Friday, 25 November 2022

बौद्ध धम्माची अवनती आणि ऱ्हास

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_बौद्ध धम्माची अवनती आणि ऱ्हास_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

             _भारतामधून बौद्ध धम्म नष्ट होण्याबद्दल सर्वांनाच अत्यंत आश्चर्य वाटते. ज्यांनी या विषयावर चिंतन केले आहे अशा अनेकांना दुःखही होते. *बौद्ध धम्म भारतातूनच नाहीसा झालेला आहे. परंतु चीन, जपान, ब्रह्मदेश, इंडोनिशिया, व्हिएतनाम, श्रीलंका, मलाया, सुमात्रा इत्यादी देशांत आजही अस्तित्वात आहे.*_

                _हे अचानक कसे काय घडले, हा एक महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. या प्रश्नाचे कुठलेही समाधानकारक उत्तर मिळत नाही. परंतु कुणाही व्यक्तीने या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर शोधण्याचादेखील प्रयत्न केला नाही. या विषयावर विचार करताना लोक एक महत्त्वाची बाब विसरतात, ही बाब बौद्ध धम्माची अवनती आणि ऱ्हासाच्या अंतराशी संबंधित आहे. बौद्ध धम्माच्या अवनतीची कारणे तर स्पष्ट आहेत. परंतु नाशाची कारणे तितकीशी स्पष्ट नाही._

             *_भारतात मुसलमानांच्या आक्रमणांमुळे बौद्ध धम्माचा नाश घडून आला यामध्ये कुठलीही शंका नाही._*

               _*इस्लामचा मूर्तिभंजक या स्वरूपात भारतात प्रवेश झाला. 'बूत' या शब्दाचा अरबी भाषेत मूर्ती असा अर्थ होतो. तथापि, बहुतेक लोकांना 'बूत' या शब्दाचा खरा अर्थ माहीत नाही. 'बूत' हा शब्द अरबी भाषेत 'बुद्ध' या शब्दाचा अपभ्रंश म्हणून वापरतात. अशाप्रकारे मुसलमान विचारवंतांच्या दृष्टिकोनातून या शब्दाच्या व्युत्पत्तीकडे पाहता मूर्तिपूजा आणि बौद्ध धर्म एक दुसऱ्याचे पर्यायवाचक शब्द आहेत. मुस्लिमांकरिता मूर्तिपूजा आणि बौद्ध धर्म एक दुसऱ्यांचे समानार्थी शब्द आहेत. म्हणून मूर्तिविध्वंस करण्याचा उद्देश बौद्ध धम्म नष्ट करणे असा करण्यात आला. मुस्लिम धर्माने भारतातूनच केवळ बौद्ध धम्माला नष्ट केले नाही तर जिथे कुठे बौद्ध धम्म अस्तित्वात होता त्या सर्व ठिकाणी या धर्माला नष्ट करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. मुस्लिम धर्माचा भारतात प्रवेश होण्यापूर्वी बौद्ध धम्म इराण, इराक, अफगाणिस्तान, गांधार, चीन आणि मध्य एशियाचा धर्म होता. एकप्रकारे बौद्ध धम्म हा आशियाचा धर्म होता. या सर्व देशांत मुस्लिम धर्माने बौद्ध धम्माला नष्ट केले.*_

         _या बाबतीत *विसेन्ट स्मिथ म्हणतात की, “सनातनी ब्राह्मणांद्वारा केल्या गेलेल्या अत्याचारापेक्षाही मुस्लिम आक्रमकांनी जे भीषण हत्याकांड केले ते कित्येकपटीनी मोठे होते आणि भारताच्या बहुतेक प्रांतांतून बौद्ध धम्म नष्ट होण्याला जबाबदार आहे.*_

              _या स्पष्टीकरणाने सर्वांचे समाधान होऊ शकत नाही. किंबहुना कुणाचेही याने समाधान होऊ शकत नाही. दोनही धमपैिकी केवळ एकच धर्म कसा शिल्लक राहिला? असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. हा प्रश्न तर्कसंगत आहे पण उपरोक्त सिद्धांताचे खंडन करू शकत नाही. ब्राह्मणवाद जिवंत राहील आणि त्यांचे अस्तित्व टिकून राहिले._

