🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_राजहत्या किंवा प्रतिक्रांतीचा जन्म ब्राह्मणवादाचा विजय_*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_१) बौद्ध धम्माविरुद्ध ब्राह्मणी उठाव, (बंड)_*
_भारताबाबत बोलताना प्रा. ब्लूमफिल्ड यांनी 'वेदांचा धर्म' या विषयावरील व्याख्यानांची "भारत ही एकाहून अनेक अर्थांनी धर्माची भूमी आहे." याचे स्मरण करून केली आहे. आपल्या स्वतःच्या साधनांच्या साह्याने भारताने अनेकविध धर्म आणि पंथ निर्माण केले आहेत._
_दुसऱ्या एका अर्थानेही भारत ही धर्माची भूमी आहे. इतरत्र कोठेही धार्मिक श्रद्धांनी आणि आचारांनी जीवनाच्या सर्व क्षेत्रांत समावेश केलेला दिसत नाही._
_या निवेदनात फार मोठे सत्य आहे. भारत ही धर्माच्या संघर्षाची भूमी आहे असे जर त्यांनी म्हटले असते. तर ते सत्याच्या अधिक समीप ठरले असते. कारण भारताच्या इतिहासाइतका धर्माचा प्रभाव इतर कोणत्या देशातील इतिहासावर दिसून येत नाही. *भारताचा इतिहास हा बौद्ध धर्म आणि ब्राह्मणी धर्म यांमधील मरणांतिक संघर्षांचा इतिहास आहे.* या सत्याची इतकी उपेक्षा झाली आहे की, कोणीही त्याला सहजगत्या मान्यता देणार नाही. इतकेच नव्हे तर ही गोष्ट सर्वस्वी फेटाळून लावणारे थोडे निघणार नाहीत._
_*यासाठी या ठिकाणी भारताच्या इतिहासातील काही महत्त्वाच्या गोष्टी सांगू इच्छितो. कारण जो कोणी भारताचा इतिहास जाणू इच्छितो, त्याला भारताचा इतिहास हा ब्राह्मण धर्म व बौद्ध धर्म यांच्या प्रभुत्वासाठी झालेल्या इतर काही नाही हे समजणे आवश्यक आहे.*_
_भारताच्या इतिहासाची सुरुवात, भारतावर आर्यांचे आक्रमण, त्यांनी भारताला आपले वस्तीस्थान बनवणे आणि आपली संस्कृती तेथे स्थापन करणे येथून होते, असे मानले जाते. आर्याचे गुण कोणतेही असोत, त्यांची संस्कृती, त्यांचा धर्म, त्यांची समाजव्यवस्था काहीही असो; पण आपणास त्यांच्या राजकीय इतिहासाचे फार कमी ज्ञान आहे हे निश्चित. आर्य हे अनार्यापेक्षा श्रेष्ठ होते असा दावा केला जातो. परंतु आर्यांनी आपल्या राजकीय इतिहासाबाबत बोलण्यासारखे फारसे काही ठेवले नाही हे खरे आहे. *भारताचा राजकीय इतिहास नाग नावाच्या अनार्यांच्या उदयापासून सुरू होतो. हे नाग राजे फार शक्तिमान होते. त्यांना आर्य जिंकू शकले नाहीत. आर्यांना त्यांच्याशी शांतता करावी लागली व त्यांना आपल्या समान दर्जाचे मानावे लागले. प्राचीन काळात भारताने जी काही कीर्ती आणि गौरव प्राप्त करून घेतला त्याचे श्रेय या अनार्य नागांनाच द्यावे लागेल. या नागांनीच भारताला जगात महान व गौरवशाली बनविले.*_
_*भारताच्या इतिहासातील पहिला टप्पा मगध राज्याच्या ख्रिस्तपूर्व ६४२ मध्ये झालेला उदय हा आहे. मगध राज्याचा संस्थापक शिशुनाग हा होता. हा शिशुनाग अनार्य नाग वंशाचा होता.*_
_*या शिशुनाग घराण्याच्या कारकीर्दीत छोट्या मगध राज्याचा विस्तार खूप मोठा झाला. या घराण्यातील पाचवा राजा बिंबिसार याच्या कारकीर्दीत मगध राज्याचे रूपांतर साम्राज्यात त्याला 'मगध साम्राज्य' असे नाव प्राप्त झाले. शिशुनाग घराण्याचे राज्य ख्रिस्तपूर्व ४१३ पर्यंत अस्तित्वात होते. या वर्षी शिशुनाग घराण्यातील राजा महानंद यास नंद नावाच्या एका साहसी तरुणाने ठार केले. नंदाने मगध साम्राज्य बळकावले व नंद घराण्याची सत्ता चालू केली. या नंद घराण्याची सत्ता ख्रिस्तपूर्व ३२२ पर्यंत होती. शेवटच्या नंद घराण्यातील राजाला चंद्रगुप्ताने पदच्युत केले व मौर्य घराण्याची सत्ता मगध राज्यावर स्थापन केली. चंद्रगुप्त हा शिशुनाग घराण्यातील शेवटच्या सम्राटाचा नातलगच होता. याचा अर्थ असा होतो की चंद्रगुप्ताने पुन्हा नाग घरण्याचीच सत्ता मगध साम्राज्यावर स्थापन केली.*_
_मौर्य घराण्याने त्यांच्या विजयी मोहिमांनी मगध साम्राज्याचा विस्तार प्रचंड प्रमाणात केला. अशोक सम्राटाच्या काळात हे मगध साम्राज्य इतके विस्तार पावले होते की, मगध साम्राज्याला अशोकाचे साम्राज्य असे मानले जाऊ लागले._
_*त्यावेळी प्रचारात असलेल्या धर्मापैकी बौद्ध धम्म असल्याने ब्राह्मणी धर्माचे स्वरूप टिकून राहिले नाही. अशोकाने बौद्ध धम्माला राजधर्म बनविले. ब्राह्मणी धर्माला हा फार मोठा धक्का होता. अशोकाच्या राज्याचा ब्राह्मणांना राजाचा आश्रय राहिला नाही व त्यांची दुय्यम आणि दुर्लक्षित म्हणून गणना होऊ लागली. खरे तर ते दडपले गेले असेही म्हणता येईल. कारण अशोकाने ब्राह्मणी धर्माचे प्रमुख अंग असलेल्या सर्व प्रकारच्या प्राण्यांना यज्ञात बळी देण्याच्या पद्धतीवर बंदी घातली. ब्राह्मणांनी राजाश्रय तर गमावलाच; शिवाय त्यांचा उपजीविकेचा धंदाही बंद झाला; कारण दक्षिणा घेऊन यज्ञाचे पौरोहित्य करणे हा त्यांचा मूळ पेशा होता व दक्षिणा म्हणून त्यांना फार मोठी रक्कम मिळत असे. ते त्यांचे सर्वात महत्वाचे उपजीविकेचे साधन होते. मौर्य साम्राज्य अस्तित्वात होते तितकी १४० वर्षे ब्राह्मण हे दडपलेले व पददलित वर्ग म्हणून जगले. त्यामुळे बौद्ध शासनाविरुद्ध बंड करणे याशिवाय दुसरा कोणताही मार्ग हालअपेष्टा सोसणाऱ्या या ब्राह्मणांना राहिला नाही. पुष्यमित्राने मौर्य घराण्याविरुद्ध बंड केले. त्याचे आणखी एक खास कारण होते. (पुष्यमित्राचे शुंग हे गोत्र होते.) शुंग हे सामवेदी ब्राह्मण होते, शुंगांचा प्राणिमात्राच्या आहुतींवर सोमयज्ञावर विश्वास होता. सर्व मौर्य साम्राज्यात पशूंची आहुती देण्यावर बंदी होती. (अशोकाच्या स्मृतिशिलेवर ही बंदी कोरलेली होती) त्याविरुद्ध शुंग गोत्री यांचा राग असणे स्वाभाविक होते. त्यामुळे बौद्ध समाज नष्ट करून ब्राह्मणांची अवनती टाळावी हे सामवेदी ब्राह्मण म्हणून पुष्यमित्राचे ध्येय होते यात नवल नाही. बौद्धांच्या राज्यातील ब्राह्मणांच्या होणाऱ्या हालातून ब्राह्मणांना मुक्त करणे, ब्राह्मणी धर्माचे पुनरुज्जीवन करणे हे पुष्यमित्राचे ध्येय होते.*_
*_पुष्यमित्राने केलेल्या राजहत्येचा उद्देश राजधर्म म्हणून बौद्ध धम्माचे स्थान नष्ट करणे आणि ब्राह्मणांना भारताचे सार्वभौम शास्ते बनवावयाचे हा होता. ब्राह्मणी धर्माच्या मागे राजसत्ता उभी केली तर ब्राह्मणी धर्माला बौद्ध धर्मावर विजय प्राप्त करता येईल हा पुष्यमित्राचा विचार होता. त्याच आणखी दोन पुरावे देता येतील._*
_पुष्यमित्राचा स्वतःचा आचार (वर्तन) हा पहिला पुरावा आहे. पुष्यमित्राने सत्तेवर येताच अश्वमेध यज्ञ केला (घोड्याची आहुती देणे). हा वैदिक विधी फक्त सार्वभौम सम्राटाद्वारा करता येत असे._
_*व्हिन्सेंट स्मिथ यांनी म्हटल्याप्रमाणे : प्राणिमात्राच्या जीवनाचे अतिशयोक्त पावित्र्य हे बौद्ध धम्माचे अत्यंत महत्त्वाचे वैशिष्ट होते. आणि त्यामुळे अशोकाच्या वैशिष्ट्यपूर्ण कायद्याने रक्तमय आहुती देणाऱ्या यज्ञावर बंदी घालण्यात आली. अशा प्रकारचे यज्ञात बळी देणे हे काही ब्राह्मण पूजेत अत्यंत महत्त्वाचे व आवश्यक मानले जाई. सनातनी ब्राह्मणांना अशा आहुती देणे हे आत्मरक्षणासाठी आवश्यक वाटे. पुष्यमित्राने केलेला अश्वमेघ यज्ञ ही या बंदीवरील ब्राह्मणी धर्माची पहिली प्रतिक्रिया होती. या यज्ञाचा विकास पुढे पाच शतकांनी समुद्रगुप्ताचा व त्यांच्या वारसांच्या काळात झाला.*_
*_पुष्पमित्राने सत्तेवर आल्यावर बौद्धांवर व बौद्ध धम्मावर भयानक अत्याचाराची विषारी मोहीम सुरू केली, हा याचा दुसरा पुरावा आहे._*
*_पुष्यमित्राच्या काळात बौद्धांचा किती निर्दयपणे छळ करण्यात आला. त्याचा पुरावा पुष्यमित्राने बौद्ध भिक्खूंबाबत काढलेल्या एका जाहीर आदेशावरून मिळतो. पुष्यमित्राने प्रत्येक बौद्ध भिक्खूचे शिर आणून देणाऱ्यास सोन्याची १०० नाणी बक्षीस देणारा आदेश काढला होता._*
_*डॉ. हरिप्रसाद शास्त्री यांनी पुष्यमित्राच्या बौद्धांच्या छळाबाबत म्हटले आहे की, "सनातनी व कर्मठ शुंग साम्राज्याच्या काळात बौद्धांचा जो छळ झाला, त्याचे वर्णन करण्यापेक्षा कल्पनाच करणे योग्य होईल. चिनी अधिकाऱ्यांच्या माहितीप्रमाणे अजूनही बौद्ध पुष्यमित्राच्या नावाचा उच्चार शाप देऊन करतात."*_
_पुष्यमित्राची क्रांती ही फक्त राज्यक्रांतीच असती तर त्याला बौद्ध धर्मीयांच्या छळाची मोहीम काढणे आवश्यक नव्हते. ही छळाची मोहीम गझनीच्या महंमदाने हिंदूविरुद्ध काढलेल्या छळाच्या मोहिमेपेक्षा निराळी नव्हती. पुष्यमित्राचा उद्देश मुख्यतः बौद्ध धम्म नष्ट करून ब्राह्मणी धर्माची स्थापना करणे हाच होता याचा हा परिस्थितिजन्य पुरावा आहे._
*_पुष्यमित्राच्या मौर्याच्या विरुद्ध क्रांतीचे मूळ उद्दिष्ट बौद्ध धम्म नष्ट करून त्याच्या जागी ब्राह्मणी धर्म प्रस्थापित करणे हे होते. याचा पुरावा मनुस्मृतीला कायदा म्हणून दर्जा देण्याची घोषणा हा आहे._*
_मनुस्मृती ही ईश्वरी आहे असे मानण्यात येते. मनुस्मृती स्वयंभू निर्मात्याने मनूला सांगितली आहे आणि मनूने ती मानवांना सांगितली, असे सांगण्यात येते. ही गोष्ट प्रत्यक्ष मनुस्मृतीतही सांगण्यात आली आहे. कोणीही या दाव्याची सत्यता पडताळून पाहण्याचा प्रयत्न केला नाही. त्याचा परिणाम भारताच्या इतिहासात मनुस्मृतीचे स्थान, महत्त्व व गाभा काय त्याबद्दल जाणीव निर्माण करण्यात पूर्ण अपयश आले. मनुस्मृती ही हिंदू समाजातील सर्वांत मोठ्या क्रांतीचे प्रतीक आहे. तरीही भारतीय इतिहासकारांनाही यात अपयश आले आहे. मनुस्मृतीने तिच्या लेखनाच्या उगमाबाबत केलेला दावा हा पूर्णपणे खोटा व फसवणूक करणारा आहे आणि या खोट्या दाव्यातून निर्माण झालेल्या धारणा या टिकण्यासारख्या नाहीत._
_*भारताच्या प्राचीन इतिहासात मनू या नावाला फार मोठी प्रतिष्ठा आहे. या प्राचीन नावाची प्रतिष्ठा या स्मृतीला लाभावी म्हणून मनूचे नाव त्याला जोडण्यात आले. हा लोकांना फसविण्यासाठी केलेला बनाव आहे, हे संशयातीत आहे. मनुस्मृतीवर प्राचीन काळाच्या रीतीप्रमाणे भृगू घराण्याच्या नावाची सही आहे. भृगूने रचलेली संहिता 'मनुची धर्मसंहिता' हे या गंथाचे खरे शीर्षक आहे. या संहितेच्या प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी भृगूचे नाव आहे. आणि त्यामुळे आपणाला या संहितेच्या लेखकाच्या घराण्याचे नाव माहीत झाले आहे. या ग्रंथात त्याचे स्वतःचे नाव कोठेच सांगण्यात (उल्लेखण्यात) आलेले नाही. परंतु तरीही ते अनेकांना माहीत होते. इसवी सनाच्या चौथ्या शतकात नारद स्मृतीच्या लेखकाला हे नाव माहीत होते. आणि त्याने हे गुप्त नाव प्रकट केले. नारदाच्या माहितीप्रमाणे मनुस्मृतीची लेखक 'सुमती भार्गव' हा आहे. सुमती भार्गव हे दंतकथेतील नाव नाही. ती ऐतिहासिक व्यक्ती असली पाहिजे. कारण मेघतिथि या भाष्यकाराने मनू हे एका व्यक्तीने धारण केलेले नाव आहे, असे म्हटले आहे. याप्रमाणे मनू हे नाव सुमती भार्गव या व्यक्तीने धारण केलेले नाव होते व ही व्यक्तीच मनुस्मृतीची लेखक होती.*_
_या सुमती भार्गवने ही संहिता कधी तयार केली? या रचनेचा निश्चित काळ सांगणे शक्य नाही. परंतु ज्या काळात ही संहिता लिहिली गेली त्याबद्दल सांगता येईल. ज्यांचा अधिकार निर्विवाद आहे अशा विद्वानांच्या म्हणण्याप्रमाणे सुमती भार्गवाने ही संहिता ख्रिस्तपूर्व १७० ते १५० या काळात लिहिली असावी. तिला मनुस्मृती हे नाव जाणीवपूर्वक दिले असावे. पुष्यमित्राने मौर्याच्या बौद्ध शासनाविरुद्ध ब्राह्मणी क्रांतीची तत्त्वे ग्रंथित करणाऱ्या मनुस्मृतीला कायद्याचे स्वरूप दिले. ब्राह्मणी व्यवस्थेचे मनुस्मृती हे स्वरूप होते आणि पुष्यमित्राची क्रांती ही वैयक्तिक साहसवादातून केलेली नसून ती ब्राह्मणी विरुद्ध संस्कृतीच्या स्थापनेसाठी केली होती. ही गोष्ट मनुस्मृतीच्या काळात खालील वैशिष्टांवरून स्पष्ट होते._
_पहिली गोष्ट ही की पुष्यमित्राच्या काळात मनुस्मृतीचा नवीन कायद्याची संहिता म्हणून अंमल झाला. *मनुस्मृतीच्या पूर्वी मानवधर्मसूत्र नावाची संहिता अस्तित्वात होती आणि मनुस्मृती त्यावरच आधारलेली आहे, असेही एक मत आहे. परंतु मानवधर्मसूत्रचे अंशही कोठे न मिळाल्याने हे मत अग्राह्य ठरविण्यात आले.* मनुस्मृतीपूर्वी आणखी दोन ग्रंथ अस्तित्वात होते. एक मानव अर्थशास्त्र किंवा मानव राज्यशास्त्र किंवा मानव राजधर्मशास्त्र. दुसऱ्या ग्रंथाचे नाव मानव गुह्यसूत्र असे होते. विद्वानांनी त्यांची मनुस्मृतीशी तुलना केलेली आहे. महत्त्वाच्या बाबतीत मनुस्मृती व या ग्रंथात वेगळेपण तर आहेच. पण अनेक ठिकाणी सर्व बाबतीत या दोन ग्रंथांतील तरतुदी आणि मनुस्मृतीतील तरतुदी यात परस्परविरोध आहे. यावरून हे स्पष्ट होते की मनुस्मृतीही नव्या राज्यातील नवी आचारसंहिता आहे._
_पुष्यमित्राची नवी राजवट बुद्ध धम्माविरोधी होती. याचा पुरावा मनुस्मृतीत बौद्ध आणि बौद्ध धम्मा यांच्याविरुद्ध जे उल्लेख आहेत त्यावरून स्पष्ट होते. मनुस्मृतीतील खालील तरतुदी पाहा :_
_*९. २२५. जे लोक नास्तिक किंवा पाखंडी (बौद्ध) आहेत त्यांना राजाने राज्यातून हाकलून द्यावे.*_
_*९. २२६. वेषांतरित दरोडेखोर राज्यात राहून सतत त्यांच्या गैरकृत्यांमुळे प्रतिष्ठित प्रजाजनांना इजा पोचवितात.*_
_*५.८९. जे धर्मकृत्यांची उपेक्षा करतात त्यांचा जन्म निरर्थक होय. जे मिश्र जातीच्या संयोगाने जन्माला येतात पाखंडी मताचे संन्यासी आहेत व ज्यांनी आत्महत्या केली आहे अशांच्या आत्म्यांना पाण्याची आहुती देऊ नये.*_
_*५.९०. ज्या स्त्रियांनी पाखंडी (बौद्ध) पंथ स्वीकारला आहे त्यांच्या आत्म्यासाठी पाण्याचे तर्पण करू नये.*_
_*४.३०. गृहस्थाने शब्दानेही पाखंड्यांच्या वेदविरोधी तार्किकांचा सन्मान करू नये.*_
_*१२.९५. वेदांवर आधारित नसलेल्या सर्व प्रकारच्या निंदास्पद तत्त्वज्ञानाच्या पद्धती आणि त्यांच्या सर्व परंपरा यामुळे मृत्यूनंतर सद्गती मिळत नाही. कारण त्या आधारावर आधारलेल्या असतात.*_
_*१२.९६. वेदांशी मतभेद असणारे जे सर्व सिद्धांत निर्माण होतात आणि नष्ट होता, ते नवे असल्यामुळे अर्थशून्य असतात.*_
_*हे पाखंडी मतांचे ज्यांचा उल्लेख मनू पाखंडी असा करतो, ज्यांना नव्या राजाने राज्यातून हद्दपार करावे. गृहस्थाने त्यांना जीवनात व मृत्यूनंतर सन्मान करू नये मग हे ते पाखंडी कोण होते? हे नव्या काळातील अर्थशून्य तत्त्वज्ञान कोणते? वेदांपासून वेगळ्या आधारावर आधारलेले आणि नष्ट होणाच असे हे तत्त्वज्ञान कोणते ? मनूने वर्णन केलेले पाखंडी हे बुद्धच होते. आणि मनूने ज्या तत्त्वज्ञानाला अर्थशुन्य असे संबोधले ते बुद्ध धर्माचे तत्त्वज्ञान होते. कल्लूक भट या मनुस्मृतीवरील दुसऱ्या भाष्यकाराने मनुस्मृतीने मनुस्मृतीच्या श्लोकात उल्लेखिलेले पाखंडी आणि त्यांचे तत्त्वज्ञान म्हणजे बुद्ध आणि बुद्धवाद होय असे स्पष्टपणे म्हटले आहे.*_
_ह्या निवेदनाला तिसरा आधार मनुस्मृतीत ब्राह्मणांचे जे स्थान आहे त्यावरून स्पष्ट होतो. मनुस्मृतीतील खालील तरतुदी पाहा._
*_ब्राह्मणांचा दर्जा_*
_१.९३. ब्राह्मण हे ब्रह्माच्या मुखातून निर्माण झाले असल्याने, ते प्रथम जन्माला आले असल्याने, ते वेद म्हणत असल्याने ते सर्व प्राणिमात्रांचे स्वामी आहेत._
_१.९६ सृष्टीतील ईश्वरनिर्मित सर्व गोष्टीमध्ये सचेतन प्राणी हा उत्तम. सर्व सचेतनांमध्ये जे बुद्धीवर जगतात असे बुद्धिमान मानव श्रेष्ठ अशा मानवात ब्राह्मण उत्तम असतात._
_*१. जगात जे जे काही अस्तित्वात आहे, ती ब्राह्मणाची मालमत्ता आहे. कारण ब्राह्मणांची उत्पत्ती ही सर्वश्रेष्ठ आहे. आणि त्या सर्व गोष्टीवर ब्राह्मणांचा अधिकार आहे.*_
_१.१०१. ब्राह्मण फक्त स्वतःचेच अन्न खातो. फक्त स्वतःचेच कपडे वापरतो. फक्त स्वतःचीच भिक्षा घेतो. इतर सर्व मर्त्य मानव ब्राह्मणांच्या कृपेने जगतात._
_१.३ आपल्या श्रेष्ठत्वामुळे, निर्मितीच्या श्रेष्ठत्वामुळे, विशिष्ट प्रतिबंधक नियमांच्या आचारामुळे, विशिष्ट पवित्रतेमुळे, विशिष्ट पवित्र संस्कारांमुळे ब्राह्मण हा सर्व जातींचा स्वामी आहे._
_१०.३५. ब्राह्मणांचे वर्णन "या विश्वाचा निर्माता, शासन करणारा, गुरू आणि सर्व प्राणिमात्रांवर उपकारकर्ता" असे केलेले आहे; ब्राह्मणाला कोणी अयोग्य आणि तीव्र शब्दांनी संबोधू नये._
_*मनूने ब्राह्मणांना असंतुष्ट करू नये असा इशारा राजांना खालील शब्दांत दिला आहे-*_
_९.३१३. राजाने तो अधिकाधिक अडचणीत असला तरी ब्राह्मणांचा राग ओढवून घेऊ नये. कारण ब्राह्मण रागावले तर त्याच्या सैन्याचा, त्यांच्या वाहनांच ताबडतोब नाश करू शकतात._
_११.३१. ज्या ब्राह्मणाला कायदा कळतो त्याने कोणताही गुन्हा राजाच्या निदर्शनास आणण्याची गरज नाही. त्याच्या स्वतःच्या अधिकारात तो ज्याने त्या दुखविले असेल त्याला शिक्षा करू शकतो._
_११.३२. ब्राह्मणांची स्वतःची शक्ती ही राज्याच्या शक्तीपेक्षा अधिक असते म्हणून ब्राह्मणाने केवळ स्वतःच्या शक्तीने आपल्या शत्रूचा नाश करावा._
_*ब्राह्मणांचे हे दैवतीकरण त्यांना राजापेक्षा उच्च स्थान देणे ही गोष्ट स्वतः राजा ब्राह्मण असल्याखेरीज अशक्य होते. स्वतः राजा ब्राह्मण असल्याशिवाय व मनूने व्यक्त केलेल्या मतांबाबत त्याला सहानुभूती असल्याशिवाय अशक्य होते. पुष्यमित्राने आणि त्याच्या वारसांनी ब्राह्मणांचे हे अतिरिक्त दावे ते स्वतः ब्राह्मण आणि ब्राह्मणी 'धर्मांच्या स्थापनेत रस घेणारे असल्याखेरीज सहन करण्यात आले नसते. अगदी शक्य आहे की पुष्यमित्रानेच मनुस्मृती तयार करण्याचे आदेश दिले असावेत आणि ब्राह्मणी तत्त्वज्ञानाचे ग्रंथ म्हणून त्याला स्थान दिले असावे.*_
_*या सर्व गोष्टी लक्षात घेतल्यावर पुष्यमित्राच्या क्रांतीचा एकमेव उद्देश बौद्ध धम्माचा नाश करणे आणि ब्राह्मणी धर्माची पुन्हा स्थापना करणे हे संशयातीतपणे सिद्ध होते.*_
_भारताच्या राजकीय इतिहासाचा वरील सारांश या प्रकरणात देण्याची वास्तविक गरज नव्हती. भारताचा इतिहास ज्या पद्धतीने लिहिला गेला आहे त्या बाबतीत समाधानी असतो तर वरील सारांश दिलाच नसता. परंतु त्याबाबत समाधानी नाही, कारण भारताच्या इतिहासात मुस्लिम विजयावर अतिरिक्त भर दिलेला आहे. मुस्लिम आक्रमणांच्या लाटांवर लाटा एखाद्या वादळाप्रमाणे कशा आल्या, त्यांनी राज्यकर्त्यांना कसे पदच्युत केले आणि सर्व लोकांवर कसा प्रभाव निर्माण केला, यावर कागदांचे भारेच्या भारे लिहिले गेले आहेत. भारताचा सर्व इतिहास असा लिहिला आहे की, मुस्लिम आक्रमणांची सूची हीच फक्त अभ्यासायोग्य होती हे स्पष्ट होते, त्यापेक्षाही अधिक महत्त्वाची नसली तरी त्या इतकीच महत्वाची इतर आक्रमणेही होती. हिंदू भारतावर मुस्लिम आक्रमकांनी आक्रमणे केली. त्याचप्रमाणे ब्राह्मणी आक्रमकांनी बौद्ध भारतावरही आक्रमणे केली. हिंदू भारतावरील मुस्लिम आक्रमणे आणि बौद्ध भारतावरील ब्राह्मणी आक्रमणे यात अनेक साम्यस्थळे आहेत. हिंदू भारतावरील मुसलमान आक्रमक आपल्या घराण्याच्या, राज्याच्या महत्वाकांक्षेपायी आपापसात लढले. *अरब, तुर्क, मोगल आणि अफगाणी है आपापसात स्वतःच्या प्रभुत्वासाठी लढले. हे खरे असले तरी त्यांच्यात एक गोष्ट समान होती. मूर्तिपूजक धर्म नष्ट करण्याचे त्यांचे ध्येय हे समान होते.* त्याप्रमाणेच बौद्ध भारतावरील आक्रमण हे आपल्या घराण्याचे राज्य चालावे या महत्त्वाकांक्षेने एकमेकांशी भाडले. *शुंग, कण्व, आंध्र आदी घराणी प्रभुत्वासाठी आपापसात लढली. परंतु एका बाबतीत हिंदू भारताच्या मुस्लिम आक्रमकांप्रमाणेच त्यांचा एक उद्देश समान होता आणि तो म्हणजे बौद्धांचा आणि बौद्ध धर्माचा नाश !* इतिहासकारांच्या दृष्टीने हिंदू भारतावरील आक्रमणे ही नमूद करावयास योग्य अशी समजली जाऊ शकतील. कारण ब्राह्मणशाहीची बौद्ध धर्माविरुद्धची आक्रमणे ही मुस्लिम आक्रमणांच्या हिंदू धर्मावरील अत्याचारापेक्षा कमी हिंसक वा जालीम नव्हती. जनतेच्या सामाजिक आणि आध्यात्मिक जीवनावर शाश्वत परिणाम करण्याच्या दृष्टीने बुद्ध धर्मीयांवरील ब्राह्मणशाहीची आक्रमणे ही मुस्लिम आक्रमणांपेक्षा इतकी अधिक परिणामकारक होती की, त्यामुळे मुस्लिम आक्रमणे अगदी वरवरची व तात्कालिक स्वरूपाची आढळून येतील._
