इथं वो ञातनं सुखिता होतु
या बऱ्याचदा आपण ही गाथा पुण्यानुमोदन करत असताना एखादं कुशल कर्म केल्यानंतर पुण्य वितरण करत असताना ही अशी एक गाथा आपण म्हणत असतो. आपला पूर्वजांसाठी किंवा जे लोक आता आपल्या सोबत नाहीये, आपल्याला सोडून गेलेले आहे, परलोक तस्थ झालेले आहेत अशा लोकांसाठी. पण ही प्रथा सुरू कुठून होते, याचा उद्गम कुठे होतो आणि भगवान बुद्धांनी कशा प्रकारे सांगितलेला आहे की, जे लोक आता हयात नाही, आपल्याला सोडून गेलेले आहेत, वारले आहेत, परलोक तस्थ झालेले आहेत त्यांना आपण पुण्यानुमोदन कसं करू शकतो. आणि खरंच त्यांच्यापर्यंत पुण्य पोहोचतं का? त्यांना पुण्यात त्यांना पुण्याची गरज आहे का? हे आपण आज या पाहुया.
आपल्या भारतीय परंपरेमध्ये आपण बरेच वर्षांपासून हजारो वर्षांपासून खूप साऱ्या प्रकारचे आणि खूप विविध प्रकारे आपण आपल्या पूर्वजांना भोजन दान वगैरे इतर गोष्टी करत आलेलो आहोत. आणि याचा एक दिवस सुद्धा ठरलेला आहे. भारतीय परंपरेनुसार किंवा एक सनातनी परंपरेनुसार तो दिवस येतो आणि त्या दिवसाला सगळेच लोक पितृपक्ष वगैरे काहीतरी करत असतात, घास टाकत असतात वगैरे. पण याची खरी पद्धत काय आहे? आणि बुद्धांनी नेमकं काय सांगितलंय? कशाप्रकारे आपण आपल्या पूर्वजांना दान देऊ शकतो? आणि त्यांची सुटका करून घेऊ शकतो? पण सुटका कशातून करून घेतली पाहिजे? त्यांना या पुण्य भेटतं का? त्यांना हे भोजन पाणी आपण देतो त्यांना मिळतं का? का फक्त हा एका प्रकारचा कर्मकांड झालाय? एका कर्मकांडातून आपण निघालो आणि दुसऱ्या कर्मकांडामध्ये आलो असा काहीतरी आहे का?
या प्रश्नांची उत्तर आपण बघूया आणि नंतर एक छोटासा विषय असा की हे भूत पिशाच वगैरे आहेत? त्यांचा खरंच कोणाला त्रास होतो का? तर का होतो? काही त्रास झालास तर का होतो? हे सुद्धा आपल्याला या सूत्तामध्ये आज शिकायला मिळेल.
या सूत्ताचे नाव आहे तिरोकुट, सूत्तक पाठामध्ये आपल्याला हे सूत्त सापडतं आणि बऱ्याचदा आपल्याला अशा खूप साऱ्या गाथा परित्राण पाठामध्ये सुद्धा ऐकायला मिळतात. फार महत्त्वाचं सूत्त आहे. यातून खूप साऱ्या आपले भ्रम, शंका आणि कर्मकांड आहे की नाही? जे आपण करत आहोत ते समजायला मदत होईल.
आता जसं आपण या फोटोमध्ये बघू शकतो की तिरोकुटसुद्ध याच्या बॅकग्राऊंड मध्ये तुम्ही एक घर बघत आहात आणि या घराच्या समोर एक कंपाउंड आहे. आणि कंपाउंडच्या भोवती काहीतरी अमनुष्य लोक आहेत, प्रेत आहेत आपण बघू शकतो तिरोकुट- तिरोकुट घराचे कंपाउंड घराच्या कंपाउंड वरती प्रेत लोक येऊन बसतात. कोणते प्रेत लोक? आपले पूर्वज लोक किंवा त्या घरामध्ये राहणारे प्रेत लोक असा याचा अर्थ सुद्धा होऊ शकतो. काही लोकांना पटणार नाही पण ३१ प्लेन्स ऑफ एक्झिस्टन्स म्हणजे हे जे लोक आहे ३१ प्रकारचे लोक आहेत याला साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये आपण असं समजूया की ३१ माळ्याची बिल्डिंग आहे. आपण मनुष्य लोक पाचव्या माळ्यावर राहतोय. आपली ऐपत किंवा आपलं पुण्य एवढंच होतं की आपण पाचव्या माळ्यापर्यंत आलेलो आहोत. तुम्ही आणि मी जितके मनुष्य लोक आपण बघत आहोत हे पाचव्या माळ्यापर्यंत आहेत. मग बुद्ध कुठे होते? बुद्धांचा पाचव्या माळ्यामध्ये जन्म झाला. पण जेव्हा ते सम्यक संबुद्ध झाले, बुद्ध झाले तेव्हा ते लोकोत्तर झाले.
