🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_स्त्री आणि प्रतिक्रांती_*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_ज्या प्रमाणात मनू शूद्रांबद्दल नीच विचारधारणा प्रस्तुत करतो. तीच नीच विचारधारणा स्त्रीवर्गाबद्दलसुद्धा प्रस्तुत करतो. स्त्रीवर्गाबद्दल हीन विचार ठेवताना मनू म्हणतो :*_
_*२.२१३ पुरुषांना मोहित करणे हा स्त्रियांचा मूळस्वभाव आहे आणि म्हणून बुद्धिमान माणसे स्त्रियांच्या सहवासात राहू शकत नाही.*_
*_२.२१४ कारण या जगात स्त्रिया केवळ मूर्खानाच वाईट मार्गाला लावत नाही तर विद्वान माणसालाही वासनेचा आणि क्रोधाचा गुलाम बनवितात._*
_२. २१५ पुरुषाने आई, बहीण किंवा मुलगी यांच्याबरोबर एकांतात बसू नये. कारण इंद्रिये ही शक्तिमान असतात आणि ती विद्वान माणसांनाही आपल्या प्रभुत्वाखाली आणतात._
_*९.१४ स्त्रियांना सौंदर्याची पर्वा नसते किंवा त्यांचे वयाकडेही लक्ष नसते. तो पुरुष असला म्हणजे त्यांना पुरेसे आहे. त्या स्वतःला सुंदर माणसांच्या आणि कुरूप माणसांच्या हवाली करतात.*_
_*९.१५ स्त्रिया पुरुषांच्या आसक्तीमुळे, त्यांच्या चंचल स्वभावामुळे आणि नैसर्गिक हृदयशून्यतेमुळे त्यांचे कितीही काळजीपूर्वक संरक्षण केले तरी त्या आपल्या पतीशी बेइमान होतात.*_
_९.१६ स्त्रियांना निर्माण करताना ईश्वराने त्यांची ही जी प्रवृत्ती बनविली आहे. ती लक्षात घेऊन प्रत्येक माणसाने अगदी कडकपणे त्यांच्यावर पहारा ठेवला पाहिजे._
_*९. १७ स्त्रियांना निर्माण करताना ईश्वराने त्यांना शयनाची आसक्ती, आसनाची आसक्ती, दागिन्याची आसक्ती, अशुद्ध इच्छा, राग, अप्रामाणिकपणा, मत्सर आणि गैरवर्तवणूक हे गुण बहाल केले आहेत.*_
_*स्त्रियांबाबत मनूने केलेले कायदे हे अपरिवर्तनीय आहेत. मनूच्या मतानुसार स्त्रियांना कुठल्याही परिस्थितीत स्वतंत्रता असू नये.* त्याच्या मते -_
*_९.२ कुटुंबातील पुरुषांनी स्त्रियांना रात्रंदिवस आपल्या नजरेखाली ठेवावे. स्त्रिया ह्या विषयासक्त (चंचल) असल्यामुळे त्यांना आपल्या नियंत्रात ठेवावे._*
_*९.३ पित्याने तिचे बालपणात रक्षण करावे. पतीने तारुण्यात रक्षण करावे, वृद्धापकाळात तिचे मुलांनी रक्षण करावे. स्त्री ही केव्हाही स्वतंत्र राहण्यास योग्य नाही.*_
_९.५ विशेषकरून स्त्रियांचे त्यांच्या गैरप्रवृत्तीच्याविरुद्ध रक्षण करावे. मग त्या कितीही शुक्षुक असोत. कारण त्यांच्यावर लक्ष ठेवले नाही तर त्या दोन्ही कुटुंबांना दुःखात पाडतात._
_९.६ सर्व जातीचे उत्तम कर्म म्हणून अगदी दुर्बल पतीनेही पत्नी रक्षण केले पाहिजे._
_*५.१४७ मुलीने, तरुण स्त्रीने किंवा अगदी वृद्ध स्त्रीने स्वतःच्या घरातही स्वतंत्रपणे काही करू नये.*_
_५. १४८ बालपणात स्त्री पित्याच्या ताब्यात असावी. तिला स्वातंत्र्य कधीही देऊ नये._
