Saturday, 26 November 2022

ब्राह्मणवादी साहित्य

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_ब्राह्मणवादी साहित्य_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

             _पुष्यमित्राच्या राजकीय विजयानंतर जे ब्राह्मणी साहित्य निर्माण झाले ते वस्तुस्थितीच्या कारणांवर प्रकाश टाकते. अशा ब्राह्मणी साहित्याला सहा भागांत विभागलेले आहे._

*_१. मनुस्मृती_*

*_२. भगवद्गीता_*

*_३. रामायण_*

*_४. महाभारत_*

*_५. वेदान्त_*

*_६. पुराण_*

                 _या साहित्याचे विवेचन करताना फक्त अशाच गोष्टींचा निर्देश होईल की ज्यामूळे बौद्ध धम्माच्या -हासाला कारणीभूत असल्याचे दिसून येईल._

               _*साहित्य हे जनतेच्या जीवनाचा आरसा असते असे मानले जाते.* साहित्यात जनतेच्या जीवनाचे प्रतिबिंब पडलेले असते. एक मुद्दा स्पष्ट करणे आवश्यक वाटते, हे साहित्य ज्या वेळी जन्माला आले त्याबाबतच्या निर्मितिकालाबद्दल आहे. *पुष्यमित्राच्या प्रतिकांतीनंतरचे हे सर्व साहित्य जन्माला आले आहे.*_

              _*याबाबत सर्वांचे मतैक्य होणार नाही. याउलट हिंदू लोक, ते सनातनी असोत वा नसोत, विद्वान असोत वा अल्पशिक्षित असोत, असे अगदी ठामपणे समजतात की आपले पवित्र साहित्य हे फार पुरातन काळातील आहे. त्यांचा हा विश्वास अपरिवर्तनीय आहे. किंबहुना तो त्यांच्या श्रद्धेचाच एक भाग आहे. प्रत्येक हिंदूची यावर असीम श्रद्धा असते. आपले पवित्र साहित्य फार पुरातन आणि प्राचीन आहे. यावर त्यांचा दृढ विश्वास आहे.*_

*_१) मनुस्मृती_*

               _मनूच्या काळाच्या संदर्भात *मनुस्मृती ही सुमती भार्गव याने ख्रिस्तपूर्व १८५ मध्ये म्हणजे पुष्यमित्राच्या क्रांतीनंतर लिहिली असल्याचे संदर्भ भेटले आहेत.* या विषयावर अधिक काही सांगण्याची गरज नाही._

_*२) भगवद्गीता*_

             _भगवद्गीतेच्या निर्मितीच्या काळाबाबत भिन्न मते आहेत._

      _*१) श्री. तेलंग यांच्या मते भगवद्गीतेचा काळ हा ख्रिस्तपूर्व तिसऱ्या शतकापेक्षा प्राचीन असावा. अर्थात त्याआधी किती काळ हे ते सांगू शकले नाहीत.*_ 

    _*२) श्री. टिळकांच्या मते गीतेचा रचनाकाळ इ. पूर्व ५ वे शतक आहे.*_

    _*३) प्रा. गार्बे यांच्या मते आज आपणास जी गीता उपलब्ध आहे त्यापेक्षा मूळ गीता वेगळी होती. अलीकडच्या काळात भगवद्गीता आपल्यापर्यंत तिच्या मूळ स्वरूपात पोचली नाही याबाबत भारताबाहेरील बऱ्याच प्राच्य विद्या अभ्यासकांत एकमत आहे. प्रा. गार्बे यांच्या मताप्रमाणे भगवद्गीतेतील १४६ श्लोक नवीन आहेत. हे श्लोक मूळ गीतेत नाहीत. गीतेच्या रचनेच्या काळाबाबत बोलताना प्रा. गार्बे म्हणतात, 'इसवी सनाच्या दुसऱ्या शतकाच्या पूर्वी भगवद्गीता लिहिली असल्याचे संभव नाही.'*_

      _*४) राजा बालादित्याच्या काळात भगवद्गीता लिहिली असावी असे प्रा. कोसंबी आग्रहपूर्वक प्रतिपादतात. बालादित्य हा गुप्त घराण्यातील राजा होता. गुप्त घराण्याने आंध्र राजघराण्याची जागा घेतली. बालादित्य इ. स. ४६७ मध्ये राज्यावर आला. भगवद्गीतेची रचना इतक्या उशिरा झाली असे कोसंबी यांनी प्रतिपादण्याची दोन करणे आहेत. शंकराचार्यांनी भगवद्गीतेवर भाष्य करीपर्यंत भगवद्गीतेची माहिती कुणालाही नव्हती. शंकराचार्यांचा जन्म इ. स. ७८८ मध्ये व मृत्यू इ. स. ८२० मध्ये झाला. भगवद्गीतेचा उल्लेख शांतरक्षिताच्या तत्त्वसंग्रहात निश्चितपणे नव्हता. तत्त्वसंग्रह हा ग्रंथ शंकराचार्यापूर्वी फक्त ५० वर्षे निर्माण झाला. दुसरे कारण असे की वसुबंधू हा विज्ञानवाद नावाच्या विचारधारेचा निर्माता होता. ब्रह्मसूत्र भाष्यात वसुबंधूच्या विज्ञानवादावर टीका आहे. गीतेमध्ये ब्रह्मसूत्र भाष्याचा संदर्भ आहे. त्यामुळे गीता ब्रह्मसूत्र भाष्याच्या व वसुबंधूच्या नंतर लिहिली गेली असावी असा निष्कर्ष कोसंबी यांनी काढला आहे. वसुबंधू हा गुप्त घराण्यातील राजा बालादित्याचा गुरू होता. या कारणामुळे गीता बालादित्याच्या काळात वा नंतर लिहिली असावी.*_

