Thursday, 22 December 2022

शूद्र आणि प्रतिक्रांती

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_शूद्र आणि प्रतिक्रांती_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

          _*मनुस्मृतीचे अध्ययन केल्यास शूद्रांच्या स्थितीविषयी मनूच्या नियमात अत्यंत आश्चर्यकारक माहिती मिळते.* हिंदू समाजाचा सर्वांत मोठ्या संख्येने अधिक असलेल्या भागाविषयी हिंदूच्या मनोवृत्तीचे निर्धारण त्या वेळेला आणि वेळोवेळी या नियमांनी केले आहे. या नियमांना खाली दिलेले आहे. ज्यावरून वाचकांना शूद्रांच्या स्थितीविषयी पूर्ण माहिती मिळेल._

      _४. ६१ मनू हा ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य गृहस्थांना आदेश देतो की, ज्या देशाचा शासक शूद्र असेल त्या देशात त्यांनी राहू नये. शूद्र हा सन्मानित व्यक्ती होऊ शकत नाही. या बाबतीत मनू म्हणतो :_

         _११.२४ ब्राह्मण कधीही यज्ञकार्यासारख्या धार्मिक कार्याला शूद्राकडे धन मागणार नाही._

          _*शूद्रावर सर्व प्रकारच्या विवाहांना बंदी घालण्यात आली. तीनही उच्च वर्णाच्या स्त्रियांशी विवाह करण्यास शूद्रांना मनाई करण्यात आली. वरिष्ठ वर्गाच्या स्त्रियांशी शूद्रांनी कोणताही संबंध ठेवू नये असा मनूद्वारे शूद्रांना आदेश देण्यात आला आणि शूद्राने जर तिच्याशी व्यभिचार केला तर त्याला मृत्युदंडाच्या शिक्षेचे प्रावधान करण्यात आले.*_

        _*८. ३७४ शूद्राने उच्च वर्णाच्या संरक्षित अथवा असंरक्षित स्त्रीशी संभोग केला तर त्याला खालीलप्रमाणे शिक्षा द्यावी. स्त्री जर असंरक्षित असेल तर गुन्हा करणाऱ्याचा अवयव कापून टाकवा आणि ती जर संरक्षित असेल तर त्याला ठार करून त्याची मालमत्ता जप्त करावी.*_

        _*८.२० जर एखादा ब्राह्मण जन्माने केवळ ब्राह्मण असेल व त्याने वेदांचे अध्ययन केले असेल वा नसेल तरीही राजाला अशा ब्राह्मणाला न्यायाधीश बनविण्याचा अधिकार आहे; परंतु शूद्र कितीही विद्वान असला तरी त्याला तो अधिकार देऊ नये.*_

      _८. २१ शूद्राद्वारे न्यायदान करण्यात येणारे राज्य अधोगतीला पोचते._

        _*८.२७२ शूद्राने जर उद्यामपणे ब्राह्मणाला धर्मोपदेश देण्याचा प्रयत्न केला तर त्याच्या तोंडात व कानात उकळते तेल टाकावे.*_

*_शूद्राद्वारे ज्ञानार्जन करण्यासंबंधी मनू म्हणतो :_*

    _३. १५६ जो, शूद्र शिष्यांना शिक्षण देतो व ज्या शूद्रांचा तो शिक्षक होतो तो, शूद्रांचा शिक्षक या संबंधाने अयोग्य ठरविला जातो._

        _*४.९९ त्याने (ब्राह्मणाने) शूद्राच्या उपस्थितीत कधीही वेदपाठ करू नये.*_

            _शूद्राने वेदाध्ययन केल्यावर दंडाचे नियम तर मनूच्या नंतरच्या स्मृतिकारांनी अधिकच कठोर असे बनविले._       

            _*उदाहरणार्थ कालायनने असे सांगितले आहे की, शूद्राने जर वेद ऐकले किंवा वेदातील एखाद्या शब्दाचा उच्चार जरी केला तर राजा त्याच्या जिभेचे दोन तुकडे करील आणि त्याच्या कानात उकळलेले शिसे टाकील.*_ 

