Friday, 16 May 2025

शून्यागार आणि पगोड्याचे महत्व

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

*_शून्यागार आणि पगोड्याचे महत्व_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2025/05/blog-post_16.html

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

धम्मचली, जयपुर येथील पगोड्याच्या शिलान्यासाप्रसंगी पूज्य गुरुजींचे प्रवचन (मार्च 14, 1982)

जिथे शुद्ध धर्म जागतो, तिथली धरती अजूनच तपू लागते. धर्माच्या शुद्ध तरंगांमुळेच धरती आणि सारे वातावरण तपत असते. ही तपोभूमी न जाणे कित्येक युगांमध्ये, सहस्त्रावधी वर्षांपासून धर्माच्या तपाने तपलेली आहे, म्हणूनच तर इथे शुद्ध धर्म जागण्याचा आणि अनेक लोकांच्या कल्याणाचा सुअवसर प्राप्त झाला. ज्या धरतीवर तपस्वी तपतात, धर्म-तपाव्यतिरिक्त आणखी कोणती प्रवृत्ती नसते तिथल्या धर्मतरंगांचे तर काय सांगावे ! चित्त कसे आसक्ती, द्वेष आणि मोहातून विमुक्त होईल, याचे केवळ चिंतन-मननच नाही, तर त्याचा सक्रिय अभ्यास होत असतो. कसा चित्ताचा अंतर्मनाच्या तळापर्यंत जाऊन संवर करावा, नवीन आसक्ती, द्वेष आणि मोह उत्पन्नच होऊ देऊ नयेत. आणि जे संगृहीत आहेत, ते कसे हळू-हळू दूर होत जातील, हळू-हळू त्यांची निर्जरा होत जाईल. चित्ताची अशुद्धता दूर होत जाईल, तिचा क्षय होत जाईल.

ज्या धरतीवर धर्माचा शुद्ध अभ्यास निरंतर होत असतो ती धरती खूप तपू लागते. सारे वातावरण धर्माच्या तरंगांनी आप्लावित होऊन जाते, तरंगित होऊन जाते. अधिक लोक कल्याण होते. अशा तपोभूमीमध्ये येऊन एखाद्या व्यक्तीने थोडेसे जरी प्रयत्न केले तरी अधिक प्रमाणात सफलता प्राप्त होते. या धरतीवर तर आत्ताही लोक तपत आहेत. भविष्यात जेव्हा इथे शून्यागार बनतील आणि त्यात लोक तपतील तर आणखीनच अधिक कल्याण होईल. साधनेच्या पथावर पुढे जाण्यासाठी आपली मेहनत, आपले परिश्रम, आपला पुरुषार्थ तर आवश्यक आहेच. यांच्याशिवाय कोणतीही उपलब्धी प्राप्त होत नाही. दुसरे म्हणजे साधनेचा विधी निर्मळ असेल, स्वच्छ असेल तर अधिक लाभ होतो. साधनेचा विधी निर्मळ नसेल तर पुष्कळ मेहनत करूनही जो लाभ मिळायला पाहिजे तो मिळत नाही. उचित मार्गदर्शक असेल तर साधक चुकीच्या पद्धतीने काम करत नाही तर जसे करायला पाहिजे, तसे काम करतो. आणखी एक गोष्ट आणि जी खूप आवश्यक आहे ती ही की उचित वातावरण असावे, उचित स्थान असावे. प्रत्येक ठिकाणी ध्यान करण्याने तितका लाभ प्राप्त होत नाही जितका एखाद्या तपलेल्या भूमीवर ध्यान केल्याने होतो. आत्ताच मागच्या काही दिवसांमध्ये साधकांचे एक मंडळ भारताच्या अशा स्थानांवर जाऊन आले जिथे संत तपले होते, अरहंत तपले होते. तर इतक्या दीर्घ कालावधीनंतरही साधक अनुभवतात की किती प्रेरणादायक तरंग आजदेखील तिथे कायम आहेत. तेव्हा भूमीचे आपल्या स्वतःचे खूप मोठे महत्व असते. खरोखरच ही 'भूमी अत्यंत मंगलमयी आहे, म्हणूनच तर शुद्ध धर्माचा अभ्यास इथे सुरु झाला आणि आता यापुढे अधिक लोक इथे तप करतील. 

