✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹
*_बुद्ध शिकवण काय आहे?_*
https://mikamblemahesh.blogspot.com/2025/03/blog-post_8.html
✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹
सज्जन पुरुष व स्त्रियांनो !
_'बुद्ध शिकवण काय आहे' या विषयावर आज माझे विचार आपणासमोर मांडण्याची सुसंधी मिळाल्यामुळे मी स्वतःला धन्य समजतो. आपले विचार मांडण्यापूर्वीच मी एक बाब स्पष्ट करु इच्छितो की मी विश्वविद्यालयातून उच्च शिक्षण घेतले नाही. तसेच आधुनिक विज्ञानाचेही मला तेवढे ज्ञान नाही, जितके एका साधारण मनुष्याला असू शकते. मी ना तर बुद्ध शिकवणुकीच्या दार्शनिक सिद्धातांचा पंड़ित आहे, ना मला पाली 'भाषेचे खूप ज्ञान आहे, ज्यात बुद्ध शिकवणुक तिपिटक ग्रंथात संग्रहित आहे. हो, काही प्रतिष्ठित विद्वान भिक्षूद्वारे ब्रह्मी भाषेत बुद्ध शिकवणुकीवर लिहिलेल्या काही टीका मी अवश्य वाचल्या आहेत. मी बुद्ध शिकवणुकीचे अध्ययन सैद्धांतिक दृष्टिकोनाने कमी, परंतु व्यावहारिक दृष्टिकोनाने अधिक केले आहे. त्यामुळे मला विश्वास आहे की आज मी जी व्यावहारिक माहिती देणार आहे, ती आपणाला सहजतेने कदाचितच प्राप्त होईल._
_मी हेसुद्धा स्वीकारतो की मी सध्या या विषयाचा एक विद्यार्थीच आहे. बुद्ध शिकवणुकीच्या विभिन्न प्रयोगांद्वारे प्रकृतीच्या स्वभावाच्या सत्यतेचा केवळ शोध घेत आहे. गृहस्थ तसेच एक उच्च सरकारी अधिकारी असल्यामुळे मला या कार्यासाठी खूप कमी वेळ मिळतो. या अल्प वेळातच मी आपले प्रयोग करत राहतो. हेच कारण आहे की माझी प्रगती खूप हळू आहे. त्यामुळे मी हा दावाही करु शकत नाही की मी जे काही सांगणार आहे ते पूर्णपणे सत्यच असेल. कदाचित ते बरोबरही असेल अथवा चूकही. परंतु हो, मी आपणाला इतका विश्वास अवश्य देऊ शकतो की मी जे काही सांगीन ते माझ्यातर्फे पूर्ण सत्य, सद्भावना आणि सखोल विश्वासानेच सांगीन._
*_भगवान बुद्धांनी 'कालाम सुत्ता'त म्हटले आहे -_*
१. *_"तुम्ही कोणतीही बाब केवळ यामुळे स्वीकारु नका की ती बाब ऐकलेली आहे,_*
२. *_केवळ यामुळे स्वीकारु नका की ती परंपरागत आहे आणि अनेक पिढ्यांनी ती मान्य केली आहे,_*
३. *_केवळ यासाठी स्वीकारु नका की ती अनेकांद्वारे सांगितली गेली आहे,_*
४. *_केवळ यासाठी स्वीकारु नका की या बाबीला प्रमाणित करण्यासाठी एखादे ऋषी प्रणित शास्त्र प्रस्तुत केले गेले आहे,_*
५. *_केवळ यासाठी स्वीकारु नका की ती बाब आमच्या मतांच्या आणि स्वभावाच्या अनुकूल आहे,_*
६. *_केवळ यासाठी स्वीकारु नका की सांगणारा आमचा गुरु आहे, पूज्य आहे._*
