Friday, 23 December 2022

स्त्री आणि प्रतिक्रांती

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_स्त्री आणि प्रतिक्रांती_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

      *_ज्या प्रमाणात मनू शूद्रांबद्दल नीच विचारधारणा प्रस्तुत करतो. तीच नीच विचारधारणा स्त्रीवर्गाबद्दलसुद्धा प्रस्तुत करतो. स्त्रीवर्गाबद्दल हीन विचार ठेवताना मनू म्हणतो :*_

_*२.२१३ पुरुषांना मोहित करणे हा स्त्रियांचा मूळस्वभाव आहे आणि म्हणून बुद्धिमान माणसे स्त्रियांच्या सहवासात राहू शकत नाही.*_

*_२.२१४ कारण या जगात स्त्रिया केवळ मूर्खानाच वाईट मार्गाला लावत नाही तर विद्वान माणसालाही वासनेचा आणि क्रोधाचा गुलाम बनवितात._*

_२. २१५ पुरुषाने आई, बहीण किंवा मुलगी यांच्याबरोबर एकांतात बसू नये. कारण इंद्रिये ही शक्तिमान असतात आणि ती विद्वान माणसांनाही आपल्या प्रभुत्वाखाली आणतात._

_*९.१४ स्त्रियांना सौंदर्याची पर्वा नसते किंवा त्यांचे वयाकडेही लक्ष नसते. तो पुरुष असला म्हणजे त्यांना पुरेसे आहे. त्या स्वतःला सुंदर माणसांच्या आणि कुरूप माणसांच्या हवाली करतात.*_

_*९.१५ स्त्रिया पुरुषांच्या आसक्तीमुळे, त्यांच्या चंचल स्वभावामुळे आणि नैसर्गिक हृदयशून्यतेमुळे त्यांचे कितीही काळजीपूर्वक संरक्षण केले तरी त्या आपल्या पतीशी बेइमान होतात.*_

_९.१६ स्त्रियांना निर्माण करताना ईश्वराने त्यांची ही जी प्रवृत्ती बनविली आहे. ती लक्षात घेऊन प्रत्येक माणसाने अगदी कडकपणे त्यांच्यावर पहारा ठेवला पाहिजे._

_*९. १७ स्त्रियांना निर्माण करताना ईश्वराने त्यांना शयनाची आसक्ती, आसनाची आसक्ती, दागिन्याची आसक्ती, अशुद्ध इच्छा, राग, अप्रामाणिकपणा, मत्सर आणि गैरवर्तवणूक हे गुण बहाल केले आहेत.*_

       _*स्त्रियांबाबत मनूने केलेले कायदे हे अपरिवर्तनीय आहेत. मनूच्या मतानुसार स्त्रियांना कुठल्याही परिस्थितीत स्वतंत्रता असू नये.* त्याच्या मते -_ 

*_९.२ कुटुंबातील पुरुषांनी स्त्रियांना रात्रंदिवस आपल्या नजरेखाली ठेवावे. स्त्रिया ह्या विषयासक्त (चंचल) असल्यामुळे त्यांना आपल्या नियंत्रात ठेवावे._*

_*९.३ पित्याने तिचे बालपणात रक्षण करावे. पतीने तारुण्यात रक्षण करावे, वृद्धापकाळात तिचे मुलांनी रक्षण करावे. स्त्री ही केव्हाही स्वतंत्र राहण्यास योग्य नाही.*_

_९.५ विशेषकरून स्त्रियांचे त्यांच्या गैरप्रवृत्तीच्याविरुद्ध रक्षण करावे. मग त्या कितीही शुक्षुक असोत. कारण त्यांच्यावर लक्ष ठेवले नाही तर त्या दोन्ही कुटुंबांना दुःखात पाडतात._

_९.६ सर्व जातीचे उत्तम कर्म म्हणून अगदी दुर्बल पतीनेही पत्नी रक्षण केले पाहिजे._ 

_*५.१४७ मुलीने, तरुण स्त्रीने किंवा अगदी वृद्ध स्त्रीने स्वतःच्या घरातही स्वतंत्रपणे काही करू नये.*_

_५. १४८ बालपणात स्त्री पित्याच्या ताब्यात असावी. तिला स्वातंत्र्य कधीही देऊ नये._

_५. १४९ तिने स्वतःला पित्यापासून, पतीपासून किंवा पुत्रापासून वेगळे ठेवू नये. जर ती तशी वेगळी राहिली तर तिचे स्वतःचे आणि तिच्या पतीचे कुटुंब तिरस्करणीय स्त्रियांना घटस्फोटाचा हक्क असू नये._

_९.४५ पती हा स्त्रीशी पूर्णपणे एकरूप असतो. त्यामुळे स्त्रीने एकदा लग्न केल्यानंतर त्याच्यापासून तिला वेगळे होता येत नाही._

     _बहुतांश हिंदू मनूद्वारा समर्थित विवाह विच्छेदाच्या नियमाला आदर्श मानतात. मनूने विवाहाला एखाद्या संस्काराप्रमाणे मानलेले आहे आणि म्हणूनच विवाहापासून विच्छेद घेता नाही. अशी आपली अविवेकी समजूत अधिकांश हिंदू करून घेतात. परंतु ही बाब सत्यापासून शेकडो मैल दूर आहे. विवाह विच्छेदाचा मनूचा उद्देश अजिबात वेगळा होता. ही बाब एका पुरुषाला स्त्रीशी जोडणारी नसून स्त्रीला पुरुषाशी जोडणारी आहे. एवढेच नव्हे तर *यात पुरुष स्वतंत्र असून तो केव्हाही आपल्या पत्नीचा त्याग करू शकतो. पुरुष हा केवळ स्वतःच्या पत्नीचा त्यागच करू शकत नाही तर तिला विकूसुद्धा शकतो. तो पत्नीला स्वतंत्र न होण्याकरिता नियमसुद्धा घालून देतो.*_

_*यासंबंधी मनू म्हणतो :*_

*_९.४.६ विकल्याने किंवा सोडून दिल्यावरही स्त्री ही स्वतःच्या पतीपासून दूर होऊ शकत नाही. याचा अर्थ हा आहे की केवळ विकून दिल्यावर किंवा सोडून दिल्यावरही ज्या व्यक्तीने तिचा स्वीकार केला आणि विकत घेतला आहे त्याची कायदेशीर पत्नी होवू शकत नाही. जर ही बाब असंगत नाही तर मग कुठलीही बाब असंगत नाही. परंतु स्वतःच्या नियमाच्या परिणामस्वरूप होणाऱ्या न्याय-अन्यायाबद्दल मनू चिंतित नव्हता. तो स्त्रीला त्या अधिकारापासून वंचित करू इच्छित होता, जो तिला बौद्ध शासनांतर्गत मिळत होता. मनूला माहीत होते की स्त्रीला मिळणाऱ्या स्वातंत्र्याचा उपयोग ती शूद्रांसोबत लग्न करूनदेखील करू परिणामतः वर्णव्यवस्था नष्ट होऊन जाईल._*

         _स्त्रीला स्वातंत्र्य मिळाल्यामुळे मनू हा क्रोधित व चिंतेत पडला आणि तिला या स्वातंत्र्यापासून वंचित केले._

       _मालमत्तेबद्दल पत्नीचे स्थान एखाद्या गुलामाच्या स्तरापर्यंत मनूने आणून सोडले._

_*९. ४१६. पत्नी, पुत्र आणि दास या तिघांकडेही कोणत्याही प्रकारची संपत्ती ठेवू नये. स्त्रीद्वारे कमावलेली संपत्ती तिची होत नसून ती ज्याची पत्नी किंवा दास आहे त्याची होईल.*_

       *_जर एखादी स्त्री विधवा झाली तर तिला जीवननिर्वाहाबद्दल धन दिले जाऊ शकते, भूसंपत्तीदेखील निर्वाहाबद्दल दिली जाऊ शकते, परंतु ही संपत्ती कायमस्वरूपी स्वतःकडे मालमत्ता म्हणून ठेवण्याचा अधिकार मात्र स्त्रीला मनूद्वारे नाकारण्यात आला आहे._*

_मनूद्वारा निर्मित नियमानुसार स्त्रीला शारीरिक दंडसुद्धा दिला जाऊ शकतो आणि *पती स्वतःच्या पत्नीला मारू किंवा पिटू शकतो.*_

*_८.२९९ स्त्रीने जर अपराध केला तर पती तिला रस्सीने बांधून बांबूने (छडीने) मारू शकतो._*

*_यापेक्षा वेगळ्या परिस्थितीत मनू स्त्रियांचे स्थान शूद्रांच्या बरोबरीनेच मानतो._*

        *_वेदांचे अध्ययन करण्यापासून ज्याप्रमाणे शूद्राला वंचित करण्यात आले आहे त्याप्रमाणे स्त्रीलादेखील नाकारण्यात आले आहे._*

*_मनू म्हणतो:_*

*_२.७७ स्त्रियांवर सगळे संस्कार केले जावे परंतु ते वेदमंत्राशिवाय केले जावेत._*

*_९.१८ स्त्रीला शिक्षणाचा अधिकार नाही. म्हणूनच वेदमंत्राशिवाय तिचे संस्कार केले जातात. वेद वाचण्याचा स्त्रीला कुठलाही अधिकार नसल्यामुळेच तिला धम्माचे ज्ञान नसते. पापांपासून मुक्ती मिळविण्याकरिता वेदपठण करणे आवश्यक आहे. स्त्रियांना वेद वाचण्याचा अधिकार नसल्याकारणाने त्या असत्याप्रमाणे अपवित्र ठरतात._*

        _ब्राह्मणी धर्मानुसार यज्ञ करणे हेच धम्माचे सार आहे. तरीसुद्धा मनूने स्त्रियांना यज्ञ करण्याची अनुमती दिलेली नाही._

*_मनू आदेश देतो -_*

*_११.३६ स्त्री वेदमंत्राच्या उच्चारासह यज्ञ करू शकत नाही._*

*_११.३७ जर ती असे करील तर ती नरकात जाईल._*

         _स्त्रियांनी यज्ञकर्म करू नये म्हणून त्या ब्राह्मणांची मदत करू शकत नाही किंवा सेवादेखील करू शकत नाही किंवा मदतदेखील घेऊ शकत नाही._

_४.२०५ स्त्रीद्वारा देण्यात आलेल्या अन्नाला यज्ञ करणारा ब्राह्मण ग्रहण करणार नाही._

_४.२०६ स्त्रीद्वारा हजर यज्ञकर्म केले गेले तर ते अशुभ ठरून अपवित्र असते. देवता त्याचा स्वीकार करीत नाही. म्हणूनच त्यात भाग घेऊ नये._

           _*"स्त्रीने कुठलेही बौद्धिक कार्य करू नये. तिने स्वतःच्या इच्छेने काहीही करू नये. स्वतंत्र विचार देखील डोक्यात आणता कामा नये. बौद्ध धम्मदेखील ती स्वीकारू शकत नाही. जर तिने बौद्ध धर्माचे पालन केले तर मेल्यावर जे संस्कार करण्यात येतात ते तिच्यावर करण्यात येणार नाहीत. "जीवनाचे आदर्श म्हणून मनूने स्त्रियांकरिता घालून दिलेल्या आदर्शाकडेसुद्धा लक्ष द्या.*_

*_मनू म्हणतो :_*

_५.१५. स्त्रीने आजीवन पतीच्या आज्ञेत राहावे व त्याचे पालन करावे. पती मेल्यावर ती श्राद्धदेखील करू शकत नाही._

_*५.१५४ पती कितीही दुराचारी असला किंवा अन्य स्त्रीसोबत राहात असला किंवा दुर्गुणी आणि व्यसनी असला तरी देवतेसमान मानून त्याचीच पूजा करावी.*_

_*५.१५५ पतीशिवाय स्त्रीने कोणतेही व्रत किंवा उपवास करू नये. पतीच्या आज्ञेत जर स्त्री राहिली तरच ती स्वर्गातदेखील सन्मानित होईल.*_

_आता मनूद्वारा निर्मित त्या आदर्शाकडे लक्ष द्या, जे स्त्रियांकरिता स्थापित करण्यात आले आहेत._

_५.१५० स्त्रीने नेहमीच प्रसन्न राहावे. घरकार्यात चतुर असावे. घरातील भांडी स्वच्छ ठेवावी आणि खर्च करण्याबाबत मितव्ययी असावे._

_*५. १५३ पत्नी म्हणून स्वीकारलेल्या स्त्रीचा पतीला हाच तिचा सर्वकाळ अधिकारी असतो. मग तिला मुले होवोत अथवा न होवोत.*_

*_आता मनुपूर्व काळात स्त्रियांची जी स्थिती होती तीकडे लक्ष द्या. अथर्व वेदांत स्पष्टपणे लिहिले आहे की स्त्रियांनादेखील उपनयनाचा अधिकार आहे._*

_ब्रह्मचर्य अवस्था समाप्त केल्यानंतर स्त्री ही विवाह योग्य होत असते._

  _- श्रौत सूत्रांमध्ये हे स्पष्टपणे लिहिले आहे की स्त्रीदेखील वेदमंत्राचे उच्चारण करू शकते आणि वेदमंत्रातील शिक्षणदेखील दिले जात असे._

     _- पाणिनीच्या अस्टाध्यायीमध्ये याचा उल्लेख सापडतो. प्राचीन काळात स्त्रिया गुरुकुलातदेखील जात असत आणि वेदांच्या विशिष्ट शाखेचा अभ्यासदेखील करीत._

   _-एवढेच नव्हे तर त्या मीमांसेतदेखील प्रवीण असत._

   _-पतंजलीच्या महाभाष्यात लिहिले आहे की,_

*_स्त्रियांना शिक्षकदेखील होता येत असे आणि त्या लहान मुलांना वेददेखिल शिकवीत असत._*

    *_धम्म; अध्यात्म आणि तत्त्वमीमांसेतील कठिणातील कठीण विषयावर स्त्रियांचे पुरुषाबरोबर वादविवाद होत असत._*

_या वादविवादाची अनेक उदाहरणे देता येतील._

         _*- जनक आणि सुलभ, याज्ञवल्क्य आणि गार्गी, याज्ञवल्क्य आणि मैत्रैयी तसेच शंकराचार्य आणि विाधरी यांच्यामध्ये चाललेल्या वादविवादामधून सिद्ध होते की मनुपूर्व स्त्रिया शिक्षण आणि मानाच्या उच्च पातळीपर्यंत पोहोचलेल्या होत्या."*_

          *_मनुपूर्व स्त्रियांना समाजात मानाचे स्थान होते. हे कुणीही नाकारू शकत नाही. प्राचीन काळात राजाच्या राज्याभिषेकाच्या वेळी ज्या स्त्रियांची महत्त्वाची भूमिका असे त्यात राणीचादेखील समावेश होता. राजा इतरांप्रमाणेच राणीलादेखील वर प्रदान करीत असे. एवढेच नव्हे तर खालच्या जातीतील आपल्या इतर राण्यांनादेखील राजा सन्मानित करीत असे. राज्याभिषेकानंतर राजा हा आपल्या राज्यातील मंत्र्याच्या राण्यांनादेखील अभिवादन करीत असे._*

        _*कौटिल्याच्या काळात स्त्री ही १२ वर्षांची व पुरुष हा १६ वर्षांचा असताना वयस्क मानला जात असे. बौद्धायनाच्या गुह्यसूत्रामध्ये लिहिले आहे की यानंतरच स्त्रिया विवाह योग्य होतात.*_