                 _परंतु याचा अर्थ हा नाही की, मुस्लिमांमुळे बौद्ध धम्म नष्ट झाला नाही. याचा अभिप्राय हा आहे की, त्या काळात अशी काही परिस्थिती होती, जिच्यामुळे मुस्लिमांच्या आक्रमणापुढे ब्राह्मणवाद टिकून राहणे शक्य होते. परंतु बौद्ध धम्म टिकून राहणे शक्य नव्हते, जे लोक या विषयावर गंभीरपणे विचार करतील त्यांना तीन कारणे मुस्लिम आक्रमणांपुढे ब्राह्मणवादाला टिकून राहण्याचे व बौद्ध धम्म नष्ट होण्याबद्दल आढळून येतील._

_*१) पहिली गोष्ट ही की, मुस्लिम आक्रमणांच्या वेळी ब्राह्मणवादाला राजाश्रय प्राप्त होता. बौद्ध धम्माला मात्र राजाश्रय प्राप्त नव्हता. परंतु सर्वाधिक महत्त्वपूर्ण गोष्ट ही की, बौद्ध धम्म पूर्णपणे नष्ट होईपर्यंत ब्राह्मणवादाला भारतात राजाश्रय प्राप्त होता.*_

_*२) दुसरी गोष्ट ही की इस्लामच्या तलवारीने बौद्ध भिक्षूंचे पूर्णपणे शिरकाण केले व बौद्ध भिक्षुपरंपरेला दुसऱ्यांदा पुनर्जीवित करता आले नाही. याउलट ब्राह्मणवादी पौरोहित्याला कायमचे नष्ट करणे मुस्लिमांना शक्य झाले नाही.*_

_*३) तिसरी गोष्ट ही की, भारतातील ब्राह्मणवादी शासकांनी बौद्ध बहुसंख्य जनतेवर अत्याचार केले. त्यांच्या या अत्याचार व छळापासून बचाव करण्याकरिता भारतातील बहुसंख्याक बौद्ध जनतेने मोठ्या संख्येने इस्लाम धर्माचा स्वीकार केला आणि त्यांनी बौद्ध धम्माला कायमचे सोडून दिले.*_

                    _वरील तीनही बाबींचे इतिहास समर्थन करतो. *मुस्लिम प्रभावाखाली येणारा भारतातील सर्वांत प्रथम प्रांत सिंध होता. पूर्वी या प्रांतावर शूद्र राजा राज्य करीत होता. परंतु एका ब्राह्मणाने हे राज्य बळकावले. या वंशाचे शासन सिंधीवर ७१२ पर्यंत चालले. इसवी सन ७१२ मध्ये इब्न कासिमद्वारा सिंधवर आक्रमण झाले. तेव्हा एका ब्राह्मण शासकाद्वारे ब्राह्मण धर्माला वाचविणे स्वाभाविक होते. सिंधचा शासक दाहिर होता. दाहिर हा ब्राह्मण वंशाचा होता.*_

                    _*स्वतः हुएनत्संगने आपल्या डोळ्यांनी पाहिले होते की, त्याच्या वेळी पंजाबमध्ये बौद्ध वंशाच्या राजाचे शासन होते. या वंशाने पंजाबवर ८८० पर्यंत शासन केले. नंतर हे राज्य 'लल्लिय' नावाच्या ब्राह्मणाने बळकावले व त्याने ब्राह्मणवादी धर्माला राजाश्रय दिला. या वंशाने पंजाबवर ८८० ते १०२१ पर्यंत शासन केले. यावरून हे दिसून येते की ज्यावेळी सुबुक्तगीन आणि मोहम्मद कासिमने पंजाबवर आक्रमण केले, त्यावेळी भारतातील बहुतेक शासक ब्राह्मण धर्मावलंबी होते. जयपाळ (९६०-९८०), आनंदपाल (९८० - १०००) व त्रिलोचनपाल (१०००-२१) हे सर्व ब्राह्मण धर्मावलंबी शासक होते. सुबुक्तगीन आणि मुहम्मद कासिम यांच्या आक्रमणाबद्दल आपण सर्वांनी खूपच वाचलेले आहे. मुहम्मद गझनीच्या आक्रमणांनी सुरूवात झालेले व शहाबुद्दीन घोरीच्या नेतृत्वात सुरू असलेले मध्य भारतावरील मुस्लिमांचे आक्रमण सतत सुरू होते. त्यावेळी मध्य भारतात हिंदू राज्ये होती. मेवाड (आता उदयपूर) वर गहलोत यांचे शासन होते. सांभर (आता बुंदी, कोटा आणि सिरोही) वर चौहानाचे राज्य होते. कन्नौजवर प्रतिहारांचे, धारवर परमारांचे, बुंदेलखंडवर चंदेलांचे, अन्हिलवाडवर चावडांचे तर चेदीवर कलचुरींचे शासन होते. या सर्व राज्यांचे शासक हे राजपूत राजे होते* व राजपूत हे काही कारणांमुळे ज्यांची मी नंतर चर्चा करणार आहे, ब्राह्मणवादी धर्माचे कट्टर समर्थक होते._