*_शून्यागाराचे आपले महत्व_*

भगवानांनी म्हटले आहे- "जेव्हा कोणी व्यक्ती एकटा तपतो तेव्हा जसे ब्रह्मा तपतो. जिथे दोघे जण मिळून तपतात तेव्हा जसे कोणी देवता तपतात. तिघेजण एकत्र बसून तपतात तेव्हा जसे कोणी तपस्वी मनुष्य तपतात. यापेक्षा अधिक लोक एकत्र बसून तपतात तेव्हा कोलाहल होतो." तितक्या सखोलतेने तप होत नाही, याकरीता शून्यागाराचे महत्व सर्वोपरी आहे. शून्यागार म्हणजे असे स्थान, अशी खोली, अशी कुटी ज्याच्यात आपल्या शिवाय आणखी कोणी नाही, शून्यच शून्य. एकटा व्यक्ती एकांतात ध्यान करू शकेल, हे खूप आवश्यक असते आणि त्याचा मोठा लाभ होतो. ब्रह्मदेशात जे ध्यानाचे केंद्र आहे, तिथल्या शून्यागारांमध्ये जे तपस्वी तपतात, त्यामुळे तिथले तरंग कशा प्रकारे धर्माने ओतप्रोत भरलेले आहेत हे कोणी साधकच समजू शकतो. तिथे बसून ध्यान केले तर किती फरक पडेल. ठीक अशाच प्रकारे इगतपुरीमध्ये शून्यागार बनले आहेत, लोक त्यात ध्यान करतात तेव्हा किती मोठा फरक जाणवतो. शून्यागाराचे खूप मोठे महत्व आहे.

*_सुञ्ञगारं पविट्ठस्स, सन्तचित्तस्स भिक्खुनो।_*

*_अमानुसी रती होति, सम्मा धम्मं विपस्सतो ॥_*

*_(धम्मपदपाळि- 373, भिक्खुवग्गो)_*

'सम्मा धम्मं विपस्सतों' सम्यक प्रकाराने धर्माची विपश्यना करतो. कुठे करतो 'सुञ्ञगारं पविट्ठस्स' एखाद्या शून्यागारात प्रवेश करून शुद्ध धर्माची विपश्यना करत असेल तर साधक शांत चित्त होतो. आणि 'अमानुसी रती होति' आतमध्ये असा आनंद, असा रस प्राप्त होतो जो आपल्यासारख्या मनुष्यांना सामान्यपणे आपल्या इंद्रिय सुखांच्या अनुभूतीद्वारे प्राप्त होत नाही. त्याचा कशाशी मुकाबला होऊ शकत नाही, कशाशी तुलना होऊ शकत नाही. त्याच्या खूप पलीकडची दिव्य अनुभूती होते, ब्राह्मी अनुभूती होते. आणि त्याच्याही पलीकडील निर्वाणिक अनुभूती होते कारण एकांतात साधना करीत आहे. कुठे कोणता व्यत्यय नाही, कोणत्या बाधा नाहीत.

     या तपोभूमीवर देखील असे शून्यागार निर्माण होतील जिथे साधक आपल्या साधनेद्वारे धर्माच्या तळस्पर्शी गहनतेपर्यंत जाऊ शकतील. मोठ्या कल्याणाची गोष्ट होईल. कल्याण तर जे-जे तपतील, त्या सर्वांचे होणारच आहे, पण एखाद्या जरी व्यक्तीचे कल्याण झाले तर निर्माण करण्याकरीता जे श्रम, जो त्याग, ज्या कोणी केला असेल, ते सार्थक होईल. यापेक्षा अधिक मूल्य आणखी कोणते होऊच शकत नाही.