           *_मनूच्या नियमाच्या विरुद्ध कौटिल्याच्या काळात स्त्रीचा जर पतीसोबत वैरभाव अथवा घृणाभाव किंवा तिचा पती चारित्र्यहीन असेल तर त्या स्त्रीला घटस्फोटाचा अधिकार होता. एवढेच नव्हे तर विधवा अथवा एखाद्या स्त्रीला पुनर्विवाह करण्याचा हक्कसुद्धा होता. मन्नुपूर्व काळात पती मेल्यावर संपत्तीचा अधिकारसुद्धा स्त्रियांना प्राप्त होता._*

        _*हे वाचून तर आपणास आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही की मनुपूर्व काळात पतीच्या छळ अथवा जाचापासून, मानहानीपासून सुटका करून घेण्यासाठी न्यायालयातसुद्धा जाण्याचा अधिकार स्त्रीवर्गाला प्राप्त होता.*_

         _*अर्थात मनुपूर्व काळात स्त्री ही स्वतंत्र होती आणि पुरुषांच्या बरोबरीने समान होती. परंतु मनूने तिची अधोगती केली.*_

*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_संदर्भ :- कांती आणि प्रतिक्रांती_*

*_लेखक :- डॉ बाबासाहेब आंबेडकर_*

*_संकलन :- महेश कांबळे_*

*_दिनांक :- २३/१२/२०२२_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2022/12/blog-post_23.html

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

Thursday, 22 December 2022

शूद्र आणि प्रतिक्रांती

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_शूद्र आणि प्रतिक्रांती_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

          _*मनुस्मृतीचे अध्ययन केल्यास शूद्रांच्या स्थितीविषयी मनूच्या नियमात अत्यंत आश्चर्यकारक माहिती मिळते.* हिंदू समाजाचा सर्वांत मोठ्या संख्येने अधिक असलेल्या भागाविषयी हिंदूच्या मनोवृत्तीचे निर्धारण त्या वेळेला आणि वेळोवेळी या नियमांनी केले आहे. या नियमांना खाली दिलेले आहे. ज्यावरून वाचकांना शूद्रांच्या स्थितीविषयी पूर्ण माहिती मिळेल._

      _४. ६१ मनू हा ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य गृहस्थांना आदेश देतो की, ज्या देशाचा शासक शूद्र असेल त्या देशात त्यांनी राहू नये. शूद्र हा सन्मानित व्यक्ती होऊ शकत नाही. या बाबतीत मनू म्हणतो :_

         _११.२४ ब्राह्मण कधीही यज्ञकार्यासारख्या धार्मिक कार्याला शूद्राकडे धन मागणार नाही._

          _*शूद्रावर सर्व प्रकारच्या विवाहांना बंदी घालण्यात आली. तीनही उच्च वर्णाच्या स्त्रियांशी विवाह करण्यास शूद्रांना मनाई करण्यात आली. वरिष्ठ वर्गाच्या स्त्रियांशी शूद्रांनी कोणताही संबंध ठेवू नये असा मनूद्वारे शूद्रांना आदेश देण्यात आला आणि शूद्राने जर तिच्याशी व्यभिचार केला तर त्याला मृत्युदंडाच्या शिक्षेचे प्रावधान करण्यात आले.*_

        _*८. ३७४ शूद्राने उच्च वर्णाच्या संरक्षित अथवा असंरक्षित स्त्रीशी संभोग केला तर त्याला खालीलप्रमाणे शिक्षा द्यावी. स्त्री जर असंरक्षित असेल तर गुन्हा करणाऱ्याचा अवयव कापून टाकवा आणि ती जर संरक्षित असेल तर त्याला ठार करून त्याची मालमत्ता जप्त करावी.*_

        _*८.२० जर एखादा ब्राह्मण जन्माने केवळ ब्राह्मण असेल व त्याने वेदांचे अध्ययन केले असेल वा नसेल तरीही राजाला अशा ब्राह्मणाला न्यायाधीश बनविण्याचा अधिकार आहे; परंतु शूद्र कितीही विद्वान असला तरी त्याला तो अधिकार देऊ नये.*_

      _८. २१ शूद्राद्वारे न्यायदान करण्यात येणारे राज्य अधोगतीला पोचते._

        _*८.२७२ शूद्राने जर उद्यामपणे ब्राह्मणाला धर्मोपदेश देण्याचा प्रयत्न केला तर त्याच्या तोंडात व कानात उकळते तेल टाकावे.*_

*_शूद्राद्वारे ज्ञानार्जन करण्यासंबंधी मनू म्हणतो :_*

    _३. १५६ जो, शूद्र शिष्यांना शिक्षण देतो व ज्या शूद्रांचा तो शिक्षक होतो तो, शूद्रांचा शिक्षक या संबंधाने अयोग्य ठरविला जातो._

        _*४.९९ त्याने (ब्राह्मणाने) शूद्राच्या उपस्थितीत कधीही वेदपाठ करू नये.*_

            _शूद्राने वेदाध्ययन केल्यावर दंडाचे नियम तर मनूच्या नंतरच्या स्मृतिकारांनी अधिकच कठोर असे बनविले._       

            _*उदाहरणार्थ कालायनने असे सांगितले आहे की, शूद्राने जर वेद ऐकले किंवा वेदातील एखाद्या शब्दाचा उच्चार जरी केला तर राजा त्याच्या जिभेचे दोन तुकडे करील आणि त्याच्या कानात उकळलेले शिसे टाकील.*_ 

_*शूद्राने मालमत्ता बाळगण्यासंबंधी मनूचे नियम खालीलप्रमाणे :*_

      _१०.१२९ धनसंपत्ती जमविण्यास शूद्र समर्थ असले तरीदेखील त्याने ती जमवू नये; कारण धनसंपत्ती जमविल्यावर असा शूद्र अहंकारी बनतो._

       _८.४१७ जर एखादा ब्राह्मण आपली जीविकोपार्जन करण्यास असमर्थ असेल तर निःसंकोच तो शूद्राची संपत्ती हिसकावून घेऊ शकतो._

         _*शूद्र केवळ एकच व्यवसाय करू शकतो. मनूच्या आठ अपरिवर्तनीय नियमांमध्ये हासुद्धा अपरिवर्तनीय नियम आहे. या बाबतीत मनू म्हणतो.*_

      *_१.९१ ब्राह्मनाने शूद्रांकरिता एकच व्यवसाय ठरवून दिला आहे. तो म्हणजे विनम्रतापूर्वक तीनही वर्ण ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्यांची सेवा करणे होय._* 

        _१०.१२१ एखादा शूद्र जर ब्राह्मणाची सेवा करून जगण्यास असमर्थ असेल तर त्याने क्षत्रियाची सेवा करावी. नाही तर वैश्याची सेवा करून जगावे._

     _*१०.१२२ ब्राह्मणांची सेवा केल्याने शूद्राच्या सर्व प्रकारच्या इच्छा पूर्ण होतात. या जीवनात व पुढच्या जीवनात शूद्राला ब्राह्मणाची सेवा केल्याने स्वर्गलाभ होईल.*_

         _*१०.१२३ ब्राह्मणांची सेवा करणे हाच शूद्रासाठी सर्वोत्तम व्यवसाय आहे, असे ठरविण्यात आले आहे. कारण याव्यतिरिक्त तो जो काही करतो ते सगळे व्यर्थ (निष्फळ) ठरते.*_

           _शूद्रांकडून सेवा कर्म करण्यासाठी कुठल्याही कराराची आवश्यकता नाही, असे मनूला वाटते तर शूद्राकडून बलपूर्वक सेवा करून घेण्यात यावे असे मनूने नियमात खालीलप्रमाणे सांगितले आहे._

        _*८.४१३ प्रत्येक ब्राह्मण शूद्राकडून सेवा करून घेण्यासाठी बळजबरी करू शकतो. जरी तो ब्राह्मणाचा गुलाम असो वा नसो. कारण शूद्रांचे जीवन हे ब्राह्मणांच्या सेवेकरिताच बनलेले आहे. ब्राह्मणाने शूद्रांना त्याची योग्यता, त्याने केलेली सेवा आणि शूद्रांच्या परिवारातील संख्या पाहून पोषण मोबदला द्यावा.*_

          _१०.१२५ शूद्रांनी वाचलेले अन्न व घरातील शिल्लक राहिलेले जुने पुराने द्यावे. मनूच्या मतानुसार शूद्राने इतरांशी बोलताना आणि व्यवहार करताना गुलामाप्रमाणे विनम्रपणे राहिले पाहिजे._

         *_८.२७० शूद्राने जर ब्राह्मण जातीचा व नावाचा उच्चार तिरस्काराने केला तर त्याची जीभ कापावी. कारण तो जन्मानेच नीच कुळात जन्मलेला आहे._*

        _*८.२७१ शूद्राने जर ब्राह्मण जातीचा अथवा नावाचा उच्चार तिरस्काराने केला तर दहा उंगल लांबीची लोखंडी सळाक तापवून लाल करून त्याच्या तोंडात घालावी.*_ 

       _*शूद्रांचा हलका दर्जा त्याच्या नावातूनसुद्धा प्रकट व्हायला पाहिजे.* निरनिराळ्या वर्णातील लोकांची नावे कशी असावीत याबद्दल मनू म्हणतो._

      _*२.३१ ब्राह्मणाचे नाव मंगलसूचक, क्षत्रियाचे नाव शक्तिसूचक, वैश्यांचे नाव धनसूचक तर शूद्राचे नाव दासभाव सूचक असावे.*_

           _*मनूच्या पूर्वी शूद्रांची स्थिती काय होती? शूद्रांचे वर्णन मनू बाहेरून आलेल्या परकीय अनार्याप्रमाणे करतो. कुठल्याही प्रकारचे सामाजिक आणि धार्मिक अधिकार शूद्रांना प्राप्त होऊ नयेत. अशी धारणा मुद्दाम लोकांच्या मनात भरविली गेली की, शूद्र हे अनार्य होते. परंतु या बाबतीत कुठलीही शंका नाही की, प्राचीन आर्य साहित्यात यासंबंधी कुठलाही पुरावा आढळत नाही.*_

         _*आर्याच्या धार्मिक साहित्याचा अभ्यास केल्यावर त्यात विविध जाती समुदायांचा उल्लेख आढळतो. सर्वप्रथम आर्यांचा उल्लेख सापडतो. आर्यामध्ये चार वर्ण होते. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. याव्यतिरिक्त आर्यापेक्षा वेगळ्या अशा १) असुर २) सुर अथवा देव ३) यक्ष ४) गंधर्व ५) किन्नर ६) चारण, अश्विनी आणि निशाद इत्यादी नावांचा उल्लेख सापडतो.*_

        _*निषाद हे वनातील रहिवासी असून आदिम व असंस्कृत होते. गंधर्व, यक्ष, किन्नर, चारण आणि आश्विनी हे व्यावसायिक वर्ग होते. असुर हे सामान्य नाव असून विशिष्ट जनसमुदायांना दिलेले नाव आहे, या जनसमुदायांना विभिन्न नावांनी ओळखले जायचे. जसे दैत्य, दानव, कलंज, कलेय, कालिन, नाग, निवात, कवच, पुलोम, पिशाच आणि राक्षस, ही सर्व एकाच जनसमुदायाची विभिन्न नावे आहेत.*_

          _आपणास दोन समुदायांतील प्रमुख देवांची नावे माहिती आहेत. उदा. ब्रह्मा, विष्णू, रूद्र, सूर्य, इंद्र, वरुण आणि सोम इत्यादी. *सायणाचार्याच्या भ्रामक लिखाणामुळे बुद्धिमान माणसांनादेखील वरील नावाबद्दल भ्रम पडलेला आहे. लोकांचा यावर विश्वास बसला आहे की, असुर हे मानवसमूहातील नव्हते. तर हे असुर लोक रात्र झाल्यावर आर्यांना त्रास देणारे भूत-पिशाच्च होते. देवांना मात्र नैसर्गिक शक्तीचे प्रतीक म्हणून समजले गेले. आर्यात अशी धारणा सुर आणि आहे की ते गोऱ्या रंगाचे, सरळ नाकाचे व गौर वर्णाचे असून त्यांना याबद्दल अभिमान होता. दस्यू (अनार्य) लोकांबद्दल ही धारणा आहे की, ते येथील आदी निवासी होते. त्यांचा रंग काळा आणि नाक चपटे होते. आर्यांनी भारतावर आक्रमण करून अनार्य लोकांना पराजित केले व त्यांना आपले दास बनविले. दास या अर्थाने पराजितांना दस्यू हे नाव दिले गेले.*_

           _*'दस्यू' हा शब्द दास या शब्दापासून बनलेला असून तो गुलाम या अर्थाने वापरला जातो. या सर्व धारणा चुकीच्या आहेत. असुर आणि सुर, दोघेही आर्य समुदायांतील समान लोक होते. दोघांचा ही पिता 'काश्यप' होता. काश्यप याच्यापासून जन्मलेल्या 'दिती' पासून जे उत्पन्न झाले ते दैत्य व आदितीपासून उत्पन्न झाले ते देव अथवा सुर या नावे प्रसिद्धीला आले. या दोघांमध्ये पृथ्वीवर अधिपत्य स्थापित करण्यासाठी तुंबळे युद्धे झालीत. अशा प्रकारची पौराणिक कथा आहे. निःसंशय पौराणिक कथादेखील एक इतिहासच आहे. ज्याला विकृत करून ब्राह्मणांद्वारे सांगण्यात आले आहे.*_

          _*आर्य कोणत्याही एका प्रजातीचे नाव नाही. तो काही लोकांचा समूह आहे. आर्य संसकृती या नावाची एक विशिष्ट संस्कृती होती. ज्यामध्ये आर्याचे हितसंबंध गुंतलेले होते. जी व्यक्ती आर्यात सामील होण्याची इच्छा ठेवीत असे. तिला आर्य संस्कृती स्वीकारावी लागत असे. आर्यांमध्ये काळ्या रंगाचे, चपट्या नाकाचे असे कोणत्याही प्रकारचे लोक नव्हते. जे आर्याहून स्वरूपात भिन्न होते. वरील धारणा 'वर्ण' आणि 'अनास' या शब्दाचा चुकीचा अर्थ लावला गेल्यामुळे तयार झालेली आहे.*_

         _*'वर्ण' या शब्दाचा अर्थ रंग आणि 'अनास' या शब्दाचा अर्थ 'नाक नसलेला' असा करण्यात आला. हे दोन्हीही अर्थ चुकीचे आहेत. जाती या अर्थाने वर्ण आणि अन् + आस = मुख किंवा आकृतिरहित या अर्थाने अनास असा अर्थ लावला तर आर्य हे रंगाप्रती पूर्वग्रही होते याला कोणताही आधार सापडत नाही. वर्णासंबंधी प्रचलित धारणा ही चुकीच्या कल्पनांवर आधारलेली आहे.*_

           _*दस्यू हे वेगळ्या प्रजातीचे नसून आर्य समुदायातील लोक होते. आयपिक्षा भिन्न संस्कृतीशी यांचा संबंध होता. आर्यांच्या विरोधात्मक धोरणांशी यांचा संबंध असल्यामुळे आर्यांनी यांना वेगळे नाव दिले. म्हणून दास हे वेगळ्या प्रजातीचे नाव होते हे सिद्ध करणे कठीण आहे. असे समजणेदेखील चुकीचे आहे की आर्य आक्रमणकारी लोकांनी शूद्रांवर विजय प्राप्त केला.*_

           _*प्रथम गोष्ट ही की या गोष्टीचा कोणताही पुरावा आढळत नाही की आर्यांनी भारताबाहेरून आक्रमण केले व त्यांनी येथील लोकांनी गुलाम बनविले.*_

         _*या बाबतीत अनेक पुरावे देता येतील की आर्य हे भारतातील मूळनिवासी होते. या बाबीचे कुठलेही प्रमाण नाही की, आर्य आणि दस्यूंमध्ये युद्ध झाले. वस्तुतः दस्यूंचा कुठलाही संबंध नाही.*_