इतिपी सो भगवा विद्या चरण संपन्न सुगतो लोकविधु - लोकविधु या लोकांना जाणणारे ते लोकोत्तर झाले. त्यांचे चित्त आता लोकोत्तर झालेला आहे. त्यांना सोत्तापन्नाची डुबकी लागते जे सोत्तापन्न होतात. मग्ग फलावरती असतात तिथपासून ते अरहंतांपर्यंत, ते सगळे आता लोकोत्तर आहेत. या लोकांपासून ह्या ३१ माळ्याची ही बिल्डिंग आहे. समजा हे ३१ लोक आहेत, या लोकांपासून त्या दूर झालेल्या आहेत, परत त्यांचा इथे कुठेच जन्म होणार नाहीये. असे ते लोकोत्तर आहे सोत्तापन्न पासून किंवा अरहंतानंतर, अरहंत बुद्ध परत कधी इथे येणार नाहीये. आपलं पुण्य एवढंच होतं की आपण पाचव्या माळ्यापर्यंत आलो. पाप अजून जास्त असलं असतं तर आपण पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या माळ्यापर्यंत आलो असतो. अजून थोडं पुण्य असलं असतं तर आपण अजून सहाव्या सातव्या आठव्या माळ्यापर्यंत तर ३१ व्या माळ्यापर्यंत पोहोचू शकलो असतो. मी याला माळा शब्द का वापरतोय की साधं सरळ भाषेत मध्ये समजायला. ३१ माळ्याची बिल्डिंग आहे. तुमचं माझं जेवढं पुण्य होतं त्याच्या प्रतापाने आपण पाचव्या माळ्यावर म्हणजे या पाचव्या लोकांमध्ये मनुष्य लोकांमध्ये आलेलो आहोत. पण काहीतरी असे खूप सारे सत्व आहेत की जे अपायभूमीमध्ये पण असतात. आता अपायभूमी किती तर चार आहे आपण खालनं सुरू करूया,
१) पहिला माळा आहे नीरय त्याला तुम्ही नरक सुद्धा म्हणू शकतात. नरक.... नरकाचे खूप प्रकार आहेत, विविध प्रकार आहेत आणि नरकामध्ये गेलेला व्यक्ती हजारो करोडो वर्ष त्या ठिकाणी असतो, असं खूप ठिकाणी वर्णन आहे.
२) ३१ माळाच्या बिल्डिंग मध्ये ३१ प्रकारच्या लोकांमध्ये दुसरा आहे, तिरच्छान - तिरच्छान म्हणजे काय .... जितके पण कीटक प्राणी आपण या पृथ्वीवरती बघत आहोत. ते सगळे तिरच्छान मध्ये आहेत. कुत्रा, मांजर वगैरे वगैरे वेगळे जितके पण प्राणी आहेत ते सगळे तिरच्छांमध्ये येतात.
३) तिसरं तिसरा आहे पेतलोक - पेतलोक ज्याला तुम्ही भूत वगैरे या शब्दांमध्ये आपण त्यांचं वर्णन करतो, असं पेतलोक
४) आणि चौथं आहे असुर - असुरांमध्ये मग काही वेगवेगळ्या प्रकारचे असुर असतील, यक्ष असतील, ते त्या ठिकाणी येतात असं हे चार आणि असुरांच्या वरती आपण पाचव्या वरती मनुष्य लोक.
मनुष्यांचा जन्म परत परत मिळत नाही. या जन्मानंतर लगेच मनुष्य जन्म असेल याची पण गॅरंटी नाहीये.
तिरोकुट सूत्त - आता या सुताची आपली एक बॅकग्राऊंड स्टोरी आहे. बॅकग्राउंड स्टोरी काय भगवान बुद्ध जातात राजगृहाला. बिंबिसार राजा भगवान बुद्धांची वंदना करतो, पूजा करतो आणि बिंबिसार राजा त्यांना एक वेळुवन दान देतो. वेळुवन बुद्धांना दान देतो साधुकार होतो. खूप चांगला प्रसंग असतो. राजा खूप चांगल्या प्रकारे पुण्याने पुण्य कमवतो आणि त्या रात्री राजा त्याच्या महलामध्ये गेल्यानंतर झोपतो. रात्री अचानक राजा झोपू शकत नव्हता. त्याला जाग येते! का जाग येते? अतिशय भयंकर असे डरावणे, घातक आवाज त्याला येऊ लागतात. खूपच भयंकर, खूपच घाबरण्यासारखे असे आवाज, जसे की कोणी असुर कोणी प्रेत कोणी लोक रडतायेत. कुठे त्याच्या महलाच्या कंपाउंड जवळ. कंपाउंड पर्यंत कोणतरी आलेले आहेत, रडतायत - ओरडतायत, खूप जोरजोरामध्ये आवाज करतायत, आक्रोश करतायत, आकंत करतायत आणि याला काही झोप येत नाहीये. खूप असा भयंकर तो प्रसंग त्याने अनुभवला. सकाळी उठून बुद्धांकडे जातो.... की भगवंत असं का झालं? मी रात्री झोपू शकत नव्हतो मला असे आवाज ऐकायला आलेत. बुद्धांकडे येतो बुद्ध सांगतात आणि प्रसंग आता सुरू करतात की हा नेमकं काय झालं तर. भगवान बुद्ध सांगतात की बिंबिसार हे तुझे पूर्वज लोक आहेत आणि तुझे पूर्वज लोकांना तुझा राग आलाय. राग आलाय म्हणजे मी थोडक्यात सांगतो की राग आलाय म्हणजे काय तू काल इतक्या चांगल्या प्रकारे कुशल कम्म केलं, तू बुद्धांना भिक्षु संघाला वेळुवन दान दिलं आणि हे वेळुवन दिल्यानंतर जे काही तू पुण्य कमावलं आहे तू कोणाला समर्पित केलं नाहीये.....त्याचं अनुमोदन केलेलं नाहीये, तुझ्या पूर्वजांपर्यंत तू हे पोहोचवलेलं नाहीये म्हणून ते रात्री तुझ्या दाराकडे येऊन तुझ्या महलाकडे येऊन ते आक्रोश करत होते, आकांत करत होते असं बुद्ध सांगतात. मग याचं काय कारण आहे? माझे पूर्वज हे त्या पेतलोकांमध्ये का गेलेत? असा एक प्रसंग आता राजा बिंबिसार बुद्धांना विचारतो आणि मग बुद्ध याच्यावरती त्यांच्या मागच्या जन्मांच्या स्टोरी सांगतात.
