Saturday, 17 December 2022

भगवद्गीतेवर निबंध : प्रतिक्रांतीचे धार्मिक समर्थन 'कृष्ण आणि त्याची गीता'

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_भगवद्गीतेवर निबंध : प्रतिक्रांतीचे धार्मिक समर्थन 'कृष्ण आणि त्याची गीता'_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

              _प्राचीन भारतीय साहित्यात गीतेचे कोणते स्थान आहे? ख्रिश्चन धर्माचा बायबल हा जसा धर्मग्रंथ आहे, तसाच तो हिंदू धर्माचा धर्मग्रंथ आहे काय? हिंदू या ग्रंथाला धर्मग्रंथ मानतात. जर 'गीता' हा धर्मग्रंथ आहे तर तो काय शिकवण देतो? कोणत्या सिद्धांतांचे 'गीता' प्रतिपादन करते. या विषयावर विद्वानांत मतभेद आहेत. हे मतभेद पाहता वाचकांस आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाहीत._

_*बोटलिंग्क लिहितो -* गीतेमध्ये उच्च व सुंदर भाव आहेत. पण सोबतच काही विरोधात्मक बाबीसुद्धा आढळतात, ठिकठिकाणी पुनरावृत्ती, अतिशयोक्ती, विसंगती आणि अर्थहीन उदाहरणे आपणास गीतेमध्ये पाहावयास मिळतात._

_*होपकिन्स म्हणतो -* गीता ही महत्त्वपूर्णता व महत्त्वहीनता, तर्कपूर्णता व तर्कहीनता, यामुळे हिंदू साहित्यात एक विलक्षण कृती मानली जाते. आदिम तत्त्वज्ञानाच्या सिद्धांतांची गीता म्हणजे विचित्र समुच्चय (भेसळ) आहे._ 

_पुढे *हॉपकिन्स म्हणतो* एखाद्या काव्यकृतीच्या दृष्टिकोनातून पाहता गीता ही कमजोर रचना आहे. एकाच गोष्टीला वारंवार सांगण्यात आले आहे. शब्द आणि अर्थाच्या विसंगतीची शेकडो उदाहरणे आहेत. सगळ्या बाबी पाहता गीता हे अद्भुत काव्य आहे, हे निरीक्षणाअंती आश्चर्यकारक वाटते._

_*होटजनमैन म्हणतो-* भगवद्गीता ही सर्वेश्वरवादी काव्याचा वैष्णव ग्रंथ आहे._

_*गोर्बे  म्हणतो –* “कृष्ण नावाचा देवता मानवरूप धारण करून श्रोत्यांना उपदेश देतो व हे सागतो की, प्रत्येकाने आपल्या कर्तव्याचे पालन केलेच पाहिजे. गीतेत सर्वेश्वरवाद व ईश्वरवाद एक दुसऱ्यात मिळविण्यात आलेले आहे._

_*श्री. तेलंग यांच्या मते -* "गीतेमध्ये अशी अनेक स्थळे आहेत ज्यांचा एकदुसऱ्याशी योग्य जुळत नाही. याबद्दल कुणीही प्रयत्नदेखील केलेला नाही. गीतेमध्ये जी काही विसंगती पाहावयास मिळते, त्याबद्दल गीतेच्या रचनाकाराला माहिती होती. सत्य गोष्टीबद्दल केवळ अनुमान काढण्यात आलेले आहे. अनेक अर्ध-सत्य बाबींना इतरत्र पेरून ठेवलेले आहे. परंतु या इतस्तः विखुरलेल्या अर्धसत्यांना एकत्र करण्याचा कुणीही प्रयत्नदेखील केलेला नाही._