*_श्रेष्ठ दानाचे विश्लेषण_*

        एकदा भगवानांनी आपल्या एका पूर्व-जन्मातील गोष्ट सांगताना म्हटले तेव्हा ते बोधिसत्व होते, बुद्ध बनले नव्हते. अनेक जन्मांपर्यंत बोधिसत्वाचे जीवन जगत-जगत, आपल्या दहा पारमितांना पूर्ण करत-करतच कोणी बुद्ध बनतो, सम्यक संबुद्ध बनतो. दानाचीही एक खूप मोठी पारमी असते. त्यांनी सांगितले की कोणत्या एका जीवनात ते खूप मोठ्या देशाचे राजा होते. चित्तामध्ये दानाची चेतना जागली तेव्हा जितका राज्यकोष होता, जितके काही त्यांच्याजवळ होते, ते दान करणे सुरू केले. हजारो, लाखो लोकांना दान दिले. सात वर्षांपर्यंत सतत दानाचा कार्यक्रम चालतच राहिला. अन्नाचे दान, वस्त्रांचे दान, औषधांचे, वाहनांचे आणि निवासस्थानांचे दान दिले. लोकांच्या ज्या-ज्या सांसारिक गरजा होत्या त्या सर्व गोष्टींची पूर्तता केली गेली. कोणा व्यक्तीला कोणत्या सांसारिक गोष्टींची कमतरता पडू दिली नाही. अशी सात वर्षे खूप दान दिले. इतके पुण्यशाली तसेच पारमी वाढविणारे दान देखील जर कोणा एका स्रोतापन्न व्यक्तीला एक वेळेचे भोजन दिले, तर ते एका वेळेचे भोजन-दान त्यापेक्षा कितीतरी अधिक पुण्यशाली होते. म्हणजे, पात्र कसे आहे? कुठे बीज रोपले गेले आपल्या पुण्य-कर्माचे? जमिन सुपीक असेल तर फळ अधिक चांगले येईल.

तो स्रोतापन्न व्यक्ती जो साधना करत-करत, शील, समाधी, प्रज्ञेमध्ये पुष्ट होत होत अनार्यापासून आर्य बनला, ज्याने पहिल्यांदा निर्वाणाचा साक्षात्कार केला, मुक्तीच्या चार पायऱ्यांपैकी पहिल्या पायरीपर्यंत पोहोचला. धर्मपथाचा पहिला सोपान प्राप्त केला. असा स्रोतापन्न झालेला व्यक्ती मुक्तीच्या स्रोतात पड़ला. प्रत्येक दानाचा लाभ होतच असतो, पण कोणाला दान द्यावे? तेव्हा सांगितले की त्या वेळी धरतीवर कोणी स्रोतापन्न नव्हतेच, कारण विपश्यना नव्हती. कारण लोकांजवळ निर्वाणाचा साक्षात्कार करण्यासाठी कोणते तेलच नव्हते. अशा परिस्थितीत जे होते त्यांनाच दान दिले गेले. पण त्याच्या तुलनेत एका स्रोतापन्न व्यक्तीला केवळ एका वेळेचे भोजन दिले गेले तर ते त्याहूनही अधिक लाभदायक होते.

          असे का होते, हे समजून घेऊ ! कोणत्याही प्राण्याला भोजन दिले तर त्याला आपण एक दिवसाचे जीवन आणखी देत आहोत. त्या भोजनाच्या बळावर त्याची जीवन-धारा अजून थोडी पुढे जाईल. पण कोणाला देत आहोत? एखादा कोणता हिंसक पशू आहे- समजा एखादा सिंह आहे, चित्ता आहे, आणि दुसरीकडे एक गाय आहे. एक दिवसाचे भोजन आपण दोघांना दिले. पण गायीला दिलेले भोजन अधिक पुण्यशाली का? सिंह किंवा चित्त्याला एक दिवस अधिक जगवून तो इतर प्राण्यांना कष्टच देईल. गाय एक दिवस अधिक जगली तर इतर प्राण्यांना लाभच देईल. म्हणून या दोन्हींच्या तुलनेने गायीला दिलेले एक दिवसाचे भोजन अधिक फलदायी आहे, अधिक कल्याणकारी आहे. असेच गायीच्या तुलनेने एका सामान्य मनुष्याला दिलेले भोजन अधिक कल्याणकारी होईल, कारण मनुष्य आहे. पशूच्या तुलनेत मनुष्याजवळ अशी शक्ती आहे की तो अंतर्मुखी, आत्ममुखी, सत्यमुखी होऊन आपल्या गाठी उलगडणे शिकला तर मुक्त होऊ शकतो. हे काम पशू करू शकत नाहीत. ती गाय जीवनभर जगूनही आपल्या स्वतःला मुक्त करू शकत नाही. तिला निसर्गाने ती शक्ती दिलेली नाही. या मनुष्याला जर आपण एक दिवस अजून जगवले तर कोण जाणे त्या एका दिवसात त्याचा शुद्ध धर्माशी संपर्क होऊन जाईल. त्याला असा विधी मिळून जाईल ज्यामुळे तो आत्ममुखी होऊन आपल्या गाठी उलगडून टाकेल. या दोघांच्या तुलनेत त्या व्यक्तीला दिलेले भोजन अधिक कल्याणकारी आहे.

