🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_ब्राह्मण विरुद्ध क्षत्रिय_*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
_हिंदूच्या धर्मग्रंथात ब्राह्मणाविरुद्ध क्षत्रिय यांच्यामध्ये संघर्षाची वर्णने अनेक ठिकाणी मिळतात. स्वतःच्या वर्गाच्या हिताचे रक्षण करण्याकरिता यामध्ये अनेकदा रक्तपातदेखील घडून आलेला आहे. *सर्वप्रथम उल्लेख 'वेण' राजाचा येतो.*_
_*वेण हा यज्ञकर्माच्या विरुद्ध होता.* वेणापासून ब्राह्मणांना यज्ञकर्मात बाधा येत होती तेव्हा *मारीचा या ऋषीच्या नेतृत्वात सर्व मोठमोठ्या ऋषींनी त्याला पकडून रगडले. त्यातून निषिध याची उत्पत्ती झाली. हाच निषाद वंशाचा प्रवर्तक होता. याच निषादापासून ढिवर लोकांची उत्पत्ती झाली.*_
_*दुसरे उदाहरण पुरूरवा याचे आहे. हा एक क्षत्रिय राजा होता. हा इतकाचा पुत्र आणि वैवस्वत याचा नातू होता.*_
_यांचा संघर्ष नहुष आणि ब्राह्मणांमध्ये घडून आला जो काहीसा गंभीर असा होता. *नहुष पुरूरवाचा नातू होता. महाभारतात याचा उल्लेख दोन ठिकाणी आहे. एक वनपर्वात आणि दुसरा उद्योगपर्वात.*_
_*चौधे उदाहरण निमी राजाचे आहे. निमी हा इश्वाकूच्या पुत्रांपैकी एक होता. ब्राह्मणांसोबत झालेल्या नीमीचे वर्णन विष्णु पूराणात पाहावयास मिळते.*_
_*पाचवे उदाहरण वसिष्ठ आणि विश्वामित्र यांच्यामधील आहे. वसिष्ट हा ब्राह्मण पुरोहित होता आणि विश्वामित्र एक क्षत्रिय होता. विश्वामित्राची इच्छा ब्रह्मर्षी बनण्याची होती. या संघर्षाचे वर्णन रामायणामध्ये आढळते.* विश्वामित्र आणि वसिष्ठ बनण्याची संघर्ष सुदासच्या काळापासून चालत आलेला होता. सुदास हा इश्वाकू वंशातील होता. वसिष्ठ हा सुदासाचा कुलपुरोहित होता. काही कारणास्तव सुदास याने विश्वामित्राला आपला कुलपुरोहित नियुक्त केले. यावरून विश्वामित्र आणि वसिष्ठ यांच्यामध्ये संघर्ष घडून आला आणि हा संघर्ष दीर्घकाळापर्यंत सुरू राहिला._
_एक अन्य उदाहरण *अबरीष नावाच्या अयोध्येच्या राजाचे आहे. एक अन्य घटना त्रिशंकू राजाचा पुत्र हरिश्चंद्र याची आहे.*_
_या कथेची वर्णने *विष्णू पुराणात आणि मार्कन्डेय पुराणात वाचावयास मिळते. जगदग्नी याचा पुत्र परशुराम याचा व क्षत्रियांचा सुप्रसिद्ध संघर्ष आपणांस महाभारतात वाचावयास मिळतो.*_
_या *परशुरामाने २१ वेळा पृथ्वी क्षत्रियविहीन केली. या क्षत्रियांच्या विधवा स्त्रियांपासून वर्तमान क्षत्रिय उत्पन्न झाले असे शास्त्रात वर्णित करण्यात आले.*_
_मनू हा क्षत्रिय व ब्राह्मणांमध्ये समेट घडवून आणल्यास उत्सुक होता. एवढा मरणांतक संघर्ष घडून आल्यावरदेखील हे सगळे रहस्यमय वाटते. ब्राह्मणांची अचानक अधोगती, का झाली? *क्षत्रियांना जिंकण्यासाठी 'ब्राह्मणांचा असफल प्रयत्न का पडला? या रहस्याचे कारण काय असावे?"*_
*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*
*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_संदर्भ :- कांती आणि प्रतिक्रांती_*
*_लेखक :- डॉ बाबासाहेब आंबेडकर_*
*_संकलन :- महेश कांबळे_*
*_दिनांक :- २२/१२/२०२२_*
https://mikamblemahesh.blogspot.com/2022/12/blog-post_22.html
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
No comments:
Post a Comment