             _*या आक्रमणांच्या वेळी बंगाल दोन राज्यांत विभागलेला होता, पूर्व आणि पश्चिम. पश्चिम बंगालवर पाल वंशाच्या शासकाचे राज्य होते तर पूर्व बंगालवर सेन वंशाचे राज्य होते. पाल हे क्षत्रिय होते व ते बौद्ध धम्मावलंबी होते. सेन वंशाबद्दल मात्र मतभेद आहेत. अधिकांश विचारकांच्या मते, सेन हे प्रारंभी बौद्ध होते. नंतर ते ब्राह्मणी धर्माचे कट्टर समर्थक बनले.*_

        _मुस्लिम आक्रमणाच्या वेळी नर्मदा नदीच्या दक्षिणेकडे चार राज्ये अस्तित्वात होती :_

_*१) पश्चिमी चालुक्याचे दक्षिणी राज्य*_

_*२) चोलांचे दक्षिणी राज्य*_

_*३) पश्चिम तटावरील कोकणात सिलहाडांचे राज्य आणि*_

_*४) पूर्व तटावरील त्रिकलिंगचे गंग राज्य १२ व्या शतकात ही राज्ये अधिक शक्तिसंपन्न बनली.*_

         _१३ व्या शतकात तर ही राज्ये स्वतंत्र झाली. ही स्वतंत्र बनलेली राज्ये अशी :_

१) देवगिरींचे यादव 

२) वरंगलचे काकतीय 

३) हैलबिडचे होयासल 

४) मदुराचे पांडय तर 

५) त्रावणकोरचे चेर राज्य.

                _ही सर्व राज्ये सनातनी ब्राह्मण धर्माची समर्थक होती._

            _*भारतावर मुस्लिम आक्रमणांना सन १००१ मध्ये सुरुवात झाली. या आक्रमणाची झंझावाती लाट दक्षिणेत सन १२९६ मध्ये दक्षिण भारताच्या देवगिरी राज्यावर आदळली. सन १२९६ पर्यंत संपूर्ण दक्षिण भारत मुस्लिमांच्या वर्चस्वाखाली आला. ३०० वर्षांच्या मुस्लिम आक्रमणांच्या या काळात संपूर्ण भारतावर हिंदू किंवा ब्राह्मणवादी राजांची सत्ता होती. या वाताहतीच्या काळात ब्राह्मणी धर्माला या हिंदू राजाचे समर्थन प्राप्त हाते. परंतु मुस्लिमांद्वारे पराजित व नष्ट होण्याच्या मार्गावर असलेल्या बौद्ध धम्माला मात्र कुणाचाही आश्रय प्राप्त होऊ शकला नाही. अशा परिस्थितीत बौद्ध धम्म निरश्रित अवस्थेत होता. स्थानीय राज्यांची हेटाळणी व आश्रयाविना बौद्ध धम्म भारतात मृतप्राय झाला व मुस्लिम आक्रमकांच्या ज्वालांत जळून नष्ट झाला.*_

              _*मुस्लिम आक्रमणकारी लोकांनी ज्या बौद्ध विश्वविद्यालयांना लुटून नष्ट केले त्यामध्ये नालंदा, विक्रमशिला, जगदल, ओदान्तपुरी ही विश्वविद्यालये होती. देशातील या सर्व बुद्धविहारांना मुस्लिम आक्रमकांनी नष्ट केले. जीव वाचविण्याकरिता हजारोंच्या संख्येने बौद्ध भिक्षू भारताबाहेर नेपाळ, तिबेट व इतर देशांत पळून गेले.*_