_*आधुनिक अशा विचारवंतांचे हे विचार आहेत :*_

_जुन्या रूढीवादी पंडितांच्या विचारात गीतेबाबत बरीच तफावत दिसून येते._ 

_(१) एक मत हेसुद्धा आहे की भगवद्गीता हा कुठल्याही विशेष धार्मिक संप्रदायाचा ग्रंथ नसून मोक्षप्राप्तीच समान (एकाच) मार्गांचे प्रतिपादन करतो तो मार्ग आहे :_

           _१) कर्ममार्ग; २) भक्तिमार्ग आणि ३) ज्ञानमार्ग या तीनही मार्गाद्वारे मोक्षप्राप्तीची हमी गीतेद्वारा देण्यात येते. आपल्या मनाच्या समर्थनार्थ ही रूढीवादी मंडळी खालील अध्यायाचा पुरावा म्हणून उल्लेख करतात._

 _*या ग्रंथातील एकूण १८ अध्यायांपैकी*_

१) १ ते ६ मध्ये ज्ञानमार्ग 

२) ७ ते १२ मध्ये कर्ममार्ग आणि

३) १३ ते १८ मध्ये भक्तिमार्गाचा उपदेश करण्यात आला आहे.  

           _रूढीवाद्यांच्या मते वरील तीनही मार्ग मोक्षप्राप्ती करिता आवश्यक आहेत असे गीता प्रतिपादित करते._

       _*रुढीवादी लेखकांच्या श्रेणीमध्ये शंकराचार्य आणि टिळकांचा समावेश होऊन देखील या दोघांची मते परंपरेपेक्षा वेगळी आहेत.*_

_*शंकराचार्यांच्या मते* गीतेमध्ये ज्ञानमार्गाचा उपदेश करण्यात आलेला आहे. आणि मोक्षप्राप्त करीत ज्ञानमार्ग हा एकच योग्य असा मार्ग आहे. गीतेमध्ये अनेक विसंगती आहेत ही बाबच टिळक मानावयास तयार नाहीत. उलट ते या गोष्टीचे खंडन करतात._

        _*मोक्षप्राप्तीचे तीनही मार्ग योग्य आहेत या रूढीवादी पंडितांच्या मतालादेखील मानण्यास टिळक तयार नाहीत. शंकराचार्याच्या मताप्रमाणे टिळकांचेदेखील मत हे की गीता ही एका निश्चित मार्गाची शिकवण देते. टिळकांच्या मते गीता ही ज्ञानमार्गाचा उपदेश देते.*_

            _गीतेमध्ये जे काही सांगण्यात आलेले आहे. त्याबद्दल विद्वानांत इतके मतभेद का आहेत, याबद्दल अनेकांना आश्चर्य वाटते. परंतु कुणीही विचारू शकेल की विद्वानांत इतके मतभेद का आहेत. *या सर्व विद्वानांनी गीतेमध्ये अशा गोष्टीचा शोध लावण्याचा प्रयत्न केला जे खोटे आहे, भ्रामक आहे. हे विद्वान लोक कुराणामध्ये, बायबलमध्ये आणि धर्मपदामध्ये जो धार्मिक उपदेश सांगण्यात आलेला आहे. अशा धार्मिक उपदेशाचा शोधाशोध गीतेमध्ये करतात.*_

              _*असा प्रयत्न करणे व्यर्थ आहे. ईश्वरवाणी नसल्यामुळे गीतेमध्ये कोणताही धार्मिक संदेश नाही आणि असा संदेश शोधणे हेदेखील व्यर्थ आहे. निःसंदेह कुणीही प्रश्न करील की गीता ही जर ईश्वरवाणी नाही तर आहे तरी काय? याला उत्तर हे आहे की भगवत गीता हा धर्मग्रंथही नाही अथवा तत्त्वज्ञानाचा ग्रंथदेखील नाही. जर कुणी व्यक्ती भगवद्गीतेला धर्मग्रंथ किंवा तत्त्वज्ञानाचा ग्रंथ म्हणवून घेत असेल तर स्वतःचीच फसगत करून घेत आहे. वस्तुतः गीता हा धर्मग्रंथही नाही किंवा तत्त्वज्ञानाचा ग्रंथदेखील नाही. या ग्रंथामध्ये प्रतिक्रांतीच्या दार्शनिक तत्त्वज्ञानाचे धार्मिक आधारावर समर्थन करण्यात आलेले आहे.*_

