Thursday, 15 December 2022

हिंदू समाजाचे आचार विचार

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_हिंदू समाजाचे आचार विचार_*

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

              _हिंदूंचे आचारविचार आणि धार्मिक सिद्धांत स्मृतीवर आधारित आहेत. या स्मृतीची गणना हिंदूच्या पवित्र धार्मिक साहित्यात केली जाते. जर *आपणास हिंदूंचे नैतिक आणि धर्मविषयक विचार माहीत करून घ्यावयाचे झाल्यास, या स्मृतींचे अध्ययन करणे आवश्यक आहे. अशा स्मृतींची संख्यादेखील कमी नाही. साधारणतः स्मृतींची संख्या १०८ मानण्यात येते.* स्मृतींची ही मोठी संख्या मात्र आपणास अडचण ठरू शकणार नाही. जरी या स्मृती वेगवेगळ्या आल्या तरी त्या एकमेकांपासून मूलतः भिन्न नाहीत. या सर्वांमध्ये इतकी समानता आढळून येते की यांचे वाचन करताना बहतेक वाचकांना कंटाळा आल्याशिवाय राहात नाही. *या सर्वांचे मूळमात्र एकच आहे. तो आहे 'मनुस्मृती' जी 'मानव धर्मशास्त्र' या नावानेदेखील ओळखली जाते.. सर्वं स्मृतींची पुनरावृत्ती मनुस्मृतीपासूनच गेली आहे. सर्व स्मृतींचे मूळ मनुस्मृती यात असल्याकारणाने हिंदूंचे नैतिक आचारविचार आणि धार्मिक संकल्पना जाणून घेण्यासाठी मनुस्मृतीचे अध्ययन करणे आवश्यक आहे. मनुस्मृती ही कायद्याची संहिता आहे.* हीच गोष्ट इतर स्मृतिनादेखील लागू आहे. हे नीतिशास्त्रही नाही किंवा धार्मिक ग्रंथदेखील नाही. *नियमांच्या कुठल्याही संहितेला नीतिविषयक आणि धार्मिक शिकवणुकीचा ग्रंथ समजणे म्हणजे नीतिशास्त्र, धर्म आणि कायदा यात गफलत निर्माण करणे होय.*_
              _धर्माला कायद्यापासून वेगळे करणे हे आधुनिक समाजाचे कृत्य आहे. *प्राचीन काळात कायदा आणि धर्म एकच होते. हे प्रो. मॅक्समुल्लर आणि सर हेन्री मेन्स यांनी पटवून दिलेले आहे.* प्राचीन काळात दैवीशक्तीच्या रूपात धर्म हा जीवनाच्या प्रत्येक अंगाशी आणि सामाजिक संस्थाशी जोडलेला असे. *सर हेन्री मेन्सच्या मते, धर्म ही एक अलौकिक सत्ता असून तिचा उद्देश प्रमुख संस्था, राज्य, जाती आणि परिवार इत्यादींची पवित्रता कायम ठेवून परस्परांना जोडणे हे असे.*_
                _धर्माला कायद्याच्या स्थानापासून वेगळे करणे कित्येक शतके संभव न झाल्यामुळे धर्माचे स्थान अढळ राहिले. पुढील काळात मात्र हे शक्य झाले. परंतु आतादेखील याची चिन्हे आजतागायत दिसत असल्यामुळे मानव इतिहासाच्या सुरुवातीला धर्माचे केवढे मोठे प्राबल्य होते हे दिसून येते._
             _आधुनिक युगात धर्म आणि नैतिकतेमध्ये भेद केला गेला. धर्म आणि नैतिकतेचा एकमेकांशी इतका जवळचा घनिष्ठ संबंध आहे की त्यांना वेगळे करणे जवळपास अशक्यप्राय आहे. सदाचार आणि नैतिकता हे व्यवहाराचे विषय आहे. *प्रो. जॅक्सनने जोर देऊन सांगितले आहे की नैतिकता ही लोकांना माहीतच पाहिजे असे नाही तर लोकांनी चांगले राहावे हा नैतिकतेचा मूळहेतू आहे. एवढेच नव्हे तर योग्य आहे त्याला वैज्ञानिकता आधार देऊन जीवनात अनुकरण करण्यायोग्य बनवावे.*_    
                _जोपर्यंत या नैतिकतेत सदाचाराच्या पालनाला एखाद्या प्रेरक शक्तीची जोड असत नाहीत तोपर्यंत सदाचार निष्क्रिय ठरतो. म्हणून सदाचाराची प्रेरक शक्ती ही धर्मात निहित असते. धर्म हीच खरीखुरी शक्ती असते._
              _*प्रो. जॅक्सच्या मते “यातून आपणास प्रेरणा मिळते. या प्रेरणेमुळेच आपण जीवन जगण्यास प्रवृत्त होतो. जीवनात येणाऱ्या मोठमोठ्या बाधादेखील आपणास या प्रेरणामुळेच पार करू शकतो. या प्रेरणा दिसावयास साधारण जरी असल्या तरी याद्वारे नैतिक सदाचाराच्या मार्गावर मनुष्य सदैव मार्गक्रमण करीत जातो. कधी ही प्रेरणा निषेज्ञांच्या स्वरूपात असते तर ती कधी पवित्र नियमांच्या स्वरुपात असते. यांचे अनुसरण लोक श्रद्धेने करतात. परंतु ही सगळी वेगवेगळी रूपे आहेत. ज्याद्वारे धर्मरूपी प्रेरक शक्तीद्वारा सदाचारांच्या नियमांच्या पालनांची भावना लोकांमध्ये वसत असते. धर्म ही ऊर्जा आहे. जी सदाचाराच्या चक्राला नियंत्रित करीत असते.*_