आता फुस्स बुद्धांच्या वेळेस गोष्ट आहे. २८ बुद्ध परित आहे. तंण करो महावीरो मेधको महायसो सरणं करो लोक हेतो दीपंकर ज्योतिधरो.... ही पूर्ण गाथा आहे, जी आपण पाठ करू शकतो
फुस्सबुद्धांच्या वेळेस काय होतं, एका ठिकाणी एका नगरीमध्ये फुस्स बुद्धांचं आगमन होणार होतं. आणि मग त्या गावकऱ्यांनी त्या नगरातील लोकांनी कॉन्ट्रीब्यूशन करून म्हणा एक मोठा उत्सव त्यांनी उत्सव त्यांनी आता करायचं ठरवलं. मग खूप सारे दानाच्या गोष्टी येत गेल्या भेट वस्तू येत गेल्या भिक्षू संघासाठी. आता ते इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये असतात तर मॅनेजमेंट करणारे लोक पण आहेत. ते मॅनेजमेंट कमिटीमध्ये या बिंबिसाराचे काही पूर्वज असतात, पूर्वज असतात. आता फुस्स बुद्धांचा काळ खूप अनंत म्हणजे भरपूर भरपूर हजारो लाखो करोडो वर्ष आधीन खूप कल्पां आधीचा हा काळ आहे खूपच कल्प. आता फुस्सबुद्ध येणार आहेत आणि इथे लोक मॅनेजमेंट कमिटी मध्ये आहेत, वेगळे -वेगळे. आता या लोकांच्या मनामध्ये थोडसं एक अकुशल कम्म येतं..... अदिन्नादाना, न दिलेली वस्तू घेणे, चोरी करणे. असा एखादा प्रसंग त्या ठिकाणी येतो आणि त्यांना असं वाटतं अरे इतक्या गोष्टी दानामध्ये आलेल्या आहेत, तर आपण यातलं काही ठेवू शकतो का? घेऊ शकतो का? असं त्यांना वाटलं आणि ते तसं करतात. भिक्षु संघाच्या नावाने आलेली वस्तू गोष्ट दान त्याच्यामध्ये ते त्यांचा मारतात कट मारणे, मी बोलतो कारण की बऱ्याच ठिकाणी असं कदाचित होत असेल. अदिन्ना दाना न दिलेली वस्तू... परमिशन नाहीये तुम्हाला, पण तुम्ही घेतलं, तुम्ही हात मारला, कट मारला, चोरी केली असं झालं. आता जरी त्यांनी खूप सारे कुशल कर्म केलेले असतील पण तरी पण बुद्धांचं बुद्धांची गोष्ट चोरीला घेतली आहे. अरहंत भिक्षूची गोष्ट चोरीला घेतली आहे. चोरी झाली आहे, अकुशल कम्म झाले आणि ते पण कोणाचं सम्यक संबुद्धांची गोष्ट असेल, अरहंत वस्तू असेल त्या दानातनं अरे बापरे साधा साधं सुद्धा नाही तर दानातल्या गोष्टीतनं कट मारलाय, दान ते चोरलंय बापरे अदिन्नादाना खूप मोठं भयंकर पाप झालेला आहे, आता होतं असं त्या अकुशल कर्मामुळे ते लोक तेव्हा फुस्स बुद्धांच्या वेळेसच ते जातात पेतलोकांमध्ये आणि हजारो करोडो वर्षांच्या या कालावधीमध्ये ते पेतलोकांमध्ये तरसत असतात, तडफडत असतात, त्रासामध्ये असतात आणि खूप यातना भोगत असतात.
मग आता काल येतो कसप्प बुद्धांचा. कूसो सत्यवाहो कोणा गमनोज कसपो सिरी संपन्न गौतमो गौतम बुद्धांच्या आधीचे बुद्ध कस्यप बुद्ध त्यांच्या वेळेस आता असा प्रसंग येतो की हे पेतलोक आता बुद्धांना विचारतात की भगवंत आम्ही इतक्या वर्षांपासून, आम्ही इतक्या कल्पांपासून यातना भोगत आहोत. आमच्या मुक्तीचा मार्ग काय? कोण आम्हाला यातून मुक्त करेल? तुम्ही आम्हाला सांगावं, तेव्हा कश्यप बुद्ध सांगतात सांगतात की, हो पुढच्या बुद्ध जेव्हा गौतम बुद्ध होतील तेव्हा त्यांच्या वेळेस एक राजा असेल बिंबिसार तो तुम्हाला या दुःखातून मुक्ती देऊ शकतो असं कस्यप बुद्ध सांगतात. आणि मग गौतम बुद्धांच्या काळामध्ये आता बिंबिसाराने वेळुवन दान दिलेला आहे आणि आत्ताचा हा सध्याचा प्रसंग आहे.