             _*सर्वप्रथम गीतेमध्ये कुठली बाब पाहायला मिळत असेल तर ती म्हणजे युद्धाचे समर्थन होय. युद्धाचे तत्त्वज्ञानाच्या आधारावर, समर्थन दोन तर्क देऊन करण्यात आले आहे. प्रथम हा की, जग हे नश्वर आहे व मनुष्य मृत्युधर्मी आहे. वस्तूचा अंत होणे निश्चित आहे. बुद्धिमान व्यक्तीच्या दृष्टिकोनात ही बाब निरर्थक आहे की, मृत्यू स्वाभाविकपणे होतो की युद्धात हिंसेद्वारे. जे स्वाभाविक असेल, जे नष्ट होणारे आहे त्याबद्दल रडण्यात काय हाशील. मृत्यू अनिवार्य आहे. आत्मा अमर असतो, आत्मा केव्हाही मरत नसतो. इतकेच नव्हे तर याला वायू नष्ट करू शकत नाही. अग्नी याला जाळू शकत नाही. शस्त्र याला कापू शकत नाही. म्हणून हे मानणे निरर्थक आहे की, व्यक्ती मेल्यानंतर शरीराचे काय होते? ज्याप्रमाणे एखादी व्यक्ती नवीन वस्त्र धारण करते, त्याचप्रमाणे आत्मासुद्धा नवीन शरीर धारण करतो. म्हणून स्वाभाविकरीत्या मरणे किंवा युद्धात मरणे यात कुठलाही फरक नाही.*_

              _*आणखी एका सिद्धांताचे प्रतिपादन भगवद्गीतेमध्ये करण्यात आले आहे आणि ते म्हणजे चातुवर्ण्याचे तात्विक समर्थन. निःसंदेह गीतेमध्ये सांगितले आहे की, चातुर्वर्ण्याची निर्मिती ही ईश्वराद्वारे करण्यात आलेली आहे आणि म्हणूनच चातुर्वर्ण्य हे पवित्र आहे. केवळ पवित्र आहे म्हणूनच ती ईश्वरवाणी आहे हे नसून किंबहुना याला तत्त्वज्ञानाच्या आधारावर समर्थन केले गेले आहे. चातुर्वर्ण हे माणसाच्या स्वाभाविक व जन्मजात गुणांवर आधारित ईश्वराद्वारे निर्माण करण्यात आले आहे.*_

            _*भगवद्गीतेचा तिसरा सिद्धांत हा कर्मयोगाला धर्माचे तात्त्विक आधारावर समर्थन देण्याबाबतचा आहे. गीतेनुसार कर्ममार्ग म्हणजे मोक्षप्राप्तीकरिता यज्ञयाग करणे होय. गीतेमध्ये कर्मयोगाचे प्रतिपादन केले गेले आणि कर्मयोगातून अनावश्यकरीत्या बाहेर पडणाऱ्या बाबींचे निराकरण केले गेले आहे. ह्या बाबी कुशलतेने लपविण्यात आल्या आहेत किंवा विकृत तरी केल्या गेल्या आहेत. पहिली बाब आहे अंधश्रद्धा. खरा कर्मयोग हा कर्मकांड करणे होय. आणि यामध्ये कुठलेही चुकीचे आचरण नाही. हाच कर्मयोग म्हणजेच अंधश्रद्धा गीतेद्वारा प्रतिपादण्यात आली आहे.*_ 