              _सदाचार आणि नैतिकता जर कर्तव्य असतील तर निःसंदेह मनुस्मृती हा नीतिशास्त्राच ग्रंथ आहे. जो कुणी मनुस्मृती वाचण्याचे कष्ट घेईल त्याला हे निश्चितच आढळून येईल की या ग्रंथामध्ये मुख्य विषय जर कुठला असेल तर तो कर्तव्याबाबत आहे._
               _'मनू' हा सर्वप्रथम अशी व्यक्ती होती जिने या कर्तव्यांना आणि नियमांना व्यवस्थित व संहिताबद्ध केले. हे नियम पालन करणे हिंदूंना बंधनकारक करण्यात आले. मनू हा वर्णाश्रम धर्म आणि साधारण धर्म यात भेद करतो. वर्णाश्रम धर्मामध्ये समाविष्ट कर्म हे जीवनाच्या विशिष्ट अवस्थांशी संबंधित आहेत. यातील निर्णय है त्या जातीपुरते किंवा वर्णापुरते मर्यादित आहेत तर साधारण नियम हे मनुष्य असल्या कारणाने आचरण करावयाचे आहेत. या संपूर्ण ग्रंथात कर्तव्याशिवाय काहीही सांगितलेले नाही._
           _अशाप्रकारे मनुस्मृती ही कायद्याची संहिता आहे; कारण यामध्ये धर्म आणि सदाचाराला जोडण्यात आलेले आहे. हा आचारशास्त्राचा ग्रंथ आहे; कारण की यात मनुष्याच्या कर्तव्याचा समावेश केला गेला आहे. *मनुस्मृती हा धर्मग्रंथ आहे; कारण की यात हिंदूंच्या धर्मरूपी जीवनाचा आत्मा असलेल्या जातीचे वर्णन केले गेले आहे. या नियमाचे उल्लंघन केले गेल्यास दंडाचे प्रावधान असल्याने मनुस्मृती ही कायद्याची संहिता आहे. या सर्व बाबी लक्षात घेतल्यास हिंदूंच्या आचारविचारांच्या आदर्शाना आणि त्यांच्या धार्मिक संकल्पना माहीत करावयाचे असल्यास मनुस्मृतींचा सहारा घेणे आवश्यक ठरते. मनुस्मृतीला धर्मग्रंथ मानणे हे फारच विसंगत वाटते; कारण हे आहे की हिंदू धर्म हाच मुळी भ्रामक आहे.* अनेक लेखकांनी याची व्याख्या वेगवेगळ्या प्रकारे केली आहे._
          _*सर डी. इबटसन हिंदू धर्माच्या व्याख्या पुढीलप्रमाणे करतो "ब्राह्मणांद्वारे पौरोहित्य संपन्न केला गेलेला वंशानुगत धर्म ज्यात जातींचा समावेश होतो. जाती ही भारतात जन्मलेल्या प्रत्येक व्यक्तीला धर्माच्या स्वरूपात जीवनाच्या विविध अंगांशी जोडलेली असते जे ख्रिश्चन, इस्लाम आणि बौद्ध वेगळेपणा दर्शवीत असते. हा धर्म शीख आणि जैन धर्मापासूनदेखील वेगळा आहे. "*_
          _*सर जे. ए. बेन्सनुसार लोकांची एक प्रचंड संख्या जी न बौद्ध आहे न शीख आहे, न इस्लाम न पारसी कि न हिंदू वा ख्रिश्चन आहे.*_
          _*सर एडवड गैटनुसार : मतमतांतराचा एक असा समुच्चय ज्यात एकेश्वरवाद, बहुदेववाद, सर्वेश्वरवाद, महादेव, शिव, विष्णू, दुर्गा, लक्ष्मी आणि वृक्ष, दगड तसेच नद्या इत्यादीच्या पूजनाचा समावेश होतो. यात लोक वरील वस्तूंना बळी देऊन संपुष्ट करतात. धर्माच्या नावावर हे लोक जपजाप्य करतात.*_
             _*हिंदू धर्माच्या धार्मिक स्वरूपाबद्दल सर अल्फ्रेड लायल म्हणतो, “हिंदू धर्म हा खोट्या अंधश्रद्धा, आचारविचार उपासना पद्धती, रूढी, परंपरा आणि पौराणिक कथांचा समावेश असलेल्या गुंतागुंतीचा समुच्चय आहे. यांना ब्राह्मणांची मान्यता असून याचा प्रचारदेखील ब्राह्मण करतात.*_
           _*श्री सेननुसार एखादी व्यक्ती तेव्हाच हिंदू म्हणून गणली जाते जेव्हा ती एखाद्या जातीत जन्म घेतो. प्रत्येक हिंदू हा जातीवर विश्वास करतो आणि गर्व करतो.*_
          _*प्रो. मॅक्युमुल्लरनुसार : आधुनिक हिंदू धर्म हा जातीवर आधारित आहे. एखाद्या पाषाणावर तो आधारित असून ज्याला कुणीही हलवू शकत नाही.*_
           _यांचे तात्पर्य हे आहे की जर मनुस्मृतीने जातीच्या सिद्धांतांना निर्धारित केले आणि हिंदू धर्माच्या मुळाशी जाती आहेत तेव्हा मनुस्मृतीला धर्मग्रंथ म्हणून स्वीकारणे आवश्यक ठरते._
_३.११० ब्राह्मणांच्या घरी येणारा क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र, परिचित, मित्र आणि गुरु 'अतिथि' अर्थात पाहूणे म्हणविले जाणार नाही._
_३. १११ जर क्षत्रिय ब्राह्मणाच्या घरी पाहुणा म्हणून गेला तर प्रथम ब्राह्मण भोजन करेल तद्नंतर क्षत्रिय भोजन करेल._
_३.११२ ब्राह्मणांच्या घरी वैश्य किंवा शूद्र पाहुणा बनून आल्यास त्यांना नोकरासमान वागवावे._
            _एका वर्णाची स्थिती दुसऱ्या वर्णाच्या तुलनेत कशी असेल याबाबत समीकरण मनूने मांडलेले आहे ते तर फारच रोचक आहे._