७. *_जेव्हा तुम्ही आपल्या अनुभवाने स्वतः जाणाल आणि तपासून घ्याल की ही बाब तर्क संगत आहे, तसेच सर्व लोकहितकारिणीही आहे, तरच ती स्वीकारा आणि त्यानुसार जीवन जगा."_*
_*त्यामुळे मी तुम्हाला विनंती करतो की जेव्हा मी दार्शनिक सिद्धांत सांगीन तेव्हा कृपया त्यांना तेव्हापर्यंत मानू नका जोपर्यंत आपणाला पूर्ण विश्वास बसणार नाही की ते तर्क संगत आहेत आणि व्यावहारिकही.*_
*_सब्ब पापस्स अकरणं, कुसलस्स उपसम्पदा।_*
*_सचित्त परियोदपनं, एतं बुद्धानसासनं ।।_*
*_सर्व पाप न करणे, कुशल (पुण्य) कार्यांचे संपादन करणे आणि चित्ताला निर्मल करणे, हीच सर्वे बुद्धांची शिकवण आहे._*
_धम्मपदाची ही गाथा, संक्षेपात, बुद्ध शिकवणुकीचे सार आहे. ऐकण्यात हे जितके सोपे वाटते, व्यवहारात तितकेच कठीण आहे. *बुद्ध सिद्धांतांना आपल्या जीवनात उतरविल्याविना कोणीही खरा प्रशिक्षणार्थी होऊच शकत नाही.* भगवान बुद्ध म्हणाले -_
_"ज्या परम सत्याचा मी स्वतः साक्षात्कार केला आहे, तेच तुम्हाला सांगितले आहे. याला स्वीकारा, धारण करा, यावर ध्यान भावना करा, याला प्रसारित करा, ज्यामुळे हा सद्धर्म देव-मनुष्यांच्या हितसुखासाठी चिरकाळापर्यंत स्थायी होईल."_
_यापूर्वी की मी भगवान बुद्धांच्या शिकवणुकींबाबत सांगू त्या शिकवणुकींबाबत ज्या बुद्ध शिकवणुकीच्या आधारशीला आहेत, मी आपणाला भगवान बुद्धांच्या जीवन कथेचा परिचय करवून देऊ इच्छितो. त्यासाठी आवश्यक आहे की मी आपणाला प्रथम बुद्ध मान्यतांच्या त्या पृष्ठभूमीची थोडीशी माहिती देऊ जी आपल्यापैकी पुष्कळांसाठी सर्वस्वी नवी व माहित नसणारी असेल. मी आपणाला विश्व, ब्रह्मांड, विभिन्न लोक, भुवन व प्राणी जगताच्या संबंधी बुद्ध मान्यतांचा संक्षिप्त परिचय करून देऊ इच्छितो. या परिचयात आपणाला खूप चिंतन करण्याला वाव मिळेल. परंतु मी आपणाला प्रार्थना करेन की आपण प्रथम शांतीपूर्वक ऐकून घ्यावे व प्रवचन संपल्यावर प्रश्नोत्तर आणि विचार-विमर्शाच्या वेळेपर्यंत धीर ठेवावा._
*_विश्वासंबंधी बुद्ध मान्यता या प्रकारे आहे -_*
_प्रथम *'ओकास लोक' (अवकाश लोक) आहे,* ज्यावर सर्व नाम व रुप-चेतन आणि जड आश्रित आहेत. हा असा लोक आहे, ज्यात नाम व रुपाचीच प्रधानता आहे, जे कार्य-कारणाच्या क्रमिक नियमांनी बांधलेले आहेत. *यानंतर आहे 'संस्कार लोक' (चित्तवृत्ती-चेतनांचा लोक) मनाद्वारे सृजनशील आणि निर्मित.* कायिक, वाचिक व मानसिक कर्माच्या साह्याने, मनाच्या सृजनात्मक शक्तींद्वारे, या मनोलोकाचे निर्माण होते. *तिसरा व अंतिम आहे 'सत्तलोक' जो मानसिक शक्ती व त्यातून उत्पन्न कर्मांद्वारे उत्पन्न दृश्य व अदृष्य सत्वांचा, प्राण्यांचा निवास लोक आहे.* हे तिन्ही लोक एक दुसऱ्यापासून वेगळे न होणारे आहेत, जणू एकातच तिन्ही सामावले आहेत. तिन्ही एक दुसऱ्यात मिळून जणू एकच होत आहेत._