           _*मुस्लिम आक्रमकांनी हजारोंच्या संख्येने बौद्ध भिक्षूंची कत्तल केली. या बौद्ध भिक्षूंची किती निर्घृणपणे मुस्लिम आक्रमकांद्वारे हत्या करण्यात आली, याचे वर्णन स्वतः मुस्लिम इतिहासकारांनी केलेले आहे. ११९७ मध्ये मुस्लिम सेनापतीने आक्रमणाच्या वेळी बिहारमध्ये कोणत्या व कशा प्रकारे हत्या केली गेली यांचे वर्णन विन्सेट स्मिथ यांनी केले आहे. "त्यांच्या मते, आक्रमणांकरिता प्रसिद्ध असलेल्या ज्या मुसलमान सेनापतीचे नाव प्रसिद्ध होते. त्याने एका झटक्यात येथील राजधानीवर ताबा मिळविला. त्याच वेळेला आक्रमणकर्त्या दलातील एकाशी इतिहासकराची भेट झाली. त्या माणसाद्वारे इतिहासकाराला हे माहीत झाले की, केवळ २०० घोडेस्वारांनी विहारातील एका किल्ल्यावर (विहारावर) बेधडक बिनविरोध मागील दारातून आक्रमण केले व तो संपूर्ण किल्लाच जिंकून घेतला. लुटीत यांना प्रचंड प्रमाणात संपत्ती प्राप्त झाली. आक्रमणकर्त्यांनी मुंडण केलेल्या ब्राह्मणांची अर्थात बौद्ध भिक्षूंची इतक्या मोठ्या प्रमाणात हत्या केली की, त्या संपूर्ण विहारातील पुस्तक वाचण्याकरीता एक भिक्षूदेखील आक्रमणकर्त्यांना उपलब्ध होऊ शकला नाही. नंतर आम्हाला कळले की, हे संपूर्ण विहार एक मोठे विश्वविद्यालय होते. हिंदी भाषेत महाविद्यालयाला 'विहार' म्हणतात.*_

             _अशा प्रकारे बौद्ध भिक्षूंचा मुस्लिम आक्रमणांद्वारे संहार करण्यात आला. या आक्रमकांनी मुळावरच घ्याव घातला. *बौद्ध भिक्षूंचा संहार करून इस्लामने बौद्ध धम्माची हत्या केली. हे एक मोठे संकट होते. जे बौद्ध धम्माच्या विनाशाला कारणीभूत बनले. प्रचलित विचारधारेप्रमाणे धर्माचा प्रसार केवळ प्रचाराद्वारेच होतो. जर प्रचार असफल ठरला तर धर्म नष्ट होतो. इस्लामच्या तलवारीने बौद्ध भिक्षूंवरच मोठा आघात केला. यामुळे तो नष्ट झाला किंवा भारताबाहेर निघून गेला. धर्माचा प्रकाश प्रज्ज्वलित करण्याकरिता कुणीही जिवंत राहिला नाही. निश्चितच हीच बाब ब्राह्मणी पौरोहित्यालादेखील लागू पडते. एवढ मोठ्या प्रमाणात नसेलही; परंतु काही प्रमाणात मात्र निश्चितच लागू आहे. व दोघातील अंतर हे या धर्माच्या संघटनेशी संबंधित आहे. या अंतरातील फरकामुळे ब्राह्मणी धर्म मुस्लिम आक्रमणांनंतरही टिकून राहिला. हे अंतर पुरोहित वर्गा संबंधित आहे. ब्राह्मणवादी पौरोहित्याचे एक व्यापक असे संघटन राहिलेले आहे.*_

           _रामकृष्ण भांडरकरांच्या मते, प्रत्येक ब्राह्मण कुठल्यांना कुठल्या वेदांच्या विशेष शाखेशी संबंधित असतो व त्याच्या घरातील संस्कार वेदातील सूत्रानुसार होत असतात. त्याच्याकरिता वेदांच्या श्लोकांना कंठस्थ करणे अनिवार्य असते ही बाब मध्य काळात लागू होती. परंतु बनारससह संपूर्ण देशात कुठेना कुठे ब्राह्मणवर्गाद्वारे वेदपठण होत असे व ही बाब आजतागायत चालत आलेली आहे._

