Tuesday, 20 May 2025

भगवान बुद्धांच्या शिकवणुकीच्या हासाचे प्रमुख कारण

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_भगवान बुद्धांच्या शिकवणुकीच्या हासाचे प्रमुख कारण_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2025/05/blog-post_45.html

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

                _*भगवान बुद्धांच्या नंतर सम्राट अशोकांनी बुद्धांच्या धर्म -शिकवणुकीला भारताच्या दूर-दूरच्या गावात आणि शेजारील देशातही पसरविले.* अशोकांच्या मृत्यूनंतर त्यांच्या संतानात राजगादी प्राप्त करण्याच्या इच्छेने परस्परात कलह निर्माण झाला. हळू-हळू राजपरिवाराची सुख-शांती नष्ट होऊ लागली. त्यामुळे सारे साम्राज्य बृहद्रथाच्या हातात आले. बृहद्रथ दुर्बळ वृत्तीचा राजा होता. बाहेरील शत्रुचे आक्रमण होत राहात असे. त्यामुळे त्याने आपल्या अश्वारोही सेनेच्या सैनिकांना प्रशिक्षित करण्यासाठी कोण्या अन्य देशातून आलेल्या पुष्यमित्र शुंग नावाच्या युवकाला आपल्या अश्वसेनेचा प्रशिक्षक बनविले. हळू-हळू काही कुटिल लोकांच्या चलाखीमुळे तो साऱ्या सेनेचा सेनापती झाला. दुर्भाग्यामुळे ह्याच लोकांनी चलाखीने पुष्यमित्राच्या हाताने राजाची हत्या करविली आणि पुष्यमित्र शुंगला राजगादीवर बसविले, जो सेनेचा सेनापती होता. तो राजमदात मस्त झाला. त्याला दिसतही नव्हते की षडयंत्रकारी त्याच्याद्वारे काय करवित आहेत. त्यानंतर ते आपली मनमानी करू लागले "पती झाला कोतवाल, आता भिती कोणाची ह्या म्हणीनुसार कारभार सुरु झाला._

         _लोकांच्यात खूप मोठी भ्रांती पसरली की पुष्यमित्र शुंगाच्या राज्यात सर्व ब्राम्हण समाजाने मिळून बुद्धांच्या शिकवणुकीला नष्ट करून टाकले, *वस्तुतः सामान्य ब्राम्हणांचा बुद्धांच्या शिकवणुकीला कोणताही विरोध नव्हता. विरोध ब्राम्हणांच्या पुरोहित वर्गाच्या मनात जागला, कारण जे पशू-यज्ञ होत होते, ते बुद्धांच्या शिकवणुकीमुळे बंद होत गेले. त्यामुळे त्या यज्ञांमुळे होणारी त्यांची मोठी कमाई बंद झाली. हे सत्य आहे की सर्व पुरोहित ब्राम्हणच होते परंतु सत्य हे ही आहे की सर्व ब्राम्हण पुरोहित नव्हते. यज्ञ बंद झाल्यामुळे सर्वात मोठी हानी पुरोहित वर्गाच्या ब्राम्हणांची झाली. त्यामुळे त्यांनी नवीनच तयार झालेल्या संस्कृत भाषेत जे साहित्य रचले, त्यात बुद्धांच्या शिकवणुकीला लोकांसाठी अग्राह्य आणि चुकीचे सांगितले आणि ह्या प्रकारे बुद्धांची शिकवणुक नष्ट होत गेली.*_

           _त्यामुळे सर्व ब्राम्हणांना बुद्धांच्या शिकवणुकीला नष्ट करण्यासाठी जबाबदार ठरविणे एकदम चुकीचे आहे. कारण बुद्धांच्या विद्येला नष्ट करणारे तर मोजकेच पुरोहित होते, जे ब्राम्हण वर्गाचे अवश्य होते, परंतु ब्राम्हणांचा सर्वसाधारण समाज पुरोहितगिरी करीत नव्हता. त्यामुळे बुद्धांच्याद्वारे पशू-यज्ञ बंद करण्यामुळे त्यांचे खूप मोठे नुकसान नव्हते. यज्ञांचा प्रमुख लाभ तर पुरोहितांना प्राप्त होत होता. बाकी इतर ब्राम्हणांना तर केवळ प्रसादाच्या रूपाने बळी दिलेल्या पशुच्या मासाचे काही तुकडे मिळत होते. ह्या यज्ञांच्या बंद होण्यामुळे सर्वात मोठी हानी पुरोहितांची झाली. इतर ब्राम्हण समाजाची नाही. पुरातन साहित्याच्या अवलोकनाने ह्या बाबीचे प्रमाण मिळते की कोणत्या यज्ञाला करविण्यामुळे पुरोहिताला किती दक्षिणा मिळत होती._