_*मुस्लिम आक्रमकांनी हिंदू धर्माचा नाश केला नाही किंवा हिंदू जनतेच्या आध्यात्मिक जीवनाला आधार देणाऱ्या सिद्धांतांना व तत्त्वांना सुरुंग लावला नाही. परंतु ब्राह्मणी तत्त्वांच्या आक्रमणांमुळे बौद्ध धर्माने जे जीवनमार्गाचे व धर्माचे सिद्धांत सांगितले आणि शंभर वर्षे जनतेने ज्या तत्त्वांचा सत्य आणि शाश्वत जीवनमार्ग म्हणून स्वीकार केला त्याचाच नाश केला.* उपमा बदलून बोलावयाचे तर मुस्लिम आक्रमकांनी फक्त न्हाणीघरातील पाणी ढवळले व तेही अगदी अल्प काळासाठी. त्यानंतर या ढवळाढवळीला ते कंटाळले आणि त्यांनी पाण्यातील घटकांसह ते पाणी तसेच राहू दिले. हिंदू धर्माच्या तत्त्वज्ञानाला न्हाणीघरातील बाळाची उपमा दिली तर त्यांनी या बाळाला न्हाणीघरातून फेकून दिले नाही. ब्राह्मणशाहीने मात्र बौद्ध धर्माशी संघर्षात या धर्माला त्यांनी बौद्ध धर्माच्या बाळासह न्हाणीघरातून फेकून दिले. आणि आपले पाणी न्हाणीत ओतले व आपले बाळ त्यात ठेवले. ब्राह्मणशाहीने उदात्त बुद्धापासून वाहात आलेले बौद्ध धर्माच्या तत्त्वज्ञानाच्या सुवासिक आणि शुद्ध पाण्याची तुलना करता आपले पाणी किती घाण व गलिच्छ आहे याचा विचार केला नाही.. ब्राह्मणशाहीने बौद्ध धर्माच्या बाळाशी तुलना करता आपले बाळ किती विद्रूप व भयानक आहे याचा विचार केला नाही. ब्राह्मणशाहीने आपल्या आक्रमणाने बौद्ध धर्माचा नाशही केला. *इस्लामने हिंदू धर्माची जागा कधीही घेतली नाही. इस्लामने हिंदू धर्म नष्ट करण्याचे आपले काम कधीच पूर्णपणे केले नाही. ब्राह्मणशाहीने मात्र ते केले. त्यांनी धर्म म्हणून बौद्ध धर्माला बाहेर हाकलले आणि त्याची जागा घेतली.*_
_यावरून हे स्पष्ट होते की *ब्राह्मणशाहीचे बौद्ध धर्मावरील आक्रमण है हिंदू धर्मावरील आक्रमापेक्षा भारताच्या इतिहासाच्या दृष्टीने किती तरी अधिक महत्त्वाचे आहे.* परंतु मौर्यानी निर्माण केलेल्या साम्राज्यावरील आक्रमणाला इतिहासात फारच थोडी जागा दिली आहे. त्यातही शुंग, कण्व आणि आंध्र हे कोण हाते व त्यांनी मौर्यांनी निर्माण केलेले साम्राज्य का नष्ट केले, या सहज निर्माण होणाऱ्या प्रश्नांकडे संपूर्ण दुर्लक्ष केले. त्याचप्रमाणे बौद्ध धर्माविरुद्ध विजय मिळविल्यानं ब्राह्मणशाहीने राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात केलेल्या बदलांचा अभ्यास त्या केलेला नाही.*_
_भारतीय इतिहासाच्या या अंगाचा विचार करण्यातील या अपयशाच्या मागे अस्तित्वात असलेल्या काही चुकीच्या कल्पना आहेत. सर्वसामान्यपणे असे समजले जाते की या भारताच्या संस्कृतीच्या वेगवेगळ्या अवस्था होत्या. त्यांच्यात मूलभूत विरोध कधीच नव्हता असे समजले जाते. दुसरी गैरसमजूत अशी आहे की भारतीय इतिहासात जे संघर्ष झाले, ते सर्व राजकीय आणि राजघराण्यातील संघर्ष होते. त्यांचा सामाजिक व सांस्कृतिक जीवनाशी काहीही संबंध नव्हता. या अगदी चुकीच्या कल्पनांमुळे भारतीय इतिहास हा पूर्णपणे यांत्रिक बनला. तो एका राजघराण्यानंतर दुसरे राजघराणे आणि एका राजानंतर दुसरा राजा शासनसत्तेवर आरूढ होणे या स्वरूपात लिहिला गेला. ही लेखनाची प्रवृत्ती सुधारावयाची असेल तर प्रथम दोन निर्विवाद सत्ये स्वीकारावी व समजून घ्यावी लागतील._
_*पहिली गोष्ट ही की भारतात कोणतीही एकमेव व एकच एक समान संस्कृती कधीच नव्हती. ऐतिहासिकदृष्ट्या तीन भारत होते. पहिला ब्राह्मणांचा भारत, दुसऱ्या बौद्ध धर्मीय भारत व तिसरा हिंदू भारत. या प्रत्येकाची स्वतःची अशी संस्कृती होती. दुसरी गोष्ट अशी की भारतावरील मुस्लिम आक्रमणापूर्वी ब्राह्मणशाहीत व बौद्ध धर्म यात मरेपर्यंत अतिशय तीव्र संघर्ष झाला होता. जो या दोन गोष्टी लक्षात घेणार नाही त्याला भारताचा खरा इतिहास कधी लिहिताच येणार नाही.* त्याला या इतिहासात अंतर्भूत असलेला अर्थ व कार्यकारण भाव समजणार नाही. आतापर्यंत भारताचा इतिहास ज्या प्रकारे लिहिला गेला, त्यात सुधारणा करण्याच्या आणि इतिहासाचा अर्थ व उद्दिष्टे समजून देण्याच्या दृष्टीनेच ब्राह्मणशाहीच्या बौद्ध धर्मावरील आक्रमणाच्या व ब्राह्मणशाहीच्या बौद्ध धर्मावरील राजकीय विजयाच्या या इतिहासाची मला पुनर्रचना करणे भाग पडले._
_*त्यामुळे पुष्यमित्राची क्रांती ही ब्राह्मणांनी बौद्ध धर्माचा पराभव करण्यासाठी केलेली राजकीय क्रांती होती हे मान्य करावे लागेल.*_
_जिज्ञासू हा प्रश्न सहजच विचारतील की ब्राह्मणवादाने विजयी झाल्यानंतर काय केले? आता या प्रश्नाचे उत्तर देऊया. विजयाच्या गर्वाने फुगलेल्या ब्राह्मणवादाच्या दुष्कृत्यांचे सात शीर्षकांतर्गत विवेचन करणार करूया._
_*१) ब्राह्मणांना शासन आणि राजहत्या करण्याचा अधिकार प्रदान केला.*_
_*२) ब्राह्मणांना विशेष अधिकार प्राप्त लोकांचा वर्ग बनविले.*_
_*३) वर्णाचे रूपांतर जातीत केले.*_
_*४) विभिन्न जातींमध्ये संघर्ष आणि समाजविरोधी भावना निर्माण झाली.*_
_*५) शूद्र आणि स्त्रियांना नीच मानले.*_
_*६) विषमतेच्या आधारावर वर्णव्यवस्थेचे निर्माण केले* आणि_
_*७) प्रथम पारंपरिक आणि परिवर्तनशील असलेल्या सामाजिक व्यवस्थेला कायद्याने कायमचे अपरिवर्तनीय करून ठेवले.*_
*_प्रथम पहिल्या शीर्षकापासून सुरू करू._*
_*पुष्यमित्राने सुरू
केलेल्या प्रतिक्रांतीने सुरुवातीला ब्राह्मणांना नव्या संकटांना समोरे जावे
लागले. जनतेने सहजासहजी या प्रतिक्रांतीचा स्वीकार केला नाही. जनतेचा विरोध बाण
नावाच्या कवीने उत्तमपणे वर्णन केले आहे. या प्रतिकांतीचा उल्लेख करताना
पुष्यमित्राचे वर्णन बाणाने अधम जातीत जन्मलेला असा केला असून त्याच्याद्वारे
करण्यात आलेल्या राजहत्येला अनार्य अर्थात आर्य नियमांच्या विरोधी असा केला आहे.*_
_पुष्यमित्राच्या काळापर्यंत खालील तीन
नियम पूर्णतः अपरिवर्तनीय होते. तत्कालीन आर्य नियमांत स्पष्ट लिहिलेले आहे की,_
*_१) राजा होण्याचा अधिकार केवळ क्षत्रियांनाच आहे._*
*_२) कोणताही ब्राह्मण शस्त्रांचा व्यवसाय करणार नाही._*
*_३) राजाच्या विरुद्ध विद्रोह करणे पाप आहे._*
_*पुष्यमित्राद्वारे केल्या गेलेल्या कृत्याद्वारे वरील तीनही
नियमांचे उल्लंघन केले गेले. नव्हे पापच केले गेले आहे. एकतर तो ब्राह्मण होता.
ब्राह्मण असूनदेखील त्याने क्षत्रियाचा पेशा अंगीकारला राजाविरुद्ध या शास्त्राचा
वापर केला आणि तो स्वतः राजा बनून बसला.*_
_*नियमांविरुद्ध
कृत्य केल्यामुळे राज्यातील सर्व जनता पुष्यमित्राच्या विरुद्ध होती.* राज्यातील सर्व ब्राह्मणांना
पुष्यमित्राद्वारे केल्या गेलेल्या पापाचे समर्थन करावे लागले. याकरिता *ब्राह्मणांना तत्कालीन आर्यनियमात बदल
करावा लागला. संपूर्ण व्यवस्थेतच फेरफार (बदल) करून ब्राह्मणांनी पुष्यमित्राचे
समर्थन केले. ब्राह्मणांद्वारे करण्यात आलेले हे व्यवस्था परिवर्तन आपणास
मनुस्मृतीत पाहावयास मिळते.* या संबंधित श्लोकांचे वर्णन मी खाली करीत आहे._
_१२. १०० राजाचे
सेनापतिपद, राजाचे प्रमुखत्व व सर्वांवर साम्राज्य हे ब्राह्मणाला योग्य
मानावे._
_*येथे आपणास एक बदल आढळतो. ब्राह्मणाला
सेनापती बनण्याची, शासन करण्याची व सम्राट बनवण्याचीही मुभा त्यांना मिळाली.*_
_१२. ३१. ब्राह्मणाला कायद्याचे ज्ञान असल्यामुळे त्याने राजाकडे
तक्रार करण्याची गरज नाही. जे त्याची हानी करतील त्यांना स्वतःच्या अधिकारात त्याने शिक्षा करावी._
_११. ३२. ब्राह्मणाला स्वतः ची शक्ती ही त्याच्या स्वतःवरच अवलंबून
असते. व त्यामुळे त्याची शक्ती ही राज्याच्या
शक्तीपेक्षा अधिक समजावी. कारण राजाची शक्ती ही इतर माणसांवर अवलंबून असते त्यामुळे ब्राह्मणाला आपल्या
स्वतःच्या बळावर शिक्षा करता येते._
_१२. २६१-२६२ ब्राह्मणाने तीनही वर्णातील जनतेला ठार मारले तरी त्याने ऋग्वेद, यजुर्वेद किंवा सामवेद व उपनिषदांचे बरोबर पठण केल्यास तो पापमुक्त
होतो._
_आर्याच्या कायद्याचा हा दुसरा भाग
आहे. यामुळे ब्राह्मणाला कवळ राजालाच ठार मारण्याचा नव्हे तर सत्तेला, दर्जाला हनी पोचत असेल तर सर्व माणसांची कत्तल करण्याचा परवाना
दिला आहे._
_१३. ३४८. ज्या वेळी धर्माने प्रत्येकाला घालून दिलेल्या
व्यवसायापासून त्यांना सक्तीने अडथळा आणण्यात येईल, त्यावेळी द्विजाने शस्त्र धारण करावे. आणि वाईट काळात द्विजांवर संकट कोसळले असतानाही त्यांनी शस्त्र धारण करण्यास
हरकत नाही._
_१०. ३२०. क्षत्रियांना (लष्करी माणसाने किंवा राजाने) जर
ब्राह्मणाविरुद्ध हिंसक सशस्त्र हल्ला केला तर ब्राह्मणाला निर्दोष समजावे. कारण
मूलतः सैनिक हा ब्राह्मणापासून निर्माण झाला आहे._
*_आर्य कायद्यात हा तिसरा बदल आहे. कारण
यात बंड करण्याचा आणि राजहत्या करण्याचा परवाना देण्यात आला आहे. हा नवा कायदा
अत्यंत कुशलतेने तयार केला आहे. यात बंडाचा हक्क फक्त वरच्या तीन वर्णांना दिला
आहे. त्या वेळी ब्राह्मणाला एकट्यालाही बंडाचा हक्क देण्यात आला आहे. या बंडाचा
हक्क देताना त्याच्या सीमा ठरवून देण्यात आल्या आहेत. मनूने सर्व वर्णाना घालून
दिलेल्या व्यवसायांच्या नियमांचा भंग जर राजाने केला तरच बंडाला परवानगी आहे._*
_*हे कायद्यातील बदल जितके आवश्यक तितकेच क्रांतिकारकही होते.
पुष्यमित्राने मौर्य राजाला ठार करून जी परिस्थिती निर्माण केली होती. त्यातून
त्याच्या कृत्यांना कायद्याचा आधार देऊन सर्व सुरळीत करणे हा या बदलाचा उद्देश
होता. या कायद्यातील बदलामुळे ब्राह्मण राजहत्या कायदेशीरपणे करू शकत होते.
ब्राह्मणाला जर स्वतःच्या हक्कांच्या संरक्षणासाठी आवश्यक असेल तरच कत्तल व
रक्तपात करण्याचाही हक्क होता.*_
*_याप्रमाणे ब्राह्मणशाहीने शासन करण्याचे आणि त्यांच्या श्रेष्ठ दर्जाबाबत
आणि हक्कांबाबत संशय वा वाद माजू नयेत अशी कायदेशीर व्यवस्था केली. परंतु हे सर्व
ब्राह्मण जातीसाठी पुरेसे नव्हते. हे केवळ अभिमान बाळगण्यासाठी पुरेसे असले तरी
त्यांचा प्रत्यक्ष फायदा नव्हता. जर ब्राह्मणांना इतर सर्वसामान्य माणसासारखेच
हक्क आणि कर्तव्य असतील तर ब्राह्मणांना शासन असण्यास काही खास फायदा नव्हता.
ब्राह्मणांना जर ब्राह्मण शासनाची न्यायतः स्थापना करावयाची असेल तर एक वर्ग
म्हणून सर्व ब्राह्मणांना काही खास हक्क आणि निबंधापासून मुक्तता मिळणे आवश्यक
होते. ब्राह्मणांचा श्रेष्ठ दर्जा त्यांच्यासाठी खास कायदे जर मान्य करण्यात आले
नसते तर पुष्यमित्राची क्रांतीही काहीही चांगले करण्यास असमर्थ व असहायक आहे हे
सिद्ध होऊन उलट ते एक वाईट वादळ ठरले असते. मनूला याची जाणीव होती आणि म्हणून
त्यांने ब्राह्मणांसाठी मक्तेदारी निर्माण केली. त्यांना हक्क दिले आणि काही
निर्बंधापासून आपल्या संहितेद्वारे मुक्त ठेवले._*
*_प्रथम मक्तेदारीबद्दल विचार करू._*
_१. ८८.
ब्राह्मणांना त्याने अध्ययनाचा आणि अध्यापनाचा (वेदांचा) हक्क दिला. तसेच
स्वतःच्या आणि इतरांच्या फायद्यांसाठी बळी देण्याचा तसेच दान (भीक) देण्याचा आणि
घेण्याच्या हक्क दिला._
_*१०. १. द्विज
असलेल्या तीनही वर्णाना आपली कर्तव्ये पार पाडताना वेदांचे अध्ययन करण्याची मुभा
आहे. परंतु त्यांच्यापैकी फक्त ब्राह्मणच ते शिकवू शकतात. इतर दोन वर्णाना तो
अधिकार नाही हा सिद्ध नियम आहे.*_
_१०. २. सर्वांना कायद्यात उपजिविकेचे साधन म्हणून काम सांगितलेले
आहे.
हे ब्राह्मणाला माहीत असले पाहिजे.
त्याने ते इतरांना सांगितले पाहिजे. आणि स्वत: ही त्याचे आचरण केले पाहिजे._
_१०. ३. ब्राह्मणाला त्याच्या श्रेष्ठ स्थानामुळे, त्याचे मूळ श्रेष्ठतम असल्यामुळे तो विशिष्ट निर्बंधाचे नियम पाळत
असल्यामुळे आणि त्याला खास पवित्रता असल्यामुळे ब्राह्मण हा सर्व जातींचा
(वर्ण) स्वामी आहे._
_१०. ७४. जे ब्रह्माशी एकरुप होण्याच्या साधनाबाबत इच्छुक आहेत, आपली कर्तव्ये करण्यात खंबीर आहेत आणि त्यांनी खाली दिलेल्या सहा
कृत्यांचे पालन करावे. ही सहा कृत्ये खाली क्रमशः दिली आहेत :_
_१०. ७५. १) वेदांचे
अध्ययन, २) वेदांचे अध्यापन, ३) स्वतःसाठी यज्ञ करणे, ४) दुसऱ्यासाठी यज्ञ करणे, ५) देणग्या देणे आणि ६) देणग्या घेणे ही सहा कृत्ये ब्राह्मणासाठी सांगितली आहेत._
_१०. ७६. परंतु या सहा कृत्यांपैकी तीन कृत्ये म्हणजे दुसऱ्यासाठी
यज्ञ करणे, अध्यापन करणे आणि शुद्ध माणसांकडून देणग्या घेणे ही तीन कृत्ये
त्यांच्या उपजीविकेची साधने आहेत._
_१०. ७७. ब्राह्मणानंतर क्षत्रियांचा विचार करताना क्षत्रियांना तीन
कृत्ये करण्यास प्रतिबंध आहे. म्हणजे अध्यापन, दुसऱ्यासाठी यज्ञ
करणे आणि दान घेणे या गोष्टी क्षत्रियांना निषिद्ध आहेत._
_१०. ७८. ही कृत्ये
वैश्यांनाही निषिद्ध आहेत हा निश्चित नियम आहे. कारण प्रजापती मनूने ही कृत्ये या
दोन वर्णासाठी सांगितलेली नाहीत._
_१०. ७९. शस्त्रांचा
वापर करणे हे क्षत्रियांचे उपजीविकेचे साधन आहे. व्यापार करणे, गुरे राखणे, शेती करणे, ही वैश्याची उपजीविकेची साधने आहेत. परंतु त्याच्या कर्तव्यात
उदारता, वेदांचे अध्ययन आणि यज्ञ करणे या गोष्टींचा समावेश आहे._
_*मनूने याप्रमाणे तीन बाबतीत
ब्राह्मणांची मक्तेदारी ठेवली. वेद शिकवणे, यज्ञ करणे आणि देणग्या स्वीकारणे हे हक्क फक्त ब्राह्मणांपुरतेच
मर्यादित राहिले.*_
_याबरोबर
ब्राह्मणांना खालील बाबतीत निर्बंधमुक्त करण्यात आले. याचे दोन भाग आहेत._
*_एक करांपासून मुक्तता व दुसरे काही प्रकारच्या शिक्षांपासून
मुक्तता._*
_८.१३३. राजा आजारामुळे मरत असला तरी त्याने ब्राह्मणावर कर लादू
नये. राज्यातील एकही ब्राह्मण भुकेमुळे मरता कामा नये._
_८.१२२. शहाण्या माणसाला न्यायदानात अपयश येऊ नये. अन्यायाला
प्रतिबंध असावा म्हणून शहाण्या माणसाने खोटी शपथ घेण्याच्या गुन्ह्याबाबत दर
सांगितले आहेत._
_८.१२३. न्यायी राजा खोटी शपथ घेतल्याबद्दल कनिष्ठ तीन वर्णांना दंड आणि हद्दपारीची शिक्षा देऊ शकतो. परंतु ब्राह्मणाला मात्र तो फक्त
हद्दपार करील._
_*८. १२४. स्वयंभू ईश्वराचा पुत्र मनू याने तीन कनिष्ठ वर्णांसाठी
शिक्षा करण्याच्या दहा जागा निश्चित केल्या
आहेत. पण ब्राह्मणाला मात्र देशातून कोणतीही इजा न करता जाऊ द्यावे.*_
_*८. ३७९. ब्राह्मणाला देहान्त शिक्षेऐवजी फक्त त्याचे डोके
भादरण्याची शिक्षा सांगितली आहे. इतर जातींना
मात्र देहान्त शासन भोगावे लागेल.*_
_*८. ३१०. ब्राह्मणाने जरी सर्व संभवनीय
गुन्हे केले असले तरी त्याचा वध करू नये. (राजाने) ब्राह्मणांची सर्व मालमत्ता त्याच्याकडे ठेवून
कोणतीही इजा न करता ब्राह्मण गुन्हेगाराला हद्दपार
करावे.*_
_याप्रमाणे मनूने ब्राह्मणांना
गुन्ह्यांबाबत सर्वसधारण गुन्हेगारविषयक कायद्यापासून अलिप्त ठेवले आहे. त्याला
देहान्त शासनाऐवजी त्याच्या सर्व मालमत्तेसह आणि एकही जखम न होता देश सोडून
जाण्याची शिक्षा सांगितली आहे. *त्याला फक्त हद्दपारीची शिक्षा म्हणजे हॉक्सच्या शब्दात अत्यंत घृणास्पद गुन्ह्यांबाबत हवापालट करण्याची शिक्षा सांगितलेली आहे.*_
मनूने ब्राह्मणाला
काही हक्क दिले आहेत :
_*न्यायाधीश ब्राह्मणच असला पाहिजे.*_
_८.९. राजा जर वैयक्तिकरीत्या खटला चालवीत नसेल तर त्याने व्यासंगी ब्राह्मणाला खटले चालविण्यास सांगावे._
_८.१०. या ब्राह्मणाने श्रेष्ठतम न्यायालयात करवसुली अधिकाऱ्यांच्या
बरोबर
यावे आणि राजापुढे आलेल्या सर्व
खटल्यांचा बसून वा उभे राहून पूर्णपणे विचार करावा._
_८.३८. ज्या वेळी राजाला जमिनीत लपविलेले धन (खजिना) मिळतो, त्यावेळी राजाने त्यातील अर्ध धन ब्राह्मणाला
द्यावे आणि बाकीचे सरकारी खजिन्यात ठेवावे._
_९.३३३. पण ज्या राजाला आपला मृत्यू समीप आला आहे असे वाटते, त्याने दंडापासून जमा झालेली सर्व संपत्ती ब्राह्मणांना द्यावी.
आपले राज्य मुलाला द्यावे आणि युद्धात मृत्यू पत्करावा._
_९.१८७. मृतांच्या सपिंडापैकी जो सर्वांत जवळचा तीन पिढ्यांतील असेल, त्याचा माणसाच्या मालमत्तेवर हक्क असतो. त्यानंतर आध्यात्मिक
शिक्षक हा सकुल्य (वारस) समजावा किंवा शिष्याला वारस समजावा._
_९.१८८. परंतु
यापैकी कोणताही वारस नसेल तर जे वेदांत निष्णात आहेत, शुद्ध व आत्मसंयमी आहेत असे ब्राह्मण मालक बनतील व या प्रकारे
कायद्याचे उल्लंघन होणार नाही._
_९.१८९. राजाने
ब्राह्मणांची मालमत्ता कधीही घेऊ नये, हा निश्चित नियम आहे; परंतु इतर जातीतील मृतांचे वारस नसतील तर ती मालमत्ता राजाने
ताबडतोब घ्यावी._
_*मनूने या प्रकारे
हे कायदे,
हक्क व काही गोष्टीपासून मुक्तता
ब्राह्मणांना प्रदान केली आहे. राजा ब्राह्मण असल्याचे ते निदर्शक आहे.*_
_ब्राह्मणशाहीचे पाठीराखे
-ब्राह्मणशाहीच्या श्रेष्ठत्वावर व सर्वोत्तम स्वरूपावर त्यांचा इतका गाढा विश्वास होता की, त्यांना या
अतिरिक्त हक्कांबाबत काही सबबी देण्याचीही गरज वाटली नाही. मनूने ब्राह्मणांवर
लादलेल्या काही निर्बंधाबाबत तक्रार करण्यास ते हयगय करीत नाहीत. *मनूने ब्राह्मणांवर काही निर्बंध
लादले आहेत, ते खरे आहे. हे करण्याचा उद्देश मनूने
ब्राह्मणांपुढे दरिद्री राहण्याचा आणि सेवा करण्याचा आदर्श ठेवला होता. हे दाखविणे
हा होता.* परंतु या
निर्बंधाकडे वोट दाखवून मनूने ब्राह्मणांपुढे दारिद्र्याचा व आदर्श ठेवला होता हे
समजणे हे सर्वस्वी चुकीचे आहे. अशा प्रकारचा अर्थ काढण्याला मनुस्मृतीत काहीही
आधार नाही._
_हे निर्बंध घालण्याचा मनूचा उद्देश
समजून घ्यावयास असेल तर दोन गोष्टी ध्यानी घ्याव्या लागतील. पहिली गोष्ट मनूने
ब्राह्मणांना समाजव्यवस्थेत जे स्थान दिले त्याचा व दुसरी म्हणजे या निर्बंधाच्या
स्वरूपाचा विचार करावा लागेल. मनूने समाजव्यवस्थेत ब्राह्मणांना दिलेले स्थान
(सर्वश्रेष्ठ) अगदी स्पष्ट शब्दांत ग्रंथित केले आहे. ही गोष्ट महत्त्वाची असल्याने
पूर्वी उद्धृत केलेले श्लोक पुन्हा देत आहे._
_१.९३. ब्राह्मण हा
ब्रह्माच्या मुखातून निर्माण झाला असल्याने, प्रथम जन्माला आला असल्याने, तो वेद जाणत असल्याने, तो सर्व चराचर सृष्टीचा स्वामी आहे._
_४.२. ब्राह्मणाने
अशी उपजीविकेची साधने वापरावीत की ज्यामुळे दुस वेदना (त्रास) होणार नाही वा कमीत
कमी वेदना (त्रास) होतील व संकटात त्यावेळी त्याने हीच उपजीविकेची साधने वापरावीत._
_४.३. आपल्या फक्त
उपजीविकेसाठी त्याने त्याच्या वर्गासाठी ठरवून दिले निर्दोष व्यवसायाच्या द्वारा
आपल्या शरीराला अधिक कष्ट न देता मालमत्ता जमवावी.
