Monday, 28 April 2025

कोकणातील भावकी मंडळ

*_कोकणातील भावकी मंडळ_*

_कोकणात बौद्ध समाज हा वाडी निहाय आहे म्हणजे प्रत्येक गावात एक बौद्ध वाडी आहे आणि प्रत्येक वाडीची परिस्थिती सारखीच आहे. प्रत्येक वाडीत मंडळे आहेत आणि प्रत्येक वाडीचे दोन भाग आहे (काही अपवाद) वाडीतील लोकांची परिस्थिती आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक स्थिती खुप वाईट आहे दिसत नाही पण ती आहे हे मान्य करावे लागेल. भावकी भावकीत वाद आहेत वाडीतल्या वाडीत गटबाजी होते. खरंच आपली परिस्थिती खुप चांगली आहे का ? हा प्रश्न मला विचारावा वाटतो. झाडु खाते सोडले तर बी. एम. सीत कुणालाच पिटीकेस नाही. आणि कोकणातील बहुतांश समाज हा नोकरवर्ग आहे त्यात सरकारी वर्ग कर्जबाजारी आहे सगळेच नाही काही अपवाद वगळून. पण एक गोष्ट नक्कीच की सरकारी नोकरीत असुन ही कोकणातील बौद्धांची मुले ही बारावीच्या पुढे सुशिक्षित नाही. *80% लोक व्यसनाधीन आहेत व्यसन नाही अशी फक्त 20% लोक आहेत. *_

आता आपण विषयाकडे येऊया

_कोकणात मंडळ पद्धती आहे. म्हणजे काय असतं वाडीत एक मंडळ (भावकी) असते. मग त्या मंडळात अध्यक्ष, सचिव वगैरे वगैरे पदे असतात हे लोक वाडी सांभाळतात आणि वाडीतील लोकांच्या मदतीला धावतात, मदत करतात, लोकांसाठी अहोरात्र कष्ट घेत असतात. ही मंडळ पद्धतीची एक बाजु. *दुसरी बाजु हे मंडळ वर्गणी काढुन जयंत्या, कार्यक्रम करते.*_

_पण सांगण्याचा मुद्दा असा की जेवढा पैसा जयंतीसाठी खर्च होतो तोच पैसा वाडीतीलच एखाद्या हुशार गरीब मुलाच्या शिक्षणावर करताना ही मंडळे दिसत नाही. आता काहीजण म्हणतात अशी हुशार गरीब मुले वाडीत नाहीत. अरे पण ती का नाहीत. हा प्रश्न वाडीतील लोकांना पडु नये का? आपण वाडीचे मंडळ म्हणुन काम पाहतो ते फक्त कार्यक्रम करण्यापुरतेच का? बाबासाहेबांचा समाज शिकण्याची इच्छा असणारा नाही. अस ग्राह्य धरावे का?. मंडळातील काही लोक (मोजकेच) एखाद्याला वैयक्तिक कारणाने टार्गेट करतात ही बाब कोकणातल्या मंडळ पद्धतीत प्रखरपणे दिसुन आली आहे. *कोकणात बौद्ध मंडळे ही फक्त मोठेपणा आणि पदासाठी धडपडत असतात*._

_हो मान्य काही मंडळे खरेच चांगली कामगिरी करतात. पण निम्म्याहून जास्त कोकणातील मंडळात वादच दिसुन येतो. या मंडळाचा फायदा काहीच नाही असे नाही पण जे कार्य या मंडळानी करायला हवे ते दिसत नाही. ज्या वाडीचे, शाखेचे पद तुम्ही सांभाळता तेथील लोकांची आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक, परिस्थितीत सुधारणा करण्याचे तुम्ही काम करत असाल तर तुम्ही खरे बाबासाहेबांचे अनुयायी पण परिस्थिती खरेच खुप खराब आहे. *कोकणातील मंडळ पद्धत ही एक फंडासारखी झाली आहे वर्गणी काढा जयंत्या करा, कुणाचे बारसे, बारावे करा यापलिकडे कोणतेच काम नाही.*_

*काही प्रश्न आहेत मंडळ पद्धतीत असणाऱ्या सर्व गावातील मंडळाना*

१. किती मंडळांनी आतापर्यंत गरिब मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलला

२. किती मंडळानी वाडीत ग्रंथालय उभारले

३. किती मंडळानी मुलांना ज्ञान मिळावे म्हणुन संगणकाची वाडीत व्यवस्था केली.

४. किती मुलांना मार्गदर्शन करून त्यांना नोकरी लावुन दिली

५. किती घरातील लोकांना समाजकल्याण मधुन मिळणाऱ्या सोयीसुविधासाठी मदत केली,

६. किती विधवा स्त्रियांना आर्थिक सहाय्य मिळवुन दिले.

_सर्व मंडळे नावाला रजिस्टर होतात आणि काम मात्र फक्त जयंत्या करणे यापलिकडे काहीच नाही. *आता काही महाभाग असे म्हणतील ही जी कामे आहेत आम्ही कशी करणार शासन करेल पण अरे ते तुम्ही मिळवुन देण्यास मदत तर करू शकता की नाही.*_

_काही जण म्हणतात मी दहा वर्षे मी माझ्या गावचा अध्यक्ष होतो. मी वाडीसाठी काय काय केले. मग तो सांगेल आम्ही बौद्ध विहारे बांधली, वाडीतील ईतक्या लोकांची लग्न लावली, ईतक्या मुलांचे बारसे केले पण यावर मला एक म्हणायचे आहे की दहावर्षात एका मुलांला चांगले शिक्षण घेण्यास मदत केली असती आणि त्याला उच्च पदावर पोहोचण्यास सहकार्य केले असते तर आज एक समाजात उत्तम उदाहरण निर्माण झाले असते आणि समाजातले स्थान वाढले असते. मुलांसाठी विविध उपक्रम राबवून मुलांना चांगल्या मार्गास लावता आले असते._

_*आता कोकणात प्रत्येक बौद्धवाडीत व्यसनाधीन मुले आहेत*. पण एका ही मंडळाने कधी प्रयत्न केला नाही की वाडी दारूमुक्त व्हावी.* कारण जे मंडळात कार्यकर्ते असतात ते स्वतः पिणारे खाणारे असतात. *काही मंडळे याला अपवाद आहेत आणि खरेच अशी मंडळे आदर्शच असतात.* कोकणातील ही बौद्ध मंडळ पद्धत ही जेवढी चांगली आहे त्यापेक्षा तिचा वापर करता आला नाही. असे मला वाटते. काहीनी *मोठेपणासाठी वापर केला तर काही जणांनी पैशासाठी, तर काही जणांनी हुकूमशाही गाजवण्यासाठी*

_कोकणातील बौद्ध मंडळ पद्धत ही फक्त नावालाच आहे कारण त्याचे काम हे फक्त ठरलेलेच असते. किती मंडळे स्थापन होतात पण वाडीतील लोकांच्या राहणीमानाचा, शिक्षणाचा दर्जा काही सुधारत नाही, कोकणातील मुलं ही फक्त हाऊसकिपींग, वेटर, झाडुवाला, अश्याच नोकरी करणारे असतात कारण मुळात आम्हीच मागे आहोत हे कळतच नाही. *असो पण जे लोक मोठ मोठी भाषणे करताय त्यांनी सांगावे की आपण खरेच बाबासाहेबांचे काम करत आहात का? दरवेळेस बाबासाहेबांनी असे केले तसे केले सांगतो, अरे पण तुम्ही मंडळ म्हणुन आणि वैयक्तिक बाबांचा अनुयायी म्हणुन काय केलात?*_

_*कोकणातील मंडळे ऑर्केस्ट्रा, कव्वाली यासाठी खर्च करताना जराही विचार करणार नाहीत* पण तेच लाख दोन लाख एखाद्या पोराला व्यवसायासाठी किंवा शिक्षणासाठी खर्च करताना दिसत नाहीत. दरमहिन्याला आणि जयत्यांना आम्ही पैसे काढायचे पण वाडीत कोण असा आहे का ज्याला पैशाची गरज आहे त्याला मदत करूया त्यासाठी पैसे काढ्या असा विचार कुणाच्या मनात येत नाही. *आता काही जण म्हणतात मंडळाने त्याच्याकडे का जावे त्याने आमच्याकडे यावे आम्ही मदत करू आणि हाच इगो मंडळात आग लावतो.*_

_मंडळातील लोकांनी गरजु लोकांपर्यंत पोहोचायला हवे हे तुमचे काम आहे हेच बाबासाहेबांचे काम आहे *पण काय आहे मंडळ पद्धतीत जेव्हा पदावर तो व्यक्ती असतो तेव्हा त्याला लय अभिमान स्वाभिमान निर्माण झालेला असतो (अपवाद वगळून). तो स्वतःला जरा जास्तच ग्रेट समजु लागतो. आणि मंडळात असंतोष निर्माण व्हायला हे ही एक कारणच आहे.*_

_कोकणातील मंडळ पद्धती चांगली होती आणि आहे पण लोकांनी तिचा वापर करावा तसा केला नाही. पदावर येणाऱ्या माणसांच्या मनात निस्वार्थ भावना, तळमळ दिसतच नाही मंडळे फक्त नावापुरतीच आणि कार्यक्रमापुरतीच राहिली माझा समाज होता तिथेच आहे पण तसा तो दिसत नाही आहे. *तुम्हाला माझे विचार मान्य असो नसो पण जे आहे ते आहे.*_

राजन बनसोडे

मुख्याध्यापक

मंडणगड सिनियर कॉलेज, मंडणगड

संपर्क-9876543210

Monday, 21 April 2025

पालि वाङमयाच्या संशोधनाची आणि अभ्यासाची उपोयगिता

💮💮💮💮💮💮💮💮💮💮💮

*_पालि वाङ्मयाच्या संशोधनाची आणि अभ्यासाची उपोयगिता_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2025/04/blog-post_21.html

💮💮💮💮💮💮💮💮💮💮💮

_पालि भाषा आता कालबाह्य झाली आहे, ही भाषा आता बोलली जात नाही, हे विज्ञान युग आहे. आता या भाषेचा अभ्यास का करायचा? अभ्यास करून काय उपयोग आहे? वगैरे वगैरे अनेक सबबी आहेत. त्यामुळे या साहित्याची उपयोगिता आहे की नाही हा प्रश्न निश्चित आपल्या मनात उपस्थित होतो. पण पालिभाषाच काय? कोणत्याही भाषेचे संशोधन वा अभ्यास असो तो मानवाला नवी दिशा देणारा असतो. तसेच संशोधन ही निरंतर प्रक्रिया आहे. मग ही तर पालि भाषा आणि साहित्य आहे. या भाषेला आणि साहित्याला सम्मासंबुध्दाच्या वचनाचा वारसा लाभला आहे. हे आपण कसे विसरुन जातो!_

_पालि वाङ्मयाचे संशोधन आणि अभ्यास, याची केवळ उपयोगिताच आहे असे नाही तर, मानवाचे संपूर्ण जीवन, त्याचे अस्तित्व सर्व पातळ्यांवर बदलण्याचे सामर्थ्य सुध्दा त्यात आहे. तसेच त्याची विविधांगी उपयोगिता असल्याचे आपल्याला संशोधनाने आणि अभ्यासाने दिसून येईल. या अभ्यासाची सुरुवात ही आपल्याला भगवान बुध्दांपासून करावी लागते! कारण *त्यांनी बुध्दत्वप्राप्तीनंतर तेव्हाच्या मध्यमंडलामध्ये निरंतर ४५ वर्षे त्या वेळच्या लोकभाषेत जो उपदेश केला तोच आज तिपिटकाच्या स्वरुपात सुरक्षित आहे.* तिपिटकाच्या भाषेलाच आज 'पालि भाषा' असे म्हणण्यात येते. 'बुद्धवचन' या भाषेत संग्रहीत असल्यामुळे ही भाषा 'धम्माची भाषा झाली आहे. ह्या भाषेतच तिपिटकाची अंतिम निर्मिती *"देवानंपिय पियदस्सि धम्मासोक"* राजाच्या काळापर्यंत झाल्याचे आपल्याला *तिसऱ्या धम्मसंगितीवरुन दिसून येते. यावरून हे लक्षात येते की पालि साहित्याच्या निर्मितीचा काळ अर्थात तिपिटकाचा काळ हा बुद्धकाळापासून सुरू होऊन धम्मासोकाच्या काळापर्यंतचा आहे आणि नंतर हे साहित्य वट्टगामणि अभय राज्याच्या काळात साधारणतः पहिल्या शतकात सिंहल देशात लिपिबध्द झाल्याचे महावंश या ग्रंथावरून दिसून येते.* अशी दीर्घ काळ चालू असलेली पालि साहित्याची ही चळवळ आहे. त्यानंतर सुद्धा ती तशीच पुढे चालू राहिली. पण त्याची स्थित्यंतरे वेगवेगळ्या स्वरूपात झाली._

_भगवंताना असे वाटत होते की, त्यांचा संदेश सर्व लोकांपर्यंत पोहचावा. म्हणून स्वतः त्यांनी तत्कालीन लोकभाषेत उपदेश केला आणि त्याचबरोबर आपल्या भिक्खू संघाला सुद्धा अनुमती देताना असे म्हटले की,_

*_'अनुजानामि, भिक्खवे, सकाय निरुत्तिया बुद्धवचन परियापुणितु न्ति._*

_'भिक्खूंनो, अनुमती देतो आपल्या बोलीभाषेत बुध्दवचन अध्ययन करण्याची. असे सुद्धा होवू शकते की, तत्कालीन अनेक बोली भाषेत बुद्धवचनाचा संग्रह झाला असावा. परंतु आज जे बुद्धवचन आपल्याला उपलब्ध आहे. ते एकाच पालि भाषेत उपलब्ध आहे. कालांतराने याच भाषेत विस्तृत साहित्याची रचना झाली. तिपिटकावर अट्ठकथा आणि (या अट्ठकथांवर टीका, अनुटीका, बघुटीका, योजना, यष्ठीपद इ. अनेक टीका) ग्रंथ वेळो वेळी आचार्यांकडून व भिक्खू संघाकडून निर्माण झाले. या शिवाय अनुपिटक आणि त्यावर अट्ठकथा, टीका यासारखे विपुल साहित्य आपल्याला पालिभाषेत दिसून येते. तसेच कलेचा आणि संस्कृतीचा, वारसा देणाऱ्या लेण्या, स्तूप, विहारे, शिलास्तंभ, शिलालेख व त्यावरील पालि भाषेतील साहित्य, अशी पालि साहित्याची समृद्ध परंपरा ह्यू-एन-त्सँग या चीनी प्रवाशाच्या काळात सुद्धा चांगल्या स्थितीत असल्याचे त्यांच्या प्रवास वर्णनाच्या डायरीवरुन दिसते._

_पण एवढी समृद्ध पालि साहित्याची परंपरा, संस्कृती, कला, तत्त्वज्ञान याचा जेथे उगम झाला, त्या भारतातूनच हे सर्व लुप्त झाले. बौद्धधम्माच्या संस्कृतीचा, कलेचा, समृद्धीचा आणि संपन्नतेचा वारसा सांगणाऱ्या येथील बौद्धलेण्या, स्तुप, विहारे ज्या त्याचे मुर्तीमंत उदाहरण आहेत, त्या सुद्धा मातीच्या ढिगाऱ्यांनी भरून गेल्या. *येथे माणसाचेच धर्मांतर होते असे नाही. तर अनेक लेण्या, विहारांचे दुसऱ्या धर्माच्या श्रद्धास्थानात धर्मांतर झाल्याचे आपल्याला दिसून येते.*_

_तसेच तक्षशिला, नालन्दा, विक्रमशिला, वल्लभी या सारख्या विश्वविद्यालयांमध्येही अनेक वाङ्मयीन ग्रंथांची रचना झाली असावी. पण ही सर्व साहित्यसंपदा आज उपलब्ध नाही. कारण नंतरच्या काळात वेगवेगळ्या प्रकारच्या राजकीय, सामाजिक, धार्मिक, साहित्यक, सांस्कृतिक, स्वकीय आणि परकीय आक्रमणामुळे भारतामध्ये बुद्धधम्माला उत्तरती कळा लागल्यावर नष्ट झाली असावी. ज्या पालि साहित्य संपदेचे भिक्खूसंघाने संरक्षण केले, ते त्यांनी आपल्या बरोबर शेजारी देशात, नेऊन त्याचे जतन केले असावे. कारण धम्माशोकाने (अशोकाचा काळ साधारपणपणे खि. पू. २७२-२५ या दरम्यानचा आहे) तिसऱ्या धम्मसंगिती नंतर भारताबाहेर धम्मप्रचार-प्रसार करण्याची, जी योजना आखली, त्यानुसार धम्माशोकाचा पुत्र थेर महिंद्र आणि कन्या थेरी संघमित्ता यांनी सिंहल देशात पालि साहित्याची परंपरा नेली. ही परंपरा स्तविर आणि आचार्य यांच्या माध्यमातून बर्मा (ब्रह्मदेश), श्रीलंका, सयाम (थायलंड), कंबोज इ. देशात गेली. भारताच्या शेजारील या देशांनी, भगवान बुद्धाच्या धम्मदेसनेचे, अनुशासनाचे व संपूर्ण साहित्य परंपरेचे जतन आणि संवर्धन केल्यामुळेच ही संपूर्ण साहित्य परंपरा तेथे अस्तित्वात राहू शकली. त्याचेच फळ आज आपणाला थोडेसे मिळू लागले आहे._

_हे पालि साहित्य त्यांनी ताडपत्रावर लिहून ठेवले. पण हे कोणत्याही तद्देशीय भाषेत नसून पालि भाषेत होते. या बौद्ध देशांमध्ये ही परंपरा आज सुद्धा उपलब्धच नाही, तर जतन करून ठेवली आहे. यावरून असे दिसते की, तेथील लोकांची भगवंताच्या शिकवणीवर अखंड दृढनिष्ठा असल्यामुळे त्यांनी ते ताडपत्रावरील हस्तलिखित ग्रंथ साहित्य फार जपून ठेवले. काही ग्रंथाच्या नवीन नकला केल्या. काहीवर भाष्ये लिहिली व काही निरनिराळ्या ताडपत्रावर विस्तृत रुपाने लिहून ठेवले._

_असे असताना कालांतराने ब्रिटिश राजवटीच्या काळात शेजारील देशांनी ताडपत्रावर जपून ठेवलेल्या त्या जुन्या नकला युरोपियन संशोधकांनी हस्तगत केल्या. याच *ब्रिटिश राजवटीच्या काळात एकीकडे जेम्स प्रिन्सेप यांनी अशोकाच्या शिलालेखांचा उलगडा करण्यास सुरुवात केली. तर ह्यू-एन-त्सँग या चीनी प्रवाशाच्या डायरीवरुन अलेक्झेंन्डर कनिंगहॅम यांनी त्यांच्या पाऊलावर पाऊल ठेवून अनेक ऐतिहासिक पुरातत्व स्थळांचे उत्खनन करुन त्यांचा शोध लावला व त्यावरून अत्यंत महत्त्वाचा ऐतिहासिक पुरावा उपलब्ध होऊ लागला. दुसरीकडे ऱ्हिस डेव्हिड, टर्नर, चाइल्डर्स, गॉजर्ली, ओल्डनबर्ग यांच्या सारख्या पंडितांनी युरोपियन सुसंस्कृत वर्गाला ताडपत्रावरील लिखाणांचा परिचय करून देण्याचे काम सुमारे अर्धशतकावर चालू ठेवले. त्या पूर्वी बुद्धाच्या शिकवणीविषयी काही मध्ययुगीन ग्रंथावरून ज्ञात होत असे तेवढेच. अशाच एका ग्रंथाच्या आधारे ए‌ड्विन आर्नोल्ड यांनी आपले Light of Asia हे काव्य लिहिले.*_

_वर निर्देश केलेल्या विद्वानांनी ताडपत्रावरील पालि साहित्याचे संशोधन करुन ते ग्रंथरुपाने छापून काढले व इतर भिक्खूंच्या मदतीने त्याची भाषांतरे केली. म्हणून त्या काळात युरोप व अमेरिकेतील विद्वान जनतेला प्राचीन बौद्धधम्मासंबंधी बरेच ज्ञान मिळाले. यावरुन हे स्पष्ट होते की, *आधुनिक काळात पालि साहित्याच्या संशोधनाला आणि अभ्यासाला गती ही १८ व्या १९ व्या शतकात, इंग्रजाच्या राजवटीत निर्माण व्हायला सुरुवात झाली आणि पाश्चात्यांनी पालि साहित्याच्या संशोधनाला आणि अभ्यासाला सुरुवात केली. प्रो. ऱ्हिस डेव्हिडस् यांनी स्थापन केलेल्या एकट्या पालि टेक्स्ट सोसायटी, लंडन या सोसायटीने मूळ ग्रंथ व भाषांतरे मिळून एकंदर पालि साहित्याची ७० पुस्तके प्रकाशित केली आहेत.*_

_*मॅक्स मुल्लर यांच्या The Sacred Books of the East या मालिकेत कित्येक भाषांतरे प्रसिद्ध झाली आहेत व The Sacred Books of the Buddhist, the Harvard Oriental series आणि जर्मन पालि सोसायटी इ. च्या विद्यमाने कित्येक नवीन नवीन पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. तसेच Oxford University Press येथून सुद्धा अनेक पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत.*_

_*१९ व्या शतकात अनागारिक धम्मपाल यांनी 'महाबोधि सोसायटी' ची स्थापना करुन व इतर मार्गाने भारतामध्ये बौद्ध धम्माच्या अभ्यासाची नवीन प्रेरणा आणली. तर २०व्या शतकाच्या सुरुवातीला आपल्याकडे पालि भाषेच्या संशोधनाला आणि अभ्यासाला पुन्हा नव्याने आचार्य धर्मानंद कोसम्बी यांनी सुरुवात केली. त्यांच्या अध्यापनकाळात चिं. वि. राजवाडे, डॉ.पु. वि. बापट, प्रा. चिंतामणराव जोशी, प्रा. ना. के. भागवत यांच्यासारखे बौद्धधम्माचे व पालिभाषेचे पुष्कळ विद्वान त्यांच्या हातून तयार झाले. त्या विद्वानांनी आणि राहुल सांस्कृत्यायन, भन्ते जगदीश काश्यप, भदन्त डॉ. आनन्द कौसल्यायन, भदन्त धर्मरक्षित, धर्मरत्न यांनी पालि भाषेचे देवनागरी लिपीतील अनेक ग्रंथ आणि त्याची भाषांतरे करण्याचे काम केले आहे.*_

_पण हे काम सर्वार्थाने पूर्ण झाले आहे असे नाही. आताच्या अभ्यासकांना आणि संशोधकांना पालि भाषेचा अभ्यास अनेक विषयाच्या अनुषंघाने करता येण्यासारखा आहे. *पालि साहित्य आणि प्राचीन भारतीय संस्कृतीच्या अभ्यासक डॉ. मिना तालिम यांनी 'पालि भाषेच्या विकासाची दालने' या लेखात म्हटल्याप्रमाणे पालि भाषेचा अभ्यास अनेक विषयाच्या संबंधाने करता येवू शकतो हे स्पष्टच आहे.* त्याचा आधार घेऊन काही मुद्दे या लेखात स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच त्या संबंधाने त्याची उपयोगिता असल्याचे सुद्धा दिसून येईल. जसे..._

*_१. इतिहास संशोधनाच्या दृष्टीने उपयोगिता_*

_प्राचीन भारतीय इतिहासाचे प्रतिबिंब पालि वाङ्‌मयात दिसून येते व त्यात येणारा इतिहास हा सत्यावर आधारलेला आहे. कारण तो बहुतांशी श्रमणांनी (भिक्खूंनी) लिहिला असल्यामुळे त्यात कोठल्याही राजाचा व राजवंशाचा द्वेष वा लोभ नाही. दुसरे असे की, पालि साहित्यातून पालि वाङ्म‌याच्या इतिहासाचा अभ्यास करता येतो. पण पालि वाङ्‌मयाच्या इतिहासाचा अभ्यास झाला म्हणजे बौद्ध वाङ्‌मयाचा प्रश्न पुरा झाला. सुटला, असे मात्र नाही. तर बुद्धाची शिकवण ही भारतात तसेच भारताबाहेर गेली. त्यामुळे त्या देशातील कोट्यावधी लोक बुद्धधम्माचे अनुयायी बनले. म्हणून बुद्धधम्माच्या इतिहासात तत्कालीन लोकांची बुद्धी, नीति, विचार, जीवन, राजकारण, कला वगैरे गोष्टीचे चित्र दृष्टीस पडत असल्यामुळे गेल्या अडीच हजार वर्षात बौद्धधम्मामुळे मानव जातीची सुधारणा कशी झाली व त्यामुळे इतर धर्मीयांच्या आचारांत विचारांत बुद्धधम्माची काही बाबतीत छाप कशी पडली, हा इतिहास काही संस्कृत व पालि ग्रंथावरुन, काही शिलालेख, नाणी, ताम्रपट, जयस्तंभावरील लेख, लोकांचा आधार यावरुन समजतो. तसेच राजनैतिक, धार्मिक व सामाजिक इतिहास संशोधनामुळे समजतो. तसेच *बुद्धधम्माचे आगार असलेल्या प्रांतात तीन प्रसिद्ध चिनी यात्रेकरु (फा-हि-यान इ.स.४०० मध्ये इ-त्सिंग इ.स.५१८ मध्ये, ह्यू एन त्संग ६२९-६४८) मध्ये येवून गेले.* त्यांनी आपली अमूल्य प्रवास वर्णने लिहून ठेवली नसती तर बुद्धधम्माचा आता समजतो, तेवढा सुद्धा इतिहास कळला नसता. पुराणवस्तू संसोधनही जेव्हा साजेशा पद्धतीने होऊ लागेल तेव्हा कोठे आपणाला जेमतेम क्रमवार इतिहास जुळवता येईल. त्यासाठी अजूनही अभ्यासाची आणि संशोधनाची आवश्यकता आहेच._

_यासाठी उदाहरणच द्यायचे झाले तर *ऐतिहासिक पुरुष असलेले सम्मासबुद्ध म्हणजेच (भगवान बुद्ध) हे आपल्याच मायभूमीतच अवतारी पुरुष झाले होते. पण वर म्हटल्याप्रमाणे ह्यू-एन त्सँग या चीनी यात्रेकरुच्या डायरीवरून अलेक्झान्डर कनिंगहॅम यांनी त्यांच्या पाऊलावर पाऊल ठेवून अनेक ऐतिहासिक पुरातत्व स्थळे शोधली. त्यामध्ये लुंबिनीचा धम्माशोकाचा लेख असलेला शिलास्तंभसुद्धा आहे. जेम्स प्रिन्सेप यांनी धम्माशोकाच्या या शिलालेखांचा उलगडा करण्यास सुरुवात केली आणि ब्राह्मी लिपी व लेखाची पालि भाषा वाचता येऊ लागली. त्यामुळे धम्माशोकाचा लुम्बिनीतील स्तंभालेख वाचण्यात आला आणि भगवान बुद्धाविषयीचा भारताचा संपूर्ण इतिहास बदलला. भगवान बुद्ध ऐतिहासिक पुरुष असल्याचे या स्तंभलेखाने सिद्ध झाले. हा इतिहास बदलविणारा तो कोणता लेख धम्माशोकाच्या लुम्बिनी (रुम्मिनदेई) च्या स्मारक स्तंभलेखातील होता,*_

 तर तो म्हणजे-

_*'देवानपियेन पियदसिन लाजिन वीसती वसाभिसितेन अतन आगाच महीयिते हिद बुधे जाते सक्यमुनी ति सिला विगडभी चा कालपित सिला यभे च उसपापिते हिद भगवं जाते ति, लुमिनि गामे उबलिकेकटे अठभागिये च*_

_*रोमिला थापर लिखित 'अशोक आणि मौर्याचा ऱ्हास या पुस्तकाचा डॉ. शरावती शिरगांवकर यांनी अनुवाद केला.* त्यातील हा, त्यांनी केलेला अनुवाद. 'देवांचा प्रिय प्रियदर्शि राजा, राज्याभिषेकाला वीस वर्षे झाल्यानंतर स्वतः त्या बुद्ध शाक्यमुनिच्या जन्मस्थानी आला आणि त्याने या स्थानाची पूजा केली. त्याने येथे दगडी वेदी बांधण्याची व दगडी स्तंभउभारण्याची व्यवस्था केली. लुंबिनी या खेड्यात भगवान बुद्धाचा जन्म झाला म्हणून त्याला करातून सूट दिली आणि महसूल म्हणून वसूलीचा (धान्याचा) एक अष्टमांश इतका हिस्सा ठरवून देण्यात आला._

_*दुसरा अनुवाद राधाकुमुद मुखर्जी यांनी 'अशोक' या पुस्तकात केलेला* 'देवताओं के प्रिय प्रियदर्शी राजाने अभिषेक के बीसवे वर्ष में यहाँ आकर पूजा की क्योंकि यहाँ बुद्ध शाक्यमुनि का जन्म हुआ था। यहाँ एक शिला-विग्रह बनवाया और एक पत्थर का स्तंभ भी लगवाया कि भगवान यहाँ जन्मे थे। लुमिनी ग्राम को अपवलिक किया और अष्टभागिक किया। (अर्थात इस गाँव से कोई बलि धार्मिक कर नहीं लिया जाएगा और उपज का आठवाँ भाग कर लिया जाएगा।)_

_*तिसरा अनुवाद डॉ. मिना तालिम यांचा 'Edicts of king Asoka a new Vision' या पुस्तकात केलेला,* जो पालि भाषेला अनुसरून आहे. त्यांनी प्रथम धम्माशोकाचा ब्राम्ही लिपितील लेख देवनागरी लिपीत पालि भाषेत लिप्यांतरीत केला व नंतर त्याचे भाषांतर केले. ते खालीलप्रमाणे आहे._

*_देवानंप्पियो पियदस्सि राजिना वीसतिवस्साभिसित्तेन अत्तनो आगतोः महिंया इथ बुद्धो जातो सक्कमुनि 'ति सिलावङ्गुकीमि च कारापिता सिलाथम्मो च उस्सापिता। इध भगवा जातो इति लुम्बिनीगामे उबलिं कता अट्ठभागे च।_*

1. Piyadassi, the beloved of the God, twenty years after the consecration.

2. has come to this land in person as Buddha, the Sakya sage was born here, on this earth.

