Tuesday, 20 May 2025

संगमेश्वर तालुक्यातील धार्मिक चळवळ

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_संगमेश्वर तालुक्यातील धार्मिक चळवळ_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2025/05/blog-post_81.html

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

       _*सन १९५८ नंतर संगमेश्वर तालुका सामाजिक दृष्ट्या रिपब्लिकन पक्षाच्या गटबाजीमुळे दुभंगलेला राहीला.* त्याचे परिणाम समाजाच्या सामाजिक, धार्मिक जीवनावर झाले. *सन १९७४ पर्यंत तालुक्यातील कार्यकर्त्यांनी राजकीय गटाच्या सोयीनुसार भारतीय बौद्ध महासभा, बुद्ध शासन सभा या धार्मिक संस्थांचे काम केले व करीत आहे.*_

           _*सन १९७४ मध्ये गटनिहाय रिपब्लिकन पक्षाचे एकीकरण झाल्यानंतर संगमेश्वर तालुक्यात श्री एस. आर. जाधव (कुडवली) यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय बौद्ध महासभा या धार्मिक संस्थेचे कामकाज सुरु झाले. पुढील पांच वर्षातच या संस्थेचा कारभार गुंडाळण्यात आला.*_

          _*कोकण प्रांतातील समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, धार्मिक व सांस्कृतिक विकास उनतीसाठी बोधीसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिनांक २५ मे १९४१ रोजी बौद्धजन पंचायत समिती या संस्थेची स्थापना केली. या संस्थेला कोकणवासीय कामधेनू म्हणतात.* समितीच्या संघटन, शिस्त आणि संस्कार या त्रिसूत्री कार्यप्रणालीमुळे कोकणातील बौद्ध समाज जीवनावर समितीचा अनन्यसाधारण प्रभाव राहिला आहे. समितीचे समाज परिवर्तन चळवळीतील अग्रस्थान व कार्य विचारात घेऊन तालुक्यातील कार्यकर्त्यांनी समितीचे काम तालुका स्तरावर सुरु करण्याचा विचार केला._

        _*श्री. वाय. जी. पवार गुरुजी (परचुरी) यांच्या पुढाकाराने मा. घनःश्याम तळवटकर, सभापती बौ. पं. समिती यांच्या उपस्थितीत दिनांक २२ एप्रिल १९७९ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक देवरुख येथे बौद्धजन पंचायत समिती तालुका शाखा, संगमेश्वर या संस्थेचा कार्यारंभ सोहळा संपन्न झाला.*_

 _बौद्धजन पंचायत समिती तालुका शाखा कार्यकारिणीची निवड करण्यात आली, ती येणेप्रमाणे......_ 

_*अध्यक्ष श्री. एस. आर. जाधव (कुडवली), उपाध्यक्ष-सर्वश्री सुरेश गो जाधव (देवळे), दा. य. कदम, डॉ. डी. बी. कांबळे (करंजारी), चिटणीस- सर्वश्री गो. रा. कदम (कुंभारखणी), उपचिटणीस-श्री. र. श. पवार, खजिनदार सर्वश्री एस. जी. मोहिते, जयराम रामजी कांबळे (देवडे), हिशोब तपासणीस वाय. जी. पवार, सभासद-सर्वश्री ज.भा. कदम (आंबेडखुर्द), सुरेश पवार, राजाराम रावजी कदम, शांताराम रामजी गमरे, राजाराम नामदेव जाधव, सावळाराम लक्ष्मण जाधव, आर. डी. कांबळे, रावजी कुशा जाधव, सुरेश रामजी पवार गुरुजी, गंगाराम गोविंद कांबळे, तु. स. मोहिते, गं.भि. पवार, शिवराम विठ्ठल पवार, लक्ष्मण देऊ कदम._

*_बौद्धजन पंचायत समितीच्या कामकाजासाठी गट व गटप्रतिनिधींची नावे खालील प्रमाणे जाहीर झाली._*

*_१) चिखली गट :_*

सावळाराम लक्ष्मण जाधव, नारायण शिवराम कांबळे, आनंदा सखाराम गमरे, भिकाजी सजना कदम.

*_२) अंत्रवली गट :_*

राघो सखाराम मोहिते, राजाराम राघो कदम गुरुजी, रमेश मोहिते (कळंबस्ते), शंकर देवजी जाधव

*_३) संगमेश्वर गट :_*

ज.भा. कदम, गो. रा. कदम

*_४) फुणगुस गट :_* रमेश पवार

*_५) वाशी गट :_*

रावजी कुशा जाधव, रत्नू गोविंद कांबळे

*_६) ताम्हाणे गट :_*

कृष्णा ताम्हणकर, दौलता आंबवलकर, रुपचंद देवजी कांबळे

*_७) देवरुख गट :_*

एस. आर. जाधव, राजाराम रामजी कदम, धर्माजी अमृता मोहिते, धोंडीराम पांडुरंग जाधव

*_८) तुळसणी गट :_*

तु. स. मोहिते, राजाराम नामदेव जाधव

*_९) काटवली गट :_* अ. वि. जाधव

१०) मारळ आंगवली गट : सुरेश पवार 

*_११) देवळे-साखरपा गट :_*

दा. य. कदम, सुरेश जाधव गुरुजी, डॉ. बी. डी. कांबळे, गंगाराम दाभोळकर

_तथापि *१० मे १९८५ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह देवरुख येथे श्री. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर हयांचे नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी मेळाव्यात बौ.पं. समिती तालुका शाखेचे अध्यक्ष श्री. एस. आर. जाधव हयांनी संस्थेच्या घटनात्मक तरतूदीनुसार कोणत्याही कार्यवाहीचा अवलंब टाळून व कार्यकारिणीच्या गांव शाखा पदाधिकाऱ्यांची पूर्व मंजूरीशिवाय एकतर्फी बौ. पं. समिती तालुका शाखा बरखास्त केली; त्याच बरोबर श्री प्रकाश आंबेडकर हयांच्या राजकीय पक्षाचा आश्रय घेऊन भारतीय बौद्ध महासभा या धार्मिक संस्थेचा कार्यारंभ घोषित केला.* यावेळी देवरुख विभागातील बी. सी. कांबळे यांच्या राजकीय पक्षात व धार्मिक संस्थेत काम करणाऱ्या बहुसंख्य कार्यकर्त्यांनी श्री. एस. आर. जाधव हयांचे तालुका नेतृत्व मान्य केले होते आणि यदाकदाचित *सार्वजनिक चळवळीतील डावपेचात्मक धोरण म्हणूनच श्री. एस. आर. जाधव हयांनी बौ. पं. समिती शाखा बरखास्त केली असावी असा संशय आल्याशिवाय राहत नाही.*_

*_श्री. जाधव हांचे वरील घोषणेनंतर सन १९८५ ते १९९० पर्यंत देवरुख विभाग, साखरपा अकरा गांव विभाग, सोळागाव माखजन विभाग या विभागात भारतीय बौद्ध महासभेचे धार्मिक कामकाज सुरु होते व उर्वरीत तालुक्यात सर्वश्री सुरेश गोविंद जाधव (अध्यक्ष(, रत्नाकर धो. मोहिते (उपाध्यक्ष), ज. भा. कदम (चिटणीस), अ. वि. जाधव, सुरेश पवार, गो. रा. कदम हांच्या पुढाकाराने बौद्धजन पंचायत समिती तालुका शाखा संगमेश्वर या संस्थेचे कार्य पुनः रपि जोमाने सुरु करण्यात आले व हे कार्य सन १९९० पर्यंत चालू होते._*

_सन १९९० मध्ये संगमेश्वर तालुक्यातील आंबेडकरी अनुयायांनी रिपब्लिकन पक्षाच्या सर्व गटनिहाय संघटना बरखास्त करुन तालुका स्तरावर राजकीय ऐक्य साकार केले. याबाबतचा उहापोह स्वतंत्र प्रकरणात केला आहे. या राजकीय ऐक्यानंतर तालुक्यात सामाजिक, धार्मिक एकजीव संघटन निर्माण करणे अनिवार्य बाब होती._

_संगमेश्वर तालुक्यातील हे सामाजिक, धार्मिक ऐक्य मुंबई व ग्रामिण भागातील कार्यकर्त्यांच्या सहमतीने, आचार-विचाराने होणे जरुरीचे होते. संगमेश्वर तालुक्याचे राजकीय ऐक्य घडविताना श्री. वि. ल. मोहिते यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील समस्त कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, संगमेश्वर या नावाने राजकीय पक्षाचे काम सुरु केले. ग्रामिण भागातील कामकाजासाठी प्रमुख निमंत्रक श्री. एस. आर. जाधव (कुडवली), निमंत्रक - श्री. अशोक बा. पवार (धामणी), बाळाराम ल. जाधव (आंबव) यांची निमंत्रक समिती गठीत झाली. *तालुका ग्रामिण भागात धार्मिक संघटना किंवा ऐक्य घडविताना या राजकीय पक्षाच्या निमंत्रक समितीने अथवा ग्रामिण भागातील धार्मिक संघटना पदाधिकाऱ्यांनी (ज्यांनी धार्मिक ऐक्यासाठी पुढाकार घेतला) मुंबईतील आर. पी. आय. संगमेश्वर संघटनेला/कार्यकर्त्यांना विश्वासात घेतले नाही. इतकेच नव्हे तर "भारतीय बौद्ध महासभा" या धार्मिक संस्थेचे कामकाज सुरु करण्यापूर्वी ज्यांनी तालुक्याचे राजकीय ऐक्य घडविले त्यांना व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मशताब्दी वर्ष समिती (संगमेश्वर) मुंबई संस्थेला बेदखल केले.*_

     _यावेळी *संगमेश्वर तालुका ग्रामिण भागात भारतीय बौद्ध महासभा, तालुका शाखा संगमेश्वर, बौद्धजन पंचायत समिती, तालुका शाखा संगमेश्वर व बुद्ध शासन सभा, तालुका शाखा  संगमेश्वर या धार्मिक संस्था कामकाज करीत होत्या. या तिन्ही संस्थाचे पदाधिकारी व निमंत्रक समितीचे कार्यकर्ते यांची दिनांक २७ मे १९९० रोजी देवरुख येथे बैठक पार पडली. या बैठकीत बौ. पं. समिती तालुका शाखा संगमेश्वरचे चिटणीस "श्री. ज. भा. कदम (आंबेडखुर्द) यांनी सूचना (ठराव) मांडली की संगमेश्वर तालुक्यात एकच धार्मिक संस्था असावी व हे धार्मिक ऐक्य झाल्याशिवाय आर. पी. आय. पक्ष बांधणी होऊ नये." या बैठकीत धार्मिक ऐक्य घडविण्यासाठी प्रमुख निमंत्रक म्हणून सर्वश्री एस. आर. जाधव (कुडवली), अशोक बा. पवार यांची निवड झाली. श्री. ज. भा. कदम यांची सूचना स्विकारुन धार्मिक ऐक्याच्या कामाला लागले.*_

         _तालुका ग्रामिण भागात *दिनांक २९ सप्टेंबर १९९० रोजी श्री. एस. आर. जाधव (कुडवली) यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक देवरुख येथे जाहीर सभा पार पडली. या सभेत तालुक्यातील कार्यरत भारतीय बौद्ध महासभा, बौद्धजन पंचायत समिती, बुद्ध शासन सभा या तिन्ही संस्थांच्या तालुका शाखा विसर्जित करुन दिनांक २९ सप्टेंबर १९९८ पासून संगमेश्वर तालुक्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सन १९५४ मध्ये प्रस्थापित केलेल्या दि बुद्धीस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा (नोंदणी क्र. एफ-९८२ मुंबई) या धार्मिक संस्थेचे कामकाज सुरु करणेबाबत निर्णय झाला. या सभेत तालुका शाखा कार्यकारी मंडळाची निवड झाली. अध्यक्ष- श्री संजय हरी कांबळे (फणसट), उपाध्यक्ष-श्री. सुरेश गो. जाधव (देवळे), जनरल सेक्रेटरी-श्री. ज. भा. कदम (आंबेडखुर्द), कार्य. सेक्रेटरी-श्री. राजाराम रा. कदम (देवरुख), सहाय्यक सेक्रेटरी-सर्वश्री विजय दौ. कांबळे (चाफवली), रामचंद्र धों. कांबळे (किरबेट), गंगाराम पां. जाधव (पाटगांव), बाबूराव पां. कांबळे (कोळंबे), सिद्धार्थ शि. जाधव (आंबव), सुभाष क. जाधव (मेढे), खजिनदार श्री. राजाराम ना. जाधव (कर्ली), सहाय्यक खजिनदार श्री. राहुल ब. मोहिते (उमरे), सदस्य- सर्वश्री सुदाम रा. गमरे (बोरसुत), अजित प. कांबळे (म्हावळंगे), देवदास भां. कांबळे (कडवई) हे पदाधिकारी होते.*_

        _पुढे *भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखेने दिनांक २७ मे १९९० रोजीच्या बैठकीतील निर्णयानुसार धार्मिक ऐक्यानंतर सामाजिक व राजकीय ऐक्यासाठी पुढाकार घेतल्याचे किंवा काम केल्याचे दिसून येत नाही.*_

            _*संगमेश्वर तालुका बौद्धजन सेवा संघ आणि भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा संगमेश्वर या दोन्ही संस्थाच्या दिनांक १९ मे १९९६, दिनांक ३ डिसेंबर १९९६ रोजीच्या संयुक्त बैठकीत या संस्थानी तालुक्यात परस्पर संस्थाच्या कामकाजाला पुरक व समाजहिताचे कार्य करण्याचे निर्णय होऊन सुद्धा "भारतीय बौद्ध महासभा" तालुका शाखेने तालुका सेवा संघाच्या कामकाजाला प्रखर विरोध करण्याची भुमिका घेतली.*_

          _सन १९९० साली संगमेश्वर तालुक्यातील मुंबईस्थित व ग्रामिण भागातील बौद्धजन भावकी संघटना, सर्व विभागीय सामाजिक संघटना, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जन्मशताब्दी वर्ष साजरे करण्यासाठी "भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मशताब्दीवर्ष समिती (संगमेश्वर) मुंबई" या संस्थेची स्थापना केली. या संस्थेच्या मार्फत *तालुक्यातील बौद्ध जनतेला भूषणावह असणारे विविध उपक्रम राबवून मौजे देवरुख येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुर्णाकृती पुतळा उभारण्याचे कार्य पार पडले.* या महत्वपूर्ण ऐतिहासिक कामकाजासाठी तालुका बौद्ध समाजातील बौद्धजन भावकी संघटना व महिला मंडळे, वैयक्तिक दानशूर देणगीदारांचे सक्रीय योगदान राहीले आहे. *यावेळी तालुक्यातील अन्य राजकीय व धार्मिक संघटनांचे सहकार्य लाभले नाही किंवा त्यांनी दिले नाही. तसेच मौजे देवरुख येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा निर्मितीशी किंवा उभारणीत भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखेचा काहीही संबंध नाही. तथापी तालुका सेवा संघाने भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा संगमेश्वर पदाधिकाऱ्यां समवेत अनेक वेळा पत्रव्यवहार करुन बैठकांचे आयोजन केले आणि तालुक्यात सामाजिक व धार्मिक काम एकजुटीने व्हावे यासाठी प्रयत्न केले, त्यास यश आले नाही.*_

          _त्यामुळे *भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा संगमेश्वरच्या पदाधिकाऱ्यांनी डॉ. बाबासाहेव आंबेडकर पुतळा परिसर सुशोभिकरणास व तेथे ग्रंथालय-वाचनालय इमारतीच्या बांधकामास केलेला विरोध हा केवळ संगमेश्वर तालुका बौद्धजन सेवा संघ ही सामाजिक संस्था नाकारण्यासाठीच आहे. यामुळे या धार्मिक तालुका शाखेची अशी भूमिका स्पष्ट होते की, संगमेश्वर तालुक्यात भारतीय बौद्ध महासभा संस्थाशिवाय अन्य कोणतीही संस्था असता कामा नये. त्या संस्थेची ही भूमिका तालुका स्तरावर सर्वांगिण आंबेडकरी चळवळीला सामाजिक, धार्मिक, राजकीय दृष्टया अडचणीची ठरणार आहे.*_

ह्या अश्या भूमिकांमुळे देवरूख येथे जे संगमेश्वर तालुक्यातील महत्वाचे ठिकाण आहे तेथे बाबासाहेबांची जयंती एकत्र साजरी करता येत नाही. ज्या बाबासाहेबांनी एकीचे सूत्र सांगितले तिथेच *"ह्या आडमुठ्या भूमिकेमुळे"* तीन तीन वेगवेगळ्या जयंत्या देवरूख येथे साजरी होते..... ते कुठे तरी थांबायला हवे, त्यासाठी संगमेश्वर तालुक्यातील सर्व तरुणांनी एकत्र येऊन विचार विमर्श करून एक मार्ग काढावा हीच विनंती.

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_संकलन :- महेश कांबळे (तळेकांटे)_*

*_संदर्भ :- संगमेश्वर तालुका - डॉ. आंबेडकर प्रणित सामाजिक चळवळ : वास्तव आणि वाटचाल_*

*_मुळ लेखक :- वि ल मोहिते_*

*_दिनांक :- २१/०५/२०२५_*

*_टिप :- संगमेश्वर तालुक्यातील आंबेडकरी चळवळीचा इतिहास अभ्यासाचा असेल तर वरील पुस्तक अभ्यासावे_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

भगवान बुद्धांच्या शिकवणुकीच्या हासाचे प्रमुख कारण

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_भगवान बुद्धांच्या शिकवणुकीच्या हासाचे प्रमुख कारण_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2025/05/blog-post_45.html

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

                _*भगवान बुद्धांच्या नंतर सम्राट अशोकांनी बुद्धांच्या धर्म -शिकवणुकीला भारताच्या दूर-दूरच्या गावात आणि शेजारील देशातही पसरविले.* अशोकांच्या मृत्यूनंतर त्यांच्या संतानात राजगादी प्राप्त करण्याच्या इच्छेने परस्परात कलह निर्माण झाला. हळू-हळू राजपरिवाराची सुख-शांती नष्ट होऊ लागली. त्यामुळे सारे साम्राज्य बृहद्रथाच्या हातात आले. बृहद्रथ दुर्बळ वृत्तीचा राजा होता. बाहेरील शत्रुचे आक्रमण होत राहात असे. त्यामुळे त्याने आपल्या अश्वारोही सेनेच्या सैनिकांना प्रशिक्षित करण्यासाठी कोण्या अन्य देशातून आलेल्या पुष्यमित्र शुंग नावाच्या युवकाला आपल्या अश्वसेनेचा प्रशिक्षक बनविले. हळू-हळू काही कुटिल लोकांच्या चलाखीमुळे तो साऱ्या सेनेचा सेनापती झाला. दुर्भाग्यामुळे ह्याच लोकांनी चलाखीने पुष्यमित्राच्या हाताने राजाची हत्या करविली आणि पुष्यमित्र शुंगला राजगादीवर बसविले, जो सेनेचा सेनापती होता. तो राजमदात मस्त झाला. त्याला दिसतही नव्हते की षडयंत्रकारी त्याच्याद्वारे काय करवित आहेत. त्यानंतर ते आपली मनमानी करू लागले "पती झाला कोतवाल, आता भिती कोणाची ह्या म्हणीनुसार कारभार सुरु झाला._

         _लोकांच्यात खूप मोठी भ्रांती पसरली की पुष्यमित्र शुंगाच्या राज्यात सर्व ब्राम्हण समाजाने मिळून बुद्धांच्या शिकवणुकीला नष्ट करून टाकले, *वस्तुतः सामान्य ब्राम्हणांचा बुद्धांच्या शिकवणुकीला कोणताही विरोध नव्हता. विरोध ब्राम्हणांच्या पुरोहित वर्गाच्या मनात जागला, कारण जे पशू-यज्ञ होत होते, ते बुद्धांच्या शिकवणुकीमुळे बंद होत गेले. त्यामुळे त्या यज्ञांमुळे होणारी त्यांची मोठी कमाई बंद झाली. हे सत्य आहे की सर्व पुरोहित ब्राम्हणच होते परंतु सत्य हे ही आहे की सर्व ब्राम्हण पुरोहित नव्हते. यज्ञ बंद झाल्यामुळे सर्वात मोठी हानी पुरोहित वर्गाच्या ब्राम्हणांची झाली. त्यामुळे त्यांनी नवीनच तयार झालेल्या संस्कृत भाषेत जे साहित्य रचले, त्यात बुद्धांच्या शिकवणुकीला लोकांसाठी अग्राह्य आणि चुकीचे सांगितले आणि ह्या प्रकारे बुद्धांची शिकवणुक नष्ट होत गेली.*_

           _त्यामुळे सर्व ब्राम्हणांना बुद्धांच्या शिकवणुकीला नष्ट करण्यासाठी जबाबदार ठरविणे एकदम चुकीचे आहे. कारण बुद्धांच्या विद्येला नष्ट करणारे तर मोजकेच पुरोहित होते, जे ब्राम्हण वर्गाचे अवश्य होते, परंतु ब्राम्हणांचा सर्वसाधारण समाज पुरोहितगिरी करीत नव्हता. त्यामुळे बुद्धांच्याद्वारे पशू-यज्ञ बंद करण्यामुळे त्यांचे खूप मोठे नुकसान नव्हते. यज्ञांचा प्रमुख लाभ तर पुरोहितांना प्राप्त होत होता. बाकी इतर ब्राम्हणांना तर केवळ प्रसादाच्या रूपाने बळी दिलेल्या पशुच्या मासाचे काही तुकडे मिळत होते. ह्या यज्ञांच्या बंद होण्यामुळे सर्वात मोठी हानी पुरोहितांची झाली. इतर ब्राम्हण समाजाची नाही. पुरातन साहित्याच्या अवलोकनाने ह्या बाबीचे प्रमाण मिळते की कोणत्या यज्ञाला करविण्यामुळे पुरोहिताला किती दक्षिणा मिळत होती._

_*१ अग्निहोत्र यज्ञ* १००० पेक्षा जास्त गायी आणि चांदीची खोळ चढविलेला पांढरा रथ._

_*२ विश्वजित यज्ञ* आपली सारी संपत्ती अथवा १००० गायी आणि १०० घोडे._

_*३ विश्वजित शिल्प यज्ञ* राजा आणि त्याच्या प्रदेशाच्या सामर्थ्यानुसार जितके तो देऊ शकतो तेवढे द्यावे लागत होते._

_*४ स्येन यज्ञ* कारण की यज्ञाचे स्वरूप जादूटोन्याचे होते म्हणून दक्षिणेच्या रूपाने एक डोळा असणारी, लंगडी, बिना शिंगाची, विना शेपटीची, आजारी गाय द्यावी लागत होती._

_*५ साड्यशक्र यज्ञ* - ६००६ गायी._

_*६ वाजपेय यज्ञ* १७०० गायी, १७०० मुल्यवान कपडे, १७०० मेंढ्या, १७०० बकऱ्या. काही काही जागी १७००० ही म्हटले आहे._

_*७ राजसूय यज्ञ* २४००० गायी._

_*८ अश्वमेध यज्ञ* अगनित गायी आणि राणी व पुत्रीला सुद्धा पुरोहिताला दिले जात होते._

_*९ सर्वमेध यज्ञ* आपला सर्व जमीन-जमुला, आपल्या मालकीची सारी संपत्ती पुरोहिताला दिली जात होती._

_सर्वसाधारण ब्राम्हण पुरोहित नव्हते. अनेक ब्राम्हण भिन्न-भिन्न प्रकाराच्या रोजगाराने आपला उदरनिर्वाह करीत होते. उदाहरणार्थ:-_

१. वैद्याचे कार्य. २. राज अमात्याचे कार्य. ३. शिकार करण्याचे कार्य, ४. मासे पकडण्याचे कार्य, ५. राजाची सेवा करण्याचे कार्य, ७. पशुपालनाचे कार्य, ८. मेहनत-मजुरीचे कार्य, ९. शेती नांगरण्याचे कार्य, १०. तलवारीचे लक्षण सांगण्याचे कार्य इत्यादी.

