🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_बुद्ध आणि त्यांचा सुधारणावादी दृष्टिकोन_*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
_हिंदू समाजाबद्दल बोलताना *सर टी. माधवराव* म्हणतात, "हिंदू समाजाप्रमाणे जो कोणी आचरण करील, पाहील व विचार करेल, त्याला एक गोष्ट गंभीरपणे लक्षात येईल की, हिंदू धर्माला सोडून पृथ्वीवरील कोणत्याही धर्मात त्यांच्या इतका सामाजिक वाईटपणा नसावा जो त्यांनी स्वतःच निर्माण केलेला आहे."_
_वरील विचार खऱ्या अर्थाने आणि अतिशयोक्तीशिवाय हिंदू समाजात सुधारणेच्या गरजेचे प्रतिपादन करतो. *समाज सुधारणेच्या बाबतीत प्रथम क्रांतिकारी समाज सुधारक व त्यातही श्रेष्ठ असे तथागत गौतम बुद्ध होत. समाज सुधारणेचा इतिहास हाच मुळी बुद्धापासून सुरू होतो. किंबहुना समाज सुधारणेचा इतिहास हा बुद्धाचा इतिहास सांगितल्याशिवाय अपूर्ण आहे.*_
_इ.स. पूर्व ५६३ मध्ये सिद्धार्थाचा जन्म नेपाळजवळील कपिलवस्तू येथे राजघराण्यात झाला. आर्यातील सामाजिक आणि धार्मिक वाईट चालीरीतींना कंटाळून बुद्धाने गृहत्याग केला. त्या वेळच्या दोन सुप्रसिद्ध ज्ञानी तत्त्ववेत्त्यांकडून बुद्धाने शिक्षा ग्रहण केली. वयाच्या ३५ व्या वर्षी बुद्धाला ज्ञान प्राप्त झाले. जीवनाच्या ४५ वर्षांपर्यंत बुद्धाने आपल्या धर्माचा प्रचार आणि प्रसार केला._
_सुखी जीवनाकरिता जीवनाचा मापदंड म्हणून नैतिक आचरण आवश्यक आहे. अशी बुद्धाची शिकवण होती. समाजाच्या विकासाकरिता बंधुतेबरोबरच लोकतांत्रिक भावनांची वृद्धीसुद्धा आवश्यक आहे असा बुद्धाचा उपदेश होता._
_*बुद्धाचे वर्णन एक श्रेष्ठ ब्राह्मणने केले आहे. पूज्य गौतम दोन्हीही कुळांकडून श्रेष्ठ कुलीन, विशुद्ध वंशाचे, दिसायला सुंदर आणि आकर्षक, विश्वासपात्र, गौरवर्णीय, प्रभावशाली व्यक्तिमत्त्व असलेले, उत्तम सद्गुणांनी युक्त, मधुर व शांत व संयमित वाणीचे, स्थिरचित असलेले, सर्वांशी उत्तम व्यवहार करणारे, अहंकाररहित, मनमिळावू आणि जसे बोलतील तसे वागणारे होते.*_
_त्यांच्या बाबतीत सर्वांना आकर्षित करणारी जर कुठली गोष्ट असेल तर सर्व सुखसंपन्नता, धनसंपत्ती, ऐश्वर्य, राजपाट असतानादेखील तारुण्याच्या अवस्थेत या सर्व सुखांचा त्याग करून संसारत्याग केला व जीवन पत्करले. अशाप्रकारचे जीवन जगण्यासाठी फारच दृढनिश्चय आणि धैर्याची आवश्यकता असते._
_*बुद्धाच्या बाबतीत म्हटले जाते की, सर्व मानव, प्राणिमात्र, देवलोक इत्यादीच्या सुखाकरिता बुद्धाने जीवन समर्पित केले होते. बुद्धाच्या व्यक्तिमत्त्वाची छाप तत्कालीन समाजावर कायमची पडली. ती इतकी की, आजतागायत भारतीय समाजावर कायम आहे.*_