_एक बाब जी आपणाला खूप रुचीकर वाटेल ती आहे- 'चक्रवाल' (ब्रह्मांडाचा निकाय म्हणजे ब्रह्मांडाचा परिघ) ची व्याख्या. प्रत्येक चक्रवालात ३१ भुवन आहेत. प्रत्येक चक्रवालाचे आपले मानव जगत आहे, आपले सौरमंडळ आहे व आपले विभिन्न प्राणी जगत आहे. या चक्रवालांची संख्या अगणित आहे, हे अनंत आहेत. यापैकी आमच्या जवळपास दहा हजार चक्रवाल तर असे आहेत जे बुद्धांचे 'ज्ञाती क्षेत्र' मानले जातात. जेव्हा भगवान गौतम बुद्धांनी कपिलवस्तूच्या जवळील महावनात लोक प्रसिद्ध महासमय सुत्ताची देशना दिली होती तेव्हा केवळ आमच्या चक्रवालाचेच नाही, तर या सर्व दहा हजार चक्रवालांचे देव, ब्रह्मा धर्म ऐकण्यासाठी एकल झाले होते. याव्यतिरिक्त शत सहस्र कोटी चक्रवालांचा एक असा समूह आहे जिथले प्राणी बुद्धाच्या अनंत करुणा व मैत्रीद्वारे प्रभावित होतात. त्यामुळेच त्या समूहाला त्यांचे "अञ्ञात क्षेत्र" (आज्ञा क्षेत्र) म्हणजे प्रभाव क्षेत्र म्हणतात. इतर बाकीचे असंख्य चक्रवाल असे आहेत जे बुद्धांच्या आवरणरहित, अफाट ज्ञानाचे विषय आहेत. त्यामुळेच हा समूह त्यांचे 'विषय क्षेत्र' म्हटले जाते. हे क्षेत्र बुद्धांच्या प्रभाव क्षेत्राच्या बाहेर आहे, त्यामुळे बुद्धांच्या चित्तवृत्तींनी लाभान्वित होऊ शकत नाही. यावरुन आपण समजू शकता की बुद्ध मान्यतेत अखिल विश्वाची किती विशद व्याख्या आहे. या अनंत असीम अवकाश लोकात आमचा हा संसार किती क्षुद्र आहे, जणू असीम आकाशात भटकणारा एक छोटासा रजकण._
_या! आता मी आपणाला आमच्या या चक्रवालातील तीन लोक व ३१ भुवनांची माहिती देतो. असेच लोक व भुवन प्रत्येक चक्रवालात आहेत._
(अ) अरुप लोक- मनोमय ब्रह्मलोक
(आ) रुप लोक सूक्ष्म पार्थिव ब्रह्मलोक
(इ) कामलोक - देव, मनुष्य व निम्नतर श्रेणींच्या प्राण्यांचे इंद्रिय लोक वा वासना लोक.
(अ) अरुप लोकात चार ब्रह्मभुवन आहेत. हे भुवन जड भौतिक पदार्थांनी नाही, तर केवळ नाम म्हणजे चित्तानी बनलेले आहेत.
(आ) रुप लोकात १६ ब्रह्मभुवन आहेत. हे अत्यंत सूक्ष्म रुप म्हणजे भौतिक पदार्थांनी बनलेले आहेत.
(इ) कामलोकात आहेत -
(क) *सहा देव भुवन-*
१. चतुर्महाराजिक,
२. तावतिंस (त्रयतिंस),
३. याम,
४. तुसित,
५. निर्माण रति,
६. परिनिर्मित वसवर्ती.
