Monday, 24 February 2025

धम्मचक्कप्पवत्तनसुत्त प्रवचन (भाग २)

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

*_धम्मचक्कप्पवत्तनसुत्त प्रवचन (भाग २)_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2025/02/blog-post_24.html

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

_*'सङ्खित्तेन पञ्चुपादानक्खन्धा दुक्खा'* संक्षेपात, थोडक्यात, सखोलतेने ही बाब समजते की हे पाच उपादान व या पाच उपादानांनी तयार झालेले हे पाच स्कंध आणि या पाच स्कंधांच्या प्रती जे उपादान आहे, जो लगाव आहे, जी आसक्ती आहे, ते दुःख आहे...._

_आम्हाला हा लोक मिळो की तो, ही योनी मिळो की ती, आमच्या दुःखांचा अंत होत नाही, कारण पाच उपादान आमच्या सोबत आहेत. तसेच सर्वात जास्त उपादान या 'मी' च्या प्रती, शरीराप्रती, चित्ताप्रती आहे. ही बाब साधना करत करत, सखोलतेत उत्तरत-उत्तरत समजू लागते. हे जन्मणे, मरणे, वृद्ध होणे... ही तर मोठी स्थूल-स्थूल दुःख आहेत. वस्तुतः दुःख तर पंच स्कंधांप्रती उपादानच आहे. तसे खुपदा या पंच स्कंधामुळे सुख जाणवते, खूप सुखद संवेदना येते, खूप सखोलतेत जाऊन शांतीही मिळते, परंतु उपादान कायम आहे- हा मी आहे, हे मला किती सुख मिळत आहे, ही मला किती शांती मिळत आहे !_

_हे हा मी आहे, माझे आहे, मी आहे, माझे आहे, खूप सूक्ष्म अवस्थेतही चालूच असते. जोपर्यंत स्थूल स्थूल दुःखालाच दुःख मानतो आणि दुःखाच्या बाहेर निघू इच्छितो, तर नाही निघू शकणार, हे जे सूक्ष्म स्तरावरील सुख आहे, ज्याला अज्ञान अवस्थेत जगातील सर्व लोक खूप सुख म्हणतात, खूप शांती म्हणतात, ते सुख नाही. कारण हे क्षेत्र अजूनही पंच स्कंधांचेच आहे, नाम व रुपाचेच आहे. त्या अवस्थेत कितीही सुखद संवेदना येत असो, कितीही प्रश्रब्धी जाणवत असो, अजून हे याच उपादानाचे क्षेत्र आहे. याचा अर्थ हा आहे की अजून भवचक्र आहे. ही तर अनित्य स्थिती आहे, नेहमी राहणारी नाही. तिच्या प्रती आसक्ती, म्हणजे, पंच स्कंधांची आसक्ती. *पंच स्कंधांच्या कोणत्याही अनुभूती प्रती आसक्ती होणे दुःखच दुःख आहे. असे समजू लागेल तर समजा सखोलतेने दुःख व त्याच्या सत्याला अनुभूतीवर उत्तरवून पाहिले.*_

_*'इदं खो पन, भिक्खवे, दुक्खसमुदयं अरियसच्चं।'* आता दुसरे आर्य सत्य समुदय- दुःखाचे उत्पन्न होणे, *'यायं तण्हा पोनोब्भविका नन्दिरागसहगता तत्रतत्राभिनन्दिनी।'*ही जी तण्हा आहे. तृष्णा आहे -ती दुःख आहे. ही का जागते ? कशी जागते ? म्हणण्यासाठी म्हणतात- दुःखाचे कारण काय आहे ? परंतु भगवानांचे आपले शब्द पाहाल, तर ते म्हणतात- दुःखाचा समुदय काय आहे ? दुःखाचा समुदय तृष्णा आहे. तृष्णा जागली तर दुःखच जागले. तृष्णेच्या सोबतच दुःखाचा उदय झाला. म्हणजे दुःखाचे कारणच नाही, तर तृष्णा स्वताच दुःख आहे._