_*बुद्धाचा धम्म लवकरच भारतात प्रसार पावला. थोड्याच काळात तो भारताचा राष्ट्रीय धर्म बनला. केवळ भारतापुरता मर्यादित न राहता जगाच्या सर्व भागात या धर्माचा प्रसार झाला. सर्व जाती व वंशाच्या लोकांनी याचा स्वीकार केला. एवढेच नव्हे तर अफगाणिस्तानच्या लोकांनीसुद्धा बौद्ध धम्म स्वीकारला. केवळ आशिया खंडापुरताच मर्यादित न राहता या बाबीचे प्रमाण मिळते की, बौद्ध धम्माचा प्रसार ब्रिटनपर्यंत झाला होता.*_
_*बुद्धांच्या धम्माचा इतका प्रसार होण्याची कारणे कोणती असेल तर ती म्हणजे बुद्धाचा धम्म हा मानवतावादी असून मैत्री, बंधुता, अहिंसा आणि नैतिक शीलाचरणावर आधारलेला होता.*_
_तत्कालीन आर्य समाज सामाजिक, धार्मिक आणि व्यक्तिगत दुराचरणाच्या निकृष्ट स्तराला पोचलेला असल्यामुळे बुद्धाच्या शिकवणीने समाजात एक क्रांतीच घडून आली._
_याप्रसंगी तत्कालीन आर्य समाजातील वाईट चालीरीतींचा उल्लेख करणे आवश्यक आहे._
_यज्ञात पशूंचा बळी हा ब्राह्मणांचा जीवकोपार्जनाचा मुख्य धंदा होता. या यज्ञाद्वारे ब्राह्मण देवांना प्रसन्न करीत._
अशा पारंपरिक यज्ञाची संख्या २१ होती. या २१ यज्ञांना सात सात याप्रमाणे तीन वर्गात विभागण्यात आलेले होते.
*_१. पहिल्या प्रकारच्या यज्ञात दूध, दही, धान्य व तूप इत्यादींची आहुती देण्यात येत असे._*
_*२. दुसऱ्या प्रकारच्या यज्ञात सोमची (मद्य) आहुती देण्यात येत असे.*_
*_३. तिसऱ्या प्रकारच्या यज्ञात जीवांचा बळी देण्यात येत असे._*
_हे यज्ञ अल्पावधी किंवा दीर्घकाळ एक वर्षापर्यंत चालत. 'यज्ञ केल्याने यज्ञकर्त्यांसोबत त्याच्या पितरांचासुद्धा उद्धार होतो. त्याचबरोबर यज्ञकर्त्यांस वैभव प्राप्तीसोबतच स्वर्गलाभ पण होतो असा तर्क लावून ब्राह्मण यज्ञाचे समर्थन करीत._
_बहुतेक यज्ञ ब्राह्मणवर्ग हे पृथ्वीवरील उत्तम वस्तू प्राप्त करण्यासाठी करीत असत. लाभप्राप्तीशिवाय ब्राह्मण लोक यज्ञ करीत नसत. यज्ञ करून आपण समाजाला मूर्ख बनवीत आहोत हे या पुरोहित ब्राह्मण वर्गाला माहीत होते. प्रत्येक यज्ञानंतर पुरोहितांना दक्षिणा म्हणून दान वाटण्यात येत असे. दक्षिणेसंबंधी ब्राह्मण पुरोहितांचे नियम स्पष्ट असत. दक्षिणा व दान घेण्याच्या हक्काचे ब्राह्मण पुरोहित निर्लज्जपणे समर्थन करीत. केवळ दक्षिणा उकळण्याच्या हेतूनेच ब्राह्मण यज्ञ करीत. या यज्ञात दान स्वरूपात ब्राह्मणांना मूल्यवान वस्त्र, गायी, घोडे आणि सोनं प्राप्त होत असे. यज्ञकत्यनि ब्राह्मनांना केव्हा काय दान द्यावयाचे आहे याचा स्पष्ट उल्लेख केलेला असे._
_कर्मकांडाद्वारे दक्षिणा प्राप्त करण्याकरिता यज्ञाचे जाळेच संपूर्ण समाजावर ब्राह्मणांनी पसरविले होते. या जाळ्यात सामान्य जनता अलगद फसत असे. यज्ञ करणाऱ्यावर यज्ञाचा बोजा पडत असे, हे यावरून लक्षात येते की, एका यज्ञात दानस्वरूपात देण्यात येणारी दक्षिणा म्हणून एक हजार गायींचा उल्लेख एके ठिकाणी आलेला आहे. एवढ्या मोठ्या लाभाच्या लालचीने ब्राह्मण पुरोहित घोषणा करीत की, जो एक हजार गायी दान देईल, त्याला स्वर्ण लाभ होईल. या बाबतीत ब्राह्मण पुरोहितांचा तर्क असे की देवदेवतांना प्रसन्न करताना देवतासुद्धा पुरस्काराची मागणी करतात. तेव्हा हा पुरस्कार दानस्वरूपात घेण्याचा अधिकार ब्राह्मणांना आहे._