            _आपल्या व्यवसायानुसार प्रत्येक वेदाचे ब्राह्मण हे दोन वर्गांत विभागलेले आहेत. गृहस्थ आणि पुरोहित गृहस्थ सांसारिक गृहकार्यात तर पुरोहित वेदांचे अध्ययन, पठण व अध्यापन कार्यात आणि धार्मिक कर्मकांडात मग्न असतो._

           _हे दोन्हीही वर्गातील लोक दररोज संध्यावंदन व सकाळ-संध्याकाळ पूजा- अर्चा करीत असतात. वेगवेगळ्या वेदांनुसार पूजा-अर्चादेखील वेगवेगळ्या असतात. परंतु गायत्री मंत्रांचे पठण पाच वेळा, नंतर अठ्ठावीस वेळा आणि शेवटी एकशे आठ वेळा आणि शेवटी आठ वेळा करणे ही सामान्य बाब असते. प्रत्येक धार्मिक पूजेच्या वेळी हे करणे आवश्यक ठरते._

              _याशिवाय प्रत्येक ब्राह्मण दररोज 'ब्रह्मयज्ञ' नावाचा धार्मिक अनुष्ठान करतो. यामध्ये अनेक संहिता, महाभारत, निरुक्त, खंड, ज्योतिष, शिक्षा, पाणिनी, याज्ञवल्क्य स्मृती व कणाद स्मृती, जमिनी, आणि बादरायणचे सूत्र इत्यादी पठणात सामील असतात._

              *_ही गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे की, धार्मिक पूजेसंबंधी ब्राह्मण पुरोहित व ब्राह्मण गृहस्थ यांच्यात जास्त अंतर नसते. गृहस्थ ब्राह्मण हा ब्राह्मण पुरोहितापेक्षा कोणत्याही बाबतीत कमी मानण्यात येत नाही. केवळ धार्मिक मंत्र आणि अनुष्ठानाच्या बाबतीत गृहस्थाने विशेष योग्यता प्राप्त केली नसल्यामुळे किंवा तो दुसऱ्या व्यवसायाशी संबंधित असल्यामुळे ब्राह्मण गृहस्थ हा पौरोहित्याची कामे करीत नसतो. अन्यथा बहिष्कृत नसलेला कुठलाही ब्राह्मण गृहस्थ, पुरोहित होण्यास योग्य मानला जातो. भिक्षूक हा वास्तविक पुरोहित असतो तर गृहस्थ हा संभावित पुरोहित असतो. अर्थात प्रत्येक ब्राह्मण हा पुरोहित बनू शकतो. पुरोहित बनण्याकरिता ब्राह्मणाला कुठल्याही प्रशिक्षणाची अथवा दीक्षेची आवश्यकता नसते. केवळ पुरोहित बनण्याची इच्छाच त्याला पर्याप्त आहे. अशाप्रकारे ब्राह्मणी धर्मात ब्राह्मणांकरिता पौरोहित्य कधीही न संपणारी बाब आहे. प्रत्येक ब्राह्मण हा पुरोहित बनू शकतो आणि त्याला आवश्यकता पडल्यास पौरोहित्याच्या कामाकरीता प्रवृत्त केले जाऊ शकते. वाईटतील बाईट ब्राह्मण व्यक्तीलादेखील या कामापासून परावृत्त करता येत नाही. परंतु बौद्ध धम्मात मात्र असे शक्य नाही. धार्मिक कार्य करण्याकरिता बौद्ध संस्कारित होण्याची अट आवश्यक ठरते. बौद्ध भिक्षूंच्या संहारानंतर धार्मिक संस्कार करणाऱ्या भिक्षूंचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे धार्मिक संस्कार करणे जवळपास नाहीसे झाले. गरज असताना गृहस्थ बौद्धांनी संस्कारविधी करण्याचा काही प्रमाणात प्रयत्न केला. परंतु हा वर्ग समाजावर आपला प्रभाव पाडू शकला नाही. विविध व्यवसायांत गुंतल्यामुळे हा गृहस्थ बौद्धांचा वर्ग बौद्ध धम्माला ऱ्हासापासून वाचवू शकला नाही._*