एक सामान्य व्यक्ती ज्याला धर्माचा मार्ग मिळाला नाही, सारे जीवन दुराचाराचेच जीवन जगतो, त्याच्या तुलनेने एक व्यक्ती जो सदाचाराचे जीवन जगत आहे, धर्माच्या मार्गाला लागलेला आहे. या दोघांमधून जर भोजनाचे दान त्या सदाचारीला दिले तर त्याला दिलेले भोजनाचे दान अधिक कल्याणकारी आहे ते यासाठी की त्याचे एक दिवसही अधिक जगणे त्याला सन्मार्गाकडे घेऊन जाण्यात सहायता करेल. आणि खरोखरच तो धर्माच्या मार्गावर पुढे जात जात मुक्त अवस्थेपर्यंत पोहोचू शकेल. खूप मोठा लाभ मिळेल त्याचा, कारण तो सन्मार्गावर म्हणजे, धर्माच्या मार्गावर चालणारा व्यक्ती आहे. परंतु अजूनपर्यंत ज्याला निर्वाणाचा साक्षात्कार झालेला नाही, त्याच्या तुलनेत ज्याला निर्वाणाचा साक्षात्कार झाला आहे, त्याला एका दिवसाचे भोजन दिले तर ते अधिक पुण्यशाली आहे. कारण तो व्यक्ती एक दिवस अधिक जगून केवळ आपलेच कल्याण करत नाही, तर आता जे तरंग निर्माण करत आहे, प्रत्येक क्षणी, प्रत्येक श्वासाबरोबर त्याच्यात जे तरंग निर्माण होत आहेत, ते आसपासच्या साऱ्या वातावरणाला धर्माच्या तरंगांनी भरून टाकतील. न जाणे कित्येक लोकांच्या कल्याणाचे कारण बनून जातील. म्हणूनच म्हटले की इतक्या लोकांना जे मी दान दिले त्याच्या तुलनेने एका स्रोतापन्न व्यक्तीला, केवळ एका वेळेच्या भोजनाचे दान दिले तर ते कित्येक पटींनी अधिक कल्याणकारी होईल, अधिक पुण्यशाली होईल.

        त्याचप्रमाणे अनेक स्रोतापन्न व्यक्तींना दिलेल्या भोजनाच्या मुकाबल्यात केवळ एका सकदागामी व्यक्तीला दिलेले भोजन कितीतरी अधिक कल्याणकारी होईल, कितीतरी अधिक बलशाली होईल. अनेक सकदागामिंना दिलेल्या भोजनाच्या मुकाबल्यात केवळ एका अनागामीला दिलेले भोजन कितीतरी अधिक कल्याणकारी होईल. अनेक अनागामिंना दिलेल्या भोजनाच्या मुकाबल्यात केवळ एका अरहंताला दिलेले भोजन कितीतरी अधिक कल्याणकारी होईल. अनेक अरहंतांना दिलेल्या भोजनाच्या मुकाबल्यात सम्यक संबुद्धांना दिलेले भोजन कित्येक पटींनी अधिक, खूप अधिक कल्याणकारी होईल. कोणा सम्यक संबुद्धांना भोजन दिले आणि त्याच्या मुकाबल्यात तप करणाऱ्या संघाला भोजन दान दिले, तर सम्यक संबुद्धांना दिलेल्या भोजनापेक्षाही ते अधिक कल्याणकारी झाले. आणि पुन्हा म्हटले, कितीही मोठ्या तप करणाऱ्या संघाला भोजन-दान देऊन, कितीही मोठे पुण्य अर्जित केले तरीही, त्याच्या मुकाबल्यात साधना करणाऱ्यांसाठी जर कोणी सुविधा बनवून दिल्या, कोणी शून्यागार बनवून दिले, ज्याच्यात बसून कोणी व्यक्ती तप करून आपल्या मुक्तीचा मार्ग शोधू शकतो तेव्हा त्या साऱ्या पुण्यांपेक्षाही हे महान सर्वोच्च पुण्य अधिक कल्याणकारी आहे.