(ख) मानव भुवन
(ग) चार अधो भुवन (अपाय भूमी)
१. निरय (नरक)
२. तिरच्छन-तिर्यक (पशु-पक्षी इत्यादी)
३. प्रेत प्राणी
४. असुर
_कायिक, वाचिक व मानसिक कर्माच्या कार्य शृंखलेत ज्या वेळी जशी चेतना होते, मन त्या वेळी तशाच चित्तवृत्तींचे प्रजनन करते. त्यानुसारच हे लोक शुद्ध-अशुद्ध, शीतल-गरम, प्रकाशमय अंधकारमय, सुखमय दुखमय व हलके-भारी असतात. उदाहरण स्वरुप आम्ही एका अत्यंत संपन्न धार्मिक व्यक्तीला बघू. तो आपल्या अपरिमित मैत्री व करुणेने सर्व प्राणी जगताला व्यापून टाकतो. असे करतांना तो अशा चित्तवृत्तींचे प्रजनन करतो, ज्या शुद्ध आहेत, शीतल आहेत, प्रकाशमान आहेत, हलक्या आहेत व सुखदायी आहेत. त्या सौमनस्यपूर्ण चित्तवृत्ती ब्रह्मलोकगामिनी आहेत. दुसरीकडे एका सर्वस्वी विपरित गुणधर्माच्या व्यक्तीला घ्या. जो असंतुष्ट आहे, क्रुद्ध आहे. त्याचा चेहरा पाहाताच जाणवते की त्याच्या मनावर किती अशुद्धी, ताप, अंधकार, जडपणा व दुःखाची छाया आहे._
_*याचे कारण हे आहे की त्याने अशा दौर्मनस्यपूर्ण द्वेषजन्य चित्तवृत्तींना उत्पन्न केले आहे, ज्या अधोलोकगामिणी आहेत. द्वेषाच्या प्रमाणेच लोभ व मोहजन्य चित्तवृत्तीही या प्रकारे अधोगतीगामिणी आहेत. भविष्याच्या सुखमय जीवनाच्या कामनेने प्रेरित, दान, भक्ती, सदाचार इत्यादी सुकर्म अशा चित्त शक्तींचे प्रजनन करतात ज्या देव, मनुष्यांच्या वासना लोकांकडे घेऊन जाणाऱ्या असतात.*_
_सज्जन पुरुष व स्त्रियांनो ! बुद्ध मान्यतेच्या या माहितीने बुद्ध जीवन समजणे आपणासाठी सोपे होईल. संक्षेपात भगवानांची जीवन कथा या प्रकारे आहे._
*_निदान कथा (बुद्धत्व प्राप्तीसाठी पूर्वीचे प्रयत्न)_*
_*ज्या कल्पात पाच सम्यक संबुद्ध होणे निश्चित असते त्याला 'भद्र कल्प म्हणतात. वर्तमान कल्प भद्र कल्प आहे, ज्यात भगवान गौतम बुद्ध चौथे बुद्ध झाले आहेत. यापूर्वी भगवान ककुसंध, कोणागमन व काश्यप बुद्ध झाले आहेत. या कल्पापूर्वी अगणित कल्पात असंख्य बुद्ध झाले आहेत. सर्व बुद्धांनी एकाच धर्माचा उपदेश दिला आहे तो धर्म जो सर्व लायक प्राण्यांना दुःख व मृत्यूच्या पार नेतो. सर्व बुद्ध महाकारुणिक, महातेजस्वी व सर्वज्ञ असतात.*_
_अनेक कल्पांपूर्वी, एकदा जेव्हा पृथ्वीवर भगवान दीपंकर बुद्ध झाले होते तेव्हा त्यांच्या दर्शनाने सुमेध नावाच एक तापस इतका प्रभावित व उत्साहित झाला की त्याने त्याच क्षणी या बाबीचा प्रण केला की तो भविष्यात सम्यक संबोधी प्राप्त करेल. त्यासाठी ज्या काही कठीण तप-साधना कराव्या लागतील, कष्ट करावे लागतील, ते तो करेल. *दीपंकर बुद्धांनी तापस सुमेधचा हा संकल्प जाणून त्याचे अनुमोदन केले. त्यांनी ही भविष्यवाणी केली की चार असंख्य आणि एक लाख कल्पांनतर हा तापस 'गौतम' नावाचा सम्यक संबुद्ध बनेल.* त्यानंतर तो बोधिसत्व (भावी बुद्ध) अनेक जन्म-जन्मांतरात दहा बुद्ध-करणीय पारमितों (सद्धांच्या परिपूर्णतां) चा अभ्यास व त्या उच्चतम चित्तवृत्तींचा संग्रह करत राहिला._
*_दहा पारमिता -_*
१) दान पारमी,
२) शील पारमी,
३) निष्क्रमण पारमी,
४) प्रज्ञा पारमी,
५) वीर्य पारमी,
६) क्षांति पारमी,
७) सत्य पारमी,
८) अधिष्ठान पारमी,
९) मैत्री पारमी,
१०) उपेक्षा पारमी.