बुद्धांबद्दल लोकांना भरपूर आपण म्हणूया की डाउट्स क्लिअर नाहीये लोक म्हणतात की २८ प्रकारचे बुद्ध झालेत! पण धम्म फक्त गौतम बुद्धांनी सांगितला. नाही असं नाहीये २८ बुद्धांनी धम्म सांगितला किंवा लोक म्हणतात की फक्त गौतम बुद्ध सम्यक संबुद्ध होते... नाही हे सगळे जे बुद्ध झालेत ते सगळे सम्यक संबुद्ध होते. त्यांचा आपला आपला काळ होता, त्या सगळ्यांनी धम्मचक्र प्रवर्तन केलं, त्यांचा धम्म ऐकून लोकं निब्बानाला सुद्धा गेले. पण प्रत्येक असा एक काळ होता काही कल्प काही वर्ष काही हजारो वर्षांचा काळ जसं ह्या बुद्धांचा आता शासनकाल ५००० वर्षांचा आहे. मग धम्मांचा ऱ्हास होत जाईल असं म्हणतात. अशी गोष्ट आहे मग पुढे खूप वर्षानंतर खूपच काळानंतर मग मैत्रेय बुद्ध येतील. असा प्रत्येक सम्यक संबुद्धांचा काळ आहे. फक्त गौतम बुद्ध सम्यक संबुद्ध होते असं नाहीये, हे सगळे सम्यक संबुद्ध आहेत.
मग आता बुद्ध सांगतात बिंबिसाराला बॅकग्राऊंड स्टोरी मग आता राजा विचारतो की मी आता काय केलं पाहिजे? भगवंत मला सांगा माझ्या पूर्वजांची सुटका कशी केली पाहिजे? मग बुद्ध तेव्हा तिरोकुटसुत्त सांगतात किंवा मग याच्यावरती तू जे काही पुण्य कमवलेला आहे तू त्यांना त्यांना अनुमोदन कर त्यांना ते पुण्य पाठव जेणेकरून त्यांना ते पुण्य मिळेल आणि त्यातून त्यांची सुटका होईल अशा प्रकारे हे तिरोकुट सुत्त आहे.
जे आपण आता शिकणार आहोत मग यातून आपण एक बघितलं काही गोष्टी आपण बघितल्या की काय सगळ्यात
१) पहिले तर अदिन्ना दाना ..चोरी तर करूच नये.
२) दुसरी गोष्ट भिक्षू संघाचा काही दान असेल त्यात अजिबात कट मारू नये. जे दानासाठी आले ते दानासाठी आलेला आहे.
बऱ्याचदा खूप साऱ्या अशा सामाजिक कार्यक्रमांमध्ये, धार्मिक कार्यक्रमांमध्ये, विहाराच्या कार्यक्रमांमध्ये कदाचित असं होत असेल किंवा काही लोक आपला एक अधिकार समजून आम्ही करत आहोत, आम्ही मॅनेजमेंट कमिटी मध्ये आहोत, मग आपण हे घेऊ शकतो, मग आपण हे खाऊ शकतो.... काय झालं भंतेच तर आहे भंतेंना विचारलं किंवा नाही विचारलं काय झालं. आपणच मॅनेज करत आहोत....पण याचे विपाक फार विचित्र असू शकतात आणि हजारो वर्षांचा काळामध्ये तुम्ही गुरफटून जाऊ शकतात. असा विपाक आहे हे झालं पहिली गोष्ट.
एकदा-एकदाच चोरी केली आणि किती वर्षांपर्यंत पेतलोकांमध्ये जाऊ लागलं त्यांना हे बघा. आता एक दुसरं आपण बुद्ध बघितले. २८ बुद्ध झालेत, फुस्स बुद्धांचा काळ, मग कसप बुद्धांपर्यंत ते पेतलोकांमध्ये परत सम्यक संबुद्ध झाले. आपले गौतम बुद्ध ते तेव्हा परत तोपर्यंत पेत लोकांमध्ये. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट जी आता आपण ह्या सूत्तामध्ये शिकणार आहोत की आपण कशा प्रकारे आपल्या पूर्वजांना आपण पुण्यानुमोदन केलं पाहिजे.
पत्तीदान प्राप्त केलेलं दान दिलं, जे पुण्य मी कमवलेला आहे ते मी दान देतोय, सारे प्राणी सुखी हो, सर्वांचे मंगल हो, सर्वांचे कल्याण हो, सर्वांना हिताचा मार्ग मिळो, आपण असं बोलतो. पण शाब्दिक रूपाने नाही तर मनातून जे आपण पुण्य कमवलेला आहे त्याचं अनुमोदन करणं. कसं करायचं? सूत्तामध्ये सांगितले. तसं आपण बऱ्याचदा गाथा म्हणतो किंवा बऱ्याचदा आपल्या खूप खूप श्रद्धा संपन्न लोक आहे उपासक उपासिक आहे, जेव्हा ते भिक्षु संघाला घरी बोलवतात भोजन दान करतात आपण पाणी टाकतो, कशा प्रकारे? मग ते आपण पितो, लोकांना आपण ते दान देतो.
पुढे बघूया आपण हे आपण हे बघणार आहोत की कशाप्रकारे कुशल कम्म हे आपण केलं पाहिजे. त्याचबरोबर आपले जे पूर्वज आहेत जे आपल्याला सोडून गेलेले आहेत. त्यांना आपण कशाप्रकारे दान पाठवू शकतो, भोजन दान पाठवू शकतो, कशाप्रकारे आपण त्यांना त्यांची सुटका करू शकतो? त्या पेत लोकातून कशाप्रकारे आपण त्यांना पुण्य पाठवू शकतो. हे या ठिकाणी या सूत्तामध्ये सांगितलेलं आहे. आता बघा होतं काय
की हे लोक काय करतात,
आगन्त्वान स्वतःच्या घरी परत येतात,
तिरोकुट्टेसु तुमच्या कंपाउंडच्या बाहेर उभा राहतात,
कोण प्रेत लोक. एक तर स्वतःच्या घरी येतात किंवा दरवाजा बाहेर असतात किंवा तुमच्या त्या अंगणामध्ये असतात तुमच्या कंपाउंड कडे असतात किंवा चौकामध्ये किंवा रस्त्यांवरती असतात.
