✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹
*_सतत साधनारत शास्ता_*
https://mikamblemahesh.blogspot.com/2025/01/blog-post_19.html
✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹
(पूज्य गुरुजी श्री सत्यनारायण गोयन्कोजी द्वारा लिहिलेले पुस्तक 'तिपिटक में सम्यक संबुद्ध' मधून साभार संकलित)
_एके समयी कोशल नरेश प्रसेनजित आपल्या अधीनस्त गणराज्य शाक्य प्रदेशाच्या शासकीय यात्रेवर निघाले. शाक्य सीमेवर स्थित चेतियगिरी निगमाच्या शांत व सुरम्य वातावरणाने प्रभावित होऊन तेथेच काही वेळ विश्राम करू लागले. इतक्यात मनात एक विचार आला की भगवान बुद्धही शांतप्रिय व मौनप्रिय आहेत. ते इथेच कुठे आसपास तर नाहींत ? कोणाला विचारल्यावर समजले की होय, येथेच जवळच्या अरण्यात साधनारत आहेत. हे ऐकून त्याची प्रबळ इच्छा झाली की त्यांना भेटावे. त्यांना भेटण्यासाठी तो रथावर स्वार होऊन निघाला परंतु थोडे दूर गेल्यावर रथ जाण्यासाठी मार्ग नसल्यामुळे पायीच निघाला. प्रश्रब्धी व शांतीने परिपूर्ण वातावरण वस्तुतः बुद्ध व त्यांच्या शिष्यांच्या नावासोबत जुळले गेले होते._
_*भगवान बुद्ध एकांत प्रिय व मौन प्रिय होते. याचा अर्थ हा नव्हता की ते शास्तांच्या जबाबदारीपासून दूर रहायचे. जुन्या शिष्यांशी व नवीन धर्मवाचकांशी त्यांचा पारस्परिक संबंध सतत कायम राहायचा. आपल्या पंचेचाळीस वर्षाच्या शासनचर्येत त्यांनी जितके धर्मोपदेश दिले तितके धर्मोपदेश मानवजातीच्या दीर्घ इतिहासात कोणत्याही एका धर्मगुरुने दिले नाहीत. ते जितक्या जिज्ञासूंना व मुमुक्षंना भेटले तितक्यांना अन्य कोणताही धर्मगुरु भेटू शकला नाही. त्यांचे सारे जीवन 'बहुजनहिताय बहुजन सुखाय' अनुकंपेने भरले होते. ते नेहमी सद्धर्म वाटण्याच्या कामातच मग्न असायचे.* भगवानांबाबत हे किती सत्य म्हटले गेले आहे._
*_असम्मोहधम्मो सत्तो लोके उप्पन्नो बहुजनहिताय बहुजनसुखाय लोकानुकम्पाय अत्थाय हिताय सुखाय देवमनुस्सान 'न्ति ।_*
*_मज्झिमनिकायो १.५०, भयभेरवसुत्तं_*
*_मोह-मुढतेपासून मुक्त, अनेकांच्या हितासाठी, अनेकांच्या सुखासाठी, जगावर करुणेची वर्षा करण्यासाठी, देवता व मनुष्यांच्या कल्याणासाठी, हित व सुखासाठी एक व्यक्ती जगात उत्पन्न झाली आहे._*
ते कशा प्रकारे लोकहितात मग्न असतात याचे वर्णन करतांना त्यांनी स्वतः म्हटले
अञ्ञत्र असितपीतखायितसायिताअञ्ञत्र उच्चारपरसावकम्मा, अञ्ञत्र निद्दाकिलमथपटिविनोदना अपरियादिन्नायेवस्स, सारिपुत्त, तथागतस्स धम्मदेसना, अपरियादिन्नंयेवस्स तथागतस्स धम्मपदब्यञ्जनं, अपरियादिन्नंयेवस्स तथागतस्स पञ्हपटिभानं ।
*_मज्झिमनिकायो १.१६१, महासीहनादसुत्तं_*
_""खाणे, पिणे व झोपण्याचा वेळ सोडून, मलमूत्र त्यागण्याचा वेळ सोडून, निद्रा व थकव्याला दूर करण्याचा वेळ सोडून, हे सारिपुत्त! तथागतांची धर्मदेशना अखंड सुरु राहते, तथागतांची धर्मपद अभिव्यक्ती अखंड सुरू राहते."* आणि खरोखरच अखंड सुरु राहिली._
*_विश्राम व ध्यान_*
या प्रकारे सतत सेवेत रत राहण्यासाठी त्यांना वेळो वेळी शरीराला आराम द्यावा लागायचा. हा विश्राम ध्यानाद्वारेच संपन्न व्हायचा, भगवानांनाही वारंवार ध्यानात लीन व्हावे लागायचे हे पाहून कोणाच्या मनात हा प्रश्न येणे स्वाभाविक होते की-
*अज्जापि नून समणो गोतमो* - अजूनही श्रमण गौतम
*अवीतरागो अवीतदोसो अवीतमोहो* वीतराग, वीतद्वेष, वीतमोह नाही ?