         _*दुसरी महत्त्वाची गोष्ट ही की, या गोष्टीवर विश्वास ठेवणेही शक्य नाही की आर्य लोक हे शक्तिशाली असून त्यांनी अनार्यांना बळाच्या जोरावर अंकित केले. अशी कल्पनादेखील करणे मूर्खपणाचे आहे की, कमजोर अशा आर्य लोकांनी शूद्रांवर विजय प्राप्त केले. दास व आर्य हे एकाच प्रजातीचे लोक असून सांस्कृतिकदृष्ट्या भिन्न होते. दस्यू म्हणजे अनार्य या अर्थाने 'आयपिक्षा वेगळी संस्कृती मानणारे लोक' असा होतो. यांनी आर्यांना विरोध केला. शूद्र हे आर्यांतीलच लोक असून आर्यांच्या जीवनपद्धतीवर यांचा विश्वास होता.*_

       _*कौटिल्याच्या काळापर्यंत शूद्रांना आर्य मानण्याची परंपरा भारतात कायम होती.*_

         _*शूद्र हे आर्य समुदायातील, जन्म-जात, अभिन्न आणि सन्मानित सदस्य होते. या गोष्टीचा उल्लेख यजुर्वेदातील एका श्लोकांत आढळतो.*_

            _*राजाच्या राज्याभिषेकाच्या वेळी शूद्रांनीदेखील ब्राह्मण, वैश्य आणि क्षत्रियाप्रमाणे आमंत्रित केले जात असे. या गोष्टीचा पुरावा महाभारतातील पांडवांचे ज्येष्ठ बंधू युधिष्ठिराच्या राज्याभिषेकाच्या वर्णनाच्या वेळी सिद्ध होते. नीलकंठ नामक प्राचीन विद्वानानुसार एका राजाच्या राज्याभिषेकाच्या वेळी चार प्रमुख मंत्री ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र यांनी राजाचा अभिषेक केला. यानंतर प्रत्येक वर्णातील प्रमुख तसेच लहान जातीतील प्रमुखांनीसुद्धा पवित्र जलाने राजाचा अभिषेक केला. यानंतर द्विजांनी राजाचा नावाचा जयघोष केला.*_

           _*वैदिक युगाच्या नंतर आणि मनुपूर्व काळात जनप्रतिनिधींचा एक वर्ग होता- त्यांना 'रत्नी' असे म्हणत असत. राज्याच्या राज्याभिषेकाच्या वेळी हे विशेष भूमिका करीत असत. यांना रत्नी यासाठी म्हणत; कारण की यांच्याकडे 'रत्न' असे, जे सत्तेचे प्रतीक असत. राजाला तेव्हाच सत्ता प्राप्त होत असे जेव्हा हे रत्नीगण स्वतःजवळील रत्न राजाला बहाल करीत असत. राजत्व प्राप्त झाल्यानंतर राजा प्रत्येक 'रत्नी'च्या घरी जात असे आणि त्याला 'उपहार' (भेट) प्रदान करीत असे. महत्त्वाची गोष्ट ही की शूद्र हादेखील एक रत्नी असे.*_

            _*प्राचीन काळात शूद्र दोन महत्त्वपूर्ण राजकीय संस्थांमध्ये अहम भूमिका निभावीत असत ज्यांना जनपद आणि पौर म्हणत असत. या संस्थांचे अधिकारी शूद्र असल्यामुळे ब्राह्मणांनादेखील शूद्रांना मान देणे भाग पडत असे.*_

       _*हे सत्य निर्विवाद आहे की प्राचीन आर्य समाजात शूद्रांनी उच्च राजकीय प्रतिष्ठा प्राप्त होती. ते राज्याचे मंत्रीसुद्धा बनू शकत. याचे प्रमाण आपणास महाभारतात मिळते._*

             _*महाभारतकार ३७ मंत्र्यांची एक सूची देतो ज्यामध्ये ४ मंत्री ब्राह्मण, ८ मंत्री क्षत्रिय, २१ मंत्री वैश्य आणि ३ मंत्री शूद्र होते आणि १ मंत्री 'सूत' होता.*_

        _*शूद्र केवळ मंत्रीच बनू शकत असे नाही तर राजेसुद्धा बनू शकत.* एखादा शुद्र राजा बनू शकतो किंवा नाही याबद्दल मनूची धारणा शूद्राविषयी ऋग्वेदामध्ये उल्लेखित कथेच्या अगदी विपरीत आहे._

             _*वेदामध्ये वर्णित 'सुदास' हा राजा दिवोदास याचा पुत्र असून तो शूद्र होता, हे वाचून कित्येकांना आश्चर्य वाटेल.* या काळातील ब्राह्मण वसिष्ठ आणि क्षत्रिय विश्वामित्र यांच्यामध्ये राजपुरोहित बनण्यावरून चाललेला वाद प्रसिद्धच आहे._

          _*या वादावरून हे सिद्ध होते की ब्राह्मण अथवा शूद्र, क्षत्रिय एका शूद्र राज्याच्या अधीन कार्य करण्यास कुठलाही कमीपणा मानत नसत; उलट राजाची कृपा प्राप्त करण्यासाठी त्यांच्यामध्ये प्रतिस्पर्धा चालत असे किंबहुना शूद्रांकडे वैदिक कर्म करण्यास ब्राह्मण सदैव तत्पर असत.*_

        _*यानंतरचेदेखील राजे हे शूद्र झालेले नाही असे देखील नाही. परंतु याउलट मनूच्या पूर्वी शूद्र राज्यांची दोन साम्राज्ये होती.' नंदांना जे शूद्र होते इ. पूर्व ४१३ ते ४२२ पर्यंत राज्य केले. यानंतर मौर्यानी इ. पूर्व ३२२ ते १८३ पर्यंत शासन केले हे सुद्धा शूद्रच होते.*_

           _*ऋग्वेदाच्या १० व्या मंडलातील अनेक मंत्रांची रचना कवी 'एलूष' नावाच्या शूद्र ऋषीने केली आहे. पूर्वमीमांसा, कात्यायन श्रौत सूत्र आणि शतपथ ब्राह्मण यामध्ये शूद्रांच्या योग्यतेबद्दल भरपूर पुरावे मिळतात. सुप्रसिद्ध अश्विनीकुमार हा- सुद्धा शूद्रच होता.*_

             _ऋषिगणांद्वारा नीच समजल्या जाणाऱ्या लोकांतील काही सुज्ञ, धनवान आणि बलशाही लोकांना शुद्ध करण्याच्या संस्काराला 'व्रात्यस्तोम' म्हणत. याचे वर्णन 'पंचवीस' ब्राह्मणांमध्ये केले गेले आहे._

           _व्रात्य लोकांना गृहस्थी जीवनात संस्कारित करण्याकरिता वरील संस्कार करण्यात येत असत. आर्य संस्कृतीत संस्कारित झाल्यानंतरच अशा लोकांना गृहस्थी जीवनाची अनुमती ऋषीद्वारा देण्यात येत असे. संस्कारानंतरच या लोकांची सर्व संपत्ती ब्राह्मणांना दान म्हणून वाटण्यास येत असे._

          _संस्कारित लोक ब्राह्मणांच्या बरोबरीचा दर्जा प्राप्त करू शकत. ते चारही वेद वाचू शकत._

         *अशा प्रकारे आर्य लोक आपल्या संस्कृतीमध्ये इतरांना वरील व्रात्यस्तोम संस्काराद्वारे परिवर्तीत करून आर्य संस्कृतीचा फैलाव करीत.*_

            _*असुर आर्यांच्या यज्ञसंस्कृती आणि चातुर्वर्णच्या विरोधी होते. त्यांनादेखील आर्य संस्कृतीत हजारोंच्या संख्येने परिवर्तीत करण्यात येत असे. हिरण्यकश्यपचा मुलगा प्रल्हाद याला अशाच प्रकारे आर्यसंस्कृतीत परिवर्तीत करण्यात आले होते. परंतु शूद्र विरोधी दृष्टिकोन का स्वीकारण्यात आला? त्यांना बहिष्कृत का करण्यात आले?*_

*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_संदर्भ :- कांती आणि प्रतिक्रांती_*

*_लेखक :- डॉ बाबासाहेब आंबेडकर_*

*_संकलन :- महेश कांबळे_*

*_दिनांक :- २२/१२/२०२२_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2022/12/blog-post_57.html

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

ब्राह्मण विरुद्ध क्षत्रिय

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_ब्राह्मण विरुद्ध क्षत्रिय_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

             _हिंदूच्या धर्मग्रंथात ब्राह्मणाविरुद्ध क्षत्रिय यांच्यामध्ये संघर्षाची वर्णने अनेक ठिकाणी मिळतात. स्वतःच्या वर्गाच्या हिताचे रक्षण करण्याकरिता यामध्ये अनेकदा रक्तपातदेखील घडून आलेला आहे. *सर्वप्रथम उल्लेख 'वेण' राजाचा येतो.*_

          _*वेण हा यज्ञकर्माच्या विरुद्ध होता.* वेणापासून ब्राह्मणांना यज्ञकर्मात बाधा येत होती तेव्हा *मारीचा या ऋषीच्या नेतृत्वात सर्व मोठमोठ्या ऋषींनी त्याला पकडून रगडले. त्यातून निषिध याची उत्पत्ती झाली. हाच निषाद वंशाचा प्रवर्तक होता. याच निषादापासून ढिवर लोकांची उत्पत्ती झाली.*_

          _*दुसरे उदाहरण पुरूरवा याचे आहे. हा एक क्षत्रिय राजा होता. हा इतकाचा पुत्र आणि वैवस्वत याचा नातू होता.*_

         _यांचा संघर्ष नहुष आणि ब्राह्मणांमध्ये घडून आला जो काहीसा गंभीर असा होता. *नहुष पुरूरवाचा नातू होता. महाभारतात याचा उल्लेख दोन ठिकाणी आहे. एक वनपर्वात आणि दुसरा उद्योगपर्वात.*_

         _*चौधे उदाहरण निमी राजाचे आहे. निमी हा इश्वाकूच्या पुत्रांपैकी एक होता. ब्राह्मणांसोबत झालेल्या नीमीचे वर्णन विष्णु पूराणात पाहावयास मिळते.*_

        _*पाचवे उदाहरण वसिष्ठ आणि विश्वामित्र यांच्यामधील आहे. वसिष्ट हा ब्राह्मण पुरोहित होता आणि विश्वामित्र एक क्षत्रिय होता. विश्वामित्राची इच्छा ब्रह्मर्षी बनण्याची होती. या संघर्षाचे वर्णन रामायणामध्ये आढळते.* विश्वामित्र आणि वसिष्ठ बनण्याची संघर्ष सुदासच्या काळापासून चालत आलेला होता. सुदास हा इश्वाकू वंशातील होता. वसिष्ठ हा सुदासाचा कुलपुरोहित होता. काही कारणास्तव सुदास याने विश्वामित्राला आपला कुलपुरोहित नियुक्त केले. यावरून विश्वामित्र आणि वसिष्ठ यांच्यामध्ये संघर्ष घडून आला आणि हा संघर्ष दीर्घकाळापर्यंत सुरू राहिला._

            _एक अन्य उदाहरण *अबरीष नावाच्या अयोध्येच्या राजाचे आहे. एक अन्य घटना त्रिशंकू राजाचा पुत्र हरिश्चंद्र याची आहे.*_

             _या कथेची वर्णने *विष्णू पुराणात आणि मार्कन्डेय पुराणात वाचावयास मिळते. जगदग्नी याचा पुत्र परशुराम याचा व क्षत्रियांचा सुप्रसिद्ध संघर्ष आपणांस महाभारतात वाचावयास मिळतो.*_

                _या *परशुरामाने २१ वेळा पृथ्वी क्षत्रियविहीन केली. या क्षत्रियांच्या विधवा स्त्रियांपासून वर्तमान क्षत्रिय उत्पन्न झाले असे शास्त्रात वर्णित करण्यात आले.*_

          _मनू हा क्षत्रिय व ब्राह्मणांमध्ये समेट घडवून आणल्यास उत्सुक होता. एवढा मरणांतक संघर्ष घडून आल्यावरदेखील हे सगळे रहस्यमय वाटते. ब्राह्मणांची अचानक अधोगती, का झाली? *क्षत्रियांना जिंकण्यासाठी 'ब्राह्मणांचा असफल प्रयत्न का पडला? या रहस्याचे कारण काय असावे?"*_

*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_संदर्भ :- कांती आणि प्रतिक्रांती_*

*_लेखक :- डॉ बाबासाहेब आंबेडकर_*

*_संकलन :- महेश कांबळे_*

*_दिनांक :- २२/१२/२०२२_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2022/12/blog-post_22.html

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

Saturday, 17 December 2022

भगवद्गीतेवर निबंध : प्रतिक्रांतीचे धार्मिक समर्थन 'कृष्ण आणि त्याची गीता'

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_भगवद्गीतेवर निबंध : प्रतिक्रांतीचे धार्मिक समर्थन 'कृष्ण आणि त्याची गीता'_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

              _प्राचीन भारतीय साहित्यात गीतेचे कोणते स्थान आहे? ख्रिश्चन धर्माचा बायबल हा जसा धर्मग्रंथ आहे, तसाच तो हिंदू धर्माचा धर्मग्रंथ आहे काय? हिंदू या ग्रंथाला धर्मग्रंथ मानतात. जर 'गीता' हा धर्मग्रंथ आहे तर तो काय शिकवण देतो? कोणत्या सिद्धांतांचे 'गीता' प्रतिपादन करते. या विषयावर विद्वानांत मतभेद आहेत. हे मतभेद पाहता वाचकांस आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाहीत._

_*बोटलिंग्क लिहितो -* गीतेमध्ये उच्च व सुंदर भाव आहेत. पण सोबतच काही विरोधात्मक बाबीसुद्धा आढळतात, ठिकठिकाणी पुनरावृत्ती, अतिशयोक्ती, विसंगती आणि अर्थहीन उदाहरणे आपणास गीतेमध्ये पाहावयास मिळतात._

_*होपकिन्स म्हणतो -* गीता ही महत्त्वपूर्णता व महत्त्वहीनता, तर्कपूर्णता व तर्कहीनता, यामुळे हिंदू साहित्यात एक विलक्षण कृती मानली जाते. आदिम तत्त्वज्ञानाच्या सिद्धांतांची गीता म्हणजे विचित्र समुच्चय (भेसळ) आहे._ 

_पुढे *हॉपकिन्स म्हणतो* एखाद्या काव्यकृतीच्या दृष्टिकोनातून पाहता गीता ही कमजोर रचना आहे. एकाच गोष्टीला वारंवार सांगण्यात आले आहे. शब्द आणि अर्थाच्या विसंगतीची शेकडो उदाहरणे आहेत. सगळ्या बाबी पाहता गीता हे अद्भुत काव्य आहे, हे निरीक्षणाअंती आश्चर्यकारक वाटते._

_*होटजनमैन म्हणतो-* भगवद्गीता ही सर्वेश्वरवादी काव्याचा वैष्णव ग्रंथ आहे._

_*गोर्बे  म्हणतो –* “कृष्ण नावाचा देवता मानवरूप धारण करून श्रोत्यांना उपदेश देतो व हे सागतो की, प्रत्येकाने आपल्या कर्तव्याचे पालन केलेच पाहिजे. गीतेत सर्वेश्वरवाद व ईश्वरवाद एक दुसऱ्यात मिळविण्यात आलेले आहे._

_*श्री. तेलंग यांच्या मते -* "गीतेमध्ये अशी अनेक स्थळे आहेत ज्यांचा एकदुसऱ्याशी योग्य जुळत नाही. याबद्दल कुणीही प्रयत्नदेखील केलेला नाही. गीतेमध्ये जी काही विसंगती पाहावयास मिळते, त्याबद्दल गीतेच्या रचनाकाराला माहिती होती. सत्य गोष्टीबद्दल केवळ अनुमान काढण्यात आलेले आहे. अनेक अर्ध-सत्य बाबींना इतरत्र पेरून ठेवलेले आहे. परंतु या इतस्तः विखुरलेल्या अर्धसत्यांना एकत्र करण्याचा कुणीही प्रयत्नदेखील केलेला नाही._

_*आधुनिक अशा विचारवंतांचे हे विचार आहेत :*_

_जुन्या रूढीवादी पंडितांच्या विचारात गीतेबाबत बरीच तफावत दिसून येते._ 

_(१) एक मत हेसुद्धा आहे की भगवद्गीता हा कुठल्याही विशेष धार्मिक संप्रदायाचा ग्रंथ नसून मोक्षप्राप्तीच समान (एकाच) मार्गांचे प्रतिपादन करतो तो मार्ग आहे :_

           _१) कर्ममार्ग; २) भक्तिमार्ग आणि ३) ज्ञानमार्ग या तीनही मार्गाद्वारे मोक्षप्राप्तीची हमी गीतेद्वारा देण्यात येते. आपल्या मनाच्या समर्थनार्थ ही रूढीवादी मंडळी खालील अध्यायाचा पुरावा म्हणून उल्लेख करतात._

 _*या ग्रंथातील एकूण १८ अध्यायांपैकी*_

१) १ ते ६ मध्ये ज्ञानमार्ग 

२) ७ ते १२ मध्ये कर्ममार्ग आणि

३) १३ ते १८ मध्ये भक्तिमार्गाचा उपदेश करण्यात आला आहे.  