_५. १४९ तिने स्वतःला पित्यापासून, पतीपासून किंवा पुत्रापासून वेगळे ठेवू नये. जर ती तशी वेगळी राहिली तर तिचे स्वतःचे आणि तिच्या पतीचे कुटुंब तिरस्करणीय स्त्रियांना घटस्फोटाचा हक्क असू नये._
_९.४५ पती हा स्त्रीशी पूर्णपणे एकरूप असतो. त्यामुळे स्त्रीने एकदा लग्न केल्यानंतर त्याच्यापासून तिला वेगळे होता येत नाही._
_बहुतांश हिंदू मनूद्वारा समर्थित विवाह विच्छेदाच्या नियमाला आदर्श मानतात. मनूने विवाहाला एखाद्या संस्काराप्रमाणे मानलेले आहे आणि म्हणूनच विवाहापासून विच्छेद घेता नाही. अशी आपली अविवेकी समजूत अधिकांश हिंदू करून घेतात. परंतु ही बाब सत्यापासून शेकडो मैल दूर आहे. विवाह विच्छेदाचा मनूचा उद्देश अजिबात वेगळा होता. ही बाब एका पुरुषाला स्त्रीशी जोडणारी नसून स्त्रीला पुरुषाशी जोडणारी आहे. एवढेच नव्हे तर *यात पुरुष स्वतंत्र असून तो केव्हाही आपल्या पत्नीचा त्याग करू शकतो. पुरुष हा केवळ स्वतःच्या पत्नीचा त्यागच करू शकत नाही तर तिला विकूसुद्धा शकतो. तो पत्नीला स्वतंत्र न होण्याकरिता नियमसुद्धा घालून देतो.*_
_*यासंबंधी मनू म्हणतो :*_
*_९.४.६ विकल्याने किंवा सोडून दिल्यावरही स्त्री ही स्वतःच्या पतीपासून दूर होऊ शकत नाही. याचा अर्थ हा आहे की केवळ विकून दिल्यावर किंवा सोडून दिल्यावरही ज्या व्यक्तीने तिचा स्वीकार केला आणि विकत घेतला आहे त्याची कायदेशीर पत्नी होवू शकत नाही. जर ही बाब असंगत नाही तर मग कुठलीही बाब असंगत नाही. परंतु स्वतःच्या नियमाच्या परिणामस्वरूप होणाऱ्या न्याय-अन्यायाबद्दल मनू चिंतित नव्हता. तो स्त्रीला त्या अधिकारापासून वंचित करू इच्छित होता, जो तिला बौद्ध शासनांतर्गत मिळत होता. मनूला माहीत होते की स्त्रीला मिळणाऱ्या स्वातंत्र्याचा उपयोग ती शूद्रांसोबत लग्न करूनदेखील करू परिणामतः वर्णव्यवस्था नष्ट होऊन जाईल._*
_स्त्रीला स्वातंत्र्य मिळाल्यामुळे मनू हा क्रोधित व चिंतेत पडला आणि तिला या स्वातंत्र्यापासून वंचित केले._
_मालमत्तेबद्दल पत्नीचे स्थान एखाद्या गुलामाच्या स्तरापर्यंत मनूने आणून सोडले._
_*९. ४१६. पत्नी, पुत्र आणि दास या तिघांकडेही कोणत्याही प्रकारची संपत्ती ठेवू नये. स्त्रीद्वारे कमावलेली संपत्ती तिची होत नसून ती ज्याची पत्नी किंवा दास आहे त्याची होईल.*_
*_जर एखादी स्त्री विधवा झाली तर तिला जीवननिर्वाहाबद्दल धन दिले जाऊ शकते, भूसंपत्तीदेखील निर्वाहाबद्दल दिली जाऊ शकते, परंतु ही संपत्ती कायमस्वरूपी स्वतःकडे मालमत्ता म्हणून ठेवण्याचा अधिकार मात्र स्त्रीला मनूद्वारे नाकारण्यात आला आहे._*
_मनूद्वारा निर्मित नियमानुसार स्त्रीला शारीरिक दंडसुद्धा दिला जाऊ शकतो आणि *पती स्वतःच्या पत्नीला मारू किंवा पिटू शकतो.*_
*_८.२९९ स्त्रीने जर अपराध केला तर पती तिला रस्सीने बांधून बांबूने (छडीने) मारू शकतो._*
*_यापेक्षा वेगळ्या परिस्थितीत मनू स्त्रियांचे स्थान शूद्रांच्या बरोबरीनेच मानतो._*