3. He raised here a stone pillar made by (stone-carpenter) sculptors.

4. Here the Lord was born, therefore the taxes of Lumbini village, Up to eighth (share) has been exempted.

_*देवाचा प्रिय प्रियदर्शि राजा, राज्याभिषेकाला वीस वर्षे झाल्यानंतर तो स्वतः त्या बुद्ध शाक्यमुनिच्या जन्मस्थानी आला. त्याने येथे मुर्तीकाराकडून (सिलाव की स्टोन कारर्पेन्टर) दगडी स्तंभ उभारुन घेतला. येथे भगवान बुद्धाचा जन्म झाला म्हणून लुंबिनी या गावाला करातून सूट दिली आणि महसूल म्हणून वसूलीचा (धान्याचा) एक अष्टामांश इतका हिस्सा ठरवून दिला.*_

_या तीनही उदाहरणावरुन आपल्याला असे दिसेल की, तिसरा अनुवाद पहिल्या दोन अनुवादापेक्षा वेगळा आहे. त्याला कारण म्हणजे त्या काळात अभ्यासकांनी पालि भाषेला प्राकृत भाषा समजून त्या लेखांचा अर्थ लावण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे भाषेच्या दृष्टीने या स्तंभलेखाचा कसा अर्थ लावला गेला या संदर्भात डॉ. मीना तालिम यांनी वेगवेगळ्या विद्वानांच्या मतांचा *Edicts of king Ashoka a new Vision'* या पुस्तकात बराच उहापोह केला आहे. तो आम्ही येथे करीत नाही पण तो ही अभ्यासनीय आहे. *या उदाहरणावरुन आपल्याला दोन गोष्टी समजतात. एक म्हणजे भगवान बुद्ध हे पौराणिक देवता नसून ते एक ऐतिहासिक पुरुष आहेत आणि दुसरे म्हणजे पालिभाषा ही प्राकृत भाषा नसून स्वतंत्र भाषा आहे. यावरून पालि साहित्याच्या संशोधनाची आणि अभ्यासाची अजूनही किती आवश्यकता आणि उपयोगिता आहे याची आपल्याला जाणीव होते.*_

*_२. बुद्धधम्माचा भारतामध्ये आणि इतर देशातील जनतेवर परिणाम :-_*

_बुद्धाच्या धम्माचे यथार्थ ज्ञान करून देणारे सर्वात प्राचीन वाङ्‌मय जर कोठे उपलब्ध असेल, तर ते पालि भाषेत आणि पालि साहित्यातच आहे. त्यामुळे हे स्पष्टच आहे की, अमूल्य अशा प्राचीन वाङ्‌मयाची एक मोठी खाण म्हणजेच पालिभाषा आणि साहित्य होय. या संदर्भात *पी. व्ही. बापट यांनी 'पालिभाषा प्रवेश' या व्याकरणाच्या पुस्तकाला लिहिलेल्या 'पुस्तकात' असे म्हटले आहे की, 'बुद्धधम्माचा संपूर्णपणे अभ्यास करु इच्छिणाऱ्यास ह्या भाषेच्या साहित्याच्या अभ्यासाची फार जरुरी आहे. एवढेच नव्हे, तर बुद्धधम्माचा भारताबाहेरील इतर देशातील जनतेवर काय परिणाम झाला हे जाणणाऱ्यांसही पालि साहित्याच्या ज्ञानाची आवश्यकता आणि उपयोगिता आहेच.*_

*_३. पाली भाषा आणि साहित्य :-_*

_भगवान बुद्धांनी आपल्या धम्माच्या उपदेशासाठी पालि भाषेचा उपयोग केला तेव्हा या भाषेला साहित्यक्षेत्रात स्थान प्राप्त झाले आणि तेव्हापासून या भाषेच्या साहित्याची परंपरा सुरु झाली असे म्हणता येते. तसे पाहिल्यास या भाषेचा पिंडच मुळी सुगम, सोप्या, सरळ साधेपणात आहे. तसेच ती लोकप्रिय असल्यामुळे जनसामान्य लोकांमध्ये बोलली जात होती. ती प्रगतिशील मानव समाजाबरोबर आपले रंग-रूप बदलत गेली. तिने मागधीचे रूप धारण केले. *'ज्याला आपण बुदधकालीन मागधी असे म्हणतो, तिच नंतर पालि, मागधी, तन्ति वगैरे नावाने ओळखली जाऊ लागली. या मागधीने भविष्यातील साहित्यात आपले एक विशिष्ट स्थान निर्माण केले. भगवंतांनी आपल्या भिक्खू संघाला तर स्पष्टपणे या आपआपल्या बोलीभाषेत बुद्धवचनाचा उपदेश करण्याची अनुमती दिली होती.*_

_तेव्हापासून क्रमशः पालिभाषा साहित्याचे भंडार वाढतच गेले आहे. धम्मासोकाच्या काळात बौद्धधम्म आणि या भाषेचे साहित्य आपल्या विकासाच्या अतिशय उच्च अशा अवस्थेला पोहचले होते. यावरुन स्पष्ट होते की, साहित्यिक भाषा म्हणून पालि (मागधी) भाषेच्या संपूर्ण साहित्याची निर्मिती भगवान बुद्धांच्या काळापासून सुरु झाली. अतः पालि साहित्याचा काळ सुद्धा बुद्धकाळापासून आरंभ होतो असे म्हटल्यास चूक होणार नाही. भगवान बुद्धानंतर सुद्धा पालि भाषेत बौद्ध विद्वानांनी वेगवेगळ्या विषयावर विपुल साहित्याची रचना करून हे साहित्य अधिक समृद्ध केले. या विषयाची माहिती सुरुवातीलाच घेतली आहे. एवढेच नव्हे तर या भाषेत काव्य निर्माण करून महाकविंनी आपल्या अनुपम प्रतिभेचा उत्तम परिचय करून दिला आहे. संस्कृत भाषेच्या नाटकात सुद्धा या भाषेचा खूप वापर दिसून येतो. तसेच *पालि भाषेतून ज्या वर्तमान भारतीय भाषांची उत्पत्ती झाली आणि त्या भारताच्या वेगवेगळ्या भागात बोलल्या जातात, त्या सर्व भाषांचे साधारण नाव 'प्राकृत' असे आहे.* या सर्व भाषा प्राकृताच्या उपभाषा मानल्या जातात. परंतु प्रदेश किंवा काळाच्या विभिन्नतेच्या कारणाने यामध्ये वेगवेगळे भेद दिसून येतात. म्हणून आजसुद्धा या भाषांबरोबर विद्वानांकडून प्राकृत शब्दाचा वापर केला जातो. (जसे-अर्धमागधी प्राकृत, महाराष्ट्री प्राकृत, अपभ्रंश प्राकृत, हिन्दी प्राकृत इ.) पालि भाषेतून वेगवेगळ्या भाषांची जरी निर्मिती झाली असली, तरी या भाषेत रचलेल्या तिपिटकाचे भारतीय साहित्यामध्ये स्वतःचे विशेष असे महत्त्वाचे स्थान आहे. त्याशिवाय नवाङ्गसासन व त्याचे प्रकारसौंदर्य या सर्वांचा विचार करणे आणि पालि वाङ्‌मयातील प्रत्येक ग्रंथाचे मूल्यमापन करणे हा सुध्दा संशोधनाचा आणि अभ्यासाचा एक महत्त्वाचा विषय म्हणून पालि भाषेकडे पाहणे अगत्याचे ठरते._

*_४. भाषा विज्ञान आणि भाषा शास्त्र:-_*

_प्राचीन भारतीय साहित्याच्या दृष्टीने पालिभाषेचे ज्ञान, भाषाविज्ञान जगातील प्राचीन भाषांबरोबर तुलनात्मक अध्ययन करण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. म्हणून *पालि भाषेच्या अंगाने भाषा विज्ञान व तुलनात्मक भाषा विज्ञान तसेच भाषा विज्ञानाचे अंग जसे (१. ध्वनी Sound २. पद किंवा शब्द Form ३. वाक्य Sentence ४. अर्थ Meaning) यांचा पालि भाषेचा उगम, विकास व त्याचा चार पोटभाषांशी (dialects) असलेला संबंध पहाणेही जरुरीचे आहे. असा अभ्यास प्रा. मेहंदळे नंतर कुठेही केलेला दिसत नाही. म्हणून पालि भाषेच्या अभ्यासकाने या अंगाने विचार केल्यास एक नविन अभ्यासाचे दालन खुले होईल.*_

*_५. पालि भाषेचे व्याकरण :-_*

_पालि भाषेचे स्वतंत्र असे व्याकरण आहे. त्यामुळे पालि भाषेचे व्याकरण हा एक वेगळाच अभ्यासाचा विषय असणे आवश्यक आहे. *पालि भाषेत कच्चायनः मोग्गल्लान, रुपसिध्दि आणि सद्दनीति हे व्याकरण ग्रंथ सुप्रसिद्ध आहेत.*_

*_६. अनुवाद आणि लिप्यांतर :-_*

_अनुवाद: पालि भाषेतील वाङ्‌मयाचा इतर भाषांमध्ये आणि मराठीत अनुवाद करणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी पालि भाषेवर प्रभुत्व मिळविणे आवश्यक आहे. हे कार्य पालि टेक्स्ट सोसायटी, लंडनच्या प्रमाणे एक मंडळ स्थापून व निदान चार-पाच विद्वानांनी एकत्र येऊन असा अभ्यास केला पाहिजे व अनुवादित पुस्तके छापली पाहिजेत. जसे धम्मपदाचा जगातल्या अनेक भाषेत अनुवाद दिसून येतो. त्यामुळे पालि भाषेचा अनुवादाच्या अंगाने अभ्यास करणे सुध्दा पालि साहित्याच्या अभ्यासकांस उपयोगी आहेच._

_*लिप्यांतर :- विपस्सना रिसर्च इन्टिट्यूट, धम्मगिरी, इगतपुरी यांनी तिपिटक अट्ठकथा आणि वंश साहित्याचे व काही इतर ग्रंथांचे १४ लिपिंमध्ये लिप्यांतर करुन काही प्रमाणात हे काम केले असले तरी आज सुध्दा पालि भाषेचे जगातल्या वेगवेगळ्या लिपिमध्ये लिप्यांतर करण्याचे काम बाकी आहे.* त्यासाठी अनेक ग्रंथ अजूनही लिप्यांतराच्या प्रतीक्षेत आहेत. ते संशोधकांना आणि अभ्यासकांना खुणावत आहेत._

*_७. बौध्दधम्माचा सखोल अभ्यास :-_*

_याचे दोन भाग पाडता येतील. 

*_अ) श्रमणांसाठीचा धम्म व ब) उपासकांसाठीचा धम्म_*

_त्यांचे नियम, ध्येये, उपासना, आचार इ. सर्व गोष्टीचा अभ्यास ध्यान, समय व विपस्सना यांचा विचार या दृष्टीने देखील आपणाला त्याचा अभ्यास करता येईल._

*_८. बुद्धांचे तत्वज्ञान :-_*

_जगात माणसाला सांसारिक गोष्टीचा विचार करणे जेवढे आवश्यक आहे. त्याहीपेक्षा पारमार्थिक गोष्टीचा विचार करणे अत्यंत आवश्यक आहे. शरीराला झालेल्या जखमा औषधाने बऱ्या करता येतात, परंतु मनुष्याच्या मनाला झालेल्या जखमा मात्र तत्त्वज्ञानरुपी औषधाशिवाय इतर औषधांनी बऱ्या करता येत नाहीत. म्हणून तत्त्वज्ञानाचा नेहमी जगात उदो उदो होतो. म्हणूनच बुद्धांचे तत्वज्ञान विषयक धोरण पालि भाषेतून अवगत करणे. *पञ्चसिल, अट्टङ्गिकोमग्गो, पटिच्चसमुप्पाद, दुक्ख, अनत्त, अनिच्चता, कम्म, पुनभव या वेगवेगळ्या तत्त्वज्ञानाधिष्ठित प्रणालीचा अभ्यास करणे जरुरीचे आहे.*_

_दुसरे म्हणजे प्राचीन भारतीय तत्त्वज्ञानाचा बौद्ध तत्वज्ञानावर झालेला परिणाम व बौद्धधम्माचा प्राचीन भारतीय तत्त्वज्ञानातील प्रणालीवर झालेला परिणाम या सर्वांचा विस्तृतपणे अभ्यास करणे हे तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने हितावह आहे._

*_९. पुरातत्व व प्राचीन वस्तुंचा अभ्यास :-_*

_पुरातत्त्वशास्त्राचा पायाभूत आधार म्हणजे उत्खनन होय. हे शास्त्र अलीकडेच विकसित झाले असले तरी यामधून प्राचीन सांस्कृतिक इतिहासाची फार मोठ्या प्रमाणात उकल होण्यास मदत झाली आहे. *पुरातत्त्वाचा सर्वात मोठा भाग हा बौद्धकालीनच आहे.* उत्खननामधून या संदर्भात अनेक उ‌द्बोधक पुरावे हाती लागतात. तथापि भौतिक विकासाचे आरेखन अद्याप शास्त्रशुद्ध नाही आणि *इतिहासलेखन व ऐतिहासिक पुरातत्त्व यात म्हणावा तसा सुसंवाद अद्याप प्रस्थापित झालेला नाही.*_

_तो प्रस्थापित व्हावा व प्राचीन भारतातील सापडणाऱ्या लेण्या, विहार, स्तूप, चैत्य, धम्माशोकाचे शिलालेख आदी सर्वांची नोंद या विषयांतर्गत येत असते. त्यामुळे पालि भाषेत लिहिले गेलेले भाष्य यासाठी फार मोलाचे ठरते._

*_१०. सांकेतिक चिन्ह योजना :-_*

_बौद्धकला आणि स्थापत्यामध्ये सांकेतिक चिन्हांचा वापर फार मोठ्या प्रमाणात झाल्याचे दिसून येते. त्यावरून त्यांचे महत्त्वही अधोरेखित होतेच. पण ही सांकेतिक चिन्हे बौद्धकला आणि स्थापत्यामध्ये आली कोठून, याचा जर आपण विचार केला. तर आपल्याला त्यासाठी पालि साहित्याकडेच वळावे लागते. कारण की, भगवंताच्या जीवनात ज्या अनेक महत्त्वाच्या घटना घडल्या त्या घटनांचे वर्णन पालि साहित्यातच पाहायला मिळते. त्या घटनांवरुनच नंतर महत्त्वाची सांकेतिक चिन्हे निर्माण झाल्याचे दिसूत येते. त्या चिन्हाचा नेमका अर्थ जाणून घेण्यासाठी पालि भाषेचे ज्ञान महत्वाचे ठरते. यावरुन आपण असे म्हणू शकतो की, सांकेतिक चिन्हांची उत्पत्ती सुद्धा पालि वाङ्‌मयातूनच झाली असावी व त्यावरुन नंतर शिलालेख, मूर्तीशास्त्र व नाणेशास्त्र या सारख्या शास्त्रांचा विकास झाला असावा._

_पालि वाङ्‌मयात *वक्कलीसुत्त आणि महापरिनिब्बान सुत्तामध्ये* या सांकेतिक चिन्हाच्या उत्त्पतीचे संकेत भगावान बुद्ध आणि वक्कली थेर यांच्या संवादात मिळतात. वक्कली थेर अत्यंत आजारी होते. ते चालू शकत नव्हते. त्यांना भगवान बुद्धांना बघण्याची इच्छा झाली होती. त्यामुळे त्यांनी दुसऱ्या एका भिक्खूजवळ भगवंताला निरोप पाठविला. भगवंत त्यांच्या भेटीसाठी गेले. तेव्हा वक्कली थेरांनी भगवंतना म्हटले, 'भन्ते आपणाला बघण्याची खूप दिवसांची इच्छा होती. पण अतिशय आजारी असल्यामुळे आणि शरीरात शक्ती नसल्यामुळे भेटीला येऊ शकलो नाही. तेव्हा भगवंतानी वक्कली थेराला म्हटले_

 *'अयं, वक्कली, कि ते इमिना पूतिकायेन दिट्ठेन? यो म पस्सति सो धम्मं पस्सति धम्मञ्हि, वक्कली, पस्सन्तो मं पस्सति, मं पस्सन्तो धम्मं पस्सति ।

_'पूरे वक्कली? काय या घाणेरड्या शरीराला पाहतोस? जो मला पाहतो, तो धम्माला पाहतो, वक्कली जो धम्माला पाहतो तोच मला पाहतो. मला पाहतानाच धम्माला पाहतो.' अशाप्रकारे बुद्ध म्हणजे सांकेतिक अर्थाने धम्म होय._

_तर दुसरे उदा. *महापरिनिब्बान सुतामध्ये भगवान बुध्द आणि आनंद थेर यांच्या संवादात मिळते.*_

_भगवंताच्या महापरिनिब्बानाच्या वेळी आनंद थेर त्यांना विचारतात, तथागताच्या शरीरासंबंधी आम्ही काय करावे ? तेव्हा तथागताने आनंदाला म्हटले *'हे, आनंद, चक्रवर्ती राजाच्या शरीराचे जे करतात, तेच तथागताच्या शरीरासंबंधी करावे. 'चातुमहापथे तथागतस्स थूपो कातब्बो ?' चौरस्त्यावर (चौकात) तथागताचा स्तूप करावा.* त्यामुळे त्याकाळी गावाच्या बाहेर असलेले चैत्य हे बुद्धांच्या महापरिनिब्बानानंतर चौकात निर्माण करायला सुरुवात झाली. *बुध्द म्हणजे सांकेतिक अर्थाने स्तूप होय. अशा अनेक सांकेतिक चिन्हांचा वापर धम्मासोकाच्या काळात आणि त्या नंतरही मोठ्या प्रमाणात करण्यात आला. बुद्धांचे सांकेतिक चिन्ह म्हणून सिंह, बोधिवृक्ष, पादचिन्ह, स्तूप इ. पालि वाङ्‌मयात, स्तंभावर, नाण्यावर आणि लेण्यांमध्ये दिसून येतात. अशा अनेक सांकेतिक चिन्हांचा अजूनही उलगडा झाला नाही तो ही संशोधकांना आकर्षित करणारा आहे.*_

_*शिलालेख :- शिलालेख, मूर्तीशास्त्र व नाणेशास्त्र* या तिन्ही विषयांसाठी पालि वाङ्‌मयाचा फारच उपयोग होत असतो. अशोकाचे शिलालेख तर पालि भाषेच्या अत्यंत जवळचे आहेत. इतर शिलालेखातील भाषा संस्कृत-पोटभाषा व पालि यावर आधारित आहेत._

_*मूर्तीशास्त्र :-* मूर्ती, मग त्या दगडातून कोरलेल्या असोत वा धातू निर्मित असोत वा मातीच्या, त्यांचा अभ्यास करतानाही पालि भाषेची मदत लागते. कारण गांधार, मथुरा आणि सारनाथ, मूर्तीकला ही त्या काळी बौध्द मूर्तीकलेची केन्द्रे होती. या केन्द्रांमधून मूर्तीकलेचा प्रसार झाला. आजही मूर्तीकारांसाठी या मूर्ती प्रेरणास्थान आहेत. त्यापासून खूप शिकावे असे त्यात भरपूर आहे._

_*नाणेशास्त्र :-* नाणेशास्त्राचा अभ्यास करतानाही पालिभाषेची फार मदत होत असते. कारण *नाण्यावर बैल, हत्ती, सिंह, मानव, वृक्ष, अश्व, चक्र इ. चिन्हे आहेत यांचा योग्य अर्थ लावणे आवश्यक आहे. नाही तर आज नाणेशास्त्राचे योग्य ज्ञान नसल्यामुळे किंवा माहिती नसल्यामुळे बुध्दांच्या पाचचिन्हाचा (नंदीपद) व महामायादेवीचा गर्भ मंगल समारंभ ज्याला (गजलक्ष्मी) असे म्हणण्यात येते, अशी अनेक चिन्हे असणारी नाणी आहेत की ज्याचा अभ्यास पालि वाङ्‌मयाच्या दृष्टीने प्रकाशित करण्याची आवश्यकता आहे.*_

*_११. भिंत्तीचित्रे व चित्रकला :-_*

_तत्कालीन उत्कृष्ट भिंतीचित्रे ही मुख्यतः अजंठा, बाग इ. लेण्यांमध्ये सापडतात. ही सर्व चित्रे जातक कथा. महावग्ग किंवा निकायांवरील घटनात्मक गोष्टीवर चित्रित केली गेली आहेत. त्यामुळे पालि भाषेच्या आधारे आपण त्यांचे अचूक निदान करु शकतो. आजच्या चित्रकारांनी सुध्दा खूप शिकावे असे त्यात भरपूर आहे._

*_१२. स्थापत्य व शिल्पकला :-_*

_प्राचीन भारतातील ही कला सर्व देशभर पसरलेली आहे व ती कानाकोपऱ्यात पसरलेली आहे. ती बहुतांशी बौद्ध स्थापत्य शिल्पकला आहे. *स्तूप, चैत्य वा विहार यांची योजना कशी करावी हे सुद्धा आपल्याला विनय पिटकात आढळते.* अभ्यासकांना याचे सुद्धा आकर्षण आहेच._

*_१३. तत्कालीन सामाजिक जीवन आणि बौद्ध धम्म :-_*

_प्राचीन भारतीय समाज कसा होता, त्याची रचना कशी होती, त्यात राहणारे लोक, त्यांच्या सामाजिक समस्या, जात, धर्म, स्त्रियांचे स्थान वगैरे अनेक गोष्टींचा उहापोह आपल्याला विशेष करून निकायामध्ये आढळतो. त्याचा अभ्यास व्हायला हवा. कारण प्राचीन भारतातील समाजाच्या संदर्भात बौद्धधम्म हा केवळ दुसरा एखादा धर्म नव्हता. तर वैयक्तिक श्रद्धेपासून, सामाजिक कल्पनांपर्यंत जीवनाच्या विविध अंगामध्ये बदल घडवून आणू पाहणाऱ्या एका व्यापक चळवळीचा तो एक परिणाम होता. मोठ्या प्रमाणावर आविष्कृत झालेले ते एक सामाजिक बौद्धिक आंदोलन होते. समकालीन विचार व जीवन यांत ते प्रतीत होत होते. आज आपल्याला ते दिसत नाही. त्यामुळे त्याचा कशामध्ये लोप झाला किंवा ते कशामध्ये लुप्त झाले, याचाही शोध घेणे पालि साहित्याच्या अभ्यासकाला आवश्यक आहे. कारण त्यामुळे काळाच्या आड गेलेले तत्कालीन सामाजिक जीवन आणि बौद्धधम्म याची खऱ्या अर्थाने वर्तमानाशी सांगड घालणे अभ्यासकास शक्य होईल._

*_१४. दागिन्यांची रचना :-_*

_*संपूर्ण भारतात एकंदर १२००च्या वर लेण्या आहेत. पैकी एकट्या सह्याद्रीमध्ये ९०० च्या वर लेण्या आहेत. यावरून महाराष्ट्रातील लोकांची संपन्नता, त्यांची कलाभिरुची व त्यांची खोदण्याची पद्धती, शिल्परचना या संबंधीचा सौंदर्यविषयक दृष्टिकोन दिसून येतो. तसेच शिल्पालंकरण, मग ते शिल्पावरील असो वा भिंतीचित्रावरील, त्यावरील दागिने अतिशय नाजूक सौंदर्यसंपूर्ण, मनमोहक व रेखीव असेच आहेत. ही सर्व शिल्परचना व चित्रे जातक कथा, महावग्ग किंवा निकायावरील घटनात्मक गोष्टीवर चित्रित केली गेली आहेत. सध्याच्या काळात Jewellery De-sign ला जगभरात महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यासाठी शिल्पावर वा भिंतीचित्रावर चित्रित दागिण्यावर अभ्यासाचा सुद्धा उपयोग होऊ शकतो.*_

*_१५. ध्यान (समाधिमार्ग) :-_*

_*समाधिमार्ग फार प्राचीन आहे. तो भगवंताच्या पूर्वी देखील अस्तित्वात होता. आलार कालाम आमि उद्दक रामपुत्त हे दोघे समाधिमार्गाचे पुरस्कर्ते होते व त्यांचा पंथ कोसल देशात बुद्धसमकालीन अस्तित्वात होता. बोधिसत्वाने कालामाच्या आणि उद्दक रामपुत्ताच्या आश्रमात जाऊन समाधीचा अभ्यास केल्याचे आपल्याला पासराशी सुत्तावरूनच दिसून येते. पण हा जुना समाधिमार्ग कशा प्रकारचा होता? याचे विस्तृत वर्णन कोठेहि सापडत नाही. कालामादिक योगी केवळ ध्यानाला महत्व देत असत. त्या ध्यानमार्गाच्यावतीने चित्ताची एकाग्रता स्थापित करणे हेच त्यांचे ध्येय होते. भगवंतानी समाधीच्यायोगे आपल्या कुशल मनोवृत्ति वृद्धिंगत करुन व तृष्णेचा नाश करुन सामान्य जनसमूहाचे हित साधण्यास आपण समर्थ होतो ती समाधी होय. याच समाधीचा भगवंताने अरियो अट्ठङ्गिगकोमग्गोमध्ये समावेश केला आहे. प्राणायामाची पद्धती भगवंतानी कायम ठेवली खरी. पण त्यात आपल्या तत्वज्ञानाला अनुकूल असे पुष्कळ फेरफार केले आहेत. मेत्ता, करुणा, मुदिता, उपेक्खा यांना तर भगवंतानी महत्त्व आणले आहे असे म्हणण्यास हरकत नाही. अभिभायतनाच्यायोगे (कसिणे) सृष्टिसौंदर्यावर ध्यान करण्याचा प्रकारही बुद्धांनीच प्रचलित केला आणि समाधिमार्गात विविधता आणली. या शिवाय जगाच्या अनित्यतेवर ध्यान करण्याचा व त्याद्वारे समाधि साधण्याचा प्रकार केवळ बौद्ध वाङ्‌मयातच सापडतो.* इतर समाधि क्षणभर विश्रांती मिळण्यासाठी आहेत. आज देखील जगभर भारतदेश समाधीमार्गा विषयी फार प्रसिद्ध आहे व सध्या या देशात त्याचे पुनर्जीवन होऊ पाहत आहे. तसेच पाश्चात्य देशांत सुद्धा विशेष महत्व मिळत आहे. त्यामुळे या विषयाकडे लोकांचा कल अधिकाधिक वाढत आहे. पालि भाषेत लिहिले गेलेले साहित्य यासाठी फार उपयोगाचे ठरते._

*_१६. पर्यावरण :-_*

_आजच्या परिस्थितीत पर्यावरणाला व त्याचा समतोल राखण्याला महत्त्व प्राप्त झाले आहे. *पालि वाङ्‌मयात विशेषतः विनयपिटक आणि पाचही निकायात तसेच जातक कथामध्ये पर्यावरणाच्या संबंधाने अनेक बाबींचा उहापोह आढळतो.* एवढेच नाही तर भगवान बुद्धाचे गृहत्यागानंतरचे संपूर्ण आयुष्य हे निसर्गाच्या सान्निध्यात गेले आहे. तसेच थेर आणि थेरी हे देखील नगरापासून जवळच असलेल्या अरण्यात राहत असत त्याला *'नगरस्मा नाती दूर नाति संन्तिके विहरन्ति' म्हणजेच 'नगरापासून जास्त दूरही नाही आणि जवळही नाही असे ते राहत असत.* त्या काळी भगवंताचा खूप मोठा भिक्खूसंघ होता. तेव्हा त्यांनी पर्यावरणाचा समतोल कसा राखला असावा त्याचा ही अभ्यास होणे गरजेचे आहे._