_८.३३७. चोरीच्या बाबतीत शूद्राचा गुन्हा आठपट, वैश्याचा सोळापट आणि क्षत्रियाचा बत्तीसपट समजावा._
_८.३३८. ब्राह्मणाचा गुन्हा चौसष्टपट समजावा किंवा शंभरपट या चौसष्ट
पटीचा दुप्पट समजावा.
_८.३८३. जर ब्राह्मणाने इतर दोन वर्णाच्या संरक्षित स्त्रीशी संभोग
केला एक हजार पट दंड करावा. शूद्राच्या संरक्षित स्त्रीशी जर हा गुन्हा कला तर
क्षत्रिय व वैश्याला एक हजारपट दंड करावा._
_८.३८४.
क्षत्रियांच्या असंरक्षित स्त्रीशी संभोग केला तर वैश्याला पाचशेपट हाच गुन्हा
क्षत्रियाने केला तर त्याची गाढवाच्या मुताने हजामत करून तितकाच दंडही करावा._
_८.३८५. ब्राह्मणाने
जर असंरक्षित क्षत्रिय, वैश्य वा शूद्र स्त्रीशी समागम केला
तर त्याला पाचशे पट दंड करावा. परंतु अतिशूद्र स्त्रीशी समागम केला त्याला एक
हजारपट दंड करावा._
_ब्राह्मणांवरील हे निर्बंध त्याला समाजात जे स्थान मनूने दिले
त्याच्या पार्श्वभूमीवर पाहिले, तर या निर्बंधाचा उद्देश ब्राह्मणाला दुःख व्हावे वा त्याचा छळ व्हावा यासाठी नाही हे उघड होते. याउलट ज्या उच्चतम स्थानावर मनूने
ब्राह्मणाल बसविले आहे, त्या स्थानापासून त्याचे पतन होऊ नये व तो अब्राह्मणांच्या दृष्टीन उतरू नये यासाठी हे निर्बंध आहेत हे लक्षात येते._
_मनुस्मृतीतील इतर तरतुदीवरून मनूचा उद्देश ब्राह्मणांना गरीब व निराधार
बनवावे हा नव्हता हे स्पष्ट होते. या संदर्भात मनुस्मृतीतील ब्राह्मण संकटात असेल
त त्याने कसे वर्तन करावे? या नियमांना वाचावे._
_१०.८०. अनेक
व्यवसायांतील ब्राह्मणांसाठी योग्य व्यवसाय, वेद शिकविणे क्षत्रियांसाठी लोकांचे
संरक्षण करणे व वैश्यांसाठी व्यापार करणे हा आहे._
_१०.८१. परंतु वर उल्लेखिलेला व्यवसाय
करून जर ब्राह्मणांची उपजीविका होत नसेल तर त्याने क्षत्रियांसाठी सांगितलेले
व्यवसाय करावे;
कारण क्षत्रिय हे दा त्यांच्या खालोखाल आहेत._
_१०.८२. या दोन्ही प्रकारच्या व्यवसायांपासून जर त्याचे पोषण होऊ शकत
नसेल तर काय करावे, या प्रश्नाचे उत्तर त्याने वैश्याचा
व्यवसाय करावा. त्याने शेती वा गुरे राखण्याचे काम करावे हे आहे._
_१०.८३. पण ब्राह्मण
व क्षत्रिय यांनी वैश्यांचा व्यवसाय करताना त्यांनी शेती करण्याचे काळजीपूर्वक
टाळावे; कारण त्यामुळे अनेक प्राण्यांना हानी पोचते व तो व्यवसाय दुसऱ्यावर
अवलंबून आहे._
_१०.८४. काहीजण असे म्हणतात की शेती व्यवसाय हा सर्वांत उत्तम आहे. परंतु सदाचारी माणसे उपजीविकेचे हे साधन सदोष मानतात. कारण
लोखंडाचा फाळ असणारे लाकडी अवजार (नागर) घरणीला
आणि जमिनीत राहणाऱ्या सजीवांना हानी पोचवितात._
_१०.८५. परंतु जर एखाद्याने अन्य उपजीविकेचे साधन नसल्याने आपल्या
कर्तव्याबाबत निर्बंध पाळले नाही, त्याने आणखी संपत्ती वाढविण्यासाठी
वैश्य विकतात त्या वस्तू विकाव्यात. फक्त त्यात खालील अपवाद करावेत._
_ब्राह्मणांवर जे
निर्बंध घातले आहेत ते तो त्याच्यासाठी सांगितलेल्या व्यवसायात त्याची भरभराट होत
आहे, तोपर्यंतच लादलेले आहेत. त्याच्यावर संकट आले व त्याचे हाल होऊ
लागले की, त्याला *कोणताही व्यवसाय करण्याची परवानगी आहे व कोणताही व्यवसाय केला तरी
तो आपले ब्राह्मणत्व गमावत नाही व आपण आपत्तीत आहोत की नाही हे ठरविण्याचा हक्क
ब्राह्मणाला स्वतःलाच आहे.* त्यामुळे भरभराटीत असलेल्या ब्राह्मणालाही इतर व्यवसाय करून
आपल्या उत्पन्नात भर पालण्यावर बंधन नाही. फक्त त्याने आपल्या मनाशी आपण आपत्तीत
आहोत असे समजून घेतले पाहिजे._
_मनुस्मृतीत
ब्राह्मणांना भौतिक फायदे मिळवून देणाऱ्या आणखीही इतर तरतुदी आहेत. त्या दक्षिणा
आणि दानाच्या स्वरूपात आहेत. धार्मिक समारंभाचे पौरोहित्य केल्याबद्दल मिळणारे
शुल्क म्हणजे दक्षिणा. ब्राह्मणशाहीत भरपूर धार्मिक कर्मकांडे आणि समारंभ आहेत.
ब्राह्मणाला उत्पन्नाचे हे केवढे मोठे साधन आहे याची कल्पना करणे कठिण नाही.
पुरोहिताचे शुल्क बुडण्याची शक्यता नव्हती. कारण दक्षिणेला जे धार्मिक महत्त्व
देण्यात आले होते. त्यामुळे दक्षिणा नियमित मिळू शकत असे. परंतु तरीही मनूने ब्राह्मणांनाही फी वसूल करण्याचा हक्क मिळवून
दिला आहे. _
_११.३८. ब्राह्मण जर श्रीमंत असूनही अम्न्यधेय (प्रजापतीस पवित्र असणारा
घोडा) करण्यासाठी दक्षिणा देणार नाही, तर तो ज्याने पवित्र होम केलाच नाही
त्याचा बरोबरीचा समजावा._
_११. ३९ ज्याची
श्रद्धा आहे व ज्याचा आपल्या इंद्रियांवर ताबा आहे अशा माणसाने अनेक सदाचार केले, तरी त्याने यज्ञासाठी ठरवून दिलेल्या दक्षिणेपेक्षा कमी दक्षिणा
देऊ नये._
_१९.४०. जर यज्ञात
फार थोडी दक्षिणा दिली तर इंद्रिये (स्पर्श आणि कृती करणारी), सन्मान, स्वर्गसुख, दीर्घायुष्य, मुले, गुरे आदी या
सर्वांचा नाश होतो आणि म्हणून त्यांचे उत्पन्न कमी आहे त्याने (श्रोत) यज्ञ करू
नये._
_आपली दक्षिणा वसूल
करण्यासाठी पुरोहिताने काहीही केले तरी तो कायद्याने गुन्हा समजू नये. या
मर्यादिपर्यंत मनू ब्राह्मणाच्या हितरक्षणाबाबत गेला आहे._
_८.३४९. ब्राह्मणाने स्वतः च्या
संरक्षणासाठी,
पुरोहिताच्या दक्षिणेसाठी, स्त्रियांच्या व ब्राह्मणांच्या संरक्षणासाठी जर संघर्ष केला व
त्यासाठी जर त्यात कुणाला ठार केले तर ते पाप समजले जात नाहीत._
_*दानाची तरतूद हेच ब्राह्मणांच्या उत्पन्नाचे मोठे साधन असते. मनूने, राजाने ब्राह्मणांना दान केले पाहिजे असा आदेश दिला आहे.*_
_७.७९. राजाने विविध (श्रोत) यज्ञांच्या वेळी उदारपणे दक्षिणा
वाटावी आणि पुण्य संपादनासाठी ब्राह्मणांना संपत्ती आणि सुख द्यावे._
_७.८२. जे ब्राह्मण
वेदांचे अध्ययन करून गुरूच्या गृहातून परत आले आहेत, अशा ब्राह्मणांचा
राजाने सत्कार करावा. या वेळी ब्राह्मणांना जो पैसा दिला जाईल तो राजाचा अविनाशी
खजिना होय असे मी जाहीर करतो._
_७.८३. चोर किंवा
शत्रू तो घेऊ शकणार नाहीत. तो हरवू शकणार नाही आणि म्हणून राजाने हे अविनाशी धन ब्राह्मणांकडे सोपवावे._
_९.४. वेदाचे शिक्षण ज्याने घेतले आहे अशा ब्राह्मणांना राजाने
यज्ञासाठी योग्य ती सर्व प्रकारची रत्ने आणि देणग्या द्याव्यात._
_*मनूने राजाला
दिलेले हे आदेश ब्राह्मणांची पोकळ आशा राहिली नाहीत. या आदेशांचा ब्राह्मणांनी
पुरेपूर फायदा घेतला हे भूगर्भ शास्त्रज्ञांनी शोधून काढलेल्या राजपत्रांच्या
संख्येवरून स्पष्ट होते. या प्रकारे राजांना ब्राह्मणांनी मूर्ख बनवून धूर्त, आळशी आणि निष्क्रिय ब्राह्मणांना गावेच्या गावे दान देण्यास कसे
प्रवृत्त केले, हे एक आश्चर्य आहे. आधुनिक काळात
ब्राह्मणांकडे जी संपत्ती आहे त्यातील बहुतांश धार्मिक पण मूर्ख राजांना धूर्त ब्राह्मणांनी फसवून मिळविलेली आहे. मनूने केवळ
राजांनाच दानाचे आदेश देऊन त्यांना ब्राह्मणांची शिकार बनविले नाही, तर दानाच्या संदर्भात सर्वसामान्य माणसांनाही लुबाडण्याची संधी
त्याने ब्राह्मणांना दिली. मनूने हे तीन प्रकार केले. प्रथमतः ब्राह्मणांना
देणग्या वा दान देणे हे माणसाचे पवित्र कर्तव्य आहे असे त्याने सांगितले आणि
ब्राह्मणाला दिलेले दान सर्वांत उच्च प्रकारचे दान आहे असे नमूद केले.*_
_७.८५. जो ब्राह्मण
नाही त्याला दान दिले तर सर्वसाधारण पुण्य लागते. जो आपल्याला ब्राह्मण म्हणवून
घेतो त्याला दान दिले तर त्याच्या दुप्पट पुण्य मिळते. व्यासंगी ब्राह्मणाला दान
दिले तर एक लक्षपट पट पुण्य मिळते. ज्याला वेद माहीत आहेत त्याला मिळणाऱ्या
पुण्याला अंत नाही._
_७.८६. दान
घेणाऱ्याच्या खास गुणानुसार आणि दान देणाऱ्याच्या श्रद्धेनुसार त्यांना पुढील जीवनात लहान वा मोठे बक्षीस मिळते._
_दुसऱ्या एका ठिकाणी मनूने काही
परिस्थितीत ब्राह्मणांना दान देणे हे सक्तीचे आहे असे प्रतिपादिले आहे._
_११.१. संतती लाभावी म्हणून जो इच्छा करतो; जो यज्ञ करण्याची इच्छा करतो; प्रवासी, जो आपली सर्व मालमत्ता देऊन टाकतो; तो आपल्या गुरूसाठी
आपल्या पित्यासाठी, आईसाठी वेद-अध्ययन करणारा विद्यार्थी
म्हणून किंवा आजारी माणूस म्हणून भीक (दान) मागतो._
_११.२. या नऊ
प्रकारच्या ब्राह्मणांना स्नातक असे संबोधावे, जे पवित्र
कायद्याच्या अंमलबजावणीसाठी दान मागतात, अशा गरीब माणसांना त्यांच्या
ज्ञानाच्या प्रमाणात दान द्यावे._
_११. ३ द्विजामधील सर्वोत्तम अशा या ब्राह्मणांना अन्न आणि बक्षिसे
(पैशांची) द्यावीत. ब्राह्मणांशिवाय इतरांना यज्ञाच्या परिसराबाहेर अन्न आणि
बक्षिसे द्यावी असा आदेश आहे._
_११.६. प्रत्येकाने आपल्या क्षमतेनुसार वेदाध्ययन आणि एकटे
राहणाऱ्या ब्राह्मणांना संपत्ती द्यावी असे केल्याने त्यांना मृत्यूनंतर स्वर्गसुख
मिळेल._
_दानाचे नियम हे
ब्रह्मणांना सुरक्षितता आणि स्थिर उत्पन्न मिळावे, यासाठी मनूने जी
पद्धती स्वीकारली ती अत्यंत चतुरपणाची होती. मनूने दानाला तपस्येशी जोडले. मनूच्या
योजनेत अयोग्य कृती हे पाप मानले जाते किंवा ते पाप आणि गुन्हा दोन्ही होऊ शकते.
पाप म्हणून त्याची शिक्षा धर्मशास्त्राच्या कायद्यानुसार मिळते. गैरवर्तणुकीला
मनूने पातक असे म्हटले आहे. या पातकाची शिक्षा तपस्या ही आहे. मनूच्या योजनेनुसार प्रत्येक पापाच्या निरसनासाठी तपस्या करणे
आवश्यक आहे._
_११.४४. जो माणूस नेमून दिलेली कामे करीत नाही किंवा दोषास्पद वर्तन
करतो किंवा शारीरिक सुखाच्या मागे लागतो त्याने तपस्या केली पाहिजे._
_११.४५. अजाणतेपणी
झालेल्या पापाबद्दल सर्व ऋषींनी तपस्येची शिक्षा सांगितली आहे. वैदिक वाङ्मयाच्या
पुराव्यावरून जाणीवपूर्वक केलेल्या गुन्ह्यासाठीही तपस्येचा उपाय सांगितलेला आहे._
_११.४६. अजाणतेपणाने केलेले पाप वेदांच्या पठणाने धुऊन निघते. परंतु जी पापे माणसे जाणीवपूर्वक करतात त्यासाठी खास तपस्या सांगितल्या
आहेत._
_११.५३. याप्रमाणे गुन्ह्यातील जे शिल्लक राहते (तपस्या न केल्यास)
त्यामुळे पुढील जन्मात माणसे वेडसर, मुकी, आंधळी, बहिरी किंवा विकृत बनतात. अशा सर्व माणसांचा सदाचारी लोक तिरस्कार करतात._
_११.५४. आणि म्हणून शुद्धीकरण तपस्या करणे हे अत्यंत आवश्यक आहे
कारण ज्यांची पापे धुऊन निघाली नाहीत त्यांचा पुढील जन्म तिरस्कणीय लक्षणांनी
युक्त असा होतो._
_तपस्येचे अनेक प्रकार मनूने सांगितले
आहेत. जे ते जाणून घेण्यास उत्सुक आहेत त्यांनी मनुस्मृतीत ते वाचावेत. महत्त्वाची
नोंद करण्यासारखी गोष्ट ही की या सर्व प्रकारच्या तपस्यांत ब्राह्मणांना भौतिक
फायदा मिळेल अशी सोय केली आहे. काही तपस्यांचे स्वरूप ब्राह्मणांना दान देणे एवढेच
आहे. इतर तपस्यांसाठी धार्मिक विधी सांगितलेले आहेत. परंतु धार्मिक कृत्ये
करण्याचा अधिकार फक्त ब्राह्मणांनाच आहे आणि धार्मिक कृत्यांनंतर ब्राह्मणाला
दक्षिणा द्यावी लागते. याप्रमाणे दानाची पद्धती ही ब्राह्मणांना उपकारक आहे._
_यामुळे मनूने ब्राह्मणांच्या समोर नम्रता, दारिद्र्य आणि सेवा यांचा आदर्श ठेवला होता असे म्हणणे हास्यास्पद आहे. ब्राह्मण मनूला या दृष्टीने कधीच समजले नाही. आपणाला विशेष हक्क असणारा वर्ग म्हणून स्थान दिलेले आहे असेच खरोखर त्यांना वाटते. तो केवळ एवढेच समजत नाहीत तर आपल्याला जे हक्क मिळाले आहेत, त्याचा इतर दिशांनीही विस्तार करण्याचा प्रयत्न त्याने केला आहे. त्याबाबत आपण नंतर चर्चा करू. ब्राह्मणांचे हे मत न्याय्यच होते. कारण मनूने ब्राह्मणांना या जगाचे स्वामी म्हणून संबोधिले होते आणि तसे कायम राहतील अशी कायद्याची. रचना केली होती._
_या प्रकारे ब्राह्मणी सत्ता आणि ब्राह्मणी प्रभुत्व राहावे यासाठी संपूर्णपणे तरतूद केल्यानंतर मनूने आपली उद्दिष्टे साध्य करण्यासाठी समाजात परिवर्तन घडवून आणण्याच्या कामास सुरुवात केली._
_वर्गाचे जातीय रूपांतर करण्याचे अत्यंत प्रचंड आणि स्वार्थी कार्य करण्यात ब्राह्मणशाहीच्या विजयानंतर मनू अग्रक्रमाने गुंतला होता. ब्राह्मणशाहीने हे परिवर्तन घडविण्यासाठी काय काय केले याची नोंद सापडलेली नाही. याउलट वर्ण आणि जातीच्या संबंधीच्या विचारात खूप गोंधळ आहे. काही जणांच्या मते वर्ण आणि जात हे एकच आहे. जे वर्ण आणि जात वेगवेगळे आहे असे समजतात, त्यांना त्या वेळी सामाजिक व्यवस्थेत आंतरवर्णीय विवाहांना बंदी आली, त्यावेळी वर्णाचे रूपांतर जातीत झाले असे वाटते. हे चुकीचे आहे आणि या चुकीचे कारण मनूने वर्णांचे जातीत रूपांतर करताना आपले उद्दिष्ट काय आणि उद्दिष्टानुरूप साधने कोणती याचा कोठेही खुलासा केला नाही._
_एखादी गोष्ट समजणे म्हणजे आपले स्वरूप दुसऱ्याला समजणे ठरते असे ऑस्कर वाइल्डने म्हटले आहे. मनूला यात सापडावयाचे नव्हते. आणि म्हणून त्याने आपली उद्दिष्टे आणि साधने याबाबत स्तब्धता पाळली आणि त्याबाबत लोकांना तर्क लढविण्यास मोकळे ठेवले. हिंदूंसाठी हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे. याचा खुलासा करून घेणे अत्यंत महत्वाचे आहे. मनूच्या उद्दिष्टांबाबत आणि साधनांबाबत विविध लोकांनी केलेली निरनिराळी मीमांसा गोंधळ निर्माण करते. ब्राह्मणशाहीने वर्णाला समाजाचा पाया असे संबोधून मूळच्या कल्पनेला ब्राह्मणशाहीने कसे चुकीचे आणि विघातक स्वरूप दिले यावर प्रकाश पडावा आणि मनूच्या उद्दिष्टांबाबत गोंधळ समजावा म्हणून असा खुलासा आवश्यक आहे._
_मनूचे मार्ग हे मूकपणाचे आणि भूमिगत असल्यासारखे आहेत. आणि त्यामुळे वर्णाचे जातीत रूपांतर कसे झाले याचा कालक्रमानुसार इतिहास देणे अशक्य आहे. परंतु सुदैवाने हा बदल कसा घडून आला याच्या निदर्शक काही खुणा आपल्याला सापडतात._
_हा बदल कसा घडून आला याबाबत चर्चा करण्यापूर्वी वर्ण आणि जात यामधील फरकाबाबत जो गोंधळ आहे तो दूर करणे आवश्यक आहे. *वर्ण आणि जात हे कायदेशीरदृष्ट्या समान वाटतात. या दोन्हींत दर्जा आणि व्यवसाय यांचा समावेश आहे. वर्णात आणि जातीत, दोन्हींमध्ये दर्जा आणि व्यवसाय यांच्या कल्पना समाविष्ट आहेत. परंतु वर्ण आणि जात याच्यात एका बाबतीत महत्त्वाचा फरक आहे. वर्ण हा वंशपरंपरागत नाही. माणसाचा दर्जा आणि व्यवसाय हे वर्णामध्ये वंशपरंपरागत असत नाहीत. परंतु जातिव्यवस्थेत दर्जा आणि व्यवसाय हे वंशपरंपरागत असतात आणि ते पित्याकडून पुत्राकडे येतात.*_
*_ब्राह्मणशाहीने वर्णांचे रूपांतर
जातीत केले याचा अर्थ दर्जा व व्यवसाय हे वंशपरंपरागत करण्यात आले असा आहे._*
_हा बदल कसा करण्यात आला, हा बदल घडवून आणण्यासाठी काय केले, यांच्या पाऊलखुणा शिल्लक ठेवल्या नाहीत. परंतु हे कसे केले असावे याचे काही टप्पे इतिहासात आढळून येतात._
हा बदल टप्प्याटप्प्याने करण्यात आला.
_*१) पहिल्या टप्प्यावर वर्णांचा
म्हणजेच दर्जा व व्यवसायाचा काळ माणसाला ठरवून देण्यात आला.*_
_*२) त्यानंतर माणसाचा वर्ण व त्याचा
व्यवसाय व दर्जा त्याचा आयुष्यापुरता ठरविण्यात आला.*_
_*३) त्यानंतरची पायरी माणसाचा वर्ण, दर्जा व व्यवसाय वंशपरंपरागत करणे ही होती.*_
*_कायद्याच्या भाषेत बोलवयाचे तर सुरुवातीला वर्णाने दिलेले इस्टेट ही काही काळापुरती होती. नंतर ती आयुष्यभर झाली व त्यानंतर इस्टेट वारसांना मिळू लागली. म्हणजेच वर्णांचे रूपांतर जातीत झाले. वर्णांचे रूपांतर या टप्प्यांनी झाले ह्या गोष्टींचा भरपूर पुरावा धार्मिक साहित्यात नोंदलेल्या परंपरांत मिळतो. या परंपरा अगदी खऱ्या म्हणून स्वीकारण्यास काही हरकत नाही. या परंपरेप्रमाणे माणसाचा वर्ण ठरविण्याचे काम मनू व सप्तर्षी करीत असत. सर्व जनतेतून मनू जे क्षत्रिय व वैश्य होण्यास लायक आहेत त्यांना निवडीत असे व सप्तर्षी जे ब्राह्मण होण्यास लायक आहेत त्यांना निवडीत असे. मनू आणि सप्तर्षी यांनी ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य यांची निवड केल्यानंतर जे जे शिल्लक राहात, त्यांना शूद्र समजण्यात येई. हे निवडलेले वर्ण एका युगासाठी असत (युग म्हणजे चार वर्षे). प्रत्येक वर्षांनंतर नवे अधिकारी या कामासाठी नेमण्यात येत. त्यांना नावे मात्र ऋषी व सप्तर्षी अशीच दिली जात. एकदा जे पूर्वी शूद्र म्हणून शिल्लक राहिले होते त्यांपैकी काहींना ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य म्हणून निवडण्यात आले होते. त्यांच्यापैकी काही निवडले न गेल्याने शूद्र म्हणून शिल्लक राहि होते. त्यापैकी काही ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य म्हणून निवडण्यात आले होते. त्यांच्यापैकी काही निवडले न गेल्याने शुद्र म्हणुन शिल्लक राहिले. या प्रकार व्यक्तीचे वर्णाचे वर्ण बदलले गेले. एक प्रकारे व्यक्तीच्या बौद्धिक, शारीरिक क्षमतेनुसार व प्रवृत्तीनुसार केलेल्या निवडीत वर्णांची सरमिसळ व बदल होत असे व त्यांना समाजजीवनाला आवश्यक ते व्यवसाय देण्यात येत. ज्यावे वर्णातील ही सरमिसळ होत असे त्याला मन्वंतर असे म्हणत. या शब्दाचा दुसरा अर्थ मनूने केलेले बदल असा होतो. 'मन्वंतर' या शब्दाचा दुसरा अर्थ व्यक्तीला तितक्या काळासाठी वर्ण बहाल करण्यात येई तो काळ, असाही होता. मन्वंतर अर्थाच्या दृष्टीने अत्यंत समृद्ध आहे आणि त्यात वर्णपद्धतीचे महत्त्वाचे घटक आहेत. हे घटक दोन आहेत. पहिली गोष्ट ही की व्यक्तीचा वर्ण मनू व सप्तर्षी या स्वतंत्र अधिकाऱ्यांच्या द्वारा ठरविला जाई. त्याचप्रमाणे वर्ण हा निश्चित काळापुरता असे व त्यानंतर त्यात मनू व सप्तर्षी बदल करीत. पुराणात नमूद केलेल्या प्राचीन परंपरेप्रमाणे हा काळ चार वर्षांचा असे. त्याला युग असे म्हणत. चार वर्षांचे हे युग संपल्यानंतर मन्वंतर होई आणि वर्णांच्या यादीत फेरफार व पुनर्रचना होई. या पुनर्रचनेत काहींचा जुना वर्ण बदले. काहींचा पूर्वीचाच वर्ण कायम राही. काहींचा वर्ण नाहीसा होई व काहींना वरचा वर्ण मिळे._*
_*मूळच्या वर्णपद्धतीत प्रौढांना वर्ण
ठरविण्याचा होतो तो पूर्वीचा प्रशिक्षणाशी किंवा पूर्वग्रह वा प्रवृत्तीशी
आधारलेला नव्हता. एखाद्या मुलाखत 'घेणाऱ्या
मंडळाप्रमाणे मनू व सप्तर्षी हे होते. आणि मुलाखतीत त्यांच्याबद्दल जे मत होई
त्यांवरून त्याचा वर्ण ठरविला जाई. वर्णांचा हा निर्णय ओबडधोबड व अस्ताव्यस्तपणे
घेतला जाई. यानंतर ही पद्धत असे संबोधले आहे. शिक्षकाने म्हणजेच आचार्याने काढलेली
शाळा म्हणजे गुरुकुल. सर्व मुले या गुरुकुलात शिकण्यासाठी जात. हे शिक्षण बारा
वर्षे दिले जाई. गुरुकुलात असणाऱ्या विद्यार्थ्यांना असे म्हणत. शिक्षणाची बारा
वर्षे संपल्यानंतर गुरुकुलाचे आचार्य उपनयनविधी करीत. उपनयनविधी हा अत्यंत
महत्त्वाचा समारंभ या उपनयनविधीच्या वेळी आचार्य मुलाला त्याचा वर्ण (निवडीत) देत.