_२.१३५ विद्यार्थी ब्राह्मणांना मग तो दहा वर्षांचा जरी असेल आणि क्षत्रिय हा जर शंभर वर्षांचा असला तरी पिता आणि पुत्र समजावा. यातही युवक ब्राह्मणाला वडिलासमान आदर द्यावा._
_२.१३९ जर एखादा असा प्रसंग उद्भवला का राजकुमार आणि ब्राह्मण स्नातक एकसाथ स्वगृही परत येत असतील तर राजकुमाराच्या तुलनेत ब्राह्मण स्नातकाला अधिक सन्मान द्यावा._
_३.१०० पृथ्वीवर जे काही आहे ते सर्व ब्राह्मणांचे आहे. अर्थात ब्राह्मणांचा जन्म उच्च कुळात झाला असल्याकारणाने तो पृथ्वीवरील सर्व वस्तूंचा स्वामी आहे._
_*३.३१७ ब्राह्मण हा जरी मूर्ख असो किंवा विद्वान दोन्ही रूपात तो श्रेष्ठ आहे. देवतातुल्य असल्याकारणाने ब्राह्मण हा कायदा आणि राजापेक्षाही श्रेष्ठ आहे.*_
_७.३७ राजाने विद्वान ब्राह्मणाची दररोज सेवा करावी. वेद माहीत असलेल्या वृद्ध ब्राह्मणाचीसुद्धा राजाने रोज सेवा करावी._
_७.३८ वृद्ध ब्राह्मणाची राजाने रोज सेवा करावी._
_११.३५ ब्राह्मण हे गुरू आणि संपूर्ण जगाचे रक्षक आहेत. मनू स हितेत विभिन्न वेद माहिती असलेल्या जातीद्वारे करावयाच्या व्यवसायाचादेखील उल्लेख आहे._
_१.८८ स्वयंभू मनूने ब्राह्मणांचे कर्तव्य म्हणून वेदाध्ययन, वेदांची शिक्षा देणे, यज्ञ करणे, दान देणे आणि दान घेणे इत्यादी आहेत._
_१.८९ दान देणे, प्रजेचे रक्षण, यज्ञ करणे, वेदाध्ययन इत्यादी क्षत्रियांची कर्तव्ये आहेत._
_१.९० पशुपालन, व्यापार करणे, दान देणे, यज्ञ करणे, शेती करणे इत्यादी वैश्यांची कर्तव्ये आहेत._
_१.९१ शूद्रांनी आनंदित राहून केवळ तीनही वर्णांची मनोभावे सेवा करावी._
_*१०.७५ वेदांचे अध्ययन, अध्यापन, यज्ञ करणे, इतरांना यज्ञ करण्यात मदत करणे, ब्राह्मण गरीब असेल तर इतरांकडून दान स्वीकारणे ही सहा कर्तव्ये ब्राह्मणांची आहेत.*_
_१०.७६ ब्राह्मणांकरिता निर्धारित सहा कर्तव्यांतील तीन कर्तव्ये त्याच्या जीविकेकरिता आहेत. ती क्षत्रियांना लागू होऊ शकत नाहीत. अर्थात वेदांचे अध्यापन (शिकविणे), यज्ञ करणे आणि दान स्वीकारणे._
_१०.७८ वरील तीन कर्तव्ये ही वैश्यांनादेखील लागू वर्जित (मनाई) आहेत. कारण की परमपिता ब्रह्माने ही कर्तव्ये क्षत्रिय आणि वैश्य वर्णाला लागू केलेली नाहीत._
_१०.७९ जीविकेकरिता शस्त्र धारण करणे हा क्षत्रियाचा व्यवसाय आहे तर व्यापार, पशुपालन आणि कृषी हा वैश्यांचा व्यवसाय आहे. परंतु पुढील हाच जन्म प्राप्त करून घ्यावयाचा असेल तर क्षत्रियांनी व वैश्यांनी दान देणे, अध्ययन आणि यज्ञ करणे इत्यादी कर्तव्ये करावीत._     
            _श्रेणी आणि व्यवसाय निश्चित केल्यानंतर काही वर्गांना मनूने विषेशाधिकार बहाल केले आहेत तर काहींना दंडाचे प्रावधान केले आहे._
_*जेथपर्यंत विशेषाधिकाराचा प्रश्न आहे. विवाहाच्या संबंधित विशेषाधिकारांचा प्रथम विचार करू.*_
_३.१२ द्विज वर्गातील लोकांनी त्यांच्या वर्गातील स्त्रीशी प्रथम विवाह करावा. दुसऱ्यांदा लग्न करावयाचे असल्यास आपल्यापेक्षा खालच्या वर्गातील स्त्रीशी विवाह करावा._
_३.१२ शूद्र स्त्री केवळ शूद्राचीच पत्नी बनू शकेल. त्याचप्रमाणे वैश्य स्त्री वैश्याची, क्षत्रिय स्त्री क्षत्रियाची तर शूद्र स्त्री शूद्राशी आणि ब्राह्मण स्त्री ब्राह्मणाची पत्नी बनेल._
_*अश्या प्रकारे व्यवसायातदेखील काही विशेषाधिकार देण्यात आले आहेत. एखाद्या वर्णावर संकट आल्यास वेळप्रसंगी तो काय करील याचेही वर्णन मनूने केलेले आहे.*_
_१०.८१ जर ब्राह्मण आपल्या निर्धारित वर्णानुसार व्यवसाय करू शकत नसेल तर त्याने क्षत्रियाचा व्यवसाय करावा. कारण की क्षत्रिय हा त्याचा नंतरचा वर्ण आहे._
_१०.८५ जर असा ब्राह्मण क्षत्रियाचा व्यवसायदेखील करण्यास असमर्थ असेल तर त्याने वैश्याचा व्यवसाय करावा._
_१०.१०२ संकटामध्ये सापडल्यावर ब्राह्मण कोणत्याही व्यक्तीद्वारा दान ग्रहण करू शकतो. कारण की याबाबत कुठलाही शुद्धता अशुद्धतेचा नियम नाही._
_१०.१०३ इतरांना वेदाध्ययन करविणे, यज्ञ करविणे आणि त्याद्वारे दान स्वीकारणे संकटात सापडलेल्या ब्राह्मणांना वर्जित नाहीत; कारण की तो मूलतः पवित्र आहे._
 