_*१ अग्निहोत्र यज्ञ* १००० पेक्षा जास्त गायी आणि चांदीची खोळ चढविलेला पांढरा रथ._

_*२ विश्वजित यज्ञ* आपली सारी संपत्ती अथवा १००० गायी आणि १०० घोडे._

_*३ विश्वजित शिल्प यज्ञ* राजा आणि त्याच्या प्रदेशाच्या सामर्थ्यानुसार जितके तो देऊ शकतो तेवढे द्यावे लागत होते._

_*४ स्येन यज्ञ* कारण की यज्ञाचे स्वरूप जादूटोन्याचे होते म्हणून दक्षिणेच्या रूपाने एक डोळा असणारी, लंगडी, बिना शिंगाची, विना शेपटीची, आजारी गाय द्यावी लागत होती._

_*५ साड्यशक्र यज्ञ* - ६००६ गायी._

_*६ वाजपेय यज्ञ* १७०० गायी, १७०० मुल्यवान कपडे, १७०० मेंढ्या, १७०० बकऱ्या. काही काही जागी १७००० ही म्हटले आहे._

_*७ राजसूय यज्ञ* २४००० गायी._

_*८ अश्वमेध यज्ञ* अगनित गायी आणि राणी व पुत्रीला सुद्धा पुरोहिताला दिले जात होते._

_*९ सर्वमेध यज्ञ* आपला सर्व जमीन-जमुला, आपल्या मालकीची सारी संपत्ती पुरोहिताला दिली जात होती._

_सर्वसाधारण ब्राम्हण पुरोहित नव्हते. अनेक ब्राम्हण भिन्न-भिन्न प्रकाराच्या रोजगाराने आपला उदरनिर्वाह करीत होते. उदाहरणार्थ:-_

१. वैद्याचे कार्य. २. राज अमात्याचे कार्य. ३. शिकार करण्याचे कार्य, ४. मासे पकडण्याचे कार्य, ५. राजाची सेवा करण्याचे कार्य, ७. पशुपालनाचे कार्य, ८. मेहनत-मजुरीचे कार्य, ९. शेती नांगरण्याचे कार्य, १०. तलवारीचे लक्षण सांगण्याचे कार्य इत्यादी.

         _*पुरोहित वर्गातही काही मोजके लोक जे नवीन संस्कृत भाषेचे विद्वान होते. ते बुद्धांद्वारे प्रयुक्त पुष्कळश्या साधनासंबंधी शब्दांचा प्रयोग आपल्या प्रशिक्षणात करू लागले, ज्यामुळे लोकांना ही भ्रांती होवो की त्यांची विद्या तर पुरातन आहे, जिला बुद्धाने त्यांच्या साहित्यातून प्राप्त केले आहे. त्यांनी अशा साहित्याची रचना केली, जे बुद्धांच्या शिकवणुकीच्या विरोधी सिद्ध झाले. बुद्धांच्या शिकवणुकीत आर्य अष्टांगिक मार्ग खूप प्रसिद्ध होता, त्यामुळे त्यांनी अष्टांग योगाची निर्मिती केली. बुद्धांच्या विपश्यनेत डोक्यापासून पायापर्यंत व पायापासून डोक्यापर्यंत आतील सत्याला पाहण्याची क्रिया होती, जिला अनुलोम-प्रतिलोम म्हणत असत. त्यांनी श्वासाच्या येण्या-जाण्याला अनुलोम-प्रतिलोमचे नाव दिले, ज्यामुळे लोकांना भ्रांती होवो की ही अनुलोम-प्रतिलोमची शिकवणुकही खूप पुरातन आहे. ह्याप्रकारे पुरोहित-वर्गाच्या ह्या संस्कृत-साहित्यकारांनी हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला की बुद्धांनी ह्या पुरातन विद्येच्या आधारावर आपल्या शिकवणुकीचा विस्तार केला.*_

         _*पुरोहितांनी समाजात ह्या बाबीचाही प्रबळ प्रचार केला की कृष्ण बुद्धांच्या पूर्वीचे अवतार होते. त्यामुळे त्यांच्या वेळची गीता ही निश्चित रूपाने पुरातन ग्रंथ आहे. जेव्हा की वास्तविकता ही आहे की गीता बुद्धांच्या नंतरची रचना आहे आणि बुद्धांच्या शिकवणुकीवर गीतेचा प्रभाव नाही तर गीतेवर बुद्धांच्या शिकवणुकीचा प्रभाव आहे.*_