_*शूद्राने मालमत्ता बाळगण्यासंबंधी मनूचे नियम खालीलप्रमाणे :*_

      _१०.१२९ धनसंपत्ती जमविण्यास शूद्र समर्थ असले तरीदेखील त्याने ती जमवू नये; कारण धनसंपत्ती जमविल्यावर असा शूद्र अहंकारी बनतो._

       _८.४१७ जर एखादा ब्राह्मण आपली जीविकोपार्जन करण्यास असमर्थ असेल तर निःसंकोच तो शूद्राची संपत्ती हिसकावून घेऊ शकतो._

         _*शूद्र केवळ एकच व्यवसाय करू शकतो. मनूच्या आठ अपरिवर्तनीय नियमांमध्ये हासुद्धा अपरिवर्तनीय नियम आहे. या बाबतीत मनू म्हणतो.*_

      *_१.९१ ब्राह्मनाने शूद्रांकरिता एकच व्यवसाय ठरवून दिला आहे. तो म्हणजे विनम्रतापूर्वक तीनही वर्ण ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्यांची सेवा करणे होय._* 

        _१०.१२१ एखादा शूद्र जर ब्राह्मणाची सेवा करून जगण्यास असमर्थ असेल तर त्याने क्षत्रियाची सेवा करावी. नाही तर वैश्याची सेवा करून जगावे._

     _*१०.१२२ ब्राह्मणांची सेवा केल्याने शूद्राच्या सर्व प्रकारच्या इच्छा पूर्ण होतात. या जीवनात व पुढच्या जीवनात शूद्राला ब्राह्मणाची सेवा केल्याने स्वर्गलाभ होईल.*_

         _*१०.१२३ ब्राह्मणांची सेवा करणे हाच शूद्रासाठी सर्वोत्तम व्यवसाय आहे, असे ठरविण्यात आले आहे. कारण याव्यतिरिक्त तो जो काही करतो ते सगळे व्यर्थ (निष्फळ) ठरते.*_

           _शूद्रांकडून सेवा कर्म करण्यासाठी कुठल्याही कराराची आवश्यकता नाही, असे मनूला वाटते तर शूद्राकडून बलपूर्वक सेवा करून घेण्यात यावे असे मनूने नियमात खालीलप्रमाणे सांगितले आहे._

        _*८.४१३ प्रत्येक ब्राह्मण शूद्राकडून सेवा करून घेण्यासाठी बळजबरी करू शकतो. जरी तो ब्राह्मणाचा गुलाम असो वा नसो. कारण शूद्रांचे जीवन हे ब्राह्मणांच्या सेवेकरिताच बनलेले आहे. ब्राह्मणाने शूद्रांना त्याची योग्यता, त्याने केलेली सेवा आणि शूद्रांच्या परिवारातील संख्या पाहून पोषण मोबदला द्यावा.*_

          _१०.१२५ शूद्रांनी वाचलेले अन्न व घरातील शिल्लक राहिलेले जुने पुराने द्यावे. मनूच्या मतानुसार शूद्राने इतरांशी बोलताना आणि व्यवहार करताना गुलामाप्रमाणे विनम्रपणे राहिले पाहिजे._

         *_८.२७० शूद्राने जर ब्राह्मण जातीचा व नावाचा उच्चार तिरस्काराने केला तर त्याची जीभ कापावी. कारण तो जन्मानेच नीच कुळात जन्मलेला आहे._*

        _*८.२७१ शूद्राने जर ब्राह्मण जातीचा अथवा नावाचा उच्चार तिरस्काराने केला तर दहा उंगल लांबीची लोखंडी सळाक तापवून लाल करून त्याच्या तोंडात घालावी.*_ 

       _*शूद्रांचा हलका दर्जा त्याच्या नावातूनसुद्धा प्रकट व्हायला पाहिजे.* निरनिराळ्या वर्णातील लोकांची नावे कशी असावीत याबद्दल मनू म्हणतो._

