प्रियदर्शी सम्राट अशोक (जयंती विशेष)
प्रियदर्शी अशोक हे जगाच्या इतिहासा मधील एक महान शासक होवुन गेलेले आहेत. त्यांचा राज्य विस्तार अफगानिस्थानापासून तर मद्रास पर्यंत विस्तारलेला होता. इतिहासाच्या पानावर ते केवळ एकच सैनिक सम्राट आहेत (ई.पू. २२५). त्यांनी युद्ध विजय प्राप्त केल्या नंतर युद्ध करणे सोडून दिले. त्यांनी घोषणा केलेली होती की आता ते युद्धाद्वारे जगाला जिंकणार नाहीत. तर धम्मा द्वारे जगाला जिंकतिल. जर आम्ही विक्रमादित्य (ई.स. ४००) आणि अकबर (ई.स १६००) यांना महान सम्राट मानले तर सम्राट अशोक या करिता महान झालेले नाहीत की त्यांनी आपला राज्यविस्तार वाढविला, उलट त्यांना महान बनविले ते त्यांच्या मनुष्या प्रति स्वतंत्रता आणि सर्व व्यापक तेजस्वीता, स्वदेश निती आणि विदेश निती व सत्याप्रति प्रेम आणि सत्याच्या प्रचाराने. याच कारणामुळे त्यांना सायबेरिया पासून श्रीलंका पर्यंतचे हितचिंतक मानल्या गेलेले आहेत. भारतातील इतर कोणत्याही सम्राटाचे यश अशा प्रकारे पसरलेले नव्हते. त्याचप्रमाणे दुसऱ्या कोणत्याही राजाचा अशा प्रकारचा प्रभाव इतिहासावर पडलेला नव्हता.'
सम्राट अशोक मौर्य वंशाचे असुन सुद्धा त्यांच्या नावा सोबत 'मौर्य' हा शब्द फारसा प्रचलित आढळून येत नाही. ज्या प्रमाणे त्यांचे आजोबा चंद्रगुप्त मौर्य म्हटले जातात, त्याप्रमाणे सम्राट अशोकाला, 'मौर्य' म्हटले जात नाही. *सम्राट अशोक हे 'सम्राट अशोक' किंवा 'धम्माशोक' किंवा 'पियदस्सी असोक' या नावाने प्रसिद्ध आहेत.*
मौर्य वंशा संबंधी अध्ययन करताना अनेक विद्वानांनी इतिहासकारांनी वेगवेगळे विचार प्रदर्शित केलेले आहेत. काही विद्वानांचे म्हणणे आहे की, सम्राट चंद्रगुप्ताने आपली आई मुरादेवीच्या नावावर 'मौर्य' वंशाची स्थापना केलेली आहे.
_*सुत्तपिटका मधील दीघनिकाय या पालि ग्रंथा मध्ये असा उल्लेख आलेला आहे, की पिप्पलीवन चे लोक हे क्षत्रिय कुळातील होते आणि ते 'मोरिय' नावाने ओळखले जात होते. बौद्ध आणि जैन परंपरे नुसार 'मोरिय' किंवा 'मौर्य' चा संबंध मोराशी आहे. नंदगढ मध्ये अशोका द्वारे निर्माण करण्यात आलेला स्तंभ आणि सांचीच्या स्तुपावर कोरल्या गेलेले मोर हे दीघनिकाय मधील वरिल मताचे समर्थन करतात.*_
राजा विड्दूभच्या आक्रमणाने कंटाळुन पिप्पलीवन चे मोरिष (मोर्च) हिमालया मध्ये निघुन गेले होते आणि तेथे राहु लागलेत. तेथे राहणारे आधि चे लोक मोर पाळत होते. आणि मोराच्या पंखाद्वारे घरांचे छत बनवित होते. याच कारणामुळे ते लोक मोरिय नावाने प्रसिद्ध झालेत. ते लोक सुद्धा अजातसत्तु च्या भितीने आधिच पळून गेले होते ते शाक्य होते. नंतर दोन्ही समुहांना एकाच 'मोरिव' नावाने ओळखले जाऊ लागले.
पालि महाबोधि वंस हा ग्रंथ वरिल मताचे समर्थन करतो. कुमार चंद्रगुप्त *'नंरिदं-कुल-संभव'* जो 'मोरिय' नगरामध्ये राहात होता तो तेथेच जन्मास आला. हे नगर शाक्यांच्या द्वारे वसविल्या गेले होते. नंतर चाणाक्याच्या मदतीने तो पाटली पुत्तचा राजा झाला. पालि महावंश हा ग्रंथ सुद्धा असे मत प्रदर्शित करतो की, मोरिय चंद्रगुत हा कुळामध्ये जन्मलेला होता. *'मोरियानं खत्तिवान वंसे जातं ।"*
सम्राट अशोकाच्या जन्मा संबंधी अनेक चमत्कारक, काल्पनिक कथा आढळुन येतात. अनेक इतिहास कारांचे अनुमान आहे की, सम्राट अशोकाची आजी किंवा आई ग्रीक कुमारी राहिली असावी, अशा प्रकारच्या अनुमानाची शक्यता सुद्धा असु शकते. कारण चंद्रगुप्त मौर्य आणि सेल्युकस यांच्यात वैवाहित संबंध असावा असे मानले जाते. दोन्ही मधे राजकीय संबंध असल्यामुळे मौर्य कुमारीचे सेल्युकस च्या राजमहालामधे आणि ग्रीक कुमारीचे चंद्रगुप्ताच्या राज महालामधे येणे जाणे अशक्य वाटत नाही. अशा प्रकारचा विवाह झालेला असेल तर या करिता कोणते ही विशेष प्रमाण आढळुन येत नाही, की राजा बिन्दुसार हा ग्रीक कुमारी पासुन जन्मास आलेला होता आणि अशोक त्यांचा नातु होता किंवा बिन्दुसाराने ग्रीक कुमारी सोबत विवाह केलेला होता ज्यांचा मुलगा अशोक होता. जर हे शक्य असेल तर ती ग्रीक कुमारी पर्सियन कुमारी पासुन जन्मास आलेली सेल्युकस ची मुलगी असावी.
*_पालि दीपवंस, समन्त पासादिका आणि महावंस या ग्रंथामध्ये अशोकाच्या आई संबंधी कोणती ही माहीती आढळून येत नाही. महावंश टीका ग्रंथा मध्ये आढळून येते की, अशोकाच्या आईचे नाव 'धम्मा' होते, जी क्षत्रियांच्या मौर्य वंशातील (भोरिय वंसजा) होती. आणि त्यांच्या कुटुंबाचा उपदेशक एक आजीवक होता. ज्याचे नाव जनसान, जरसान किंवा जरसोन होते. धम्मा ही बिन्दुसार राजाची प्रमुख पत्नी होती. (अग्गमहिसी). अवदानमाला मध्ये तिला सुभद्रांगी म्हटल्या गेलेले आहे._*
_महावंस टीका ग्रंथानुसार बिन्दुसार राजा ची आई चंद्रगुप्त मौर्याच्या मामाची मुलगी होती. तिच्या सोबत चंद्रगुप्ताचा विवाह झालेला होता.. *बौद्ध ग्रंथाच्या नुसार अशोकाच्या आईचे नाव सुभद्रांगी होते. ती चम्पा (भागलपुर) च्या ब्राह्मणाची मुलगी होती. असे म्हटले जाते की, ब्राम्हणाने सुभांगीला बिन्दुसार मौर्याला भेट स्वरूपामध्ये दिलेली होती. तिच्या नावावरूनच असे स्पष्ट होते की, ती सुंदर असावी.* सत्ताहीन होण्याच्या भितीने राज महालातील राण्यांनी तीला राजा पासून दूर ठेवले असावे. एक दिवस अचानक तिला राजाचे डोक्यावरील केस व्यवस्थित करण्याची संधी प्राप्त झाली. यात शंका नाही की, राजा बिंदुसार तिला पूर्णपणे विसरून गेलेला होता. असे होणे स्वाभाविक सुद्धा आहे. ती राजमहालातील शेकडो खीया मध्ये लुप्त होऊन गेलेली होती. तिच्या नवख्या स्पर्शा ने राजा प्रभावित झालेला होता. राजाने तिला तिच्या संबंधी विचारले. तिने आपल्या वडीलाद्वारे भेट स्वरूपात दिल्याची आठवण करून दिली राजाने तिला आपली राणी बनविले, पुत्राचा जन्म (ई.पू. ३०४) झाल्या नंतर ती म्हणाली की, आता मी शोक रहित आहे अर्थात मी अशोक आहे. मुलाचे नाव सिंहली परंपरेनुसार सुद्धा तेच झाले.
*_सिंहल परंपरे प्रमाणे अशोकाच्या आईचे नाव धम्मा होते. दिव्यावदान आणि अशोकावदान ची कथावस्तु एकच आहे. ती जनपद कल्याणी म्हटली जात होती. याच ग्रंथामध्ये इतरत्र तिला सुभद्रांगी आणि पुण्णा चम्पाच्या ब्राम्हणाची मुलगी म्हटल्या गेलेले आहे. (परंतु ही मान्यता ऐतिहासिक वाटत नाही. पौराणिक, काल्पनीक अशीच अधिक आढळुन येते.)_*
अशोकाच्या बालपणा संबंधी आणि त्यांच्या आई विषयी शिलालेखामध्ये काही ही माहीती प्राप्त होत नाही. बौद्ध ग्रंथावरून काही ना काही माहीती प्राप्त होते. पाली परंपरेनुसार अशोकाची एक बहीण होती. तिला अग्नी ब्रम्हा नावाचा मुलगा होता. त्याने अशोका ची मुलगी संघमित्ता (संघमित्रा) सोबत विवाह केलेला होता आणि त्यापासुन तिने सुमन नावाच्या मुलाला जन्म दिलेला होता. पालि ग्रंथ अशा प्रकारची माहिती उपलब्ध करून देतात की, राजा बिन्दुसाराला सोळा राण्या होत्या आणि त्यांच्या पासून १०१ पुत्र होते. त्यात सुमन कुमार सुमनकुमार सर्वात मोठा होता आणि अशोक हा सुमनकुमारापेक्षा लहान होता. *दिव्यावदानानुसार मोठ्या मुलाचे नाव सुसिम होते. अशोकाला एकच सख्खा भाऊ होता आणि तो अशोकपेक्षा लहान होता. त्याचे तिस्स नाव होते, असे सांगितले जाते. परंतु तो वितसोक या नावाने अधिक प्रसिद्ध होता.' चिनी साहित्या मध्ये सुदत्त किंवा सुगन नावाचा उल्लेख आढळुन येतो."*
*_थेरगाधे मध्ये दोन गाथा आढळुन येतात, एक विहारिय स्थविरा संबंधी आणि दुसरी वितसोक स्थविरा संबंधी. "पालि अट्ठकथाकार धम्मपाल असे मत व्यक्त करतात की, विहारिय स्थविर अशोकाच्या भाऊ तिस्सर होता आणि वितसोक यांचा दुसरा भाऊ विगतासोक होता. हे दोन्ही वेगवेगळे व्यक्ती होते."_*
असे म्हटले जाते की अशोक पहायला सुंदर नव्हता, म्हणूनच त्याचे वडील त्याला पसंत करीत नव्हते. परंतु ते अशोकाच्या बालपणा पासूनच अनेक गुणांनी अतिशय प्रभावीत होते. यामुळेच राजा बिन्दुसाराने त्याला उपराजा नियुक्त करून उज्जैनिला पाठविले होते. "त्याला उज्जैनिला पाठविण्याचे आणखी एक कारण असु शकते की, वडील हे अशोकाला आपल्या नजरे पासून दूर ठेवू इच्छित असावे.
*_उज्जैन पोहचण्याच्या आधि उपराजा अशोक विदिसा (म.प्र.) नगरा मध्ये थांबलेले होते, तेथे त्यांची एका व्यापाऱ्याच्या देवी नावाच्या मुली सोबत भेट झाली. तिला आपली पत्नी बनवुन (ई.पू. २८६) अशोक तिला आपल्या सोबत घेऊन उज्जैनला गेला. तेथे त्या श्रीमंत कन्या देवीला एका मुलगा झाला. " (ई.पू. २८४). हा तोच मुलगा होता जो नंतर 'महेन्द स्थविर' या नावाने प्रसिद्ध झाला आणि बौद्धधम्म प्रचारार्थ तो सिंहल दीपामध्ये गेला. महिन्दाच्या जन्माच्या दोन वर्षा नंतर (ई.पू. २८२) 'संघमित्ता' नावाच्या मुलीचा जन्म झाला._*
महावंस टीका ग्रंथा नुसार देवी अर्थात अशोकाची पत्नी अतिशय सुंदर आणि प्रभावी होती. यामुळेच तिच्या वडीलाने तिथे देव किंवा देवी हे नाव ठेवावयास लावले होते. *"महाबोधिवंस मध्ये (ई.पू. ९८-११०) तिला विदिशा महादेवी म्हटल्या गेलेले आहे आणि शाक्य कुमारी म्हणून संबोधल्या गेलेले आहे.* सिंहल दीप मध्ये जाण्याच्या आधि महिन्द स्थविर आपल्या आईला भेटण्या करीता विदिशाला गेले होते. तेव्हा आपल्या मुलाच्या निवासा करीता आईने विदिशागिरी" नावाचे विहार बनविले होते. उज्जैन मध्ये आपले कार्य पूर्ण करून अशोक आपल्या दोन्ही अर्थात मुलगा आणि मुलगी सोबत पाटलीपुत्रला गेलेत. त्यांच्या सोबत अशोकपत्नी देवी गेली नाही. ती विदिशा मध्येच राहीली."