का बघा की त्यांचे जे नातेवाईक आहेत समजा आता त्यांच्याकडे बहुत खूप सारं अन्नपान अन्न आणि खाद्य सामग्री खज्ज भोके भरपूर प्रमाणामध्ये आहे, अबुडेंट आहे, खूप आहे भरपूर आहे ......पण
आता या ठिकाणी आपण असं समजू शकतो की जर कदाचित पेत लोकांमध्ये जाण्याचा जर प्रसंग आला - गेलो समजा कुठल्यातरी अकुशल कामामुळे तर, कोणीतरी आपल्याला पुण्य पाठवलं पाहिजे, पुण्यामोदन केलं पाहिजे तर का नाही आता आपण पुण्यामोदन केलं पाहिजे. आपल्या पेत लोकांसाठी जेणेकरून आपलं पुण्य जेणेकरून आपलं पुण्यबळ वाढेल आणि जर कधी असा प्रसंग आला, चुकीने जर एखादं कम्म झालं आणि पेत लोकांमध्ये गेलो तर आपल्याला पण कोणीतरी पुण्य पाठवेल. काय झालं आता हे पेत लोक आलेत घराच्या बाहेर आलेत घरी आलेत, द्वारावरती आलेत, तुमच्या कंपाउंड वरती आलेत किंवा या त्या आपल्या रस्त्यावरती आणि चौकामध्ये आलेत. का आलेत नातेवाईकांकडे? खायला प्यायला खूप काही आहे पण कोणी आम्हाला पाठवतच नाहीये, कोणी दान देतच नाहीये, असं त्या पेतलोकांचं म्हणणं आहे.
आता खूप लोकांना हे सुद्धा ऐकत असताना खूप साऱ्या शंका कुशंका येत असतील. मग बाबासाहेबांनी याला मानलं का? असं आहे का? तसं आहे का? बघा बाबासाहेबांनी संप्रति संप्रति ब्रह्माचा उल्लेख आपल्या पुस्तकामध्ये केलेला आहे. बुद्धांनी त्यांच्या धम्मामध्ये. संप्रत ब्रह्मा हा ब्रह्मलोकांमध्ये आहे, जर ब्रह्मलोक आहे तर अपायभूमी पण आहे, अपायभूमी आहे नरक आहे, पिशाच आहेत, पेत लोक आहे, असुर लोक आहे. जर संप्रती ब्रह्माचा उल्लेख असतो तर त्या ठिकाणी पेत लोकाचा सुद्धा उल्लेख आहे, असं आपण समजू शकतो आणि पुढे आपण चाललं पाहिजे, नाहीतर मग धम्म कधीच नाही कळणार. लोकोत्तर शब्दाचा अर्थ कधीच नाही कळणार. निब्बाण कधीच नाही कळणार. असा आहे कुशल अकुशल आणि कर्म सिद्धांत हे ज्या गोष्टी आहेत या कधीच नाही कळणार. मग आपण एकाच ठिकाणी एका गोष्टीवरती अडकून राहू आणि धम्म कधीच नाही समजणार.
पुढे....
आता हे लोक जे आलेले आहेत, पेत लोक हे सुखी कधी होतील कधी होतील जेव्हा आपण त्यांच्यावरती अनुकंपा करतो. अनुकंपा करतो, दयामया करतो,
पुढे बघू आपण त्यांना देतो....
इदं वो ञातीनं होतु, सुखिता होन्तु ञातयो
की बाबा माझे जे नातेवाईक जे आता आम्हाला सोडून गेलेले आहेत, परलोक तस्थ झालेले आहेत, नंतर ते कदाचित पेत लोकांमध्ये गेलेले आहेत. तर त्यांच्या नावाने आपण दानधर्म करत आहोत, कपडे -भोजन- पाणी इत्यादी वस्तू त्यांना आपण दान देत आहोत. त्यांच्यावरती अनुकंपा करत. आता ह्या पेत लोकांना आपण वेळोवेळी भोजन दान दिलं तर ते काय म्हणतात ......
पेत लोकांमध्ये जे आपले नातेवाईक गेलेले आहेत ते आता जमा झालेले आहेत, ते काय म्हणतात.....
पेत वगैरे तुमच्या घरासमोर आलेत वगैरे वगैरे, येतात आणि त्याच्यानंतर आपण त्यांना अशा प्रकारे भोजन दान देतो वगैरे वेगळे दान देतो ते सुखी होतात. आणि आपल्याबद्दल ते असा विचार करतात की आपल्याला चिरकाळापर्यंत आयुष्य मिळो नंतर आपण सुखी राहो आपण त्यांना भोजन दान दिलेला आहे तर ह्या पुण्य हे खूप मोठे पुण्य आहे असं ते म्हणतात.