आणि त्या वर्णांची कर्तव्ये करण्यासाठी त्याला खुल्या जगात पाठवीत. मनू व सप्तर्षी
यांनी वर्ण प्रदान करण्याऐवजी, आचार्यांने निर्णय करण्याची नवी पद्धती अमलात आली. त्यात जुन्या
पद्धतीतील तत्त्व कायम ठेवण्यात आले व त्यात वर्ण ठरविण्यापूर्वी प्रशिक्षण
व्यक्तीचा विकास करू शकते आणि वर्णाबाबत निर्णयाची सुरक्षित पद्धत विद्यार्थ्यांचे
व्यक्तित्व, त्याची क्षमता आणि प्रवृत्ती समजून
घेणे हीच आहे. त्यामुळे वर्ण निर्णयाची नवी पद्धतही फार मोठी सुधारणा मानावी
लागेल. आचार्य गुरुकुल पद्धतीत वर्णाच्या काळापुरता होता. तो आता पूर्ण
आयुष्यासाठी प्रदान करण्यात येऊ लागला. परंतु वंशपरंपरागत नव्हता.*_
_ब्राह्मणशाही या पद्धतीवर नाराज होती, हे उघड आहे. या नाराजीचे कारण स्पष्ट होते. कारण या पद्धतीत आचार्य ब्राह्मणाच्या मुलाला शूद्र वर्णही देण्याचा धोका होता. हे टाळणे ब्राह्मणशाहीला अत्यावश्यक वाटते. त्यांना वंशपरंपरागत हवा होता. वर्ण हा वंशपरंपरागत झाला तरच ब्राह्मणांची मुले शुद्र म्हणून जाहीर करण्याचे टळले असते. हे ध्येय साधण्यासाठी ब्राह्मणशाहीने अत्यंत धारिष्ट्य दाखवून वर्ण वंशपरंपरागत केले._
_ब्राह्मणवाद आणि जातीची निर्मिती वर्णांचे जातीत रूपांतराची प्रक्रिया_*
_ब्राह्मणशाहीने मुलाचा वर्ण ठरविण्याच्या पद्धतीत तीन मूलभूत बदल केले. पहिली गोष्ट ही की मुलांना प्रशिक्षण देणारी आणि प्रशिक्षणानंतर मुलांचा वर्ण ठरविणारी गुरुकुल पद्धती त्यांनी बंद केली. मनूला गुरुकुल पद्धतीची पूर्ण माहिती होती. तो 'गुरुवास' चा उल्लेख करतो. (गुरूच्या हाताखाली गुरुकुलात राहाणे आणि प्रशिक्षण घेणे) परंतु उपनयन संदर्भात तो गुरूचा वा गुरुकुलाचा उल्लेखही करीत नाही. उपनयनविधीच्या संदर्भात त्याने दुरूनही गुरूचा उल्लेख केला नाही. गुरूच्या जागी मनूने मुलाच्या उपनयनाचा विधी करण्याची जबाबदारी त्याच्या पित्यावर पितृगृही टाकली. या विधीत गुरू, वर्णाची पदवी विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षमतेनुसार देत असे आणि मग दिलेल्या वर्णाची कर्तव्ये त्यांना सांगितली जात असत. मनूच्या कायद्यात उपनयनाच्या संस्काराचा अर्थ आणि उद्दिष्टे संपूर्णपणे बदलण्यात आली._
_तिसरी गोष्ट अशी की उपनयन आणि प्रशिक्षण यांचा क्रम उलटा करण्यात आला. उपनयन प्रशिक्षणाच्या आधी सुरू झाले. मुलाला गुरूकडे प्रशिक्षणासाठी उपनयनाच्या नंतर, म्हणजे पित्यापासून त्याला वर्ण प्राप्त झाल्यानंतर पाठवावे असा मनूचा आदेश आहे._
_*ब्राह्मणशाहीत उपनयन करण्याचा अधिकार गुरूऐवजी पित्याला देण्यात आला हा सर्वांत महत्त्वाचा बदल आहे. कारण पित्याला हा अधिकार दिल्या कारणाने पिता आपला स्वतःचा वर्ण मुलाला देऊ लागला. साहजिकच वर्णव्यवस्था वंशपरंपरागत झाली. याप्रमाणे वर्ण ठरविण्याचा अधिकार गुरूकडून काढून घेऊन आणि पित्याला देऊन ब्राह्मणशाहीने वर्णाचे रूपांतर जातीत केले.*_
_वर्णांचे रूपांतर जातीत होण्याच्या प्रक्रियेची ही कथा आहे. वर्णांचे जातीत रूपांतर करण्याच्या या प्रक्रियेची मी पुनर्रचना केली आहे. यापूर्वी दिलेल्या कारणामुळे जातीत ती कदाचित सर्व तपशिलांसह अचूक नसेल. परंतु वर्णव्यवस्थेचे जातीत रुप करण्याचे जे टप्पे आणि जो मार्ग यापूर्वीच्या चर्चेत सुचविला आहे, अशाच प्रकारचा असला पाहिजे याबाबत संशय नाही._
_*वर्णाचे जातीत रूपांतर करण्याचा ब्राह्मशाहीचा हेतू काय असावा है। समजणे कठीण नाही. ब्राह्मणांना प्राचीन काळापासून जो उच्च दर्जा आणि जे हक्क प्राप्त झाले, ते प्रत्येक ब्राह्मणाला प्राचीन काळापासून जो उच्च दर्जा आणि त्यांच्या वारसांना प्राप्त व्हावे, त्यांच्या गुणाशी वा शैक्षणिक लायकीशी संबंध राहू नये हाच तो उद्देश होता. निराळ्या शब्दांत हा उद्देश सांगायचा तो हा की, आपल्या मुलांना, त्यांच्यातील काहींना जो श्रेष्ठ दर्जा प्रत्येक ब्राह्मणाला मिळावा, मग तो कितीही नीच कवडीमोलाचा असो. हा ब्राह्मणशाहीचा या परिवर्तनामागील उद्देश होता. सर्व ब्राह्मण जातीलाच कोणताही अपवाद न करता है गौरवास्पद स्थान मिळावे असा प्रयत्न होता.*_
_ब्राह्मणशाहीचे हे उद्दिष्ट, मनूचे आदेश पाहिले तर स्पष्ट होते. मनूला हे माहीत होते की वर्ण वंशपरंपरागत केला की अगदी अज्ञानी ब्राह्मणालाही, व्यासंगी, विद्वान, ब्राह्मणांच्या बरोबरीने स्थान मिळेल. त्यामुळे अत्यंत विद्वान ब्राह्मणाइतका मान लोक त्याला देणार नाहीत अशी भीती मनूला होती. सर्व ब्राह्मणांना मान मिळावा हाच त्याचा उद्देश होता. मनू हा अज्ञानी ब्राह्मणांच्या संबंधी अगदी चिंतित होता आणि म्हणून त्याने मनुस्मृतीत अज्ञानी नीच ब्राह्मणांचाही अपमान करू नये असा स्पष्ट इशारा दिला._
_९.३१७. ब्राह्मण-मग तो विद्वान असो की अज्ञानी, फार शक्तिमान दैवत आहे. ज्याप्रमाणे अवनी संस्कारित (यज्ञासाठी पेटविलेला) असो की साधा असो ते शक्तिमान दैवत असते, त्याचप्रमाणे ब्राह्मणांचे आहे._
_९.३१९. ब्राह्मण कितीही कनिष्ठ वा नीच व्यवसाय करीत असो, त्याला न चुकता मान दिला पाहिजे. कारण ती एक दैवीशक्ती आहे._
_सर्व ब्राह्मणवर्गाला उदात्त करण्याचा उद्देश असता तर या इशाऱ्याची गरज नव्हती. या ठिकाणी दुर्गुण गुणांना त्यांचा योग्य मान देण्यास ढोंगीपणानेही तयार नाहीत. ब्राह्मण भ्रष्ट असला किंवा अज्ञानी असला तरी त्याची पूजा करण्याचा मनूच्या या उपदेशापेक्षा दुसरे कोणते नैतिक अधःपतन असू शकेल? वर्णाचे जातीत रूपांतर कसे झाले, हे आपण पाहिले. आता या बदलाचे परिणाम काय झाले ते पाहू._
_*वर्णबदलाचे परिणाम*_
_या बदलाचे आध्यात्मिक दृष्टिकोनातून इतके वाईट परिणाम झाले की त्यांचा समतोल बुद्धीने विचार करणेच अशक्य आहे. *मनूच्या कायद्यानुसार पुरोहित बनलेल्या ब्राह्मणांची आणि इंग्लंडच्या चर्चच्या क्लर्जी पदाच्या कायद्याची तुलना केली तर याचे परिणाम किती वाईट झाले हे स्पष्ट होईल.* इंग्लंडमध्ये इतर नागरिकांप्रमाणेच क्लर्जी ( इंग्लंडमधील पुरोहित) यांनाही सर्व फौजदारी कायदे लागू आहेत. परंतु याशिवाय त्याच्यावर चर्चच्या शिस्तीचीही बंधने आहेत. गुन्हेगारी कायद्यानुसार त्याची पात्रता नसताना जर त्याने क्लर्जी म्हणून (धर्मोपदेश) काम केले; तर त्याला शिक्षा होऊ शकते. त्याचप्रमाणे चर्चच्या शिस्तीच्या कायद्यानुसार नैतिकदृष्ट्या हे कृत्य चुकीचे असल्याने अशा क्लर्जीना (धर्मोपदेशकाला) अपात्र म्हणून ठरविण्यात येते. हा गुन्हा म्हणून समजला जात नसला तरी नैतिकदृष्ट्या गैर समजले जाते. क्लर्जीवरील (धर्मोपदेशकावरील) हे दुहेरी नियंत्रण न्याय्य समजले जाते. कारण जो क्लर्जी (धर्मोपदेशक) लोकांच्या आध्यात्मिक गरजा पूर्ण करतो, त्याला विद्वता आणि नैतिकतेची गरज असते असे मानण्यात येते. पण ब्राह्मणशाहीमध्ये ब्राह्मणच फक्त पुरोहित (धर्मोपदेशक) बनू शकतो, पण त्याला विद्वत्तेची किंवा नैतिकतेची आवश्यकता नसते. तरीही तो लोकांना आध्यात्मिक बाबतीत एकमेव मार्गदर्शक असतो. अशा प्रकारची मुभा ज्या धर्मात आहे, त्याच्या मूल्याबाबत काही भाष्य करण्याची गरज नाही._
_१. धर्मनिरपेक्ष दृष्टिकोनातून वर्णातून जातीत रूपांतर करण्याचा परिणाम हिंदूची प्रवृत्ती अत्यंत विकृत बनण्यात झाला. त्यामुळे गुणांबाबतचा अनादर व फक्त जन्माबाबत आदर निर्माण झाला आहे._
_२. एखादा माणूस जर उच्च कुलात जन्मलेला असेल तर त्याच्यात गुणात अभाव तर त्याच्यापेक्षा अधिक गुणसंपन्न असलेल्या परंतु नीच कुळात जन्म झालेल्या माणसापेक्षा तो श्रेष्ठ समजू लागला व नीच कुळातील उत्तम गुणांचा माणुस त्याच्यापेक्षा कनिष्ठ समजू लागला. ब्राह्मणशाहीत जन्मालाच फक्त विजय मिळाला. मग जन्मविरोधी वर्तन असो की गुणवत्तेपेक्षा विरोधी जन्म असो. गुणांना गुणांच्या द्वारे जिंकणे अशक्य आहे._
_३. अप्रगतिकारक समाजाची निर्मिती होण्यास दुसरे कोणतेही इतके प्रभावी साधन नाही. ज्यात गुणांचे हक्क सरंजामी हक्कांच्या वेदीवर बळी दिले जातात._
_४. ब्राह्मणशाहीच्या बौद्ध धम्मावरील विजयानंतर ब्राह्मणशाहीने केलेल्या अशा कृत्यांच्या यादीत तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ब्राह्मणांना ब्राह्मणेतर जनतेपासून विभक्त करणे आणि ब्राह्मणेतर जनतेचे निरनिराळे उच्च-नीच सामाजिक स्तर निर्माण करून त्यांना परस्परांपासून दूर ठेवणे हे आहे._
_पुष्यमित्राच्या ब्राह्मणी क्रांतीचा उद्देश बौद्ध काळात मागे पडलेल्या चातुर्वर्ण्याच्या प्राचीन सामाजिक व्यवस्थेचा पुनरुद्धार करणे हे होते. परंतु ब्राह्मणशाहीने ज्या वेळी बौद्ध धम्मावर विजय मिळविला, त्यावेळी मूळच्या चातुर्वण्याचा सामाजिक व्यवस्थेचा पुनरुद्धार करणे एवढ्याने त्याचे समाधान झाले नाही. बुद्धपूर्व काळातील चातुर्वर्ण्य पद्धती लवचिक आणि खुली होती. याचे कारण वर्णव्यवस्थेचा विवाहपद्धतीशी संबंध नव्हता. चातुर्वण्यनि चार वेगवेगळ्या वर्णांना मान्यता दिली असली तरी आंतरवर्णीय विवाहांना बंदी नव्हती. एका वर्णाचा पुरुष कायदेशीरपणे दुसऱ्या वर्णांच्या स्त्रीशी विवाह करू शकत असे._
_ब्राह्मणशाहीने एखाद्या पशूप्रमाणे विविध वर्णातील या आंतरवर्णीय विवाहावर हल्ला करून बंद केले. मनूने नवा कायदा केला. त्यात खालील तरतुदी होत्या._
_१.१२. द्विजांचा पहिला विवाह त्यांच्या समान जातीशीच करावा अशी शिफारस आहे._
_२. १३. शूद्र स्त्री हीच शूद्राची पत्नी होऊ शकते._
_३.१४. अगदी प्राचीन वाङ्मयातील शूद्र स्त्री ब्राह्मणाची किंवा क्षत्रियाची ते कितीही अडचणीत असले तरी पहिली स्त्री झाल्याचे उदाहरण नाही._
_३.१५. ज्या द्विज व्यक्ती घोर चूक करून शूद्र स्त्रीशी विवाह करतील ते त्यांच्या कुटुंबाला आणि मुलाला शूद्र म्हणून अधःपतित करतील._
_३.१६. अत्री आणि उताथ्याच्या मुलगा गौतम यांच्या आदेशाप्रमाणे जो शूद्र स्त्रीशी विवाह करतो तो जातीबाहेर टाकला जातो. शौनकाच्या आदेशाप्रमाणे त्याला मुलगा झाला व भृगूच्या म्हणण्याप्रमाणे शूद्र स्त्रीबरोबर शूद्र स्त्रीपासून मुलगा झाला तर तो जातीबाह्य ठरतो._
_३.१७. जो ब्राह्मण शूद्र स्त्रीबरोबर शयन करतो तो मृत्यूनंतर नरकात जातो. तिच्यापासून जर त्याला मूल झाले तर त्याचे ब्राह्मणत्व नष्ट होते._
_३.१८. मृतात्मे आणि देव यांच्या सन्मानासाठी धर्मकृत्ये करणारा माणूस जर शूद्र पत्नीच्या मदतीने त्याचे स्वागत करीत असेल तर त्याला स्वर्ग मिळणार नाही._
_३.१९. जो शूद्र स्त्रीच्या ओठावरील ओलावा पितो, जो तिच्या श्वासोच्छ्वासाने कलंकित होतो, तिच्यापासून ज्याला मुलगा होतो त्याला मुक्ती मिळत नाही._
_*केवळ आंतरवर्णीय विवाहांना बंदी करून ब्राह्मणशाहीचे समाधान झाले नाही, तर त्यांना सहभोजनावरही बंदी घातली.*_
_मनूने अन्नाबाबत काही निर्बंध घातले आहेत. त्यातील काही आरोग्यविषयक तर काही सामाजिक आहेत. सामाजिक निर्बंधाच्या बाबतीत खालील गोष्टींकडे लक्ष देणे उचित ठरेल._
_४.२१८. राजाने दिलेल्या अन्नामुळे पौरुषत्व नष्ट होते, शूद्राने दिलेल्या अन्नामुळे स्वर्गीय तेज नष्ट होते, सोनाराने अन्न दिले तर जीवन नष्ट होते आणि चर्मकाराने अन्न दिले तर चांगले नाव नष्ट होते._
_४.२१९. आचार्यांनी अन्न दिले आणि कनिष्ठ कारागिराने अन्न दिले तर मुले नष्ट होतात. धोब्याने अन्न दिले तर शारीरिक शक्ती नष्ट होते._
_४.२२१. इतर सर्वांच्या बाबतीत क्रमाने त्यांच्या हाताने अन्न घेतले तर कातडी, हाडे, डोक्यावरील केस नाहीसे होतात._
_४.२२२. जर अजाणतेपणी अशा एखाद्या माणसाच्या हाताचे अन्न गिळले तर तीन दिवस उपोषण करावे. परंतु असे अन्न जर जाणीवपूर्वक खाल्ले तर त्याने अशुद्ध वीर्य, माणसाची विष्ठा किंवा मूत्र चाखल्याप्रमाणे अत्यंत कठीण अशी तपस्या करावी._
_ब्राह्मणशाहीने एखाद्या हिंस्र, पिसाळलेल्या पशूप्रमाणे आंतरवर्णीय विवाह आणि सहभोजन यांच्यावर बंदी घातली असे म्हटले, त्याबद्दल ज्यांना संशय असेल त्यांनी मनूची भाषा नीट वाचावी._
_*मनूने शूद्र स्त्रीबद्दल किती उबग आणणारे उद्गार काढले आहेत ते पाहा. मनूने शूद्राकडून अन्न खाणे हे वीर्य वा मुत्राइतके अशुद्ध आहे, असे म्हटले आहे. या दोन कायद्यांमुळे जातिव्यवस्था निर्माण झाली. आंतरवर्णीय विवाहांना आणि सहजीवनाला बंदी या दोन खांबांवर जातिव्यवस्था उभी आहे. जातिव्यवस्था आणि तिचे आंतरजातीय विवाह व सहभोजन यांच्यावरील बंदी यांचे संबंध साधन आणि साध्य असे आहेत. दुसऱ्या कोणत्याही साधनांनी जातिनिर्मितीचे उद्देश साध्य झाले नसते. जातिव्यवस्थेची निर्मिती ही साधने वापरण्यामागे ब्राह्मणशाहीचा उद्देश होता आंतरजातीय विवाह व सहभोजने यावरील बंदी ब्राह्मणशाहीने त्यासाठी वापरली परंतु ब्राह्मणशाहीने समाजव्यवस्थेत आणखी बदल केले. हे बदल करण्यामागे ब्राह्मणशाहीची उद्दिष्टे जर मी सुचविली ती असतील, तर एक गोष्ट स्पष्ट होते की, जातिव्यवस्था कायम ठेवण्यासाठीही कोणतेही मार्ग, मग ते योग्य असोत की अयोग्य, नैतिक असोत की अनैतिक, स्वीकारण्यास ब्राह्मणशाहीने मागेपुढे पाहिले नाही असा निष्कर्ष निघतो.*_
_मुलीच्या विवाहाबाबत आणि विधवांच्या जीवनाबाबत मनुस्मृतीत जी तरतूद केली आहे, तिच्याशी याचा संदर्भ आहे._
_मुलाच्या विवाहाबाबत मनूने काय आदेश दिले आहेत हे पाहू :_
_४.४. जो पिता मुलीचे लग्न योग्य वेळी करीत नाही तो कायम चिंतास्पद समजावा._
*_९.८८. समान जातीच्या सुंदर आणि प्रतिष्ठित मुलाशी पित्याने ठरवून दिलेल्या नियमाप्रमाणे आपल्या कन्येचा विवाह करावा. मग ती वयात आली नसली तरी चालेल._*
*_या नियमाप्रमाणे मुलगी वयात आली नसली, अगदी बालिका असली तरी तिचा विवाह करावा असे मनू सांगतो._*
*_विधवांबाबत_*
_आता विधवांबाबत मनू काय आदेश देतो ते पाहू :_
_*५.१५७. विधवेने आपल्या इच्छेनुसार स्वेच्छेने शुद्ध फुले, मुळे आणि फळे खाऊन आपले शरीर रोड करावे. परंतु कोणत्याही स्थितीत तिचा पती मृत्यू पावल्यानंतर तिने दुसऱ्या माणसाचे नावही उच्चारू नये.*_
_५.१६१. परंतु विधवेने आपल्याला मूल व्हावे म्हणून पुनर्विवाह करून आपल्या पतीचा अपमान केला, तर ती खाली दिल्याप्रमाणे स्वतःचा अधःपात करते आणि स्वर्गातील पतीच्या स्थानावरील आपला हक्क गमावते._
_५.१६२. आपल्या पतीच्या खेरीज इतरांपासून स्त्रीला झालेले मूल हीच तिची संतती समजली जात नाही. त्याचप्रमाणे दुसऱ्याच्या स्त्रीपासून झालेले मूल हे त्या जनकाचे मूल असमजले जात नाही. *सदाचारी स्त्रीने दुसरा विवाह केल्याचे कोठे लिहिलेले नाही.*_
_*स्त्रीवर विधवापण लादणारा हा नियम आहे. या ठिकाणी सतीचासुद्धा उल्लेख करता येईल. विधवेने आपल्या पतीच्या चितेवर उडी घेऊन स्वतःच्या जीवनाचा अंत करण्याच्या या प्रकाराबाबत मनूने मौन पाळले आहे.*_
*_मनू इतकाच ज्याचा अधिकार आहे त्या याज्ञवल्क्याने विधवेने स्वतंत्रपणे वा एकटे राहू नये असे म्हटले आहे._*
_८६. नवरा मृत्यू पावल्यानंतर स्त्रीने तिचा पिता, माता, बंधू, सासू किंवा मामा यांच्यापासून दूर राहू नये. नाही तर ती निर्देश पात्र होईल._
_*येथेही याज्ञवल्क्याने विधवेला सती जावे असे सुचविले नाही. परंतु मिताक्षर भाष्याचा लेखक विज्ञानेश्वर यांनी श्रुतीबाबत लिहिलेल्या भाष्यात या श्लोकावर भाष्य करताना म्हटले आहे :*_
_*विष्णूच्या लिखाणाप्रमाणे व्रतस्थ राहण्याचा पर्याय स्त्रीला दिला आहे. तिने एक तर ब्रह्मचर्य पाळावे किंवा चितेवर आरूढ व्हावे असा हा पर्याय आहे.*_
_*विज्ञानेश्वर यांनी, “पतीबरोबर सती जाण्यात फार मोठे पुण्य आहे.” असे आपले मत दिले आहे.*_
_यावरून सतीचा नियम कसा घालण्यात आला हे सहजगत्या आणि स्पष्टपणे समजते. *मनूचा नियम विधवेने पुन्हा विवाह करू नये असा होता. पण विज्ञानेश्वराच्या निवेदनावरून विष्णुस्मृतीच्या काळापासून मनूच्या या आदेशाचे विश्लेषण वेगळ्या प्रकारे होऊ लागले असे दिसते. मनूच्या नियमांच्या नव्या विश्लेषणाप्रमाणे विधवेपुढे दोन पर्याय ठेवले गेले. पहिला, पतीच्या चितेवर जळून जीव द्यावा किंवा दुसरा जर तसे करणार नसेल तर अविवाहित राहावे. परंतु हे विश्लेषण संपूर्ण चुकीचे आणि अगदी अनावश्यक आहे. कारण मनूचे शब्द अगदी स्पष्ट आहेत. परंतु ते कसेही असले तरी हे नवे विश्लेषण स्वीकारण्यात आले हे खरे आहे. विष्णुस्मृतीचा काळ तिसऱ्या व चौथ्या शतकातला आहे. यावरून सतीचा नियम त्या काळापासून सुरू. झाला असावा असा निष्कर्ष काढता येईल.*_
_एक गोष्ट स्पष्ट आहे की हे नियम नवीन होते. *मुलीने वयात येण्यापूर्वी विवाह करावा हा मनूचा नियम नवीन आहे. बुद्धपूर्व ब्राह्मणशाहीत मुलीचे विवाह हे ती वयात आल्यावर तर होत असतच. परंतु ती वयाने वाढल्यानंतरच होत असत. याचे अनेक पुरावे आहेत. त्याचप्रमाणे स्त्रीचा पती मृत्यू पावल्यानंतर तिने पुन्हा विवाह करू नये, हाही नवा नियम आहे. बुद्धपूर्व ब्राह्मणशाहीत विधवेच्या पुनर्विवाहाला परवानगी होती. संस्कृत भाषेत पुनर्भू (दुसरा विवाह केलेली स्त्री) असा शब्द आहे. ही वस्तुस्थिती आहे. या शब्दापासून बुद्धपूर्व ब्राह्मणशाहीत पुनर्विवाह हे सर्वसामान्य होते असे दिसून येते. सतीच्या बाबतीत ही प्रथा कशी सुरू झाली याचे उत्तर ती प्राचीन काळापासून होती याचा पुरावा आहे. त्यानंतर ही प्रथा बंद झाली होती. पुष्यमित्राच्या नेतृत्वाखालील ब्राह्मणशाहीने बौद्ध धम्मावरील विजय मिळविल्यानंतर मनूच्याही नंतर ती सुरू झाली असावी. प्रश्न असा निर्माण होतो की, विजयी ब्राह्मणशाहीने हे बदल का केले? स्त्रियांनी वयात येण्यापूर्वी विवाह करावा, विधवेने पुन्हा लग्न करू नये, मृत पतीच्या चितेवर तिने स्वतःला जाळून घ्यावे हे बदल करून ब्राह्मणशाह काय साधले? याबद्दलचा खुलासा होत नाही. सी.व्ही. वैद्य यांनी हा खुलासा के आहे की, हा नियम करण्याचे कारण मुलींनी बौद्ध धम्माच्या भिक्खुणी होऊ नये यासाठी हा नियम केला होता. परंतु हा खुलासा समाधान करीत नाही. श्री. दे यांनी मनूचा दुसरा एक नियम विचारात घेतला नाही. विवाहाचे योग्य वय कोण यासंबंधीचा हा नियम खाली दिल्याप्रमाणे आहे.*_
_९.१४. ३० वर्षाच्या व्यक्तीने त्याला आवडणाऱ्या १२ वर्षांच्या मुलीश लग्न करावे. किंवा २४ वर्षांच्या व्यक्तीने ८ वर्षांच्या मुलीशी लग्न करावे._
_प्रश्न मनूने अल्पवयीन मुलीशी लग्न करण्याचा नियम का केला हा नसून त्याने वधू आणि वरात इतके अंतर असण्याला का मुभा दिली हा आहे._
_*श्री. काणे यांनी सतीबाबत खुलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या मते यात काहीही नवीन नव्हते. प्राचीन काळात भारतात जगातील इतर भागांप्रमाणे ही प्रथा होती. या खुलाशानेही समाधान होत नाही. ही प्रथा भारताच्या बाहेर असली तरी भारताइतक्या प्रचंड प्रमाणात ही प्रथा पाळली जात नसे. दुसरी गोष्ट अशी की, प्राचीन काळात क्षत्रियांच्यामध्ये ही प्रथा असल्याचा पुरावा सापडतो, पण ती नष्ट झाल्यानंतर पुन्हा सुरू का करण्यात आली? किंवा ती सार्वत्रिक का नाही? काणे यांनी वारसा कायद्याशी सतीच्या प्रथेचा संबंध जोडला आहे तो मला पटण्यासारखा नाही. हिंदूच्या वारशाचा कायदा बंगालमध्ये अस्तित्वात होता, त्याप्रमाणे स्त्रियांना मालमत्तेचा वारसाहक्क असे. पतीचे नातलग तिला मालमत्तेचा भाग द्यावा लागू नये म्हणून तिला सती जाण्यास मोठ्या प्रमाणात भाग पाडीत असत. हा खुलासा बंगालपुरता ठीक आहे. परंतु भारताच्या इतर भागांत सतीची प्रथा कशी सुरू झाली आणि तिची अंमलबजावणी कशी झाली याचा खुलासा त्यामुळे होत नाही.*_
