Thursday, 29 February 2024

पाली पाठ ८

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_पाली पाठ_*

*_भदंत सिलवंस, डॉ नीरज बोधी_*

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2024/02/blog-post_29.html

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_!! भाग ८  !!_*

 _*अव्ययीभाव समास*_

_जेव्हा एखाद्या अव्ययासोबत समास होतो तेव्हा त्याला अव्ययी भावसमास असे म्हणतात._

समास        अर्थ

अधित्थि = स्त्रीयांविषयी

सब्रह्मं = ब्रम्हासोबत

सुभिक्खं = अन्न-पानाने पूर्ण

उपकुम्भं = घड्याजवळ

उपनगरं = नगराजवळ

सतिणं = गवताजवळ

समक्खिकं = माशी सोबत

निम्माक्खिकं = माशांरहित

दुस्साद्दिकं = शब्दरहित

नित्तिणं = तृणरहित

अन्वद्धमासं = प्रत्येक अर्धा महिना

अनुरूपं = रूपाच्या योग्य

यथासत्ति = यधाशक्ती

अनुरथं = रथाच्या मागे

सचक्कं = चक्रासोबत

सधुरं = ओझ्यासहित


*_!!  वाक्य  !!_*

_*१) अधित्थि समताभावं भवतु।* = स्त्रीयाविषयी समताभाव असावा._

_*२) सब्रह्म चतु गुणं सन्ति।* = बह्या सोबत चार गुण आहेत._

_*३) मम गेहं सुभिक्खं भवतु।* = माझे घर अन्न-पाण्याने पूर्ण असावे._

_*४) मम वत्थं उपकुम्भं सन्ति।* = माझे वस्त्र घड्याजवळ आहेत._

_*५) तं उपनगरं विमानपत्तनं अत्थि।* = त्या नगराजवळ विमानतळ आहे._

_*६) उरगो तत्थसतिणं किलति।* = साप तेथे गवताजवळ खेळत आहे._

_*७) समक्खिकं रोगं तणोति।* = माशीसोबत रोग पसरतो._

_*८) इमं भूमि निम्मक्खिकं अत्थि।* = ही जागा माशारहित आहे._

_*९) दुस्सद्दिकं भावना भवति।* = शब्दरहित भावना प्रिय असते._

_*१०) सो नित्तिणं भूमिय कुटिं करोति।* = तो तृणरहित जागेवर कुटी बनवितो._

*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 

*_संकलन - महेश कांबळे_*

*_दिनांक :- २९/०२/२०२४_*

*_संदर्भ :-_*

*_१) विजित संग्राम, मासिक जानेवारी२०१५ अंक ७८, वर्ष सातवे_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

Tuesday, 27 February 2024

पाली पाठ ७

 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_पाली पाठ_*

*_भदंत सिलवंस, डॉ नीरज बोधी_*

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2024/02/blog-post_27.html

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_!! भाग ७  !!_*

*_सूचना :-  आपण सर्वांनी "पाली भाषेचा" अभ्यास करावा आणि आपल्या जवळील विद्यापीठात "पाली भाषा" शिकण्यासाठी प्रवेश घ्यावा ह्या उद्देशाने सदर सत्र हे काही मोजकेच दिवस सुरू करण्यात येत आहे._*

                                      *_ !! वाक्य !!_*

_*१) तापसो वने विचरति ।* = तपस्वी वनात विचरण करतो._

_*२) अहं अभिज्झालु नत्थि।* = मी लोभी नाही._

_*३) दयालु दानं देति।* = दयावान दान देतो._

_*४) जटिलो जटं मुञ्चति।* = जटाधारी जटा सोडतो._

_*६) अहं जटं कन्तति।* = मी जटा कापतो._

_*७) सीलवा कुहिं गच्छन्ति।* = शीलवान कुठे जातात._

_*८) सीलवा कुत्र वसन्ति।* = शीलवान कुठे राहतात._

_*९) सीलवो मुसा न वदति।* = शीलवान खोटे बोलत नाही._

_*१०) सीलवो पिसुणा वाचा न वदति।* = शीलवान चुगली करीत नाही._

_*११) अण्णवे उदधि अत्थि।* = समुद्रात फार पाणी आहे._

_*१२) अण्णवो निल वण्णो अत्थि।* = समुद्र निळ्या रंगाचा आहे._

_*१३) सो मायावी पुरिसो अत्थि।* = तो माया दाखविणारा पुरूष आहे._

_*१४) अहं इमाय गेहस्स सामी अत्थि।* = मी ह्या घराचा स्वामी आहे._

_*१५) सुवामी धनं रक्खति।* = अधिकार ठेवणारा धनाला राखतो._

_*१६) सा अङ्गना इत्थि अत्थि ।* = ती सुंदर शरीराची स्त्री आहे._

_*१७) अच्छो लोमसो अत्थि।* = अस्वल लोम असणारा आहे._

_*१८) पुत्तिमो पुत्तस्स सद्धिं गच्छति।* = पुत्रवाला पुत्रासोबत जातो._

_*१९) सेनियो असिं ठपेति।* = सेनावाला तलवार ठेवतो._

_*२०) सो लक्खणो विञ्ञु अत्थि।* = तो धनवाला विज्ञ (ज्ञानी) आहे._

*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 

*_संकलन - महेश कांबळे_*

*_दिनांक :- २७/०२/२०२४_*

*_संदर्भ :-_*

*_१) विजित संग्राम, मासिक जून २०१२ अंक ४७, वर्ष चोथे_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

Monday, 26 February 2024

धम्म-संस्कारांची आस !

 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_धम्म-संस्कारांची आस !_*

*_विमलकित्ती गुणसिरी_*

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2024/02/blog-post_26.html

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

        _*'अविज्जा पच्चया संखारा' म्हणजे अविद्येतून संस्कार घडतात. 'संखारा पच्चया विञ्ञाण' म्हणजे त्या संस्कारातून विज्ञान घडते आणि 'विञ्ञाण पच्चया नाम-रूप' म्हणजे पुढे त्या विज्ञानातून शरीर आणि मन घडते. तथागत भगवान बुद्धांनी जाणलेली मनुष्य जीवनाची पूर्वपिठीका अशा प्रकारची आहे.*

     _*विञ्ञाण म्हणजे चेतना शक्ती. त्याला आधुनिक विज्ञानाच्या इंग्लिश भाषेत 'कॉन्शसनिस' 'Consciousness' असे म्हणतात. ही चेतनाशक्ती पुन्हा पुन्हा निर्माण होणे आणि क्षय पावणे या प्रक्रियेत अडकलेली असते. त्यामुळे प्राण्यांचा जन्म आणि मृत्यू होत राहतो. ही चेतनाशक्ती परिवर्तनशील असल्याने तिला तथागत भगवान बुद्धांनी नित्य स्वरूपाचा व कधीही न बदलणारा असा आत्मा मानले नाही.*_ 

    _*अविद्येच्या संस्कारातून या चेतनाशक्तीची जी काही प्रवृत्ती बनलेली असते, त्यानुसार ती चेतनाशक्ती माणसाच्या जीवनकाळात त्याचा स्वभाव बनते आणि त्या स्वभावनुसार प्रत्येक प्राणी वागत असतो. त्यामुळे मनुष्यप्राण्यात एक सारख्या स्वभावाची माणसे असत नाहीत. अविद्येच्या कमी-अधिक प्रभावामुळे त्यांचे स्वभाव विभिन्न बनलेले असतात. परंतु त्यांच्या एकंदरीत जीवनातील काही संस्कारात खूप साम्य असते. ते प्रामुख्याने चित्तमलाच्या स्वरूपात असते. त्यालाच लोभ, द्वेष आणि अज्ञान असे म्हटले जाते. या मूळ संस्कारामुळे मनुष्य आपल्या जीवनात आसक्ती ठेऊन अहंकारी, स्वार्थी, द्वेषी, मत्सरी आणि मूढ बनतो. त्यामुळे तो कायम दुःखात जगत राहतो आणि त्याला सर्वात मोठे दुःख मरणाचे वाटते. म्हणून माणूस मरणास सर्वात जास्त भीत असतो. मरणामुळे आपले सर्व काही गमावले जाते, ते त्याला नकोसे वाटते. परंतु मरण तर चुकत नाही.* म्हणून अनेक धर्मानी आत्मा अमर असल्याची कल्पना करून माणसाला काही दिलासा देण्याचा प्रयत्न केला. त्याला मेल्यानंतर स्वर्गसुख मिळेल अशी आशा दाखवून त्याला निरर्थक कर्मकांडात आणि पूजा-प्रार्थनेत अडकवून त्याचे भौतिक शोषण सुरू केले. *तथागत भगवान बुद्धांनी मात्र माणसाला मूळ सत्त्य त्यांनी जसे पाहिले - जाणले तसेच पाहाण्यास शिकविले. आपल्या चित्तशक्तीत भिनलेल्या त्या लोभ, द्वेष आणि अज्ञानाच्या विषाला दूर करून जन्म-मृत्याच्या फेऱ्यातून मुक्त होऊन ईहलोकीच सुखी होण्याचा मार्ग दाखविला. त्यांचे ते मार्गदर्शन स्वानुभूतीतून साकारलेले प्रत्यक्ष सत्त्य होते.* म्हणून त्यांनी स्पष्ट शब्दात म्हटले आहे की, *"यं मया सामं दिट्ठं तमहं वदामि।"* म्हणजे जे मी प्रत्यक्ष पाहिले, अनुभविले तेच मी आपणास सांगतो आहे. आणि त्या सत्त्याला जाणण्याचा मार्ग म्हणजे आपापल्या चित्ताची परिशुद्धी होय आणि ती प्रत्येकाला स्वतःच करायची असते. तोच त्यांचा धम्म होय. म्हणून प्रत्येकाला धम्माचे प्रत्यक्ष आचरण करूनच त्याचा लाभ घेता येतो. *धम्म केवळ मानण्याची किंवा विश्वास ठेवण्याची गोष्ट नाही. धम्माला मानले की आपले काम झाले असे नाही. तर धम्माप्रमाणे वागून पाहिले तरच अपले काम झाले असा त्याचा अर्थ आहे.*_

                _यावरून आपल्या लक्षात येईल की, *धम्मामध्ये संस्कारांचे किती महत्त्व आहे. संस्कार म्हणजे चित्त-प्रवृत्ती होय. जो विचार मनात भिनल्यामुळे त्या विचाराप्रमाणेच वागण्याची मनाला प्रेरणा मिळते आणि त्याप्रमाणे वारंवार वागून माणसाला तशीच सवय लागते. अशा प्रकारे संस्कार घट्ट होत असतात. तेव्हा त्याला सवय म्हटले जाते. सवय ही भावनात्मक प्रवृत्ती बनते आणि पुढे कोणताही विचार न करता किंवा त्या सवयीच्या बऱ्यावाईट परिणामांची मुळीच पर्वा न करता माणूस सवयीचा गुलाम बनतो. त्याची ही मानसिक गुलामगिरी म्हणजे पराकोटीचे अज्ञान होय. या अज्ञानाची त्याला काहीच जाणीव नसल्यामुळे तो बहुदा बुद्धीवादी असला तरी अज्ञानीच राहतो. अशा वेळी आपण कळते पण वळत नाही असे म्हणतो.* सवय ही एक प्रकारे नशेची किंवा मोहाची अवस्था असते. म्हणून *अज्ञानाला पाली भाषेत 'मोह' किंवा संमोह असे म्हणतात.* या मोहरूपी मूलभूत *अज्ञानामुळे माणूस लोभाचा आणि द्वेषाचा शिकार बनतो आणि आयुष्यभर त्याप्रमाणे वागत राहून दुःखच दुःख निर्माण करीत असतो. त्यातून त्याची मुक्ती कोणत्याही बाह्य शक्तीच्या पूजा-अर्चनेने किंवा कर्मकांडाने किंवा व्रतवैकल्याने होऊ शकत नाही. कारण की प्रत्येकाचे मन फक्त त्यालाच जाणता येते आणि त्यातील दोष त्यालाच दूर करता येतात.* हे सत्त्य तथागत भगवान बुद्धांनी स्वप्रयत्नांनी जाणले आणि त्याप्रमाणे प्रत्यक्ष करून सर्व दुःखमुक्त झाले. म्हणून त्यांनी निक्षून सांगितले आहे की,_ 

*'मनोपुब्बङ्गमा धम्मा मनोसेट्ठा मनोमया।* 

*मनसा चे पदुट्ठेन भासति वा करोति वा।।'* 

            _*म्हणजे प्रवृत्ती मनातूनच उदय पावतात, मनातही त्या श्रेष्ठ असून मनोमयच असतात त्यातून प्रगट झाल्याने माणसाला त्याप्रमाणेच भासते आणि करावेसे वाटते.* पुढे म्हटले आहे की, *'ततो'नं दुक्खमन्वेति, चक्कं'व वहतो पदं।'* म्हणजे माणसाने जर दुःखजनक वृत्तीने वर्तन केले तर ज्याप्रमाणे बैलगाडीच्या बैलाच्या मागून चाक जाते त्याप्रमाणे माणसाच्या वागण्यातून दुःख निर्माण होते. तसेच *'ततो'नं सुखमन्वेति छाया'व अनपायिनी।।'* म्हणजे माणसाने जर सुखजनक वर्तन केले तर कधीही साथ न सोडणाऱ्या सावलीप्रमाणे सुख त्याचे मागून येते._