         _*दुसरा दोष म्हणजे या कर्मकांडामागे स्वार्थ साधणे हा होय. हा स्वार्थ लपविण्याकरिता भगवद्गीतेमध्ये अनासक्तीयोग अर्थात कर्मफलाची इच्छा न करता कर्म करीत राहणे या सिद्धांताचे होय. या आधारावर कर्मकांड करणे कधीही वाईट होऊ शकत नाही.* अशाच प्रकारे इतर बाबींचा शोधाशोध करणेदेखील आवश्यक आहे. ज्यांचा समावेश पूर्वी गीतेमध्ये नव्हता व त्यानंतर त्यांचे प्रतिक्रांतीचे अधिकारिक पुस्तक ज्याला प्रतिक्रांतीचे बायबल म्हणतो त्या जैमिनीकृत पूर्वमिमांसेचे, प्रतिपादन, गीतेमध्ये करण्यात आलेले आहे. धार्मिक आधारावर समर्थन करून गीतेमध्ये घुसडून देण्यात आलेले आहेत._

         _हा एक शोधप्रबंधाचा विषय आहे. या ठिकाणी मात्र प्राचीन भारतीय साहित्यात गीतेचे स्थान कोणते होते ते निश्चित करणे एवढेच आहे. म्हणूनच मुख्य सिद्धांताची निवड केलेली आहे. या व्याख्येतून दोन प्रश्न निर्माण होतात._

_१) भगवद्गीतेमध्ये ज्या सिद्धांताचे धार्मिक आधारावर समर्थन केले गेले आहे ते कुणाचे आहोत?_

_२) भगवद्गीतेमध्ये या सिद्धांताची समर्थन करण्याची गरज यांना का भासली?_

         _पहिल्या प्रश्नापासून सुरुवात करू. गीतेमध्ये ज्या सिद्धांताचे समर्थन केले गेले आहेत ते प्रतिक्रांतीचे सिद्धांत आहेत. आणि हे सिद्धांत प्रतिक्रांतीचे अधिकारित पुस्तक जैमिनीकृत पूर्वमीमांसामध्ये वर्णित आहेत. या तत्त्वाला स्वीकार करण्यामागे कोणताही संकोच नसावा. अडचण जर कुठली असेल कर्मयोग या शब्दाचा चुकीचा अर्थ स्वीकारण्याची आहे. *भगवद्गीतेचे बहुतेक भाष्यकार कर्मयोग या शब्दाचा अर्थ 'कार्य' आणि 'ज्ञानयोग' शब्दाचा अनुवाद 'ज्ञान' असा करतात. आणि भगवद्गीतेमध्ये सामान्यपणे ज्ञान आणि कर्माच्या फरकांसंबंधी विवेचन केले आहे असाच समज करून घेतात, हा समज फारच चुकीचा आहे. भगवद्गीतेचा उद्देश कर्म आणि ज्ञान सांगणे असा चुकीचा लावण्यात आला आहे. भगवद्गीतेचा उद्देश कर्म आणि ज्ञान यासंबंधित तात्त्विक चर्चा करणे हा नाही. वास्तविक पाहता गीतेचा संबंध सामान्य विषय नसून 'विशेष विषय' हा आहे.*_

