✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹
*_'भवा'चे तात्पर्य_*
https://mikamblemahesh.blogspot.com/2025/01/blog-post_66.html
✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹
_प्रिय शंकरने अजून एक प्रश्न विचारला आहे की *तृष्णेच्या नंतर हे 'उपादान' व 'भव' काय असते ?*_
_आजच्या हिंदीत भव 'संसारा'ला म्हणतात. जसे भवसागर म्हणजे संसारसागर, हा अर्थ प्राचीन पालीच्या अर्थापासून फार दूर नाही, तरीही 'भव' येथे कर्म अशा अर्थाने मोजले आहे. हे कसे ? याला समजा -_
_*प्रतीत्य समुत्पादाच्या एकेका कडीचे निरीक्षण करतांना आम्ही पाहतो की षडायतन म्हणजे सहा इंद्रियांद्वारे आपल्या-आपल्या विषयाशी 'फस्स' म्हणजे स्पर्श झाल्यावर वेदना म्हणजे सुखद अथवा दुःखद संवेदना उत्पन्न होतात. इथपर्यंत कोणतेही कर्म झाले नाही. जास्तीत जास्त एखाद्या पूर्व कर्माचे फळ पक्व होऊन तयार झाले. त्यामुळे अशी परिस्थिती निर्माण होऊन. सहा इंद्रियांसमोर असे विषय उत्पन्न झाले की त्यांच्या संसर्गाने संवेदनांची अनुभूती झाली. ती चांगल्या कर्मामुळे उत्पन्न झाल्यामुळे सुख वेदनेच्या रूपात प्रकट झाली व वाईट कर्मामुळे उत्पन्न झाल्यामुळे दुःख वेदनेच्या रूपाने प्रकट झाली. आता या वेदनेच्या त्वरित नंतर जी तृष्णा जागली, ती सुखद वेदना असेल तर ती आवडू लागली. त्या तृष्णेची उत्पत्ती होताच नवीन कर्माचे चक्र आरंभ झाले. तीच तृष्णा तीव्र झाली तर उपादान झाले. चित्तात खोलवर लालसा उत्पन्न झाली, जिला इंग्रजीत 'craving' म्हणतात. चित्ताच्या अशा अवस्थेत कर्माचे संपादन होणे, कर्म घडणे अनिवार्य असते चैतसिक कर्म, वाणीचे कर्म व कायेचे कर्म. या कर्मानाच भव अथवा कर्म-भव म्हणतात आणि संक्षेपात केवळ भवच म्हणतात.*_
_*भव का म्हणतात ? कारण तृष्णा व उपादानामुळे उत्पन्न झालेले हे कर्मच आमच्यासाठी एक नवे भव तयार करतात, एक असा संस्कार जो जीवन-मरणाचे चक्र तयार करतो.* मी आता जो कोणी आहे, माझ्या आपल्या कर्माचेच विपाक फळ आहे. त्यामुळे माझे कर्मच माझे भव आहे. त्यामुळे कर्माला भवाचे पर्यायवाची म्हणणे चुकीचे नाही. प्रत्येक प्राणी आपल्या आपल्या कर्मानुसार आपल्या आपल्या मनाच्या बंधनात गुंतलेला राहातो. खरोखर हा भवसागर अत्यंत विस्तृत आहे, अत्यंत गहन आहे. याची सुरवात-अंत दिसत नाही. याच्या तळाला स्पर्श केला जाऊ शकत नाही. प्रत्येक प्राण्याचा भव त्याच्या कर्मानुसार, त्याच्या आपल्या कर्मसीमेतच बांधलेला आहे. विष्ठेच्या घाणीत वळवळणारा एक किडा त्याच मळात जन्मतो, त्यातच इकडे-तिकडे वळवळ करुन काही वेळानंतर मरून जातो. त्याच्यासाठी हे अनंत कोटी सूर्य, चंद्र व तारे, ही पृथ्वी, हे आकाश यांचा काहीही अर्थ नसतो. त्याचा क्षुद्र भव त्या विष्ठेच्या छोट्याशा घाणीपर्यंतच सीमित असतो. याच प्रकारे प्रत्येक प्राण्याचा भव त्याच्या आपल्या कर्मानुसार सीमितच आहे._