                _हे स्पष्ट करताना *डॉ. आंबेडकरांना आपल्या भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म' ग्रंथात लिहिले आहे की, 'लोभाने लुब्ध, रागाने क्षुब्ध आणि मोहाने (अज्ञानाने) मूढ झाल्यामुळे माणसे स्वतःच्या व इतरांच्या दुःखाबद्दलचे विचार मनात घोळवू लागतात आणि त्यामुळे त्यांना मानसिक वेदना आणि पिडा अनुभवाव्या लागतात. (३.३.३/२९)* पुढे ते म्हणतात की, *'भगवान बुद्धांच्या मते.. सत्प्रवृत्ती हीच चिरस्थायी चांगुलपणाचे अधिष्ठान आणि हमी आहे. म्हणूनच भगवान बुद्धांनी चित्ताच्या साधनेला म्हणजेच माणसाच्या वृत्तीला सुसंस्काराने वळण लावण्याला अगदी पहिले स्थान दिले आहे. (३.३.३/३१-२) त्यांनी पुढे मनाच्या सामर्थ्याचे वर्णन करताना म्हटले आहे की, 'माणसात इच्छाशक्ती नावाची एक शक्ती असते. जेव्हा योग्य हेतू निर्माण होतात तेव्हा या इच्छाशक्तीला जागृत करता येते व तिला गती देता येते. ...आपणास पाहिजे त्या दिशेने जाण्यासाठी आपल्या मनाला आपण वळण लावू शकतो. मन हेच आपल्याला जीवनाच्या कारागृहात बंदीवान करीत असते आणि तेच आपणाला तेथे डांबून ठेवते. पण मन जी गोष्ट निर्माण करते ती ते नष्टही करू शकते. जर मनाने माणसाला बंधनात टाकले असेल तर तेच मन योग्य दिशेने वळविल्यास त्याला बंधमुक्तही करू शकते. (२.२.४) यावरून धम्म-संस्कारांनी मनाला वळण लावण्याचे महत्त्व आपल्या लक्षात येईल.*_

                    _*तथागत भगवान बुद्धांनी धम्म-संस्कार दोन प्रकारचे मानलेले आहेत. एक दुःखजनक संस्कार ज्याला त्यांना अकुशल म्हटले आहे आणि दुसरे सुखजनक संस्कार ज्यांना त्यांनी कुशल म्हटले आहे. अकुशल म्हणजे लोभ, द्वेष आणि मोहयुक्त मनोप्रवृत्ती घडविणारे संस्कार होत आणि कुशल म्हणजे त्यापासून मुक्त दान, मैत्री आणि प्रज्ञायुक्त मनोप्रवृत्ती घडविणारे संस्कार होत. दुःखयुक्त संस्कारांना त्यांनी पापमय म्हटले आहे, तर सुखयुक्त संस्कारांना पुण्यमय म्हटले आहे. म्हणजेच अकुशल म्हणजे पाप आणि कुशल म्हणजे पुण्य होय. हीच खरी पाप-पुण्याची व्याख्या होय आणि मानवी जगाच्या इतिहासात ती तथागत भगवान बुद्धांशिवाय इतर कोणी केलेली नाही, हे आवर्जून लक्षात घेतले पाहिजे.*_ 

                _म्हणूनच *बुद्धांचा धम्म अवघ्या तीन वाक्यात सांगितला जातोः ''सब्बपापस्स अकरणं, कुसलस्स उपसम्पदा । सचित्तपरियोदपनं, एतं बुद्धान सासनं।" (धम्मपद, १८३) म्हणजे, कोणत्याही प्रकारचे पाप न करणे, पुण्यकारक कर्माचा अंगिकार करणे, त्यासाठी आपल्या चित्ताची (लोभ, द्वेष आणि अज्ञानापासून) शुद्धी करणे, हेच बुद्धांचे अनुशासन (धम्म शिकवण) होय.* अशा प्रकारे धम्म-जीवनमार्ग म्हणजे आपल्या मनाला प्रयत्नपूर्वक सतत सुसंस्कारीत करण्याचे आचरण होय. यासाठी धम्म-संस्कारांची गरज आहे. हे धम्म-संस्कार मिळविण्यासाठी आणि त्यांचे पालन करून पाहाण्यासाठी म्हणून बुद्धविहारांची आणि तेथे प्रयत्नपूर्वक आचरण करून दाखविण्यात दक्ष असणाऱ्या संघाची गरज आहे. तथागत भगवान बुद्धांनी आचरणशील लोकांच्या परस्परोपयोगी सामूहिक अस्तित्वाला संघ म्हटले आहे. त्यांच्या दृष्टीने असा संघ म्हणजे प्रत्यक्ष धम्म-जीवनप्रवाहात पूर्णपणे वाहत राहणाऱ्या आणि त्यातून कधीच मागे न फिरणाऱ्या अनुयायांचा संघ होय असे अनुयायी भिक्खु, भिक्खूनी, उपासक आणि उपासिका अशा चार प्रकारचे असतात. *केवळ भिक्खू-भिक्खूनींचा संघ म्हणजे खरा संघ नव्हे, तर भिक्खू-भिक्खूनी आणि उपासक-उपासिका अशा दोन्ही प्रकारच्या अनुयायांचा मिळून होतो तो संघ असतो. त्याला त्यांनी श्रावक-संघ (पालीमध्ये सावकसंघो) असे म्हटलेले आहे.*_

                _*श्रावक म्हणजे कमीत कमी श्रोतापन्न (पाली: सोतापन्न) या अवस्थेला पोहोचलेला म्हणजेच ज्याच्या कुशल प्रवृत्ती पक्क्या झाल्या आहेत असा मनुष्य होय. ज्यांच्या कुशल प्रवृत्ती पक्क्या होतात तेच पुढील प्रगती करू शकतात. त्यांना सकदागामी, अनागामी आणि शेवटी अर्हत म्हणजे दुःखमुक्त असे म्हणतात. जरी श्रोतापन्न नसले तरी भिक्खू- भिक्खूनींना विशेष महत्त्व यासाठी दिले जाते की, एक तर ते आपल्या अस्तित्त्वासाठी पूर्णपणे गृहस्थांवर अवलंबून असतात आणि दुसरे म्हणजे सांसारीक जीवनाचा त्याग करून पूर्ण वेळ केवळ धम्माचे अध्ययन, आचरण आणि त्याचा इतरांना उपदेश करण्याचेच कामात मग्न राहतात म्हणून होय.* पूर्ण वेळ धम्मरत राहिल्यामुळे धम्म- संस्कार अनुभविण्याची आणि ते इतरांना देण्याची त्यांची क्षमता अधिक असू शकते. *परंतु जर भिक्खू-भिक्खूनी धम्मरत नसतील तर ते गृहस्थांच्या धम्मश्रद्धेला अस्थीर करून धम्माला धोकादायक होऊ शकतात. म्हणून आचरणहीन भिक्खू-भिक्खूनींपासून दूर राहण्याचा आणि त्यांचे पोषण न करण्याचा भगवान बुद्धांनी उपदेश केलेला आहे.* धम्म-संस्कार जोपासून धम्म-श्रद्धा पक्की करण्यास योगदान देणे हेच भिक्खू-भिक्खूनीचे परम कर्तव्य आहे. त्यासाठी बुद्धविहारे आणि दानाचा आधार देणे हे गृहस्थ अनुयायांचे कर्तव्य आहे. अशा प्रकारे धम्म-जीवनमार्गाचा गाभा म्हणजे धम्म-संस्कार होत आणि ते रूजविण्याची यंत्रणा म्हणजे भिक्खू-भिक्खूनी संघाचे नेतृत्त्व आणि गुहस्थांचे दातृत्त्व यातून साकारलेले संघ जीवन होय. म्हणून संघ जीवन हे प्राथमिक महत्वाचे असून त्यामुळेच धम्म-जीवन साकार होऊन बुद्ध जीवनाकडे वाटचाल शक्य होत असते._

         *'संघ सरणं गच्छामि' ला भगवान बुद्धांनी प्रत्यक्ष आपणाएवढे आणि धम्माएवढे महत्त्व को दिले याचे मर्म यावरून लक्षात येईल.* असे हे संघ-जीवन रचण्याचे मूलभूत कार्य *डॉ. आंबेडकरांनी धम्मदीक्षेच्या अगोदरच हाती घेतले होते. त्यासाठी त्यांना बेंगलोरला एक बुद्धिस्ट रिलिजिअस सेमिनरी स्थापन करून तिचे संचालन ब्रह्मदेशच्या भिक्खू संघाकडे सोपायचे होते. परंतु तसे काही घडले नाही.* प्रत्यक्ष डॉ. आंबेडकरांच्या अनुयायांनीसुद्धा हे कार्य हाती घेण्याचा कधी प्रयत्न केला नाही. परिणामी भारतातील धम्मक्रांतीची प्रचंड पिछेहाट होत गेली. ती अजूनही चालू आहे. बौद्ध समाजच मुळी धम्म-संस्कारांपासून वंचित राहिला आहे. ते रूजविण्याची यंत्राणा वर नमूद केल्याप्रमाणे आहे, परंतु ती कोठेही कार्यरत नाही. *बुद्ध विहारे खूप आहेत, परंतु त्यात भिक्खू-भिक्खूनींना जागा नाही. भिक्खू-भिक्खूनीसुद्धा योग्य प्रकारे प्रशिक्षित नाहीत, म्हणून संघटीत आणि कार्यक्षम नाहीत, हेही खरेच आहे.*_

                _*अनेक विहारे अज्ञानी आणि आचरणहीन गृहस्थांच्या मालकीची आणि त्यांनी आपापल्या मर्जीनुसार चालविलेली आहेत. तेथे प्रशिक्षित, आचरणशील भिक्खू- भिक्खूनींना धारा नाही आणि कोठे असलाच तर त्यांच्यापासून शिकायला कोणाला वेळ नाही. चुकून-माकून कार्यक्रमाच्या निमित्ताने काही शिकविले गेले तर ते श्रद्धेने आचरणात आणायला कोणाला सवड नाही. म्हणून धम्मकार्य केवळ प्रसंगापुरते शोभेचे कार्य झालेले आहे. त्यात मग माणसे जमविण्यासाठी गायनपार्ट्या आणि ऑकेस्ट्राच्या करमणूकीच्या कार्यक्रमाची फॅशन रूढ झालेली आहे. नाव धम्मकार्याचे आणि गाव करमणूकीच्या चंगळवादाचे, असा प्रकार सर्वत्र घडत आहे.* धम्मश्रद्धेच्या अभावाचे आणि धम्म- संस्कार शून्यतेचे हे ठळक लक्षण आहे. *बौद्ध सणावाराच्या दिवशीसुद्धा आपला वेळ धम्म शिकण्या- समजण्यासाठी आणि थोडेफार का होईना, परंतु आचरण करून पाहाण्यासाठी उपयोगात आणावा आणि आपली बुद्ध, धम्म आणि संघाप्रती श्रद्धा व्यक्त करावी असे कोणाला वाटत नाही, हेच मोठे आश्चर्य आहे.* म्हणून आज गरज आहे ती धम्म-संस्कारांचे पुनरूज्जीवन करून त्यांची रूजवात करण्याची. त्यासाठी *प्रशिक्षित भिक्खू-भिक्खूनी आणि उपासक-उपासिकांची निर्मिती करणे हे प्रथम कर्तव्य आहे.* अशा प्रशिक्षित प्रचारकांनी सर्वसामान्य लोकांत वावरून त्यांना धम्मदीक्षेसह नामांतर आणि कर्मांतर शिकविणे गरजेचे आहे. बौद्ध जीवनमार्गाला, सणावारांना आणि उत्सवांना मूळ संस्कृतीच्या कोंदणात गुंफणे आवश्यक आहे. ते सर्व आज भरकटत चाललेले आहेत. संघजीवन, संघदान आणि संघसेवेचा आदर्श प्रस्थापित करणे आवश्यक आहे. त्यातून बौद्ध समाजाचे सुसंघटन होणे शक्य आहे. सुसंघटनाशिवाय सामाजिक आणि आर्थिक प्रगती शक्य नाही. तसेच अन्याय - अत्याचारापासून सुटकाही नाही. *आज मितीला केवळ बौद्ध समाजातच नव्हे, तर अवघ्या दलित वर्गातील सत्तर टक्के विद्यार्थी मॅट्रिकपूर्वीच शाळेतून गळताहेत. तसेच सत्तर टक्के लोग गरीबीचे जीवन जगताहेत. या बहुजनांच्या मुक्तीचा एकच खात्रीचा मार्ग आहे, आणि तो म्हणजे धम्मक्रांतीचा मार्ग होय. परंतु त्याचा वसा घेतलेलेच जर नीटपणे धम्म- संस्कार घेऊ शकले नाहीत, तर दुसऱ्याला ते काय देऊ शकणार आहेत ?*_

            _*धम्म-संस्कारातील पहिले पाऊल आहे ते धम्मश्रद्धा जागृत करण्याचे होय.* त्यासाठी श्रुतमय आणि चिंतमय प्रज्ञेला उत्तेजीत करून सम्यकदृष्टीच्या विकासाचे संस्कार करावयाचे असतात. त्यामध्ये कमीत कमी बुद्धानुसति, धम्मानुसति, संघानुसति, शीलानुसति, त्यागानुसति याचे प्राथमिक प्रशिक्षण घेऊन त्यांचा सराव करायचा असतो आणि सतत चिंतन-मननातून ते सत्त्य जाणायचे असते. पुढे चालून मग मनुष्य आनापानसति, कायानुसति आणि मरणानुसति यांचे प्रशिक्षण घेऊन विपस्सना साधना करावयास सिद्ध होत असतो. या संस्कारात माणसाची बौद्धिक आणि भावनिक शक्ती विकास पावून त्याचे जीवन ताण-तणावमुक्त आणि संतुलीत होत असते. माणूस खऱ्या अर्थाने श्रद्धावान बनून आचरणशील होत असतो आणि आपल्या जीवनात त्याचा प्रत्यक्ष सकारात्मक अनुभव घेत राहतो. त्याचे विचार शुद्ध आणि सात्विक होत जातात. *बुद्धविहारे अशा या कम्मट्ठानाच्या म्हणजे मानसिक कार्यसिद्धीच्या कामासाठी वापरावयाची असतात.*_

