✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹
*_विपश्यना केंद्रांची / विहारांची शांती व परिशुद्धता_*
https://mikamblemahesh.blogspot.com/2025/01/blog-post_27.html
✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹
(पूज्य गुरुजी श्री सत्यनारायणजी गोयन्कांद्वारे उद्धरणांसह लिहिलेले पुस्तक 'त्रिपिटकात सम्यक संबुद्ध' मधून साभार संकलित.)
बुद्धकालीन विहार (केंद्र) प्रमाद वा आळसात जीवन जगण्याची जागा नसायचे. लोक येथे विपश्यना ध्यान साधनेच्या गंभीर हेतूने यायचे व राहायचे. या उलट अन्य अनेक सांप्रदायिक आश्रमात लोक व्यर्थ चर्चेतच आपला वेळ व्यतीत करायचे.
*भगवान बुद्धांच्या ध्यान केंद्रांना आश्रम (आश्रयस्थळ) नावाने संबोधित केले जात नसे, तर त्यांना विहार' अथवा 'ध्यान केंद्र' म्हटले जात असे. त्या विहारात नियमांचे कठोरतेने पालन केले जात होते,* ज्यामुळे लोकांना करुणायुक्त समजदारीने केलेल्या कठोर मेहनतीचे पूर्ण फळ प्राप्त होऊ शकेल.
*अधिकांश साधक या बाबीचे स्वतः पूर्ण पालन करत असत तरीही भगवान बुद्धांनी विहाराच्या वातावरणाला पूर्णपणे परिशुद्ध बनवून ठेवण्यासाठी कठोर नियम लागू केले होते. जेव्हा एखाद्या अन्य सांप्रदायिक आश्रमात राहिलेली कोणतीही व्यक्ती संघात भिक्षू बनून सामील होऊ इच्छित असेल तेव्हा तिला ताबडतोब संघात सामील केले जात नसे. तिला चार महिने वाट पाहाण्यास सांगितले जाई, ज्यावरून हे तपासले जात असे की ती नियमांचे योग्य प्रकारे पालन करू शकेल की नाही.*
गृहस्थ उपासक-उपासिकांना हा नियम लागू होत नव्हता व त्यांना गृही संघात सामील होण्याची अनुमती त्वरित मिळत असे.
भगवान बुद्धांनी दुस-या सांप्रदायिक आश्रमात लोकांना व्यर्थ व प्रमादपूर्ण कामात वेळ वाया घालवतांना पाहूनच हे नियम लागू केले होते.
जे लोक दिवस व्यर्थ चर्चेत व रात्र झोपण्यात घालवत असतील त्यांना येताच ताबडतोब भिक्षु बनवून जर संघात सामील केले गेले असते तर अशा प्रमादी लोकांनी विहाराच्या शुद्ध वातावरणाला दूषित केले असते. त्यामुळे त्यांना ताबडतोब मनाई न करता, त्यांच्या भल्यासाठी चार महिन्याची मुदत दिली जात असे. ज्यामुळे ते विहाराच्या धर्ममय परिवेशात नियमबद्ध जीवन जगण्यासाठी आपल्या स्वतःला पूर्णपणे तयार करू शकतील, जेथे आर्य मौनासह विपश्यना साधना करणेच मुख्य काम होते.