_जीवांचे बळी देणाऱ्या यज्ञाला, यज्ञात प्रमुख स्थान प्राप्त होत असे. असे यज्ञ फार खर्चिक व हिंसक असत. या *यज्ञात पाच प्रकारच्या जीवांचा बळी देण्यात येत असे. यात मनुष्यबळीला प्रमुख स्थान होते. परंतु नरबळी देणे ही फार खर्चिक बाब होती. नरबळी देण्याबाबत हा नियम होता की नरबळी हा ब्राह्मण किंवा शूद्र वर्गातील नसावा तर तो क्षत्रिय व वैश्य वर्गातील असावा. त्या वेळच्या कीमतीनुसार एका मुनष्याचे मूल्य एक गायी इतके होते; शिवाय नरबळी देणाऱ्यास बळींचा वध करून बळींचे मांस खाण्याचा नियमदेखील होता.*_
_मनुष्यबळीनंतर दुसरे स्थान घोड्याचे होते. अश्वबळी देणेसुद्धा फार खर्चिक बाब होती. कारण की, आर्यांच्या सैन्य अभियानात घोड्याला महत्त्वपूर्ण वाहकाचे स्थान होते. घोड्याचा बळी देणे म्हणजे फार मोठे नुकसान करणे होय हे आर्यांना माहीत होते. अश्वबळी देण्यात आणखी एक संकट होते ते म्हणजे घोड्याचा वध ही फार हिंसक बाब होती. सोबतच *अश्वमेध यज्ञ करणाऱ्याच्या पत्नीला घोड्याशी मैथुनदेखील करावा लागत असे.*_
_सर्वसाधारणपणे कृषिकार्यात उपयोगी असणाऱ्या पशूंचाच यज्ञात बळी देण्याचे प्रचलन वाढले. त्यात गायी आणि बैल प्रामुख्याने असत._
*_कौशलनरेश प्रसेनजित याने करावयाच्या एका यज्ञात बळी म्हणून पाचशे गायी, पाचशे बैल, पाचशे सांड व पाचशे बकरे आणि पाचशे मेंढ्या खांबांना बांधण्यात आल्या. या सर्व पशूंना बळी देण्याच्या कामी जे सेवक चाकरी बजावीत होते, त्या सर्व सेवकांच्या डोळ्यांतून अश्रू वाहात होते. हे बळीयज्ञ एक प्रकारे उत्सवासारखे साजरे करण्यात येई. ब्राह्मणांना भाजलेल्या मांसाव्यतिरिक्त मादक पेयसुद्धा भरपूर प्रमाणात उपलब्ध होत असे. सोम व सुरा ही दोन्ही प्रकारची मद्ये ब्राह्मणांना देण्यात येत._*
_जवळपास सर्वच यज्ञात जुगार खेळण्यात येत असे व त्यातही असामान्य गोष्ट म्हणजे आसपासच्या परिसरात खुलेआम सर्रास संभोग चालायचे._
*_यज्ञ हे ब्राह्मणांच्या अय्याशीचे साधन बनले होते व त्यात कुठलीही नैतिकता आणि धर्म शिल्लक राहिलेला नव्हता. अर्थात तत्कालीन आर्य समाज हा सर्वांत घृणित अशा सामाजिक, धार्मिक आणि आध्यात्मिक व्याभिचारामध्ये गुरफटून गेला होता._*
_*समाजाची निकृष्टावस्था बघता तत्कालीन समाजात समाज सुधारणेची आवश्यकता भासत होती. या बाबतीत सर्वप्रथम समाज सुधारणेचा प्रयत्न केला तो तथागत गौतम बुद्धाने.*_
_भारतात सामाजिक सुधारणेचा इतिहासच मुळी गौतम बुद्धापासून सुरू होतो. किंबहुना *कोणताही समाज सुधारणेचा इतिहास, बुद्धाचा इतिहास सांगितल्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही.*_