              _*हरप्रसाद शास्त्री यांच्या मते, “भिक्षूंच्या अभावामुळे बौद्ध पौरोहित्यात मोठा बदल घडून आला. ज्यांचे परिवार होते अशा विवाहित लोकांना भिक्षूंचे स्थान घेण्याचा प्रयत्न केला आणि भिक्षूंचे धार्मिक कार्य संपन्न करवयास सुरुवात केली. काही वर्षापर्यंत ही परंपरा चालत राहिली. धार्मिक कार्ये करीताना ही मंडळी मूर्तिकार, शिल्पकार, वाढई, गवंडी इत्यादी जीविकोपार्जनाचे धंदेदेखील करीत. पुढे अशा कारागीर लोकांची संख्या खूपच वाढली. हेच लोक धार्मिक कार्ये करू लागली. व्यवसायामुळे गुंतून पडल्यामुळे या लोकांकडे स्वतःच्या ज्ञानार्जनाकरिता, गंभीर चिंतन आणि विचार करण्याकरिता तसेच ध्यानसाधनेसाठी वेळच मुळी शिल्लक नसे. किंबहुना हे लोक धर्माचरणात गंभीर नव्हते.*_

             _पतनाच्या अवस्थेकडे झुकलेल्या बौद्ध धम्माच्या वाढीची अपेक्षा मुळीच या लोकांकडून केली जाऊ शकत नव्हती. बौद्ध धम्मात काही सुधार करून त्याला श्रेष्ठ स्थान प्राप्त करून देण्याचे सामर्थ्य या लोकांत नव्हते._

              _ही बाब स्पष्ट आहे की हे नवीन धर्माचरणी लोक मूळ भिक्षूंच्या तुलनेत फारच हलक्या दर्जाचे असून ज्ञानवान तर मुळी नव्हतेच. बौद्ध धम्माचे कट्टर विरोधक ब्राह्मण पुरोहिताच्या तुलनेत हे नवीन लोक कमजोर होते. कारण की ब्राह्मणांचा वर्ग हा चतुर आणि धूर्त होता._

                 _ब्राह्मणाच्या तुलनेत हा वर्ग कमजोर ठरला. अर्थात ब्राह्मणांचा वर्ग हा धूर्त लोकांचा वर्ग होता. ब्राह्मण धर्म विनाशापासून कसा बचावला आणि बौद्ध धम्म कसा विनाश पावला याला कारण हे नाही की ब्राह्मण धर्म बौद्ध धम्मापेक्षा श्रेष्ठ आहे. तर याला जर काही कारण असेल तर दोन्ही धर्मांतील पौरोहित्याचे विशिष्ट चरित्र आहे. *बौद्ध धम्म जनसामान्यातून नष्ट झाला. याला कारण त्यातील बौद्ध पौरोहित्याचे जनसामान्यांना पुनरुज्जीवन करणे शक्य होऊ शकले नाही.* परंतु पुरोहिता ब्राह्मणी धर्म पराजित झाल्यावरही तो पूर्णपणे नष्ट होऊ शकला नाही. प्रत्ये जीवित ब्राह्मण हा पुरोहित व पुजारी बनला आणि प्रत्येकाने ब्राह्मण स्थान ग्रहण केले. *बहुसंख्याक बौद्ध जनतेद्वारे इस्लाम धर्माचा स्वीकार हा सुद्धा बौद्ध धम्माच्या -हासाला कारणीभूत ठरला, यामध्ये कुठलीही शंका नाही.*_

                _१९३८ साली इलाहाबाद येथे झालेल्या भारतीय इतिहास काँग्रेसच्या 'प्रारंभिक आणि मध्यकालीन राजपुतांचा अभ्यास' या विषयावर अधिवेशनान अध्यक्षीय भाषणात प्रो. सुरेंद्रनाथ सेन म्हणाले होते की, भारताच्या मध्यकालीन इतिहासासंबंधी दोन समस्या आहेत. ज्यांचे समाधानकारक उत्तर आतापर्यंत मिळू शकलेले नाही. त्यांनी ज्या दोन समस्यांचा उल्लेख केला, त्यातील एक राजपुतांच्या उत्पत्तीशी संबंधित आहेत. तर दुसरी, भारतात मुस्लिम जनसंख्येच्या विस्ताराशी संबंधित आहे. दुसऱ्या समस्येसंबंधी ते म्हणाले,_