           _रूढीवाद्यांच्या मते वरील तीनही मार्ग मोक्षप्राप्ती करिता आवश्यक आहेत असे गीता प्रतिपादित करते._

       _*रुढीवादी लेखकांच्या श्रेणीमध्ये शंकराचार्य आणि टिळकांचा समावेश होऊन देखील या दोघांची मते परंपरेपेक्षा वेगळी आहेत.*_

_*शंकराचार्यांच्या मते* गीतेमध्ये ज्ञानमार्गाचा उपदेश करण्यात आलेला आहे. आणि मोक्षप्राप्त करीत ज्ञानमार्ग हा एकच योग्य असा मार्ग आहे. गीतेमध्ये अनेक विसंगती आहेत ही बाबच टिळक मानावयास तयार नाहीत. उलट ते या गोष्टीचे खंडन करतात._

        _*मोक्षप्राप्तीचे तीनही मार्ग योग्य आहेत या रूढीवादी पंडितांच्या मतालादेखील मानण्यास टिळक तयार नाहीत. शंकराचार्याच्या मताप्रमाणे टिळकांचेदेखील मत हे की गीता ही एका निश्चित मार्गाची शिकवण देते. टिळकांच्या मते गीता ही ज्ञानमार्गाचा उपदेश देते.*_

            _गीतेमध्ये जे काही सांगण्यात आलेले आहे. त्याबद्दल विद्वानांत इतके मतभेद का आहेत, याबद्दल अनेकांना आश्चर्य वाटते. परंतु कुणीही विचारू शकेल की विद्वानांत इतके मतभेद का आहेत. *या सर्व विद्वानांनी गीतेमध्ये अशा गोष्टीचा शोध लावण्याचा प्रयत्न केला जे खोटे आहे, भ्रामक आहे. हे विद्वान लोक कुराणामध्ये, बायबलमध्ये आणि धर्मपदामध्ये जो धार्मिक उपदेश सांगण्यात आलेला आहे. अशा धार्मिक उपदेशाचा शोधाशोध गीतेमध्ये करतात.*_

              _*असा प्रयत्न करणे व्यर्थ आहे. ईश्वरवाणी नसल्यामुळे गीतेमध्ये कोणताही धार्मिक संदेश नाही आणि असा संदेश शोधणे हेदेखील व्यर्थ आहे. निःसंदेह कुणीही प्रश्न करील की गीता ही जर ईश्वरवाणी नाही तर आहे तरी काय? याला उत्तर हे आहे की भगवत गीता हा धर्मग्रंथही नाही अथवा तत्त्वज्ञानाचा ग्रंथदेखील नाही. जर कुणी व्यक्ती भगवद्गीतेला धर्मग्रंथ किंवा तत्त्वज्ञानाचा ग्रंथ म्हणवून घेत असेल तर स्वतःचीच फसगत करून घेत आहे. वस्तुतः गीता हा धर्मग्रंथही नाही किंवा तत्त्वज्ञानाचा ग्रंथदेखील नाही. या ग्रंथामध्ये प्रतिक्रांतीच्या दार्शनिक तत्त्वज्ञानाचे धार्मिक आधारावर समर्थन करण्यात आलेले आहे.*_

             _*सर्वप्रथम गीतेमध्ये कुठली बाब पाहायला मिळत असेल तर ती म्हणजे युद्धाचे समर्थन होय. युद्धाचे तत्त्वज्ञानाच्या आधारावर, समर्थन दोन तर्क देऊन करण्यात आले आहे. प्रथम हा की, जग हे नश्वर आहे व मनुष्य मृत्युधर्मी आहे. वस्तूचा अंत होणे निश्चित आहे. बुद्धिमान व्यक्तीच्या दृष्टिकोनात ही बाब निरर्थक आहे की, मृत्यू स्वाभाविकपणे होतो की युद्धात हिंसेद्वारे. जे स्वाभाविक असेल, जे नष्ट होणारे आहे त्याबद्दल रडण्यात काय हाशील. मृत्यू अनिवार्य आहे. आत्मा अमर असतो, आत्मा केव्हाही मरत नसतो. इतकेच नव्हे तर याला वायू नष्ट करू शकत नाही. अग्नी याला जाळू शकत नाही. शस्त्र याला कापू शकत नाही. म्हणून हे मानणे निरर्थक आहे की, व्यक्ती मेल्यानंतर शरीराचे काय होते? ज्याप्रमाणे एखादी व्यक्ती नवीन वस्त्र धारण करते, त्याचप्रमाणे आत्मासुद्धा नवीन शरीर धारण करतो. म्हणून स्वाभाविकरीत्या मरणे किंवा युद्धात मरणे यात कुठलाही फरक नाही.*_

              _*आणखी एका सिद्धांताचे प्रतिपादन भगवद्गीतेमध्ये करण्यात आले आहे आणि ते म्हणजे चातुवर्ण्याचे तात्विक समर्थन. निःसंदेह गीतेमध्ये सांगितले आहे की, चातुर्वर्ण्याची निर्मिती ही ईश्वराद्वारे करण्यात आलेली आहे आणि म्हणूनच चातुर्वर्ण्य हे पवित्र आहे. केवळ पवित्र आहे म्हणूनच ती ईश्वरवाणी आहे हे नसून किंबहुना याला तत्त्वज्ञानाच्या आधारावर समर्थन केले गेले आहे. चातुर्वर्ण हे माणसाच्या स्वाभाविक व जन्मजात गुणांवर आधारित ईश्वराद्वारे निर्माण करण्यात आले आहे.*_

            _*भगवद्गीतेचा तिसरा सिद्धांत हा कर्मयोगाला धर्माचे तात्त्विक आधारावर समर्थन देण्याबाबतचा आहे. गीतेनुसार कर्ममार्ग म्हणजे मोक्षप्राप्तीकरिता यज्ञयाग करणे होय. गीतेमध्ये कर्मयोगाचे प्रतिपादन केले गेले आणि कर्मयोगातून अनावश्यकरीत्या बाहेर पडणाऱ्या बाबींचे निराकरण केले गेले आहे. ह्या बाबी कुशलतेने लपविण्यात आल्या आहेत किंवा विकृत तरी केल्या गेल्या आहेत. पहिली बाब आहे अंधश्रद्धा. खरा कर्मयोग हा कर्मकांड करणे होय. आणि यामध्ये कुठलेही चुकीचे आचरण नाही. हाच कर्मयोग म्हणजेच अंधश्रद्धा गीतेद्वारा प्रतिपादण्यात आली आहे.*_ 

         _*दुसरा दोष म्हणजे या कर्मकांडामागे स्वार्थ साधणे हा होय. हा स्वार्थ लपविण्याकरिता भगवद्गीतेमध्ये अनासक्तीयोग अर्थात कर्मफलाची इच्छा न करता कर्म करीत राहणे या सिद्धांताचे होय. या आधारावर कर्मकांड करणे कधीही वाईट होऊ शकत नाही.* अशाच प्रकारे इतर बाबींचा शोधाशोध करणेदेखील आवश्यक आहे. ज्यांचा समावेश पूर्वी गीतेमध्ये नव्हता व त्यानंतर त्यांचे प्रतिक्रांतीचे अधिकारिक पुस्तक ज्याला प्रतिक्रांतीचे बायबल म्हणतो त्या जैमिनीकृत पूर्वमिमांसेचे, प्रतिपादन, गीतेमध्ये करण्यात आलेले आहे. धार्मिक आधारावर समर्थन करून गीतेमध्ये घुसडून देण्यात आलेले आहेत._

         _हा एक शोधप्रबंधाचा विषय आहे. या ठिकाणी मात्र प्राचीन भारतीय साहित्यात गीतेचे स्थान कोणते होते ते निश्चित करणे एवढेच आहे. म्हणूनच मुख्य सिद्धांताची निवड केलेली आहे. या व्याख्येतून दोन प्रश्न निर्माण होतात._

_१) भगवद्गीतेमध्ये ज्या सिद्धांताचे धार्मिक आधारावर समर्थन केले गेले आहे ते कुणाचे आहोत?_

_२) भगवद्गीतेमध्ये या सिद्धांताची समर्थन करण्याची गरज यांना का भासली?_

         _पहिल्या प्रश्नापासून सुरुवात करू. गीतेमध्ये ज्या सिद्धांताचे समर्थन केले गेले आहेत ते प्रतिक्रांतीचे सिद्धांत आहेत. आणि हे सिद्धांत प्रतिक्रांतीचे अधिकारित पुस्तक जैमिनीकृत पूर्वमीमांसामध्ये वर्णित आहेत. या तत्त्वाला स्वीकार करण्यामागे कोणताही संकोच नसावा. अडचण जर कुठली असेल कर्मयोग या शब्दाचा चुकीचा अर्थ स्वीकारण्याची आहे. *भगवद्गीतेचे बहुतेक भाष्यकार कर्मयोग या शब्दाचा अर्थ 'कार्य' आणि 'ज्ञानयोग' शब्दाचा अनुवाद 'ज्ञान' असा करतात. आणि भगवद्गीतेमध्ये सामान्यपणे ज्ञान आणि कर्माच्या फरकांसंबंधी विवेचन केले आहे असाच समज करून घेतात, हा समज फारच चुकीचा आहे. भगवद्गीतेचा उद्देश कर्म आणि ज्ञान सांगणे असा चुकीचा लावण्यात आला आहे. भगवद्गीतेचा उद्देश कर्म आणि ज्ञान यासंबंधित तात्त्विक चर्चा करणे हा नाही. वास्तविक पाहता गीतेचा संबंध सामान्य विषय नसून 'विशेष विषय' हा आहे.*_

          _*गीतेमध्ये सांगितलेला कर्मयोग अथवा कर्माचा संबंध जैमिनीने सांगितलेल्या कर्मकांडाशी आहे आणि ज्ञानयोग किंवा ज्ञानाचा संबंध त्या विद्वानांशी आहे जे बादरायणने ब्रह्मसूत्रांत दिलेले आहे.* गीतेमधील कर्माचा अर्थ कर्म किंवा अकर्म, निवृत्तीवाद किंवा प्रवृत्तीवाद याच्याशी नाही तर सामान्यपणे गीतेतील कर्माचा अर्थ धार्मिक अनुष्ठान किंवा त्याच्या पालनाशी संबंधित आहे. जो कुणी गीता वाचेल त्याला हे निश्चित कळून येईल. *एखाद्या शुद्र गोष्टीच्या वादविवादामध्ये गुंतलेल्या वर्गाच्या स्तराला वर उचलण्याच्या संदर्भात प्रचाराचे साहित्य म्हणून गीता लिहिली गेली आहे.* आभास मात्र असा करण्यात आला की हा ग्रंथ एखाद्या विशेष तत्त्वज्ञानावर आणि त्याच्या अर्थावर सविस्तरपणे लिहिलेला आहे. आणि म्हणूनच कर्म आणि ज्ञान या शब्दांच्या अर्थाचा विस्तार करण्यात आला आणि याचा सामान्य स्वरूपात स्वीकारण्यात आला. देशभक्त भारतीयांनी याचा दोष टिळकांना दिला पाहिजे. या शब्दांचा चुकीचा अर्थ लावल्याने परिणाम असा घडून आला की लोक भ्रमित झाले._ 

           _परिणामतः भगवद्गीता हा एक स्वतंत्र आणि स्वतः एक पूर्ण ग्रंथ आहे. असा विश्वास लोकांनी करून घेतला. परंतु या ग्रंथामध्ये कर्म आणि ज्ञानाचा काडीइतकाही संबंध नाही._

           _*परंतु एखाद्या व्यक्तीने कर्मयोगाचा भगवद्गीतेतील अर्थ स्वीकारायचा म्हटल्यास गीतेमध्ये कर्मयोगाचा आशय जैमिनीद्वारा प्रतिपादित कर्मकांडाशी आहे. याच कर्मकांडांना गीतेद्वारे पुनर्जीवित आणि प्रतिष्ठापित करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.*_

          _आता आपण दुसऱ्या प्रश्नांबाबत विचार करू या. भगवद्गीतेमध्ये प्रतिक्रांतीच्या तत्त्वज्ञानाचे प्रतिपादन का करण्यात आले आहे? याचे उत्तर सरळ आहे. हे *बौद्ध धम्माच्या जबरदस्त प्रभावापासून ब्राह्मणवादाचे रक्षण करण्यासाठीच भगवद्गीतेची रचना करण्यात आली. बुद्धाने अहिंसेचा उपदेश दिला. केवळ उपदेशच दिला नाही तर ब्राह्मणांना सोडून बहुसंख्य समाजाने अहिंसेचा जीवनशैलीच्या स्वरूपात स्वीकार केला. हिंसेबद्दल तत्कालीन समाजात घृणा निर्माण झाली होती. बुद्धाने चातुर्वण्याच्या विरूद्ध उपदेश दिला. बुद्धाने चातुर्वर्ण्याचे खंडन तीव्र शब्दांत केले आहे. बुद्धाच्या शिकवणीने चातुर्वर्ण्याचा डोलाराच उद्ध्वस्त झाला. चातुर्वर्ण्य उलटसुलट रचलेले होते. बुद्धाने लोकांना समजावून सांगितले की चातुर्वर्ण्याच्या आड ब्राह्मणांचे स्वार्थ दडलेले आहे. बुद्धाच्या अशा शिकवणीमुळे चातुर्वर्ण्याचा डोलाराच उद्ध्वस्त झाला.*_

          _बुद्धाच्या या क्रांतिकारी तत्त्वज्ञानाला ब्राह्मणवाद्याचे काय उत्तर होते? हेच की वेद हे अपौरुषेय (ईश्वरनिर्मित) असून त्यांच्याबद्दल कुठलीही शंका घेता येत नाही._

