Sunday, 20 April 2025

काषाय वस्त्राचा अधिकारी कोण?

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

*_काषाय वस्त्राचा अधिकारी कोण?_*

*_देवदत्तची कथा_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2025/04/blog-post_20.html

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

_एके समयी अग्रश्रावक सारिपुत्त आणि महामोग्गगलान आपल्या भिक्षु संघासोबत राजगृहामध्ये चारिकेकरिता निघाले. राजगृहवासी त्यांना दोन, तीन किंवा मोठ्या समूहाने दान देऊ लागले. तेव्हा भन्ते सारिपुत्तांनी त्यांना दानाची महिमा समजावताना सांगितले की,_ 

*_१) एखादी व्यक्ति अगर स्वतः दान तर करते, परंतु दुसऱ्यांना दान करण्यासाठी प्रेरित करीत नाहीः तर ती व्यक्ति पुढल्या जन्मी स्वतः तर सुख ऐश्वर्य प्राप्त करते परंतु परिवार किंवा संपत्ती प्राप्त करू शकत नाही._*

*_२) एखादी व्यक्ति स्वतः तर दान करीत नाही परंतु दुसऱ्यांना मात्र दान देण्यासाठी प्रेरित करते. ती व्यक्ति पुढल्या जन्मी परिवार-संपत्ती प्राप्त करते, परंतु स्वतः कोणते सुख-ऐश्वर्य प्राप्त करू शकत नाही._*

*_३) जो व्यक्ति स्वतः सुद्धा दान देत नाही किंवा दुसऱ्यांना दानासाठी प्रेरित करीत नाही, असा मनुष्य पुढल्या जन्मी कोणते परिवार-संपत्तीचे सुख भोगू शकत नाही किंवा स्वतः कोणते सुख-ऐश्वर्य भोगू शकत नाही. त्याला भोजनसुद्धा प्राप्त करणे महाकठीण होऊन जाते._*

*_४) याच्या ऐवजी चौथ्या प्रकारचा माणूस तो असतो, की जो स्वतः देखील दान देतो आणि दुसऱ्यांनासुद्धा दान देण्यासाठी प्रेरित करतो. असा माणूस पुढल्या जन्मी स्वतः शेकडो, हजारो पटीने सुख-ऐश्वर्य प्राप्त करतो आणि त्याचबरोबर तेवढ्याच प्रमाणात परिवार-संपत्ती सुद्धा मिळवतो आणि या सुखोपभोगांचा सदुपयोग सुद्धा करतो._*

_दानाची महिमा ऐकून एक समजदार माणसाने विचार केला, 'दानाची महिमा मोठी अपरंपार आहे. भिक्षु संघाला भोजनासाठी का बरे बोलावू नये?' असा विचार करून त्याने भिक्षु संघाला आपल्या निवासस्थानी दुसऱ्याच दिवशी भोजनाकरिता निमंत्रित केले आणि घरोघर फिरून लोकांकडून दान घेतले, जेणे करून भोजनाचा प्रबंध चांगल्या प्रकारे होऊ शकेल. एका श्रीमंत व्यक्तिने त्या उपासकाला एक अत्यंत मौल्यवान वस्त्र देत सांगितले,_

_'जर का भोजनदानाचे आयोजन करण्यात पैशांची कमतरता पडली, तर हे मौल्यवान वस्त्र विकून त्या पैशाने उरलेली उणीव पुरी कर. जर उणीव भासली नाही, तर हे वस्त्र एखाद्या भिक्षुला दान दे._