         _*दुसरे त्यांनी पाहिले की बुद्धांच्या शिकवणुकीचा विस्तार ह्यामुळे झाला की ही सांप्रदायिक शिकवण नसून सार्वजनिक शिकवण होती. बुद्धांच्या शिकवणुकीचा आधार शील, समाधी आहे आणि सदाचरणच धर्म आहे. लोक ह्याला सांप्रदायिक मानीत नव्हते. त्यामुळे हिचा प्रसार होण्यात कोणतीही अडचण आली नाही. बुद्धांनी आपल्या शिकवणुकीला 'धर्म' म्हटले, जो सर्वांचा असतो. आपल्या अनुयायांना 'धार्मिक' म्हटले, ह्याला सर्वांनी स्वीकारले. त्यामुळे त्यांनी बुद्धांच्या शिकवणुकीवर गंभीर प्रहार हा केला की त्यांची शिकवण 'धर्म' नसून 'बौद्ध-धर्म' होती आणि त्यांचे अनुयायी 'धार्मिक' नसून 'बौद्ध' होते. ह्या प्रकारे बुद्धांची सार्वजनिक शिकवण सांप्रदायिक बनविण्यात आली आणि लोक ह्यालाही एक 'सांप्रदायिक-धर्म' मानू लागले. ह्यामुळे बुद्धांच्या शिकवणुकीचा ज्या सहज भावाने विस्तार होत होता, तो थांवला.*_

           _संप्रदाय शब्द धर्माच्या रूपात मानण्यात येऊ लागला. त्यामुळे जेव्हा भारताचे संविधान बनले तेव्हा चुकीने त्याला हिंदी भाषेत 'धर्म-निरपेक्ष' म्हटले गेले, कोणतेही चांगले राज्य 'धर्म निरपेक्ष' नसते तर 'धर्म-सापेक्ष' असते. ते 'संप्रदाय-निरपेक्ष' अवश्य असते. *इंग्रजीत लिहिल्या गेलेला भारतीय संविधानाचा हिंदी अनुवाद हिंदीचे प्रसिद्ध विद्वान शेठ गोविंददास द्वारे केला गेला आणि त्यांनी हिंदी अनुवादात 'धर्म निरपेक्ष' शब्दाचा प्रयोग केला, जो चुकीचा होता. शेठ गोविंददास जेव्हा रंगूनमध्ये मला भेटले तेव्हा मी त्यांना म्हटले की चांगले राज्य 'धर्म-निरपेक्ष' कसे होईल? राज्य तर 'धर्म-सापेक्ष' असले पाहिजे. हो, 'संप्रदाय-निरपेक्ष' अवश्य आहे. त्यांनी आपली चूक स्वीकारली आणि पुढे चालून 'धर्म-निरपेक्ष' च्या जागी 'पंथ-निरपेक्ष' केले,* हिंदीच्या एका अन्य विद्वानांनीही ह्याबाबत आवाजी मागणी केली की 'धर्म निरपेक्ष' म्हणण्यात येऊ नये आणि 'पंथ-निरपेक्ष' शब्दाचे त्यांनी समर्थनही केले._

        _*साऱ्या देशात आजही 'धर्म' चा अर्थ 'संप्रदाय' च्या रूपाने घेतला जातो, जसे हिंदू-धर्म, जैन-धर्म, इस्लाम-धर्म, शिख-धर्म इत्यादी. 'धर्म' सर्वांना स्वीकार्य आहे आणि बुद्धांची शिकवणुक जोपर्यंत 'धर्म' होती, तेव्हापर्यंत सर्वांना स्वीकार्य होती. परंतु 'बौद्ध-धर्म' बनताच अन्य संप्रदायांप्रमाणेच ती संप्रदाय झाली. ही मान्यता दुर्भाग्याने साऱ्या भारतातच नाही तर शेजारी देशातही पसरली. इंग्रज लोक भारतात आले तेव्हा त्यांनी हिंदुइज्म (Hinduism), जैनिज्म (Jainism) अशा शब्दांप्रमाणेच बुद्धांच्या शिकवणुकीलाही 'बुद्धीज्म्' (Buddhism) म्हणणे सुरु केले आणि त्यांच्या अनुयायांना 'बुद्धिष्ट' (Buddhist) म्हणू लागले. ह्या प्रकारे इंग्रजांनी बुद्धांच्या शिकवणुकीला बुद्धिज्म घोषित केले आणि त्यांच्या अनुयायांना बुद्धिष्ट. राजाच्या मान्यतेचा प्रभाव प्रजेवर पडू लागला.*_