        _*दुसरा धम्म-संस्कार म्हणजे मैत्री भावनेचा होय.* यात मैत्रीभावनेच्या सरावाबरोबरच संघदानाचा संस्कार सामावलेला असतो. दान भावनेतून लोभ कमी होत असतो, समाज जोडला जातो आणि बहुजनांच्या हिताचे आणि सुखाचे दृष्टीने संघाचे हातून धम्मकार्य घडत राहते. म्हणून संघाला अग्रक्रमाने दान देणे बौद्ध संस्कृतीचे फार महत्त्वाचे अंग आहे. तथागत भगवान बुद्धांनी संघाला दान देण्याच्या आचरणाला पुण्ण्याचे अमाप पीक देणाऱ्या संघरूपी शेतात बीज पेरण्याची उपमा दिलेली आहे. *'अनुत्तरं पुञख्खेतं लोकस्स'* असे म्हटले आहे. *बौद्ध राष्ट्रात अनेक लोक दररोज संघाला दान केल्याशिवाय आपला दिवस सार्थकी लागला असे समजत नाहीत.* दानाची सवय लागणे म्हणजे मैत्रीचा धम्म- संस्कार घडणे होय. त्यातून सतत सकारात्मकता वाढत जाते आणि माणसाचे जीवन शांती आणि समाधाने भरून जाते. दानातून *'दानकिरियावत्थु'* चा संस्कार घडत असतो. दान कसे द्यायचे, काय द्यायचे, केव्हा द्यायचे आणि दानातून काय लाभते, हे शिकावे लागते. त्यासाठी पुन्हा एकदा बुद्धविहारे आणि संघाची गरज पडतेच. या दोन प्रकारच्या संस्कारातून *'सब्बपापस्स अकरणं' आणि 'कुसलस्स उपसंपदा'* हे आचरण सिद्ध होत असते._

             _*तिसरा संस्कार म्हणजे भावना होय.* भावना याचा अर्थ आहे आंतरिक विकास, त्यालाच मनाची शुद्धी म्हणतात. त्यात सम्यक व्यायम, सम्यक स्मृति आणि सम्यक समाधी मुख्य असतात. त्यामध्ये 'समाधीभावना' सर्वश्रेष्ठ मानली जाते. ती पुढे सम्यक समाधीत परिवर्तीत होते. यातून सुसंस्कार घडत असतात. मनाला कायम स्वरूपाचे वळण लागत असते. *डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटल्याप्रमाणे, 'परिव्राजकांनो, लोभ, द्वेष, आळस व सुस्ती, संशय आणि अनिश्चय (अस्वस्थता)' हे पाच अडथळे होत, म्हणून हे अडथळे दूर करणे आवश्यक आहे. हे अडथळे म्हणजे बंधने होत आणि ते दूर करण्याचा मार्ग म्हणजे समाधी होय. परंतु परिव्राजकांनो, सम्यक समाधि म्हणजे समाधि नव्हे, हे लक्षात घ्या. तिचे स्वरूप अगदी निराळे आहे. समाधि म्हणजे केवळ चित्ताची एकाग्रता होय. वरील पाच अडथळ्यांना अटकाव करणाऱ्या स्वयंप्रेरित अशा ध्यानावस्थांच्या मार्गावर ती आपणास नेते यात शंका नाही. परंतु या ध्यानाच्या अवस्था तात्पुरत्या असतात. त्यामुळे अडथळ्यांना केलेला अटकाव हा देखील तात्पुरता ठरतो. मनाला स्थायी स्वरूपाचे वळण लावणे आवश्यक आहे. अशा प्रकारचे कायम स्वरूपी वळण केवळ सम्यक समाधीनेच लावता येईल. समाधीमुळे अडथळ्यांना फक्त तात्पुरता अटकाव होतो. म्हणून ती केवळ नकारात्मक स्थिती होय. तिच्यात मनाला वळण लावले जात नाही. सम्यक समाधि ही वास्तवात्मक असते. ती मनाला एकाग्रतेचे आणि एकाग्रतेच्या काळात कुशल कर्माचा विचार करण्याचे शिक्षण देते, आणि त्याला अनुसरूनच अडथळ्यांमुळे निर्माण होणाऱ्या अकुशल कर्माकडे आकर्षित होण्याची मनाची प्रवृत्तीही नष्ट करते. सम्यक समाधि मनाला चांगल्या गोष्टींचा विचार करण्याची व चांगल्या गोष्टींचाच नेहमी विचार करण्याची सवय लावते. सम्यक समाधि चांगल्या कृती करण्यास आवश्यक अशीच प्रेरणा मनामध्ये निर्माण करीत असते.” (२.२.५)*_

                _*कोणताही माणूस एकाएकी समाधी भावनेच्या नादी लागत नाही. त्याला हहूहळू त्याची सवय व्हावी लागते. ते कार्य बुद्धविहारांतून व्हावे लागते. लहान-थोर, शिक्षित-अशिक्षित, श्रीमंत-गरीब, नेता- अनुयायी असा कोणताही भेदाभेद न करता, सर्व बौद्धांना अशा प्रकारे सुसंस्कार करून घ्यावे लागतात. म्हणून प्रत्येकानेच विहारांमध्ये नियमित जावे लागते. परंतु जर विहारांमध्ये असे काही कार्य होत नसेल, तर तेथे कोण कशाला जाईल आणि काय मिळविल?* खरं तर विहारात जा म्हणणारेसुद्धा स्वतः कधी जात नसतात. *डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर बुद्धविहारे एखाद्या सेमिनरीप्रमाणे धम्म- संस्काराची केंद्रे बनली नाहीत. त्यामुळे धम्मक्रांतीची जोरदार पिछेहाट झालेली आहे.* धम्म-संस्कारामध्ये मुलांवर सुसंस्कार  घडविण्यासाठी आणि त्यांची वृत्ती वैज्ञानिक बनविण्यासाठी खास कार्यक्रम राबविले जातात. त्यासाठी दर रविवारी सकाळी विहारांमध्ये संडे स्कूल्स भरविली जातात. तेथे प्रशिक्षित लोक त्यांना अनेक प्रकारच्या उपक्रमांतून प्रशिक्षण देत असतात. त्यासाठी बऱ्याच सोई निर्माण कराव्या लागतात. केवळ भाषणांच्या माध्यमातून ते प्रशिक्षण होत नसते. अशा सोई विहारांतून निर्माण होतील तो सुदिन समजायचा. पण त्या निर्माण केल्याशिवाय काही गत्यंतर नाही, हे मात्र खरे!_

                _आता तरी सावध होऊन सर्व बौद्धांनी धम्माच्या सुसंस्काराची कास धरावी आणि त्यासाठी तरी योग्य त्या भिक्खू-भिक्खूनी संघाला जवळ करून त्यांचे कडून धम्मसेवा करून घ्यावी, हीच सदिच्छा._

*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 

*_संकलन - महेश कांबळे_*

*_दिनांक :- २६/०२/२०२४_*

*_संदर्भ :-_*

*_१) विजित संग्राम, मासिक मे २०१४ अंक ७०, वर्ष सहावे_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

Saturday, 24 February 2024

पाली पाठ ६

 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_पाली पाठ_*

*_भदंत सिलवंस, डॉ नीरज बोधी_*

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2024/02/blog-post_24.html

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_!! भाग ६  !!_*

*_सूचना :-  आपण सर्वांनी "पाली भाषेचा" अभ्यास करावा आणि आपल्या जवळील विद्यापीठात "पाली भाषा" शिकण्यासाठी प्रवेश घ्यावा ह्या उद्देशाने सदर सत्र हे काही मोजकेच दिवस सुरू करण्यात येत आहे._*

_*तद्धितान्त शब्द व अर्थ*_

द्विधा = दोन भागात

एकधा = एका भागात

बहुथा = अनेक भागात

द्वेधा, द्विधा = दोन प्रकारे

तेधा, तिधा = तीन प्रकारे

एकज्झं = एक प्रकारे

द्विक्खत्तुं = दोन वेळा

कतिक्खतुं = किती वेळा

बहुक्खंत्तु = अनेक वेळा

खण्डसो = खंड खंड करून

एकेकसो = एक एक करून

पुथुसो = विस्ताराने

सब्बसो = सर्व प्रकारे

धवली करोति = शुभ्र करतो

धवली सिया = शुद्ध व्हावे, उजळ व्हावे

धवली भवति = उजळ होतो, शुभ्र होतो

_*वाक्य*_

_*१) पाकित्तान द्विधा विभत्त अहोसि।* = पाकिस्तान दोन भागात विभक्त होता._

_*२) भारतस्स एकधा मरूथलं अत्थि।* = भारताच्या एका भागात वाळवंट आहे._

_*३) भारतस्स बहुधा अटवियो सन्ति।* = भारताच्या अनेक भागात जंगले आहेत._

_*४) इमं द्वेधा अत्थं ब्याकरेति।* = हे दोन प्रकारे अर्थ सांगितले आहे._

_*५) उपासका तेधा वन्देन्तु।* = उपासकांनी तीन प्रकारे वंदन करावे._ 

_*६) एकज्झं एसो धम्मस समादियाति।* = एकप्रकारे हा धम्माचे ग्रहण करतो._ 

_*७) द्विक्खत्तु सो धम्मं सवणं करोति।* = दोनवेळा तो धम्म श्रवण करतो._

_*८) तिक्खत्तुं अहं अभिवादेमि।* = तीनवेळा मी अभिवादन करतो._

_*९) कतिक्खत्तुं अहं ओसधं आहरामिं।* = किती वेळा मी औषध आणले ?_

_*१०) बहुक्खत्तुं दस्सनियं ठाणं गच्छतु।* = अनेकवेळा दर्शनीय स्थळी जावे._

_*११) यट्ठिय खण्डसो तो पक्कमति।* = काठीचे खंड खंड करून तो निघून जातो._

_*१२) एकेकसो त्वं गुणं पकाससि।* = एक एक करून तू गूण प्रकट करतोस._

_*१३) पुथुसो सो अत्यं वदति।* = विस्ताराने तो अर्थ सांगतो._

_*१४) सो वत्थं धवली करोति।* = तो वस्त्र शुभ्र करतो._

_*१५) सीलेन पुरिसो धवली भवति।* = शीलाने पूरूष उजळ होतो._

*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 

*_संकलन - महेश कांबळे_*

*_दिनांक :- २४/०२/२०२४_*

*_संदर्भ :-_*

*_१) विजित संग्राम, मासिक जानेवारी २०१४ अंक ६६, वर्ष सहावे_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

Friday, 23 February 2024

धर्माचे सद्गुण

 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_धर्माचे सद्गुण_*

*_डॉ. के. श्री. धम्मानंद_*

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2024/02/blog-post_91.html

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

                      _*सामान्यपणे भगवान बुद्धांच्या उपदेशांना धम्म (धर्म) असे म्हणतात.* धम्म काही दंतकथा, पुराणकथा, प्रकटन, अटकळ किंवा धार्मिक वळण नव्हे, 'धम्म', जगात सदा सर्वदा विद्यमान असणारे 'सत्य' असून ते एका संबोधिप्राप्त आचार्यांनी शोधले. *भगवान बुद्ध हे त्या धम्माचे एकमेव शोधकर्ता असल्याने 'धम्माला, 'बौद्ध धर्म' असे नाव पडले.* सिद्धार्थ गौतमांनी स्वतः त्याचा साक्षात्कार केला आणि ते जगासाठी उघड केले. त्यांनी शोधलेल्या धम्माला योग्यप्रकारे समजणे साधारण लोकांच्या आवाक्याबाहेर आहे. कारण साधारण जनांचे मन भ्रमाच्या ढगांनी सदा झाकोळलेले असते._

           _धम्माचे अनेक सद्गुण आहेत ते त्याला 'लोकोत्तर' किंवा 'उदात्त' आणि परिपूर्ण बनवितात. तरी त्यांच्या तीन पैलूंची नोंद घ्यावी लागते._

_*प्रथम पैलू* धर्माचे सिद्धांत त्याच्या मूळ शुद्धतेत शिकावे लागतात._

_*दुसरा पैलू* भगवान बुद्धांनी सांगितल्याप्रमाणे - सब्ब पापस्स अकरणं, कुसलस्स उपसंपदा, सचित्त परियोदपणं अर्थात कोणतेही पापकर्म न करणे, कुशल कर्म करणे आणि चित्त शुद्धी करणे ह्या उपदेशाला प्रायोगिक अंग बनवून त्याप्रमाणे जीवन जगणे._

_*तिसरा पैलू* सर्व घटनांचे परिपूर्ण सत्य जाणण्यासाठी प्रज्ञेचा विकास करणे._

_धम्माच्या अनेक गुणांपैकी सहा वैशिष्ट्यांचा उल्लेख अधिकृत ग्रंथांत आढळतो बौद्धांच्या दैनंदिन पूजेत ह्या गुणांचे उच्चारण केले जाते. पाली भाषेत प्रकाशित झालेले हे सहा गुण असे आहेत- १) स्वाक्खातो भगवता धम्मो (२) सन्दीट्ठिको (३) अकालिको (४) एहिपस्सिको (५) ओपनायिको (६) पच्चतं वेदितब्बो विञ्ञुहि. उपरोक्त सहा वैशिष्टये विस्तृतपणे खाली दिली आहेत._

_*(१) स्वाक्खातो भगवता धम्मो-*_

                 _भगवान बुद्धांनी हा धम्म शोधला आणि जनहितार्थ तो प्रकट केला. (सर्वांना तो सहज समजावा म्हणून) उत्तम रितीने सांगितला. सिद्धांत, व्यवहारात उपयोगात (प्रात्यक्षिक) आणि उपलब्धी (थिअरी, प्रॅक्टिस, रिअलाइझेशन) ह्यांना एकत्र गुंफणारे समान मूल्य 'स्वाक्खातो' होय असे म्हटले जाते. लोकोत्तर विशुद्धींकडे, निब्बाणाकडे नेणारा अष्टांगिक मार्ग उत्तम रितीने सांगितला आहे. हेच बौद्ध धम्माचे 'सार' होय._