*_१७. बौद्धसंस्कृती :-_*

_*बुद्धधम्म एकेकाळी सांस्कृतिक दृष्टीने महत्त्वाचा असून त्याच्या छत्राखाली तत्कालीन विद्या आणि शास्त्र, तत्वज्ञान आणि वाङ्‌मय, नीतिशास्त्र आणि समाजधारणा, ही सर्व एकत्र नांदत होती असे आपल्याला दिसते. त्यामुळे बुद्धधम्म केवळ त्याचा संप्रदाय आणि त्याचे अनुयायी एवढ्यापुरताच संकुचित होता असे नव्हे. त्या काळी बुद्धधम्माने स्वतःचा विचार व संस्कृती यांची कायमची छाप मारल्यावाचून त्या धम्माचा एकदम इतका विस्तार होणे संभवत नाही. म्हणून 'बौद्धभारत' असा शब्दप्रयोग करणे किंवा बौद्धविचार व संस्कृती हीच भारतीय विचार व संस्कृती होय असे विधान करणे उचित ठरणार नाही. कारण बुद्धोत्तर भारतीय वाङ्‌मयावर बौद्धधम्म व तत्त्वज्ञान याचा अतिशय पगडा बसलेला स्पष्ट दिसतो. यादृष्टीने सुद्धा बुद्ध काळापासून इ.स. १००० ते १५०० वर्षे संपूर्ण जम्बुद्धिपावर बौद्ध धम्माचा मोठा प्रभाव असल्याचे स्तुप, लेण्या, मोठ मोठी विहारे, बुद्धाच्या मोठमोठ्या मूर्ती अवशेषाच्या रुपाने संपूर्ण भारतभर आजही पहायला मिळतात. म्हणूनच ऱ्हिस डेव्हिड यांना Buddhist India हे पुस्तक लिहावे लागले. परंतु धम्मशोकाच्या साम्राज्याची अवनती व विनाश, राजा कनिष्काच्या आश्रयाने काश्मीरात झालेला बुद्धधम्माचा प्रसार, किंवा धम्माशोकाच्या राज्याचे नाव असो जो मगधप्रांत त्यापर्यंत किंवा सभोवार झालेली बुद्धधम्माची पिछेहाट यासंबंधी आपल्याला फारच बेताची माहिती आहे. बुद्धधम्माला उतरती कळा लागल्यावर त्या काळात निर्माण झालेली बौद्ध संस्कृती भारतामध्ये आज कोठे आहे? याचा थांगपत्ता लागत नाही. याचा शोध घेणे अभ्यासकांसाठी गरजेची बाब आहे. कारण भारतात उत्पन्न झालेला बौद्धधम्म भारतातूनच नामशेष झाला. त्याचे पुनर्जीवन करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महाराष्ट्रात पुन्हा येथील जनतेला तो दिला व त्याचे पुनर्जीवन केले. तसेच आचार्य गोयंका गुरुजीनी विपस्सनेच्या माध्यमातून परत या देशात ध्यान साधना आणली आणि या दोन्हीचे पुनर्जीवन केले. आता बौध्द संस्कृतीचे पुनर्जीवन करावयाचे आहे. कारण आज येथील बौद्धाचे सण किंवा संस्कृती कोणती? तर १४ एप्रिल डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म दिवस, १४ ऑक्टोबर- विजयादशमी, धम्मचक्क प्रवत्तन दिन हे तर सोहळे म्हणून बाबासाहेबांच्या सन्मानार्थ व्हायलाच पाहिजेत. पण बौद्धांचे सण किंवा संस्कृती म्हणजे केवळ बुद्ध जयंती. वर्षावास समारोह एवढीच बौद्ध संस्कृती आहे काय? तर सांगायचा मुद्दा हा की एवढी उज्वल परंपरा असलेली आपली बौद्ध संस्कृती गेली कुठे? याचे संशोधन आणि अभ्यास करुन पूर्वीची उज्वल परंपरा परत निर्माण करण्याचे आव्हान निश्चितच आहे.*_

*_१८. वैदिक भाषा आणि पालि भाषा तौलनिक अभ्यास :-_*

_*'वैदिक भाषेला सर्वात जवळ असलेली अशी कोणती भाषा असेल तर ती पालिभाषा होय.' असे पी. व्ही. बापट यांनी 'पालिभाषा प्रवेश' या व्याकरणाच्या पुस्तकाला लिहिलेल्या 'पुरस्कारात' म्हटले आहे.* तेव्हा वैदिक भाषा आणि पालि भाषा तौलनिक अभ्यास करून पालि भाषा ही स्वातंत्र्य भाषा कशी आहे हे सिद्ध करण्याचे आव्हानसुद्धा आहेच._

*_निष्कर्ष :_*

_- अशा अनेक विषयांच्या दृष्टीने पालि साहित्याचे संशोधन आणि अभ्यास केल्याने तो पालि साहित्याच्या विकासासाठी महत्त्वाचा आधार ठरेल._

_- इतिहासाच्या दृष्टीने अनेक सत्य घटनांवर प्रकाश पडेल. कारण हे साहित्य श्रमणांनी लिहिलेले आहे. त्यामुळे पालि साहित्यात कल्पना विलास नसून ते सत्यावर आधारित आहे._

_- पालि वाङमयातील प्रत्येक ग्रंथाचे मूल्यमापन करणे हा सुध्दा संशोधनाचा आणि अभ्यासाचा एक महत्त्वाचा विषय म्हणून पालि भाषेकडे पाहणे अगत्याचे ठरते._

_- बुद्धधम्माने स्वतःचे विचार व संस्कृती याची कायमची छाप मारल्यावाचून, त्या धम्माचा एकदम इतका विस्तार भारतात आणि भारताबाहेर होणे संभवत नाही. म्हणून बुद्धोत्तर भारतीय वाङ्‌मयावर बौद्धधम्म व तत्त्वज्ञानाचा अतिशय पगडा बसलेला स्पष्ट दिसतो. त्याची उकल करता येईल._

_- भारतामध्ये लुप्त झालेली बौद्ध संस्कृती पुन्हा विकास पावू शकेल._

_- लिप्यांतर आणि भाषांतराच्या कामाला गती येईल. पर्यावरणाचा अभ्यास करता येईल._

_- पाली भाषेचा इतर भाषांशी तौलनिक अभ्यास करता येईल._

_अशा अनेक विषयांच्या दृष्टीने पालि साहित्याचे संशोधन आणि अभ्यास केल्याने पालि साहित्य आपल्याला व सर्व जगाला हितावह आणि सुखावह आहे. म्हणूनच पालि साहित्य सुधारलेल्या देशात आश्चर्यकारक वाटल्यामुळे अमेरिका व युरोपातील इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी वगैरे देशातील नामांकित विद्यापीठातून पालि साहित्याचा अभ्यास मोठ्या आस्थेने केला जातो. तर श्रीलंका, ब्रह्मदेश, सयाम, कंम्बोज, तिबेट, चीन, जपान या ठिकाणच्या लोकांनी त्याच्या उपयोगितेमुळे संशोधन, अध्ययन, अध्यापन मोठ्या भक्तीने सुरु केले आहे._

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

*_लेखक :- *_प्रा. विनोद भेले_*

       *_सिध्दार्थ महाविद्यालय, मुंबई_*

*_संकलन :- महेश कांबळे_*

*_दिनांक :-_* २२/०४/२०२५

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

Sunday, 20 April 2025

काषाय वस्त्राचा अधिकारी कोण?

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

*_काषाय वस्त्राचा अधिकारी कोण?_*

*_देवदत्तची कथा_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2025/04/blog-post_20.html

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

_एके समयी अग्रश्रावक सारिपुत्त आणि महामोग्गगलान आपल्या भिक्षु संघासोबत राजगृहामध्ये चारिकेकरिता निघाले. राजगृहवासी त्यांना दोन, तीन किंवा मोठ्या समूहाने दान देऊ लागले. तेव्हा भन्ते सारिपुत्तांनी त्यांना दानाची महिमा समजावताना सांगितले की,_ 

*_१) एखादी व्यक्ति अगर स्वतः दान तर करते, परंतु दुसऱ्यांना दान करण्यासाठी प्रेरित करीत नाहीः तर ती व्यक्ति पुढल्या जन्मी स्वतः तर सुख ऐश्वर्य प्राप्त करते परंतु परिवार किंवा संपत्ती प्राप्त करू शकत नाही._*

*_२) एखादी व्यक्ति स्वतः तर दान करीत नाही परंतु दुसऱ्यांना मात्र दान देण्यासाठी प्रेरित करते. ती व्यक्ति पुढल्या जन्मी परिवार-संपत्ती प्राप्त करते, परंतु स्वतः कोणते सुख-ऐश्वर्य प्राप्त करू शकत नाही._*

*_३) जो व्यक्ति स्वतः सुद्धा दान देत नाही किंवा दुसऱ्यांना दानासाठी प्रेरित करीत नाही, असा मनुष्य पुढल्या जन्मी कोणते परिवार-संपत्तीचे सुख भोगू शकत नाही किंवा स्वतः कोणते सुख-ऐश्वर्य भोगू शकत नाही. त्याला भोजनसुद्धा प्राप्त करणे महाकठीण होऊन जाते._*

*_४) याच्या ऐवजी चौथ्या प्रकारचा माणूस तो असतो, की जो स्वतः देखील दान देतो आणि दुसऱ्यांनासुद्धा दान देण्यासाठी प्रेरित करतो. असा माणूस पुढल्या जन्मी स्वतः शेकडो, हजारो पटीने सुख-ऐश्वर्य प्राप्त करतो आणि त्याचबरोबर तेवढ्याच प्रमाणात परिवार-संपत्ती सुद्धा मिळवतो आणि या सुखोपभोगांचा सदुपयोग सुद्धा करतो._*

_दानाची महिमा ऐकून एक समजदार माणसाने विचार केला, 'दानाची महिमा मोठी अपरंपार आहे. भिक्षु संघाला भोजनासाठी का बरे बोलावू नये?' असा विचार करून त्याने भिक्षु संघाला आपल्या निवासस्थानी दुसऱ्याच दिवशी भोजनाकरिता निमंत्रित केले आणि घरोघर फिरून लोकांकडून दान घेतले, जेणे करून भोजनाचा प्रबंध चांगल्या प्रकारे होऊ शकेल. एका श्रीमंत व्यक्तिने त्या उपासकाला एक अत्यंत मौल्यवान वस्त्र देत सांगितले,_

_'जर का भोजनदानाचे आयोजन करण्यात पैशांची कमतरता पडली, तर हे मौल्यवान वस्त्र विकून त्या पैशाने उरलेली उणीव पुरी कर. जर उणीव भासली नाही, तर हे वस्त्र एखाद्या भिक्षुला दान दे._

_भोजनदानाच्या कार्यक्रमाचे आयोजन यशस्वी झाले. कोणत्याही वस्तुची उणीव भासली नाही. तेव्हा त्या उपासकाने इतर दानदात्यांना सांगितले की, दान कर्म पैशाच्या उणीवेशिवाय पूर्ण झाले. हे वस्त्र कोणाला द्यावे?" तेव्हा कोणी तरी सुचविले की, 'स्थविर सारिपुत्त हेच यासाठी योग्य आहेत. परंतु दुसऱ्या कोणीतरी म्हटले, 'भिक्षु देवदत्त शेती तयार झाल्यापासून आपल्या बरोबर राहत आहे, म्हणून हे वस्त्र त्यांनाच द्यावे. बऱ्याच विचाराअंती बहुमत भिक्षु देवदत्तच्या बाजूने झाले. म्हणून ते वस्त्र भिक्षु देवदत्ताला देण्यात आले. देवदत्ताजवळ काषाय वस्त्राची कमी नव्हती. परंतु *भिक्षु संघाचा असा विनय होता की, जर कोणाला अशा प्रकारचे दान मिळाले आणि त्याच्याजवळ पूर्वीपासूनच काषाय वस्त्र असेल, तर ते वस्त्र भिक्खु संघाला दान द्यावे लागत असे. तथा ज्या भिक्षुला वस्त्राची गरज असेल, त्यालाच ते वस्त्र दिले जात असे. परंतु देवदत्ताने ते वस्त्र भिक्षु संघाला दिले नाही. त्याऐवजी त्याने ते वस्त्र आपल्या योग्य होईल असे कापून, शिऊन आणि त्याला रंगवून स्वतःच परिधान करू लागला.*_

_या प्रसंगाला अनुसरून श्रावस्तीच्या जेतवनात पुढील गाथा तथागतांनी म्हटली आहे._

_*'अनिक्कसावो कासावं, यो वत्थं परिदहेस्सति ।*_

_*अपेतो दमसच्चेन, न सो कासावमर्हित ।।९।।*_

*_(अर्थात ज्याने आपल्या मनाला स्वच्छ केले नाही व काषाय वस्त्र धारण करतो, असा सत्यापासून दूर, संयमहीन व्यक्ति काषाय वस्त्र धारण करण्यास पात्र नसतो.)_*

*_देवदत्त, तुझ्यावर हे काषाय वस्त्र शोभत नाही_*

_सर्व जनतेने देवदत्ताने ते वस्त्र परिधान केलेले पाहिले. ते आपल्या स्वतःला आवरू शकले नाही आणि आपसात चर्चा करू लागले, हे वस्र देवदत्ताच्या अंगावर शोभून दिसत नाही. या वस्त्राचे खरे हक्कदार तर भन्ते सारिपुत्त वाटतात."_

_तथागत त्या दिवसात श्रावस्तीमध्ये चारिका करीत होते. काहीं वेळेनंतर एक भिक्षु राजगृहाहून श्रावस्तीला पोहोचले व शाक्यमुनिंच्या समोर येऊन सादर प्रणाम करून एका बाजूला बसले. शास्त्यांनी त्यांची विचारपूस केली. तेव्हा बातचीत करता करता त्यांनी राजगृहात घडलेली घटना सांगितली की, कशा प्रकारे देवदत्त नवीन काषाय वस्त्र घालून फिरत होता. तसेच लोकांमध्ये याबद्दल प्रक्षोभ होता. ही गोष्ट ऐकून शाक्यमुनिंनी म्हटले, 'भिक्षुनो! अशी घटना पहिल्यांदाच घडलेली नाही की, योग्यायोग्याता नसताना सुद्धा देवदत्तने असे मौल्यवान वस्त्र परिधान केले आहे. पूर्वजन्मात सुद्धा त्याने असे केले आहे. असे म्हणून शाक्यमुनिंनी भूतकाळात घडलेली गोष्ट ऐकवली._

_पूर्वी एके काळी जेव्हा वाराणसीमध्ये राजा ब्रह्मदत्त राज्य करीत होता, तेव्हा एका हत्तीची हत्या करणारा हत्तीला मारून त्याचे दांत, नखे, आतडे, मांस इत्यादी विकून आपले जीवन जगत होता. त्या दिवसांत प्रत्येक बुद्ध अरण्यात साधना करीत होते. अरण्यात फिरताना हत्ती जेव्हा कधी प्रत्येक बुद्धांना पाहत असत त्या वेळी त्यांना वाकून प्रणाम करून पुढे जात होते. एके दिवशी हत्तीची शिकार करणाऱ्याने हे पाहिले तेव्हा विचार केला की, 'या हत्तींना मारणे फारच सोपे आहे. जर मला सुद्धा काषाय वस्त्र मिळाले, तर ते घालून या हत्तींना सहज मारू शकेन.' असा विचार करून तो काषाय वस्त्राचा शोध घेऊ लागला. एके दिवशी त्याने एका भिक्षुला चिवर उतरून तलावात अंघोळ करताना पाहिले. त्याने भिक्षुचे वस्त्र चोरले व ते घालून बसू लागला. हत्ती जेव्हा त्याला प्रणाम करून पुढे जात, तेव्हा तो शेवटच्या हत्तीला भाला मारून त्याची हत्या करीत असे. त्याचे दात इत्यादी काढून विकून उरले-सुरले अंश जमीनीत गाडून टाकीत होता._

_पुढे जाऊन एक बोधिसत्व हत्तींचे राजा बनले. तो बोधिसत्व हत्तीसुद्धा आपल्या पुर्वजांच्या सवयी नुसार हत्तीची शिकार करणाऱ्याला प्रणाम करून पुढे जात असे. एके दिवशी हत्तीराजाने आपल्या सोबत्यांकडे विचार विमर्श केला की, 'आपली संख्या दरदिवशी कमी-कमी होत आहे. जर कोणी साथी येथून कुठे जात असेल, तर सांगितल्याशिवाय जात नाही. तेव्हा शक्यता आहे की, कोणी तरी आमच्याशी शत्रुत्वपूर्ण व्यवहार करीत आहे. मला त्या काषायवस्त्र धारण करणाऱ्यावर संशय येत आहे.' तेव्हा एक दिवस सर्व हत्तींच्याजवळ चर्चा करून गजराजाने सर्व हत्तींच्या कळपाला पुढे पाठवून स्वतः सर्वांत शेवटी जाऊ लागला._

_रोजच्या प्रमाणे त्या शिकाऱ्याने हत्तीच्या कळपातील हत्तींनी प्रणाम करून गेल्यानंतर राजा ने हत्तीवर भाला फेकून मारला. परंतु हत्तीराज सावध होता, म्हणून तो एका बाजूला वळला व भाल्याच्या वारापासून वाचला. त्याने त्या हत्तीच्या हल्लेखोराला पकडले आणि त्याला विचारले की, काय त्याने हत्तींची हत्या केली होती का? तेव्हा हल्लेखोराने आपला अपराध स्वीकार केला. तेव्हा हत्तींच्या राजाने असा विचार केला की, 'जर मी याची हत्या केली, तर हजारो बुद्ध, प्रत्येक बुद्ध आणि क्षीणास्त्रव भिक्षुना हे समजल्यावर हा विचार करतील की, काय? वस्त्रधारी सुद्धा जीव-हत्या करतात.' असा विचार करून हत्तीराजाने त्या हल्लेखोराचे प्राण घेतले नाही आणि त्याला म्हणाला, 'या चराचरामध्ये विरक्त भिक्षुंचे वस्त्र धारण करून तू हत्या करून फार मोठे पाप केले आहेस. तू त्या काषाय वस्त्राचा उत्तराधिकारी नव्हतास. उलट *जो व्यक्ति आतून निर्मळ व पवित्र असतो, तोच काषाय वस्त्राचा उत्तराधिकारी असतो.'*_

_शाक्यमुनिंनी ही कथा सांगताना म्हटले की, 'त्या जन्मात हत्तींची हत्या करणारा देवदत्त होता आणि हत्तींचा राजा मी होतो. अशा प्रकारे उत्तराधिकारी नसतानाही देवदत्तने भूतकाळात काषाय वस्त्र धारण केले होते." असे म्हणून शास्त्याने पुढील दोन गाथा ऐकवल्या._

*_यो च वन्तकसावस्स, सीलेसु सुसमाहितो ।_*

*_उपेतो दमसच्चेन, स वे कासावमर्हित ।।१०।।_*

*_(अर्थात ज्याने आपल्या मनाला स्वच्छ केले आहे आणि त्याच वेळेस काषाय वस्त्र धारण केले आहे, असाच सत्य आणि संयमी माणूस काषाय वस्त्राचा उत्तराधिकारी असतो.)_*

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

*_हृषीकेश शरण यांच्या 'धम्मपद गाथा आणि कथा' यमक वग्ग या ग्रंथातून साभार_*

*_शब्दांकन : बुद्धघोष एस. के. खैरे मो.९८६७८३६५४८_*

*_प्रबुद्ध समाज मासिक मार्च व एप्रिल २०२५_*

*_संकलन : महेश कांबळे_*

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

Friday, 18 April 2025

पालि व मराठी भाषेला अभिजात दर्जा पुढे काय?

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

*_पालि व मराठी भाषेला अभिजात दर्जा पुढे काय?_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2025/04/blog-post_18.html

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

_जगभरात सहा हजारापेक्षा जास्त बोलीभाषा बोलल्या जातात. *त्यातील अनेक भाषा आज नष्टप्राय होत आहेत. त्या नष्ट का होत आहेत तर त्यातील अनेक कारणांपैकी एक कारण म्हणजे त्याची लिपी अस्तिवात नसणे होय. तसेच त्या भाषा बोलणारे लोक उपलब्ध नसतील तर भाषा मृतप्राय किंवा लुप्त होतात.* त्याच बरोबर आज अनेक प्राचीन भाषा आधुनिक भाषात परावर्तीत झाल्या आहेत._

_आधुनिक भाषांच्या निर्मिती आधी ज्या अपभ्रंश भाषा निर्माण झाल्या त्या प्राचीन भाषा उद्भव आहेत असे भाषातज्ज्ञांचे मत आहे. सध्या बोलल्या जाणाऱ्या आधुनिक भाषा ह्या प्राचीन प्राकृत भाषांच्या पायावर उभ्या आहेत. प्राकृत, पालि व दक्षिणेकडच्या भाषांनी भारत देशाचा इतिहास रचला आहे._

*_प्राकृतातून सर्व भाषाची निर्मिती_*

_या भाषांना हजारो वर्षांचा इतिहास आहे. *अभिजात (पालि संयम्भू) दर्जा मिळवण्यासाठी जे नियम आहेत त्यामध्ये एक नियम, ती भाषा किमान दोन हजार वर्ष जुनी असावी.* या निकषावर ह्या दोन्ही भाषा उतरल्यामुळे त्यांना हा दर्जा प्राप्त झाला. पालि भाषेला साधारणतः तीन हजार वर्षाचा इतिहास आहे. दोन्ही भाषा ह्या प्राकृत भाषा असून त्या सामान्य लोकांच्या बोलीभाषा आहेत. त्यामुळे दोघींमध्ये बरेच साम्य आहे. त्याची निर्मिती प्राकृत भाषेपासून झाली आहे. *मराठीत शेकडा ८० टक्के शब्द पालितून आले आहेत.* दोघींचे व्याकरणसुद्धा सारखे आहे._

_जी संस्कृती जिवंत असते त्या संस्कृतीची भाषा कधीही मरत नाही. भले ती काळानुसार बदलत राहील कारण परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे. वैदिक भारतात येण्यापूर्वी भारतीय प्राकृत भाषा सुस्थापित होत्या आणि यातून दैनंदिन व्यवहार होत होते. भारतीय धर्म साहित्याचीही भाषा प्राकृतच होती. प्राकृतला स्वतंत्र अशी स्थानिक परंपरा असल्याने सिंधू काळातही याच प्राकृतचे प्राचीनरूप वापरात होते. याचा अर्थ सिंधू संस्कृतीचा प्रवाह केवळ धर्म, सांस्कृतिक व काही प्रमाणात व्यावहारिक गोष्टीपुरताच मर्यादित नव्हता तर तो भाषिक बाबतीतही होता. *प्रमोद पाठक म्हणतात 'पाश्चात्य विद्वानांनी संस्कृत आधीची व प्राकृत भाषानंतरच्या अशी केलेली मांडणी चुकीची आहे. वैदिक भाषेचे व्याकरण आणि शब्दसंग्रह अभिजात संस्कृतशी जुळत नाही तर प्राकृतशी जुळते, त्यामुळे संस्कृतमधून प्राकृतभाषा जन्माला आल्या हे मान्य करता येत नसल्याने रिचर्ड पिशेल यांनी सप्रमाण दाखवून दिलेले आहे. (प्रा. हरी नरके, प्रस्तावना, प्राकृत आणि पाली भाषांचा इतिहास, लेखक, संजय सोनवणी.)*_

_*आपल्या अंतःकरणातील अभिप्राय दुसऱ्या माणसाला समजून देण्याकरिता उच्चारला जाणारा जो ध्वनी त्याला भाषा असे म्हणतात. 'भाष्' या धातूपासून भाषा हा शब्द बनला आहे त्याचा अर्थ होतो, बोलणे.* जर ही भाषा नसती तर माणसाला आपल्या अंतःकरणातील विचार दुसऱ्या समोर व्यक्त करता आले नसते. *तसेच 'लिपी' हा शब्द लिंपणे म्हणजेच सारवणे या अर्थाने आला आहे.*_

_मराठी जशी अनेक प्रकारांनी बोलली जाते. १. पुणेरी २. कोकणी ३. मालवणी ४. कोंकणी ५. चित्पावनी ६. वऱ्हाडी ७. नागपुरी ८. खानदेशी ९. कारवारी._

*_प्राकृत भाषेचेही एकूण सोळा प्रकार आहेत. १. महाराष्ट्री (पुढे मराठी झाली) २. शौरसेनी ३. प्राची ४. अवंती ५. मागधी (पालि व अर्धमागधी) ६. शाकारी ७. चांडाली ८. शाबरी ९. आभिरिका १०. टाक्की ११. नागर १२. ब्राचड १३. उपनागर १४. कैकयी १५. पैशाची १६. पांचाली._*

_*प्राचीन पालि भाषेचे अवशेष हे आधुनिक भाषा हिन्दी, राजस्थानी, पंजाबी, बंगाली, उडिया, आसामी, मराठी इत्यादी बोलीभाषेत विशेष आढळून येतात. पालिभाषा ही वैदिक पूर्व प्राचीन भारतातील बहुजन समाजाची भाषा होती असे संशोधनार्थी दिसते.*_

_बुद्ध काळात छान्दस आत्ताची संस्कृत भाषा सुद्धा प्रचलित होती. परंतु संस्कृत भाषा ही त्याकाळी फक्त अभिजन वर्गाची अर्थात ब्राम्हणांची, ग्रंथांची, अधियन व अध्यापनाची, धार्मिक पूजाअर्चा व कर्मकांडाची पण रोजच्या व्यवहारात न बोलली जाणारी भाषा होती. ती बहुजनांची बोली भाषा कधीच नव्हती. याचा पुरावा म्हणजे जुन्या संस्कृत नाटकात ब्राम्हण पुरुष दुसऱ्या ब्राम्हणाशी संस्कृत मध्ये बोलतो तर आपल्या पत्नीशी प्राकृत मध्ये बोलतो. उपलब्ध काव्य, नाटक, शिलालेख प्राकृत भाषेतच आहेत. हीच आपली प्राचीन शिष्टाचाराची भाषा होती. राजभाषा होती. स्त्रियांनाच संस्कृत निषिद्ध असल्याने संस्कृत कोणाचीही मातृभाषा असण्याची शक्यता नव्हती. मग या भाषेचा अपभ्रंश होण्याने त्यातून प्राकृत भाषा निर्माण झाल्या, हा तथाकथित विद्वानांचा दावा हास्यास्पद आहे._

_*पण्डित हरगोविन्दास ती. सेठ म्हणतात 'संस्कृत भाषेची निर्मिती वैदिक भाषेतून झालेली नसून ती मध्यदेशातील प्राकृतपासून बनली आहे.'* जगातील सर्व आदी भाषा ह्या प्राकृतच आहेत. भाषेचा इतिहास म्हणजे संस्कृतीचा इतिहास असतो. *माणसंही भाषेच्या साह्याने संस्कृतीची जनुके एका पिढीकडून दुसऱ्या पिडीकडे पोहचवितात. (प्रा. हरी नरके, प्रस्तावना, प्राकृत आणि पाली भाषांचा इतिहास, लेखक, संजय सोनवणी.)*_

_वाक्पतीराज या आठव्या शतकांत होऊन गेलेला आपल्या महाकाव्यात म्हणतो की,_

_सायलाओ इम वाया विसंति एतो णेति वायाओ ।_

_एति समुदं चिय णेति सायराओ च्चिय जलाई ।_

_याचा अर्थ असा होतो की, 'सर्व नद्या समुद्राला मिळतात आणि समुद्राचे जल जसे बाष्परूपाने बाहेर जाते त्याप्रमाणे प्राकृत भाषेत सर्व भाषा प्रवेश करतात आणि प्राकृतातून सर्वभाषा निघतात.' मागधी व शौरसेनी यांचे ध्वनी उच्चार सारखे आहेत. *मागधी, अर्धमागधी व शौरसेनी आज निरनिराळ्या हिन्दीच्या उपबोली भाषांची जन्मदात्री आहेत.* याचमुळे हिन्दी भाषेचा विस्तृत पट्टा उत्तर भारतात आहे. *आजची बिहार मधील हिन्दी हे मागधीचे आधुनिक रूप आहे. मगधाच्या पश्चिमकडचा भाग व्यापणाऱ्या भाषेला अर्धमागधी म्हणतात. भगवान महावीरांनी याच भाषेतून आपला धमर्मोपदेश केला. श्वेताम्बारांचे बरेचसे वाङ्मय हे याच भाषेत आहे.*_

*_संतसाहित्याचे योगदान_*

_संतसाहित्याने प्राकृत भाषेत साहित्य निर्मिती करून तिला एक प्रकारचे अधिष्ठान प्राप्त करून दिले. त्यांनी प्राकृत मराठीला प्रोत्साहन दिले. अभिजनांना प्रश्न विचारले, *संत एकनाथ म्हणतात की, 'संस्कृतवाणी देवे केली, मग प्राकृत काय चोरांपासून झाली?'* मराठी ही महाराष्ट्री प्राकृतच असून ती संस्कृत पासून जन्मलेली नाही. ती एक प्राचीन, समृद्ध आणि प्रतिष्ठीत भाषा आहे. अशी मांडणी प्रथम एकनाथांनी केली. *संत बहिणाबाई म्हणतात 'तुकारामांनी वेदांचा अर्थ प्राकृतातून सांगितला.' तर संत ज्ञानेश्वर मराठी ही भाषा 'अमृतातेही पैजा जिंकणारी आहे' असे सांगतात. रेड्या मुखी वेद उच्चारणे याचा प्रतिकात्मकरित्या अर्थ सामान्य जणांपर्यंत हे ज्ञान पोहोचवणे होय. ज्ञानेश्वर व मुक्तेश्वर याच्या साहित्य लेखनात प्राकृत पालिचे अनेक शब्द जसेच्या तसे आले आहेत. हा त्याच्या वरचा प्रभाव आहे. उदा. पसायदान व करणीयमेत्त सुत्त अनेक साम्य स्थळे दिसतात. ज्ञानेश्वरीत ही पालि, प्राकृत शब्द आले आहेत.*_

*_पालि भाषा का शिकावी?_*

_मराठी आता आधुनिक काळाची भाषा आहे. ती महाराष्ट्र व आजूबाजूच्या प्रांतात मोठ्या प्रमाणात बोलली जाते पण मग पालिचे काय? ती तर कोणत्याही प्रदेशात बोलली जात नाही. सद्यस्थिती ती केवळ धर्मग्रंथाची भाषा बनून राहिली आहे. तर मग ही भाषा सामान्य लोकांनी का शिकावी? तिचा अभ्यास का करावा? तर पुढील चार गोष्टीसाठी अभ्यास करावा, शिकावी._

१. भाषाविज्ञान 

२. इतिहास संशोधन 

३. बौद्धधम्म 

४. बौद्धतत्त्वज्ञान.

_सद्यस्थितीत पालि भाषेच्या अद्ययन, अध्यापन, संशोधन याबाबतीत जगभरात लोकांची उत्सुकता वाढत चालली आहे._

१. *भाषाविज्ञान :* _भाषाउत्पत्ती शास्त्रानुसार शब्दांची उत्पत्ती कशी झाली. आधुनिक भाषांचे शब्द मूळ कुठून आले, हे शोधण्यासाठी पालि भाषेचा अभ्यास करणे आवश्यक आहे. प्राकृत, संस्कृत व आधुनिक भारतीय भाषा यांना जोडणारा एक दुवा पालि भाषा आहे. कसे ते आपण पाहू._

१) पालि : चक्क, कम्म, मत्तिका, सोळ, सिक्खा, पानीय, नोनीत, केस

२) संस्कृत : चक्र, कर्म, मृत्तिका, षोडश, शिक्षा, पानीय, नवनीत, केश

३) मराठी : चाक, काम, माती, सोळा, शिकणे, पाणी, लोणी, केस

४) हिंदी : चका, काम, मिट्टी, सोलह, सिखना, पानी, +, +

अशारितीने शब्द कसे निर्माण झाले हे पाहण्यासाठी व बोली भाषांचे व्याकरण सारखेच असल्याने पालि भाषेचे अद्ययन आवश्यक झाले आहे.