_या प्रकारे आम्ही पाहतो की संबोधीची उपलब्धी अत्यंत कष्टसाध्य आहे. हिच्या उपलब्धीच्या केवळ चिंतनालाही असीम मानसिक शक्ती लागते._
_बोधिसत्वाने असंख्य जन्म-जन्मांतरात अर्जित पारमितांची परिपूर्णता त्या जन्मात पूर्ण केली जेव्हा तो -_
_दानवीर महाराज वैसांतराच्या रुपात जन्मला. या जन्मात त्याचे दान अद्वितीय होते. त्याने राज्य, धन, ऐश्वर्य हेच नाही तर स्री, पुत्रांचेही दान दिले. या प्रकारे त्याने भगवान दीपंकर बुद्धांसमोर केलेल्या प्रणाची पूर्ती केली._
_त्यानंतर बोधिसत्वाने सेतकेतू नावाच्या प्रतापी देवाच्या रुपाने तुषित देवलोकात जन्म घेतला. त्या स्वर्गलोकात त्या वेळाची प्रतीक्षा करत राहिला जेव्हा त्याला बुद्धत्व प्राप्तीसाठी अंतिम जन्म ग्रहण करायचा होता. वेळ आल्यावर तुषित देवलोकाचा त्याग करुन तो कपिलवस्तूच्या महाराज शुद्धोदनाची राणी महामायाच्या गर्भात स्थित झाला. जेव्हा प्रसवकाळ जवळ आला तेव्हा राणीने प्रसुतीसाठी माहेरी जाण्याची इच्छा प्रकट केली. महाराज शुद्धोदनांनी तिच्या इच्छापूर्तीसाठी आवश्यक दास व दासी तसेच रक्षकांसह राणीला पितृगृही पाठवले. ते लुंबिनीच्या शाल वनातून जात होते. संपूर्ण वन शाल पुष्पांच्या सुगंधाने सुवासित होते. थोडी वैळासाठी ते तिथे थांबले. राणी महामायाची इच्छा झाली की थोडा वेळ वनात घालवावा. ती आपल्या पालखीतून उतरली. शाल वनाच्या रमणीयतेचा आनंद घेत ती एका शाल वृक्षाखाली उभी राहिली व फूल तोडण्यासाठी जसे तिने आपल्या उजव्या हाताने वृक्षाची फांदी पकडली तसेच अत्यंत अनपेक्षित रुपाने एका बालकाला जन्म दिला, जो भावी सम्यक संबुद्ध बनणार होता. या बालकाने जन्म घेताच विश्वात ३२ प्रकारच्या चमत्कारपूर्ण अस्वाभाविक घटना घडल्या संपूर्ण भौतिक संसार प्रकंपित झाला. सौरमंडळ अभूतपूर्व प्रकाशाने दैदीप्यमान झाले. पार्थिव जगताचे सर्व प्राणी एकमेकांना पाहाण्यात समर्थ झाले. मुक्यांनी बोलण्याची व बहिऱ्यांनी ऐकण्याची शक्ती प्राप्त केली. सर्वल देव दुदुंभीचे शब्द ऐकू आले, इत्यादी._
_या वेळी महाराज शुद्धोदनांचा संन्यासी राजगुरु काल देवल तावंतिस देवलोकात गेला होता व तेथील देवतांना उपदेश देत होता. काल देवलाने ध्यानाच्या आठ समापत्तींवर अधिकार प्राप्त करुन पुष्कळशा सिद्धी प्राप्त केल्या होत्या. जेव्हा त्याने दिव्यदृष्टीद्वारे हे पाहिले की संपूर्ण नाम व रुप लोकात एकाएकी जो आनंद व उत्साह पसरला तो महाराज शुद्धोदनाच्या पुन्नजन्मामुळे आहे. तेव्हा तो तत्काळ देवलोक सोडून शुद्धोदनाच्या राजमहालात पोहोचला व त्याने बालकाला आशीर्वाद देण्यासाठी घेऊन येण्यास सांगितले. महाराज जसे नवजात शिशुला