_आम्ही मनुष्य आहोत, प्राण्यांमध्ये अत्यंत उच्च कोटीचे प्राणी, परंतु आमचा भवही तर शेवटी सीमितच आहे. हे अनंत कोटी सूर्य, चंद्र, नक्षत्र, प्रकाशपुंज आमच्या कोणत्या कामाचे आहेत ? केवळ त्यांची कल्पना करू शकतो. परंतु तरीही प्रत्येक प्राणी या असीम भवसागरात ज्याची ना कुठे सुरवात आहे ना अंत, आपल्या कर्मामुळे कुठून कुठे पोहोचतो व जन्म धारण करत राहातो. *आमच्या कर्मानुसार बनलेले हे भव आमच्या पुढच्या जन्माचे कारण बनले. जन्म होतो तर वृद्धत्व येते, आजारपण येते, मृत्यू येतो व अनेक प्रकारचे दुःख संताप निर्माण होतात. हाच प्रतीत्य-समुत्पाद आहे.* 'वेदने' च्या नंतर निर्माण होणा-या तृष्णेला थांबवताच उपादान आपोआप थांबते व उपादान थांबल्याबरोबर कर्मभव थांबतो. ज्याच्यासाठी कोणतेही भव नाही त्याचे कर्म जन्म देणारे कर्म नसते. म्हणजे त्याच्या चित्तातून तृष्णा व अविद्येचा समूळ नाश झालेला असतो. त्याची कर्मे अरहंताची कर्मे असतात, जी संस्कारहीन आहेत व फलहीन आहेत, चांगले वा वाईट फळ देणारी नसतात. त्यामुळेच भव उत्पन्न करणारी नसतात. त्याच्यासाठी कोणताही संसार नाही, कोणताही जन्म, जरा, व्याधी, मृत्यू, दुःख, संताप, दौर्मनस्य व रडणे, क्रंदन नसते, हीच निर्वाणाची अवस्था आहे._
_या बाबीची सखोलता समजून सद्धर्माला समजणारी एक व्यक्ती म्हणते की या अनंत सृष्टीला रचणारा व संचालन करणारा कोणी एक देव, ब्रह्म अथवा ईश्वर नाही आणि कोणी असेल तरी आमचे त्याच्याशी काहीही घेणे-देणे नाही. त्याच्या असण्यामुळे अथवा नसण्यामुळे आमची कोणतीही हानी वा लाभ नाही. कारण आम्ही त्याच्यामुळे नाही, तर आपल्या कर्मभवामुळे सुखदुःखाचे भागीदार होतो. आपल्या कर्मामुळेच प्राणी स्वतः आपला भव निर्माण करतो आणि आपल्या कर्माना मुळापासून नष्ट (निरोध) करून आपल्या भवाला मुळापासून नष्ट (निरुद्ध) करतो. त्यामुळे आम्ही स्वतःच आपल्या स्वतःला बंधनमुक्त करणारे आहोत. कोणी बिचारा सृष्टी रचणारा ब्रह्म अथवा तारक ब्रह्म यात काय करेल ? जर कोणी आपल्या स्वतःला तारक म्हणण्याचा दंभ डंका बाळगेल तर तो खरोखर मिथ्यादृष्टीनेच बांधलेला आहे. कोणी महापुरुष जास्तीत जास्त प्राण्यांचा केवळ मार्ग निर्देशक होऊ शकतो. तो योग्य मार्ग प्रकाशित करेल, येवढीच अनुकंपा करू शकतो व इतक्या अर्थानेच तारक म्हटला जाऊ शकतो, यापेक्षा अधिक नाही._
_कोणी मला रंगूनपासून मांडलेला जाणारा मार्ग सांगेल, समजावेल व मला योग्य प्रकारे समजेलही. परंतु जोपर्यंत मी त्या मार्गावर एक पाऊलही चालणार नाही, तोपर्यंत मांडले माझ्यापासून तितकेच दूर आहे, जितके पूर्वी होते. त्या तारकाच्या संपर्कात येऊनही मी रंगूनपासून एक पाऊलही पुढे जाऊ शकत नाही. तर ख-या अर्थाने आपला तारक तर मी स्वतः आहे. मार्ग निर्देशक कोणी दुसरा अवश्य होऊ शकतो, परंतु तारक नाही. *असा आहे हा भय व अशी आहे या भवाची उत्पत्ती आणि असा आहे या भवाचा निरोध, ज्याने या भव निरोधाच्या मार्गाला योग्य प्रकारे समजून घेतले आणि स्वतः त्यावर योग्य प्रकारे चालून खरोखर ज्याने आपल्या भवाचा निरोध केला, तो खरोखर मुक्त आहे, अन्य सर्व भ्रमित आहेत.*_
_त्यामुळे या, या मोहबंधन व भवबंधनातून सुटकेसाठी शील, समाधी व प्रज्ञेचा नियमित रूपाने अभ्यास करून धर्मात पुष्ट होऊ आणि सर्व बंधनांपासून मुक्ती प्राप्त करू. यातच आम्हा सर्वांचे मंगल कल्याण सामावले आहे._
✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹
*_लेखक :- कल्याणमित्र सत्यनारायण गोयन्का_*
_बुद्धवर्ष २५५८, फाल्गुन पौर्णिमा, ५ मार्च, २०१५ वर्ष १ अंक ११_
*_संकलन :- महेश कांबळे_*
*_दिनांक :-_* २४/०१/२०२५
✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹
No comments:
Post a Comment