        _*बौद्धकाल हा भारतील सर्वांत प्रबुद्ध व विवेकवादी काळ होता. अशा काळात ब्राह्मणवाद दुराग्रह, कर्मकांड, अविवेक व खोट्या धारणावर आधारित असल्यामुळे त्यांच्या मुळावरच आघात बसला. अहिंसेला बहुजन समाजाने स्वीकारल्यानंतर ब्राह्मणवाद्यांची हिंसा व चातुर्वर्ण्याचा सिद्धांत स्वीकारण्याची बहुजन समाजाला काय गरज? बौद्ध धम्माच्या वाढत्या प्रभावाने जैमिनीचे प्रतिक्रियावादी सिद्धांत मोडकळीस आलेले होते आणि याला धार्मिक तत्त्वांच्या आधारावर समर्थन हवे होते. असे समर्थन भगवद्गीतेद्वारा केले गेले. क्षत्रियांचे कर्तव्य फक्त हत्या करणे या तत्त्वाचे भगवद्गीतेद्वारा धार्मिक आधारावर समर्थन एक मूर्खतापूर्ण गोष्ट आहे. या आधारावर हत्या करणे हे हत्या करणेच नव्हे असे प्रतिपादन आहे. कारण की शरीर नष्ट होते, आत्मा नष्ट होत नाही, या तत्त्वाच्या आधारावर हत्येचे समर्थन कर्माच्या बचावाशी संबंधित आहे.* आज जर कृष्णाला हत्येच्या संदर्भात बचाव पक्षाचा वकील म्हणून न्यायालयात उभे राहण्याचा प्रसंग आला असता तर त्याला पागलखान्यात ठेवावे लागले असते.  हत्येप्रमाणेच गीतेद्वारा चातुर्वर्ण्याचे समर्थन करणेदेखील तितकेच विसंगत आहे. कृष्ण चातुर्वर्ण्याचे समर्थन सांख्यतत्त्वांच्या आधारावर करतो. सांख्यतत्त्वानुसार तीनच गुण असतात. मग चातुर्वर्ण्याचे समर्थन करायचे तरी कसे? भगवद्गीतेचे चातुर्वर्ण्याचे समर्थन करण्याचा जो मूर्खतापूर्व प्रयत्न करण्यात आलेला तो फारच नीच असा आहे. यावर एक क्षणभरमात्र विचार करण्याची गरज नाही. भगवद्गीतेची ही भूमिका क्रांतिकारकांना कितीही धाडसाची वाटली तरी यामध्ये कुठलीही शंका नाही की भगवद्गीतेने प्रतिक्रांती पुनर्जीवन प्रदान केले आणि जर आज जी काही प्रतिक्रांती आपणास पाहावयास मिळते त्याचे मूळ भगवद्गीतेद्वारा या तत्त्वाचे समर्थन धार्मिक आधारावर करण्यात आलेले आहे हे होय. गीताही कुठल्याही प्रकारे वेद आणि शास्त्राच्या विरोधी नाही. उलट या दोघांचेही समर्थन गीता करते. अशाप्रकारे भगवद्गीता आणि जैमिनीचे पूर्वमीमांसा यामध्ये कसल्याही प्रकारचे अंतर नाही. अंतर जर कुठले असेल तर भगवद्गीता ही जोर देऊन दृढतेने प्रतिक्रांतीचे समर्थन करते तर जैमिनीची पूर्वमीमांसा तितकासा जोर प्रतिक्रांतीवर देत नाही. भगवद्गीता वैशिष्ट्यपूर्ण यासाठी आहे कारण की प्रतिक्रांतीला धर्मतत्त्वांचा स्थायी आधार प्राप्त करून देते. जो यापूर्वी कधीही प्राप्त नव्हता. धर्मतत्त्वांचा आधार गीतेने घेतला नसता तर प्रतिक्रांती अस्तित्वातच नसती. चातुर्वर्ण्याचा प्रसार आणि त्याला चिरस्थायित्व प्राप्त करून देणे हाच भगवद्गीतेचा मुख्य विषय आहे. वास्तविक पाहता भगवद्गीतेमध्ये चातुर्वर्ण्याचे समर्थन एक वेडेपणाचे व मूर्खपणाचे कार्य आहे. हा वेडेपणा व मूर्खपणा प्रतिक्रांतिवाद्यांनी धार्मिक आधारावर केला आहे._

           _*भगवद्गीतेचा अध्याय १८, श्लोक ४१ ते ४८ मध्ये कृष्णाने म्हटले आहे की, प्रत्येक व्यक्तीने आपल्या वर्णावर आधारित कर्तव्याप्रमाणे कर्म केले पाहिजे. असे जर त्याने केले नाही तर त्याला मोक्ष प्राप्त होणार नाही. अर्थात शूद्राला मोक्षलाभ पाहिजे असेल तर त्याने उच्च वर्णाच्या व्यक्तीची सेवा केलीच पाहिजे.*_

_१) थोडक्यात शूद्र हा कितीही महान भक्त असला व त्याने शूद्राचे कर्तव्य केले नाही कर्तव्याचे उल्लंघन केले अर्थात त्याने उच्च वर्गाची सेवा करून जीवननिर्वाह केला नाही तर त्याला मोक्ष प्राप्त होऊ शकत नाही._

_२) जैमिनीच्या सिद्धांताला नवीन आधारावर समर्थन प्राप्त करून देणे कमीत कमी त्या तत्त्वांना धर्मतत्त्वांचा आधार प्राप्त करून देणे जे जैमिनीच्या नंतर लिहिण्यात आले._

_३) तीसरे अनुमान आहे की बौद्ध धम्माच्या क्रांतिकारी आणि बुद्धिवादी विचारांचे समर्थन प्राप्त करून दृढ केले. अधिकांश भारतीय विद्वानांचे मत आहे की गीता ही अतिप्राचीन काळातील रचना आहे. परंतु अत्यंत सखोल अशी चौकशी केली असता याची साक्ष पटते की गीतेची रचना जैमिनीची पूर्वमीमांसा आणि बादरायणाच्या ब्रह्मसूत्रानंतरच झालेली आहे._

          _*गीता आणि बौद्ध धम्म दोन्ही एकाच वेळी झालेल्या क्रांतीची अभिव्यक्ती आहेत. ज्या वेळेला बौद्ध धम्माचा प्रभाव ब्राह्मण धर्मावर खूपच वाढला आणि बौद्ध क्रांतीने तत्कालीन समाजव्यवस्थेत आमूलाग्र परिवर्तन घडवून आणले त्यावेळी गीता प्रारंभिक अवस्थेत होती. म्हणूनच गीतेतील सिद्धांताला धार्मिक तत्त्वांच्या आधाराची गरज भासू लागली. गीतेमध्ये जे जे अंग दुर्बल असतील त्या अंगांना बल देण्याचा प्रयत्न करण्यात आला.*_

            _सैद्धांतिकपणे विद्वानांत हीच धारणा आहे की, बौद्ध धम्म हा प्राचीन ब्राह्मणी धर्माचेच एक रूप आहे. भगवद्गीतेवर बौद्ध धम्माचा कुठल्याही प्रकारचा प्रभाव आहे हे मानण्यासच मुळी ही मंडळी तयार नाही. हा दृष्टिकोन टिळक आणि राधाकृष्णन यांचा आहे._

         _जेव्हा जेव्हा बौद्ध धम्मातील सिद्धांतांना गीतेमध्ये समर्थन केलेले आढळते तेव्हा तेव्हा हे विद्वान या गोष्टीला नकार देतात की बौद्ध धम्म आणि गीतेमध्ये बरेचसे साम्य आहे._

      _*गीता आणि बौद्ध धम्माचे तुलनात्मक अध्ययन ज्याने केले आहे त्याला तर फारच धक्का पोचल्याशिवाय राहात नाही; कारण की गीतेमध्ये सांख्यतत्त्वज्ञानच सांगण्यात आले आहे. तेव्हा हे स्पष्टच आहे की गीता ही बौद्ध विचारांनी भरलेली आहे.*_

_ही समानता केवळ विचारांचीच नाही तर भाषेचीदेखील आहे. काही उदाहरणे देऊन हे स्पष्ट करता येऊ शकते._

      _*भगवद्गीतेमध्ये ब्रह्म निर्वाणावर विवेचन केले आहे. एखादी व्यक्ती ब्रह्मण निर्वाणपदाला केव्हा पोचते? याबद्दल गीतेत सांगितलेले आहे :*_

_१) श्रद्धा (स्वतःवर विश्वास )_ 

_२) व्यवसाय (दृढ विश्वास)_

_३) स्मृती (ध्येयप्राप्ती)_

_४) समाधी (एकाग्रता) आणि_ 

_५) प्रज्ञा (अंतर्दृष्टी किंवा ज्ञान)_

           _*आता गीतेमध्ये हा निर्वाण सिद्धांत कुठून (कोणाकडून) आला? निश्चितच हा सिद्धांत उपनिषदांमधून आलेला नाही. कारण की उपनिषदांमध्ये 'निर्वाण' शब्दाचा उल्लेख नाही.*_

           _*गीतेतील ही ब्रह्म निर्वाणाची संपूर्ण विचारसरणी महापरिनिर्वाण सुत्तामध्ये सांगितलेली आहे. आता सांगा, काय हा विचार गीतेने चोरलेला नाही? ही विचारसरणी बौद्ध धम्मापासून चोरून ती लपविण्याचाच प्रयत्न गीतेने केला आहे.*_

        _*दुसरे एका उदाहरणानुसार अध्याय ७, श्लोक १३ ते २० नुसार कृष्णाच्या म्हणण्याप्रमाणे खरा भक्त कोण आहे? तर जो १) मैत्री, २) करुणा (दया), ३) मुदिता व ४) उपेक्षा या चार तत्त्वांचे पालन करतो तो.*_

         _*आता भगवद्गीतेमध्ये खऱ्या भक्ताचे हे गुण कोठून (कुणाकडून) घेतले आहेत? हे गुणसुद्धा बौद्ध धम्मातून उधार घेतलेले आहे. ज्यांना याची खात्री करावयाची असेल त्यांनी बौद्ध धम्माचे 'महापदान सुत्त' व 'तेविज्ज सुत्त' पहावे.*_

          _*सारांश स्वरूपात आपण हे सिद्ध करून म्हणू शकतो की, बौद्ध धम्माच्या सूत्रावरच गीतेची रचना करण्यात आली. जेवढी समानता बौद्ध धम्म आणि गीतेमध्ये आढळते तेवढी इतरत्र कुठेही आढळत नाही. विद्वानांनी बौद्ध धम्माचे हे ऋण मान्य केले पाहिजे. परंतु टिळक व राधाकृष्णन यांनी ही बाब टाळून बुद्धिकौशल्याची चलाखी केलेली आहे.*_

       _*भगवद्गीतेची अवस्था ही ऋण घेणाऱ्या याचकाची असून बौद्ध धम्माची स्थिती ही दान देणाऱ्या दानदात्याची आहे.*_

          _*पिढ्यान्पिढ्या ब्राह्मणांनी बौद्ध धम्माप्रती तिरस्काराची भावना स्वीकारल्यामुळे लोकांचा भ्रामक कल्पनांवर विश्वास बसलेला आहे. परंतु इतिहास मात्र सत्य शोधुन सांगतो की, भगवद्गीतेला जे काही महत्त्व आहे ते केवळ बौद्ध धम्माच्या सिद्धांतामुळे.*_


*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_संदर्भ :- कांती आणि प्रतिक्रांती_*

*_लेखक :- डॉ बाबासाहेब आंबेडकर_*

*_संकलन :- महेश कांबळे_*

*_दिनांक :- १९/१२/२०२२_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2022/12/blog-post_17.html

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

Friday, 16 December 2022

भग्ग, भगवा आणि भगवान

 भग्ग, भगवा, भगवान..


"भगवान" हा शब्द भारतीय संस्कृतीत एक प्रचंड रुजलेला शब्द आहे. देव, सर्वशक्तिशाली, परमेश्वर, दाता, परमात्मा....ही या भगवान शब्दाची काही पर्यायवाची नावे आहेत. मात्र या अर्थाने हा शब्द खूप नंतरच्या काळात वापरलेला दिसतो. वेद किंवा उपनिषद मध्ये देखील हा शब्द येत नाही. नंतरच्या काही वैदिक साहित्यात हा शब्द आढळतो. भक्ती संप्रदायात अनेक 'देवांना' हा शब्द किंवा उपाधी लावण्यात आली आहे. मात्र या शब्दाची उत्पत्ती नेमकी कधी आणि केव्हा झाली?


भगवा अथवा भगवान हा शब्द सर्वात पहिल्यांदा आपल्याला पालि त्रिपिटकात वाचायला मिळतो. बुद्धांचा उल्लेख करताना त्यांना "बुद्ध" या नावाने उल्लेख करण्याऐवजी "भगवा" हा शब्द अनेक वेळा आदरार्थ्याने  उच्चरलेला दिसतो. उदा. एकं समयं भगवा वाराणसीयं  विहरती...भगवा हा शब्द मूळ "भग्ग" या शब्दापासून तयार झाला आहे. भग्ग या शब्दाचा संस्कृत मध्ये "भंज" हा पर्यायवाची आहे. पालि भाषेत या शब्दाची फोड अशी होते - भग + वान. भग म्हणजे नष्ट किंवा विध्वंस आणि वान म्हणजे आपल्या मनातील षड्रिपू अथवा वासना. म्हणजेच "भगवान" या शब्दाचा अर्थ "ज्याने आपल्या मनातील सर्व विकार / वासना नष्ट केले आहेत अशी व्यक्ती. याचे अनेक संदर्भ आपल्याला पालि त्रिपिटकात दिसून येतात. "भग्ग रागो, भग्ग दोसो किंवा सब्बा ते फासुका भग्गा किंवा भग्गा पाप्पका धम्मा...


भारतीय तत्त्वज्ञानाच्या इतिहासात खऱ्या अर्थाने केवळ दोनच भगवान झाले आहेत - भगवान बुद्ध आणि भगवान महावीर. (इतर "भगवानांनी" त्यांच्या मनातील षड्रिपू नष्ट केले कि नाही हे माहीत नाही किंवा सध्यातरी तसा पुरावा उपलब्ध नाही.) 


भ. बुद्धांच्या काळी भिक्खूंना केवळ लोकांनी टाकून दिलेले वस्त्र घालण्याची प्रथा होती. म्हणजे प्रेतावरील वस्त्र किंवा उपयोगात नाही म्हणून टाकून दिलेले वस्त्र. अशी वस्त्रे गोळा करून त्यांचा अनावश्यक भाग कापून टाकला जाई, नंतर ती वस्त्र स्वछ धुवून त्यांना अनेक विरक्त रंगांनी रंगविले जाई. एकदा भात शेती पाहताना व त्यातील आखीव रेखीव पीक व शेतांमधील पायवाट पाहून, भ. बुद्धांनी, भन्ते आनंदाला अशा प्रकारचे 'चीवर' बनवायला सांगितले. याच कापडाला एक विशिष्ट रंग देण्यात आला जो त्याग, परिश्रम व विरक्तीचे प्रतीक होता. हा रंग मनातील वासनांना नष्ट करणाऱ्या शौर्याचा प्रतीक बनला. हाच रंग "भगवा" म्हणून अस्तित्वात आला. मनातील शत्रूंना पराभव करणाऱ्याचा जसा तो रंग होता तसाच तो बाह्य जगातील शत्रूंना नेस्तनाबूत करणाऱ्यांचा देखील विजयी रंग ठरला. 


आपल्या तिरंगातील रंगांबद्दल अनेक विचारवंतांनी गौरवोद्गार काढले आहेत. या बद्दल सांगताना तत्कालीन उपराष्ट्रपती सर्वेपल्ली राधाकृष्णन म्हणतात " Saffron किंवा भगवा हा त्यागाचे प्रतीक आहे. सर्व राज्यकर्त्यांनी त्याग वृत्ती ठेवली तरच राष्ट्राची प्रगती होऊ शकेल" Ref - Constituent Assembly Debates 


भग्ग, भगवा आणि भगवान हे बौद्ध संस्कृतीची देन आहे.