              _शास्त्यांनी (भगवान बुद्धांनी) 'धम्म' उत्तम रितीने प्रतिपादिला आहे. हा धम्म सुरूवातीला उत्कृष्ट, मध्यमवाणी उत्कृष्ट आणि शेवटी सुद्धा उत्कृष्ट आहे. कल्याणकारी आहे. त्यात परस्पर विरोध, संदिग्धता नसून तो सरळ व सुस्पष्ट असा आहे. समुद्रातील पाण्याच्या प्रत्येक थेंबाला जशी एकच चव असते, मीठाची चव असते तद्वतच धम्माला कोणत्याही काळात निब्बाणाची, परमसुखाची चव असते. धम्माची सुरूवात शीलापासून होते. शील धम्माची आधारशिला आहे. त्यावर 'मनाची शांतता' रूपी इमारत उभी केली जाते. ह्यालाच समाधि म्हणतात. समाधी परिपक्व झाल्यावर प्रज्ञेचा उगम होतो._

                   _धम्माचे ज्ञान प्राप्त करण्यासाठी प्रशिक्षकांकडून ऐकून, जटिल भगाची त्यांचेकडून उकल करून घेऊन प्रात्यक्षिक करण्यासाठी योग्य पद्धतीचा वापर समजून घ्यावा. त्यानंतर निरंतर सरावाने मनातील अडथडे (निवरणे) दूर होऊन, मन शांत, स्पष्ट आणि प्रसन्न बनते. अशी अवस्था 'अंतदृष्टी' (विपस्सना) साठी आवश्यक असते. ह्या अंतदृष्टीचा सातत्याने विकास करीत गेल्यास ह्याच जन्मी सर्वोच्च अवस्था गाठण्याची संधी मिळू शकते. जग आणि जिवित मात्र ह्यांचे विषयी बुद्धांचे स्पष्टीकरण अंतिम मानले जाते. तत्कालीन परंपरा, मान्यता, ग्रंथप्रामाण्य झुगारून बुद्धांनी आपले सिद्धांत, धम्माच्या खोल अंतरंगात शिरून अनुभवाच्या आधारावर प्रतिपादित केले, *'केवळ मी ह्यांचा शोधकर्ता हा अभिमान न धरता त्यांनी धम्म प्रकट केला धम्मोपदेश केला आणि त्यांच्या उपदेशांनी इतर सर्व उपदेशांना मागे टाकले.*_

                  _कोणत्याही तथाकथित सर्वोच्च शक्तीच्या पायावर निष्ठा अर्पण न करता बुद्धांनी प्रत्येक व्यक्तीला विचार, चिंतन स्वातंत्र्य देऊन स्वतःचा मोक्ष स्वतःच गाठण्यासाठी प्रोत्साहित केले. जगाच्या कोणत्याही भागात, कोणत्याही काळी 'धम्म' सार्वजनित आहे आणि मानवजातीच्या आत्यंतिक हिताचा आहे._

                _धम्मोपदेश करण्यापूर्वी तात्वीक व्याख्या, त्यातील शब्दांचे अर्थ वैज्ञानिक पद्धतीने स्वतः तयार केले. उदा. कर्म ह्याचा प्रचलित अर्थ 'कृति' असा होता, त्याला बुद्धांनी 'कृती' करण्यामागील प्रेरणा असा केला. जातीव्यवस्था, गुलामगिरी, स्त्रियांचा हिन दर्जा हयाला धम्माने सातत्याने विरोध केला. बुद्ध हे 'हुकमशहा' नव्हते तर ते आध्यात्मिक लोकशाहीचे शिक्षक होते._

              भगवान बुद्धांचा अनुयायी त्रिरत्नानचे अनुसरण करून, प्रयत्नांची पराकाष्ठा करून उत्तम रितीने प्रतिपादिलेल्या (स्वाक्खातो) धम्माच्या मार्गदर्शनाखाली, सुरक्षित राहून निर्वाणाच्या परमसुखाचा आनंद उपभोगतो._

_*२) सन्दिट्ठिको -*_

                 _*'धम्म' व्यवस्थित समजून त्यानुसार गंभीरपणे आणि प्रामाणिकपणे 'भावित' केला तर त्याची उपकारक फळे 'याचि देही' याचि डोळा' येथे आणि आता उपभोगता येतात असा 'सन्दिट्ठिको' ह्या शब्दाचा अर्थ आहे.* उदाहरणार्थ 'चंड' स्वभावाची व्यक्ती जी स्वतःकरिता आणि समाजाकरिता अभिशाप असते. त्याने जर बुद्धांची आणि धम्माची कास धरली (धम्माचे अनुसरण) तर ती एका नवीन जीवनाची सुरूवात करेल. त्याला संत्रस्त करणारे क्लेष नाहीसे होऊन ती चांगली व्यक्ती बनेल. सम्राट अशोकाचे जीवन पाहिल्यास बौद्ध धम्माचे अनुसरण करण्यापूर्वी त्याला 'चंड अशोक' असे नाव होते. मात्र धम्माच्या अनुसरणाने चंड अशोकाचे रूपांतर होऊन 'धम्म अशोक' म्हणून त्याची ख्याति झाली._

_*३) अकालिको -*_

                  _धम्माच्या प्रकटनापासून दिर्घ कालावधी लोटला तरी धम्म पूर्वीइतकाच ताजातवाना, टवटवीत आव्हानापलीकडे राहिला आहे. धम्माचे उपयुक्त परिणाम लगेच पाहावयास मिळतात. अत्याधुनिक वैज्ञानिक प्रगतिनंतरही धम्माचा प्रभाव तेवढाच (पूर्वी इतकाच) जाणवतो 'सत्य' जुने होत नाही. संसारातील जीवनाच्या अस्तित्वाचे सत्य धम्म प्रकट करतो त्यामुळे धम्म 'जुना' होऊ शकत नाही. जग हे अनित्य आहे, असमाधानकारक आहे आणि त्याचे कारण आहे 'तृष्णा' ह्या असमाधानाचे, दुक्खाचे कारण तृष्णा जोवर समूळ नष्ट केली जात नाही तोवर दु:क्ख, असमाधान राहील, आर्य अष्टांगिक मार्गाचे आचरण करून तृष्णा नष्ट करता येते._

_*४. एहिपस्सिको -*_

                _*ह्याचा अर्थ कोणालाही धम्माचे निरिक्षण, परिक्षण करण्याचे, कसोटीवर घासून पाहण्याचे स्वातंत्र्य आहे.* ज्यांना हा धम्म स्वीकारायचा आहे त्यांना देखील असे स्वातंत्र्य आहे. कारण धम्मात गुढ, रहस्यमय, लपविण्यासारखे काही नाही. धम्म शुद्ध आणि पारदर्शक आहे. शुद्ध सोन्याप्रमाणे आहे. बुद्ध स्वतः सांगतात-_

                _*"माझ्याप्रति असलेल्या आदरामुळे मी सांगतो म्हणून स्वीकारू नका. सोणार ज्याप्रमाणे सोने तापवून खात्री करतो त्याप्रमाणे धम्माला कसोटीवर घासून पाहा आणि नंतरच स्वीकार करा." धम्माचे 'परिक्षण करा' हे बुद्धांचे निर्भिड वक्तव्य बुद्धांचे आणि धम्माचे अचल श्रेष्ठत्व दर्शविते.*_

_*५. ओपनेयिको-*_

                     _धम्म मार्गावर आरूढ झालेले गंभीर आणि प्रामाणिक साधक पुढे- पुढे जात राहतील. अर्थात धम्म त्यांना पुढे-पुढे नेत राहील. शुद्धीकरणाच्या आणि फलप्राप्तीच्या चार अवस्था धम्मात सांगितल्या आहेत. धम्ममार्गावर चालणाऱ्या साधकाला धम्मच एका अवस्थेतून परिपक्व झाल्यावर दुसऱ्या उच्च अवस्थेकडे नेत असतो. मुक्त अवस्था गाठेपर्यंत हा प्रवास सुरू असतो._

_*६. पच्चतं वेदितब्बो विञ्ञुहि-*_

                     _विद्वान साधकांनी प्रत्यक्ष (स्वतः) वेदित (अनुभवून) करून खात्री केली आहे असा वरील वाक्याचा अर्थ आहे. दुसऱ्याकरिता धम्माचा अनुभव घेता येत नाही. *तहानलेल्या माणसाची तहान स्वतः पाणी प्यायल्याशिवाय भागत नाही त्याप्रमाणे धम्माचा अनुभव स्वतः घ्यावा लागतो. संबोधिप्राप्ती वैयक्ति असते आणि प्रज्ञावंत, विद्वानच धम्माचा अनुभव घेवू शकतात.*_

                 _*बुद्ध हे मोक्षदाता नसून मार्गदाता आहे. शिक्षक, आचार्य आहे. इतरांना दिशा दाखविणारे आहे. शील, सम्यक जीवन आणि सम्यक समाधीचा अभ्यास (सराव) साधकाने करून प्रज्ञा जागृत करायची असते आणि स्वप्रयत्नाने आपली मुक्ती साधायची असते.*_

*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 

*_संकलन - महेश कांबळे_*

*_दिनांक :- २३/०२/२०२४_*

*_संदर्भ :-_*

*_१) विजित संग्राम, मासिक जानेवारी २०१४ अंक ६६, वर्ष सहावे_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

पाली पाठ ५

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_पाली पाठ_*

*_भदंत सिलवंस, डॉ नीरज बोधी_*

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2024/02/blog-post_23.html

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_!! भाग ५  !!_*

*_सूचना :-  आपण सर्वांनी "पाली भाषेचा" अभ्यास करावा आणि आपल्या जवळील विद्यापीठात "पाली भाषा" शिकण्यासाठी प्रवेश घ्यावा ह्या उद्देशाने सदर सत्र हे काही मोजकेच दिवस सुरू करण्यात येत आहे._*

_*शब्द*_

तम = अन्धकार

तेज = तेज

उर = छाती

ओज = ओज

यस = यश

चेत = चित्त/मन

सर = तलाव/सरोवर

अय = लोखंड

तप =तप

सिर = डोके

वच = वचन

रज = धुळ

पय = दुध/पाणी

वय = वय

वास = वस्त्र

_*परिवार वाचक शब्द*_

ससुर = श्वसुर

भाता = भाऊ

पितामह = आजोबा 

अम्मा = माता/आई

मातुल = मामा

सहज = भाऊ

मातामही = आजी

धाति = दाई

मातुलानि = मामी

पितुच्छा = आत्या

मातुच्छा = मावशी

चुल्लपिता = काका

भातुज = भाचा

सस्सु = सासू

भगिनेय = जावई 

भरिया = पत्नी 

पुत्त = पुत्र

_*वाक्य*_

_*१) अहं सुरियस्स तेजं पस्सामि।* = मी सुर्याचा तेज पाहतो._

_*२) सो उरेन गच्छति।* = तो छातीने चालतो._

_*३) परिक्खाय यसं लभति।* = परिक्षेमुळे यश मिळते._

_*४) सो सरम्हि पक्खिं पस्सति।* = तो सरोवरात पक्षी पाहतो._

_*५) मयं अयस्स तन्तु वायति।* = आम्ही लोखंडाचे तार विणतो._

_*६) सुनखो रजम्हि किलेति।* = कुत्रा धुळीत खेळतो._

_*७) ञाता पयं रूचिया पिवन्ति।* = ज्ञानी आवडीने दुध पितात._

_*८) अहं वासं हरितुं आगच्छामि।* = मी वस्त्र नेण्याकरिता येतो._

_*९) तस्स सिरं भारकेन संवरति।* = त्यांचे डोके भारामुळे झाकले._

_*१०) अहं तमो युगं नस्सामि।* = मी अंधकार युग नष्ट करतो._

_*११) मातुलो अम्बं आहरति।* = मामा आंबे आणतो._

_*१२) मातामही कथं वदति।* = आजी कथा सांगते._

_*१३) अहं पितामहं सद्धि सालाय गच्छामि।* = मी आजोबासोबत शाळेत जातो._

_*१४) पितुच्छा गितं गायति।* = आत्या गाणे गाते._

_*१५) मातुच्छाय गेहं नागपूरे अत्थि।* = मावशीचे घर नागपूरात आहे._

_*१६) तस्स भारिया सारम्भ करोति।* = त्याची पत्नी भांडण करते._

_*१७) भगिनेय अतिव गुणवा अत्थि।* = जावई फार गुणवान आहे._

_*१८) सस्सु सुनिसाय पियायति।* = सासू सूनेवर प्रेम करते._

_*१९) माता सब्बाय रक्खति।* = आई सर्वांचे रक्षण करते._

_*२०) मम सहजो कम्मं करोति।* = माझा भाऊ काम करतो._

*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 

*_संकलन - महेश कांबळे_*

*_दिनांक :- २३/०२/२०२४_*

*_संदर्भ :-_*

*_१) विजित संग्राम, मासिक डिसेंबर २०११ अंक ४१, वर्ष चौथे_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

Thursday, 22 February 2024

पाली पाठ ४

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_पाली पाठ_*

*_भदंत सिलवंस, डॉ नीरज बोधी_*

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2024/02/blog-post_22.html

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_!! भाग ४  !!_*

*_सूचना :-  आपण सर्वांनी "पाली भाषेचा" अभ्यास करावा आणि आपल्या जवळील विद्यापीठात "पाली भाषा" शिकण्यासाठी प्रवेश घ्यावा ह्या उद्देशाने सदर सत्र हे काही मोजकेच दिवस सुरू करण्यात येत आहे._*

*_क्रियापद_*

_*प्रेरणार्थक क्रिया :* 'प्रेरणा' करणाऱ्याच्या अर्थामध्ये प्रेरणार्थक क्रिया होते. जेंव्हा एखादा कर्ता अन्य दुसऱ्याकडून काम करवून घेतो, तेंव्हा ती प्रेरणार्थक क्रिया होते._