*_वेदांचे अध्ययन करण्यापासून ज्याप्रमाणे शूद्राला वंचित करण्यात आले आहे त्याप्रमाणे स्त्रीलादेखील नाकारण्यात आले आहे._*
*_मनू म्हणतो:_*
*_२.७७ स्त्रियांवर सगळे संस्कार केले जावे परंतु ते वेदमंत्राशिवाय केले जावेत._*
*_९.१८ स्त्रीला शिक्षणाचा अधिकार नाही. म्हणूनच वेदमंत्राशिवाय तिचे संस्कार केले जातात. वेद वाचण्याचा स्त्रीला कुठलाही अधिकार नसल्यामुळेच तिला धम्माचे ज्ञान नसते. पापांपासून मुक्ती मिळविण्याकरिता वेदपठण करणे आवश्यक आहे. स्त्रियांना वेद वाचण्याचा अधिकार नसल्याकारणाने त्या असत्याप्रमाणे अपवित्र ठरतात._*
_ब्राह्मणी धर्मानुसार यज्ञ करणे हेच धम्माचे सार आहे. तरीसुद्धा मनूने स्त्रियांना यज्ञ करण्याची अनुमती दिलेली नाही._
*_मनू आदेश देतो -_*
*_११.३६ स्त्री वेदमंत्राच्या उच्चारासह यज्ञ करू शकत नाही._*
*_११.३७ जर ती असे करील तर ती नरकात जाईल._*
_स्त्रियांनी यज्ञकर्म करू नये म्हणून त्या ब्राह्मणांची मदत करू शकत नाही किंवा सेवादेखील करू शकत नाही किंवा मदतदेखील घेऊ शकत नाही._
_४.२०५ स्त्रीद्वारा देण्यात आलेल्या अन्नाला यज्ञ करणारा ब्राह्मण ग्रहण करणार नाही._
_४.२०६ स्त्रीद्वारा हजर यज्ञकर्म केले गेले तर ते अशुभ ठरून अपवित्र असते. देवता त्याचा स्वीकार करीत नाही. म्हणूनच त्यात भाग घेऊ नये._
_*"स्त्रीने कुठलेही बौद्धिक कार्य करू नये. तिने स्वतःच्या इच्छेने काहीही करू नये. स्वतंत्र विचार देखील डोक्यात आणता कामा नये. बौद्ध धम्मदेखील ती स्वीकारू शकत नाही. जर तिने बौद्ध धर्माचे पालन केले तर मेल्यावर जे संस्कार करण्यात येतात ते तिच्यावर करण्यात येणार नाहीत. "जीवनाचे आदर्श म्हणून मनूने स्त्रियांकरिता घालून दिलेल्या आदर्शाकडेसुद्धा लक्ष द्या.*_
*_मनू म्हणतो :_*
_५.१५. स्त्रीने आजीवन पतीच्या आज्ञेत राहावे व त्याचे पालन करावे. पती मेल्यावर ती श्राद्धदेखील करू शकत नाही._
_*५.१५४ पती कितीही दुराचारी असला किंवा अन्य स्त्रीसोबत राहात असला किंवा दुर्गुणी आणि व्यसनी असला तरी देवतेसमान मानून त्याचीच पूजा करावी.*_
_*५.१५५ पतीशिवाय स्त्रीने कोणतेही व्रत किंवा उपवास करू नये. पतीच्या आज्ञेत जर स्त्री राहिली तरच ती स्वर्गातदेखील सन्मानित होईल.*_
_आता मनूद्वारा निर्मित त्या आदर्शाकडे लक्ष द्या, जे स्त्रियांकरिता स्थापित करण्यात आले आहेत._
_५.१५० स्त्रीने नेहमीच प्रसन्न राहावे. घरकार्यात चतुर असावे. घरातील भांडी स्वच्छ ठेवावी आणि खर्च करण्याबाबत मितव्ययी असावे._
_*५. १५३ पत्नी म्हणून स्वीकारलेल्या स्त्रीचा पतीला हाच तिचा सर्वकाळ अधिकारी असतो. मग तिला मुले होवोत अथवा न होवोत.*_
*_आता मनुपूर्व काळात स्त्रियांची जी स्थिती होती तीकडे लक्ष द्या. अथर्व वेदांत स्पष्टपणे लिहिले आहे की स्त्रियांनादेखील उपनयनाचा अधिकार आहे._*
_ब्रह्मचर्य अवस्था समाप्त केल्यानंतर स्त्री ही विवाह योग्य होत असते._