अतुल भोसेकर

९५४५२७७४१०

Thursday, 15 December 2022

शून्यागार और पगोडा

 🌷शून्यागार और पगोडा 🌷


जहां शुद्ध धरम जागता है वहां की धरती तपने लगती है। धरम की शुद्ध तरंगों से ही धरती तपती है। सारा वातावरण तपता है। यह तपोभूमि न जाने कितने युगों में, कितनी सदियों में धरम के तप से तपी है। तभी यहां शुद्ध धरम जागने का, अनेक लोगों के कल्याण का अवसर प्राप्त हुआ है।

जिस धरती पर तापस तपते हैं, जहां सिवाय धरम-तप के और कोई प्रवृति नहीं होती, वहां चित कैसे राग से विमुक्त हो, द्वेष से विमुक्त हो, मोह से विमुक्त हो। इसका सक्रिय अभ्यास ही किया जाता है। इसका भी केवल चिंतन-मनन नहीं, सक्रिय अभ्यास होता है। अंतर्मन की गहराइयों तक कैसे संवर कर लें। नया राग जगने ही न पाये, नया द्वेष जगने ही न पाये, नया मोह जगने ही न पाये। और जो संग्रहीत है वह कैसे शनै: शनै: दूर होता चला जाय। धीरे-धीरे उसकी निर्जरा होती चली जाय, छूटता चला जाय, उसका क्षय होता चला जाय।

जिस धरती पर धरम का यह शुद्ध अभ्यास निरंतर होता रहता है. वह धरती खूब तपने लगती है। सारा वातावरण तरंगों से आप्लावित हो उठता है, तरंगित हो उठता है। अधिक लोक-कल्याण होने लगता है। ऐसी तपोभूमि में आकर जब कोई व्यक्ति थोड़ा भी प्रयास करता है तो अधिक सफलता प्राप्त होती है।

इस धरती पर अब भी लोग तप रहे हैं। भविष्य में जब यहां शून्यागार बन जायेंगे तो और अधिक लोग तपेंगे। आज भी लोगों का कल्याण होता है, शून्यागार में तपेंगे तब और अधिक कल्याण होगा। साधना के रास्ते, आगे बढ़ने के लिए एक तो अपनी मेहनत आवश्यक है, अपना परिश्रम आवश्यक है। बिना परिश्रम किये कोई उपलब्धि नहीं होती। दूसरे साधना की विधि निर्मल हो, स्वच्छ हो तो लाभ होता है। साधना की विधि निर्मल न हो तो बहुत मेहनत करने पर भी जो लाभ मिलना चाहिए वह नहीं मिलता। उचित मार्गदर्शक हो तो लाभ होता है। क्योंकि साधक गलत तरीके से काम नहीं करता। अच्छे मार्ग निर्देशन में जैसे काम करना चाहिए वैसे काम करता है। एक बात और जो बहुत आवश्यक है, वह है उचित वातावरण हो, उचित स्थान हो। हर कहीं ध्यान करने से वह लाभ नहीं प्राप्त होगा जितना लाभ किसी तपी हुई भूमि पर ध्यान करने से होता है।

अभी पिछले दिनों, साधकों की एक मंडली भारत के वैसे स्थानों पर होकर आयी जहां संत तपे, अरहंत तपे। तभी इतने लंबे अरसे के बाद भी साधक महसूस करता है कि कितनी प्रेरणादायी तरंगें वहां आज भी कायम हैं। तो भूमि का अपना बहुत बड़ा महत्व होता है।

यह भूमि बहुत मंगलमयी है! तभी शुद्ध धरम का अभ्यास यहाँ आरंभ हुआ और आगे जा कर और अधिक लोग यहां तपेंगे। शून्यागार का अपना महत्व है। भगवान ने कहा, जब कोई व्यक्ति अकेला तपता है तो जैसे ब्रह्मा तप रहा हो! जहां दो साथ बैठ कर तपते हो तो जैसे दो देवता तप रहे हों। तीन बैठकर साथ तप रहे हो तो जैसे कोई तपस्वी मनुष्य तप रहे हैं। इससे अधिक एक साथ बैठकर तप रहे हों तो कोलाहल होता है। यानी उन गहराइयों तक तप नहीं होता। सामूहिक साधना का अपना महत्व होता है। शून्यागार का अलग महत्व है। शून्यागार माने ऐसा स्थान, ऐसा कमरा, ऐसी कुटी जिसमें अपने सिवाय कोई और नहीं। शून्य ही शून्य है। अकेला व्यक्ति एकांत ध्यान कर सके। बहुत आवश्यक है। बड़ा लाभ भी होता है। ब्रह्मदेश में जो ध्यान का केंद्र है, वहां जो शून्यागार हैं उनमें जो तपस्वी तपते हैं, उनकी तरंगें किस प्रकार धर्म से भरपूर हैं। साधक हो तो उसकी महत्ता को समझ सकता है। वहां बैठ करके ध्यान करे तो कितना अंतर। ठीक उसी प्रकार इगतपुरी में शून्यागार बने तो लोग उसमें ध्यान करते हैं तो कितना बड़ा अंतर मालूम होता है।

🌷शून्यागार का अपना महत्व, बहुत बड़ा महत्व है।

सुञ्आगारं पविट्टस्स, सन्तचित्तस्स भिक्खुनो। 

अमानुसी रति होति, सम्मा धम्मं विपस्सतो॥

“सम्मा धम्मं विपस्सतो” - सम्यक प्रकार से विपश्यना करता है। कहां करता है - " सुञ्आगारं पविट्ठस्स" - किसी शून्यागार में प्रवेश करके, शुद्ध धरम की विपश्यना करता हो तो शांतचित हो जाता है साधक। और "अमानुसी रति होति"- भीतर ऐसा आनंद, ऐसा रस प्राप्त होता है कि हम मनुष्यों को सामान्यतया अपने ऐन्द्रिय अनुभूति से होने वाले सुखों से उसका कोई मुकाबला नहीं, उसकी कोई तुलना नहीं। उससे बहुत परे है, बहुत परे है। दिव्य अनुभूति होती है, ब्राह्मी अनुभूति होती है और उससे भी परे निर्वाणिक अनुभूति होती है। क्युकि एकांत साधना कर रहा है। कहीं कोई व्यवधान नहीं है, बाधायें नहीं हैं।

तो बड़े कल्याण की बात होगी। इस तपोभूमि में भी ऐसे शून्यागार निर्मित होंगे। जहां साधक अपनी साधना द्वारा धर्म की गहरइयो तक जा सकेगा, अन्तेर्मन कि गहरइयो तक जो गाँठे बांध रखी है उन्हें खोल सकेगा। किसी एक व्यक्ति का भी कल्याण हो जायगा और कल्याण तो जो-जो तपेगा सबका ही होने वाला है।

👇


सन्मार्ग के रास्ते पड़ा हुआ, धर्म के रास्ते पड़ा हुआ एक व्यक्ति है, लेकिन अभी तक उसको निर्वाण का साक्षात्कार नहीं हुआ। उसके मुकाबले एक व्यक्ति जिसको निर्वाण का साक्षात्कार हो गया, उसे एक दिन का भोजन देते हैं तो वह ज्यादा पुण्यशाली है। क्योंकि उस व्यक्ति को हमने यदि एक दिन का जीवन दिया तो एक दिन अधिक जी करके वह केवल अपना ही कल्याण नहीं कर रहा बल्कि हर सांस के साथ अब वह जो तरंगें पैदा करता है, हर क्षण जो तरंगों से भरती हैं। वह न जाने कितने लोगों के कल्याण का कारण बन जायेगा। 


इसीलिए कहा कि इतने लोगों को जो मैंने दान दिया उसके मुकाबले एक श्रोतापन्न को दिया गया भोजन दान कही अधिक कल्याणकारी होता है, कहीं अधिक पुण्यशाली होता है। 

अनेक श्रोतापन को भोजन दिया उसके मुकाबले अगर एक सक्दागामी को भोजन दे दिया, वह कही अधिक कल्याणकारी होगा, कही अधिक फलशाली होगा । अनेक सक्दागामी को भोजन दिया उसके मुकाबले एक अनागामी को भोजन दे दिया । वह कही अधिक कल्याणकारी हो गया! अनेक अनागामी को भोजन दान दिया, उसके मुकाबले एक अरहंत को भोजन दान दे दिया, वह उससे भी अधिक कल्याणकारी हो गया! अनेक अरहंतों को भोजन दिया और एक सम्यक संबुद्ध को भोजन दे दिया, वह कहीं अधिक कल्याणकारी हो गया। किसी सम्यक संबुद्ध को भोजन दे और तपने वाले संघ को भोजन दे तो सम्यक संबुद्ध को दिये हुए भोजन से भी ज्यादा कल्याणकारी हो गया !


और उसके बाद कहा कि कितने ही बड़े तपने वाले संघ को भोजन दे करके, कितना ही बड़ा पुण्य अर्जित क्यों न कर ले, उसके मुकाबले साधना करने वालो के लिय कोई सुविधा बना दी, कोई शून्यागार बना दिया, जिसमें बैठ करके कोई व्यक्ति अपनी मुक्ति का रास्ता खोज सकता हो तो उन सारे पुण्यों से भी अधिक ऊंचा पुण्य है, अधिक कल्याणकारी है। 


अब तक जो काम हुए वे निरर्थक हुए ऐसा नहीं कहते, पर शून्यागार बनाने का जो भी श्रम कर रहे हैं वह अधिक कल्याणकारी है। एक-एक व्यक्ति अलग-थलग रहे। उसका निवास भी अलग हो और उसके ध्यान का जो स्थान ही वह भी अलग हो तो साधक की जो प्रगति होती है वह कई गुना अधिक होती है। बहुत अच्छी बात कि इस तपोभूमि में शून्यागार बनने का काम शुरू हुआ। इस धरती का सम्मान करते हैं। अपने यहां एक परंपरा है- भूमिपूजन होता है। शुद्ध धरम के रास्ते क्या भूमिपूजन होता है -भूमि का सम्मान इसी तरह किया जाता है कि तपते हैं उस भूमि पर बैठकर । तप करके जो शुद्ध तरंगें पैदा करेंगे, इससे बढ़कर कोई धरती सम्मानित नही हो सकती, पूजित नही हो सकती । तो इसीलिए यहाँ तपे, तप करके भूमि का सम्मान किया। अधिक से अधिक धरम की तरंगें इस भूमि पर स्थापित हों, इस वातावरण में स्थापित हों ताकि अधिक से अधिक लोगों का कल्याण हो, यही भूमिपूजन है। यही भूमि का सम्मान है। 


जो भी साधक अब तक यहाँ तपते रहे है, अपना मैल उतारते रहे हैं, जिसका थोड़ा भी मैल उतर जाता है मन में मंगल-मैत्री जागती ही है कि जैसे मेरा कल्याण हुआ, जैसी सुख-शांति मुझे मिली, थोड़ी-सी ही मिली, ऐसी सुख-शांति, अधिक से अधिक लोगों को मिले। अधिक से अधिक लोगों के करम-बंधन टूटें। अधिक से अधिक लोगों को मुक्ति का रास्ता मिले। ऐसा मंगलभाव मन में जागता है, कि मैं उसमें कैसे सहायक हो सकूं ! 

अनेक प्रकार से सहायक हो सकता है - जिसके पास जो शक्ति है. उस शक्ति के बल पर सहायक हो सकता है। शरीर की सेवा करके सहायक हो सकता है। वाणी द्वारा सहायक हो सकता है। किसी के पास धन है, धन द्वारा सहायक हो सकता है। पर उन सबसे बढ़कर एक बहुत बड़ी सहायता होती है, तपकर सहायक होता है।


पुराना साधक इस धरती पर जितना तपेगा उतना ही अनेक लोगों के मंगल का कारण बनेगा। गुरुदेव के जीवनकाल में देखते थे – कि अनेक लोग ऐसे जो निर्वाणीक अवस्था तक पहुचे हुये और उस अवस्था तक जो पहुँचता है वह जब जी चाहे, जितने समय के लिए जी चाहे, निवृणिक अवस्था की अनुभूति करता है। ऋण से मुक्त होना है तो कैसे हो सकते हो? और लोग अपनी ओर से शरीर-श्रम का दान दे करके, धन का दान दे करके, अन्य प्रकार से सहायता करके, अपने-अपने ऋण से मुक्त होने का प्रयत्न करेंगे। लेकिन इतने अच्छे तापस के लिए तो यही उचित है कि कम से कम समाह में एक बार यहां आ जाया करो और किसी शून्यागार में बैठ करके एक घंटे की निर्वाणक समाधि लेकर चले जाया करो। बस, हो गया! कितनी बड़ी सेवा हो गयी। सारा का सारा आश्रम उन धरम कि तरंगो से इतना अल्पवित हो उठेगा ! तो जो भी साधक जिस-जिस अवस्था तक पहुँचा है, जितना भी तपा है उतनी तरंगें पैदा करेगा ही।


शुन्यगार बना कर लोगों को उसमे जो तपने की सहूलियत दे रहे हैं, यह तो अपने आपमें बहुत पुण्य की बात है ही, पर उससे कही बड़े पुण्य कि बात यह होगी कि, हर साधक सप्ताह में एक बार यहां आकर के तपेंगे। यह अपने तप का दान है। अपने तप की तरंगों का दान है। वह इस धरती को खूब अधिक पकायेगा.

खूब अधिक तपायेगा। जिससे कि जो भी व्यक्ति आये वह थोड़े ही श्रम से अधिक प्राप्त कर सके। अपने विकारों से युद्ध करने की मेहनत तो हर व्यक्ति को करनी पड़ेगी। लेकिन आसपास का वातावरण धर्म कि तरंगो से तरंगित है तो मेहनत आसान हो जायगी। बाहर की तरंगें अगर दृषित हैं तो बाधायें अधिक आयेंगी। भीतर की तरंगों से यानी अपने विकारों से भी लड़ रहा है और बाहर कि तरंगे भी ऐसी है जो पाँव खीचने वाली है, तो काम नही करने देती। उससे बचाव हो जायगा। बहुत बड़ा बल मिलता है, बहुत बड़ी सहायता मिलती है।


साधकों को चाहिए कि अपने भीतर मंगल मैत्री जगायें। अपना कल्याण तो है ही। जब आकर तपेंगे तब अपना कल्याण तो है ही । लेकिन उस तपने से और न जाने कितनो का कल्याण होगा। सदियों तक कल्याण होने वाला है। जहां धरम की तरंगे जगने लगी तो लोग अपने आप खीचते हुये चले आयेगे । इस स्थान पर धर्म अपने शुद्ध रूप में जितनी सदियों तक रहेगा, उतनी सदियों तक न जाने कितने लोग आयेगे, तपेंगे , अपना अपना कल्याण करेंगे। 


इस समय जो भी तप रहे हैं, भविष्य में आकर जो भी तपेंगे उन सब का मंगल हो ! उन सब का कल्याण हो ! मुक्ति हो, उन सब की स्वस्ति मुक्ति हो! 


