्सितो होति? इध, भिक्खवे, महाचोरो राजानं वा राजमहामत्तानं वा निस्सितेत होति । सचे में कोचि किञ्चि वक्खति, इमे मे राजानो वा राजमहामत्ता वा परियोधाय अत्थं भणिस्सन्ती ति । एवं खो, भिक्खवे, महाचोरो बलवनिस्सितो होति।_*

_(भिक्षुंनो, चोर अधिक बलवान कशाने होतात? जेव्हा चोर राजासोबत किंवा त्याच्या सरदारासोबत वावरताना दिसतात, तेव्हा त्या चोरांच्या मनात विचार येतो की, मी काहीही केले तरी राजा माझे संरक्षण करील मला शिक्षा करणार नाही. त्यामुळे चोर अधिक बलवान होतात)_

_आजच्या परिस्थितीत जे मोठमोठे घोटाळे अथवा भ्रष्टाचार दिसतात, ते बव्हंशी राजकीय पाठबळ असलेल्या लोकांनी केलेले दिसतात. राजकीय पुढारी व त्यांचे अनुयायी अशा भ्रष्टाचारात अग्रणी असतात. कारण पकडले गेलो तरी आपला नेता आपल्याला सोडवण्यासाठी प्रयत्न करील अथवा संपूर्ण प्रकरणच दाबून टाकील याची खात्री राजकीय पुढाऱ्यांच्या अनुयायांना असते. त्यामुळे भ्रष्ट लोकही मुद्दाम राजकीय पुढाऱ्यांशी सलगी ठेवून असतात. पाली वाङ्मयात यासंबंधी अनेक संदर्भ सापडतात._

_जातवास्तव हे भारतीय समाजजीवनाचे कटुसत्य आहे. संपूर्ण समाज वेगवेगळ्या पद्धतीने विभागला गेला आहे. जातपात आणि शिवाशीव पाळण्यावर कायद्याने बंदी आहे. भारतीय राज्यघटनेने समाजपरिवर्तनाचे अतिशय मोठे काम यानिमित्ताने केले आहे. कायद्याच्या पाठबळामुळे अस्पृश्यतानिवारणाचा मोठा प्रश्न मार्गी लागला आहे. पाली वाङ्‌म‌यातही जातपात व अस्पृश्यतेचा निषेध अनेक ठिकाणी आढळतो. एखादी व्यक्ती खालच्या जातीची असली म्हणजे ती पापी, दुष्ट असलीच पाहिजेः असा समज त्याकाळी प्रचलित होता. खालच्या जातीचा म्हणजे नीच असे मानले जाई. बुद्धकाळात अशा व्यक्तीचा उल्लेख वसल (वृषल) असा केला जात असे. *खुद्दकनिकायच्या सुत्तनिपात या ग्रंथामधील वसलसुत्तात यासंबंधी माहिती मिळते.*_

*_न जच्चा वसलो होति, न जच्चा होति ब्राह्मणो।_*

*_कम्मुना वसलो होति, कम्मुना होति ब्राह्मणो ।।_* 

*_तचिनापि जानाय, यथामेदं निदस्सनं ।_*

*_चण्डालपुत्तो सोपाको, मातङो इति विस्सुतो।।_*

_(केवळ जन्मावरून कुणी वृषल होत नाही अथवा केवळ जन्माने ब्राह्मण होत नाही. माणसाच्या कर्तृत्वावरून त्याचे वृषलपण किंवा ब्राह्मणपण ठरते. तुम्हाला उदाहरणच द्यायचे झाले तर मी चांडाळपुत्र सोपाकाचे देईन. जो मातङ्ग या नावानेही प्रसिद्ध आहे.)_ 

_तथागत बुद्धांनी जातीप्रथा व अस्पृश्यता निवारणासंबंधी दिलेले अनेक उपदेश पाली वाङ्‌म‌यात आढळतात._

_पाली वाङ्‌मयात सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक बाबींबरोबरच प्रत्येक व्यक्तीच्या वैयक्तिक उन्नतीचे मार्गदर्शनही आढळते. आजच्या बदलत्या जीवनशैलीत माणूस आपल्या आरोग्याविषयी अधिकाधिक निष्काळजी होत चालला आहे. त्यामुळे विविध प्रकारच्या रोगांना तो बळी पडतो आहे. *आरोग्य हा श्रेष्ठतम लाभ असल्याने आरोग्याचे महत्त्व विशद केल्याचे आपल्याला पाली वाङ्‌मयातून दिसते. खुद्दकनिकायच्या धम्मपद या उपविभागातील सुखवग्गात तथागतांनी सांगितले आहे,*_

*_आरोग्य परमा लाभा, सन्तुट्ठी परमं धनं ।_*

*_विस्सास परमा जाति, निब्बानं परमं सुखं ।।_*

_(आरोग्य श्रेष्ठ लाभ आहे, संतुष्टी श्रेष्ठ धन आहे, विश्वास मोठा भाऊ आहे आणि निब्बाण श्रेष्ठ सुख आहे)_

*_संतुष्टी मनाशी संबंधित असल्याने मनाची मशागत करण्यावर तथागतांनी विशेष भर दिला आहे. मनातील लोभ, द्वेष आणि मूढता नष्ट करण्यासाठी तथागतांनी अष्टांगमार्ग हा मध्यममार्ग सांगितला आहे. सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्मांत, सम्यक आजिविका, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती, सम्यक समाधी हा बुद्धांनी प्रतिपादित केलेला अष्टांगमार्ग आहे. तोच मानवी दुःखाच्या निवारणाचा मध्यममार्ग आहेः जो मार्ग काळाच्या कसोटीवर खरा ठरला आहे. स्थळ काळाच्या मर्यादेपलिकडे हा दुःखमुक्तीचा मार्ग आहे. मानवी जीवनाशी संबंधित प्रश्नांवर उत्तर केवळ याच मध्यममार्गात सापडते. या अष्टांगमार्गाचे विश्लेषण म्हणजेच पाली वाङ्‌मयातील तत्वज्ञान आहे. या मार्गाच्या विश्लेषणातून पाली वाङ्‌मय आकारास आले आहे. त्यामुळे पालि वाङमय हे आजच्या समस्यांवरील उत्तर आहे यात शंका नाही._*

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

*_लेखन :- देवेंद्र उबाळे, इगतपुरी_*

*_संकलन :- महेश कांबळे_*

*_संपर्क :-_*

संपादक - बुद्धघोष एस. के. खैरे (9867836548) प्रबुद्ध समाज मासिक, वर्ष ४/अंक २० ऑगस्ट - सावणो २०२४_*

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

धर्म व अहिंसा (भाग २)

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

*_धर्म व अहिंसा (भाग २)_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2025/01/blog-post_31.html

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

(सार्वजनिक प्रवचन, मुंबईः जैन पर्वोत्सव, २००५)

धर्म प्रेमी सज्जनांनो !

(मागील अंकापासून क्रमश:) 

_जेव्हा आम्ही अहिंसक झालो, म्हणजे विकार नाहीत तर मैत्री आहे, करुणा आहे तर पुरस्कार मिळेल, ताबडतोब मिळेल. अरे, इतके सुख इतकी शांती जेवढी कधी पाहिली नाही, कधी इतके सुख अनुभवास आले नाही, कधी इतकी शांती अनुभवास आली नाही. जरा मनाला निर्मळ करुन तर पाहा, किती पुरस्कार मिळतो._

_भारतात यालाच धर्म म्हणायचे. आणि कुठे हिंदू धर्म, बौद्ध धर्म.. आमचा धर्म, तुमचा धर्म. हे वरवरचे कर्मकांड, वेशभूष, दार्शनिक मान्यता धर्म बनली. कुठे गेला धर्म? लुप्त झाली विद्या. मी म्हणत होतो की ५० वर्षापूर्वी जेव्हा अशी परिस्थिती आली की आपल्या गुरुंजवळ गेलो तेव्हा घाबरतच गेलो की बौद्धांचा धर्म आहे, न जाणे कुठे गुंतेन. परंतु दृढ प्रतिज्ञा करुन गेलो की एकदा करुन पाहीन, पण बौद्ध बनणार नाही. हे म्हणतात की यामुळे शील, सदाचार वाढेल, मन काबूत येईल, प्रज्ञा जागेल, मन निर्मळ होईल. सर्व बाबी चांगल्या वाटतात, करुन पाहीन, परंतु बौद्ध बनणार नाही. ते म्हणाले *'मी तुम्हाला जी विद्या शिकवीन, ती तुमच्या भारताची खूप पुरातन विद्या आहे. तिला 'विपश्यना' म्हणतात. विपश्यना म्हणतात, कधी नावही ऐकले नाही. हिंदीचे बरेच अध्ययन होते, परंतु विपश्यना काय असते ? घरी येऊन हिंदीचा शब्दकोश पाहिला, त्यात विपश्यना शब्दच नाही, संस्कृतच्या शब्दकोशातही नाही. खूप दुर्भाग्याची बाब झाली की या देशाने विद्याच हरवली.* एका देशाने शताब्दीपर्यंत सांभाळून ठेवली, तेव्हा आपल्या देशात पुन्हा आली. आता भगवान महावीरांची वाणीही इतकी स्पष्ट लक्षात येते, गीतेची वाणीही स्पष्ट लक्षात येते, संपूर्ण धर्म स्पष्ट पणे लक्षात येते._

_*भगवान महावीर म्हणतात- आयतचक्खू लोगविपस्सी..। जो लोकविपश्यी होईल त्याला ज्ञानाचे चक्षु प्राप्त होतील, प्रज्ञेचे चक्षु प्राप्त होतील.* एक शब्द आयत, म्हणजे दूरवरचे चक्षु प्राप्त झाले. चांगले जाणले की जेव्हा मी आपल्या आत विकार जागवतो तेव्हा काय परिणाम येतील. मी व्याकुळ होईन, इतरांनाही व्याकुळ करीन आणि व्याकुळ होण्याचा स्वभाव बनला तर? वारंवार न इच्छिलेली बाब होईल आणि मी विकार जागवीन, मनाप्रमाणे होणार नाही, विकार जागवीन. अंतर्मनाच्या सखोलतेत एक असा स्वभाव (बिहेवियर पॅटर्न) तयार झाला, ज्याचा गुलाम झाली. तेव्हा एका जन्माचे नाही तर अनेक जन्मांचे दुःख डोळ्यासमोर येईल. असा आयतचक्षु, दीर्घचक्षु झालो. दिव्यदर्शी झालो तेव्हा पाहिले की आता काय होत आहे. आयतचक्षू कोण ? *जो लोकविपश्यी आहे. लोकविपश्यी म्हणजे काय? लोक' म्हणायचे त्या दिवसात कायेला. शरीरासाठी 'लोक' शब्दाचा वापर व्हायचा. बाहेरचे जितके लोक आहेत, सर्व आमच्या साडे तीन हाताच्या कायेत सामावले आहेत. आत लोगस्स अहोभागं जाणति, उड्ढं भागं जाणति, तिरियं भागं जाणति (जिनागम-ग्रन्थमाला, ग्रन्धांक-१/९१)*_

_हा जो लोक आहे त्याच्या खालच्या भागाला चांगल्या प्रकारे जाणा. वरच्या भागाला चांगल्या प्रकारे जाणा, आडव्या, तिरप्या, पुढे-मागे, साऱ्या शरीराला चांगल्या प्रकारे जाणा, अनुभव करा, काय होत आहे ! अरे, बाहेर-बाहेर पाहात तर सारे जीवन संपले. जेव्हापासून जन्मलो डोळे उघडले तेव्हापासून बहिर्मुखीच राहिलो. तुझ्या आत काय होत आहे, कधी पाहिलेच नाही ना! आता पाहा! साऱ्या शरीरात काय होत आहे ? पाहशील तर माहित होईल, किती गोंधळ आहे माझ्या मनात. वरवर म्हणतो शरीर 'मी' नाही, 'माझे' नाही, शरीर माझा आत्मा नाही, परंतु आतल्याआत किती गोंधळ, किती गुंतलो आहे 'मी-माझे', 'मी माझे शरीरासोबत इतकी तादात्म बुद्धी झाली, इतकी मोठी आसक्ती झाली. वरवर हजार म्हणेल, आत पाहील तर माहीत होईल की किती देहात्म बुद्धी आहे. जसा कोणी देहालाच 'आत्मा' मानत आहे, 'मी', 'माझे' मानत आहे, आणि देहासोबत जुळलेल्या मनाला, म्हणजे चित्ताला चित्तात्म बुद्धी मानत आहे, माझा आत्मा मानत आहे. गुंतत गेलो, गुंतून गेलो, खरे तर म्हणजे हा तर *गढिए अणुपरियट्टमाणे-परमाणुंचा पुंज आहे.* जो सतत परिवर्तनशील आहे. प्रवाहमान आहे, बनतो नष्ट होतो, बनतो नष्ट होतो. विपश्यना करतो तेव्हा माहीत होते की संपूर्ण शरीरात परमाणुचा प्रवाह कसा चालत आहे. याला पाहू शकत नाही तेव्हा काय होते? या प्रती 'मी' चा भाव जागतो. पाहतो की कोणत्याही कारणामुळे एक सुखद संवेदना जागली, सुखद अनुभूती झाली, वाह-खूप चांगले आहे, हे खूप चांगले झाले. माझी साधना इतकी चांगली झाली, माझे ध्यान इतके चांगले लागले, पाहा आनंदच आनंद, आनंदच आनंद. इतके सुख, इतके सुख आसक्ती जागवू लागला ना. त्याच्याप्रती आसक्ती जागवू लागला आणि काही वेळानंतर ते नष्ट झाले तर रडतो. शिबिरात या प्रकारचे नवीन नवीन खूप लोक येतात आणि नंतर कालातंराने समजतात. प्रथम तर म्हणतात 'गुरु महाराज, सकाळी-सकाळी खूप चांगली साधना झाली, खूप आनंद येत होता, आता तर संपला.' 'अरे, भल्या माणसा तो नष्ट होण्यासाठीच आला. सर्व शरीर प्रतिक्षण बदलत आहे, सर्व चित्त प्रतिक्षण बदलत आहे आणि तू यातच गुंतत आहेस. तू त्यातच खूप गुंतत जात आहेस. त्याला 'मी,' 'माझे', 'माझा आत्मा' मानून चिकटून आहेस त्याच्यासोबत. किती आसक्ती आहे रे, त्यामुळेच व्याकुळ आहेस. शुध्दीवर ये_

_*भगवान महावीर म्हणतात- सन्धिं विदित्ता-संधीला पाहा,* काय संधीला पाहा ? विपश्यना भारतातून लुप्त झाली, दुःख झाले. काही असे लोक ही शिबिरात आले की आम्ही संधीला पाहतो. काय संधीला पाहता? ही हाताची संधी, ही कोपऱ्याची संधी. अरे, काय पाहता याला ? काय मिळेल याला पाहून ? सांगणाऱ्याने काय सांगितले आणि कोठे गुंतलो आम्ही ? *सन्धिं विदित्ता- म्हणजे चित्त धारेत आसक्तीची संधी कोठे झाली ! चित्तधारेत द्वेषाची संधी कोठे झाली! त्याला पाहा, त्याला पाहाल तर जाणवेल, असे व्याकुळ झालो ना! त्याला पाहाणार नाही तर आपल्या व्याकुळतेला ओळखूच शकणार नाही. ओळखल्याशिवाय व्याकुळतेच्या बाहेर कसा निघेल ? आपल्या आसक्ती, द्वेषांना ओळखणार नाही तर बाहेर कसा निघेल ? वीतराग कसा होईल ? वीतद्वेष कसा होईल ?*_

_शरीरात अनेक कारणांमुळे वेगवेगळ्या प्रकारच्या अनुभूती होतात. कधी सुखद, कधी दुःखद सुखद होताच पाहा आसक्ती जागली ना, दुःखद होताच पाहा द्वेष जागला ना हे पाहावयाचे आहे- *सन्धिं विदित्ता।* आणि याला पाहून- *ऐस वीरे पसंसिते जे बद्धे पड़िमोयए* हा वीर आहे, विपश्यना करणारा वीर असतो. *ऐस वीरे पसंसिते हा वीर प्रशंसा करण्यायोग्य आहे जे बद्धे पड़िमोयए जो गाठी उघडतो.* जेव्हापासून जन्मलो तेव्हापासून गाठी बांधणेच शिकलो. इतके अनमोल मनुष्याचे जीवन मिळाले, अनमोल कोणत्या अर्थाने ? की हे काम केवळ मनुष्य करु शकतो. अंतर्मुखी होऊन सत्याचे दर्शन करत, करत, वीतराग होण्याचे, वीतद्वेष, वीतमोह, वीतक्रोध, वीतभय, वीतअहंकार होण्याचे काम केवळ मनुष्य करु शकतो. प्रकृतीने अथवा म्हणा परमेश्वराने केवळ मनुष्यालाच ही शक्ती दिली आहे, ही उर्जा दिली आहे. एक पशु करु शकत नाही, पक्षी, सरपटणारे प्राणी, कीडे-पत्तंग, प्रेत प्राणी करु शकत नाहीत, म्हणून मनुष्याचे जीवन अनमोल आहे. त्याच्याजवळ इतकी मोठी शक्ती आहे की तो अंतर्मुखी होऊन, सत्याला पाहू शकतो. आणि पाहून गाठी बांधणाऱ्या स्वभावाला थांबवू शकतो. नवीन गाठी बांधणे बंद झाले की आपोआप जुन्या उघडू लागतात. *'खीणं पुराणं नवं नत्थि सम्भवं।'* नवीन बनविणे बंद करा, जुने आपोआप क्षीण होत जाईल. जितक्या गाठी पूर्वी बांधल्या आहेत, सर्व आपोआप उघडतील, परंतु जर नवीन बनवत जाल तर कशा उघडतील ?_