       _*५) गीतेमध्ये एके ठिकाणी 'ब्रह्मसुत्रा'चा उल्लेख सापडतो. या ब्रह्मसूत्रात विज्ञानवादी सांप्रदायाचा जनक वसुबंधु याची टीका आपणांस वाचावयास सापडते. 'वसुबंधू' हा गुप्तवंशीय नरेश बालादित्य यांचा गुरू होता. यावरून हे सिद्ध होते की, गीतेची रचना बालादित्याच्या शासनकाळात इ. स. ४६७ च्या आसपास करण्यात आली.*_

        _*६) काळाच्या प्रवाहात गीतेच्या अनेक आवृत्यांची निर्मिती केली गेली याबद्दल विद्वानांत मतभेद नाहीत. आज ज्या स्वरूपात गीतेची रचना आहे. तीत व मूळ गीतेत बरेच भेद आहेत. याबद्दलसुद्धा विद्वानांत एकमत आहे. वेगवेगळ्या संपादकांच्या हातून त्यांच्या क्षमतेनुसार गीतेच्या वेगवेगळ्या आवृच्यांची रचना निरनिराळ्या काळांत करण्यात आली. खरे पाहता गीता ही प्रतिभावंत लेखकाने लिहिलेला अशाप्रकारचा कुठलाही ग्रंथ नाही. केवळ काल्पनिक घटनाच यात ठिकठिकाणी दिसतात. यामध्ये अवडंबरपूर्ण व अर्थहीन शब्दांचा वापर करून एकच विचार पुन्हा पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.*_

         *_७) गीतेमध्ये अनेकदा साहित्यिक अलंकरण दोषपूर्ण आढळते. अनेक छंद उपनिषदांपासून जसेच्या तसे उचलून गीतेमध्ये घुसडून देण्यात आले आहेत. कवीने व लेखकाने टाळावयाच्या अनेक बाबी गीतेमध्ये सापडतात. केवळ पांडित्य प्रदर्शन करण्यासाठी सत्य, रज व तमस यांचे वर्णन करण्यात आले आहे._* 

        _८) निःसंशय गीतेची रचना खऱ्या व सर्जनात्मक कवीची कृती नसून ती मुद्दाम रचण्यात आलेली कृती आहे._

        *_९) वेगवेगळ्या लेखकांच्या हातून वेगवेगळ्या काळात गीतेच्या नवीन आवृत्यांची रचना करण्यात आली. याबद्दल विद्वानांमध्ये एकमत आहे. वादाचा मुख्य मुद्दा हा आहे की, मूळ गीतेमध्ये नवीन कोणता भाग जोडण्यात आला? राजाराम शास्त्री भागवत यांच्या म्हणण्यानुसार मूळ गीतेत केवळ साठ श्लोक होते._*

       *_१०) हबोल्डस यांच्या विचारानुसार, मूळ गीतेमध्ये केवळ अकरा अध्याय होते. बारा ते अठरा अध्यायांपर्यंतची साम्रगी नंतर जोडण्यात आली._*

       _*११) हॉपकिन्स यांच्या म्हणण्यानुसार मूळ गीतेमध्ये प्रारंभिक चौदा अध्याय हेच होते.*_

    _*१२) राजवाडेसुद्धा दहा व अकरा अध्याय गीतेमध्ये जोडण्यात आल्याबद्दल सहमत आहेत.*_

     _*१३) प्रा. गार्बे यांच्या म्हणण्यानुसार मूळ गीतेमध्ये नसलेले १४६ छंद नवीन आहेत. यावरून हा अर्थ निघतो की, गीतेचा जवळपास पाचवा भाग नवीन जोडलेला आहे.*_

      _*१४) गीतेच्या लेखकाबद्दल कुठेही उल्लेख सापडत नाही. गीतेचा उपदेश कृष्णाने अर्जुनाला युद्धभूमीवर दिलेला आहे. या उपदेशाचे पुनर्कथन संजय याने कौरवांचा पिता धृतराष्ट्र याच्यापुढे केलेले आहे. गीतेला आपण महाभारताचा एक भाग म्हणून स्वीकार करू शकतो. परंतु गीता महाभारताचा भाग नसून स्वतंत्र अशी रचना आहे. लेखकाचा उल्लेख मात्र गीतेमध्ये सापडत नाही. तरीपण आपण हे अनुमान काढू शकतो की, 'व्यास' यानेच गीतेची रचना केली असावी.*_

 *_३. रामायण__*

   *_१. महाभारताप्रमाणेच रामायणाच्याही तीन वेगवेगळ्या आवृत्त्या निघाल्या असे दिसते._*

  *_२. महाभारतात रामायणाचे दोन संदर्भ सापडतात. एके ठिकाणी रामायणाचा उल्लेख आहे. परंतु रामायणाच्या लेखकाचा उल्लेख नाही. दुसऱ्या संदर्भात मात्र 'वाल्मीकीचे रामायण' असा उल्लेख आहे._*

  *_३. परंतु आजचे रामायण हे वाल्मीकीचे रामायण नाही. सी. व्ही. वैद्य यांच्या मते सध्याचे रामायण हे जरी संशोधक आणि सर्वांच्या आदरास पात्र असलेल्या कटक नावाच्या समीक्षकांनी मान्य केलेले व स्वीकारलेले असले तरी ते वाल्मीकीने लिहिलेले मूळ रामायण नाही याबाबत अगदी सनातनी विचारवंतांनाही संशय नाही._*

  *_४. अगदी वरवर रामायणाचे काव्य वाचणाऱ्यालाही (मग ती बंगाली) आवृत्ती असो की मुंबईची) त्यातील विसंगती, संदर्भहीनता, जुन्या व नव्या घटनांचे मिश्रण पाहून आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. आणि वाल्मीकी रामायणाची पुढच्या काळात मोठ्या प्रमाणात पुनर्रचना करण्यात आली असावी याची खात्री होते._*

