✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹
*_धम्मचक्कप्पवत्तनसुत्त प्रवचन (भाग ३)_*
https://mikamblemahesh.blogspot.com/2025/02/blog-post_26.html
✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹
*_चार आर्यसत्यांचे पूर्ण ज्ञान झाले पाहिजे_*
_चार आर्यसत्यांच्या ह्या सगळ्याच्या सगळ्या चारही अवस्था अनुभूतीवर उत्तरल्या पाहिजेत. तेव्हा म्हणतात *'यावकीवञ्च मे, भिक्खवे, इमेसु चतूसु अरियसच्चेसु'* हि जी चार आर्यसत्य आहेत त्या प्रत्येक आर्यसत्याला 'तिपरिवट्ठं' तीन प्रकारांनी म्हणजे 'द्वादसाकारं' बारा प्रकारांनी ह्या सत्यांचे पूर्ण ज्ञान करायचे आहे. ह्या सत्यांचे पूर्ण ज्ञान झाले. ह्या बारामधून स्वतः गेलो. जो पर्यंत गेलो नाही तो पर्यंत *'यथाभूतं ञाणदस्सनं न सुविसुद्धं अहोसि'* माझे ज्ञान, माझे दर्शन शुद्ध झाले नाही. *सम्यक ज्ञानाशिवाय, सम्यक दर्शना (दार्शनिक मान्यता नाही) शिवाय कोणतीही व्यक्ती सम्यक संबुद्ध होणार नाही.* त्याची सगळी वाणी अशा प्रकारे कायम राहील पण बिघडून जाईल कारण अनुभूतीवर उतारण्याची बाबच विसरुन जातील. आमची मान्यताच सम्यक ज्ञान आहे, सम्यक दर्शन आहे._
_*सम्यक ज्ञान तेच असते जे आमच्या अनुभवावर उत्तरते. त्या अनुभवाने जे ज्ञान उदयास येते ते आमचे स्वतःचे ज्ञान, सम्यक ज्ञान आहे; खरेखुरे ज्ञान आहे; योग्य ज्ञान आहे. अनुभूतीने उदयास आलेले ज्ञान आहे, कोणी सांगितलेल्या ऐकलेल्या गोष्टीमधून नाही. असे ज्ञान, असे दर्शन तोपर्यंत विशुद्ध होत नाही, जोपर्यंत ते सम्यक होत नाही. सम्यक तोपर्यंत होत नाही जोपर्यंत स्वतःच्या अनुभूतीवर उतरत नाही.* तेव्हा म्हणतात *'यथाभूतं'* जसे आहे तसे. *"यथाभूतं ञाणदस्सनं न विसुद्धं अहोसि"* जोपर्यंत सुविशुद्ध झाले नाही तो पर्यंत *'नेव तावाहं'* मी ह्या गोष्टीचा दावा केला नाही की *'सदेवके लोके समारके सन्ब्रह्मके सस्समणब्राह्मणिया पजाय सदेवमनुस्साय 'अनुत्तरं सम्मासम्बोधिं अभिसम्बुद्धो 'ति पच्चञ्ञासिं।'* अशा संसारात ज्यामध्ये देवही आहेत. ब्रह्मही आहेत, मारही आहे, श्रमणही आहेत, ब्राह्मणही आहेत, ही सगळी प्रजा आहे. यांच्यामध्ये मी ह्या गोष्टीचा स्वीकार केला नाही की मला सम्यक संबोधी प्राप्त झाली. *त्या वेळी सुद्धा भारतात अनेक लोक होते, त्या पूर्वीही होते, जे केवळ बुद्धीच्या स्तरावर धर्म समजून ह्या गोष्टीचा दावा करीत होते 'आम्ही बुद्ध झालो. ही व्यक्ती म्हणते की जोपर्यंत माझ्या अनुभूतीवर ह्या चारही गोष्टी बारा प्रकारांनी उतरत नाहीत तो पर्यंत मी दावा केला नाही की मला ज्ञान प्राप्त झाले, मला सम्यक संबोधी प्राप्त झाली.* पुढे म्हणतात-_