*_तक्षशिला मधील विद्रोह आणि अशोक_*
याच वेळी तक्षशिलेच्या राज्यामध्ये विद्रोह होऊ लागला. त्या विद्रोहाला शांत करण्याकरिता राजा बिंदु साराने अशोकालाच अधिक योग्य मानले. त्या कार्या करिता अशोक तक्षशिला मध्ये गेले. त्यांच्या येण्याची बातमी ऐकून तक्षशिला मधील लोक त्यांच्या स्वागता करीता नगराच्या बाहेर आलेत. त्यांनी अशोक कुमाराला विनम्रता पूर्वक निवेदन केले की, तक्षशिला मधील नागरिक आपल्या किंवा सम्राटाच्या विरोधामध्ये नाहीत. आणि ते राजद्रोही सुद्धा नाहीत. परंतु दुष्ट मंत्र्याने तक्षशिलेच्या नागरिकांचा अपमान केलेला आहे. आम्हाला शांततेची आवश्यकता आहे आणि तक्षशिले करिता योग्य शासकाची आवश्यकता आहे. *"तक्षशिलेला पोहचतात कुमार अशोकाने तेथील नागरिकांचे मन जिंकले आणि त्यांनी तक्षशिलामध्ये पून्हा शांतता निर्माण केली."*
सम्राट बिन्दुसार अशोकाला आपला उत्तराधिकारी बनवू इच्छित नव्हते. परंतु राज्याचे मंत्री गण अशोकालाचा अधिक योग्य मानत होते. ते अशोकाच्या सामर्थ्याला आणि शक्तीला चांगल्या प्रकारे ओळखून होते. अशोकाला अवन्ती मध्ये आणि तक्षशिला मध्ये जे यश प्राप्त झाले त्या पासून राज्याचे अधिकारी प्रभावित झाले होते. यामुळेच राजा बिंदूसाराच्या मरणानंतर अशोकाने मंत्री गणाच्या मदतीने राज्य सिंहासनावर आपला अधिकार स्थापीत केला (ई.पू. २७३). राजसत्ता प्राप्ती च्या चार वर्षानंतर (ई.पू. २६९) अशोकाचे राज्याभिषेक झाले. अशोकाच्या राज्याभिषेकाच्या उशीर होन्याला अनेक कारण सांगितल्या गेलेले आहेत.
*_डॉ. काशीप्रसाद जयसवाल असे म्हणतो की, पंचवीस वर्ष वयाच्या आधी राज्याभिषेक करता येत नव्हता यामुळेच अशोकाला चार वर्षा पर्यंत प्रतिक्षा करावी लागली होती. परंतु महाभारतामध्ये विचित्रविर्य याचा अभिषेक बालवयामध्येच झालेला होता. अशोकाने स्वतःला सम्राट बनविण्याकरिता राधगुप्ताच्या मदतीने आपल्या ९९ भावंडाना मारून टाकलेले होते." नंतर अशोकाने त्याला आपला प्रमुख किंवा प्रधानमंत्रीचे पद दिलेले होते. डॉ. स्मिथ असे म्हणतात की, अशोकाच्या १७-१८ वर्षाच्या राज्य काळामध्ये सुद्धा त्याचे अनेक भाऊ जीवंत होते. हे फार अशक्य नाही की, जे भाऊ अशोकाच्या विरूद्ध होते, किंवा अशोक ज्यांना आपले विरोधक मानत होते. त्यांना त्याने मारून टाकले असावे. जे भाऊ अशोकाच्या बाजुने राहिले असतील ते जीवंत राहिले असतील. हे ही शक्य आहे की, अशोकाने चार वर्षा पर्वत आपल्या भावांच्या सोबत संघर्ष करीत आपला मार्ग तयार केलेला असावा. या कारणामुळेच अशोकाला राज्याभिषेकाला चार वर्षाचा उशीर झाला असावा."_*
*_अशोकाचे पाटलीपुत्रला येणे_*
असे आढळुन येते की, तक्षशिले मधील विद्रोहाला शांत करण्याकरिताचा अशोकाला उज्जैन वरून पाटलीपुत्रला बोलावले गेले असावे. अशोक तक्षशिले मधील विद्रोह शांत करून पुन्हा उज्जैनिला परतले होते. कारण जेव्हा बिंदुसार मरणावस्थे मध्ये होता तेव्हा अशोकाने उज्जैन वरून पाटलीपुत्रला जावुन राजसिंहासनावर आपले अधिकार स्थापित केले होते. त्यावेळी सुसिम किंवा सुमन" अशोकाचा मोठा भाऊ (दूसऱ्या आईचा मुलगा) दूर काश्मीर मध्ये होता. जेव्हा त्याला ही घटना कळली तेव्हा तो सुद्धा पाटलीपुत्रमध्ये आला आणि राजसिंहांसनाकरीता युद्ध करीत अशोकाद्वारे मारला गेला.
हे स्वाभाविक आहे की, जे बंधु सुमन यांच्या बाजू ने लडत असतील ते सर्व अशोका द्वारे मारल्या गेले असावेत. जे अशोका सोबत होते ते जीवंत राहिले असावेत. या कारणामुळेच अशोकाच्या शासन काळामध्ये सुद्धा त्यांचे अनेक भाऊ आणि त्यांचे कुटुंब पाटलीपुत्र व पाटलीपुत्राच्या बाहेर राहात होते.
जेव्हा सुमन राजकुमार मारल्या गेला तेव्हा त्याची पत्नी सुमनादेवी गर्भवती. ती पळून चांडाळांच्या वस्ती मध्ये गेली. तेथे ती एक निग्रोध (वडाचे झाड) झाडाखाली बसली आणि तेथे तिने एका सुंदर मुलाला जन्म दिला. निग्रोध झाडाखाली जन्म घेतल्यामुळे त्या मुलाचे नाव निग्रोध ठेवले गेले. त्या गावाच्या प्रमुखाने सुमना देवीला पाहिले. तिला आपली स्वामीनी मानुन त्याने सात वर्षापर्यंत आई आणि मुलाची सेवा केली. एक दिवस महावरूण स्थविराने त्या कुमाराला उपनिस्सय गुणांनी युक्त पाहून त्याच्या आई कडून परवानगी प्राप्त करून त्या मुलाला प्रव्रज्जीत केले. नंतर याच निग्रोध सामणेराचा बुद्ध उपदेश ऐकून अशोकाला बौद्धधम्मामध्ये आस्था उत्पन्न झाली.
*_सम्राट अशोकाच्या पाच राण्या होत्या. जेव्हा ते उपराजा होवून उज्जैनला जात होते. १) तेव्हाच त्याचा विवाह देवी नावाच्या विदिशाच्या एका धनवान व्यक्तीच्या मुलीशी झाला. अशोकाच्या दुसऱ्या राण्यामध्ये २) असंधीमित्ता, ३) कालुवाकी किंवा चारूवाकी किंवा कलविंका, ४) पदमावति आणि ५) तिस्सरक्खिता. राणीच्या शिलालेखा वरून असे आढळुन येते की कालुवाकी ही सम्राट अशोकाची दूसरी राणी होती. आणि ती कुमार तीवल (तीवर) ची आई होती. असंधिमित्ता ही अशोकाची प्रमुख राणी होती. सम्राट अशोकाच्या राज्याभिषेकाच्या सव्विसाव्या वर्षी असंधिमित्ता ही मरणास प्राप्त झाली. यानंतर चार वर्षानंतर सम्राट अशोकाने तिस्सरक्खा (दीव्यावदानातील तिस्सरक्षिता) ला प्रमुख राणी बनविले ती असंधिमित्ताच्या जीवन काळामध्ये ती तीची प्रमुख सेविका होती. महावंस (पाली) आणि दिव्यावदान (बौद्ध संस्कृत) या ग्रंथानुसार तिस्सरक्खिता ही बोधगयेच्या बोधिवृक्षाचा द्वेष करीत होती. कारण सम्राट अशोक बोधगयेचा बोधिवृक्षावर अतिशय प्रेम करीत होते. आपल्या जीवापेक्षा ही अधिक ही गोष्ट तिस्सरक्खिताला सहन झाली नाही. आणि तिने बोधगयेच्या बोधिवृक्षाला नष्ठ करण्याचा प्रयत्न केला._*
"कुणाल सम्राट अशोकाचा अतिशय प्रिय मुलगा होता. तो ज्यावेळी तक्षशिला मध्ये उपराजा पदावर होता, तेव्हा तिस्सरक्खिता ने क्रोधाने पेटून त्याचे डोळे काढावयास लावले. कारण ती त्याची प्रेमीका होऊ इच्छित होती. वास्तविकपणे कुमार कुणाल तिला आपली आई मानत होते. ज्याठीकाणी कुणाल ने आपले डोळे काढले होते, तेथे नंतर सम्राट अशोकाने शंभर फुट उंचीचा एक स्तुप बनविलेला होता. हा स्तुप दक्षिण पर्वताच्या उत्तरिय भागामध्ये आणि तक्षशिलेच्या दक्षिण-पूर्व भागामध्ये निर्मित होता. चिनी प्रवासी ह्युएन-त्सांग यांचे म्हणणे आहे की आंधळे लोक तेथे येऊन याचना करीत असत ज्यामुळे अनेकांचे डोळे दुरूस्त होत असत.
दीव्यावदान या ग्रंथानुसार कुणाल हा सम्राट अशोकाच्या पद्मावती राणीचा मुलगा होता. तो धर्मवर्धन (धम्मबंधन) किंवा धर्मविवर्धन (धम्माला वाढविणारा) या नावाने सुद्धा प्रसिद्ध होता. राणी पद्मावती आणि राणी कालुवाकी ह्या दोन्ही आपल्या मुलांच्या नावाने ओळखल्या जात होत्या. कुणाल आणि तिवल किंवा तिवर हे दोघांचे दोन उपनाव होते. जेव्हा राणी पद्मावतीला मुलगा झालेला होता, तेव्हा सम्राट अशोकाने त्याचे नाव धम्मविवद्धन (धर्मविवर्धन) ठेवले होते. परंतु त्याच्या डोळयांचे सौंदर्य पाहून त्याच्या मंत्र्यांनी सम्राट अशोकाला सांगितले की, कुमाराचे डोळे हिमालयामध्ये राहणाऱ्या कुणाल पक्षाच्या डोळयासारखे आहेत. यामुळेच कुमाराचे उपनाव कुणाल ठेवल्या गेले." ज्यावेळी सम्राट अशोक धम्मानुसार राज्य करीत होते, त्यावेळी कुणालाचा जन्म झालेला होता. याकरिताच सम्राट अशोकाने त्याचे नाव धम्मविवद्धन ठेवले होते." असे म्हटले जाते की, अगदी कुणालाच्या जन्माच्या आधि सम्राट अशोकाने ८४००० धम्माराजिक विहार बनवुन पूर्ण केलेले होते. तिवल किंवा तिवर जो बऱ्याच काळानंतर च्या शिलालेखा मध्ये कोशलचा राजा म्हणून उल्लेख आढळून येतो. त्याचे डोळे एका शिकाऱ्याच्या अतिशय तिक्ष्ण" डोळया प्रमाणे असल्यामुळे त्याचे उपनाव तिवल किंवा तिवर (तिव्र डोळे असलेला) ठेवल्या गेले. त्याच्या जन्माच्या वेळी सुद्धा सम्राट अशोक धम्मानुसारच राज्य करीत होता.
सम्राट अशोकाच्या जीवनामध्ये कलिंग युद्ध हे शेवटचे युद्ध होते. काही इतिहासकारांचया मतानुसार सम्राट अशोकाने हे युद्ध बौद्धधम्माचा स्विकार केल्या नंतर केलेले होते. कारण त्यावेळी सम्राट अशोक कट्टर बौद्ध नव्हता आणि तो बुद्धाच्या शिकवणूकीशी चांगल्या प्रकारे परिचित सुद्धा नव्हता." परंतु इतर ऐतिहासिक प्रमाणाकडे नजर टाकल्यास वरील प्रकारचे म्हणणे आधारहिन आढळुन येते. राज्याभिषेकाच्या आठव्यावर्षी " सम्राट अशोकाने कलिंग देशावर विजय मिळाविलेला होता. हे अतिशय भयंकर असे युद्ध होते. या युद्धामध्ये जिंकलेल्या (१,५०,०००) लोकांना कैदी बनवुन नेण्यात आले होते. या युद्धात दहा हजार लोक मारल्या गेलेले होते. आणि किती लोक तरी अधिक संख्येने भूकेने किंवा बिमारीने मारण पावले होते.
कलिंग राज्य अतिशय समृद्ध राज्य होते. धनधान्याने परिपूर्ण होते. मॅनमार आणि दक्षिणपूर्व आशिया सोबत त्याचे व्यापारी संबंध होते. हत्ति दंताच्या वस्तु करिता सुद्धा कलिंग राज्य प्रसिद्ध होते. तेथे हत्ति फार मोठ्या संख्येने असल्यामुळे त्यांचा युद्धा मध्ये फार मोठा वापर होत असे. ह्या भयंकर युद्धा मध्ये कलिंग राज्याच्या सैन्यामध्ये ६०,००० पायी सैन्य, एक हजार घोडस्वार आणि ७०० हत्ती होते." सम्राट अशोकाने कलिंग देशावर आक्रमण का केले होते. याचे कारण अस्पष्ट आहे. शक्यता आहे की, सम्राट अशोकाला कलिंग देशाच्या धनसंपत्तीने आकर्षित केले असावे किंवा मौर्य साम्राज्याचा विस्तार करण्याची भावना अशोकाच्या मनामध्ये राहिली असावी. यात मुळीच शंका नाही की, कलिंग देशातील लोक पराक्रमी होते आणि पराक्रम पूर्वक लढले होते. अनेक विद्वान या मताचे आहेत की, सम्राट अशोकाने कलिंगावर आक्रमणाआधि कलिंग राज्य बौद्ध धम्मावलंबी होते.
या महाभयंकर युद्धामुळे जी हानी झाली त्याचा सम्राट अशोकाच्या मनावर भयंकर परिणाम झाला. आई आणि लहान मुलांचे मनाला चीरणारे आवाज त्यांच्या कानामध्ये गुंजत राहिलेत. याचा सम्राट अशोकाला भयंकर पश्चाताप झाला. अशाच प्रकारच्या अवस्थेमध्ये एक दिवस सम्राट अशोकाने निग्गोध सामणेराला शांत भाव युक्त स्थितीमध्ये राजवाड्याच्या आंगणातून जातांना पाहिले. ज्याप्रमाणे बुडणाऱ्याला काठीचा आधार मिळावा अशाच प्रकारे सम्राट अशोकाच्या मनामध्ये संवेदना उत्पन्न झाली. संवेदनापूर्ण अवस्थेमध्ये सम्राट अशोकाने निग्गोध सामणेराला आपल्या जवळ बोलाविले. अशोकाने त्या सामणेराला म्हटले.
"तात ! आपण योग्य आसन ग्रहण करावे." निग्गोध सामणेर राज सिंहासना कडे आला त्याच्या राजसिंहासनाकडे आल्या नंतर सम्राट अशोकाने असा विचार केला.
"आज हा सामणेर माझ्या घराचा स्वामी होईल,"
आणि सम्राट अशोकाच्या हाताचा आधार घेत सामणेर निग्गोध सिंहासनावर चढून पांढऱ्या राजछत्राच्या खाली बसला. लहान सामणेराला सिहासनावर बसलेला पाहून सम्राट अशोक प्रसन्न झाला. सम्राट अशोकाने सामणेर निग्गोधाचा योग्य सन्मान केला. आपल्या करिता बनविण्यात आलेल्या भोजना मधुन सामणेर निग्गोधाला भोजनदान दिले. त्यानंतर सम्राट अशोकाने सामणेराला भगवान तथागता द्वारे उपदेशित धर्माविषयी विचारले. सामणेर निग्गोधाने सम्राट अशोकाला अप्पमादवग्ग (अप्रमादवर्ग) धम्मपदाचा उपदेश दिला." तो उपदेश ऐकून सम्राट अशोकाची बौद्धधम्माप्रति आस्था जागृत झाली."