_याच तुलना जर इतर वर्णातील लोकांशी करून पाहिली तर मनू म्हणतो_
_१०.९६ खालच्या वर्गातील मनुष्य जर लोभीवृत्तीने वरच्या वर्गाचे अनुसरून करू लागला अथवा जीविका कमावू लागला तर राजाने त्याची सर्व संपत्ती जप्त करून त्याला तत्काल निष्कासित करावे._
_१०.९८ जो इतराचा धर्म स्वीकारतो तो स्वधर्मापासून वंचित होतो._
_१०.१२१ जर एखादा शूद्र जीविकोपार्जन करू इच्छिल्यास त्याने प्रथम ब्राह्मणांची सेवा करावी. नंतर क्षत्रियाची सेवा करावी व क्षत्रियही न मिळाल्यास वैश्याची सेवा करावी._
_१०.१२३ ब्राह्मणांची सेवा करणे हेच शूद्राचे प्रथम कर्तव्य आहे. असे न केल्यास शूद्राचे कर्म निष्फळ ठरतात._
_१०.१२५ शेवटी शिल्लक राहिलेले अन्न शूद्राला द्यावे. वापरलेली देखील शूद्राला द्यावी._
_१०.१२८ इतर वर्णाची निंदा न करता शूद्र स्वतःची कर्मे करीत असेल तर तो स्वर्गलोकात प्रशंसित होतो._
_१०.१२९ जर संपत्तीचा शूद्राला कितीही उपयोग असला तरी कोणत्याही शूद्राने संपत्तीचा संग्रह करू नये. कारण धनसंग्रहाने असा शूद्र माजतो व त्यामुळे ब्राह्मणांना त्रास संभवतो._
_१०.१३० वरील सगळी कर्तव्ये त्या त्या वर्णांनी निर्धारित केल्याप्रमाणे अनुसरावीत. असे केल्यास त्यांना श्रेष्ठ जन्म प्राप्त होईल._