_अग्नी जळत आहे आणि आम्हाला वाटते की त्याला विझवावे. कसे विझवाल ? यात नवीन सरपण टाकत आहात, नवीन नवीन पेट्रोल टाकत आहात आणि इच्छिता की तो विझावा, कसा विझेल ? त्याला सरपण देणे बंद करा. तर जे सरपण त्याच्याजवळ आहे, तितके जळून आपोआप संपून जाईल. साधी बाब आहे, प्रकृतीच्या नियमांची बाब आहे. *नवीन-नवीन विकार जागवू, नवीन नवीन आसक्ती, द्वेष जागवू आणि समजू की वीतराग बनू, वीतद्वेष बनू, मनुष्य जीवनाचे सर्वात मोठे लक्ष हे आहे की कसे वीतराग, वीतद्वेष बनावे, कसे वीतमोह बनावे, कशी विकारांपासून मुक्ती मिळेल ? कसे ख-या अर्थाने अहिंसक बनावे. अहिंसक बनण्यासाठी हे अंतर्तप करणे आवश्यक आहे.*_

_जे साधनेत येतात, त्यांना माहीत आहे. काम सुरु करताच कोणा-कोणाला आतील ज्वाला, गर्मी जाणवते. आत द्वेषाचे, क्रोधाचे, दौर्मनस्याचे जितके भांडार आहे, आग आहे, ती उभारुन येते. आम्ही तटस्थ भावाने तिला पाहातो, नवीन आग निर्माण करत नाही तर जुनी जळत-जळत संपते. यालाच आपल्या इथे अंतर्तप म्हणत._

_*बाहेर धुनी लावून, राख लावून बसले, आम्ही तप करत आहोत-अरे बाबा, काय तप करत आहात ? देशाचे दुर्भाग्य झाले की जन्म-मरणापासून सोडवणारी इतकी महत्वपूर्ण विद्या लुप्त झाली आणि आता आली तर परक्यासारखी वाटते.* मलाही वाटली होती. यातून गेलो तेव्हा माहीत झाले, अरे, हेच तर भारताचे खरे आध्यात्म आहे. आध्यात्म शब्दाचा अर्थच विसरले. *आध्यात्म म्हणतात आतील सत्याला, बहिद्धा-बाहेरचे सत्य, आतील सत्य, आतील सत्याला पाहाणेच धर्मात परिपक्व होणे आहे. अज्झत्त- आतील सत्याला पाहिल्याविना आसक्ती द्वेषापासून कशी सुटका होईल ? आम्ही महापुरुषांची वाणी विसरलो, त्याचा अर्थ विसरलो. पाठ करु लागलो, भगवान महावीर म्हणायचे जहा अंतो तहा वाहिं, जहा बाहिं तहा अंतो जे बाहेर आहे तेच आत आहे, जे आत आहे, तेच बाहेर आहे. बाहेरचे सारे विश्व प्रतिक्षण बदलत आहे आणि आतील सर्व शरीर व सर्व चित्त प्रतिक्षण बदलत आहे.* त्यानंतर म्हणतात-या बाबीला असेच मानू नका. *अंतो अंतो पूतिदेहंतराणि-* याच्या आत जाता-जाता देहाचा अंत होईल, म्हणजे देहाच्या सीमेपर्यंत सा-या शरीराला पाहा म्हणजे विपश्यना करा, पाहा याला. *पुढो बीसवताई-* उलटून टाका साऱ्या आश्रवांना, आश्रव म्हणजे जितका मळ आत जमा करुन ठेवला आहे, त्याला उलटा, त्याची उल्टी करा. जसे बादलीत मळ आहे. आम्ही उलटला. म्हणून म्हटले- उलटून टाका त्याला. *विपश्यना यासाठी करावयाची आहे की जितका मळ एकत्र केला आहे, त्याला उलटवयाचे आहे* भाऊ. याला भरतच जाऊ? किती जन्मांपासून भरतच जात आहोत, अजूनही पुढे भरतच जाऊ, भरतच जाऊ तर काय हाल होतील ? आज दुःखी आहात, पुढेही दुःखच आहे._

_इतकी कल्याणकारी विद्या जी साऱ्या परंपरेत होती, हळूहळू लुप्त होत होत, केवळ शब्दच राहिले. शब्दांचे अर्थ नष्ट झाले. धर्म परका वाटू लागला. आजही आमचे खूप जवळचे लोक, जे या बाबीला स्वीकारतात की जो-जो तिथे जातो, बदलाव येतोच. विकार थोडे फार कमी होतातच. जितके काम करु तितके कमी होतात. मळ काढण्याचा रस्ता तर मिळाला. खूप क्रोधी व्यक्तींचा क्रोध कमी होत जातो. होता होता बिल्कुल समाप्त होतो. खूप वासनेत बुडालेल्यांची वासना कमी होत जाते. भयवाल्यांचे भय कमी होत जाते, डिप्रेशन वाल्यांचे डिप्रेशन कमी होत जाते. अरे, आमच्या आत जे काही रोग आहेत, ते कमी होत जातात तर अजून काय पाहिजे? प्रत्यक्ष प्रमाण आहे, तरीही आम्ही म्हणतो, येऊ तर इच्छितो, परंतु शेवटी आहे तर बौद्ध धर्म ना ! आम्हाला दयाही येते, हसूही येते, करुणाही येते, कारण मी सुद्धा असाच गुंतलो होतो. याच वेडेपणात गुंतलो होतो. नाही जाणार, हा तर बौद्ध धर्म आहे. *गुरुजींना भेटण्यास गेलो तेव्हा ते म्हणाले भाऊ तुम्ही येथील हिंदूचे नेते आहात, आम्हाला एक गोष्ट सांगा की तुमच्या हिंदूत शील, सदाचाराचे जीवन जगण्याला काही विरोध आहे? शील, सदाचारात काय विरोध, आमच्या हिंदू धर्मात काय कोणत्याच धर्मात विरोध नाही. तर पाहा आम्ही १० दिवसांपर्यत तुम्हाला शील, सदाचाराचे पालन करणे शिकवू. काही विरोध नाही ना? कोणताही विरोध नाही. कसे पालन कराल, तुमचे मनच काबूत नाही, तर कसे पालन कराल ? आम्ही तुम्हाला मनावर ताबा ठेवायला शिकवू. तुम्ही मनाचे गुलाम आहात, मनाचे मालक बनणे शिकवू. याला आम्ही समाधी म्हणतो. काही विरोध आहे ?* अरे, समाधी, त्या दिवसात जे शास्त्र वाचले, धर्माची पुस्तके वाचली त्यात हेच की अमुक मुनी जंगलात राहिले, त्यांनी समाधी लावली, अमुक ऋषी जंगलात गेले त्यांनी समाधी लावली. आम्ही तर गृहस्थ आहोत-तर कोणी आम्हाला समाधी लावणे शिकवेल तर काय विरोध आहे ! नाही महाराज, कोणताही विरोध नाही आम्हाला._

_*काहीही होत नाही या समाधीनेही. समाधीने चित्त एकाग्र होईल, परंतु एकाग्र चित्ताने वाईट कामही करु शकता. प्रत्येक वाईट करणारा चित्ताला एकाग्र करतो. चित्त एकाग्र होण्यामुळे हे समजू नये की आम्ही चांगलेच काम करु. का? कारण तुमच्या आत विकारांचे भांडार आहे. ते वारंवार उभारुन येईल व जरी चित्त एकाग्र झाले तरी जर तो विकार जागला-क्रोध जागला तर वाईटच काम कराल. वासना जागली तर वाईटच काम कराल, अहंकार जागला तर वाईटच काम कराल. केवळ चित्त एकाग्र करण्यामुळे काहीही मिळत नाही. आम्हाला कोणाची निंदा करावयाची नाही परंतु मी ज्या परंपरेत जन्मलो, वाढलो, विश्वमित्राचे चित्र समोर आले, दुर्वासाचे चित्र समोर आले, पराशराचे चित्र समोर आले, खूप ध्यान केले, पण काय झाले? तेव्हा म्हणाले, जेव्हापर्यंत प्रज्ञा जागणार नाही, प्रत्यक्ष ज्ञान होणार नाही, तेव्हापर्यंत तुमचे विकारांचे जे भांडार आहे. ते रिकामे होणार नाही, वाढतच जाईल, वरवर हजार मनाला काबूत ठेवा. त्यामुळे ते भांडार कसे रीक्त होईल ? पोहोचावयाचे तेथे आहे, जेथे विकारांची उत्पत्ती होते. जेथे विकार संग्रहित होतात, त्यांचे संवर्धन होते आणि वाढत वाढत डोक्यावर स्वार होतात. तुमच्या सर्व समाधी एका बाजुला राहतील. पुन्हा तसेचे-तसेच राहाल.*_

_आम्ही प्रज्ञा शिकवतो. गीतेत खूप पाठ केला. स्थितप्रज्ञस्य का भाषा...। स्थितप्रज्ञ असा असतो, असा असतो. वीतराग भय क्रोधः जो वीतराग, वीतभय, वीतक्रोध आहे, तो स्थितप्रज्ञ आहे. परंतु आमच्या आत तर प्रज्ञेचे नावनिशान नाही, आणि हे म्हणतात हे सर्व गुण येतील यामुळे, तर चला करुन पाहू. आणि असेही म्हटले- या तीन बाबींशिवाय भगवान बुद्धांनी कोणतीही चवथी बाब शिकवली नाही आणि आम्हीही शिकवणार नाही. तुम्ही १० दिवस करुन तर पाहा, तर यामुळे की चला आजमावून तर पाहू. गेलो तर पाहिले की येथे धर्मच धर्म आहे. न बौद्ध, न हिंदू, न जैन, न खिश्चन आहे. धर्म शब्दासोबत जसे हे विशेषण लागले, धर्म दुर्बल झाला. विशेषण प्रमुख झाले, धर्म गौण झाला, अरे, धर्माला प्रमुख बनवावयाचे आहे भाऊ !_

_*आता आमच्या येथे शोध होत आहे, तेव्हा पाहिले की भगवान महावीरांच्या १५०० वर्षानंतर, प्रथम वेळी 'जैन' शब्दाचा प्रयोग झाला. यापूर्वीच्या कोणत्याही साहित्यात जैन शब्द नाही. याच प्रकारे भगवान बुद्धांच्याही ५००-७०० वर्षानंतरही कुठे 'बौद्ध' शब्द नाही. न भगवान महावीरांनी जैन शब्दाचा प्रयोग केला ना बुद्धांनी बौद्ध चा. ना अन्य एखाद्या परंपरेत हिंदू इत्यादीचा प्रयोग केला गेला. ह्या सर्व बाबी नंतरच्या आहेत. जेव्हा संप्रदाय बनू लागले तेव्हा प्रत्येक व्यक्ती आपल्या संप्रदायाला नाव देऊ इच्छित होता. आपल्या संप्रदायाच्या कर्मकांडांना, आपल्या संप्रदायाच्या दार्शनिक मान्यतांना एक नाव देऊ इच्छित होता.*_

_हे नाव प्रमुख झाले, परंतु धर्माची काय अवस्था झाली? हे कर्मकांड केले, ते कर्मकांड़ केले. हे व्रत, उपवास केले, ते व्रत, उपवास केले, ही यात्रा केली, ती यात्रा केली, ही वेषभूषा केली, ती वेषभूषा केली, अशी पूजा केली, तसा पाठ केला. धर्म कुठे आहे ? निसर्गाच्या नियमांना, धर्म नियमिततेला कुठे जाणले तू? त्याचा कधी अनुभव केला नाही. प्रज्ञेचे पाठ खूप केले परंतु प्रज्ञा जागवली नाही. जाणलेच नाही की प्रज्ञा काय असते, तर प्रज्ञेत पुष्ट कसे व्हाल ? स्थितप्रज्ञ कसे व्हाल ? संपूर्ण देशातील सर्व विहीरीत जणू भांग पडली. जशी जशी लोकात ही जागृती येईल की *धर्म प्रमुख आहे, त्याच्यासोबत लागणारे विशेषण नाही. जेव्हापर्यंत धर्म जीवनात उतरत नाही, आमच्यासाठी अंधारच अंधार आहे.*_

_आजच्या सभेत जे आले आहेत, आजच्या एक तासाच्या प्रवचनाला वाणीविलास, श्रुतीविलास समजून निघून जाऊ नये. चिंतन जरुर करावे. चिंतन-मनन करणे मनुष्याचा स्वभाव आहे, परंतु केवळ चिंतन-मनन करुन थांबू नये! पुढचे पाऊल उचलावे, धारण करावा !_

*_धर्म ना हिंदू बौद्ध, धर्म न मुस्लिम जैन।_* 

*_धर्म चित्ताची शुद्धता, धर्म शांतिसुख चैन ।।_*

_*चित्ताची शुद्धता सर्वांची असते, कोणत्याही एका संप्रदायाची नाही, कोणत्याही एका समाजाची नाही, कोणत्याही एका जमातीची नाही आणि शांती, सुखही सर्वांचे असते. कोणत्याही एका जातीचे नाही, कोणत्याही एका वर्णाचे अथवा गोत्राचे नसते. जो धारण करेल तो सुखी होईल. शांत होईल.*_

_आजच्या या सभेत. एक छोटीशी बाब अजून सांगीन, *धर्माच्या शुद्ध परंपरेत जो धर्माचा आचार्य असतो, तो कधी दान मागत नाही, जर तो मागेल तर दोष होईल. म्हणून मनाई आहे, कोणत्याही आचार्याने मागणी करु नये. मी हा नियम तोडतो. जरी दोषाची बाब असेल तरी तोडतो व मागतो. काय मागतो ? आपल्या जीवनाचे अमुल्य १० दिवस मला द्या. १० दिवस द्या, आपल्या भल्यासाठी, आपल्या कल्याणासाठी, आपल्या मंगलासाठी, आपल्या मुक्तीसाठी, आणि न जाणो आपणातर्फे किती जणांचे मंगल होईल, किती जणांचे कल्याण होईल, किती जणांचे भले होईल.*_

_जे-जे या सभेत आले आहेत ते आपल्या जीवनाचे १० दिवस देऊन आपले कल्याण साधोत, आपले मंगल साधोत, आपली स्वस्ति-मुक्ती साधोत !_

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

*_लेखक :- कल्याणमित्र सत्यनारायण गोयन्का_*

_बुध्दवर्ष २५५९, आश्विन पौर्णिमा, २७ ऑक्टोंबर, २०१५, वर्ष २, अंक ७_

*_संकलन :- महेश कांबळे_*

*_दिनांक :-_* ०१/०२/२०२५

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

Wednesday, 29 January 2025

धर्म आणि अहिंसा भाग१

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

*_धर्म आणि अहिंसा - भाग १_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2025/01/blog-post_29.html

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

धर्म प्रेमी सज्जनांनो ।

_या, आज या धर्म सभेत समजूया की धर्म काय आहे. आता तर बुध्दीच्या स्तरावरच समजू शकू. कारण *खरा धर्म काय आहे तो त्याला धारण केल्यावरच समजतो.* परंतु प्रथम पाऊल तर हेच असते की ऐकावे व बुध्दीच्या स्तरावर तरी समजावे की धर्म काय आहे ? त्यानंतर पुढचे पाऊल धर्म धारण करण्याचे असते. त्याच्याशिवाय खऱ्या अर्थाने धर्म समजू शकत नाही. *धर्म या प्रवचनात नसतो, ग्रंथात व मंदिरातही नसतो, जर धारण केला तरच धर्म,*_

*_धारण केला तर धर्म, अन्यथा फक्त बात।_*

*_सूर्य उगे तर प्रभात, अन्यथा काळिरात ।।_*

_सूर्य व प्रकाशाची कितीही प्रशंसा करत रहा, जेव्हापर्यंत सूर्य उगवणार नाही, आमच्यासाठी रात्र काळीच राहील. तसेच जेव्हापर्यंत अंतरी धर्म जागणार नाही, तोपर्यंत धर्माला खऱ्या अर्थाने समजू शकणार नाही. तरीही प्रथम पाऊल तर उचलावेच._