सम्राट अशोकाने म्हटले, "हे तात! मी तुम्हाला आठ भोजन (आठ लोकांचे भोजन) देतो." सामणेर म्हणाले "मी त्याला आपल्या उपाध्यायाला समर्पित करित आहे.
नंतर सम्राट अशोकाने पुन्हा आठ भोजन दिले. सामणेर निग्गोधाने ते आपल्या आचार्याला अर्पण केले. सम्राट अशोकाने पून्हा आठ भोजन दिले. सामणेर निग्गोधाने ते भिक्खू संघाला अर्पण केले. नंतर आठ भोजन प्राप्त झाल्यानंतरच बुद्धीमान सामणेर निग्गोधाने ते स्विकार केले. दुसऱ्या दिवशी सामणेर निग्गोध बत्तीस भिक्खूंच्या सोबत राजमहालामध्ये गेले. सम्राट अशोकाने त्यांना आपल्या हाताने भोजन वाढले. आणि धम्मउपदेश ऐकल्यानंतर लोकांसह शरण (त्रिसरण) ग्रहण केले. "
त्यांनतर सम्राट अशोकाने हया संख्येला दुप्पट करीत क्रमाक्रमाने आठ हजारा पर्वत वाढवित दान दिले." आणि भिक्खूंना दान उपहार देऊन विचारले-
"तथागत बुद्धाद्वारे दिल्या गेलेले उपदेश किती आहेत ?
मोग्गलिपुत्त स्थविराने उत्तर दिले-
"राजा ! ८४,००० धम्म स्कन्ध (विभाग) आहेत."
हे ऐकून सम्राट अशोकाने म्हटले की "मी प्रत्येका करीता एक एक विहार तयार करवून सर्वांची पूजा करील. ""
यावरून स्पष्ट होते की, सम्राट अशोक बौद्धधम्मामध्ये संस्कारीत होवुन उपासक झालेला होता. " राज्याभिषेकाच्या अकराव्या वर्षाच्या उत्तरार्धामध्ये सम्राट अशोकाने बौद्धधम्माच्या निर्माणात्मक कार्याला सुरू केलेले होते.
*_सम्राट अशोकाचे बौद्ध उपासक होणे._*
काही विद्वान प्रामुख्याने भारतीय विद्वान सम्राट अशोकाला अबौद्ध सिद्ध करण्याचा अयशस्वी प्रयत्न करताना आढळून येतात. परंतु त्यांचे अशा प्रकारचे प्रयत्न यशस्वी झालेले नाहीत. हे सत्य आहे की, सम्राट अशोकाच्या शिलालेखा मध्ये बौद्धधम्माच्या येवजी केवळ 'धम्म' नावाचाच उल्लेख आढळुन येतो. हे अशक्य नाही की, त्याकाळापर्यंत धम्माच्या सोबत 'बुद्ध' किंवा 'बौद्ध' नाव लावण्याची प्रथा प्रचलित नसावी. पालि साहित्यामध्ये 'बुद्धधम्मा' करिता 'धम्म विनय' शब्द आढळून येतो. सम्राट अशोक एका विशाल राष्ट्राचे एक महान सम्राट होते. त्यांना अबौद्ध समाजाची ही तेवढीच चिंता होती. जेवढी बौद्ध समाजाची. या मुळेच सम्राट अशोकाने इतर ही धर्मावलंबीयांना मदत केलेली होती. जरी आजचे संप्रदायवादी काही विद्वान सम्राट अशोकाला 'बौद्ध सम्राट' मानोत किंवा न मानोत परंतु देशामध्ये आणि देशाच्या बाहेर सुद्धा अशोकाने जे कार्य केलेले आहे, त्यामुळे कुणी ही स्विकार करील की, सम्राट अशोक 'बौद्ध सम्राट' होता. सम्राट अशोकाचे शिलास्तंभ व शिलालेख स्पष्ट शब्दामध्ये हे सांगतात की, प्रियदर्शी अशोक बौद्ध होता.
सप्म्राट अशोकाच्या बौद्ध असण्याचे हे सुद्धा एक फार मोठे प्रमाण आहे की, ते काही विद्वानांच्या मतानुसार बौद्ध भिक्खु झालेले होते. " आणि त्यांनी बौद्ध स्थळांची यात्रा केलेली होती. ९०० वर्षानंतर भारतामध्ये आलेले चीनी प्रभावी ईत्सींग यांचे म्हणणे आहे की, एका विशिष्ठ पद्धतीने अशोकाची प्रतिमा भिक्खूंच्या वेशामध्ये (चीवर) पाहीलेली होती." सम्राट अशोकाच्या भिक्खु होण्यावर विश्वास करता येते. कारण ईत्सींग या चीनी प्रवाशाच्या देशातील एका सम्राटाने दोन प्रसंगी चीवर परिधान केलेले होते. एक ई.स. ५२७ मध्ये व दूसरे ई.स. ५२९ मध्ये "त्याचप्रमाणे बाराव्या शतकामध्ये एक जैन राजासुद्धा भिक्खु (जैन साधु) झालेला होता. 'भिक्खु' अवस्थेमध्ये त्याने आपले नाव संघाचा शास्ता धारण केलेले होते. त्याने आपल्या शासन काळामध्ये अनेक प्रसंगी व्रत आणि उपवास केलेले होते. अकराव्या आणि बाराव्या शतकामध्ये जापानी सम्राट सुद्धा भिक्खु झालेले होते. त्या अवस्थे मध्येही तो उघडपणे आपल्या देशाचे मार्गदर्शन करीत होता. भिक्खु अवस्थेमध्ये आपल्या मुलांना नाव मात्र राजा बनविलेले होते. "
एखादा व्यक्ती अशा प्रकारची शंका घेऊ शकतो की, काय एखादा राजा एकाच वेळी भिक्खु जीवन व विशाल साम्राज्याचा भार सांभाळु शकतो काय ? भारतीय हिंदु परंपरे नुसार राजे म्हातारपणामध्ये सन्यास आश्रम स्विकार करीत होते. आणि आपल्या मुलांना राजसत्ता सोपवून वनामध्ये जात होते. परंतु चीन आणि जापान मधील सम्राटांनी एकाच वेळी दोन्ही कार्य करून दाखविले. हे अधिक शक्य आहे की, सम्राट अशोक बौद्ध स्थळांच्या यात्रेच्या वेळी भिक्खु बनलेले असावेत आणि नंतर पुन्हा गृहस्थ बनलेले असावेत. कारण बौद्ध भिक्खु हा चीवर त्याग करण्याकरिता नेहमीच स्वतंत्र असतो. आज सुद्धा थायलण्ड सारख्या देशामध्ये प्रत्येक बौद्ध गृहस्थ आणि तेथील राजा काही वेळा करीता (काही दिवसा करीता) प्रव्रज्जीत होतात.
बौद्ध होण्या संबंधी स्वत: सम्राट अशोक असे म्हणतात की, 'मी जवळ जवळ अडीच वर्षापासून उपासक राहीलेलो आहे. एक वर्ष पर्यंत मी चांगल्या प्रकारे प्रगती केलेली नाही, परंतु एक वर्ष जेव्हा मी संघाला (भिक्खु संघ) भेटायला गेलो. तेव्हा मला असे कळले की, मी चांगल्या प्रकारे प्रगती करीत आहे' अशा प्रकारे सम्राट एका दुसऱ्या शीलालेखामध्ये " सुद्धा स्वतःला 'उपासक' स्विकार करतो.
यामध्ये मुळीच शंका नाही की, सम्राट अशोक 'बौद्ध' होते. अशा प्रकारची भाषा तर अलिकडील राजकारणी सुद्धा बोलु शकत नाही. डॉ. रंगस्वामी असे प्रतिपादन करतो की, सम्राट अशोक पहिले महान शासक होते." जे बौद्ध होते डॉ. अमत्य चंद्रसेन यांचे म्हणणे आहे की, सम्राट अशोकाच्या सहाकार्यामुळेच बौद्धधम्म दुसऱ्या देशामध्ये पसरला. परंतु ज्या धम्माचा प्रचार सम्राट अशोकाने भारतामध्ये केला तो बौद्धधम्म नव्हता. हे शक्य आहे की, सम्राट अशोकाने ज्या धम्माचा प्रचार भारतामध्ये केला तो महायान किंवा हिनयानच्या रूपामध्ये नसावा. परंतु तो बौद्धधम्म नसावा किंवा हिंदु धर्म असावा याचे कोणते ही प्रमाण उपलब्ध नाही. सम्राट अशोकाने ज्या तिसऱ्या बौद्ध संगितीचे आयोजन केले होते. ते बौद्ध धम्माच्या प्रचाराचे कार्य नव्हते काय ? अशोकाच्या शिलालेखांचे अनेक किंवा जवळ जवळ संपूर्ण उपदेश बुद्धोपदेशच आहेत. अशाच प्रकारे सम्राट अशोकाने संपूर्ण भारतामध्ये (प्राचीन भारत) ८४,००० विहार बनविले होते. त्यांचे हे सर्व कार्य बौद्धधम्माचे उघड उघड प्रचार कार्य नव्हते तर काय होते ? काही विद्वान अशोकाचा 'व्यक्तीगत धर्म' आणि 'राजकिय धर्म' वेगवेगळे असल्याचे सांगतात. परंतु सम्राट अशोकाच्या कर्तुत्वाने सिहावलोकन केल्या नंतर असे काही ही आढळुन येत नाही. ते दोन्ही दोन वेगवेगळ्या स्वरूपामध्ये असतील ही तरी ते दोन्ही बौद्धधम्माचेच दोन रूप होते. यात मुळीच शंका नाही.
डॉ. के. वी. रंगस्वामी एका प्रसंगी असे म्हणतो की, अशोकांचा धर्म आपल्या स्थुल स्वरूपामध्ये केवळ ब्राह्मण धर्मच आहे. " डॉ. रंगस्वामी पुन्हा असेही म्हणतो की, अशोक बौद्ध होता आणि ईतर ठिकाणी अशोकाच्या धम्माला तो ब्राह्मण धर्म असल्याचे म्हणतो. डॉ. रंगस्वामी यांच्या हया दोन्ही मान्यता एक दुसऱ्याच्या विरोधी आहेत. वास्तविकपणे सम्राट अशोकाच्या धम्म हा ब्राह्मण धम्माशी कुठल्या ही प्रकारचा संबंध स्थापीत करित नाही. जसे आधि म्हटल्या गेलेले आहे की, बौद्धधम्म त्यावेळी धम्म विनयाच्या नावाने ओळखला जात होता. 'धम्म' या शब्दा सोबत 'बुद्ध' किंवा बौद्ध जोडण्याची परंपरा त्यावेळी प्रचलित झालेली नव्हती. अशोक पुत्र थेर महिन्द जेव्हा सिरिलंकेला गेले. तेव्हा त्यांनी सिरिलंकेचा राजा तिस्स यांच्या प्रश्नाचे या अर्थात शब्दामध्ये उत्तर दिलेले होते की "समनामयं महाराज धम्म राजस्स सावका.....' हे राजा, आम्ही धम्मराजा बुद्धाचे सावक आहोत. सद्धम्म किंवा बौद्धधम्म आणि अशोकाच्या धम्मामध्ये कोणत्याही प्रकारचा फरक आढळुन येत नाही.
*_प्रियदर्शी सम्राट अशोकाचा धम्म 'बौद्धधम्म'_*
सम्राट अशोकाच्या धम्म लक्षणा संबंधी विद्वानामध्ये वेगवेगळ्या मान्यता आहेत. या विद्वानामध्ये क्लिट, विंसेण्ट स्मिथ आणि डी. आर. भांडारकर हे प्रमुख मानता येईल. क्लिट यांच्या मतानुसार अशोकाचा व्यक्तीगत धम्म त्याच्या राजधम्माचेच एक दुसरे स्वरूप आहे. जे महाकाव्या मध्ये आढळून येते आणि जो राजकारणाची शिकवण देतो. विंसेण्ट स्मिथ यांचे म्हणणे आहे की अशोकाच्या धम्मामध्ये जो सिद्धांत आहे, ते सर्व धर्माचे सर्व सामान्य सिद्धांत आहेत. कमी किंवा जास्त प्रमाणात विन्सेण्ट स्मिथ यांचे म्हणणे डॉ. मुखर्जीच्या मान्यतेला अनुकुल आहेत. हे दोन्ही विद्वान अशोकाच्या धम्माला विश्वधम्म मानतात.
डॉ. सेनरत आणि डॉ. हुल्टस्व हे दोन्ही विद्वान अशोकाच्या धम्माचे निरिक्षण बुद्धोपदेशाच्या प्रकाशामध्ये करताना आढळून येतात. ते अशोकाच्या धम्माला बौद्धधम्मच मानतात. आणि ते या सिद्धांताचे सर्वात मोठे समर्थक आहेत. डॉ. डी. आर भांडारकर त्यांचे म्हणणे आहे की, अशोकाचा धम्म प्राचीन बौद्धधम्माची अनुकृती नाही. जो उपासकाद्वारे गृहस्थाद्वारे बुद्धाची पूजा करण्याचाच धम्म नव्हता. डॉ. भांडारकर आणि डॉ. राय चौधरी हे आमचे लक्ष बुद्धाद्वारे उपदेशित चक्रवर्ती राजाच्या आदर्शाकडे आकर्षित करतात. यांच्या समर्थनामध्ये डॉ. बेनी माधव बरूआ असे मत व्यक्त करतात की, सम्राट अशोकाचा धम्म संपूर्ण पणे बुद्धधम्माच्या सिद्धांताशी सरळ संबंध स्थापित करतो. इतर धर्म किंवा धार्मिक विचारांशी आणि मान्यतांशी मुळीच संबंध स्थापित करीत नाही. आणि या मान्यते मध्ये परिवर्तन करण्याचा आतापर्यंत कोणते ही कारण आढळुन आलेले नाही. " एखादा विद्वान याला राजधर्म म्हणू शकतो. किंवा बौद्धउपासक धम्म आणि विश्वधम्म माणील. परंतु या स्थिती मध्ये कोणत्याही प्रकारचे अंतर आढळुन येणार नाही. "ऱ्हिस डेव्हीड यांचे असे स्पष्ट निरिक्षण आहे की, अशोकाच्या धम्मामध्ये ईश्वर किंवा आत्मा आणि बुद्ध व बौद्ध धम्माचा उल्लेख आढळुन येत नाही."