२. *इतिहास संशोधन :* _भगवान बुद्धांनी धम्म, विनय, मातिका याचा उपदेश केला. पुढे जावून तेच सुत्तपिटक, विनयपिटक, अभिधम्मपिटक म्हणून प्रथम धम्म संगीतीत संपादित केले गेले. हे तिन्ही संग्रह तीन पेटीत किंवा टोपलीत वेगवेगळे ठेवले जात होते. यामुळेच त्यांना तिपिटक म्हटले जावू लागले. पण त्याकाळातील वाङ्‌मय श्रुती व स्मृतीच्या आधारे अखंड ठेवले जात होते. अर्थात मौखिक पद्धतीने सुरक्षित ठेवले जात असे. त्यामुळे या तिन्ही विभागांना पालन करून, रक्षण करून ठेवणारे साहित्याला तिपिटक म्हटले गेले. *हे साहित्य प्राचीन काळाच्या लोकभाषेत आहे. या भाषेने त्याचे पालन केले, रक्षण केले त्यामुळे ती पालि म्हटली जावू लागली. याचे कारण की, ज्या भाषेने बुद्धांच्या वाणीचे पालन केले, रक्षण केले. 'पा पलत्ती रक्खति पालि।' म्हणून पालि भाषा संबोधली गेली.* तिसऱ्या धम्मसंगीतीनंतर प्रियदर्शी अशोकाने धम्म विनयाला व पालि वाङ्मयाला भारताच्या सीमा ओलांडून ब्रम्हदेश (सुवर्णभूमी), श्रीलंका (लंकाद्वीप), थायलंड (सयाम) इ. देशात पोहचविले._

३. *बौद्धधम्म :* _प्राचीन पालि वाङ्मयातील उच्चकोटीतील नीतीमूल्ये, सोदाहरण विवेचन, मुद्देसूद युक्तिवाद, सोपी नितीतत्त्वे, बुध्दिवादी अन्वेषण पद्धती, खंडन मंडन वादविवाद पद्धत, नवांगानी नटलेले वाङ्मय, धम्मपद, सूत्तनिपाता सारखी गेय्य सुभाषितमाला इ. अनेक साहित्य प्रकारामुळे पालि वाङ्मयाने सर्व जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. हे सारे ग्रंथ तिन्ही धम्मसंगीतीमध्ये संगायन केले गेले. ते मौखिक पद्धतीने पाचशे वर्षांपेक्षा अधिक काळ जतन केले गेले. यानंतर श्रीलंकेत राजा वट्टगामिनी अभय याच्या काळात ते प्रथम लिपिबध्द झाले. हे सर्व वाङ्मय फक्त धार्मिक साहित्य नसून, मानवी जीवनाच्या सवींगाना स्पर्श करणारे मूळ भारतीय अस्सल वाङ्मय आहे._

_यात प्राचीन बुद्धकालीन समाज, संस्कृती, रूढी परंपरा यांचा समग्र संग्रह, इतिहास, भौगोलिक माहिती, तत्कालीन प्रदेश, जनपद, निगम, ग्राम यांची नावे, तत्त्वज्ञान, ते निर्माण करणारे विविध आचार्य, विविध संप्रदाय, अर्थव्यवस्था, श्रेणी, गण, सेट्ठी इ. व्यापारी समुहाची माहिती, व्यापारी केंद्रे, राजकीय व सांस्कृतिक केंद्रे, ज्ञानाची केंद्रे, भरभराटीला आलेली नगरे अर्थात वैशाली, श्रावस्ती, काशी यांचा सविस्तर अभ्यास करता येतो._

_हा पालि वाङ्मयाचा प्राचीन वारसा भारताला व एकंदर मानवी जीवनाला समृद्ध करणारा आहे. याच काळाला भारताचा सुवर्णकाळ असे म्हणतात. भारतीय इतिहासाचा हाच विश्वासार्ह स्रोत म्हटला जातो. यावर जम्बूद्वीपाचा अर्थात प्राचीन भारताचा समग्र इतिहास आधारित आहे._

४. *बौद्धतत्त्वज्ञान :* _या संदर्भात चार आर्यसत्य म्हणजे काय? याची माहिती करून देऊन दुःख निवारण्यासाठी मानवाने कोणते प्रयत्न केले पाहिजेत याचा अभ्यास करता येतो. यासाठी तिपिटक व तिपिटकेत्तर साहित्याची माहिती गोळा करून उपदेशांना अंगीकृत करण्यासाठी चालना मिळते._

_या अनुषंगाने जीवनमूल्ये व कौशल्यांचा समायोजन साधण्यास मदत होईल. विकसित होणाऱ्या जीवन कौशल्यांच्या प्रयत्नांमुळे सम्मादिट्ठि प्राप्त होवून सम्मासङ्कप्पोद्वारे प्रज्ञेचा विकास घडवून येईल. येथे सम्मादिठ्ठि, सम्मासङकप्पो, सम्मावाचा, सम्माकम्मन्तो, सम्माआजिवो, सम्मावायामो, सम्मासति व सम्मासमाधी याद्वारे शीलाचरणाचे महत्त्व समजेल. या सम्मावायामो, सम्मासती व सम्मासमाधीद्वारे समाधी अवस्थेचा सराव करून पायरी पायरीने त्यांचा विकास करण्यासाठी मानव प्रयत्न करण्यास प्रेरित होईल._

_चार अरियसत्याचा अभ्यास करताना आपण हे दुःख आहे, हे दुःखाचे कारण आहे, हा दुःखाचा निरोध आहे, हा दुःखाच्या निरोधाचा मार्ग आहे, हे यथाभूत जाणून घेणे आवश्यक आहे. ही चार अरियसत्य जो पर्यंत माणसाला सत्याची अनुभूती देत नाहीत, माणसाला सत्यवादी बनविण्यास जोपर्यंत सहाय्यकारी होत नाहीत. तोपर्यंत ती चार अरियसत्य मानवाच्या उपयोगी आहेत असे म्हणता येणार नाहीत. वरील सर्व गोष्टींसाठी पालि भाषेचे अद्ययन करणे आवश्यक आहे._

*_अभिजात (पालि संयम्भू) दर्जा मिळाला पुढे काय?_*

_*३ ऑक्टोबर २०२४ रोजी पालि बरोबर मराठीला अभिजात दर्जा मिळाला.* याने हे सिद्ध झाले की, ज्या दहा भाषांना आता पर्यंत अभिजात दर्जा मिळाला आहे. त्या संस्कृत पासून निर्माण झाल्या नसून स्वयंभू निर्माण झाल्या आहेत. याकरिता *पालि भाषा संविधानाच्या परिशिष्ट आठ मध्ये समाविष्ट होणे आवश्यक आहे. तर केंद्र शासनाच्या अनेक सुविधा तिला प्राप्त होतील. याच बरोबर पालि भाषा ही २०१२ पर्यंत यूपीएसीला एक विषय म्हणून होती. परंतु ती त्यावर्षी यूपीएसीतून विदेशी भाषा म्हणून काढून टाकली गेली. याचे कारण दिले गेले की, २०११ च्या जनगणनेत पालि बोलणारे लोक भारतात नाहीत. ते श्रीलंका व म्यानमार, थायलंडची भाषा आहे. त्याची न्यायालयीन लढाई लढून ती जिकली आहे पण जनरेठा नसल्याने केंद्र सरकार अजून सुरु करण्याचा निर्णय घेत नाही. यासाठी पुन्हा जनरेठा दाखवावा लागेल. ही लढाई अधुरी आहे. हे पालि भाषेच्या प्रचार व प्रसारानेच होणार आहे.*_

*_पालि विद्यापीठाची निर्मिती होणे आवश्यक_*

_*१८ सप्टेंबर १९९७ मध्ये कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाची महाराष्ट्र शासनाने स्थापना केली.* या आधी संस्कृत अभ्यासासाठी कोणतेही विद्यापीठ नव्हते. ह्या विद्यापीठातर्फे संस्कृत साहित्याच्या वेगवेगळ्या विषयांवर अभ्यास आणि अध्यापनाच्या व्यवस्थेसाठी अनेक विभागांतर्गत काम केले जाते आणि पदविका, स्नातक, स्नातकोत्तर पदवी, विध्यानिष्णात पदव्या प्रधान केल्या जातात. म्हणूनच या विद्यापिठाच्या स्थापनेनंतर २००५ साली संस्कृत भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला व तिच्या संवर्धनासाठी करोडो रुपयांची तरतूद झाली._

_*पालि भाषेला साधारणतः तीन हजार वर्षाचा इतिहास आहे. बौद्ध धम्म ज्या ज्या देशात गेला पालि भाषाही गेली. त्या त्या देशातल्या लोकांनी तिला आपली धर्मभाषा म्हणून स्वीकारली. त्यांनी पालि साहित्याचे जतन आपापल्या भाषेत केले. यामुळे जगातील लोकभाषांचे महत्त्व वाढले आहे. पालि भाषेने लोकभाषेची प्रतिष्ठा वाढवली आहे. आज भारत देशातील बहुजन समाज मोठ्या प्रमाणात पालिभाषा अद्ययानाकडे वळत आहे. भारतातील अनेक शाळा, महाविद्यालय आणि विद्यापीठात पालिभाषा शिकवली जात आहे. प्रमाणपत्र पदविका कोर्स सुरु झाले आहेत. पालिभाषेत मोठ्या प्रमाणात संशोधन कार्य सुरु आहे. याला युजीसी नवी दिल्लीकडून फेलोशिप दिली जाते. याकरिता अद्यायन, अध्यापन, संशोधन याला खूप महत्त्व प्राप्त झाले आहे.*_

_भारतीय लोकांत पालिभाषा जाणण्याची, शिकण्याची ओढ लागली आहे. यासाठी पालि विद्यापीठाची गरज निर्माण झाली आहे. या विद्यापीठामुळे पालि शिकणे, जाणणे, बोलणे अधिक सोपे होईल. भाषेच्या वेगवेगळ्या पैलूंवर प्रकाश टाकता येईल. पालि विद्यापीठामुळे बौद्ध तत्त्वज्ञान, संस्कृती समकालीन अनेक आचार्याचे विचार प्रवाह, समाजजीवन इ. चा अभ्यास करणे सोपे होईल. हे सारे प्राचीन विद्यापीठात विद्यमान होते. याकरिता असंख्य विद्यापीठाची स्थापना झाली होती. या विद्यापीठाच्या माध्यमातून पालि साहित्य, बौद्ध तत्त्वज्ञान, संस्कृती, कला, सभ्यता जतन केली गेली. या विद्यापीठात जगभरातून विद्यार्थी भारतात येत होते. शिक्षण घेवून येथील पालिभाषा ग्रंथ घेवून आपापल्या देशात भाषा, साहित्य, कला, बौद्ध धम्माचा प्रचार व प्रसार करतात. या धर्तीवर पालिभाषा व साहित्याचा अभ्यास करण्यासाठी पालि विद्यापीठाची आवश्यकता आहे._

_*पालि विद्यापीठ स्थापन झाल्याने साहित्य बरोबरच, बौद्धकला, मूर्तीकला, शिल्पकला, धातुकला, चित्रकला ही भारतातील उच्चकोटीच्या कलांचा अभ्यास होईल.* त्या अनुषंगाने या कलांचे संरक्षण होईल. पालि भाषा साहित्य हे मानवी संवेदनांचा आविष्कार असल्याने जगभर मानवतावादाचा प्रचार प्रसार होईल. जे आज युद्धजन्य परिस्थितीत जगाला आवश्यक आहे. पालिभाषा मानवी जीवनाला उन्नत, सुंदर, सुसंकृत व अर्थपूर्ण बनवणारी आहे. म्हणून या संस्कृतीचे रक्षण करण्यासाठी पालि विद्यापीठाची आवश्यकता आहे._

_*आधुनिक काळात या पालिभाषेला जाणण्यासाठी उत्सुक असणारा मोठा वर्ग भारतात निर्माण झाला आहे. याचे कारण पालिभाषेत असलेले धम्म उपदेश माणसाला प्रगतीच्या मार्गावर नेणारे आहे. हा धम्म विज्ञानवादी असल्याने आधुनिक काळाला साजेसे लोककल्याण याने साधता येईल. म्हणून पालिभाषेचे व पालिसाहित्याचे अद्यायन, अध्यापन करणे याकरिता पालिभाषेचे संरक्षण आवश्यक आहे. पालिभाषेचा प्रचार व प्रसार होणे आवश्यक आहे, तर चला पाली करू वैभवशाली, पोहोचवू घर घर पाली.*_

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

*_लेखक :- *_प्रा. विजय मोहिते_*

*_संकलन :- महेश कांबळे_*

*_दिनांक :-_* १८/०४/२०२५

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

Thursday, 17 April 2025

पाली भाषा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

*पाली भाषा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर*

https://mikamblemahesh.blogspot.com/2025/04/blog-post_17.html

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

_*सांप्रत काळी काही विद्वानांमध्ये खल सुरू आहे की बाबासाहेबांनी* बौद्ध वाङ्मयाचा जो अभ्यास केला व त्यावर आपली मनोभूमिका बनविली ते सारे ग्रंथ इंग्रजी होते. *मूळ पाली ग्रंथांचा त्यांनी अभ्यास केला नाही. याचे कारण बाबासाहेबांना पाली येत नव्हते,* असा धांदात आरोप केला जात आहे. त्यामुळे *बाबासाहेबांच्या बौद्ध वाङ्मयाच्या अभ्यासातील व त्यांनी मांडलेल्या बुद्ध आणि त्यांच्या धम्म यातील सिद्धांताविषयी त्रुटी व संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न काही महाभागांकडून केला जात आहे.* प्रत्यक्षात वस्तुस्थिती निराळी आहे. *बाबासाहेबांनी पाली भाषेचा अभ्यास केला होता. इतकेच नव्हे तर त्यांना पाली भाषा अवगत होती. त्याबरोबर पाली भाषेच्या विकासासाठी त्यांनी स्वतः प्रयत्न करून पुस्तकही लिहिलं आहे. महाराष्ट्र शासनाने 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर रायटिंग्ज एन्ड स्पीचेस, खंड १६ (१९९८) या खंडात पाली व्याकरण, दोन प्रकारचे पाली शब्दकोश (त्यापैकी एक फक्त 'आ' स्वरापर्यंतचा आहे व बुद्ध पूजापाठ हे साहित्य छापण्यात आले आहे.) या लेखनामुळे बाबासाहेबांचा पाली भाषाविषयक आणखी एक पैलू लोकांच्या नजरेसमोर आला.*_

_आता पाली भाषेच्या उत्कर्षासाठी व बौद्ध धम्माच्या प्रचारार्थ बाबासाहेबांनी केलेले योगदान पाहू. *दि. ८ मे १९५५ मुंबई नरे पार्क मैदानातील बुद्ध जयंतीच्या वेळच्या भाषणात बाबासाहेब सांगतात "मी धम्माचा संशोधक नाही, प्रचारक आहे." पुढे ते म्हणतात- "या धर्माचे संशोधन करणे माझे कार्य नाही. आपले मुख्य कार्य प्रचार करण्याचे, आम्हांला लोकांना बुद्धिष्ट करून घ्यावयाचे आहे."* त्यांच्या वरील वक्तव्यावरून आपणांस बाबासाहेबांचा संशोधनापेक्षा प्रचारावर अधिक भर होता. हे समजते. यासाठी ते *बंगलोर येथे धर्मशिक्षणाचे विद्यापीठ बुद्धिष्ट सेमिनरी उभारणार होते.* धर्मान्तरानंतर अवघ्या दोन महिन्यांत ते बांधून तयार करणार होते. *'सर्वसामान्य लोकात बुद्ध धर्माचा प्रसार करण्याकरिता प्रचारक तयार करणे हा विद्यापिठाचा मुख्य उद्देश होता. त्यांची अशी योजना होती की ह्या विद्यापिठात जात, धर्म, राष्ट्र, हा भेद न मानता विद्यार्थी घेतले जातील, त्यांना निरनिराळ्या धर्माचे तौलनिक ज्ञान करून इतर संबोधित विषय शिकविले जातील. तसेच चीन, जपान, ब्रम्हदेश, अमेरिका इत्यादी परदेशातूनही अभ्यासक बोलावणार होते. बौद्ध वाङ्गमय छापण्याकरिता विद्यापीठात एक छापखानाही चालविला जाऊन ग्रंथालय मंदिरे असा विभागही विद्यापीठात केला जाणार होता. बौद्ध धम्माचे मिशन सुरू केल्याशिवाय बौद्ध धम्माचा जगात प्रसार करणे अशक्यच ठरणार, असे बाबासाहेबांना वाटे.* शिक्षण प्रसाराइतकेच धम्मप्रसाराचे कार्य महत्त्वाचे आहे. असा प्रसार करण्यास मनुष्यबळ व पैशाचे बळ लागणारच लागणार, हा पैसा कसा व कोठून जमवावयाचा. तो बौद्ध धम्म ज्या देशातून आज जिंवत आहे. त्या देशातूनच हा पैसा उभा करावा लागणार असे आवाहन बाबासाहेबांनी केले होते. भारतात बौद्ध धर्मीय प्रचारासाठी त्या तत्त्वज्ञानाच्या ग्रंथाचे सर्व भारतीय भाषांत भाषांतर झाले पाहिजे. यासाठी दिल्ली, मुंबई, मद्रास या शहरात बुद्ध विहार स्थापन करून प्रत्येक रविवारी लोकांच्या उपासनेची सोय करण्याचा आपण प्रयत्न करावा, असे त्यांनी सांगितले._

_*बाबासाहेबांनी २० जून १९४६ मुंबईत सिद्धार्थ महाविद्यालय सुरू केले. यात इंग्रजी बरोबर संस्कृत, पाली, अर्धमागधी, उर्दू, पर्शियन, फ्रेंच, जर्मन व मराठी ह्या भाषांच्या व विज्ञानाच्या सर्व शाखांच्या अध्यापनाची सोय करण्यात आली, असे शां. शं. रेगे आपल्या 'भीमपर्व' ह्या पुस्तकात लिहितात. याचा अर्थ १९४६ पासून सिद्धार्थ महाविद्यालयात पाली भाषा शिकविण्याची बाबासाहेबांनी सोय केली. याचबरोबर १९४७ साली स्वतंत्र भारताच्या पार्लमेंटमध्ये सदस्य असताना बौद्धधम्माच्या पुनरुत्थानासाठी भारतीय राज्यघटनेत पाली भाषेच्या उपस्थितीची योजना करून ठेवली. याबरोबर राष्ट्रपतीच्या राजवाड्यावर गौतम बुद्धांच्या शिकवणुकीतील पहिलेच चरण धम्मचक्र परिवर्तन (धम्मचक्र प्रवर्तनाय) घातले आहे. तसेच भारतीय पार्लमेंटच्या निशाणावर अशोकचक्र हे धम्मचक्र भारत सरकारचे प्रतीक म्हणून घटनेत मान्य करून घेतले व जिथे शपथविधी होतो त्या हॉलला 'अशोक हॉल' नाव दिले.*_

_बाबासाहेबांचे बौद्ध धर्माचे वेड पुरातन होते. बौद्ध धम्माचे प्रति डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना फार पूर्वीपासून आकर्षण होते, अशी आत्मस्वीकृती त्यांनी अनेक वेळा दिली आहे. तुमचा बौद्ध धर्माकडे ओढा का? हा प्रश्न नेहमी विचारला जाई. 'बुद्ध आणि त्यांचा धम्म' या ग्रंथाच्या प्रस्तावनेत डॉ. बाबासाहेबांनी या प्रश्नाचे उत्तर दिले आहे. ज्या वर्षी इंग्रजी चौथ्या वर्गाची परीक्षा पास केली. त्या वेळी समाजातील लोकांनी अभिनंदनापित्यर्थ जाहीर सभा घेतली. या सभेत वडिलांचे मित्र *गुरुवर्य कृष्णाजी अर्जुन केळूसकर गौतम बुद्धाचे चरित्र हा ग्रंथ त्यांना भेट दिला.  बाबासाहेब म्हणतात, "मी मोठ्या आवडीने ते पुस्तक वाचले. त्या पुस्तकाने मी फार प्रभावित व प्रेरित झालो." हा ग्रंथ वाचल्यानंतर बाबासाहेबांनी रामायण-महाभारतातील विषम व या समाजव्यवस्थेविषयी वडिलांना विचारणा केली. आपण आणि महाभारतातील पात्रांच्या वागणुकीची समीक्षा त्यांनी वडिलांना विनंती केली. बाबासाहेब या विषयी लिहितात. "माझे वडील गप्प राहिले. त्यांनी ओळखले की बंड झाले आहे. अशा प्रकारे दादा केळूसकरांनी दिलेल्या पुस्तकामुळे मी बुद्धाकडे गेलो नाही.* मला पार्श्वभूमी होती आणि बुद्धांच्या जीवनावरील पुस्तक वाचताना मी तुलना व भेद करीत असे. बुद्ध आणि त्यांचा धम्म यांच्यात रस घेण्याची माझी सुरुवात होती. त्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर अवघ्या १४ वर्षाचे होते. या बालवयातच बाळासाहेबांच्या हृदयावर बुद्ध प्रतिबिंबित झाले. हा प्रसंग त्यांनी अनेकदा वर्णन केला आहे._

_*१४ जानेवारी १९५५ साली वरळी येथे बौद्ध धर्म प्रचार समितीतर्फे भरलेल्या सभेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी एक महत्वपूर्ण भाषण केले.* या सभेला संत गाडगे महाराज उपस्थित होते. या भाषणात सुद्धा त्यांनी बालपणीच त्यांचा बौद्ध धर्माशी परिचय झाला असल्याचे सांगितले होते. *ते म्हणाले, "बौद्ध धर्मसंबंधी मला सांगावयाचे आहे. बौद्ध धर्माची माझी घोषणा आजकालची नसून मी चौदा वर्षाचा असताना बौद्ध धर्माशी माझा परिचय झाला. लहानपणी माझ्या अभिनंदनाप्रित्यर्थ जी पहिली सभा घेण्यात आली. तिचे अध्यक्ष श्री. दादा केळुसकर होत. त्या वेळेला मी सभेत काय वेडेवाकडे बोल बोललो ते मला आत्ता आठवतही नाहीत, भाषण संपल्यावर केळुसकरांनी गौतम बुद्धांचे छोटेसे चरित्र मला बक्षीस म्हणून दिले. रामायण महाभारतासारखे बरेच ग्रंथ मी वाचून काढले होते. तसेच हेही पुस्तक मी वाचले, परंतु बुद्धांची शिकवण व इतर ग्रंथाची शिकवण यात बरीच तफावत आहे, असे मला आढळून आले. पुढे पुस्तकासारखी नवनवीन पुस्तके जसजशी मी वाचू लागलो तसतसा माझ्या डोळ्यात नवा प्रकाश पडू लागला. बुद्ध धर्म कसा व हिंदू धर्म कसा, दोहोंत किती भेद आहे. निराळी दृष्टी आहे मला कळू लागले उच्च शिक्षणासाठी मी अमेरिकेलाही धर्माचा बराच अभ्यास केला. धर्म काय हे समजून घेण्याकरिता व बुद्ध चरीत्राने मनात उडविलेली खळबळ शमविण्याकरिता मी तेथे बरेच वाचन केले. बराच विचार केला तेव्हा हिंदू धर्म व बुद्ध धर्म यातील अंतर मला कळुन चुकले. बौद्ध धर्माचे माझे वेड पुरातन आहे. बालवयात रुजलेल्या बुद्धाचा, वाढत्या वयात बाचासाहेबांच्या हृदयात बोधिवृक्ष झाला ह्या बोधिवृक्षाची पाने म्हणजे पाली, तिला पालवी फुटण्यासाठी खतपाणी घातले म्हणूनच ते म्हणाले होते "बोधिवृक्षाच्या मुळांना पाणी घातल्यास ती वाढेल."*_

_*बाबासाहेबांना पाली व संस्कृत सम प्रमाणात येत होते. म्हणूनच त्यांनी धम्मपद व भगवदगीता यांची चिरफाड केली आणि पुढे हेही म्हटले की, 'गीता म्हणजे धम्मपदाची नक्कल'.* बाबासाहेबांना पाली भाषेचे ज्ञान होते. याचा आणखी एक सबळ पुरावा म्हणजे देहुरोड येथील भाषण. त्यात *कमळाला पाली भाषेत पांडुरंग असे म्हणतात,* असे त्यांनी सांगितले. पुढे ते म्हणाले तुम्ही पंढरपुरुला जाता, पांडुरंगाचे अभंग म्हणत पुण्याच्या इतिहास संशोधन मंडळातील लोकांची पंढरीचा विठ्ठल कोण होता. यावर हुज्जत चालू आहे. पण *माझा त्यांना खडा सवाल आहे की विठ्ठलाची भानगड सोडून देऊन पंढरीचा पाडुरंग कोण? याचे पहिल्यांदा उत्तर द्या. तो होता कुठे? त्याला पळविले कोणी! कोणी डुबविले? पांडुरंग म्हणजे पंढरपूर येथे बौद्ध धर्माचे देवालय होते. हे मी त्यांना सिद्ध करून देईन, पुंडलिक या शब्दापासून पांडुरंग हा शब्द झाला. पुंडलिक याचा अर्थ कमळ, तुम्हाला भुलविण्यासाठी ब्राम्हणांनी बुद्धाच्या नावाचा लोप केला. पाली भाषेत पुंडलिक म्हणजे कमळ होय आणि विठ्ठल हा शब्द सुद्धा पाली भाषेतील आहे. विट् + थल म्हणजे = विट्ठल असा शब्द बनला. याचा अर्थ विठ आहे स्थळ ज्याचे तो विठ्ठल, कारण बौद्ध स्तुप हे सारे विटांनीच बनलेले आहे. म्हणून "अठ्ठावीस युगे विठेवरीच उभा असे त्यासंबंधी म्हटले जाते. 'बुद्धवंस' ह्या ग्रंथात अठ्ठावीस बुद्धाचा इतिहास अंतर्भूत आहे.* समता, सहिष्णुता व स्वातंत्र्याचा पुरस्कार करणाऱ्या बौद्ध धम्माचे अस्सल भारतीय धर्माचा परिचय देशवासीयांना व्हावा, ह्या हेतूने त्यांनी १९४८ साली 'पी. लक्ष्मी नरसूच्या एसेन्स ऑफ बुद्धिसम' ह्या अभ्यासपूर्ण ग्रंथाची द्वितीय आवृत्ती विवेचक प्रस्तावना स्वतः लिहून प्रसिद्ध केली. *बाबासाहेबांचे ग्रंथपाल शां. शं. रेगे यांनी 'भीमपर्व या पुस्तकात प्रसिद्ध बाबासाहेबांच्या वाङ्मयाविषयी असल्या जबरदस्त आकर्षणाचा किस्सा सांगितला.* तो असा. १९५० च्या में महिन्यात जागतिक बौद्ध परिषदेसाठी ते सिलोनला गेले. तेथील वास्तव्यात विद्यापीठाच्या ग्रंथालयात त्यांना बौद्ध धर्मावर विवेचक आणि माहितीपूर्ण लेख असलेल्या एका दुर्मिळ मासिकाचे बांधीव संच आढळले. त्यांनी ते वाचावयास उसने बगितले. पण ग्रंथालयातले ग्रंथ बाहेर नेता येणार नाहीत असे सांगितल्यामुळे ते निराश झाले. भारतात परत जाण्यास फक्त एकच दिवस होता. त्यामुळे हे दुर्मिळ ज्ञानवैभव प्राप्त होणे असंभाव्य होते. पण त्यांनी ह्या समस्येवर उपाय शोधलाच. त्यांच्याबरोबर दिल्लीच्या मंत्रालयातले त्यांचे टंकलेखक श्री. पिल्ले आलेले होते. बाबासाहेबांनी त्यांना मागे ठेवले आणि ग्रंथालयात बसून सर्व लेख टंकलिखित झाल्यावर मग भारतात येण्यास सांगितले. श्री. पिल्ले हे अत्यंत हुशार आणि अनुभवी लेखक होते. त्यांनी दोन दिवसात काम पूर्ण करून टंकलिखित दोन प्रती दिल्लीस नेल्या. बाबासाहेबांनी ते सुबक  घेऊन एक प्रत पुन्हा मुंबईत आले तेव्हा माझ्या स्वाधीन केले व दुर्मिळ लेखसंग्रहाचे हे सहा खंड जपून ठेवण्याबद्दल सांगितले. बौद्ध वाङ्मयाबद्दल त्यांची असलेली निष्ठा व ग्रंथासंबंधीची अतिव ओढ स्पष्ट होते._

_*अनागारिक धम्मपाल यांनी कलकत्ता विद्यापीठात पाली सुरू केले. १९९० साली मुंबई विद्यापीठात पाली चे अध्यापन सुरू झाले. धर्मानंद कोसंबी व त्यांचे तीन शिष्य  पी. बी. बापट, चि. व्ही. जोशी आणि एन. के. भागवत यांनी पुणे, बडोदा व मुंबईमध्ये पाली भाषेचे अध्यापन केले. चि. व्ही. जोशी यांचे 'मॅन्युअल ऑफ पाली' हे पुस्तक प्रसिद्ध आहे. परंतु १९४७ साली भारत स्वतंत्र झाल्यावर संविधानात पालीचा अंतर्भाव केल्यावर पाली एक जिवंत भाषा म्हणुन भारतातील सर्व विद्यापीठात शिकविली जाऊ लागली. हे योगदान बाबासाहेबांचे आहे. म्हणूनच आधुनिक भारतात यु. पी. एस.सी. च्या परीक्षेसाठी पालीचा एक भाषा म्हणून समावेश करण्यात आला असून आता एम. पी. एस. सी. साठी सुद्धा विचाराधीन आहे. प्रशासकीय सेवा परीक्षेमध्ये 'पाली भाषेचा अंतर्भाव हा पाली भाषा जिवंत असल्याचा भक्कम पुरावा आहे.*_

_*"पापालति रक्खति पालि।" या बुद्ध वचनाचे पालन व रक्षण पाली भाषा करते आणि या पाली भाषेचे रक्षण बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून केले आहे. एवढेच नव्हे तर त्यांनी पाली व्याकरण, शब्दकोश व बौद्ध पूजापाठ है साहित्य ग्रंथबद्ध करून वर उल्लेख केलेल्या पाली विद्वांनासारखे महत्त्वपूर्ण योगदान पाली भाषेसाठी दिलेले आहे आणि खऱ्या अर्थाने प्रचारक म्हणून बौद्ध धम्म सर्वदूर पोचविण्यासाठी प्रयत्न केले. ते म्हणतात, "बौद्ध धर्म मी स्वीकारला आहे. तुम्हीही स्वीकारा. नुसत्या अस्पृश्य समाजानेच तो स्वीकारून चालणार नाही तर साऱ्या भारताने व त्याबरोबर साऱ्या जगानेही बुद्ध धर्म स्वीकारावा, अशी माझी इच्छा आहे."*_

_थोडक्यात, *संविधानात पाली भाषेची नोंद, राष्ट्रपती भवनात 'धम्मचक्क पवत्तनाय' हे पाली बुद्ध वचन, सिद्धार्थ व मिलिंद महाविद्यालयात पाली भाषेच्या अध्यापनास प्रोत्साहन आणि पाली भाषेचे व्याकरण व शब्दकोश, तसेच बौद्ध पूजापाठावरील ग्रंथ हे बाबासाहेबांचे कार्य म्हणजे पाली भाषेच्या उत्कर्षासाठी बाबासाहेबांनी केलेली पायाभरणीच होय.*_

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

*_लेखक :- *_प्रा. विजय मोहिते*_ 

                  _*हा लेख २००८ चा आहे*_

*_संकलन :- महेश कांबळे_*

*_दिनांक :-_* १७/०४/२०२५

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

Wednesday, 2 April 2025

प्रियदर्शी सम्राट अशोक

 प्रियदर्शी सम्राट अशोक (जयंती विशेष)

प्रियदर्शी अशोक हे जगाच्या इतिहासा मधील एक महान शासक होवुन गेलेले आहेत. त्यांचा राज्य विस्तार अफगानिस्थानापासून तर मद्रास पर्यंत विस्तारलेला होता. इतिहासाच्या पानावर ते केवळ एकच सैनिक सम्राट आहेत (ई.पू. २२५). त्यांनी युद्ध विजय प्राप्त केल्या नंतर युद्ध करणे सोडून दिले. त्यांनी घोषणा केलेली होती की आता ते युद्धाद्वारे जगाला जिंकणार नाहीत. तर धम्मा द्वारे जगाला जिंकतिल.  जर आम्ही विक्रमादित्य (ई.स. ४००) आणि अकबर (ई.स १६००) यांना महान सम्राट मानले तर सम्राट अशोक या करिता महान झालेले नाहीत की त्यांनी आपला राज्यविस्तार वाढविला, उलट त्यांना महान बनविले ते त्यांच्या मनुष्या प्रति स्वतंत्रता आणि सर्व व्यापक तेजस्वीता, स्वदेश निती आणि विदेश निती व सत्याप्रति प्रेम आणि सत्याच्या प्रचाराने. याच कारणामुळे त्यांना सायबेरिया पासून श्रीलंका पर्यंतचे हितचिंतक मानल्या गेलेले आहेत. भारतातील इतर कोणत्याही सम्राटाचे यश अशा प्रकारे पसरलेले नव्हते. त्याचप्रमाणे दुसऱ्या कोणत्याही राजाचा अशा प्रकारचा प्रभाव इतिहासावर पडलेला नव्हता.'