          _*गीतेमध्ये सांगितलेला कर्मयोग अथवा कर्माचा संबंध जैमिनीने सांगितलेल्या कर्मकांडाशी आहे आणि ज्ञानयोग किंवा ज्ञानाचा संबंध त्या विद्वानांशी आहे जे बादरायणने ब्रह्मसूत्रांत दिलेले आहे.* गीतेमधील कर्माचा अर्थ कर्म किंवा अकर्म, निवृत्तीवाद किंवा प्रवृत्तीवाद याच्याशी नाही तर सामान्यपणे गीतेतील कर्माचा अर्थ धार्मिक अनुष्ठान किंवा त्याच्या पालनाशी संबंधित आहे. जो कुणी गीता वाचेल त्याला हे निश्चित कळून येईल. *एखाद्या शुद्र गोष्टीच्या वादविवादामध्ये गुंतलेल्या वर्गाच्या स्तराला वर उचलण्याच्या संदर्भात प्रचाराचे साहित्य म्हणून गीता लिहिली गेली आहे.* आभास मात्र असा करण्यात आला की हा ग्रंथ एखाद्या विशेष तत्त्वज्ञानावर आणि त्याच्या अर्थावर सविस्तरपणे लिहिलेला आहे. आणि म्हणूनच कर्म आणि ज्ञान या शब्दांच्या अर्थाचा विस्तार करण्यात आला आणि याचा सामान्य स्वरूपात स्वीकारण्यात आला. देशभक्त भारतीयांनी याचा दोष टिळकांना दिला पाहिजे. या शब्दांचा चुकीचा अर्थ लावल्याने परिणाम असा घडून आला की लोक भ्रमित झाले._ 

           _परिणामतः भगवद्गीता हा एक स्वतंत्र आणि स्वतः एक पूर्ण ग्रंथ आहे. असा विश्वास लोकांनी करून घेतला. परंतु या ग्रंथामध्ये कर्म आणि ज्ञानाचा काडीइतकाही संबंध नाही._

           _*परंतु एखाद्या व्यक्तीने कर्मयोगाचा भगवद्गीतेतील अर्थ स्वीकारायचा म्हटल्यास गीतेमध्ये कर्मयोगाचा आशय जैमिनीद्वारा प्रतिपादित कर्मकांडाशी आहे. याच कर्मकांडांना गीतेद्वारे पुनर्जीवित आणि प्रतिष्ठापित करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.*_

          _आता आपण दुसऱ्या प्रश्नांबाबत विचार करू या. भगवद्गीतेमध्ये प्रतिक्रांतीच्या तत्त्वज्ञानाचे प्रतिपादन का करण्यात आले आहे? याचे उत्तर सरळ आहे. हे *बौद्ध धम्माच्या जबरदस्त प्रभावापासून ब्राह्मणवादाचे रक्षण करण्यासाठीच भगवद्गीतेची रचना करण्यात आली. बुद्धाने अहिंसेचा उपदेश दिला. केवळ उपदेशच दिला नाही तर ब्राह्मणांना सोडून बहुसंख्य समाजाने अहिंसेचा जीवनशैलीच्या स्वरूपात स्वीकार केला. हिंसेबद्दल तत्कालीन समाजात घृणा निर्माण झाली होती. बुद्धाने चातुर्वण्याच्या विरूद्ध उपदेश दिला. बुद्धाने चातुर्वर्ण्याचे खंडन तीव्र शब्दांत केले आहे. बुद्धाच्या शिकवणीने चातुर्वर्ण्याचा डोलाराच उद्ध्वस्त झाला. चातुर्वर्ण्य उलटसुलट रचलेले होते. बुद्धाने लोकांना समजावून सांगितले की चातुर्वर्ण्याच्या आड ब्राह्मणांचे स्वार्थ दडलेले आहे. बुद्धाच्या अशा शिकवणीमुळे चातुर्वर्ण्याचा डोलाराच उद्ध्वस्त झाला.*_

          _बुद्धाच्या या क्रांतिकारी तत्त्वज्ञानाला ब्राह्मणवाद्याचे काय उत्तर होते? हेच की वेद हे अपौरुषेय (ईश्वरनिर्मित) असून त्यांच्याबद्दल कुठलीही शंका घेता येत नाही._