उपासक शब्द बौद्ध व जैन दोन्ही साहित्यामध्ये उपलब्ध आहेत (थरस्ता, गहथा सिलालेख-12-13). धर्माच्या दृष्टि ने उपासक शब्द त्या श्रमण ब्राह्मण (भानु शिलालेख 13) धर्म संप्रदायाचे दायक मानले जातात (निकाय शिलालेख 13) उपासक ते गृहस्थ होते जे विभिन्न सामाजिक अनुक्रम आणि धर्म गुरूंच्या मार्गदर्शना नुसार जीवन मार्गावर चालत होते, विश्वास करीत होते (तत्रतत्र प्रसन्ना, शिलालेख 12). राजधर्म मनुष्य मात्राच्या सोबत प्राथमिक धार्मिकतेशी संबंधीत असताना सुद्धा तो शेवटी उपासक किंवा गृहस्थ धर्मायोग्य झाला. ह्या दोन्ही मध्ये फरक आहे. राजधर्माच्या मागे राज्य होते. परंतु उपासक धर्माच्या मागे अशाप्रकारची कोणती ही शक्ती नव्हती. परंतु परंपरांचे प्राबल्य आणि सामाजिक बंधन होते. तशाच प्रकारे धार्मिक प्रतिबंध हा दोन्हीचा उद्देश होता. सत्याप्रति आकर्षण आणि या जगामध्ये शांती व मरणांनतर परलोक प्राप्तीची भावना होती. निर्वाणाला प्राप्त करणे किंवा मोक्षाची प्राप्ती करणे त्यांच्या सामर्थ्यांच्या पलिकडील बाब होती. दोन्हीच्या आकर्षणाचे केन्द्रबिंदु होते दान, शील आणि मोक्ष प्राप्ती. येथे दान व शील आणि जीवनमुक्ती थे दोन साधन होते. स्वर्गाचा अर्थ होता (विपुले स्वर्गे), वरील लोक जेथे पुण्यवान व्यक्ती पोहोचतो. जो ईहलोकामध्ये पूण्य करतो. त्याला तेथे पर लोकामध्ये फळ प्राप्त होत असते (बहुफलाणं, साधवनि, शिलालेख-5 व 7).
उपासक धम्माच्या स्वरूपामध्ये अशोकाच्या धम्मा संबंधी न्हिस डेव्हीडस यांच्या तर्काप्रमाणे अधिक तर्क कदाचितच दुसरा कोणी आम्हाला देऊ शकेल. " डॉ. डी. आर. भांडारकर यांनी या विषयासंबधी सिगालोवाद सुत्ताचे उदाहरण देऊन तर्कानुरूप समजाविले आहे. महामंगल सुत्त आणि महामंगल जातक" मध्ये सुद्धा गृहस्थ धम्माचा उपदेश दिल्या गेले आहे. ते सर्व उपदेश अशोकाच्या शिलालेखामध्ये क्रमबद्ध आहेत आणि नविन पद्धतीने समजाविल्या गेलेले आहेत. या सर्वांच्या मुळा मध्ये हाच परमार्थ राहिला असेल की, भारतामध्ये बौद्ध प्रभाव कायम राहावा आणि बौद्धधम्माचा प्रचार व प्रसार व्हावा. सम्राट अशोकाने कर्तव्य आणि धार्मिकतेच्या आवश्यक सिद्धांतांचा समावेश आपल्या उपदेशा मध्ये काही प्रमाणात अशा प्रकारे केलेला आहे-
1) आई वडिलांची सेवा करणे आणि त्यांच्या आदेशाचे पालन करणे (मातरि पितरी सुसूसा शिलालेख, 3,11, 13 स्तंभलेख - 7 लघुशिलालेख).
2) गुरूजनांचा गौरव आणि आदर करणे (आचरिये अपचारिये सुसूंसे -
ठविये (लघुशिलालेख) गुरू सूसूसा (शिलालेख 13) गुरूनं अपचिति (शिलालेख 9 आणि लघु शिलालेख, स्तंभलेख 7).
3) मोठ्या व्यक्तीचा आदर करणे अगभूति सूसूसा (शिलालेख
4) अनुभवि आणि मोठयांना आदर करणे आणि सेवा करणे भाईर सुसू बुध-सुसूस (शिलालेख 4), त्यांचा सल्ला घेणे आणि सेवेमध्ये तत्पर असणे वयो महालकान अनुपहिपति, (स्तंभ लेख 7). थेरानं बुधानं दसने (शिलालेख 8).
5) सद् भाव श्रमण ब्राम्हणांच्या प्रति साधुत्वाचा व्यवहार आणि त्यांच्या प्रति उदारता दाखविणे - समण वाभणेसु सम्पटिपत्ति, (शिलालेख 4, स्तंभ लेख) ब्राम्हण समणानं दानं (शिलालेख 3). अशाप्रकारे त्यांच्या तत्वज्ञानाने दसनेच (शिलालेख ४).
6) मित्र, सगे संबंधी सोबती व रातलगांच्या प्रति मित बंधुत पहाय नातिकेसु सम्दापटिपति (शिलालेख 13), दानं (शिलालेख 3,9).
7) दास आणि नौकर यांच्या सोबत दया भावनेचा व्यवहार-दास नतकम्हि सम्यपटिपत्ति (शिलालेख 9,11, स्तंभलेख 7).
8) आई वडिलांचे पोषण करणे आणि राजाच्या प्रति वडिलाचा भाव ठेवणे. (साधवनि शिलालेख 2).
9) प्राणिहिसे पासून अलिप्त राहणे आणि कुणाव्याहि विद्यारांना नुकसान न पोहचविणे अनारंभो प्राणानं अविहिंसा भूतानं (शिलालेख 4) "
सम्राट अशोकाच्या शिलालेखामध्ये गृहस्थांचे करतुत्व स्पष्ट पणे सांगितल्या गेलेले आहे. ज्याप्रमाणे हे पित्याद्वारे किंवा पुत्राद्वारे किंवा भावाद्वारे किंवा पतिद्वारे करणिय आहे."
त्याच प्रमाणे मित्र, संबंधी किंवा नातलग व शेजारी द्वारे हे योग्य आहे. याला केले पाहिजे (शिलालेख 9,11).
अशोकाची नियमावलि व बौद्धन्याय
सम्राट अशोकाची नियमावली सुद्धा बौद्धमनो विज्ञान किंवा न्यायाशी संबंध ठेवणारी आहे. लघुलेखा मध्ये सम्राट अशोक हे वंडिये निठुलिये कोथे, माने आणि ईश्या इत्यादि शब्दांचा उल्लेख करतात. जे मानसाला न्हासा कडे नेतात, 'आसिनव गामिनी',
साधवनि शिलालेख एक ची सुची हया नियमांचा उल्लेख इच्या या अर्थाने करित असतो इ सा, असुलोष (उत्तेजना), निठुलिये (निष्ठुरता) आणि तुलना" कठोरता हे नियम धम्मदाबाद सुत्त" मध्ये एका मागे एक येत असतात. अशाच प्रकारे पूराभेद सुत्तामध्ये आणि महानिदेस सुत्तामध्ये समान स्वरूपामध्ये समजाविले गेलेले आहे. पालिच्या दोन नियमावलिना एकाच सोबत घेण्यात आलेले आहे. जी पुढील शब्दांशी संबंध ठेवत असते. क्रोध, ईष्या, मान, चंण्डिक्क आणि अस्सुलोप या मध्ये दोन दोन विशेषण आहेत. चण्ड आणि फरूस एकाच प्रकारच्या व्यक्तीवर लागू होतात." अशोकाच्या अखखसे अचण्डे सखिनालंभे किंवा अचंडे अफलुसं (साधवनी शिलालेख -1) चे शब्द आपल्या पालि स्वरूपामध्ये अकक्कसं, अफरूसं (जातक -3 पा. 248) आढळून येतात. अशोकाचे सखिना लम्भे सरळ पालिच्या सहवासो (जातक 4, पा. 110) शी संबंध ठेवतो.
अशोकाच्या शिलालेखामध्ये दोन शब्द आपले महत्वपूर्ण स्थान ठेवित...
पुढील भागात
मुक्तीदाता विशेषांक
प्रियदर्शि सम्राट अशोक (जयंती विशेष)
भाग 8
असतात - दान आणि दया, दयेकरिता पालिमध्ये अनुहया शब्द आहे. भगवान बुद्धाच्या उपदेशानुसार अनुया पासून सहानुभूति समानता आणि सहहृदय भाव (मेत्तचित्तता) था बोध होतो. दया शुद्ध करूणा (कारूण्य) शी संबंध ठेवीत असते. लहानांच्या प्रति अनुकंपा, दान, दयाचे स्पष्टीकरण आहे. दानाचा अर्थ त्याग आहे. (पालिचाग किंवा परिच्छाग) अशोक दान कर्माला अनेक अर्थाने प्रयोग करतो. स्तंभलेख दोन मध्ये सम्राट अशोक डोळे दान (चक्खु दाने) आणि जीवनदान (पानदखिनाये) चा उल्लेख करतो. अशा प्रकारे अनेक उदाहरण देता येतील.
सम्राट अशोकाकरीता योग्य प्रकारे धम्म केवळ जीवन मार्ग किंवा मनुष्य स्वभावाला विकसित करण्या करिताच नव्हते तर मनुष्यमात्राचे हृदय जिंकण्याचे एक शख सुद्धा होते. आजच्या राजकारणाच्या अर्था मध्ये स्थायी सभ्यता स्थापित करणे, एका देशाचे दुसऱ्या देशा सोबत संबंध स्थापीत करणे आणि नवीन राष्ट्रीयतेचे निर्माण करणे हा सम्राट अशोकाचा उद्देश होता. सम्राट अशोकाच्या धम्मविजयाने दुसऱ्या देशांच्या सोबत भारताचे संबंध स्थापीत केले. त्यांचा धम्म विजय त्या चार महान धम्मविजया मधील एक होती. जी मुस्लीम पूर्व भारतामध्ये इण्डो आर्यान च्या द्वारे करण्यात आलेली होती. इतर तीन विजय हया अग्नीच्या दिग्विजय होत्या. महाकाव्याचे धर्मविजय आणि कारण्डव्यूह त्रैलोक्य विजय.
धम्मविजयाच्या सिद्धांताचे बिज
धम्मविजयाच्या सिद्धांताचे बिज आणि विकास बौद्ध विचारधारेच्या द्वारे व ब्राहाण विचारधारेच्या द्वारे, अशाप्रकारे दोन्ही द्वारे प्रारंभ झालेले होते. ब्राह्मण कौटिल्याच्या अर्थशास्त्रानुसार दुर्बलांच्या द्वारे दुसऱ्यांच्या सामर्थ्याला स्विकार करणे हा विचार धम्मविजयाच्या मार्गाला समाधान मिळवून देते. संस्कृत महाकाव्यामध्ये सुद्धा हे स्पष्ट पणे म्हटल्या गेलेले आहे की, पांडवाच्या दिग्विजया अंतर्गत असलेले उपहारांचे देणे किंवा लगान स्विकार करणे किंवा सत्ता स्विकार करणे किंवा स्वामित्व मान्य करणे. ब्राह्मण विचारधारेचा धर्मविजय तलवारिच्या बळावरच होत राहिला. सम्राट अशोकाचा धम्मविजय मध्यममार्ग स्विकार करतो. जेथे शांती (सकावे हैं) आणि साधारण शिक्षा (लघु दण्डता) चे विधान करण्यात आलेले आहे. (शिलालेख 13) बौद्ध धम्मविजय तलवारीशिवाय किंवा सैन्याच्या मदतीने दंडरहित, शख रहित व मनुष्यत्वाच्या श्रेष्ठ आदर्शा द्वारे (धम्मेन अभिविजय) होत राहिलेला आहे. अशोकाच्या शिलालेखामध्ये कुठे ही सैन्याचा निषेध नाही आणि पूर्णपणे सैन्याचे विधान सुद्धा नाही. भगवान बुद्धाच्या धम्मविजय" च्या आधारेच धम्माशोकाचा धम्मविजय वाढत राहिला. अशोका च्या धम्मविजयाचे मुळ तत्व भगवान बुद्धाच्या धम्मविजयाचेच होते,
भगवान बुद्धाच्या महापरिनिब्बाणा नंतर त्यांच्या अवशेषावर वेगवेगळ्या राजांनी आप आपल्या राज्यामध्ये आठ स्तूप बनविलेले होते. सम्राट अशोकाने त्या सात स्तूपामधून भगवान बुद्धाच्या शारिरीक धातु काटुन घेतल्यात. जेव्हा रामगामध्या स्तूपा मधून भगवान बुद्धाच्या अस्ती काढण्यात येऊ लागल्या होत्या तेव्हा तेथील तळयामध्ये एक दैत्य मनुष्याच्या स्वरूपामध्ये सम्राट अशोकाला आपल्या निवास स्थानी घेऊन गेला आणि प्रार्थना केली की, तेथील स्तूपामधून भगवान बुद्धाच्या अस्ती काडु नये. तेव्हा त्याच्या विनंती वरून सम्राट अशोकाने रामगामच्या स्तूपामधील भगवान बुद्धाच्या अस्ती तेथेच राहु दिल्या, अशा प्रकारची मान्यता प्रचलीत होती.
आधिच म्हटल्या गेलेले आहे की, सम्राट अशोकाने आपल्या संपूर्ण साम्राज्यामध्ये 84,000 विहाराच्या सोबतच तेवढयाच संख्येमध्ये स्तूपांचे निर्माण कार्य सुद्धा केलेले होते. या सर्व ठिकाणी समान स्वरूपामध्ये तथागताच्या शारिरीक धातु ठेवण्यात आलेल्या होत्या.
विहार आणि स्तूप प्रामुख्याने ऐतिहासिक व महत्वपूर्ण ठिकाणीच बांधल्या गेलेले होते. उदा. कपिलवस्तु जवळील चैत्य अर्थात स्तूप जेथे सिद्धार्थ कुमाराने गृहत्याग नंतर सर्व प्रथम विहार केलेला होता. आणि ज्या ठिकाणी सिद्धार्थ कुमारोन आपल्या तलवारीने आल्या डोक्याचे केस कापलेले होते.