_काय आहे तृष्णा? जे आहे त्यात संतुष्टी नाही, त्यात तृप्ती नाही, आणि जे नाही, त्यासाठी व्याकुळ आहे. ही स्थिती नेहमी कायम राहाते- हे नाही, हे नाही.... अशी स्थिती कधीही येत नाही की आता कोणताही अभाव नाही. कोणता ना कोणता अभाव नेहमी घेऊनच चालतो. सर्व काही झाले, पण हे तर नाही... अरे, हे कधीही मानणार नाही की 'आता काही नको. आता अजून पाहिजे, अजून पाहिजे.... यालाच तृष्णा म्हणतात. जसे गळा सुकतो पाण्याविना, तसेच तृष्णेचे जागणेच दुःखाचे जागणे आहे._

_कशी तृष्णा? *कामतण्हा* कामभोगांची तृष्णा, इच्छांची तृष्णा. हे व्हावे, हे व्हावे लागते. यातून निघतो तर अजून एक तृष्णा मागे लागते._

_*भव-तण्हा- भवाची तृष्णा-* काय ठेवले आहे या जगात? दुःखच दुःख आहे. परंतु भव तर जरुर असो, कोणत्याही प्रकारे मी तर कायम राहू. ही मी च्या प्रती, आत्मभावाच्या प्रती, किती सखोल आसक्ती. हा 'मी' कायम राहिलाच पाहिजे. ह्या दुःखाच्या जगातून सुटका होवो, परंतु एक अमर लोक तर पाहिजेच तर स्वर्ग लोक अमर आहे. मग कोणी म्हणेल, स्वर्गही अमर नाही, तेथेही मृत्यू येतोच. तर एखाद्या ब्रह्मलोकात जन्म व्हावा. मी अमर होईन. कोणी म्हणतो नाही, नाही, निर्वाण होईल, तेव्हा जाऊन अमर होऊ. तर मग माझे निर्वाण व्हावे, पण मी तर कायम राहावे, मी भवातच राहावे. कधीही अभवात न जावे. मी भवातच राहावे._

_अशा वेळी जेव्हा कोणी कानात म्हणते की बाकी सर्व काही नष्ट होणारे आहे, पण तू तर कायम राहशील. ही बाब खूप प्रिय वाटते. बाकी सर्व काही नष्ट होईल. पण मी तर कायम राहीनच, यालाच *भवतृष्णा* म्हटले. ही स्थिती कायम राहिली पाहिजे की मी कायम राहीन, या भवात राहीन अथवा त्या भवात राहीन, या लोकात राहीन, अथवा त्या लोकात राहीन परंतु मी कायम राहीन._

_*विभव-तण्हा- तसेच विभव तृष्णा.* दोन अंत आहेत. एक अंत तर भवात राहू इच्छितो, दुसरा विभवात. मला या साऱ्या भवचक्रातून मुक्त व्हावयाचे आहे. अरे, 'विभव-विभव'... ही पाहिजे- पाहिजेचा आजार आहे ना ! ही विभव तृष्णाही आम्हाला त्या अवस्थेत घेऊन जाणार नाही. ती तर मुक्तीची अवस्था आहे. अष्टांगिक मार्गावर चालू तर आपोआप भवचक्र तुटून जाईल आणि मुक्त होऊच. परंतु जोपर्यंत त्याची तृष्णा आहे, तोपर्यंत मुक्ती खूप दूर आहे._

_*'इदं खो पन, भिक्खवे, दुक्खनिरोधं अरियसच्चं।'* हे एक आर्य सत्य आहे, ज्यात दुःखाचा निरोध झाला. समाप्त झाले. पण कसे समाप्त झाले ? *'यो तस्सायेव तण्हाय असेसं'* जिथे तृष्णा असेस, म्हणजे शेष नाही. आता थोडीशीही तृष्णा नाही. *'असेस विरागं'* आसक्ती राहिली नाही जराशीही, तृष्णा राहिली नाही, आसक्ती मुळापासून निघाली, वीतराग अवस्था प्राप्त झाली तर 'निरोधो। निरुद्ध झाला. थोड्यावेळाकरीता न जागे एक बाब झाली. पण आतातर आसक्ती जागूच शकत नाही. अशा अवस्थेला प्राप्त झाला तेव्हा *'निरोधो'* आता सर्व सुटले. कोणात जी जी आसक्ती होती, आसक्तीचे आलंबन होते, ते सर्व सुटले. *'पटिनिस्सग्गो'* त्या सर्वातून निघून गेला. 'मुक्ती' ती मुक्त अवस्था आहे. *'अनालयो'* आता अजून काही ग्रहण करण्यासाठी कोणताही आलय नाही. कोणताच आधार नाही._