_त्याचप्रमाणे विधवा पुनर्विवाहावरील बंदीचा खुलासा होत नाही. *विधवेला अस्तित्वात असलेल्या प्रथेच्या विरुद्ध जाऊन पुनर्विवाहाला बंदी का घालण्यात आली? तिला दुःखी जीवन कंठण्यास का भाग पाडण्यात आले आणि तिला विद्रूप का करण्यात येत होते?*_
_मुलींचा विवाह, तिच्यावर लादलेले वैधव्य आणि सतीप्रथा याबाबत माझा खुलासा वेगळा आहे. त्याला काही मूल्य असो की नसो, तो खाली दिला आहे._
_*जमातीबाहेर लग्नाऐवजी जमातीत लग्न करण्याच्या प्रथेचे प्रभुत्व याचा अर्थ जातीची निर्मिती असा आहे. परंतु हे सोपे काम नाही. समजा एका काल्पनिक गटाला आपले जातीत रूपांतर करावे असे वाटले तर जातीतच विवाह होण्यासाठी त्याला कोणती साधने वापरावी लागतील याचा विचार करू. या गटाला जर जातीत विवाह करावे असे वाटत असेल तर केवळ बाहेरच्या जातीत आंतरजातीय विवाह करू नये असा औपचारिक नियम करून भागणार नाही. विशेषतः या गटात पूर्वी जातीबाहेर लग्न करण्याचा नियम असेल तर ते कठीण आहे. त्याचबरोबर जे गट परस्परांच्याजवळ राहतात. त्यांच्यात एक दुसऱ्यात समाविष्ट होण्याची वा विलीन होण्याची व एकजिनसी समाज निर्माण करण्याची प्रवृत्ती असते. या प्रवृत्तीला जातीच्या निर्मितीसाठी जर विरोध करावयाचा असेल तर, आपल्या जातीभोवती एक वर्तुळ करून त्याबाहेर विवाह होऊ न देणे आवश्यक ठरते.*_
_परंतु अशाप्रकारे आपल्या जातीच्या वर्तुळाबाहेर विवाह करण्यास प्रतिबंध केल्यामुळे आतूनच असे काही प्रश्न निर्माण होतात की ज्यांना उत्तर सापडत नाही. प्रत्येक सर्वसामान्य गटात पुरुष आणि स्त्री यांचे प्रमाण बहुदा सारखे असते आणि बहुतेक ठिकाणी एकाच वयाच्या स्त्री-पुरुषांची संख्या सारखी असते. परंतु ही समानता प्रत्यक्ष समाजात नेहमी असतेच असे नाही. ज्या गटाला जातिव्यवस्था निर्माण करावयाची आहे, त्यांच्या दृष्टीने पुरुष आणि स्त्रियांच्या संख्येतील समानता हेच अंतिम ध्येय ठरते. कारण त्याशिवाय जातीतच विवाह करणे शक्य होत नाही. दुसऱ्या शब्दांत जातीच्या अंतर्गतच विवाह व्हावेत असे वाटत असेल तर जाती अंतर्गत विवाहाचा हक्क उपलब्ध असावा लागतो. नाही तर जातीच्या वर्तुळाबाहेर जाऊन कुणाशीही विवाह केले जातात. हे वैवाहिक हक्क जाती अंतर्गत देणे आवश्यक असले तर स्त्री-पुरुषांची संख्या सारखी असणे आवश्यक असते. ही स्त्री-पुरुष दोन्ही व्यक्तींची संख्या सारखी कायम ठेवणे जाती अंतर्गत विवाहासाठी अत्यावश्यक असते. ही समानता कायम राहावी लागते. त्यातील समानता बिघडली तर जाती अंतर्गत विवाहाची प्रथा मोडण्याचा धोका असतो. जातिव्यवस्थेतील ही समस्या सोडविण्यासाठी विवाहयोग्य पुरुष आणि स्त्री यांच्यातील विषमता सतत दूर करावी लागते. हा समतोल राखण्यासाठी पती आणि पत्नी बरोबरच मरणे आवश्यक असते. परंतु हे क्वचितच होते. पती हा आधी मेला तर एक अधिक स्त्री शिल्लक राहते. तिला काही करून दूर करावे लागते. कारण तिने पुन्हा लग्न केले तर गटांतर्गत लग्नाचा नियम भंग पावतो._
_ त्याप्रमाणे जर पत्नीनंतर पुरुष जिवंत राहिला तर एक पुरुष अधिक होतो. या अधिक पुरुषाबाबत कितीही सहानुभूती असली तरी त्यालाही दूर करावे लागते. कारण नाही तर तो जातीबाहेर लग्न करेल आणि जाती अंतर्गत लग्नाची मोडेल. याप्रमाणे जादा पुरुष आणि जादा स्त्री दोघेही जातिव्यवस्थेला संकटच असते. त्यांची काळजी घ्यावी लागते. कारण त्यांना जाती अंतर्गत वर्तळात योग्य जोडीदार मिळाला नाही (आणि तसे मिळण्याची शक्यता नसते. कारण विवाहाचे जोडे सारख्या स्त्री- पुरुष संस्थेमुळे पुरेसे असतात.) तर ते जातीच्या मयदिबाहेर जाऊन लग्न करतील आणि जातीत बाहेरच्या माणसाची आयात करतील. आपल्या कल्पनेतील गटात जादा पुरुषाच्या आणि जादा स्त्रीबाबत विचार करू. तिची दोन प्रकारे व्यवस्था लावून जाती अंतर्गत विवाह सुरक्षित ठेवता येतील._
_*एक-तिने मृत पतीच्या बरोबर स्वतःला जाळून घेऊन जातीच्या मार्गातून दूर होणे; परंतु हा स्त्री-पुरुष संख्येतील विषमता नष्ट करण्याचा मार्ग व्यवहार्य नाही. काही बाबतीत तो यशस्वी होईल, काही बाबतीत होणार नाही. परिणामी जादा स्त्रीला नष्ट करण्याचा हा मार्ग सोपा वाटत असला तरी तो प्रत्यक्षात येणे कठीण आहे. परंतु जादा स्त्री (विधवा) जर गटातून नाहीशी झाली तर तिच्या अस्तित्वामुळे दोन धोके निर्माण होतात. एक तर ती जातीबाहेर लग्न करून जाती अंतर्गत लग्नाची प्रथा मोडेल. आणि नाही तर जाती अंतर्गत लग्न करून समाजातील विवाह वयातील स्त्रियांशी स्पर्धा करून त्यांची विवाहाची संधी घालवेल. याप्रमाणे अशी स्त्री ही समाजाला संकटासमान असते. आणि म्हणून तिच्या पतीच्या मृत्यूनंतर तिला जाळता येत नसेल तर अन्य काही उपाय शोधला पाहिजे.*_
_*यावर दुसरा उपाय आयुष्यभर तिच्यावर वैधव्य लादणे हा आहे. जादा स्त्रीची समस्या सोडविण्याचा तिला जाळणे हा परिणामाच्या दृष्टीने लादलेल्या वैधव्यापेक्षा अधिक प्रभावी मार्ग आहे. विधवेला जाळल्यामुळे तिच्यापासून निर्माण होणारी तिन्ही संकटे टाळतात. ती मरण पावल्या कारणाने तिचे जातीबाहेर वा जाती अंतर्गत विवाह करण्याचा धोका टळतो. परंतु वैधव्य लादणे हे जाळण्यापेक्षा अधिक व्यवहार्य आहे. आणि तौलनिकदृष्ट्या अधिक मानवी असल्याने जाळण्यापेक्षा वा पुनर्विवाहापेक्षा ते अधिक योग्य ठरते. परंतु त्यामुळे गटाच्या नैतिकतेचा धोका निर्माण होतो. व्यक्तीच्या वैधव्यामुळे स्त्रीचे अस्तित्व शिल्लक राहते हे खरे; परंतु कायदेशीर पत्नी होण्याचा तिचा नैसर्गिक हक्क डावलला गेल्याने ती अनैतिक कृत्याकडे वळण्याचा संभव अधिक वाढतो. परंतु हे संकट टाळणे कठीण नाही. ज्यामुळे तिचा मोह अनावर होणार नाही अशा तऱ्हेने तिला विद्रूप करणे हा त्यावर उपाय आहे.*_
_जादा पुरुषाचा प्रश्न (विधुराचा ) हा जात म्हणून राहणाऱ्या गटाच्या दृष्टीने स्त्रीपेक्षा अधिक महत्त्वाचा आणि अधिक कठीण आहे. तो गटात प्रभावी असतो आणि स्त्री-पुरुषात त्याची प्रतिष्ठा अधिक असते. पुरुषाच्या या स्त्रीपेक्षा पारंपरिक श्रेष्ठत्वाच्या कल्पनेमुळे त्याची इच्छा नेहमीच विचारात घेतली जाते. परंतु स्त्री मात्र असमान प्रतिबंधाच्या धार्मिक, सामाजिक आणि आर्थिक सर्व प्रकारच्या प्रतिबंधाला बळी पडते. पुरुष हा या सर्व प्रतिबंधाचा जनक असला तरी तो या सर्वापासून मुक्त राहतो. यामुळे जातीतील जादा स्त्रीवर ज्या प्रकारची वर्तणूक लादण्यात येते, त्या प्रकारची बंधने टाकली जात नाहीत._
_स्त्रीप्रमाणे पुरुषाला पत्नीच्या बरोबर जाळणे दोन तऱ्हेने धोक्याचे असते. एक तर तो पुरुष आहे या एकाच कारणामुळे ते शक्य होत नाही आणि दुसरे म्हणजे एक धडधाकट पुरुष गेल्यामुळे जातीचे नुकसान होते. मग फक्त दोनच पर्याय शिल्लक राहतात की ज्याचा उपयोग सोयीस्करपणे करता येतो. सोयीस्करपणे म्हटले याचे कारण पुरुष हा गटाचा आधार असतो._
_*पुरुष हा गटाच्या दृष्टीने महत्त्वाचा असला तरी जाती अंतर्गत विवाह त्यापेक्षा अधिक महत्त्वाचे आहेत आणि त्यामुळे या दोन्ही समस्यांतून मार्ग काढताना दोन्ही उद्दिष्टे साध्य करावी लागतात. या परिस्थितीत त्याच्यावर विधवेप्रमाणे सर्व जीवन विधूर म्हणून काढण्याची सक्ती करणे वा त्याचे मन वळविणे हा एक मार्ग आहे. हा मार्ग फारसा कठीण नाही. कारण सक्ती नसली तरी काही लोक स्वतःवर ब्रह्मचर्य लादून घेतात किंवा अनेक वेळा संसारसुखाचा त्याग करून संन्यस्त जीवन कंठतात.* परंतु मानवी स्वभाव लक्षात घेतला तर हे उत्तर प्रत्यक्षात येणे कठीण आहे. याउलट पुरुष जर गटातील घडामोडीत सामील होणार असला तर या गटाच्या नैतिकतेला बहुदा धोका ठरतो. निराळ्या दृष्टिकोनातून पाहिले तर पुरुष ब्रह्मचर्य राखण्यात जरी यशस्वी झाला तरी ते समाजाच्या भौतिक प्रगतीच्या दृष्टीने फायद्याचे नसते. त्याने जर खरोखरच ब्रह्मचर्य पाळले आणि संसारसुखाचा त्याग केला तर तो जातीतील विवाहप्रथेच्या दृष्टीने किंवा जातीतील नैतिकतेच्या दृष्टीने संकट ठरणार नाही हे खरे आहे; परंतु संवादाच्या दृष्टीने तपस्वी ब्राह्मचारी राहणे आणि जाळणे हे जातीच्या भौतिक प्रगतीच्या दृष्टीने सारखेच आहे. सामाजिक जीवन समृद्धपणे जगण्याच्या दृष्टीने जातीची संख्या ही विशिष्ट मर्यादित असावीच लागते. परंतु याची इच्छा करणे आणि ब्रह्मचर्य पाळण्यास लावणे ही गोष्ट रक्तस्राव करून क्षय बरा करण्यासारखी आहे._
_जादा पुरुषावर ब्रह्मचर्य लादणे हे व्यावहारिकदृष्ट्या आणि तात्त्विकदृष्ट्या अपयशी ठरते. त्याने गृहस्थ म्हणून राहणे आवश्यक असते. परंतु त्याला जातीतच पत्नी मिळवून देणे ही एक समस्या असते. वरवर पाहता ते शक्य नसते. कारण पुरुष आणि स्त्री एका पुरुषास एक स्त्री या प्रमाणात असावे लागतात. कुणालाही दुसऱ्या लग्नाची संधी देणे शक्य नसते. कारण प्रत्येक समाजात जात ही खरी बंदिस्त असली तरी साधारणतः विवाहयोग्य पुरुषांना पुरेशा स्त्रिया उपलब्ध असतात. त्यामुळे जादा पुरुषाला पत्नी उपलब्ध करून द्यायची तर ज्यानी अजून विवाहाचे वय गाठले नाही अशा मुलींशी त्यांचा विवाह लावून त्याला गटात बंदिस्त करता येते. जादा पुरुषाच्या संदर्भात हेच सर्वांत उत्तम उत्तर असू शकते. असे केले तर तो जातीत राहतो. जातीची संख्या तो बाहेर गेल्याने कमी होत नाही. त्याचप्रमाणे जाती अंतर्गत नीती आणि प्रथा या दोन्हींच्या दृष्टीने ते योग्य ठरते._
_*जातीतील स्त्री-पुरुषांच्या संख्येतील विषमता चार मार्गानी टाळता येतो : १) स्त्रीला मृत पतीबरोबर जाळणे. २) स्त्रीवर सक्तीचे वैधव्य लादणे.. ३) विधुरावर ब्रह्मचर्य लादणे, ४) त्याचा विवाह योग्य वयापेक्षा कमी वयाच्या मुलीशी लावणे. बालविवाह लावणे.*_
_वर म्हटल्याप्रमाणे विधवेला जाळणे किंवा विधुरावर विधूर राहण्याची सक्ती करणे या दोन्ही गोष्टी जातीतील जाती अंतर्गत विवाह प्रथा कायम राखण्याच्या दृष्टीने संशयास्पद उपयुक्तता असलेल्या आहेत. ही सर्व साधणे आहेत. परंतु साधने ही कोणते तरी साध्य साधण्याच्या दृष्टीने उपयोगात आणली जातात. मग या साधनाचे अंतिम उद्दिष्ट काय? या साधनामुळे जाती अंतर्गत किंवा गटांतर्गत विवाहाची निर्मिती आणि सातत्य कायम राहते. जात आणि जमाती अंतर्गत विवाह या दोन्ही गोष्टी एकच आहे. हे आतापर्यंत केलेल्या चिकित्सेमुळे आणि जातीच्या व्याख्येमुळे सिद्ध होते. याप्रमाणे या साधनांचे अस्तित्व म्हणजे जात आणि जातीत या साधनांचा अंतर्भाव असतो._
_जातिव्यवस्थेची सर्वसाधारण यंत्रणा या प्रकाराची असते असे मत आहे. हिंदू समाजातील जातीचा आता आपण विचार करू. आणि त्यातील त्या यंत्रणेची पाहणी करू, जातीचा भूतकाळात शोध घेण्याच्या मार्गात अनेक अडचणी नाहीत असे म्हणून शकत नाही. जात ही भारतातील फार प्राचीन व्यवस्था आहे. विशेषतः लिखित आणि अचूक इतिहासाच्या नोंदीच्या अभावामुळे हे अधिक खरे ठरते. कारण हिंदूच्या दृष्टीने जग ही माया आहे आणि त्यामुळे इतिहास लिहिणे हा मूर्खपणा आहे. परंतु असे असले तरी संस्था जिवंत असतात आणि प्रदीर्घ काळ त्यांची नोंद झाली नाही तरी रीतिभातीचे आणि नैतिकतेचे अवशेष त्यांची कथा सांगतात. हे जर खरे असेल तर हिंदूनी जादा पुरुष आणि जादा स्त्री यांचा प्रश्न कशा प्रकारे सोडविला याचा अभ्यास केला तर या प्रयत्नाला यश आल्याशिवाय राहणार नाही._
_हिंदू समाजव्यवस्थेतील एकंदर कार्यपद्धती ही गुंतागुंतीची असली तरी वरवर पाहणाऱ्यालाही तीत रीतिभाती आढळून येतात._
_*१) सती-पतीच्या चितेवर पत्नीने जाळून घेणे.*_
*_२) सक्तीचे वैधव्य - विधवेला पुनर्विवाह करू न देणे._*
*_३) बालविवाह._*
_याबरोबरच संन्याशाचा गौरव. विधुराने संन्यास घ्यावा अशी प्रेरणा देण्याचा प्रयत्न हाही एक मार्ग आहे. पण तो पुरुषाच्या मानसिक अवस्थेवर अवलंबून आहे._
_माहितीप्रमाणे या रीतींचे मूळ काय याचे शास्त्रीय उत्तर अजून कोणी दिले नाही. *या प्रथांना मान का होता यासंबंधी खूप तत्त्वज्ञान सांगितले गेले आहे. (सी. एफ. ए. के. कुमार स्वामी "सती : पौर्वात्य स्त्रीचे संरक्षक" ब्रिटिश सोशिऑलॉजिकल रिव्ह्यु व्हॉल्युम - VI १९१३)* कारण पती आणि पत्नी यांच्यातील शरीर यांच्या आत्मा याच्या अभंग ऐक्याचे प्रतीक आहे. उमेने सांगितल्याप्रमाणे तो पत्नीत्वाचा आदर्श आहे. ती म्हणते, "पतीबाबत भक्ती हा स्त्रीचा उद्गार काढते, तू जर समाधानी नसशील तर मला स्वर्गाचीही इच्छा नाही. "सक्तीच्या वैधव्याला प्रतिष्ठा कशी मिळाली हे मला माहीत नाही किंवा सक्तीच्या वैधव्याचा कुणी गौरव केला याची नोंद नाही. परंतु तरीही या प्रथेला असंख्य लोक चिकटून आहेत. *डॉ. केतकरांनी बालविवाहाची माहिती अशी सांगितली आहे. ते म्हणतात, "निष्ठावान पुरुष वा स्त्री यांनी जिच्याबरोबर व ज्याच्याबरोबर त्यांचा संयोग होतो, त्याखेरीज इतर पुरुषावर प्रेम करू नये. ही शुद्धता केवळ विवाहानंतरची नाही तर विवाहापूर्वीची आहे. कारण चारित्र्याचा आणि पावित्र्याचा तो खरा आदर्श आहे. ज्याच्याशी विवाह होतो त्या पुरुषावाचून इतर माणसाबाबत प्रेम वाटणाऱ्या कोणत्याही कुमारिकेला शुद्ध म्हणता येणार नाही. कोणत्या पुरुषाशी विवाह होणार हे तिला माहीत नसल्याने तिने विवाहापूर्वी कोणत्याही पुरुषावर प्रेम करता कामा नये. तिने तसे केले तर ते पाप आहे. त्यामुळे तिच्यात वैषयिक जाणीव निर्माण होण्यापूर्वीच तिने कोणावर प्रेम केले पाहिजे हे तिला कळले पाहिजे म्हणून बालविवाह केला पाहिजे.*_
_हे उच्च उदात्त भाषेतील चतुर तत्त्वज्ञान या प्रश्नांचा गौरव का करावा है सांगते; परंतु त्याची अंमलबजावणी का होत होती हे सांगत नाही. या प्रथांची अंमलबजावणी होत होती. म्हणूनच त्यांचा गौरव केला गेला. एखादी गोष्ट घडणे हे महत्त्वांचे असते आणि मग त्या कृतीची न्याय्यता सांगणारे तत्त्वज्ञान त्याच्याभोवती निर्माण होते._
_अठराव्या शतकातील व्यक्तिवादाच्या उगमाशी ज्याचा परिचय आहे त्याला हे विधान पटेल. याबरोबर या प्रथांचे उदात्तीकरण केले गेले, याचे कारण या प्रथांचे उदात्तीकरण करण्याची या प्रथांना गरज होती. या प्रथांची गरज काय होती या प्रश्नाचे उत्तर जातीच्या रचनेसाठी या प्रथा आवश्यक होत्या आणि या प्रथा लोकप्रिय करण्यासाठी त्यांच्या समर्थनार्थ तत्त्वज्ञानही आवश्यक होते. या प्रथा इतक्या घृणास्पद आणि सर्वसाधारण माणसाला धक्का देणाऱ्या होत्या की, त्यांच्यावर औषधी गोळ्यावर असते तसे गोड आवरण चढविणे आवश्यक होते. वास्तवात या प्रथा साधनांच्या स्वरूपात होत्या. परंतु ध्येय म्हणून त्यांना समाजात ठेवण्यात आले. त्यामुळे या प्रथांच्या परिणामाबाबत आपण आंधळे राहू नये (अज्ञानी राहू नये). या साधनांना आदर्श म्हणून समाजापुढे ठेवणे, त्याची चांगल्या प्रकारे अंमलबजावणी होण्यासाठी आवश्यक होते असे आपण म्हणू. साधनांना साध्य म्हणून पुढे ठेवल्याने त्याचे खरे स्वरूप लपले जाते. याखेरीज इतर काही नुकसान होत नाही. वस्तुतः साधन म्हणूनही त्यांचे खरे स्वरूप नष्ट होत नाही. *सर्व मांजरांना कुत्रा म्हणावे असा आपण कायदा करू शकतो, परंतु त्यामुळे त्यांचे स्वभाव वा स्वरुप बदलत नाही. मांजरांचे कुत्रे होत नाही. याप्रमाणे साधनांना साध्य म्हटल्याने त्याचे स्वरूप पालटत नाही. सक्तीचे वैधव्य आणि बालविवाह या प्रथा मूलतः जादा पुरुष आणि जादा स्त्री यांची समस्या सोडविण्यासाठी व जाती अंतर्गत विवाह होण्यासाठी साधने म्हणून वापरली गेली. हे मांडलेले मत योग्य आहे. जाती अंतर्गत विवाहाशिवाय जात टिकत नाही आणि या प्रथांशिवाय जाती अंतर्गत विवाह यशस्वी होत नाहीत.*_
_बालविवाह, सक्तीचे वैधव्य आणि सती या ब्राह्मणशाहीने आंतरजातीय विवाहावर बंदी घालून निर्माण केलेल्या प्रथा जातिव्यवस्थेचा आधार म्हणून अमलात आणल्या गेल्या. आंतरजातीय विवाह थांबविणे कठीण होते. प्रेमासाठी गरज म्हणून जातीबाहेर विवाह करून जातीच्या बाहेर लोक जाण्याचा संभव होता. ते टाळण्यासाठी ब्राह्मणशाहीने सर्व साधने वापरून निरनिराळ्या जातीतील आंतरजातीय विवाह टाळायचे होते व त्यासाठी सर्व साधनांचा वापर केला हे संशयातीत आहे. ब्राह्मणशाहीच्या या इच्छेचे दुसरे उदाहरण *मनूने जातिबाह्य करण्यासंबंधी नियम केले आहेत* ते पुढीलप्रमाणे आहेत._
_*मनू म्हणतो की ज्याला जातीने वाळीत टाकले आहे त्याला जातिबाह्य समजावे. मनूच्या मताप्रमाणे जातीबाहेर असलेला माणूस हा प्रत्यक्ष मेलेला आहे असे समजून त्याच्याशी वागावे. अशा माणसाची उत्तरक्रिया करावी असे सांगून जातिबाह्य माणसाच्या उत्तरक्रियेची पद्धती त्याने सांगितलेली आहे :*_
_११.१८३. जातिबाह्य केलेल्या माणसाच्या सपिंडानी आणि समानोदकांनी तो मृत असल्याप्रमाणे त्याला पाण्याचे अर्घ्य गाव बाहेर अशुभ दिवशी संध्याकाळी त्याचे नातलग, पुरोहित आणि शिक्षकासमोर द्यावे._
_११.१८४. स्त्री गुलामाने त्याच्या नावाने पाण्याचे भरलेले भांडे पायाने सांडावे. माणूस मेल्यानंतर तसे करतात. यानंतर त्याचे संपिंड आणि समानोदक एक दिवस आणि एक रात्र सुतक पाळतील._
_*मात्र मनूने जातीबाहेर असणाऱ्यांना प्रायश्चित्त देऊन पुन्हा जातीत परतण्यास मुभा दिली आहे. हे खालील नियमांवरून स्पष्ट होईल.*_
_११. १८७. त्याने प्रायश्चित्त घेतल्यानंतर ते पवित्र तीर्थस्थानी त्याच्याबरोबर स्नान करतील आणि पाण्याने भरलेले नवे पात्र फेकून देतील._
_११. १८८. तो पाण्याने भरलेले भांडे पाण्यात टाकील. घरात प्रवेश करील आणि पूर्वीप्रमाणे आपल्या नातलगाबाबत आपले कर्तव्य करील._
_११.१८९. जातिबाह्य असलेल्या स्त्रीच्या बाबतीतही ते हाच नियम पाळतील; पण कपडे, अन्न व पाणी त्यांना देण्यात येईल आणि ते कुटुंब जिथे राहात असेल त्यांच्याजवळ राहतील; परंतु जातिबाह्य माणसाला जर पश्चात्ताप झाला नसेल तर त्याला मनूने शिक्षा सांगितली आहे. मनू त्यांना कुटुंबाच्या घरी राहण्यास प्रतिबंध करतो._
*_मनू म्हणतो :_*
_११.१८९. त्यांना (कुटुंबातील जातीबाह्य सदस्यांना) कपडे, अन्न, पाणी व पेय देण्यात येईल व ते कुटुबाच्या घराच्या शेजारी राहतील._
_३.९२. गृहस्थाने कुत्रे, जातीबाह्य, चांडाळ, पापाची शिक्षा म्हणून रोगगस्त असलेले, कावळे, जीवजंतू, यांच्यासाठी जमिनीवर हलक्या हाताने अन्न ठेवावे._
_जातिबाह्य माणसाबरोबर सामाजिक संबंध ठेवणे हे पाप असल्याचे मनू सांगतो. तो स्नातकांना इशारा देतो..._
_४.२९. जातिबाह्य माणसाबरोबर राहू नका._
_४.२१३. जातिबाह्य माणसाने दिलेले अन्न खाऊ नका._
*_गृहस्थासाठी मनू सांगतो...._*
_३.१५१. गृहस्थाने त्यांना श्राद्धाला बोलावू नये._
_३.१५७. जो माणूस आपल्या आईवडिलांना विसरतो. पुरेशा कारणाशिवाय शिक्षकाला विसरतो, जो वेदांच्या वा विवाहाच्या द्वारा जातीबाह्यांशी मैत्री करतो, त्याच्यावर जातिबाह्य संबंध ठेवल्याच्या गुन्ह्याबदल सामाजिक बहिष्कार टाकावा._
_११.१८१. जो जातिबाह्य माणसाबरोबर एक वर्ष संबंध ठेवतो त्याला स्वतःला जातीबाहेर टाकावे. यज्ञात, वेदपठणात वा इतर संबंध जातिबाह्यांशी ठेवल्यामुळे माणूस आपल्या जातीला मुकतोच. परंतु त्याने जातिबाह्य माणसाबरोबर एकाच वाहनातून, एकाच आसनावर व एकाच ठिकाणी अन्न घेतल्यानेही तो दोषी ठरतो._
_११.१८२. जो जातिबाह्य माणसांशी संबंध ठेवतो त्याने प्रायश्चित्त म्हणून दोषमुक्त होण्यासाठी पापी माणसाला सांगितलेले प्रायश्चित्त घ्यावे. जातीबाहेर टाकलेला जो माणूस जातींची पर्वा करणार नाही. आणि जातिबाह्य राहणे पत्करेल, त्याचे पुढील जन्मात काय होईल ते मनूने सांगितले आहे._
_*७.६०. ज्याने जातिबाह्य माणसाशी संबंध ठेवला असा माणूस पुढील जन्मी ब्रह्मराक्षस होईल.*_