सातव्या शतकातील चीनी यात्री व्हेन सांग असे वर्णन करतो की गांधार प्रदेशामध्ये हजारो स्तुप आणि विहार होते. ज्यामधील अनेक विहार आणि स्तूप खंडीत झालेले होते. त्याचप्रमाणे शेजारच्या उदयेन राज्यामध्ये चौदा हजार पेक्षा कमी विहार नव्हते. तक्षशिला मधील विहार व स्तूपांची संख्या सुद्धा फार मोठी होती. प्राचीन तक्षशिला नगराच्या पूर्वे कडील पहाडी विहारांनी वेढलेली होती आणि शहरामध्ये या पेक्षा ही अधिक संख्येने संघाराम विद्यमान होते. जेव्हा तिस्स रक्खिता ने तक्षशिलेच्या उपराज कुणाल कुमार यांचे डोळे काढावयास लावले होते, तेथे सुद्धा सम्राट अशोकाद्वारे एक चैत्य बनविण्यात आले होते. अमिअरल व नम्रनाला यांच्या मध्ये तक्षशिला मधील एक संघाराम (महाविहार) होते, ज्याला शक्यता आहे, सम्राट अशोका द्वारेच बनविण्यात आलेले होते. हे स्थळ अतिशय महत्वाचे आहे. याचे प्राचीन नाव धम्मराजिक होते. असे मानले जाते की, जेवढे स्तूप भगवान बुद्धाच्या अस्थिवर निर्माण करण्यात आलेले होते, ते सर्वाच्या सर्व सम्म्राट अशोका द्वारेच निर्माण करण्यात आले होते.
राजा बिंदुसाराच्या जीवन काळामध्ये सम्राट अशोक तेथील विद्रोहाला शांत...
पुढील भागात
मुक्तीदाता विशेषांक
प्रियदर्शि सम्राट अशोक (जयंती विशेष)
भाग 9
करण्याकरिता तक्षशिलेला गेला होता. परंतु तो काश्मिर ला गेला असेल असे निश्चित पणे म्हणता येत नाही. तरी परंतु श्रीनगर च्या निर्मिती चे श्रेय्य अशोकालाच दिले जाते." अशाप्रकारे सम्राट अशोकानेच काश्मीर ला बौद्धधम्माशी परिचित केले होते. सम्राट अशोकाने देवो पाटन (देवपट्टन) नावाचे नगर नेपाळ मध्ये स्थापीत केले होते. राजधानी पाटलीपुत्त मध्ये सम्राट अशोकाद्वारे निर्माण करण्यात आलेले दोन संघाराम पातील एक अशोकाराम व दूसरा कुक्कुटाराम प्रसिद्ध आहे.
सम्राट अशोकाद्वारे बौद्ध धम्माला स्विकारल्या नंतर सर्व सामान्य लोकांची अभिरूची सुद्धा बौद्धधम्मा कडेच वाढली. धम्मप्रचाराकरीता राज्य कोशामधून बऱ्याच मोठ्या प्रमाणात धन संपत्ती खर्च करण्यात येऊ लागले. दान देणे व प्रामुख्याने भिक्खूंना भोजन दान देण्यामध्ये आपल्या उदारतेमुळे ते अनाथपिण्डिका सारखे 'दायक' म्हटल्या गेले.
सम्राट अशोकाने आपल्या धम्मगुरू मोग्गल्लिपुत्त तिस्स यांच्या प्रेरणेने श्रद्धापूर्वक बौद्ध स्थळांची यात्रा केली. ते जेथे जेथे गेलेत तेथे तेथे त्यांनी अर्थात सम्राट अशोकाने स्मारक स्वरूपामध्ये स्तूप, विहार बनविलेत आणि मोठमोठाले स्तंभ(अशोक स्तंभ) स्थापीत केलेत आणि त्यावर लेख कोरलेत, शिलालेख लिहिलेत. हया अनेक स्मारका मधील काही स्मारक फाहीयान (पाचवे शतक) आणि व्हेन त्यांग (सातवे शतक) यांनी पाहिलेत आणि त्यांनी आपल्या यात्रा विवरणामध्ये वर्णन सुद्धया केलेले आहेत. अशोकाचे हे शिलालेख व स्तंभ लेख आपल्या प्राचीन भारतीय इतिहासाचे मैलाचे दगड आहेत.
सम्राट अशोकाचा आजोबा सम्राट चंद्रगुप्त मौर्य आणि वडिल बिंदुसार यांनी मौर्य साम्राज्याचा फार मोठ्या प्रमाणात विस्तार केलेला होता. त्यांनी हा राज्य विस्तार प्रमाण किंवा आक्रमण या द्वारे केलेला होता. परंतु सम्राट अशोकाने विहार यात्रा मृद यात्रा व विजय यात्रा इत्यादीचा निषेध करून धम्मयात्रा आणि धम्मयात्रामध्ये सम्राट अशोक युद्ध प्रयाण प्रमाणेच फार मोठ्या थाटाने एका सम्राटाच्या स्वरूपामध्ये यात्रा करित होता. त्यांच्या सोबत सरदार, मंत्री फार मोठ्या आकाराचे हत्ती, घोडे, मुर्तीकार, शिल्पकार व भिक्खु संघ होता. त्यांचा परिवार सुद्धा सोबत राहात होता.
अशोकाची धम्मयात्रा
सम्राट अशोकाच्या धम्मयात्रा (ईसा पूर्व 249) त्यांच्या राज्याभिषेकाच्या वीसाव्या वर्षी प्रारंभ झाल्यात. सम्राट अशोक आपले आचार्य गुरू मोग्गल्लिपुत्त तिस्स यांच्या मार्गदर्शनामध्ये सर्वात आधि भगवान बुद्धाचे जन्म स्थान लुम्बीनीला गेले. या यात्रा मध्ये सम्राट अशोका सोबत त्यांचे दुसरे धम्मगुरू आचार्य उपगुप्त स्थविर सुद्धा सोवत होते. सम्राट अशोकाने लुम्बिनी मध्ये एक विशाल स्तंभ स्थापित करविले. त्या स्तंभावर खालील लेख पालि भाषेमध्ये आणि धम्मलिपी मध्ये पुढील प्रमाणे कोरण्यात आलेला होता.
देवानपियेन पियदसिन लाजिन वीसतिवसा भिसितेन।
अतन आगाच महीयिते हिद बुधे जाते सक्यमुनीति। सिलाविगडभी चा कालापिते सिलाथमे च उस पापिते ।
हिंद भगवं जाते ति, सुमिनिगामे उबलिके कते, अठ भागियेच।
देवांना प्रिये प्रियदर्शी, आपल्या अभिषेकाच्या वीसाव्या वर्षी येथे पूजा करित आहे. कारण येथे भगवान बुद्ध सक्यमुनिचा जन्म झालेला होता. शिलास्तंभ स्थापित करण्यात आले. आणि येथे भित्त सुद्धा बनविण्यात आली. कारण येथे भगवान (तथागत) जन्मलेले होते. आणि लुम्बिनी गाव राज्यकरापासून मुक्त करण्यात येते आहे. जो आठवा भाग राज्याला दिला जात होता.
जो पर्यंत हे शिलास्तंभ लेख प्राप्त झालेले, नव्हते तो पर्यंत अनेक विद्वान लोक भगवान बुद्धा ला ऐतिहासिक महापुरूष मानायला तयार नव्हते. सम्राट अशोक लुम्बिनी वरून कपिलवत्थुला गेले होते. त्यानंतर सात्वत्थि, सारनाथ" कुशिनारा, आणि बोधगया इत्यादीची यात्रा करित पाटलीपुतला परतले होते.
बौद्ध इतिहासकार तारानाथ यांच्या मतानुसार सम्राट अशोक नालंदाला सुद्धा गेले होते. त्यांनी तेथे सारिपुत्ताच्या चैत्याची पूजा केलेली होती आणि तेथे एक संघाराम (भिक्खूंचे निवास स्थान) बनविले होते, म्हणूनच सम्राट अशोकाला नालंदा महाविहार (विद्यापीठ) चे पहिले संस्थापक मानले पाहिजेत.
भगवान बुद्ध जेथे जेथे विचरण करित राहिलेत किंवा त्याचे सावक (भिक्खु) गणांनी चारिका केली होती, त्या त्या सर्व ठिकाणी सम्राट अशोकाने सुद्धा यात्रा केलेली होती. सम्राट अशोकाच्या धम्म यात्रेचे वर्णन व्हेनत्सांग या चीनी प्रवासाने आपल्या यात्रा वृत्तांता मध्ये केले आहे. अशाप्रकारे सम्राट अशोका द्वारे निर्माण करण्यात आलेल्या विहाराची आणि चैत्यांची माहिती आढळून येते. चीनी यात्री व्हेन-सांग यांच्या नुसार धम्माशोकाने तक्षशिला मध्ये तीन फार मोठे स्तुप बनविलेले होते. जे शंभर शंभर फुट उंच होते. नगरहार (कंदहार) च्या स्तुपा संबधी त्यांनी लिहिलेले आहे की, ते स्तुप 300 फुट उंच वनविण्यात आले होते. या व्यतिरिक्त सम्राट अशोकाद्वारे मधुरा (मथुरा) थानेश्वर, कनौज, साकेत (अयोध्या), प्रयाग (इलाहाबाद), कोसंबी, सावत्वी, श्रीनगर, कपिलवत्यु, कुशीनगरा, काशी, सारनाथ, मसाद (शाहाबाद) आटवी...
पुढील भागात
मुक्तीदाता विशेषांक
प्रियदर्शि सम्राट अशोक (जयंती विशेष)
भाग 10
वैशाली, श्वेतपूर (हाजीपुर), राजगृह (राजगृह), बोधगया, हिरण्यपर्वत आणि महाराष्ट्र इत्यादि प्रदेशामध्ये बनविण्यात आलेल्या स्तूपांचे सविस्तार वर्णन आढळून येते. पाटलिपुत्ता संवधी लिहितांना व्हेनत्सांग असे लिहितो की, तेथे शेकडो संघाराम आणि विहार विद्यमान होते. त्यातील काही तेव्हाही सुरक्षित होते.
महान चीनी यात्री व्हेनसांग पुढे असे ही लिहितो की नगर (पाटलीपुत्त), व्या उत्तर भागामध्ये एक स्तंभ आहे. जेथे अशोक राजाचे द्वार आहे. त्या जागे पासून दक्षिण दिशेला एक स्तुप आहे आणि त्याच्या शेजारीच एक विहार आहे, ज्यात भगवान बुद्धाच्या पायाचे चिन्न होते. हे पदचिन्न एक फुट आठ इंच लांब आणि सहा इंच रुंद होते. त्यात चक्र (धम्म चक्र), कमळाचे फुल आणि अष्टांगिक मार्गाचे प्रतिक चिन्ह कोरलेले होते. त्या विहाराच्या उत्तरे मध्ये सुद्धा एक स्तंभ आहे. ज्यावर लिहिलेले आहे की, "अशोकाने तीनदा संपूर्ण जम्बुद्विपाला बुद्ध, धम्म आणि संघाला दान दिलेले होते." राजधानी पाटलिपुत्तच्या दक्षिण पूर्व मध्ये कुक्कुटाराम विहार आहे. त्याच ठिकाणी सम्राट अशोक भिक्खूंना (समण) चार प्रकारचे दान देत असत.
डॉ. जेन फिल्लिओज यांचे म्हणणे आहे की, अशोकाने आपली धम्मयात्रा अगदी 256 दिवसामध्ये पूर्ण केलेली होती. प्रश्न उपस्थित होतो की, सम्राट अशोकाने खरोखर 256 दिवसामध्येच आपल्या धम्म यात्रेला पूर्ण केले होते काय ?
वरिल म्हणण्याचे हेच उत्तर असु शकते की, कारण ज्यादिवशी अशोकाने आपली धम्मयात्रा समाप्त केली त्याच दिवशी भगवान तथागताच्या महापरिनिर्वाणाला सुद्धा खरोखर 256 वर्ष पूर्ण झालेले असावेत. असे अनुमान करता येईल.
स्थविर महेन्द्राच्या आई पासून प्रेरितहोवून सम्म्राट अशोकाने सर्वात आधि सांचीचे विहार आणि स्तूप (मध्यप्रदेश) वनविले असावे. आणि शिलालेख नंतर लिहिले गेले असावेत. या लेखामध्ये सम्राट अशोक भिक्षु आणि भिक्खुनींना संघामध्ये मतभिन्नता विवाद उत्पन्न न करण्याची कठोर सूचना देतो व म्हणतो की, जो संघामध्ये मतभेद उत्पन्न करील त्याला पांढरे कपडे नेसायला दिले जाईल आणि त्याला विहारातून बाहेर काढून दिले जाईल. (अनावासासि)"
सम्राट अशोकाच्या काळा आधि भारतीय घर, भवन, लाकडांचे बनविले जात असत. तशाच प्रकारचे जसे आज सुद्धा म्यानमार मध्ये लाकडांच्या इमारती, घरे दारे बनविलि जातात. सम्राट अशोकाच्या काळा मध्ये दगडांचे भगवन, घर तयार करण्याची परंपरा कदाचित परशियामधून आली असावी. सम्राट अशोकाचे शिलास्तंभसुंदर, गुळगुळीत व चमकदार आहे. यावरून असे लक्षात येते की, हे कार्य कीती कष्टाने व परिश्रम पूर्वक करण्यात आले असावेत.
अशोक चक्र किंवा धम्मचक्र हे भगवान बुद्धाद्वारे उपदेशिलेल्या प्रतित्य समुत्पाद आणि आर्य अष्टांगिक मार्गाच्या आधारे बनविल्या गेले. हे त्याचेच प्रतित आहे. सारनाथ मध्ये शिलास्तंभाच्या वर बनविण्यात आलेले चार सिंह हे भगवान युद्धाद्वारे चार ही दिशांना करण्यात आलेल्या सिंहनादाचे द्योतक आहे. अशाच प्रकारे घोडे, बैल (सांड), हत्ती आणि हंस हे सिद्धार्थ कुमार अर्थातच भगवान बुद्धाचे प्रतिक मानल्या गेलेले आहे किंवा मानले जातात.