_*प्रेरणार्थक रूप अर्थ*_

_कारेति, कारयति, कारापेति, कारापयति = *करवितो, करवून घेतो*_

_पाचेति, पाचयति, पाचापेति, पाचापयति = *शिजवून घेतो*_ 

_कन्देति, कन्दयति, कन्दापयति, कन्दापेति = *रडवितो*_

_कम्पेति, कम्पयति = *थरथरवितो*_

_कम्पापेति, कम्पापयति  = *कंपित करवितो*_

_चाजापेति, चाजापयति, चाजेति, चाजयति = *सोडवितो*_ 

_भोजेति, भोजयति, भोजापेति, भोजापयति = *भोजन करवितो*_

_कोधेति, कोधयति, कोधापेति, कोधापयति = *क्रोध करवितो*_ 

_खेपेति, खेपयति, खेपापेति, खेपापयति = *फेकवितो*_ 

_लेखेति, लेखयति, लेखापेति, लेखापयति = *लिहवितो*_

*_वाक्य_*

_१) सो भिक्खु झानं कारेति। = *तो भिक्खू ध्यान करवितो.*_

_२) कवि गन्थं कारयति। = *कवी ग्रंथ करवितो.*_

_३) दब्बियं सुपं पाचयति । = *कडछीत दाळ शिजवून घेतो.*_ 

_४) दाबयन्तरे भोजनं पाचापयति। = *कुकरमध्ये अन्न शिजवून घेतो.*_

_५) सो फलानं दारके कन्दयति। = *तो फळांसाठी मुलांना रडवितो.*_

_६) सा भिक्खायं ता कन्देति। = *ती भिक्षेकरिता त्यांना रडविते.*_

_७) सो खणं सरिरं कम्पेति। = *तो क्षण शरीराला थरथरवितो.*_

_८) तेन दारकेन सो रूक्खं कम्पापेति। = *त्या मुलाद्वारे तो वृक्ष कंपित करवितो.*_

_९) सा तस्स वारूणि चाजेति। = *ती त्याची दारू सोडविते.*_

_१०) सो पञ्ञाय विकारं चाजापेति। = *तो प्रज्ञेने विकार सोडवितो.*_

_११) सो तस्स हत्थेन भोजेति।= *तो त्याच्या हाताने भोजन करवितो.*_

_१२) भुपालो दास्स हत्येन भोजयति।= *राजा दासाच्या हाताने भोजन करवितो.*_

_१३) सो मित्तेन कोधेति।= *तो मित्राद्वारे क्रोध करवितो.*_

_१४) सा सामिना कोधयति।= *ती पतीद्वारे क्रोध करविते.*_

_१५) अहं तेन पुरिसेन अवसिटुं खेपयामि।= *मी त्या पुरुषाद्वारे कचरा फेकवितो.*_

_१६) सो नागेन दारू खेपापयति।= *तो हत्तीद्वारे लाकडे फेकवितो.*_

_१७) सो मित्तेन कथं लेखेति ।= *तो मित्राद्वारे कथा लिहवितो.*_

_१८) अहं दारकेन गन्थं लेखापेमि।= *मी मुलाद्वारे ग्रंथ लीहवितो.*_

_१९) तुम्हे बुद्धस्स वन्दना कारेथ ।= *तुम्ही बुद्धाची वन्दना करवावी.*_

_२०) सो तेन बन्धनं चाजयति। = *तो त्याचे द्वारे बंधन सोडवितो.*_

*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 

*_संकलन - महेश कांबळे_*

*_दिनांक :- २२/०२/२०२४_*

*_संदर्भ :-_*

*_१) विजित संग्राम, मासिक मे २०११ अंक ३४, वर्ष तिसरे_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

Wednesday, 21 February 2024

पाली पाठ ३

  🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_पाली पाठ_*

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2024/02/blog-post_21.html

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_!! भाग ३ !!_*

*_सूचना :-  आपण सर्वांनी "पाली भाषेचा" अभ्यास करावा आणि आपल्या जवळील विद्यापीठात "पाली भाषा" शिकण्यासाठी प्रवेश घ्यावा ह्या उद्देशाने सदर सत्र हे काही मोजकेच दिवस सुरू करण्यात येत आहे._*

*_शब्द_*

अज्झत्तं - स्वताशी, व्यक्तिगत. 

अधिगतो - प्राप्त केले. 

अनसवं - विकारमुक्त.

अपरं - दुसरा, अन्य

एकाकिनी - एकटिच.

एकमन्तं - एका बाजुला. 

ओकम्म - दूर होऊन, बाजुला होऊन. 

ओरूहति - वरून खाली उतरणे. 

ओमान - निंदा, अपमान. 

ओपम्मं - उपमा, तुलना, रुपक, सारखेपणा. 

कण्डु - खाज.

कटुक - कडु

कणेरिक - झोपडी.

कणेरू - हत्तीचे लहान पिल्लू. 

किच्चं - काम, कार्य, व्यवसाय. 

गोणो - बैल.

गोपुरं - दरवाजा, नगर, मनोरा. 

गोरसो - दूध, गोळो--चेंडू

घट - घागर.

घतं - तुप.घायति--सुंघतो,  

चोरेति - चोरतो.

चोळक - फाटलेले कापड. 

जीवी - जगणारा.

जेट्ठभातु - मोठा भाऊ. 

तन्दित - थकलेला, सुस्त

तथभावो - वास्तविकता.

दुरागत - वाईट, अप्रिय. 

पच्चयो - हेतू, कारण, आधार

पण्डरो - पांढरा, शुभर. 

पुप्फगन्ध - फुलाचा सुगंध. 

मस्सु - मिशा.

रोचेति - आवडने, पसंत करणे

विलीनो - मिसळलेला

संसयो - संशय, शंका. 

सम्भीत - घाबरलेला.

सीरो - नांगर.

सेखो - शिकत असलेला. 

सुदक - स्वंयपाकी.

                              *_वाक्य_*

_*१) यं मया पस्सितं तं त्वया सुणितं* - जे  मी पाहिले आहे तेच तू ऐकले आहे._

_*२)  समरङ्गानं गच्छन्तानं सेनापतीनं जयो भयेय्य * - रणभूमीवर जाणाऱ्या सेनापती चे जय हो._ 

_*३) सावकेहि धम्मो सोतब्बो* - सावकाच्याव्दारा धम्म ऐकला गेला पाहिजे._

_*४) आकास्मा पतिता वुट्ठि खेत्तं पूरेन्तो तळागं पूरेसि* - आकाशातून पडलेल्या पावसाने शेतातील तलाव भरले आहेत._

_*५) दिल्लियं अच्चतं सीतलता अत्थि* - दिल्लीमधे अधिकतर शीतलता आहे._

_*६) नदी एवं सन्दति* - नदी अशीच वाहत असते._

_*७) तरूणियासध्दिं तारका गच्छन्ति।* - तरूणींसोबत तारका जातात._

_*८) इत्थियो विहार गच्छन्ति।* - स्त्री या विहारात जातात._

_*९) उम्मत्तका जना वारुणीं पिबन्ति।* - बेहोष लोक दारू पितात._ 

_*१०) भिक्खू नज्जा तीरे विहरति।* - भिक्खू नदीकाठी रहातात._

*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 

*_संकलन - महेश कांबळे_*

*_दिनांक :- २१/०२/२०२४_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

Tuesday, 20 February 2024

पाली पाठ २

 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_पाली पाठ_*

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2024/02/blog-post_20.html

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_!! भाग २ !!_*

*_सूचना :-  आपण सर्वांनी "पाली भाषेचा" अभ्यास करावा आणि आपल्या जवळील विद्यापीठात "पाली भाषा" शिकण्यासाठी प्रवेश घ्यावा ह्या उद्देशाने सदर सत्र हे काही मोजकेच दिवस सुरू करण्यात येत आहे._*

*_शब्द_*

सब्बञ्ञु = सर्वत्र

मग्गञ्ञु = मार्गज्ञ (मार्ग जाणणारा)

अत्थञ्ञु = अर्थज्ञ

रत्तञ्ञु = जूना परिचीत

कतञ्ञु = कृतज्ञ

विदू = जाणणारा (विद्वान)

पारगू = पार जाणारा

धम्मञ्ञु = धर्मज्ञ (धम्म जाणणारा)

कालञ्ञु = कालज्ञ (वेळ जाणणारा)

मत्तञ्ञु = मात्रज्ञ (मात्रा जाणणारा)

तत्तञ्ञु = तत्त्वज्ञ

वेदगू = अर्हत

*_कृदन्त शब्द_*

दिट्ठो = दिसलेला

गतो = गेलेला

कुद्धो = रागावलेला

सुक्खो = सुकलेला, वाळलेला

भीतो = घाबरलेला

पीतो = प्यालेला

तिण्णो = पार केलेला

सिद्धो = सिद्ध झालेला

खन्तो = क्षमा केलेला

गुल्हो = लपलेला

जातो = उत्पन्न झालेला

जिण्णो = जिर्ण झालेला

ठितो = उभा झालेला

तुट्ठो = संतुष्ट झालेला

दन्तो = दमन केलेला

भूत्तो = खाल्लेला

सम्पुण्णो= भरलेला, परिपूर्ण, संपूर्ण

वुत्थो = राहिलेला

वुसितो = राहिलेला

मुल्हो= विसरलेला

भग्गो= तुटलेला

पक्को= पिकलेला

रत्तो= आसक्त झालेला

दड्ढो = जळालेला

मुत्तो = सुटलेला

वुध्दो= वाढलेला

त्रस्तो= घाबरलेला

भूतो= झालेला

पुट्ठो= विचारलेला

_*वाक्य*_

_*१) धम्मञ्ञुस्स पञ्जा वुध्दो अत्थि।* = धर्म जाणणाऱ्याची प्रज्ञा वाढलेली आहे._

_*२) वेदगुना भवचक्कं तिण्णो सन्ति।* = अर्हताने भवचक्र पार केलेला आहे._

_*३) अत्थञ्ञु तस्स कम्मेन तुट्ठो निक्खमि।* = अर्थज्ञ त्याच्या कामाने संतुष्ट झालेला निघून गेला._

_*४) वेदगुस्स चित्तं दन्तो भवति।* = अर्हताने चित्त दमन केलला असतो._

_*५) अहं तस्मिं गामे रत्तो भविं।* = मी त्या गावात आसक्त झालेलो होतो._

_*६) रत्तञ्ञु अज्ज गामे आगच्छि।* = जूना परिचीत आज गावात आला._

_*७) पारगू धितिवा सन्ति।* = पार जाणारा धैर्यवान आहे._

_*८) मग्गञ्ञुस्स ञाणं परिपुण्णो भवति।* = मार्ग जाणणाऱ्याचे ज्ञान परिपूर्ण असते._

_*९) धम्मञ्ञु सदा धम्मं वदन्ति।* = धर्मज्ञ नेहमी धम्म सांगतात._

_*१०) विदुना अहं धम्मं जानामि।* = विद्वानाद्वारे मी धम्म जाणतो._

_*११) सो मुत्तो यत्र तत्र धावति।* = तो सुटलेला जिथे तिथे धावतो._

_*१२) तदा कालञ्ञु मुल्हो आगच्छि।* = तेव्हा कालज्ञ विसरलेला आला._

_*१३) तत्थ पक्को फलं पतति।* = तेथे पिकलेले फळ पडते._

_*१४) परहियो अहं दड्डो मनुस्सो पस्सिं।* = परवा मी जळालेला मनुष्य पाहिला._

_*१५) कदाचि सो त्रस्तो भवि।* = कदाचित तो घाबरलेला होता._

*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 

*_संकलन - महेश कांबळे_*

*_दिनांक :- २०/०२/२०२४_*

*_संदर्भ :-_*

*_१) विजित संग्राम, मासिक नोव्हेंबर २०१० अंक २८, वर्ष तिसरे_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

Monday, 19 February 2024

पाली पाठ १

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_पाली पाठ_*

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2024/02/blog-post_19.html

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_!! भाग १ !!_*

*_सूचना :-  आपण सर्वांनी "पाली भाषेचा" अभ्यास करावा आणि आपल्या जवळील विद्यापीठात "पाली भाषा" शिकण्यासाठी प्रवेश घ्यावा ह्या उद्देशाने सदर सत्र हे काही दिवस सुरू करण्यात येत आहे._*

_*शब्दार्थ*_

नदी = नदी 

पाटली = एक वृक्ष (पाटली नावाचे)

मही = पृथ्वी

वेतरणी = वैतरणी (नदी)

वापी = बोळी/छोटे जलाशय

वारुणी = दारू

ब्राम्हणी = ब्राह्मणी

सखी = सखी/मैत्रीण

गन्धब्बी = गन्धर्व स्त्री

अजी = बकरी

वानरी = वानरी/बंदरी

सीही = सिंहनी

कुक्कुटी = कोंबडी 

कदली = केळी

दासी = दासी

काकी = कावळी

नारी = स्त्री

कुमारी = कुमारी

तरूणी = तरूणी

किन्नरी = किन्नर स्त्री

नागी = नागिन

देवी = देवी

यक्खी = यक्षिणी

मिगी = मृगी/हरिण

सूकरी = डूकरी

हंसी = हंसिनी

भगिनी = बहिण

घटी = घाघर

गावी = गाय

राजिणी = राणी

*_क्रियापद_*

सुणोति = ऐकतो

खिणोती = क्षय होतो

वुणोती = झाकतो

गिणोती = शब्द करता /आवाज करतो

सक्णोति = शकतो

सक्कुणोति = शकतो

पापुणोति = प्राप्त करतो.