सम्राट अशोक मौर्य वंशाचे असुन सुद्धा त्यांच्या नावा सोबत 'मौर्य' हा शब्द फारसा प्रचलित आढळून येत नाही. ज्या प्रमाणे त्यांचे आजोबा चंद्रगुप्त मौर्य म्हटले जातात, त्याप्रमाणे सम्राट अशोकाला, 'मौर्य' म्हटले जात नाही. *सम्राट अशोक हे 'सम्राट अशोक' किंवा 'धम्माशोक' किंवा 'पियदस्सी असोक' या नावाने प्रसिद्ध आहेत.*

मौर्य वंशा संबंधी अध्ययन करताना अनेक विद्वानांनी इतिहासकारांनी वेगवेगळे विचार प्रदर्शित केलेले आहेत. काही विद्वानांचे म्हणणे आहे की, सम्राट चंद्रगुप्ताने आपली आई मुरादेवीच्या नावावर 'मौर्य' वंशाची स्थापना केलेली आहे.

_*सुत्तपिटका मधील दीघनिकाय या पालि ग्रंथा मध्ये असा उल्लेख आलेला आहे, की पिप्पलीवन चे लोक हे क्षत्रिय कुळातील होते आणि ते 'मोरिय' नावाने ओळखले जात होते. बौद्ध आणि जैन परंपरे नुसार 'मोरिय' किंवा 'मौर्य' चा संबंध मोराशी आहे. नंदगढ मध्ये अशोका द्वारे निर्माण करण्यात आलेला स्तंभ आणि सांचीच्या स्तुपावर कोरल्या गेलेले मोर हे दीघनिकाय मधील वरिल मताचे समर्थन करतात.*_

राजा विड्दूभच्या आक्रमणाने कंटाळुन पिप्पलीवन चे मोरिष (मोर्च) हिमालया मध्ये निघुन गेले होते आणि तेथे राहु लागलेत. तेथे राहणारे आधि चे लोक मोर पाळत होते. आणि मोराच्या पंखाद्वारे घरांचे छत बनवित होते. याच कारणामुळे ते लोक मोरिय नावाने प्रसिद्ध झालेत. ते लोक सुद्धा अजातसत्तु च्या भितीने आधिच पळून गेले होते ते शाक्य होते. नंतर दोन्ही समुहांना एकाच 'मोरिव' नावाने ओळखले जाऊ लागले.

पालि महाबोधि वंस हा ग्रंथ वरिल मताचे समर्थन करतो. कुमार चंद्रगुप्त *'नंरिदं-कुल-संभव'* जो 'मोरिय' नगरामध्ये राहात होता तो तेथेच जन्मास आला. हे नगर शाक्यांच्या द्वारे वसविल्या गेले होते. नंतर चाणाक्याच्या मदतीने तो पाटली पुत्तचा राजा झाला. पालि महावंश हा ग्रंथ सुद्धा असे मत प्रदर्शित करतो की, मोरिय चंद्रगुत हा कुळामध्ये जन्मलेला होता. *'मोरियानं खत्तिवान वंसे जातं ।"*

सम्राट अशोकाच्या जन्मा संबंधी अनेक चमत्कारक, काल्पनिक कथा आढळुन येतात. अनेक इतिहास कारांचे अनुमान आहे की, सम्राट अशोकाची आजी किंवा आई ग्रीक कुमारी राहिली असावी, अशा प्रकारच्या अनुमानाची शक्यता सुद्धा असु शकते. कारण चंद्रगुप्त मौर्य आणि सेल्युकस यांच्यात वैवाहित संबंध असावा असे मानले जाते. दोन्ही मधे राजकीय संबंध असल्यामुळे मौर्य कुमारीचे सेल्युकस च्या राजमहालामधे आणि ग्रीक कुमारीचे चंद्रगुप्ताच्या राज महालामधे येणे जाणे अशक्य वाटत नाही. अशा प्रकारचा विवाह झालेला असेल तर या करिता कोणते ही विशेष प्रमाण आढळुन येत नाही, की राजा बिन्दुसार हा ग्रीक कुमारी पासुन जन्मास आलेला होता आणि अशोक त्यांचा नातु होता किंवा बिन्दुसाराने ग्रीक कुमारी सोबत विवाह केलेला होता ज्यांचा मुलगा अशोक होता. जर हे शक्य असेल तर ती ग्रीक कुमारी पर्सियन कुमारी पासुन जन्मास आलेली सेल्युकस ची मुलगी असावी.

*_पालि दीपवंस, समन्त पासादिका आणि महावंस या ग्रंथामध्ये अशोकाच्या आई संबंधी कोणती ही माहीती आढळून येत नाही. महावंश टीका ग्रंथा मध्ये आढळून येते की, अशोकाच्या आईचे नाव 'धम्मा' होते, जी क्षत्रियांच्या मौर्य वंशातील (भोरिय वंसजा) होती. आणि त्यांच्या कुटुंबाचा उपदेशक एक आजीवक होता. ज्याचे नाव जनसान, जरसान किंवा जरसोन होते. धम्मा ही बिन्दुसार राजाची प्रमुख पत्नी होती. (अग्गमहिसी). अवदानमाला मध्ये तिला सुभद्रांगी म्हटल्या गेलेले आहे._*

_महावंस टीका ग्रंथानुसार बिन्दुसार राजा ची आई चंद्रगुप्त मौर्याच्या मामाची मुलगी होती. तिच्या सोबत चंद्रगुप्ताचा विवाह झालेला होता.. *बौद्ध ग्रंथाच्या नुसार अशोकाच्या आईचे नाव सुभद्रांगी होते. ती चम्पा (भागलपुर) च्या ब्राह्मणाची मुलगी होती. असे म्हटले जाते की, ब्राम्हणाने सुभांगीला बिन्दुसार मौर्याला भेट स्वरूपामध्ये दिलेली होती. तिच्या नावावरूनच असे स्पष्ट होते की, ती सुंदर असावी.* सत्ताहीन होण्याच्या भितीने राज महालातील राण्यांनी तीला राजा पासून दूर ठेवले असावे. एक दिवस अचानक तिला राजाचे डोक्यावरील केस व्यवस्थित करण्याची संधी प्राप्त झाली. यात शंका नाही की, राजा बिंदुसार तिला पूर्णपणे विसरून गेलेला होता. असे होणे स्वाभाविक सुद्धा आहे. ती राजमहालातील शेकडो खीया मध्ये लुप्त होऊन गेलेली होती. तिच्या नवख्या स्पर्शा ने राजा प्रभावित झालेला होता. राजाने तिला तिच्या संबंधी विचारले. तिने आपल्या वडीलाद्वारे भेट स्वरूपात दिल्याची आठवण करून दिली राजाने तिला आपली राणी बनविले, पुत्राचा जन्म (ई.पू. ३०४) झाल्या नंतर ती म्हणाली की, आता मी शोक रहित आहे अर्थात मी अशोक आहे. मुलाचे नाव सिंहली परंपरेनुसार सुद्धा तेच झाले.

*_सिंहल परंपरे प्रमाणे अशोकाच्या आईचे नाव धम्मा होते. दिव्यावदान आणि अशोकावदान ची कथावस्तु एकच आहे. ती जनपद कल्याणी म्हटली जात होती. याच ग्रंथामध्ये इतरत्र तिला सुभद्रांगी आणि पुण्णा चम्पाच्या ब्राम्हणाची मुलगी म्हटल्या गेलेले आहे. (परंतु ही मान्यता ऐतिहासिक वाटत नाही. पौराणिक, काल्पनीक अशीच अधिक आढळुन येते.)_*

अशोकाच्या बालपणा संबंधी आणि त्यांच्या आई विषयी शिलालेखामध्ये काही ही माहीती प्राप्त होत नाही. बौद्ध ग्रंथावरून काही ना काही माहीती प्राप्त होते. पाली परंपरेनुसार अशोकाची एक बहीण होती. तिला अग्नी ब्रम्हा नावाचा मुलगा होता. त्याने अशोका ची मुलगी संघमित्ता (संघमित्रा) सोबत विवाह केलेला होता आणि त्यापासुन तिने सुमन नावाच्या मुलाला जन्म दिलेला होता. पालि ग्रंथ अशा प्रकारची माहिती उपलब्ध करून देतात की, राजा बिन्दुसाराला सोळा राण्या होत्या आणि त्यांच्या पासून १०१ पुत्र होते. त्यात सुमन कुमार सुमनकुमार सर्वात मोठा होता आणि अशोक हा सुमनकुमारापेक्षा लहान होता. *दिव्यावदानानुसार मोठ्या मुलाचे नाव सुसिम होते. अशोकाला एकच सख्खा भाऊ होता आणि तो अशोकपेक्षा लहान होता. त्याचे तिस्स नाव होते, असे सांगितले जाते. परंतु तो वितसोक या नावाने अधिक प्रसिद्ध होता.' चिनी साहित्या मध्ये सुदत्त किंवा सुगन नावाचा उल्लेख आढळुन येतो."*

*_थेरगाधे मध्ये दोन गाथा आढळुन येतात, एक विहारिय स्थविरा संबंधी आणि दुसरी वितसोक स्थविरा संबंधी. "पालि अट्ठकथाकार धम्मपाल असे मत व्यक्त करतात की, विहारिय स्थविर अशोकाच्या भाऊ तिस्सर होता आणि वितसोक यांचा दुसरा भाऊ विगतासोक होता. हे दोन्ही वेगवेगळे व्यक्ती होते."_*

असे म्हटले जाते की अशोक पहायला सुंदर नव्हता, म्हणूनच त्याचे वडील त्याला पसंत करीत नव्हते. परंतु ते अशोकाच्या बालपणा पासूनच अनेक गुणांनी अतिशय प्रभावीत होते. यामुळेच राजा बिन्दुसाराने त्याला उपराजा नियुक्त करून उज्जैनिला पाठविले होते. "त्याला उज्जैनिला पाठविण्याचे आणखी एक कारण असु शकते की, वडील हे अशोकाला आपल्या नजरे पासून दूर ठेवू इच्छित असावे.

*_उज्जैन पोहचण्याच्या आधि उपराजा अशोक विदिसा (म.प्र.) नगरा मध्ये थांबलेले होते, तेथे त्यांची एका व्यापाऱ्याच्या देवी नावाच्या मुली सोबत भेट झाली. तिला आपली पत्नी बनवुन (ई.पू. २८६) अशोक तिला आपल्या सोबत घेऊन उज्जैनला गेला. तेथे त्या श्रीमंत कन्या देवीला एका मुलगा झाला. " (ई.पू. २८४). हा तोच मुलगा होता जो नंतर 'महेन्द स्थविर' या नावाने प्रसिद्ध झाला आणि बौद्धधम्म प्रचारार्थ तो सिंहल दीपामध्ये गेला. महिन्दाच्या जन्माच्या दोन वर्षा नंतर (ई.पू. २८२) 'संघमित्ता' नावाच्या मुलीचा जन्म झाला._*

महावंस टीका ग्रंथा नुसार देवी अर्थात अशोकाची पत्नी अतिशय सुंदर आणि प्रभावी होती. यामुळेच तिच्या वडीलाने तिथे देव किंवा देवी हे नाव ठेवावयास लावले होते. *"महाबोधिवंस मध्ये (ई.पू. ९८-११०) तिला विदिशा महादेवी म्हटल्या गेलेले आहे आणि शाक्य कुमारी म्हणून संबोधल्या गेलेले आहे.* सिंहल दीप मध्ये जाण्याच्या आधि महिन्द स्थविर आपल्या आईला भेटण्या करीता विदिशाला गेले होते. तेव्हा आपल्या मुलाच्या निवासा करीता आईने विदिशागिरी" नावाचे विहार बनविले होते. उज्जैन मध्ये आपले कार्य पूर्ण करून अशोक आपल्या दोन्ही अर्थात मुलगा आणि मुलगी सोबत पाटलीपुत्रला गेलेत. त्यांच्या सोबत अशोकपत्नी देवी गेली नाही. ती विदिशा मध्येच राहीली."

*_तक्षशिला मधील विद्रोह आणि अशोक_*

याच वेळी तक्षशिलेच्या राज्यामध्ये विद्रोह होऊ लागला. त्या विद्रोहाला शांत करण्याकरिता राजा बिंदु साराने अशोकालाच अधिक योग्य मानले. त्या कार्या करिता अशोक तक्षशिला मध्ये गेले. त्यांच्या येण्याची बातमी ऐकून तक्षशिला मधील लोक त्यांच्या स्वागता करीता नगराच्या बाहेर आलेत. त्यांनी अशोक कुमाराला विनम्रता पूर्वक निवेदन केले की, तक्षशिला मधील नागरिक आपल्या किंवा सम्राटाच्या विरोधामध्ये नाहीत. आणि ते राजद्रोही सुद्धा नाहीत. परंतु दुष्ट मंत्र्याने तक्षशिलेच्या नागरिकांचा अपमान केलेला आहे. आम्हाला शांततेची आवश्यकता आहे आणि तक्षशिले करिता योग्य शासकाची आवश्यकता आहे. *"तक्षशिलेला पोहचतात कुमार अशोकाने तेथील नागरिकांचे मन जिंकले आणि त्यांनी तक्षशिलामध्ये पून्हा शांतता निर्माण केली."*

सम्राट बिन्दुसार अशोकाला आपला उत्तराधिकारी बनवू इच्छित नव्हते. परंतु राज्याचे मंत्री गण अशोकालाचा अधिक योग्य मानत होते. ते अशोकाच्या सामर्थ्याला आणि शक्तीला चांगल्या प्रकारे ओळखून होते. अशोकाला अवन्ती मध्ये आणि तक्षशिला मध्ये जे यश प्राप्त झाले त्या पासून राज्याचे अधिकारी प्रभावित झाले होते. यामुळेच राजा बिंदूसाराच्या मरणानंतर अशोकाने मंत्री गणाच्या मदतीने राज्य सिंहासनावर आपला अधिकार स्थापीत केला (ई.पू. २७३). राजसत्ता प्राप्ती च्या चार वर्षानंतर (ई.पू. २६९) अशोकाचे राज्याभिषेक झाले. अशोकाच्या राज्याभिषेकाच्या उशीर होन्याला अनेक कारण सांगितल्या गेलेले आहेत.

*_डॉ. काशीप्रसाद जयसवाल असे म्हणतो की, पंचवीस वर्ष वयाच्या आधी राज्याभिषेक करता येत नव्हता यामुळेच अशोकाला चार वर्षा पर्यंत प्रतिक्षा करावी लागली होती. परंतु महाभारतामध्ये विचित्रविर्य याचा अभिषेक बालवयामध्येच झालेला होता. अशोकाने स्वतःला सम्राट बनविण्याकरिता राधगुप्ताच्या मदतीने आपल्या ९९ भावंडाना मारून टाकलेले होते." नंतर अशोकाने त्याला आपला प्रमुख किंवा प्रधानमंत्रीचे पद दिलेले होते. डॉ. स्मिथ असे म्हणतात की, अशोकाच्या १७-१८ वर्षाच्या राज्य काळामध्ये सुद्धा त्याचे अनेक भाऊ जीवंत होते. हे फार अशक्य नाही की, जे भाऊ अशोकाच्या विरूद्ध होते, किंवा अशोक ज्यांना आपले विरोधक मानत होते. त्यांना त्याने मारून टाकले असावे. जे भाऊ अशोकाच्या बाजुने राहिले असतील ते जीवंत राहिले असतील. हे ही शक्य आहे की, अशोकाने चार वर्षा पर्वत आपल्या भावांच्या सोबत संघर्ष करीत आपला मार्ग तयार केलेला असावा. या कारणामुळेच अशोकाला राज्याभिषेकाला चार वर्षाचा उशीर झाला असावा."_*

*_अशोकाचे पाटलीपुत्रला येणे_*

असे आढळुन येते की, तक्षशिले मधील विद्रोहाला शांत करण्याकरिताचा अशोकाला उज्जैन वरून पाटलीपुत्रला बोलावले गेले असावे. अशोक तक्षशिले मधील विद्रोह शांत करून पुन्हा उज्जैनिला परतले होते. कारण जेव्हा बिंदुसार मरणावस्थे मध्ये होता तेव्हा अशोकाने उज्जैन वरून पाटलीपुत्रला जावुन राजसिंहासनावर आपले अधिकार स्थापित केले होते. त्यावेळी सुसिम किंवा सुमन" अशोकाचा मोठा भाऊ (दूसऱ्या आईचा मुलगा) दूर काश्मीर मध्ये होता. जेव्हा त्याला ही घटना कळली तेव्हा तो सुद्धा पाटलीपुत्रमध्ये आला आणि राजसिंहांसनाकरीता युद्ध करीत अशोकाद्वारे मारला गेला.

हे स्वाभाविक आहे की, जे बंधु सुमन यांच्या बाजू ने लडत असतील ते सर्व अशोका द्वारे मारल्या गेले असावेत. जे अशोका सोबत होते ते जीवंत राहिले असावेत. या कारणामुळेच अशोकाच्या शासन काळामध्ये सुद्धा त्यांचे अनेक भाऊ आणि त्यांचे कुटुंब पाटलीपुत्र व पाटलीपुत्राच्या बाहेर राहात होते.

जेव्हा सुमन राजकुमार मारल्या गेला तेव्हा त्याची पत्नी सुमनादेवी गर्भवती. ती पळून चांडाळांच्या वस्ती मध्ये गेली. तेथे ती एक निग्रोध (वडाचे झाड) झाडाखाली बसली आणि तेथे तिने एका सुंदर मुलाला जन्म दिला. निग्रोध झाडाखाली जन्म घेतल्यामुळे त्या मुलाचे नाव निग्रोध ठेवले गेले. त्या गावाच्या प्रमुखाने सुमना देवीला पाहिले. तिला आपली स्वामीनी मानुन त्याने सात वर्षापर्यंत आई आणि मुलाची सेवा केली. एक दिवस महावरूण स्थविराने त्या कुमाराला उपनिस्सय गुणांनी युक्त पाहून त्याच्या आई कडून परवानगी प्राप्त करून त्या मुलाला प्रव्रज्जीत केले. नंतर याच निग्रोध सामणेराचा बुद्ध उपदेश ऐकून अशोकाला बौद्धधम्मामध्ये आस्था उत्पन्न झाली.

*_सम्राट अशोकाच्या पाच राण्या होत्या. जेव्हा ते उपराजा होवून उज्जैनला जात होते. १) तेव्हाच त्याचा विवाह देवी नावाच्या विदिशाच्या एका धनवान व्यक्तीच्या मुलीशी झाला. अशोकाच्या दुसऱ्या राण्यामध्ये २) असंधीमित्ता, ३) कालुवाकी किंवा चारूवाकी किंवा कलविंका, ४) पदमावति आणि ५) तिस्सरक्खिता. राणीच्या शिलालेखा वरून असे आढळुन येते की कालुवाकी ही सम्राट अशोकाची दूसरी राणी होती. आणि ती कुमार तीवल (तीवर) ची आई होती. असंधिमित्ता ही अशोकाची प्रमुख राणी होती. सम्राट अशोकाच्या राज्याभिषेकाच्या सव्विसाव्या वर्षी असंधिमित्ता ही मरणास प्राप्त झाली. यानंतर चार वर्षानंतर सम्राट अशोकाने तिस्सरक्खा (दीव्यावदानातील तिस्सरक्षिता) ला प्रमुख राणी बनविले ती असंधिमित्ताच्या जीवन काळामध्ये ती तीची प्रमुख सेविका होती. महावंस (पाली) आणि दिव्यावदान (बौद्ध संस्कृत) या ग्रंथानुसार तिस्सरक्खिता ही बोधगयेच्या बोधिवृक्षाचा द्वेष करीत होती. कारण सम्राट अशोक बोधगयेचा बोधिवृक्षावर अतिशय प्रेम करीत होते. आपल्या जीवापेक्षा ही अधिक ही गोष्ट तिस्सरक्खिताला सहन झाली नाही. आणि तिने बोधगयेच्या बोधिवृक्षाला नष्ठ करण्याचा प्रयत्न केला._*

"कुणाल सम्राट अशोकाचा अतिशय प्रिय मुलगा होता. तो ज्यावेळी तक्षशिला मध्ये उपराजा पदावर होता, तेव्हा तिस्सरक्खिता ने क्रोधाने पेटून त्याचे डोळे काढावयास लावले. कारण ती त्याची प्रेमीका होऊ इच्छित होती. वास्तविकपणे कुमार कुणाल तिला आपली आई मानत होते. ज्याठीकाणी कुणाल ने आपले डोळे काढले होते, तेथे नंतर सम्राट अशोकाने शंभर फुट उंचीचा एक स्तुप बनविलेला होता. हा स्तुप दक्षिण पर्वताच्या उत्तरिय भागामध्ये आणि तक्षशिलेच्या दक्षिण-पूर्व भागामध्ये निर्मित होता. चिनी प्रवासी ह्युएन-त्सांग यांचे म्हणणे आहे की आंधळे लोक तेथे येऊन याचना करीत असत ज्यामुळे अनेकांचे डोळे दुरूस्त होत असत.

दीव्यावदान या ग्रंथानुसार कुणाल हा सम्राट अशोकाच्या प‌द्मावती राणीचा मुलगा होता. तो धर्मवर्धन (धम्मबंधन) किंवा धर्मविवर्धन (धम्माला वाढविणारा) या नावाने सुद्धा प्रसिद्ध होता. राणी प‌द्मावती आणि राणी कालुवाकी ह्या दोन्ही आपल्या मुलांच्या नावाने ओळखल्या जात होत्या. कुणाल आणि तिवल किंवा तिवर हे दोघांचे दोन उपनाव होते. जेव्हा राणी प‌द्मावतीला मुलगा झालेला होता, तेव्हा सम्राट अशोकाने त्याचे नाव धम्मविवद्धन (धर्मविवर्धन) ठेवले होते. परंतु त्याच्या डोळयांचे सौंदर्य पाहून त्याच्या मंत्र्यांनी सम्राट अशोकाला सांगितले की, कुमाराचे डोळे हिमालयामध्ये राहणाऱ्या कुणाल पक्षाच्या डोळयासारखे आहेत. यामुळेच कुमाराचे उपनाव कुणाल ठेवल्या गेले." ज्यावेळी सम्राट अशोक धम्मानुसार राज्य करीत होते, त्यावेळी कुणालाचा जन्म झालेला होता. याकरिताच सम्राट अशोकाने त्याचे नाव धम्मविवद्धन ठेवले होते." असे म्हटले जाते की, अगदी कुणालाच्या जन्माच्या आधि सम्राट अशोकाने ८४००० धम्माराजिक विहार बनवुन पूर्ण केलेले होते. तिवल किंवा तिवर जो बऱ्याच काळानंतर च्या शिलालेखा मध्ये कोशलचा राजा म्हणून उल्लेख आढळून येतो. त्याचे डोळे एका शिकाऱ्याच्या अतिशय तिक्ष्ण" डोळया प्रमाणे असल्यामुळे त्याचे उपनाव तिवल किंवा तिवर (तिव्र डोळे असलेला) ठेवल्या गेले. त्याच्या जन्माच्या वेळी सुद्धा सम्राट अशोक धम्मानुसारच राज्य करीत होता.

सम्राट अशोकाच्या जीवनामध्ये कलिंग युद्ध हे शेवटचे युद्ध होते. काही इतिहासकारांचया मतानुसार सम्राट अशोकाने हे युद्ध बौद्धधम्माचा स्विकार केल्या नंतर केलेले होते. कारण त्यावेळी सम्राट अशोक कट्टर बौद्ध नव्हता आणि तो बुद्धाच्या शिकवणूकीशी चांगल्या प्रकारे परिचित सुद्धा नव्हता." परंतु इतर ऐतिहासिक प्रमाणाकडे नजर टाकल्यास वरील प्रकारचे म्हणणे आधारहिन आढळुन येते. राज्याभिषेकाच्या आठव्यावर्षी " सम्राट अशोकाने कलिंग देशावर विजय मिळाविलेला होता. हे अतिशय भयंकर असे युद्ध होते. या युद्धामध्ये जिंकलेल्या (१,५०,०००) लोकांना कैदी बनवुन नेण्यात आले होते. या युद्धात दहा हजार लोक मारल्या गेलेले होते. आणि किती लोक तरी अधिक संख्येने भूकेने किंवा बिमारीने मारण पावले होते.

कलिंग राज्य अतिशय समृद्ध राज्य होते. धनधान्याने परिपूर्ण होते. मॅनमार आणि दक्षिणपूर्व आशिया सोबत त्याचे व्यापारी संबंध होते. हत्ति दंताच्या वस्तु करिता सुद्धा कलिंग राज्य प्रसिद्ध होते. तेथे हत्ति फार मोठ्या संख्येने असल्यामुळे त्यांचा युद्धा मध्ये फार मोठा वापर होत असे. ह्या भयंकर युद्धा मध्ये कलिंग राज्याच्या सैन्यामध्ये ६०,००० पायी सैन्य, एक हजार घोडस्वार आणि ७०० हत्ती होते." सम्राट अशोकाने कलिंग देशावर आक्रमण का केले होते. याचे कारण अस्पष्ट आहे. शक्यता आहे की, सम्राट अशोकाला कलिंग देशाच्या धनसंपत्तीने आकर्षित केले असावे किंवा मौर्य साम्राज्याचा विस्तार करण्याची भावना अशोकाच्या मनामध्ये राहिली असावी. यात मुळीच शंका नाही की, कलिंग देशातील लोक पराक्रमी होते आणि पराक्रम पूर्वक लढले होते. अनेक विद्वान या मताचे आहेत की, सम्राट अशोकाने कलिंगावर आक्रमणाआधि कलिंग राज्य बौद्ध धम्मावलंबी होते.