सम्राट अशोकाच्या काळामध्ये भगवान बुद्धाच्या महापरिनिर्वाणाच्या 260 वर्षानंतर अशोकारामा मध्ये साठ हजार भिक्खू विहार करित होते." तशाच प्रकारे संपूर्ण देशामध्ये भिक्खूंची संख्या फार मोठया प्रमाणामध्ये वाढलेली होती. त्यावेळी भिक्खू आणि भिक्खूणिचा सन्मान सुद्धा वाढलेला होता. दिपवंसा मधील उल्लेखा प्रमाणे आजीवक परिव्राजक व इतर विचार धारेना मानणारे साधू भिक्खूंच्या चीवरामध्ये या आदर सत्काराचा चुकीच्या पद्धतीने लाभ घेऊ लागलेले होते. यावरून असे आढळुन येते की, जे भिक्खु धेरवादी बौद्ध परंपरेला मानत नव्हते त्यांना 'आजीवक' किंवा 'अन्यमतावलंबी' म्हणून भिक्षु संघामधून बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आलेला होता. आणि हा प्रयत्न यशस्वी सुद्धा झालेला होता. भगवान बुद्धाच्या महापरिनिर्वाणा नंतर 100 वर्षा नंतर जी दूसरी धम्म संगिती झालेली होती त्यावेळी सुद्धा वैशालीच्या हजारो भिक्खूंनी आपली संगिती अर्थात परिषद स्वतंत्र पणे आयोजित केलेली होती. सम्राट अशोकाच्या वेळी त्यांच्या संखे मध्ये बरीच वाढ झाली होती. सम्राट अशोकाने मोग्गल्लिपुत्त तिस्स स्थविराच्या अध्यक्षतेखाली भिक्खु संघाच्या (थेरवाद) आग्रहा वरून तिसरी संगिती आयोजित केलेली होती. दूसऱ्या आणि तिसऱ्या संगितीच्या आधिच भगवान बुद्धाच्या महापरिनिर्वाणा नंतर लगेच तीन महीने पूर्ण होताच राजगृहमध्ये वैभार पर्वता वरील सत्तपणि गुहेमध्ये आयोजित करण्यात आलेली होती. आणि या संगितीला मगध राजा अजातसत्तुचे संपूर्ण संरक्षण प्राप्त होते. वैशाली मध्ये पहिल्या धम्म संगिती नंतर 100 वर्षानी जी दूसरी धम्म संगिती झाली त्या संगितीला वैशालीचा राजा काळाशोकाचे संपूर्ण राजकिय संरक्षण प्राप्त होते.
भिक्खू संघामध्ये विवाद
इतिहासकार आर. आर दीवाकर असे विचार स्पष्टपणे प्रतिपादन करतो की, सम्राट अशोका ने निश्चितपणे बौद्ध धम्माचा स्विकार केलेला होता. परंतु सम्राट अशोकाने संप्रदाय विशेष बौद्ध धम्माची बाजु घेतलेली नव्हती पाटलीपुत्त मध्ये आयोजित तिसऱ्या संगितीच्या अवलोकनावरून व पुरातात्वीक उत्खननावरून असे...
पुढील भागात
मुक्तीदाता विशेषांक
प्रियदर्शि सम्राट अशोक (जयंती विशेष)
भाग 11
स्पष्ट पणे आढळुन येते की, सम्राट अशोकाने धेरवादी बौद्ध धम्मचीच विशेष व आग्रहपूर्वक बाजू घेतलेली होती. अभिधम्म पिटकाच्या अंतर्गत मानल्या गेलेल्या 'कथावान्णु' या ग्रंथाचे कर्ते सम्राट अशोकाचे गुरू स्थविर मोग्गल्लिपुत्त तिस्स हे होते. या संधामध्ये त्यांनी इतर मताचे खंडन केलेले आहे. आणि शेवटी त्यांनी थेरवादालाच मूळ बुद्धवचन मानलेले आहे. सम्राट अशोकाचे शिलालेख सुद्धा कथावत्युच्या सिद्धातांचे, मान्यतांचे समर्थन करतात.
काही काळानंतर पाटलीपुत्तच्या विहारामध्ये राहणारे धम्मवादी व अधम्मवादी भिक्खूंच्या मध्ये मतभेद निर्माण झालेत. ती मतभिन्नता, विवाद कोणत्याही प्रकारे शांत होत नाही हे पाहून स्थविर मोग्गल्लिपुत्त तिस्स दुक्खी होवून पाटलिपुत्ताचा त्याग करून अहोगं " पर्वतावर निघून गेलेत. तेथे चार वर्ष पर्वत विवाद चालत राहिला. उपोसथ कर्मसुद्धा बंद पडले. उपोसथ कर्माकरिता सर्वांचे एके ठिकानी येणे आवश्यक
होते. विनयानुसार एकाच ठिकाणी वेगवेगळे उपोसथ कर्म करता येत नव्हते. भिक्खूंच्या विवादाला शांत करण्या करिता सम्राट अशोकाने आपल्या एका मंत्र्याला विहारा मध्ये पाठविले. त्याच्या समजाविल्या नंतर सुद्धा भिक्खुंमधील भांडण शांत झाले नाही. तेव्हा त्याने बळजबरी ने उपोसथ कर्म करविण्याचा प्रयत्न केला. राजभयाने सुद्धा भिक्खु घाबरत नाही हे पाहून क्रोधामध्ये येऊन त्याने अनेक भिक्खूंचे डोके उडवुन टाकलेत. " आणि म्हटले की, 'मी उपोसथ कर्म करविल्या शिवाय राहणार नाही. भिक्खूंचा संहार होतांना पाहून सम्राट अशोकाचे लहान बंधु तिस्स स्थविर त्या हत्या करणाऱ्या समोर जावुन उभे राहिलेत. तेव्हा मंत्री हार मानून परत निघून गेला. आणि संपूर्ण घटने संबधी सम्राट अशोकाला सांगितले. हे सर्व प्रकरण ऐकून सम्राट अशोक फार दुक्खी झालेत. आणि अतिशय घाबरलेत सुद्धा. ते त्वरीतच भिक्खु संघाच्या जवळ गेले आणि विचारले की, 'या वाईट कर्माला कोण दोषी आहे ?' त्यातील जे अज्ञानी होते ते महणाले की, 'हा आपलाच दोश आहे.' दूसरे म्हणाले की, 'आपला दोष नाही'
हे सर्व ऐकून सम्राट अशोकाने विचारले की, 'काय कुणी तरी सामर्थ्यवान भिक्खु नाही काय जो माझ्या शंकाचे समाधान करू शकेल आणि सोबतच धम्माचा संग्रह करून या विवादाला शांत करू शकेल?'
तेव्हा भिक्खु संघाने मोग्गल्लिपुत्त तिस्स स्थविराची आठवण करू दिली. हे ऐकून सम्राट अशोकाला समाधान वाटले आणि त्यांना यात आशेचे किरण दिसून आलेत.
स्थविर मोग्गल्लिपुत्त तिस्स यांना घेऊन येण्या करिता सम्राट अशोकाने त्याच दिवशी चार स्थविरांना आणि चार मंत्र्यांना पाठविले. तेथे जाऊन त्यांनी राजाची इच्छा बोलुन दाखविली आणि पाटलिपुतला घेण्याची प्रार्थना केली. परंतु स्थविर मोग्गल्लिपुत्त तिरस यांनी घेण्यास नकार दिला. दुसन्यांदा सम्राट अशोकाने आठ भिक्खूंच्या सोबत आठ मंत्र्यांना पाठविले तरी सुद्धा महास्थवीर मोग्गलिपुत्ततिस्स पेण्यास तयार झाले नाहीत. तिसन्या वेळी जेव्हा सोळा भिक्खु आणि सोळा मंत्री गेलेत तेव्हा महास्थविर मोग्गल्लिपुत्त तिस्स येण्यास तयार झाले. ते पाण्याच्या मार्गाने नौकेवर स्वार होवुन पाटलिपुत्तला पोहोचले. सम्राट अशोक सुद्धा महास्थविरांच्या आतिश्यासाठी गंगा नदीच्या घाटावर पोहोचलेत. त्यांनी मांडी पर्यंत च्या पाण्यात चालुन महास्थविरांना नौकेवरून उतरण्या करीता आपला उजवा हात पुढे केला."
महास्थविर मोग्गल्लिपुत्त तिस्स रतिवडुन वागेमध्ये थांबले होते. ते विहारामध्ये थांबलेले नव्हते. सम्राट अशोकाने विनम्रतापूर्वक महास्थविरांना विचारले की, 'भन्ने मंत्र्याद्वारे भिक्खुंचे डोके कापण्यात आल्याचा दोष मला लागेल किंवा नाही?' या प्रश्नाच्या उत्तरामध्ये महास्थविराने सम्राटाला तित्तिर जातक ऐकवून समजाविले की, 'जो पर्यंत कर्मा सोबत मन दोषयुक्त होत नाही तोपर्यंत कर्म दोषयुक्त होत नाही. ""
तीसरी धम्म संगिती आयोजित
या नंतर एक आठवडा संपल्यानंतर महास्थविर मोग्गल्लिपुत्त तिस्स यांच्या सोवत विचार विनिमय करून सम्राट अशोकाने अशोकारामामध्ये एका विशाल परिषदेचे आयोजन केले. तेथे एका विशिष्ट स्थळी मोग्गलिनपुत्त तिस्स महास्थविरा सोवत सम्राट अशोकाने एका एका भिक्सर्चुला एकानंतर एकाला बोलाविणे आणि त्यांना एक प्रश्न विचारला की 'भन्ने, भगवान बुद्धाची विचार धारा काय होती?'
भिक्खूंनी आप आपल्या तांनुसार शाश्वतवाद इत्यादि विवारांना सांगून उत्तर दिले, तेव्हा सम्राट अशोकाने अशा सर्व भिक्खूंचे चिवर, प्रवज्जा काढुन घेतली. भिक्खु संघातुन काढण्यात आलेल्या भिक्खूंची संख्या फार कमी नव्हती. ती संख्या जवळ जवळ साठ हजारा पर्यंत पोहोचलेली होती. ते सर्व भिक्खु पाटलीपुत्त वरून नालंदाला गेले आणि तेथे एकत्र झाले. तेव्हा पासून सर्वास्तवादीचे नालंदा हे एक प्रमुख केन्द्र वनले. त्या भिक्खूंनी नालंदामध्ये आपली वेगळी धम्मपरिशद आयोजित केली. ते सर्वासतीवादी बौद्धभिक्खु नालंदा वरून दक्षिण भारता मध्ये गेलेत. आणि तिथुन काश्मीर मध्ये गेलेत व इतरत्र पसरलेत. ते अशा तन्हेने क्रमाक्रमाने मध्य आशिया व चीन मध्ये गेलेत." सर्वास्तिवादयांची एक शाखा इथूनच मथुरेला पोहोचली होती...
पुढील भागात
मुक्तीदाता विशेषांक
प्रियदर्शि सम्राट अशोक (जयंती विशेष)
भाग 12
सम्राट अशोकाने हाच प्रश्न धम्मवादी भिक्खूंना विचारले की, "तथागत बुद्धाची विचारधारा काय होती?' त्यांनी उत्तर दिले की, भगवान तथागत विभज्जवादी होते. तेव्हा सम्राट अशोकाने या उत्तराच्या निर्णया करीता मोग्गलिलपुत्त तिसर महास्थविराला विचारले की, 'भते, भगवान बुद्ध विभज्जवादी होते काय?' तेव्हा महास्थविराने स्वीकार केले. सम्राट अशोकाने भिक्खु संघाला युद्ध व दोषयुक्त मानून ते नगरामध्ये गेलेत. त्यानंतर भिक्खु संघाने उपोसथाचा पाठ केला.
महास्थविर मोग्गल्लिनपुत्त तिस्स ने भिक्खु संघामधील एक हजार विद्वान, ज्ञानी तिपिटकाचे जाणकार परिसम्मिदा " प्राप्त भिक्खूंना सद्धम्माच्या संग्रह करण्या करिता निवडलेत आणि त्यांच्या सोवत अशोकारामा मध्येच सद्धम्माचे संगायन करण्यात आलेत. ज्याप्रमाणे पहिली संगिती" महाकस्सपाच्या प्रमुख नेतृत्वामध्ये आयोजित करण्यात आली होती. दुसरी संगिती" यश महास्थविराच्या प्रमुख नेतृत्वामध्ये करण्यात आली होती वैशाली मध्ये. त्याचप्रमाणे महास्थविर मोग्गल्लिपुत्त तिस्स यांच्या प्रमुखत्वामध्ये या तिसऱ्या संगितीचे आयोजन पाटलीपुत्तमध्ये करण्यात आले होते. महास्थविर मोग्गलिनपुत्त तिस्सने या धम्म संगिती मध्ये दुसऱ्यामतांचे खंडन करण्याकरीता कथावत्धु प्रकरण गंधाची रचना केलेली होती. ही तिसरी धम्म संगिती सम्राट अशोकाच्या राज्याभिषेकाच्या सतराव्या वर्षी महापवारणेच्या दिवशी समाप्त झालेली होती. हीच संगिती सम्राट अशोकाच्या अनुग्रहामुळे एक हजार भिक्खूंनी नऊ महिन्यामध्ये पूर्ण केलेली होती. त्योवळी महास्थविर मोग्गल्लिपुत्ततिस्स यांचे
वय 72 वर्षाचे होते."
धम्मप्रचाराकरीता धम्मदूतांची नियुक्ती
या तिसऱ्या संगितीच्या संगायनाच्या समाप्ती नंतर मोग्गल्लिपुत्त तिस्स महास्थविराने सम्राट अशोकाच्या सहकार्याने शेजारच्या प्रदेशामध्ये देशामध्ये बौद्धधम्माचा प्रचाराकरिता धम्मदूत नियुक्त करवुन पाठविलेले होते.
1 मज्डान्तिक (माध्यमिक) स्थविर काश्मीर आणि गांधार 100 मध्ये.
2 महादेव स्थविर महिसमण्डल 101 मध्ये
3 रक्षित स्थविर वनवास मध्ये 102
4 यवन धम्मरक्खित स्थविर अपरांत मध्ये 193
5 महाधम्मरक्षित स्थविर महाराष्ट्रामध्ये
6 महारक्षित स्थविर यवन देशामध्ये 104
7 मज्झिम स्थविर हिमवंत (हिमालय प्रदेश
8 सोण आणि उत्तर स्थविर स्वर्ण भूमि 105
9 महामहिंद, इट्ठीय, उत्तीय, सम्बल सिंहल मध्ये
तथा भहसाल या व्यतिरिक्त सम्राट अशोकाच्या शिलालेखा वरून आढळून येते की, आणखी अनेक देशामध्ये धम्मदूत पाठविण्यात आले होते. चंद्रगुप्त मौर्य आणि राजा बिन्दुसार यांचा पाश्चिमात्य देशांशी संबध होता. राजा चंद्रगुप्ताच्या राजसभेमध्ये मैगस्थाइन हा राजदूत म्हणून आलेला होता. या संबंधाना घट्ट करण्याकरिता सम्राट अशोकाने पाश्चिमात्य देशा मध्ये धम्मदूत पाठविले होते. त्या धम्म प्रचारकांचे नाव अज्ञात असतांना सुद्धा त्यांच्या जाण्याच्या स्थळांची माहिती आढळुन येते. एक शिलालेख आहे की, ग्रीक राजा 800 योजनाच्या अंतरावर होता, त्याचे नाव एंटीयोक सांगितल्या गेलेले आहे. इतर चार राजाचेही नाव उल्लेखनिय आहेत. जेथे सम्राट अशोकाने आपले प्रचारक पाठविले होते. ते म्हणजे तूरमय, एंटीकोन, मगए आणि एलिक सुंदर, अशाच प्रकारे दक्षिणेमध्ये पांडे आणि ताम्रपर्णि देशामध्ये धम्मदूत पाठविण्यात आले होते. कम्बोज, नाभक, नाथ पंक्तिक, भोज, पितीनियक, आन्ध्र आणि पुलिंद देशा मध्ये सुद्धा धम्मप्रचारक पाठविण्याचा उल्लेख आढळून येतो.