_मनू जातिबाह्य माणसांना एवढ्यावर सोडण्यास तयार नव्हता. त्याने त्यांच्याविरुद्ध आणखी काही शिक्षा सांगितल्या, त्या अत्यंत तीव्र स्वरूपाच्या होत्या. जातीबाहेर टाकलेल्या माणसासाठी मनूने खालील शिक्षा सांगितलेल्या आहेत :_
_३.१५०. जे ब्राह्मण जातिबाह्य असतील, नास्तिक असतील ते ईश्वराला आणि मृतात्म्यांना आहुती देण्यास अपात्र आहेत._
_९.२०१. जातिबाह्य माणसाला वारस म्हणून संपत्तीचा वारसा मिळत नाही._
_११.१८५. माणसाला जातीबाहेर टाकल्यानंतर (जातिबाह्यतेच्या माणसाचे संस्कार केल्यानंतर) त्याच्याशी कोणी संवाद करू नये. त्याच्याबरोबर बसू नये. त्याला वारसाचा हिस्सा देऊ नये व माणसामाणसांशी असलेले संबंध त्याच्याशी ठेवू नये._
_११.१८६. जर जातिबाह्य टाकलेल्या सर्वांत वडील तोच असेल तर वडील- भावाचे त्याचे हक्क स्थगित करण्यात येतील. तसेच वडील मुलगा म्हणून मिळणारा जादा वाटा त्याला मिळणार नाही. त्याच्याऐवजी त्याचा धाकटा भाऊ, तो जातीतील सर्व नियम नीट पाळीत असेल तर त्यांच्या वडीलभावाचा वाटा मिळू शकेल._
_जातिबाह्य माणसाबाबत मनूचा कायदा हा असा आहे. त्याच्याबाबत शिक्षा ह्या अत्यंत कठोर आहेत हे स्पष्ट आहे. त्याला सर्व सामाजिक संबंधापासून तोडण्यात येते. सर्व प्रकारच्या सार्वजनिक समारंभातून त्याला वगळण्यात येते. कोणत्याही अधिकारास तो पात्र नसतो, तसेच त्याला मालमत्तेचा वारसाही मिळत नाही. या सर्व शिक्षामुळे जातिबाह्य माणूस हा मेल्यासारखा असतो. खरे तर मनू त्याला मेलेलाच समजतो._
_आणि मृतात्म्यांना ज्या आहुती देतो त्या त्याच्या नावाने दिल्या जातात. जातिबाह्य माणसांशी जो संबंध ठेवता त्यालाही मनूने अशाच प्रकारची एकाकीपणाची आणि अपमानास्पद वागणूक सांगितली आहे. या शिक्षा केवळ जातिबाह्य पुरुषापुरत्या मर्यादित नाहीत. जातिबाह्य माणसापुरत्याच नाहीत किंवा त्या केवळ पुरूषापुरत्या मर्यादित नाहीत. जातिबाह्य व्यक्तीविरोधी कायदा हा स्त्री आणि पुरुषांना सारखाच आहे. इतकेच नव्हे तर त्यांची संततीही या शिक्षेला पात्र ठरते._
_जातिबाह्य माणसाची जी मुले त्याला जातीबाहेर टाकण्यापूर्वी जन्माला आलेली असतात ती त्यांचा पिता मेला आहे असे समजून संपत्तीचे वारस बनतात. जातीबाहेर टाकल्यानंतर जर ती जन्मली असतील तर त्यांनाही शिक्षा लागू होते आणि तेही वारसाचा हक्क गमावतात. ती मुले जातिबाह्य समजली जातात._
_मनूचे जातिबाह्य व्यक्तीबाबतचे हे कायदे न्याय आणि मानवतेला धरून नाहीत. काही जणांना असे वाटले की यामध्ये कुठे काही विसंगत नाही. कारण इतर धर्माच्या आचारसंहितेतही नास्तिक आणि स्वधर्म त्याग करणाऱ्या माणसाविरुद्ध असेच कायदे आहेत. दुर्दैवाने ही गोष्ट खरी आहे. *बौद्ध धम्म सोडला तर बाकी सर्व धर्मात त्याच्या आचारसंहितेशी चिकटून न राहणाऱ्याच्या संदर्भात वारसाच्या कायद्याचा दुरुपयोग केलेला आहे. खिश्चन धर्मातून ज्यूडाइझम स्वीकारलेले किंवा नास्तिकवाद वा इतर कोणत्याही धर्म स्वीकारण्याला सम्राट कॉन्स्टन्टाइन, सम्राट थिओलेसिएस आणि व्हॅलेटिनियस यांनी मृत्यूची शिक्षा सांगितली, जर अशा माणसांनी इतरांनाही विकृत बनविले तर त्यासाठीही हीच शिक्षा होती. इतर युरोपीय देशांतही खिश्चन धर्माची सक्ती करण्यासाठी याच प्रकारच्या शिक्षा अमलात आणल्या.*_
_अशा प्रकारचा जातिबाह्य व्यक्तीबाबतचा कायदा हा अनावश्यक आहे. पहिली गोष्ट ही की, *जातिबाह्यता ही ब्राह्मणशाहीची निर्मिती आहे. जातिव्यवस्थेचाच तो एक, आवश्यक भाग आहे.* ब्राह्मणशाहीने एकदा जातिव्यवस्था राबविण्याचे ठरविल्यानंतर जातिबाह्यतेचा कायदा आवश्यक बनला. कारण जातीबाहेर जाणाऱ्यांना शिक्षा केली तरच जातिव्यवस्था टिकून राहू शकते. दुसरी गोष्ट अशी की ख्रिश्चन आणि मुस्लिम धर्मातील स्वधर्म सोडणाऱ्याविरुद्धचा कायदा आणि ब्राह्मणशाहीतील जातीविषयक कायदा यात फरक आहे. ख्रिचन आणि मुस्लिम धर्मातील अपात्रतेचा कायदा हा ज्यांच्यात धार्मिक श्रद्धेचा अभाव आहे किंवा जे चुकीच्या धर्माचा प्रसार करतात त्यांच्यापुरता मर्यादित आहे. *ब्राह्मणी अपात्रतेच्या कायद्याचा श्रद्धेशी वा श्रद्धेच्या अभावांशी काही संबंध नाही.* त्याचा संबंध सामाजिक संघटनेच्या एका भागाच्या जातीच्या पावित्र्याशी आहे. जातीबाहेर पडणाऱ्याच्या बाबतीत या शिक्षा आहेत. हा फार महत्त्वाचा फरक आहे. ब्राह्मणी जातिबाह्य व्यक्तीबाबतचा कायदा आणि इतर धर्मातील धर्मत्याग करणाऱ्याबाबतचा कायदा याची तुलना केली तर ब्राह्मणशाहीत ईश्वरावरील श्रद्धा ही आवश्यक समजली जात नाही. सदाचाराने किंवा प्रेषितावर श्रद्धा ठेवल्याने मुक्ती मिळते ही कल्पनाही ब्राह्मणशाहीत आवश्यक मानली जात नाही. मात्र वेदाच्या पवित्रतेवरील विश्वास ही फक्त एकच श्रद्धा ब्राह्मणशाहीत आवश्यक समजली जाते. जातिव्यवस्थेचा भंग हाच शिक्षापात्र ठरतो. इतर गोष्टींचा विचार केला तर त्याबाबत आक्षेप नाही._
_*समाजाच्या एकात्मतेच्या या शक्तीबाबत जे अजाणते नाहीत त्यांना कबूल करावे लागेल की, ब्राह्मणशाहीने आंतरजातीय विवाह व भोजन यांना प्रतिबंध करून समाजाचे संपूर्ण विघटन केले आहे. ही सामाजिक ऐक्याची मृत्युघंटा आहे. एकत्रित कृतीला त्याने परिणामकारक प्रतिबंध झाला. ब्राह्मणशाहीने ब्राह्मणाविरुद्ध अब्राह्मण्यांनी एकत्रित कृती करून ब्राह्मणांचे वर्णस्व झुगारून देऊ नये, यासाठी कसे प्रयत्न केले* ते यानंतर सांगणार आहे. यासाठीच ब्राह्मणशाहीने भारतीय समाजाचे या प्रकारे विघटन केले. परंतु विष देणाऱ्याच्या मूळच्या उद्दिष्टांची मर्यादा विष देणाऱ्याच्या तितकीच मर्यादित राहात नाही. जातिव्यवस्थेबाबत नेमके हेच झाले आहे. *ब्राह्मणेतरांनी ब्राह्मणाविरुद्ध बंड करू नये या इच्छेने ब्राह्मणशाहीने त्यांना अपंग केले.* परंतु त्यांनी राष्ट्र म्हणून परराष्ट्राविरुद्ध लढताना अपंग राहावे असा ब्राह्मणशाहीचा उद्देश नव्हता. परंतु जातीच्या विषामुळे ज्याप्रमाणे ब्राह्मणांच्या विरुद्ध कृतीस ब्राह्मणेतर अपंग झाले, त्याप्रमाणे ते परकीयांच्या विरुद्ध अपंगच राहिले. वेगळ्या शब्दांत असे म्हणता येईल की, जातिव्यवस्थेमुळे राष्ट्रवादाच्या वाढीत फार मोठा अडथळा निर्माण झाला._
_इतरांनी काही म्हटले तरी जातियवस्थेत काही वाईट आहे असे हिंदू म्हणणार नाहीत आणि एका दृष्टीने ते बरोबर आहे. एका कुटुंबातील सदस्यांत प्रेम, एकी आणि परस्परांना मदत करण्याची भावना असते. चोरातही परस्पर आदरांची भावना असते. आपल्या सदस्यांमध्ये दरोडेखोरांचेही समान समान हितसंबंध असतात. दरोडेखोरांच्या होळीत बंधुभावाची भावना असते. तसेच त्यांच्या उद्दिष्टांवर त्यांची तीव्र निष्ठा असते. मग ते इतर टोळ्यांच्या कितीही विरुद्ध असोत. याच तऱ्हेने आपण असेही म्हणू शकू की समाजात जी गौरवास्पद वैशिष्ट्ये असतात ती सर्व जातीमध्येही असतात._
_जातीतील या गौरवास्पद वैशिष्ट्यांबाबत हिंदूनी खुशाल समाधान मानावे आणि जातीत काही बरे वाईट नाही असे समजावे. परंतु असे करताना ते विसरतात की सामाजिक संघटनेचे जात हे एक आदर्श स्वरूप आहे, या सिद्धांताला पाठिंबा द्यावयाचा असेल तर *प्रत्येक जात हा स्वतंत्र समाज आहे. राष्ट्राप्रमाणेच जात हेही एक स्वतंत्र साध्य आहे असे मानावे लागेल. परंतु जात हा हिंदू समाजाचा एक भाग आहे आणि हिंदू समाजाच्या अंतर्गत जात आहे, हा विचार केला तर हा सिद्धांत कोसळल्याशिवाय राहात नाही.*_
_वरील विचारानुसारही जातिव्यवस्थेत काही वाईट आहे हे हिंदू मान्य करणार नाहीत. हिंदू धर्मावर जातिव्यवस्था ही वाईट आहे असा आरोप करा, तो लगेच उत्तर देईल, "युरोपातील वर्णपद्धतीचे काय?" एका मर्यादिपर्यंत हे उत्तर चोख आहे. जगात कोठेही तत्त्वज्ञानी माणसाने सांगितलेला आदर्श समाज ज्यात आहे, परस्परांबद्दल सहानुभूती आहे, सार्वजनिक हिताबाबत निष्ठा आहे आणि समाजाच्या सर्वसाधारण भल्याची भावना आहे, असा समाज अस्तित्वात नाही. हिंदू जर असे म्हणाले की प्रत्येक समाजात परस्परांपासून वेगळी अशी कुटुंबे आणि वर्ग आहेत; परस्परांबद्दल संशय, जे बाहेर आहेत त्यांच्याबद्दल मत्सर, दरोडेखोरांचे जत्थे आणि टोळ्या, संकुचित गट, कामगार संघटना, कर्मचाऱ्यांचे संघ, कारागिरांचे संघ, व्यापाराचे संघ, राजकीय पक्ष हे सर्व समाजात आहेत. यापैकी काही जण समाजहितासाठी, काही जण लूट करण्यासाठी आणि काही जण लोकांची सेवा करण्याची इच्छा दाखवून त्यांचे शोषण करण्यासाठी एकत्र येतात._
_वास्तवात सर्व ठिकाणी भूतकाळातील वा सांप्रत त्या समाजात एकसंघ समजाऐवजी विविध परस्परांविरुद्ध उद्दिष्टांसाठी बनलेल्या छोट्या-छोट्या गटांचा समाज बनलेला असतो. खरंच या युक्तिवादांच्या मागे हिंदू जातिव्यवस्था आणि हिंदूंशिवाय इतर वर्ग पद्धती हे समाज आहेत असे दाखवू शकत नाहीत. या विषयाबाबत जणू यापलीकडे सांगण्यासारखे काही नाही असे तो म्हणू शकत नाही. कारण हिंदूंना या गोष्टीची दखल घेतली पाहिजे की प्रत्येक समाजात गट असले तरी काही गट है असामाजिक असतात तर काही समाजातील गट हे समाजविरोधी असतात. याबाबत *जॉन डुई* यांनी या फरकाच्या केलेल्या विवरणाइतकेच चांगले दुसरे विवरण नाही. त्यांच्या मताप्रमाणे हे गट परस्परांशी संबद्ध आहेत की एकाकी आहेत यावर अवलंबून आहे. जर त्यांच्यात परस्पर संवादी संबंध असतील तर ते केवळ असामाजिक ठरतील, परंतु ते परस्परांपासून पूर्णपणे विभक्त ठरतील. जर त्यांच्यात परस्परांना प्रतिसाद देण्याची भावना नसेल तर ते समाजविरोधी ठरतील. याबाबत प्रा. हुई यांचे शब्दांत :_
*_"एकाकी आणि परस्परांशी संपूर्णपणे फटकून वागणाऱ्या टोळ्या वा गटात समाजविरोधी प्रवृत्ती निर्माण होते. ज्या ज्या ठिकाणी एका गटात स्वतःचा असा हितसंबंध असतो व त्यामुळे तो स्वतः ला आपल्यापुरते बंदिस्त करतो व इतर गटांशी संबंध ठेवीत नाही. जो त्याच्याजवळ आहे त्याची फक्त साथ करतो. स्वतःच स्वतःची पुनर्रचना वा प्रगती व्यापक संबंधातून निर्माण करीत नाही, अशा गटात ही समाजविरोधी भावना निर्माण होते. अशा प्रकारची सर्वांपासून फटकून राहणारी राष्ट्रे असू शकतात, तसेच आपला इतर व्यापक जगाशी संबंध नाही अशा प्रकारे स्वतःत गुरफटत गेलेली कुटुंबेही असतात. घर आणि समाज यांच्यापासून माणसाला तोडणाऱ्या शाळा, श्रीमंत आणि गरीब, अशिक्षित आणि असुरक्षित अशी विभागणीही असते. सारांश, अशा विभक्तपणाच्या भावनेतून एक प्रकारचा ताठरपणा आणि जीवनाची पोलादी चौकट निर्माण होते व असा गट स्थितिशील आणि स्वार्थी बनतो."_*
_एखाद्या समाजात गट आहेत की तो समाज एकसंघ आहे असा प्रश्न विचारात घेण्याची गरज नाही, तर समाजातील विविध गटांत किती प्रमाणात सहकार्य आहे, परस्परांशी संवाद आहे, क्रिया-प्रतिक्रिया आहेत या प्रश्नांचे उत्तर शोधावे लागते. अशा गटात किती प्रमाणात विविध हितसंबंधाबाबत गटागटांत सहभाग असतो, त्यांच्यात किती प्रमाणात मुक्त देवाणघेवाण असते हे प्रश्न महत्त्वाचे असतात. *कोणत्याही समाजात गट आहेत म्हणून त्याचा धिक्कार करणे योग्य नाही. जर समाजातील गट पूर्णपणे विभक्त, परस्परांशी फटकून वागणारे आणि स्वतःच्याच जीवनात गुरफटलेले असतील तर त्यांचा धिक्कार केला पाहिजे.* कारण अशा एकाकी गटातूनच समाजविरोधी भावना निर्माण होते. आणि परस्पर सहकार्यातून ध्येय साधणे अशक्य बनते._
_*ब्राह्मणशाहीने वर्गांचे हे संपूर्णपणे विभक्तीकरण केले. त्यांनी आंतरजातीय विवाहांना आणि सहभोजनांना चार वर्गात बंदी करून ते साध्य केले.* या प्रकरणाच्या सुरुवातीच्या भागात याबाबत चर्चा केली आहे. परंतु या निवेदनात एक गोष्ट राहून गेली आहे. असे म्हटले आहे की, वर्गपद्धतीत विवाहाचा काही संबंध नव्हता. निरनिराळ्या वर्णातील स्त्री-पुरुष एकमेकांशी विवाह करू शकतात आणि आंतरवर्ण विवाहाच्या आड कायदा येत नसे. असे विवाह सामाजिक नीतिमत्तेच्या विरोधी समजले जात नसत. सवर्ण विवाहाची त्या वेळी गरज भासत नसे आणि समाजही असे विवाह व्हावेत असे प्रतिपादित असे. सर्व प्रकारचे विविध वर्णातील विवाह कायदेशीर मानले जात असत. वर उच्च वर्णातील आहे की वधू नीच वर्णातील आहे अशा प्रकारचे प्रश्न निर्माण केले जात नसत. *प्रा. काणे यांनी म्हटल्याप्रमाणे अनुलोम आणि प्रतिलोम विवाहात भेद केला जात नसे. इतकेच नव्हे तर त्या काळात अनुलोम आणि प्रति हे शब्दच अस्तित्वात नव्हते. हे सर्वभेद ब्राह्मणशाहीने निर्माण केले.* ब्राह्मणशाही प्रतिलोम विवाहांना (उच्च वर्णातील स्त्री आणि कनिष्ठ वर्णातील पुरुष यांचा विवाह) बंदी केली. वर्णावर्णातील संबंध संपविण्याच्या दिशेने ते पहिले पाऊल होते. आणि त्यातून परस्परांशी फटकून वागणे आणि समाजविरोधी प्रवृत्ती यांचा जन्म झाला परंतु प्रतिलोम विवाहाचे (आंतरवर्णीय विवाहाचे) दरवाजे बंद झाले तरी अनुलोम विवाहाचे दरवाजे बंद झाले नाहीत._
_*अनुलोम विवाह म्हणजे उच्च वर्णाचा पुरुष आणि कनिष्ठ वर्णाची स्त्री यांच्यातील विवाह.* याचा उल्लेख उतरत्या श्रेणीच्या जातिव्यवस्थेच्या चर्चेत केला आहे. अनुलोम पद्धतीच्या विवाहांना परवानगी दिल्यामुळे वर्गावर्गात संपूर्ण विभक्तीकरण झाले नाही; पण तिथेही ब्राह्मणशाही घृणास्पद युक्ती काढली. ही युक्ती किती घृणास्पद होती हे पाहण्यासाठी मुलांचा दर्जा ठरविण्याबाबतचे नियम काय होते हे पाहणे आवश्यक आहे. *अगदी प्राचीन काळापासून मुलांचा दर्जा ठरविताना त्याला पित्याचा वर्ण दिला जाई. अगदी प्राचीन काळपासून मुलांचा दर्जा ठरविताना त्याला पित्याचा वर्ण दिला जाई. आईचा वर्ण महत्त्वाचा समजला जात नसे. या नियमाला पितृसवर्ण्य असे म्हणत. या पितृसवर्ण्य नियमाचा परिणाम अनुलाम-प्रतिलोम विवाह पद्धतीवर काय झाला हे पाहणे योग्य होईल. प्रतिलोम विवाहावर याचा झालेला परिणाम असा की, उच्च वर्णाच्या स्त्रीची मुले त्यामुळे कनिष्ठ वर्णाच्या पातळीवर ओढली गेली. अनुलोम विवाहावर याचा अगदी विरुद्ध परिणाम झाला. या विवाहात कनिष्ठ वर्णाच्या आईची मुले त्यांच्या पित्याच्या वरच्या वर्णाच्या पातळीवर आली.*_
_*मनूने प्रतिलोम विवाह थांबविले आणि त्यामुळे उच्च जातीच्या मातेची मुले पित्याच्या कनिष्ठ वर्णांच्या पातळीवर येण्याचे बंद झाले. हे कितीही दुःखदायक असले तरी जोपर्यंत अनुलोम विवाहपद्धती व पितृसवर्ण्य पद्धती कायम होती. तोपर्यंत फार "काही बिघडले नाही.* अनुलोम विवाहाने वर्णावर्णातील संबंध कायम राहिले. आणि पितृसवर्ण्य नियमामुळे उच्च वर्णात सामील होण्याचे थांबले नाही. *ब्राह्मणशाहीला वर्णावर्णातील संबंधाची ही दारे उघडी ठेवायची नव्हती. ती बंद व्हावीत असा त्यांनी प्रयत्न केला; परंतु हे त्यांनी अत्यंत दुष्कीर्ती होईल अशा पद्धतीने केले. याबाबत अनुलोम विवाह पद्धती बंद करणे हा सरळ मार्ग होता. परंतु ब्राह्मणशाहीने ते केले नाही. त्यांनी अनुलोम विवाह पद्धती कायम ठेवली. परंतु मुलांचा दर्जा ठरविण्याचे नियम बदलले. त्यांनी पितृसवर्ण्य नियमांच्या जागी मातृसवर्ण्य पद्धती सुरू केली. आणि त्यानुसार आईचा वर्ण मुलाला देण्याचा नियम केला. या बदलामुळे जाती- जातीतील आपापसातील संबंध संपले. आणि केवळ कनिष्ट वर्णाच्या मातेपासून मुले झाली. या कारणाने या मुलांची जबाबदारी टाळणे वरिष्ट वर्णाना शक्य झाले. त्यामुळे अनुलोम विवाह हा केवळ वैषयिक संबंध राहिला. कनिष्ठ वर्णाचा हा अपमान एक प्रकारे हेटाळणी होती. याउलट यामुळे वरच्या वर्णातील लोकांना कनिष्ठ वर्णातील स्त्रियांशी कायदेशीरपणे व्यभिचार करणे शक्य झाले. त्याचमुळे सामाजिकदृष्ट्या वर्णावर्णातील संबंध नष्ट होऊन वर्णाचे पूर्ण विभक्तीकरण झाले आणि तो हिंदू धर्माला शाप ठरला.*_
_हे सर्व असूनही सनातनी हिंदू हे जातिव्यवस्था ही आदर्श पद्धती समजतात. परंतु सनातनी हिंदूंनाच कशाला नावे ठेवावी, समजणारे विद्वान राजकीय पुढारी आणि इतिहासकार जातिव्यवस्था ही राष्ट्रीयतेच्या आड येते या आक्षेपाचा अत्यंत जोरदारपणे इन्कार करतात. *भारत हे एक राष्ट्र आहे तसे ते समजतात. आणि भारतीय राष्ट्र याऐवजी भारताची जनता असे कोणी म्हटले तर त्यांना राग येतो. त्यांची ही भावना समजण्यासारखी आहे. बहुतांश राजकारणी आणि इतिहासकार हे ब्राह्मण आहेत. आणि त्यामुळे आपल्या पूर्वजांनी केलेली दुष्कृत्ये आणि त्यांनी पाडलेल्या वाईट प्रथा उघड्यावर आणण्याचे धैर्य त्यांच्यात नाही. कुणालाही विचारा, “भारत हे राष्ट्र आहे का?"* आणि ते एकाच सुरात "होय" असे म्हणतील. असे म्हणण्याची कारणे विचारा. ते सांगतील एक तर भौगोलिकदृष्ट्या हा देश एकात्म असल्याने भारत हे राष्ट्र आहे आणि दुसरी गोष्ट सांस्कृतिकदृष्ट्या या राष्ट्रात मूलभूत एकात्मता आहे. हे सर्व वादासाठी मान्य केले तरीही या सर्व संदर्भावरून भारत हे एक राष्ट्र आहे असा निष्कर्ष काढणे म्हणजे भ्रमाला उत्तेजन देण्यासारखे आहे. कारण राष्ट्र म्हणजे काय? कारण राष्ट्र म्हणजे केवळ भौगोलिकदृष्ट्या कितीही एकात्म असलेला प्रदेश नव्हे. राष्ट्र म्हणजे केवळ समान भाषा, समान धर्म, समान वंश यातून निर्माण झालेल्या समान संस्कृतीचे लोक नव्हते. दुसऱ्या जागी यापूर्वी जे लिहून ठेवले आहे त्याचा पुनरुच्चार करायचा तर, *राष्ट्रीयता ही एक आत्मनिष्ठ मानसिकता आहे. ही एक अशी भावना आहे की ज्यात सर्वांच्या मध्ये सामूहिक एकतेची भावना असते आणि त्यामुळे आपण सर्व आप्तसंबंधी आहोत असे त्यांना वाटते. ही राष्ट्रीय भावना दुहेरी स्वरूपाची असते. एका बाजुला यात बंधुत्वाची, आपलेपणाची भावना असते व दुसरीकडे जे आपले नाहीत त्यांच्याबाबत बंधुत्वाच्या भावनेचा विरोध आढळून येतो. आपल्या स्वतःच्या गट राहण्याची इच्छा आणि दुसऱ्या गटात न जाण्याची इच्छा त्यात असते. आणि आपल्या गटाच्या बाहेर आहेत त्यांच्याशी संबंध न बाळगण्याची इच्छाही त्यात असते राष्ट्रीयत्वाचा आणि राष्ट्रीय भावनेचा गाभा आहे.* स्वतःच्या गटातील लोकातच राहण्याची इच्छा ही एक मानसिक, आत्मकेंद्रित अवस्था आहे. या भावनेश भूगोलाशी, संस्कृतीशी, आर्थिक प्रश्नांची वा सामाजिक संघर्षाशी काही संबंध नसतो भौगोलिक एकात्मता असूनही या भावनेचा अभाव असू शकतो आणि भौगोलिक एकात्मता नसतानाही ही भावना अत्यंत प्रबळ असू शकते. सांस्कृतिक एकता असूनही या भावनेचा अभाव असू शकतो आणि आर्थिक व वर्गीय संघर्ष असूनही आपण या गटाचे आहोत, या राष्ट्राचे आहोत ही भावना प्रखर होऊ शकते. मुख्य मुद्दा असा की, राष्ट्रीयता हा केवळ भूगोल, संस्कृती यांच्याशीच संबंध असलेला प्रश्न नाही._
_वैदिक पद्धतीच्या उतरत्या काळात शूद्र आणि स्त्रिया यांना अत्यंत कनिष्ठ स्थान प्राप्त झाले होते. बौद्ध धम्माच्या वाढत्या लाटेत या दोघांच्या दर्जात फार मोठा बदल झाला. *थोडक्यात सांगावयाचे तर बुद्ध राजवटीत शूद्रांना मालमत्ता करण्याचा, अध्ययन करण्याचा हक्क प्राप्त झाला आणि ते राजेही होऊ शकत.* इतकेच नव्हे तर वैदिक राजवटीत जे ब्राह्मणांचे सामाजिक स्थान होते. तेही प्राप्त करण्याचा त्याला हक्क मिळाला. *वैदिक राजवटीत ब्राह्मणाचा जो दर्जा होता तोच दर्जा बौद्ध धम्मात भिक्खूचा होता. दोन्ही धर्मव्यवस्थेत आपापल्या धर्मात त्यांचे स्थान आणि दर्जा एकाच पातळीवर मिळाला होता. परंतु शूद्राला वैदिक काळात ब्राह्मण होण्याची कधीच आशा नव्हती; परंतु भिक्खू होऊन तो ब्राह्मणाचे स्थान आणि दर्जा मिळवू शकत होता. वैदिक व्यवस्थेत ब्राह्मण बनण्याची दारे शूद्राला बंद होती. परंतु बौद्ध धम्मात त्यांनी भिक्खू बनून ब्राह्मणाच्या तोडीचे होता येऊ लागले. याच प्रकारचा बदल स्त्रियांच्या बाबतीतही झाला. बौद्ध राजवटीत स्त्री मुक्त झाली. विवाहाने ती गुलाम बनणे बंद झाले. कारण बुद्ध धम्मातील नियमाप्रमाणे विवाह हा एक करार होता. बौद्ध राजवटीत स्त्रीही मालमत्ता मिळू शकत होती, ती शिक्षण घेऊ शकत होती आणि सर्वांत वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट ही की, बौद्धव्यवस्थेत भिक्खुणी बनून तिला ब्राह्मणाचे स्थान आणि दर्जा मिळू शकत होता. शूद्र आणि स्त्रियांचा दर्जा वाढविण्याबाबत बौद्ध धम्मात सिद्धांत इतका परिणामकारक झाला की बौद्ध धम्माचे शत्रू या धर्माला शूद्रांचा धर्म असे म्हणू लागले.*_