_*व्यक्तिगत नैतिकतेचे आचरण हाच मनुष्याच्या जीवनाचा खरा मापदंड आहे अशी बुद्धाची शिकवण होती. तत्कालीन समाजाला बुद्धाचे विचार अभिनव व क्रांतिकारी वाटले.*_
_*पवित्र जीवनाचे उदाहरण प्रस्तुत करूनच बुद्ध थांबले नाही तर समाजातील प्रत्येक स्त्री-पुरुषाचे चारित्र्य निर्माण व्हावे असे बुद्धाला वाटत असे. तत्कालीन आर्य समाजाला माहीत नसलेल्या दीक्षाविधीची सुरुवात बुद्धाने केली ज्याद्वारे लोकांचे मार्गदर्शन होईल. दीक्षा घेणाऱ्यांना बुद्धाद्वारे देण्यात येणाऱ्या नैतिक तत्त्वांचे पालन करण्याची प्रतिज्ञा या दीक्षाविधीमध्ये घ्यावी लागत असे.*_
*_या अभिनव सिद्धांतांना पंचशील म्हणतात. ते पंचशील अशाप्रकारचे आहेत :_*
_*१) हत्या न करणे. २) चोरी न करणे. ३) खोटे न बोलणे. ४) व्याभिचार न करणे. ५) मादक पदार्थांचे सेवन न करणे.*_
_*हे पाच सिद्धांत सामान्य लोकांकरिता होते तर भिक्षूकरिता खालील पाच सिद्धांत होते :*_
*_१) नियमबाह्य भोजन न करणे._*
_*२) नृत्य, गायन, नाट्य अथवा तमाशे न पाहणे किंवा त्यात सहभागसुद्धा न घेणे.*_
_*३) फुलांच्या माळा, सुगंधित द्रव्य आणि अलंकाराचा उपयोग न करणे.*_
_*४) उंच आसने किंवा शय्येचा वापर न करणे.*_
_*५) धनसंग्रह न करणे.*_
_*हे जीवनाचे मापदंड सर्वांनाच लागू असावेत अशी बुद्धाची विचारसरणी होती.*_
*_या सर्वांमध्ये महत्त्वाचा सिद्धांत हा अहिंसेचा होता. केवळ जीव वाचविण्यासाठी या सिद्धांताचा उपयोग करायचा नाही असे नव्हे तर सृष्टीतील प्रत्येक सजीवाप्रती मानवाने संवेदनशील सद्भावनापूर्वक आणि मैत्रीपूर्वक राहावयास पाहिजे._*
_बुद्धाने इतर सिद्धांतांनादेखील असाच व्यापक आणि सकारात्मक दृष्टिकोन प्रदान केला._
_सुखी आणि संपन्न जीवनाकरिता दृढ संकल्प करून आणि सतत प्रयत्न करणे आवश्यक आहे. बुद्धाचे उपदेश हे केवळ नकारात्मक नव्हते तर ते सकारात्मक आणि रचनात्मकही होते. *बुद्धाच्या सिद्धांताचे अनुसरण करणाऱ्यावर बुद्ध संतुष्ट नव्हते तर त्या व्यक्तीने इतरांनादेखील प्रवृत्त करावे असा बुद्धाचा आग्रह होता.*_
_*अंगुत्तरनिकायामध्ये बुद्धाने एक चांगला मनुष्य आणि श्रेष्ठ मनुष्य यामध्ये भेद केलेला आहे. जो मनुष्य हत्या, चोरी, खोटे बोलणे आणि मादक पदार्थांचे सेवन करीत नाही त्याला चांगला मनुष्य म्हणावा; परंतु श्रेष्ठ मनुष्य त्यालाच म्हणावे जो वरील नियमांचे पालन स्वतः करतो आणि इतरांना पालन करावयास लावतो.*_
_*म्हणून म्हणतात की बौद्ध धम्माची दोन वैशिष्टे आहेत एक म्हणजे मैत्री आणि दुसरा विवेक हा होय.*_
_*मैत्रीपूर्ण व्यवहाराला जीवनात अत्यंत आवश्यकता आहे. हे बुद्धाला पूर्णपणे माहीत होते. म्हणून बुद्ध म्हणतात ज्याप्रमाणे एखाद्या लहान मुलाची आई आपल्या बाळाची काळजी करते, त्याचप्रकारे सर्व प्राणिमात्राबद्दल मनुष्याने व्यवहार केला पाहिजे.*_