      _*२.३१ ब्राह्मणाचे नाव मंगलसूचक, क्षत्रियाचे नाव शक्तिसूचक, वैश्यांचे नाव धनसूचक तर शूद्राचे नाव दासभाव सूचक असावे.*_

           _*मनूच्या पूर्वी शूद्रांची स्थिती काय होती? शूद्रांचे वर्णन मनू बाहेरून आलेल्या परकीय अनार्याप्रमाणे करतो. कुठल्याही प्रकारचे सामाजिक आणि धार्मिक अधिकार शूद्रांना प्राप्त होऊ नयेत. अशी धारणा मुद्दाम लोकांच्या मनात भरविली गेली की, शूद्र हे अनार्य होते. परंतु या बाबतीत कुठलीही शंका नाही की, प्राचीन आर्य साहित्यात यासंबंधी कुठलाही पुरावा आढळत नाही.*_

         _*आर्याच्या धार्मिक साहित्याचा अभ्यास केल्यावर त्यात विविध जाती समुदायांचा उल्लेख आढळतो. सर्वप्रथम आर्यांचा उल्लेख सापडतो. आर्यामध्ये चार वर्ण होते. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. याव्यतिरिक्त आर्यापेक्षा वेगळ्या अशा १) असुर २) सुर अथवा देव ३) यक्ष ४) गंधर्व ५) किन्नर ६) चारण, अश्विनी आणि निशाद इत्यादी नावांचा उल्लेख सापडतो.*_

        _*निषाद हे वनातील रहिवासी असून आदिम व असंस्कृत होते. गंधर्व, यक्ष, किन्नर, चारण आणि आश्विनी हे व्यावसायिक वर्ग होते. असुर हे सामान्य नाव असून विशिष्ट जनसमुदायांना दिलेले नाव आहे, या जनसमुदायांना विभिन्न नावांनी ओळखले जायचे. जसे दैत्य, दानव, कलंज, कलेय, कालिन, नाग, निवात, कवच, पुलोम, पिशाच आणि राक्षस, ही सर्व एकाच जनसमुदायाची विभिन्न नावे आहेत.*_

          _आपणास दोन समुदायांतील प्रमुख देवांची नावे माहिती आहेत. उदा. ब्रह्मा, विष्णू, रूद्र, सूर्य, इंद्र, वरुण आणि सोम इत्यादी. *सायणाचार्याच्या भ्रामक लिखाणामुळे बुद्धिमान माणसांनादेखील वरील नावाबद्दल भ्रम पडलेला आहे. लोकांचा यावर विश्वास बसला आहे की, असुर हे मानवसमूहातील नव्हते. तर हे असुर लोक रात्र झाल्यावर आर्यांना त्रास देणारे भूत-पिशाच्च होते. देवांना मात्र नैसर्गिक शक्तीचे प्रतीक म्हणून समजले गेले. आर्यात अशी धारणा सुर आणि आहे की ते गोऱ्या रंगाचे, सरळ नाकाचे व गौर वर्णाचे असून त्यांना याबद्दल अभिमान होता. दस्यू (अनार्य) लोकांबद्दल ही धारणा आहे की, ते येथील आदी निवासी होते. त्यांचा रंग काळा आणि नाक चपटे होते. आर्यांनी भारतावर आक्रमण करून अनार्य लोकांना पराजित केले व त्यांना आपले दास बनविले. दास या अर्थाने पराजितांना दस्यू हे नाव दिले गेले.*_