कल्याण मित्र, 

स.ना.गोयंका


🟠🟠🟠👆👆🟠🟠🟠

हिंदू समाजाचे आचार विचार

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_हिंदू समाजाचे आचार विचार_*

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

              _हिंदूंचे आचारविचार आणि धार्मिक सिद्धांत स्मृतीवर आधारित आहेत. या स्मृतीची गणना हिंदूच्या पवित्र धार्मिक साहित्यात केली जाते. जर *आपणास हिंदूंचे नैतिक आणि धर्मविषयक विचार माहीत करून घ्यावयाचे झाल्यास, या स्मृतींचे अध्ययन करणे आवश्यक आहे. अशा स्मृतींची संख्यादेखील कमी नाही. साधारणतः स्मृतींची संख्या १०८ मानण्यात येते.* स्मृतींची ही मोठी संख्या मात्र आपणास अडचण ठरू शकणार नाही. जरी या स्मृती वेगवेगळ्या आल्या तरी त्या एकमेकांपासून मूलतः भिन्न नाहीत. या सर्वांमध्ये इतकी समानता आढळून येते की यांचे वाचन करताना बहतेक वाचकांना कंटाळा आल्याशिवाय राहात नाही. *या सर्वांचे मूळमात्र एकच आहे. तो आहे 'मनुस्मृती' जी 'मानव धर्मशास्त्र' या नावानेदेखील ओळखली जाते.. सर्वं स्मृतींची पुनरावृत्ती मनुस्मृतीपासूनच गेली आहे. सर्व स्मृतींचे मूळ मनुस्मृती यात असल्याकारणाने हिंदूंचे नैतिक आचारविचार आणि धार्मिक संकल्पना जाणून घेण्यासाठी मनुस्मृतीचे अध्ययन करणे आवश्यक आहे. मनुस्मृती ही कायद्याची संहिता आहे.* हीच गोष्ट इतर स्मृतिनादेखील लागू आहे. हे नीतिशास्त्रही नाही किंवा धार्मिक ग्रंथदेखील नाही. *नियमांच्या कुठल्याही संहितेला नीतिविषयक आणि धार्मिक शिकवणुकीचा ग्रंथ समजणे म्हणजे नीतिशास्त्र, धर्म आणि कायदा यात गफलत निर्माण करणे होय.*_
              _धर्माला कायद्यापासून वेगळे करणे हे आधुनिक समाजाचे कृत्य आहे. *प्राचीन काळात कायदा आणि धर्म एकच होते. हे प्रो. मॅक्समुल्लर आणि सर हेन्री मेन्स यांनी पटवून दिलेले आहे.* प्राचीन काळात दैवीशक्तीच्या रूपात धर्म हा जीवनाच्या प्रत्येक अंगाशी आणि सामाजिक संस्थाशी जोडलेला असे. *सर हेन्री मेन्सच्या मते, धर्म ही एक अलौकिक सत्ता असून तिचा उद्देश प्रमुख संस्था, राज्य, जाती आणि परिवार इत्यादींची पवित्रता कायम ठेवून परस्परांना जोडणे हे असे.*_
                _धर्माला कायद्याच्या स्थानापासून वेगळे करणे कित्येक शतके संभव न झाल्यामुळे धर्माचे स्थान अढळ राहिले. पुढील काळात मात्र हे शक्य झाले. परंतु आतादेखील याची चिन्हे आजतागायत दिसत असल्यामुळे मानव इतिहासाच्या सुरुवातीला धर्माचे केवढे मोठे प्राबल्य होते हे दिसून येते._
             _आधुनिक युगात धर्म आणि नैतिकतेमध्ये भेद केला गेला. धर्म आणि नैतिकतेचा एकमेकांशी इतका जवळचा घनिष्ठ संबंध आहे की त्यांना वेगळे करणे जवळपास अशक्यप्राय आहे. सदाचार आणि नैतिकता हे व्यवहाराचे विषय आहे. *प्रो. जॅक्सनने जोर देऊन सांगितले आहे की नैतिकता ही लोकांना माहीतच पाहिजे असे नाही तर लोकांनी चांगले राहावे हा नैतिकतेचा मूळहेतू आहे. एवढेच नव्हे तर योग्य आहे त्याला वैज्ञानिकता आधार देऊन जीवनात अनुकरण करण्यायोग्य बनवावे.*_    
                _जोपर्यंत या नैतिकतेत सदाचाराच्या पालनाला एखाद्या प्रेरक शक्तीची जोड असत नाहीत तोपर्यंत सदाचार निष्क्रिय ठरतो. म्हणून सदाचाराची प्रेरक शक्ती ही धर्मात निहित असते. धर्म हीच खरीखुरी शक्ती असते._
              _*प्रो. जॅक्सच्या मते “यातून आपणास प्रेरणा मिळते. या प्रेरणेमुळेच आपण जीवन जगण्यास प्रवृत्त होतो. जीवनात येणाऱ्या मोठमोठ्या बाधादेखील आपणास या प्रेरणामुळेच पार करू शकतो. या प्रेरणा दिसावयास साधारण जरी असल्या तरी याद्वारे नैतिक सदाचाराच्या मार्गावर मनुष्य सदैव मार्गक्रमण करीत जातो. कधी ही प्रेरणा निषेज्ञांच्या स्वरूपात असते तर ती कधी पवित्र नियमांच्या स्वरुपात असते. यांचे अनुसरण लोक श्रद्धेने करतात. परंतु ही सगळी वेगवेगळी रूपे आहेत. ज्याद्वारे धर्मरूपी प्रेरक शक्तीद्वारा सदाचारांच्या नियमांच्या पालनांची भावना लोकांमध्ये वसत असते. धर्म ही ऊर्जा आहे. जी सदाचाराच्या चक्राला नियंत्रित करीत असते.*_
              _सदाचार आणि नैतिकता जर कर्तव्य असतील तर निःसंदेह मनुस्मृती हा नीतिशास्त्राच ग्रंथ आहे. जो कुणी मनुस्मृती वाचण्याचे कष्ट घेईल त्याला हे निश्चितच आढळून येईल की या ग्रंथामध्ये मुख्य विषय जर कुठला असेल तर तो कर्तव्याबाबत आहे._
               _'मनू' हा सर्वप्रथम अशी व्यक्ती होती जिने या कर्तव्यांना आणि नियमांना व्यवस्थित व संहिताबद्ध केले. हे नियम पालन करणे हिंदूंना बंधनकारक करण्यात आले. मनू हा वर्णाश्रम धर्म आणि साधारण धर्म यात भेद करतो. वर्णाश्रम धर्मामध्ये समाविष्ट कर्म हे जीवनाच्या विशिष्ट अवस्थांशी संबंधित आहेत. यातील निर्णय है त्या जातीपुरते किंवा वर्णापुरते मर्यादित आहेत तर साधारण नियम हे मनुष्य असल्या कारणाने आचरण करावयाचे आहेत. या संपूर्ण ग्रंथात कर्तव्याशिवाय काहीही सांगितलेले नाही._
           _अशाप्रकारे मनुस्मृती ही कायद्याची संहिता आहे; कारण यामध्ये धर्म आणि सदाचाराला जोडण्यात आलेले आहे. हा आचारशास्त्राचा ग्रंथ आहे; कारण की यात मनुष्याच्या कर्तव्याचा समावेश केला गेला आहे. *मनुस्मृती हा धर्मग्रंथ आहे; कारण की यात हिंदूंच्या धर्मरूपी जीवनाचा आत्मा असलेल्या जातीचे वर्णन केले गेले आहे. या नियमाचे उल्लंघन केले गेल्यास दंडाचे प्रावधान असल्याने मनुस्मृती ही कायद्याची संहिता आहे. या सर्व बाबी लक्षात घेतल्यास हिंदूंच्या आचारविचारांच्या आदर्शाना आणि त्यांच्या धार्मिक संकल्पना माहीत करावयाचे असल्यास मनुस्मृतींचा सहारा घेणे आवश्यक ठरते. मनुस्मृतीला धर्मग्रंथ मानणे हे फारच विसंगत वाटते; कारण हे आहे की हिंदू धर्म हाच मुळी भ्रामक आहे.* अनेक लेखकांनी याची व्याख्या वेगवेगळ्या प्रकारे केली आहे._
          _*सर डी. इबटसन हिंदू धर्माच्या व्याख्या पुढीलप्रमाणे करतो "ब्राह्मणांद्वारे पौरोहित्य संपन्न केला गेलेला वंशानुगत धर्म ज्यात जातींचा समावेश होतो. जाती ही भारतात जन्मलेल्या प्रत्येक व्यक्तीला धर्माच्या स्वरूपात जीवनाच्या विविध अंगांशी जोडलेली असते जे ख्रिश्चन, इस्लाम आणि बौद्ध वेगळेपणा दर्शवीत असते. हा धर्म शीख आणि जैन धर्मापासूनदेखील वेगळा आहे. "*_
          _*सर जे. ए. बेन्सनुसार लोकांची एक प्रचंड संख्या जी न बौद्ध आहे न शीख आहे, न इस्लाम न पारसी कि न हिंदू वा ख्रिश्चन आहे.*_
          _*सर एडवड गैटनुसार : मतमतांतराचा एक असा समुच्चय ज्यात एकेश्वरवाद, बहुदेववाद, सर्वेश्वरवाद, महादेव, शिव, विष्णू, दुर्गा, लक्ष्मी आणि वृक्ष, दगड तसेच नद्या इत्यादीच्या पूजनाचा समावेश होतो. यात लोक वरील वस्तूंना बळी देऊन संपुष्ट करतात. धर्माच्या नावावर हे लोक जपजाप्य करतात.*_
             _*हिंदू धर्माच्या धार्मिक स्वरूपाबद्दल सर अल्फ्रेड लायल म्हणतो, “हिंदू धर्म हा खोट्या अंधश्रद्धा, आचारविचार उपासना पद्धती, रूढी, परंपरा आणि पौराणिक कथांचा समावेश असलेल्या गुंतागुंतीचा समुच्चय आहे. यांना ब्राह्मणांची मान्यता असून याचा प्रचारदेखील ब्राह्मण करतात.*_
           _*श्री सेननुसार एखादी व्यक्ती तेव्हाच हिंदू म्हणून गणली जाते जेव्हा ती एखाद्या जातीत जन्म घेतो. प्रत्येक हिंदू हा जातीवर विश्वास करतो आणि गर्व करतो.*_
          _*प्रो. मॅक्युमुल्लरनुसार : आधुनिक हिंदू धर्म हा जातीवर आधारित आहे. एखाद्या पाषाणावर तो आधारित असून ज्याला कुणीही हलवू शकत नाही.*_
           _यांचे तात्पर्य हे आहे की जर मनुस्मृतीने जातीच्या सिद्धांतांना निर्धारित केले आणि हिंदू धर्माच्या मुळाशी जाती आहेत तेव्हा मनुस्मृतीला धर्मग्रंथ म्हणून स्वीकारणे आवश्यक ठरते._
_३.११० ब्राह्मणांच्या घरी येणारा क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र, परिचित, मित्र आणि गुरु 'अतिथि' अर्थात पाहूणे म्हणविले जाणार नाही._
_३. १११ जर क्षत्रिय ब्राह्मणाच्या घरी पाहुणा म्हणून गेला तर प्रथम ब्राह्मण भोजन करेल तद्नंतर क्षत्रिय भोजन करेल._
_३.११२ ब्राह्मणांच्या घरी वैश्य किंवा शूद्र पाहुणा बनून आल्यास त्यांना नोकरासमान वागवावे._
            _एका वर्णाची स्थिती दुसऱ्या वर्णाच्या तुलनेत कशी असेल याबाबत समीकरण मनूने मांडलेले आहे ते तर फारच रोचक आहे._
_२.१३५ विद्यार्थी ब्राह्मणांना मग तो दहा वर्षांचा जरी असेल आणि क्षत्रिय हा जर शंभर वर्षांचा असला तरी पिता आणि पुत्र समजावा. यातही युवक ब्राह्मणाला वडिलासमान आदर द्यावा._
_२.१३९ जर एखादा असा प्रसंग उद्भवला का राजकुमार आणि ब्राह्मण स्नातक एकसाथ स्वगृही परत येत असतील तर राजकुमाराच्या तुलनेत ब्राह्मण स्नातकाला अधिक सन्मान द्यावा._
_३.१०० पृथ्वीवर जे काही आहे ते सर्व ब्राह्मणांचे आहे. अर्थात ब्राह्मणांचा जन्म उच्च कुळात झाला असल्याकारणाने तो पृथ्वीवरील सर्व वस्तूंचा स्वामी आहे._
_*३.३१७ ब्राह्मण हा जरी मूर्ख असो किंवा विद्वान दोन्ही रूपात तो श्रेष्ठ आहे. देवतातुल्य असल्याकारणाने ब्राह्मण हा कायदा आणि राजापेक्षाही श्रेष्ठ आहे.*_
_७.३७ राजाने विद्वान ब्राह्मणाची दररोज सेवा करावी. वेद माहीत असलेल्या वृद्ध ब्राह्मणाचीसुद्धा राजाने रोज सेवा करावी._
_७.३८ वृद्ध ब्राह्मणाची राजाने रोज सेवा करावी._
_११.३५ ब्राह्मण हे गुरू आणि संपूर्ण जगाचे रक्षक आहेत. मनू स हितेत विभिन्न वेद माहिती असलेल्या जातीद्वारे करावयाच्या व्यवसायाचादेखील उल्लेख आहे._
_१.८८ स्वयंभू मनूने ब्राह्मणांचे कर्तव्य म्हणून वेदाध्ययन, वेदांची शिक्षा देणे, यज्ञ करणे, दान देणे आणि दान घेणे इत्यादी आहेत._
_१.८९ दान देणे, प्रजेचे रक्षण, यज्ञ करणे, वेदाध्ययन इत्यादी क्षत्रियांची कर्तव्ये आहेत._
_१.९० पशुपालन, व्यापार करणे, दान देणे, यज्ञ करणे, शेती करणे इत्यादी वैश्यांची कर्तव्ये आहेत._
_१.९१ शूद्रांनी आनंदित राहून केवळ तीनही वर्णांची मनोभावे सेवा करावी._
_*१०.७५ वेदांचे अध्ययन, अध्यापन, यज्ञ करणे, इतरांना यज्ञ करण्यात मदत करणे, ब्राह्मण गरीब असेल तर इतरांकडून दान स्वीकारणे ही सहा कर्तव्ये ब्राह्मणांची आहेत.*_
_१०.७६ ब्राह्मणांकरिता निर्धारित सहा कर्तव्यांतील तीन कर्तव्ये त्याच्या जीविकेकरिता आहेत. ती क्षत्रियांना लागू होऊ शकत नाहीत. अर्थात वेदांचे अध्यापन (शिकविणे), यज्ञ करणे आणि दान स्वीकारणे._
_१०.७८ वरील तीन कर्तव्ये ही वैश्यांनादेखील लागू वर्जित (मनाई) आहेत. कारण की परमपिता ब्रह्माने ही कर्तव्ये क्षत्रिय आणि वैश्य वर्णाला लागू केलेली नाहीत._
_१०.७९ जीविकेकरिता शस्त्र धारण करणे हा क्षत्रियाचा व्यवसाय आहे तर व्यापार, पशुपालन आणि कृषी हा वैश्यांचा व्यवसाय आहे. परंतु पुढील हाच जन्म प्राप्त करून घ्यावयाचा असेल तर क्षत्रियांनी व वैश्यांनी दान देणे, अध्ययन आणि यज्ञ करणे इत्यादी कर्तव्ये करावीत._     
            _श्रेणी आणि व्यवसाय निश्चित केल्यानंतर काही वर्गांना मनूने विषेशाधिकार बहाल केले आहेत तर काहींना दंडाचे प्रावधान केले आहे._
_*जेथपर्यंत विशेषाधिकाराचा प्रश्न आहे. विवाहाच्या संबंधित विशेषाधिकारांचा प्रथम विचार करू.*_
_३.१२ द्विज वर्गातील लोकांनी त्यांच्या वर्गातील स्त्रीशी प्रथम विवाह करावा. दुसऱ्यांदा लग्न करावयाचे असल्यास आपल्यापेक्षा खालच्या वर्गातील स्त्रीशी विवाह करावा._
_३.१२ शूद्र स्त्री केवळ शूद्राचीच पत्नी बनू शकेल. त्याचप्रमाणे वैश्य स्त्री वैश्याची, क्षत्रिय स्त्री क्षत्रियाची तर शूद्र स्त्री शूद्राशी आणि ब्राह्मण स्त्री ब्राह्मणाची पत्नी बनेल._
_*अश्या प्रकारे व्यवसायातदेखील काही विशेषाधिकार देण्यात आले आहेत. एखाद्या वर्णावर संकट आल्यास वेळप्रसंगी तो काय करील याचेही वर्णन मनूने केलेले आहे.*_
_१०.८१ जर ब्राह्मण आपल्या निर्धारित वर्णानुसार व्यवसाय करू शकत नसेल तर त्याने क्षत्रियाचा व्यवसाय करावा. कारण की क्षत्रिय हा त्याचा नंतरचा वर्ण आहे._
_१०.८५ जर असा ब्राह्मण क्षत्रियाचा व्यवसायदेखील करण्यास असमर्थ असेल तर त्याने वैश्याचा व्यवसाय करावा._
_१०.१०२ संकटामध्ये सापडल्यावर ब्राह्मण कोणत्याही व्यक्तीद्वारा दान ग्रहण करू शकतो. कारण की याबाबत कुठलाही शुद्धता अशुद्धतेचा नियम नाही._
_१०.१०३ इतरांना वेदाध्ययन करविणे, यज्ञ करविणे आणि त्याद्वारे दान स्वीकारणे संकटात सापडलेल्या ब्राह्मणांना वर्जित नाहीत; कारण की तो मूलतः पवित्र आहे._
 