पाटलीपुत्ताच्या ईतर विहारांसोबतच अशोकाराम विहार सुद्धा बनविण्यात आले. या प्रसंगी फार मोठ्या उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. सम्राट चण्डअशोक हे धम्मशोक या नावाने प्रसिद्ध झालेत. प्रसन्न चित्त सम्राट अशोकाने महास्थविर मोग्गल्लिपुत्त तिस्स यांना विनम्रता पूर्वक विचारले की, 'हे भन्ते, बुद्धधम्मा मध्ये कोणत्या वस्तूचा त्याग महान त्याग मानला जातो?' मोग्गल्लिपुत्ततिस्स महास्थविर म्हणाले की, 'हे राजा, भगवान बुद्धाच्या जीवनकाळामध्ये सुद्धा आपल्या सारखा त्यागी कुणी ही नव्हता."
सम्राट अशोकाने पुन्हा विचारले की, 'हे भन्ते!
माझ्या सारखा व्यक्ती धम्माचा दायाद (दायाक) म्हणता येईल काय ?'
हे राजा ! आपल्या सारखा व्यक्ती सुद्धा धम्माचा दायाद म्हणता येणार नाही. जो आपल्या मुलाला, मुलीला धम्मा मध्ये प्रव्रज्जित करवितो तोच धम्माचा दायाद आणि दायक दोन्ही मानला जातो. धम्माचा दायाद होण्याच्या इच्छेने सम्राट अशोका शेजारी उभे असलेल्या महिन्द आणि संघमित्ताला विचारले की, 'तात ! तुम्ही संघामध्ये प्रव्रज्जा स्विकार करणार काय ? प्रव्रज्जा महान आहे'.
वडीलांचे हे म्हणणे ऐकून त्या दोन्ही मुलांनी म्हटले की, "हे राजा ! जर आपली परवानगी असेल तर आजच आम्ही प्रव्रज्जीत होण्यास तयार आहोत. आमच्या प्रव्रज्जेने ने आम्हाला आणि आपल्याला पुण्याचा लाभ होईल"....
पुढील भागात
मुक्तीदाता विशेषांक
प्रियदर्शि सम्राट अशोक (जयंती विशेष)
भाग 13
उपराजा तिस्स यांच्या प्रव्रज्जेच्या दिवसा पासून महिन्द आणि अग्नीब्रह्मा "" बांच्या प्रव्रज्जेच्या वेळी पासून संघमित्ता प्रवज्जित होण्याचा निश्चय करून चुकलेली होती. काहीच दिवसा मध्ये महिन्द उपराजा होणार होते. परंतु सम्राट अशोकाने उपराजा पदापेक्षा प्रव्रज्जेला महान समजले. सप्ताट अशोकाने आपला प्रिय मुलगा महिन्द आणि मुलगी संघमित्रा यांना फार मोठ्या उत्सवासह प्रवजित करतील, त्यावेळी महिन्द कुमारांचे वय 20 वर्षाचे होते. आणि राज कुमारी संघमित्ताचे वय 18 वर्षाचे होते. महिन्द्र कुमाराचे उपाध्याय मोग्गल्लिपुत्त तिस्स आणि आचार्य महादेव स्थविर झालेत. राजकुमारी संघमित्ता यांचे उपाध्याय प्रसिद्ध थेरी धम्मपाला व आचार्य आयुपाला होती. हया दोघांची प्रव्रज्जा सम्म्राट अशोकाच्या राज्याभिषेकाच्या सहाव्यावर्षी झाली होती.
भिक्खू महामहिन्द आणि संघमित्ताचे सिरिलंका गमन
तिसरी धम्म संगिती संपन्न झाल्या नंतर भिक्खु महामहिन्द आपल्या सहकारी भिक्खूंच्या सोबत बौद्धधम्माच्या प्रचारा करिता सिंहल देशा मध्ये गेले. त्यावेळी तेथील रजा देवानामप्रिय तिस्स सम्राट अशोकाचे मित्र होते, सम्राट अशोकाने सिंहल देशाचा राजा तिस्स यांना अभिषेकाच्या वस्तु पाठविलेल्या होत्या. पाच भेटीच्या स्मरणामध्ये त्याने आपल्या नावा सोबत 'देवानामपिय' जोडले होते. वडील सम्राट अशोकाची ही पूर्व मैत्री भिक्खु महामहिन्द यांच्या धम्मप्रचार कार्यामध्ये सहाय्यक ठरली. भिक्खु महामहिन्द नंतर भिक्खुनी संघमित्ता सुद्धा बोधगयेच्या बोधिवृक्षाची एक शाखा सोबत घेऊन सिंहल देशामध्ये घेऊन गेल्या. त्यांनी सिंहल देशामध्ये भिक्खुनी संघाची स्थापना केली. आज सुद्धा सिंहल देशामधील अनुराधपूरमधील भिक्खुनी संघमित्ताद्वारा रोपण्यात आलेला बोधिवृक्ष विद्यमान आहे. आज सुद्धा सिंहल देशामध्ये स्थविर महिन्द हे अनुबुदु (दुसरे बुद्ध) या नावाने ओळखले जातात.
सम्राट अशोकाच्या इतर महत्वपूर्ण कार्यामध्ये त्यांच्या शिलालेखांचे, स्तंभलेखांचे आपले विशेष महत्वाचे स्थान आहे. सम्राट अशोकाचे या शिलालेखामधुन व स्तंभ लेखामधुन आम्हाला भारतीय इतिहासा बद्दल बरिच वास्तववादी व ऐतिहासिक माहिती प्राप्त होते. हे शिलोलख, स्तंभलेख व त्यांचे इतर ही लेख प्रामुख्याने धम्मलिपी मध्ये आहेत. धम्मलिपी मध्ये लिहिल्या गेले आहेत. जिला काही लोक ब्राह्मी लिपी सुद्धा म्हणतात. ही लिपी भारतीय व सिंहल वर्ण मालेचे मूळ स्वरूप मानले जाते. सन् 1838 मध्ये पहिलांदा एका इंग्रज विद्वानाने काही धम्म शिलालेखांना वाचले होते." या कार्या करिता त्यांना भारत ग्रीक शासकांचे शिक्के जे ग्रीक आणि कब्राह्मी अक्षरामध्ये होते. फार उपयोगी पडलेत. यानंतर वेगवेगळ्या देशातील पुरातत्व विद्वानांनी सम्राट अशोकाच्या या लेखांना वाचण्याचा प्रयल केला. या विद्वानामध्ये प्रामुख्याने युरोप, अमेरिका व भारतीय विद्वान सुद्धा होते. या कार्यामध्ये भारतीय पुरातत्व विभागाचे जनक सर एलेक्सड़झांडर कनिंघम आणि एमिल सेनरत (फ्रेंच विद्वान) यांचे विशेष उल्लेखिन योगदान आहे. प्राचीन भारतीय इतिहास अध्ययन कर्त्यांनी सम्राट अशोकाच्या हया शिलालेखांना, स्तंभ लेखांना आठ भागामध्ये विभागलेले आहे.
1. लघु शिलालेख.
2. भानु शिलालेख.
3. चतुर्दश शिलालेख.
4. कलिंग लेख.
5. गुहाभिलेख.
6. तराई स्तंभ लेख.
7. प्रमुख लेख
8. गौण स्तंभ लेख.
1) लघु शिलालेख 12 मानल्या गेलेले आहे. क) सिद्धपूर (मैसूर), ख) ब्रम्हगिरि (मैसूर), ग) जतिंग रामेश्वर (मैसूर), घ) मास्की (रायचूर जिल्हा, मध्यप्रदेश) च) रूपनाथ (जबलपूर म.प्र) छ) वैराट (जयपूर, राजस्थान), ज) सासराम (इलाहाबाद), छ) गुर्जर दतिया, ८) राजुल (मंदगिरी), ठ) वेरगुडी (कर्नूल), ड) गवोमठ (रायचूर) आणि ड) पाल्को गुण्डु (रायचूर) इत्यादि, 2) भाबूशिलालेख वैराट (जयपूर) मध्ये प्राप्त झालेले आहे.
3) चौदावा शिलालेख हाच प्रमुख शिलालेख मानला जातो, जो ई.पू. 256 मध्ये लिहिल्या गेलेला होता. यात चौदा आज्ञा असल्यामुळे हा चौदावा शिलालेख मानला जातो. हे शिलालेख खालील ठिकाणी प्राप्त झालेले आहेत. अ) कालसी (देहरादून जवळ), आ) गिरनार (जूनागढ़, काठीयावाडा) ? इ) सहवाज गढी (पेशावर च्या युफज तालुक्या मध्ये), ई) मानसेरा (ऐबटाबाद हजारा) उ) बेर्रगुडी (कर्नुल, मद्रास), ऊ) सोपारा (मुंबई, जि. ठाणे), ए) धवली (ओरिसा) आणि ऐ) जौगड (गंजाम, ओरिसा).
4) कलिंग लेख सुद्धा दोन आहेत, जर्जी धौलीच्या मुख्य लेख असलेल्या दगडावर कोरलेले आहेत. हे लेख ई.पू. 256 चे आहेत...
पुढील भागात
मुक्तीदाता विशेषांक
प्रियदर्शि सम्राट अशोक (जयंती विशेष)
भाग 14
5) गुहाभिलेख तीन आहेत. हे तिन्ही गुष्ठाभिलेख गया जिल्हयाच्या बराबर पहाडाच्या गुफामध्ये कोरलेले आहेत. या गुहाभिलेखांचा काळ ई. पू. 257 ते ई.पु. 250 पर्यंत मानला जातो.
6) पायथा स्तंभलेख दोन प्राप्त झालेले आहेत. हे दोन्ही लेख नेपाळच्या मैदानी भागामध्ये असलेल्या रूम्मिनीदेई (लुम्बीनी) आणि निलिवा गावामध्ये उपलब्ध झालेले आहेत. यांचा काळ ई. पु. 249 मानला जातो.
7) प्रमुख स्तंभ लेख सात आहेत. जे सहा ठिकाणी आढळून येतात. यांचा काळ ई.पू. 243 ते 242 असा मानला जातो. क) अम्बाला शेजारी टोपरा नावाचे स्थळ आणि ख) उत्तर प्रदेशातील मेरठ मध्ये हया दोन्ही स्तंभ लेखांना फिरोजशहा तुगलकाने त्या जागेतून उचलून दिल्लीमध्ये आनले होते, जे आज सुद्धा तेथे आहेत. ग) प्रयाग (अलाहबाद) येथील स्तंभ आधि कोसंबी मध्ये होता. असे मानले जाते की, हा स्तंभ सुद्धा फिरोजशहा तुगलक याने कोसांबी वरून आनले होते. अशाप्रमारे अशोकाने दोन लेख लिहावयास लावले होते. घ) लौरीया अरेराज, छ) लौरीया नंदगड आणि छ) रामपूरवा मध्ये हे तिन्ही स्तंभ व या वरील तिन्ही अभिलेख चम्पारण (बिहार) जिल्ह्यामध्ये आहेत.
8) सामान्य स्तंभाभिलेख एक सांची मध्ये आहे आणि दूसरा सारनाथ मध्ये
आहे. या व्यतिरिक्त रानीचा सुद्धा लेख आहे.
सम्राट अशोकाच्या शिलालेखांच्या भाषेसंबधी सेनरथ नावाचे विद्वान असे मत प्रतिपादन करतो की, 'भाषा अलंकृत व रेखीव नाही. हे लेख अगदी सम्म्राटाच्या शब्दामध्ये लिहिल्या गेले असावेत. कुणी ही त्यांना बरोबर करण्याचे धैर्य दाखविले नसावेत. कदाचित ती राज्यभाषा राहिली नसावी. परंतु संपूर्ण साम्राज्याचे लोक तिला समजत असावेत. त्याकाळी वेगवेगळ्या प्रदेशातील लोक त्याभाषेला समजत असावेत.' हे अशक्य असल्या सारखे वाटते. असे होवु शकते की, ही त्या काळच्या मगध राज्याची भाषा राहिली असावी. पालि भाषेशी तुलना करतांना असे वाटते की, ती तिपिटकाची सुद्धा भाषा राहिली असावी.
आधि म्हटल्या गेलेले आहे की, सम्राट अशोकाने आपल्या शिलालेखांच्या करिता (बाह्मणी) लिपीचा वापर केलेला होता. हीच लिपी वर्तमान भारतीय भाषांच्या वर्णमालेचा जन्म देणारी मानली जाते. तसेच भारताच्या बाहेरील श्रीलंका, तिबेट, प्राचीन मध्ये आशिया म्यान्मार, कम्बोडीया, थायलॅण्ड इन्डोनेशिया आणि फिलिपाईन्स आदी देशातील लिपीना जन्म देणारी मानली जाते. ही धम्मलिपी त्या प्राचीन आर्य अक्षरा पासून निर्माण झालेली मानली जाते. जी काही विद्वानांच्या मतानुसार मोहनजोदाडो आणि पश्चिमोत्तर भारतामध्ये आढळुन आली. परंतु अशाप्रकारचे म्हणणे संयुक्तीक वाटत नाही. यामुळेच धम्मलिपी (ब्राह्मी लिपी) आर्य अक्षरा पासून निर्माण झालेली आहे. असे म्हणणे अयोग्य आहे. असे म्हणता येईल.
अशोकाच्या साम्राज्याच्या उत्तर दिशेला हिमालय पर्वत उभा होता. दक्षिण दिशेला पाण्डे, चोल सतीपुत्त आणि केरल पुत्त सारख्या स्वतंत्र राज्यांच्या सीमा होत्या. तशाच प्रकारे दक्षिणेला तम्बपण्णि राज्य सुद्धा होते. हे सर्व सम्राट अशोकाचे मित्र राष्ट्र होते. "" कलिंग विजयानंतर पूर्वेला बंगालच्या खाडी पर्यंत त्यांचा राज्य विस्तार झालेला होता. आणि पश्चिमेला अरबी महासागरापर्यंत व उत्तर पश्चिम मध्ये एंटीयोक च्या राज्याची सीमा होती. "" या राज्याचा व्यवहार सुद्धा सम्राट अशोकाच्या राज्याशी मैत्री पूर्ण होता. सम्राट अशोकाच्या राज्यामध्ये चार ग्रीक क्षेत्रीय राजे अफगाणिस्थान आणि बलुचीस्थात च्यास्वरूपा मध्ये होते. भौगोलिक विभाजनाच्या दृष्टीने सम्राट अशोकाचे साम्राज्य पाच भागामध्ये विभागलेले होते.