*_'यतो च खो मे, भिक्खवे, इमेसु चतूसु अरियसच्चेसु एवं तिपरिवट्ठं द्वादसाकारं यथाभूतं ञाणदस्सनं सुविसुद्ध अहोसि,_*
_हि चारही आर्य सत्य तीन पद्धतींनी, बारा प्रकारांनी मी अनुभवली तेव्हा माझे ज्ञान आणि दर्शन सुविशुद्ध झाले. सगळ्या संसारात ज्या ठिकाणी देव आहेत, मार आहे. ब्रह्म आहे, श्रमण आहेत, ब्राह्मण आहेत, प्रजा आहे, मनुष्य आहेत तेव्हा ह्या गोष्टीचा मी स्वीकार केला की *'अनुत्तरं सम्मासम्बोधिं अभिसम्बुद्धो ति'* मला सम्यक संबोधी प्राप्त झाली. ह्या गोष्टीला मी स्वतः स्वीकारले आणि घोषणा केली *'ञाणञ्च पन में दस्सनं उदपादि'* आता खऱ्या अर्थाने ज्ञान उत्पन्न झाले, खऱ्या अर्थाने दर्शन उत्पन्न झाले. त्या अवस्थेचा अनुभव झाला ज्या ठिकाणी पोहोचणारा माणूस अनुभवतो की आता माझा पुनर्जन्म होणार नाही._
_*पुनर्जन्म होणार नाही ही अंधविश्वासाची गोष्ट नाही.* त्या अर्हत्वाच्या निरोध समापत्तीचा अनुभव करुन जेव्हा माणूस बाहेर येतो तेव्हा सगळ्या गोष्टी खूप स्पष्ट होतात. जेवढे जेवढे जन्म देणारे संस्कार होते, ते सगळे निघून गेले. एकही शिल्लक नाही आणि अशा प्रकारे जन्म देणारे नवे संस्कार आता बनू शकतच नाहीत. ही अवस्था प्राप्त झाली. ह्या अवस्थेला आपल्या अनुभवावर उतरवून जेव्हा दर्शन करतो तेव्हा म्हणतो *'अकुप्पा मे चेतोविमुक्ति'.* अरे, मला विमुक्ती प्राप्त झाली. *'अयमन्तिमा जाति'* हे माझे अंतिम जीवन आहे. *'नत्थिदानि पुनब्भवोति'* आता पुन्हा नवा भव, नवा जन्म होणार नाही._
_सत्य अनुभूतीवर उतरवून जी व्यक्ती असा दावा करते ती खरोखर मुक्त झाली. आणि सत्य अनुभूतीवर न उत्तरवितांना केवळ दार्शनिक मान्यतेच्या आधारावर दावा करतो तो बिचारा स्वतः गोंधळलेला आहे आणि इतरांनाही गोंधळात टाकतो._
_ही बुद्धांची संबोधी आहे की तो त्या अवस्थेवर पोहोचला. ह्या चारही आर्यसत्यांना तिन्ही प्रकारांनी आपल्या अनुभूतीवर उतरवून त्या अवस्थेवर पोहोचला जी मुक्त अवस्था आहे आणि, तेव्हा घोषणा करतो 'आता माझा पुनर्जन्म नाहीं' मी त्या अवस्थेचा स्वतः साक्षात्कार केला. भगवानांची ही वाणी ऐकून त्या पंचवर्गीय भिक्खुंचे मन खूप प्रसन्न झाले._
_आणखी एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की हे पाच भिक्षु भगवानांना विरोध करुन पळून गेले होते. कारण भारतात एक मान्यता अशाप्रकारे रुजली होती की शरीराला दंड दिल्याशिवाय मुक्ती मिळतच नाही आणि ह्या व्यक्तीने शरीराला दंड देण्याचे खूप काम केले. सहा वर्षापर्यंत दंड दिला. ह्यापूर्वी आठ ध्यान केली होती, तेव्हा अंतर्मनात पाहिले की शरीराला दंड देऊन जरासा सुद्धा लाभ झाला नाही म्हणून त्याचा त्याग केला आणि मध्यम मार्गाकडे गेला. जेव्हा त्याग केला तेव्हा पाच भिक्षू समजले की हा माणूस भ्रष्ट झाला. हा भ्रष्ट योगी आहे. हा कसा मुक्त होईल? म्हणून त्याला विरोध करुन सोडून गेले._