_आमच्या देशातील महापुरुषांनी धर्माची व्याख्या खूप थोड्या शब्दात केली. भगवान महावीर म्हणाले धर्म उत्कृष्ट मंगल आहे. साधारण मंगल नाही, उत्कृष्ट मंगल आहे, केव्हा आहे? जेव्हा त्याला धारण करु. तर म्हटले *अहिंसा, संयमो, तपो* या तीन बाबी धारण केल्या तरच धर्म आहे, अन्यथा केवळ वाणीविलास आहे, बुद्धीविलास आहे. त्याच्यामुळे आमचे सामान्य मंगलही होणार नाही. उत्कृष्ट मंगल तर खूप मोठी गोष्ट झाली. यासाठी ऐकत आहोत की आमच्या अंतरी प्रेरणा जागावी व आम्ही *अहिंसा, संयम व तपाला* अनुभवावर उत्तरवू शकू._

_यालाच आमच्या देशातील एका अन्य महापुरुषाने म्हटले शील, समाधी, प्रज्ञा. एकच बाब आहे. जसे ऐकणारे समोर असतील त्यानुसार शब्दांचा उपयोग केला जातो, ज्यामुळे ते समजू शकतील. दोन्हींतही बाबी सारख्याच आहेत. वर-वरच्या स्तरावर आम्ही एखाद्या जीवाची वा प्राण्याची हत्या केली तर ती हिंसा आहे. हत्या केली नाही तर अहिंसा आहे. ही खूप, स्थूल बुध्दीने समजण्याची बाब झाली. सखोलतेने समजू तर आम्ही *एखाद्या प्राण्याच्या सुख, शांतीची हत्या केली तर हिंसा झाली. एखाद्या प्राण्याच्या सुख, शांतीची हत्या केली नाही तर अहिंसा झाली. प्रथम शिकवण आहे कोणत्याही प्राण्याची हत्या करु नये. दुसरी ही की त्याची प्रिय वस्तू चोरुन, हिसकावून, लुटून घेऊ नये, जबरदस्तीने घेऊ नये. यामुळे त्याला किती दुःख होईल, म्हणजे त्याच्या सुखाची हत्या केली, त्याच्या शांतीची हत्या केली. तिसरी एखाद्या सोबत व्यभिचार केला, त्यामुळे त्याला, त्याच्या परिवाराला किती दुःख होईल. त्या सर्वांच्या सुख, शांतीची हत्या केली. ही साधारण बाब नाही, हिंसाच आहे. चौथी तुम्ही खोटे बोलून कोणाला फसवले, कठोर बोलून व्याकुळ केले. त्याच्या सुख, शांतीची हत्या केली. ह्या सर्व हिंसाच आहेत, म्हणजे एखाद्या जीवाच्या प्राणाची हत्या करणेच हिंसा नाही, तर एखाद्या जीवाच्या सुख, शांतीची हत्या करणेही हिंसाच आहे. यालाच शील म्हटले, सदाचार म्हटले, यालाच चातुर्याम म्हटले. याचे पालन करु लागू तर लाभ होईल* अन्यथा केवळ स्वीकार करुनच बाब पूर्ण होत नाही._

_अजून एक जोडले गेले यासोबत की नशा करु नये. नशा केल्यावर हे चांगले समजूनही की मी कोणत्याही प्राण्याच्या सुख, शांतीची हत्या वा हिंसा करु नये, तरीही करेल, व्याभिचार करेल, खोटे बोलेल, कठोर बोलेल काहीही करेल. कारण तो आपल्या काबूत नाही. नशेचा गुलाम झाला आहे ना, तर ही पाचवी बाबही महत्वपूर्ण आहे. मुख्य बाबी चारच आहेत. म्हणजे चातुर्यामाचे पालन करावयाचे आहे. पालन केल्याविना तर असेच आहे की एक रोगी मनुष्य एखाद्या डॉक्टरकडे जाईल. डॉक्टर त्याचा आजार पाहून समजेल की याला हा रोग आहे, या रोगाचे हे मूळ कारण आहे व हे याचे औषध आहे ज्यामुळे याच्या आजाराचे निवारण होईल, कारण आजाराच्या कारणाचे निवारण होईल. त्यामुळे एका कागदावर औषध लिहून देतो. प्रिसक्रिप्शन लिहून देतो. आता हा नासमज मनुष्य घरी येऊन त्या कागदाला वाचतो दोन गोळ्या सकाळी, दोन गोळ्या दुपारी, दोन गोळ्या संध्याकाळी, दोन गोळ्या सकाळी,... अरे काय मिळाले वाचून ? तुला या औषधाचे सेवन करण्यासाठी सांगितले, परंतु तू सेवन तर केले नाही. सेवन करावयाचे आहे बाबा! धर्म धारण करावयाचा आहे._

_*यासाठी प्रथम महत्वपूर्ण पाऊल संयम आहे,* यालाच म्हटले समाधी, चित्ताला आपल्या काबूत ठेवा. खूप चांगले समजते की हे करु नये, ते करु नये, तरीही करतो. नशा केली नाही तरीही विकारांची नशा असते. खूप मोठी नशा असते. क्रोधाची नशा, वासनेची नशा, अहंकाराची नशा, ही विकारांची नशा अशी आहे की त्या मदिरेच्या नशेपेक्षाही भयानक. इच्छा नसतानांही हत्या करेल, हिंसा करेल, लोकांची सुख शांती भंग करेल, सर्व वातावरणाला व्याकुळ करेल. ही हिंसा आहे बाबा, खूप मोठी हिंसा आहे. तर *संयमो* मन काबूत असणे आवश्यक आहे. तरीही केवळ यामुळेच बाब पूर्ण होत नाही. संयम करुन आम्ही वाणी वा शरीराने कोणतेही असे दुष्कर्म केले नाही ज्यामुळे अन्य लोकांची सुख, शांती भंग होईल. परंतु त्यापेक्षाही मोठी हिंसा- आपल्या स्वतःच्या सुख, शांतीची हत्या करणे, हत्या हत्या आहे, आपल्या सुख, शांतीची हत्याही हिंसाच आहे._

_जसा मनात कोणताही विकार जागला, क्रोध जागला, द्वेष जागला, दुर्भावना जागली, ईर्ष्या जागली, अहंकार जागला, वासना जागली, कोणताही विकार जागला, मनाचे संतुलन गमावले, समता हरवली, मनाची शांती हरवली, सुख, चैन, हरवले, अरे आपल्या सुख शांतीची हत्या करत आहात नाः जे सर्वात जास्त हानिकारक आहे._

_कारण जेव्हा मनुष्य क्रोध, द्वेष, दुर्भावना इत्यादी कोणताही विकार जागवून आपल्या सुख शांतीची हत्या करतो, तेव्हा जवळपासच्या सा-या वातावरणाला अशांत करतो, व्याकुळ करतो. त्यावेळी त्याच्या संपर्कात जो येईल तो व्याकुळ होईल, त्याची सुख शांती भंग होईल. क्रोध करुन मी केवळ माझीच शांती भंग करत नाही, तर इतरांचीही शांती भंग करु लागतो. सर्व वातावरण दुःखी बनवतो._

_तिसरे पाऊल *'तपो'* तप करणे आहे. तपाचा अर्थच विसरले. हे बाहेर बाहेरचे तप नाही, अंतर्तप आहे. काय असते अंतर्तप ? खऱ्या सत्याला अंतरी सखोलतेने ते जाणत जाणत जेथे विकारांचा उगम होतो, जेथे विकार जागतात, जेथे त्यांचे प्रजनन होते, संवर्धन होते हे समजणे वाढत-वाढत डोक्यावर चढतात. आम्हाला शुद्ध राहात नाही, जे करु नये, ते करत जातो आणि जे केले पाहिजे ते करु शकत नाही, कारण विकार डोक्यावर चढतात, त्याच्यांपासून सुटका करण्यासाठी तप, अंतर्तप, *एका परंपरेत यालाच प्रज्ञा म्हटले. ही ऐकलेली प्रज्ञा नाही, ते तर बौद्धिक ज्ञान आहे. तरीही चांगले आहे. कारण प्रारंभत्यानेच होतो. परंतु जे ज्ञान आपल्या अनुभवावर अंतरी स्वतः जागते, त्यालाच भारताच्या जुन्या भाषेत प्रज्ञा म्हणत होते.*_

_आता तर सर्व विद्याच नष्ट झाल्या त्यामुळे प्रज्ञेचाही पाठ होऊ लागला. मी स्थितप्रज्ञ कसा बनू ? जेव्हा प्रज्ञाच जागली नाही तेव्हा त्यात स्थित होणे तर खूप दूरची बाब झाली. प्रत्यक्ष ज्ञान जागावे. काय ज्ञान जागावे ? पाहा क्रोध जागला तर काय झाले ? संपूर्ण शरीराचे रसायनशास्त्र बदलले. सर्व शरीराचे रसायन बदलले. सर्व शरीरात गर्मी जाणवू लागली, हृदयाचे स्पंदन वाढले, तणाव वाढला, व्याकुळता आली. क्रोध करत आहे एखाद्या दुसऱ्यावर, एखाद्याला दुःखी बनवण्यासाठी, कारण त्याने माझा अपमान केला, त्याने माझ्या मनाविरुध्द काम केले, मनाप्रमाणे काम होऊ दिले नाही. त्यामुळे मला राग आला, कारण सूड घेऊ शकू, त्याला शिक्षा देऊ, वर-वर तर असे वाटेल की दुसऱ्यांना दुःखी बनविण्यासाठी क्रोध करत आहे, परंतु शुद्ध नाही की आपल्या स्वतःला दुःखी बनवत आहे. *जोपर्यंत मनुष्य आपल्या स्वतःला दुःखी बनवत नाही, दुसऱ्याला दुःखी बनवू शकतच नाही. जोपर्यंत आपल्या सुख, शांतीची हिंसा करत नाही, तोपर्यंत अन्य कोणाची हिंसा करुच शकत नाही, नियम आहे प्रकृतीचा.*_

_कोणी हत्या कशी करेल? क्रोध जागवेल, द्वेष जागवेल. दुर्भावना जागवेल. चोरी कशी करेल? लोभ जागवेल, मोह जागवेल, तृष्णा जागवेल. व्यभिचार कसा करेल? वासना जागवेल. कठोर वचन वा खोटे कसे बोलेल? अहंकार जागवेल, लोभ जागवेल, कोणता ना कोणता विकार जागवेल तेव्हाच वाणी वा शरीराने दुष्कर्म होते. आमच्या देशातील महापुरुषांनी हे सत्य जाणले._

_वर-वरचे उपदेश देणारा महापुरुष होत नाही. तो तर केवळ ज्ञानी आहे, पुस्तके वाचली आहेत, थोडे चिंतन-मनन केले आहे, त्यामुळे धर्माची चर्चा करतो. ऐकणाऱ्याला चांगले वाटते. बोलणाऱ्यालाही चांगले वाटते व चांगलेही आहे, प्रथम पाऊल तर आहे. धर्माची चर्चा ऐकली तरी, ज्याने कधी धर्माची चर्चा ऐकलीच नाही, तो बिचारा धर्म धारण कसा करेल? तो आंतर सत्याचा अनुभव कसा करेल ? त्यामुळे चांगले आहे, परंतु पूर्णपणे चांगले नाही._



_ज्या दिवशी ही शुध्द येईल की धर्म वाणीविलास, बुद्धिविलास वा श्रुतीविलासासाठी नाही. धर्म धारण करण्यासाठी आहे,* अन्यथा रात्र काळीच राहील. कितीही ऐकत राहिलो, कितीही चिंतन-मनन करत राहिलो, सुटका होणार नाही, जेव्हा स्वतःला अनुभव होऊ लागेल तेव्हा हिंसा कसा करेल? दुसऱ्या प्राण्याच्या सुख शांतीची हिंसा करण्यापूर्वी पाहील माझी हिंसा होऊ लागली, मी दुःखी होऊ लागलो ना._

_*पुब्बे हनति अत्तानं, पच्छा हनति सो परे -* प्रथम आपले हनन करतो, प्रथम आपली हत्या करतो, नंतर दुसऱ्याची हत्या करतो. ही प्रवचन ऐकून मानण्याची बाब नाही. थोड्या वेळासाठी, "हो, हो गोष्ट तर ठीक वाटत आहे" पुन्हा जसेचे तसे. परंतु जेव्हा अनुभव होऊ लागला, तेव्हा पाहील की पाहा मी काय केले! मी कोणताही शील सदाचार भंग केला, कोणाच्याही सुख, शांतीची हत्या केली, त्यापूर्वी आपल्या सुख, शांतीची हत्या केली. हा अनुभव झाला. अरे हे काय करु लागलो ? आता कोणावर हात कसा उचलेल? शिव्या कसा देईल? क्रोध, द्वेष, दुर्भावना जागताच व्याकुळता जागली ना! अरे किती अशांत झालो, बेचैन झालो, आपल्या सुख, शांतीची हत्या केली._

_ज्या दिवशी ही शुध्द येईल, त्या दिवशी खऱ्या अर्थाने अहिंसक बनू. अन्यथा अहिंसेच्या नावावर न जाणे किती कर्मकांड चालतात. सर्व जीवन या कर्मकांडात चालले जाईल. सर्व जीवन स्वतःला भ्रमात ठेवण्यात चालले जाईल, मी खूप अहिंसक आणि मग स्पर्धा होईल. या पक्षाचा नेता म्हणेल- मी तुझ्यापेक्षा जास्त अहिंसक, दुसरा म्हणेल मी तुझ्यापेक्षा जास्त अहिंसक, अरे, काय अहिंसक? आत पाहिलेस तू? महापुरुषांनी आत पाहाणे शिकविले, यालाच भारताच्या जुन्या भाषेत 'विपश्यना' म्हणायचे._

_*'पश्यना' म्हणजे पाहाणे, पाहाणेच नाही, अनुभव करणे, पाहाणे शब्दाचा एक साधारण अर्थ आहे उघड्या डोळ्यांनी रुप, रंग, प्रकाश वा व्यक्ती पाहाणे, पाहाणे झाले. विपश्यना म्हणजे सामान्य पाहाणे नाही, त्याचा अनुभव व्हावा. आज या शब्दाचा अर्थच बदलला. आता तर पश्यना म्हणजे डोळ्याने पाहाणेच मानत आहोत, समजत आहोत. जुन्या भारतात असे नव्हते, आजही कधी-कधी या शब्दाचा खरा अर्थ प्रयोगात येतो. कधी-कधी कोणी म्हणते अरे, हा रसगुल्ला खूप गोड आहे, खूप गोड आहे. तू खाऊन तर पाहा. खाऊन काय पाहील, त्याचा रंग, रुप, आकृती पाहील, काय पाहील? अरे, खाऊन अनुभव कर, म्हणजे पाहाण्याचा अर्थ अनुभव करणे. हे संगीत किती मधूर आहे, अरे तू ऐकून तर पाहा, काय पाहील? रंग पाहील, रुप पाहील, आकृती पाहील, नाही तर तू ऐकून अनुभव कर, हे मखमल किती मुलायम आहे, अरे तू स्पर्श करुन तर पाहा, म्हणजे अनुभव कर. पुरातन भारतात या शब्दाचा प्रयोग याच अर्थाने व्हायचा म्हणजे अनुभव करणे. कुठे गुंतलो? हे आमचे दर्शन, हे तुमचे दर्शन, ही आमच्या परंपरेची दार्शनिक मान्यता, ही तुमच्या..... असे भांडणच भांडण राहिले, सत्याचा काही अनुभव झाला तर म्हणायचे आम्हाला असे दर्शन झाले, म्हणजे अनुभव झाला. जो अनुभव आला त्यासाठी 'दर्शन' या शब्दाचा प्रयोग व्हायचा. तोच आता दार्शनिक मान्यता बनला व यासाठी संप्रदाय निर्माण झाले. आमची ही दार्शनिक मान्यता, तुमची ही दार्शनिक मान्यता, आमची दार्शनिक मान्यता खरी, तुमची चूक, अरे हिंसाच हिंसा, मांडणच भांडण, कुठे गुंतलात रे ! अनुभव करावयाचा आहे. क्रोध जागला तर अनुभव व्हावा की आत काय होत आहे. भय जागले तर अनुभव व्हावा, आत काय होत आहे. यालाच 'विपश्यना' म्हणत होते. बुध्दीविलास नाही, वाणीविलास नाही, सत्य जे आपल्या अनुभवावर उतरेल. एखाद्या दुसऱ्याच्या अनुभवावर उतरेल तर ते त्याचे प्रत्यक्ष ज्ञान. आमच्यासाठी तर अप्रत्यक्ष ज्ञान आहे. आम्ही ऐकले, मानले, स्वीकारले, श्रध्देने मानले, बुद्धीच्या स्तरावर मानले, अनुभव केला नाही, तर आमचे ज्ञान नाही, ज्या दिवशी आमचे ज्ञान जागेल त्या दिवशी धर्म जागला, त्या दिवशी खऱ्या अर्थाने अहिंसा जागली, चक्षु जागले.* अनुभव होत आहे की पाहा दुसऱ्याची हत्या करण्यापूर्वी मी आपली हत्या करत आहे, दुसऱ्याची सुख, शांती भंग करण्यापूर्वी मी आपली सुख, शांती भंग करत आहे. जगात एकही मनुष्य असा नाही जो स्वतःला दुःखी करु इच्छित असेल, कोणीही स्वताला दुःखी करु इच्छित नाही._