*_वाक्य_*

_*१) नदि सन्दति।* = नदी वाहते_

_*२) इदं पाटलीया फलं अत्थि।* = हे पटली वृक्षाचे फळ आहे._ 

_*३) वापीया इत्थियो वत्थ धोबन्ति ।* = स्त्रीया तळयात कपडे धुतात._

_*४) वारूणी गेहं डहाति।* = दारू घर जाळते._

_*५) वारूणीया आरा भवतु।* = दारूपासून दूर रहावे._

_*६) ममं सखी पियो सन्ति।* = मला मैत्रिण प्रीय आहे._

_*७) गन्धब्बी गेयं गायति।* = गन्धर्वी गाणं गाते._

_*८) दासी सद्दं सुणेति।* = दासी शब्द ऐकते._

_*९) काकी अट्ठिं चोरेति।* = कावळी हाड चोरते._

_*१०) हंसी मुत्तं विहारं करोति।* = हंसीनी मुक्त विहार करते._

_*११) तरूणी सद्धिं भाता अत्थि।* = तरूणी सोबत भाऊ आहे._

_*१२) यक्खी धनं रक्खति।* = यक्षी धन राखते. (रक्षण करते)_ 

_*१३) सो घटीं करोति।* = तो घाघर करतो._

_*१४) नागी इंस सक्णोति ।* = नागीण दंश करू शकते._

_*१५) कुमारी कदलीं खादति।* = कुमारी केळी खाते._

_*१६) कुक्कुटी जलं पिवति।* = कोंबडी पाणी पीते._

_*१७) मही गतीं पापुणोति।* = पृथ्वी गती प्राप्त करते._

_*१८) तदा सब्बथि नस्सति ।* = तेव्हा सर्वकाही नष्ट होते._

_*१९) मिगी वेगेने धावधिं।* = हरिण वेगाने धावते._

_*२०) भगिणी ओदणं पचति।* = बहिण भात शिजविते._

*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 

*_संकलन - महेश कांबळे_*

*_दिनांक :- १९/०२/२०२४_*

*_संदर्भ :-_*

*_१) विजित संग्राम, मासिक जानेवारी २०१० अंक १८, वर्ष दुसरे_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼


Thursday, 15 February 2024

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आर्थिक तत्त्वज्ञान व नवीन आर्थिक धोरण

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आर्थिक तत्त्वज्ञान व नवीन आर्थिक धोरण_*

*_डॉ. एस. के. गजभिये_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2024/02/blog-post_15.html

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

                  _*डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे जागतिक कीर्तिचे अर्थशास्त्रज्ञ होते.* त्यांनी आर्थिक विषयावरील अनेक ग्रंथांचा संशोधनपूर्ण अभ्यास केलेला होता. अर्थशास्त्राचे संशोधक आणि अभ्यासक असल्यामुळे त्यांच्या आर्थिक विचारांना वैश्विक महत्त्व आहे. भारताच्या मातीत जन्म घेतलेले डॉ. आंबेडकर जगातील मानवाच्या संदर्भात विचार करताना आर्थिक दृष्टिकोनातून प्रत्येक माणूस हा आर्थिकदृष्ट्या कसा सक्षम होईल हा विचार करतात. आर्थिकदृष्ट्या जर माणूस सक्षम झाला तर त्याला जीवन जगणे फार सोपे जाईल. म्हणजेच विश्वात आर्थिक समानता निर्माण झाली पाहिजे यावर त्यांचा भर होता. कारण भारतात ब्रिटिशांचे राज्य असताना मोठ्या प्रमाणात आर्थिक असमानता होती. जगात जरी श्रीमंत व गरिब हा भेद असला तरी भारतात व्यवस्थेच्या नावाखाली उच्चवर्णीय माणूस हा दलित, आदिवासी व इतर शोषित समाजाचे शोषण करीत होता. हे शोषण फक्त सामाजिक स्वरुपाचेच नव्हते तर त्याहीपेक्षा भयानक आर्थिक स्वरूपाचे होते. महार वतन व खोती पद्धत या माध्यमातून भारतात झालेले आर्थिक शोषण जगात कुठेही बघायला मिळणार नाही. जातीच्या नावाखाली झालेले आर्थिक शोषण गुलामीपेक्षाही भयंकर स्वरुपाचे होते. महार वतनाच्या धोरणात बिनपगारी सरकारी नोकर असे जगात कुठेही बघायला मिळणार नाही. तर खोती पद्धतीच्या माध्यमातून वर्षभर शेतीवर काम करून सुद्धा या भूमीहिन शेतमजुराला वर्षाच्या शेवटी मोबदला मिळेल याची खात्री नव्हती. आणि म्हणून *डॉ. आंबेडकर म्हणतात, मार्क्सनी "दास कॅपिटल" नावाच्या ग्रंथातून एक नवीन तत्त्वज्ञान जगाच्या पुढे मांडले आणि समाजाचे व जगातील लोकांचे दोन वर्ग तयार केले, मालक व मजूर, मालकाद्वारे मजुरांचे शोषण केले जाते व या दोन वर्गात नेहमीच वर्गकलह सुरू असतो. उत्पादनाच्या साधनांचे राष्ट्रीयीकरण करून म्हणजेच मालमत्तेची खाजगी मालकी नष्ट करून मजुरांचे शोषण थांबविणे हे शक्य आहे. याकरीता मार्क्सने क्रांतीची बीजे रोवली. ही क्रांती रक्तरंजीत आहे. डॉ. आंबेडकर म्हणतात जर मार्क्सचा जन्म भारतात झाला असता तर मार्क्सचे तत्त्वज्ञान हे वेगळे असते.*_

                _डॉ. आंबेडकर हे लोकशाहीचे पुरस्कर्ते आहेत. त्यामुळे त्यांच्या तत्त्वज्ञानात माणूस हा श्रेष्ठ आहे. मार्क्सने युरोपमध्ये बसून जगात श्रीमंत व गरिब म्हणजेच मालक व मजूर असे दोन वर्ग बघितले व यांच्या संघर्षातून मजुरांचा विजय होऊन सत्ता परिवर्तन होऊ शकते असा सिद्धांत मांडला. या सिद्धांतातून एक नवीन साम्यवादाची अपेक्षा केली. हा *साम्यवाद स्थापन करण्याकरिता दोन महत्त्वाचे मुद्दे मार्क्सनी सांगितले. एक रक्तरंजित काती म्हणजेच सत्ता परिवर्तनाकरिता मालकाचे मुडदे पाडले तरी चालेल व दुसरे सत्तेमध्ये आलेल्या सर्वसामान्यांची हुकूमशाही होय.* यामध्ये मजूर वर्गाला सुखी ठेवण्याकरीता त्याचे आर्थिक शोषण थांबवून त्याला जीवन जगण्याकरीता लागणाऱ्या बाबींची पूर्तता करणे होय. पण ही पूर्तता करीत असताना या वर्गाचे स्वातंत्र्य हिरावून घेऊन त्यावर हुकूमशाही गाजविणे हा मार्क्सच्या सिद्धांताचा प्रमुख उद्देश होता. कारण ही त्याच्या साम्यवादाची नीव होती._

                _*मार्क्सच्या तत्त्वज्ञानानंतर रशियामध्ये एक क्रांती १९१७ ला सेंट पीटर्सबर्ग मध्ये झाली व याचे अग्रदूत लेनिन ठरले. मार्क्सचे माडॅल म्हणून संपूर्ण जग रशियाकडे बघायला लागले.* मालक व मजूर यांच्या वर्गकलहातून झालेला हा संघर्ष मजुरांच्या दिशेने वळला व लेनिननी केलेल्या क्रांतीला यश मिळाले. *ऑक्टोबर रिव्होल्युशन नावाने झालेली ही क्रांती पूर्णपणे रक्तरंजित होती.* मालकांचे खून करून संपूर्ण देशात मजुरांची सत्ता प्रस्थापित झाली. मजुरांची सत्ता प्रस्थापित होताच संपूर्ण देशातील मालमत्तेवर व उद्योगांवर मजुरांची मालकी झाली व ठरल्याप्रमाणे मजूर नेत्यांनी देशातील सर्व जनतेला सत्ता परिवर्तनापूर्वी जी हमी दिली होती ती पूर्ण करण्याकडे वाटचाल केली. मजुरांना राहण्याकरिता संपूर्ण देशात नवीन घरे बांधण्यात आली व आर्थिक दृष्टिकोनातून त्यांना सक्षम बनविण्याकरीता प्रत्येक हाताला काम देण्यात आले. शहरामध्ये राहणाऱ्या लोकांना उद्योगात काम मिळाले तर गावात राहणाऱ्या लोकांना शेतीत काम मिळाले व त्यांना त्यांचा पगार नियमित मिळेल याची खात्री सरकारनी मजुरांना दिली. या माध्यमातून रशियामध्ये झालेल्या सत्ता परिवर्तनाच्या रक्तरंजित क्रांतीस एक नवे आयाम मिळाले. म्हणजे *कालपर्यंत मालकांपासून होत असलेले आर्थिक शोषण थांबले व मार्क्सच्या तत्त्वज्ञानाने या देशातील मनुष्याला अन्न, वस्त्र व निवारा या बाबींची पूर्तता झाली.* म्हणजे उद्योगपतींना सत्तेतून खाली ओढण्यात रशियाला यश मिळाले व याला एक नवीन साम्यवादाचे नाव देण्यात आले._

              _*मार्क्सच्या साम्यवादाचे पूर्णपणे समर्थन न करता डॉ. आंबेडकर म्हणतात, मार्क्सचा साम्यवाद हा माणसाला परिपूर्ण करणारा नाही. सत्ता परिवर्तनाकरिता डॉ. आंबेडकरांना रक्तरंजित क्रांती मान्य नाही. शिवाय मनुष्याला जीवन जगण्याकरिता फक्त अन्न, वस्त्र व निवारा या बाबीच पूर्ण नाहीत तर मनुष्याला परिपूर्ण जीवन जगण्याकरिता समता, स्वातंत्र्य, बंधुता व न्याय या मुल्यांची जास्त गरज आहे. याशिवाय हा मनुष्य पूर्ण होऊ शकत नाही. बुद्धाने हे तत्त्वज्ञान मार्क्सच्या हजारो वर्षे आधी सांगितलेले तत्त्वज्ञान आहे. डॉ. आंबेडकरांनी ते स्वीकारले व जगापुढे ठेवले.*_

                     _*डॉ. आंबेडकरांचे आर्थिक तत्त्वज्ञान त्यांनी जरी राज्य समाजवादाच्या माध्यमातून भारतापुढे ठेवले असले तरी ते ते जगाच्या संदर्भात तेवढेच महत्त्वाचे आहे. भारतातील गरिबीबरोबरच जगातील गरिबी ते दूर करू शकतात एवढी ताकद त्यांच्या आर्थिक तत्वज्ञानामध्ये आहे. लोकशाहीचा पुरस्कार करणारे डॉ. आआंबेडकर नवीन साम्यवादी मांडणी करतात व लोकशाही समाजवादामधून कशी साकार होऊ शकते हे सांगताना संपूर्ण जगातील मानवाची आर्थिक शोषणातून मुक्तता करतात.*_

                _ब्रिटिशांच्या गुलामित असलेला भारत देश जेव्हा भारताच्या स्वातंत्र्याकरिता महात्मा गांधींच्या नेतृत्वात लढा देत होता त्याच वेळेस डॉ. आंबेडकर भारतामध्ये असलेल्या करोडो लोकांचे जीवन कसे सुखी होईल, जाती व्यवस्थेच्या जाळ्यात अडकलेला हा देश कसा मुक्त होईल, दलित, अस्पृश्य, आदिवासी हा समानतेत कसा येऊ शकेल याकडे त्यांचे लक्ष लागले होते. यातून या देशातील प्रत्येक मनुष्य हा आर्थिकदृष्ट्या कसा सक्षम होईल याकडे त्यांचे लक्ष होते. कारण देश हा ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून स्वतंत्र झाला तर देशातील सत्ता ही सवर्ण लोकांकडेच जाईल व यातून परत विषमता जास्त प्रमाणात निर्माण होईल. आर्थिक विषमतेच्या आधारावर जसे शोषण आज होत आहे तसेच शोषण नंतरही सुरू राहील. कदाचित ते जास्तही राहू शकेल. यामुळे डॉ. आंबेडकर जास्त चिंतीत होते. जरी अस्पृश्यांच्या विकासाची एक नैतिक जबाबदारी त्यांनी स्विकारलेली होती तरी संपूर्ण देशातील लोकांचाही ते विचार करीत होते. *राष्ट्रवाद हा त्यांच्या रक्तात भरलेला होता. त्यामुळे ते अनेकदा आपल्या भाषणात असे म्हणाले सुद्धा होते, "मी प्रथम भारतीय आहे व अंततःही भारतीय आहे." त्यामुळे त्यांना असे वाटत होते की, जर भारताला स्वातंत्र्य मिळाले तर प्रत्येक भारतीयाला सुखाने जगण्याची एक हमी भारताने दिली पाहिजे.* तरच खऱ्या अर्थाने या देशाच्या स्वातंत्र्याला अर्थ राहील. नाहीतर या देशातील मनुष्य हा तसाच राहील, जसा ब्रिटिशांच्या गुलामित राहत होता. स्वातंत्र्याच्या नावाखाली फक्त सत्ता हस्तांतरीत होईल. *ब्रिटिश लोक जातील व ब्राह्मणांच्या म्हणजेच मनुवाद्यांच्या हातात सत्ता येईल. विषमता जशी आहे तशीच राहील, हे डॉ. आंबेडकरांना नको होते. देशाच्या स्वातंत्र्याच्या ते कधीही विरोधात नव्हते. पण अस्तित्वात असलेल्या व्यवस्थेच्या मात्र ते विरोधात होते.* कारण ही व्यवस्था वर्णव्यवस्थेला जोपासत असल्यामुळे या देशातील ८५ टक्के लोकांना देश स्वतंत्र्य झाला काय किंवा नाही याचा काहीही उपयोग होणार नाही, म्हणून डॉ. आंबेडकर चिंतीत होते._