  *_५. महाभारताप्रमाणेच रामायणाच्या तीन आवृत्त्यांत बरीच भर टाकण्यात आली._*

  *_६. सुरुवातीला रामायण फक्त रावणाने सीतेचे हरण केल्यामुळे झालेल्या राम व रावणाच्या युद्धापुरतेच मर्यादित होते._* 

  *_७. दुसऱ्या आवृत्तीत या कथेत उपदेशांची भर घालण्यात आली. केवळ ऐतिहासिक कथेऐवजी त्यात तार्किक विचार ग्रंथित करण्यात आले व सामाजिक, नैतिक व धार्मिक कर्तव्याबाबत योग्य मार्ग कोणता ते शिकविण्याच्या उद्देशाने केलेला उपदेश त्यांत घुसडून देण्यात आला._*

  *_८. तिसर्या आवृत्तीत त्यात दंतकथा, शिक्षा, तत्त्वज्ञान, कला व विज्ञान-विषयक मजकुराची भर टाकण्यात आली._*

  *_९. रामायणाच्या काळाबाबत एक गोष्ट निश्चितपणे सिद्ध झालेली आहे. ती ही की रामाचा काळ हा पांडवांच्या काळापेक्षा खूप जुना आहे. परंतु महाभारताच्या पुनर्लेनाबरोबरच रामायणाचेही पुनर्लेखन होत गेले ही गोष्ट शक्य आहे की, रामायणातील काही अंश महाभारताच्याही पूर्वी रचले गेले असावेत. परंतु रामायणाचा बराचसा भाग महाभारताचा बराचसा भाग लिहून झाल्यानंतरच रचला असावा हे निश्चित._*

*_४. महाभारत_*

        _महाभारताची रचना कधी केली असावी याबद्दल निश्चित सांगणे अशक्य आहे. महाभारताच्या लेखनाच्या काळाचा फक्त अंदाज करता येण्यासारखा आहे._

*_१. महाभारताच्या एकंदर तीन आवृत्त्या आहेत._* 

_२. आणि प्रत्येक संपादनाच्या वेळी शीर्षक व विषयांत बदल केलेला आहे._

*_३. महाभारताच्या मूळस्वरूपात त्याला 'जय' असे नाव आहे. हे मूळचे नाव तिसऱ्या आवृत्तीत सुरुवातीला आणि शेवटी आलेले आहे._*

*_४. मुळातील 'जय' या नावाच्या पहिल्या आवृत्तीचे लेखक व्यास हे होते._*

*_५. दुसऱ्या आवृत्तीत त्याचे नाव 'भारत' असे होते._*

_६. या दुसऱ्या आवृत्तीचे संपादक वैशंपायन होते. पण वैशंपायनाने संपादित केलेली दुसरी आवृत्ती ही भारताची एकमेव दुसरी आवृत्ती नव्हती. व्यासाचे वैशंपायनाव्यतिरिक्त इतर अनेक शिष्य होते._

*_७. सुमंतु, जैमिनी, पैल व शुक्र असे व्यासांचे आणखी चार शिष्य होते. त्यांपैकी प्रत्येकाने आपापली संपादित आवृत्ती तयार केली._* 

*_८. याप्रमाणे महाभारताच्या आणखी चार आवृत्त्या तयार झाल्या. वैशंपायनाने या चारही आवृत्त्यांची पुनर्रचना करून आपली आवृत्ती तयार केली._*

*_९. तिसर्या आवृत्तीचा संपादक सौती हा होता. त्याने वैशंपायन याच्या अवृत्तीची पुनर्रचना केली. सौतीच्या अंतिम आवृत्तीचे नाव 'महाभारत' असे होते. अशा तर्हेने हा ग्रंथ आकाराने व मजुकाराने बराच मोठा बनला._*

_१०. 'जय' हा व्यासांचा मूळ ग्रंथ छोटा होता. त्यात फक्त ८८०० श्लोक होते._

_११. वैशंपायनांच्या आवृतीत श्लोकांची संख्या ४४ हजार झाली आणि सौतीने त्यात भर टाकून हा ग्रंथ ९६ हजार ८३६ श्लोकांचा बनविला._ 

_१२. मजकुराच्या दृष्टीने व्यासाने लिहिलेल्या ग्रंथात फक्त कौरव व पांडवांच्या युद्धाची कथा होती._

_१३. वैशंपायनांच्या आवृत्तीत मूलतः दोन विषय होते. मूळ कथेत एका उपदेशाची भर घालण्यात आली. ते एक नीतिमूल्ययुक्त साहित्य बनले._ 

_१४. वैशंपायनच्या आवृत्तीत काव्यविषय तीनपट करण्यात आला. मूळ कथेसोबत उपदेश अर्थात धार्मिक शिकवणसुद्धा जोडण्यात आली._

_१५. त्यात सामाजिक, नैतिक व धार्मिक आदर्शयुक्त आचारसंहिता शिकविण्यात आली. शेवटचा संपादक सौती याने हा ग्रंथ दंतकथांचा सर्वसंग्राहक ग्रंथ बनविला._

_१६) निरनिराळ्या दंतकथा, छोटया-मोठया ऐतिहासिक कथा स्वतंत्रपणे विखुरलेल्या होत्या. त्या सौतीने भारतात समाविष्ट केल्या. त्या नाहीशा होऊ नये वा एकत्रित वाचावयास मिळाव्यात हा यामागे सौतीचा उद्देश होता._

_१७) भारत हे नाव व्यासंगाचे भांडार बनावे ही सौतीची महत्त्वाकांक्षा होती. म्हणून त्याने भारतात राजकारण, भूगोल, धनुर्विद्या आद ज्ञानांच्या सर्व शाखांचा अंतर्भाव केला._