                _'मला एका प्रश्नावर बोलण्याची अनुमती मिळाली पाहिजे, ज्याचा संबंध पुरातत्त्वाच्या विषयाशी नाही. भारतातील मुस्लिम जनसंख्येच्या विस्ताराबद्दल स्पष्टीकरण होणे आवश्यक आहे. सामान्यपणे असे म्हटले जाते की, मुस्लिमांच्या विजय अभियानाबरोबर मुस्लिम जनसंख्येचा विस्तार होत गेला आणि ज्या लोकांना मुस्लिम धर्मात धर्मांतरित करण्यात आले, त्यांच्यावर जबरदस्ती करण्यात आली. जेव्हा आम्ही सीमांत प्रांतात आणि पंजाबातील मुस्लिमांची बहुसंख्य व मुस्लिम बलाधिक्य पाहतो, तेव्हा या विचारांना आधार मिळतो. परंतु या सिद्धांताच्या आधारावर पूर्व बंगालमधील मुसलमानांच्या भारी बहुसंख्याकतेचे गूढ मात्र लक्षात येत नाही. या गोष्टीची सहज संभावना आहे की, कुंषाणांच्या काळापासूनच उत्तर- पश्चिमी सीमांत प्रांतात तुर्क स्थायिक झालेत आणि त्यांनी मुस्लिम धर्माचा स्वीकार केला. नवविजेत्यांशी यांचा धर्मबांधव या नात्याने आलेल्या संबंधाचा हा आधार सांगितला जाऊ शकतो. परंतु पूर्व बंगालमधील मुसलमानांचा तुर्क व अफगाणी लोकांशी निश्चितच संबंध नाही तर इतर दुसऱ्याच कारणाने या क्षेत्रातील हिंदूंनी मुस्लिम धर्माचा स्वीकार केला. ही अन्य कारणे कोणती' प्रा. सेन यांनी मुस्लिम ग्रंथात मिळत असलेल्या या कारणांचा उल्लेख केलेला आहे. ते सिंधचे उदाहरण देतात. याबद्दल प्रत्यक्ष प्रमाण उपलब्ध आहेत. ते म्हणतात,_

         _*'चचनामा' नुसार ब्राह्मण शासनकांच्या आधी सिंधमधील जनतेने अनेक प्रकारचा अपमान व संकटांना सहन केले. परंतु जेव्हा अरबांनी सिंधवर आक्रमण केले तेव्हा त्यांनी अरबांना पूर्ण साह्यता दिली. दाहिरचा वध झाल्यानंतर तेथे मुस्लिम सत्ता स्थापन झाल्यावर तेथील बौद्धांची फारच निराशा झाली. अरब लोक त्यांचे अधिकार, विशेषाधिकार तथा सुविधांबद्दल उदासीन होते. एवढेच नव्हे तर नवीन शासनसत्तेत हिंदूंशी योग्य व्यवहार करण्यात आला. या संकटातून मुक्ती प्राप्ती करण्याकरिता एकमात्र उपाय होता. तो म्हणजे मुस्लिम धर्माचा स्वीकार कारण की धर्मांतरित लोकांना मुस्लिम लोकांचे सर्व अधिकार, विशेषाधिकार आणि सर्व सुखसुविधा सहजतेने उपलब्ध होऊ शकतात. म्हणून सिंधच्या बहुसंख्याक बौद्ध लोकांनी मुस्लिम धर्माचा स्वीकार केला आणि ते मुस्लिम बनते. यानंतर प्रा. सेन एक महत्त्वपूर्ण गोष्ट सांगताना म्हणतात, "ही काही अचानक घडलेली गोष्ट नव्हे की, पंजाब, काश्मीर, बिहारच्या आसपासच्या जवळील जिल्हे, उत्तर पूर्वजिल्हे जिथे, मुस्लिमांच्या सत्तेची स्थापना झाली. ते त्यापूर्वी ह्या भागातील शक्तिशाली बौद्ध केंद्रे होती. " येथील बौद्धांनी, हिंदूच्या तुलनेत राजनीतिक प्रलोभनांना बळी पडून सहजतेने धर्मपरिवर्तन राजनीतिक प्रतिष्ठा आणि स्थिती प्राप्त करण्याकरिता केला असेल. असे म्हणणे देखील योग्य नाही.*_

                 _ज्या कारणांमुळे बौद्धांनी बौद्ध धम्म त्यागून मुस्लिम धर्माचा त्याग केला त्या कारणांचा अद्याप शोध लागायचा आहे. ब्राह्मण राजाद्वारे बौद्धांचा छळ होणे एवढेच कारण याकरिता पुरेसे नाही. परंतु *हेसुद्धा प्रमुख कारण असू शकते की ब्राह्मण राजाद्वारा बौद्धांचा छळ झाला असेल. आपल्याकडे बौद्धांचा छळ करणाऱ्या दोन राजांची उदाहरणे प्रमाणासह उपलब्ध आहेत.*_