आता सगळ्यात महत्त्वाचं की आपण यांना दान का दिलं पाहिजे? एक तर आपला कृतज्ञ भाव की आपल्या पूर्वजांप्रती आपण कृतज्ञ आहोत म्हणून, आपण दान धर्म करतोय त्यांची त्यातनं सुटका व्हावी म्हणून, आपण यांना पुण्यानुमोदन करतोय. पण अजून एक कारण कसं .... प्रत्येक लोकांमध्ये खाण्यापिण्याची आपली एक अवस्था असेल. जसं तिरच्छान मधला कुठलाही कीटक कुठलाही प्राणी शिकार करून किंवा वेगवेगळ्या प्रकारे स्वतःचं पोट भरत असतो. पण पेत लोकांमध्ये असं नाहीये. आता पेत लोकांचं वर्णन पाहिलं तर खूप वेगळे वेगळे प्रकार आहेत आणि खूप वेगळे वेगळे प्रकारचे पेत आहेत की समजा इतकं मोठं पोट असेल आणि तोंड एवढं बारीक असेल, म्हणजे इतकी मोठी त्याची भूक असेल, तृष्णा असेल... पण खायला एवढंच आहे म्हणजे खाऊ शकत नाही नाहीये, पोट भरू शकत नाहीये. अशा प्रकारे खूप सारे वर्णन आपल्याला खूप साऱ्या ठिकाणी असं बघायला मिळतात.
बघू आपण भविष्यामध्ये आणि तुमच्या पण वाचनामध्ये असं खूप काही आलेलं पण असेल तर का आपण दानधर्म केला पाहिजे....!
आता ही गाथा आपण बऱ्याच ठिकाणी ऐकलेली असेल आणि बऱ्याचदा भिक्षू संघ आपल्या घरी आल्यानंतर आपण पुण्यानुमोदन करतो. एक परात आणतो ताट आणतो त्याच्यामध्ये ग्लासामध्ये तांब्यामध्ये आपण पाणी सोडतो ही गाथा आपल्यापैकी बरेच लोकांनी ऐकलेली असेल निश्चितच
ही गाथा खूपदा आपण ऐकलेली आहे कसा आहे
आता तुम्ही माझ्या ज्या माता-भगिनी हे व्हिडिओ बघत असतील त्यांना पण प्रश्न पडला असेल हे काय आपण असं हे काय असं करतोय मग हे कर्मकांड झालंय आणि काय होणार आहे हे? आहे हे सांकेतिक आहे हे. सांकेतिक गोष्ट आहे की, जसं वरून पाणी सोडलं तर खाली जाणारच आहे तसंच माझे जे पूर्वज लोक जर काही अपाय भूमीमध्ये असेल, असुर असतील, प्रेत लोकांमध्ये असेल, तिरच्छान मध्ये असेल इव्हन निर्यामध्ये जरी असेल मी त्यांना पुण्य पाठवते, मी त्यांना दुःखातून मुक्तीचा मार्ग पाठवते, मी त्यांना पुण्य पाठवते... जेणेकरून त्यांचा यातून मुक्ती हो.
बघा या मनुष्य जन्मानंतर लगेच मनुष्य जन्म मिळेल याची गॅरंटी नाहीये असं उदाहरण बुद्धांनी खूपदा दिलेला आहे. जसं की एक सिम्पल उदाहरण की मोठा एक खूप मोठा सागर आहे. महासागर आहे. त्याच्यामध्ये कासव आहे आणि समुद्रावर त्या महासमुद्रावर एक टायरचा ट्यूब आहे. टायरचा ट्यूब आपला आपला तरंगत आहे आणि हा कासव त्या समुद्रामध्ये आपला आपला फिरत आहे. अशी काय गॅरंटी असल अशी काय संभावना असल, अशी काय प्रोबॅबिलिटी असल की जेव्हा हा कासव त्या पाण्याच्यावर डोकं काढेल आणि त्याचं डोकं बरोबर त्या टायऱ्याच्या ट्यूब मध्ये येईल याची प्रोबॅबिलिटी काय असेल? याची संभाव्यता काय असेल? याचे चान्सेस काय असतील? तेवढेच चान्सेस मनुष्य जन्मानंतर लगेच मनुष्य जन्म मिळणं याचेच आहेत. कॅल्क्युलेशन करण्यासारखं आहे की नाही बघा आणि याचे किती चान्सेस असतील. समजा पॅसिफिक महासागर आहे, प्रशांत महासागर आहे तिथे आपण एक टायरीचा ट्यूब सोडलेला आहे आणि तिथे एक कासव आहे तो कासव जेव्हा जेव्हा डोकं वरती घेईल आणि किती वेळेस त्याचं आणि किती वेळेस त्याचं डोकं हे त्या टायरेच्या ट्यूब मध्ये येईल याचा अंदाज लावा तेवढाच कठीण किंवा तेवढं सोपं आहे. मनुष्याचा जन्म परत मनुष्य जन्मामध्ये होणं.....
जसं पूर आलेला आहे खूपच पूर आलेला आहे. आणि काय होतं पाऊस पडतो पाऊस हा नदी नाल्यातनं झऱ्यातनं तो नद्यांमध्ये येतो, मग नद्या मोठ्या मोठ्या होऊन जातात आणि कालांतराने नदी एका सागराला जाऊन मिळते....
आता आपण त्यांना हे का दिलं पाहिजे पुब्बेकारी आणि कतञ्ञु..... पुब्बेकारी आणि कतञ्ञु या दोन प्रकारचे लोक या जगामध्ये भेटणं मिळणं फार मुश्किल आहे तर आपण कतञ्ञु बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कृतज्ञ भाव असला पाहिजे. का असला पाहिजे?
कोणत्या कार्याचा अनुसरण करून
शोक रडणं गाणं किंवा हे शोक नाही करायचा आहे. याच्या परिवेदना त्याने त्यांना फक्त वेदना सोडणार आहेत.