इथे केंद्र बनवण्याचे आत्तापर्यंत जे काम झाले ते निरर्थक झाले असे मला निश्चितच म्हणायचे नाही, पण शून्यागार बनतील, प्रत्येक व्यक्तीसाठी निवास-स्थानही स्वतंत्र असतील, निवास-स्थाने स्वतंत्र नसली तरी ध्यानाचे जे स्थान आहे ते तर स्वतंत्र असायलाच पाहिजे, जेणेकरून दुसऱ्या कुणा व्यक्तीचे तरंग, किंवा इतर कोणती बाधा त्याच्या मार्गात अडचण उपस्थित करणार नाही. अशी परिस्थिती प्राप्त झाली तर साधकाची प्रगती कित्येक पटींनी अधिक होते. खूप चांगली गोष्ट झाली की इथे शून्यागार बनविण्याचे काम सुरु झाले. अशा प्रकारे या धरतीचा सन्मान होत आहे.

*_भूमीचा सन्मान_*

आपल्या इथे एक परंपरा आहे- भूमी-पूजनाची. शुद्ध धर्माच्या मार्गात भूमी-पूजन काय असते? भूमीचा सन्मान अशा प्रकारे केला जातो की त्या भूमीवर बसून लोक तप करतील आणि तप करून जे शुद्ध तरंग निर्माण करतील यापेक्षा श्रेष्ठ कोणत्याही प्रकारे धरती सन्मानित होऊ शकत नाही, पूजित होऊ शकत नाही. म्हणूनच आज इथे बसून जी साधना केली, इथे तपलो, म्हणजेच तप करून भूमीचा खरा सन्मान केला. जास्तीत जास्त धर्माचे तरंग या भूमीवर स्थापित होवोत, या वातावरणात स्थापित होवोत की ज्यामुळे अधिकहून अधिक लोकांचे कल्याण होईल. हेच भूमी-पूजन आहे, हाच भूमीचा सन्मान आहे. जे कोणी साधक आत्तापर्यंत इथे आत्तापर्यंत इथे तपत राहिले आहेत, ते आपली मलिनता उतरवत आहेत. ज्याची थोडी जरी मलिनता दूर झाली तरी त्याच्या मनात मंगल मैत्री जागतेच की जसे माझे कल्याण झाले, जशी मला सुख-शांती मिळाली, भले थोड़ीफारच मिळाली; अशी सुख-शांती अधिकडून अधिक लोकांना मिळावी. अधिकडून अधिक लोकांची कर्म-बंधने तुटावीत. अधिकहून अधिक लोकांना मुक्तीचा मार्ग मिळावा. असे मंगल भाव मनात जागतातच. अरे, मुक्तीच्या मार्गावर मी कसा सहायक होऊ शकेन ? व्यक्ती अनेक प्रकारांनी सहायक होऊ शकतो. ज्याच्याकडे जी शक्ती आहे त्या शक्तीच्या बळावर तो सहायक होऊ शकतो. शरीराने सेवा देऊन किंवा वाणीद्वारे सहायक होऊ शकतो. कोणाजवळ धन असेल तर धनाद्वारे सहायक होऊ शकतो. पण या सर्वांहून श्रेष्ठ एक खूप मोठी सहायता - स्वतः 'तप करून' सहायक होता येते.