_आता जेव्हा तो येत आहे तेव्हा म्हणतात हा भ्रष्ट योगी आहे. आम्ही त्याची कोणतीही गोष्ट ऐकणार नाही, त्याचा सन्मान करणार नाही. तो राजपुत्र आहे. राजघराण्यातून आला आहे म्हणून बसण्यासाठी आसन जरुर देऊ, आणखी दूसरे काहीही करणार नाही. तेच लोक आता प्रसन्न मनाने ह्या सगळ्या गोष्टी स्वीकारतात कारण आता योग्य दृष्टीने पाहातात की अरे इतर सगळ्या गोष्टी आपल्या जागेवरच ठेवा. मुख्य गोष्ट ही आहे की दुःख आहे आणि पहा हे दुःखाचे कारण आहे. आणखी पहा हे दुःखाचे निवारण आहे आणि दुःख निवारण करण्याचा हा मार्ग आहे. आणि म्हणतो की ह्या चारही गोष्टींचा कोरा उपदेश नाही. मी यांना स्वतःच्या अनुभवावर उत्तरविले आहे. आता तुम्हाला समजविण्यास आलो आहे की आपल्या अनुभवावर उत्तरवा._
_हे पहिले धर्म-चक्र प्रवर्तन, पहिले धर्मचक्र प्रवर्तन तर खरोखर बोधी वृक्षाखाली झाले. आपल्या आत जे धर्मचक्र चालविले ते. लोकचक्रच चालत होते. प्रत्येक व्यक्ती आपल्या आत लोकचक्र, लोकचक्र, दुःखचक्र, दुःखचक्र हेच चालवितो, हे पहिल्यादांच आपल्या आत धर्मचक्र चालविले म्हणजे धर्म अनुभूतीवर उतरविला. जी गोष्ट मी कधीही ऐकली नव्हती ती आपल्या अनुभूतीवर उतरविली. *पुब्बे अननुस्सुतेसु धम्मेसु चक्खुं उदपादि.* धर्मचक्षु उघडले. जी गोष्ट पूर्वी कधी ऐकली नव्हती. धर्माच्या नावावर न जाणो काय-काय ऐकत राहिलो. आता धर्माच्या नावावर योग्य गोष्ट- हा कायदा आहे, हा नियम आहे, हे विधान आहे, ही प्रकृती आहे, ही नियती आहे. सगळ्या गोष्टी समजू लागल्या. *त्या सगळ्या गोष्टी आपल्या अनुभूतीवर उतरवतो तो सम्यक संबुद्ध होतो. जे धर्मचक्र आपल्या आत जागविले ते आता बाहेर चालो. व्यक्ती-व्यक्ती मध्ये धर्मचक्र प्रवाहीत होवो आणि ते दुःख-चक्राच्या बाहेर निघून जावोत. लोकचक्रातून बाहेर निघून जावोत. लोकांमध्ये धर्मचक्र जागविण्याचे पहिले काम केले म्हणून हा पहिला उपदेश आहे. लोकांसाठी धर्मचक्र प्रथमच जागले.*_
_आता जे पाच लोक बसले होते त्यांना सगळी बाब समजली. त्यांचे मन खूप प्रसन्न झाले. अरे, ही गोष्ट खूप चांगली सांगत आहे. आम्ही अशासाठी यांच्यापासून पळालो होतो की हा शरीराला दंड देत नव्हता. शरीराला दंड न देतासुद्धा या चारही गोष्टींचे दर्शन होऊ शकते, ही गोष्ट समजली._