_भोजनदानाच्या कार्यक्रमाचे आयोजन यशस्वी झाले. कोणत्याही वस्तुची उणीव भासली नाही. तेव्हा त्या उपासकाने इतर दानदात्यांना सांगितले की, दान कर्म पैशाच्या उणीवेशिवाय पूर्ण झाले. हे वस्त्र कोणाला द्यावे?" तेव्हा कोणी तरी सुचविले की, 'स्थविर सारिपुत्त हेच यासाठी योग्य आहेत. परंतु दुसऱ्या कोणीतरी म्हटले, 'भिक्षु देवदत्त शेती तयार झाल्यापासून आपल्या बरोबर राहत आहे, म्हणून हे वस्त्र त्यांनाच द्यावे. बऱ्याच विचाराअंती बहुमत भिक्षु देवदत्तच्या बाजूने झाले. म्हणून ते वस्त्र भिक्षु देवदत्ताला देण्यात आले. देवदत्ताजवळ काषाय वस्त्राची कमी नव्हती. परंतु *भिक्षु संघाचा असा विनय होता की, जर कोणाला अशा प्रकारचे दान मिळाले आणि त्याच्याजवळ पूर्वीपासूनच काषाय वस्त्र असेल, तर ते वस्त्र भिक्खु संघाला दान द्यावे लागत असे. तथा ज्या भिक्षुला वस्त्राची गरज असेल, त्यालाच ते वस्त्र दिले जात असे. परंतु देवदत्ताने ते वस्त्र भिक्षु संघाला दिले नाही. त्याऐवजी त्याने ते वस्त्र आपल्या योग्य होईल असे कापून, शिऊन आणि त्याला रंगवून स्वतःच परिधान करू लागला.*_

_या प्रसंगाला अनुसरून श्रावस्तीच्या जेतवनात पुढील गाथा तथागतांनी म्हटली आहे._

_*'अनिक्कसावो कासावं, यो वत्थं परिदहेस्सति ।*_

_*अपेतो दमसच्चेन, न सो कासावमर्हित ।।९।।*_

*_(अर्थात ज्याने आपल्या मनाला स्वच्छ केले नाही व काषाय वस्त्र धारण करतो, असा सत्यापासून दूर, संयमहीन व्यक्ति काषाय वस्त्र धारण करण्यास पात्र नसतो.)_*

*_देवदत्त, तुझ्यावर हे काषाय वस्त्र शोभत नाही_*

_सर्व जनतेने देवदत्ताने ते वस्त्र परिधान केलेले पाहिले. ते आपल्या स्वतःला आवरू शकले नाही आणि आपसात चर्चा करू लागले, हे वस्र देवदत्ताच्या अंगावर शोभून दिसत नाही. या वस्त्राचे खरे हक्कदार तर भन्ते सारिपुत्त वाटतात."_

_तथागत त्या दिवसात श्रावस्तीमध्ये चारिका करीत होते. काहीं वेळेनंतर एक भिक्षु राजगृहाहून श्रावस्तीला पोहोचले व शाक्यमुनिंच्या समोर येऊन सादर प्रणाम करून एका बाजूला बसले. शास्त्यांनी त्यांची विचारपूस केली. तेव्हा बातचीत करता करता त्यांनी राजगृहात घडलेली घटना सांगितली की, कशा प्रकारे देवदत्त नवीन काषाय वस्त्र घालून फिरत होता. तसेच लोकांमध्ये याबद्दल प्रक्षोभ होता. ही गोष्ट ऐकून शाक्यमुनिंनी म्हटले, 'भिक्षुनो! अशी घटना पहिल्यांदाच घडलेली नाही की, योग्यायोग्याता नसताना सुद्धा देवदत्तने असे मौल्यवान वस्त्र परिधान केले आहे. पूर्वजन्मात सुद्धा त्याने असे केले आहे. असे म्हणून शाक्यमुनिंनी भूतकाळात घडलेली गोष्ट ऐकवली._

_पूर्वी एके काळी जेव्हा वाराणसीमध्ये राजा ब्रह्मदत्त राज्य करीत होता, तेव्हा एका हत्तीची हत्या करणारा हत्तीला मारून त्याचे दांत, नखे, आतडे, मांस इत्यादी विकून आपले जीवन जगत होता. त्या दिवसांत प्रत्येक बुद्ध अरण्यात साधना करीत होते. अरण्यात फिरताना हत्ती जेव्हा कधी प्रत्येक बुद्धांना पाहत असत त्या वेळी त्यांना वाकून प्रणाम करून पुढे जात होते. एके दिवशी हत्तीची शिकार करणाऱ्याने हे पाहिले तेव्हा विचार केला की, 'या हत्तींना मारणे फारच सोपे आहे. जर मला सुद्धा काषाय वस्त्र मिळाले, तर ते घालून या हत्तींना सहज मारू शकेन.' असा विचार करून तो काषाय वस्त्राचा शोध घेऊ लागला. एके दिवशी त्याने एका भिक्षुला चिवर उतरून तलावात अंघोळ करताना पाहिले. त्याने भिक्षुचे वस्त्र चोरले व ते घालून बसू लागला. हत्ती जेव्हा त्याला प्रणाम करून पुढे जात, तेव्हा तो शेवटच्या हत्तीला भाला मारून त्याची हत्या करीत असे. त्याचे दात इत्यादी काढून विकून उरले-सुरले अंश जमीनीत गाडून टाकीत होता._