_अज्ञान आहे, बेशुध्दी आहे, सत्याचे दर्शन केले नाही की आपल्या आत काय होत आहे, त्याला कधी अनुभवाने जाणले नाही. डोळे बंद करुन बसला की मी ध्यान करत आहे, तर एखाद्या काल्पनिक मान्यतेचे ध्यान करत आहे. एखाद्या दार्शनिक मान्यतेचे ध्यान करत आहे. अनुभव कोठे रे, कल्पना करत आहे ना ! अनुभव कर, तू हिंसा तर करत नाहीस ना._

_*गोष्ट सुरु होते अहिंसेने व दुसरे पाऊल तपाने. तप म्हणजे चित्त एकाग्र व्हावे. एकाग्र झाल्याविना आम्ही आतील सत्याला पाहू शकणार नाही. तर सदाचार असावा, सदाचारासाठी संयम असावा, समाधी असावी, मन काबूत असावे. त्यानंतर प्रज्ञा असावी, अंतर्तप असावे, तेव्हा आतील सत्य माहीत होऊ लागेल, अरे, मी काय करत आहे, अरे मी काय करत आहे.*_

_एका उदाहरणाने समजा एक छोटासा मुलगा, अबोध आहे, दुनियादारीची शुध्द नाही, लहान आहे. जवळच शेगडीत जळणारे निखारे आहेत. मूल पाहाते, अरे, हे लाल-लाल खेळणे आहे, मी त्यांच्याशी खेळू इच्छितो. त्यांच्याकडे जातो, आई अडवते, अरे, निखारे आहेत, जळशील, रडतो, आई अडवते, तरीही जाऊ इच्छितो, एकदा असा प्रसंग आला की आजू-बाजूला आई नाही, निखारे आहेत, तर खूप खूश होतो, जाऊन दोन निखारे पकडतो व ओरडतो. जळला ना, असे एकदा करेल, दोनदा करेल, त्यानंतर समजून जाईल, निखारा आहे, जाळतो._

_या प्रकारे जेव्हा आतील निखाऱ्यांना पाहाणे शिकाल तेव्हा समजाल की जाळतो. आता तर अनुभव होत नाही ना जेव्हा क्रोध करतो त्यावेळी मनात त्या माणसाचे चिंतन चालते ज्याच्यावर क्रोध आहे. तो असा आहे, तो असा दुष्ट आहे, तो माझा शत्रू आहे, त्याने माझे मनात इच्छिलेले काम होऊ दिले नाही, ते मनाविरुध्द काम केले. मनात इच्छिलेल्या कामात अशी बाधा निर्माण केली, माझा अपमान केला, मला शिव्या दिल्या, हेच चिंतन चालते. तो असा आहे, तो असा आहे..... जेव्हा तू क्रोध करत आहेस, तेव्हा पाहा तुझ्यात काय होत आहे. हे सत्य पाहाण्याची विद्या तर काय, भारतातून या विद्येचे नावच लुप्त झाले._

_आजच्या ५० वर्षापूर्वी जेव्हा मी आपल्या गुरुंजवळ ही विद्या शिकण्यासाठी गेलो, खूप घाबरत गेलो, ती एक वेगळी गोष्ट आहे. एक वेडेपणा अजून डोक्यावर स्वार असतो की हा आमचा धर्म, हा तुमचा धर्म, अरे याच्याजवळ जाऊन विपश्यना शिकू ? तो तर बौद्ध आहे, बौद्धांचा धर्म आहे. मी जर बौद्ध झालो तर? अरे ना बाबा ना । *स्वधर्मे निधनं श्रेयः, पर धर्मो भयावह ! भयावह !* एका परक्या धर्मात जाऊ नये, खूप भयावह आहे. आपल्या धर्मात मरणे चांगले. असा खूप घाबरत होतो. पण जावे लागले. परका धर्म आहे, परका धर्म आहे. जेव्हा त्यामधून गेलो तेव्हा माहीत झाले की काय परके आहे._

_*जेव्हा माणसाला क्रोध येतो, तेव्हा त्याला काय नाव द्याल? हा हिंदू क्रोध आला, हा मुस्लिम क्रोध आला, हा बौद्ध क्रोध आला, हा जैन क्रोध आला? त्या क्रोधाच्या कारणांमुळे जी व्याकुळता येते तिला काय नाव द्याल, बौद्ध व्याकुळता आहे, जैन व्याकुळता आहे, हिंदू व्याकुळता आहे? व्याकुळता निसर्गाचा नियम आहे, विश्वाचे विधान आहे. निसर्गाचा नियम आहे- क्रोध जागवाल तर ताबडतोब दंड मिळेल, व्याकुळ व्हाल. आमच्या भारतात याला धर्म म्हणत होते. नियम आहे, त्यामुळेच धर्म नियमितता म्हणत होते, ऋत म्हणत होते. प्रकृतीचा नियम आहे असे असे कराल तर हा परिणाम येईलच. हा परिणाम नको असेल तर असे असे होऊ देऊ नये. तुम्ही आपल्या मनात विकार जागवाल, तर ताबडतोब दंड मिळेल. जगातली कोणतीही शक्ती तुम्हाला वाचवू शकत नाही. वाचवूच शकत नाही. तुम्हाला दंड नको असेल तर असे असे होऊ देऊ नये. खूप सरळ साधी बाब आहे, अग्नीवर हात ठेवाल तर हात जळेलच, अग्नी ह्या बाबीला पाहाणार नाही की ज्याचा हाथ जळाला हा व्यक्ती स्वतःला जैन म्हणवतो की बौद्ध, की खिश्चन, की मुस्लिम म्हणवतो. काय म्हणवतो पाहाणार नाही. स्वतःला ब्राह्मण म्हणतो की शूद्र, की क्षत्रिय की वैश्य, अग्नीवर हात ठेवतो तर तो जाळेलच जर जाळत नाही तर अग्नी नाही, काहीतरी अजून असेल. हा त्याचा धर्म आहे. स्वभाव, प्रकृती आहे स्वभाव धम्मे - स्वभावालाच धर्म म्हणायचे भारतात.*_

_क्रोधाचा धर्म आहे व्याकुळ बनवेल, असाच प्रत्येक विकाराचा धर्म आहे, व्याकुळ बनवेलच. वाचू शकत नाही. हे समजले की आमचा धर्म, तुमचा धर्म, स्वधर्म, परधर्म, हा वेडेपणा डोक्यातून निघून जावा. धर्म सर्वांचा एक सारखा आहे. प्रकृतीचा नियम सर्वांसाठी एक सारखा आहे. तुम्ही मनाला विकारांनी विकृत कराल तर तुम्हाला दंड मिळेलच. तुम्ही मनाला विकारांपासून मुक्त कराल, विकार विमुक्त करुन निर्मळ कराल, तर मग प्रकृतीचा दुसरा धर्म आहे - अंतरी मैत्री जागेल, करुणा जागेल, स‌द्भावना जागेल. मग प्रकृतीचा एक अजून नियम आहे की जशी मैत्री जागली, करुणा जागली, सद्भावना जागली, अरे, इतकी शांती, इतके सुख. करुणा जागवतो दुसऱ्यावर, मैत्री जागवतो दुसऱ्यावर, परंतु पाहाल की प्रथम आम्हाला शांती मिळू लागली. जसे क्रोध जागल्यावर प्रथम आम्ही व्याकुळ होऊ लागलो. प्रकृतीचा नियम आहे._

_ज्या राज्यात राहाता, त्या राज्याच्या नियमांना तोडाल तर दंड मिळेल, राजदंड मिळेल. त्या राजदंडाच्या मिळण्यात वेळही लागू शकतो, होऊ शकते कधी-कधी मिळणारही नाही. या न्यायालयातून, त्या न्यायालयात, त्या न्यायालयातून पुढच्या न्यायालयात, वर्षों लागतील, शेवटचा निर्णय होण्यात. तसेच कधी-कधी शेवटचा निर्णयही तुमच्या बाजूने झाला, न्यायाधिशाने आपले डोळे बंद ठेवले. अथवा अशी काही घटना घडली की तुम्ही वाचलात. परंतु प्रकृतीच्या नियमात वेळ लागत नाही, ना अंधार, दंडही त्वरित मिळतो व पुरस्कारही ताबडतोब मिळतो. जसाही नियम तोडला, प्रकृतीचा नियम असा आहे की दंड मिळेलच. त्यामुळे मनात विकार जागू देऊ नका. जागला तर तुम्ही हिंसक झालात. जागवत नाही, तर तुम्ही अहिंसक झालात, हिंसक झालात तर दंड मिळेल, ताबडतोब मिळेल, व्याकुळ व्हाल. अहिंसक झालात, विकार नाही, उलट मैत्री आहे, करुणा आहे, तर ताबडतोब पुरस्कार मिळेल. अरे, इतके सुख इतकी शांती, कुठेही पाहिली नसेल, कधी इतके सुख अनुभवले नसेल. कधी इतकी शांती अनुभव केली नसेल, जरा मनाला निर्मळ करुन पाहा, किती पुरस्कार मिळतो._

*_(... क्रमशः पुढील अंकात)_*

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

*_लेखक :- कल्याणमित्र सत्यनारायण गोयन्का_*

_बुद्धवर्ष २५५९, भाद्रपद पौर्णिमा, २८ सप्टेंबर, २०१५, वर्ष २, अंक ६_

*_संकलन :- महेश कांबळे_*

*_दिनांक :-_* ३०/०१/२०२५

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

Monday, 27 January 2025

नमस्कार धर्मकायेला

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

*_नमस्कार धर्मकायेला_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2025/01/blog-post_32.html

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

_शाक्य जनपद कोशल नरेश प्रसेनजितच्या अधीन होते. त्यामुळे सर्व शाक्य आपला शासक प्रसेनजिता अभिवादन करायचेः हात जोडून सन्मान-सत्कार करायचे; प्रणाम करायचे. *प्रसेनजितला माहीत होते को श्रमण गौतम शाक्य कुळातून प्रव्रजित झाले आहेत, परंतु तरीही भगवान त्याला नमस्कार करीत नव्हते. तोच भगवानांना अपूर्व आदरपूर्वक नमस्कार करायचा.* जसे-

भगवानांच्या चरणात डोके झुकवून भगवानांच्या चरणांचे तो मुके घेऊ लागला, हाताने दाबू लागला व आपले नाव ऐकवत म्हणू लागला भंते' मी कोशलनरेश प्रसेनजित आहे."

या प्रकारचा सन्मान कोणी शाक्य प्रसेनजितच्या प्रतीही प्रकट करत नव्हता, जसा प्रसेनजित शाक्य श्रमण भगवान बुद्धांच्या प्रती प्रकट करायचा. या प्रकारे सन्मान करतांना प्रसेनजितला *भगवानांनी विचारले "महाराज! काय पाहून या शरीराप्रती इतका गौरव प्रकट करत आहात ? असा विचित्र सन्मान प्रकट करत आहात जो मित्रतेचे प्रतीक आहे!*

यावर प्रसेनजितने उत्तर दिले *अत्थि खो मे, भन्ते, भगवति धम्मन्वयो।*

*_"भंते! भगवानांशी माझा धर्म-संबंध आहे. धर्मामुळेच मी भगवानांचा अनुगामी आहे."_*

*_(म० नि० २.३६६-३६७, धम्मचेतियसुत्त)_*

*_मला भगवानांमध्ये धर्मसमन्वय दिसतो. भगवानांशी माझा धर्माचा संबंध आहे."_*

*_पूजन धर्माचे आहे, धर्मकायेचे आहे, रूपकायेचे नाही. हा आदर-सत्कार त्यासाठी आहे._*

यासाठी नाही की श्रमण गौतमांची काया सुंदर आहे व माझी असुंदर, यासाठीही नाही को श्रमण गौतम उच्च जातीचे आहेत व मी नीच जातीचा; यासाठीही नाही की श्रमण गौतम बलवान आहे व मी बलहीन, यासाठीही नाही की श्रमण गौतम महाप्रतापी आहेत व नी कमी प्रतापी आहे.

धर्माचाच सत्कार करीत, धर्माचाच जयजयकार करोत, धर्माचा सन्मान करीत, धर्माचेच पूजन करीत, धर्माला अभिवादन करीत (तो) तथागतांना वंदन करतो.

म्हणूनच हे समजले पाहिजे की, *धम्मोव सेट्टो जनेतस्मिं - लोकात धर्मच श्रेष्ठ आहे.*

*_(दी० नि० ३.११७, अग्गञ्ञसुत्त)_*

म्हणून धर्मच पूज्य आहे. धर्मकायाच पूज्य आहे. त्यामुळे साधकांनी या उदाहरणांनी प्रेरणा प्राप्त करून आम्हीही आपल्या स्वतःला दैनिक ध्यान व मौन ऊर्जेने भरत राहू. यातच सर्वांचे मंगल कल्याण सामावले आहे.

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

*_लेखक :- कल्याणमित्र सत्यनारायण गोयन्का_*

_बुद्धवर्ष २५५९, ज्येष्ठ पौर्णिमा, २ जून, २०१५ वर्ष २, अंक २_

*_संकलन :- महेश कांबळे_*

*_दिनांक :-_* २८/०१/२०२५

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

सतत साधनारत शास्ता

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

*_सतत साधनारत शास्ता_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2025/01/blog-post_19.html

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

(पूज्य गुरुजी श्री सत्यनारायण गोयन्कोजी द्वारा लिहिलेले पुस्तक 'तिपिटक में सम्यक संबुद्ध' मधून साभार संकलित)

_एके समयी कोशल नरेश प्रसेनजित आपल्या अधीनस्त गणराज्य शाक्य प्रदेशाच्या शासकीय यात्रेवर निघाले. शाक्य सीमेवर स्थित चेतियगिरी निगमाच्या शांत व सुरम्य वातावरणाने प्रभावित होऊन तेथेच काही वेळ विश्राम करू लागले. इतक्यात मनात एक विचार आला की भगवान बुद्धही शांतप्रिय व मौनप्रिय आहेत. ते इथेच कुठे आसपास तर नाहींत ? कोणाला विचारल्यावर समजले की होय, येथेच जवळच्या अरण्यात साधनारत आहेत. हे ऐकून त्याची प्रबळ इच्छा झाली की त्यांना भेटावे. त्यांना भेटण्यासाठी तो रथावर स्वार होऊन निघाला परंतु थोडे दूर गेल्यावर रथ जाण्यासाठी मार्ग नसल्यामुळे पायीच निघाला. प्रश्रब्धी व शांतीने परिपूर्ण वातावरण वस्तुतः बुद्ध व त्यांच्या शिष्यांच्या नावासोबत जुळले गेले होते._

_*भगवान बुद्ध एकांत प्रिय व मौन प्रिय होते. याचा अर्थ हा नव्हता की ते शास्तांच्या जबाबदारीपासून दूर रहायचे. जुन्या शिष्यांशी व नवीन धर्मवाचकांशी त्यांचा पारस्परिक संबंध सतत कायम राहायचा. आपल्या पंचेचाळीस वर्षाच्या शासनचर्येत त्यांनी जितके धर्मोपदेश दिले तितके धर्मोपदेश मानवजातीच्या दीर्घ इतिहासात कोणत्याही एका धर्मगुरुने दिले नाहीत. ते जितक्या जिज्ञासूंना व मुमुक्षंना भेटले तितक्यांना अन्य कोणताही धर्मगुरु भेटू शकला नाही. त्यांचे सारे जीवन 'बहुजनहिताय बहुजन सुखाय' अनुकंपेने भरले होते. ते नेहमी सद्धर्म वाटण्याच्या कामातच मग्न असायचे.* भगवानांबाबत हे किती सत्य म्हटले गेले आहे._

*_असम्मोहधम्मो सत्तो लोके उप्पन्नो बहुजनहिताय बहुजनसुखाय लोकानुकम्पाय अत्थाय हिताय सुखाय देवमनुस्सान 'न्ति ।_*

*_मज्झिमनिकायो १.५०, भयभेरवसुत्तं_*

*_मोह-मुढतेपासून मुक्त, अनेकांच्या हितासाठी, अनेकांच्या सुखासाठी, जगावर करुणेची वर्षा करण्यासाठी, देवता व मनुष्यांच्या कल्याणासाठी, हित व सुखासाठी एक व्यक्ती जगात उत्पन्न झाली आहे._*

ते कशा प्रकारे लोकहितात मग्न असतात याचे वर्णन करतांना त्यांनी स्वतः म्हटले

अञ्ञत्र असितपीतखायितसायिताअञ्ञत्र उच्चारपरसावकम्मा, अञ्ञत्र निद्दाकिलमथपटिविनोदना अपरियादिन्नायेवस्स, सारिपुत्त, तथागतस्स धम्मदेसना, अपरियादिन्नंयेवस्स तथागतस्स धम्मपदब्यञ्जनं, अपरियादिन्नंयेवस्स तथागतस्स पञ्हपटिभानं ।

*_मज्झिमनिकायो १.१६१, महासीहनादसुत्तं_*

_""खाणे, पिणे व झोपण्याचा वेळ सोडून, मलमूत्र त्यागण्याचा वेळ सोडून, निद्रा व थकव्याला दूर करण्याचा वेळ सोडून, हे सारिपुत्त! तथागतांची धर्मदेशना अखंड सुरु राहते, तथागतांची धर्मपद अभिव्यक्ती अखंड सुरू राहते."* आणि खरोखरच अखंड सुरु राहिली._

*_विश्राम व ध्यान_*

या प्रकारे सतत सेवेत रत राहण्यासाठी त्यांना वेळो वेळी शरीराला आराम द्यावा लागायचा. हा विश्राम ध्यानाद्वारेच संपन्न व्हायचा, भगवानांनाही वारंवार ध्यानात लीन व्हावे लागायचे हे पाहून कोणाच्या मनात हा प्रश्न येणे स्वाभाविक होते की-

*अज्जापि नून समणो गोतमो* - अजूनही श्रमण गौतम

*अवीतरागो अवीतदोसो अवीतमोहो* वीतराग, वीतद्वेष, वीतमोह नाही ?