        _*बौद्धकाल हा भारतील सर्वांत प्रबुद्ध व विवेकवादी काळ होता. अशा काळात ब्राह्मणवाद दुराग्रह, कर्मकांड, अविवेक व खोट्या धारणावर आधारित असल्यामुळे त्यांच्या मुळावरच आघात बसला. अहिंसेला बहुजन समाजाने स्वीकारल्यानंतर ब्राह्मणवाद्यांची हिंसा व चातुर्वर्ण्याचा सिद्धांत स्वीकारण्याची बहुजन समाजाला काय गरज? बौद्ध धम्माच्या वाढत्या प्रभावाने जैमिनीचे प्रतिक्रियावादी सिद्धांत मोडकळीस आलेले होते आणि याला धार्मिक तत्त्वांच्या आधारावर समर्थन हवे होते. असे समर्थन भगवद्गीतेद्वारा केले गेले. क्षत्रियांचे कर्तव्य फक्त हत्या करणे या तत्त्वाचे भगवद्गीतेद्वारा धार्मिक आधारावर समर्थन एक मूर्खतापूर्ण गोष्ट आहे. या आधारावर हत्या करणे हे हत्या करणेच नव्हे असे प्रतिपादन आहे. कारण की शरीर नष्ट होते, आत्मा नष्ट होत नाही, या तत्त्वाच्या आधारावर हत्येचे समर्थन कर्माच्या बचावाशी संबंधित आहे.* आज जर कृष्णाला हत्येच्या संदर्भात बचाव पक्षाचा वकील म्हणून न्यायालयात उभे राहण्याचा प्रसंग आला असता तर त्याला पागलखान्यात ठेवावे लागले असते.  हत्येप्रमाणेच गीतेद्वारा चातुर्वर्ण्याचे समर्थन करणेदेखील तितकेच विसंगत आहे. कृष्ण चातुर्वर्ण्याचे समर्थन सांख्यतत्त्वांच्या आधारावर करतो. सांख्यतत्त्वानुसार तीनच गुण असतात. मग चातुर्वर्ण्याचे समर्थन करायचे तरी कसे? भगवद्गीतेचे चातुर्वर्ण्याचे समर्थन करण्याचा जो मूर्खतापूर्व प्रयत्न करण्यात आलेला तो फारच नीच असा आहे. यावर एक क्षणभरमात्र विचार करण्याची गरज नाही. भगवद्गीतेची ही भूमिका क्रांतिकारकांना कितीही धाडसाची वाटली तरी यामध्ये कुठलीही शंका नाही की भगवद्गीतेने प्रतिक्रांती पुनर्जीवन प्रदान केले आणि जर आज जी काही प्रतिक्रांती आपणास पाहावयास मिळते त्याचे मूळ भगवद्गीतेद्वारा या तत्त्वाचे समर्थन धार्मिक आधारावर करण्यात आलेले आहे हे होय. गीताही कुठल्याही प्रकारे वेद आणि शास्त्राच्या विरोधी नाही. उलट या दोघांचेही समर्थन गीता करते. अशाप्रकारे भगवद्गीता आणि जैमिनीचे पूर्वमीमांसा यामध्ये कसल्याही प्रकारचे अंतर नाही. अंतर जर कुठले असेल तर भगवद्गीता ही जोर देऊन दृढतेने प्रतिक्रांतीचे समर्थन करते तर जैमिनीची पूर्वमीमांसा तितकासा जोर प्रतिक्रांतीवर देत नाही. भगवद्गीता वैशिष्ट्यपूर्ण यासाठी आहे कारण की प्रतिक्रांतीला धर्मतत्त्वांचा स्थायी आधार प्राप्त करून देते. जो यापूर्वी कधीही प्राप्त नव्हता. धर्मतत्त्वांचा आधार गीतेने घेतला नसता तर प्रतिक्रांती अस्तित्वातच नसती. चातुर्वर्ण्याचा प्रसार आणि त्याला चिरस्थायित्व प्राप्त करून देणे हाच भगवद्गीतेचा मुख्य विषय आहे. वास्तविक पाहता भगवद्गीतेमध्ये चातुर्वर्ण्याचे समर्थन एक वेडेपणाचे व मूर्खपणाचे कार्य आहे. हा वेडेपणा व मूर्खपणा प्रतिक्रांतिवाद्यांनी धार्मिक आधारावर केला आहे._