         _*पुरोहित वर्गातही काही मोजके लोक जे नवीन संस्कृत भाषेचे विद्वान होते. ते बुद्धांद्वारे प्रयुक्त पुष्कळश्या साधनासंबंधी शब्दांचा प्रयोग आपल्या प्रशिक्षणात करू लागले, ज्यामुळे लोकांना ही भ्रांती होवो की त्यांची विद्या तर पुरातन आहे, जिला बुद्धाने त्यांच्या साहित्यातून प्राप्त केले आहे. त्यांनी अशा साहित्याची रचना केली, जे बुद्धांच्या शिकवणुकीच्या विरोधी सिद्ध झाले. बुद्धांच्या शिकवणुकीत आर्य अष्टांगिक मार्ग खूप प्रसिद्ध होता, त्यामुळे त्यांनी अष्टांग योगाची निर्मिती केली. बुद्धांच्या विपश्यनेत डोक्यापासून पायापर्यंत व पायापासून डोक्यापर्यंत आतील सत्याला पाहण्याची क्रिया होती, जिला अनुलोम-प्रतिलोम म्हणत असत. त्यांनी श्वासाच्या येण्या-जाण्याला अनुलोम-प्रतिलोमचे नाव दिले, ज्यामुळे लोकांना भ्रांती होवो की ही अनुलोम-प्रतिलोमची शिकवणुकही खूप पुरातन आहे. ह्याप्रकारे पुरोहित-वर्गाच्या ह्या संस्कृत-साहित्यकारांनी हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला की बुद्धांनी ह्या पुरातन विद्येच्या आधारावर आपल्या शिकवणुकीचा विस्तार केला.*_

         _*पुरोहितांनी समाजात ह्या बाबीचाही प्रबळ प्रचार केला की कृष्ण बुद्धांच्या पूर्वीचे अवतार होते. त्यामुळे त्यांच्या वेळची गीता ही निश्चित रूपाने पुरातन ग्रंथ आहे. जेव्हा की वास्तविकता ही आहे की गीता बुद्धांच्या नंतरची रचना आहे आणि बुद्धांच्या शिकवणुकीवर गीतेचा प्रभाव नाही तर गीतेवर बुद्धांच्या शिकवणुकीचा प्रभाव आहे.*_

         _*दुसरे त्यांनी पाहिले की बुद्धांच्या शिकवणुकीचा विस्तार ह्यामुळे झाला की ही सांप्रदायिक शिकवण नसून सार्वजनिक शिकवण होती. बुद्धांच्या शिकवणुकीचा आधार शील, समाधी आहे आणि सदाचरणच धर्म आहे. लोक ह्याला सांप्रदायिक मानीत नव्हते. त्यामुळे हिचा प्रसार होण्यात कोणतीही अडचण आली नाही. बुद्धांनी आपल्या शिकवणुकीला 'धर्म' म्हटले, जो सर्वांचा असतो. आपल्या अनुयायांना 'धार्मिक' म्हटले, ह्याला सर्वांनी स्वीकारले. त्यामुळे त्यांनी बुद्धांच्या शिकवणुकीवर गंभीर प्रहार हा केला की त्यांची शिकवण 'धर्म' नसून 'बौद्ध-धर्म' होती आणि त्यांचे अनुयायी 'धार्मिक' नसून 'बौद्ध' होते. ह्या प्रकारे बुद्धांची सार्वजनिक शिकवण सांप्रदायिक बनविण्यात आली आणि लोक ह्यालाही एक 'सांप्रदायिक-धर्म' मानू लागले. ह्यामुळे बुद्धांच्या शिकवणुकीचा ज्या सहज भावाने विस्तार होत होता, तो थांवला.*_

           _संप्रदाय शब्द धर्माच्या रूपात मानण्यात येऊ लागला. त्यामुळे जेव्हा भारताचे संविधान बनले तेव्हा चुकीने त्याला हिंदी भाषेत 'धर्म-निरपेक्ष' म्हटले गेले, कोणतेही चांगले राज्य 'धर्म निरपेक्ष' नसते तर 'धर्म-सापेक्ष' असते. ते 'संप्रदाय-निरपेक्ष' अवश्य असते. *इंग्रजीत लिहिल्या गेलेला भारतीय संविधानाचा हिंदी अनुवाद हिंदीचे प्रसिद्ध विद्वान शेठ गोविंददास द्वारे केला गेला आणि त्यांनी हिंदी अनुवादात 'धर्म निरपेक्ष' शब्दाचा प्रयोग केला, जो चुकीचा होता. शेठ गोविंददास जेव्हा रंगूनमध्ये मला भेटले तेव्हा मी त्यांना म्हटले की चांगले राज्य 'धर्म-निरपेक्ष' कसे होईल? राज्य तर 'धर्म-सापेक्ष' असले पाहिजे. हो, 'संप्रदाय-निरपेक्ष' अवश्य आहे. त्यांनी आपली चूक स्वीकारली आणि पुढे चालून 'धर्म-निरपेक्ष' च्या जागी 'पंथ-निरपेक्ष' केले,* हिंदीच्या एका अन्य विद्वानांनीही ह्याबाबत आवाजी मागणी केली की 'धर्म निरपेक्ष' म्हणण्यात येऊ नये आणि 'पंथ-निरपेक्ष' शब्दाचे त्यांनी समर्थनही केले._

        _*साऱ्या देशात आजही 'धर्म' चा अर्थ 'संप्रदाय' च्या रूपाने घेतला जातो, जसे हिंदू-धर्म, जैन-धर्म, इस्लाम-धर्म, शिख-धर्म इत्यादी. 'धर्म' सर्वांना स्वीकार्य आहे आणि बुद्धांची शिकवणुक जोपर्यंत 'धर्म' होती, तेव्हापर्यंत सर्वांना स्वीकार्य होती. परंतु 'बौद्ध-धर्म' बनताच अन्य संप्रदायांप्रमाणेच ती संप्रदाय झाली. ही मान्यता दुर्भाग्याने साऱ्या भारतातच नाही तर शेजारी देशातही पसरली. इंग्रज लोक भारतात आले तेव्हा त्यांनी हिंदुइज्म (Hinduism), जैनिज्म (Jainism) अशा शब्दांप्रमाणेच बुद्धांच्या शिकवणुकीलाही 'बुद्धीज्म्' (Buddhism) म्हणणे सुरु केले आणि त्यांच्या अनुयायांना 'बुद्धिष्ट' (Buddhist) म्हणू लागले. ह्या प्रकारे इंग्रजांनी बुद्धांच्या शिकवणुकीला बुद्धिज्म घोषित केले आणि त्यांच्या अनुयायांना बुद्धिष्ट. राजाच्या मान्यतेचा प्रभाव प्रजेवर पडू लागला.*_

            _जेथे जेथे त्यांच्या राज्याचा विस्तार झाला, तेथे तेथे बुद्धांची शिकवणुक 'धर्म' न राहून 'बौद्ध धर्म' झाली आणि 'बुद्धिज्म्' म्हणविल्या गेली आणि ह्याला मानणारे 'धार्मिक' नसून 'बौद्ध' झाले. *बुद्धांची शिकवणुक सांप्रदायिकता-विहीन होती, सार्वजनिक होती. तिला सांप्रदायिक बनविण्यासाठी अन्य शिकवणुकीप्रमाणेच जेव्हा 'बौद्ध-धर्म' म्हटले जाऊ लागले, तेव्हा बुद्धांच्या शिकवणुकीच्या पतनाचे हे एक मोठे कारण झाले.* लोकात ह्या बाबीचा प्रचार होऊ लागला की *"स्वधर्मे निधनं श्रेयः परधर्मो भयावह"- परधर्मात जाण्यापेक्षा स्वधर्मात मरणे श्रेयस्कर आहे. गीतेचे हे बोल बुद्धांच्या नंतरचे आहेत. परंतु गीतेला बुद्धांपूर्वीची रचना सांगून ह्या पदाला जुने म्हणून प्रसिद्ध करण्यात आले.* वस्तुतः ह्याला पुरातन भारतीय संस्कृतीतून घेतले गेले नाही, तर बुर्द्धाच्या शिकवणुकीला बिघडवून ग्रहण केले गेले._

        _ज्याला 'धर्म' म्हणतात त्याला सर्व जाती, वर्ण, गोत्र, संप्रदाय अथवा देश-विदेशाचे लोक एकसमानच स्वीकार करतात कारण धर्म सर्वांचा असतो. "सदाचरणच धर्म आहे. दुराचरणच पाप ह्या बोलात कोणाचेही काहीही मतभेद होत नाहीत. परंतु जेव्हा बुद्धांच्या शिकवणुकीला 'बौद्ध-धर्म' म्हणणे सुरू केले तेव्हा त्यालाही संप्रदायासोबत जोडून लोक हे समजू लागले की हा तर परधर्म आहे, त्यांनी ह्यापासून दूर राहिले पाहिजे. भारतात बुद्धांच्या शिकवणुकीच्या पतनाचे हे एक मोठे कारण झाले._

      _मी शेजारीला देश बर्मा (म्यंमा) मध्ये पाहिले की सर्वसाधारण जनता आपल्या भाषेत बुद्धांच्या धर्माला 'ट्या' म्हणते, ज्याचा अर्थच 'धर्म' आहे. "ट्यो ना था मैं" म्हणजे धर्माचे प्रवचन ऐकू, 'ट्या ठाई मैं" म्हणजे धर्माच्या साधनेत बसु, परंतु सोबतच 'बुद्धीज्म' आणि 'बुद्धीष्ट' शब्दही बहु-प्रचलित झाले, कारण "जसा राजा. तशी प्रजा." *जशी बुद्धांची शिकवणुक सार्वजनिक न राहून सांप्रदायिक झाली तसेच स्वभावतः लोक ह्यापासून दूर पळू लागले.*_

       _ह्याचप्रकारे "सर्व धर्मान्परित्यज्य मामेकं शरणं व्रज" - येथेही सर्व धर्मांचा अर्थ सर्व सांप्रदायिक धर्माशी आहे, ज्यात बुद्धांची शिकवणुकही सामील करण्यात आली. हा ही फसवेगिरीचाच प्रयोग होता, जो बुद्धांच्या शत्रुंनी पसरविणे सुरु केले आणि बुद्धांच्या शिकवणुकीचा ऱ्हास होत गेला.

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_लेखक :- कल्याणमित्र सत्यनारायण गोयन्का_*

_बुद्धवर्ष २५५६, चैत्र पौर्णिमा, २५ एप्रिल २०१३, वर्ष २, अंक २_

*_संकलन :- महेश कांबळे_*

*_दिनांक :-_* २०/०५/२०२५

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

Monday, 19 May 2025

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक कमिटी, मुंबई (विभाग देवरुख)

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक कमिटी, मुंबई (विभाग देवरुख)_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2025/05/blog-post_19.html

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

          _*सन १९३२ साली संगमेश्वर तालुक्यातील कार्यकर्त्यांची सभा श्री. सजनबुवा पुरकर यांच्या अध्यक्षतेखाली साडवली येथे झाली. या सभेत सर्वश्री शिवराम कांबळे, हवालदार पुरकर, भिकाजी गमरे विघ्रवलीकर, पांडू सुभाना पोमींडकर, रामचंद्र यशवंत साडवलीकर हजर होते.* या सभेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करण्यात आला आणि तालुक्यात त्यांच्या विचारांचा प्रचार व जनजागृती करण्याचा, त्यासाठी तालुका संघटन करण्याचा निर्णय घेण्यात आला. *डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अत्यंत विश्वासू सहकारी व कामगार नेते श्री गणपत महादेव जाधव तथा मडकेबुवा यांच्या अध्यक्षतेखाली सन १९३३ मध्ये संगमेश्वर तालुक्यात कसबा (फाशीचा आंबा) व साडवली येथे जोरदार सभा झाल्या. या सभेत मडकेबुवांनी महार वतन, बलुते, गांवात भिक व सण मागणे, स्पृश्यांना जोहार घालणे अशा अनेक रुढी, परंपरा आणि समाजावर लाचारीचे जीवन लादणाऱ्या जातीयतेवर प्रखरपणे हल्ला चढविला. त्यांनी समाजाला अन्यायाविरोधी लढण्यासाठी संघटीत होण्याचे आवाहन केले._

      _या सर्व सामाजिक घडामोडीचा असा परिणाम झाला की *सन १९३३ सालात संगमेश्वर तालुक्यात*...._

१. संगमेश्वर महाल, 

२. फुणगुस महाल, 

३. देवरुख महाल, 

४. देवळे महाल 

*_आणि रत्नागिरी तालुक्यात...._*

५. हातखंबा महाल, 

६. बावीसखेडे महाल, 

७. पावस महाल, 

८. नेवरे महाल, 

९. केळये महाल, 

१०. हरचेरी महाल, 

११. धामणसे-तरवळ महाल, 

          _याप्रमाणे अकरा महालातील पूर्वाश्रमीचा महार समाज महालस्तरावर संघटीत झाला आणि त्यांनी सामाजिक सुधारणा चळवळीस सुरुवात केली._

_त्यावेळी *संगमेश्वर तालुक्यातील कार्यकर्ते रामजी सोमाजी कुरधुंडकर, भिवा रामा बेलारकर, रामजी काळू आंबेडकर, धर्मा काळू करजुवेकर, कृष्णा गोविंद कडवईकर, रामजी नामा साडविलकर, विठोबा चांगदेव कर्लीकर, गणपत सखाराम काटविलकर, मानका लक्ष्मण पुरयेंकर, तुकाराम धर्माजी दाभोळकर, सोमा तानू फुणगुसकर, रत्नू गुणाजी सोनारवाडकर, अर्जुन राजू उंब्रेकर, अर्जुन राघो निगुडवाडकर, विठ्ठल रामा डिंगणकर, रावजी सुभाना धामापुरकर, महादू रामजी नांदलजकर, पांडू बोरसुतकर, बुधा भागा सायेलकर, रत्नू रामजी कुचामकर, पांडु धर्मा शिनगारपूरकर, बाबू भिवा ईलकर*_

      _*या बावीस पुढाऱ्यांनी डॉ. बाबासाहेबांच्या विचारांचा शहरात व खेडोपाडी जोरदार प्रचार केला आणि लोकांना संघटीत करुन सन १९३५ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली मौजे देवरुख येथे सामाजिक परिषद घडवून आणली.* या परिषदेला खेडया-पाडयांतून स्त्री-पुरुष, शेतमजूर, कामगार, चाकरमनी मोठ्या संख्येने, आशेने, हिमतीने सामर्थ्यानिशी हजारोंच्या संख्येत हजर होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो, या गगनभेदी घोषणांनी सारा देवरुख परिसर दुमदुमला होता. लोकांच्या गर्दीने गजबजला होता. *या परिषदेची सर्व व्यवस्था श्री. पांडुरंग गुणाजी पाटगांवकर यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी चोख ठेवली होती. या परिषदेत डॉ. बाबासाहेबांचे जवळचे, जिव्हाळयाचे सहकारी भिवा रामा बेलारकर यांनी तालुक्यातील बावीस पुढारी व जनतेच्या वतीने दलितांचे उद्धारकर्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना फेटा बांधला. त्यांना मानपत्र देण्यात आले.* यावेळी सन्मानार्थी उपस्थित जनतेने टाळयांचा कडकडाट केला. बाबासाहेबांच्या जय जयकारांच्या घोषणांनी आसमंत भरुन पावला. आपल्या नेत्याच्या सन्मानाने कार्यकर्ते, जनता धन्य झाली._

            _*डॉ. बाबासाहेब परिषदेला मार्गदर्शन करताना म्हणाले, तुम्ही गरीब आहात, दरिद्री आहात हे खरे आहे. घाणीची कामे करण्यासाठीच तुमचा जन्म झाला आहे असे सवर्णांचे मत बनले आहे. त्यामुळे गावाची घाण तुम्ही उचलू नका. स्वतःचे घर स्वच्छ ठेवा, मुलांना शिकवा, मृतमांस खाऊ नका, मेलेली गुरे-ढोरे ओढू नका, त्यामुळे तुमच्याविषयी सवर्णांच्या मनात घृणा निर्माण झाली आहे. तुमच्या जमिनी गहाण टाकू नका, परिश्रमाने गरीबीवर मात करा. महारकीकरिता तुमचे स्वतःचे स्वत्व गमाऊ नका, स्वाभिमानाने जगा. निर्धाराने अत्याचाराचा मुकाबला करा. देव-देवस्कीच्या कल्पनेतून बाहेर पडा. कोणीही देव तुमचे कल्याण करणार नाही. मांत्रिक तांत्रिकावर विश्वास ठेवू नका. स्त्रीयांनी चांगले रहाण्याची सवय अंगी बाणवली पाहिजे, त्यामुळे घरात आनंदाचे वातावरण तयार होईल. पुढे त्यांनी खोती पद्धती, वतनदारीमुळे दलितांचे कसे हाल होत आहेत या विषयीची वस्तुस्थिती मांडली आणि शेतकऱ्यावर होणाऱ्या अन्यायाचे विदारक चित्र परिषदेसमोर उभे केले. हिंदू सनातनी अन्यायी वृत्तीचा त्यांनी तीव्र शब्दात धिक्कार केला. डॉ. बाबासाहेबांच्या या मर्मभेदी भाषणाने सर्व जनता मंत्रमुग्ध झाली.*_

_*दुसरी महत्वाची घटना म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिनांक १७ सप्टेंबर १९३७ या दिवशी मुंबई प्रांतिक विधीमंडळात खोतीव्यवस्था निर्मुलन विधेयक सादर केले आणि खोतीपद्धत रद्दबातल करण्याची मागणी जोरकसपणे मांडली. या विधेयकासंबंधी विशेषतः कोकण प्रांतात शेतकरी व कामकरी वर्गाला वेळोवेळी संबोधीत केले. मौजे देवरुख येथे दिनांक १५ मे १९३८ रोजी भरविण्यात आलेल्या शेतकरी सभेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या प्रमुख पुढारी मंडळीसह उपस्थित राहीले. या सभेला स्पृश्य-अस्पृश्य शेतकरी बांधवांसह मुसलमान शेतकरी बांधवही हजारोंच्या संख्येने उपस्थित होते._*

         _या सभेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर शेतकरी वर्गाला उद्देशून म्हणाले, त्यांच्या विधेयकाचा हेतू खोती बिल पास करणे आणि शेतकरी वर्गाची गरीब परिस्थिती सुधारणे हा आहे. शेतकऱ्यांनी आपला सनदशीर लढा लढावा व तो लढत असता सर्व बाजूंनी शेतकऱ्यांनी आपली संघटना करावी. काँग्रेसने जर खोती बिल नामंजूर केले तर पुढे सत्याग्रह मोहिमेस शेतकऱ्यांनी सज्ज राहावे. बहुसंख्यांक असा शेतकरी व कामकरी वर्ग या देशाचा खरा सत्ताधारी वर्ग बनला पाहिजे आणि त्याच दृष्टीने स्वतंत्र मजूर पक्ष धडाडीने कार्य करावयास पुढे सरसावलेला आहे. डॉ. बाबासाहेबांच्या या ओजस्वी वाणीने शेतकरी वर्गात नवचैतन्य निर्माण झाले आणि त्यांना त्यांचा तारणहार नेता गवसला; या आत्मविश्वासाने जय आंबेडकर, खोतीशाही नष्ट होवो या गगनभेदी घोषणांनी गरजला._

*_डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक कमिटी, मुंबई (विभाग देवरुख)_*

           _*मुक्काम देवरुख येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक बांधणे, देवरुख विभागातील बौद्धांच्या सर्वांगीण उनतीसाठी प्रयत्न करणे, विद्यार्थी वसतीगृह चालविणे, प्रचारासाठी आवश्यक ते साहित्य प्रकाशित करणे इत्यादी ध्येय-उद्देशपूर्तीसाठी दिनांक २ ऑक्टोबर १९५८ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक कमिटी, मुंबई (विभाग, देवरुख, ता. संगमेश्वर) ही संस्था अस्तित्वात आली आणि या संस्थेची सन १९५९ मध्ये धर्मादाय आयुक्त कार्यालय, मुंबई येथे मुंबई विश्वस्त कायदा व महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम अंतर्गत नोंदणी करण्यात आली.*_

         _*सर्वश्री भिकाजी बाबू कांबळे, बाळू पांडुरंग जाधव, पांडुरंग भाऊराव कांबळे, देवराज अर्जुन कांबळे, गणपत हीराजी कांबळे, लक्ष्मण भागुराम जाधव, गणपत सखाराम जाधव, गोविंद शिवा कांबळे, भिवा रामा जाधव, सदाशिव गणपत कांबळे, अर्जुन विठ्ठल कर्लीकर, धर्माजी गोपाळ जाधव, विठ्ठल शिवराम जाधव, गुणाजी भोरु कांबळे, तुकाराम धर्माजी जाधव, कमळाकर भिकाजी मोहिते, लक्ष्मण काळया जाधव, भिकू गंगाराम ताम्हणकर, हरिश्चंद्र देवू गमरे, भागुराम बाळाजी जाधव, रावजी देवजी जाधव, महादेव रावजी जाधव, गणपत धर्मा जाधव, यशवंत महादेव जाधव, रावजी राघो कदम, बाबू सादू जाधव, रत्नू जानू जाधव, विश्राम बाळू कांबळे, गेणू राजू कांबळे, विठ्ठल सोनू मोहिते, दौलत भागोजी मोहिते, कानू गौरा जाधव, सावळाराम देवू गमरे, अमृता गणू जाधव, गंगाराम अमृता जाधव, रोंगा राघू जाधव, पंडया दाजी जाधव, विठ्ठल भाऊराम कांबळे, रामचंद्र नामेदव जाधव, बाळू नामेदव कांबळे, शिवराम रामजी शिगवण, तुकाराम जानू जाधव, धोंडीराम सखाराम जाधव, गोपाळ रोंगाजी जाधव, रावजी लक्ष्मण जाधव, देवू सजना पवार, रामचंद्र जानू कदम, बाबूराव पांडूरंग जाधव, सिताराम राघो कांबळे, बुधाजी बाळू कांबळे, रावजी गोविंद कांबळे हे सर्व मान्यवर देवरुख विभाग संस्थेचे संस्थापक सदस्य आहेत.*_

             _या संस्थेचे पहिले कार्यकारी मंडळ येणे प्रमाणे होते. अध्यक्ष-लक्ष्मण भागुराम जाधव, उपाध्यक्ष-भिवा रामा जाधव, जनरल सेक्रेटरी-अर्जुन विठ्ठल कर्लीकर, दुय्यम सेक्रेटरी-धर्माजी गोपाळ जाधव, खजिनदार - गुणाजी भोरु कांबळे, दुय्यम खजिनदार बाबूराव पांडुरंग जाधव, सभासद-तुकाराम धर्माजी जाधव, कमळाकर भिकाजी मोहिते, एस. आर. जाधव, पांडुरंग भाऊराव कांबळे, गणपत हिराजी कांबळे, देवराम अर्जुन कांबळे, गंगाराम भागुराम जाधव, विठ्ठल शिवराम जाधव, गणपत सखाराम जाधव, सदाशिव गणपत कांबळे, बाळू पांडुरंग जाधव, गोविंद शिवा कांबळे, लक्ष्मण काळया जाधव, भिकाजी बाळू कांबळे, भिकाजी गंगाराम कांबळे, सिताराम राघो कांबळे, शिवराम रावजी शिगवण._

         _*संस्थेने मुक्काम देवरुख येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह बांधण्यासाठी माहे फेब्रुवारी १९६० मध्ये जमीन खरेदी केली आणि या खरेदीखतपत्रावर संस्थेचे उपाध्यक्ष भिवा रामा जाधव यांनी स्वाक्षरी केली. त्याच ठिकाणी देवरुख विभाग ३६ गावे ग्रामिण व मुंबई बौद्धजन भावकी संघटनांच्या सहकार्यातून "डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृहाची" उभारणी झाली आणि संस्थेच्या उद्देशपूर्तीचा पहिला टप्पा पुर्णत्वास गेला.*_

             _मौजे देवरुख येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह हे एक आंबेडकरी चळवळीचे केंद्र आहे. येथूनच संगमेश्वर तालुक्यातील डॉ. आंबेडकर प्रणित सामाजिक, राजकीय, धार्मिक व सांस्कृतिक चळवळीला दिशा देण्याचे काम केले जाते. *डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली सन १९३५ मध्ये पार पडलेली सामाजिक परिषद, दिनार्क १५ मे १९३८ रोजी शेतकरी वर्गाची सभा पार पडली.*_

             _या महत्वपूर्ण घटना देवरुख परिसराचे ऐतिहासिक महत्व अधोरेखीत करतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मशताब्दी वर्षात (सन १९९१-९२) देवरुख येथे त्यांचा उभारण्यात आलेला पुर्णाकृती पुतळा हे आंबेडकरी समाजाचे प्रेरणादायी स्फूर्तीस्थान आहे. या अनेक गोष्टीमुळे मौजे देवरुख परिसराला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे._

            _या संघटनेच्या वतीने सन २००१ मध्ये निवड झालेल्या श्री. श्रीपत ल. मोहिते यांच्या अध्यक्षतेखालील कार्यकारी मंडळाच्या अधिपत्याखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह इमारतीची पुर्नबांधणी करण्यात आली आणि यावेळी सभागृहाला आंबेडकरी चळवळीला साजेसे अनुरुप देण्यात आले आहे. या नवीन सभागृह इमारत उभारणीत सर्वश्री वाय. जी. पवार, राजाराम रा. कदम, यांचे महत्वपूर्ण योगदान आहे._