या महाभयंकर युद्धामुळे जी हानी झाली त्याचा सम्राट अशोकाच्या मनावर भयंकर परिणाम झाला. आई आणि लहान मुलांचे मनाला चीरणारे आवाज त्यांच्या कानामध्ये गुंजत राहिलेत. याचा सम्राट अशोकाला भयंकर पश्चाताप झाला. अशाच प्रकारच्या अवस्थेमध्ये एक दिवस सम्राट अशोकाने निग्गोध सामणेराला शांत भाव युक्त स्थितीमध्ये राजवाड्याच्या आंगणातून जातांना पाहिले. ज्याप्रमाणे बुडणाऱ्याला काठीचा आधार मिळावा अशाच प्रकारे सम्राट अशोकाच्या मनामध्ये संवेदना उत्पन्न झाली. संवेदनापूर्ण अवस्थेमध्ये सम्राट अशोकाने निग्गोध सामणेराला आपल्या जवळ बोलाविले. अशोकाने त्या सामणेराला म्हटले.

"तात ! आपण योग्य आसन ग्रहण करावे." निग्गोध सामणेर राज सिंहासना कडे आला त्याच्या राजसिंहासनाकडे आल्या नंतर सम्राट अशोकाने असा विचार केला.

"आज हा सामणेर माझ्या घराचा स्वामी होईल,"

आणि सम्राट अशोकाच्या हाताचा आधार घेत सामणेर निग्गोध सिंहासनावर चढून पांढऱ्या राजछत्राच्या खाली बसला. लहान सामणेराला सिहासनावर बसलेला पाहून सम्राट अशोक प्रसन्न झाला. सम्राट अशोकाने सामणेर निग्गोधाचा योग्य सन्मान केला. आपल्या करिता बनविण्यात आलेल्या भोजना मधुन सामणेर निग्गोधाला भोजनदान दिले. त्यानंतर सम्राट अशोकाने सामणेराला भगवान तथागता द्वारे उपदेशित धर्माविषयी विचारले. सामणेर निग्गोधाने सम्राट अशोकाला अप्पमादवग्ग (अप्रमादवर्ग) धम्मपदाचा उपदेश दिला." तो उपदेश ऐकून सम्राट अशोकाची बौद्धधम्माप्रति आस्था जागृत झाली."

सम्राट अशोकाने म्हटले, "हे तात! मी तुम्हाला आठ भोजन (आठ लोकांचे भोजन) देतो." सामणेर म्हणाले "मी त्याला आपल्या उपाध्यायाला समर्पित करित आहे.

नंतर सम्राट अशोकाने पुन्हा आठ भोजन दिले. सामणेर निग्गोधाने ते आपल्या आचार्याला अर्पण केले. सम्राट अशोकाने पून्हा आठ भोजन दिले. सामणेर निग्गोधाने ते भिक्खू संघाला अर्पण केले. नंतर आठ भोजन प्राप्त झाल्यानंतरच बुद्धीमान सामणेर निग्गोधाने ते स्विकार केले. दुसऱ्या दिवशी सामणेर निग्गोध बत्तीस भिक्खूंच्या सोबत राजमहालामध्ये गेले. सम्राट अशोकाने त्यांना आपल्या हाताने भोजन वाढले. आणि धम्मउपदेश ऐकल्यानंतर लोकांसह शरण (त्रिसरण) ग्रहण केले. "

त्यांनतर सम्राट अशोकाने हया संख्येला दुप्पट करीत क्रमाक्रमाने आठ हजारा पर्वत वाढवित दान दिले." आणि भिक्खूंना दान उपहार देऊन विचारले-

"तथागत बुद्धाद्वारे दिल्या गेलेले उपदेश किती आहेत ?

मोग्गलिपुत्त स्थविराने उत्तर दिले-

"राजा ! ८४,००० धम्म स्कन्ध (विभाग) आहेत."

हे ऐकून सम्राट अशोकाने म्हटले की "मी प्रत्येका करीता एक एक विहार तयार करवून सर्वांची पूजा करील. ""

यावरून स्पष्ट होते की, सम्राट अशोक बौद्धधम्मामध्ये संस्कारीत होवुन उपासक झालेला होता. " राज्याभिषेकाच्या अकराव्या वर्षाच्या उत्तरार्धामध्ये सम्राट अशोकाने बौद्धधम्माच्या निर्माणात्मक कार्याला सुरू केलेले होते.

*_सम्राट अशोकाचे बौद्ध उपासक होणे._*

काही विद्वान प्रामुख्याने भारतीय विद्वान सम्राट अशोकाला अबौद्ध सिद्ध करण्याचा अयशस्वी प्रयत्न करताना आढळून येतात. परंतु त्यांचे अशा प्रकारचे प्रयत्न यशस्वी झालेले नाहीत. हे सत्य आहे की, सम्राट अशोकाच्या शिलालेखा मध्ये बौद्धधम्माच्या येवजी केवळ 'धम्म' नावाचाच उल्लेख आढळुन येतो. हे अशक्य नाही की, त्याकाळापर्यंत धम्माच्या सोबत 'बुद्ध' किंवा 'बौद्ध' नाव लावण्याची प्रथा प्रचलित नसावी. पालि साहित्यामध्ये 'बुद्धधम्मा' करिता 'धम्म विनय' शब्द आढळून येतो. सम्राट अशोक एका विशाल राष्ट्राचे एक महान सम्राट होते. त्यांना अबौद्ध समाजाची ही तेवढीच चिंता होती. जेवढी बौद्ध समाजाची. या मुळेच सम्राट अशोकाने इतर ही धर्मावलंबीयांना मदत केलेली होती. जरी आजचे संप्रदायवादी काही वि‌द्वान सम्राट अशोकाला 'बौद्ध सम्राट' मानोत किंवा न मानोत परंतु देशामध्ये आणि देशाच्या बाहेर सुद्धा अशोकाने जे कार्य केलेले आहे, त्यामुळे कुणी ही स्विकार करील की, सम्राट अशोक 'बौद्ध सम्राट' होता. सम्राट अशोकाचे शिलास्तंभ व शिलालेख स्पष्ट शब्दामध्ये हे सांगतात की, प्रियदर्शी अशोक बौद्ध होता.

सप्म्राट अशोकाच्या बौद्ध असण्याचे हे सुद्धा एक फार मोठे प्रमाण आहे की, ते काही विद्वानांच्या मतानुसार बौद्ध भिक्खु झालेले होते. " आणि त्यांनी बौद्ध स्थळांची यात्रा केलेली होती. ९०० वर्षानंतर भारतामध्ये आलेले चीनी प्रभावी ईत्सींग यांचे म्हणणे आहे की, एका विशिष्ठ पद्धतीने अशोकाची प्रतिमा भिक्खूंच्या वेशामध्ये (चीवर) पाहीलेली होती." सम्राट अशोकाच्या भिक्खु होण्यावर विश्वास करता येते. कारण ईत्सींग या चीनी प्रवाशाच्या देशातील एका सम्राटाने दोन प्रसंगी चीवर परिधान केलेले होते. एक ई.स. ५२७ मध्ये व दूसरे ई.स. ५२९ मध्ये "त्याचप्रमाणे बाराव्या शतकामध्ये एक जैन राजासुद्धा भिक्खु (जैन साधु) झालेला होता. 'भिक्खु' अवस्थेमध्ये त्याने आपले नाव संघाचा शास्ता धारण केलेले होते. त्याने आपल्या शासन काळामध्ये अनेक प्रसंगी व्रत आणि उपवास केलेले होते. अकराव्या आणि बाराव्या शतकामध्ये जापानी सम्राट सुद्धा भिक्खु झालेले होते. त्या अवस्थे मध्येही तो उघडपणे आपल्या देशाचे मार्गदर्शन करीत होता. भिक्खु अवस्थेमध्ये आपल्या मुलांना नाव मात्र राजा बनविलेले होते. "

एखादा व्यक्ती अशा प्रकारची शंका घेऊ शकतो की, काय एखादा राजा एकाच वेळी भिक्खु जीवन व विशाल साम्राज्याचा भार सांभाळु शकतो काय ? भारतीय हिंदु परंपरे नुसार राजे म्हातारपणामध्ये सन्यास आश्रम स्विकार करीत होते. आणि आपल्या मुलांना राजसत्ता सोपवून वनामध्ये जात होते. परंतु चीन आणि जापान मधील सम्राटांनी एकाच वेळी दोन्ही कार्य करून दाखविले. हे अधिक शक्य आहे की, सम्राट अशोक बौद्ध स्थळांच्या यात्रेच्या वेळी भिक्खु बनलेले असावेत आणि नंतर पुन्हा गृहस्थ बनलेले असावेत. कारण बौद्ध भिक्खु हा चीवर त्याग करण्याकरिता नेहमीच स्वतंत्र असतो. आज सुद्धा थायलण्ड सारख्या देशामध्ये प्रत्येक बौद्ध गृहस्थ आणि तेथील राजा काही वेळा करीता (काही दिवसा करीता) प्रव्रज्जीत होतात.

बौद्ध होण्या संबंधी स्वत: सम्राट अशोक असे म्हणतात की, 'मी जवळ जवळ अडीच वर्षापासून उपासक राहीलेलो आहे. एक वर्ष पर्यंत मी चांगल्या प्रकारे प्रगती केलेली नाही, परंतु एक वर्ष जेव्हा मी संघाला (भिक्खु संघ) भेटायला गेलो. तेव्हा मला असे कळले की, मी चांगल्या प्रकारे प्रगती करीत आहे' अशा प्रकारे सम्राट एका दुसऱ्या शीलालेखामध्ये " सुद्धा स्वतःला 'उपासक' स्विकार करतो.

यामध्ये मुळीच शंका नाही की, सम्राट अशोक 'बौद्ध' होते. अशा प्रकारची भाषा तर अलिकडील राजकारणी सुद्धा बोलु शकत नाही. डॉ. रंगस्वामी असे प्रतिपादन करतो की, सम्राट अशोक पहिले महान शासक होते." जे बौद्ध होते डॉ. अमत्य चंद्रसेन यांचे म्हणणे आहे की, सम्राट अशोकाच्या सहाकार्यामुळेच बौद्धधम्म दुसऱ्या देशामध्ये पसरला. परंतु ज्या धम्माचा प्रचार सम्राट अशोकाने भारतामध्ये केला तो बौद्धधम्म नव्हता. हे शक्य आहे की, सम्राट अशोकाने ज्या धम्माचा प्रचार भारतामध्ये केला तो महायान किंवा हिनयानच्या रूपामध्ये नसावा. परंतु तो बौद्धधम्म नसावा किंवा हिंदु धर्म असावा याचे कोणते ही प्रमाण उपलब्ध नाही. सम्राट अशोकाने ज्या तिसऱ्या बौद्ध संगितीचे आयोजन केले होते. ते बौद्ध धम्माच्या प्रचाराचे कार्य नव्हते काय ? अशोकाच्या शिलालेखांचे अनेक किंवा जवळ जवळ संपूर्ण उपदेश बुद्धोपदेशच आहेत. अशाच प्रकारे सम्राट अशोकाने संपूर्ण भारतामध्ये (प्राचीन भारत) ८४,००० विहार बनविले होते. त्यांचे हे सर्व कार्य बौद्धधम्माचे उघड उघड प्रचार कार्य नव्हते तर काय होते ? काही विद्वान अशोकाचा 'व्यक्तीगत धर्म' आणि 'राजकिय धर्म' वेगवेगळे असल्याचे सांगतात. परंतु सम्राट अशोकाच्या कर्तुत्वाने सिहावलोकन केल्या नंतर असे काही ही आढळुन येत नाही. ते दोन्ही दोन वेगवेगळ्या स्वरूपामध्ये असतील ही तरी ते दोन्ही बौद्धधम्माचेच दोन रूप होते. यात मुळीच शंका नाही.

डॉ. के. वी. रंगस्वामी एका प्रसंगी असे म्हणतो की, अशोकांचा धर्म आपल्या स्थुल स्वरूपामध्ये केवळ ब्राह्मण धर्मच आहे. " डॉ. रंगस्वामी पुन्हा असेही म्हणतो की, अशोक बौद्ध होता आणि ईतर ठिकाणी अशोकाच्या धम्माला तो ब्राह्मण धर्म असल्याचे म्हणतो. डॉ. रंगस्वामी यांच्या हया दोन्ही मान्यता एक दुसऱ्याच्या विरोधी आहेत. वास्तविकपणे सम्राट अशोकाच्या धम्म हा ब्राह्मण धम्माशी कुठल्या ही प्रकारचा संबंध स्थापीत करित नाही. जसे आधि म्हटल्या गेलेले आहे की, बौद्धधम्म त्यावेळी धम्म विनयाच्या नावाने ओळखला जात होता. 'धम्म' या शब्दा सोबत 'बुद्ध' किंवा बौद्ध जोडण्याची परंपरा त्यावेळी प्रचलित झालेली नव्हती. अशोक पुत्र थेर महिन्द जेव्हा सिरिलंकेला गेले. तेव्हा त्यांनी सिरिलंकेचा राजा तिस्स यांच्या प्रश्नाचे या अर्थात शब्दामध्ये उत्तर दिलेले होते की "समनामयं महाराज धम्म राजस्स सावका.....' हे राजा, आम्ही धम्मराजा बुद्धाचे सावक आहोत. सद्धम्म किंवा बौद्धधम्म आणि अशोकाच्या धम्मामध्ये कोणत्याही प्रकारचा फरक आढळुन येत नाही.

*_प्रियदर्शी सम्राट अशोकाचा धम्म 'बौद्धधम्म'_*

सम्राट अशोकाच्या धम्म लक्षणा संबंधी विद्वानामध्ये वेगवेगळ्या मान्यता आहेत. या विद्वानामध्ये क्लिट, विंसेण्ट स्मिथ आणि डी. आर. भांडारकर हे प्रमुख मानता येईल. क्लिट यांच्या मतानुसार अशोकाचा व्यक्तीगत धम्म त्याच्या राजधम्माचेच एक दुसरे स्वरूप आहे. जे महाकाव्या मध्ये आढळून येते आणि जो राजकारणाची शिकवण देतो. विंसेण्ट स्मिथ यांचे म्हणणे आहे की अशोकाच्या धम्मामध्ये जो सिद्धांत आहे, ते सर्व धर्माचे सर्व सामान्य सिद्धांत आहेत. कमी किंवा जास्त प्रमाणात विन्सेण्ट स्मिथ यांचे म्हणणे डॉ. मुखर्जीच्या मान्यतेला अनुकुल आहेत. हे दोन्ही विद्वान अशोकाच्या धम्माला विश्वधम्म मानतात.

डॉ. सेनरत आणि डॉ. हुल्टस्व हे दोन्ही विद्वान अशोकाच्या धम्माचे निरिक्षण बुद्धोपदेशाच्या प्रकाशामध्ये करताना आढळून येतात. ते अशोकाच्या धम्माला बौद्धधम्मच मानतात. आणि ते या सिद्धांताचे सर्वात मोठे समर्थक आहेत. डॉ. डी. आर भांडारकर त्यांचे म्हणणे आहे की, अशोकाचा धम्म प्राचीन बौद्धधम्माची अनुकृती नाही. जो उपासकाद्वारे गृहस्थाद्वारे बुद्धाची पूजा करण्याचाच धम्म नव्हता. डॉ. भांडारकर आणि डॉ. राय चौधरी हे आमचे लक्ष बुद्धाद्वारे उपदेशित चक्रवर्ती राजाच्या आदर्शाकडे आकर्षित करतात. यांच्या समर्थनामध्ये डॉ. बेनी माधव बरूआ असे मत व्यक्त करतात की, सम्राट अशोकाचा धम्म संपूर्ण पणे बुद्धधम्माच्या सिद्धांताशी सरळ संबंध स्थापित करतो. इतर धर्म किंवा धार्मिक विचारांशी आणि मान्यतांशी मुळीच संबंध स्थापित करीत नाही. आणि या मान्यते मध्ये परिवर्तन करण्याचा आतापर्यंत कोणते ही कारण आढळुन आलेले नाही. " एखादा विद्वान याला राजधर्म म्हणू शकतो. किंवा बौद्धउपासक धम्म आणि विश्वधम्म माणील. परंतु या स्थिती मध्ये कोणत्याही प्रकारचे अंतर आढळुन येणार नाही. "ऱ्हिस डेव्हीड यांचे असे स्पष्ट निरिक्षण आहे की, अशोकाच्या धम्मामध्ये ईश्वर किंवा आत्मा आणि बुद्ध व बौद्ध धम्माचा उल्लेख आढळुन येत नाही."

उपासक शब्द बौद्ध व जैन दोन्ही साहित्यामध्ये उपलब्ध आहेत (थरस्ता, गहथा सिलालेख-12-13). धर्माच्या दृष्टि ने उपासक शब्द त्या श्रमण ब्राह्मण (भानु शिलालेख 13) धर्म संप्रदायाचे दायक मानले जातात (निकाय शिलालेख 13) उपासक ते गृहस्थ होते जे विभिन्न सामाजिक अनुक्रम आणि धर्म गुरूंच्या मार्गदर्शना नुसार जीवन मार्गावर चालत होते, विश्वास करीत होते (तत्रतत्र प्रसन्ना, शिलालेख 12). राजधर्म मनुष्य मात्राच्या सोबत प्राथमिक धार्मिकतेशी संबंधीत असताना सुद्धा तो शेवटी उपासक किंवा गृहस्थ धर्मायोग्य झाला. ह्या दोन्ही मध्ये फरक आहे. राजधर्माच्या मागे राज्य होते. परंतु उपासक धर्माच्या मागे अशाप्रकारची कोणती ही शक्ती नव्हती. परंतु परंपरांचे प्राबल्य आणि सामाजिक बंधन होते. तशाच प्रकारे धार्मिक प्रतिबंध हा दोन्हीचा उद्देश होता. सत्याप्रति आकर्षण आणि या जगामध्ये शांती व मरणांनतर परलोक प्राप्तीची भावना होती. निर्वाणाला प्राप्त करणे किंवा मोक्षाची प्राप्ती करणे त्यांच्या सामर्थ्यांच्या पलिकडील बाब होती. दोन्हीच्या आकर्षणाचे केन्द्रबिंदु होते दान, शील आणि मोक्ष प्राप्ती. येथे दान व शील आणि जीवनमुक्ती थे दोन साधन होते. स्वर्गाचा अर्थ होता (विपुले स्वर्गे), वरील लोक जेथे पुण्यवान व्यक्ती पोहोचतो. जो ईहलोकामध्ये पूण्य करतो. त्याला तेथे पर लोकामध्ये फळ प्राप्त होत असते (बहुफलाणं, साधवनि, शिलालेख-5 व 7).


उपासक धम्माच्या स्वरूपामध्ये अशोकाच्या धम्मा संबंधी न्हिस डेव्हीडस यांच्या तर्काप्रमाणे अधिक तर्क कदाचितच दुसरा कोणी आम्हाला देऊ शकेल. " डॉ. डी. आर. भांडारकर यांनी या विषयासंबधी सिगालोवाद सुत्ताचे उदाहरण देऊन तर्कानुरूप समजाविले आहे. महामंगल सुत्त आणि महामंगल जातक" मध्ये सुद्धा गृहस्थ धम्माचा उपदेश दिल्या गेले आहे. ते सर्व उपदेश अशोकाच्या शिलालेखामध्ये क्रमबद्ध आहेत आणि नविन पद्धतीने समजाविल्या गेलेले आहेत. या सर्वांच्या मुळा मध्ये हाच परमार्थ राहिला असेल की, भारतामध्ये बौद्ध प्रभाव कायम राहावा आणि बौद्धधम्माचा प्रचार व प्रसार व्हावा. सम्राट अशोकाने कर्तव्य आणि धार्मिकतेच्या आवश्यक सिद्धांतांचा समावेश आपल्या उपदेशा मध्ये काही प्रमाणात अशा प्रकारे केलेला आहे-


1) आई वडिलांची सेवा करणे आणि त्यांच्या आदेशाचे पालन करणे (मातरि पितरी सुसूसा शिलालेख, 3,11, 13 स्तंभलेख - 7 लघुशिलालेख).


2) गुरूजनांचा गौरव आणि आदर करणे (आचरिये अपचारिये सुसूंसे -


ठविये (लघुशिलालेख) गुरू सूसूसा (शिलालेख 13) गुरूनं अपचिति (शिलालेख 9 आणि लघु शिलालेख, स्तंभलेख 7).


3) मोठ्या व्यक्तीचा आदर करणे अगभूति सूसूसा (शिलालेख 


4) अनुभवि आणि मोठयांना आदर करणे आणि सेवा करणे भाईर सुसू बुध-सुसूस (शिलालेख 4), त्यांचा सल्ला घेणे आणि सेवेमध्ये तत्पर असणे वयो महालकान अनुपहिपति, (स्तंभ लेख 7). थेरानं बुधानं दसने (शिलालेख 8).


5) सद् भाव श्रमण ब्राम्हणांच्या प्रति साधुत्वाचा व्यवहार आणि त्यांच्या प्रति उदारता दाखविणे - समण वाभणेसु सम्पटिपत्ति, (शिलालेख 4, स्तंभ लेख) ब्राम्हण समणानं दानं (शिलालेख 3). अशाप्रकारे त्यांच्या तत्वज्ञानाने दसनेच (शिलालेख ४).


6) मित्र, सगे संबंधी सोबती व रातलगांच्या प्रति मित बंधुत पहाय नातिकेसु सम्दापटिपति (शिलालेख 13), दानं (शिलालेख 3,9).


7) दास आणि नौकर यांच्या सोबत दया भावनेचा व्यवहार-दास नतकम्हि सम्यपटिपत्ति (शिलालेख 9,11, स्तंभलेख 7).


8) आई वडिलांचे पोषण करणे आणि राजाच्या प्रति वडिलाचा भाव ठेवणे. (साधवनि शिलालेख 2).


9) प्राणिहिसे पासून अलिप्त राहणे आणि कुणाव्याहि विद्यारांना नुकसान न पोहचविणे अनारंभो प्राणानं अविहिंसा भूतानं (शिलालेख 4) "


सम्राट अशोकाच्या शिलालेखामध्ये गृहस्थांचे करतुत्व स्पष्ट पणे सांगितल्या गेलेले आहे. ज्याप्रमाणे हे पित्याद्वारे किंवा पुत्राद्वारे किंवा भावाद्वारे किंवा पतिद्वारे करणिय आहे."


त्याच प्रमाणे मित्र, संबंधी किंवा नातलग व शेजारी द्वारे हे योग्य आहे. याला केले पाहिजे (शिलालेख 9,11).


अशोकाची नियमावलि व बौद्धन्याय


सम्राट अशोकाची नियमावली सुद्धा बौद्धमनो विज्ञान किंवा न्यायाशी संबंध ठेवणारी आहे. लघुलेखा मध्ये सम्राट अशोक हे वंडिये निठुलिये कोथे, माने आणि ईश्या इत्यादि शब्दांचा उल्लेख करतात. जे मानसाला न्हासा कडे नेतात, 'आसिनव गामिनी',


साधवनि शिलालेख एक ची सुची हया नियमांचा उल्लेख इच्या या अर्थाने करित असतो इ सा, असुलोष (उत्तेजना), निठुलिये (निष्ठुरता) आणि तुलना" कठोरता हे नियम धम्मदाबाद सुत्त" मध्ये एका मागे एक येत असतात. अशाच प्रकारे पूराभेद सुत्तामध्ये आणि महानिदेस सुत्तामध्ये समान स्वरूपामध्ये समजाविले गेलेले आहे. पालिच्या दोन नियमावलिना एकाच सोबत घेण्यात आलेले आहे. जी पुढील शब्दांशी संबंध ठेवत असते. क्रोध, ईष्या, मान, चंण्डिक्क आणि अस्सुलोप या मध्ये दोन दोन विशेषण आहेत. चण्ड आणि फरूस एकाच प्रकारच्या व्यक्तीवर लागू होतात." अशोकाच्या अखखसे अचण्डे सखिनालंभे किंवा अचंडे अफलुसं (साधवनी शिलालेख -1) चे शब्द आपल्या पालि स्वरूपामध्ये अकक्कसं, अफरूसं (जातक -3 पा. 248) आढळून येतात. अशोकाचे सखिना लम्भे सरळ पालिच्या सहवासो (जातक 4, पा. 110) शी संबंध ठेवतो.


अशोकाच्या शिलालेखामध्ये दोन शब्द आपले महत्वपूर्ण स्थान ठेवित...


पुढील भागात 

मुक्तीदाता विशेषांक


प्रियदर्शि सम्राट अशोक (जयंती विशेष)

भाग 8


असतात - दान आणि दया, दयेकरिता पालिमध्ये अनुहया शब्द आहे. भगवान बुद्धाच्या उपदेशानुसार अनुया पासून सहानुभूति समानता आणि सहहृदय भाव (मेत्तचित्तता) था बोध होतो. दया शुद्ध करूणा (कारूण्य) शी संबंध ठेवीत असते. लहानांच्या प्रति अनुकंपा, दान, दयाचे स्पष्टीकरण आहे. दानाचा अर्थ त्याग आहे. (पालिचाग किंवा परिच्छाग) अशोक दान कर्माला अनेक अर्थाने प्रयोग करतो. स्तंभलेख दोन मध्ये सम्राट अशोक डोळे दान (चक्खु दाने) आणि जीवनदान (पानदखिनाये) चा उल्लेख करतो. अशा प्रकारे अनेक उदाहरण देता येतील.


सम्राट अशोकाकरीता योग्य प्रकारे धम्म केवळ जीवन मार्ग किंवा मनुष्य स्वभावाला विकसित करण्या करिताच नव्हते तर मनुष्यमात्राचे हृदय जिंकण्याचे एक शख सुद्धा होते. आजच्या राजकारणाच्या अर्था मध्ये स्थायी सभ्यता स्थापित करणे, एका देशाचे दुसऱ्या देशा सोबत संबंध स्थापीत करणे आणि नवीन राष्ट्रीयतेचे निर्माण करणे हा सम्राट अशोकाचा उद्देश होता. सम्राट अशोकाच्या धम्मविजयाने दुसऱ्या देशांच्या सोबत भारताचे संबंध स्थापीत केले. त्यांचा धम्म विजय त्या चार महान धम्मविजया मधील एक होती. जी मुस्लीम पूर्व भारतामध्ये इण्डो आर्यान च्या द्वारे करण्यात आलेली होती. इतर तीन विजय हया अग्नीच्या दिग्विजय होत्या. महाकाव्याचे धर्मविजय आणि कारण्डव्यूह त्रैलोक्य विजय.


धम्मविजयाच्या सिद्धांताचे बिज


धम्मविजयाच्या सिद्धांताचे बिज आणि विकास बौद्ध विचारधारेच्या द्वारे व ब्राहाण विचारधारेच्या द्वारे, अशाप्रकारे दोन्ही द्वारे प्रारंभ झालेले होते. ब्राह्मण कौटिल्याच्या अर्थशास्त्रानुसार दुर्बलांच्या द्वारे दुसऱ्यांच्या सामर्थ्याला स्विकार करणे हा विचार धम्मविजयाच्या मार्गाला समाधान मिळवून देते. संस्कृत महाकाव्यामध्ये सुद्धा हे स्पष्ट पणे म्हटल्या गेलेले आहे की, पांडवाच्या दिग्विजया अंतर्गत असलेले उपहारांचे देणे किंवा लगान स्विकार करणे किंवा सत्ता स्विकार करणे किंवा स्वामित्व मान्य करणे. ब्राह्मण विचारधारेचा धर्मविजय तलवारिच्या बळावरच होत राहिला. सम्राट अशोकाचा धम्मविजय मध्यममार्ग स्विकार करतो. जेथे शांती (सकावे हैं) आणि साधारण शिक्षा (लघु दण्डता) चे विधान करण्यात आलेले आहे. (शिलालेख 13) बौद्ध धम्मविजय तलवारीशिवाय किंवा सैन्याच्या मदतीने दंडरहित, शख रहित व मनुष्यत्वाच्या श्रेष्ठ आदर्शा द्वारे (धम्मेन अभिविजय) होत राहिलेला आहे. अशोकाच्या शिलालेखामध्ये कुठे ही सैन्याचा निषेध नाही आणि पूर्णपणे सैन्याचे विधान सुद्धा नाही. भगवान बुद्धाच्या धम्मविजय" च्या आधारेच धम्माशोकाचा धम्मविजय वाढत राहिला. अशोका च्या धम्मविजयाचे मुळ तत्व भगवान बुद्धाच्या धम्मविजयाचेच होते,


भगवान बुद्धाच्या महापरिनिब्बाणा नंतर त्यांच्या अवशेषावर वेगवेगळ्या राजांनी आप आपल्या राज्यामध्ये आठ स्तूप बनविलेले होते. सम्राट अशोकाने त्या सात स्तूपामधून भगवान बुद्धाच्या शारिरीक धातु काटुन घेतल्यात. जेव्हा रामगामध्या स्तूपा मधून भगवान बुद्धाच्या अस्ती काढण्यात येऊ लागल्या होत्या तेव्हा तेथील तळयामध्ये एक दैत्य मनुष्याच्या स्वरूपामध्ये सम्राट अशोकाला आपल्या निवास स्थानी घेऊन गेला आणि प्रार्थना केली की, तेथील स्तूपामधून भगवान बुद्धाच्या अस्ती काडु नये. तेव्हा त्याच्या विनंती वरून सम्राट अशोकाने रामगामच्या स्तूपामधील भगवान बुद्धाच्या अस्ती तेथेच राहु दिल्या, अशा प्रकारची मान्यता प्रचलीत होती.


आधिच म्हटल्या गेलेले आहे की, सम्राट अशोकाने आपल्या संपूर्ण साम्राज्यामध्ये 84,000 विहाराच्या सोबतच तेवढयाच संख्येमध्ये स्तूपांचे निर्माण कार्य सुद्धा केलेले होते. या सर्व ठिकाणी समान स्वरूपामध्ये तथागताच्या शारिरीक धातु ठेवण्यात आलेल्या होत्या.