           _*भगवद्गीतेचा अध्याय १८, श्लोक ४१ ते ४८ मध्ये कृष्णाने म्हटले आहे की, प्रत्येक व्यक्तीने आपल्या वर्णावर आधारित कर्तव्याप्रमाणे कर्म केले पाहिजे. असे जर त्याने केले नाही तर त्याला मोक्ष प्राप्त होणार नाही. अर्थात शूद्राला मोक्षलाभ पाहिजे असेल तर त्याने उच्च वर्णाच्या व्यक्तीची सेवा केलीच पाहिजे.*_

_१) थोडक्यात शूद्र हा कितीही महान भक्त असला व त्याने शूद्राचे कर्तव्य केले नाही कर्तव्याचे उल्लंघन केले अर्थात त्याने उच्च वर्गाची सेवा करून जीवननिर्वाह केला नाही तर त्याला मोक्ष प्राप्त होऊ शकत नाही._

_२) जैमिनीच्या सिद्धांताला नवीन आधारावर समर्थन प्राप्त करून देणे कमीत कमी त्या तत्त्वांना धर्मतत्त्वांचा आधार प्राप्त करून देणे जे जैमिनीच्या नंतर लिहिण्यात आले._

_३) तीसरे अनुमान आहे की बौद्ध धम्माच्या क्रांतिकारी आणि बुद्धिवादी विचारांचे समर्थन प्राप्त करून दृढ केले. अधिकांश भारतीय विद्वानांचे मत आहे की गीता ही अतिप्राचीन काळातील रचना आहे. परंतु अत्यंत सखोल अशी चौकशी केली असता याची साक्ष पटते की गीतेची रचना जैमिनीची पूर्वमीमांसा आणि बादरायणाच्या ब्रह्मसूत्रानंतरच झालेली आहे._

          _*गीता आणि बौद्ध धम्म दोन्ही एकाच वेळी झालेल्या क्रांतीची अभिव्यक्ती आहेत. ज्या वेळेला बौद्ध धम्माचा प्रभाव ब्राह्मण धर्मावर खूपच वाढला आणि बौद्ध क्रांतीने तत्कालीन समाजव्यवस्थेत आमूलाग्र परिवर्तन घडवून आणले त्यावेळी गीता प्रारंभिक अवस्थेत होती. म्हणूनच गीतेतील सिद्धांताला धार्मिक तत्त्वांच्या आधाराची गरज भासू लागली. गीतेमध्ये जे जे अंग दुर्बल असतील त्या अंगांना बल देण्याचा प्रयत्न करण्यात आला.*_

            _सैद्धांतिकपणे विद्वानांत हीच धारणा आहे की, बौद्ध धम्म हा प्राचीन ब्राह्मणी धर्माचेच एक रूप आहे. भगवद्गीतेवर बौद्ध धम्माचा कुठल्याही प्रकारचा प्रभाव आहे हे मानण्यासच मुळी ही मंडळी तयार नाही. हा दृष्टिकोन टिळक आणि राधाकृष्णन यांचा आहे._

         _जेव्हा जेव्हा बौद्ध धम्मातील सिद्धांतांना गीतेमध्ये समर्थन केलेले आढळते तेव्हा तेव्हा हे विद्वान या गोष्टीला नकार देतात की बौद्ध धम्म आणि गीतेमध्ये बरेचसे साम्य आहे._

      _*गीता आणि बौद्ध धम्माचे तुलनात्मक अध्ययन ज्याने केले आहे त्याला तर फारच धक्का पोचल्याशिवाय राहात नाही; कारण की गीतेमध्ये सांख्यतत्त्वज्ञानच सांगण्यात आले आहे. तेव्हा हे स्पष्टच आहे की गीता ही बौद्ध विचारांनी भरलेली आहे.*_