              _देवरुख विभाग (मुंबई/ग्रामिण) संघटनेच्या वाटचालीत व कामकाजात सर्वश्री भरत बा. जाधव (कुडवली), श्रीपत ल. मोहिते (तुळसणी), प्रदिप का. कांबळे (सोनारवाडी), डी. के. जाधव (पाटगांव), हिराजी सि. मोहिते (तुळसणी), प्रकाश गु. कांबळे (तळेकांटे), विलास शिवगण (हातीव), अनंत स. जाधव (निवे), सुरेश शि. शिगवण (हातीव), प्रकाश स. मोहिते (आंबवली), भरत ल. जाधव (बेलारी), विठ्ठल मोहिते (तुळसणी), सुधाकर र. कांबळे (तळेकांटे), पांडुरंग कांबळे (फणसट), देवजी बा. जाधव (खडीनिवे), अजित सो. कांबळे (तामनाळे), अशोक जाधव (आंगवली), चंद्रकांत दे. जाधव (निगुडवाडी), प्रदिप का. जाधव (सोनारवाडी), गणपत ह. कांबळे (खडी ओझरे) शंकर रत्नू जाधव (कर्ली), प्रकाश पवार (बोंडये), प्रकाश ज. मोहिते (तुळसणी), रमेश गो. जाधव (विघ्रवली), यशवंत वि. जाधव (कर्ली), सदानंद भि. कांबळे (तामनाळे) व्ही.एच. कांबळे (तामनाळे), डी. एस. सकपाळ (देवधामापूर), विजय गौ. मोहिते (साडवली), बी. व्ही. जाधव (आंगवली), एस. आर. जाधव (कर्ली), विलास कृ. पवार (बोंडये), दिलीप ग. कांबळे (फणसट), दिपक शि. शिगवण (हातीव), संतोष द. जाधव (काटवली), दिपक ज. कांबळे (वायंगणे), संतोष गं. कांबळे (हरपुडे), दिलीप का. मोहिते (आंबवली), अनिल ना. जाधव (काटवली), सचिन भ. जाधव (निवेखुर्द), बबन शं. मोहिते (साडवली), प्रशांत वि. जाधव (बामणोली), शशिकांत स. जाधव (ताम्हाणे), नंदु दे. जाधव (देवघर), दिलीप बा. कदम (देवरुख), प्रशांत वि. जाधव (बामणोली), वाय. जी. पवार (बोंडये), राजाराम कदम (देवरुख), कृष्णा कदम (देवरुख), चंद्रकांत बा. जाधव (कुडवली), संजय मोहिते (आंबवली), बी. आर. कांबळे (हरपुडे), कमलाकर ह. कांबळे (माळवाशी) या अनेक कार्यकर्त्यांचा सहभाग व योगदान आहे._

        _श्री. अशोक भि. जाधव (निवेबु।।) यांच्या अध्यक्षतेखाली खाली कार्यकारी मंडळ सद्या कामकाज करीत आहे._

१) अशोक भिकाजी जाधव (अध्यक्ष)

२) संजय रामचंद्र मोहिते (उपाध्यक्ष)

३) मनोहर शिवराम मोहिते (उपाध्यक्ष)

४) रमेश बाबू जाधव (उपाध्यक्ष)

५) सुनिल श्रीपत जाधव (सेक्रेटरी)

६) संदिप गोविंद पवार (उपसेक्रेटरी)

७) संतोष दत्ताराम जाधव (उपसेक्रेटरी)

८) महेश हरिश्चंद्र कांबळे (उपसेक्रेटरी)

९) विलास कृष्णा पवार (खजिनदार)

१०) दिलीप रामचंद्र कदम (उपखजिनदार)

११) दिलीप काशिराम मोहिते (हिशोब तपासणीस)

१२) राहूल शिवराम गमरे (सल्लागार)

१३) मिलिंद तुकाराम जाधव (सल्लागार)

१४) भालचंद्र रघुनाथ कांबळे (सल्लागार)

१५) अनिल सोमा जाधव (सल्लागार)

१६) संजय विठ्ठल कांबळे (सल्लागार)

१७) अनिल नारायण जाधव (सभासद)

१८) कमलाकर हरी कांबळे (सभासद)

१९) प्रकाश गणपत जाधव (सभासद)

२०) संदीप यशवंत जाधव (सभासद)

२१) रमेश बाळू कांबळे (व्यवस्थापक)

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_संकलन :- महेश कांबळे (तळेकांटे)_*

*_संदर्भ :- संगमेश्वर तालुका - डॉ. आंबेडकर प्रणित सामाजिक चळवळ : वास्तव आणि वाटचाल_*

*_मुळ लेखक :- वि ल मोहिते_*

*_दिनांक :- २०/०५/२०२५_*

*_टिप :- संगमेश्वर तालुक्यातील आंबेडकरी चळवळीचा इतिहास अभ्यासाचा असेल तर वरील पुस्तक अभ्यासावे_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

Saturday, 17 May 2025

धम्म चर्चा ८ ठिकाणी करू नये

 

भंते मी आपणासी एकांतात काही बोलू इच्छितो तेथे कोणीही तिसरा मनुष्य असता कामा नये बौद्ध भिक्षू राहण्यास योग्य अशा आठही अंगाने युक्त निर्मूल्य जंगलात येईल निवांत स्थळी मी माझे विचार आपणास सांगावे असे मला वाटते आपण उभा आहात कोणतीही गोष्ट बघता रहस्यमय असू नये भंते गंभीर स्वरूपाच्या सल्लामसत चालत असताना जे रहस्य उघड केले जाते ते एकमेका पात्र झालोय असे मला वाटते आपल्या मनातील भाव उपमेच्या आधाराने देखील स्पष्ट करता येतात पण ते ज्याप्रमाणे या धरणीवर विश्वास ठेवून मौल्यवान धन दौलत तेजमध्ये पुरवून सुरक्षित ठेवली जाते तदोत मी सुद्धा आपणाकडून अत्यंत गंभीर स्वरूपाचे रहस्य ऐकून ते सुरक्षित ठेवण्यास पात्र आहे यात मुळीच शंका नसावी राजा मेरे आणि त्यांचे गुरु नागसेन हे दोघेही ठरल्याप्रमाणे अशाच एका शांत ठिकाणी पोहोचले तेव्हा राजा म्हणाला धर्माच्या गोड अशा रहस्यमय तत्वावर चर्चा करणाऱ्याने आठ प्रकारच्या स्थळांना टाळण्यास बरे या आठ ठिकाणी कोणताही बुद्धिमान मनुष्य अशा धर्म चर्चा करणार नाही कारण चर्चा करून सुद्धा काहीच निर्णय लागत नाही आणि मुद्दा तसाच पडून राहतो गेल्यानंतर म्हणतात मागे मी तुम्हाला प्रस्तावने बरच सांगितलं की काय नेमकं राजाला काय प्रश्न पडले होते की काही काही गोष्टी तर्क समजत नाहीयेत आणि त्याला उत्तर नागसेन देऊ शकतात आणि म्हणून ते त्यांना म्हणतात की मलाही प्रश्न समजले मी समजलो परंतु पुढे येणाऱ्या आपल्या धम्मावरती विरोधकांनी शत्रूचा उल्लेख म्हटलं पण धर्माला कधी शत्रू नसतात विरोधक असतात विरोधकांनी आपल्या धम्मावरती वरती कुठलेतरी आक्षेप घेऊ नये आणि म्हणून माझ्या मनात निर्माण झालेले मेंढक प्रश्न मी तुम्हाला विचारतो परंतु धर्म चर्चा करता नाही अशी आठ स्थळ आहेत की तिथं धर्म चर्चा करता येत नाही आता होतं काय की नेमकं आपल्याला तेच माहिती नसल्यामुळे आपण धर्म चर्चा कुठेही सुरू करू शकतो की नाही रस्त्यावर भेटला जय भीम म्हटला की सुरू होते आपली धम्म परिषद आणि मग म्हणून म्हणतात की इथून धम्माला सुरुवात होते की धम्म सांगताना आणि ऐकताना म्हणून नाही सांगितलं की धम्म जोपर्यंत विनंती केली जात नाही तोपर्यंत सांगू नये आणि म्हणून राजा मिलिंदाला कारण राजा मिलिंद अनाडी सेवक नाही किंवा अनाडी उपासक नाहीये तो खूप हुशार उपासक आहे आणि म्हणून त्याला बऱ्याचश्या गोष्टी माहिती आहे आणि म्हणून तो भंतेजींना म्हणतो की भंतेजी की अशा आठ जागा आहेत की तिथे धर्म चर्चा होऊ शकत नाही आणि मला तर अशा काही गोष्टी विचारायच्या आहेत की ज्याच्यामध्ये कुठलीही अडचण येता कामा नये तर अशा आठ ठिकाण वळून आपण अशी जागा शोधूया आठ ठिकाण कुठले आहेत जिथे धर्म चर्चा करता येत नाही हे आठ स्थाने अशी आहेत 


१) उताराचे स्थान २) सुरक्षित भयावह असे स्थान ३) वादळे वाहत असलेले स्थान ४) अत्यंत गुप्त असे स्थान ५) पवित्र असे देवस्थान ६) जिथे अधिक रहदारी असे स्थान ७) पूल आणि ८) स्थिर म्हणाले महाराज या स्थळावरील दोष कोणते की जेणेकरून स्थाने आणि म्हणून आठ स्थळ सांगतो की ह्या आठ जागेवरती धम्म चर्चा करतात येत नाही. विचारतात पूर्ण कल्पना आहे पण त्यांना विचारतात तुम्ही आठ स्थळ सांगितले बरोबर आहे परंतु या स्थळावर काय असं दोष आहे की तिथे आपण चर्चा करू शकत नाही कारण राजा मिलिंदाचे दोघेही एकमेकांच्या बुद्धिमत्तेची एक कळस गाठणार आहेत की जसं राजा मिलिंद सांगतो की आठ ठिकाणी करता येत नाही तर विचारतात आठ ठिकाणी काहीतरी दोष असले पाहिजे जिथे आपण धर्म करू शकत नाही तर असे काय आठ ठिकाणी तर 

१) पहिलाच आहे चढ उताराचे स्थान आता आपण जर समजा की जिथे डोंगर आहे आणि उतार आहे डोंगरावर चला आता समजा आपण तुम्हाला म्हटलं की चला आपण धम्म चर्चा डोंगरावर करू, चढाच्या ठिकाणी चालत गेल्यानंतर दम लागणार आणि उतरता नाही तुम्हाला हे होणार आणि म्हणून मनाची स्थिती कधी नेहमी बघा आपण कुठल्याही तुम्ही धार्मिक स्थळी किंवा कुठं जर प्रवचन चालू असलं, कुठलातरी वक्ता बोलत असतो आणि श्रोता असतात आपसात बोलत असतो का होतं असं? एक एक तर श्रोत्याचं वक्तृत्व कमी पडतं किंवा त्याची बुद्धिमत्ता कमी पडते किंवा ऐकणारा श्रोताही तयार नसतो. आता आपण बऱ्याच वेळा चर्चा केली की धम्म चर्चा ऐकणाराही तुमच्या जोपर्यंत श्रद्धा जागृत होत नाही तोपर्यंत धम्म चर्चा आपण म्हणतो. काय लोक दुय्यम स्थान देतात येतच नाही. कारण चूक त्यांची नाही त्यांच्यामध्ये अजून श्रद्धा उत्पन्न झालीच नाही. जोपर्यंत श्रद्धा उत्पन्न होत नाही तोपर्यंत तुम्ही आणि मारून मुटकून आणले तर मात्र ते तरी ते ऐकणार नाही समजा काहीतरी दंडक लावला किंवा तुम्ही जर नाही झाले तर आम्ही तुमच्या लग्नालाच येणार नाही. तुमच्या पहिल्या जमात वाळीत टाकणं म्हणत होते की नाही आणि हे विहार पूर्ण भरलं जरी तरी ते प्रवचन ऐकण्याच्या मूडमध्ये नसणार. म्हणून जोपर्यंत श्रद्धा होत नाही म्हणजे चढ आणि उतारमय कुणाला तरी फोर्स करून आणलंय आणि अशा ठिकाणी केलं की जिथे चढायची जागा आहे उताराची जागा आहे तिथे तुमचं लक्ष लागणार नाही. म्हणजे धम्मचर्ला जे अनुकूल वातावरण लागतं त्यातली पहिली जागा जर कुठली असेल, तर जिथे चर्चा नाही करताना ती चढ आणि उताराची जागा आहे की जिथे साधारणतः आपण डोंगर किंवा टेकडी अशा ठिकाणी म्हणू तर ही जागा धम्म चर्चेक करता सुनेल 

२) दुसरी असुरक्षित आणि भयावह, आता अशा ठिकाणी जर तुम्हाला नेलं समजा चर्चा करायला की जिथे एकदम भुयार आहे मोठं खूप भयानक परिस्थिती आहे तुमचं मन खरंच स्थिर राहील का तिथे? एखाद्या वेळेस सांगणारा समजा सिद्ध असेल तर तो स्थिर राहील पण ऐकणारा राहील का? किंवा ऐकणारा सिद्ध असेल तर सांगणारा राहील का? तुम्हाला सांगितलं की वाघाचे उपाय कधी वाघ येऊ शकतो तिचा प्रवचन ऐकता येईल का कारण त्याचा अर्ध वागत असेल आला का तिकडून गेला का हे झाला का ते झाला का म्हणून जी अति सुरक्षित नाही किंवा भयावह जागा आहे अशाही ठिकाणी तुम्हाला धम्म चर्चा करता येणार नाही.

३) तर तिसरा आहे वादळी वारे वाहत असलेले त्यावेळेस परिस्थिती तुमच्या आवाजाला डिस्टर्ब करणार काय होतं तर वादळी. आता तुमच्या आवाजाला डिस्टर्ब करणाऱ्या कितीतरी गोष्टी निघाल्या अशी जागा की जिथून गाड्या पास अशी जागा की जिथे डीजे नेहमीच वाजत राहतो, तिथे धम्म प्रवचनामध्ये तुमचं मन लागेल का नाही लागणार म्हणून राजा सांगतात त्यावेळेस वारे वाजत होते त्यावेळेस डीजे नव्हते, त्यावेळेस वाहन रथ होतं फक्त कारण ते काय आवाज करत जात नव्हतं आणि म्हणून आजच्या घडीला वादळी फक्त उपयोगी पडतील का? नाही आजच्या घडीला तुमचं रहदारी ठिकाण असेल किंवा आवाजावी असेल मोटाचा कर्कश आवाज असेल किंवा डीजे असो किंवा कुठेतरी मोठं नाच गाण्याची पार्टी चालू आहे आणि त्याच्या स्टेजच्या पाठीमागे बसून धर्म चर्चा होऊ शकेल का म्हणून असं ठिकाण की जिथे धर्म चर्चा होणार नाही त्यांनी वादळी वारे लिहिले पण आजच्या जमान्यामध्ये जिथे घोंगाट आहे हे आहे तिथेही चर्चा नाही होऊ शकणार 

४) अत्यंत गुप्त ठिकाण असं एखादं ठिकाण आहे की ते खूप गुप्त ठिकाणी आहे, जिथे कोणीही जाऊ शकत नाही. अशा ठिकाणी चर्चा का नाही होऊ शकणार? तर त्या गुप्त ठिकाणी माणसाच्या मनामध्ये नेहमी भीती राहत राहील की कोणी ऐकतोय का कोणी ऐकतोय का कोणी चोरून हे करतय का कारण नेहमी म्हणतात ना की जर कुठलीतरी गुज गोष्ट करायची असेल तर सगळे लोक म्हणतात की भिंतीला कान असतात ना ! म्हणजे अत्यंत गुप्त ठिकाणी गेला तरी लावून काय कोणीतरी ऐकत असेल म्हणून अत्यंत गुप्त ठिकाणी तुमची चर्चा होऊ शकत नाही 

५) किंवा एखादं अतिपवित्र स्थान तुम्ही आता आपण जे ऐकतोय आज आपण या धार्मिक स्थळावरती बसलो. आता आपली काय काय सुरू आहे? कारण चर्चा आणि प्रवचन याच्यामध्ये फरक आहे. कारण चर्चा ही दोघात घडून आलेली साधक बादक विचार. प्रवचन कसं एकजण देतो आणि बाकीच्यांनी श्रवण करायचं. म्हणून अति धार्मिक ठिकाणी चर्चा होऊ शकते का? कारण त्याही वेळेस भगवान बुद्धाकडे तुम्ही जर विचार केला तर वेगवेगळ्या ठिकाणी निर्णय सविस्तर वर्णन आहे की बुद्ध वेळूनामध्ये विहार करत असताना कुठेतरी येत आणि त्यांना प्रश्न विचारतात. वनामध्ये कुठे असतात भगवान बुद्ध त्यांच्या कुटीमध्ये असतात. चर्चा कुठे होते मग कुटीमध्ये होते किंवा एका स्थानावर होते परंतु आज इथे आपण प्रवचन देतो आणि तुम्ही प्रवचन ग्रहण करतात. कारण का एखाद्या अत्यंत पवित्र ठिकाणी का चर्चा नाही होऊ शकत तर त्याला अति गंभीर स्वरूप येत. कधी कधी आपण म्हणतो ना की विहारामध्ये अपशब्द वापरू नये. चर्चेमध्ये कधी कधी काही गोष्टी अशा निघतात की त्या समजावून देताना काही काही गोष्टींनी बोलावं लागेल, काही काही की ज्या आता कसं समजावून सांगता येईल तुम्हाला की आपण समजा राज्यसभा किंवा लोकसभेमध्ये काही शब्द त्यांनी निषेध मानलेले आहे की हे लोकसभेमध्ये बोलता येणार नाही आणि चुकून माकून कोणी बोललं की ते व्यवहारातून काढून टाकतात. ना कारण ही संकल्पना कुठून घेतलेली आहे विनय पिटकातून की जेव्हा धम्मचर्चा चालू असते तेव्हा पहिले नियम ठरवलेले असतात 

(राजा तुम्ही आठवा सुरुवातीला राजा जेव्हा चर्चा करायला नागक्षणाला बोलवतो तेव्हा पहिलं ठरतं की काय म्हणतात की मी भंते सारखी चर्चा करेल आणि तू उपासकाशी सारखी चर्चा केली पाहिजे नाहीतर मी भिक्षू सारखी चर्चा करेल तू राजासारखी चर्चा करेल तर त्याला काही अर्थ राहणार नाही)

 आणि म्हणून त्यात नियम ठरले पाहिजे म्हणून एखाद्या अति पवित्र ठिकाणी काय नियम ठरलेला असतो समजा विहाराचा आहे ना विहारातला अलिखित नियम काय किंवा दारू पिऊन ह्या विहारात हा अलिखित नियम आहे की नाही आता आलास तर काय आपण त्याच्या डोक्यात दगड घालणार नाही कारण दारू पिणारा माणूस खूप मोठ्या ताक त्याच्यावरती असतो परंतु एक नियम आहे की त्या पवित्र विहारामध्ये किंवा पवित्र जागेमध्ये माणसाच्या धर्म चर्चेला बंधन आहे. म्हणून अशा अशा ठिकाणी धम्मचर्चा होऊ शकत नाही की ते अतिपवित्र स्थळ आहे 

६) सहावा आहे की जास्त रहदारी आहे मी आता असंच सांगितलं की सहावं स्थान कसं आहे की रस्त्याने रहदारी चालू आहे आणि तुम्ही दोघेजण उभे राहून धम्म चर्चा करू शकणार नाही. कारण त्या रहदारीच्या याच्यामध्ये दोघांचाही त्या धार्मिक त्याच्यावरती चित्त एकाग्र होणार नाही. आणि म्हणून तुम्ही धार्मिक चर्चा करू शकणार नाही. काय होतं? बऱ्याचशा गोष्टी आपण कुठे काय केल्या पाहिजे हे ठरलेलं असतं आणि मग रोड वरती जेव्हा तुम्ही धम्म चर्चा करायला लागता, तर रोड वरती मारामारी होण्याची शक्यता असते. कारण आजही तुम्ही बघा रोड वरती चर्चा जर तुम्ही कधी ऐकल्या असतील पण रोडवरच्या चर्चेचा स्वरूप कसं असतं सांगणाऱ्याला वाटतं की यांनी एकट्याने ऐकू नये, रस्त्याने जातात त्यांनी ऐकावं. म्हणून तो त्यांना उद्देशून बोलत असतो. आणि ऐकणाऱ्याला वाटत असते फक्त माझ्यापुरत कशाला भानगडीत पडला आणि मग त्या चर्चेला उथळ स्वरूप येण्याचा संभव असतो म्हणून रहदारीच्या ठिकाणी तुम्हाला चर्चा करता येत नाही.

७) सातव कारण आहे पूल एखाद्या पुलावर उभे राहून तुम्ही धार्मिक चर्चा करू शकाल का? कारण त्या पुलावरती उभे राहून तुमचं लक्ष कुठे जाईल कशावर बांधल्या जातात नदी नाना याच्यावरती बांधल्या जातात आणि म्हणून त्या पुलावर उभं राहून धर्माच्या त्या गोष्टीकडे लक्ष नाही राहणार तर नेमकं ते कुठल्या गोष्टीवर बांधलाय आणि त्याच्यावरनं काय सुरू आहे याच्यावरती होईल बघा किती डीपली त्या राजाने विचार केलेला आहे की मला जर हे मेंडक प्रश्न विचारायचे तर स्थानही कसं असावं त्याच्या आठ स्थानामध्ये सांगितलं त्यांनी की पुलासारख्या ठिकाणी आपल्याला धार्मिक चर्चा करता येणार नाही. 