     _यातील काही विशेषाधिकार तर सामाजिक नसून आर्थिक होते:_
_८.३५ एखाद्याची संपत्ती जर स्वतःची असेल तर राजाने त्यातील सहावा भाग घ्यावा._
_८.३६ परंतु ती संपत्ती जर त्याची नसेल त्यातील काही भाग दंड म्हणून वसूल करावा._
_८.३८. जमिनीत गाडलेली संपत्ती जर राज्यातील कुणाही व्यक्तीला सापडल्यास त्यातील अर्धा भाग राजाने दानस्वरूपात ब्राह्मणाना वाटावा व अर्धा भाग स्वतःकडे ठेवावा._
_७.१३३ एखादा राजा मरत जरी असेल तर त्याने वेदाध्ययन करणाऱ्या ब्राह्मणांकडून कर घेऊ नये किंवा त्याच्या राज्यात राहणाऱ्या ब्राह्मणांना इजादेखील पोचवू नये._
_७.१३४ ज्या राजाच्या राज्यात ब्राह्मण भुकेने व्याकूळ राहतो. त्या राज्यात लवकरच अकाल पडतो._
_९. १८८ व्यक्ती मृत झाल्यानंतर वेदांचे पठण केलेल्या ब्राह्मणांनाच पिंडदान करावे. अशा मृत व्यक्तीचे कायदेशीर उत्तराधिकारी होतात._
_*१०.१८९ ब्राह्मणांची संपत्ती राजाने कधीही घेऊ नये. हा एक निश्चित नियम आहे. मर्यादा आणि परंतु इतरांची संपत्ती मात्र राजा तो व्यक्ती मृत झाल्यावर हिसकावून घेऊ शकतो.*_
_१०.३ जातिगत उच्चतेमुळे, ज्ञानार्जन करण्याच्या अधिकारामुळे, यज्ञोपवीत धारण केल्यामुळे ब्राह्मण हा तीनही वर्णांचा स्वामी आहे._
_९.३१७ ब्राह्मण हा मूर्ख असो वा विद्वान दोनही रूपात श्रेष्ठ आहे._
_९.९१९ जरी ब्राह्मण निंदनीय कर्म करीत असेल तरी तो पूजनीय समजावा; कारण की तो श्रेष्ठ देवता आहे._
_७.३५ राजाचे प्रयोजन चारही वर्णाद्वारे निर्धारित वर्णाद्वारे कर्म निर्धारित करणाऱ्यांवर देखरेख करणे आहे._
_७.३७ सकाळी उठल्याबरोबर राजाने ब्राह्मणांची सेवा करावी व ब्राह्मणांच्या म्हणण्यानुसारच पुढील कार्ये करावीत._
_७. ३८ वेदाध्ययन करणाऱ्या वरिष्ठ ब्राह्मणाची राजाने सेवा करावी._
_९.३१८ एखाद्या घोर संकटात सापडल्यावरही राजाने ब्राह्मणांना राग आणू देऊ नये._
            _यज्ञोपवीत धारण करणे हा ब्राह्मणांचा महत्त्वाचा संस्कार आहे.. ब्राह्मणाच्या मुलाला आठव्या वर्षी, क्षत्रियाच्या मुलाला अकराव्या वर्षी तर वैश्याच्या मुलाला बाराव्या वर्षी यज्ञोपवीत धारण करण्याचा संस्कार करावा._ 