_*कुणाबद्दलही मनात वैरभाव बाळगू नका, सर्व प्राणिमात्रांबद्दल दयाभाव ठेवा. संपूर्ण विश्वाप्रती सद्भावना ठेवा. मैत्रीपूर्ण आणि शत्रुताविहीन संबंधच जीवनाचा सर्वोत्तम आधार आहे हीच जीवनाची सर्वोत्तम जगण्याची पद्धती आहे. हाच खरा बुद्धाचा आदेश आहे.*_
*_सर्व प्राणिमात्राबद्दल व्यापक करुणाभाव संवेदना आणि प्रत्येक प्राणिमात्राबद्दल मैत्री बुद्धाच्या शिकवणीची विशेषता होती आणि जगातील इतर धर्मसंस्थापकांत बुद्धाची हीच विशेषता आहे._*
_*बुद्ध आपल्या वैशिष्ट्यपूर्ण शिकवणीमुळे जगातील बहुतेक भागांत आपल्या धर्माचा प्रसार करण्यात यशस्वी राहिले.*_
_*मैत्रीएवढे महत्त्व बुद्ध विवेकांना देत असत. बुद्धाचे ठाम मत होते की जीवनाची सुरुवात ज्ञानाने होते आणि जीवनाची समाप्ती विवेकाने होते. जगावे कल्याण करण्यासाठीच बुद्धाच्या जीवनाचे प्रयोजन होते. दु:खमुक्ती करण्यासाठीचा मार्ग म्हणजे अज्ञानाचा विनाश करणे होय.*_
_जीवनात जर सुख प्राप्त करावयाचे असेल तर ज्ञान आवश्यक आहे आणि याचा विवेकपूर्ण वापर करूनच मनुष्य सुखी होऊ शकतो._
_*बुद्ध सर्व लोकांना अलौकिक (देवी) शक्तीद्वारे एकदम सुखी करतील हा दावा बुद्धाने कधीच केला नाही. ज्याने त्याने स्वतःच स्वतःच्या प्रयत्नाद्वारे ज्ञानाच्या मार्गावर चालून उद्धार करून घ्यावयाचा आहे. बुद्धाने नैतिकतेवर फारच जोर दिलेला आहे. कारण की बुद्धाच्या मते नैतिकतेशिवाय ज्ञान हे व्यर्थ आहे.*_
_*खालील तीन कुप्रथांविरुद्ध बुद्धाने महत्त्वाचा भर दिला आहे.*_
*_१) बुद्धाने वेदांच्या अधिकार श्रेष्ठतेला (अपौरुषेयतेला) नकार दिला._*
*_२) धर्म म्हणून बळीप्रथेला बुद्धाने विरोध दर्शविला._*
_*३) जातिप्रथेला (वर्णव्यवस्थेला) बुद्धाने प्रखर विरोध केला.*_
_*आजच्यासारखी त्या काळी जातिप्रथा तितकीशी कठोर नव्हती. आंतरजातीय विवाहांवर प्रतिबंध नव्हता. व्यवहारात लवचीकता होती. आजच्यासारखी ती कठोर नव्हती. परंतु तत्कालीन समाजात जातिव्यवस्थेचा फैलाव झाला. विषमता ही या जातिव्यवस्थेचा आधार होती आणि याच जातिव्यवस्थे विरुद्ध बुद्धाने मोहीम उघडली. संपूर्ण समाजावर वर्चस्व गाजविणाऱ्या ब्राह्मणांच्या अहंकाराचे भगवान बुद्ध फार मोठे कट्टर विरोधक होते.*_
_*या सर्व बाबींचा पुरावा आपणांस कुटदंत सुत्त, अंबठ्ठ सुत्त, लोहित्त सुत्त आणि महाविगत राजाच्या गोष्टीवरून बुद्धाच्या नैतिक शिकवणुकीची आपणास कल्पना येते.*_
*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*
*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_संदर्भ :- कांती आणि प्रतिक्रांती_*
*_लेखक :- डॉ बाबासाहेब आंबेडकर_*
*_संकलन :- महेश कांबळे_*
*_दिनांक :- २३/११/२०२२_*
https://mikamblemahesh.blogspot.com/2022/11/blog-post_24.html
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
No comments:
Post a Comment