८) तर दुसरा आहे घाट घाट म्हणजे काय म्हटलंय आता घाटाचे तीन प्रकार आहेत. आता तुमच्या कुंभमेळा सुरू आहे घाटच म्हणतात. तो एक घाट आहे आणि एक घाट आहे डोंगर माथ्याचा. त्या डोंगर माथ्यावरती विरळ असतं, त्यावेळेस बुद्धाला सांगण्याची परिस्थिती कशी आहे की धर्म चर्चा करताना त्या घाटावरती नाही आणि आजच्या परिस्थितीत घेतलं तर कुंभमेळात खरच धार्मिक चर्चा होत असेल का तिथे? आता कुठली चर्चा झाली शंकराच्या म्हणून त्यांचा उद्देश काय बौद्ध लिटरेचर मध्ये कुंभ हा कधीपासून सुरू झाला तर राजा हर्षवर्धनाच्या काळामध्ये. त्याला कुंभ म्हणत नव्हते तर दानभूमी म्हणायचे. कारण राजा हर्षवर्धन पाच वर्ष जेवढी काही संपत्ती जमा व्हायची, ती पाच वर्षानंतर त्या संगमावरती तो दान करायचा. आणि म्हणून त्याला दान भूमी म्हणायचे. चिनी प्रवासी युवान आणि यांच्या प्रवास वर्णामध्ये आलेलं आहे. आता हा विषय आपला नाही त्याच्यावर चर्चा करण्याचा परंतु घाट आला म्हणून त्या घाटावर परत धार्मिक चर्चा आता सुरू आहेत का? धार्मिक चर्चाच नाही तिथे कारण धार्मिक चर्चा होऊ शकत नाही? अशा ठिकाणी धार्मिक चर्चा घडू शकत नाही हे राजा मिलिंदाने नागसेनाला सांगितले नागसेनाला जेव्हा आठ स्थान तेव्हा नागसेन विचारतात की घाटावरती चर्चा नाही होऊ शकत आणि म्हणून अशी आठ ठिकाण आहेत की ज्या ठिकाणी धार्मिक चर्चा होऊ शकत नाही आणि म्हणून राजा मिलिंद आणि बनते नुसती धार्मिक चर्चा करताच नाही पण भिक्षूला राहण्याकरता आठ स्थानाची हे आठ स्थान भिक्षूला राहण्याकरता योग्य नाही आणि म्हणून बघा भगवान बुद्धाने जेव्हा जेव्हा वेळुवन असेल असेल हे स्वीकारली हे आठ प्रकारात बसत नाही कधी कधी तुम्ही जर त्रिपिटकामध्ये गेला तर वर्णन येतं की राजा आपल्या रथातून जिथपर्यंत रथ जात होता तिथपर्यंत रथाने गेले आणि नंतर उतरून चालत गेले याचा अर्थ काय रहदारी ठिकाण ते नाही तिथे भिक्षू किंवा बौद्ध राहतात म्हणून हे नुसतं चर्चे ठिकाण नाही तर बौद्ध भिक्षू आता हल्ली आपण बघतच कारण आपले विहार आता अशा ठिकाणी आहेत सगळ्या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे. त्यालाही बऱ्याच जणांचं उत्तर असतं की ही धार्मिक चर्चा नाहीये धार्मिक चर्चा कुटीमध्ये होऊ शकते त्यालाही वेगवेगळे आहे आणि म्हणून परत आमचे भिक्षू लोक त्याला उत्तर देतात की भगवान बुद्धांनी सांगितलं स्तळ काल आणि वेळ परतले तुमचे विनय बदला. आजही धार्मिक चर्चाला मला असं वाटतं हे अटीच्या अटी नियम जशाला तसे लागू पडतात आणि म्हणून धार्मिक चर्चा जर करायची असतील तर माणसाने ह्या आठ स्थानाचा तर अवश्य विचार केला पाहिजे आणि आठ स्थान जेव्हा राजा मिलिंद नागक्षेनाला सांगतो तर ही आठ स्थान भंते सांगतात की बरोबर आहे आठ स्थानावरती धार्मिक चर्चा होऊ शकत नाही 

स्थानच सांगत नाही तर तो राजा पुढे सांगतो की धार्मिक चर्चा करण्यास अयोग्य अशा आठ व्यक्ती आहेत आता आपण आज बघितलं की स्थानच आहे का तर धार्मिक चर्चा करण्याला आठ प्रकारच्या व्यक्ती अयोग्य म्हणून मी सुरुवातीला सांगितलं की धर्माची चर्चा किंवा धर्म ऐकणं हे जोपर्यंत तुमच्या श्रद्धेचा विषय होत नाही तोपर्यंत तुम्ही येऊ शकत नाही किंवा धर्म श्रवण करणे ही जोपर्यंत आपल्यात ती निर्मिती होत नाही तोपर्यंत तुम्ही धर्म श्रवण करू शकत नाही मग कोण धार्मिक चर्चा करणारा अशी कोण व्यक्ती अलायक आहेत की जे राजा मिलिंद नागसेनाला सांगतो की आठ व्यक्ती जर असतील सोबत तर धार्मिक चर्चा घडू शकत नाही अशा आठ व्यक्ती कोण आहेत आपण त्यात बघूया भंते नागक्ष 

चर्चेचा विषय बिघडवून अर्थाचा अनर्थ करणारे आठ प्रकारचे लोक असतात म्हणून महत्त्वपूर्ण चर्चा करीत असता त्यांचा संघ टाळला पाहिजे ते आठ प्रकारचे लोक 

१) लालसी 

२) द्वेष म्हणजे दुष्ट 

३) भ्रमिष्ट 

४) गर्विष्ट 

५) लोभी 

६) आळसी 

७) एकच कल्पना धरून ठेवणारा हट्टे आणि 

८) मूर्ख हे आठ प्रकारच्या लोकांबरोबर धार्मिक चर्चा होऊ शकत नाही किंवा तेच आपल्या आजूबाजूला जरी असले तरी तिथे धार्मिक चर्चा घडू शकत नाही कारण कधी कधी तुम्ही बघा 

१) जो लालची माणूस असतो लालची माणसाचा स्वभाव काय आहे की मला काय मिळतं याच्या पलीकडे त्याचा धम्म जात नाही आणि मग जेव्हा आपण धार्मिक चर्चा करत असताना जर बाजूला असेल तर त्या अर्थाचा एवढ्या प्रकारात तो लावतो की तुम्ही जर म्हटले की आता आज आपल्या विहारामध्ये आपल्याला अमुक अमुक कार्यक्रम घ्यायचा आहे तो लालची माणूस असेल तर त्याच्या मनामध्ये पहिला प्रश्न काय निर्माण होईल की तो कार्यक्रम करताना मला काही भेटणार आहे आणि त्याला जर भेटणार नसेल तर मग मात्र तुमच्या त्या कार्यक्रमाचा अर्थाचा तो अनर्थ करून टाकेल तो दुसऱ्याला बिघडून टाकेल काय तुम्ही जर सांगितलं की आज आपल्याला श्रद्धा रक्षित भंतेजी प्रवचन ठेवायचं आणि प्रवचन ठेवण्याकरता अमुक अमुक कार्यक्रम करायचा अमुक अमुक काही गोष्टी करायच्या तो लालची माणूस कशाच्या असेल की भंतेच्या प्रवचनात जर गेलं तर मला लालच कशाची असते लालच माणसाला लालसा आणि लालच या दोन गोष्टी आहेत. तर लालसा माणसाला बुद्धीची असू शकते की मला तिथे काय मिळणार आहे पण लालच ही मात्र फक्त खाली तुम्हाला मिळणाऱ्या द्रव्याची किंवा आकांक्षाची किंवा तृष्णेची असू शकते. लालसा बुद्धीची आणि लालच तॄष्णेची असू शकते आणि म्हणून कुठल्याही कार्यक्रमामध्ये लालची माणसाला आपलं हित फक्त तो बघेल की मला तिथे काय मिळतंय का आणि म्हणून जर लालची माणूस आपल्या आजूबाजूला असेल तर तिथे धार्मिक चर्चा घडू शकत नाही तर 

२) दुसरा व्यक्ती आहे द्वेषात आणि दुष्ट की ज्या माणसाच्या मनामध्ये द्वेषचला आणि तिथे जर तुम्ही धार्मिक चर्चा करायला गेला विधायक चर्चा करायला गेला तर तो दोष आणि दुष्ट करणाऱ्या माणसाजवळ तुम्ही धार्मिक चर्चा करू शकत नाही कारण तो त्याचाही अर्थाचा अनर्थ लावून टाकेल तुमच्या कुठल्यातरी विधायक कामाला तो असं काही स्वरूप देईल की त्याचा अर्थ बिघडून जाईल आणि म्हणून दुसऱ्या टाईपचा माणूस आहे तो जर आजूबाजूला असेल तर धार्मिक चर्चा घडू शकत नाही तर 

३) तिसऱ्या प्रकारचा माणूस आहे कारण जर भ्रमिष्ट माणूस असेल म्हणजे काय की त्याला स्वतःलाच काही कळत नाही भ्रम पैदा करणं काही काही गोष्टीचे नुसता भ्रमिष्ट म्हणजे तो स्वतः भ्रम निर्माण करत असतो आणि असा माणूस जर आजूबाजूला असेल तर धार्मिक चर्चा होऊ शकत नाही कारण आजही आपल्या पूर्ण संघ आपण काय म्हणतो ना चळवळी भ्रमिष्ट झाल्या धार्मिक असेल आर्थिक असेल राजकीय असेल आपल्यापुढे भ्रम निर्माण केला जातो कसा की जर तुम्ही काँग्रेसला मतदान नाही दिलं तर बीजेपी निवडून येईल मोठमोठे लोक सांगतात भ्रमिष्ट आहे त्यांना सांगायला तुमच्याकडे हे नसतं की बाबा रे बाबासाहेबांच्या काळामध्ये बाबासाहेबांनी कोणाशी युती न करता या महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 16-16 एमएलए निवडून आणले होते कारण असं भ्रमिष्ट माणसाबरोबर ना तुम्ही धार्मिक चर्चा करू शकत ना आर्थिक चर्चा करू शकत ना राजकीय चर्चा करू शकत आणि म्हणून मिलिंद प्रश्नांमध्ये जरी धार्मिक सांगितलं असेल परंतु हे प्रश्न तुमच्या सगळ्याला लागू पडतात की अशी व्यक्त तुमच्या राजकीय लेव्हल वरती तुम्हाला उभं राहू देत नाही धार्मिक लेव्हल वरती उभं राहू देत नाही तर आर्थिक लेव्हल वरती उभं राहू देत नाही आणि म्हणून त्या म्हणी पडल्यात की नाही की माणसाला घोड्यावरही बसू देत नाही आणि पायी चालू देत नाही हे कोणाचं लक्षण आहे भ्रमिष्ट करणाऱ्याचं लक्षण की तुम्हाला असं भ्रमिष्ट करून टाकायचं की तुम्ही त्या चर्चेमध्ये चर्चेचे अर्थच बिघडून जातात अर्थ बदलून जातात म्हणून आज आपल्या सगळ्या चळवळी भ्रमिष्ट लोकांच्या त्याच्यामुळे झालेल्या आहेत आणि म्हणून भ्रमिष्टाचे प्रमाण जास्त असल्यामुळे ना धार्मिक चर्चा घडतात ना राजकीय चर्चा घडतात ना आर्थिक चर्चा घडतात आणि तिन्ही चर्चा जोपर्यंत कारण समाज कशामुळे उभा राहतो धार्मिक होऊन भागणार आहे का तुम्हाला सकाळी उठलं आपल्या बंधना सुरू केलं काय होणार आहे सकाळी उठल्यापासून सुरुवात केली संध्याकाळ पर्यंत धार्मिक राहिला धार्मिक भागणार आहे बाबासाहेब तेच म्हणतात की धार्मिक होऊन नाही बघणार की तुम्हाला धार्मिका बरोबर तुम्हाला आर्थिक आणि राजकीय बनावं लागेल तोपर्यंत तुमच्या धार्मिक पणाला काही अर्थ राहणार नाही तुम्ही किती धार्मिक वागायचं केलं आणि आजूबाजूचा परिसर जर अधार्मिक असेल त्यातला एकटा माणूस धार्मिक माणूस त्याच्यामध्ये नाही शकत म्हणून कधी कधी उदाहरण देताना सांगतात ना की भ्रष्टाचाराच्या पूर्ण बाजारामध्ये एक इमानदार माणूस उघडा पडतो त्याला टिकू दिल्या जात नाही म्हणून मुंडेच्या जवळजवळ एका सोळा वर्षाच्या सर्विस मध्ये त्याच्या 28 बदल्या होतात कशामुळे होतात की भ्रमिष्ठा सारखंच केलेलं असतं सगळं भ्रमिष्ट करून टाकलेलं आहे आणि म्हणून या भ्रमष्टपणामुळे तुम्हाला धार्मिक याच्यामध्ये वावरू दिल्या जात नाही आर्थिक मध्ये दिल्या जात नाही आणि मग ह्या ब्रह्मिष्ठ व्यक्तीच्या व्यतिरिक्त तुम्हाला धर्म सांगता आला पाहिजे त्याला बाजूला करता आलं पाहिजे परंतु आजही आमच्या ना धार्मिक याच्यामध्ये कारण मी नेहमी स्पष्ट बोलणार आहे काय आहे भ्रमिष्ठाची अवस्था आपली धार्मिक याच्यात भिक्षू लोक वेगळं सांगतात भिक्षू महासंघ वेगळा सांगतो त्यातला तो संघाप्रमाणे वागत आहे टीका केली आता एखाद्या संगमाला तुम्ही जर वाचत असाल की धम्म परिषदा किती धम्म परिषदा होतात धम्म परिषदेचा अर्थ काय परिषद ही विनयामध्ये सांगितली कशाकरता परिषद भरवल्या जायची एक तर तुमच्या स्वतःचे दोष शोधण्याकरता आणि दोष शोधून त्याची उन्नती करण्याकरता आजच्या धम्म परिषदेमध्ये मला सांगा बरं एका तरी समाजाच्या दोषावरती चर्चा झाली का कुठली असेल भारतीय बौद्ध महासभेचे असू द्या भिक्षू महासंघाचे असू द्या त्रिलोक्य महासंघ मग हे भ्रमिष्ठ नाहीयेत बाबासाहेबांनी परिषदा घेतल्या पण त्यांच्या परिषदामध्ये केलेला ठराव हा अमलात येत होता आणि दुसऱ्या परिषदेमध्ये मागच्या परिषदेमध्ये आम्ही काय केलंय याची चर्चा होत होती याला परिषद म्हणतात आताच्या परिषदे भ्रमिष्ट आहेत कशा करता करतात आजच्या परिषदा कोणाला राग येऊ या काही हो फक्त स्वतःला मग तो भिक्षू असो नेता असो या कुणी असो आणि आम्ही सारखे जातो तिथे कोणी विचारत नाही बाबा या धम्म परिषदेचा उद्देश काय होता आणि वर लिहितात तेरावी धम्म परिषद बाराचा आउटपुट काय आहे का जर बाराचा आउटपुट नाही तर भल्या घेतो त्याला याला भ्रमिष्ट सारखे असेल तिथे धार्मिक चर्चा होऊ शकत नाही आणि म्हणून आत्ताच्या धम्म परिषदा भ्रमिष्ठाच्या धम्म परिषदा कारण धम्म परिषदेमध्ये बाबासाहेबांनी मानगावला धम्म परिषद घेतली मानगावच्या धम्म परिषदेमध्ये पहिला निर्णय झाला की महाराणी मग शाहू महाराज होते धम्म परिषदेमध्ये महाराणी आज शिक्षणा करता केलेला आणि बाबासाहेबाला नेता माना कोणी सांगितलं होतं शाहू महाराज आणि त्या महाराणी बाबासाहेबांना असा नेता मानला की बाबासाहेबांनी त्याच्याकरता आता आमच्या धम्म परिषद मला एका तरी धम्म परिषदेचा आउटपुट सांगा किंवा राजकीय लेव्हल वरती घेतलेल्या एका तरी याचा आउटपुट झालाय का ना सांगणाऱ्याचं त्याच्यामध्ये क्रेडिबिलिटी आहे आणि ना समाजामध्ये कारण बाबासाहेबांनी जेव्हा ठराव मांडत होते त्या ठरावावरती पूर्ण वर्षभर अंमलबजावणी होत होती धम्म परिषदा करूनच महाडचा सत्याग्रह झालेला आहे धम्म परिषदेमध्ये घेतलेले निर्णय आहेत ते मला आता असा एखादा तरी निर्णय सांगा की ह्या धम्म परिषदेमध्ये निर्णय घेतलाय आणि तो लया राजकारण जाऊ द्या धार्मिक लेव्हल वरती तरी झालं धार्मिक लेव्हल वरती कंटाळा आहे आर्थिक लेव्हल वरती तरी काही झालं कुठेही आणि म्हणून ही ब्रह्मिष्ठाची पद्धती आहे राजा त्यावेळेस सांगतो की भ्रमिष्ठाच्या याच्यावरती धम्मचर्चा होऊ शकत नाही आणि अशा आमच्या सगळ्या चर्चा या भ्रमिष्टपणामध्ये चाललेल्या आहेत भ्रमिष्टपणा म्हणजे काय तुमच्यापुढे असा भ्रम निर्माण करणं की काहीतरी चांगलं होतं खरोखर चांगलं होतंय का फक्त भ्रम निर्माण केला जातो आजही तुमच्यापुढे भ्रम निर्माण केला की घटना बदलली जाणार आहे आणि त्याच्याकरता 400 लोकांची 400 खासदारांची गरज भ्रमच निर्माण केला होता तुमच्या जर समजा त्यांना घटना बदलायची असेल आता पंचमीला मला वाटतं उद्या काहीतरी ते डिक्लेअर करणार आहेत त्यांची घटना संविधान त्यांच्यावर डिक्लेअर करणार आहे काय हा घटना डिक्लेअर करणार घटना लिहिण घटना अमलात करणं काय साध्या गोष्टी आहेत का भगवान बुद्धा त्रिपिटक म्हणजे काय धर्माची घटनाच आहे ना त्रिपिटक धर्माची घटना आहे तशी त्यांची मनुस्मृती एवढ्या लवकर आलेल्या आहेत मनुस्मृती कधी पुष्यमित्र शृंगाने भिक्षूचा खून करून इथून बौद्ध धर्म लयाला गेल्यानंतर ऋषींनी ते चौथ्या पाचव्या शतकात म्हणजे 600 वर्ष त्यालाही लागलेली यायला लगेच त्याच्या डोक्यातून आलेली आहे का ती म्हणून एवढे सोपे नाहीये ते कुठल्याही गोष्टी एवढ्या सोप्या नाहीये त्याच्यावरती खूप मोठं ज्ञानार्जन असतं त्याच्यावरती म्हणजे चांगलं करायला आणि वाईट करायला मनुस्मृती वाईटच आहे पण ते वाईट अमलात आणायलाही 600 वर्षे लागली एकदम अमलात आलं का पुष्यमित्र शृंगाने जरी भिक्षूचे खून केले भिक्षू खून केले तरीही जनता लढत होती तरीही लोक फक्त तुमच्या माहिती करता सांगतो की ह्या ज्या तुमच्या सभ्यता उभ्या राहिल्या हडप्पा असेल मोहनजोद असेल की ह्या शहरी संस्कृती होत्या की नाही मग शहरी संस्कृतीच्या तुमच्या खेड्यामध्ये कसं हे झालं कोणी पीएचडी लवकर करत नाही कारण आज तुम्ही कुठल्याही खेड्यात जर गेलात तर एखाद्या गावामध्ये पर्टिक्युलर हार्ट नावाची माणसं आहेत मोठी वस्ती त्यांचीच असते एखाद्या गावाचं नाव आहे आणि तिथे आडनावाची तीच आहे काय झालं होतं त्यावेळेस हडप्पा किंवा मुळे मध्ये झालेल्या आक्रमणामध्ये जेव्हा विस्थापित झाले तेव्हा त्यांनी जंगलामध्ये कुठेतरी आश्रय घेतले आणि ते नदीच्या काठाला आपलं स्वतःचं एक घर बसून गाव निर्माण केलं हे गाव निर्माण करण्यामध्ये तिथे आणि मग ती त्याची संस्कृती निर्माण करता करता त्याला जेव्हा या गोष्टी उमजल्या गेल्या आणि मग ते नियम हळूहळू लागू होत गेले मग ज्याचं वर्चस्व वाढत गेलं त्याचे नियम लागू होत गेले आणि म्हणून त्या वेळेसच्या जे विस्थापित झाले होते आजही तुम्ही बंजारा समाज माहिती आहे का बंजारा समाजामध्ये का आजही तुम्ही गेला तर तुमचं पंचशीर आहे की नाही तसं बंजारा समाजामध्ये त्याला पाच पारा म्हणतात सेम टू सेम आहे ते जतन केले त्यांनी फक्त त्यांच्या विस्कृतीत गेलं की हे बुद्धाचा आहे ते त्याच्यावरून ते म्हणतात आम्ही बुद्धाच्या अगोदरचे आमचं बुद्धाने सांगितलं पाच अरेस्टिंग मार्ग हे बंजारा समाजामध्ये त्याला गोरमाटी म्हणतात ही संस्कृती तुमच्या आदिवासी जपली की ह्या त्याच्यामध्ये ब्रह्मस्थ अवस्थेमधून बाहेर येताना ह्या संस्था निकाल गेल्या म्हणून कुठलाही संविधान किंवा कुठलीही स्मृती ही दुसऱ्या दिवशी जन्माला येत नाही म्हणून आम्हाला भ्रमिष्ट केलं की मग परत आपल्याला तिथे जावं लागतं की जोपर्यंत प्रज्ञा जागृत होत नाही तोपर्यंत तुमची भ्रमिष्ट अवस्था जाणार नाही आणि म्हणून या भ्रमिष्ट अवस्थेमध्ये ब्रह्मिष्ठाच्या ठिकाणी आज का नाही आपण करू शकत आम्ही भ्रमिष्ठ आहोत बौद्ध परिषदेचा कॉल केला की आम्ही सर्वजण जातो जातो जातो आणि प्रश्न विचारत नाही आणि मग भ्रमिष्ठाची अवस्था कायम राहते ही भ्रमिष्ठाची अवस्था जर तोडायची असेल तर प्रत्येक जसं मागच्या प्रवचनामध्ये मी सांगितलं होतं की तुम्ही जर राजा मिलीन झाला नाही तर नागक्षण भेटणं मुश्किल आहे ना भेटणारच नाही तुम्हाला कारण नागक्षण भेटायला राजा मिली व्हावं लागेल तुम्हाला बाबासाहेब भेटायला तो महार व्हावं लागेल तो महार नाही झाला तर बाबासाहेब भेटणार नाही म्हणून तो कडवा महार व्हावा लागेल तुम्हाला आज आम्ही तो कडवा महार आहोत का नाही आम्ही अर्धे कच्चे आणि अर्धे पक्के आहोत धड महारही नाहीत आणि धड बुद्धही नाही आणि म्हणून आम्हाला नागक्षेनही भेटत नाही आणि बाबासाहेबही भेटतात ही भ्रमिष्ट अवस्था आमची करून ठेवलेली आहे आणि म्हणून किती प्रासंगिक आहे बघा वाचताना आपल्याला कसं वाटतं की भ्रमिष्ट माणूस असेल तर तिथे चर्चा करू नये साधं वाटतं की नाही किती डीप आहे किती गोल आहे की जोपर्यंत आमची भ्रमिष्ठ अवस्था निघून जाणार नाही तोपर्यंत तुमच्या कुठल्याच गोष्टीला यश प्राप्त होणार नाही आणि मग भ्रमिष्ठ अवस्था घालवायची असेल तर मग चर्चा कुठे झाल्या पाहिजे परीक्षा अशाच लोकात झाल्या पाहिजे तेवढ्याच लोकात की जिथे भ्रमिष्ठाचा मेळा नाही मग ते पाच का असत नाही म्हणून वामन दादा म्हणतात ना भीमा तुझ्या विचाराचे जर पाच लोक असते तलवारीचे तया न्यारे असते आपले पाच आहेत का मेळेच्या मेळे आहेत आणि त्याच्यात बिचारे पाच हरवलेले आहेत त्यांना सापडतच नाही म्हणून भ्रमिष्ठाची अवस्था जर घालवायची असेल आपल्याला म्हणून मी सांगितलं ना की कुठून सुरुवात करायची हे आम्हाला आता कळलं पाहिजे भ्रमिष्ठाच्या मेळ्यामध्ये न राहता आम्ही पाच लोक का नाही आहोत परंतु भ्रमिष्ठाच्या मेळ्यामधून बाहेर आलं पाहिजे तुम्हीच भ्रमिष्ठाच्या मेळ्यात नाही आम्ही पण आहोत आम्ही भिक्षे भ्रमिष्ठाच्या मेळ्यात आहेत भ्रमिष्ठाचा मेळा त्यांचा वेगळ्या प्रकारचा आहे ते वेगळ्या प्रकाराने चाले त्यांनाही अजूनही भ्रमिष्ठाच्या बाहेर यायला तयार नाही बुद्धाने दोन पर्याय सांगितले होते तुम्हाला भिक्षू जीवनाला दोन सांगितले होते कशा करता एक तर स्वतः अरहंत व्हायला तू पुढे हो जास्त भानगडीत पडू नको तू ये विनयाचा आचरण कर ध्यान धारणा कर उपासना कर अरहंत हो आणि मोकळा हो आणि दुसरं कोणाला सांगितलं जेरोचर होते त्यांना सांगितलं बहुजन येतात बहुजन सुद्धा आमच्यात दोन्ही भ्रमिष्ट आहेत की नाही आम्ही दोघेही भ्रमिष्ट आहोत म्हणून मी सांगितलं की राजा होणार नाही तोपर्यंत भेटणार नाही आणि म्हणून भगवान बुद्धाच्या त्या तत्त्वावरती जावं लागतं की भगवान बुद्धाने का सांगितलं होतं तुम्हाला चार संघ स्थापन करायला हे चार संघ स्थापन झाले तरच एकमेकांवर होईल जोपर्यंत उपासकाचा संघ होणार नाही तोपर्यंत भिक्षू संघाला तुम्ही प्रश्न विचारणार कारण तुमचा आता संघ नाही आहे का संघ तुमची कमिटी आहे कमिटी आणि संघ याच्यामध्ये खूप फरक आहे आम्ही संघाला कमिटीचे स्वरूप देऊन टाकू कारण कमिटीला विनय पाळायची गरज नाही उपाध्यक्ष आला काय आणि नाही आला पण संघामध्ये विनय पाळावा लागतो आणि म्हणून ज्या दिवशी तुम्ही कमिटीला संघाचं स्वरूप द्याल आणि मग ते संघाचं स्वरूप द्या परत तिथं तुमची भ्रमिष्ट अवस्था गेली पाहिजे अवस्थेतून आम्ही बाहेर आलो पाहिजे जोपर्यंत या भ्रमिष्ट अवस्थेतून आम्ही बाहेर येणार नाही म्हणून राजा मिलिंद म्हणतो की धर्म चर्चा करता आजूबाजूला भ्रमिष्ठाची फौज असेल तर धार्मिक चर्चा होऊ शकत नाही आणि म्हणून आजही आम्ही आता लक्षात ठेवलं पाहिजे की जर आम्हाला धार्मिक लेव्हल वरती आणि सगळा पाया आहे धार्मिक लेव्हल जर तुमची मजबूत असेल कारण जर धार्मिक लेव्हल तुम्हाला गरज नसती तर बाबासाहेबांनी धर्म स्वीकारायची काही गरज होती का होते ना त्यावेळेस बाप सगळे तुमच्या पाठी होते त्यावेळेस बाबासाहेबांनी म्हटलं असतं महाराजांना वेळी मारा तर मारल्या असत्या महाराजांनी पण धम्माची का गरज पडली बाबासाहेबांना माहित होतं की धम्म हे फाउंडेशन आहे धम्माचा पाया मजबूत असेल तर त्याच्यावर आर्थिक राजकीय कुठल्याही इमारती आणि हे माळे मजबूत पणाने उभे राहतील आणि म्हणून बाबासाहेबांनी आणि शेवटला ते बोलले होते की आता मी याच्यापुढे फक्त खाली धम्माचं काम करेन का बोलले होते तर ही गोष्ट होती की त्यांना धम्माचा पाया घालायचा होता कारण पाया मजबूत असेल तर त्याच्यावरती मजले मजबूत होतात काय मजले आमच्या धार्मिक पायावरती उभे राहण्याचा राजकीय हा पहिला मजला आहे तुमचा आर्थिक हा दुसरा मजला आहे आणि म्हणून ही मजले जर उभी राहायचे असतील तर तुमचा धार्मिक पाया हा मजबूत झाला पाहिजे त्याच्यामध्ये भोंग असता कामा नये तुम्हाला सांगणारा म्हणून भगवान बुद्धाच्या याला तत्वज्ञान टीचिंग म्हटलं कर्मकांड नाही म्हटलं भगवान बुद्धाची काय म्हटली शिकवण म्हटली टीचिंग शिकवण आहे तर त्यांच्या वेदाला काय म्हटलंय ती शिकवण नाही त्याला ज्ञान म्हटलं त्यांनी ते भगवान बुद्धाने ज्ञान ज्ञानाच्या भानगडीत नाही पडली माझी शिकवण आहे आत्मसात करायची तर करा त्यांनी कर्मकांडाच्या भानगडीत ते पडले नाही आणि म्हणून की ह्या तुम्हाला धार्मिक पद्धतीत जर उभं राहायचं असेल तर ह्या भ्रमिष्ठाच्या टोळीतून तुम्हाला बाहेर यावं लागेल तर चौथ्या प्रकारचा माणूस आहे गर्विष्ट आजही आपण जर बघितलं मी काही काही गोष्टी अनुभवाने सांगतो माझा हा भिक्षूचा जेम तेम दोन वर्षाचा पिरियड आहे कुठे कुठे मी जातो कार्यक्रमाला राजा सांगतो की गर्विष्ट माणूस असेल तर धार्मिक चर्चा होऊ शकत नाही आणि मी मला इथे एखादी गोष्ट सांगितलेली आहे की एका घरी मी [संगीत] गेलो मंगलमंतु बाबा हा सुखी आणि म्हणून एका घरी गेलो होतो तर तिथे गेल्यानंतर मोठी माणूस होते ते आता नाही बाहेर आहे बाहेर आहे हा सुपर क्लास वन ऑफिसर औरंगाबादची गोष्ट सुपर क्लास वन ऑफिसर घरात किती तीन प्रकारची माणसं असतात मला निमंत्रण द्यायला मिसेस आले पण तेजी आमच्याकडे या काय मला आठवत नाही मला वाटतं मुलाचा वाढदिवस का असा काहीतरी कार्यक्रम होता जेव्हा ठीक आहे म्हटलं जेव्हा कार्यक्रमाला गेलो तेव्हा मुलाने वंदन केलं आणि बायकोने वंदन केलं कोण आहे परंतु साहेब काही उठले नाही कारण साहेब पुढचे टाईट बसलेले होते मी बी नेमकाच भंती झालो होतो कारण हे टाईटपणा मी बी अनुभवलेला होता ना माझ्या बी अंगात गर्व होता मी कुणीतरी आहे मोठा ऑफिसर आहे मला एवढा पगार आहे मी एवढा शिकलेला आहे हा गर्विष्टपणा माझ्यात होता म्हणून तो ओळखायला मला वेळ नाही लागला हा माझा अनुभव आहे एक अनुभव सांगतो तुम्हाला पाच सहा महिन्यानंतर परत त्याच घरी मला आणि दुसऱ्या वेळेस त्या माणसाची इच्छा होती वंदन करायची पण करू नाही शकला कारण सहा महिने आणि त्याच्या कृतीहून वाटत होतं की त्याला आता खूप वाटतं की मी उठून त्रिवार वंदन करावं पण करू नाही शकला याला काय म्हणतात गर्विष्ट माणसाबरोबर तुम्हाला धम्म सांगता येत नाही आणि धम्म ऐकताही येत नाही आणि म्हणून बुद्धाने त्यावेळेस कारण काय होतं गर्विष्ट माणसाला लक्षातच येत नाही अभिमानात असतो ना तो कुठल्या अभिमानात असतो एक तर त्याच्या संपत्तीच्या एक तर त्याच्या विद्वत्तेच्या किंवा अजून दुसऱ्या कुठल्यातरी आणि म्हणून भगवान बुद्धाने या सगळ्या गोष्टींना लष्कर सांगितलं की जे जे उत्पन्न होईल ते कधी कधी नष्ट होणार आहे आणि म्हणून कितीही विद्वान माणूस असला भगवान बुद्धाने वंदन करायला काय सांगितलं माणसाला करतात कावार वंदन म्हटलंय बुद्ध नमा नमा नमामी ज्या दिवशी तुमच्या लक्षात येईल तेव्हा ह्या शिवराच्या आत आतल्या माणसाला तुम्ही वंदन करतच नाहीये ज्या दिवशी ह्या गर्भिष्ठ माणसाला ते समजेल त्या दिवशी तो ऑटोमॅटिक क्लीन होईल कारण इथे बसलेलं भतीजी चिवर सोडलं तुम्ही भतीजी आहे का नाही राहत तुमच्यासारखाच माणूस आहे रक्त अंगावरती चिवर आहे थोडाफार मी नाही पाळतो कारण तो कडकपणाने पाळला पाहिजे आणि म्हणून गर्भिष्ट माणसामध्ये गर्भ कुठल्या गोष्टीचा असतो त्याचा त्याच्या बुद्धीचा त्याच्या पैशाचा किंवा त्याचा आणि म्हणून त्याच्या जवळ तुम्ही धार्मिक चर्चा करायला गेला तर तो चर्चा करणार नाही कारण पैशावाल्याला काय घमंड असते ठीक आहे ना तुम्ही आम्ही पाच पेक्षा मी बोलवी [संगीत] जात नाही अशातला प्रकार नाही आपल्या इथल्या वर्षावासाचा जर प्रसंग घेतला तुम्ही जेव्हा वर्षावासाची सांगता होती साहेब सगळे जाऊन एकही नाही काय असतं याचा प्रकार टीका करू नये संघावर टीका करू नका म्हणतात परंतु गर्विष्टपणाची आणि आपलेपणाची म्हणजे गर्व कशाचा असतो भिक्षू नाही आता कशाचा गर्व आहे माझ्यासारखी बुद्धिमत्ता नाही म्हणून आजही भिक्षूला त्यांचे विनायक कळले नाही तर उपसकाला त्यांचे विनाय कळले नाही म्हणून राजा सांगतो की गर्विष्ट माणसाबरोबर तुम्हाला धार्मिक चर्चा करता येणार नाही सगळ्याच गोष्टी तिन्ही बाबतीत लागू पडतात धार्मिकच नाही आर्थिक बाबतीत आजही आपल्या समाजामध्ये जो मोठा माणूस आहे मोठ्या माणसाचं कर्तव्य काय छोट्याला सांभाळा मोठ्याची व्याख्या मी माझ्या पद्धतीने करतो की मोठ्याची व्याख्या आहे त्याने लहान्यावरती अधिकार जरूर गाजवावा मोठा भाऊ असतो ना मोठ्या भावाने लहान्या भावावर अधिकार जरूर गाजवावा पण लहाण्याचा हट्टही पुरवावा याला मोठं कनिष्ठाचा अधिकार गाजवायचा का जर मोठं होऊन तुम्ही अधिकार गाजवता साधं उदाहरण सांगतो की लहान भावाला जाडीचं बंडल घेऊन ये हा तुझा अधिकार झाला पण बिडीचं बंडल देता देता त्याने म्हटलं की मला एक घ्यायचं याला आज आमच्यातली मोठी लोक तशी मोठी आहेत का जास्त शिकलेला असेल तर तो त्याच्या स्टोरी काय म्हणतो याला समजावून काय अरे भले समजावून तर बघ तुला समजावता आलं तर पैशावाला काय म्हणतो त्याच्या नादी कशाला कारण याच्या पोराला पोरगी पैशावाल्याची बघतो ना मग आम्ही गर्विष्ट आहोत कशाच्या काळावर गर्विष्ट आहोत आणि म्हणून त्यांच्याबरोबर धम्म चर्चा नाही होऊ शकणार गर्विष्टपणाने वागणाऱ्या माणसाबरोबर जोपर्यंत त्यांचा गर्व जाणार नाही आणि म्हणून धार्मिक चर्चा करताना गर्विष्टा बरोबर चर्चा होणार नाही तर पाचव्या प्रकारचा माणूस आहे लोभी मला सगळं अशा माणसाबरोबर धार्मिक चर्चा होऊ शकेल का धर्माशी त्याला घेणं देणं आहे का प्रवचना सांगतो रात्रीच मला एका माझ्या पूर्वाश्रमीच्या मित्राचा फोन आला बोलता बोलता आता कधी कधी कसं असतं की गृहस्थ जीवनात आपल्या हातून काही निर्णय असे झालेले असतात ना धर्माच्या बसत नाही त्याला विश्वासूच येत नव्हता की मी घेतले म्हणून तो बार बार मला विचारत होता तू खरंच भंती झालास का बाबा तर व्हिडिओ कॉल कर मी आता सध्या कुटीमध्ये आहे ठीक आहे म्हणे मग माझ्याकडे एक काम आहे म्हटलं काय काम आहे तर म्हणे अशी एक अशी एक जागा आहे फिरू द्या फिरू द्या त्यांना माझ्याकडे अशी जागा आहे तिचं जर आपण अतिक्रमण केलं तर विहारही होऊ शकते मोठं पटांगण होऊ शकते होऊ शकतं आणि आजूबाजूच्या चार एकराच्या जागा आपण विकूही शकतो लोभीपणाचं हे बोलण्याची हिम्मत का करू शकले तर माझं आयुष्य त्याला नाही माहिती आहे कारण काही गोष्टी आम्ही या केल्या होत्या म्हणून लोभी माणूस कुठपर्यंत जाऊ शकतो परंतु हीच गोष्टीच्या धम्मसेवक बोलायची किंमत होईल का कारण तिथे खरे त्याठिकाणी आहेत आजही तुम्ही जर तिथे गेलात तर तिथं हायस्कूल पासून कॉलेज पर्यंत आहे तिथे शिवराज मुलं शिकतात आणि तुम्ही भंतेजीची राहण्याची खोली जर बघितलं तर आजही खाट आहे त्या खाटावरती गोधडी आहे त्या गोधडीवरती भंतेजी स्वतः धम्मसेवक त्यांना बोलायची हिम्मत करेल आणि म्हणून साहेब की लोभी माणसाबरोबर आहे तुम्ही चर्चा मी त्याच्याबरोबर काय चर्चा करू आता होऊ शकेल का त्याच्याबरोबर चर्चा कारण तो लोभी आहे लोभी माणसाचा लोभ कधी जाईल की अलोभी माणसाने केलेला विकास जेव्हा तो बघेल तेव्हा त्यातला लोभ निघे जाईल गर्विष्ट माणसाचा गर्व कधी हरण होईल की त्याच्या एवढाच खूप पैशावाला माणूस आहे पण तो विहारात जातो भिक्षूच्या पुढे त्रिवार वंदन करतो जेव्हा तो गर्विष्ट पैशावाला बघेल तेव्हा म्हणून तुम्हाला कोण धार्मिक करायचं पैशावाला हे नाही करायचा पण जो अतिलोभी आहे त्याला दुसरा लोभी दाखवायचा की तो कसा सुधार अति पैशावाल्याला दाखवायचा की पैशावाला होतो कारण शिकवायचा असेल तर तुम्हाला रतन टाटा दाखवा त्याच्या पैशावाला होता वेळ जर पडली असती तर टाटा जगाचा सगळ्यात श्रीमंत झाला असता परंतु काही गुण आता इंडस्ट्री म्हणून काही अवगुणही असते त्याच्यामध्ये पण एक उदाहरण द्यायचं सांगितलं तर अडाणी आणि अदानी पेक्षा रतन टाटा कितीतरी म्हणून तुम्हाला एक उदाहरण सांगतो की जेव्हा बॉम्ब स्पोट झाले की नाही बॉम्बेमध्ये बॉम्बस्फोट झाले ताजमहाल हे रतन टाटा हॉटेल आहे त्याच हॉटेलमध्ये बॉम्ब स्पोट झाले आम्ही गेलो होतो त्यावेळेस झालो झाले तिथल्या आतंकवाद्यांनी गोळीबार झाला होता रतन टाटानी त्या हॉटेल मधल्या कर्मचाऱ्याला त्यांच्यावर झालेले जे काय होते ते सगळ्यांना भरपाई तर दिलीच पण पुढे कोरोना आल्यानंतर दोन वर्ष त्यांच्या कर्मचाऱ्यांना घरी बसून पगार दिला एकाही माणसाला त्यांनी नोकरीवरून काढलं नाही [संगीत] अंबानीच्या पोराच्या लग्नामध्ये सहा हजार करोड खर्च केला आणि पोराचं लग्न इकडे लागलं ते हनिमून गेलं तिकडे पाच हजार कर्मचारी समोरचं उदाहरण आहे तुमचं गर्व कशाचा आहे पैशाचा आहे ना आणि माझं मोठं आहे माझं कोणी काही करू शकणार नाही इथे राजांनी 2600 वर्षांपूर्वी सांगितलं की अशा माणसाबरोबर धार्मिक चर्चा नाही होऊ शकत तर जो माणूस की पैशाने धनवानी आहे पण नम्र आहे अशी लोक नाहीत असं नाही आजही आपल्यामध्ये आहे आज आपल्यामध्ये कितव्या पिढीत आपण सुधारू मानगावची पहिली पिढी धरली शिक्षणाला तिथूनच सुरुवात झाली ना हा साधारणतः 110 वर्षाचा पिरियड आहे मग तुमच्या जोरात टाकता येत का काय असून असून असणार आहे आमच्या तरी किती गर्विष्टपणा आहे इथपर्यंत नजर असते काय जाऊन ऐकायचं तिथं ते भंतीजी काय सांगणार आहे त्या भंतीजीला काय येते त्याच्यापेक्षा मला जास्त गरिबिष्टपणाचा आहे ना अरे बाबा येतो तर ये आणि तुझ्याजवळ आहे ते तर सांग त्या लिंकेने दुसरे सुधारतील एवढा मोठा माणूस आला बरं काही काही कसा आहे ते येऊन सांगायला जातात आणि कृती शून्य असते म्हणून तुकाराम महाराज म्हटले ना की बोले जसा चाले त्याची बंधावी आम्ही बोलतो तसे वागतही म्हणून मी सांगितलं की रात्रीचा मला आलेला फोन कशामुळे होता माझं पूर्व आयुष्य त्याला माहिती होतं ना परंतु जर हेच आयुष्य मी सहा वर्ष आणि जेव्हा सगळे उदाहरण सांगतो की हे प्रवचन जातात ना हीच प्रवचन जर थांबून पाच सात लोक सारखे नाही पूर्वाश्मीचा असणारा माणूस आज सुधारणा होतील ना पूर्वाशमीचा अंगुलीमान अरंत होऊ शकतो आणि म्हणून गर्विष्ट माणूस किंवा लोभी माणसाबरोबर तुमची चर्चा धार्मिक चर्चा नाही होऊ शकत तर सहा नंबरचा माणूस आहे आळशी आळशी माणसाबरोबर मी चर्चा नाही आळशी माणूस एवढा काही हे असतो की तुम्ही जर निघाला साहेबांच्या बाजूचा बंगल्यातला माणूस असेल चला आणि इकडून जाताना मी झोपलेला आणि म्हणून आळसी माणसाबरोबर चर्चा नाही होऊ शकत मला एका जणांनी व्याख्या सांगितली थोडी हसण्यासारखी आहे म्हणे दारुड्या कोणाला म्हणायचं दारू पितो दारुड्या नाही दारू पितो तर बिलकुल दारू मग जो आपल्यासारख्या वीस लोकांना दारू प्यायला शिकवतो तो दारू दारुड्याची व्याख्या सांगितली एकटा पितो तो दारुड्या नाही पण आपल्यासारख्या 20 लोकांना प्यायला शिकवतो तो दारुड्या जुगाऱ्याची काय जुगार खेळतो आपल्यासारख्या 25 लोकांना जुगार खेळायला शिकवतो तो जुगारी आणि मग त्यांनी तीच व्याख्या सांगितली की भिक्षूची व्याख्या नुसता एकटा भिक्षू बनून जो सगळ्यांना घेऊन भिक्षूचं जीवन जगायला लागतो तो खरा भिक्षू खरा बुद्धिमान मग ही व्याख्या सगळ्यालाच लागू पडते की नाही बेवड्याची व्याख्या म्हणजे वाईटाची व्याख्या एकदम स्प्रेड होते चांगल्यापणाची व्याख्या स्प्रेड व्हायला वेळ लागते परंतु ती शाश्वत असते भगवान बुद्धाचा धम्मही लगेच इकडे त्यांना ज्ञान प्राप्त झालं लगेच वाढला का 45 वर्ष फिरले तेही [संगीत] पायी 45 वर्ष फिरल्यानंतर पूर्णिपात बौद्ध धम्म केला होता का राजा अशोकाला जावं लागलं 200 वर्षानंतर आणि म्हणून काही गोष्टी अशा असतात की त्या आळशी माणसांनी होत नाही आळस हा तुमच्या बुद्धीला लागलेला गंज आहे आणि हा काढायचा असेल तर आळशी माणसाजवळ धर्मचर्चा करून होणार नाही तर तुमच्याकडे बघून आळशी माणूस सुधारला पाहिजे तर सात प्रकारचा माणूस आहे हट्टे काहीचे स्वभाव हट्टीच असतात ना मी जे करणार आहे ते करणारच आहे मग ते चूक असो की बरोबर असो म्हणून हट्टी माणसाबरोबर तुम्ही चर्चा नाही करू शकणार हट्टी माणूस आपलाच हट्ट धरून बसतो म्हणून चर्चा नाही होऊ शकत म्हणून राजा मिलिंदालाही नागसेना प्रश्न तोच टाकला होता की तू राजा म्हणून कारण हट्टीच असतो ना राजा म्हणून प्रश्न विचारशील तर मी तुला उत्तर देणार नाही एक उपासक म्हणून विचारशील मग तुला उत्तर देईल कारण तू हट्टी होणार नाही अधिकार असतो ना आपल्याकडे आजही घरामध्ये जो कर्ता पुरुष असतो तो थोडाफार हट्टीच असतो ना सगळ्यावरती हट्ट करतो हट्टी माणूस हट्ट दोन चार प्रकारचे की जो साधारण हट्ट आहे म्हणजे एखाद्या मुलाने धरलेला हट्ट निरोपद्रवी हट्ट असेल ना त्याचा मूल मागून मागून काय मागणार आहे छोटीशी गोष्ट परंतु तो बुद्धिमानाने धरलेला हट्ट म्हणजे त्याने नुकसान होतं म्हणून अशा हट्टी माणसाबरोबर चर्चा करता येणार नाही तर आठव्या प्रकारचा माणूस आहे मूर्ख आता मूर्खाची व्याख्या घेतली तर बौद्ध धर्मामध्ये मूर्खाला बालि एकदम एवढं विकृत नाही म्हटलं कारण मूर्ख म्हटलं की आज जर कोणाला मूर्ख म्हटलं लगेच मारामारी लागायची वेळ येते परंतु बौद्ध धर्मामध्ये बालिश म्हटलं जाईल की जो बालबुद्धी आहे मूर्ख आहे की त्याच्याबरोबर ही चर्चा नाही करता येत की ज्याची बालबुद्धी आहे अशा बरोबर चर्चा करून तुम्ही धम्म नाही सांगू शकणार आज आपण इथे ह्या आठ लोकांबरोबर धम्म चर्चा नाही करता येत इथे आपण आजचं प्रवचन थांबूया बाकी उद्या 