1) प्राच्य ...... पूर्वोत्तर किंवा पूर्व देश, 2) दक्षिण (दक्षिणापथ) देश, 3) पश्चिम (प्रत्रीच्य, अपरांत) देश, 4) उत्तर उर्धव, उदिच्य उत्तरापथ आणि 5) मध्ये (मध्यम, मध्य देश, अंतरर्वेधी) देश.
सम्राट अशोक आपल्या राज्याला एक विस्तारलेला साम्राज्य सांगतात, ज्याची राजधानी पाटली पुत्त होती. ते दुसऱ्या नगरांचाही उल्लेख करतात. ज्यात सम्राटाच्या परिवारातील किंवा त्यांच्या भावांचे कुटुंब रहात होते. किंवा त्यांच्या बहिणीचे किंवा इतर संबंधीतांचे निवासस्थान होते. इतर ही महत्वपूर्ण नगर होते. ज्यात तक्षशिला, कोसंबी, उज्जैनी, तोसली आणि संपा स्वर्णगीरी व रिफील याशिवाय इतर ही नगरांचा उल्लेख आढळुन येतो. उदा. कपिलवत्यु शुब्न, राजपुर, अभिसार, पुषकरावती, गिरीनगर (जैन गिरी नगर) सुपरिक (सोपारा) विराट नगर, विदिशा, आणि गया, सम्राट अशोकाच्या धम्मविजयामुळेच एका महान साम्राज्याचा विस्तार झाला आणि भारत जम्बुदीप म्हणून ओळखला जाऊ लागला. परंपरे नुसार सम्म्राट अशोकाच्या जीवन काळामध्येच जम्बुदीपा मध्ये लहान मोठे 84,000 शहर होते.
पश्चिम आणि मध्य देशामध्ये सम्राट अशोकाचे प्रत्यक्ष राज्य होते. अन्य प्रदेशामध्ये सम्राटा द्वारे नियुक्त प्रतिनिधि राज्याचा कारभार साभाळीत असत. गावाचा प्रमुख ग्रामभृजक किंवा ग्रामभोजक म्हटला जात असे. कौटिल्याच्या अर्थशास्त्रानुसार जो पाच ते दहा गावांचा कार्यभार सांभाळीत असे तो उत्पन्नाचा एक चर्तुथांश भाग स्वताहा आपल्या कडे ठेवीत असे. अशा लोकांचे कार्य होते प्रदेशाला राज्याच्या...
पुढील भागात
मुक्तीदाता विशेषांक
प्रियदर्शि सम्राट अशोक (जयंती विशेष)
भाग 15
नियंत्रणामध्ये ठेवून निश्चित स्थळांची देखरेख करणे. उत्पन्नाचा सहावा भाग राज्याला दिला जात होता, कधी कधी चौथाभाग आणि कधी कधी आठवा भाग सुद्धा. कराचा काही भाग सैन्यावर खर्च केला जात होता. कलाकार राज्यकोषातून पगार प्राप्त करीत असत. तत्वचिंतका मध्ये ज्यात श्रमण, ब्राम्हण होते, ते सुद्धा राज्यकोषावर अवलंबुन होते. उत्पन्नाचा बराचसा भाग शेती सिंचाई, रस्ते, बांधणे आदीवरच खर्च केला जात होता. यामुळेच दवाखाने विहिरी बांधणे व सावली देणारे झाड लावणे यावर राजाच्या संपत्तीचा बराच मोठा भाग खर्च होत होता."
सम्राट अशोकाने आपल्या साम्राज्या मध्ये स्त्रीयांच्या शिक्षणाची सुद्धा व्यवस्था केली होती. ते इतिहासा मधील पहिले सम्राट होते की ज्यांनी आपल्या प्रजेला सुशिक्षित करण्याकरिता पहिल्यादा प्रयल केला होता. त्याच प्रमाणे भगवान बुद्धाच्या शिकवणुकी पासून लोकांना जागृत करण्या करिता त्यांनी संपूर्ण देशामध्ये शिलालेख कोरून ठेवलेत.
आपल्या राज्याभिषेकाच्या तेराव्या वर्षी सम्राट अशोकाने धम्म महामंत्र्याची नियुक्ती केलेली होती. त्यांच्यावर धम्मकार्याच्या प्रचाराची जबाबदारी सोपविण्यात आली होती. या शिवाय ते इतर ही कार्य करित असत (बहुमुखा). तोसाली आणि समापा येथील शिलालेख दोन नगरांचा उल्लेख करता. जे न्याय प्रमुखाच्या नियंत्रणाखाली होते. ते नगर व्यवहारीक किंवा नगर महामात्य सुद्धा म्हटले जात असत. नगराधीकारी अनेक प्रकारचे होते. सम्राट अशोकाचे आजोबा सम्राट होते, त्यांचे वडील सुद्धा सम्राट होते व स्वताहा अशोक सुद्धा एक सम्म्राट होते. परंतु त्यांनी स्वताहाला कधी ही 'सम्राट' महटले नाही. आणि त्यांनी आपल्या शिलालेखामध्ये कुठे ही सम्राट शब्दाचा उल्लेख केलेला नाही. अनेक लहान लहान राज्यांनी आपल्या नावाच्या सोबत मोठमोठाले लांबलचक विशेषण लावलेत. उदा. राजाधिराज इत्यादी.
अशोकाचे संपूर्ण नाव आणि त्यांचे पद त्यांच्या शिलालेखामध्ये आढळून येते. ते एवढेच आहे की, 'राजा देवानाम पिये, पियदस्सी' तर काही काही ठिकाणी संक्षिप्त स्वरूपात राजा पियदस्सी असेच आढळून येते. भास्कीच्या शिलालेखामध्ये 'देवानामप्रिय अशोक' हे नाव आढळून येते. बौद्धसाहित्या मध्ये (पालि साहित्य) मध्ये त्यांना धम्मराज किंवा धम्मासोक म्हटल्या गेलेले आहे. 'देवानामपिये' हे सम्राट अशोकाचे व्यक्तिगत नाव नव्हते. उलट राजकिय पद होते. हे आढळुन येत नाही की हे पद अशोकाच्या आधि सुद्धा कुण्यातरी राजाने स्विकारले असेल. हेच नाव नंतर अशोकाचा नातु बृहदत्त यांनी स्विकारले होते." सम्राट अशोकाने स्वताहाला कधी ही महाराजा म्हटले नाही. त्यांच्या शिलालेखा मध्ये राजा नावाचाच उल्लेख आढळून सम्राट अशोकाचे समकालिन असलेला कात्यायन (ई. पू. 250 ते 200 ई.पू) पाणिनीच्या अष्टांब्याची सुत्रांची व्याख्या करीत असतांना तो 'देवानाम प्रिये' शब्दाचा अर्थ 'शिवी' सारखा करतो. कैचट (बारावे शतक) पातंजली चे महाभाष्यकार याचा अर्थ अतिशय सत्वधानी ने करतो. परंतु हेमचंद्राचा शब्द संग्रह (12 वे शतक) आणि सिद्धांत कौमुदी (10 वे शतक) स्पष्ट पणे देवानामप्रिये या शब्दाचा अर्थ मुर्ख असा करतात. अशा प्रकारचा आदर आणि सन्मान सुचक शब्द अशा तन्हेने निंदा युक्त अर्थाने का वापरल्या गेलेला असावा ? याचे अनेक कारण देता येवू शकतात. सम्राट अशोकाने पशु यहांच्या निशेधाचे विधान केले होते. ज्यामुळे वैदिक ब्राह्मण धर्मा वर फार मोठ्या प्रमाणात प्रहार झाला आणि दुसरी गोष्ट सामाजिक उत्सवांचा निषेध (समाज) त्याचप्रमाणे युद्धाचा त्याग" चे विधान महत्वाकांक्षेत सैनिक वर्गावर आणि राजकारणी लोकावर सुद्धा फार मोठया प्रमाणात प्रहार होता. बौद्धधम्माचा स्विकार करणे आणि बौद्धधम्माचे प्रचार कार्य करणे वैदीक मतावलंबीयांना (अबौद्ध) आणि प्रामुख्याने ब्राह्मणांना पचनी पडणे शक्य नव्हते. कारण ते जन्मानेच वौद्धधम्माचे शत्रु होते. धम्माच्या प्रचाराकरीता सम्राट अशोकाने एका स्वतंत्र विभागाची स्थापना केलेली होती. धम्म यात्रा लोकांना धम्माचा उपदेश देणे. धम्मासंवधी प्रश्नोत्तर करणे करविणे, लोकांना सुशिक्षित करणे आणि त्याकरीता शिलालेख कोरविणे. हे सर्व कार्य त्या काळा करिता नवीन कार्य होते. सम्राट अशोकाचे हे कार्य ब्राह्मण धर्मियांना प्रिय होणे शक्यच नव्हते. सम्राट अशोकाच्या कार्यापैकी अनेक कार्य इतर लोकांना ही एकदम नवीन होते. दवाखाने धम्मदूतांना दूसऱ्या प्रांतामध्ये व देशामध्ये पाठविणे, विशाल स्तुपांचे निर्माण करणे, विहार बांधणे, गुफांचे निर्माण करणे, शिलास्तंभरोवणे ज्यावर वेगवेगळ्या प्राण्यांच्या करीता चिन्ह कोरलेले असत. ज्यांच्या निर्माती करिता हजारोच्या संख्येने कलाकार, शिल्पकार बोलविले जात असत, लोकांच्या करिता हे कार्य अतिशय आश्चर्य कारक होते.
सम्राट अशोकाचे हे कर्तृत्व त्या काळी जेवढे आश्चर्य कारक होते, तेवढेच आज सुद्धा आहे. उलट त्याही पेक्षा अधिक आहे. परंतु दोन्ही काळातील अभिप्राय वेगवेगळे आहेत. आजच्या विद्वानांच्या करिता अशोक एक महान दूरदर्शी राजा, महान विजेता राजा, महान राजकारणी राजा आणि सर्व सामान्य लोकांचे मन जिंकणारा महान सम्राट आहे. युरोपीयन लेखक एच. जी. वेल्स असे लिहीतो की "जर महान अशोका जवळ एरिस्टॉटल असता तर यात मुळीच शंका नाही की त्याने फार मोठया प्रमाणावर एक वैज्ञानिक संस्था निर्माण केली असती."
स्वताहा सम्राट अशोकाचे म्हणणे होते की, "मी जेवण करतांना असो किंवा राजमहाला मध्ये असो किंवा शयना गारा मध्ये असो प्रतिवेदन लोकांनी मला प्रेजेच्या कार्याकरीता नेहमीच सुचना द्यावी. मी मौखीक आज्ञा दिली किंवा मंत्र्यांना, अधिकाऱ्याचा भार सोपविला त्यासंबंधी विवाद किंवा नकार असल्यास मला सुचना देण्यात यावी, किती ही कामात व्यस्त असलो, कामात गुंतुन राहिलो तरी मला समाधान होत नाही. सर्व प्राण्यांचे कल्याण करणे हेच मी आपले कर्तव्य मानतो आहे आणि त्याचे मुळ उद्योग, प्रयत्न आणि कार्य तत्परता आहे. लोकांच्या करीता काम करण्याव्यतिरिक्त माझे स्वताहाचे कोणते ही काम नाही. मी जे काही करतो ते या करीता की, मी जीव प्राण्यांच्या कर्जातून कर्ज मुक्त व्हावे."
सम्राट अशोकाने ई.पू. 270 किंवा 261 पासून तर ई. पू. 234 किंवा 233 पर्वत राज्य केले. बौद्ध परंपरे नुसार अशोकाच्या जीवनामध्ये दोन महत्वपूर्ण प्रसंग होते. 1) राज्याभिषेक व 2) दूसरा बौद्धधम्माचा स्विकार करणे. ज्यामुळे सम्राट अशोक अतिशय प्रभावित होते. सम्राट अशोक पहिल्या घटनेने तेवढे प्रभावित झाले जेवढे दुसऱ्या घटनेने प्रभावित झाले होते.
(लघु शिलालेख)
मुक्तीदाता विशेषांक
संदर्भ
1. H. G Wells, outline of History.
2. Romesh Chunder Dutt. History of Civilisation in Ancient Indian, Vol. III.
3. R. K. Mookerji, Chandrag Pta Maurya and His Times p.14
4.पंचमो परिच्छेदो, गाथा 16
5. Thapur, Ashoka and the Decline of the Mourya, P. 20
6.अशोकावदान, दिव्यावदान तथा रंसत्यपकासिनी
7.वसत्थपकासिनीः
8. वसत्थपकासिनीः
9.दिव्यावदानः
10. Ashoka and His Inscriptions, P. 36
11. Mrs. Rhys David's Psalms of the Early Buddhists P. 133.
12. Ashoka and His Inscriptions.
13. अवन्तिरद्धं मूंजतो पितरा दिन्नमत्तनो ।
सो अशोककुमारो हि उज्जेनी गमना पुरा। महावंसो, 13/8
14. महावंश (हिन्दी, भदंत आनन्द कौसल्यायन पृ. 64)
प्रियदर्शी अशोक
15. रंसत्थपकासिनी पू. 3241
16. भेलसा के समीप के पर्वत ।
17. Ashoka and His Inscriptions
18. दिव्यावदान ।
19. दिव्यावदा तथा महावंश (हिन्दी) भदन्त आनन्द कौसल्यायन, पृ. 211
20. डॉ. वासुदेव उपाध्याय आयु के कम होने के मत को ही बार-बार दोहराते हैं, जो महाभारत से एकदम मेल नहीं खाता ।
21. महावंश (हिन्दी), भदन्त आनन्द कौसल्यायन पू. 22।
22. हवलदार त्रिपाठी, बौद्ध धर्म और विहार, पृ. 167 ।
23. वे सब लक्षण, जिनसे भविष्य में अर्हत् होना निश्चित हो ।
24. महावंश (रिन्दी), भदन्त आनन्द कौसल्यायन, पृ. 23 ।
25. देवानां पियषा वचनेना सवत महामता, वतविया (:) ए हेता दुतियाये देवीये
26. Ashoka and His Inscriptions, P. 53.
27. महावंश तथा दिव्यावदान ।
28. दिव्यावदान, पू. 407
29. Thomas Watter, Op. Yuan-Chawang's Travels in India.
30. दिव्यावदान पृ. 406
31. Mookerju, Ashoka P. 8
32. दिव्यावदान धर्मेण राज्य मम कृर्वतो हि जातः सुतो धर्मरिवदर्धणोवस्तु ।
33. Fleet, Gupta Inscriptions, P. 225, E.I. Vol. VIII, P. 103.
34. In the Samyutta, II, P. 19 the primitive dwellers of mt are reightly called Tivaras.
35. और सायद पहला भी।
36. H. L. Eggermont.