राजगुरुंच्या चरणात ठेवण्यासाठी गेले राजगुरु देवल ताबडतोब समजला की हे बालक बोधिसत्व आहे. हे जाणून तो अत्यंत प्रसन्न झाला, परंतु दुसऱ्याच क्षणी जेव्हा त्याने हे जाणले की त्याचे स्वतःचे आयुष्य खूप कमी राहिलेले आहे तेव्हा तो दुःखाने रडू लागला. तो या माहितीमुळे व्यथित झाला की सम्यक संबुद्धांचे दर्शन करु शकणार नाही, तसेच त्यांचे उपदेशही ऐकू शकणार नाही. कारण मृत्यूनंतर तो अरुप ब्रह्मलोकात जन्म घेईल, जिथे राहतांना या भौतिक जगाशी संपर्क स्थापित करणे अशक्य आहे._
_पाचव्या दिवशी बालकाचे नामकरण केले गेले व त्याला 'सिद्धार्थ' नाव दिले गेले. या प्रसंगी जे ज्योतिषी व पंडित एकत्र झाले होते, त्यांनी सांगितले की बालकात बुद्धत्वाची सर्व लक्षण आहेत. सातव्या दिवशी आई महामायेचे निधन झाले, त्यामुळे बाल राजकुमाराचे पालण-पोषण मावशी प्रजापती गौतमीने केले._
_राजकुमार सिद्धार्थ राजवैभवात वाढू लागला. कालांतराने तो अतिशय बुद्धिमान व बलशाली झाला. महाराजांनी त्याचे जीवन सर्व सुख-सुविधानी परिपूर्ण व्हावे याबाबत कुठलीही कमतरता ठेवली नाही. राजकुमारासाठी तिन्ही ऋतूंच्या अनुकूल तीन महाल बनवले. त्यांना भोगविलासाच्या साधन-सामग्रीने परिपूर्ण केले, ज्यामुळे राजकुमार सतत भोग-विलासतच बुडालेला राहावा. स्वाभाविकपणे वात्सल्य-नेहवश महाराजांची उत्कट इच्छा होती की त्यांचा पुत्र जीवनभर राजसी सुख-संपदेचा उपभोग करो, तो कधीही विरक्त होऊन सम्यक संबुद्ध न बनो._
_त्यांनी या बाबीचा पूर्ण प्रबंध केला की वैराग्याची सारी लक्षण राजकुमारापासून दूर ठेवावी. सर्व सेवकांना व सोबत्यांना हे निर्देश दिले गेले की त्यांनी राजकुमारासमोर जरा, व्याधी व मृत्यूची चर्चाही करु नये, उलट त्याला या भ्रमात ठेवावे की जगात कुठेच दुःख नाही. याबाबत इतकी दक्षता घेण्यात आली की ज्या सेवकात जरा व व्याधीची किंचितही लक्षण दिसू लागताच, त्याला राजकुमाराच्या सेवेतून निवृत्त केले जायचे. दुसरीकडे नाचगाणे व वासनेचे असे वातावरण बनवून ठेवले गेले की कुमार सतत विषयवासनेतच मग्न राहावा._
*_महाभिनिष्क्रमण (गृहत्याग)_*
_परंतु जस-जसा कालावधी गेला, या एकरसीय विलासितेमुळे कुमारचे मन विटू लागले, विलास फिका पडू लागला. आपल्या असंख्य पूर्व जन्मात केलेल्या कुशल कर्मांद्वारे बुद्धत्व प्राप्तीसाठी ज्या पारमितांना परिपूर्ण केले होते, त्या आता स्वतः जागृत होऊ लागल्या. कधी-कधी जेव्हा कामास्रव क्षीण व्हायचे तेव्हा कुमारचे चित्त विशुद्ध व प्रश्रब्धी प्राप्त करुन समाधीच्या तशाच उन्नत अवस्थेत जात असे, जशी त्याने लहानपणी सहज प्राप्त केली होती. जेव्हा राजगुरु