Friday, 16 May 2025

शून्यागार आणि पगोड्याचे महत्व

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

*_शून्यागार आणि पगोड्याचे महत्व_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2025/05/blog-post_16.html

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

धम्मचली, जयपुर येथील पगोड्याच्या शिलान्यासाप्रसंगी पूज्य गुरुजींचे प्रवचन (मार्च 14, 1982)

जिथे शुद्ध धर्म जागतो, तिथली धरती अजूनच तपू लागते. धर्माच्या शुद्ध तरंगांमुळेच धरती आणि सारे वातावरण तपत असते. ही तपोभूमी न जाणे कित्येक युगांमध्ये, सहस्त्रावधी वर्षांपासून धर्माच्या तपाने तपलेली आहे, म्हणूनच तर इथे शुद्ध धर्म जागण्याचा आणि अनेक लोकांच्या कल्याणाचा सुअवसर प्राप्त झाला. ज्या धरतीवर तपस्वी तपतात, धर्म-तपाव्यतिरिक्त आणखी कोणती प्रवृत्ती नसते तिथल्या धर्मतरंगांचे तर काय सांगावे ! चित्त कसे आसक्ती, द्वेष आणि मोहातून विमुक्त होईल, याचे केवळ चिंतन-मननच नाही, तर त्याचा सक्रिय अभ्यास होत असतो. कसा चित्ताचा अंतर्मनाच्या तळापर्यंत जाऊन संवर करावा, नवीन आसक्ती, द्वेष आणि मोह उत्पन्नच होऊ देऊ नयेत. आणि जे संगृहीत आहेत, ते कसे हळू-हळू दूर होत जातील, हळू-हळू त्यांची निर्जरा होत जाईल. चित्ताची अशुद्धता दूर होत जाईल, तिचा क्षय होत जाईल.

ज्या धरतीवर धर्माचा शुद्ध अभ्यास निरंतर होत असतो ती धरती खूप तपू लागते. सारे वातावरण धर्माच्या तरंगांनी आप्लावित होऊन जाते, तरंगित होऊन जाते. अधिक लोक कल्याण होते. अशा तपोभूमीमध्ये येऊन एखाद्या व्यक्तीने थोडेसे जरी प्रयत्न केले तरी अधिक प्रमाणात सफलता प्राप्त होते. या धरतीवर तर आत्ताही लोक तपत आहेत. भविष्यात जेव्हा इथे शून्यागार बनतील आणि त्यात लोक तपतील तर आणखीनच अधिक कल्याण होईल. साधनेच्या पथावर पुढे जाण्यासाठी आपली मेहनत, आपले परिश्रम, आपला पुरुषार्थ तर आवश्यक आहेच. यांच्याशिवाय कोणतीही उपलब्धी प्राप्त होत नाही. दुसरे म्हणजे साधनेचा विधी निर्मळ असेल, स्वच्छ असेल तर अधिक लाभ होतो. साधनेचा विधी निर्मळ नसेल तर पुष्कळ मेहनत करूनही जो लाभ मिळायला पाहिजे तो मिळत नाही. उचित मार्गदर्शक असेल तर साधक चुकीच्या पद्धतीने काम करत नाही तर जसे करायला पाहिजे, तसे काम करतो. आणखी एक गोष्ट आणि जी खूप आवश्यक आहे ती ही की उचित वातावरण असावे, उचित स्थान असावे. प्रत्येक ठिकाणी ध्यान करण्याने तितका लाभ प्राप्त होत नाही जितका एखाद्या तपलेल्या भूमीवर ध्यान केल्याने होतो. आत्ताच मागच्या काही दिवसांमध्ये साधकांचे एक मंडळ भारताच्या अशा स्थानांवर जाऊन आले जिथे संत तपले होते, अरहंत तपले होते. तर इतक्या दीर्घ कालावधीनंतरही साधक अनुभवतात की किती प्रेरणादायक तरंग आजदेखील तिथे कायम आहेत. तेव्हा भूमीचे आपल्या स्वतःचे खूप मोठे महत्व असते. खरोखरच ही 'भूमी अत्यंत मंगलमयी आहे, म्हणूनच तर शुद्ध धर्माचा अभ्यास इथे सुरु झाला आणि आता यापुढे अधिक लोक इथे तप करतील. 

*_शून्यागाराचे आपले महत्व_*

भगवानांनी म्हटले आहे- "जेव्हा कोणी व्यक्ती एकटा तपतो तेव्हा जसे ब्रह्मा तपतो. जिथे दोघे जण मिळून तपतात तेव्हा जसे कोणी देवता तपतात. तिघेजण एकत्र बसून तपतात तेव्हा जसे कोणी तपस्वी मनुष्य तपतात. यापेक्षा अधिक लोक एकत्र बसून तपतात तेव्हा कोलाहल होतो." तितक्या सखोलतेने तप होत नाही, याकरीता शून्यागाराचे महत्व सर्वोपरी आहे. शून्यागार म्हणजे असे स्थान, अशी खोली, अशी कुटी ज्याच्यात आपल्या शिवाय आणखी कोणी नाही, शून्यच शून्य. एकटा व्यक्ती एकांतात ध्यान करू शकेल, हे खूप आवश्यक असते आणि त्याचा मोठा लाभ होतो. ब्रह्मदेशात जे ध्यानाचे केंद्र आहे, तिथल्या शून्यागारांमध्ये जे तपस्वी तपतात, त्यामुळे तिथले तरंग कशा प्रकारे धर्माने ओतप्रोत भरलेले आहेत हे कोणी साधकच समजू शकतो. तिथे बसून ध्यान केले तर किती फरक पडेल. ठीक अशाच प्रकारे इगतपुरीमध्ये शून्यागार बनले आहेत, लोक त्यात ध्यान करतात तेव्हा किती मोठा फरक जाणवतो. शून्यागाराचे खूप मोठे महत्व आहे.