*तस्मा अरञ्ञवनपत्थानि पन्तानि सेनासनानि पटिसेवति।*

त्यामुळेच तर अरण्यात शांत वनस्थलीचे, एकांतवासाचे सेवन करतो.

या मिथ्या संशयाचे स्पष्टीकरण देतांना भगवान म्हणाले

*द्वे खो अहं, ब्राह्मण, अत्थवसे सम्पस्समानो अरञ्ञवनपत्थानि पन्तानि सेनासनानि पटिसेवामि अत्तनो च दिट्ठधम्मसुखविहारं सम्पस्समानो, पच्छिमञ्च जनतं अनुकम्पमानो "ति।*

*म० नि० १.५५, भयभेरवसुत्त*

- ते एकांतवासाचे सेवन या दोन कारणांमुळे करतात. एक तर आपल्या त्या वेळच्या (शारीरिक) सुख विहारासाठी सम्यक विपश्यना करीत व दुसरे भावी जनतेवर अनुकंपा करीत.

शेवटी मानवी शरीराच्या सामर्थ्याची सीमा आहे. मग ते भगवान बुद्धांचेही शरीर का असेना, त्याला विश्रांतीची गरज पडायची. या व्यतिरिक्त भगवान दूरदर्शी होते. पाहायचे की *येणाऱ्या पिढ्यांचे विपश्यना गुरु स्वतः तर विपश्यना करणार नाहीत आणि दुसऱ्यांना विपश्यना करण्याचा उपदेश देत राहातील कधी असे होऊ नये. त्यांना विपश्यना गुरुंच्या आदर्श जीवनाची परंपरा स्थापित करावयाची होती. नितांत वीतराग, वीतद्वेष, वीतमोह झाल्यावरही भगवानांनी स्वतः ध्यान करणे सोडले नाही. हे जाणून की भावी आचार्य ही जेव्हा इतरांना विपश्यना करण्यास सांगतिल, तेव्हा स्वतःही विपश्यना करत त्यांना प्रोत्साहित करतील. *जो गुरु आपल्या शिकवणुकीचे स्वतः पालन करीत नाही. त्यांच्या शिष्याकडून ही अपेक्षा केली जाऊ शकत नाही की ते त्या शिकवणुकीचे पालन करतील.* भावी आचार्यांनी अशी चुक करू नये. या बाबीला लक्षात घेऊन त्यांच्यावर अनुकंपा करून भगवान स्वतः वेळो वेळी ध्यानात लीन व्हायचे, आपले आसक्ती, द्वेष वा मोह दूर करण्यासाठी नाही. त्यांचे हे विकार तर संपूर्ण नष्ट झालेच होते.

*_एकांत ध्यानाची ऊर्जा_*

लोक संपर्कजन्य श्रमामुळे शारीरिक ऊर्जेचे क्षीण होणे स्वाभाविक होते. रूपकायेच्या या थकव्याला दूर करण्यासाठी भगवानांना विश्रांती घेणे आवश्यक होते. ध्यानात लीन होण्यामुळे कायेला जी विश्रांती मिळते ती अतुलनीय आहे. त्यामुळे भगवान आपल्या दैनिक दिनचर्येत ध्यानासाठी वेळ निश्चित ठेवायचे. ज्यामुळे धर्मकायेद्वारा ज्या धर्म ऊर्जेची निर्मिती होईल ती रूपकायेसाठी आवश्यक ऊर्जेची पूर्ती करेल. सामान्य दैनिक जीवनात जो लोक संपर्क व्हायचा त्यामुळे येणाऱ्या थकव्याला दूर करण्यासाठी नित्य नियमित वेळेचे ध्यान पर्याप्त होते. परंतु जशीजशी भगवानांची प्रसिद्धी वाढत गेली तसतसा लोक संपर्कही वाढत गेला.

*भगवान या बाबीला उत्तम प्रकारे जाणत होते की भावी आचार्यगणांनी आपल्या स्वतःला जन-शास्ता समजून आपली स्वतःची साधना सोडू नये. त्यांनी असे म्हणू नये की काय करू. खूप अधिक व्यस्ततेमुळे साधनेसाठी वेळ कोठून आणू? यासाठीच त्यांनी मौन व एकांत साधनेला अधिक महत्व दिले व त्याचे अद्भुत उदाहरण प्रस्तुत केले.*

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

*_लेखक :- कल्याणमित्र सत्यनारायण गोयन्का_*

_बुद्धवर्ष २५५९, ज्येष्ठ पौर्णिमा, २ जून, २०१५ वर्ष २, अंक २_

*_संकलन :- महेश कांबळे_*

*_दिनांक :-_* २८/०१/२०२५

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

विपश्यना केंद्रांची शांती व परिशुद्धता

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

*_विपश्यना केंद्रांची / विहारांची शांती व परिशुद्धता_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2025/01/blog-post_27.html

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

(पूज्य गुरुजी श्री सत्यनारायणजी गोयन्कांद्वारे उद्धरणांसह लिहिलेले पुस्तक 'त्रिपिटकात सम्यक संबुद्ध' मधून साभार संकलित.)

बुद्धकालीन विहार (केंद्र) प्रमाद वा आळसात जीवन जगण्याची जागा नसायचे. लोक येथे विपश्यना ध्यान साधनेच्या गंभीर हेतूने यायचे व राहायचे. या उलट अन्य अनेक सांप्रदायिक आश्रमात लोक व्यर्थ चर्चेतच आपला वेळ व्यतीत करायचे.

*भगवान बुद्धांच्या ध्यान केंद्रांना आश्रम (आश्रयस्थळ) नावाने संबोधित केले जात नसे, तर त्यांना विहार' अथवा 'ध्यान केंद्र' म्हटले जात असे. त्या विहारात नियमांचे कठोरतेने पालन केले जात होते,* ज्यामुळे लोकांना करुणायुक्त समजदारीने केलेल्या कठोर मेहनतीचे पूर्ण फळ प्राप्त होऊ शकेल.

*अधिकांश साधक या बाबीचे स्वतः पूर्ण पालन करत असत तरीही भगवान बुद्धांनी विहाराच्या वातावरणाला पूर्णपणे परिशुद्ध बनवून ठेवण्यासाठी कठोर नियम लागू केले होते. जेव्हा एखाद्या अन्य सांप्रदायिक आश्रमात राहिलेली कोणतीही व्यक्ती संघात भिक्षू बनून सामील होऊ इच्छित असेल तेव्हा तिला ताबडतोब संघात सामील केले जात नसे. तिला चार महिने वाट पाहाण्यास सांगितले जाई, ज्यावरून हे तपासले जात असे की ती नियमांचे योग्य प्रकारे पालन करू शकेल की नाही.*

गृहस्थ उपासक-उपासिकांना हा नियम लागू होत नव्हता व त्यांना गृही संघात सामील होण्याची अनुमती त्वरित मिळत असे.

भगवान बुद्धांनी दुस-या सांप्रदायिक आश्रमात लोकांना व्यर्थ व प्रमादपूर्ण कामात वेळ वाया घालवतांना पाहूनच हे नियम लागू केले होते.

जे लोक दिवस व्यर्थ चर्चेत व रात्र झोपण्यात घालवत असतील त्यांना येताच ताबडतोब भिक्षु बनवून जर संघात सामील केले गेले असते तर अशा प्रमादी लोकांनी विहाराच्या शुद्ध वातावरणाला दूषित केले असते. त्यामुळे त्यांना ताबडतोब मनाई न करता, त्यांच्या भल्यासाठी चार महिन्याची मुदत दिली जात असे. ज्यामुळे ते विहाराच्या धर्ममय परिवेशात नियमबद्ध जीवन जगण्यासाठी आपल्या स्वतःला पूर्णपणे तयार करू शकतील, जेथे आर्य मौनासह विपश्यना साधना करणेच मुख्य काम होते.

विहारात चर्चेसंबंधी मुख्य नियम हाच होता की-

*_"धम्मी वा कथा, अरियो वा तुण्हीभावो।"_*

*_(मज्झिमनिकायो १.२७३, पासरासिसुत्तं)_* 

*_-धर्म चर्चा व्हावी अथवा आर्य मौन असावे._*

*_धर्म चर्चा कशी व्हावी :-_*

जेव्हा कोणी साधक आपल्यापेक्षा वरिष्ठ भिक्षूकडून धर्माच्या परियत्ती अथवा पटिपत्तीसंबंधी मार्गदर्शन मागायचा तेव्हा त्याला योग्य उत्तर मिळायचे. *अशा वेळी प्रश्नार्थी प्रश्न विचारायचा व मार्गदर्शक उत्तर द्यायचा. एका वेळी एकच व्यक्ती बोलायची. त्यामुळे धर्मकेंद्राचे शांत वातावरण बाधित होत नसे. प्रश्नार्थीचा प्रश्न व त्याचे उत्तर सर्व साधकगण ऐकू शकत. अशा प्रेरणादायक वातावरणात सर्व आर्यमौनासहित आपल्या ध्यान साधनेत तल्लीन राहायचे, जर वादविवाद झाला असता तर कोलाहल होणे निश्चित होते.*

बुद्धांनी म्हटले आहे -

*_"इधावुसो सारिपुत्त, भिक्खु पटिसल्लानारामो होति पटिसल्लानरतो, अज्झत्तं चेतोसमथमनुयुत्तो अनिराकतज्झानो, विपस्सनाय समन्त्रागतो, ब्रूहेता सुञ्जगारानं।.."_*

*_(मज्झिमनिकायो, १.३३४, महागोसिङ्गसुतं)_*

*_- हे सारिपुत्त, भिक्षु एकांत स्थानात सुखी होतो, व सुखी होतो एकांतवासात जेथे चित्तमळांनी युक्त मनाचा विकास केला जाऊ शकतो._*

विपश्यना साधनेची अवहेलना न करून भिक्षु आंतरिक सत्याला जाणून घेतो. त्यामुळे तो अधिकाअधिक वेळ शून्यागारात व्यतीत करतो.

या प्रकारे विपुल पारमी प्राप्त भिक्षुंच्या असण्यामुळे ध्यान विहारांची वृद्धी झाली. अधिकाअधिक लोक विपश्यना ध्यान शिकून आपल्या दु:खातून बाहेर पडले. 'आर्यमौन' ध्यानाच्या गहनतेत पोहोचण्यासाठी सहायक सिद्ध झाले व धर्माच्या गरिमेमुळे संघ मजबूत झाला. त्यामुळेच आर्यमौनाला इतके अधिक महत्व दिले गेले.

अरण्यात राहतांना गंभीर साधक आर्यमौनाचे अधिकाअधिक पालन करायचे, विहारात जेथे अनेक साधक एकत्र राहायचे, तेथे निश्चितच मौनाचे अत्याधिक महत्व असायचे.

जर मौन भंग अनिवार्य असेल तेव्हाही बोलणे हळूहळू व्हायचे ज्यामुळे दुस-या साधकांच्या साधनेत व्ययधान येऊ नये.

*_सारिपुत्त व महामोग्गल्लान_*

*भगवान बुद्धांनी नेहमी विहारांत शांत वातावरण कायम राखण्याला विशेष महत्व दिले.* साधकगण हळूहळू धर्मचर्चा करायचे तर साधनेला अनुकूल वातावरण नेहमी कायम राहायचे. तरीही कधीकधी जोराने केलेल्या चर्चेमुळे कोलाहल उत्पन्न झाला. तेव्हा विपश्यना विहारात व दुसऱ्या आश्रमात काही फरक राहिला नाही. विहाराचे निर्मळ शांत वातावरण दूषित झाले. अशा वेळी भगवानांनी त्या लोकांना सावध केले. *आर्यमौन व सम्मावाचेचा कठोर नियम विहार व अरण्यात जशाचा तसा लागू केला.* कारण ध्यानाच्या त्या वातावरणाची शुद्धता व शांती कायम राखणे अत्यंत आवश्यक होते.

एकदा शाक्यमुनी शाक्य राज्याच्या आमलकी वनात थांबलेले होते. त्या वेळी तेथे महाथेर सारिपुत्त व महाथेर महामोग्गल्लान संघात सामील झालेल्या त्यांच्या ५००-५०० नवीन शिक्षित शिष्यांसह आले. येताच त्या नवीन भिक्षूंनी जोरजोरात बोलून कोलाहल निर्माण केला. धर्माचे नियम तर सर्वांवर समान रूपाने लागू होतात व समान रूपाने फळही देतात.

जरी ते १,००० नवीन शिक्षित भिक्षु जेष्ठ महास्थविरांचे शिष्यगण होते, परंतु बुद्धांनी त्यांना धडा शिकवण्याचा निश्चय केला.

बुद्ध म्हणाले -

*_"गच्छथ, भिक्खवे, पणामेमि वो, न वो मम सन्तिके वत्थब्ब"न्ति ।_*

*_"एवं, भन्ते" ति खो ते भिक्खू भगवतो पटिस्सुत्वा उट्ठायासना भगवन्तं अभिवादेत्वा पदक्खिणं कत्वा सेनासनं संसामेत्वा पत्तचीवरमादाय पक्कमिंसु।_*

*_(मज्झिमनिकायो, २.१५७, चातुमसुत्त)_*

*_भिक्षूंनो, तुम्ही येथून निघून जा. बुद्धांच्या सोबत ध्यान करण्याची आपली वेळ अजून परिपक्व झाली नाही._*

*_महाकारुणिकांच्या वचनांचा अभिप्राय समजून दोन्ही महाथेरांनी बुद्धांना प्रणाम करून त्या १,००० शिष्यांसह कुठे तरी दूर जाण्यासाठी प्रस्थान केले._*

लोकांना आश्चर्य वाटले. शेवटी सारिपुत्त व महामोग्गल्लान बुद्धांच्या उजव्या व डाव्या हातासमान होते. आता त्यांना ध्यानाच्या वातावरणाला दूषित करण्याच्या परिणाम स्वरूप निष्कासित केले जात होते.

*जेतवनासारखे मोठे विपश्यना ध्यान केंद्र असो अथवा एखाद्या अरण्यातील छोटे केंद्र असो, स्वानुशासन सर्वत्र अत्यावश्यक आहे.* सम्यक संबुद्धांची ही करुणासिंचित सूचना होती जी आजही सर्व विपश्यी साधकांवर समान रूपाने लागू होते आहे.

लोकांनी विचार केला की सारिपुत्त व महामोग्गल्लानाविना शुद्ध धर्म योग्य रीतीने कसा पुढे जाईल.