विहारात चर्चेसंबंधी मुख्य नियम हाच होता की-
*_"धम्मी वा कथा, अरियो वा तुण्हीभावो।"_*
*_(मज्झिमनिकायो १.२७३, पासरासिसुत्तं)_*
*_-धर्म चर्चा व्हावी अथवा आर्य मौन असावे._*
*_धर्म चर्चा कशी व्हावी :-_*
जेव्हा कोणी साधक आपल्यापेक्षा वरिष्ठ भिक्षूकडून धर्माच्या परियत्ती अथवा पटिपत्तीसंबंधी मार्गदर्शन मागायचा तेव्हा त्याला योग्य उत्तर मिळायचे. *अशा वेळी प्रश्नार्थी प्रश्न विचारायचा व मार्गदर्शक उत्तर द्यायचा. एका वेळी एकच व्यक्ती बोलायची. त्यामुळे धर्मकेंद्राचे शांत वातावरण बाधित होत नसे. प्रश्नार्थीचा प्रश्न व त्याचे उत्तर सर्व साधकगण ऐकू शकत. अशा प्रेरणादायक वातावरणात सर्व आर्यमौनासहित आपल्या ध्यान साधनेत तल्लीन राहायचे, जर वादविवाद झाला असता तर कोलाहल होणे निश्चित होते.*
बुद्धांनी म्हटले आहे -
*_"इधावुसो सारिपुत्त, भिक्खु पटिसल्लानारामो होति पटिसल्लानरतो, अज्झत्तं चेतोसमथमनुयुत्तो अनिराकतज्झानो, विपस्सनाय समन्त्रागतो, ब्रूहेता सुञ्जगारानं।.."_*
*_(मज्झिमनिकायो, १.३३४, महागोसिङ्गसुतं)_*
*_- हे सारिपुत्त, भिक्षु एकांत स्थानात सुखी होतो, व सुखी होतो एकांतवासात जेथे चित्तमळांनी युक्त मनाचा विकास केला जाऊ शकतो._*
विपश्यना साधनेची अवहेलना न करून भिक्षु आंतरिक सत्याला जाणून घेतो. त्यामुळे तो अधिकाअधिक वेळ शून्यागारात व्यतीत करतो.
या प्रकारे विपुल पारमी प्राप्त भिक्षुंच्या असण्यामुळे ध्यान विहारांची वृद्धी झाली. अधिकाअधिक लोक विपश्यना ध्यान शिकून आपल्या दु:खातून बाहेर पडले. 'आर्यमौन' ध्यानाच्या गहनतेत पोहोचण्यासाठी सहायक सिद्ध झाले व धर्माच्या गरिमेमुळे संघ मजबूत झाला. त्यामुळेच आर्यमौनाला इतके अधिक महत्व दिले गेले.
अरण्यात राहतांना गंभीर साधक आर्यमौनाचे अधिकाअधिक पालन करायचे, विहारात जेथे अनेक साधक एकत्र राहायचे, तेथे निश्चितच मौनाचे अत्याधिक महत्व असायचे.
जर मौन भंग अनिवार्य असेल तेव्हाही बोलणे हळूहळू व्हायचे ज्यामुळे दुस-या साधकांच्या साधनेत व्ययधान येऊ नये.
*_सारिपुत्त व महामोग्गल्लान_*
*भगवान बुद्धांनी नेहमी विहारांत शांत वातावरण कायम राखण्याला विशेष महत्व दिले.* साधकगण हळूहळू धर्मचर्चा करायचे तर साधनेला अनुकूल वातावरण नेहमी कायम राहायचे. तरीही कधीकधी जोराने केलेल्या चर्चेमुळे कोलाहल उत्पन्न झाला. तेव्हा विपश्यना विहारात व दुसऱ्या आश्रमात काही फरक राहिला नाही. विहाराचे निर्मळ शांत वातावरण दूषित झाले. अशा वेळी भगवानांनी त्या लोकांना सावध केले. *आर्यमौन व सम्मावाचेचा कठोर नियम विहार व अरण्यात जशाचा तसा लागू केला.* कारण ध्यानाच्या त्या वातावरणाची शुद्धता व शांती कायम राखणे अत्यंत आवश्यक होते.
एकदा शाक्यमुनी शाक्य राज्याच्या आमलकी वनात थांबलेले होते. त्या वेळी तेथे महाथेर सारिपुत्त व महाथेर महामोग्गल्लान संघात सामील झालेल्या त्यांच्या ५००-५०० नवीन शिक्षित शिष्यांसह आले. येताच त्या नवीन भिक्षूंनी जोरजोरात बोलून कोलाहल निर्माण केला. धर्माचे नियम तर सर्वांवर समान रूपाने लागू होतात व समान रूपाने फळही देतात.
जरी ते १,००० नवीन शिक्षित भिक्षु जेष्ठ महास्थविरांचे शिष्यगण होते, परंतु बुद्धांनी त्यांना धडा शिकवण्याचा निश्चय केला.