देवलांच्या माथ्याला त्याची पावल लागली होती. हळूहळू कुमारच्या मनात अंतद्वंद्व आरंभ झाले. विषय-वासनेच्या बंधनापासून मुक्ती मिळवण्यासाठी मन उद्विग्न झाले. त्याला हे जाणण्याची तीव्र इच्छा झाली की राजमहालाच्या भिंतींबाहेर काय आहे, जिथे त्याला जाऊ देण्यात येत नाही. त्याची इच्छा झाली की बाहेरील प्रकृतीला तिच्या सत्य स्वरुपात पाहावे, महालातील कृत्रिम रुपांना नाही. त्याने आग्रह धरला की तो महालाबाहेरच्या राजकीय उपवनात फिरावयास जाईल._
_अनिच्छा असतांनाही महाराज शुद्धोदनांना स्वीकृती द्यावी लागली. परंतु त्यांनी या बाबीचा प्रबंध केला की संपूर्ण रस्त्यावर कुमारला कोणतेही अप्रिय दर्शन होऊ नये. परंतु तरीही राजमहालातून प्रथम वेळी बाहेर निघाल्यावर त्याने कंबरेत वाकलेल्या एका वृद्धाला पाहिले. दुसऱ्यांदा मरणांतक पीडेने व्याकूळ एका रोग्याला पाहिले. तिसऱ्या वेळा एका मृताला व चवथ्यांदा एका विरक्त संन्याश्याला पाहिले._
_या चारही दृश्यांनी कुमाराच्या मनाला गंभीर चिंतनात मग्न केले. त्याच्या मनोस्थितीत विशिष्ट परिवर्तन आले. मनातील सारे विकार दूर झाले. तो या प्रकारे विरज विमल होऊन संस्कार लोकात पूर्व संचित अनंत पारमिता शक्तींनी संयुक्त झाला. आता त्याचे मन अजून निर्बंध, प्रशांत, प्रशुद्ध व प्रबळ झाले. हे सर्व त्या रात्री झाले जेव्हा पत्नी यशोधरेने भवबंधनाच्या नव्या बेडी स्वरुप एका पुत्राला जन्म दिला. परंतु आता कोणतेही बंधन सिद्धार्थाला बांधू शकत नव्हते, कोणतीही बाधा त्याला थांबवू शकत नव्हती, कोणताही संभ्रम त्याच्या मनाला विचलित करु शकत नव्हता. त्याने दृढ निश्चय केला की जन्म, जरा, दुःख व मृत्यूपासून सुटका प्राप्त करण्यासाठी सत्य मार्ग शोधावाच लागेल. या दृढ संकल्पाला जन्म-जन्मांतरापासून संचित अधिष्ठान पारमीचे अपूर्व बळ प्राप्त झाले. अर्धी रात्र संपता संपता राजकुमाराने घर सोडण्याचा अंतिम निर्णय केला. त्याने सेवक छंदाला आदेश दिला की प्रिय अश्व छंदकाला शीघ्र तयार कर. प्रिय पत्नी यशोधरा व नवजात पुत्र राहुलवर त्याने निरोपाची दृष्टी टाकली व पारिवारिक जीवन नेहमीसाठी सोडून महाभिनिष्क्रमण (गृहत्याग) केले. राजधानी सोडून त्याने अनोमा नदी पार केली व दृढ निश्चय केला की अभिष्ट सिद्धी प्राप्त केल्याविना परत येणार नाही._
✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹
*_लेखक :- सयाजी ऊ बा खिन_*
_बुद्धवर्ष २५६१, फाल्गुन पौर्णिमा, १ मार्च, २०१८, वर्ष १ अंक १२_
*_संकलन :- महेश कांबळे_*
*_दिनांक :-_* ०९/०३/२०२५
✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹
No comments:
Post a Comment