त्यामुळे काही काळानंतर या बाबीने चिंतित चातुमचे शाक्यगण त्या महाथेरांविषयी प्रार्थना करण्यासाठी भगवान बुद्धांजवळ आले व सहम्पती महाब्रह्मानेही त्या दोघांकरता व १,००० नवीन शिक्षित भिक्षंकरता भगवानांना निवेदन केले -

*_"अभिनन्दतु, भन्ते, भगवा भिक्खुसङ्गं; अभिवदतु, भन्ते, भगवा भिक्खुसङ्घ ।_*

*_भगवानांनी त्यांना संघात स्थान द्यावे, भगवानांनी पुन्हा एकदा त्यांना संघात मार्गदर्शन द्यावे._*

*_(मज्झिमनिकायों, २.१५८. चातुमसुत्तं)_*

_*एका कुशल शल्य चिकित्सकाप्रमाणे महाकारुणिक सम्यक संबुद्ध जाणत होते की साधकांच्या प्रगतीसाठी कधीकधी काही कठोर पाऊले उचलणे आवश्यक असते.*_

कालांतराने ते १,००० भिक्षुगणही गहन साधनेत पुढे-पुढे प्रगती करत गेले. हे पाहून भगवान बुद्ध आनंदित झाले व त्याना पुन्हा एकदा विहारात परतण्याची अनुमती दिली.

या प्रकारे *बुद्धांनी दर्शविले की आवश्यकता पडल्यावर विपश्यना ध्यान केंद्रांच्या / विहारांच्या पावन परिशुद्धतेला सतत कायम ठेवण्यासाठी कठोर पाऊले उचलण्यात यावीत, जरी एखाद्या विशेष परिस्थितीमुळे असो, केंद्रांच्या / विहारांच्या  नियमांना भंग करणारे वरिष्ठतम धर्मसेवक असोत अथवा बुद्धांचे श्रेष्ठतम आचार्य सारिपुत्त व महामोग्गल्लान ही असोत.*

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

*_लेखक :- कल्याणमित्र सत्यनारायण गोयन्का_*

_बुद्धवर्ष २५५८, वैशाख पौर्णिमा, ४ मे, २०१५, वर्ष २, अंक १_

*_संकलन :- महेश कांबळे_*

*_दिनांक :-_* २७/०१/२०२५

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

Sunday, 26 January 2025

रमाई ते माई

*_रमाई ते माई...!_*

'माईसाहेब आंबेडकर' यांच्याविषयी मी तीन वर्षांपूर्वी दिव्य मराठीच्या रसिक पुरवणीत लिहिलेला लेख...

उद्याच्या त्यांच्या जयंतीप्रित्यर्थ शेअर करते आहे.

_नुकतंच सोलापूर येथे रमाई चळवळीचं सातवं साहित्य संमेलन पार पडलं. माझी आई - हिरा पवार ही या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी होती. आंबेडकरी साहित्य चळवळीत महत्वाचं योगदान दिलेल्या महिलांची निवड या संमेलनाचे आयोजक करीत आले आहेत ही अत्यंत स्तुत्य अशी बाब आहे. संयोजकांनी आईला केवळ ती सोलापूरची माहेरवाशीण आहे म्हणून अध्यक्षपदी बसवलं नसणार. तिच्यातलं लेखिकापण, कवीपण, कार्यकर्तीपण आणि एकूणच तिच्या व्यक्तिमत्वात असलेलं हरहुन्नरीपण याच अधिक जमेच्या बाजू ठरल्या असणार. सोलापूरच्या बोर्डिंगमध्ये गेलेलं तिचं विलक्षण एकाकी बालपण, दारिद्र्याचे चटके सोसत तिने सगळ्याच बिकट परिस्थितीशी केलेले दोन हात ते नंतर दया पवार नावाच्या क्षितिजावर नव्यानेच उगवू पाहणाऱ्या कवीशी विवाह झाला तिथपासून तिच्या आयुष्याच्या संघर्षाचा उभा-आडवा धांडोळा 'सांगायची गोष्ट म्हणजे' या तिच्या आत्मकथनातून तिने घेतला आहे. समष्टीशी, चळवळीशी अत्यंत जैव नातं राखत तिने जी स्वतःची वैशिष्ट्यपूर्ण नाममुद्रा उभी करत नेली त्यामुळेच तिला हा बहुमान प्राप्त झाला असं मी मानते._

_छापायला जाण्याआधी आईने तिचं अध्यक्षीय भाषण मला वाचून दाखवलं. उत्तमच झालं होतं! पण माझ्या लक्षात राहिलं ते माता रमाबाई भीमराव आंबेडकर यांच्याविषयीचं तिचं मनोगत. रमाईंच्या व्यक्तिमत्वाबद्दल, त्यांच्या त्यागाबद्दल, कष्टांबद्दल, रमाईंच्या मनात बाबासाहेबांप्रती असलेल्या आदरयुक्त प्रेमभावाबद्दल, समर्पणाबद्दल, त्यांच्या सोशिक, कनवाळू स्वभावाबद्दल आईने भरभरून लिहिलं होतं तिच्या भाषणात. जवळपास सहा-सात पाने भरतील एवढा मजकूर होता तो. मजकूर कसला? खरं तर श्रद्धेचा ओसंडून वाहणारा प्रपातच जणू !_

_माझ्या स्मृतींच्या खिडक्या खटाखट उघडू लागल्या. मला लख्ख जाणवून गेलं की, *आपल्याकडे एकही आंबेडकरवादी कवी- कवयित्री असे नसतील ज्यांनी रमाईंवर कविता लिहिलेली नाही! नामदेव ढसाळ, यशवंत मनोहर, हिरा बनसोडे यांच्यापासून ते आज नव्या दमाने लिहिणाऱ्यांपर्यंत अनेकजण रमाईंच्या  प्रतिमेपासून स्वतःला लांब ठेवू शकलेले नाहीत. एका साध्यासुध्या हाडामासाच्या संसारी बाईने ज्या धैर्याने, निष्ठेने अतिशय हलाखीच्या काळात आपल्या जगावेगळ्या नवऱ्यासाठी त्यांच्या उत्तुंग कामाचं मोल जाणून जिवाची कुरवंडी केली त्याने माझ्यासह अनेक कवींना आतूनच हलवलं आहे.*_

_एकीकडे रमाईंच्या युगपुरुषाची फक्त सावली नसलेल्या प्रतिमेने भारावून जाणारी मी 'शारदा कबीर' उर्फ 'सविता भीमराव आंबेडकर' उर्फ 'माईसाहेब आंबेडकर' या तितक्याच ऐतिहासिक आणि वंदनीय प्रतिमेकडे पाहते तेव्हा मात्र माझ्या काळजात कायम एक कळ उठते. दुखत राहतं मन पश्चातापदग्ध भावनेनं._

_*माईसाहेबांवर खरोखरच खूप मोठा अन्याय झालेला आहे, त्यांची योग्य बूज आपल्या समाजाने राखली नाही, कायम परकं मानलं आणि बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर तर सतत संशयाच्या काळोख्या पिंजऱ्यात त्यांना बंदिस्त करून टाकलं याची मला खरोखर लाज वाटते.  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाच्या पूर्वार्धात रमाईंचा तर त्यांच्या निधनानंतर बाबासाहेबांच्या उत्तरार्धात माईंचा सहभाग तितकाच मोलाचा होता. या दोघीही बाबासाहेबांच्या सहचारिणी. पण जो सर्वोच्च सन्मान रमाईंच्या वाट्याला भरभरून आला त्यापासून माईसाहेब मात्र अखेरपर्यंत विन्मुख राहिल्या.*_

_*खरं तर दोघींची तुलना होण्याचा प्रश्नच उदभवू नये. दोघींचंही बाबासाहेबांच्या आयुष्यातील स्थान तितकंच तोलामोलाचं होतं. दोघींच्याही आयुष्याचं प्रयोजनच मुळी 'बाबासाहेब'! पण सारस्वत ब्राम्हण जातीत जन्मलेल्या, उच्चविद्याविभूषित, पेशाने डॉक्टर असलेल्या आणि डॉक्टर असल्यामुळेच बाबासाहेबांच्या लग्नाच्या प्रस्तावाला होकार देणाऱ्या शारदा कबीर यांना समजून घेण्यात आपण कायमच गल्लत केली.*_

_आपल्याला लग्नाचा प्रस्ताव पाठवणाऱ्या भीमराव आंबेडकरांवर भारताच्या राज्यघटना निर्मिर्तीची  युगप्रवर्तक अशी ऐतिहासिक जबाबदारी आहे, हजारो वर्षे अन्यायाच्या गर्तेत गलितगात्र होऊन पडलेल्या दलित-वंचित समाजाला आयडेंटीटी मिळवून देण्याचं ज्या माणसाचं स्वप्न अद्याप अधुरं राहिलेलं आहे, भारताच्याच नव्हे तर जगाच्या विचारविश्वात ललामभूत ठरतील अशी ग्रंथनिर्मिती ज्यांच्या हातून निर्माण होते आहे, 'मी हिंदू म्हणून जन्माला आलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही' अशी घोषणा करून *समतावादी बौद्ध धम्माच्या दिशेने ज्यांची पावलं वळत आहेत अशा प्रज्ञावंत माणसाला खरोखरच एका एकमय नात्याची गरज आहे हे शारदा कबीर यांनी मनोमन जाणलं होतं. त्या त्यांच्या डॉक्टर होत्या आणि जेव्हा बाबासाहेबांनी त्यांना लग्नाची मागणी घातली तेव्हा बाबासाहेबांचा देह मधुमेह, संधिवात, रक्तदाब, न्युरायटीस अशा अनेक व्याधींनी ग्रासला होता. आयुष्यभर विक्राळ परिस्थितीशी झुंज देऊन स्वतःच्या दीनदुबळ्या समूहासाठी अहर्निश झगडत असताना त्यांनी स्वतःच्या प्रकृतीची कधीही तमा बाळगलेली नव्हती. अशा अटीतटीच्या निर्णायक टप्प्यावर शारदा कबीर यांचं बाबासाहेबांसोबत असलेलं डॉक्टर- पेशंट हे नातं त्यांच्या विवाहानंतर पती-पत्नीमध्ये पर्यवसित झालं. त्यावेळी बाबासाहेबांचं वय ५४ होतं आणि वय, प्रकृती सामाजिक -आर्थिक स्तर, जात या सर्व बाबतीत शारदा कबीर आणि त्यांच्यात खूपच अंतर होतं. परंतू बाबासाहेबांसारख्या प्रकांड तत्ववेत्त्याने त्यांना वरलं होतं आणि शारदा कबीर यांनीही उभयतांमध्ये असलेल्या सर्व प्रकारच्या असमानतेचं अंतर तोडून त्यांना मनोमन प्रतिसाद दिला होता. बाबासाहेबांच्या शब्दांतच सांगायचं झाल्यास ''एका जीवात्म्याने दुसऱ्या जीवात्म्यास पाहिले, समान शील ओळखले ...'' असे आमचे मनोमिलन झाले. 'आपला विवाह हा आत्मैक्य योग आहे', अशी भावना बाबासाहेबांनी शारदा कबीर यांना पत्रातून कळवली होती.*_

_त्या दोघांचा पत्रव्यवहार मोठा मनोज्ञ आणि बाबासाहेबांच्या चिर-परिचित रुपांपेक्षा भिन्न रूपे प्रकट करणारा आहे. किती उत्कटपणे ते भावी पत्नीला पत्रं लिहित असत, किती उत्कट आर्जवे करीत असत, किती छोट्या छोट्या गोष्टींमध्ये रस घेत असत, पत्नीने नेमकी कोणती वस्त्रप्रावरणे ल्यावीत याची नमुनाचित्रंही कशी धाडत असत हे वाचलं की बाबासाहेबांमधला प्रियकर, पती किती श्रेष्ठ पातळीवर पोहचला होता हे उमगतं. ही सगळी पत्रं ''डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सहवासात'' या डॉ. सविता आंबेडकर यांच्या आत्मचरित्रपर ग्रंथात प्रसिद्ध झालेली आहेत. *आपल्या प्रत्येक पत्राची सुरुवात 'My dearest sharu'  या मायन्याने करून 'with fondest love from - Raja' असा पत्राचा शेवट करणारी बाबासाहेबांची कितीतरी पत्रं या पुस्तकात समाविष्ट केलेली आहेत.* नीती, शील, चारित्र्य, प्रेमभाव याविषयीची त्यांची जी काही मतं व्यक्त झालेली आहेत ती मुळापासूनच वाचण्याजोगी आहेत. स्त्री- सन्मानाविषयी, तिच्या स्वतंत्र अस्तित्वाविषयी, तिच्या देहावर असलेल्या तिच्याच हक्कासंबंधी बाबासाहेब किती जागरूक होते हे या पत्रांमधून सतत ध्वनित होत राहतं. त्या दोघांमधलं प्रेम, अनुनय, ओढ, बौद्धिक वितंडा, रसिकता, अदब, परस्पर- साहचर्य, एकमेकांप्रती असलेला आदर, सन्मान अशा अनेक रंगांनी ही पत्रं रंगलेली आहेत. *बाबासाहेबांनी नंतर संसदेत भारतीय स्त्रियांच्या हक्कासंदर्भात ज्या 'हिंदू कोड बिला'ची मांडणी केली त्याच्या कितीतरी खुणा या पुस्तकात आढळतात. मात्र दुर्दैवाची गोष्ट ही, की ज्या बाबासाहेबांनी हिंदू कोड बिलाची निर्मिती करून स्त्रीहक्काचा ओनामा केला त्यांच्याच सुविद्य पत्नीला मात्र बाबासाहेबांची पत्नी असल्याच्या सर्व हक्कांना मुकावं लागलं.*_

_*डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतर माईसाहेबांकडेच सगळा झोत वळेल, राजकीय नेतृत्वाच्या दावेदार त्याच होऊ शकतील या भीतीपोटी, असुरक्षिततेपोटी राजकीय महत्त्वाकांक्षेने  पछाडलेल्या काही दलित नेत्यांनी माईंविरुद्ध पद्धतशीर जनमत भडकवायला, बाबासाहेबांवर विषप्रयोग झाला अशी हाकाटी पिटायला सुरुवात केली. त्यांची मजल इथवर पोहचली की, बाबासाहेबांच्या  मृत्यूची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. माईसाहेबांविरुद्ध वादळ उठवून त्यांना आपल्या समाजापासून अलग पाडण्याचा त्यांचा डाव सत्तेच्या भुकेची हीन पातळी दर्शवणारा तर आहेच शिवाय पत्नी या नात्याने बाबासाहेबांना अखेरपर्यंत सक्रीय साथ देणाऱ्या, त्यांची अक्षरशः सेवा करणाऱ्या आणि हिमालयाएवढी उत्तुंग काम त्यांच्या हातून पार पडावीत म्हणून निरंतर दक्ष राहणाऱ्या स्त्रीवर अन्याय करणारा आहे. अर्थात सरकारने चौकशी केली आणि तत्कालीन गृहमंत्री पं. गोविंद वल्लभ पंत यांनी बाबासाहेबांचा मृत्यू सर्वसामान्य स्थितीत आणि नैसर्गिकरित्या झाला असं लोकसभेत एका निवेदनाद्वारे जाहीर केलं ही बाब अलाहिदा.*_

_*२७ मे रोजी रमाईंचा स्मृतिदिन असतो. सर्व बौद्ध समाज या दिवशी विविध स्वरूपाचे उपक्रम करून त्यांना आदरांजली वाहतो. शारदा कबीर ते माईसाहेब आंबेडकर असा यातायातीचा प्रवास करणाऱ्या माईंचा स्मृतिदिन त्यानंतर दोनच दिवसांनी म्हणजे २९ मे रोजी असतो. त्यांच्यासाठीही आपले हात जोडले जातील तेव्हा समतेची, जातिअंताची चळवळ चार पावलं पुढे सरकेल असं मी मानते. त्या दिवसाची मी डोळ्यांत प्राण आणून वाट पाहते आहे!*_

*_--- प्रज्ञा दया पवार_*

Friday, 24 January 2025

पाली तिपिटक साहित्यामध्ये बुध्दवंसाचे स्थान व महत्त्व

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

*_पाली तिपिटक साहित्यामध्ये बुध्दवंसाचे स्थान व महत्त्व_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2025/01/blog-post_70.html

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

_प्राचीन भारतीय साहित्यामध्ये पाली साहित्य हे अतिशय महत्त्वाचे साहित्य आहे. *पाली साहित्य हे केवळ तिपिटकापुरतेच मर्यादित नसून यात पाली तिपिटका व्यतिरिक्त स्वतंत्र पाली साहित्य आहे. ज्यात पेटकोपदेश, नेत्तिप्पकरण, मिलिंदपञ्हो, विसुध्दिमग्गो व अभिधम्मत्थसंगहो सारखे स्वतंत्र पाली ग्रंथही आहेत. त्याचबरोबर पाली अट्ठकथा साहित्य, पाली वंस साहित्य आणि पाली व्याकरण साहित्य आहे. याशिवाय पाली टीका साहित्य, पाली अनुटिका साहित्य तसेच सिलोन, बरमा, थाईलंड, लाओस, कंबोडीया. व्हियेतनाम इत्यादी देशांमध्ये लिहिले गेलेले पाली सहित्य आहे.*_