_२.१६९ द्विज म्हणविल्या जाणाऱ्या व्यक्तीचे तीन जन्म होतात. पहिला जन्म आईच्या गर्भातून. दुसरा जन्म यज्ञोपवीत धारण केल्याने तर तिसरा जन्म यज्ञकर्म केल्याने होत असतो. *मनूने हे संस्कार शूद्र आणि स्त्रियांना नाकारलेले आहेत.*_
       _*मनूने इतरांच्या शिक्षणासंबंधी काहीही उल्लेख केला नाही. त्याला इतरांच्या शिक्षणासंबंधी काहीही घेणे-देणे नाही. जनतेच्या सार्वत्रिक शिक्षणासंबंधी तो राज्याकरिता कोणतेही नियम सांगत नाही. तो केवळ वेदांच्या अध्ययनांबाबतच चिंतित राहतो.* त्याच्या मते_
            _ब्राह्मणांच्या परवानगीशिवाय कोणीही वेदाध्ययन करू शकत नाही. कुणीही स्वतःच्या मर्जीप्रमाणे वेदाध्ययन करू शकत नाही. जो कुणी असे करेल त्याच्यावर चोरीचा आरोप ठेवण्यात यावा._
_२.११६ आचार्याच्या परवानगीशिवाय जो कुणीही वेदाध्ययन करेल तो शास्त्रांची चोरी करण्याचा अपराधी राहील आणि तो नरकात जाईल._
_*९.१८ स्त्रियांना वेदाध्ययन करण्याचा अधिकार नाही. स्त्रियांद्वारे वेदाध्ययन हे एक पाप ठरते.*_
_४.९९ शूद्राच्या सानीध्यात ब्राह्मणाने वेदाध्ययन मुळीच करू नये._
       _अयोग्य व्यक्तीद्वारा यज्ञकार्य करणे अथवा वेदाध्ययन करणे अयोग्य आहे._
       _कायदेशीर कारवाईच्या वेळेस संबंधित पक्षाच्या स्थितीची व्याख्या मनूने केलेली आहे जी फौजदारी केसेसशी संबंधित आहेत._
_८.२६७ जो क्षत्रिय कोणत्याही ब्राह्मणाची मानहानी करेल तर त्याला शंभरपट, वैशाला दीडशेपट आणि याच अपराधाला शूद्राला फटके मारण्याची शिक्षा द्यावी._
_८.२७० जर एखाद्या शूद्राने ब्राह्मणाला शिवी दिली तर त्याची जीभ कापावी कारण की तो ब्राह्मणाच्या खालच्या अंगाद्वारे उत्पन्न झालेला आहे._
_८.२७१ जर तो ब्राह्मणाच्या नावाचे तिरस्कारपूर्वक उच्चारण करीत असेल तर त्याच्या तोंडात दहा उंगल लांब लोखंडाची सळाक घालावी._
_*८.२७२ जर एखादा शूद्र व्यक्ती ब्राह्मणाचा अभिमानपूर्वक त्याच्या कर्तव्याबद्दल जाणीव करून देत असला तर राजाने त्याच्या तोंडात आणि कानात उकळते तेल ओतावे.*_
_*शिव्या देण्याच्या अपराधाबद्दल मनू म्हणतो :*_
_८. २७६ जर ब्राह्मण आणि क्षत्रिय एकमेकांना शिव्या देत असतील तर राजाद्वारे ब्राह्मणांना कमीत कमी व क्षत्रियाला जास्त दंड द्यावा._
_८.७७७ याच प्रकारचा दंड वैश्य आणि शूद्रांनादेखील देण्यात यावा._
_*मारपीट केल्याच्या अपराधाबद्दल मनू म्हणतो :*_
_८.२७९ खालच्या वर्गातील व्यक्ती जर वरच्या वर्णातील व्यक्तीला मारपीट करू लागला तर ज्या अंगाचा त्याने उपयोग केला ते अंग छाटून टाकावे._
_८.२८० जर शूदू व्यक्तीने हाताने मारले तर हात छाटावा व पायाने मारले तर पाय कापून टाकावे._