_*'इमस्मिञ्च पन वेख्याकरणस्मिं भञ्ञमाने आयस्मतो कोण्डञ्ञस्स विरजं वीतमलं धम्मचक्खुं उदपादि 'यं किञ्चि समुदयधम्मं, सब्बं निरोधधम्म' न्ति।'* पुढे जे वारंवार अनेक सूत्तांचे वाचन कराल, बुद्ध वाणीचा अभ्यास कराल, तेव्हा एक गोष्ट वारंवार अशी येत जाईल की आपल्या अडाणीपणामुळे मनात एक शंका निर्माण करेल, की ही कशी गोष्ट आहे? एकीकडे भगवान सांगतात *'एकायनो मग्गो'* आपल्या आत शरीर आणि चित्ताच्या अवस्थांचा अनुभव करीत असतांना, चार सतिपट्ठाण करीत असतांना मुक्त अवस्थेपर्यंत पोहोचू, भगवानांची इतकी मोठी घोषणा आहे आणि दुसरीकडे आम्ही पाहातो की वारंवार भगवान उपदेश देत आहेत आणि तो उपदेश समाप्त झाल्यानंतर इतके लोक स्रोतापन्न झाले, इतके लोक सकदागामी झाले, इतके लोक अर्हत झाले; अशा गोष्टी वारंवार वाचनात येतील. तेव्हा शंका येणारच. एकीकडे *'एकायनो मग्गो* आणि दुसरीकडे केवळ उपदेशच मार्ग झाला. म्हणजे सम्यक संबुद्धाचा केवळ उपदेश ऐकूनच मुक्त होऊ हा दुसरा मार्ग आहे ना. हा जास्त सरळ मार्ग आहे. मग कशाला त्यावर चालू? दोन्हीमध्ये विरोधाभास होईल._
_आता ही बाब समजून घेऊ या. साधक ध्यानाच्या खोलीत जाईल तेव्हा त्याला स्पष्ट समजेल की बुद्धासारखी व्यक्ती सांगत आहे, धर्माची गोष्टी समजावित आहे ती केवळ वाणी नाही. वाणीबरोबर धर्मधातू आहे, निर्वाण धातू आहे, मैत्री धातू आहे, तरंगे आहेत आणि जी जी व्यक्ती कोणत्या ना कोणत्या जन्मात त्यांच्याबरोबर राहिली आहे आणि आपल्या पारमिता पूर्ण करीत-करीत ह्या अवस्थेवर पोहोचली आहे, की ही व्यक्ती जेव्हा सम्यक संबुद्ध होईल तेव्हा याच्याबरोबर जन्म घेऊ आणि मुक्त अवस्थेपर्यंत पोहोचू. जे असे लोक आहेत, तेव्हा बुद्ध जे सांगतात, धर्म समजवितात, ते धर्म ऐकत आहे. तो धर्म ऐकता ऐकता आत तरंगे जागृत झाली. आत तरंगे जागत आहेत, अनित्य बोध समजू लागला. आत 'अनित्य आहे. अनित्य आहे' ही जाण आहे. तो उपदेश समाप्त होत नाही तोपर्यंत निर्वाणिक अवस्था प्राप्त झाली._
_काही लोकांना प्राप्त झाली, काही लोकांना प्राप्त झाली नाही. आतमध्ये चारही आर्यसत्यांची म्हणजे चारही सतिपट्ठाणांची आपोआप अनुभूती झाली म्हणून ही अवस्था प्राप्त झाली. केवळ उपदेशांनी होत नाही. तर *केवळ उपदेशांनी कोणी व्यक्ती अरहंत होईल ही मिथ्या धारणा मनातून काढून टाकली पाहिजे.*_
_त्या वेळी जेव्हा ह्या पाच व्यक्तींना सांगितले गेले तेव्हा त्यापैकी एकाला ही अवस्था प्राप्त झाली. *पाच ब्राह्मणांपैकी एकाला कौंडण्यला 'विरजं' जेथे रज नाही, रज म्हणजे आसक्ती नाही. 'वीतमलं' जेथे कोणता मळ नाही असे धर्म चक्षु उत्पन्न झाले. ही केवळ बुद्धिची गोष्ट नाही. सगळे सत्य त्याच्या अनुभूतीवर उतरले. कोणते सत्य अनुभूतीवर उतरले? 'यं किञ्चि समुदयधम्मं' जे जे उत्पन्न होणारे धर्म आहेत त्या सगळ्या अवस्था ज्यांना उत्पाद आहे 'सब्बं तं निरोधधम्मं' त्या सर्व निरोध होणाऱ्या स्वभावाच्या आहेत. उदय होणे व्यय होणे हा त्यांचा स्वभाव आहे.* विपश्यना करणारी प्रत्येक व्यक्ती जाणते, विपश्यनेची सुरुवातच येथून होते. पाहा उदय होत आहे, व्यय होत आहे. *'समुदयधम्मानुपस्सी विहरति, वयधम्मानुपस्सी विहरति'.*_