_पाली तिपिटक साहित्यामध्ये सुत्तपिटक विनयपिटक आणि अभिधम्मपिटक हे तीन पिटक आहेत. प्रत्येक पिटकाचे स्वतंत्र महत्त्व आहे. या तिन्ही पाली तिपिटकांना बौध्द परंपरा बुध्दवचन मानते. बौध्द परंपरेमध्ये संपूर्ण पाली तिपिटका प्रती अतिशय सन्मानाची व आदराची भावना आहे. पाली तिपिटकामधील सुत्तपिटक हे इतर पिटकापेक्षा एका वेगळ्या दृष्टिने अतिशय महत्त्वाचे आहे. सुत्त- पिटकामध्ये एकूण पाच निकाय आहेत. दीघनिकाय, मज्झिमनिकाय, संयुक्त निकाय, अंगुत्तरनिकाय आणि खुद्दकनिकाय. खुद्दकनिकायामध्ये एकूण पंधरा ग्रंथ आहेत. त्यात खुद्दकपाठ, धम्मपद, उदान, इतिवुत्तक, सुत्तनिपात, विमानवत्यु, पेतवत्यु, थेरगाथा, थेरीगाथा, जातक, निद्देस, पटिसम्भिदामग्ग, अपदान, बुध्दवंस, चरियापिटक हे एकूण पंधरा ग्रंथ आहेत. *यातील एक ग्रंथ आहे 'बुध्दवंस' बुध्दवंसामध्ये एकूण एकोणतीस प्रकरणे आहेत.* त्यांत_

१. रतनचंकमनकण्डं, 

२. सुमेध पत्थनाकथा, 

३. दीपंकरबुध्दवंसो, 

४. मंगलबुध्दवंसो, 

५. सुमनबुध्दवंसो, 

६. रेवतबुध्दवंसो, 

७. सोभितबुध्दवंसो, 

८. अनोमदस्सीबुध्दवंसो, 

९. पदुमबुध्दवंसो, 

१०. नारदबुध्दवंसो, 

११. पदुमुत्तरबुध्दवंसो, 

१२. सुमेधबुध्दवंसो, 

१३. सुजातबुध्दवंसो, 

१४. पियदस्सीबुध्दवंसो, 

१५. अत्थदस्सीबुध्दवंसो , 

१६. धम्म दस्सीबुध्दवंसो, 

१७. तिस्सबुध्दवंसो, 

१८. फुस्सबुध्दवंसो, 

१९. विपस्सीबुध्दवंसो, 

२०. सिखीबुध्दवंसो, 

२१. वेस्सभूबुध्दवंसो, 

२२. ककुसन्धबुध्दवंसो, 

२३. कोणागमनबुध्दवंसो, 

२४. कस्सप बुध्दवंसो, 

२५. गोतमबुध्दवंसो, 

२६. बुध्दपकिण्णककण्डं, 

२७. धातुभाजनीयकथा 

_इत्यादी प्रकरणांचा समावेश होतो. *बुध्दवंस ग्रंथामधील रतनचंकमनकण्डं सुमेध-पत्थनाकथा, बुध्दपकिण्णककण्डे व धातुभाजनीय कथा या चार प्रकरणांना सोडून बाकीच्या प्रकरणांमध्ये एकूण पंचवीस बुध्दांचे जीवनचरित्र वर्णन करण्यात आले आहे. बुध्दवंस हा ग्रंथ मूळ पालि तिपिटकामधील असून हा पूर्णपणे गाथा स्वरूपामध्ये आहे. या ग्रंथामध्ये एकूण एक हजार सत्तर गाथा आहेत.*_

*_बुध्दवंसाचा अर्थ :-_*

_बुध्दवंस हा शब्द बुध्द आणि वंस या दोन शब्दांनी मिळून बनलेला आहे. बुध्द' या शब्दाचा अर्थ बुध्दीमान, ज्ञानी, प्रज्ञावंत असा होतो. बुध्द हे एक पद सुध्दा आहे. सिध्दार्थ गौतमाने बुध्दत्व या पदाला प्राप्त केल्यामुळे त्यांना बुध्द म्हटले गेलेले आहे. बुध्द हे एक विशेषण सुध्दा आहे. 'वंस' या शब्दाचा अर्थ इतिहास, वंशावळ, वृत्तांत असा होतो. बौध्द परंपरेनुसार अनेक बुध्द होऊन गेलेत अशी मान्यता आहे. *बुध्दवंस याचा अर्थ बुध्दाचा इतिहास वर्णन करणाऱ्या ग्रंथाला बुध्दवंस म्हटले गेलेले आहे.*_

*_बुध्दवंसाचा काळ :-_*

_बुद्धवंस हा ग्रंथ सुत्तपिटकाच्या खुद्दक- निकायामधील चौदावा ग्रंथ आहे. संपूर्ण बौध्द परंपरा पालि तिपिटकाला बुद्धवचन मानते. याचा अर्थ असा की, तिपिटकामधील संपूर्ण ग्रंथ हे बुद्धवचन अर्थात बुध्दाने दिलेले उपदेश आहेत. म्हणजेच या संपूर्ण तिपिटकाचे संगायन हे पहिल्या संगीतिमध्ये झाले._

_म्हणजे बुध्दवंस या ग्रंथाचे संगायन सुध्दा पहिल्या संगीतिमध्ये झाले. दुसऱ्या व तिसऱ्या संगीतीमध्ये या ग्रंथाला अंतिम स्वरूप देण्यात आले. परंतु बुध्दवंस या ग्रंथाच्या रचनाकाळासंबंधी सुध्दा विद्वानांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मान्यता आहेत. या ग्रंथाच्या एकंदर स्वरूपावरून असे म्हणता येईल की, हा ग्रंथ सुरूवातीला अतिशय लघु आकाराचा होता. नंतर काही भाग या ग्रंथामध्ये जोडण्यात आला *डॉ. भिक्खु धर्मरक्षित यांनी आपल्या 'पाली साहित्य का इतिहास' या ग्रंथात बुद्धवंसासंबंधी म्हटलेले आहे की, 'भगवान बुद्धाने या ग्रंथाचा उपदेश त्यावेळी दिलेला होता ज्यावेळी ते महाराज शुद्धोद्धनाच्या निमंत्रणावरून आपल्या २०,००० अरहंत भिक्खूंच्या सोबत कपिलवत्थुला गेले होते आणि रमणीय न्यग्रोधाराम नामक विहारामध्ये रत्नमय चंक्रमणामध्ये विहार करीत असताना आपल्या ८२,००० जातीबंधुच्या अभिमानाला तोडण्याकरिता त्यांनी आयुष्यमान सारिपुत्ताने विचारल्यानंतर पूर्व बुद्धांच्या इतिहासाला सांगितले होते.*_

_त्याचप्रमाणे या ग्रंथातील प्रत्येक बुध्दांच्या जीवन चरित्रावरून प्रत्येक व्यक्तीला दान करण्याची प्रेरणा, गरजू लोकांना मदत करण्याची प्रेरणा, लोकांच्या कल्याणाकरिता प्रयत्नशील राहण्याची प्रेरणा, लोकांच्या रोगाला नष्ट करण्यासाठी चिकित्सकीय प्रेरणा, जगातील लोकांचे दुःख दूर करण्याची प्रेरणा इत्यादींच्या प्रेरणा निश्चितपणे प्राप्त होतात._

*_बोधिसत्वाची संकल्पना :-_*

_बुध्दवंस हा ग्रंथ बुध्दधम्मातील बोधिसत्वाची संकल्पना स्पष्ट करणारा आहे. थेरवादी बौध्द धम्म असो की महायान बौध्द धम्म असो दोन्हीमध्ये तत्त्वज्ञानामध्ये बोधिसत्वाच्या संकल्पनेला फार महत्व आहे. दोन्हीचा अंतिम आदर्श व उद्देश बुध्दत्वाची प्राप्ती करणे आहे. बुध्दपद प्राप्त करणे आहे. बुध्दपद प्राप्त करणे, बुध्दत्वाला प्राप्त करणे हे थेरवादी बौध्द धम्माचे व महायानी बौध्द धम्माचे अंतिम उद्दिष्ट आहे. दोन्हीमध्ये बोधिसत्व, बुध्दत्व व बुध्द हे अंतिम आदर्श आहेत. बुध्दवंस या ग्रंथाच्या माध्यमाने बोधिसत्व आदर्शाचे व बुद्धत्व प्राप्तीचे महत्त्व वर्णन करण्यात आलेले आहे. *थेरवादी बुद्धधम्मातील बोधिसत्वाची संकल्पना, बुद्धाची संकल्पना समजून घेण्याकरिता बुद्धवंस हा ग्रंथ अतिशय महत्वाचा आहे.* त्याचप्रमाणे बुध्दत्व प्राप्तीसाठी दहा पारमिता पूर्ण करणे अतिशय महत्वाचे आहे. बौध्द तत्वज्ञानामध्ये व प्रामुख्याने थेरवादी बौध्द तत्वज्ञानामध्ये या दहा पारमितांना अनन्य साधारण महत्व आहे. या दहा पारमिता म्हणजे दान, सील, नेक्खम्म (नैष्क्रम्य), पञ्ञा, विरिय, खन्ति (क्षान्ती), सच्च, अधिठ्ठान, मेत्ता व उपेक्खा (उपेक्षा) होत. प्रत्येक बुध्दाला बुध्द होण्याआधी किंवा बुध्दत्व प्राप्त करण्याच्या आधी बोधिसत्वाचे जीवन जगावे लागते आणि बोधिसत्व जीवनामध्ये दहा पारमिता पूर्ण केल्यानंतरच बोधिसत्व हा बुध्दत्वाला प्राप्त होतो._

_बुद्धवंस हा ग्रंथ भाषा, शैली, बौद्ध संस्कृती, बौद्ध मान्यता व प्रामुख्याने थेरवादी मान्यता इत्यादी दृष्टीने महत्वाचा आहे. त्याचप्रमाणे बुद्धाच्या काळातील वेगवेगळ्या मान्यता, भौगोलिक स्थिती, सामाजिक स्थिती, आर्थिक स्थिती, तत्कालीन वैदिक मान्यता, वैदिक मिथक, पौराणिक नाव इत्यादींच्या दृष्टीने सुद्धा या ग्रंथाला फार महत्त्व आहे. बुद्धाच्या काळातील अनेक ऐतिहासिक संदर्भ या ग्रंथामध्ये आढळून येतात. म्हणून या ग्रंथाला सामाजिक, सांस्कृतिक, तात्विक अध्ययनाच्या दृष्टीने जेवढे महत्व आहे तेवढेच महत्व या ग्रंथाला ऐतिहासिक दृष्ट्या सुद्धा आहे. या ग्रंथामध्ये पौराणिक बुद्धांचे जीवन चरित्र व ऐतिहासिक बुद्धांचेही जीवन चरित्र आलेले आहे. पौराणिक बुद्ध व ऐतिहासिक बुद्धांच्या जीवन चरित्रावरुन हे स्पष्ट होते की, पौराणिक बुद्धांची कथा ही ऐतिहासिक बुद्धाचे महत्व त्यांच्या विचारांचे महत्व स्पष्ट करण्याकरिता वर्णन करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे पौराणिक बुद्धांची कथा व ऐतिहासिक बुद्धांची कथा यात मुलभूत स्वरूपाचा फरक आहे. यात प्रत्येक बुद्धांचे जीवन व कार्य हे प्रत्येकांसाठी प्रेरणादायी आहे. या ग्रंथाचा मुख्य उद्देश बोधिसत्व आणि बुद्धत्वाच्या आदर्शाचे महत्व प्रतिपादन करणे असा आहे. त्याचप्रमाणे *हा ग्रंथ ज्ञानाची परंपरा, त्यागाची परंपरा, सेवेची परंपरा, शील, समाधी व प्रज्ञेची परंपरा, अखंड परंपरा आहे. ती सिद्धार्थ गौतम बुद्धांच्या आधीही होती, त्यांच्या काळामध्येही होती व त्यानंतरही राहणार आहे असे या ग्रंथाच्या अध्ययनावरून निश्चितपणे म्हणता येईल.* बुद्धवंस हा ग्रंथ जरी प्राचीन ग्रंथ असला, तरीही हा ग्रंथ आजसुद्धा मानवी कल्याणाच्या दृष्टीने महत्वाचा आहे. त्याचप्रमाणे हा ग्रंथ आधुनिक समाजामध्ये ज्ञानाची परंपरा, लोक कल्याणाची परंपरा, अहिंसेची परंपरा व शांतीची परंपरा समाजामध्ये निर्माण करण्याकरिता निश्चितपणे प्रेरक असा ग्रंथ आहे._

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

*_लेखन :- डॉ. सविता कांबळे_*

(पोष्ट डॉक्टोरल फेलो, यु.जी.सी. न्यु दिल्ली) गव्हरमेंट पी.जी. कॉलेज, सोवनी, मध्यप्रदेश

*_संकलन :- महेश कांबळे_*

*_संदर्भ :- प्रबुद्ध समाज मासिक, वर्ष ४/अंक २० ऑगस्ट - सावणो २०२४_*

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

पाली भाषेच्या विकासाची दालने

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

*_पाली भाषेच्या विकासाची दालने_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2025/01/blog-post_94.html

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

_पालि भाषा शिकू इच्छिणाऱ्या किंवा शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनात काही प्रश्न असतात._

१. ही भाषा शिकून काय उपयोग ?

२. ही भाषा शिकल्यानंतर मला नोकरी मिळेल काय? अथवा उदरनिर्वाहाचे साधन मिळेल काय?

३. आजच्या युगातील तरूणाई अनेक देशांच्या भाषा शिकत असताना ही प्राचीन भाषा का शिकावी ?

_वरील प्रश्नांची उत्तरे तिसऱ्या अखिल भारतीय पालि वाङ्मय अधिवेशनात (२००९) पाली भाषेच्या विद्वान संशोधिका डॉ. मिना तालीम यांनी केलेल्या शोधनिबंधातून मिळू शकतात. यासाठी डॉ. मिना तालीम यांचा हा शोध निबंध वाचकांच्या माहितीसाठी प्रसिद्ध करीत आहोत._

_माझा आजचा विषय *पाली भाषेच्याः विकासाची दालने'* हा आहे. २१ व्या शतकात पाली भाषेचे महत्व व अभ्यास कसा वृध्दिंगत' होईल, याचा आपण विचार करूया. गेली चार तपं मी पाली भाषा, बौध्द संस्कृती व प्राचीन भारतीय संस्कृती यांचा अभ्यास व संशोधन करीत आले आहे. हे करीत असताना सुरूवातीचा काळ खडतर होता. माझ्या समकालीन संशोधकांनी पाली भाषेकडे संपूर्णतः दुर्लक्ष करून त्या भाषेच्या अनुवादावरच आपले बौध्दकालिन संशोधन प्रस्थापित केले होते व त्यांना भारतात आणि भारताबाहेर बरीच मान्यता मिळाली होती. अशा संशोधकांना शह देण्याचे आव्हान मी स्वीकारले होते. *पाली भाषेवर प्रेम व बुध्दांवरील श्रध्दा या केवळ दोन गोष्टींमुळे मी माझा मार्ग एकटीच चालत राहीले.* पाली भाषा संशोधनासाठी किती आवश्यक आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न केला. आज माझे विद्यार्थी माझ्या मागोमाग येत आहेत याचा मला आनंद आहे. *पाली भाषेचा काळ साधारणतः इ. स. पूर्व ५ वे शतक ते इ.स. ५ वे शतक असा १० शतकाचा काळ आहे.* या दहा शतकांतील-पाली वाङ्‌मय हे अत्यंत समृध्द्ध व परिपूर्ण असे आहे. हे एक प्राचीन भारतीय इतिहासाचे खजिना - घर (कोषागर) आहे. या खजिना घराला बरीच दालने आहेत. प्रत्येक दालन हे प्रामाणिकपणे पडताळून पहाण्याचा प्रयत्न केलात तर तुमचे आयुष्य अपुरे पडावे, इतकी माहीती त्यात तुम्हाला मिळणार आहे._

_प्रथम, त्यासाठी तुम्हाला पाली भाषेच्या कक्षा रुंदावल्या पाहिजेत. ह्या कक्षा व सीमा ओलांडताना तुमच्या नकळत दुसऱ्या विषयाच्या प्रांगणात तुमचा प्रवेश होईल आणि हे लक्षात आल्यावर तुम्ही आनंदाने भारावून जाल. हा माझा अनुभव आहे. आता ही दालने कोणती व तिचा तुम्हाला, सद्यपरिस्थितीत कसा उपयोग करून घेता येईल, हे सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे._

👉 *_दालन नं १. Religion : बौध्द धम्माचा 'सखोल अभ्यास._*

याचे दोन विभाग पाडता येतील. 