_हे सर्व ब्राह्मणांना न पचण्यासारखे, न रुजण्यासारखे होते. बौद्ध धम्माच्या शिकवणीतून शूद्र आणि स्त्रिया यांच्यात किती क्रांतिकारक परिवर्तन झाले आणि ब्राह्मणांना ही गोष्ट किती प्रक्षोभक वाटली याची साक्ष ब्राह्मणशाहीच्या विजयानंतर त्यांनी शूद्र आणि स्त्रियांना मिळालेल्या उच्च स्थानावरून त्यांना खाली खेचण्यासाठी किती विध्वंसक प्रवृत्ती दाखविली यावरून स्पष्ट होते._
_६.१ द्विज स्नातक गृहस्थाच्या कर्तव्याप्रमाणे जो राहिलेला आहे. ज्यांनी खंबीर निश्चयाने आपली इंद्रिये ताब्यात ठेवली आहेत व जंगलात राहन खालील नियम पाळले आहेत._
_६.३३ माणसाच्या नैसर्गिक आयुष्याचा तिसरा भाग जंगलात काढल्यानंतर त्याने आयुष्याचा चौथा भाग संन्यासी म्हणून काढावा व जगातील सर्व गोष्टींबाबत आसक्ती सोडावी._
_कायद्यातही मनूने क्रमशः असमानता ग्रंथित केली आहे. दोनच उदाहरणे द्यावयाची तर बेअदबीचा कायदा व हल्ला करण्याबाबत कायदा पाहू._
_३. २६७. क्षत्रियाने जर ब्राह्मणाची बदनामी केली तर १०० पट दंड करावा. वैश्याने बदनामी केली तर १५० पट. याच अपराधाबद्दल शूद्राला देहदंड सांगितला आहे._
_८. २६८. ब्राह्मणाने जर क्षत्रियाचा अपमान केला तर त्याला ५० पट दंड करावा. वैश्याची बदनामी केली तर त्याला २५ पट दंड करावा. जे उच्चारु नये असे भाषण केल्याबद्दल १२ पट. याच्या जोडीला जर बदनामी केली असेल तर दुप्पट दंड वसूल करावा._
_८.२७६. ब्राह्मण आणि क्षत्रिय यांनी परस्परांना शिवीगाळ केली तर विवेकी राजाने ब्राह्मणाला सर्वांत कमी तर क्षत्रियाला मध्यम दंड करावा._
_७. २७७. वैश्य आणि शूद्र यांना त्यांच्या जातीनुसार याचप्रमाणे दंड करावा. परंतू शूद्राची जीभ कापावी असा निर्णय आहे._
_७.२७९. शरीराच्या कोणत्याही इंद्रियाच्या साह्याने जर कनिष्ठ जातीच्या माणसाने उच्च त्रिवर्णीयांना इजा केली तर त्याचे इंद्रिय कापून टाकावे अशी मनूची शिकवण आहे._
_८.२८०. जो आपला हात उगारेल वा काठी उगारेल त्याचा हात कापून टाकावा. जो रागात लाथ मारील त्याचा पाय कापावा._
_प्रत्येक ठिकाणी उतरत्या क्रमाने असमानतेचे तत्त्व समाजात इतके खोलवर रुजवण्यात आले आहे की, मनूने ते तत्त्व लावण्यात हयगय केली, तेथे मनूच्या वंशजांनी हे तत्त्व लागू करण्याची काळजी घेतल्याचे दिसते. उदाहरणार्थ, मनूने गुलामीच्या आदेशांना इतर क्षेत्रांप्रमाणे उच्च-नीचतेनुसार असमानतेचे तत्त्व लागू होते की नाही हे सांगण्यास मनू विसरला होता._
_हे क्रमशः उच्च-नीचतेचे, असमानतेचे तत्त्व गुलामीला लागू नाही अशी कुणाची समजूत होईल आणि ब्राह्मणही शूद्राचा गुलाम होऊ शकतो असे कुणाला वाटेल या भीतीने *याज्ञवल्क्य* याने या बाबतीत शंकानिरसन केले. त्याने स्पष्टपणे सांगितले आहे की-_
_१५.१८३. गुलामी ही वर्णाच्या उतरत्या धर्माप्रमाणे असते, चढत्या क्रमाने असत नाही._
_विज्ञानेश्वरांनी याज्ञवल्क्यावरील आपल्या भाष्यात उदाहरण देऊन या असमानतेच्या तत्त्वावर शिक्कामोर्तब केलेले आहे. तो म्हणतो, “ब्राह्मण आणि इतर वर्ण यांच्यामध्ये गुलामी ही क्रमाने असते. उदाहरणार्थ, क्षत्रिय आणि इतर वर्णीयांना ब्राह्मण गुलाम करू शकतो. क्षत्रिय हे वैश्य व शूद्रांना गुलाम करू शकतात. याप्रमाणे गुलामाची पद्धत उतरत्या क्रमाने लागू होते."_
_समानता आणि असमानतेच्या भाषेत बोलावयाचे तर याचा अर्थ ब्राह्मण हा सर्वांत उच्च वर्णाचा म्हणून त्याला कोणीही गुलाम करू शकत नाही. परंतु तो इतर कोणत्याही वर्णीयाला गुलाम करू शकतो. शूद्र हा सर्वांत नीच वर्णाचा. कारण शूद्राशिवाय तो कोणालाही गुलाम करू शकत नाही. क्षत्रिय आणि वैश्याचा क्रमही याप्रमाणे एकाखाली एक असे लागतात. क्षत्रिय हा ब्राह्मणापेक्षा कनिष्ठ वर्णाचा व तो ब्राह्मणाचा गुलाम होऊ शकतो. परंतु तो वैश्यापेक्षा व शूद्रापेक्षा श्रेष्ठ व तो या दोघांनाही गुलाम बनवू शकतो. वैश्यांना आणि शूद्रांना क्षत्रियास गुलाम म्हणून ठेवण्याचा हक्क नाही. वैश्याला ब्राह्मण आणि क्षत्रिय गुलाम करू शकतात. परंतु तो ब्राह्मण वा क्षत्रियाला गुलाम करू शकत नाही. परंतु निदान आपण शूद्राच्या तरी वरचे आहोत असा अभिमान धरता येतो. परंतु शूद्र हा वैश्याचा गुलाम होऊ शकतो. पण वैश्याला गुलाम करू शकत नाही._
_या प्रकारचे उच्च-नीचतेचे तत्त्वज्ञान ब्राह्मणशाहीने लोकांच्या हाडामासात भिनविलेले आहे. याच्याइतके समाजात पक्षपात करणारे व असमानता निर्माण करणारे दुसरे काही असू शकणार नाही._
_या उच्च-नीचतेचे परिणाम स्पष्टपणे दिसत नसले तरी त्यामुळेच हिंदू समाज पंगू बनला आहे, यात संशय नाही. समाजव्यवस्थेचे अभ्यासक समानता आणि असमानता यातील फरकाचाच विचार करतात, परंतु याशिवाय क्रमशः असमानतेचे, तिच्या विनाशाची बीजे असतात. फार काळ टिकत नाही. साध्या शुद्ध असमानतेत दोन गोष्टी होतात. *१) त्यामुळे सर्वसाधारण असंतोष निर्माण होतो व त्यातून क्रांतीची बीजे पेरली जातात. २) शिवाय असमानतेचे जे बळी असतात, ते समान शत्रूविरुद्ध समान गाहाण्यासाठी लढण्यास एकत्र येतात. परंतु उतरत्या क्रमाच्या असमानतेत या दोन्ही गोष्टी शक्य नसतात.*_
_क्रमशः असमानतेमुळे सर्वसाधारण असंतोष निर्माण होत नाही व त्यामुळे त्यातून क्रांतीची प्रेरणा मिळत नाही. दुसरी गोष्ट अशी की क्रमशः असमानतेत जातिव्यवस्थेचे फायदे आणि तोटे हे प्रत्येकाचे वेगवेगळे असतात. त्यामुळे सर्व वर्णांनी आपल्या शत्रूविरुद्ध एक होण्याचा प्रश्नच येत नाही. ही विषमता आणखी पक्की करण्यासाठी आपल्या कनिष्ठ वर्णातील कोणत्याही स्त्रीशी विवाह करण्याचा हक्क आहे ही स्पष्ट असमानता होय. परंतु क्षत्रिय, वैश्य व शूद्र यांच्याबरोबर एकत्र येत नाही. याची कारणे दोन आहेत. एक तर त्याला माहीत आहे की ब्राह्मणाला ज्याप्रमाणे तिन्ही वर्णातील स्त्रियांवर विवाह करण्याचा हक्क आहे. त्याचाही हक्क आहे त्याची तक्रार त्याच्या खालच्या दोन वर्णाइतकी तीव्र नाही. शिवाय तो जर सर्वांबरोबर क्रांतीत सामील झाला तर त्याच्याखाली आहेत तेही त्याच्याबरोबर येतील. तेही क्षत्रियाच्या स्त्रीबरोबर विवाहाचा हक्क मागतील. कोणतेही असमानतेचे क्षेत्र घेतले तरी त्याविरुद्ध याच मानसिकतेमुळे सर्व एकत्र येणे अशक्य बनते._
_*ब्राह्मणशाहीविरूद्ध व त्यातील असमानतेविरुद्ध क्रांती होऊ शकली नाही याचे कारण क्रमशः पायरी पायरी असमानतेचे तत्त्व आहे, हे निःसंशय आहे. लुटीच्या पद्धतीला मान्यता मिळावी म्हणून लुटीचा काही भाग वाटण्यासारखे हे आहे. असमानता कायम राखण्यासाठी आणि त्याचे फायदे उतरवण्यासाठी शोधून काढलेली ही अत्यंत नीच अशी धूर्तपणाची योजना आहे. असमानतेच्या पद्धतीला पाठिंबा मिळविण्यासाठी केलेले हे असमानतेचे वाटत आहे.*_
_आता ब्राह्मणशाहीच्या नाट्यातील अखेरचा पडदा उघडणे बाकी आहे. *ब्राह्मणशाहीने वैदिक काळापासून चातुर्वर्ण्य ही आपल्या आर्य पूर्वजांनी निर्माण केलेली अभूतपूर्व अशी गोष्ट आहे असे हिंदू मानतात. परंतु त्यात अभूतपूर्व असे काहीही नाही. त्यात कोणतेही नावीन्य नाही. सर्व प्राचीन जगात तो प्रयोग करून तो अपयशी झाला आहे. इजिप्शियन संस्कृतीत तो होता. प्राचीन पर्शियन जातीतही तो प्रयोग झाला आहे. प्लेटो या पद्धतीने इतका भारावला गेला की त्याने 'आदर्श पद्धतीची समाजरचना' असे त्याचे वर्णन केले आहे. चातुवर्णाचे ध्येयच सदोष आहे. माणसांना ठरावीक वर्णाच्या चौकटीत एकत्र ठेवणे हे व माणसाबाबत व मानवी शक्तीबाबत अगदी वरवरचा संकुचित दृष्टिकोन बाळगण्याचे लक्षण आहे. प्राचीन आर्य प्लेटो यांना मानवी व्यक्तिमत्त्वातील वैशिष्ट्याची पुरेशी जाणीव नव्हती. त्यांना व्यक्तीतील असमानतेची प्रत्येक व्यक्ती हा एक स्वतःपुरता वर्णच असतो त्याची जाणीव नव्हती. माणसामाणसाच्या कर्तृत्वातील व प्रवृत्तीतील वैविध्याची आणि त्यांच्या दृष्टीने माणसाच्या विविध प्रवृत्तीनुसार आणि कार्यशक्तीनुसार त्यांचे वर्गीकरण करणे पुरेसे होते, हे मुळातच चुकीचे आहे. आधुनिक विज्ञानाने हे सिद्ध केले आहे की माणसांना एकाच, एक विशिष्ट क्षेत्राच्या चौकटीत कोंबणे हे व्यक्तीवर व समाजावरही अन्याय करणारे आहे. वर्ण आणि व्यवसायाची विशिष्टपणे विभागणी करणे हे व्यक्ती केली व समाज दोघांच्याही प्रगतीच्या दृष्टीने हानिकारक असते हे सिद्ध केले आहे.*_
_*प्राचीन हिंदू व प्लेटो यांनी आणखी एक चूक केली आहे. जीवजंतूप्रमाणे माणसातही एकाच अवयवाचे व गुणांचे दोन प्रकार असू आहे शकतात. यात बहुधा काही सत्य असावे. पहिल्यांदा (माणसात) ते फक्त मानसिक असते तर जीवजंतूत ते शारीरिक व मानसिक असते. माणसात मानसिकदृष्ट्या ते असते असे गृहीत धरले तरी त्यामुळे माणसे जन्मतःच काही विशिष्ट कामे करण्यास तयार असतात. तर काही दूसरी कामे करण्यास योग्य असतात. तर काही केवळ हुकूम सोडण्यासाठी जन्माला येतात तर काही फक्त आज्ञा पाळण्यासाठी व गुलाम होण्यासाठीच जन्मतात अशी विभागणी योग्य नाही. काही माणसाकडे विशिष्ट गुण जन्मतःच असतात तर काहीकडे ते नसतात अशी विभागणी योग्य नाही. चुकीची आहे. याउलट खरी गोष्ट ही आहे की सर्व गोष्टी, सर्व माणसांत असतातच. काही जणांत त्यापेक्षा एखादी प्रवृत्ती बलवान असते तर तीच तेवढीच उघडपणे दिसते. त्यामुळे हे सत्य नाकारले जाऊ शकत नाही. हे सत्य इतके प्रस्थापित झाले आहे की, एकाच माणसात एका वेळी एखादी प्रवृत्ती बलवान दिसते तर दुसऱ्या वेळी दुसरी प्रवृत्ती किंवा पहिल्याच्या अगदी विरुद्ध प्रवृत्ती बलवान बनलेली दिसून येते. नित्शेच्या माणसे आणि गुलामाच्या परस्पर- विरोधाबाबत, मतांबद्दल बोलताना प्रा. बर्गस म्हणतात-*_
_*"याची स्पष्ट प्रचिती (असल्याची) आपणास क्रांतीच्या वेळी येते. अगदी साधे नागरिक, गरीब व आज्ञाधारक वागणारे नागरिक एका क्रांतिकारक दिवशी माणसांचे नेतृव करताना दिसतात.'*_
_*मुसोलिनी आणि हिटलर यांची उदाहरणे आर्याच्या व प्लेटोच्या सिद्धांताचे खोटेपणाच सिद्ध करतात.*_
_चातुर्वर्ण्याची ही वैदिक पद्धती ही मुळातच आदर्श पद्धती नव्हती आणि ब्राह्मणाशाहीने त्यात केलेल्या बदलामुळे ती अधिक वाईट झाली हे यापूर्वी दाखवून दिलेच आहे. या बदलापैकी प्रत्येक बदल हा खोडसाळपणाचा होता हे वादातीत आहे. *बौद्धांची भिक्खू संस्था व वैदिक ब्राह्मण व्यवस्था ही एकाच उद्देशाने निर्माण झाली. ते समाजातील उत्तम लोक होते व समाजाला मार्गदर्शन करून त्यांना योग्य मार्गाला नेणे हे त्यांचे कर्तव्य होते. दोघांनाही करावयाचे कर्तव्य एकच असले तरी ब्राह्मणापेक्षा ते कर्तव्य करण्यास भिक्खू अधिक पात्र होते. कारण जी गोष्ट त्यांच्यापूर्वी त्याने व कोणी केली नव्हती ती गोष्ट बुद्धाने केली. बुद्धाला याची जाणीव होती की आता बुद्धिमान माणसाला जर खरोखरच समाजाचे नेतृत्व व विश्वासू मार्गदर्शन करावयाचे असेल तर तो बौद्धिकदृष्ट्या स्वतंत्र आणि पुढारलेला असला पाहिजे हे फार महत्त्वाचे आहे. त्याला जर बौद्धिकदृष्ट्या स्वतंत्र राहावयाचे असेल तर त्याची खाजगी मालमत्ता असता कामा नये. उत्तम बुद्धिमान माणसाच्या मागे जर खाजगी मालमत्तेची काळजी असेल तर तो समाजाला विश्वासपूर्वक योग्य मार्गदर्शन करू शकणार नाही आणि म्हणून बुद्धाने भिक्खुंसाठी आचारसंहिता ठरवून देताना त्यांना खासगी मालमत्ता बाळगण्यास प्रतिबंध केला. वैदिक ब्राह्मणांच्या बाबतीत असा कोणताही प्रतिबंध नव्हता. ब्राह्मण मालमत्ता धारण करू शकत असे. या फरकामुळे बौद्ध भिक्खू हा बुद्धिमान वर्ग बनला, तर ब्राह्मण फक्त शिक्षित वर्ग राहिला. बुद्धिमान वर्ग आणि शिक्षित वर्ग यात फार फरक आहे. बौद्धिक वर्गाला कोणत्याही वर्गाशी वा हितसंबंधाशी संबंधाच्या मर्यादा नसतात. शिक्षित वर्गाने शिक्षण घेतलेले असले तरी तो बुद्धिमंतांच्या वर्गात मोडत नाही. कारण त्याच्या बुद्धीच्या कक्षा आणि नव्या ध्येयवादाबाबत तो ज्या वर्गाचा असेल त्या वर्गाबाबत सहानुभूतीच्या त्याच्या वर्गहिताच्या मर्यादा पडतात.*_
_त्यामुळे सुरुवातीपासूनच ब्राह्मणवर्ग हा शिक्षित पण स्वार्थी राहिला. जुन्या वैदिक पद्धतीत पुढे जे बदल करण्यात आले, त्यामुळे वैदिक वर्गव्यवस्थेला अनिष्ट स्वरूप आले. ब्राह्मणांना दिलेला शासन हक्क व इतर खास हक्क आणि प्रतिबंधापासून मुक्तता यामुळे ब्राह्मण अधिक स्वार्थी बनले आणि त्यांच्या मनात आपल्याच शिक्षणाचा उपयोग समाजातील प्रगतीसाठी करण्याऐवजी वा आपले ज्ञान वाढविण्याच्या प्रयत्नाऐवजी आपल्या समाजाचा व स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी शिक्षणाचा उपयोग करण्याची प्रवृत्ती निर्माण झाली._
_ब्राह्मणांची सर्व शक्ती आणि त्यांचे शिक्षण हे समाजाच्या भल्यासाठी खर्च होण्याऐवजी स्वतःच्या खास हक्कांचे संरक्षण करण्यासाठी खर्च होऊ लागले. हिंदू लेखकांनी हिंदू संस्कृती ही जगातील सर्वांत प्राचीन संस्कृती आहे अशी प्रौढी मिरवली आहे. ज्ञानाची अशी कोणतीही शाखा नाही की ज्याची सुरुवात त्यांच्या पूर्वजांनी केली नाही. *'पॉझिटिव्ह बॅक ग्राऊंड ऑफ हिंदू सोशिओलॉजी' यासारखे प्रा. विनयकुमार सरकार यांचे पुस्तक घ्या किंवा डॉ. ब्रजेंद्रनाथ शील यांनी लिहिलेले 'पोझिटिव्ह सायन्सेस ऑफ एन्शट हिंदूज' हे पुस्तक घ्या. त्यात हिंदूंच्या विविध विषयांवरील ज्ञानक्षेत्रातील कामगिरीबाबत इतकी प्रचंड अधिकारीक माहिती असते की, माणसाला अचंबा वाटावा. त्यांच्या ग्रंथावरून असे वाटते की, प्राचीन भारतीयांना खगोलशास्त्र, ज्योतिष, शरीरशास्त्र, रसायनशास्त्र, गणित, वैद्यकी, खाण, विज्ञान, भौतिकशास्त्र आदी सर्व शास्त्रांतील माहिती होती. सामान्य जनांना तर त्यांची वैयक्तिक माहिती होती असे वाटते.* हे सर्व कदाचित खरेही असू शकेल. महत्त्वाचा प्रश्न असा आहे की सर्व शास्त्रे प्राचीन भारतीयांनी कशी शोधली? ज्या या सर्व शास्त्रांचा, ज्ञानाचा त्यांनी प्रारंभ केला, त्यात पुढे प्रगती करण्याचे त्यांनी का थांबविले? वा त्यांची प्रगती का थांबली? शास्त्रातील या प्रगतीला अचानक पडलेला खंड जास्त आश्चर्यकारक तसाच शोचनीय आहे. विज्ञानाच्या दुनियेत प्राथमिक अवस्थेतील माणसाच्या तुलनेत भारत पहिला असता तर तो आधुनिक राष्ट्र अखेरचा का आहे? ज्या लोकांनी शास्त्रीय ज्ञानातील प्रगतीला सुरुवात केली ते अचानक कसे थांबले? त्यांनी आपले कार्य मध्येच अर्ध्यावर कसे थांबवले? या प्रश्नाचा विचार करून त्यांचे उत्तर दिले पाहिजे. फक्त प्राचीन भारतीयांना काय माहीत होते हे सांगण्यात तात्पर्य नाही._
_*याचे फक्त एकच उत्तर आहे आणि ते अगदी साधे आहे. प्राचीन भारतात ब्राह्मण हा एकच शिक्षित वर्ग होता. हा वर्ग स्वतःला इतर सर्वापेक्षा श्रेष्ठ समजत असे. बुद्धाने ब्राह्मणांचे हे वर्चस्व नाकारले व त्यांच्याशी संघर्ष केला. ब्राह्मण सुशिक्षितासारखे वागले. बुद्धिमान माणसे अशा स्थितीत जर्म वागतात तसे वागले नाहीत. त्यांनी बाकीचे सर्व कार्य थांबविले व फक्त आपल्या श्रेष्ठत्वाचे संरक्षण करण्यात सर्व शक्ती खर्च केली. शास्त्रीय विषयावरील पुस्तके लिहिण्याऐवजी त्यांनी स्मृती लिहिल्या. भारतातील शास्त्रीय प्रगती का थांबली याचे हे उत्तर आहे. बुद्धाच्या सामाजिक समतेच्या सिद्धांताचा पराभव करण्यासाठी स्मृती लिहिणे त्यांना अधिक महत्त्वाचे वाटले.*_
_ब्राह्मणांनी किती स्मृती लिहिल्या? स्मृती साहित्यातील एक अग्रगण्य अधिकारी अभ्यासक श्री. काणे यांनी १२८ स्मृतींची नोंद केली आहे. हे सर्व कशासाठी?_
_स्मृतींना कायद्याचे ग्रंथ मानतात, पण वास्तवात त्यांचे स्थान ज्याविषयी आहे ते खरे तर ब्राह्मणांच्या श्रेष्ठत्वाबाबतच व त्यांच्या फक्त अधिकारावरचे सैद्धांतिक लिखाण आहे ब्राह्मणशाहीचे समर्थन हे शास्त्रीय प्रगतीपेक्षा त्यांनी अधिक महत्त्वाचे मानले. ब्राह्मणशाहीने केवळ आपल्या हक्कांचे संरक्षण केले नाही तर कोणत्याही सुसंस्कृत शंका वाटावी अशा तऱ्हेने त्यात ते सतत वाढ करीत गेले. मनूने दिलेल्या हक्काची व्याप्ती वाढेल अशाप्रकारे त्यांनी मनुस्मृतीतील आदेशांचा अर्थ लावला._
_*मनूने ब्राह्मणांना दान घेण्याचा मार्ग खुला केला होता. हे दान नेहमी धनाच्या वा गुरांच्या रूपाने दिले जाई. परंतु पुढे दानांची वाढविण्यात आली व त्यात स्त्रीचा समावेश करण्यात आला. दान दिलेल्या स्त्रीला ब्राह्मण आपली रखेली म्हणून ठेवू लागला व तिला पैसे देऊन आपली सुटका करून घेऊ लागला.*_
_*मनूने ब्राह्मणांना भूदेव. पृथ्वीचे मालक म्हणून संबोधिले. ब्राह्मणांनी या शब्दाची व्याप्ती वाढवून इतर वर्णाच्या स्त्रियांशी कामक्रीडा करण्याचा हक्क ब्राह्मणांना आहे असा त्याचा अर्थ लावला. अगदी राण्याही या नियमाला अपवाद राहिल्या नाहीत. डेव्हिको दि वारथेमा हा भारतात प्रवासी म्हणून इ. स. १५०२ मध्ये आला. त्याने कालिकतच्या ब्राह्मणांची खालील गोष्ट नोंदविलेली आहे.*_
_*"हे ब्राह्मण कोण आहेत हे समजून घेणे योग्य व मनोरंजक आहे. ते धर्मातील प्रमुख आहेत. आमच्याकडील पुजाऱ्यांच्यासारखे त्यांचे स्थान आहे. ज्या वेळी राजा विवाह करतो, त्यावेळी तो अत्यंत सन्मानप्राप्त व अगदी योग्य ब्राह्मण शोधून त्याच्याकडे आपल्या नवविवाहित पत्नीला पहिल्या रात्री झोपण्यास पाठवून तिचे कौमार्य खुडून टाकण्यासाठी त्याची योजना करतो."*_
_*हॅमिल्टन नावाचा दुसरा लेखक लिहितो, “झमोरिनने विवाह केला तर त्याने आपल्या पत्नीने जोपर्यंत नंबोरीशी (नंबुद्री ब्राह्मणांशी) किंवा धर्माच्या मुख्य पुरोहिताशी संभोग केला नाही, तोपर्यंत तिला पतीशी संभोग करता येत नाही. आणि यावर जर इच्छा झाली तर तो पुरोहित सतत तीन रात्री तिचा उपयोग घेऊ शकतो. कारण तिच्या कौमार्याचे पहिले फळ तिने पवित्र आहुती म्हणून ती ज्या देवाची पूजा करते त्याला दिले पाहिजे."*_
_*मुंबई प्रांतात वैष्णव पंथातील पुरोहित स्त्रीच्या कौमार्याचा पहिला उपभोग घेण्याचा हक्क सांगतात. यातून १८८९ मध्ये महाराजा अब्रुनुकसानीचा प्रश्न निर्माण झाला. वैष्णव पंथाच्या मुख्य पुरोहिताने मुंबई उच्च न्यायालयात कर्सनदास मुलजी यांच्यावर खटला भरला होता. यावरून या वेळेपर्यंत आपल्या पंथातील नवविवाहित पत्नीचा प्रथम उपभोग घेणाऱ्या पुरोहिताचा हक्क अमलात होता हे सिद्ध होते.*_
_ही पहिली रात्र संभोग करण्याचा हक्क सर्वसाधारण माणसांना, विशेषतः कनिष्ठ वर्गांना लागू झाल्यानंतर ब्राह्मण त्या हक्काचा विस्तार करण्यास कचरत नाहीत. विशेषतः मलबारमध्ये हे झालेले आहे. तेथे मनूने ब्राह्मणांना भूदेव (पृथ्वीचे मालक) म्हणून संबोधले व या शब्दाची व्याप्ती वाढवून ब्राह्मणांनी इतर वर्गाच्या स्त्रिया भोगण्याचा हक्क ब्राह्मणाला आहे असा त्याचा अर्थ लावला हे विशेषतः मलबारमध्ये झाले. तेथे...._
_"ब्राह्मण जात मुलायम पद्धतीची अंमलबजावणी करतात. त्यानुसार मूल हे पित्याच्या कुटुंबाचा भाग असते, ते आपल्या जातीत नियमितपणे विवाह करतात. त्या विवाहाला कायद्याची व धर्माची मान्यता असते. परंतु ब्राह्मण हे कनिष्ठ जातीच्या स्त्रियांशी संबंध ठेवतात.” परंतु एवढ्यानेच भागत नाही. लेखक पुढे काय लिहितो ते पाहा._