_सर्व आधार, सर्व आलंबनांना तोडून, जी अवस्था प्राप्त झाली ती निर्वाणाची अवस्था आहे. जोपर्यंत नाम आणि रुपाच्या क्षेत्रात, सहा इंद्रियांच्या क्षेत्रात विचरण करत आहे, तोपर्यंत ती अवस्था नाही. ही अवस्था या सर्वांच्या पलीकडे- निर्वाणिक अवस्था आहे. ही निर्वाणाची निरोध अवस्था, अर्हताची निरोध अवस्था, स्रोतापन्नाची निर्वाणिक अवस्था- आम्हाला मुक्तीकडे घेऊन जाण्यात सहायक झाली. एका अंशी आमची मुक्ती झाली. खालच्या अपाय लोकांतून आमची मुक्ती झाली. परंतु अजून लोकांपासून आम्हाला मुक्त व्हायचे आहे. असे होता-होता अर्हत अवस्थेची अनुभूती केली. त्याचा निरोध, म्हणजे, निर्वाणाच्या अवस्थेचा अनुभव केला, तर बिल्कुल मुक्त झाला. त्या अवस्थेसाठी म्हटले की आता यानंतर पकडण्यासाठी अजून काही नाही. एकदम मुक्त आहे. सर्व तृष्णा एकदम अशेष झाली, समाप्त झाली._

_*'इदं खो पन, भिक्खवे, दुक्खनिरोधगामिनीपटिपदा अरियसच्चं।'* आता हे चवथे आर्य सत्य. ही मध्यम मार्गाची प्रतिपदा, *दुक्खनिरोधगामिनी पटिपदा- 'अयमेव अरियो अट्ठङ्गिको मग्गो... सम्मादिद्वि... सम्मासमाधि... इत्यादि।'*हा त्या अवस्थेपर्यंत पोहोचण्याचा मार्ग आहे. ही चारही आर्यसत्य, हे धर्माचे प्रथम प्रकाशन आहे. याला समजले पाहिजे._

_काय विशेष बाब सांगितली ह्या मनुष्याने ? जी भिन्न-भिन्न मत कायम होती त्या वेळी तर, असे एखाद्या संप्रदायाच्या नेत्याशी चर्चा केली वा स्वतःला धर्माचा नेता म्हणणाऱ्याशी चर्चा केली तर ते सर्व हेच म्हणतील मुक्त अवस्थेपर्यंत पोहोचायचे आहे. पण कसे पोहोचायचे आहे? काय आहे मुक्त अवस्था? कोणाची मुक्ती? कशापासून मुक्ती? त्या सर्व बाबी गौण होतील आणि त्या मुक्त अवस्थेपर्यंत पोहोचायचे आहे या बाबीला घेऊन अशा जंजाळात पडतील की मुक्तीच्या विपरीत रस्त्यावर पळतील. परंतु जेव्हा शुद्ध धर्म जागेल तर इतर बिनाकामाच्या बाबी, ज्या बाबींचा आमच्या बंधनांशी, बंधनांच्या कारणांशी, आमच्या मुक्तीशी, मुक्तीच्या उपायाशी काहीही देणे-घेणे नाही- या सर्व बाबींना एका बाजूला ठेवू, व्यर्थ बाबी आहेत, बिनाकामाच्या बाबी आहेत, सोडा यांना, या दार्शनिक मान्यता आहेत, लोकांना गुंतवून ठेवतात धर्माच्या नावावर, अध्यात्माच्या नावावर, जणू काही या मान्यतेला मानण्यामुळेच मी मुक्त होईन. शुद्ध धर्मात या सर्वांना काहीही स्थान नाही._

_*'दुःख आहे'- व* एखाद्या मान्यतेला मानणारा असो, या संप्रदायात दीक्षित असो की त्या संप्रदायात, याला नाकारु शकत नाही दुःख तर आहेच. हे केवळ बौध्दांचे वा एखाद्या सम्यक संबुद्धांनी तयार केलेले सत्य नाही. कोणी सम्यक संबुद्ध बनला नाही तरीही दुःख तर आहेच. तसेच दुःखाचे कारण तर आहेच. दुःखाच्या कारणाला दूर करण्याचा उपाय तर आहेच. त्या उपायाला ग्रहण करुन दुःखाला संपूर्ण नष्ट करण्याच्या अवस्थेपर्यंत पोहोचायचे आहे._