*_१८) पुनरुक्तीची सौती याला सवय असल्याने भारताचे 'महाभारत' बनले यात संशय नाही._*

        _या ग्रंथाच्या प्रत्येक आवृत्तीचा काळ ठरविणे अतिशय कठीण आहे. याचा सर्वकष विचार करून प्रा. हॉपकिन्स म्हणतात,_

*_१८) "महाभारताचा सर्वसाधारणे काळ इ.स. २०० ते ४०० या दरम्यान असावा. परंतु नंतर या ग्रंथात जो जादा मजकूर पुढील आवृत्त्यांत समाविष्ट करण्यात आला त्याचा या कालनिश्चितीत विचार करण्यात आलेला नाही. त्याचप्रमाणे या ग्रंथाचे पुनर्लेखन करताना त्यानंतरच्या नक्कल करणाऱ्यांनी जे शाब्दिक फेरबदल केले असतील तेही यात गृहीत धरलेले नाहीत._*

_१९) परंतु या ग्रंथाचा काळ यापेक्षा नंतरचा असावा असे निश्चितपणे वाटावे अशा काही घटना आहेत._

*_२०) महाभारतात हुणांचा उल्लेख आहे. स्कंदगुप्ताने हुणांशी लढून त्यांचा पराभव इ.स. ४५५ च्या सुमारास केला. परंतु तरीही हुणांचे आक्रमण इ.स. ५२८ पर्यंत चालू होते. या काळात वा त्यानंतर महाभारत लिहिले असावे हे उघड आहे._*

_२१) आणखी काही अशा गोष्टी आहेत की ज्यामुळे महाभारताचा काळ त्यानंतरचा असावा असे दिसून येते. *महाभारतात म्लेंच्छ वा मुस्लीम असा उल्लेख आहे. महाभारतातील वनपर्वात १९० व्या अध्यायात २९ व्या श्लोकात लेखक म्हणतो, 'सर्व जग इस्लामी बनेल. यज्ञ, क्रियाकर्म, धार्मिक कृत्ये सर्व बंद होतील.' मुस्लिमांचा हा प्रत्यक्ष उल्लेख आहे. श्लोकात जरी भविष्यात काय घडेल हे सांगितले असले तरी ते एक पुराण असल्याने त्यात घडून गेलेल्या गोष्टीचाच उल्लेख असला पाहिजेत हे उघड आहे. वरील श्लोकावरून महाभारत हे मुस्लीम आक्रमणानंतर लिहिले असले पाहिजे, असा अभिप्राय काही जन व्यक्त करतात*_

_२२) इतरही काही पुरावे या समजुतीला पाठिंबा देणारे आहेत._

            _*याच अध्यायाच्या ५९ व्या श्लोकात असे म्हटले आहे की, 'वृषलांकडून छळ झाल्यामुळे भौतिग्रस्त झाल्याने आणि संरक्षण करणारे कोणीच नसल्याने ब्राह्मण सर्व पृथ्वीवर दुःखाने आणि वेदनेने विव्हळत व शोक करीत फिरतात.' या श्लोकात वृषल म्हणून ज्यांचा उल्लेख आहे ते बौद्ध धर्म असूच शकत नाही. ब्राह्मणांवर अन्याय झाल्याचा कोणताही पुरावा नाही. याउलट असा पुरावा उपलब्ध आहे, की बौद्धांच्या सत्तेच्या काळात ब्राह्मणांना उदारतेने वागविले जात होते. वृत या शब्दाचा अर्थ 'असंस्कृत' असा आहे. त्यामुळे वृषल हा उल्लेख बहुधा मुस्लीम आक्रमकांसाठी केला असावा.*_

_२३) वनपर्वातील याच अध्यायात ६५, ६६ व ६७ या श्लोकात असे म्हटले आहे की, 'समाज विस्कळीत बनेल. लोक एडुकांची पूजा करतील, ते देवावर बहिष्कार घालतील. शूद्र द्विजांची सेवा करणार नाहीत. सर्व जग एकमय होईल. युग समाप्त होईल._

_*२४) यातील एडूक या शब्दाचा अर्थ काय? काही जणांच्या मते एडूक म्हणजे बौद्ध धर्मीय चैत्य होत. परंतु कोसंबी यांच्या मते हे चुकीचे आहे. बौद्ध साहित्यात वा वैदिक साहित्यात कोठेही 'एडूक' या शब्दाचा उपयोग चैत्य या अथनि केलेला नाही. या उलट महेश भट्ट यांनी अमरकोशाच्या लिहिलेल्या टीकेत 'एडुक' या शब्दाचा अर्थ ज्या भिंतीला लाकडाचा उपयोग करून आधार दिलेला आहे अशी भिंत असा आहे. हा अर्ध लक्षात घेता एडूक म्हणजे मुस्लिमांचा इदगाह असावा असे मत कोसंबी यांनी मांडलेले आहे. इदगाहासमोर मुसलमान प्रार्थना (नमाज) करतात. हा अर्थ जर बरोबर असेल तर महाभारताचा काही भाग मोहम्मद घोरी याच्या आक्रमणानंतर लिहिलेला असावा असे सिद्ध होते. मुस्लिमांचे पहिले आक्रमण इब्ने कासीम याच्या सैन्याने इ. स. ७१२ मध्ये केले. त्याने उत्तर भारतातील काही खेडी जिंकली; पण त्याने फारसा विनाश केला नाही. त्याच्यानंतर महम्मद गझनीने भारतावर स्वारी केली. गझनीच्या महम्मदाने देवळे व विहार नष्ट केले व दोन्ही धर्माच्या पुरोहितांची कत्तल केली. परंतु त्याने इदगाह व मशिदी बांधल्या नाहीत. ते काम महम्मद घोरी याने केले. यावरून असा निष्कर्ष काढता येतो की, इ.स. १२०० पर्यंत महाभारताचे लिखाण पूर्ण झाले नव्हते.*_

