🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
_*जेष्ठ पौर्णिमा आणि भन्ते महिंद्र यांचे परिनिर्वाण?*_
_कृपया प्रसिद्धीस_
https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_25.html
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
_जेष्ठ पौर्णिमेनिमित्त फेसबुक आणि व्हाटसअपवर एक संदेश वाचण्यात आला कि, *जेष्ठ पौर्णिमा दिनी भन्ते महिंद्र यांचे परिनिर्वाण झाले.* ह्या माहितीच्या आधारे मी हि तीच माहिती सर्वांना दिली पण *पण मी देत असलेली माहिती चुकीची आहे हे आताच "महावंस साहित्याचा" अभ्यास करतांना लक्षात आले.*_
_जेंव्हा आपण महावंस या ग्रंथाचा अभ्यास करतो तेंव्हा....._
१. *_चॅप्टर १३ मधील गाथेत गाथा क्रमांक १८ सांगते कि, भन्ते महिंद्र यांचे लंकेत आगमन जेष्ठ पौर्णिमेला झाले._*
२. *_चॅप्टर २० मधील गाथा क्रमांक ३२/३३ या गाथेत स्पष्ट नमूद केले आहे की, "भन्ते महिंद्र यांचे परिनिर्वाण हे अश्विन पौर्णिमेच्या शुल्क पक्षाच्या आठव्या दिवशी झाले."_*
_कृपया अभ्यासकांनी वरील माहितीच्या आधारे आपण करीत असलेल्या चुकीला सुधारावे किंवा माझी माहिती हि कशी चुकीची आहे याबद्दल मार्गदर्शन करावे, हि नम्र विनंती._
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_लेखक : महेश कांबळे_*
*_संदर्भ : महावंस साहित्य_*
*_दिनांक : ११/०६/२०२५_*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
No comments:
Post a Comment