_निर्वाणिक अवस्थेची पहिल्यांदा अनुभूती होईल तेव्हा 'निरोधधम्मा', पहिल्यांदा निरोधाची अनुभूती झाली. हे जे उत्पन्न होते, व्यय होते, हे चक्र चालूच राहाते, परंतु एक अवस्था अशी येते जेथे निरोध होतो. जेथे त्याची उत्पत्तीच होत नाही. तेव्हा ही गोष्ट सांगितली गेली की त्या व्यक्तीला ह्या सगळ्या गोष्टी ऐकता ऐकता ही अवस्था प्राप्त झाली. असा धर्मचक्षु जागृत झाला म्हणजे विपश्यना आतून जागली आणि जागता-जागता स्रोतापन्न फळाची पहिली अवस्था *'यं किञ्चि समुदयधम्मं'* जे जे उत्पन्न होणारे सत्य आहे *'सब्बं तं निरोधधम्मं'-* त्यांच्या धर्माचा निरोध आहे हे त्याने अनुभवाने जाणले. म्हणजे पहिल्यांदा त्या व्यक्तीने निरोध अवस्थेचा साक्षात्कार केला. पहिल्यांदा निर्वाणाचा साक्षात्कार केला ती व्यक्ती स्रोतापन्न झाली. बाकी चार झाले नाहीत जरी पाचही जणांना धर्म शिकविला जात होता._
_*आणखी एक गोष्ट समजली पाहिजे की जी व्यक्ती सम्यक संबुद्ध होते ती मुक्तीदाता नसते. ती आम्हाला मुक्ती देऊ शकत नाही. ती आम्हाला मार्ग दाखविते. मुक्तीदाता स्वतः आपणच आहोत.* आम्ही अनेक जन्मापासून किती काम केले आणि सत्याचा मार्ग चालत असतांना आम्ही बरेचशे विकार पूर्वीच काढले आहेत. थोडेसेच राहिले आहेत आणि आता पध्दत मिळाली. तर आम्ही निरोध अवस्थेची ताबडतोब डुबकी मारु. आम्ही आमच्याजवळ भरपूर विकार एकत्र करुन ठेवलेले आहेत. तर आम्हाला मुक्त होण्यासाठी जास्त वेळ लागेल. परंतु काम आम्हालाच करावे लागेल. *जर तो मुक्तीदाता असता तर ह्या पाचही जणांना निर्वाणिक अवस्थेची अनुभूती करुन दिली असती. केवळ स्रोतापन्नचीच का? त्यांना अर्हत अवस्थेची अनुभूती करुन दिली असती. करु शकला नाही ना? तेव्हा ह्या भ्रमात राहू नका की कोणता गुरु आम्हाला तारुन नेईल किंवा कोणता देव, ईश्वर, ब्रह्मा तारुन नेईल. ह्यातून बाहेर पडले पाहिजे. आम्हालाच तरुन जायचे आहे. ह्या चारच्या चारही आर्यसत्यांचा साक्षात्कार आम्हाला करायचा आहे. ते ह्या विपश्यनाद्वारे होते. ही बाब समजून काम केले तर त्याच्या बाहेर निघून जाईल.*_