            _जेथे जेथे त्यांच्या राज्याचा विस्तार झाला, तेथे तेथे बुद्धांची शिकवणुक 'धर्म' न राहून 'बौद्ध धर्म' झाली आणि 'बुद्धिज्म्' म्हणविल्या गेली आणि ह्याला मानणारे 'धार्मिक' नसून 'बौद्ध' झाले. *बुद्धांची शिकवणुक सांप्रदायिकता-विहीन होती, सार्वजनिक होती. तिला सांप्रदायिक बनविण्यासाठी अन्य शिकवणुकीप्रमाणेच जेव्हा 'बौद्ध-धर्म' म्हटले जाऊ लागले, तेव्हा बुद्धांच्या शिकवणुकीच्या पतनाचे हे एक मोठे कारण झाले.* लोकात ह्या बाबीचा प्रचार होऊ लागला की *"स्वधर्मे निधनं श्रेयः परधर्मो भयावह"- परधर्मात जाण्यापेक्षा स्वधर्मात मरणे श्रेयस्कर आहे. गीतेचे हे बोल बुद्धांच्या नंतरचे आहेत. परंतु गीतेला बुद्धांपूर्वीची रचना सांगून ह्या पदाला जुने म्हणून प्रसिद्ध करण्यात आले.* वस्तुतः ह्याला पुरातन भारतीय संस्कृतीतून घेतले गेले नाही, तर बुर्द्धाच्या शिकवणुकीला बिघडवून ग्रहण केले गेले._

        _ज्याला 'धर्म' म्हणतात त्याला सर्व जाती, वर्ण, गोत्र, संप्रदाय अथवा देश-विदेशाचे लोक एकसमानच स्वीकार करतात कारण धर्म सर्वांचा असतो. "सदाचरणच धर्म आहे. दुराचरणच पाप ह्या बोलात कोणाचेही काहीही मतभेद होत नाहीत. परंतु जेव्हा बुद्धांच्या शिकवणुकीला 'बौद्ध-धर्म' म्हणणे सुरू केले तेव्हा त्यालाही संप्रदायासोबत जोडून लोक हे समजू लागले की हा तर परधर्म आहे, त्यांनी ह्यापासून दूर राहिले पाहिजे. भारतात बुद्धांच्या शिकवणुकीच्या पतनाचे हे एक मोठे कारण झाले._

      _मी शेजारीला देश बर्मा (म्यंमा) मध्ये पाहिले की सर्वसाधारण जनता आपल्या भाषेत बुद्धांच्या धर्माला 'ट्या' म्हणते, ज्याचा अर्थच 'धर्म' आहे. "ट्यो ना था मैं" म्हणजे धर्माचे प्रवचन ऐकू, 'ट्या ठाई मैं" म्हणजे धर्माच्या साधनेत बसु, परंतु सोबतच 'बुद्धीज्म' आणि 'बुद्धीष्ट' शब्दही बहु-प्रचलित झाले, कारण "जसा राजा. तशी प्रजा." *जशी बुद्धांची शिकवणुक सार्वजनिक न राहून सांप्रदायिक झाली तसेच स्वभावतः लोक ह्यापासून दूर पळू लागले.*_

       _ह्याचप्रकारे "सर्व धर्मान्परित्यज्य मामेकं शरणं व्रज" - येथेही सर्व धर्मांचा अर्थ सर्व सांप्रदायिक धर्माशी आहे, ज्यात बुद्धांची शिकवणुकही सामील करण्यात आली. हा ही फसवेगिरीचाच प्रयोग होता, जो बुद्धांच्या शत्रुंनी पसरविणे सुरु केले आणि बुद्धांच्या शिकवणुकीचा ऱ्हास होत गेला.

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_लेखक :- कल्याणमित्र सत्यनारायण गोयन्का_*

_बुद्धवर्ष २५५६, चैत्र पौर्णिमा, २५ एप्रिल २०१३, वर्ष २, अंक २_

*_संकलन :- महेश कांबळे_*

*_दिनांक :-_* २०/०५/२०२५

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

No comments:

Post a Comment

कोलित सुत्त

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_कोलित सुत्त_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_41.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼  _'कोलित सुत...