             _त्यामध्ये *पहिले नाव 'मिहिरकुल' यांचे आहे. हा हूण होता. हुणांनी भारतावर ४५५ मध्ये आक्रमण करून उत्तर भारतात आपले राज्य स्थापन केले. पंजाबात हुणांनी साकल येथे (स्यालकोट) आपली राजधानी बनविली. मिहिरकुलाने जवळपास ५२८ पर्यंत शासन केले. विनसेंट स्मिथ म्हणतो की, पूर्ण भारतीय इतिहासात मिहिरकूलचे वर्णन क्रूर, अत्याचारी व रक्तपिपासू असे केले गेले आहे. सर्वसाधारण क्रूर आणि कठोर प्रमाणात असलेल्या आक्रमणकत्यपेिक्षाही हूण हे अधिक क्रूर हिंसक होते. शांततापूर्ण बौद्ध धम्माच्या विरुद्ध मिहिरकुल याने शत्रुत्व अंगीकारले व बौद्ध स्तूप व विहारांना नष्ट करून तेथील संपत्ती लुटून टाकली.*_

                *_दुसरा राजा पूर्व भारतातील शशांक होता. त्याने सातव्या शतकाच्या प्रथम दशकात राज्य केले. शशांक हा हर्षवर्धनबरोबर झालेल्या लढाईत पराजित झाला त्याच्याबाबत विन्सेंट स्मिथ म्हणतो, “शशांक हा हर्षवर्धनाच्या भावाचा खुनी होता. हा संभवतः गुप्त वंशान शासक होता. हा शिवाचा उपासक असून बौद्ध धम्माबद्दल घृणा बाळगीत अर बौद्ध धम्माला नष्ट करण्याचा याने सर्वप्रकारचा प्रयत्न केला. एका आख्यायिकेनुसार त्याने बुद्धगया येथील बोधिवृक्षाची मुळे खोदून काढली व त्यांना जाळून टाकले. या बोधिवृक्षावर अशोकाची फार श्रद्धा व भक्ती होती. शशांकने पाटलीपुत्र येथील बुद्धाचे पदचिन्ह असलेली शिलादेखील फोडून टाकली. भिक्षुकांचा छळ केला. त्यामुळे भिक्षू घाबरून इकडे तिकडे पळाले. भिक्षूंचा पाठलाग याने नेपाळपर्यंत केला._*

               *_सातवे शतक हे भारतात धार्मिक अत्याचार आणि छळाचे शतक म्हणून गणले गेले आहे. त्यामुळे बौद्ध धम्माचा नाश झाला. हा अत्याचार आणि छळ मुसलमानांच्या आक्रमणांपर्यंत अव्याहत सुरू राहिला. या गोष्टींचे अनुमान या तर्कावरून लावता येते की उत्तर भारतातील शासक राजे लोक हे ब्राह्मण व राजपूत होते. हे दोघेही बौद्ध धम्माचे शत्रू होते. जैनांचादेखील असाच छळ १२ व्या शतकात 'गुजरातचा शैव' शासक अजयदेव याने केला. या बाबतीत अनेक उदाहरणे इतिहासातील देता येतील._*

            *_अशाप्रकारे यामध्ये आता कुठलाही संशय राहात नाही की, बौद्ध धर्माच्या हासाला कारण बौद्धांद्वारे इस्लामचा स्वीकार करणे हे आहे. या मार्गाचा स्वीकार त्यांनी ब्राह्मणवादाच्या अत्याचार व छळापासून बचावण्यासाठी केला. त्या वेळेला जर कोणते संकट असेल तर ते म्हणजे ब्राह्मणवाद हेच होय._*


*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_संदर्भ :- कांती आणि प्रतिक्रांती_*

*_लेखक :- डॉ बाबासाहेब आंबेडकर_*

*_संकलन :- महेश कांबळे_*

*_दिनांक :- २४/११/२०२२_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2022/11/blog-post_24.html

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

No comments:

Post a Comment

कोलित सुत्त

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_कोलित सुत्त_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_41.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼  _'कोलित सुत...