*_वेदांत सूत्रे_*

           _यापूर्वी सांगितल्याप्रमाणे वेद वाङ्मयात वेद, ब्राह्मणे, आरण्यके व उपनिषदे यांचा समावेश होतो. त्यांच्या विषयानुसार या साहित्याचे दोन प्रकार पडतात :-_

_१) ज्या साहित्यात धार्मिक कार्ये, समारंभ, तांत्रिक विधी या सर्वांना कर्मकांड असे म्हणतात असे साहित्य._

_२) ईश्वरविषयक माहिती देणारे साहित्य त्यास ज्ञानकांड असे म्हटलेले आहे. वेद व ब्राह्मणे हे पहिल्या वर्गातील साहित्य आहे, तर आरण्यके व उपनिषदे हे दुसऱ्या प्रकारात मोडतात._

       _वैदिक साहित्य हे प्रचंड प्रमाणात वाढले आणि ते जंगली गवताप्रमाणे अस्ताव्यस्त स्वरूपात वाढले हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. या गोंधळातून काही पद्धती, काही सुसंगती निर्माण करणे आवश्यक होते. *वेदान्तात सुसंगतता निर्माण करण्याच्या गरजेतून 'मीमांसे'चा जन्म झाला.* वैदिक साहित्याच्या पवित्र ग्रंथातील सुसंबद्ध अर्ध शोधून काढण्याचा प्रयत्न झाला. वेदातील साहित्यात पद्धतशीरपणा आणि सुसूत्रता आणावयाची होती. त्यांनी स्वत ला दोन विचारशाखांत विभागले. *एक शाखेने 'कर्मकांड'चे तर दुसरीने 'ज्ञानकांड' चे सुसूत्रीकरण केले. त्यामुळे वैदिक साहित्याच्या दोन शाखा बनल्या - एक पूर्वमीमांसा व दुसरी उत्तरमीमांसा. पूर्वमीमांसेमध्ये वैदिक साहित्यातील पहिला भाग - वेद व ब्राह्मणे यांचा समावेश आहे. त्यामुळेच त्याला पूर्व (आधीची) मीमांसा असे नाव पडले. उत्तरमीमांसेत वैदिक वाङ्मयाचा नंतरचा भाग आरण्यके व उपनिषदे यांचा समावेश आहे आणि म्हणूनच त्याला उत्तर (नंतरची) मीमांसा असे म्हणतात.*_

       _मीमांसाशास्त्रांच्या दोन शाखांशी संबंधित साहित्य विपुल आहे. यापैकी दोन सूत्राचे संग्रह मीमांसाशास्त्रात प्रमुख समजले जातात. यापैकी एका सूत्रसंग्रहाचा लेखक जैमिनी व दुसऱ्याचा बादरायण ज्ञानकांडाबाबत चर्चा करतो, जैमिनी बादरायणाच्या पूर्वीही इतर लेखकांनी या विषयावर लेखन केले होते यात संशय नाही. परंतु जैमिनी व बादरायण यांची सूत्रे म्हणजे मीमांसाशास्त्राच्या दोन शाखांवरील अधिकृत लेखन समजले जाते._

         _दोघांचीही सूत्रे मीमांसेबाबत असली तरी जैमिनीच्या सूत्रांना 'मीमांसासूत्रे' असे म्हणतात तर बादरायणाच्या सूत्रांना 'वेदान्तसूत्रे' असे म्हणतात वेदान्त या शब्दाचा अर्थ वेदांचा अंत म्हणजे शेवट असा होतो किंवा वेदांच्या शेवटच्या प्रकरणात सांगितलेला सिद्धांत असा होतो. त्यात उपनिषदांचा समावेश होतो. उपनिषदे ही वेदांची अंतिम उद्दिष्टे आहेत. *बादरायणाची सूत्रे वेदांच्या या भागाचे सुसूत्रीकरण पद्धतशीरपणे करतात, म्हणून त्यांना 'वेदान्तसूत्रे' म्हणतात.* वेदांच्या अखेरच्या भागात संजयाला वृत्तांत देण्याचा आदेश दिला. वेदांत सूत्रांचा हा उगम आहे. हा बादरायण कोण होता? त्याने ही सूत्रे कशासाठी रचली? त्याने ती कधी रचली? नावाशिवाय बादरायणाची कोणतीही माहिती उपलब्ध नाही. ते लेखकाचे नाव खरे आहे की नाही हेही निश्चित नाही. या सूत्राच्या लेखकाबाबत प्रमुख भाष्यकारांतही एकमत नाही. काही जण लेखक बादरायण आहे असे मानतात, तर काही जण असे म्हणतात की व्यास आणि बादरायण ही एकाच व्यक्तीची नावे आहेत. अशा प्रकारे या सूत्रांच्या लेखकाबाबत आश्चर्यकारक परस्परविरोधी मते आढळून येतात. बादरायणाने ही सूत्रे कशासाठी लिहिली?_