           _*'दस्यू' हा शब्द दास या शब्दापासून बनलेला असून तो गुलाम या अर्थाने वापरला जातो. या सर्व धारणा चुकीच्या आहेत. असुर आणि सुर, दोघेही आर्य समुदायांतील समान लोक होते. दोघांचा ही पिता 'काश्यप' होता. काश्यप याच्यापासून जन्मलेल्या 'दिती' पासून जे उत्पन्न झाले ते दैत्य व आदितीपासून उत्पन्न झाले ते देव अथवा सुर या नावे प्रसिद्धीला आले. या दोघांमध्ये पृथ्वीवर अधिपत्य स्थापित करण्यासाठी तुंबळे युद्धे झालीत. अशा प्रकारची पौराणिक कथा आहे. निःसंशय पौराणिक कथादेखील एक इतिहासच आहे. ज्याला विकृत करून ब्राह्मणांद्वारे सांगण्यात आले आहे.*_

          _*आर्य कोणत्याही एका प्रजातीचे नाव नाही. तो काही लोकांचा समूह आहे. आर्य संसकृती या नावाची एक विशिष्ट संस्कृती होती. ज्यामध्ये आर्याचे हितसंबंध गुंतलेले होते. जी व्यक्ती आर्यात सामील होण्याची इच्छा ठेवीत असे. तिला आर्य संस्कृती स्वीकारावी लागत असे. आर्यांमध्ये काळ्या रंगाचे, चपट्या नाकाचे असे कोणत्याही प्रकारचे लोक नव्हते. जे आर्याहून स्वरूपात भिन्न होते. वरील धारणा 'वर्ण' आणि 'अनास' या शब्दाचा चुकीचा अर्थ लावला गेल्यामुळे तयार झालेली आहे.*_

         _*'वर्ण' या शब्दाचा अर्थ रंग आणि 'अनास' या शब्दाचा अर्थ 'नाक नसलेला' असा करण्यात आला. हे दोन्हीही अर्थ चुकीचे आहेत. जाती या अर्थाने वर्ण आणि अन् + आस = मुख किंवा आकृतिरहित या अर्थाने अनास असा अर्थ लावला तर आर्य हे रंगाप्रती पूर्वग्रही होते याला कोणताही आधार सापडत नाही. वर्णासंबंधी प्रचलित धारणा ही चुकीच्या कल्पनांवर आधारलेली आहे.*_

           _*दस्यू हे वेगळ्या प्रजातीचे नसून आर्य समुदायातील लोक होते. आयपिक्षा भिन्न संस्कृतीशी यांचा संबंध होता. आर्यांच्या विरोधात्मक धोरणांशी यांचा संबंध असल्यामुळे आर्यांनी यांना वेगळे नाव दिले. म्हणून दास हे वेगळ्या प्रजातीचे नाव होते हे सिद्ध करणे कठीण आहे. असे समजणेदेखील चुकीचे आहे की आर्य आक्रमणकारी लोकांनी शूद्रांवर विजय प्राप्त केला.*_

           _*प्रथम गोष्ट ही की या गोष्टीचा कोणताही पुरावा आढळत नाही की आर्यांनी भारताबाहेरून आक्रमण केले व त्यांनी येथील लोकांनी गुलाम बनविले.*_

         _*या बाबतीत अनेक पुरावे देता येतील की आर्य हे भारतातील मूळनिवासी होते. या बाबीचे कुठलेही प्रमाण नाही की, आर्य आणि दस्यूंमध्ये युद्ध झाले. वस्तुतः दस्यूंचा कुठलाही संबंध नाही.*_

         _*दुसरी महत्त्वाची गोष्ट ही की, या गोष्टीवर विश्वास ठेवणेही शक्य नाही की आर्य लोक हे शक्तिशाली असून त्यांनी अनार्यांना बळाच्या जोरावर अंकित केले. अशी कल्पनादेखील करणे मूर्खपणाचे आहे की, कमजोर अशा आर्य लोकांनी शूद्रांवर विजय प्राप्त केले. दास व आर्य हे एकाच प्रजातीचे लोक असून सांस्कृतिकदृष्ट्या भिन्न होते. दस्यू म्हणजे अनार्य या अर्थाने 'आयपिक्षा वेगळी संस्कृती मानणारे लोक' असा होतो. यांनी आर्यांना विरोध केला. शूद्र हे आर्यांतीलच लोक असून आर्यांच्या जीवनपद्धतीवर यांचा विश्वास होता.*_