_*कोण्या व्यक्तीचे सम्यक संबुद्ध होणे सोपी गोष्ट नाही. न जाणो किती कल्पापर्यंत, असंख्य कल्पापर्यंत पारमिता वाढविता-वाढविता, पारमिता त्याच आहेत पण त्या खूप जास्त प्रमाणात वाढवाव्या लागतात, केवळ स्वतःलाच मुक्त व्हायचे असेल तर थोड्याशाच कल्पामध्ये तेवढ्याच प्रमाणात पारमिता वाढवून मुक्त अवस्थेपर्यंत पोहोचेल, पण ज्याला सम्यक संबुद्ध व्हायचे आहे ज्यामुळे इतरांनाही मुक्तीचा मार्ग दाखवू शकेल आणि अनेक लोकांच्या मुक्तीसाठी सहायक होऊ शकेल त्या अवस्थेपर्यंत पोहोचायचे आहे म्हणून असंख्य जन्म व कल्पापर्यंत काम करीत करीत पारमिता वाढीवेणे सोपी गोष्ट नाही. ह्या अवस्थेपर्यंत पोहोचणे स्वतःसाठी एक महत्वपूर्ण बाब आहे. ह्या अवस्थेपर्यंत पोहोचून आपल्यामध्ये धर्मचक्र चालविले तीच स्वतःसाठी खूप महत्वपूर्ण बाब आहे आणि जेव्हा हे धर्मचक्र लोकांसाठी, अन्य प्राण्यांसाठी चालविले ज्यामुळे अन्य प्राणीसुद्धा त्याचा लाभ घेऊन मुक्त अवस्थेपर्यंत निघून जातील, ही खूप-खूप मोठी महत्वपूर्ण घटना घडते. याचा प्रभाव सगळ्या ब्रह्मांडावर पडतो. सगळ्या विश्वावर पडतो.* त्याचे स्पष्टीकरण पुढे केले आहे._
_*'पवत्तिते च पन भगवता धम्मचक्के भुम्मा देवा सद्दमनुस्सावेसुं "एतं भगवता बाराणसियं इसिपतने मिगदाये अनुत्तरं धम्मचक्कं पवत्तितं अप्पटिवत्तियं समणेन वा ब्राह्राणेन वा देवेन वा मारेन वा ब्रह्युना वा केनचि वा लोकस्मि' न्ति।* भगवानांनी जेव्हा धर्मचक्र प्रवर्तन केले तेव्हा अनेक भोमियादेव पृथ्वीवर राहाणारे देव, अदृश्य प्राणी, सगळ्या विश्वात, सगळ्या सूर्यमालेत असे अनेक प्राणी आहेत की जे अनेक जन्मापासून मुक्तीच्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यापैकी अनेक असे आहेत की ज्यांच्यामध्ये धर्माचे बीज आहे. त्यांना जेव्हा धर्म तरंगे मिळाली, मुक्तीची व्हायब्रेशन मिळाली तेव्हा खूप आनंद झाला. ह्या आनंदामुळे ते ह्या गोष्टीची घोषणा करतात, "अरे, पहा भगवानांनी ऋषिपत्तन मृगदाय मध्ये हे अनुत्तर, या पेक्षा उच्च अवस्था नसते अशा धर्मचक्राचे प्रवर्तन केले. लोकात दुसरा कोणी प्राणी अशाप्रकारे धर्मचक्राचे प्रवर्तन करु शकत नाही ज्याने धर्मचक्र आपल्या आत जागवून मुक्त अवस्था प्राप्त केली तीच व्यक्ती धर्मचक्राचे प्रवर्तन करते. अरे, पहा. ह्या व्यक्तीने धर्मचक्राचे प्रवर्तन केले, असे आनंदाचे उद्गार त्या प्राण्यांच्या तोडूंन निघाले जे पृथ्वीवरचे देव होते._
_आणि हा जो आवाज निघाला तो पसरतो. हे व्हायब्रेशन पसरते *'भुम्मानं देवानं सहं सुत्वा'* हे पृथ्वीवरील देव, ह्या पृथ्वीवरील देवांचा आवाज ऐकून जो *चातुर्महाराजिक* देवलोक आहे त्या देवलोकातील प्राण्यांपर्यंत ही गोष्ट पोहोचली. त्यांनी खूप आनंदाने ह्या गोष्टीची घोषणा केली की कोणी व्यक्ती अशप्रकारे धर्मचक्र प्रर्तन करु शकत नाही. पहा असे धर्मचक्र प्रवर्तन ह्या सम्यक संबुद्धाने केले._