          _ब्राह्मणांनी वैदिक साहित्यातील कर्मकांडाचे सुसूत्रीकरण करावे यासाठी ती लिहिली असावीत हे आपण समजू शकतो. ब्राह्मणांना कर्मकांडाचे महत्व फार वाटे वैदिक साहित्यातील कर्मकांडाच्या सुसूत्रीकरणावर त्यांची उपजीविका व जीवन अवलंबून होते. परंतु ब्राह्मणांना वैदिक वाङ्मयातील ज्ञानकांडात काहीही रस नव्हता. मग त्याची शास्त्रशुद्ध मांडणी कशासाठी केली? हा प्रश्न आतापर्यंत कोणी उपस्थित केला नाही. परंतु हा प्रश्न महत्त्वाचा आहे व त्याचे उत्तरही महत्त्वाचेच असले पाहिजे. हा प्रश्न का महत्त्वाचा आहे व त्याचे उत्तर काय आहे याची चर्चा मी नंतर करीन. वेदान्त सूत्राबाबत आणखी दोन प्रश्न आहेत. ही सूत्रे (ईश्वरविषयक) आहेत की शुद्ध तत्त्वज्ञानांच्या स्वरूपाची आहेत? की प्रस्थापित ब्रह्मज्ञानविषयक सिद्धांतांची शुद्ध तत्त्वज्ञानांशी सांगड घालण्याचा हा प्रयत्न होता व या प्रकारे त्यांना निरुपद्रवी बनविण्याचा प्रयत्न होता? दुसरा प्रश्न वेदान्तसूत्रांवरील भाष्यासंबंधी आहे. वेदान्तसूत्रावर पाच भाष्ये पाच ख्यातनाम आचार्यांनी लिहिली आहेत. त्यांच्या बौद्धिक क्षमतेच्या कीर्तीमुळे त्यांना आचार्य ही पदवी मिळालेली होती. पाच भाष्ये यांची-_

*_१) शंकराचार्य (इ.स. ७८८ ते ८२०)_*

*_२) रामानुजाचार्य, (इ. स. १०१७ ते इ. स. ११३७)_* 

*_३) निंबारकाचार्य (मत्यू इ. स. ११६३)_* 

*_४) माधवाचार्य (इ. स. ११९७ ते अंदाजे १२७६)_* आणि 

*_५) वल्लभाचार्य (इ. स. १४१७)_*

          _वेदान्तसूत्रावरील ही भाष्ये प्रत्यक्ष वेदान्तसूत्रापेक्षा अधिक महत्त्वाची मानण्यात येऊ लागली. यांचे वैशिष्ट्ये हे आहे की या पाच आचार्यांनी एकाच वेदान्तसूत्रांच्या संकलनाच्या आधावर पाच वेगवेगळ्या विचारपद्धती शोधून काढण्याचा प्रयत्न केला. शंकराचार्याच्या मते वेदान्तसूत्रे एकेश्वरीय व अद्वैत तत्त्वज्ञान शिकवितात, तर रामानुजाचार्यांच्या मते विशिष्ट अद्वैतवाद, निंबारकांच्या मते एकात्मिक द्वैतवाद, माधवांच्या मते द्वैतवाद तर वल्लभाचार्यांच्या मते शुद्ध अद्वैत. या संज्ञांच्या अर्थाविषयीची चर्चा आता करणार नाही. एकाच सूत्राच्या संकलनाचे पाच वेगवेगळे अर्थ लावून त्यावर पाच वेगवेगळ्या विचारांच्या पद्धती का निर्माण करण्यात आल्या? हा फक्त व्याकरणाशी संबंधित प्रकार आहे की या पाच वेगवेगळया विचारांच्या पद्धती निर्माण करण्यामागे काही कारणे आहेत? या अनेकविध भाष्यांतून आणखी एक प्रश्न निर्माण होतो. वेदान्तसूत्रांवर पाच वेगवेगळी भाष्ये असली, त्यातून ईश्वर व व्यक्तिनिहाय आत्मा यांचा विचार करण्याच्या पाच वेगवेगळ्या पद्धती सांगितल्या असल्या तरी खऱ्या अर्थाने त्या दोनच पद्धती आहेत. शंकराचार्यांचा दृष्टिकोन व इतर चार जणांचा दृष्टिकोन. कारण बाकीच्या चार जणांत मतभिन्नता असली तरी त्या चारही जणांच्या दोन मुद्यांवर शंकराचार्यांशी असणारा विरोध सारखाच आहे -_

_१) ईश्वर व आत्मा एकच असल्याचा मुद्दा._ 

_२) जग हे भ्रम आहे हा सिद्धांत._ 

    _यातून तिसराच एक प्रश्न निर्माण होतो. बादरायणाच्या वेदान्तसूत्रातून शंकराचार्यांनी इतका वेगळा सिद्धांत का काढला ? सूत्रांच्या चिकित्सक अभ्यासातून हा सिद्धांत काढण्यात आला काय? की काही उद्देश आधी ठरवून त्यासाठी सोबीचा असा (अर्थ) सिद्धांत शंकराचार्यांनी काढला आहे?_

_या ठिकाणी फक्त प्रश्न उपस्थित केले आहेत. येथे त्यांच्यावर  चर्चा करणार नाही. येथे फक्त या भाष्यांच्या काळासंबंधी चर्चा करावया आहे. या भाष्यांचा काळ बुद्धपूर्व काळ आहे की बुद्धोत्तर हा यावेळी आपल्या प्रश्न आहे._

            _वेदान्तसूत्रांचा काळ ठरविण्याच्या मार्गात भगवद्गीतेप्रमाणेच अडचण आहे, की या सूत्रात अनेक बदल झाले आहेत. काही जणांच्या मते वेदान्त सूत्रांच्या तीन आवृत्त्या झाल्या असाव्यात. त्यामुळे त्यांच्या काळाबाबत निश्चित काही सांगणे शक्य नाही. याबाबत व्यक्त केलेली मते केवळ अंदाजाने व्यक्त केलेली आहेत. *वेदान्तसूत्रे ही बुद्धाच्या काळानंतर लिहिलेली आहेत यात संशय नाही. कारण सूत्रांत बौद्ध धम्माचा उल्लेख आहे. ती मनूनंतर लिहिलेली नसावीत कारण मनूने आपल्या स्मृतीत त्याचा उल्लेख केलेला आहे. प्रा. कीथ यांच्या मते वेदान्तसूत्रे इ. स. २०० च्या सुमारास लिहिलेली असावीत, तर प्रा. जॅकोबी यांच्यानुसार सूत्रांची रचना इ. स. २०० ते इ. स. ४५० च्या दरम्यान केलेली असावी.*_