बुद्ध म्हणाले -
*_"गच्छथ, भिक्खवे, पणामेमि वो, न वो मम सन्तिके वत्थब्ब"न्ति ।_*
*_"एवं, भन्ते" ति खो ते भिक्खू भगवतो पटिस्सुत्वा उट्ठायासना भगवन्तं अभिवादेत्वा पदक्खिणं कत्वा सेनासनं संसामेत्वा पत्तचीवरमादाय पक्कमिंसु।_*
*_(मज्झिमनिकायो, २.१५७, चातुमसुत्त)_*
*_भिक्षूंनो, तुम्ही येथून निघून जा. बुद्धांच्या सोबत ध्यान करण्याची आपली वेळ अजून परिपक्व झाली नाही._*
*_महाकारुणिकांच्या वचनांचा अभिप्राय समजून दोन्ही महाथेरांनी बुद्धांना प्रणाम करून त्या १,००० शिष्यांसह कुठे तरी दूर जाण्यासाठी प्रस्थान केले._*
लोकांना आश्चर्य वाटले. शेवटी सारिपुत्त व महामोग्गल्लान बुद्धांच्या उजव्या व डाव्या हातासमान होते. आता त्यांना ध्यानाच्या वातावरणाला दूषित करण्याच्या परिणाम स्वरूप निष्कासित केले जात होते.
*जेतवनासारखे मोठे विपश्यना ध्यान केंद्र असो अथवा एखाद्या अरण्यातील छोटे केंद्र असो, स्वानुशासन सर्वत्र अत्यावश्यक आहे.* सम्यक संबुद्धांची ही करुणासिंचित सूचना होती जी आजही सर्व विपश्यी साधकांवर समान रूपाने लागू होते आहे.
लोकांनी विचार केला की सारिपुत्त व महामोग्गल्लानाविना शुद्ध धर्म योग्य रीतीने कसा पुढे जाईल.
त्यामुळे काही काळानंतर या बाबीने चिंतित चातुमचे शाक्यगण त्या महाथेरांविषयी प्रार्थना करण्यासाठी भगवान बुद्धांजवळ आले व सहम्पती महाब्रह्मानेही त्या दोघांकरता व १,००० नवीन शिक्षित भिक्षंकरता भगवानांना निवेदन केले -
*_"अभिनन्दतु, भन्ते, भगवा भिक्खुसङ्गं; अभिवदतु, भन्ते, भगवा भिक्खुसङ्घ ।_*
*_भगवानांनी त्यांना संघात स्थान द्यावे, भगवानांनी पुन्हा एकदा त्यांना संघात मार्गदर्शन द्यावे._*
*_(मज्झिमनिकायों, २.१५८. चातुमसुत्तं)_*
_*एका कुशल शल्य चिकित्सकाप्रमाणे महाकारुणिक सम्यक संबुद्ध जाणत होते की साधकांच्या प्रगतीसाठी कधीकधी काही कठोर पाऊले उचलणे आवश्यक असते.*_
कालांतराने ते १,००० भिक्षुगणही गहन साधनेत पुढे-पुढे प्रगती करत गेले. हे पाहून भगवान बुद्ध आनंदित झाले व त्याना पुन्हा एकदा विहारात परतण्याची अनुमती दिली.
या प्रकारे *बुद्धांनी दर्शविले की आवश्यकता पडल्यावर विपश्यना ध्यान केंद्रांच्या / विहारांच्या पावन परिशुद्धतेला सतत कायम ठेवण्यासाठी कठोर पाऊले उचलण्यात यावीत, जरी एखाद्या विशेष परिस्थितीमुळे असो, केंद्रांच्या / विहारांच्या नियमांना भंग करणारे वरिष्ठतम धर्मसेवक असोत अथवा बुद्धांचे श्रेष्ठतम आचार्य सारिपुत्त व महामोग्गल्लान ही असोत.*
✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹
*_लेखक :- कल्याणमित्र सत्यनारायण गोयन्का_*
_बुद्धवर्ष २५५८, वैशाख पौर्णिमा, ४ मे, २०१५, वर्ष २, अंक १_
*_संकलन :- महेश कांबळे_*
*_दिनांक :-_* २७/०१/२०२५
✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹
No comments:
Post a Comment