_*खोट्या अभिमानाबद्दल मनू म्हणतो :*_
_*८.२८१ जर खालच्या वर्गातील व्यक्ती वरच्या वर्गातील व्यक्तीच्या आसनावर बसला तर त्याच्या पाठीवर तापविलेले लोखंड ठेवावे किंवा त्यांचे नितंब कापावे.*_
_८.२८२ जर एखादा शूद्र गर्वाने उच्च वर्णीयावर थुंकला तर त्याचे दोन्ही ओठ कापावे. लघवी केल्यास त्यांचे लिंग कापावे. घाण वारा सोडल्यास त्याची गुदा कापावी._
_८.३५९ जर एखाद्या शूद्र वर्गाच्या व्यक्तीने उच्च वर्गातील स्त्रीशी व्यभिचार केला तर त्याला प्राणदंड द्यावा._
_८.३६६ उच्च वर्गातील स्त्रीशी कनिष्ठ वर्णातील पुरुषाने प्रेम जरी केले तर त्याला शारीरिक दंड द्यावा._
_*८.३७४ एखाद्या शूद्राने उच्च वर्णातील स्त्रीशी व्यभिचार केल्यास त्याचे लिंग कापावे. आणि त्याची सारी संपत्ती जप्त करावी.*_
_८.३७७ जर एखाद्या वैश्य किंवा क्षत्रियाने उच्च वर्गातील स्त्रीशी व्यभिचार केला तर त्याला जिवंत जाळावे._
_८.३८३ हेच कृत्य जर एखाद्या ब्राह्मणाने शूद्र स्त्रीशी केल्यास त्याला केवळ आर्थिक दंड द्यावा._