*_६) पुराण_*

_१) या वेळेला उपलब्ध पुराणांची संख्या १८ आहे._

*_२) सुरुवातीला केवळ एकच पुराण - 'ब्रह्मांड पुराण' अस्तित्वात होते._*

_३) या अठरा पुराणांच्या निर्मितीमागे 'व्यासांचा संबंध' आहे._

_४) या व्यासानेच ब्रह्मांड पुराणातील विषय वेगवेगळे करून प्रत्येक विषयावर स्वतंत्र अशा पुराणांची निर्मिती केली._

_५) अशाप्रकारे अठरा पुराणांच्या निर्मितीच्या प्रक्रियेला पुराणांच्या विकासाची द्वितीय अवस्था मानण्यात येते._

*_६) प्रत्येक पुराणाच्या सुरुवातीचा भाग व्यासद्वारा रचित व प्रकाशित केला गेला. त्याला आदीपुराण म्हणतात._* 

_७) पुराणांचे मूळ विषय हे 'व्यासांद्वारा' निर्मित आहेत._

_८) या अठरा पुराणांच्या निर्मितीनंतर व्यासांनी ते आपला शिष्य 'रोमहर्षण' याला ऐकविले._ 

_९) रोमहर्षणद्वारा पुराणांची तृतीय आवृत्ती निर्माण केली गेली._

_१०) रोमहर्षण यांना सहा शिष्य होते. या सहापैकी तीन शिष्य काश्यप, सावर्णी व वैशंपायन यांनी आपले स्वतः चे वेगवेगळे पुराणांचे संस्करण तयार केले._

_११) यांनाच पुराणांची चतुर्थ आवृत्ती म्हणण्यात येते._ 

_१२) वरील तीनही संस्करण तिघांच्या नावाने ओळखले जातात._

_१३) भविष्य पुराणातील पुराव्यानुसार पुराणात संशोधन राजा विक्रमादित्याच्या काळात करण्यात आले._

_१४) सुरुवातीला पुराणात केवळ पाच विषय होते._

         १) सर्ग, २) प्रतिसर्ग, ३) वंश, ४) मन्वंतर आणि ५) वंशचरित

*_१) सर्ग - याचा अर्थ आहे ब्रह्मांडाची रचना._*

*_२) प्रतिसर्ग - याचा अर्थ आहे ब्रह्मांडाचे विलीनीकरण_*

*_३) वंश - याचा अर्थ आहे जीवनाचा क्रम अर्थात वंशावळी_*

*_४) मन्वंतर - याचा अर्थ वेगवेगळ्या १४ मनूंपासून सृष्टीचा विकास झाला, त्यांना मन्वंतर म्हणतात._*

*_५) वंशचरित याचा अर्थ राजामहाराजांच्या अनेक पिढ्यांच्या - वंशावळीचे वर्णन._*

_१५) वरील पाच विषयांव्यतिरिक्त खालील विषयांचा पुराणात समावेश करण्यात आला आहे._

_अ) स्मृतिधर्म  १) वर्णाश्रम धर्म, २) आचार, ३) अहमिका, ४) भाषाभाष्य, ५) विवाह, ६) अशौच, ७) श्राद्ध, ८) द्रव्यशुद्धी, ९) पताका, १०) प्रायश्चित्त, ११) नरक, १२) कर्मविपाक, १३) युगधर्म._

_ब) व्रतधर्म - व्रत ठेवणे, पर्व पाळणे._

_क) क्षेत्रधर्म - तीर्थयात्रा आणि_

_ड) दानधर्म - दान पुण्य करणे._

_१६) प्रत्येक पुराण एखाद्या विशिष्ट देवतेशी संबंधित आहे. त्याच देवतेच्या आराधना पद्धतीचे वर्णन त्यात सांगितलेले असते. जेणेकरून ती देवता प्रसन्न होईल. अठरापैकी पाच पुराण विष्णुपूजेसंबंधी जोडलेले आहेत. ते असे : १) विष्णू, २) भागवत ३) नारद ४) वामन ५) गरुड,_

_आठ पुराण शिवपूजेसबंधी आहेत ते असे : १) शिव २) ब्रह्म ३) लिंग ४) वराह ५) स्कंद ६) मत्स्य, ७) कुर्म, ८) ब्रह्मांड_

_एक पुराण - पद्म पुराण ब्राह्मणपूजेवर आधारित आहे._

_एक पुराण - सूर्यपूजेवर व_

_शेवटचे पुराण - गणेशपूजेवर आधारित आहे._

_१७) देवांनी वेळोवेळी घेतलेले अवतार व त्यांचे वेगवेगळे स्वरूप कोणते आहे, हाच पुराणातील मुख्य विषय आहे. पुराणांच्या म्हणण्यानुसार ईश्वर एक आहे; परंतु त्याचे स्वरूप वेगवेगळे आहेत. अर्थात तो दोन नावांला ओळखला जातो. ईश्वर जेव्हा मनुष्याच्या रूपात जन्म घेतो तेव्हा तो चमत्कार अवश्य दाखवितो._

_१८) अवतारवादाबद्दल विस्तृत वर्णन विष्णुपुराणात वर्णन करून सांगितलेले आहे. कारण विष्णूनेच वेळोवेळी मानवी किंवा पशुस्वरूपात धारणकरून काही ना काही चमत्कार अवश्य दाखविलेला आहे._

_१९) विष्णूने मानव व पशू ज्यात वेळोवेळी घेतलेल्या अवतारांची विस्तारपूर्वक चर्चा या पुराणांत करण्यात आली आहे._