_ही समानता केवळ विचारांचीच नाही तर भाषेचीदेखील आहे. काही उदाहरणे देऊन हे स्पष्ट करता येऊ शकते._

      _*भगवद्गीतेमध्ये ब्रह्म निर्वाणावर विवेचन केले आहे. एखादी व्यक्ती ब्रह्मण निर्वाणपदाला केव्हा पोचते? याबद्दल गीतेत सांगितलेले आहे :*_

_१) श्रद्धा (स्वतःवर विश्वास )_ 

_२) व्यवसाय (दृढ विश्वास)_

_३) स्मृती (ध्येयप्राप्ती)_

_४) समाधी (एकाग्रता) आणि_ 

_५) प्रज्ञा (अंतर्दृष्टी किंवा ज्ञान)_

           _*आता गीतेमध्ये हा निर्वाण सिद्धांत कुठून (कोणाकडून) आला? निश्चितच हा सिद्धांत उपनिषदांमधून आलेला नाही. कारण की उपनिषदांमध्ये 'निर्वाण' शब्दाचा उल्लेख नाही.*_

           _*गीतेतील ही ब्रह्म निर्वाणाची संपूर्ण विचारसरणी महापरिनिर्वाण सुत्तामध्ये सांगितलेली आहे. आता सांगा, काय हा विचार गीतेने चोरलेला नाही? ही विचारसरणी बौद्ध धम्मापासून चोरून ती लपविण्याचाच प्रयत्न गीतेने केला आहे.*_

        _*दुसरे एका उदाहरणानुसार अध्याय ७, श्लोक १३ ते २० नुसार कृष्णाच्या म्हणण्याप्रमाणे खरा भक्त कोण आहे? तर जो १) मैत्री, २) करुणा (दया), ३) मुदिता व ४) उपेक्षा या चार तत्त्वांचे पालन करतो तो.*_

         _*आता भगवद्गीतेमध्ये खऱ्या भक्ताचे हे गुण कोठून (कुणाकडून) घेतले आहेत? हे गुणसुद्धा बौद्ध धम्मातून उधार घेतलेले आहे. ज्यांना याची खात्री करावयाची असेल त्यांनी बौद्ध धम्माचे 'महापदान सुत्त' व 'तेविज्ज सुत्त' पहावे.*_

          _*सारांश स्वरूपात आपण हे सिद्ध करून म्हणू शकतो की, बौद्ध धम्माच्या सूत्रावरच गीतेची रचना करण्यात आली. जेवढी समानता बौद्ध धम्म आणि गीतेमध्ये आढळते तेवढी इतरत्र कुठेही आढळत नाही. विद्वानांनी बौद्ध धम्माचे हे ऋण मान्य केले पाहिजे. परंतु टिळक व राधाकृष्णन यांनी ही बाब टाळून बुद्धिकौशल्याची चलाखी केलेली आहे.*_

       _*भगवद्गीतेची अवस्था ही ऋण घेणाऱ्या याचकाची असून बौद्ध धम्माची स्थिती ही दान देणाऱ्या दानदात्याची आहे.*_

          _*पिढ्यान्पिढ्या ब्राह्मणांनी बौद्ध धम्माप्रती तिरस्काराची भावना स्वीकारल्यामुळे लोकांचा भ्रामक कल्पनांवर विश्वास बसलेला आहे. परंतु इतिहास मात्र सत्य शोधुन सांगतो की, भगवद्गीतेला जे काही महत्त्व आहे ते केवळ बौद्ध धम्माच्या सिद्धांतामुळे.*_


*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_संदर्भ :- कांती आणि प्रतिक्रांती_*

*_लेखक :- डॉ बाबासाहेब आंबेडकर_*

*_संकलन :- महेश कांबळे_*

*_दिनांक :- १९/१२/२०२२_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2022/12/blog-post_17.html

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

No comments:

Post a Comment

कोलित सुत्त

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_कोलित सुत्त_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_41.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼  _'कोलित सुत...