       _*कौटिल्याच्या काळापर्यंत शूद्रांना आर्य मानण्याची परंपरा भारतात कायम होती.*_

         _*शूद्र हे आर्य समुदायातील, जन्म-जात, अभिन्न आणि सन्मानित सदस्य होते. या गोष्टीचा उल्लेख यजुर्वेदातील एका श्लोकांत आढळतो.*_

            _*राजाच्या राज्याभिषेकाच्या वेळी शूद्रांनीदेखील ब्राह्मण, वैश्य आणि क्षत्रियाप्रमाणे आमंत्रित केले जात असे. या गोष्टीचा पुरावा महाभारतातील पांडवांचे ज्येष्ठ बंधू युधिष्ठिराच्या राज्याभिषेकाच्या वर्णनाच्या वेळी सिद्ध होते. नीलकंठ नामक प्राचीन विद्वानानुसार एका राजाच्या राज्याभिषेकाच्या वेळी चार प्रमुख मंत्री ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र यांनी राजाचा अभिषेक केला. यानंतर प्रत्येक वर्णातील प्रमुख तसेच लहान जातीतील प्रमुखांनीसुद्धा पवित्र जलाने राजाचा अभिषेक केला. यानंतर द्विजांनी राजाचा नावाचा जयघोष केला.*_

           _*वैदिक युगाच्या नंतर आणि मनुपूर्व काळात जनप्रतिनिधींचा एक वर्ग होता- त्यांना 'रत्नी' असे म्हणत असत. राज्याच्या राज्याभिषेकाच्या वेळी हे विशेष भूमिका करीत असत. यांना रत्नी यासाठी म्हणत; कारण की यांच्याकडे 'रत्न' असे, जे सत्तेचे प्रतीक असत. राजाला तेव्हाच सत्ता प्राप्त होत असे जेव्हा हे रत्नीगण स्वतःजवळील रत्न राजाला बहाल करीत असत. राजत्व प्राप्त झाल्यानंतर राजा प्रत्येक 'रत्नी'च्या घरी जात असे आणि त्याला 'उपहार' (भेट) प्रदान करीत असे. महत्त्वाची गोष्ट ही की शूद्र हादेखील एक रत्नी असे.*_

            _*प्राचीन काळात शूद्र दोन महत्त्वपूर्ण राजकीय संस्थांमध्ये अहम भूमिका निभावीत असत ज्यांना जनपद आणि पौर म्हणत असत. या संस्थांचे अधिकारी शूद्र असल्यामुळे ब्राह्मणांनादेखील शूद्रांना मान देणे भाग पडत असे.*_

       _*हे सत्य निर्विवाद आहे की प्राचीन आर्य समाजात शूद्रांनी उच्च राजकीय प्रतिष्ठा प्राप्त होती. ते राज्याचे मंत्रीसुद्धा बनू शकत. याचे प्रमाण आपणास महाभारतात मिळते._*

             _*महाभारतकार ३७ मंत्र्यांची एक सूची देतो ज्यामध्ये ४ मंत्री ब्राह्मण, ८ मंत्री क्षत्रिय, २१ मंत्री वैश्य आणि ३ मंत्री शूद्र होते आणि १ मंत्री 'सूत' होता.*_

        _*शूद्र केवळ मंत्रीच बनू शकत असे नाही तर राजेसुद्धा बनू शकत.* एखादा शुद्र राजा बनू शकतो किंवा नाही याबद्दल मनूची धारणा शूद्राविषयी ऋग्वेदामध्ये उल्लेखित कथेच्या अगदी विपरीत आहे._

             _*वेदामध्ये वर्णित 'सुदास' हा राजा दिवोदास याचा पुत्र असून तो शूद्र होता, हे वाचून कित्येकांना आश्चर्य वाटेल.* या काळातील ब्राह्मण वसिष्ठ आणि क्षत्रिय विश्वामित्र यांच्यामध्ये राजपुरोहित बनण्यावरून चाललेला वाद प्रसिद्धच आहे._