                   _डॉ. आंबेडकर सतत हा विचार करीत होते की, स्वातंत्र्यानंतर या देशातील प्रत्येक मनुष्य हा कसा सुखी होऊ शकेल याकरिता या देशातील प्रत्येक हाताला जर काम मिळाले तर आर्थिक विषमता दूर होऊ शकेल असे त्यांना वाटत होते. कारण लोकशाही मुल्यांचा पुरस्कार करणारे डॉ. आंबेडकर देशालाही बळकट बनविण्याच्या विचारात होते. त्यामुळे लोकांचा विकास व देशाचा विकास हे त्यांना अपेक्षित होते. त्यामुळे आपल्या विद्वत्तेचा परिचय देऊन एक आर्थिक कार्यक्रम देशाच्या स्वातंत्र्यापूर्वी त्यांनी तयार केला. आणि या आर्थिक कार्यक्रमाच्या माध्यमातून देशाचा विकास व लोकाचा विकास कसा होऊ शकतो याची हमी दिली. या विचारातून त्यांनी फक्त देशापुढेच नव्हे तर जगापुढेही एक नवीन दृष्टिकोन मांडला की साम्यवादप्रणित लोकशाही हिच मनुष्याला व देशाला प्रगतीच्या वाटेकडे घेऊन जाऊ शकते. ते म्हणतात की, *देश बळकट करावयाचा असेल तर त्या देशाच्या आर्थिक विकासाबरोबरच त्या देशातील मनुष्य सुद्धा बळकट असायला पाहिजे.* म्हणून लोकांचाही विचार व देशाचाही विचार त्यानी केलेला आहे. आणि याला त्यांनी नवीन आयाम देत राज्य समाजवादाची निर्मिती केली. *डॉ. आंबेडकरांचे असे ठाम मत होते की, राज्य समाजवादातूनच या देशातील प्रत्येक माणसाचा विकास होऊ शकेल व देशाचाही विकास होईल. त्यामुळे देशात सुरू असलेली विषमताही थांबू शकेल.*_

                    _*डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अखिल भारतीय शेड्युल्ड कास्ट फेडरेशनच्या वतीने १५ मार्च १९४७ ला घटना समितीला एक मेमोरेंन्डम सादर केले होते. हे मेमोरॅन्डम राज्य आणि अल्पसंख्यांक या नावाने होते. हे मेमोरेंन्डम फक्त भारतीय लोकांच्याच दृष्टिने महत्त्वाचे नव्हते तर जगामध्ये जे लोक लोकशाही राज्याचा पुरस्कार करीत आहेत त्यांच्याही दृष्टिने महत्त्वाचे होते. म्हणजेच डॉ. आंबेडकरांच्या आर्थिक विकासाच्या कार्यक्रमाची ती ब्ल्यू प्रिंट आहे असे अनेक अर्थशास्त्रज्ञांचे मत होते. या मेमोरॅन्डममध्ये डॉ. आंबेडकरांनी राज्य समाजवादाची संकल्पना मांडली आहे, याचे ठळक वैशिष्ट्ये असे -*_

_*(१) आर्थिक विषमता प्रमुख क्षेत्रात राज्यसमाजवादाची निर्मिती*_

_*(२) राज्य समाजवाद हा घटनेनुसार निर्माण होऊन, कोणत्याही कायदे मंडळांना त्यात बदल करता येणार नाही.*_

                  _*देशाचा आर्थिक विकास सरकारी क्षेत्रातून उत्पादन क्षमता वाढवून करता येईल. याकरीता सरकारने सर्व मोठे उद्योग आपल्या ताब्यात ठेवायला हवे. म्हणजेच सर्व मोठे उद्योग व मनुष्याच्या जीवनाशी निगडित असलेले लहान उद्योग सरकारने आपल्या ताब्यात ठेवावे व उर्वरीत उद्योग खाजगी लोकांना देण्यात यावे. या माध्यमातून लोकशाहीचे आपण रक्षणही करू शकू व देशातील लोकांना कुणीही उपाशी राहणार नाही याची हमीपण देऊ शकू. राज्य समाजवादातून हे शक्य आहे असे डॉ. आंबेडकरांचे ठाम मत होते. ते म्हणतात, मोठ्या उद्योगांत सरकारला फायदाच फायदा होईल. कुठेही तोटा होणार नाही. देशातील मोठे उद्योग जर खाजगी लोकांच्या ताब्यात गेले तर देशात अराजकता माजू शकेल. लोकशाही असून सुद्धा वर्ग कलह वाढतील व वर्णव्यवस्था वाढीस लागून शोषणाचे प्रकार वाढू शकतील आणि म्हणून ते खाजगीकरणाच्या विरोधात होते. देशातील वीज व पाणी हे मनुष्याच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत आहेत. त्यामुळे डॉ. आंबेडकरांचे असे म्हणणे होते की, कुठल्याही परिस्थितीत वीज व पाणी हे खाजगी लोकांना देऊ नये. अशाप्रकारे पेट्रोलियम, माईन्स, स्टील, जहाजबांधणी, एव्हिएशन, दूरसंचार हे सर्व मोठे उद्योग सरकारच्या मालकीचे असावे व याचे संचालन राज्याने व राज्यनिर्मित महामंडळाने करावे असे ते म्हणतात.*_

                   _*मनुष्याला केंद्रस्थानी ठेवून त्याच्या विकासाकडे बघत असताना डॉ. आंबेडकर म्हणतात, मनुष्याच्या विकासाबरोबरच त्याच्या आयुष्याची सुद्धा काळजी घ्यावी लागेल. आणि याकरिता देशातील प्रत्येक व्यक्तीचा जीवन विमा काढणे गरजेचे आहे. यातून व्यक्तीला जीवन जगण्याची हमी मिळेल व देशाला विम्याच्या माध्यमातून इतके रुपये मिळतील की आर्थिक नियोजनासाठी हे रुपये कामी पडतील व देशाला जास्त व्याज दराने जागतिक बँकेकडून कर्ज घ्यावे लागणार नाही.* भारताच्या औद्योगीकीकरणा साठी राज्य समाजवाद आवश्यक आहे. कारण खाजगी उद्योजक ते करू शकणार नाही आणि त्यांना तसा प्रयत्न केला तर त्यातून विषमता वाढेल._

                     _*डॉ. आंबेडकर म्हणतात, आमचा देश कृषीप्रधान देश आहे. पण कृषी मात्र मुठभर लोकांकडेच आहे. त्यामुळे भूमीहिन शेतमजुरांचे सर्वत्र आपण शोषणच बघत आहो. आणि म्हणून शेती हा सरकारचा उद्योग असावा व शेतजमिनीची विभागणी प्रमाणित आकारमानाच्या शेतात करून स्थानिक लोकांना कुळ म्हणून ती वितरीत करावी. शेतीची लागवड ही सामुहिक पद्धतीने करावी व शेतीची लागवड करताना सरकारी नियमांचे सुद्धा पालन करावे. शेतीची जमीन ही खेड्यातील शेतमजुरांना लागवडीसाठी देताना जात, पंत, धर्म या आधारावर भेदभाव न करता जमिन लागवडीवर दिल्यानंतर कोणीच मालक राहणार नाही किंवा कुणीही भूमिहीन शेतमजूर राहणार नाही. याप्रमाणे शेतीचे वितरण करावे लागेल. शेतीची लागवड करण्यासाठी आवश्यक वीज पुरवठा, भांडवल, बी-बियाणे, पाणी, अवजारे यांचा पुरवठा करणे ही राज्याची जबाबदारी असेल अशा तत्त्वावर शेतीची पुनर्रचना करणे हे राज्यसमाजवादामध्ये शक्य आहे असे डॉ. आंबेडकरांना वाटत होते. डॉ. आंबेडकर म्हणतात, संरजामी व भांडवलशाही अर्थव्यवस्थेच्या परिवर्तनाचा मार्ग म्हणून राज्यसमाजवाद आवश्यक आहे.* हा आर्थिक कार्यक्रम संसदीय लोकशाहीच्या माध्यमातून प्रत्यक्षात आणता येईल. परंतु त्यांना याचीही जाणीव होती की संसदीय लोकशाहीत सत्तांतरामुळे राज्य समाजवादाला विरोध करणारा पक्ष जर सत्तेमध्ये बहुमताने आला तर तो साध्या कायद्यानेही हा कार्यक्रम रद्द करेल, बदलत्या संसदेकडून बाधा होऊ नये म्हणून समाजवादी आर्थिक कार्यक्रमाला घटनात्मक पाया देवून सातत्य व शाश्वती देणे गरजेचे आहे. नाहीतर यासाठी हुकूमशाही खेरीज दुसरा पर्याय राहणार नाही. हुकूमशाही सातत्य देऊ शकेल पण स्वातंत्र्य व लोकशाही हक्क हिरावले जातील. तेव्हा या आर्थिक कार्यक्रमाला घटनात्मक हमी देऊन राज्यघटनेतच त्याचा अंतर्भाव करणे आवश्यक आहे, असे डॉ. आंबेडकर म्हणतात._

                      _वरील सर्व बाबींचा विचार करता असा निष्कर्ष निघतो की, डॉ. आंबेडकरांना समाजवाद प्रणित लोकशाही आवश्यक वाटत होती. ज्या माध्यमातून जगातील प्रत्येक व्यक्तीचा व देशाचा विकास अपेक्षित होता. *डॉ. आंबेडकरांना भांडवलशाही मान्य नव्हती.* कारण भांडवलशाहीच्या माध्यमातून मुठभर लोकांच्या हातात सत्ता जाईल व हुकूमशाही निर्माण होईल. ज्यामधून शोषणाचे प्रकार वाढत जातील. वर्णव्यवस्थेच्या माध्यमातून जे शोषण भारतात झाले त्याचीच पुनरावृत्ती भांडवलशाहीच्या माध्यमातूनही होऊ शकेल असे त्यांना वाटत होते._

                _स्वातंत्र्यानंतरच्या भारतीय राज्यघटनेत डॉ. आंबेडकरांचा राज्य समाजवादी आर्थिक कार्यक्रम प्रस्थापित हितसंबंधी शक्तीच्या विरोधामुळे जरी समाविष्ट झाला नाही तरी दुर्बल, दलित व शोषित जनतेच्या राजकीय व आर्थिक प्रगतीसाठी मुलभूत अधिकार व पुरक असणारी राज्यघटनेची मार्गदर्शकतत्त्वे या तरतुदीमधून आर्थिक विकासाचे प्रतिबिंब राज्यघटनेत बघायला मिळते._

                    _१९९१ मध्ये जगाच्या पातळीवर एक नवीन दृष्टिकोन पुढे आला त्यात प्रामुख्याने लोकशाहीला मानणारे देश पुढे आले. अमेरिकासारख्या देशाने जगाला आवाहन करून संपूर्ण जगाला एकत्र करण्याचा विचार मांडला. उदारीकरण, खाजगीकरण व जागतिकीरण चा नारा देत जगातील आर्थिक विषमता या माध्यमातून दूर होऊ शकते असा एक नवीन आयाम जगापुढे ठेवला. म्हणजेच जागतिकीकरणाच्या माध्यमातून भांडवलदारांना आपले भांडवल जगातील कोणत्याही देशात वापरण्यास त्यांनी मोकळीक दिली. *मनुष्याच्या व देशाच्या विकासाच्या दृष्टीने जे खाजगीकरण डॉ. आंबेडकरांना मान्य नव्हते त्याच खाजगीकरणाचा जगामध्ये उदो उदो करण्यात आला. जगातील अनेक देश या प्रक्रियेमध्ये सामील झाले. भारतासारख्या देशाने सुद्धा अमेरिकेपुढे शरणागती पत्करली आणि आम्हाला जगाबरोबर राहायचे आहे असा विचार मांडून या जागतिकीकरणाचा स्विकार केला.* आणि त्या क्षणापासूनच भारतात आर्थिक विषमता निर्माण व्हायला लागली. सर्वसामान्य लोकांनी या खाजगीकरणाचा विरोध जरी केलेला असला तरी सरकारच्या धोरणांनी त्यांना गप्प बसल्याखेरीज पर्याय उरला नाही. अवघ्या वीस वर्षात याचे चित्र आपल्याला बघायला मिळत आहेत की या देशातील गरिब, दलित व शोषित समाजाचे शोषण मोठ्या प्रमाणात आर्थिकदृष्ट्या सुरू झालेले आहे. *ज्या राज्यसमाजवादाचा एक सक्षम आर्थिक कार्यक्रम देशापुढे ठेवून डॉ. आंबेडकरांनी देशाला व लोकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्याचे स्वप्न बघितले होते ते धुळीस मिळताना दिसत आहे.* जे सरकारी मोठे उद्योग ज्यामधून दूर-दूर पर्यंत कुठेही तोटा दिसत नाही ते उद्योग सुद्धा सरकार खाजगी लोकांना विकायला लागली आहे. जे उद्योग मनुष्याच्या जीवनाशी निगडीत आहेत ते मुलभूत उद्योगसुद्धा, ज्यामध्ये पाणी व वीज हे सुद्धा सरकार खाजगी लोकांच्या हातात देत आहे. तरीसुद्धा एक निश्चित आहे की, *या देशातील ८५ टक्के लोकांचे आर्थिक जीवन अंधारमय झालेले आहे. पुढे यातूनच आर्थिक विषमता निर्माण होईल व ज्या वर्णव्यवस्थेला डॉ. आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून नाकारले तीच अवस्था लोकशाहीच्या माध्यमातून या देशात निर्माण होईल.* श्रीमंत अधिक श्रीमत होत जातील व गरिब अधिक गरिब, अलिकडेच नागपूरमध्ये आलेले उद्योगपती मुकेश अंबानी म्हणाले की, आम्हाला गरिबी हटाव असे म्हणायची गरज नाही तर श्रीमंती वाढवा असे म्हणावे लागेल._

               _भारतात कोणत्याही पक्षाचे सरकार असले तरी त्यांचे धोरण सारखेच आहे. प्रत्येक पक्ष हा भांडवलदारांची मर्जी संपादित करीत आहे सरकारचे कुठलेही नियंत्रण खाजगी उद्योगांवर नाही. त्यामुळे खाजगी उद्योजक हे सरकारला न घाबरता आपल्या मतानुसार वाटचाल करताना दिसतात. याचे कारण असे की, हेच उद्योजक सरकारला निवडणुकीमध्ये मोठे भांडवल देत असतात. याचे उदाहरण अलिकडे आलेल्या बजेटमध्ये बघायला मिळते बजेट यायच्यापूर्वी देशातील सर्व सिमेट कंपन्यांनी आपले रेट वाढविले व बजेट आल्यानंतर सुद्धा रेट वाढवून दिले म्हणजेच एका महिन्यात एका सिमेंटच्या बॅगवर ५० रुपयाची वाढ होते व सरकार गप्प राहते. हे एक लहानसे उदाहरण मी आपल्यापुढे देत आहे. अशी अनेक उदाहरणे आपल्या देशात आहेत. यामुळे ही भिती अपेक्षित आहे की, *लोकशाहीला मानणारा हा भारत देश कधी भांडवलदारांच्या हातात जाईल हे लोकांना कळणार सुद्धा नाही व नंतर मात्र या देशात लोकशाही प्रणित गुलामगिरी अस्तीत्वात येईल. जो धोका डॉ. आंबेडकरांना दिसत होता तो पुर्णत्वाच्या वाटेकडे जाताना दिसत आहे.* भारत देश असे का करीत आहे हे सर्वसामान्य मनुष्याला अजिबात कळत नाही. पण याचे सर्वात जास्त नुकसान या देशातील गरिब, दलित व शोषितांचे होईल हे निश्चित आहे._