*_सुञ्ञगारं पविट्ठस्स, सन्तचित्तस्स भिक्खुनो।_*

*_अमानुसी रती होति, सम्मा धम्मं विपस्सतो ॥_*

*_(धम्मपदपाळि- 373, भिक्खुवग्गो)_*

'सम्मा धम्मं विपस्सतों' सम्यक प्रकाराने धर्माची विपश्यना करतो. कुठे करतो 'सुञ्ञगारं पविट्ठस्स' एखाद्या शून्यागारात प्रवेश करून शुद्ध धर्माची विपश्यना करत असेल तर साधक शांत चित्त होतो. आणि 'अमानुसी रती होति' आतमध्ये असा आनंद, असा रस प्राप्त होतो जो आपल्यासारख्या मनुष्यांना सामान्यपणे आपल्या इंद्रिय सुखांच्या अनुभूतीद्वारे प्राप्त होत नाही. त्याचा कशाशी मुकाबला होऊ शकत नाही, कशाशी तुलना होऊ शकत नाही. त्याच्या खूप पलीकडची दिव्य अनुभूती होते, ब्राह्मी अनुभूती होते. आणि त्याच्याही पलीकडील निर्वाणिक अनुभूती होते कारण एकांतात साधना करीत आहे. कुठे कोणता व्यत्यय नाही, कोणत्या बाधा नाहीत.

     या तपोभूमीवर देखील असे शून्यागार निर्माण होतील जिथे साधक आपल्या साधनेद्वारे धर्माच्या तळस्पर्शी गहनतेपर्यंत जाऊ शकतील. मोठ्या कल्याणाची गोष्ट होईल. कल्याण तर जे-जे तपतील, त्या सर्वांचे होणारच आहे, पण एखाद्या जरी व्यक्तीचे कल्याण झाले तर निर्माण करण्याकरीता जे श्रम, जो त्याग, ज्या कोणी केला असेल, ते सार्थक होईल. यापेक्षा अधिक मूल्य आणखी कोणते होऊच शकत नाही.

*_श्रेष्ठ दानाचे विश्लेषण_*

        एकदा भगवानांनी आपल्या एका पूर्व-जन्मातील गोष्ट सांगताना म्हटले तेव्हा ते बोधिसत्व होते, बुद्ध बनले नव्हते. अनेक जन्मांपर्यंत बोधिसत्वाचे जीवन जगत-जगत, आपल्या दहा पारमितांना पूर्ण करत-करतच कोणी बुद्ध बनतो, सम्यक संबुद्ध बनतो. दानाचीही एक खूप मोठी पारमी असते. त्यांनी सांगितले की कोणत्या एका जीवनात ते खूप मोठ्या देशाचे राजा होते. चित्तामध्ये दानाची चेतना जागली तेव्हा जितका राज्यकोष होता, जितके काही त्यांच्याजवळ होते, ते दान करणे सुरू केले. हजारो, लाखो लोकांना दान दिले. सात वर्षांपर्यंत सतत दानाचा कार्यक्रम चालतच राहिला. अन्नाचे दान, वस्त्रांचे दान, औषधांचे, वाहनांचे आणि निवासस्थानांचे दान दिले. लोकांच्या ज्या-ज्या सांसारिक गरजा होत्या त्या सर्व गोष्टींची पूर्तता केली गेली. कोणा व्यक्तीला कोणत्या सांसारिक गोष्टींची कमतरता पडू दिली नाही. अशी सात वर्षे खूप दान दिले. इतके पुण्यशाली तसेच पारमी वाढविणारे दान देखील जर कोणा एका स्रोतापन्न व्यक्तीला एक वेळेचे भोजन दिले, तर ते एका वेळेचे भोजन-दान त्यापेक्षा कितीतरी अधिक पुण्यशाली होते. म्हणजे, पात्र कसे आहे? कुठे बीज रोपले गेले आपल्या पुण्य-कर्माचे? जमिन सुपीक असेल तर फळ अधिक चांगले येईल.

तो स्रोतापन्न व्यक्ती जो साधना करत-करत, शील, समाधी, प्रज्ञेमध्ये पुष्ट होत होत अनार्यापासून आर्य बनला, ज्याने पहिल्यांदा निर्वाणाचा साक्षात्कार केला, मुक्तीच्या चार पायऱ्यांपैकी पहिल्या पायरीपर्यंत पोहोचला. धर्मपथाचा पहिला सोपान प्राप्त केला. असा स्रोतापन्न झालेला व्यक्ती मुक्तीच्या स्रोतात पड़ला. प्रत्येक दानाचा लाभ होतच असतो, पण कोणाला दान द्यावे? तेव्हा सांगितले की त्या वेळी धरतीवर कोणी स्रोतापन्न नव्हतेच, कारण विपश्यना नव्हती. कारण लोकांजवळ निर्वाणाचा साक्षात्कार करण्यासाठी कोणते तेलच नव्हते. अशा परिस्थितीत जे होते त्यांनाच दान दिले गेले. पण त्याच्या तुलनेत एका स्रोतापन्न व्यक्तीला केवळ एका वेळेचे भोजन दिले गेले तर ते त्याहूनही अधिक लाभदायक होते.

          असे का होते, हे समजून घेऊ ! कोणत्याही प्राण्याला भोजन दिले तर त्याला आपण एक दिवसाचे जीवन आणखी देत आहोत. त्या भोजनाच्या बळावर त्याची जीवन-धारा अजून थोडी पुढे जाईल. पण कोणाला देत आहोत? एखादा कोणता हिंसक पशू आहे- समजा एखादा सिंह आहे, चित्ता आहे, आणि दुसरीकडे एक गाय आहे. एक दिवसाचे भोजन आपण दोघांना दिले. पण गायीला दिलेले भोजन अधिक पुण्यशाली का? सिंह किंवा चित्त्याला एक दिवस अधिक जगवून तो इतर प्राण्यांना कष्टच देईल. गाय एक दिवस अधिक जगली तर इतर प्राण्यांना लाभच देईल. म्हणून या दोन्हींच्या तुलनेने गायीला दिलेले एक दिवसाचे भोजन अधिक फलदायी आहे, अधिक कल्याणकारी आहे. असेच गायीच्या तुलनेने एका सामान्य मनुष्याला दिलेले भोजन अधिक कल्याणकारी होईल, कारण मनुष्य आहे. पशूच्या तुलनेत मनुष्याजवळ अशी शक्ती आहे की तो अंतर्मुखी, आत्ममुखी, सत्यमुखी होऊन आपल्या गाठी उलगडणे शिकला तर मुक्त होऊ शकतो. हे काम पशू करू शकत नाहीत. ती गाय जीवनभर जगूनही आपल्या स्वतःला मुक्त करू शकत नाही. तिला निसर्गाने ती शक्ती दिलेली नाही. या मनुष्याला जर आपण एक दिवस अजून जगवले तर कोण जाणे त्या एका दिवसात त्याचा शुद्ध धर्माशी संपर्क होऊन जाईल. त्याला असा विधी मिळून जाईल ज्यामुळे तो आत्ममुखी होऊन आपल्या गाठी उलगडून टाकेल. या दोघांच्या तुलनेत त्या व्यक्तीला दिलेले भोजन अधिक कल्याणकारी आहे.

एक सामान्य व्यक्ती ज्याला धर्माचा मार्ग मिळाला नाही, सारे जीवन दुराचाराचेच जीवन जगतो, त्याच्या तुलनेने एक व्यक्ती जो सदाचाराचे जीवन जगत आहे, धर्माच्या मार्गाला लागलेला आहे. या दोघांमधून जर भोजनाचे दान त्या सदाचारीला दिले तर त्याला दिलेले भोजनाचे दान अधिक कल्याणकारी आहे ते यासाठी की त्याचे एक दिवसही अधिक जगणे त्याला सन्मार्गाकडे घेऊन जाण्यात सहायता करेल. आणि खरोखरच तो धर्माच्या मार्गावर पुढे जात जात मुक्त अवस्थेपर्यंत पोहोचू शकेल. खूप मोठा लाभ मिळेल त्याचा, कारण तो सन्मार्गावर म्हणजे, धर्माच्या मार्गावर चालणारा व्यक्ती आहे. परंतु अजूनपर्यंत ज्याला निर्वाणाचा साक्षात्कार झालेला नाही, त्याच्या तुलनेत ज्याला निर्वाणाचा साक्षात्कार झाला आहे, त्याला एका दिवसाचे भोजन दिले तर ते अधिक पुण्यशाली आहे. कारण तो व्यक्ती एक दिवस अधिक जगून केवळ आपलेच कल्याण करत नाही, तर आता जे तरंग निर्माण करत आहे, प्रत्येक क्षणी, प्रत्येक श्वासाबरोबर त्याच्यात जे तरंग निर्माण होत आहेत, ते आसपासच्या साऱ्या वातावरणाला धर्माच्या तरंगांनी भरून टाकतील. न जाणे कित्येक लोकांच्या कल्याणाचे कारण बनून जातील. म्हणूनच म्हटले की इतक्या लोकांना जे मी दान दिले त्याच्या तुलनेने एका स्रोतापन्न व्यक्तीला, केवळ एका वेळेच्या भोजनाचे दान दिले तर ते कित्येक पटींनी अधिक कल्याणकारी होईल, अधिक पुण्यशाली होईल.

        त्याचप्रमाणे अनेक स्रोतापन्न व्यक्तींना दिलेल्या भोजनाच्या मुकाबल्यात केवळ एका सकदागामी व्यक्तीला दिलेले भोजन कितीतरी अधिक कल्याणकारी होईल, कितीतरी अधिक बलशाली होईल. अनेक सकदागामिंना दिलेल्या भोजनाच्या मुकाबल्यात केवळ एका अनागामीला दिलेले भोजन कितीतरी अधिक कल्याणकारी होईल. अनेक अनागामिंना दिलेल्या भोजनाच्या मुकाबल्यात केवळ एका अरहंताला दिलेले भोजन कितीतरी अधिक कल्याणकारी होईल. अनेक अरहंतांना दिलेल्या भोजनाच्या मुकाबल्यात सम्यक संबुद्धांना दिलेले भोजन कित्येक पटींनी अधिक, खूप अधिक कल्याणकारी होईल. कोणा सम्यक संबुद्धांना भोजन दिले आणि त्याच्या मुकाबल्यात तप करणाऱ्या संघाला भोजन दान दिले, तर सम्यक संबुद्धांना दिलेल्या भोजनापेक्षाही ते अधिक कल्याणकारी झाले. आणि पुन्हा म्हटले, कितीही मोठ्या तप करणाऱ्या संघाला भोजन-दान देऊन, कितीही मोठे पुण्य अर्जित केले तरीही, त्याच्या मुकाबल्यात साधना करणाऱ्यांसाठी जर कोणी सुविधा बनवून दिल्या, कोणी शून्यागार बनवून दिले, ज्याच्यात बसून कोणी व्यक्ती तप करून आपल्या मुक्तीचा मार्ग शोधू शकतो तेव्हा त्या साऱ्या पुण्यांपेक्षाही हे महान सर्वोच्च पुण्य अधिक कल्याणकारी आहे.

इथे केंद्र बनवण्याचे आत्तापर्यंत जे काम झाले ते निरर्थक झाले असे मला निश्चितच म्हणायचे नाही, पण शून्यागार बनतील, प्रत्येक व्यक्तीसाठी निवास-स्थानही स्वतंत्र असतील, निवास-स्थाने स्वतंत्र नसली तरी ध्यानाचे जे स्थान आहे ते तर स्वतंत्र असायलाच पाहिजे, जेणेकरून दुसऱ्या कुणा व्यक्तीचे तरंग, किंवा इतर कोणती बाधा त्याच्या मार्गात अडचण उपस्थित करणार नाही. अशी परिस्थिती प्राप्त झाली तर साधकाची प्रगती कित्येक पटींनी अधिक होते. खूप चांगली गोष्ट झाली की इथे शून्यागार बनविण्याचे काम सुरु झाले. अशा प्रकारे या धरतीचा सन्मान होत आहे.

*_भूमीचा सन्मान_*

आपल्या इथे एक परंपरा आहे- भूमी-पूजनाची. शुद्ध धर्माच्या मार्गात भूमी-पूजन काय असते? भूमीचा सन्मान अशा प्रकारे केला जातो की त्या भूमीवर बसून लोक तप करतील आणि तप करून जे शुद्ध तरंग निर्माण करतील यापेक्षा श्रेष्ठ कोणत्याही प्रकारे धरती सन्मानित होऊ शकत नाही, पूजित होऊ शकत नाही. म्हणूनच आज इथे बसून जी साधना केली, इथे तपलो, म्हणजेच तप करून भूमीचा खरा सन्मान केला. जास्तीत जास्त धर्माचे तरंग या भूमीवर स्थापित होवोत, या वातावरणात स्थापित होवोत की ज्यामुळे अधिकहून अधिक लोकांचे कल्याण होईल. हेच भूमी-पूजन आहे, हाच भूमीचा सन्मान आहे. जे कोणी साधक आत्तापर्यंत इथे आत्तापर्यंत इथे तपत राहिले आहेत, ते आपली मलिनता उतरवत आहेत. ज्याची थोडी जरी मलिनता दूर झाली तरी त्याच्या मनात मंगल मैत्री जागतेच की जसे माझे कल्याण झाले, जशी मला सुख-शांती मिळाली, भले थोड़ीफारच मिळाली; अशी सुख-शांती अधिकडून अधिक लोकांना मिळावी. अधिकडून अधिक लोकांची कर्म-बंधने तुटावीत. अधिकहून अधिक लोकांना मुक्तीचा मार्ग मिळावा. असे मंगल भाव मनात जागतातच. अरे, मुक्तीच्या मार्गावर मी कसा सहायक होऊ शकेन ? व्यक्ती अनेक प्रकारांनी सहायक होऊ शकतो. ज्याच्याकडे जी शक्ती आहे त्या शक्तीच्या बळावर तो सहायक होऊ शकतो. शरीराने सेवा देऊन किंवा वाणीद्वारे सहायक होऊ शकतो. कोणाजवळ धन असेल तर धनाद्वारे सहायक होऊ शकतो. पण या सर्वांहून श्रेष्ठ एक खूप मोठी सहायता - स्वतः 'तप करून' सहायक होता येते.

जुना साधक या धरतीवर जितका तपेल, तितकाच अनेक लोकांच्या कल्याणाचा कारण बनेल. गुरुदेवांच्या जीवन-काळात आपण पाहत होतो की अनेक लोक निर्वाणाच्या अवस्थेपर्यंत पोहोचलेले होते आणि जेव्हा कोणी त्या अवस्थेवर पोहोचतो तेव्हा हवे तेव्हा, हव्या तितक्या वेळासाठी, निर्वाणिक अवस्थेची अनुभूती करू शकतो. त्यांना गुरुजी म्हणत असत की तुम्ही लोक ऋणातून कसे मुक्त होऊ शकता? इतर लोक आपल्याकडून शारीरिक श्रमांचे दान देऊन, धनाचे दान देऊन, किंवा अन्य प्रकारे सहायता करून, आप-आपल्या ऋणांमधून मुक्त होण्याचा प्रयत्न करतील. पण तुमच्यासारख्या इतक्या श्रेष्ठ तापसांकरीता सर्वश्रेष्ठ योगदान हेच आहे की कमीत कमी आठवड्यातून एकदा इथे येत राहा, एखाद्या शून्यागारात बसून, एक तास निर्वाणिक समाधीचा अभ्यास करून मग जा. बस्स! काम झाले. किती मोठी सेवा झाली. साराच्या सारा आश्रम त्या धर्माच्या तरंगांनी व्याप्त होऊन जाईल. जो साधक ज्या कोणत्या अवस्थेला पोहोचला असेल, जितका तपला असेल, तितके तरंग तर निर्माण करेलच.

      शून्यागार बनवून अनेक लोकांना त्यात तप करण्याची सुविधा देत आहेत, ही तर आपल्या स्वतःमध्येच खूप मोठ्या पुण्याची गोष्ट आहे, पण याहून कितीतरी अधिक मोठ्या पुण्याची गोष्ट ही होईल की प्रत्येक साधकाने आठवड्यातून एकदा इथे येऊन तप करावेच. हे आपल्या तपाचे दान आहे. आपल्या तपाच्या तरंगांचे दान आहे, जे या धरतीला खूप पक्व करेल. हे स्थान इतके अधिक तपेल की इथे जो कोणी व्यक्ती येईल, थोड्या श्रमातूनच अधिक प्राप्ती करेल. आपल्या विकारांशी युद्ध करण्यासाठी मेहनत तर प्रत्येक व्यक्तीला स्वतःच करावी लागेल, परंतु जर आसपासचे वातावरण धर्माच्या तरंगांनी तरंगित असेल तर मेहनत करणे सोपे होईल. बाहेरचे तरंग दुषित असतील तर त्यांची बाधा येईल. आपल्या आतील विकारांच्या तरंगांशी तर तो लढतच आहे, बाहेरील तरंगही जर पाय ओढणारे असतील तर काम करू देणार नाहीत.  त्यांच्यापासून तर वाचता येईल. खूप मोठे बळ मिळते, खूप मोठी सहायता मिळते. साधकांनी आपल्या आतमध्ये मंगल मैत्री जागवली पाहिजे. इथे येऊन तपतील तर आपले कल्याण करतीलच, त्या तपण्याने सहस्त्रावधी वर्षांपर्यंत न जाणे आणखी कित्येकांचे कल्याण होईल. जिथे धर्माचे तरंग जागू लागतील, तिथे लोक आपोआप खेचल्यासारखे निघून येतील.

धर्म आपल्या शुद्ध रूपात जितक्या युगांपर्यंत राहील, तोपर्यंत या ठिकाणी न जाणे कितीतरी, अगणित संख्येने लोक येतील, तपतील आणि आप-आपले कल्याण साधतील, वर्तमानात जे तपत आहेत, 'भविष्यातही जे कोणी येऊन तपतील, त्या सर्वांचे मंगल होवो ! कल्याण होवो ! त्या सर्वांची स्वस्ति मुक्ती होवो !!

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

*_लेखक :- कल्याणमित्र सत्यनारायण गोयन्का_*

_बुद्धवर्ष २५६६, चैत्र पौर्णिमा, ६ ऑगस्ट, २०२३, वर्ष ७, अंक १_

*_संकलन :- महेश कांबळे_*

*_दिनांक :-_* १७/०५/२०२५

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

Thursday, 8 May 2025

इथं वो ञातनं सुखिता होतु

 इथं वो ञातनं सुखिता होतु

 या बऱ्याचदा आपण ही गाथा पुण्यानुमोदन करत असताना एखादं कुशल कर्म केल्यानंतर पुण्य वितरण करत असताना ही अशी एक गाथा आपण म्हणत असतो. आपला पूर्वजांसाठी किंवा जे लोक आता आपल्या सोबत नाहीये, आपल्याला सोडून गेलेले आहे, परलोक तस्थ झालेले आहेत अशा लोकांसाठी. पण ही प्रथा सुरू कुठून होते, याचा उद्गम कुठे होतो आणि भगवान बुद्धांनी कशा प्रकारे सांगितलेला आहे की, जे लोक आता हयात नाही, आपल्याला सोडून गेलेले आहेत, वारले आहेत, परलोक तस्थ झालेले आहेत त्यांना आपण पुण्यानुमोदन कसं करू शकतो. आणि खरंच त्यांच्यापर्यंत पुण्य पोहोचतं का? त्यांना पुण्यात त्यांना पुण्याची गरज आहे का? हे आपण आज या पाहुया.

आपल्या भारतीय परंपरेमध्ये आपण बरेच वर्षांपासून हजारो वर्षांपासून खूप साऱ्या प्रकारचे आणि खूप विविध प्रकारे आपण आपल्या पूर्वजांना भोजन दान वगैरे इतर गोष्टी करत आलेलो आहोत. आणि याचा एक दिवस सुद्धा ठरलेला आहे. भारतीय परंपरेनुसार किंवा एक सनातनी परंपरेनुसार तो दिवस येतो आणि त्या दिवसाला सगळेच लोक पितृपक्ष वगैरे काहीतरी करत असतात, घास टाकत असतात वगैरे. पण याची खरी पद्धत काय आहे? आणि बुद्धांनी नेमकं काय सांगितलंय? कशाप्रकारे आपण आपल्या पूर्वजांना दान देऊ शकतो? आणि त्यांची सुटका करून घेऊ शकतो? पण सुटका कशातून करून घेतली पाहिजे? त्यांना या पुण्य भेटतं का? त्यांना हे भोजन पाणी आपण देतो त्यांना मिळतं का? का फक्त हा एका प्रकारचा कर्मकांड झालाय? एका कर्मकांडातून आपण निघालो आणि दुसऱ्या कर्मकांडामध्ये आलो असा काहीतरी आहे का? 

या प्रश्नांची उत्तर आपण बघूया आणि नंतर एक छोटासा विषय असा की हे भूत पिशाच वगैरे आहेत? त्यांचा खरंच कोणाला त्रास होतो का? तर का होतो? काही त्रास झालास तर का होतो? हे सुद्धा आपल्याला या सूत्तामध्ये आज शिकायला मिळेल.

 या सूत्ताचे नाव आहे तिरोकुट, सूत्तक पाठामध्ये आपल्याला हे सूत्त सापडतं आणि बऱ्याचदा आपल्याला अशा खूप साऱ्या गाथा परित्राण पाठामध्ये सुद्धा ऐकायला मिळतात. फार महत्त्वाचं सूत्त आहे. यातून खूप साऱ्या आपले भ्रम, शंका आणि कर्मकांड आहे की नाही? जे आपण करत आहोत ते समजायला मदत होईल.

 आता जसं आपण या फोटोमध्ये बघू शकतो की तिरोकुटसुद्ध याच्या बॅकग्राऊंड मध्ये तुम्ही एक घर बघत आहात आणि या घराच्या समोर एक कंपाउंड आहे. आणि कंपाउंडच्या भोवती काहीतरी अमनुष्य लोक आहेत, प्रेत आहेत आपण बघू शकतो तिरोकुट-  तिरोकुट घराचे कंपाउंड घराच्या कंपाउंड वरती प्रेत लोक येऊन बसतात. कोणते प्रेत लोक? आपले पूर्वज लोक किंवा त्या घरामध्ये राहणारे प्रेत लोक असा याचा अर्थ सुद्धा होऊ शकतो. काही लोकांना पटणार नाही पण ३१ प्लेन्स ऑफ एक्झिस्टन्स म्हणजे हे जे लोक आहे ३१ प्रकारचे लोक आहेत याला साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये आपण असं समजूया की ३१ माळ्याची बिल्डिंग आहे. आपण मनुष्य लोक पाचव्या माळ्यावर राहतोय. आपली ऐपत किंवा आपलं पुण्य एवढंच होतं की आपण पाचव्या माळ्यापर्यंत आलेलो आहोत. तुम्ही आणि मी जितके मनुष्य लोक आपण बघत आहोत हे पाचव्या माळ्यापर्यंत आहेत. मग बुद्ध कुठे होते? बुद्धांचा  पाचव्या माळ्यामध्ये जन्म झाला. पण जेव्हा ते सम्यक संबुद्ध झाले, बुद्ध झाले तेव्हा ते लोकोत्तर झाले.

 इतिपी सो भगवा विद्या चरण संपन्न सुगतो लोकविधु - लोकविधु या लोकांना जाणणारे ते लोकोत्तर झाले. त्यांचे चित्त आता लोकोत्तर झालेला आहे. त्यांना सोत्तापन्नाची डुबकी लागते जे सोत्तापन्न होतात. मग्ग फलावरती असतात तिथपासून ते अरहंतांपर्यंत, ते सगळे आता लोकोत्तर आहेत. या लोकांपासून ह्या ३१ माळ्याची ही बिल्डिंग आहे. समजा हे ३१ लोक आहेत, या लोकांपासून त्या दूर झालेल्या आहेत, परत त्यांचा इथे कुठेच जन्म होणार नाहीये. असे ते लोकोत्तर आहे सोत्तापन्न पासून किंवा अरहंतानंतर, अरहंत बुद्ध परत कधी इथे येणार नाहीये. आपलं पुण्य एवढंच होतं की आपण पाचव्या माळ्यापर्यंत आलो. पाप अजून जास्त असलं असतं तर आपण पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या माळ्यापर्यंत आलो असतो. अजून थोडं पुण्य असलं असतं तर आपण अजून सहाव्या सातव्या आठव्या माळ्यापर्यंत तर ३१ व्या माळ्यापर्यंत पोहोचू शकलो असतो. मी याला माळा शब्द का वापरतोय की साधं सरळ भाषेत मध्ये समजायला. ३१ माळ्याची बिल्डिंग आहे. तुमचं माझं जेवढं पुण्य होतं त्याच्या प्रतापाने आपण पाचव्या माळ्यावर म्हणजे या पाचव्या लोकांमध्ये मनुष्य लोकांमध्ये आलेलो आहोत. पण काहीतरी असे खूप सारे सत्व आहेत की जे अपायभूमीमध्ये पण असतात. आता अपायभूमी किती तर चार आहे आपण खालनं सुरू करूया,

१) पहिला माळा आहे नीरय त्याला तुम्ही नरक सुद्धा म्हणू शकतात. नरक.... नरकाचे खूप प्रकार आहेत, विविध प्रकार आहेत आणि नरकामध्ये गेलेला व्यक्ती हजारो करोडो वर्ष त्या ठिकाणी असतो, असं खूप ठिकाणी वर्णन आहे. 