_पुढे जाऊन एक बोधिसत्व हत्तींचे राजा बनले. तो बोधिसत्व हत्तीसुद्धा आपल्या पुर्वजांच्या सवयी नुसार हत्तीची शिकार करणाऱ्याला प्रणाम करून पुढे जात असे. एके दिवशी हत्तीराजाने आपल्या सोबत्यांकडे विचार विमर्श केला की, 'आपली संख्या दरदिवशी कमी-कमी होत आहे. जर कोणी साथी येथून कुठे जात असेल, तर सांगितल्याशिवाय जात नाही. तेव्हा शक्यता आहे की, कोणी तरी आमच्याशी शत्रुत्वपूर्ण व्यवहार करीत आहे. मला त्या काषायवस्त्र धारण करणाऱ्यावर संशय येत आहे.' तेव्हा एक दिवस सर्व हत्तींच्याजवळ चर्चा करून गजराजाने सर्व हत्तींच्या कळपाला पुढे पाठवून स्वतः सर्वांत शेवटी जाऊ लागला._

_रोजच्या प्रमाणे त्या शिकाऱ्याने हत्तीच्या कळपातील हत्तींनी प्रणाम करून गेल्यानंतर राजा ने हत्तीवर भाला फेकून मारला. परंतु हत्तीराज सावध होता, म्हणून तो एका बाजूला वळला व भाल्याच्या वारापासून वाचला. त्याने त्या हत्तीच्या हल्लेखोराला पकडले आणि त्याला विचारले की, काय त्याने हत्तींची हत्या केली होती का? तेव्हा हल्लेखोराने आपला अपराध स्वीकार केला. तेव्हा हत्तींच्या राजाने असा विचार केला की, 'जर मी याची हत्या केली, तर हजारो बुद्ध, प्रत्येक बुद्ध आणि क्षीणास्त्रव भिक्षुना हे समजल्यावर हा विचार करतील की, काय? वस्त्रधारी सुद्धा जीव-हत्या करतात.' असा विचार करून हत्तीराजाने त्या हल्लेखोराचे प्राण घेतले नाही आणि त्याला म्हणाला, 'या चराचरामध्ये विरक्त भिक्षुंचे वस्त्र धारण करून तू हत्या करून फार मोठे पाप केले आहेस. तू त्या काषाय वस्त्राचा उत्तराधिकारी नव्हतास. उलट *जो व्यक्ति आतून निर्मळ व पवित्र असतो, तोच काषाय वस्त्राचा उत्तराधिकारी असतो.'*_

_शाक्यमुनिंनी ही कथा सांगताना म्हटले की, 'त्या जन्मात हत्तींची हत्या करणारा देवदत्त होता आणि हत्तींचा राजा मी होतो. अशा प्रकारे उत्तराधिकारी नसतानाही देवदत्तने भूतकाळात काषाय वस्त्र धारण केले होते." असे म्हणून शास्त्याने पुढील दोन गाथा ऐकवल्या._

*_यो च वन्तकसावस्स, सीलेसु सुसमाहितो ।_*

*_उपेतो दमसच्चेन, स वे कासावमर्हित ।।१०।।_*

*_(अर्थात ज्याने आपल्या मनाला स्वच्छ केले आहे आणि त्याच वेळेस काषाय वस्त्र धारण केले आहे, असाच सत्य आणि संयमी माणूस काषाय वस्त्राचा उत्तराधिकारी असतो.)_*

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

*_हृषीकेश शरण यांच्या 'धम्मपद गाथा आणि कथा' यमक वग्ग या ग्रंथातून साभार_*

*_शब्दांकन : बुद्धघोष एस. के. खैरे मो.९८६७८३६५४८_*

*_प्रबुद्ध समाज मासिक मार्च व एप्रिल २०२५_*

*_संकलन : महेश कांबळे_*

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

No comments:

Post a Comment

कोलित सुत्त

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_कोलित सुत्त_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_41.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼  _'कोलित सुत...