_याच तुलना जर इतर वर्णातील लोकांशी करून पाहिली तर मनू म्हणतो_
_१०.९६ खालच्या वर्गातील मनुष्य जर लोभीवृत्तीने वरच्या वर्गाचे अनुसरून करू लागला अथवा जीविका कमावू लागला तर राजाने त्याची सर्व संपत्ती जप्त करून त्याला तत्काल निष्कासित करावे._
_१०.९८ जो इतराचा धर्म स्वीकारतो तो स्वधर्मापासून वंचित होतो._
_१०.१२१ जर एखादा शूद्र जीविकोपार्जन करू इच्छिल्यास त्याने प्रथम ब्राह्मणांची सेवा करावी. नंतर क्षत्रियाची सेवा करावी व क्षत्रियही न मिळाल्यास वैश्याची सेवा करावी._
_१०.१२३ ब्राह्मणांची सेवा करणे हेच शूद्राचे प्रथम कर्तव्य आहे. असे न केल्यास शूद्राचे कर्म निष्फळ ठरतात._
_१०.१२५ शेवटी शिल्लक राहिलेले अन्न शूद्राला द्यावे. वापरलेली देखील शूद्राला द्यावी._
_१०.१२८ इतर वर्णाची निंदा न करता शूद्र स्वतःची कर्मे करीत असेल तर तो स्वर्गलोकात प्रशंसित होतो._
_१०.१२९ जर संपत्तीचा शूद्राला कितीही उपयोग असला तरी कोणत्याही शूद्राने संपत्तीचा संग्रह करू नये. कारण धनसंग्रहाने असा शूद्र माजतो व त्यामुळे ब्राह्मणांना त्रास संभवतो._
_१०.१३० वरील सगळी कर्तव्ये त्या त्या वर्णांनी निर्धारित केल्याप्रमाणे अनुसरावीत. असे केल्यास त्यांना श्रेष्ठ जन्म प्राप्त होईल._

     _यातील काही विशेषाधिकार तर सामाजिक नसून आर्थिक होते:_
_८.३५ एखाद्याची संपत्ती जर स्वतःची असेल तर राजाने त्यातील सहावा भाग घ्यावा._
_८.३६ परंतु ती संपत्ती जर त्याची नसेल त्यातील काही भाग दंड म्हणून वसूल करावा._
_८.३८. जमिनीत गाडलेली संपत्ती जर राज्यातील कुणाही व्यक्तीला सापडल्यास त्यातील अर्धा भाग राजाने दानस्वरूपात ब्राह्मणाना वाटावा व अर्धा भाग स्वतःकडे ठेवावा._
_७.१३३ एखादा राजा मरत जरी असेल तर त्याने वेदाध्ययन करणाऱ्या ब्राह्मणांकडून कर घेऊ नये किंवा त्याच्या राज्यात राहणाऱ्या ब्राह्मणांना इजादेखील पोचवू नये._
_७.१३४ ज्या राजाच्या राज्यात ब्राह्मण भुकेने व्याकूळ राहतो. त्या राज्यात लवकरच अकाल पडतो._
_९. १८८ व्यक्ती मृत झाल्यानंतर वेदांचे पठण केलेल्या ब्राह्मणांनाच पिंडदान करावे. अशा मृत व्यक्तीचे कायदेशीर उत्तराधिकारी होतात._
_*१०.१८९ ब्राह्मणांची संपत्ती राजाने कधीही घेऊ नये. हा एक निश्चित नियम आहे. मर्यादा आणि परंतु इतरांची संपत्ती मात्र राजा तो व्यक्ती मृत झाल्यावर हिसकावून घेऊ शकतो.*_
_१०.३ जातिगत उच्चतेमुळे, ज्ञानार्जन करण्याच्या अधिकारामुळे, यज्ञोपवीत धारण केल्यामुळे ब्राह्मण हा तीनही वर्णांचा स्वामी आहे._
_९.३१७ ब्राह्मण हा मूर्ख असो वा विद्वान दोनही रूपात श्रेष्ठ आहे._
_९.९१९ जरी ब्राह्मण निंदनीय कर्म करीत असेल तरी तो पूजनीय समजावा; कारण की तो श्रेष्ठ देवता आहे._
_७.३५ राजाचे प्रयोजन चारही वर्णाद्वारे निर्धारित वर्णाद्वारे कर्म निर्धारित करणाऱ्यांवर देखरेख करणे आहे._
_७.३७ सकाळी उठल्याबरोबर राजाने ब्राह्मणांची सेवा करावी व ब्राह्मणांच्या म्हणण्यानुसारच पुढील कार्ये करावीत._
_७. ३८ वेदाध्ययन करणाऱ्या वरिष्ठ ब्राह्मणाची राजाने सेवा करावी._
_९.३१८ एखाद्या घोर संकटात सापडल्यावरही राजाने ब्राह्मणांना राग आणू देऊ नये._
            _यज्ञोपवीत धारण करणे हा ब्राह्मणांचा महत्त्वाचा संस्कार आहे.. ब्राह्मणाच्या मुलाला आठव्या वर्षी, क्षत्रियाच्या मुलाला अकराव्या वर्षी तर वैश्याच्या मुलाला बाराव्या वर्षी यज्ञोपवीत धारण करण्याचा संस्कार करावा._ 

_२.१६९ द्विज म्हणविल्या जाणाऱ्या व्यक्तीचे तीन जन्म होतात. पहिला जन्म आईच्या गर्भातून. दुसरा जन्म यज्ञोपवीत धारण केल्याने तर तिसरा जन्म यज्ञकर्म केल्याने होत असतो. *मनूने हे संस्कार शूद्र आणि स्त्रियांना नाकारलेले आहेत.*_
       _*मनूने इतरांच्या शिक्षणासंबंधी काहीही उल्लेख केला नाही. त्याला इतरांच्या शिक्षणासंबंधी काहीही घेणे-देणे नाही. जनतेच्या सार्वत्रिक शिक्षणासंबंधी तो राज्याकरिता कोणतेही नियम सांगत नाही. तो केवळ वेदांच्या अध्ययनांबाबतच चिंतित राहतो.* त्याच्या मते_
            _ब्राह्मणांच्या परवानगीशिवाय कोणीही वेदाध्ययन करू शकत नाही. कुणीही स्वतःच्या मर्जीप्रमाणे वेदाध्ययन करू शकत नाही. जो कुणी असे करेल त्याच्यावर चोरीचा आरोप ठेवण्यात यावा._
_२.११६ आचार्याच्या परवानगीशिवाय जो कुणीही वेदाध्ययन करेल तो शास्त्रांची चोरी करण्याचा अपराधी राहील आणि तो नरकात जाईल._
_*९.१८ स्त्रियांना वेदाध्ययन करण्याचा अधिकार नाही. स्त्रियांद्वारे वेदाध्ययन हे एक पाप ठरते.*_
_४.९९ शूद्राच्या सानीध्यात ब्राह्मणाने वेदाध्ययन मुळीच करू नये._
       _अयोग्य व्यक्तीद्वारा यज्ञकार्य करणे अथवा वेदाध्ययन करणे अयोग्य आहे._
       _कायदेशीर कारवाईच्या वेळेस संबंधित पक्षाच्या स्थितीची व्याख्या मनूने केलेली आहे जी फौजदारी केसेसशी संबंधित आहेत._
_८.२६७ जो क्षत्रिय कोणत्याही ब्राह्मणाची मानहानी करेल तर त्याला शंभरपट, वैशाला दीडशेपट आणि याच अपराधाला शूद्राला फटके मारण्याची शिक्षा द्यावी._
_८.२७० जर एखाद्या शूद्राने ब्राह्मणाला शिवी दिली तर त्याची जीभ कापावी कारण की तो ब्राह्मणाच्या खालच्या अंगाद्वारे उत्पन्न झालेला आहे._
_८.२७१ जर तो ब्राह्मणाच्या नावाचे तिरस्कारपूर्वक उच्चारण करीत असेल तर त्याच्या तोंडात दहा उंगल लांब लोखंडाची सळाक घालावी._
_*८.२७२ जर एखादा शूद्र व्यक्ती ब्राह्मणाचा अभिमानपूर्वक त्याच्या कर्तव्याबद्दल जाणीव करून देत असला तर राजाने त्याच्या तोंडात आणि कानात उकळते तेल ओतावे.*_
_*शिव्या देण्याच्या अपराधाबद्दल मनू म्हणतो :*_
_८. २७६ जर ब्राह्मण आणि क्षत्रिय एकमेकांना शिव्या देत असतील तर राजाद्वारे ब्राह्मणांना कमीत कमी व क्षत्रियाला जास्त दंड द्यावा._
_८.७७७ याच प्रकारचा दंड वैश्य आणि शूद्रांनादेखील देण्यात यावा._
_*मारपीट केल्याच्या अपराधाबद्दल मनू म्हणतो :*_
_८.२७९ खालच्या वर्गातील व्यक्ती जर वरच्या वर्णातील व्यक्तीला मारपीट करू लागला तर ज्या अंगाचा त्याने उपयोग केला ते अंग छाटून टाकावे._
_८.२८० जर शूदू व्यक्तीने हाताने मारले तर हात छाटावा व पायाने मारले तर पाय कापून टाकावे._


_*खोट्या अभिमानाबद्दल मनू म्हणतो :*_
_*८.२८१ जर खालच्या वर्गातील व्यक्ती वरच्या वर्गातील व्यक्तीच्या आसनावर बसला तर त्याच्या पाठीवर तापविलेले लोखंड ठेवावे किंवा त्यांचे नितंब कापावे.*_
_८.२८२ जर एखादा शूद्र गर्वाने उच्च वर्णीयावर थुंकला तर त्याचे दोन्ही ओठ कापावे. लघवी केल्यास त्यांचे लिंग कापावे. घाण वारा सोडल्यास त्याची गुदा कापावी._
_८.३५९ जर एखाद्या शूद्र वर्गाच्या व्यक्तीने उच्च वर्गातील स्त्रीशी व्यभिचार केला तर त्याला प्राणदंड द्यावा._
_८.३६६ उच्च वर्गातील स्त्रीशी कनिष्ठ वर्णातील पुरुषाने प्रेम जरी केले तर त्याला शारीरिक दंड द्यावा._
_*८.३७४ एखाद्या शूद्राने उच्च वर्णातील स्त्रीशी व्यभिचार केल्यास त्याचे लिंग कापावे. आणि त्याची सारी संपत्ती जप्त करावी.*_
_८.३७७ जर एखाद्या वैश्य किंवा क्षत्रियाने उच्च वर्गातील स्त्रीशी व्यभिचार केला तर त्याला जिवंत जाळावे._
_८.३८३ हेच कृत्य जर एखाद्या ब्राह्मणाने शूद्र स्त्रीशी केल्यास त्याला केवळ आर्थिक दंड द्यावा._

             _*मनूचे हे नियम शाश्वत आहेत. म्हणून यामध्ये कुठल्याही प्रकारचे परिवर्तन होऊ शकत नाही.* मनूच्या समोर जर मुख्य प्रश्न कुठला असेल तर याला लागू कसे करावे._
_८.४१० राजाने वैश्याद्वारे व्यापार, कृषी किंवा पशुपालन होते आहे की नाही ते पाहावे तसेच शूद्राद्वारे इतर तीनही वर्णाची सेवाचाकरी होत आहे की नाही हेसुद्धा पाहावे._
         _जर एखादा राजा आपले कर्तव्य करीत नसेल तर तो एक अपराध आहे आणि त्यालासुद्धा दंडाचे प्रावधान आहे._
_*अपराधाबद्दल राजाने दंडस्वरूपात धन ब्राह्मणांना प्रदान करावे.*_
_८. ३४८. ब्राह्मणांच्या धर्मपालनात विघ्न निर्माण करणाऱ्याविरुद्ध ब्राह्मण शस्त्र धारण करू शकतो. किंबहुना ब्राह्मणांवर संकट निर्माण झाल्यास तोसुद्धा शस्त्र धारण करू शकतो._

            _*विद्रोह करण्याचा अधिकार शूद्र वर्गाला सोडून इतर तीन वर्गांना देण्यात आला आहे. हे बहुधा संभवनीय आहे की या अधिकाराचा फायदा हा तीनही वर्णाना होता. परंतु समजा जर राजाने ही व्यवस्था समाप्त करण्याचा प्रयत्न केला व क्षत्रिय वर्गाने त्याला साहाय्य केले अशा परिस्थितीत राजाला दंड देण्याचा अधिकार ब्राह्मणांना देण्यात आला आहे.*_

_९.३२० जर एखादा क्षत्रिय ब्राह्मणांच्या विरुद्ध शस्त्र धारण करीत असेल तर ब्राह्मण त्याला स्वतः दंड देईल. कारण की मूलतः क्षत्रिय हे ब्राह्मणांपासूनच निर्माण झालेले आहेत._

               _*मनू हा चातुर्वर्ण्यव्यवस्थेचा प्रबंध समर्थक आहे म्हणूनच त्याने वरील मौलिक परिवर्तने घडवून आणली. ब्राह्मणांद्वारे शस्त्र धारण करण्याचा आग्रह, हे असेच एक मूलभूत परिवर्तन आहे.*_
        _*मनुपूर्व हा नियम अस्तित्वातच नव्हता. किंबहुना ब्राह्मणांद्वारे शस्त्र धारण करण्यास सक्त मनाई होती.*_
_*१.१०.२९.६ ब्राह्मणाला एखाद्या शस्त्राची तपासणी जरी करावयाची असेल तर तो त्या शस्त्राला हात लावू शकत नाही.*_
*_मनूचा उत्तराधिकारी बौद्धायन म्हणतो:_*
_*२. २४१८ गोरक्षणार्थ किंवा वर्णरक्षणार्थ ब्राह्मण स्वतःच्या हातात शस्त्र धारण करू शकतो. कारण की असे करणे शास्त्रसंमत आहे.*_

*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_संदर्भ :- कांती आणि प्रतिक्रांती_*

*_लेखक :- डॉ बाबासाहेब आंबेडकर_*

*_संकलन :- महेश कांबळे_*

*_दिनांक :- १६/१२/२०२२_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2022/12/blog-post.html

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

कोलित सुत्त

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_कोलित सुत्त_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_41.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼  _'कोलित सुत...