२) ३१ माळाच्या बिल्डिंग मध्ये ३१ प्रकारच्या लोकांमध्ये दुसरा आहे, तिरच्छान - तिरच्छान म्हणजे काय .... जितके पण कीटक प्राणी आपण या पृथ्वीवरती बघत आहोत. ते सगळे तिरच्छान मध्ये आहेत. कुत्रा, मांजर वगैरे वगैरे वेगळे जितके पण प्राणी आहेत ते सगळे तिरच्छांमध्ये येतात.

३) तिसरं तिसरा आहे पेतलोक - पेतलोक ज्याला तुम्ही भूत वगैरे या शब्दांमध्ये आपण त्यांचं वर्णन करतो, असं पेतलोक 

४) आणि चौथं आहे असुर - असुरांमध्ये मग काही वेगवेगळ्या प्रकारचे असुर असतील, यक्ष असतील, ते त्या ठिकाणी येतात असं हे चार आणि असुरांच्या वरती आपण पाचव्या वरती मनुष्य लोक.

मनुष्यांचा जन्म परत परत मिळत नाही. या जन्मानंतर लगेच मनुष्य जन्म असेल याची पण गॅरंटी नाहीये. 

तिरोकुट सूत्त - आता या सुताची आपली एक बॅकग्राऊंड स्टोरी आहे. बॅकग्राउंड स्टोरी काय भगवान बुद्ध जातात राजगृहाला. बिंबिसार राजा भगवान बुद्धांची वंदना करतो, पूजा करतो आणि बिंबिसार राजा त्यांना एक वेळुवन दान देतो. वेळुवन  बुद्धांना दान देतो साधुकार होतो. खूप चांगला प्रसंग असतो. राजा खूप चांगल्या प्रकारे पुण्याने पुण्य कमवतो आणि त्या रात्री राजा त्याच्या महलामध्ये गेल्यानंतर झोपतो. रात्री अचानक राजा झोपू शकत नव्हता. त्याला जाग येते! का जाग येते? अतिशय भयंकर असे डरावणे, घातक आवाज त्याला येऊ लागतात. खूपच भयंकर, खूपच घाबरण्यासारखे असे आवाज, जसे की कोणी असुर कोणी प्रेत कोणी लोक रडतायेत. कुठे त्याच्या महलाच्या कंपाउंड जवळ. कंपाउंड पर्यंत कोणतरी आलेले आहेत, रडतायत - ओरडतायत, खूप जोरजोरामध्ये आवाज करतायत, आक्रोश करतायत, आकंत करतायत आणि याला काही झोप येत नाहीये. खूप असा भयंकर तो प्रसंग त्याने अनुभवला. सकाळी उठून बुद्धांकडे जातो.... की भगवंत असं का झालं? मी रात्री झोपू शकत नव्हतो मला असे आवाज ऐकायला आलेत. बुद्धांकडे येतो बुद्ध सांगतात आणि प्रसंग आता सुरू करतात की हा नेमकं काय झालं तर. भगवान बुद्ध सांगतात की बिंबिसार हे तुझे पूर्वज लोक आहेत आणि तुझे पूर्वज लोकांना तुझा राग आलाय. राग आलाय म्हणजे मी थोडक्यात सांगतो की राग आलाय म्हणजे काय तू काल इतक्या चांगल्या प्रकारे कुशल कम्म केलं, तू बुद्धांना भिक्षु संघाला वेळुवन दान दिलं आणि हे वेळुवन दिल्यानंतर जे काही तू पुण्य कमावलं आहे तू कोणाला समर्पित केलं नाहीये.....त्याचं अनुमोदन केलेलं नाहीये, तुझ्या पूर्वजांपर्यंत तू हे पोहोचवलेलं नाहीये म्हणून ते रात्री तुझ्या दाराकडे येऊन तुझ्या महलाकडे येऊन ते आक्रोश करत होते, आकांत करत होते असं बुद्ध सांगतात. मग याचं काय कारण आहे? माझे पूर्वज हे त्या पेतलोकांमध्ये का गेलेत? असा एक प्रसंग आता राजा बिंबिसार बुद्धांना विचारतो आणि मग बुद्ध याच्यावरती त्यांच्या मागच्या जन्मांच्या स्टोरी सांगतात. 

आता फुस्स बुद्धांच्या वेळेस गोष्ट आहे. २८ बुद्ध परित आहे. तंण करो महावीरो मेधको महायसो सरणं करो लोक हेतो दीपंकर ज्योतिधरो....  ही पूर्ण गाथा आहे, जी आपण पाठ करू शकतो 

फुस्सबुद्धांच्या वेळेस काय होतं, एका ठिकाणी एका नगरीमध्ये फुस्स बुद्धांचं आगमन होणार होतं. आणि मग त्या गावकऱ्यांनी त्या नगरातील लोकांनी कॉन्ट्रीब्यूशन करून म्हणा एक मोठा उत्सव त्यांनी उत्सव त्यांनी आता करायचं ठरवलं. मग खूप सारे दानाच्या गोष्टी येत गेल्या भेट वस्तू येत गेल्या भिक्षू संघासाठी. आता ते इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये असतात तर मॅनेजमेंट करणारे लोक पण आहेत. ते मॅनेजमेंट कमिटीमध्ये या बिंबिसाराचे काही पूर्वज असतात, पूर्वज असतात. आता फुस्स बुद्धांचा काळ खूप अनंत म्हणजे भरपूर भरपूर हजारो लाखो करोडो वर्ष आधीन खूप कल्पां आधीचा हा काळ आहे खूपच कल्प. आता फुस्सबुद्ध येणार आहेत आणि इथे लोक मॅनेजमेंट कमिटी मध्ये आहेत, वेगळे -वेगळे. आता या लोकांच्या मनामध्ये थोडसं एक अकुशल कम्म येतं..... अदिन्नादाना, न दिलेली वस्तू घेणे, चोरी करणे. असा एखादा प्रसंग त्या ठिकाणी येतो आणि त्यांना असं वाटतं अरे इतक्या गोष्टी दानामध्ये आलेल्या आहेत, तर आपण यातलं काही ठेवू शकतो का? घेऊ शकतो का? असं त्यांना वाटलं आणि ते तसं करतात. भिक्षु संघाच्या नावाने आलेली वस्तू गोष्ट दान त्याच्यामध्ये ते त्यांचा मारतात कट मारणे, मी बोलतो कारण की बऱ्याच ठिकाणी असं कदाचित होत असेल. अदिन्ना दाना न दिलेली वस्तू... परमिशन नाहीये तुम्हाला, पण तुम्ही घेतलं, तुम्ही हात मारला, कट मारला, चोरी केली असं झालं. आता जरी त्यांनी खूप सारे कुशल कर्म केलेले असतील पण तरी पण बुद्धांचं बुद्धांची गोष्ट चोरीला घेतली आहे. अरहंत भिक्षूची गोष्ट चोरीला घेतली आहे. चोरी झाली आहे, अकुशल कम्म झाले आणि ते पण कोणाचं सम्यक संबुद्धांची गोष्ट असेल, अरहंत वस्तू असेल त्या दानातनं अरे बापरे साधा साधं सुद्धा नाही तर दानातल्या गोष्टीतनं कट मारलाय, दान ते चोरलंय बापरे अदिन्नादाना खूप मोठं भयंकर पाप झालेला आहे, आता होतं असं त्या अकुशल कर्मामुळे ते लोक तेव्हा फुस्स बुद्धांच्या वेळेसच ते जातात पेतलोकांमध्ये आणि हजारो करोडो वर्षांच्या या कालावधीमध्ये ते पेतलोकांमध्ये तरसत असतात, तडफडत असतात, त्रासामध्ये असतात आणि खूप यातना भोगत असतात.

 मग आता काल येतो कसप्प बुद्धांचा.  कूसो सत्यवाहो कोणा गमनोज कसपो सिरी संपन्न गौतमो गौतम बुद्धांच्या आधीचे बुद्ध कस्यप बुद्ध त्यांच्या वेळेस आता असा प्रसंग येतो की हे पेतलोक आता बुद्धांना विचारतात की भगवंत आम्ही इतक्या वर्षांपासून, आम्ही इतक्या कल्पांपासून यातना भोगत आहोत. आमच्या मुक्तीचा मार्ग काय? कोण आम्हाला यातून मुक्त करेल? तुम्ही आम्हाला सांगावं, तेव्हा कश्यप बुद्ध सांगतात सांगतात की, हो पुढच्या बुद्ध जेव्हा गौतम बुद्ध होतील तेव्हा त्यांच्या वेळेस एक राजा असेल बिंबिसार तो तुम्हाला या दुःखातून मुक्ती देऊ शकतो असं कस्यप बुद्ध सांगतात. आणि मग गौतम बुद्धांच्या काळामध्ये आता बिंबिसाराने वेळुवन दान दिलेला आहे आणि आत्ताचा हा सध्याचा प्रसंग आहे.

 बुद्धांबद्दल लोकांना भरपूर आपण म्हणूया की डाउट्स क्लिअर नाहीये लोक म्हणतात की २८ प्रकारचे बुद्ध झालेत! पण धम्म फक्त गौतम बुद्धांनी सांगितला. नाही असं नाहीये २८ बुद्धांनी धम्म सांगितला किंवा लोक म्हणतात की फक्त गौतम बुद्ध सम्यक संबुद्ध होते... नाही हे सगळे जे बुद्ध झालेत ते सगळे सम्यक संबुद्ध होते. त्यांचा आपला आपला काळ होता, त्या सगळ्यांनी धम्मचक्र प्रवर्तन केलं, त्यांचा धम्म ऐकून लोकं निब्बानाला सुद्धा गेले. पण प्रत्येक असा एक काळ होता काही कल्प काही वर्ष काही हजारो वर्षांचा काळ जसं ह्या बुद्धांचा आता शासनकाल ५००० वर्षांचा आहे. मग धम्मांचा ऱ्हास होत जाईल असं म्हणतात.  अशी गोष्ट आहे मग पुढे खूप वर्षानंतर खूपच काळानंतर मग मैत्रेय बुद्ध येतील. असा प्रत्येक सम्यक संबुद्धांचा काळ आहे. फक्त गौतम बुद्ध सम्यक संबुद्ध होते असं नाहीये, हे सगळे सम्यक संबुद्ध आहेत.  

मग आता बुद्ध सांगतात बिंबिसाराला बॅकग्राऊंड स्टोरी मग आता राजा विचारतो की मी आता काय केलं पाहिजे? भगवंत मला सांगा माझ्या पूर्वजांची सुटका कशी केली पाहिजे? मग बुद्ध तेव्हा तिरोकुटसुत्त सांगतात किंवा मग याच्यावरती तू जे काही पुण्य कमवलेला आहे तू त्यांना त्यांना अनुमोदन कर त्यांना ते पुण्य पाठव जेणेकरून त्यांना ते पुण्य मिळेल आणि त्यातून त्यांची सुटका होईल अशा प्रकारे हे तिरोकुट सुत्त आहे.

 जे आपण आता शिकणार आहोत मग यातून आपण एक बघितलं काही गोष्टी आपण बघितल्या की काय सगळ्यात

 १) पहिले तर अदिन्ना दाना ..चोरी तर करूच नये. 

२) दुसरी गोष्ट भिक्षू संघाचा काही दान असेल त्यात अजिबात कट मारू नये. जे दानासाठी आले ते दानासाठी आलेला आहे. 

बऱ्याचदा खूप साऱ्या अशा सामाजिक कार्यक्रमांमध्ये, धार्मिक कार्यक्रमांमध्ये, विहाराच्या कार्यक्रमांमध्ये कदाचित असं होत असेल किंवा काही लोक आपला एक अधिकार समजून आम्ही करत आहोत, आम्ही मॅनेजमेंट कमिटी मध्ये आहोत, मग आपण हे घेऊ शकतो, मग आपण हे खाऊ शकतो.... काय झालं भंतेच तर आहे भंतेंना विचारलं किंवा नाही विचारलं काय झालं. आपणच मॅनेज करत आहोत....पण याचे विपाक फार विचित्र असू शकतात आणि हजारो वर्षांचा काळामध्ये तुम्ही गुरफटून जाऊ शकतात. असा विपाक आहे हे झालं पहिली गोष्ट.

एकदा-एकदाच चोरी केली आणि किती वर्षांपर्यंत पेतलोकांमध्ये जाऊ लागलं त्यांना हे बघा. आता एक दुसरं आपण बुद्ध बघितले. २८ बुद्ध झालेत, फुस्स बुद्धांचा काळ, मग कसप बुद्धांपर्यंत ते पेतलोकांमध्ये परत सम्यक संबुद्ध झाले. आपले गौतम बुद्ध ते तेव्हा परत तोपर्यंत पेत लोकांमध्ये. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट जी आता आपण ह्या सूत्तामध्ये शिकणार आहोत की आपण कशा प्रकारे आपल्या पूर्वजांना आपण पुण्यानुमोदन केलं पाहिजे.

  पत्तीदान प्राप्त केलेलं दान दिलं, जे पुण्य मी कमवलेला आहे ते मी दान देतोय, सारे प्राणी सुखी हो, सर्वांचे मंगल हो, सर्वांचे कल्याण हो, सर्वांना हिताचा मार्ग मिळो, आपण असं बोलतो. पण शाब्दिक रूपाने नाही तर मनातून जे आपण पुण्य कमवलेला आहे त्याचं अनुमोदन करणं. कसं करायचं? सूत्तामध्ये सांगितले. तसं आपण बऱ्याचदा गाथा म्हणतो किंवा बऱ्याचदा आपल्या खूप खूप श्रद्धा संपन्न लोक आहे उपासक उपासिक आहे, जेव्हा ते भिक्षु संघाला घरी बोलवतात भोजन दान करतात आपण पाणी टाकतो, कशा प्रकारे? मग ते आपण पितो, लोकांना आपण ते दान देतो.

 पुढे बघूया आपण हे आपण हे बघणार आहोत की कशाप्रकारे कुशल कम्म हे आपण केलं पाहिजे. त्याचबरोबर आपले जे पूर्वज आहेत जे आपल्याला सोडून गेलेले आहेत. त्यांना आपण कशाप्रकारे दान पाठवू शकतो, भोजन दान पाठवू शकतो, कशाप्रकारे आपण त्यांना त्यांची सुटका करू शकतो? त्या पेत लोकातून कशाप्रकारे आपण त्यांना पुण्य पाठवू शकतो. हे या ठिकाणी या सूत्तामध्ये सांगितलेलं आहे. आता बघा होतं काय 

तिरोकुट्टेसु  तिट्ठन्तिसन्धिसिङ्घाटकेसु द्वारबाहासु तिट्ठन्तिआगन्त्वान सकं घरं
पाहुणे अन्नपानम्हिखज्जभोज्जे उपट्ठिते  तेसं कोचि सरति, सत्तानं कम्मपच्चया

की हे लोक काय करतात, 

आगन्त्वान स्वतःच्या घरी परत येतात, 

सकं घरं स्वतःच्या घरी परत येतात द्वार बाहेर तिथं किंवा दाराबाहेर उभे राहतात, 

तिरोकुट्टेसु तुमच्या कंपाउंडच्या बाहेर उभा राहतात, 

सन्धिसिङ्घाटकेसु  आणि चौकामध्ये रस्त्यामध्ये उभं राहतात... 

कोण प्रेत लोक.  एक तर स्वतःच्या घरी येतात किंवा दरवाजा बाहेर असतात किंवा तुमच्या त्या अंगणामध्ये असतात तुमच्या कंपाउंड कडे असतात किंवा चौकामध्ये किंवा रस्त्यांवरती असतात. 

    तेसं कोचि सरति, सत्तानं कम्मपच्चया 

का बघा की त्यांचे जे नातेवाईक आहेत समजा आता त्यांच्याकडे बहुत खूप सारं अन्नपान अन्न आणि खाद्य सामग्री खज्ज भोके भरपूर प्रमाणामध्ये आहे, अबुडेंट आहे, खूप आहे भरपूर आहे ......पण   तेसं कोचि सरति.... पण त्यांची कोणी आठवण काढत नाही, हे प्रेत लोक आहेत, त्यांची कोणी आठवण काढत नाही.... सत्तानं कम्मपच्चया कारण या लोकांच्या पूर्वकमाच्या आधारावरती त्यांनी कधी पुण्यकर्म केले नाहीये. त्यांनी कधी कोणाला दान दिलं नाहीये म्हणून, यांची कोणी आठवण काढत नाही आणि त्यांच्या नातेवाईकांकडे आता खूप सारी संपत्ती आहे. जेवण पाणी सगळं आहे तरीसुद्धा यांची कोणी आठवण काढत नाही. यांच्या कारण की या लोकांचे पुण्यकर्म नाहीये म्हणून. 

आता या ठिकाणी आपण असं समजू शकतो की जर कदाचित पेत लोकांमध्ये जाण्याचा जर प्रसंग आला - गेलो समजा कुठल्यातरी अकुशल कामामुळे तर, कोणीतरी आपल्याला पुण्य पाठवलं पाहिजे, पुण्यामोदन केलं पाहिजे तर का नाही आता आपण पुण्यामोदन केलं पाहिजे. आपल्या पेत लोकांसाठी जेणेकरून आपलं पुण्य जेणेकरून आपलं पुण्यबळ वाढेल आणि जर कधी असा प्रसंग आला, चुकीने जर एखादं कम्म झालं आणि पेत लोकांमध्ये गेलो तर आपल्याला पण कोणीतरी पुण्य पाठवेल. काय झालं आता हे पेत लोक आलेत घराच्या बाहेर आलेत घरी आलेत, द्वारावरती आलेत, तुमच्या कंपाउंड वरती आलेत किंवा या त्या आपल्या रस्त्यावरती आणि चौकामध्ये आलेत. का आलेत नातेवाईकांकडे? खायला प्यायला खूप काही आहे पण कोणी आम्हाला पाठवतच नाहीये, कोणी दान देतच नाहीये, असं त्या पेतलोकांचं म्हणणं आहे.

 आता खूप लोकांना हे सुद्धा ऐकत असताना खूप साऱ्या शंका कुशंका येत असतील. मग बाबासाहेबांनी याला मानलं का? असं आहे का? तसं आहे का? बघा बाबासाहेबांनी संप्रति संप्रति ब्रह्माचा उल्लेख आपल्या पुस्तकामध्ये केलेला आहे. बुद्धांनी त्यांच्या धम्मामध्ये. संप्रत ब्रह्मा हा ब्रह्मलोकांमध्ये आहे, जर ब्रह्मलोक आहे तर अपायभूमी पण आहे, अपायभूमी आहे नरक आहे, पिशाच आहेत, पेत लोक आहे, असुर लोक आहे. जर संप्रती ब्रह्माचा उल्लेख असतो तर त्या ठिकाणी पेत लोकाचा सुद्धा उल्लेख आहे, असं आपण समजू शकतो आणि पुढे आपण चाललं पाहिजे, नाहीतर मग धम्म कधीच नाही कळणार. लोकोत्तर शब्दाचा अर्थ कधीच नाही कळणार. निब्बाण कधीच नाही कळणार. असा आहे कुशल अकुशल आणि कर्म सिद्धांत हे ज्या गोष्टी आहेत या कधीच नाही कळणार. मग आपण एकाच ठिकाणी एका गोष्टीवरती अडकून राहू आणि धम्म कधीच नाही समजणार. 

 पुढे.... 

एवं ददन्ति ञातीनं, ये होन्ति अनुकम्पकासुचिं पणीतं कालेन, कप्पियं पानभोजनंइदं वो ञातीनं होतु, सुखिता होन्तु ञातयो 

आता हे लोक जे आलेले आहेत, पेत लोक हे सुखी कधी होतील कधी होतील जेव्हा आपण त्यांच्यावरती अनुकंपा करतो. अनुकंपा करतो, दयामया करतो, एवं ददन्ति ञातीनं आम्ही नातेवाईकांनी त्यांच्याबद्दल अनुकंपा करून दयामया करून त्यांना भोजन दान दिलं, कसं दिलं? त्यांच्या आठवणी मध्ये दिलं. तो पण एक प्रसंग आहे की आपण कसं त्यांना भोजन दान देऊ शकतो. 

पुढे बघू आपण त्यांना देतो.... सुचिं पणीतं कालेन, कप्पियं पानभोजनं वेळोवेळी आपण त्यांना भोजन दान देतोय आणि म्हणून का म्हणतो

 इदं वो ञातीनं होतु, सुखिता होन्तु ञातयो 

की बाबा माझे जे नातेवाईक जे आता आम्हाला सोडून गेलेले आहेत, परलोक तस्थ झालेले आहेत, नंतर ते कदाचित पेत लोकांमध्ये गेलेले आहेत. तर त्यांच्या नावाने आपण दानधर्म करत आहोत, कपडे -भोजन- पाणी इत्यादी वस्तू त्यांना आपण दान देत आहोत. त्यांच्यावरती अनुकंपा करत. आता ह्या पेत लोकांना आपण वेळोवेळी भोजन दान दिलं तर ते काय म्हणतात ...... 

ते  तत्थ समागन्त्वाञातिपेता समागतापहूते अन्नपानम्हिसक्कच्चं अनुमोदरे

चिरं जीवन्तु नो ञातीयेसं हेतु लभामसे
अम्हाकञ्च कता पूजादायका  अनिप्फला ...... 
आता ते तिथे एकत्र झालेले आहेत आपण त्यांना वेळोवेळी भोजन दान वगैरे देतोय,  ञातिपेता समागता..

 पेत लोकांमध्ये जे आपले नातेवाईक गेलेले आहेत ते आता जमा झालेले आहेत, ते काय म्हणतात..... पहूते अन्नपानम्हि...... की आम्हाला तुम्ही खूप चांगल्या प्रकारे भोजन दान दिलेला आहे .....सक्कच्चं अनुमोदरे ....आणि ते आता अनुमोदन करतात  सक्कच्चं ...खूप चांगल्या प्रकारे अनुमोदन करतायत. एका प्रकारे आशीर्वाद देताय तुमच्यासाठी मंगलमैत्री करतायत का आणि काय बोलतात..... चिरं जीवन्तु नो ञाती की ..... आमचे जे आता हे पेत लोक बोलतात, आमचे जे नातेवाईक आहेत ना हे चिरंजीवितु .....यांना दीर्घायुष्य लाभो. पेत लोक बोलतात येसं हेतु लभामसे ......की यांच्यामुळे आम्हाला हे लाभलेला आहे. काय भोजन वगैरे मिळालेला आहे .....अम्हाकञ्च कता पूजा की ......तुम्ही आमची एका प्रकारे पूजा केलेली आहे. पेत लोक बोलतात नातेवाईकांप्रती ज्या नातेवाईकांना यांनी यांना भोजन दान वगैरे दिलेला आहे ते म्हणतात की आमचे हे नातेवाईक आता चिराई हो, त्यांच्यामुळे आम्हाला हे भोजन लाभलेला आहे आणि त्यांनी अशा प्रकारे आमची जी पूजा केलेली आहे ना....... ही दायका  अनिप्फला की.... हे यांचं हे दायक हे यांनी जे दान दिलेला आहे हे निष्फळ जाणार नाहीये, असं ते पेत लोक म्हणतात. 

 पेत वगैरे तुमच्या घरासमोर आलेत वगैरे वगैरे, येतात आणि त्याच्यानंतर आपण त्यांना अशा प्रकारे भोजन दान देतो वगैरे वेगळे दान देतो ते सुखी होतात. आणि आपल्याबद्दल ते असा विचार करतात की आपल्याला चिरकाळापर्यंत आयुष्य मिळो नंतर आपण सुखी राहो आपण त्यांना भोजन दान दिलेला आहे तर ह्या पुण्य हे खूप मोठे पुण्य आहे असं ते म्हणतात.


 आता सगळ्यात महत्त्वाचं की आपण यांना दान का दिलं पाहिजे? एक तर आपला कृतज्ञ भाव की आपल्या पूर्वजांप्रती आपण कृतज्ञ आहोत म्हणून, आपण दान धर्म करतोय त्यांची त्यातनं सुटका व्हावी म्हणून, आपण यांना पुण्यानुमोदन करतोय. पण अजून एक कारण कसं .... प्रत्येक लोकांमध्ये खाण्यापिण्याची आपली एक अवस्था असेल. जसं तिरच्छान मधला कुठलाही कीटक कुठलाही प्राणी शिकार करून किंवा वेगवेगळ्या प्रकारे स्वतःचं पोट भरत असतो. पण पेत लोकांमध्ये असं नाहीये. आता पेत लोकांचं वर्णन पाहिलं तर खूप वेगळे वेगळे प्रकार आहेत आणि खूप वेगळे वेगळे प्रकारचे पेत आहेत की समजा इतकं मोठं पोट असेल आणि तोंड एवढं बारीक असेल, म्हणजे इतकी मोठी त्याची भूक असेल, तृष्णा असेल... पण खायला एवढंच आहे म्हणजे खाऊ शकत नाही नाहीये, पोट भरू शकत नाहीये. अशा प्रकारे खूप सारे वर्णन आपल्याला खूप साऱ्या ठिकाणी असं बघायला मिळतात. 