_आणि हा आवाज ह्या स्थूल पृथ्वीवरुन वर सुक्ष्मतेकडे जात आहे. चातुर्महाराजिक देवांचा आवाज *'तावंतिस'* देवलोकापर्यंत पोहोचला. त्यांच्या आनंदाची घोषणा *'यामा'* देवलोकापर्यंत पोहोचली. यामा देवतांच्या आनंदाची घोषणा *'तुषितं'* देवलोकापर्यंत पोहोचली. तुषित देवलोकातील जे प्राणी होते त्यांनी सुद्धा हीच घोषणा केली. त्यांच्या आनंदाची घोषणा *'निर्माणरत्ति'* देवलोकापर्यंत पोहोचली. त्यांचा आवाज ऐकून *'परिनिम्मितवसवत्ती'* देवलोकातील देवांनीसुद्धा ही घोषणा केली. अशा प्रकारे एकापेक्षा एक उच्च लोक, सूक्ष्माहून सूक्ष्म, 'सद्दननुस्सावेसुं' आणि त्याच्या वर असणाऱ्या ब्रह्मलोकांची पाळी आली. त्याच्यावर *ब्रह्मपरिषद* लोकातील लोकांनी 'सद्दमनुस्सावेसुं'. त्याच प्रकारे *ब्रह्मपुरोहिता* देवा सद्दमनुस्सायेसु हे सोळा ब्रह्मलोक आहेत. त्यामध्ये एक-एक करुन ब्रह्मपरिषद पासून ब्रह्मपुरोहित देवलोकात आणि अशा प्रकारे *महाब्रह्मलोकातील* जे प्राणी आहेत त्यांनीसुद्धा हा आवाज दिला. त्याचप्रकारे... *'परित्ताभा देवा सद्दमनुस्सावेसुं'.* तसेच परित्ताभानं देवानं सदं सुत्वा *अप्पमाणाभा* देवा सद्दमनुस्सावेसुं- ज्यांची आभा अपरिमित्त आहे त्या लोकातील लोकांनी ही घोषणा केली. तसेच *आभस्सरा* (आभाश्व देवलोकातील देवांनी), ब्रह्मलोकातील लोकांनी, त्याचप्रकारे *'परित्तसुभा'* (परिमित शुभ) ह्या देवलोकातील, ब्रह्मलोकातील लोकांनीही घोषणा दिली. त्याचप्रकारे *अपरिमितशुभ* ब्रह्मलोकातील देवांचीही घोषणा झाली. त्याचप्रकारे *सुभकिण्हिकानं'* (ज्या ठिकाणी शुभ्र प्रकारची किरणे निघतात अशा प्रकारे ब्रह्मलोकातील) लोकांचीही घोषणा झाली. त्याचप्रकारे *वेहप्फला* ... नंतर *अविहा देवा* ... हा अविहा. सोळा ब्रह्मलोकातील प्रत्येक बहालोक आला. उच्च, उच्च, उच्च अवस्था हे सगळे बहालोक, हे सगळे देवलोक काय आहेत? आमच्याच कर्मसंस्कारांची बैंक आहे. आमचे व्हायब्रेशंस त्याच प्रकारे तेथे जाऊन समरस होतात आणि मृत्यूच्या वेळी तसेच व्हायब्रेशंस जागले तर आम्ही ताबडतोब खेचल्याप्रमाणे तेथे जातो._
_*म्हणून आम्ही शरीर आणि वाणीने सत्कर्म करतो, दान देतो, शील पालन करतो, सेवा करतो, भले करतो, त्यांच्या ज्या व्हायब्रेशंस होतात त्या आम्हाला देवगतीकडे, (सहा देव लोक आहेत) एका पेक्षा एक सूक्ष्म व्हायब्रेशनसह समरस करीत घेऊन जातात आणि मृत्यूच्या वेळी तशाच व्हायब्रेशन जागल्या तर प्रकृती आम्हाला खेचून तेथेच घेऊन जाईल.......*_
✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹
*_लेखक :- कल्याणमित्र सत्यनारायण गोयन्का_*
_बुद्धवर्ष २५६१,श्रावण पौर्णिमा, ७ ऑगस्ट, २०१७, वर्ष १, अंक ५_
*_संकलन :- महेश कांबळे_*
*_दिनांक :-_* २७/०२/२०२५
✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹
No comments:
Post a Comment