             _*मनूचे हे नियम शाश्वत आहेत. म्हणून यामध्ये कुठल्याही प्रकारचे परिवर्तन होऊ शकत नाही.* मनूच्या समोर जर मुख्य प्रश्न कुठला असेल तर याला लागू कसे करावे._
_८.४१० राजाने वैश्याद्वारे व्यापार, कृषी किंवा पशुपालन होते आहे की नाही ते पाहावे तसेच शूद्राद्वारे इतर तीनही वर्णाची सेवाचाकरी होत आहे की नाही हेसुद्धा पाहावे._
         _जर एखादा राजा आपले कर्तव्य करीत नसेल तर तो एक अपराध आहे आणि त्यालासुद्धा दंडाचे प्रावधान आहे._
_*अपराधाबद्दल राजाने दंडस्वरूपात धन ब्राह्मणांना प्रदान करावे.*_
_८. ३४८. ब्राह्मणांच्या धर्मपालनात विघ्न निर्माण करणाऱ्याविरुद्ध ब्राह्मण शस्त्र धारण करू शकतो. किंबहुना ब्राह्मणांवर संकट निर्माण झाल्यास तोसुद्धा शस्त्र धारण करू शकतो._

            _*विद्रोह करण्याचा अधिकार शूद्र वर्गाला सोडून इतर तीन वर्गांना देण्यात आला आहे. हे बहुधा संभवनीय आहे की या अधिकाराचा फायदा हा तीनही वर्णाना होता. परंतु समजा जर राजाने ही व्यवस्था समाप्त करण्याचा प्रयत्न केला व क्षत्रिय वर्गाने त्याला साहाय्य केले अशा परिस्थितीत राजाला दंड देण्याचा अधिकार ब्राह्मणांना देण्यात आला आहे.*_

_९.३२० जर एखादा क्षत्रिय ब्राह्मणांच्या विरुद्ध शस्त्र धारण करीत असेल तर ब्राह्मण त्याला स्वतः दंड देईल. कारण की मूलतः क्षत्रिय हे ब्राह्मणांपासूनच निर्माण झालेले आहेत._

               _*मनू हा चातुर्वर्ण्यव्यवस्थेचा प्रबंध समर्थक आहे म्हणूनच त्याने वरील मौलिक परिवर्तने घडवून आणली. ब्राह्मणांद्वारे शस्त्र धारण करण्याचा आग्रह, हे असेच एक मूलभूत परिवर्तन आहे.*_
        _*मनुपूर्व हा नियम अस्तित्वातच नव्हता. किंबहुना ब्राह्मणांद्वारे शस्त्र धारण करण्यास सक्त मनाई होती.*_
_*१.१०.२९.६ ब्राह्मणाला एखाद्या शस्त्राची तपासणी जरी करावयाची असेल तर तो त्या शस्त्राला हात लावू शकत नाही.*_
*_मनूचा उत्तराधिकारी बौद्धायन म्हणतो:_*
_*२. २४१८ गोरक्षणार्थ किंवा वर्णरक्षणार्थ ब्राह्मण स्वतःच्या हातात शस्त्र धारण करू शकतो. कारण की असे करणे शास्त्रसंमत आहे.*_

*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_संदर्भ :- कांती आणि प्रतिक्रांती_*

*_लेखक :- डॉ बाबासाहेब आंबेडकर_*

*_संकलन :- महेश कांबळे_*

*_दिनांक :- १६/१२/२०२२_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2022/12/blog-post.html

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

No comments:

Post a Comment

कोलित सुत्त

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_कोलित सुत्त_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_41.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼  _'कोलित सुत...