विहार आणि स्तूप प्रामुख्याने ऐतिहासिक व महत्वपूर्ण ठिकाणीच बांधल्या गेलेले होते. उदा. कपिलवस्तु जवळील चैत्य अर्थात स्तूप जेथे सिद्धार्थ कुमाराने गृहत्याग नंतर सर्व प्रथम विहार केलेला होता. आणि ज्या ठिकाणी सिद्धार्थ कुमारोन आपल्या तलवारीने आल्या डोक्याचे केस कापलेले होते. 


सातव्या शतकातील चीनी यात्री व्हेन सांग असे वर्णन करतो की गांधार प्रदेशामध्ये हजारो स्तुप आणि विहार होते. ज्यामधील अनेक विहार आणि स्तूप खंडीत झालेले होते. त्याचप्रमाणे शेजारच्या उदयेन राज्यामध्ये चौदा हजार पेक्षा कमी विहार नव्हते. तक्षशिला मधील विहार व स्तूपांची संख्या सुद्धा फार मोठी होती. प्राचीन तक्षशिला नगराच्या पूर्वे कडील पहाडी विहारांनी वेढलेली होती आणि शहरामध्ये या पेक्षा ही अधिक संख्येने संघाराम विद्यमान होते. जेव्हा तिस्स रक्खिता ने तक्षशिलेच्या उपराज कुणाल कुमार यांचे डोळे काढावयास लावले होते, तेथे सुद्धा सम्राट अशोकाद्वारे एक चैत्य बनविण्यात आले होते. अमिअरल व नम्रनाला यांच्या मध्ये तक्षशिला मधील एक संघाराम (महाविहार) होते, ज्याला शक्यता आहे, सम्राट अशोका द्वारेच बनविण्यात आलेले होते. हे स्थळ अतिशय महत्वाचे आहे. याचे प्राचीन नाव धम्मराजिक होते. असे मानले जाते की, जेवढे स्तूप भगवान बुद्धाच्या अस्थिवर निर्माण करण्यात आलेले होते, ते सर्वाच्या सर्व सम्म्राट अशोका द्वारेच निर्माण करण्यात आले होते.


राजा बिंदुसाराच्या जीवन काळामध्ये सम्राट अशोक तेथील विद्रोहाला शांत...


पुढील भागात 

मुक्तीदाता विशेषांक


प्रियदर्शि सम्राट अशोक (जयंती विशेष)

भाग 9


करण्याकरिता तक्षशिलेला गेला होता. परंतु तो काश्मिर ला गेला असेल असे निश्चित पणे म्हणता येत नाही. तरी परंतु श्रीनगर च्या निर्मिती चे श्रेय्य अशोकालाच दिले जाते." अशाप्रकारे सम्राट अशोकानेच काश्मीर ला बौद्धधम्माशी परिचित केले होते. सम्राट अशोकाने देवो पाटन (देवपट्टन) नावाचे नगर नेपाळ मध्ये स्थापीत केले होते. राजधानी पाटलीपुत्त मध्ये सम्राट अशोकाद्वारे निर्माण करण्यात आलेले दोन संघाराम पातील एक अशोकाराम व दूसरा कुक्कुटाराम प्रसिद्ध आहे.


सम्राट अशोकाद्वारे बौद्ध धम्माला स्विकारल्या नंतर सर्व सामान्य लोकांची अभिरूची सुद्धा बौद्धधम्मा कडेच वाढली. धम्मप्रचाराकरीता राज्य कोशामधून बऱ्याच मोठ्या प्रमाणात धन संपत्ती खर्च करण्यात येऊ लागले. दान देणे व प्रामुख्याने भिक्खूंना भोजन दान देण्यामध्ये आपल्या उदारतेमुळे ते अनाथपिण्डिका सारखे 'दायक' म्हटल्या गेले.


सम्राट अशोकाने आपल्या धम्मगुरू मोग्गल्लिपुत्त तिस्स यांच्या प्रेरणेने श्रद्धापूर्वक बौद्ध स्थळांची यात्रा केली. ते जेथे जेथे गेलेत तेथे तेथे त्यांनी अर्थात सम्राट अशोकाने स्मारक स्वरूपामध्ये स्तूप, विहार बनविलेत आणि मोठमोठाले स्तंभ(अशोक स्तंभ) स्थापीत केलेत आणि त्यावर लेख कोरलेत, शिलालेख लिहिलेत. हया अनेक स्मारका मधील काही स्मारक फाहीयान (पाचवे शतक) आणि व्हेन त्यांग (सातवे शतक) यांनी पाहिलेत आणि त्यांनी आपल्या यात्रा विवरणामध्ये वर्णन सुद्धया केलेले आहेत. अशोकाचे हे शिलालेख व स्तंभ लेख आपल्या प्राचीन भारतीय इतिहासाचे मैलाचे दगड आहेत.


सम्राट अशोकाचा आजोबा सम्राट चंद्रगुप्त मौर्य आणि वडिल बिंदुसार यांनी मौर्य साम्राज्याचा फार मोठ्या प्रमाणात विस्तार केलेला होता. त्यांनी हा राज्य विस्तार प्रमाण किंवा आक्रमण या द्वारे केलेला होता. परंतु सम्राट अशोकाने विहार यात्रा मृद यात्रा व विजय यात्रा इत्यादीचा निषेध करून धम्मयात्रा आणि धम्मयात्रामध्ये सम्राट अशोक युद्ध प्रयाण प्रमाणेच फार मोठ्या थाटाने एका सम्राटाच्या स्वरूपामध्ये यात्रा करित होता. त्यांच्या सोबत सरदार, मंत्री फार मोठ्या आकाराचे हत्ती, घोडे, मुर्तीकार, शिल्पकार व भिक्खु संघ होता. त्यांचा परिवार सुद्धा सोबत राहात होता.


अशोकाची धम्मयात्रा


सम्राट अशोकाच्या धम्मयात्रा (ईसा पूर्व 249) त्यांच्या राज्याभिषेकाच्या वीसाव्या वर्षी प्रारंभ झाल्यात. सम्राट अशोक आपले आचार्य गुरू मोग्गल्लिपुत्त तिस्स यांच्या मार्गदर्शनामध्ये सर्वात आधि भगवान बुद्धाचे जन्म स्थान लुम्बीनीला गेले. या यात्रा मध्ये सम्राट अशोका सोबत त्यांचे दुसरे धम्मगुरू आचार्य उपगुप्त स्थविर सुद्धा सोवत होते. सम्राट अशोकाने लुम्बिनी मध्ये एक विशाल स्तंभ स्थापित करविले. त्या स्तंभावर खालील लेख पालि भाषेमध्ये आणि धम्मलिपी मध्ये पुढील प्रमाणे कोरण्यात आलेला होता.


देवानपियेन पियदसिन लाजिन वीसतिवसा भिसितेन। 

अतन आगाच महीयिते हिद बुधे जाते सक्यमुनीति। सिलाविगडभी चा कालापिते सिलाथमे च उस पापिते । 

हिंद भगवं जाते ति, सुमिनिगामे उबलिके कते, अठ भागियेच।


देवांना प्रिये प्रियदर्शी, आपल्या अभिषेकाच्या वीसाव्या वर्षी येथे पूजा करित आहे. कारण येथे भगवान बुद्ध सक्यमुनिचा जन्म झालेला होता. शिलास्तंभ स्थापित करण्यात आले. आणि येथे भित्त सुद्धा बनविण्यात आली. कारण येथे भगवान (तथागत) जन्मलेले होते. आणि लुम्बिनी गाव राज्यकरापासून मुक्त करण्यात येते आहे. जो आठवा भाग राज्याला दिला जात होता.


जो पर्यंत हे शिलास्तंभ लेख प्राप्त झालेले, नव्हते तो पर्यंत अनेक विद्वान लोक भगवान बुद्धा ला ऐतिहासिक महापुरूष मानायला तयार नव्हते. सम्राट अशोक लुम्बिनी वरून कपिलवत्थुला गेले होते. त्यानंतर सात्वत्थि, सारनाथ" कुशिनारा, आणि बोधगया इत्यादीची यात्रा करित पाटलीपुतला परतले होते.


बौद्ध इतिहासकार तारानाथ यांच्या मतानुसार सम्राट अशोक नालंदाला सुद्धा गेले होते. त्यांनी तेथे सारिपुत्ताच्या चैत्याची पूजा केलेली होती आणि तेथे एक संघाराम (भिक्खूंचे निवास स्थान) बनविले होते, म्हणूनच सम्राट अशोकाला नालंदा महाविहार (विद्यापीठ) चे पहिले संस्थापक मानले पाहिजेत.


भगवान बुद्ध जेथे जेथे विचरण करित राहिलेत किंवा त्याचे सावक (भिक्खु) गणांनी चारिका केली होती, त्या त्या सर्व ठिकाणी सम्राट अशोकाने सुद्धा यात्रा केलेली होती. सम्राट अशोकाच्या धम्म यात्रेचे वर्णन व्हेनत्सांग या चीनी प्रवासाने आपल्या यात्रा वृत्तांता मध्ये केले आहे. अशाप्रकारे सम्राट अशोका द्वारे निर्माण करण्यात आलेल्या विहाराची आणि चैत्यांची माहिती आढळून येते. चीनी यात्री व्हेन-सांग यांच्या नुसार धम्माशोकाने तक्षशिला मध्ये तीन फार मोठे स्तुप बनविलेले होते. जे शंभर शंभर फुट उंच होते. नगरहार (कंदहार) च्या स्तुपा संबधी त्यांनी लिहिलेले आहे की, ते स्तुप 300 फुट उंच वनविण्यात आले होते. या व्यतिरिक्त सम्राट अशोकाद्वारे मधुरा (मथुरा) थानेश्वर, कनौज, साकेत (अयोध्या), प्रयाग (इलाहाबाद), कोसंबी, सावत्वी, श्रीनगर, कपिलवत्यु, कुशीनगरा, काशी, सारनाथ, मसाद (शाहाबाद) आटवी...


पुढील भागात 

मुक्तीदाता विशेषांक

प्रियदर्शि सम्राट अशोक (जयंती विशेष)

भाग 10


वैशाली, श्वेतपूर (हाजीपुर), राजगृह (राजगृह), बोधगया, हिरण्यपर्वत आणि महाराष्ट्र इत्यादि प्रदेशामध्ये बनविण्यात आलेल्या स्तूपांचे सविस्तार वर्णन आढळून येते. पाटलिपुत्ता संवधी लिहितांना व्हेनत्सांग असे लिहितो की, तेथे शेकडो संघाराम आणि विहार विद्यमान होते. त्यातील काही तेव्हाही सुरक्षित होते.


महान चीनी यात्री व्हेनसांग पुढे असे ही लिहितो की नगर (पाटलीपुत्त), व्या उत्तर भागामध्ये एक स्तंभ आहे. जेथे अशोक राजाचे द्वार आहे. त्या जागे पासून दक्षिण दिशेला एक स्तुप आहे आणि त्याच्या शेजारीच एक विहार आहे, ज्यात भगवान बुद्धाच्या पायाचे चिन्न होते. हे पदचिन्न एक फुट आठ इंच लांब आणि सहा इंच रुंद होते. त्यात चक्र (धम्म चक्र), कमळाचे फुल आणि अष्टांगिक मार्गाचे प्रतिक चिन्ह कोरलेले होते. त्या विहाराच्या उत्तरे मध्ये सुद्धा एक स्तंभ आहे. ज्यावर लिहिलेले आहे की, "अशोकाने तीनदा संपूर्ण जम्बुद्विपाला बुद्ध, धम्म आणि संघाला दान दिलेले होते." राजधानी पाटलिपुत्तच्या दक्षिण पूर्व मध्ये कुक्कुटाराम विहार आहे. त्याच ठिकाणी सम्राट अशोक भिक्खूंना (समण) चार प्रकारचे दान देत असत.


डॉ. जेन फिल्लिओज यांचे म्हणणे आहे की, अशोकाने आपली धम्मयात्रा अगदी 256 दिवसामध्ये पूर्ण केलेली होती. प्रश्न उपस्थित होतो की, सम्राट अशोकाने खरोखर 256 दिवसामध्येच आपल्या धम्म यात्रेला पूर्ण केले होते काय ?


वरिल म्हणण्याचे हेच उत्तर असु शकते की, कारण ज्यादिवशी अशोकाने आपली धम्मयात्रा समाप्त केली त्याच दिवशी भगवान तथागताच्या महापरिनिर्वाणाला सुद्धा खरोखर 256 वर्ष पूर्ण झालेले असावेत. असे अनुमान करता येईल.


स्थविर महेन्द्राच्या आई पासून प्रेरितहोवून सम्म्राट अशोकाने सर्वात आधि सांचीचे विहार आणि स्तूप (मध्यप्रदेश) वनविले असावे. आणि शिलालेख नंतर लिहिले गेले असावेत. या लेखामध्ये सम्राट अशोक भिक्षु आणि भिक्खुनींना संघामध्ये मतभिन्नता विवाद उत्पन्न न करण्याची कठोर सूचना देतो व म्हणतो की, जो संघामध्ये मतभेद उत्पन्न करील त्याला पांढरे कपडे नेसायला दिले जाईल आणि त्याला विहारातून बाहेर काढून दिले जाईल. (अनावासासि)"


सम्राट अशोकाच्या काळा आधि भारतीय घर, भवन, लाकडांचे बनविले जात असत. तशाच प्रकारचे जसे आज सुद्धा म्यानमार मध्ये लाकडांच्या इमारती, घरे दारे बनविलि जातात. सम्राट अशोकाच्या काळा मध्ये दगडांचे भगवन, घर तयार करण्याची परंपरा कदाचित परशियामधून आली असावी. सम्राट अशोकाचे शिलास्तंभसुंदर, गुळगुळीत व चमकदार आहे. यावरून असे लक्षात येते की, हे कार्य कीती कष्टाने व परिश्रम पूर्वक करण्यात आले असावेत.


अशोक चक्र किंवा धम्मचक्र हे भगवान बुद्धाद्वारे उपदेशिलेल्या प्रतित्य समुत्पाद आणि आर्य अष्टांगिक मार्गाच्या आधारे बनविल्या गेले. हे त्याचेच प्रतित आहे. सारनाथ मध्ये शिलास्तंभाच्या वर बनविण्यात आलेले चार सिंह हे भगवान युद्धाद्वारे चार ही दिशांना करण्यात आलेल्या सिंहनादाचे द्योतक आहे. अशाच प्रकारे घोडे, बैल (सांड), हत्ती आणि हंस हे सिद्धार्थ कुमार अर्थातच भगवान बुद्धाचे प्रतिक मानल्या गेलेले आहे किंवा मानले जातात.


सम्राट अशोकाच्या काळामध्ये भगवान बुद्धाच्या महापरिनिर्वाणाच्या 260 वर्षानंतर अशोकारामा मध्ये साठ हजार भिक्खू विहार करित होते." तशाच प्रकारे संपूर्ण देशामध्ये भिक्खूंची संख्या फार मोठया प्रमाणामध्ये वाढलेली होती. त्यावेळी भिक्खू आणि भिक्खूणिचा सन्मान सुद्धा वाढलेला होता. दिपवंसा मधील उल्लेखा प्रमाणे आजीवक परिव्राजक व इतर विचार धारेना मानणारे साधू भिक्खूंच्या चीवरामध्ये या आदर सत्काराचा चुकीच्या पद्धतीने लाभ घेऊ लागलेले होते. यावरून असे आढळुन येते की, जे भिक्खु धेरवादी बौद्ध परंपरेला मानत नव्हते त्यांना 'आजीवक' किंवा 'अन्यमतावलंबी' म्हणून भिक्षु संघामधून बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आलेला होता. आणि हा प्रयत्न यशस्वी सुद्धा झालेला होता. भगवान बुद्धाच्या महापरिनिर्वाणा नंतर 100 वर्षा नंतर जी दूसरी धम्म संगिती झालेली होती त्यावेळी सुद्धा वैशालीच्या हजारो भिक्खूंनी आपली संगिती अर्थात परिषद स्वतंत्र पणे आयोजित केलेली होती. सम्राट अशोकाच्या वेळी त्यांच्या संखे मध्ये बरीच वाढ झाली होती. सम्राट अशोकाने मोग्गल्लिपुत्त तिस्स स्थविराच्या अध्यक्षतेखाली भिक्खु संघाच्या (थेरवाद) आग्रहा वरून तिसरी संगिती आयोजित केलेली होती. दूसऱ्या आणि तिसऱ्या संगितीच्या आधिच भगवान बुद्धाच्या महापरिनिर्वाणा नंतर लगेच तीन महीने पूर्ण होताच राजगृहमध्ये वैभार पर्वता वरील सत्तपणि गुहेमध्ये आयोजित करण्यात आलेली होती. आणि या संगितीला मगध राजा अजातसत्तुचे संपूर्ण संरक्षण प्राप्त होते. वैशाली मध्ये पहिल्या धम्म संगिती नंतर 100 वर्षानी जी दूसरी धम्म संगिती झाली त्या संगितीला वैशालीचा राजा काळाशोकाचे संपूर्ण राजकिय संरक्षण प्राप्त होते.


भिक्खू संघामध्ये विवाद


इतिहासकार आर. आर दीवाकर असे विचार स्पष्टपणे प्रतिपादन करतो की, सम्राट अशोका ने निश्चितपणे बौद्ध धम्माचा स्विकार केलेला होता. परंतु सम्राट अशोकाने संप्रदाय विशेष बौद्ध धम्माची बाजु घेतलेली नव्हती पाटलीपुत्त मध्ये आयोजित तिसऱ्या संगितीच्या अवलोकनावरून व पुरातात्वीक उत्खननावरून असे...


पुढील भागात 

मुक्तीदाता विशेषांक


प्रियदर्शि सम्राट अशोक (जयंती विशेष)

भाग 11


स्पष्ट पणे आढळुन येते की, सम्राट अशोकाने धेरवादी बौद्ध धम्मचीच विशेष व आग्रहपूर्वक बाजू घेतलेली होती. अभिधम्म पिटकाच्या अंतर्गत मानल्या गेलेल्या 'कथावान्णु' या ग्रंथाचे कर्ते सम्राट अशोकाचे गुरू स्थविर मोग्गल्लिपुत्त तिस्स हे होते. या संधामध्ये त्यांनी इतर मताचे खंडन केलेले आहे. आणि शेवटी त्यांनी थेरवादालाच मूळ बुद्धवचन मानलेले आहे. सम्राट अशोकाचे शिलालेख सुद्धा कथावत्युच्या सिद्धातांचे, मान्यतांचे समर्थन करतात.


काही काळानंतर पाटलीपुत्तच्या विहारामध्ये राहणारे धम्मवादी व अधम्मवादी भिक्खूंच्या मध्ये मतभेद निर्माण झालेत. ती मतभिन्नता, विवाद कोणत्याही प्रकारे शांत होत नाही हे पाहून स्थविर मोग्गल्लिपुत्त तिस्स दुक्खी होवून पाटलिपुत्ताचा त्याग करून अहोगं " पर्वतावर निघून गेलेत. तेथे चार वर्ष पर्वत विवाद चालत राहिला. उपोसथ कर्मसुद्धा बंद पडले. उपोसथ कर्माकरिता सर्वांचे एके ठिकानी येणे आवश्यक


होते. विनयानुसार एकाच ठिकाणी वेगवेगळे उपोसथ कर्म करता येत नव्हते. भिक्खूंच्या विवादाला शांत करण्या करिता सम्राट अशोकाने आपल्या एका मंत्र्याला विहारा मध्ये पाठविले. त्याच्या समजाविल्या नंतर सुद्धा भिक्खुंमधील भांडण शांत झाले नाही. तेव्हा त्याने बळजबरी ने उपोसथ कर्म करविण्याचा प्रयत्न केला. राजभयाने सुद्धा भिक्खु घाबरत नाही हे पाहून क्रोधामध्ये येऊन त्याने अनेक भिक्खूंचे डोके उडवुन टाकलेत. " आणि म्हटले की, 'मी उपोसथ कर्म करविल्या शिवाय राहणार नाही. भिक्खूंचा संहार होतांना पाहून सम्राट अशोकाचे लहान बंधु तिस्स स्थविर त्या हत्या करणाऱ्या समोर जावुन उभे राहिलेत. तेव्हा मंत्री हार मानून परत निघून गेला. आणि संपूर्ण घटने संबधी सम्राट अशोकाला सांगितले. हे सर्व प्रकरण ऐकून सम्राट अशोक फार दुक्खी झालेत. आणि अतिशय घाबरलेत सुद्धा. ते त्वरीतच भिक्खु संघाच्या जवळ गेले आणि विचारले की, 'या वाईट कर्माला कोण दोषी आहे ?' त्यातील जे अज्ञानी होते ते महणाले की, 'हा आपलाच दोश आहे.' दूसरे म्हणाले की, 'आपला दोष नाही'


हे सर्व ऐकून सम्राट अशोकाने विचारले की, 'काय कुणी तरी सामर्थ्यवान भिक्खु नाही काय जो माझ्या शंकाचे समाधान करू शकेल आणि सोबतच धम्माचा संग्रह करून या विवादाला शांत करू शकेल?'


तेव्हा भिक्खु संघाने मोग्गल्लिपुत्त तिस्स स्थविराची आठवण करू दिली. हे ऐकून सम्राट अशोकाला समाधान वाटले आणि त्यांना यात आशेचे किरण दिसून आलेत.


स्थविर मोग्गल्लिपुत्त तिस्स यांना घेऊन येण्या करिता सम्राट अशोकाने त्याच दिवशी चार स्थविरांना आणि चार मंत्र्यांना पाठविले. तेथे जाऊन त्यांनी राजाची इच्छा बोलुन दाखविली आणि पाटलिपुतला घेण्याची प्रार्थना केली. परंतु स्थविर मोग्गल्लिपुत्त तिरस यांनी घेण्यास नकार दिला. दुसन्यांदा सम्राट अशोकाने आठ भिक्खूंच्या सोबत आठ मंत्र्यांना पाठविले तरी सुद्धा महास्थवीर मोग्गलिपुत्ततिस्स पेण्यास तयार झाले नाहीत. तिसन्या वेळी जेव्हा सोळा भिक्खु आणि सोळा मंत्री गेलेत तेव्हा महास्थविर मोग्गल्लिपुत्त तिस्स येण्यास तयार झाले. ते पाण्याच्या मार्गाने नौकेवर स्वार होवुन पाटलिपुत्तला पोहोचले. सम्राट अशोक सुद्धा महास्थविरांच्या आतिश्यासाठी गंगा नदीच्या घाटावर पोहोचलेत. त्यांनी मांडी पर्यंत च्या पाण्यात चालुन महास्थविरांना नौकेवरून उतरण्या करीता आपला उजवा हात पुढे केला."


महास्थविर मोग्गल्लिपुत्त तिस्स रतिवडुन वागेमध्ये थांबले होते. ते विहारामध्ये थांबलेले नव्हते. सम्राट अशोकाने विनम्रतापूर्वक महास्थविरांना विचारले की, 'भन्ने मंत्र्याद्वारे भिक्खुंचे डोके कापण्यात आल्याचा दोष मला लागेल किंवा नाही?' या प्रश्नाच्या उत्तरामध्ये महास्थविराने सम्राटाला तित्तिर जातक ऐकवून समजाविले की, 'जो पर्यंत कर्मा सोबत मन दोषयुक्त होत नाही तोपर्यंत कर्म दोषयुक्त होत नाही. ""


तीसरी धम्म संगिती आयोजित


या नंतर एक आठवडा संपल्यानंतर महास्थविर मोग्गल्लिपुत्त तिस्स यांच्या सोवत विचार विनिमय करून सम्राट अशोकाने अशोकारामामध्ये एका विशाल परिषदेचे आयोजन केले. तेथे एका विशिष्ट स्थळी मोग्गलिनपुत्त तिस्स महास्थविरा सोवत सम्राट अशोकाने एका एका भिक्सर्चुला एकानंतर एकाला बोलाविणे आणि त्यांना एक प्रश्न विचारला की 'भन्ने, भगवान बुद्धाची विचार धारा काय होती?'


भिक्खूंनी आप आपल्या तांनुसार शाश्वतवाद इत्यादि विवारांना सांगून उत्तर दिले, तेव्हा सम्राट अशोकाने अशा सर्व भिक्खूंचे चिवर, प्रवज्जा काढुन घेतली. भिक्खु संघातुन काढण्यात आलेल्या भिक्खूंची संख्या फार कमी नव्हती. ती संख्या जवळ जवळ साठ हजारा पर्यंत पोहोचलेली होती. ते सर्व भिक्खु पाटलीपुत्त वरून नालंदाला गेले आणि तेथे एकत्र झाले. तेव्हा पासून सर्वास्तवादीचे नालंदा हे एक प्रमुख केन्द्र वनले. त्या भिक्खूंनी नालंदामध्ये आपली वेगळी धम्मपरिशद आयोजित केली. ते सर्वासतीवादी बौद्धभिक्खु नालंदा वरून दक्षिण भारता मध्ये गेलेत. आणि तिथुन काश्मीर मध्ये गेलेत व इतरत्र पसरलेत. ते अशा तन्हेने क्रमाक्रमाने मध्य आशिया व चीन मध्ये गेलेत." सर्वास्तिवादयांची एक शाखा इथूनच मथुरेला पोहोचली होती...


पुढील भागात 

मुक्तीदाता विशेषांक


प्रियदर्शि सम्राट अशोक (जयंती विशेष)

भाग 12


सम्राट अशोकाने हाच प्रश्न धम्मवादी भिक्खूंना विचारले की, "तथागत बुद्धाची विचारधारा काय होती?' त्यांनी उत्तर दिले की, भगवान तथागत विभज्जवादी होते. तेव्हा सम्राट अशोकाने या उत्तराच्या निर्णया करीता मोग्गलिलपुत्त तिसर महास्थविराला विचारले की, 'भते, भगवान बुद्ध विभज्जवादी होते काय?' तेव्हा महास्थविराने स्वीकार केले. सम्राट अशोकाने भिक्खु संघाला युद्ध व दोषयुक्त मानून ते नगरामध्ये गेलेत. त्यानंतर भिक्खु संघाने उपोसथाचा पाठ केला.


महास्थविर मोग्गल्लिनपुत्त तिस्स ने भिक्खु संघामधील एक हजार विद्वान, ज्ञानी तिपिटकाचे जाणकार परिसम्मिदा " प्राप्त भिक्खूंना सद्धम्माच्या संग्रह करण्या करिता निवडलेत आणि त्यांच्या सोवत अशोकारामा मध्येच सद्धम्माचे संगायन करण्यात आलेत. ज्याप्रमाणे पहिली संगिती" महाकस्सपाच्या प्रमुख नेतृत्वामध्ये आयोजित करण्यात आली होती. दुसरी संगिती" यश महास्थविराच्या प्रमुख नेतृत्वामध्ये करण्यात आली होती वैशाली मध्ये. त्याचप्रमाणे महास्थविर मोग्गल्लिपुत्त तिस्स यांच्या प्रमुखत्वामध्ये या तिसऱ्या संगितीचे आयोजन पाटलीपुत्तमध्ये करण्यात आले होते. महास्थविर मोग्गलिनपुत्त तिस्सने या धम्म संगिती मध्ये दुसऱ्यामतांचे खंडन करण्याकरीता कथावत्धु प्रकरण गंधाची रचना केलेली होती. ही तिसरी धम्म संगिती सम्राट अशोकाच्या राज्याभिषेकाच्या सतराव्या वर्षी महापवारणेच्या दिवशी समाप्त झालेली होती. हीच संगिती सम्राट अशोकाच्या अनुग्रहामुळे एक हजार भिक्खूंनी नऊ महिन्यामध्ये पूर्ण केलेली होती. त्योवळी महास्थविर मोग्गल्लिपुत्ततिस्स यांचे 

वय 72 वर्षाचे होते."


धम्मप्रचाराकरीता धम्मदूतांची नियुक्ती


या तिसऱ्या संगितीच्या संगायनाच्या समाप्ती नंतर मोग्गल्लिपुत्त तिस्स महास्थविराने सम्राट अशोकाच्या सहकार्याने शेजारच्या प्रदेशामध्ये देशामध्ये बौद्धधम्माचा प्रचाराकरिता धम्मदूत नियुक्त करवुन पाठविलेले होते.


1 मज्डान्तिक (माध्यमिक) स्थविर काश्मीर आणि गांधार 100 मध्ये.


2 महादेव स्थविर महिसमण्डल 101 मध्ये


3 रक्षित स्थविर वनवास मध्ये 102


4 यवन धम्मरक्खित स्थविर अपरांत मध्ये 193


5 महाधम्मरक्षित स्थविर महाराष्ट्रामध्ये


6 महारक्षित स्थविर यवन देशामध्ये 104


7 मज्झिम स्थविर हिमवंत (हिमालय प्रदेश 


8 सोण आणि उत्तर स्थविर स्वर्ण भूमि 105


9 महामहिंद, इट्ठीय, उत्तीय, सम्बल सिंहल मध्ये


तथा भहसाल या व्यतिरिक्त सम्राट अशोकाच्या शिलालेखा वरून आढळून येते की, आणखी अनेक देशामध्ये धम्मदूत पाठविण्यात आले होते. चंद्रगुप्त मौर्य आणि राजा बिन्दुसार यांचा पाश्चिमात्य देशांशी संबध होता. राजा चंद्रगुप्ताच्या राजसभेमध्ये मैगस्थाइन हा राजदूत म्हणून आलेला होता. या संबंधाना घट्ट करण्याकरिता सम्राट अशोकाने पाश्चिमात्य देशा मध्ये धम्मदूत पाठविले होते. त्या धम्म प्रचारकांचे नाव अज्ञात असतांना सुद्धा त्यांच्या जाण्याच्या स्थळांची माहिती आढळुन येते. एक शिलालेख आहे की, ग्रीक राजा 800 योजनाच्या अंतरावर होता, त्याचे नाव एंटीयोक सांगितल्या गेलेले आहे. इतर चार राजाचेही नाव उल्लेखनिय आहेत. जेथे सम्राट अशोकाने आपले प्रचारक पाठविले होते. ते म्हणजे तूरमय, एंटीकोन, मगए आणि एलिक सुंदर, अशाच प्रकारे दक्षिणेमध्ये पांडे आणि ताम्रपर्णि देशामध्ये धम्मदूत पाठविण्यात आले होते. कम्बोज, नाभक, नाथ पंक्तिक, भोज, पितीनियक, आन्ध्र आणि पुलिंद देशा मध्ये सुद्धा धम्मप्रचारक पाठविण्याचा उल्लेख आढळून येतो.