_२०) नवनवीन विषय वेळोवेळी पुराणात समाविष्ट करण्यात आल्यामुळे पुराणांचे मूळस्वरूप पूर्णतः बदलून गेले आहे._

_२१) सुरुवातीला पुराणांवर ब्राह्मणेतरांचा (सुतांचा) एकाधिकार होता. या पुराणांची रचना अथवा पठणांशी ब्राह्मणांचा लेशमात्रही संबंध नव्हता._

_२२) परंतु एक वेळ अशी आली की, ब्राह्मणेतरांच्या (सुतांच्या) हातातून ब्राह्मणांनी हा पुराण वाचण्याचा व्यवसाय हिसकावून घेतला. अशाप्रकारे पुराणांचे रचनाकार बदलण्यात आले. आता ब्राह्मणेतरांऐवजी ब्राह्मण या पुराणांचे रचनाकर्ते बनले._

_२३) ब्राह्मणांच्या हाती पुराणे पडताच ब्राह्मणांनी यात नवनवीन विषय घुसडून पुराणांची नवीन आवृत्ती तयार केली. या ब्राह्मणांद्वारे पुराणांत आमूलाग्र बदल करण्यात आला व संपूर्ण मूळ विषय बदलून यात संशोधन करून नवीन विषय घालण्यात आले. जुने विषय बदलून नवीन विषय जोडले गेले व नाव मात्र जुनेच देण्यात आलेत. अशाप्रकारे क्रमवार बदल पुराणात करण्यात आले._

_२४) पुराणांचा निर्मितिकाल ठरविणे ही बाब मात्र कठीण आहे. जे जे ब्राह्मण साहित्य ब्राह्मणांनी लिहिले त्यात त्यांचा निर्माणकाल न लिहिण्यात ब्राह्मण जाणीवपूर्वक सावध होते. पुराणसुद्धा याला अपवाद नाही._

_२५) पुराणांच्या काळनिर्धारणासंबंधी मान्यताप्राप्त संकल्पनांनाच 'साक्ष' म्हणून आपणास आधार घ्यावयाचे आहे._

_२६) इतर ब्राह्मणवादी साहित्य लिखाणाच्या निर्मितिकाळावर बरेच संशोधन झालेले आहे. परंतु पुराणांवर मात्र संशोधन झालेले नाही. या बाबतीत विद्वानांनी वैदिक साहित्यावर जेवढे लक्ष दिले आहे तेवढे मात्र या पुराणांवर दिले नाही._

_२७) मिळालेल्या माहितीनुसार श्री 'हाजरा' यांनी पुराणांच्या काळनिर्मितीवर कार्य केलेले आहे. त्यांनी दर्शविलेला कार्यकाळ खालीलप्रमाणे आहे :_

*_पुराण_*                            _*स्थापनाकाळ*_

१) मार्कण्डेय पुराण - सन २०० ते ६०० च्या काळात

२) वायू पुराण       - सन २०० ते ५०० च्या काळात

३) ब्रह्मांड पुराण   - सन २०० ते ६०० च्या काळात

४) विष्णू पुराण  - सन १०० ते ३५० च्या काळात

५) मत्स्य पुराण - सन ३२५ ते ११०० च्या काळात

६) भागवत पुराण - सन ५०० ते ६०० च्या काळात

७) कुर्म पुराण - सन ५५० ते १००० च्या काळात

८) वामन पुराण - सन ७०० ते १००० च्या काळात

९) लिंग पुराण  - सन ७०० ते १००० च्या काळात

१०) वराह पुराण - सन ८०० मे १५०० च्या काळात

११) पद्म पुराण  - सन ६०० ते ९५० च्या काळात

१२) बृहन्नारदीय पुराण - सन ८७५ ते १००० च्या काळात

१३) अग्नि पुराण  - सन ८०० ते ९०० च्या काळात

१४) गरुड पुराण - सन ८५० ते १००० च्या काळात

 १५) ब्रह्म पुराण - सन ९०० ते १००० च्या काळात

१६) स्कंद पुराण - सन ७५० नंतर 

१७) ब्रह्म वैवर्त पुराण - सन ७०० नंतर

१८) भविष्य पुराण - सन ५०० नंतर.

             *_वरील सर्वेक्षणांवरून आपल्या लक्षात येईल की, पुराण साहित्याची रचना बुद्धानंतरच्या काळात झालेली आहे. या सर्वेक्षणावरून एक महत्त्वपूर्ण सत्य पुढे येते की, या सर्व साहित्याची रचना पुष्यमित्राच्या नेतृत्वात झालेल्या प्रतिक्रांतीच्या नंतर झालेली आहे._*

            *_वरील सर्वेक्षणावरून आणखी एक बाब पुढे येते. ती म्हणजे व्यासांनीच महाभारत लिहिले, व्यासानीच गीता लिहिली व व्यासांनीच पुराणाचे लिखाण पण केले. गीतेत अठरा अध्याय, महाभारताचे अठरा अध्याय व पुराणांची संख्या- देखील अठराच आहे. तर काय ही संख्या केवळ संयोगमात्र आहे? किंवा ही एक सुनियोजित अर्थात योजनाबद्धरीत्या बनविलेली किंवा पद्धतशीरपणे षड्यंत्र रचून बनविलेली योजना आहे? याचे उत्तर मिळण्यास आपणास प्रतीक्षा करावी लागेल._*

*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_संदर्भ :- कांती आणि प्रतिक्रांती_*

*_लेखक :- डॉ बाबासाहेब आंबेडकर_*

*_संकलन :- महेश कांबळे_*

*_दिनांक :- २५/११/२०२२_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2022/11/blog-post_26.html

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

No comments:

Post a Comment

कोलित सुत्त

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_कोलित सुत्त_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_41.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼  _'कोलित सुत...