बुद्ध लोक त्यांना बुद्धवासी म्हणतात.... एखाद्या व्यक्ती जो सोडून गेलेला आहे त्यांचा आपण फोटो वगैरे लावतो त्यांच्या नावासमोर आपण बुद्धवासे लिहितो.अरे बुद्धवासी बुद्ध फक्त ते बुद्ध आहेत म्हणजे बुद्ध लोक जातात. बुद्ध होतात, बुद्ध वेगळे आहेत. बुद्धवासी नाही त्याला परलोकतस्स की आता हे या लोकांमध्ये नाहीयेत. म्हणून परलोक तस्सं अशा असा शब्द वापरला पाहिजे, बुद्धवासी नाही. हे चुकीचं आहे. मग कसं आपण त्यांना दानधर्म दिला पाहिजे? पण रडून शोक करून काही फायदा नाहीये, त्यातून त्यांची सुटका होणार नाहीये. रडून वगैरे जर आपण त्यांच्या नावाने फक्त रडत राहिलो जर त्यांच्या पुण्यतिथीला पुण्यस्मरणाच्या दिवसाला फक्त रडत राहिलो तर काही होणार नाहीये.
त्यांना कसं भोजन दान करायचं कसं करायचं हे आपण आता बघितलं.
पुढे आता आपण बघितलं की आपण त्यांना वेळोवेळी भोजन दान देतोय. पण अजून एक पाऊल पुढे जाऊन कशाप्रकारे अजून कुशल कम्म होऊ शकतं बघा.
बघा खूप चांगल्या प्रकारे भिक्षू संघ जो शिलवान आहे सदाचारी आहे एक भक्तिको आहे एक भक्ती म्हणजे दिवसातून एकदा जेवणारा आहेत, विकाल भोजनाचे खूप पालन करणारा आहेत, सहसा आता लोक असे करत नाही म्हणून बोललो एक भक्तीको आहे विकाल भोजन या शिलाचे पालन करणारा आहे ठीक आहे अशा भिक्षु संघाला आपण बोलावलं, त्यांना आपण
बघा जसं सांगितलं तसंच की एकाच ठिकाणी आपण दोन कुशल कर्म केले भिक्कूंना दिलं बलञ्च आणि या दानामुळे भिक्षूंना बल मिळेल कोणतं बल मिळेल पोट तर भरेल शक्ती मिळेल आणि ते अजून चांगल्या प्रकारे कुशल कर्म करू शकतात त्यांचा भिक्षू धर्म पाडू शकतात आणि त्यांच्या पारामी पूर्ण करू शकतात आणि इतरांना धम्मदेसना देऊ शकतात एवढं बल त्यांना मिळालेला आहे तुमच्या या भोजनामुळे तुमच्या या दानामुळे आणि ज्यांच्या निमित्ताने आपण दानधर्म करत आहोत त्यांना सुद्धा ते पुण्य मिळालेला आहे असा बुद्धांचा धम्म आहे अशा प्रकारे बुद्धांनी सांगितलेला आहे जे खूप काळापर्यंत चीर काळापर्यंत तुम्हाला मला आपल्या सगळ्यांच्या कल्याण आहेत अशाप्रकारे आपण या ठिकाणी तिरोकुट सूत्त बघितलं तसे हे सूत्त खूप महत्त्वाचा आहे कारण की आपण दर वेळेस जे कोणी लोक आपल्याला सोडून गेलेले आहेत त्यांच्या नावाने दानधर्म करत असतो बऱ्याचदा करत असतो काही काही लोक फक्त वर्षातून त्याच एका तारखेला दानधर्म करत असतील तर त्यांना दानधर्म करण्यासाठी त्या तारखेची वाट बघायची गरज नाहीये आपण भिक्षू संघाला ज्या पण निमित्ताने बोलवतो तेव्हा सुद्धा आपण त्या लोकांचा उल्लेख करू शकतो आपले आई-वडील असतील नातेवाईक असतील आजी-आजोबा वगैरे लोक असतील मित्र परिवारातले लोक असतील इव्हन एखादा प्राणी सुद्धा तुमच्या घरात मेलेला असेल कुत्रा मांजर जे तुमच्या घरातले एक सदस्य होते त्यांच्या नावाने सुद्धा आपण पुण्यकर्म करू शकतात त्यांना सुद्धा पुण्याची गरज आहे अशा प्रकारे पुण्यामोदन करणं पुण्यवितरण करणं हे स्वतः एक कुशल कर्म आहे आपण दहा प्रकारचे कुशल कर्म बघितले त्याच्यामध्ये हे सुद्धा एक कुशल कर्म आहे आपण आपली पारामी पूर्ण करत आहोत आणि आपण इतरांचेही मंगल करत आहोत एका मेणबत्ती पासून दुसरी मेणबत्ती पेटवली प्रकाश वाढतो त्याचप्रकारे अशा प्रकारे आपण पुण्यानुमोदन सुद्धा करू शकतो आता आपल्याला याचा एक प्रॉपर तरीका एक प्रॉपर वे माहिती पडलाय की आपण भिक्षू संघाला बोलवायचं ते सदाचारी आहे शीलवान आहेत एक भक्तीको आहेत विकाल भोजनाचे पालन करणारे आहेत अशा भिक्षू संघाला आपण बोलवलं त्यांना भोजन दान दिलं आणि शेवटी पुण्यानुमोदन करत असताना आपण असा विचार तर करतो की ह्या पुण्याच्या प्रतापाने माझा मंगल हो सोबत हे बोलूया की माझ्या पूर्वजांना हे पुण्य मिळो एखादी व्यक्ती आपल्या घरात वारलेली असेल तर त्यांचं नाव घेऊन त्यांना सुद्धा हे पुण्य मिळो एखादा प्राणी आपल्या घरात मेला असेल त्यांना आपण हे पुण्य पाठवूया आपल्या गुरुजनांना ज्यांनी आपल्याला धम्म सांगितला त्यांच्याबद्दल आपण कृतज्ञ भाव आहोत अशांना आपण पुण्य पाठवू शकतो पुण्यानुमोदन करू शकतो जे काही देवतागण सुद्धा आपली रक्षा करत आहोत त्यांना सुद्धा आपण हे पुण्य पाठवू शकतो आणि अजून एका व्यक्तीला पुण्य पाठवायचा आहे जो