          _*या वादावरून हे सिद्ध होते की ब्राह्मण अथवा शूद्र, क्षत्रिय एका शूद्र राज्याच्या अधीन कार्य करण्यास कुठलाही कमीपणा मानत नसत; उलट राजाची कृपा प्राप्त करण्यासाठी त्यांच्यामध्ये प्रतिस्पर्धा चालत असे किंबहुना शूद्रांकडे वैदिक कर्म करण्यास ब्राह्मण सदैव तत्पर असत.*_

        _*यानंतरचेदेखील राजे हे शूद्र झालेले नाही असे देखील नाही. परंतु याउलट मनूच्या पूर्वी शूद्र राज्यांची दोन साम्राज्ये होती.' नंदांना जे शूद्र होते इ. पूर्व ४१३ ते ४२२ पर्यंत राज्य केले. यानंतर मौर्यानी इ. पूर्व ३२२ ते १८३ पर्यंत शासन केले हे सुद्धा शूद्रच होते.*_

           _*ऋग्वेदाच्या १० व्या मंडलातील अनेक मंत्रांची रचना कवी 'एलूष' नावाच्या शूद्र ऋषीने केली आहे. पूर्वमीमांसा, कात्यायन श्रौत सूत्र आणि शतपथ ब्राह्मण यामध्ये शूद्रांच्या योग्यतेबद्दल भरपूर पुरावे मिळतात. सुप्रसिद्ध अश्विनीकुमार हा- सुद्धा शूद्रच होता.*_

             _ऋषिगणांद्वारा नीच समजल्या जाणाऱ्या लोकांतील काही सुज्ञ, धनवान आणि बलशाही लोकांना शुद्ध करण्याच्या संस्काराला 'व्रात्यस्तोम' म्हणत. याचे वर्णन 'पंचवीस' ब्राह्मणांमध्ये केले गेले आहे._

           _व्रात्य लोकांना गृहस्थी जीवनात संस्कारित करण्याकरिता वरील संस्कार करण्यात येत असत. आर्य संस्कृतीत संस्कारित झाल्यानंतरच अशा लोकांना गृहस्थी जीवनाची अनुमती ऋषीद्वारा देण्यात येत असे. संस्कारानंतरच या लोकांची सर्व संपत्ती ब्राह्मणांना दान म्हणून वाटण्यास येत असे._

          _संस्कारित लोक ब्राह्मणांच्या बरोबरीचा दर्जा प्राप्त करू शकत. ते चारही वेद वाचू शकत._

         *अशा प्रकारे आर्य लोक आपल्या संस्कृतीमध्ये इतरांना वरील व्रात्यस्तोम संस्काराद्वारे परिवर्तीत करून आर्य संस्कृतीचा फैलाव करीत.*_

            _*असुर आर्यांच्या यज्ञसंस्कृती आणि चातुर्वर्णच्या विरोधी होते. त्यांनादेखील आर्य संस्कृतीत हजारोंच्या संख्येने परिवर्तीत करण्यात येत असे. हिरण्यकश्यपचा मुलगा प्रल्हाद याला अशाच प्रकारे आर्यसंस्कृतीत परिवर्तीत करण्यात आले होते. परंतु शूद्र विरोधी दृष्टिकोन का स्वीकारण्यात आला? त्यांना बहिष्कृत का करण्यात आले?*_

*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_संदर्भ :- कांती आणि प्रतिक्रांती_*

*_लेखक :- डॉ बाबासाहेब आंबेडकर_*

*_संकलन :- महेश कांबळे_*

*_दिनांक :- २२/१२/२०२२_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2022/12/blog-post_57.html

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

No comments:

Post a Comment

कोलित सुत्त

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_कोलित सुत्त_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_41.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼  _'कोलित सुत...