_- श्रौत सूत्रांमध्ये हे स्पष्टपणे लिहिले आहे की स्त्रीदेखील वेदमंत्राचे उच्चारण करू शकते आणि वेदमंत्रातील शिक्षणदेखील दिले जात असे._
_- पाणिनीच्या अस्टाध्यायीमध्ये याचा उल्लेख सापडतो. प्राचीन काळात स्त्रिया गुरुकुलातदेखील जात असत आणि वेदांच्या विशिष्ट शाखेचा अभ्यासदेखील करीत._
_-एवढेच नव्हे तर त्या मीमांसेतदेखील प्रवीण असत._
_-पतंजलीच्या महाभाष्यात लिहिले आहे की,_
*_स्त्रियांना शिक्षकदेखील होता येत असे आणि त्या लहान मुलांना वेददेखिल शिकवीत असत._*
*_धम्म; अध्यात्म आणि तत्त्वमीमांसेतील कठिणातील कठीण विषयावर स्त्रियांचे पुरुषाबरोबर वादविवाद होत असत._*
_या वादविवादाची अनेक उदाहरणे देता येतील._
_*- जनक आणि सुलभ, याज्ञवल्क्य आणि गार्गी, याज्ञवल्क्य आणि मैत्रैयी तसेच शंकराचार्य आणि विाधरी यांच्यामध्ये चाललेल्या वादविवादामधून सिद्ध होते की मनुपूर्व स्त्रिया शिक्षण आणि मानाच्या उच्च पातळीपर्यंत पोहोचलेल्या होत्या."*_
*_मनुपूर्व स्त्रियांना समाजात मानाचे स्थान होते. हे कुणीही नाकारू शकत नाही. प्राचीन काळात राजाच्या राज्याभिषेकाच्या वेळी ज्या स्त्रियांची महत्त्वाची भूमिका असे त्यात राणीचादेखील समावेश होता. राजा इतरांप्रमाणेच राणीलादेखील वर प्रदान करीत असे. एवढेच नव्हे तर खालच्या जातीतील आपल्या इतर राण्यांनादेखील राजा सन्मानित करीत असे. राज्याभिषेकानंतर राजा हा आपल्या राज्यातील मंत्र्याच्या राण्यांनादेखील अभिवादन करीत असे._*
_*कौटिल्याच्या काळात स्त्री ही १२ वर्षांची व पुरुष हा १६ वर्षांचा असताना वयस्क मानला जात असे. बौद्धायनाच्या गुह्यसूत्रामध्ये लिहिले आहे की यानंतरच स्त्रिया विवाह योग्य होतात.*_
*_मनूच्या नियमाच्या विरुद्ध कौटिल्याच्या काळात स्त्रीचा जर पतीसोबत वैरभाव अथवा घृणाभाव किंवा तिचा पती चारित्र्यहीन असेल तर त्या स्त्रीला घटस्फोटाचा अधिकार होता. एवढेच नव्हे तर विधवा अथवा एखाद्या स्त्रीला पुनर्विवाह करण्याचा हक्कसुद्धा होता. मन्नुपूर्व काळात पती मेल्यावर संपत्तीचा अधिकारसुद्धा स्त्रियांना प्राप्त होता._*
_*हे वाचून तर आपणास आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही की मनुपूर्व काळात पतीच्या छळ अथवा जाचापासून, मानहानीपासून सुटका करून घेण्यासाठी न्यायालयातसुद्धा जाण्याचा अधिकार स्त्रीवर्गाला प्राप्त होता.*_
_*अर्थात मनुपूर्व काळात स्त्री ही स्वतंत्र होती आणि पुरुषांच्या बरोबरीने समान होती. परंतु मनूने तिची अधोगती केली.*_
*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*
*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_संदर्भ :- कांती आणि प्रतिक्रांती_*
*_लेखक :- डॉ बाबासाहेब आंबेडकर_*
*_संकलन :- महेश कांबळे_*
*_दिनांक :- २३/१२/२०२२_*
https://mikamblemahesh.blogspot.com/2022/12/blog-post_23.html
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