बघू आपण भविष्यामध्ये आणि तुमच्या पण वाचनामध्ये असं खूप काही आलेलं पण असेल तर का आपण दानधर्म केला पाहिजे....! 

 हि तत्थ कसि  अत्थिगोरक्खेत्थ  विज्जतिवणिज्जा तादिसी नत्थि, हिरञ्ञेन कयोकयं इतो दिन्नेन यापेन्ति, पेता कालङ्कता  तहिं

  हि तत्थ कसि.... आपण मनुष्य आहोत आपण कुठलातरी रोजगार वगैरे काम धंदा करून आपलं पोट भरू शकतो पण पेत लोकांमध्ये असं नाहीये तर पेत लोक कसं त्यांचा पोट भरतात?  हि तत्थ कसि..... तिथे काही शेती वगैरे नाही, कशी तिथे काही कृषी नाहीये, तिथे काहीतरी शेती नाहीये, गोरक्खेत्थ  विज्जति ....गोरख म्हणजे गुरढोर नाहीयेत की त्यांना पाडून त्यांच्यापासून दूध वगैरे घेऊन काय ते काहीतरी व्यवसाय करू शकतील, स्वतःचा पोट भरू शकतील, वणिज्जा कुठला बिजनेस नाहीये पेत लोकांमध्ये की तुमचं पोट ते वाणिज्य ते काहीतरी बिजनेस करून त्यांचा पोट भरू शकतील, हिरञ्ञेन कयोकयं..... हिरण्य म्हणजे सोनं किंवा सोनं नानाने काहीतरी ते व्यापार करून एखादी वस्तू ते विकत घेऊन वेगळे वगैरे स्वतःचं पोट नाही भरू शकत, कसं इतो दिन्नेन यापेन्ति..... आपण जे त्यांना दान देतोय पेता कालङ्कता  तहिं...... तेच त्यांना प्राप्त होते. आपण जे काही त्यांना दान धर्म देतोय, भोजन दान, कपडे दान इतर काही गोष्टी दान ते त्यांना पेत लोकांमध्ये मिळतं असं या सूत्तामध्ये वर्णन आहे. दुसरा कुठल्याच प्रकारे त्यांना भोजन सुद्धा मिळत नाही, पाणी सुद्धा मिळत नाही, पुण्य सुद्धा मिळत नाही, आपण जे त्यांना पाठवतो त्यांची आठवण करून त्यांनाच ते तेव्हा प्राप्त होतं. कसा आहे ना बुद्धांचा धम्म .....आपल्याला स्वार्थी नाही बनू देत, तुमच्याकडे धनसंपत्ती आहे, तुम्ही दान द्या. दान दिल्यानंतर तुमचा इगो कमी होतो, गर्व कमी होतो आणि आपणच पुण्य कमवत नाहीये, आपण आपण दान दिलं आपल्याला पुण्य मिळतंय पण समोर त्याचं पण मंगल होतंय. बघा कसा आहे धम्म....कसा काम करतो. आपल्याला पुण्य मिळतंय आणि समोर त्याचं पण भलं होतंय, माझी दान पारमी पूर्ण होते आणि काही लोकांचं भलं सुद्धा होईल. बघा तुम्ही किती किती कल्याणकारी धम्म आहे हा.  एकाच वेळेस किती प्रकारचं कुशल कम्म होता,त धम्म देसना देऊन, धम्म श्रवण करून साधुकार आहे.....बघा क्या बात है

  आता ही गाथा आपण बऱ्याच ठिकाणी ऐकलेली असेल आणि बऱ्याचदा भिक्षू संघ आपल्या घरी आल्यानंतर आपण पुण्यानुमोदन करतो. एक परात आणतो ताट आणतो त्याच्यामध्ये ग्लासामध्ये तांब्यामध्ये आपण पाणी सोडतो ही गाथा आपल्यापैकी बरेच लोकांनी ऐकलेली असेल निश्चितच

 उन्नमे उदकं वुट्ठंयथा निन्नं पवत्ततिएवमेव इतो दिन्नंपेतानं उपकप्पति

यथा वारिवहा पूरापरिपूरेन्ति सागरंएवमेव इतो दिन्नंपेतानं उपकप्पति

ही गाथा खूपदा आपण ऐकलेली आहे कसा आहे उन्नमे उदकं वुट्ठं जेव्हा एखाद्या उंची वरून आपण पाणी सोडूया यथा निन्नं पवत्तति आणि ते हळूहळू खाली पडत जाणारच आहे हा नियम आहे, ग्रॅविटी आहे. आपलं गुरुत्वाकर्षण आहे, वरून पाणी सोडलं तर खाली जाणारच आहे. एवमेव इतो दिन्नंपेतानं उपकप्पति .... असंच करतो ना आपण पाणी सोडतो त्या ग्लासामध्ये ....हेच आहे. समजा मी आधीच म्हटलं ३१ व्या माळ्याची बिल्डिंग आहे आपण पाचव्या माळ्यावरती आहोत पाचव्या माळ्यावरून आपण जर पाणी खाली सोडलं चौथ्या तिसऱ्या दुसऱ्या एक माळ्यावरती तर पाणी जाईलच शंभर टक्के जाईलच. तेच तसं मी जे काही पुण्य कमवलेला आहे ते मी त्यांना पाठवतोय. हि एका प्रकारचं सांकेतिक भाषा आहे, चिन्ह आहे. अशा प्रकारे कर्मकांड लोक याला बोलू शकतात. पण याचा अर्थ काय? 

आता तुम्ही माझ्या ज्या माता-भगिनी हे व्हिडिओ बघत असतील त्यांना पण प्रश्न पडला असेल हे काय आपण असं हे काय असं करतोय मग हे कर्मकांड झालंय आणि काय होणार आहे हे? आहे हे सांकेतिक आहे हे. सांकेतिक गोष्ट आहे की, जसं वरून पाणी सोडलं तर खाली जाणारच आहे तसंच माझे जे पूर्वज लोक जर काही अपाय भूमीमध्ये असेल, असुर असतील, प्रेत लोकांमध्ये असेल, तिरच्छान मध्ये असेल इव्हन निर्यामध्ये जरी असेल मी त्यांना पुण्य पाठवते, मी त्यांना दुःखातून मुक्तीचा मार्ग पाठवते, मी त्यांना पुण्य पाठवते... जेणेकरून त्यांचा यातून मुक्ती हो.

 बघा या मनुष्य जन्मानंतर लगेच मनुष्य जन्म मिळेल याची गॅरंटी नाहीये असं उदाहरण बुद्धांनी खूपदा दिलेला आहे. जसं की एक सिम्पल उदाहरण की मोठा एक खूप मोठा सागर आहे. महासागर आहे. त्याच्यामध्ये कासव आहे आणि समुद्रावर त्या महासमुद्रावर एक टायरचा ट्यूब आहे.  टायरचा ट्यूब आपला आपला तरंगत आहे आणि हा कासव त्या समुद्रामध्ये आपला आपला फिरत आहे. अशी काय गॅरंटी असल अशी काय संभावना असल, अशी काय प्रोबॅबिलिटी असल की जेव्हा हा कासव त्या पाण्याच्यावर डोकं काढेल आणि त्याचं डोकं बरोबर त्या टायऱ्याच्या ट्यूब मध्ये येईल याची प्रोबॅबिलिटी काय असेल? याची संभाव्यता काय असेल? याचे चान्सेस काय असतील? तेवढेच चान्सेस मनुष्य जन्मानंतर लगेच मनुष्य जन्म मिळणं याचेच आहेत. कॅल्क्युलेशन करण्यासारखं आहे की नाही बघा आणि याचे किती चान्सेस असतील. समजा पॅसिफिक महासागर आहे, प्रशांत महासागर आहे तिथे आपण एक टायरीचा ट्यूब सोडलेला आहे आणि तिथे एक कासव आहे तो कासव जेव्हा जेव्हा डोकं वरती घेईल आणि किती वेळेस त्याचं आणि किती वेळेस त्याचं डोकं हे त्या टायरेच्या ट्यूब मध्ये येईल याचा अंदाज लावा तेवढाच कठीण किंवा तेवढं सोपं आहे. मनुष्याचा जन्म परत मनुष्य जन्मामध्ये होणं.....

 यथा वारिवहा पूरा

जसं पूर आलेला आहे खूपच पूर आलेला आहे. आणि काय होतं पाऊस पडतो पाऊस हा नदी नाल्यातनं झऱ्यातनं तो नद्यांमध्ये येतो, मग नद्या मोठ्या मोठ्या होऊन जातात आणि कालांतराने नदी एका सागराला जाऊन मिळते.... परिपूरेन्ति सागरं...... 

एवमेव इतो दिन्नंपेतानं उपकप्पति.....अशाच प्रकारे माझं पुण्य त्यांच्यापर्यंत पोहोचव, त्यांचा मंगल हो, त्यांचा कल्याण हो अशा प्रकारे ही गाथा आहे. आणि आपण बऱ्याचदा ही ऐकलेली आहे. बऱ्याचदा आपण ही पाठ सुद्धा केली पाहिजे. 

अदासि मे अकासि मेञातिमित्ता  सखा  मेपेतानं दक्खिणं दज्जापुब्बे कतमनुस्सरं
 हि रुण्णं वा सोको वाया चञ्ञा परिदेवना तं पेतानमत्थायएवं तिट्ठन्ति ञातयो

आता आपण त्यांना हे का दिलं पाहिजे  पुब्बेकारी आणि कतञ्ञु..... पुब्बेकारी आणि कतञ्ञु या दोन प्रकारचे लोक या जगामध्ये भेटणं मिळणं फार मुश्किल आहे तर आपण कतञ्ञु बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कृतज्ञ भाव असला पाहिजे. का असला पाहिजे?

 अदासि मे अकासि मेञातिमित्ता  सखा  मेपेतानं दक्खिणं दज्जा, पुब्बे कतमनुस्सरं

कोणत्या कार्याचा अनुसरण करून अदासि मे त्यांनी माझ्यासाठी हे केलं आहे त्यांनी माझ्यासाठी असं केलेलं आहे असं बोललेलं आहे ञातिमित्ता  सखा  मे ......आपले नातेवाईक मित्र मित्र पण आहेत, पेतानं दक्खिणं दज्जा की आपल्याला त्याचं अनुसरण करायचं आहे, आठवायचं आहे की माझ्या या मित्राने माझ्या या नातेवाईकाने मला हे काही दिलेलं आहे, मला असं काही दिलेलं आहे, माझी अशी मदत केलेली आहे, याचा एक ग्रॅटीट्युड ठेवून याचा एक कृतज्ञाचा भाव ठेवून त्यांना आपण पेतानं दक्खिणं दज्जा अशा ह्या प्रेत लोकांना आपण दानधर्म दिला पाहिजे. म्हणून आपण त्यांना दान धर्म दिला पाहिजे की त्यांनी माझी अशी मदत केली होती, ते मला मदतीला धावून आले होते, वेगळे वेगळे एक कृतज्ञ भाऊ म्हणून आपण त्यांना दान दिलं पाहिजे. अशा प्रकारचं दान दिलं पाहिजे, पाहिजे पण का नाही केलं पाहिजे? काय नाही केलं पाहिजे? जे त्यांना अजिबात फलस्वरूपी मिळत नाही? काय नाही....  हि रुण्णं वा सोको वा, 

शोक रडणं गाणं किंवा हे शोक नाही करायचा आहे. याच्या परिवेदना त्याने त्यांना फक्त वेदना सोडणार आहेत. या चञ्ञा परिदेवना रडून शोक करून काही प्राप्त होणार नाहीये.  तं पेतानमत्थाय..‌.. ते त्या प्रेत लोकांच्या हितामध्ये नाहीये अजिबात हितामध्ये नाहीये. एवं तिट्ठन्ति ञातयो ....आणि जर तुम्ही असंच करत राहिले तर त्या तिथेच राहतील, त्यातून त्यांची सुटका होणार नाही लवकरात लवकर. बघा काय केलं पाहिजे.... आपण आपले नातेवाईक जे आपल्याला सोडून गेलेले आहेत, 

 बुद्ध लोक त्यांना बुद्धवासी म्हणतात.... एखाद्या व्यक्ती जो सोडून गेलेला आहे त्यांचा आपण फोटो वगैरे लावतो त्यांच्या नावासमोर आपण बुद्धवासे लिहितो.अरे बुद्धवासी बुद्ध फक्त ते बुद्ध आहेत म्हणजे बुद्ध लोक जातात. बुद्ध होतात, बुद्ध वेगळे आहेत. बुद्धवासी नाही त्याला परलोकतस्स की आता हे या लोकांमध्ये नाहीयेत.  म्हणून परलोक तस्सं अशा असा शब्द वापरला पाहिजे, बुद्धवासी नाही. हे चुकीचं आहे. मग कसं आपण त्यांना दानधर्म दिला पाहिजे? पण रडून शोक करून काही फायदा नाहीये, त्यातून त्यांची सुटका होणार नाहीये.  रडून वगैरे जर आपण त्यांच्या नावाने फक्त रडत राहिलो जर त्यांच्या पुण्यतिथीला पुण्यस्मरणाच्या दिवसाला फक्त रडत राहिलो तर काही होणार नाहीये. 

त्यांना कसं भोजन दान करायचं कसं करायचं हे आपण आता बघितलं. 

पुढे आता आपण बघितलं की आपण त्यांना वेळोवेळी भोजन दान देतोय. पण अजून एक पाऊल पुढे जाऊन कशाप्रकारे अजून कुशल कम्म होऊ शकतं बघा.

अयञ्च खो दक्खिणा दिन्नासङ्घम्हि सुप्पतिट्ठितादीघरत्तं हितायस्सठानसो उपकप्पति

बघा खूप चांगल्या प्रकारे भिक्षू संघ जो शिलवान आहे सदाचारी आहे एक भक्तिको आहे एक भक्ती म्हणजे दिवसातून एकदा जेवणारा आहेत, विकाल भोजनाचे खूप पालन करणारा आहेत, सहसा आता लोक असे करत नाही म्हणून बोललो एक भक्तीको आहे विकाल भोजन या शिलाचे पालन करणारा आहे ठीक आहे अशा भिक्षु संघाला आपण बोलावलं, त्यांना आपण अयञ्च खो दक्खिणा दिन्ना ..... आपण त्यांना दक्षिणा दिली तर काय झालं खूप मोठं पुण्य कमवलेला आहे आणि हे पुण्य कसं झालं भिक्षु संघाला आपण दान दिलं ज्यांच्या नावाने आपण दान देत आहोत की बाबा माझे आजोबा वारलेत माझे आजी वारले त्यांना हे पुण्य मिळो वगैरे वगैरे त्यांच्या निमित्ताने आपण भोजनदान दिलेला आहे ते भिक्षू संघाला सुद्धा भेटत आहे आणि त्यांना तिथे सुद्धा भेटत आहेत यांच्या नावाने आपण भोजन दान दिला आहे, कपडे पाणी दिला आहे ते त्यांना तिथे सुद्धा भेटत आहेत, असं आहे आणि त्या लोकांच्या दीर्घ रक्त्यासाठी त्यांना चीर काळासाठी त्यांना ते फलदायी असणार आहे पेत लोकातून त्यांची सुटका होण्यासारखं आहे. अशा प्रकारे आपण दोन वेळेस एकाच वेळेस दोन प्रकारचे कुशल कर्म सुद्धा करू शकतो

 अयञ्च खो दक्खिणा दिन्नासङ्घम्हि सुप्पतिट्ठितादीघरत्तं हितायस्स, ठानसो उपकप्पति 

बघा जसं सांगितलं तसंच की एकाच ठिकाणी आपण दोन कुशल कर्म केले भिक्कूंना दिलं बलञ्च आणि या दानामुळे भिक्षूंना बल मिळेल कोणतं बल मिळेल पोट तर भरेल शक्ती मिळेल आणि ते अजून चांगल्या प्रकारे कुशल कर्म करू शकतात त्यांचा भिक्षू धर्म पाडू शकतात आणि त्यांच्या पारामी पूर्ण करू शकतात आणि इतरांना धम्मदेसना देऊ शकतात एवढं बल त्यांना मिळालेला आहे तुमच्या या भोजनामुळे तुमच्या या दानामुळे आणि ज्यांच्या निमित्ताने आपण दानधर्म करत आहोत त्यांना सुद्धा ते पुण्य मिळालेला आहे असा बुद्धांचा धम्म आहे अशा प्रकारे बुद्धांनी सांगितलेला आहे जे खूप काळापर्यंत चीर काळापर्यंत तुम्हाला मला आपल्या सगळ्यांच्या कल्याण आहेत अशाप्रकारे आपण या ठिकाणी तिरोकुट सूत्त बघितलं तसे हे सूत्त खूप महत्त्वाचा आहे कारण की आपण दर वेळेस जे कोणी लोक आपल्याला सोडून गेलेले आहेत त्यांच्या नावाने दानधर्म करत असतो बऱ्याचदा करत असतो काही काही लोक फक्त वर्षातून त्याच एका तारखेला दानधर्म करत असतील तर त्यांना दानधर्म करण्यासाठी त्या तारखेची वाट बघायची गरज नाहीये आपण भिक्षू संघाला ज्या पण निमित्ताने बोलवतो तेव्हा सुद्धा आपण त्या लोकांचा उल्लेख करू शकतो आपले आई-वडील असतील नातेवाईक असतील आजी-आजोबा वगैरे लोक असतील मित्र परिवारातले लोक असतील इव्हन एखादा प्राणी सुद्धा तुमच्या घरात मेलेला असेल कुत्रा मांजर जे तुमच्या घरातले एक सदस्य होते त्यांच्या नावाने सुद्धा आपण पुण्यकर्म करू शकतात त्यांना सुद्धा पुण्याची गरज आहे अशा प्रकारे पुण्यामोदन करणं पुण्यवितरण करणं हे स्वतः एक कुशल कर्म आहे आपण दहा प्रकारचे कुशल कर्म बघितले त्याच्यामध्ये हे सुद्धा एक कुशल कर्म आहे आपण आपली पारामी पूर्ण करत आहोत आणि आपण इतरांचेही मंगल करत आहोत एका मेणबत्ती पासून दुसरी मेणबत्ती पेटवली प्रकाश वाढतो त्याचप्रकारे अशा प्रकारे आपण पुण्यानुमोदन सुद्धा करू शकतो आता आपल्याला याचा एक प्रॉपर तरीका एक प्रॉपर वे माहिती पडलाय की आपण भिक्षू संघाला बोलवायचं ते सदाचारी आहे शीलवान आहेत एक भक्तीको आहेत विकाल भोजनाचे पालन करणारे आहेत अशा भिक्षू संघाला आपण बोलवलं त्यांना भोजन दान दिलं आणि शेवटी पुण्यानुमोदन करत असताना आपण असा विचार तर करतो की ह्या पुण्याच्या प्रतापाने माझा मंगल हो सोबत हे बोलूया की माझ्या पूर्वजांना हे पुण्य मिळो एखादी व्यक्ती आपल्या घरात वारलेली असेल तर त्यांचं नाव घेऊन त्यांना सुद्धा हे पुण्य मिळो एखादा प्राणी आपल्या घरात मेला असेल त्यांना आपण हे पुण्य पाठवूया आपल्या गुरुजनांना ज्यांनी आपल्याला धम्म सांगितला त्यांच्याबद्दल आपण कृतज्ञ भाव आहोत अशांना आपण पुण्य पाठवू शकतो पुण्यानुमोदन करू शकतो जे काही देवतागण सुद्धा आपली रक्षा करत आहोत त्यांना सुद्धा आपण हे पुण्य पाठवू शकतो आणि अजून एका व्यक्तीला पुण्य पाठवायचा आहे जो

 तुम्हाला नरकातनं वाचवेल पुढचं सूत्त त्याच्या वरतीच असेल थोडसं समजायला कठीण जाईल बऱ्याच लोकांना हे एक्सेप्ट सुद्धा करता येणार नाही हे काय पण आहे बघूया आपण

 पुढच्या सूत्मध्ये त्याचबरोबर अशा प्रकारे आपण या स्वतःमध्ये कशाप्रकारे कुशल कर्म करू शकतो प्रेत लोकांना आपल्या पूर्वजांना आपण कशाप्रकारे दानधर्म करू शकतो जेणेकरून आपल्याला तर पुण्यकर्म मिळतंय त्यांना सुद्धा पुण्यकर्म मिळतंय आणि त्यातून त्यांची सुटका होऊ शकते आणि जर कोणाला असा काही त्रास होत असेल तर भिक्षू संघाला बोलवून घरामध्ये परित्राण पाठ करून कुशल कर्म केलं पाहिजे जेव्हा धम्म तुम्ही पालन करतात तर धम्म तुमचं रक्षा करतो असं म्हणतात याला आपल्याला कर्मकांडासारखं बघायचं नाहीये तर आपलं अंतिम ध्येय हे निब्बान आहे आणि निब्बानासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे तर त्याला पूरक त्याला सपोर्टिंग ह्या सगळ्या गोष्टी आहेत पुण्य कमवणं आणि पुण्य वितरण करणं पुण्यानुमोदन करणं. बाबासाहेबांनी आपल्याला खूप चांगला धम्म दिलेला आहे त्याला आपल्याला शिकायचा आहे समजायचा आहे काही प्रश्न असतील विचिकिच्छा असेल शंका असेल तर गुरुजनांना भिक्षू संघाला एखाद्या अभ्यासक उपासकाला उपासिकेला आपण विचारू शकतो शंकांचा समाधान करून घेतलेलं बरं एखाद्या गोष्टीमध्ये अडकून राहण्यापेक्षा एखादी गोष्ट समजत नसेल तिथे अडकून राहण्यापेक्षा त्याला थोड्या वेळा करता साईडला करून पुढे अजून दुसरी गोष्ट आपण समजूया एकाच ठिकाणी अडकून बसू नका पुढे चला समजून घ्या कालांतराने ती गोष्ट सुद्धा समजण्यासाठी समजेल ती गोष्ट सुद्धा समजेल अजून चांगल्या प्रकारे क्लिअर होईल धम्म गणितासारखं आहे आपल्या सगळ्यांना एक गणित दिलं एक मॅथ्स दिलं तर ते सगळ्यांना सोडवता येणार नाहीये प्रत्येक जण त्याच्या बुद्धिमत्तेने प्रयत्न करेल काही लोकांना जमेल काही लोकांना जमणार नाही पण कालांतराने अभ्यास करत गेलो बुद्धिमत्ता वाढत गेली तर धम्म सुद्धा समजेल गणित सुद्धा सॉल्व होईल प्रॅक्टिस करून करून तसंच धम्म आहे पहिल्याच अटेम्प्ट मध्ये सगळं समजेल अशी तरी अपेक्षा आपण केली नाही गेली पाहिजे 


आपण सगळे आलात श्रद्धा संपन्न उपासक उपासिका या ठिकाणी आलात आपण हा धम्म ऐकलात ही धम्म देसना माझ्याकडून ऐकली तुम्ही सगळे माझी दानपारमी पूर्ण करण्यासाठी मला मदत करत आहात खूप खूप धन्यवाद खूप खूप साधुकार या पुण्याच्या प्रतापाने तुमचं माझं आपल्या सगळ्यांचे मंगल हो धम्म सांगत असताना जर एखाद्या गोष्टीचा एखाद्या शब्द शब्दाचा जर थोडासा अर्थ मागे पुढे होत असेल तर बुद्ध धम्म संघ मला क्षमा करो माझा इंटेन्शन माझा हेतू चांगला आहे धम्माचा प्रसार प्रसार करण्यासाठी हे छोटसं कॉन्ट्रीब्यूशन आहे आपल्याला हे व्हिडिओज कसे वाटत आहेत आम्हाला कॉमेंट बॉक्स मध्ये सांगा आम्हाला आम्हाला whatsapp मध्ये सांगा whatsapp ची लिंक खाली दिलेली आहे कमेंट मध्ये दिलेली आहे आमचं whatsapp चा ग्रुप जॉईन करा अशाच प्रकारे आपण खूप साऱ्या स्वतःचा अभ्यास करणार आहोत या पुण्याच्या प्रतापाने तुमचं माझं आपल्या सगळ्यांचं मंगल हो आपल्या पारामी पूर्ण हो अरहंतांचे दर्शन हो बुद्धांचे दर्शन हो साधू साधू साधू 

कोलित सुत्त

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_कोलित सुत्त_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_41.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼  _'कोलित सुत...