जुना साधक या धरतीवर जितका तपेल, तितकाच अनेक लोकांच्या कल्याणाचा कारण बनेल. गुरुदेवांच्या जीवन-काळात आपण पाहत होतो की अनेक लोक निर्वाणाच्या अवस्थेपर्यंत पोहोचलेले होते आणि जेव्हा कोणी त्या अवस्थेवर पोहोचतो तेव्हा हवे तेव्हा, हव्या तितक्या वेळासाठी, निर्वाणिक अवस्थेची अनुभूती करू शकतो. त्यांना गुरुजी म्हणत असत की तुम्ही लोक ऋणातून कसे मुक्त होऊ शकता? इतर लोक आपल्याकडून शारीरिक श्रमांचे दान देऊन, धनाचे दान देऊन, किंवा अन्य प्रकारे सहायता करून, आप-आपल्या ऋणांमधून मुक्त होण्याचा प्रयत्न करतील. पण तुमच्यासारख्या इतक्या श्रेष्ठ तापसांकरीता सर्वश्रेष्ठ योगदान हेच आहे की कमीत कमी आठवड्यातून एकदा इथे येत राहा, एखाद्या शून्यागारात बसून, एक तास निर्वाणिक समाधीचा अभ्यास करून मग जा. बस्स! काम झाले. किती मोठी सेवा झाली. साराच्या सारा आश्रम त्या धर्माच्या तरंगांनी व्याप्त होऊन जाईल. जो साधक ज्या कोणत्या अवस्थेला पोहोचला असेल, जितका तपला असेल, तितके तरंग तर निर्माण करेलच.

      शून्यागार बनवून अनेक लोकांना त्यात तप करण्याची सुविधा देत आहेत, ही तर आपल्या स्वतःमध्येच खूप मोठ्या पुण्याची गोष्ट आहे, पण याहून कितीतरी अधिक मोठ्या पुण्याची गोष्ट ही होईल की प्रत्येक साधकाने आठवड्यातून एकदा इथे येऊन तप करावेच. हे आपल्या तपाचे दान आहे. आपल्या तपाच्या तरंगांचे दान आहे, जे या धरतीला खूप पक्व करेल. हे स्थान इतके अधिक तपेल की इथे जो कोणी व्यक्ती येईल, थोड्या श्रमातूनच अधिक प्राप्ती करेल. आपल्या विकारांशी युद्ध करण्यासाठी मेहनत तर प्रत्येक व्यक्तीला स्वतःच करावी लागेल, परंतु जर आसपासचे वातावरण धर्माच्या तरंगांनी तरंगित असेल तर मेहनत करणे सोपे होईल. बाहेरचे तरंग दुषित असतील तर त्यांची बाधा येईल. आपल्या आतील विकारांच्या तरंगांशी तर तो लढतच आहे, बाहेरील तरंगही जर पाय ओढणारे असतील तर काम करू देणार नाहीत.  त्यांच्यापासून तर वाचता येईल. खूप मोठे बळ मिळते, खूप मोठी सहायता मिळते. साधकांनी आपल्या आतमध्ये मंगल मैत्री जागवली पाहिजे. इथे येऊन तपतील तर आपले कल्याण करतीलच, त्या तपण्याने सहस्त्रावधी वर्षांपर्यंत न जाणे आणखी कित्येकांचे कल्याण होईल. जिथे धर्माचे तरंग जागू लागतील, तिथे लोक आपोआप खेचल्यासारखे निघून येतील.

धर्म आपल्या शुद्ध रूपात जितक्या युगांपर्यंत राहील, तोपर्यंत या ठिकाणी न जाणे कितीतरी, अगणित संख्येने लोक येतील, तपतील आणि आप-आपले कल्याण साधतील, वर्तमानात जे तपत आहेत, 'भविष्यातही जे कोणी येऊन तपतील, त्या सर्वांचे मंगल होवो ! कल्याण होवो ! त्या सर्वांची स्वस्ति मुक्ती होवो !!

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

*_लेखक :- कल्याणमित्र सत्यनारायण गोयन्का_*

_बुद्धवर्ष २५६६, चैत्र पौर्णिमा, ६ ऑगस्ट, २०२३, वर्ष ७, अंक १_

*_संकलन :- महेश कांबळे_*

*_दिनांक :-_* १७/०५/२०२५

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

No comments:

Post a Comment

कोलित सुत्त

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_कोलित सुत्त_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_41.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼  _'कोलित सुत...