१) श्रमणांसाठी धम्म व

२) उपासकांसाठी धम्म, त्यांचे नियम ध्येये, उपासना इ. सर्व गोष्टींचा अभ्यास, ध्यान, समथ व विपस्सना यांचा विचार

👉 *_दालन नं २. Philosophy बुद्धांचे... ज्ञान_*

_त्या विषयक धोरण पालि भाषेतून अवगत करणे पंचशील, अष्टांगिक मग्ग, पटिच्चसमुप्पाद, दुक्ख, अनत्त, अनिच्चता या वेगवेगळ्या तत्वज्ञानाधिष्ठीत प्रणालींचा अभ्यास._ 

_दुसरे अंग म्हणजे प्राचीन भारतीय तत्वज्ञानाचा बौध्द तत्वज्ञानावर झालेला परिणाम - या सर्वांचा विस्तृतपणे अभ्यास करणे._

👉 *_दालन नं ३. Literature : पाली वाङ्मय व पाली भाषा यांचा अभ्यास._*

_तिपिटक, अट्ठकथा, वंस ग्रंथ, तीन संगिती बाह्य लिहिलिले पाली वाङ्मय, नवाङ्ग शासन व त्याचे प्रकार सौंदर्य या सर्वांचा विचार पाली वाङ्मयातील प्रत्येक पंचाचे मूल्यमापन करणे ._

👉 *_दालन नं. ४. Grammer and Philosophy : पाली भाषेचे व्याकरण_*

_पाली भाषेचे व्याकरण हा एक वेगळाच विषय घेऊन अभ्यास करणे आवश्यक आहे. तसेच भाषाशास्त्र (Philosophy ), त्याचा उगम, विकास व त्याचा चार पोटभाषांशी (Dialects) असलेला संबंध पाहणेही जरूरीचे आहे. *असा अभ्यास प्रा. मेहंदळे यांच्यानंतर कुठेही केलेला दिसत नाही.*_

👉 *_दालन नं ५. पाठी भाषेतील वाङ्‌मयाचा मराठीत अनुवाद करणे._*

_पाली भाषेतील वाङ्‌मयाचा मराठीत अनुवाद करणे, ही काळाची गरज आहे. त्यासाठी पाली भाषेवर प्रभुत्व मिळविणे आवश्यक आहे. हे कार्य *Pali Text Society, London च्या प्रमाणे एक मंडळ स्थापून निदान ४/ ५ विद्वानांनी एकत्र येऊन असा अभ्यास केला पाहिजे व अनुवादित पुस्तके छापली पाहिजेत.*_

👉 *_दालन नं ६. History: इतिहास._*

_प्राचीन भारतीय इतिहासाचे प्रतिबिंव पाली वाङ्‌मयात दिसून येते व त्यात येणारा इतिहास हा सत्यावर आधारलेला आहे. कारण तो बहुतांशी श्रमणानींच लिहिला असल्यामुळे त्यात कोठल्याही राजाचा व राजवंशाचा द्वेष वा लोभ नाही._

👉 *_दालन नं ७. Archeology पुरातत्व वा प्राचीन वस्तूंचा अभ्यास._*

_पुरातत्वाचा मोठा भाग हा बौध्दकालीनच आहे. प्राचीन भारतांतील सापडणाऱ्या लेण्या, विहार, स्तूप, चैत्य, अशोकाचे शिलालेख आदी सर्वांची नोंद या विषयार्तंगत येत असते. त्यामुळे पाली भाषेत लिहिले गेलेले भाष्य फार मोलाचे ठरते._

👉 *_दालन नं ८. Inscriptions and Iconography शिलालेख, मूर्तीशास्त्र व नाणेशास्त्र_*

_शिलालेख, मूर्तीशास्त्र व नाणेशास्त्र या तिन्ही विषयांसाठी पाली वाङ्‌मयाचा फारच उपयोग होत असतो. अशोकाचे शिलालेख तर पाली भाषेच्या अत्यंत, जवळचे आहेत. इतर शिलालेखांतील भाषा संस्कृत पोटभाषा व पाली यावरच आधारीत आहेत. तसेच मूर्ती मग त्या दगडातून कोरलेल्या असोत वा धातू निर्मित असोत, त्यांचा अभ्यास करताना पाली भाषेची मदत लागते. नाणेशास्त्राचा अभ्यास करताना पालि भाषेची फार मदत होत असते._

👉 *_दालन नं ९. Fresco-paintings: भिंतीचित्रे,_*

_भिंतीचित्रे ही मुख्यता अजिंठा व बाग लेण्यांमध्ये सापडतात. ही सर्व चित्रे जातक कथा, महावग्ग व निकायांवरील घटनात्मक गोष्टींवर चित्रित केली गेली आहेत. त्यामुळे पाली भाषेच्या आधारे आपण त्यांचे अचूक निदान करू शकतो. आजच्या चित्रकारांनी सुध्दा खूप शिकावे असे त्यात भरपूर आहे.&

👉 *_दालन ने. १०. Architecture स्थापत्य शिल्प कला._*

_प्राचीन भारतातील ही कला सर्व देशभर पसरलेली आहे. ती कानाकोपऱ्यात पसरलेली आहे व ती बहुतांशी बौद्ध स्थापत्य शिल्पकला आहे. स्तूप, चैत्य व विहार यांची योजना कशी करावी हे सुध्दा आपल्याला विनय पिटकांत आढळते._

👉 *_दालन नं ११. Socilogy: समाजशास्त्र_*

_प्राचीन भारतीय समाज कसा होता, त्याची रचना कशी होती, त्यात राहाणारे लोक, त्यांच्या सामाजिक समस्या, जात, धर्म, स्त्रियांचे स्थान वगैरे अनेक गोष्टींचा उहापोह आपल्याला विशेष करून याच विभागांमध्ये आढळतो व त्याचा अभ्यास व्हायला हवा._

*_मी सर्व दालने आपल्यापुढे उघडी केली आहेत._*

_मी एक Academician म्हणून पालि भाषेच्या विकासाकडे पाहत आहे. कदाचित मी कुणाला फार महत्वकांक्षी आहे असे वाटत असेल. पण प्रयत्न केल्यास अवश्य होईल असे मला वाटते. असो ! २९ व्या शतकात तरूण पिढीसमोर नवनवी संकटे, प्रलोभने, आव्हाने येत असतात. *केवळ पालि भाषा ही नोकरी (एका मर्यादेपर्यंत) देण्यास समर्थ नाही. It is not a job oriented हे मान्य करावे लागेल. त्यामुळे या अकरा दालनांच्या सहाय्याने आर्थिकदृष्ट्याही काही मार्ग दिसू शकतील असा माझा कयास आहे. म्हणूनच मी माझे विचार तरूण मंडळींपुढे कळकळीने मांडले आहेत. त्याचा त्यांनी विचार करावा.*_

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

*_लेखिका :- डॉ. मिना तालीम_*

पाली भाषेच्या विद्वान संशोधिका

*संकलन :- महेश कांबळे_*

प्रबुद्ध समाज मासिक

वर्ष ४/अंक २१ सप्टेंबर - पोट्ठपादो २०२४

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

भवा'चे तात्पर्य

 ✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

*_'भवा'चे तात्पर्य_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2025/01/blog-post_66.html

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹


_प्रिय शंकरने अजून एक प्रश्न विचारला आहे की *तृष्णेच्या नंतर हे 'उपादान' व 'भव' काय असते ?*_

_आजच्या हिंदीत भव 'संसारा'ला म्हणतात. जसे भवसागर म्हणजे संसारसागर, हा अर्थ प्राचीन पालीच्या अर्थापासून फार दूर नाही, तरीही 'भव' येथे कर्म अशा अर्थाने मोजले आहे. हे कसे ? याला समजा -_

_*प्रतीत्य समुत्पादाच्या एकेका कडीचे निरीक्षण करतांना आम्ही पाहतो की षडायतन म्हणजे सहा इंद्रियांद्वारे आपल्या-आपल्या विषयाशी 'फस्स' म्हणजे स्पर्श झाल्यावर वेदना म्हणजे सुखद अथवा दुःखद संवेदना उत्पन्न होतात. इथपर्यंत कोणतेही कर्म झाले नाही. जास्तीत जास्त एखाद्या पूर्व कर्माचे फळ पक्व होऊन तयार झाले. त्यामुळे अशी परिस्थिती निर्माण होऊन. सहा इंद्रियांसमोर असे विषय उत्पन्न झाले की त्यांच्या संसर्गाने संवेदनांची अनुभूती झाली. ती चांगल्या कर्मामुळे उत्पन्न झाल्यामुळे सुख वेदनेच्या रूपात प्रकट झाली व वाईट कर्मामुळे उत्पन्न झाल्यामुळे दुःख वेदनेच्या रूपाने प्रकट झाली. आता या वेदनेच्या त्वरित नंतर जी तृष्णा जागली, ती सुखद वेदना असेल तर ती आवडू लागली. त्या तृष्णेची उत्पत्ती होताच नवीन कर्माचे चक्र आरंभ झाले. तीच तृष्णा तीव्र झाली तर उपादान झाले. चित्तात खोलवर लालसा उत्पन्न झाली, जिला इंग्रजीत 'craving' म्हणतात. चित्ताच्या अशा अवस्थेत कर्माचे संपादन होणे, कर्म घडणे अनिवार्य असते चैतसिक कर्म, वाणीचे कर्म व कायेचे कर्म. या कर्मानाच भव अथवा कर्म-भव म्हणतात आणि संक्षेपात केवळ भवच म्हणतात.*_

_*भव का म्हणतात ? कारण तृष्णा व उपादानामुळे उत्पन्न झालेले हे कर्मच आमच्यासाठी एक नवे भव तयार करतात, एक असा संस्कार जो जीवन-मरणाचे चक्र तयार करतो.* मी आता जो कोणी आहे, माझ्या आपल्या कर्माचेच विपाक फळ आहे. त्यामुळे माझे कर्मच माझे भव आहे. त्यामुळे कर्माला भवाचे पर्यायवाची म्हणणे चुकीचे नाही. प्रत्येक प्राणी आपल्या आपल्या कर्मानुसार आपल्या आपल्या मनाच्या बंधनात गुंतलेला राहातो. खरोखर हा भवसागर अत्यंत विस्तृत आहे, अत्यंत गहन आहे. याची सुरवात-अंत दिसत नाही. याच्या तळाला स्पर्श केला जाऊ शकत नाही. प्रत्येक प्राण्याचा भव त्याच्या कर्मानुसार, त्याच्या आपल्या कर्मसीमेतच बांधलेला आहे. विष्ठेच्या घाणीत वळवळणारा एक किडा त्याच मळात जन्मतो, त्यातच इकडे-तिकडे वळवळ करुन काही वेळानंतर मरून जातो. त्याच्यासाठी हे अनंत कोटी सूर्य, चंद्र व तारे, ही पृथ्वी, हे आकाश यांचा काहीही अर्थ नसतो. त्याचा क्षुद्र भव त्या विष्ठेच्या छोट्याशा घाणीपर्यंतच सीमित असतो. याच प्रकारे प्रत्येक प्राण्याचा भव त्याच्या आपल्या कर्मानुसार सीमितच आहे._

_आम्ही मनुष्य आहोत, प्राण्यांमध्ये अत्यंत उच्च कोटीचे प्राणी, परंतु आमचा भवही तर शेवटी सीमितच आहे. हे अनंत कोटी सूर्य, चंद्र, नक्षत्र, प्रकाशपुंज आमच्या कोणत्या कामाचे आहेत ? केवळ त्यांची कल्पना करू शकतो. परंतु तरीही प्रत्येक प्राणी या असीम भवसागरात ज्याची ना कुठे सुरवात आहे ना अंत, आपल्या कर्मामुळे कुठून कुठे पोहोचतो व जन्म धारण करत राहातो. *आमच्या कर्मानुसार बनलेले हे भव आमच्या पुढच्या जन्माचे कारण बनले. जन्म होतो तर वृद्धत्व येते, आजारपण येते, मृत्यू येतो व अनेक प्रकारचे दुःख संताप निर्माण होतात. हाच प्रतीत्य-समुत्पाद आहे.* 'वेदने' च्या नंतर निर्माण होणा-या तृष्णेला थांबवताच उपादान आपोआप थांबते व उपादान थांबल्याबरोबर कर्मभव थांबतो. ज्याच्यासाठी कोणतेही भव नाही त्याचे कर्म जन्म देणारे कर्म नसते. म्हणजे त्याच्या चित्तातून तृष्णा व अविद्येचा समूळ नाश झालेला असतो. त्याची कर्मे अरहंताची कर्मे असतात, जी संस्कारहीन आहेत व फलहीन आहेत, चांगले वा वाईट फळ देणारी नसतात. त्यामुळेच भव उत्पन्न करणारी नसतात. त्याच्यासाठी कोणताही संसार नाही, कोणताही जन्म, जरा, व्याधी, मृत्यू, दुःख, संताप, दौर्मनस्य व रडणे, क्रंदन नसते, हीच निर्वाणाची अवस्था आहे._

_या बाबीची सखोलता समजून सद्धर्माला समजणारी एक व्यक्ती म्हणते की या अनंत सृष्टीला रचणारा व संचालन करणारा कोणी एक देव, ब्रह्म अथवा ईश्वर नाही आणि कोणी असेल तरी आमचे त्याच्याशी काहीही घेणे-देणे नाही. त्याच्या असण्यामुळे अथवा नसण्यामुळे आमची कोणतीही हानी वा लाभ नाही. कारण आम्ही त्याच्यामुळे नाही, तर आपल्या कर्मभवामुळे सुखदुःखाचे भागीदार होतो. आपल्या कर्मामुळेच प्राणी स्वतः आपला भव निर्माण करतो आणि आपल्या कर्माना मुळापासून नष्ट (निरोध) करून आपल्या भवाला मुळापासून नष्ट (निरुद्ध) करतो. त्यामुळे आम्ही स्वतःच आपल्या स्वतःला बंधनमुक्त करणारे आहोत. कोणी बिचारा सृष्टी रचणारा ब्रह्म अथवा तारक ब्रह्म यात काय करेल ? जर कोणी आपल्या स्वतःला तारक म्हणण्याचा दंभ डंका बाळगेल तर तो खरोखर मिथ्यादृष्टीनेच बांधलेला आहे. कोणी महापुरुष जास्तीत जास्त प्राण्यांचा केवळ मार्ग निर्देशक होऊ शकतो. तो योग्य मार्ग प्रकाशित करेल, येवढीच अनुकंपा करू शकतो व इतक्या अर्थानेच तारक म्हटला जाऊ शकतो, यापेक्षा अधिक नाही._

_कोणी मला रंगूनपासून मांडलेला जाणारा मार्ग सांगेल, समजावेल व मला योग्य प्रकारे समजेलही. परंतु जोपर्यंत मी त्या मार्गावर एक पाऊलही चालणार नाही, तोपर्यंत मांडले माझ्यापासून तितकेच दूर आहे, जितके पूर्वी होते. त्या तारकाच्या संपर्कात येऊनही मी रंगूनपासून एक पाऊलही पुढे जाऊ शकत नाही. तर ख-या अर्थाने आपला तारक तर मी स्वतः आहे. मार्ग निर्देशक कोणी दुसरा अवश्य होऊ शकतो, परंतु तारक नाही. *असा आहे हा भय व अशी आहे या भवाची उत्पत्ती आणि असा आहे या भवाचा निरोध, ज्याने या भव निरोधाच्या मार्गाला योग्य प्रकारे समजून घेतले आणि स्वतः त्यावर योग्य प्रकारे चालून खरोखर ज्याने आपल्या भवाचा निरोध केला, तो खरोखर मुक्त आहे, अन्य सर्व भ्रमित आहेत.*_

_त्यामुळे या, या मोहबंधन व भवबंधनातून सुटकेसाठी शील, समाधी व प्रज्ञेचा नियमित रूपाने अभ्यास करून धर्मात पुष्ट होऊ आणि सर्व बंधनांपासून मुक्ती प्राप्त करू. यातच आम्हा सर्वांचे मंगल कल्याण सामावले आहे._

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

*_लेखक :- कल्याणमित्र सत्यनारायण गोयन्का_*

_बुद्धवर्ष २५५८, फाल्गुन पौर्णिमा, ५ मार्च, २०१५ वर्ष १ अंक ११_

*_संकलन :- महेश कांबळे_*

*_दिनांक :-_* २४/०१/२०२५

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

कोलित सुत्त

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_कोलित सुत्त_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_41.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼  _'कोलित सुत...