*तस्मा अरञ्ञवनपत्थानि पन्तानि सेनासनानि पटिसेवति।*
त्यामुळेच तर अरण्यात शांत वनस्थलीचे, एकांतवासाचे सेवन करतो.
या मिथ्या संशयाचे स्पष्टीकरण देतांना भगवान म्हणाले
*द्वे खो अहं, ब्राह्मण, अत्थवसे सम्पस्समानो अरञ्ञवनपत्थानि पन्तानि सेनासनानि पटिसेवामि अत्तनो च दिट्ठधम्मसुखविहारं सम्पस्समानो, पच्छिमञ्च जनतं अनुकम्पमानो "ति।*
*म० नि० १.५५, भयभेरवसुत्त*
- ते एकांतवासाचे सेवन या दोन कारणांमुळे करतात. एक तर आपल्या त्या वेळच्या (शारीरिक) सुख विहारासाठी सम्यक विपश्यना करीत व दुसरे भावी जनतेवर अनुकंपा करीत.
शेवटी मानवी शरीराच्या सामर्थ्याची सीमा आहे. मग ते भगवान बुद्धांचेही शरीर का असेना, त्याला विश्रांतीची गरज पडायची. या व्यतिरिक्त भगवान दूरदर्शी होते. पाहायचे की *येणाऱ्या पिढ्यांचे विपश्यना गुरु स्वतः तर विपश्यना करणार नाहीत आणि दुसऱ्यांना विपश्यना करण्याचा उपदेश देत राहातील कधी असे होऊ नये. त्यांना विपश्यना गुरुंच्या आदर्श जीवनाची परंपरा स्थापित करावयाची होती. नितांत वीतराग, वीतद्वेष, वीतमोह झाल्यावरही भगवानांनी स्वतः ध्यान करणे सोडले नाही. हे जाणून की भावी आचार्य ही जेव्हा इतरांना विपश्यना करण्यास सांगतिल, तेव्हा स्वतःही विपश्यना करत त्यांना प्रोत्साहित करतील. *जो गुरु आपल्या शिकवणुकीचे स्वतः पालन करीत नाही. त्यांच्या शिष्याकडून ही अपेक्षा केली जाऊ शकत नाही की ते त्या शिकवणुकीचे पालन करतील.* भावी आचार्यांनी अशी चुक करू नये. या बाबीला लक्षात घेऊन त्यांच्यावर अनुकंपा करून भगवान स्वतः वेळो वेळी ध्यानात लीन व्हायचे, आपले आसक्ती, द्वेष वा मोह दूर करण्यासाठी नाही. त्यांचे हे विकार तर संपूर्ण नष्ट झालेच होते.
*_एकांत ध्यानाची ऊर्जा_*
लोक संपर्कजन्य श्रमामुळे शारीरिक ऊर्जेचे क्षीण होणे स्वाभाविक होते. रूपकायेच्या या थकव्याला दूर करण्यासाठी भगवानांना विश्रांती घेणे आवश्यक होते. ध्यानात लीन होण्यामुळे कायेला जी विश्रांती मिळते ती अतुलनीय आहे. त्यामुळे भगवान आपल्या दैनिक दिनचर्येत ध्यानासाठी वेळ निश्चित ठेवायचे. ज्यामुळे धर्मकायेद्वारा ज्या धर्म ऊर्जेची निर्मिती होईल ती रूपकायेसाठी आवश्यक ऊर्जेची पूर्ती करेल. सामान्य दैनिक जीवनात जो लोक संपर्क व्हायचा त्यामुळे येणाऱ्या थकव्याला दूर करण्यासाठी नित्य नियमित वेळेचे ध्यान पर्याप्त होते. परंतु जशीजशी भगवानांची प्रसिद्धी वाढत गेली तसतसा लोक संपर्कही वाढत गेला.
*भगवान या बाबीला उत्तम प्रकारे जाणत होते की भावी आचार्यगणांनी आपल्या स्वतःला जन-शास्ता समजून आपली स्वतःची साधना सोडू नये. त्यांनी असे म्हणू नये की काय करू. खूप अधिक व्यस्ततेमुळे साधनेसाठी वेळ कोठून आणू? यासाठीच त्यांनी मौन व एकांत साधनेला अधिक महत्व दिले व त्याचे अद्भुत उदाहरण प्रस्तुत केले.*
✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹
*_लेखक :- कल्याणमित्र सत्यनारायण गोयन्का_*
_बुद्धवर्ष २५५९, ज्येष्ठ पौर्णिमा, २ जून, २०१५ वर्ष २, अंक २_
*_संकलन :- महेश कांबळे_*
*_दिनांक :-_* २८/०१/२०२५
✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹
No comments:
Post a Comment