                      _डॉ. आंबेडकरांचा दृष्टिकोण हा फार व्यापक होता. त्यामुळेच त्यांनी भारताच्या विकासाचे प्रारूप राज्य समाजवादाच्या माध्यमातून पुढे आणले व लोकशाहीचे रक्षण केले. हे प्रारुप जरी त्यांनी भारताच्या संदर्भात पुढे आणले असले तरी सुद्धा हा विचार कोणत्याही देशाला विकासाकडे घेऊन जाणारा आहे. याचे फार चांगले उदाहरण चीनचे देता येईल. जेव्हा चीन स्वतंत्र झाला त्यानंतर त्यांनी मार्क्सप्रणित तत्त्वज्ञानाचा स्विकार करून कम्युनिझमचा विचार त्यांच्या देशात लागू केला. त्यावेळी चीन अत्यंत गरीब अवस्थेमध्ये होता. लोकसंख्या जास्त व आर्थिक विषमता यामध्ये अडकलेला चीन लोकांच्या मुलभूत गरजा सुद्धा पूर्ण करू शकत नव्हता. पण गणतंत्र झालेला चीन जेव्हा पुढे आला तेव्हा त्यांनी राज्य समाजवादी विचार स्वीकारला. राज्य समाजवादी धोरणांमधून आज चीनचा विकास आपल्याला बघता येतो. जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत चीनने अमेरिकेला स्पष्ट सांगितले की आम्ही जागतिकीकरणाच्या विरोधात नाही, आमच्या देशात तुम्हाला यायचे असेल तर या; पण आमच्या देशातील मुलभूत उद्योगाला व मोठ्या उद्योगाला तुम्ही हात लावायचा नाही. आमच्या देशातील पाणी व वीज याकडे तुम्ही बघायचे नाही असे अमेरिकेला खडसावून सांगणारा चीन समाजवादी धोरणाला अंगीकारत होता. याच समाजवादी धोरणातून चीनने आपल्या देशातील प्रत्येक  हाताला काम दिले व आर्थिक विषमता नष्ट करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यांनी आपल्या लोकांना जीवन जगण्या हमी दिली. मोठ्या उद्योगातून जास्त अपादकता निर्माण करून संपूर्ण जगात आपली एक वेगळी छाप त्यांनी निर्माण केली आणि आपले आर्थिक सामर्थ्य वाढविले. आज अमेरिकेत तयार झालेल्या वस्तु लोक वापरताना दिसत नाही तर मोठ्या प्रमाणात चीनच्या वस्तु अमेरिकन लोक वापरत आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर समाजवादी प्रारुपाने चीन पुढे आणत आहे. *जे धोरण डॉ. आंबेडकरांनी भारताच्या संदर्भात आखून भारताला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवून भारताचा विकास करण्याचा विचार केला होता, तो भारतात यशस्वी झाला नाही तर चीनने याच समाजवादी धोरणाचा वापर करून आपल्या देशाचाच विकास केलेला नाही तर अमेरिकेला आपल्या पदरी पाडून जगापुढे एक नवीन दृष्टिकोन मांडला.* शंघाई राज्याला चीनमध्ये बघितल्यानंतर असे वाटते की, संपूर्ण जगातील विकासाचे प्रवाह शंघाई शहराकडेच येऊन थांबलेले आहेत. एवढा मोठा विकास चीनने समाजवादी धोरणातून केलेला आहे आणि गणतंत्र झालेला चीन आज जगात सगळ्याच बाबतीत अग्रेसर होत आहे. नुकत्याच प्रकाशित झालेल्या संयुक्त राष्ट्र संघाच्या रिपोर्टनुसार लोकसंख्या वाढीच्या संदर्भात भारत हा देश २०२० मध्ये पहिल्या क्रमांकावर येणार आहे. आणि चीन हा दुसऱ्या क्रमांकावर जाईल. म्हणजेच चीनने आपल्या लोकसंख्येवर सुद्धा नियंत्रण ठेवले आहे._

                      _*डॉ. आबेडकरांनी भारताच्या विकासाचे प्रारूप तयार करताना लोकसंख्या वाढीवर सुद्धा नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे यावर भर दिलेला होता.* पण अलिकडे देशात सत्ता कशी हस्तगत करता येईल याकडेच सगळ्या पक्षांचे लक्ष लागले आहे. देशाच्या संदर्भात कुणालाही विचार करण्याकरिता वेळ नाही. देशातील प्रत्येक मनुष्य हा स्वयंकेंद्रीत झालेला आहे. तो फक्त स्वतःपुरताच विचार करीत आहे. देशाच्या विकासाच्या संदर्भात जे सरकार बोलते ती आहे. आजही आमच्या देशाचे चित्र बघितले तर असे आढळून येईल की जवळ जवळ ४० टक्के लोकांना आपल्या देशात सकाळचे जेवण मिळाले तर सायंकाळचे जेवण मिळेलच याची हमी नाही. या ४० टक्के लोकांना एकीकडे जेवण मिळत नाही तर दुसरीकडे सरकार त्यांच्या गोडाऊनमध्ये सडलेल्या धान्याला समुद्रामध्ये फेकण्याकरीता हजारो करोड रुपये खर्च करीत आहे._

                    *_नवीन आर्थिक धोरणातून आर्थिक समता प्रस्थापित होऊ शकत नाही. आर्थिक समता जर देशात प्रस्थापित करावयाची असेल तर डॉ. आंबेडकर प्रणित राज्य समाजवाद हाच एकमेव पर्याय आहे. अन्यथा देशात भांडवलवादाच्या माध्यमातून विषमता निर्माण होईल व देश परत पारतंत्र्यात जाऊ शकेल. जर देश परत पारतंत्र्यात गेला तर हजारो वर्ष परत गुलामगिरीचे येतील आणि शोषणाची व्यवस्था लागू होईल._*

*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 

*_संकलन - महेश कांबळे_*

*_दिनांक :- १५/०२/२०२४_*

*_संदर्भ :-_*

*_१) विजित संग्राम, मासिक नोव्हेंबर २०१३ अंक ६४ - वर्ष सहावे_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

Wednesday, 14 February 2024

वेज्जवतपद - बुद्धकालीन वैद्यांची प्रतिज्ञा

 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_वेज्जवतपद - बुद्धकालीन वैद्यांची प्रतिज्ञा_*

*_अतुल मुरलीधर भोसेकर_*

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2024/02/blog-post_14.html

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

                   _*१९४८ साली जिनिव्हा घोषणेत जागतिक आरोग्य संघटनेने "हिप्पोक्रॅटीक प्रतिज्ञा" जाहीर केली. आधुनिक वैद्यकशास्त्राचा विद्यार्थी उत्तीर्ण झाल्यावर एक नैतिकता म्हणून ही प्रतिज्ञा घेतली जाते. या जागतिक प्रतिज्ञे ऐवजी "आचार्य चरक शपथ" घ्यायचा घाट सध्याचे आरोग्य मंत्रालय घालत आहे! मुळात हिप्पोक्रॅटीक प्रतिज्ञा बदलून, ऐतिहासिक किंवा पुरातत्त्वीय पुरावा नसलेले चरक यांची प्रतिज्ञा घेण्याची काहीही गरज नाही.* चरक हे कसे आभासी पात्र आहे हे माझ्या एका मागील लेखात लिहिले आहेच!_

              _*भ.बुद्धांना भैषज्यगुरु, वैद्य अशा अनेक विशेषणांनी गौरविलेले आहे. त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे बुद्धांनी मनाच्या आरोग्या बरोबरच शरीराच्या आरोग्याविषयी देखील देशना दिली आहे. विनय पिटक तसेच अंगुत्तर निकाय आणि संयुत्त निकाय मधून बुद्धांनी आजाऱ्यांविषयी करुणा व्यक्त केली, आजाऱ्यांची सेवा करावी असे निक्षून सांगितले आहे. बुद्धांच्या या देशनेमुळे वैद्यकशास्त्र हे खूप विकसित झाले. त्याच काळात जे वैद्य होते ते एक प्रतिज्ञा घेत. "वेज्जवतपद" म्हणजेच वैद्याची प्रतिज्ञा. विनय पिटक, अंगुत्तर निकाय, संयुत्त निकाय आणि धम्मपद मधील काही सुत्तांचे संकलन या प्रतिज्ञेत आहे. केवळ ७ मुद्द्यांची ही प्रतिज्ञा, आजाऱ्याच्या प्रति वैद्याचे काय दायित्व असावे हे स्पष्ट करते.* ही प्रतिज्ञा पालि भाषेत खालील प्रकारे आहे –_

_वुत्तानि हेतानि भगवता,“आरोग्यपरमा लाभा”ति चेव: “यो मम उपट्ठहेय्य सो गिलानं उपट्ठहेय्या”ति च_ 

_*१.* अहम्पि आरोग्यपरमा लाभा'ति मट्टामि, तथागतं उपट्ठातुकामोम्हि, तस्माहं मय्हं  वेज्जकम्मेन आरोग्यभावं वड्ढेमि चेव गिलानं हिताय दयेन अनुकम्पाय उपट्ठहामि_

_*२.* पटिबलो भविसामि भेसज्जं संविधातुं_

_*३.* सप्पायासप्पायं जानिस्सामि, असप्पायं अपनामेस्सामि; सप्पायं उप्पनामेस्सामि, असप्पायं नापनामेस्सामि_

_*४.* मेत्ताचित्तो गिलानं उपट्ठाहिस्सामि नो आमिसन्तरो_

_*५.* अजेगुच्ची भविस्सामि, उच्चारं वा पस्सावं वा वन्तं वा खेलं वा नीहरितुं_

_*६.* पटिबलो भविस्सामि, गिलानं कालेन कालम, धम्मिया कथाय सन्दस्सेतुं समादपेतुं समुत्तेजेतुं संपहंसेतुं_

_*७.* सचे गिलानं सप्पायभोजनेहि वा सप्पायभेसज्जेहि वा सप्पायूपट्ठानेन वा न उट्ठाहेय्य, अहम्पि खो तस्स  गिलानस्स अनुकम्पाय पटिरूपो उपट्ठको भविस्सामि'ति_

_वरील प्रतिज्ञेचा अर्थ असा आहे –_

_*भगवान म्हणाले,"आरोग्य हे परम लाभदायक आहे". ते पुढे म्हणाले," ज्याला माझी सेवा करायची असेल, त्याने आजाऱ्याची सेवा करावी ".*_

_*१. मलाही वाटते कि आरोग्य हे परम लाभदायक आहे आणि मी बुद्धांची सेवा करीन. म्हणून मी माझे कौशल्य सर्व आजाऱ्यांच्या हितासाठी, दयेने, करुणेने आणि अनुकंपाने करीन.*_

_*२. मी योग्य औषधे बनवीन*_

_*३. मला माहितेय योग्य औषध कोणते आणि अयोग्य कोणते. मी फक्त योग्य औषध देईन, अयोग्य नाही.*_

_*४. मी आजाऱ्यांची सेवा मनोभावे प्रेमाने करीन, काही मिळविण्याच्या इच्छेने नाही.*_

_*५. मी अतिशय तटस्थपणे मल, मूत्र, वांती किंवा थुंकीचे परीक्षण करीन*_

_*६. वेळोवेळी मी आजाऱ्यांना धम्माच्या विचाराने मार्गदर्शन, प्रेरणा, प्रोत्साहन आणि आनंद देईन.*_

_*७. जरी मी एखाद्या मृत्युपंथाला लागलेल्या आजाऱ्याला योग्य भोजन, योग्य औषधे आणि योग्य शुश्रूषा देऊ शकलो नाही तरीही मी त्याची करुणेने सेवा करीन (म्हणजे जरी मी आजाऱ्याला वाचवू शकलो नाही, तरी शेवटपर्यंत मी त्याची सेवा करीन).*_

                _*बुद्ध एके ठिकाणी म्हणतात,"अपि च गिलानुपट्ठाका बहूपकारा" (विनय पिटक, खंड १) म्हणजेच जे आजाऱ्यांची सेवा करतात ते सर्वांच्या उपयोगाचे असतात.*_

                _बुद्धकाळात वैद्यांना एक प्रतिष्ठा प्राप्त होती. मुख्य म्हणजे बुद्धांचे जे करुणेचे विचार होते त्याच कारुण्याने वैद्य रुग्णांची सेवा करीत. *एवढेच काय तर “वेज्जवतपद” यातील शेवटची प्रतिज्ञा स्पष्ट सांगते कि जरी हा रुग्ण दगावणार हे माहित असले तरीही वैद्याने शेवट पर्यंत, अत्यंत करुणेने त्याची सेवा करावी!*_

                _या उलट, *वैद्यांना सूचना देताना, सुश्रुत म्हणतात - जर एखादा आजारी व्यक्ती मृत्युपंथाला लागला असेल तर वैद्याने त्याला कुठलेही उपचार करू नये व तेथून निघून जावे, नाहीतर रोग्याच्या मृत्यूने त्या वैद्याच्या प्रतिष्ठेला डाग लागेल! (सुश्रुत संहिते; २७)*_

_मग खऱ्या अर्थाने  “वेज्जवतपद” ही प्रतिज्ञा योग्य आहे कि चरक, सुश्रुत सारखे मिथक पात्राच्या नावाची प्रतिज्ञा योग्य आहे?-

*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

कोलित सुत्त

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_कोलित सुत्त_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_41.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼  _'कोलित सुत...