_"अशा संबंधातील दोन्ही व्यक्ती त्या कुटुंबाचा घटक बनत नाहीत. अशा संभोगातून निर्माण झालेली संतीत ही आईच्या कुटुंबातील समजली जाते आणि त्या संततीस कायद्यानुसार आपल्या पित्याच्या मालमत्तेत हक्क व पित्याचा पोषणाचा हक्क मिळत नाही."_
_या प्रथेच्या उगमाबाबत गॅझेटियरचा लेखक म्हणतो कनिष्ठ पातळीवरचे क्षत्रिय वा सत्ताधीश, कनिष्ठ जातीच्या विवाहित स्त्रियांच्या पहिल्या रात्रीच्या उपभोगाचे अधिकारी ब्राह्मण असतात. मध्ययुगातील 'ऑर्डर द सिम्मेडरी सारखाच हा हक्क आहे._
_युरोपात मध्य युगात याला "पहिली रात्र उपभोगण्याचा हक्क" असे म्हणत. त्याप्रमाणे पहिल्या फळावरील हक्क एवढ्यापुरतेच हे मर्यादित होणे असे म्हणणे म्हणजे आहे त्यापेक्षा कमी सांगणे ठरेल. त्याची मर्यादा यापेक्षा जास्त आहे. *कनिष्ठ जातीच्या स्त्रियांचा उपभोग वेश्याप्रमाणे करण्याचा ब्राह्मणांचा हक्क असा याचा अर्थ आहे. ब्राह्मणांच्या कामेच्छा पूर्ण करण्याची वा त्याच्या वैवाहिक जबाबदारीपासून त्यांना मुक्त ठेवण्याची ही कृती आहे.*_
_सर्वसामान्यांविरुद्ध अशा प्रकारचे हक्क स्वतःला आध्यात्मिक गुरू म्हणवून घेणाऱ्या ब्राह्मणांनी मिळविले होते. पोपच्या राज्यावर आरुढ होणाऱ्या आध्यात्मिक गुरूमध्ये बोर्गेस पोप हे सर्वात अधिक व्याभिचारी समजले जात. परंतु ते भारतातील ब्राह्मणापेक्षा अधिक व्याभिचारी होते की काय अशी शंका आहे._
_*बुद्धाने ज्या प्रकारच्या बुद्धिमान वर्गाची संकल्पना केली, तशी इतरत्र कोठेही असेल असे वाटत नाही. हा शुद्ध बुद्धिमान वर्ग सर्वसाधारण हितासाठी प्रयत्न करणारा, कोणत्याही वर्गाच्या हिताचा विचार त्याच्या मनात नसावयाचा. बौद्धिक स्वातंत्र्याच्या भ्रामकतेमुळे पडणारी मर्यादांची कल्पना अगदी अलीकडच्या काळापर्यंत सर्वसाधारण माणसांना नव्हती. इतर देशात अशा बुद्धिमान वर्गाची जागा प्रत्येक पातळीवरील नागरिकांच्या सुशिक्षित वर्गाने भरून काढली होती. समाजाच्या विविध पातळीवरील सुशिक्षित वर्गाच्या विविध दृष्टिकोनामुळे निश्चित मर्यादाशील होत असले तरी त्याच सुरक्षितता होती. अशा विविध प्रकारच्या दृष्टिकोनामुळे समाजातील एकाच वर्गातील एकाच सुशिक्षित वर्गाकडून चुकीचे मार्गदर्शन व चुकीचा दृष्टिकोन मिळण्याचा धोका नव्हता. असा एकच वर्ग जर सुशिक्षित असेल तर तो आपल्या शिक्षणाचा उपयोग स्वतःच्या वर्गाच्या हितासाठी करून घेणे स्वाभाविक असते.*_
_शूद्रांना शिक्षणाचा अधिकार नाकारून, क्षत्रियांना लष्करी कामाकडे वळवून वैश्यांना व्यापार आदी करण्याचा आदेश देऊन, मनूने शिक्षण हे फक्त ब्राह्मणांसाठी राखून ठेवले, ब्राह्मण हाच वर्ग यामुळे सुशिक्षित बनला व त्याचा फायदा घेऊन समाजाला चुकीच्या दिशेने नेण्याची व गैर मार्गदर्शन करण्याची संधी ब्राह्मणाला मिळाली._
_मूळ वर्णव्यवस्थेचे विकृतीकरण जर सामाजिक आचारापर्यंत मर्यादित राहिले असते तर कदाचित सत्य हे वेगळे असते. परंतु ब्राह्मणशाहीला ते तितके मर्यादित नको होते. त्यांना या बदलापेक्षा व विकृत केलेल्या चातुर्वर्ण्य पद्धतीला कायमचे स्वरूप द्यावयाचे होते. ब्राह्मणशाहीने ही नदी चातुर्वर्ण पद्धती हा वैयक्तिक वा कौटुंबिक आचाराचा कायदा बनवला. याबाबत कोणताच संशय असण्याचे कारण नाही. मनूने कनिष्ठ जातीतील लोकांना उच्च जातींचा दर्जा स्वतःला देणे वा उच्च जातीचा म्हणून समाजात वावरणे हा गुन्हा ठरविला._
_१०.९६. कनिष्ठ जातीच्या माणसाने लोभामुळे जर उच्च जातीचा व्यवसाय करून जगण्याचे ठरविले तर राजाने त्याची सर्व मालमत्ता जप्त करून त्याला हद्दपार करावे._
_११.५६. आपण उच्च वर्गात जन्माला आलो अशी खोटी बतावणी करणे, राजाला गुन्ह्यासंबंधी माहिती देणे आणि आपल्या गुरूवर खोटे आरोप करणे हे सर्व ब्राह्मणाची हत्या करण्यासारखे आहे._
_येथे दोन गुन्हे आहेत. एक सर्वसाधारण बतावणी करणे (१०.९६) आणि शुद्राने आपण उच्च जातीचे आहोत अशी बतावणी करणे. (१०.५६). यातील शिक्षा किती तीव्र स्वरूपाच्या आहेत ते पाहा. पहिल्या गुन्ह्याला शिक्षा मालमत्तेची जप्ती आणि हद्दपारी ही आहे आणि दुसऱ्या गुन्ह्याला ब्राह्मणाची हत्या करण्याला जी आहे ती शिक्षा आहे._
_आधुनिक काळात दुसऱ्याची बतावणी करणे हा गुन्हा अपरिचित नाही. भारतीय फौजदारी कायद्यात ४१९ कलमात या गुन्ह्याचा उल्लेख आहे. दुसऱ्याची बतावणी करून फसविणे या गुन्ह्याला काय शिक्षा आहे? त्यासाठी दंड आणि तुरुंगवासाची शिक्षा दिली तर तीन वर्षे कारावास किंवा दोन्ही. ब्रिटिश सरकारने आपल्या जातीच्या कायद्याला इतकी क्षुल्लक शिक्षा ठेवली याबाबत मनू आपल्या कबरीत अस्वस्थ झाला असेल._
_मनूने नंतर राजाला या कायद्याची अंमलबजावणी करण्याचा आदेश दिला. प्रथमतः त्याने राजाने पवित्र कर्तव्य म्हणून याची अंमलबजावणी करावी असे सांगितले._
_७.१७२. जातीजातीत गोंधळ निर्माण करण्यास प्रतिबंध केल्याने राजाचीशक्ती वाढते व त्याची जगात व मृत्यूनंतर भरभराट होते.._
_वर्णाच्या गोंधळासंबंधात आपण सांगितलेल्या कायद्याची अंमलबजावणी कदाचित राजाच्या मनाला मानवणार नाही आणि तो त्याची अंमलबजावणी टाळेल. अशी मनूला भीती होती. यासाठी मनूने राजाने कायद्याची अंमलबजावणी कशी करावी यासंबंधी आदेश दिला._
_७. १७७. राजाने कायद्याची अंमलबजावणी करताना आपल्या आवडी वा नावडीचा विचार करू नये. त्याने यमाप्रमाणे वागावे._
_म्हणजेच मरणोत्तर न्याय करणाऱ्या यमाप्रमाणे त्याने निःपक्षपाती असावे. परंतु केवळ एक पवित्र कर्तव्य या दृष्टीने ही बाब राजावर सोपवावी अशी मनूची इच्छा नव्हती. तर ही गोष्ट राजाने आपली जबाबदारी व कर्तव्य म्हणून केली पाहिजे असे मनूला वाटत होते. या दृष्टीने त्याने म्हटले आहे :_
_७.१४०. राजाने वैश्याला व्यापार करण्यास आणि सावकारी करण्यास आणि शेती करण्यास किंवा गुरे बाळगण्यास आदेश द्यावा आणि शूद्राला द्विजांची सेवा करण्याची आज्ञा करावी._
_मनू पुन्हा या विषयाकडे वळून म्हणतो :_
_८.४१८. राजाने काळजीपूर्वक वैश्यावर व शूद्रावर त्यांच्यावर सोपविलेली कर्तव्ये करण्याची सक्ती करावी. कारण या दोन जाती जर आपल्या कर्तव्यापासून विचलित झाल्या तर साऱ्या जगात गोंधळ होईल._
_राजाने जर हे आपले कर्तव्य केले नाही तर काय होईल? मनूच्या दृष्टीने चातुर्वण्यांचा कायदा हा इतका सर्वांत महत्त्वाचा कायदा आहे की, मनू या कायद्याची अंमलबजावणी करण्याचे कर्तव्ये करण्यास राजाने हयगय करू नये यासाठी अत्यंत कठोर आहे. मनूने धैर्याने असा आदेश दिला आहे की, हा नवा कायदा जो राजा पाळणार नाही त्या राजाला पदच्युत करावे असा नवा कायदा त्याने केला. ब्राह्मणशाहीला आणि मनूला या चातुर्वर्ण्याचा कायदा किती प्रिय होता याची यावरून कल्पना होईल._
_यापूर्वी म्हटले आहे की वैदिक पद्धतीतील चातुर्वर्ण्य, जातिव्यवस्थेपेक्षा बरे होते; परंतु तरीही हे एका एकसंध समाज निर्माण करण्याच्या सामाजिक आदर्शच्या दृष्टीने अनुकूल नव्हते. चातुर्वर्ण्याच्या सिद्धांतानेच चार वर्णांना जन्म दिला हे चार वर्ग परस्परांबद्दल स्नेह बाळगणारे नव्हते. ते सतत भांडत असत आणि त्यांची भांडणे इतकी कटू असत की त्यांना वर्गयुद्ध असेच नाव द्यावे लागेल. इतके असूनही जुन्या चातुर्वर्ण्यात दोन चांगल्या गोष्टी होत्या. त्या ब्राह्मणशाहीने स्वार्थाने काढून टाकल्या. पहिली गोष्ट ही की, वर्णावर्णात संपूर्ण वेगवेगळेपणा नव्हता. आंतरवर्णीय विवाह आणि सहभोजन हे दोन या सर्वांना एकत्र बांधणारे महत्त्वाचे घटक होते. समाजाचा पायाच उखडून टाकणारे समाजविरोधी संबंध वर्णावर्णांत निर्माण होण्यास त्यात वाव नव्हता. क्षत्रिय ब्राह्मणाविरुद्ध लढले, ब्राह्मण क्षत्रियाविरुद्ध, क्षत्रियाच्या बाजूने लढणारे ब्राह्मण कमी नव्हते._
_*दुसरी गोष्ट अशी की, जुने चातुर्वर्ण्य ही एक परंपरा होती. तो समाजाचा आदर्श होता. परंतु तो शासनाचा कायदा नव्हता. ब्राह्मणशाहीने वर्णाना एकमेंकांपासून पूर्णपणे विभक्त केले आणि त्यांच्यात परस्परविरोधाची बीजे पेरली. तिसरी गोष्ट जी केवळ परंपरा होती, तिला ब्राह्मणशाहीने कायदा बनविले. तिला कायद्याचे स्वरूप देऊन ब्राह्मणशाहीने विकृती कायम बनविली. वैदिक चातुर्वर्ण जर वाईट असते तर काळाच्या ओघात आणि परिस्थितीने ते नष्ट झाले असते. त्याला कायद्याचे स्वरूप देऊन ब्राह्मणशाहीने ते शाश्वत बनविले. हिंदू समाजाच्या बाबतीत ब्राह्मणशाहीने केलेला हा सर्वांत मोठा अपराध आहे.*_
_'या प्रश्नाचा विचार करताना एक गोष्ट आपण विसरू शकत नाही की चातुर्वर्ण्याचा कायदा म्हणजेच क्रमशः उच्च-नीचतेची पद्धती कायम म्हणून राज्यावर लादत असताना या पद्धतीची सक्ती ब्राह्मणावर आणि क्षत्रियावर राजाने करावी अशी तरतूद त्यात नाही. हा कायदा फक्त वैश्यावर आणि शूद्रावर लादण्याची शक्ती आहे. ब्राह्मणशाहीला हा चातुर्वर्ण्याचा कायदा लागू करण्याबाबत तीव्रता असली तरी या सुटीमध्ये फार चमत्कारिक परिस्थिती आली. चातुर्वर्ण्याला कायद्याचे स्वरूप देण्याचा प्रयत्न त्यामुळे अर्धवट झाला. त्याला अर्धा कायदा आणि अर्धी परंपरा असे स्वरूप आहे. वैश्य आणि शूद्र यासाठी तो कायदा होता तर ब्राह्मण आणि क्षत्रिय यांच्यासाठी परंपरा होती._
_या वेगळेपणाची कारणे शोधली पाहिजेत. चातुर्वर्ण्याला कायद्याचे स्वरूप देण्याबाबत ब्राह्मणशाही प्रामाणिक काय? चारी वर्ण याबाबत कायद्याने मानले जावेत असे त्यांना वाटत होत काय? ब्राह्मणशाहीने ज्या अर्थी ब्राह्मण आणि क्षत्रिय यांना या कायद्याच्या अंकित ठेवले नाही, त्या अर्थी या बाबतीत ब्राह्मणशाही प्रामाणिक होती असे म्हणता येणार नाही. त्यांना जर चातुर्वर्ण्याची पद्धत आदर्श वाटत होती तर त्यांनी ती सर्वांना बंधनकारक केली असती._
_परंतु या निंदनीय प्रयत्नात अप्रमाणिकपणापेक्षा आणखी काही आहे. या कायद्याच्या बेड्यापासून ब्राह्मणांना का मुक्त ठेवण्यात आले हे समजण्यासारखे आहे. मनूने त्यांना भूदेव म्हटले आहे आणि देव हा कायद्याच्या बाहेर असला पाहिजे. परंतु ब्राह्मणाप्रमाणेच क्षत्रियांना या कायद्यापासून का दूर ठेवण्यात आले? त्यांना माहीत होते की, क्षत्रिय ब्राह्मणाच्या पुढे वाकणार नाही. म्हणून त्याने पुढे क्षत्रिय जर उद्दाम बनले आणि बंड करण्याचा विचार करू लागले तर त्यांना ब्राह्मण कसे शिक्षा करू शकतील याचा इशाराही दिला आहे._
_११.३२०. क्षत्रिय जर ब्राह्मणावर वरचष्मा गाजवू लागले तर ब्राह्मण त्यांना यथायोग्य प्रतिबंध करू शकतात. कारण क्षत्रिय हे ब्राह्मणापासून निर्माण झाले आहेत._
_९.३२१. पाण्यापासून अग्नी निर्माण झाली. ब्राह्मणापासून क्षत्रिय निर्माण झाला. दगडापासून सोने निर्माण झाले आणि ज्याच्यापासून ते निर्माण झाले त्याच्यावर या तिन्ही बाबतीत जे उत्पन्न झाले त्यांचे काही चालत नाही._
_यावरून एखाद्याला वाटेल की मनूने क्षत्रियावर या कायद्याची सक्ती केली नाही. याचे कारण ब्राह्मण स्वतःच्या ताकदीवर राजाच्या मदतीशिवाय क्षत्रियांशी सामना करू शकतात व ते स्वतःच्या ताकदीवर क्षत्रियावर बंधने टाकून वेळ आली तर परिणामाला न भीता क्षत्रियांशी सामना करू शकतात हा विश्वास क्षत्रियावर या कायद्याची बंधने न घालण्यामागे असावा. परंतु मनूच्या मनात हे सर्व नसावे. कारण सुडाची, धमकीची भाषा वापरल्यानंतर मनू लगेच खालच्या सुरात क्षत्रियांशी सहकार्याकरिता आणि ब्राह्मणांच्या बरोबर समान आघाडीच्या निर्मितीकरिता आवाहन करतो. ज्या श्लोकात क्षत्रियांना धमकी देण्यात आली आहे, त्याच्याच खालच्या श्लोकात मनू क्षत्रियांना आवाहन करतो._
_९.३२३. परंतु ज्या राजाला आपला शेवट जवळ आला आहे असे वाटते. त्याने ब्राह्मणांना केलेल्या दंडाच्या रकमेतून निर्माण झालेली सर्व संपत्ती आणि त्याने राज्य मुलाच्या स्वाधीन करावे आणि नंतर रणांगणावर मृत्यू स्वीकारावा._
_दमदाटीनंतर समझोत्याची भाषा ही मोठी विचित्र आहे. क्षत्रियांच्या बाबतीत मनूची ही परस्परविरोधी विचित्र वागणूक का ? याचा खुलासा काय आहे? ब्राह्मण आणि क्षत्रिय यांच्या सहकार्याचा उद्देश काय? ही आघाडी कोणाविरुद्ध आहे, याचा मनू खुलासा करीत नाही. या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर देऊन हे कोडे सोडविण्यासाठी एक हजार वर्षांचा सर्व इतिहास धुंडाळावा लागेल._
_या कोड्याचे उत्तर ज्या इतिहासाने दिले, तो इतिहास ब्राह्मण आणि क्षत्रिय यांच्यातील वर्गयुद्धाचा इतिहास आहे. *सनातनी हिंदूंना कार्ल मार्क्सचा वर्गयुद्धाचा सिद्धांत ऐकून अंगावर शहारे येतात, पण त्यांनी आपल्या पूर्वजांचा इतिहास वाचला तर त्यांना नक्कीच धक्का बसेल.* कारण आपल्या सिद्धांताला पाठिंबा मिळावा म्हणून कार्ल मार्क्सच्या इतिहासाचा शोध चालला होता. त्याला प्राचीन हिंदूच्या या इतिहासात पुरावा मिळतो. खरे पाहता ब्राह्मण आणि क्षत्रिय राजे यांच्याच नोंदी प्राचीन हिंदूंच्या वाङ्मयात सापडतात. *ब्राह्मण आणि क्षत्रिय राजे यांच्यातील संघर्षाची नोंद इतिहासात आहे. त्यापैकी पहिला नोंदविलेला संघर्ष राजा वेण, दुसरा पुरूरवाशी, तिसरा नहूशाशी, चौथा निमीशी आणि पाचवा सुमुखाशी संघर्ष आहे. यानंतर भृगू वंशातील ब्राह्मणाची क्षत्रियांनी सरसहा कत्तल केल्याचा उल्लेख आहे. ह्या कत्तली कृतवीर्याच्या वंशजांनी केल्या. त्यानंतर ब्राह्मणाच्यावतीने परशुरामाने सर्व क्षत्रियांची कत्तल केल्यानी नोंद आहे. त्यांच्यातील या संघर्षाची कारणे अनेक आहेत. त्यावरून ब्राह्मण आणि क्षत्रिय यांच्यातील संबंध किती कटू आणि तणावपूर्ण होते याची कल्पना येते. क्षत्रियांना ब्राह्मण बनण्याचा अधिकार आहे काय? या प्रश्नावर संघर्ष झाला. कोणी कुणाला पहिल्यांदा वंदन करावे आणि कुणी कुणाला प्रथम वाट द्यावी यावरही संघर्ष झाले. ही सर्व युद्धे अधिकार, दर्जा आणि प्रतिष्ठा या प्रश्नावर झाली.*_
_या युद्धाच्या परिणामाची कल्पना ब्राह्मणांना निश्चितपणे होती. त्यांच्या उद्दाम वल्गना सोडल्या तर त्यांना याची कल्पना होती की क्षत्रियांना पूर्णपणे नष्ट करणे शक्य नव्हते. क्षत्रियांचा संपूर्ण निःपात करणारी युद्धे झाली तरीही ब्राह्मणांना उपद्रव देण्याइतक्या संख्येने क्षत्रिय शिल्लक राहिलेच. ब्राह्मणांनी सांगितलेल्या आणि सूच्या काळातील क्षत्रिय हे मूळचे क्षत्रिय नाहीत. *परशुरामाने क्षत्रियांचा संपूर्ण निःपात केल्यानंतर त्यांच्या पत्नीशी समागम केल्यानंतर त्यांच्या ब्राह्मणांनी वरील क्षत्रियांची जात निर्माण केली असे आहे. ही कथा मुळातच कपोलकल्पित आहे. ब्राह्मणशाहीने धमक्या देऊन बदनामी करण्याचे साधन आपल्या स्वार्थासाठी नेहमीच निर्लज्जपणे वापरले आहे. ब्राह्मणशाहीचा क्षत्रियांशी संघर्ष हा सुरुवातीसच मूर्ख आणि उन्मत यामधील झगडा होता.* अर्थातच ब्राह्मण हे चार्तुवर्ण्याच्या रक्षणासाठी क्षत्रियांची ब्राह्मण हे चातुर्वण्यनि क्षत्रियांना दिलेला आणि ब्राह्मणांना नाकारलेली शस्त्रे चातुर्वण्याने पुरविलेली आहेत. अशा सिद्धांताच्या साहाय्याने ब्राह्मण क्षत्रियांशी क्षत्रियावर विजय मिळविण्यात किती काळ लढू शकणार? ब्राह्मणांना हे सत्य समजून आले. हे सत्य *टॅलिऍण्ड यांनी नेपोलियनला सांगितले की, "बंदूक देणे सोपे आहे, पण या बंदुकीवर बसणे कठीण आहे." क्षत्रियाकडे शस्त्रे असल्याकारणाने आणि ब्राह्मणाकडे ती नसल्या कारणाने क्षत्रियांशी युद्ध म्हणजे विनाशाला आमंत्रण ही गोष्ट ब्राह्मणाच्या लक्षात आली.* ब्राह्मण आणि क्षत्रिय यांच्यामधील युद्धाचा हा प्रत्यक्ष परिणाम होता. याप्रमाणे या युद्धाचा आणखी एक परिणाम होता की, जो ब्राह्मणाच्या लक्षात आल्याशिवाय राहिला नाही. ब्राह्मण आणि क्षत्रिय एकमेकांशी युद्ध करीत असताना, वैश्य आणि शूद्रांना नियंत्रणात ठेवण्यास कोणी शिल्लक उरले नाही. ते जवळजवळ ब्राह्मण आणि क्षत्रिय यांच्या पातळीवर सामाजिकदृष्ट्या येऊन पोचण्याच्या मार्गांवर होते. ब्राह्मणाच्या दृष्टीने क्षत्रियांना दडपूण टाकणे हे जवळजवळ अशक्य होते आणि ही युद्धे चालू राहिली तर क्षत्रिय आणि वैश्य हेही त्यांच्यात बरोबरीने येण्याचा खराखुरा धोका होता. ब्राह्मणांनी आपले क्षत्रियांशी युद्ध चालू ठेवणे आणि वैश्य व शूद्रही आपल्या बरोबरीने येण्याचा धोका पत्करावा की क्षत्रियांशी युद्ध थांबवून त्यांच्याशी मैत्री करावी आणि दोघांनी मिळून वैश्य आणि शूद्रांचे वाढते संकट दडपून टाकावे हा प्रश्न ब्राह्मणासमोर होता. ब्राह्मणांनी क्षत्रियांशी युद्धात थकल्यानंतर हा दुसरा पर्याय स्वीकारला. त्यांनी क्षत्रियांशी मैत्री करण्याचे ठरविले आणि दोघांनी मिळून वैश्य आणि शूद्रांना गुलाम करावे आणि त्यांची पिळवणूक करावी असे ठरविले. हे नवीन ध्येय शतपथ ब्राह्मणाच्या निर्मितीनंतर ब्राह्मणांनी स्वीकारले असावे. शतपथ ब्राह्मणाच्या काळातच हे नवीन ध्येय उच्चारले गेले. ज्या भाषेत हे नवे ध्येय व्यक्त झाले आणि ज्यांच्यावर त्याचा अंमल झाला ते पाहिल्यानंतर हे व्यक्त झालेले विचार मूळस्वरूपात येथे द्यावेत अशी इच्छा आहे. *शतपथाचे लेखक म्हणतात :*_
_“त्यानंतर ते आहवानीयकडे पशूंना परत नेतात. बकरा प्रथम जातो, त्यानंतर गाढव आणि त्यानंतर घोडा- आता आहवानीयकडून दूर जाताना घोडा प्रथम, गाढव नंतर व त्यानंतर बकरा जाते. *कारण घोडा हा शस्त्राचे (खानदानीचे) निदर्शक आहे. गाढव वैश्य आणि शूद्राचे निदर्शक आहे.* बकरा हे ब्राह्मणाचे आणि आहावानियापासून दूर जाता घोडा पहिला होता आणि म्हणून क्षत्रियांना प्रथम व त्याच्यामागे तीन वर्ण येतात. ज्या अर्थी गाढव हे जाताना आणि परत येताना दोन्ही वेळी प्रथम नव्हते, त्या अर्थी ब्राह्मण आणि क्षत्रिय हे दोघेही वैश्य आणि शूद्राच्या मागे कधीही जाणार नाहीत. वाईट आणि चांगले यामध्ये गोंधळ होऊ नये म्हणून या प्रमाणे ते चालते. आणि वैश्य आणि शूद्र यांना याप्रकारे ठेवण्यात येईल की हे दोघेही पुरोहित आणि क्षत्रिय यांच्यामागे राहतील आणि त्यांचे कनिष्ठ व दास म्हणून राहतील."_
*_मनूच्या क्षत्रियाविषयीच्या गोंधळात टाकणाऱ्या आदेशांचे कोडे या खुलाशाने सुटते. क्षत्रियांच्या बाबतीत ब्राह्मणांची प्रवृत्ती त्याला जखमी करण्याची इच्छा; पण चढाई करण्याची भीती. हुकमात ठेवण्याची इच्छा, परंतु मैत्री करणे अधिक पसंत अशा प्रकारची आहे. सर्व युद्धातून आणि त्यातून झालेल्या तडजोडीतून मनूच्या हे लक्षात आले की, क्षत्रियावर सक्ती करण्याचा हव्यास धरण्यापासून काही उपयोग नाही. त्यांना ब्राह्मणांच्या प्रभुत्वाखाली ठेवणे अशक्य आहे. बिस्मार्कप्रमाणे मनूच्याही समान कारणासाठी एकत्र येणे, समान आघाडी बनविणे हेच शक्य आहे. वैश्य आणि शूद्राच्या विरुद्ध या दोघांनी आघाडी उघडली पाहिजे आणि हेच मनूने केले. यात सर्वांत वाईट गोष्ट ही की, हे धर्माच्या नावावर करण्यात आले. ज्यांनी ब्राह्मणशाहीच्या प्रवृत्तीचा आणि आत्म्याचा अभ्यास केला, त्यांना यात धक्का बसण्यासारखे काही नाही. ब्राह्मणाशाहीने आपले स्वार्थी राजकारण लपविण्यासाठी धर्माचा बुरखा पांघरलेला आहे._*
*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*
*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_संदर्भ :- कांती आणि प्रतिक्रांती_*
*_लेखक :- डॉ बाबासाहेब आंबेडकर_*
*_संकलन :- महेश कांबळे_*
*_दिनांक :- २६/११/२०२२_*
https://mikamblemahesh.blogspot.com/2022/11/blog-post_27.html
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
No comments:
Post a Comment