पाटलीपुत्ताच्या ईतर विहारांसोबतच अशोकाराम विहार सुद्धा बनविण्यात आले. या प्रसंगी फार मोठ्या उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. सम्राट चण्डअशोक हे धम्मशोक या नावाने प्रसिद्ध झालेत. प्रसन्न चित्त सम्राट अशोकाने महास्थविर मोग्गल्लिपुत्त तिस्स यांना विनम्रता पूर्वक विचारले की, 'हे भन्ते, बुद्धधम्मा मध्ये कोणत्या वस्तूचा त्याग महान त्याग मानला जातो?' मोग्गल्लिपुत्ततिस्स महास्थविर म्हणाले की, 'हे राजा, भगवान बुद्धाच्या जीवनकाळामध्ये सुद्धा आपल्या सारखा त्यागी कुणी ही नव्हता."


सम्राट अशोकाने पुन्हा विचारले की, 'हे भन्ते! 

माझ्या सारखा व्यक्ती धम्माचा दायाद (दायाक) म्हणता येईल काय ?'


हे राजा ! आपल्या सारखा व्यक्ती सुद्धा धम्माचा दायाद म्हणता येणार नाही. जो आपल्या मुलाला, मुलीला धम्मा मध्ये प्रव्रज्जित करवितो तोच धम्माचा दायाद आणि दायक दोन्ही मानला जातो. धम्माचा दायाद होण्याच्या इच्छेने सम्राट अशोका शेजारी उभे असलेल्या महिन्द आणि संघमित्ताला विचारले की, 'तात ! तुम्ही संघामध्ये प्रव्रज्जा स्विकार करणार काय ? प्रव्रज्जा महान आहे'.


वडीलांचे हे म्हणणे ऐकून त्या दोन्ही मुलांनी म्हटले की, "हे राजा ! जर आपली परवानगी असेल तर आजच आम्ही प्रव्रज्जीत होण्यास तयार आहोत. आमच्या प्रव्रज्जेने ने आम्हाला आणि आपल्याला पुण्याचा लाभ होईल"....


पुढील भागात 

मुक्तीदाता विशेषांक


प्रियदर्शि सम्राट अशोक (जयंती विशेष)

भाग 13


उपराजा तिस्स यांच्या प्रव्रज्जेच्या दिवसा पासून महिन्द आणि अग्नीब्रह्मा "" बांच्या प्रव्रज्जेच्या वेळी पासून संघमित्ता प्रवज्जित होण्याचा निश्चय करून चुकलेली होती. काहीच दिवसा मध्ये महिन्द उपराजा होणार होते. परंतु सम्राट अशोकाने उपराजा पदापेक्षा प्रव्रज्जेला महान समजले. सप्ताट अशोकाने आपला प्रिय मुलगा महिन्द आणि मुलगी संघमित्रा यांना फार मोठ्या उत्सवासह प्रवजित करतील, त्यावेळी महिन्द कुमारांचे वय 20 वर्षाचे होते. आणि राज कुमारी संघमित्ताचे वय 18 वर्षाचे होते. महिन्द्र कुमाराचे उपाध्याय मोग्गल्लिपुत्त तिस्स आणि आचार्य महादेव स्थविर झालेत. राजकुमारी संघमित्ता यांचे उपाध्याय प्रसिद्ध थेरी धम्मपाला व आचार्य आयुपाला होती. हया दोघांची प्रव्रज्जा सम्म्राट अशोकाच्या राज्याभिषेकाच्या सहाव्यावर्षी झाली होती.


भिक्खू महामहिन्द आणि संघमित्ताचे सिरिलंका गमन


तिसरी धम्म संगिती संपन्न झाल्या नंतर भिक्खु महामहिन्द आपल्या सहकारी भिक्खूंच्या सोबत बौद्धधम्माच्या प्रचारा करिता सिंहल देशा मध्ये गेले. त्यावेळी तेथील रजा देवानामप्रिय तिस्स सम्राट अशोकाचे मित्र होते, सम्राट अशोकाने सिंहल देशाचा राजा तिस्स यांना अभिषेकाच्या वस्तु पाठविलेल्या होत्या. पाच भेटीच्या स्मरणामध्ये त्याने आपल्या नावा सोबत 'देवानामपिय' जोडले होते. वडील सम्राट अशोकाची ही पूर्व मैत्री भिक्खु महामहिन्द यांच्या धम्मप्रचार कार्यामध्ये सहाय्यक ठरली. भिक्खु महामहिन्द नंतर भिक्खुनी संघमित्ता सुद्धा बोधगयेच्या बोधिवृक्षाची एक शाखा सोबत घेऊन सिंहल देशामध्ये घेऊन गेल्या. त्यांनी सिंहल देशामध्ये भिक्खुनी संघाची स्थापना केली. आज सुद्धा सिंहल देशामधील अनुराधपूरमधील भिक्खुनी संघमित्ताद्वारा रोपण्यात आलेला बोधिवृक्ष विद्यमान आहे. आज सुद्धा सिंहल देशामध्ये स्थविर महिन्द हे अनुबुदु (दुसरे बुद्ध) या नावाने ओळखले जातात.


सम्राट अशोकाच्या इतर महत्वपूर्ण कार्यामध्ये त्यांच्या शिलालेखांचे, स्तंभलेखांचे आपले विशेष महत्वाचे स्थान आहे. सम्राट अशोकाचे या शिलालेखामधुन व स्तंभ लेखामधुन आम्हाला भारतीय इतिहासा बद्दल बरिच वास्तववादी व ऐतिहासिक माहिती प्राप्त होते. हे शिलोलख, स्तंभलेख व त्यांचे इतर ही लेख प्रामुख्याने धम्मलिपी मध्ये आहेत. धम्मलिपी मध्ये लिहिल्या गेले आहेत. जिला काही लोक ब्राह्मी लिपी सुद्धा म्हणतात. ही लिपी भारतीय व सिंहल वर्ण मालेचे मूळ स्वरूप मानले जाते. सन् 1838 मध्ये पहिलांदा एका इंग्रज विद्वानाने काही धम्म शिलालेखांना वाचले होते." या कार्या करिता त्यांना भारत ग्रीक शासकांचे शिक्के जे ग्रीक आणि कब्राह्मी अक्षरामध्ये होते. फार उपयोगी पडलेत. यानंतर वेगवेगळ्या देशातील पुरातत्व विद्वानांनी सम्राट अशोकाच्या या लेखांना वाचण्याचा प्रयल केला. या विद्वानामध्ये प्रामुख्याने युरोप, अमेरिका व भारतीय विद्वान सुद्धा होते. या कार्यामध्ये भारतीय पुरातत्व विभागाचे जनक सर एलेक्सड़झांडर कनिंघम आणि एमिल सेनरत (फ्रेंच विद्वान) यांचे विशेष उल्लेखिन योगदान आहे. प्राचीन भारतीय इतिहास अध्ययन कर्त्यांनी सम्राट अशोकाच्या हया शिलालेखांना, स्तंभ लेखांना आठ भागामध्ये विभागलेले आहे.


1. लघु शिलालेख.


2. भानु शिलालेख.


3. चतुर्दश शिलालेख.


4. कलिंग लेख.


5. गुहाभिलेख.


6. तराई स्तंभ लेख.


7. प्रमुख लेख


8. गौण स्तंभ लेख.


1) लघु शिलालेख 12 मानल्या गेलेले आहे. क) सिद्धपूर (मैसूर), ख) ब्रम्हगिरि (मैसूर), ग) जतिंग रामेश्वर (मैसूर), घ) मास्की (रायचूर जिल्हा, मध्यप्रदेश) च) रूपनाथ (जबलपूर म.प्र) छ) वैराट (जयपूर, राजस्थान), ज) सासराम (इलाहाबाद), छ) गुर्जर दतिया, ८) राजुल (मंदगिरी), ठ) वेरगुडी (कर्नूल), ड) गवोमठ (रायचूर) आणि ड) पाल्को गुण्डु (रायचूर) इत्यादि, 2) भाबूशिलालेख वैराट (जयपूर) मध्ये प्राप्त झालेले आहे.


3) चौदावा शिलालेख हाच प्रमुख शिलालेख मानला जातो, जो ई.पू. 256 मध्ये लिहिल्या गेलेला होता. यात चौदा आज्ञा असल्यामुळे हा चौदावा शिलालेख मानला जातो. हे शिलालेख खालील ठिकाणी प्राप्त झालेले आहेत. अ) कालसी (देहरादून जवळ), आ) गिरनार (जूनागढ़, काठीयावाडा) ? इ) सहवाज गढी (पेशावर च्या युफज तालुक्या मध्ये), ई) मानसेरा (ऐबटाबाद हजारा) उ) बेर्रगुडी (कर्नुल, मद्रास), ऊ) सोपारा (मुंबई, जि. ठाणे), ए) धवली (ओरिसा) आणि ऐ) जौगड (गंजाम, ओरिसा).


4) कलिंग लेख सुद्धा दोन आहेत, जर्जी धौलीच्या मुख्य लेख असलेल्या दगडावर कोरलेले आहेत. हे लेख ई.पू. 256 चे आहेत...


पुढील भागात 

मुक्तीदाता विशेषांक


प्रियदर्शि सम्राट अशोक (जयंती विशेष)

भाग 14


5) गुहाभिलेख तीन आहेत. हे तिन्ही गुष्ठाभिलेख गया जिल्हयाच्या बराबर पहाडाच्या गुफामध्ये कोरलेले आहेत. या गुहाभिलेखांचा काळ ई. पू. 257 ते ई.पु. 250 पर्यंत मानला जातो.


6) पायथा स्तंभलेख दोन प्राप्त झालेले आहेत. हे दोन्ही लेख नेपाळच्या मैदानी भागामध्ये असलेल्या रूम्मिनीदेई (लुम्बीनी) आणि निलिवा गावामध्ये उपलब्ध झालेले आहेत. यांचा काळ ई. पु. 249 मानला जातो.


7) प्रमुख स्तंभ लेख सात आहेत. जे सहा ठिकाणी आढळून येतात. यांचा काळ ई.पू. 243 ते 242 असा मानला जातो. क) अम्बाला शेजारी टोपरा नावाचे स्थळ आणि ख) उत्तर प्रदेशातील मेरठ मध्ये हया दोन्ही स्तंभ लेखांना फिरोजशहा तुगलकाने त्या जागेतून उचलून दिल्लीमध्ये आनले होते, जे आज सुद्धा तेथे आहेत. ग) प्रयाग (अलाहबाद) येथील स्तंभ आधि कोसंबी मध्ये होता. असे मानले जाते की, हा स्तंभ सुद्धा फिरोजशहा तुगलक याने कोसांबी वरून आनले होते. अशाप्रमारे अशोकाने दोन लेख लिहावयास लावले होते. घ) लौरीया अरेराज, छ) लौरीया नंदगड आणि छ) रामपूरवा मध्ये हे तिन्ही स्तंभ व या वरील तिन्ही अभिलेख चम्पारण (बिहार) जिल्ह्यामध्ये आहेत.


8) सामान्य स्तंभाभिलेख एक सांची मध्ये आहे आणि दूसरा सारनाथ मध्ये


आहे. या व्यतिरिक्त रानीचा सुद्धा लेख आहे.


सम्राट अशोकाच्या शिलालेखांच्या भाषेसंबधी सेनरथ नावाचे विद्वान असे मत प्रतिपादन करतो की, 'भाषा अलंकृत व रेखीव नाही. हे लेख अगदी सम्म्राटाच्या शब्दामध्ये लिहिल्या गेले असावेत. कुणी ही त्यांना बरोबर करण्याचे धैर्य दाखविले नसावेत. कदाचित ती राज्यभाषा राहिली नसावी. परंतु संपूर्ण साम्राज्याचे लोक तिला समजत असावेत. त्याकाळी वेगवेगळ्या प्रदेशातील लोक त्याभाषेला समजत असावेत.' हे अशक्य असल्या सारखे वाटते. असे होवु शकते की, ही त्या काळच्या मगध राज्याची भाषा राहिली असावी. पालि भाषेशी तुलना करतांना असे वाटते की, ती तिपिटकाची सुद्धा भाषा राहिली असावी.


आधि म्हटल्या गेलेले आहे की, सम्राट अशोकाने आपल्या शिलालेखांच्या करिता (बाह्मणी) लिपीचा वापर केलेला होता. हीच लिपी वर्तमान भारतीय भाषांच्या वर्णमालेचा जन्म देणारी मानली जाते. तसेच भारताच्या बाहेरील श्रीलंका, तिबेट, प्राचीन मध्ये आशिया म्यान्मार, कम्बोडीया, थायलॅण्ड इन्डोनेशिया आणि फिलिपाईन्स आदी देशातील लिपीना जन्म देणारी मानली जाते. ही धम्मलिपी त्या प्राचीन आर्य अक्षरा पासून निर्माण झालेली मानली जाते. जी काही विद्वानांच्या मतानुसार मोहनजोदाडो आणि पश्चिमोत्तर भारतामध्ये आढळुन आली. परंतु अशाप्रकारचे म्हणणे संयुक्तीक वाटत नाही. यामुळेच धम्मलिपी (ब्राह्मी लिपी) आर्य अक्षरा पासून निर्माण झालेली आहे. असे म्हणणे अयोग्य आहे. असे म्हणता येईल.


अशोकाच्या साम्राज्याच्या उत्तर दिशेला हिमालय पर्वत उभा होता. दक्षिण दिशेला पाण्डे, चोल सतीपुत्त आणि केरल पुत्त सारख्या स्वतंत्र राज्यांच्या सीमा होत्या. तशाच प्रकारे दक्षिणेला तम्बपण्णि राज्य सुद्धा होते. हे सर्व सम्राट अशोकाचे मित्र राष्ट्र होते. "" कलिंग विजयानंतर पूर्वेला बंगालच्या खाडी पर्यंत त्यांचा राज्य विस्तार झालेला होता. आणि पश्चिमेला अरबी महासागरापर्यंत व उत्तर पश्चिम मध्ये एंटीयोक च्या राज्याची सीमा होती. "" या राज्याचा व्यवहार सुद्धा सम्राट अशोकाच्या राज्याशी मैत्री पूर्ण होता. सम्राट अशोकाच्या राज्यामध्ये चार ग्रीक क्षेत्रीय राजे अफगाणिस्थान आणि बलुचीस्थात च्यास्वरूपा मध्ये होते. भौगोलिक विभाजनाच्या दृष्टीने सम्राट अशोकाचे साम्राज्य पाच भागामध्ये विभागलेले होते.


1) प्राच्य ...... पूर्वोत्तर किंवा पूर्व देश, 2) दक्षिण (दक्षिणापथ) देश, 3) पश्चिम (प्रत्रीच्य, अपरांत) देश, 4) उत्तर उर्धव, उदिच्य उत्तरापथ आणि 5) मध्ये (मध्यम, मध्य देश, अंतरर्वेधी) देश.


सम्राट अशोक आपल्या राज्याला एक विस्तारलेला साम्राज्य सांगतात, ज्याची राजधानी पाटली पुत्त होती. ते दुसऱ्या नगरांचाही उल्लेख करतात. ज्यात सम्राटाच्या परिवारातील किंवा त्यांच्या भावांचे कुटुंब रहात होते. किंवा त्यांच्या बहिणीचे किंवा इतर संबंधीतांचे निवासस्थान होते. इतर ही महत्वपूर्ण नगर होते. ज्यात तक्षशिला, कोसंबी, उज्जैनी, तोसली आणि संपा स्वर्णगीरी व रिफील याशिवाय इतर ही नगरांचा उल्लेख आढळुन येतो. उदा. कपिलवत्यु शुब्न, राजपुर, अभिसार, पुषकरावती, गिरीनगर (जैन गिरी नगर) सुपरिक (सोपारा) विराट नगर, विदिशा, आणि गया, सम्राट अशोकाच्या धम्मविजयामुळेच एका महान साम्राज्याचा विस्तार झाला आणि भारत जम्बुदीप म्हणून ओळखला जाऊ लागला. परंपरे नुसार सम्म्राट अशोकाच्या जीवन काळामध्येच जम्बुदीपा मध्ये लहान मोठे 84,000 शहर होते.


पश्चिम आणि मध्य देशामध्ये सम्राट अशोकाचे प्रत्यक्ष राज्य होते. अन्य प्रदेशामध्ये सम्राटा द्वारे नियुक्त प्रतिनिधि राज्याचा कारभार साभाळीत असत. गावाचा प्रमुख ग्रामभृजक किंवा ग्रामभोजक म्हटला जात असे. कौटिल्याच्या अर्थशास्त्रानुसार जो पाच ते दहा गावांचा कार्यभार सांभाळीत असे तो उत्पन्नाचा एक चर्तुथांश भाग स्वताहा आपल्या कडे ठेवीत असे. अशा लोकांचे कार्य होते प्रदेशाला राज्याच्या...


पुढील भागात 

मुक्तीदाता विशेषांक


प्रियदर्शि सम्राट अशोक (जयंती विशेष)

भाग 15


नियंत्रणामध्ये ठेवून निश्चित स्थळांची देखरेख करणे. उत्पन्नाचा सहावा भाग राज्याला दिला जात होता, कधी कधी चौथाभाग आणि कधी कधी आठवा भाग सुद्धा. कराचा काही भाग सैन्यावर खर्च केला जात होता. कलाकार राज्यकोषातून पगार प्राप्त करीत असत. तत्वचिंतका मध्ये ज्यात श्रमण, ब्राम्हण होते, ते सुद्धा राज्यकोषावर अवलंबुन होते. उत्पन्नाचा बराचसा भाग शेती सिंचाई, रस्ते, बांधणे आदीवरच खर्च केला जात होता. यामुळेच दवाखाने विहिरी बांधणे व सावली देणारे झाड लावणे यावर राजाच्या संपत्तीचा बराच मोठा भाग खर्च होत होता."


सम्राट अशोकाने आपल्या साम्राज्या मध्ये स्त्रीयांच्या शिक्षणाची सुद्धा व्यवस्था केली होती. ते इतिहासा मधील पहिले सम्राट होते की ज्यांनी आपल्या प्रजेला सुशिक्षित करण्याकरिता पहिल्यादा प्रयल केला होता. त्याच प्रमाणे भगवान बुद्धाच्या शिकवणुकी पासून लोकांना जागृत करण्या करिता त्यांनी संपूर्ण देशामध्ये शिलालेख कोरून ठेवलेत.


आपल्या राज्याभिषेकाच्या तेराव्या वर्षी सम्राट अशोकाने धम्म महामंत्र्याची नियुक्ती केलेली होती. त्यांच्यावर धम्मकार्याच्या प्रचाराची जबाबदारी सोपविण्यात आली होती. या शिवाय ते इतर ही कार्य करित असत (बहुमुखा). तोसाली आणि समापा येथील शिलालेख दोन नगरांचा उल्लेख करता. जे न्याय प्रमुखाच्या नियंत्रणाखाली होते. ते नगर व्यवहारीक किंवा नगर महामात्य सुद्धा म्हटले जात असत. नगराधीकारी अनेक प्रकारचे होते. सम्राट अशोकाचे आजोबा सम्राट होते, त्यांचे वडील सुद्धा सम्राट होते व स्वताहा अशोक सुद्धा एक सम्म्राट होते. परंतु त्यांनी स्वताहाला कधी ही 'सम्राट' महटले नाही. आणि त्यांनी आपल्या शिलालेखामध्ये कुठे ही सम्राट शब्दाचा उल्लेख केलेला नाही. अनेक लहान लहान राज्यांनी आपल्या नावाच्या सोबत मोठमोठाले लांबलचक विशेषण लावलेत. उदा. राजाधिराज इत्यादी.


अशोकाचे संपूर्ण नाव आणि त्यांचे पद त्यांच्या शिलालेखामध्ये आढळून येते. ते एवढेच आहे की, 'राजा देवानाम पिये, पियदस्सी' तर काही काही ठिकाणी संक्षिप्त स्वरूपात राजा पियदस्सी असेच आढळून येते. भास्कीच्या शिलालेखामध्ये 'देवानामप्रिय अशोक' हे नाव आढळून येते. बौद्धसाहित्या मध्ये (पालि साहित्य) मध्ये त्यांना धम्मराज किंवा धम्मासोक म्हटल्या गेलेले आहे. 'देवानामपिये' हे सम्राट अशोकाचे व्यक्तिगत नाव नव्हते. उलट राजकिय पद होते. हे आढळुन येत नाही की हे पद अशोकाच्या आधि सुद्धा कुण्यातरी राजाने स्विकारले असेल. हेच नाव नंतर अशोकाचा नातु बृहदत्त यांनी स्विकारले होते." सम्राट अशोकाने स्वताहाला कधी ही महाराजा म्हटले नाही. त्यांच्या शिलालेखा मध्ये राजा नावाचाच उल्लेख आढळून सम्राट अशोकाचे समकालिन असलेला कात्यायन (ई. पू. 250 ते 200 ई.पू) पाणिनीच्या अष्टांब्याची सुत्रांची व्याख्या करीत असतांना तो 'देवानाम प्रिये' शब्दाचा अर्थ 'शिवी' सारखा करतो. कैचट (बारावे शतक) पातंजली चे महाभाष्यकार याचा अर्थ अतिशय सत्वधानी ने करतो. परंतु हेमचंद्राचा शब्द संग्रह (12 वे शतक) आणि सिद्धांत कौमुदी (10 वे शतक) स्पष्ट पणे देवानामप्रिये या शब्दाचा अर्थ मुर्ख असा करतात. अशा प्रकारचा आदर आणि सन्मान सुचक शब्द अशा तन्हेने निंदा युक्त अर्थाने का वापरल्या गेलेला असावा ? याचे अनेक कारण देता येवू शकतात. सम्राट अशोकाने पशु यहांच्या निशेधाचे विधान केले होते. ज्यामुळे वैदिक ब्राह्मण धर्मा वर फार मोठ्या प्रमाणात प्रहार झाला आणि दुसरी गोष्ट सामाजिक उत्सवांचा निषेध (समाज) त्याचप्रमाणे युद्धाचा त्याग" चे विधान महत्वाकांक्षेत सैनिक वर्गावर आणि राजकारणी लोकावर सुद्धा फार मोठया प्रमाणात प्रहार होता. बौद्धधम्माचा स्विकार करणे आणि बौद्धधम्माचे प्रचार कार्य करणे वैदीक मतावलंबीयांना (अबौद्ध) आणि प्रामुख्याने ब्राह्मणांना पचनी पडणे शक्य नव्हते. कारण ते जन्मानेच वौद्धधम्माचे शत्रु होते. धम्माच्या प्रचाराकरीता सम्राट अशोकाने एका स्वतंत्र विभागाची स्थापना केलेली होती. धम्म यात्रा लोकांना धम्माचा उपदेश देणे. धम्मासंवधी प्रश्नोत्तर करणे करविणे, लोकांना सुशिक्षित करणे आणि त्याकरीता शिलालेख कोरविणे. हे सर्व कार्य त्या काळा करिता नवीन कार्य होते. सम्राट अशोकाचे हे कार्य ब्राह्मण धर्मियांना प्रिय होणे शक्यच नव्हते. सम्राट अशोकाच्या कार्यापैकी अनेक कार्य इतर लोकांना ही एकदम नवीन होते. दवाखाने धम्मदूतांना दूसऱ्या प्रांतामध्ये व देशामध्ये पाठविणे, विशाल स्तुपांचे निर्माण करणे, विहार बांधणे, गुफांचे निर्माण करणे, शिलास्तंभरोवणे ज्यावर वेगवेगळ्या प्राण्यांच्या करीता चिन्ह कोरलेले असत. ज्यांच्या निर्माती करिता हजारोच्या संख्येने कलाकार, शिल्पकार बोलविले जात असत, लोकांच्या करिता हे कार्य अतिशय आश्चर्य कारक होते.


सम्राट अशोकाचे हे कर्तृत्व त्या काळी जेवढे आश्चर्य कारक होते, तेवढेच आज सुद्धा आहे. उलट त्याही पेक्षा अधिक आहे. परंतु दोन्ही काळातील अभिप्राय वेगवेगळे आहेत. आजच्या विद्वानांच्या करिता अशोक एक महान दूरदर्शी राजा, महान विजेता राजा, महान राजकारणी राजा आणि सर्व सामान्य लोकांचे मन जिंकणारा महान सम्राट आहे. युरोपीयन लेखक एच. जी. वेल्स असे लिहीतो की "जर महान अशोका जवळ एरिस्टॉटल असता तर यात मुळीच शंका नाही की त्याने फार मोठया प्रमाणावर एक वैज्ञानिक संस्था निर्माण केली असती."


स्वताहा सम्राट अशोकाचे म्हणणे होते की, "मी जेवण करतांना असो किंवा राजमहाला मध्ये असो किंवा शयना गारा मध्ये असो प्रतिवेदन लोकांनी मला प्रेजेच्या कार्याकरीता नेहमीच सुचना द्यावी. मी मौखीक आज्ञा दिली किंवा मंत्र्यांना, अधिकाऱ्याचा भार सोपविला त्यासंबंधी विवाद किंवा नकार असल्यास मला सुचना देण्यात यावी, किती ही कामात व्यस्त असलो, कामात गुंतुन राहिलो तरी मला समाधान होत नाही. सर्व प्राण्यांचे कल्याण करणे हेच मी आपले कर्तव्य मानतो आहे आणि त्याचे मुळ उद्योग, प्रयत्न आणि कार्य तत्परता आहे. लोकांच्या करीता काम करण्याव्यतिरिक्त माझे स्वताहाचे कोणते ही काम नाही. मी जे काही करतो ते या करीता की, मी जीव प्राण्यांच्या कर्जातून कर्ज मुक्त व्हावे."


सम्राट अशोकाने ई.पू. 270 किंवा 261 पासून तर ई. पू. 234 किंवा 233 पर्वत राज्य केले. बौद्ध परंपरे नुसार अशोकाच्या जीवनामध्ये दोन महत्वपूर्ण प्रसंग होते. 1) राज्याभिषेक व 2) दूसरा बौद्धधम्माचा स्विकार करणे. ज्यामुळे सम्राट अशोक अतिशय प्रभावित होते. सम्राट अशोक पहिल्या घटनेने तेवढे प्रभावित झाले जेवढे दुसऱ्या घटनेने प्रभावित झाले होते. 

(लघु शिलालेख)


मुक्तीदाता विशेषांक 


संदर्भ 

1. H. G Wells, outline of History.


2. Romesh Chunder Dutt. History of Civilisation in Ancient Indian, Vol. III.


3. R. K. Mookerji, Chandrag Pta Maurya and His Times p.14


4.पंचमो परिच्छेदो, गाथा 16


5. Thapur, Ashoka and the Decline of the Mourya, P. 20


6.अशोकावदान, दिव्यावदान तथा रंसत्यपकासिनी


7.वसत्थपकासिनीः


8. वसत्थपकासिनीः


9.दिव्यावदानः


10. Ashoka and His Inscriptions, P. 36


11. Mrs. Rhys David's Psalms of the Early Buddhists P. 133.


12. Ashoka and His Inscriptions.


13. अवन्तिरद्धं मूंजतो पितरा दिन्नमत्तनो ।


सो अशोककुमारो हि उज्जेनी गमना पुरा। महावंसो, 13/8


14. महावंश (हिन्दी, भदंत आनन्द कौसल्यायन पृ. 64)


प्रियदर्शी अशोक


15. रंसत्थपकासिनी पू. 3241


16. भेलसा के समीप के पर्वत ।


17. Ashoka and His Inscriptions


18. दिव्यावदान ।


19. दिव्यावदा तथा महावंश (हिन्दी) भदन्त आनन्द कौसल्यायन, पृ. 211


20. डॉ. वासुदेव उपाध्याय आयु के कम होने के मत को ही बार-बार दोहराते हैं, जो महाभारत से एकदम मेल नहीं खाता ।


21. महावंश (हिन्दी), भदन्त आनन्द कौसल्यायन पू. 22।


22. हवलदार त्रिपाठी, बौद्ध धर्म और विहार, पृ. 167 ।


23. वे सब लक्षण, जिनसे भविष्य में अर्हत् होना निश्चित हो ।


24. महावंश (रिन्दी), भदन्त आनन्द कौसल्यायन, पृ. 23 ।


25. देवानां पियषा वचनेना सवत महामता, वतविया (:) ए हेता दुतियाये देवीये


26. Ashoka and His Inscriptions, P. 53.


27. महावंश तथा दिव्यावदान ।


28. दिव्यावदान, पू. 407


29. Thomas Watter, Op. Yuan-Chawang's Travels in India.


30. दिव्यावदान पृ. 406


31. Mookerju, Ashoka P. 8


32. दिव्यावदान धर्मेण राज्य मम कृर्वतो हि जातः सुतो धर्मरिवदर्धणोवस्तु ।


33. Fleet, Gupta Inscriptions, P. 225, E.I. Vol. VIII, P. 103.


34. In the Samyutta, II, P. 19 the primitive dwellers of mt are reightly called Tivaras.


35. और सायद पहला भी।


36. H. L. Eggermont.













कोलित सुत्त

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_कोलित सुत्त_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_41.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼  _'कोलित सुत...