तुम्हाला नरकातनं वाचवेल पुढचं सूत्त त्याच्या वरतीच असेल थोडसं समजायला कठीण जाईल बऱ्याच लोकांना हे एक्सेप्ट सुद्धा करता येणार नाही हे काय पण आहे बघूया आपण
पुढच्या सूत्मध्ये त्याचबरोबर अशा प्रकारे आपण या स्वतःमध्ये कशाप्रकारे कुशल कर्म करू शकतो प्रेत लोकांना आपल्या पूर्वजांना आपण कशाप्रकारे दानधर्म करू शकतो जेणेकरून आपल्याला तर पुण्यकर्म मिळतंय त्यांना सुद्धा पुण्यकर्म मिळतंय आणि त्यातून त्यांची सुटका होऊ शकते आणि जर कोणाला असा काही त्रास होत असेल तर भिक्षू संघाला बोलवून घरामध्ये परित्राण पाठ करून कुशल कर्म केलं पाहिजे जेव्हा धम्म तुम्ही पालन करतात तर धम्म तुमचं रक्षा करतो असं म्हणतात याला आपल्याला कर्मकांडासारखं बघायचं नाहीये तर आपलं अंतिम ध्येय हे निब्बान आहे आणि निब्बानासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे तर त्याला पूरक त्याला सपोर्टिंग ह्या सगळ्या गोष्टी आहेत पुण्य कमवणं आणि पुण्य वितरण करणं पुण्यानुमोदन करणं. बाबासाहेबांनी आपल्याला खूप चांगला धम्म दिलेला आहे त्याला आपल्याला शिकायचा आहे समजायचा आहे काही प्रश्न असतील विचिकिच्छा असेल शंका असेल तर गुरुजनांना भिक्षू संघाला एखाद्या अभ्यासक उपासकाला उपासिकेला आपण विचारू शकतो शंकांचा समाधान करून घेतलेलं बरं एखाद्या गोष्टीमध्ये अडकून राहण्यापेक्षा एखादी गोष्ट समजत नसेल तिथे अडकून राहण्यापेक्षा त्याला थोड्या वेळा करता साईडला करून पुढे अजून दुसरी गोष्ट आपण समजूया एकाच ठिकाणी अडकून बसू नका पुढे चला समजून घ्या कालांतराने ती गोष्ट सुद्धा समजण्यासाठी समजेल ती गोष्ट सुद्धा समजेल अजून चांगल्या प्रकारे क्लिअर होईल धम्म गणितासारखं आहे आपल्या सगळ्यांना एक गणित दिलं एक मॅथ्स दिलं तर ते सगळ्यांना सोडवता येणार नाहीये प्रत्येक जण त्याच्या बुद्धिमत्तेने प्रयत्न करेल काही लोकांना जमेल काही लोकांना जमणार नाही पण कालांतराने अभ्यास करत गेलो बुद्धिमत्ता वाढत गेली तर धम्म सुद्धा समजेल गणित सुद्धा सॉल्व होईल प्रॅक्टिस करून करून तसंच धम्म आहे पहिल्याच अटेम्प्ट मध्ये सगळं समजेल अशी तरी अपेक्षा आपण केली नाही गेली पाहिजे
आपण सगळे आलात श्रद्धा संपन्न उपासक उपासिका या ठिकाणी आलात आपण हा धम्म ऐकलात ही धम्म देसना माझ्याकडून ऐकली तुम्ही सगळे माझी दानपारमी पूर्ण करण्यासाठी मला मदत करत आहात खूप खूप धन्यवाद खूप खूप साधुकार या पुण्याच्या प्रतापाने तुमचं माझं आपल्या सगळ्यांचे मंगल हो धम्म सांगत असताना जर एखाद्या गोष्टीचा एखाद्या शब्द शब्दाचा जर थोडासा अर्थ मागे पुढे होत असेल तर बुद्ध धम्म संघ मला क्षमा करो माझा इंटेन्शन माझा हेतू चांगला आहे धम्माचा प्रसार प्रसार करण्यासाठी हे छोटसं कॉन्ट्रीब्यूशन आहे आपल्याला हे व्हिडिओज कसे वाटत आहेत आम्हाला कॉमेंट बॉक्स मध्ये सांगा आम्हाला आम्हाला whatsapp मध्ये सांगा whatsapp ची लिंक खाली दिलेली आहे कमेंट मध्ये दिलेली आहे आमचं whatsapp चा ग्रुप जॉईन करा अशाच प्रकारे आपण खूप साऱ्या स्वतःचा अभ्यास करणार आहोत या पुण्याच्या प्रतापाने तुमचं माझं आपल्या सगळ्यांचं मंगल हो आपल्या पारामी पूर्ण हो अरहंतांचे दर्शन हो बुद्धांचे दर्शन हो साधू साधू साधू
No comments:
Post a Comment