_त्या सत्याला, प्रकृतीच्या त्या नियमांना, ज्यांना कालावधी जाता-जाता मानव समाज विसरत जातो आणि त्याऐवजी एखाद्या बिनाकामाच्या बाबीला पकडत जातो. हे दुःख कोणत्याही एका संप्रदायाचे, एका जातीचे, एका वर्णाचे, एका समाजाचे नाही. जीवनातले हे इतके मोठे सत्य आहे दुःख आहे._

_दुःखाचे कारण आहे, तृष्णा आहे, कोणत्याही एका जातीविशेष, वर्गविशेष, वर्णविशेष, देशविशेष वा समयविशेषची नाही. तृष्णा जेव्हा जागते, ज्याच्यात जागते दुःखाच्या सोबतच जागते. हा प्रकृतीचा आपला नियम आहे. शुद्ध धर्माला याच अर्थाने सद्धर्म म्हणतात, सत्य धर्म म्हणतात. हे जीवनाचे, प्रकृतीचे सत्य आहे तृष्णा जागली की दुःख जागले. तृष्णा दूर झाली, तर दुःख दूर झाले._

_तृष्णा दूर करण्यासाठी तृष्णा जिथे जागते तिथपर्यंत पोहोचले पाहिजे. तर प्रथम आमच्या शरीराची, वाणीची जी वरवरची काम आहेत, यांना सुधारुन शीलाला विशुद्ध करावे लागेल. त्यानंतर मनाला वश करुन, क्षण-प्रतिक्षण आपल्या मनाला अशा स्थितीत ठेवावे की त्यात विकार जागू नयेत, यासाठी समाधीचा अभ्यास करावा लागेल. अंतर्मनाच्या सखोलतेत जो विकारांचा संग्रह करुन ठेवला आहे, त्यांना दूर करण्यासाठी प्रज्ञेचा अभ्यास करावा लागेल._

_शुद्ध धर्म, निसर्गाचे नियम सार्वजनिक आहेत. या चारही बाबीत आम्ही पाहू की सखोलतेपर्यंत दुःखच दुःख, दुःखच दुःख, ज्याला आम्ही सुख म्हणतो वस्तुतः तेही दुःखच आहे. ही बाब आता अनुभूतींनी समजेल की दुःख का आहे? सुखद अनुभूतींची आसक्तीच आमच्या दुःखाचे कारण आहे. आम्ही दुःखद अनुभूती इच्छित नाही, आम्हाला सुखच पाहिजे, अशी सखोल आसक्ती आहे. वारंवार तसेच पाहिजे आणि तसे नेहमी होत नाही तर व्याकुळ होतो. अथवा झाले तर त्यापेक्षा जास्त सुख पाहिजे, अजून जास्त सुख पाहिजे. व्याकुळच व्याकुळ, व्याकुळच व्याकुळ, ही बाब समजली तर दुःख समजले. दुःखाचे कारण समजले. त्याला दूर करण्याचा मार्ग आहे. त्याला जाणायचे आहे पाहा कसे दुःख जागते आहे? माझ्या आत जिथे तृष्णा जागते तिथपर्यंत पोहोचायचे आहे. तिथपर्यंत पोहोचण्यासाठी मनाला शांत करावे लागते, एकाग्र करावे लागते. त्यानंतर अंतर्मनाच्या सखोलतेत जात-जात पाहा, तृष्णा जागली ना सुखद अनुभूती झाली तर आसक्ती जागली ना! दुःखद अनुभूती झाली तर द्वेष जागला ना ! ही बाब सर्वांनाच होते. सार्वजनिक बाब आहे. हा प्रथम उपदेशच या बाबीला सिद्ध करतो की ही व्यक्ती खरोखर सम्यक संबुद्ध आहे. याला कोणत्याही संप्रदायाशी घेणे-देणे नाही. याच्यासमोर एकच लक्ष आहे की कोणत्या प्रकारे सर्व लोक जे व्याकुळ आहेत. दुःखी आहेत आणि त्यांच्या दुःखाचे हे कारण आहे, त्याला दूर करोत. जसे मी आपल्या अनुभूतीने जाणले आणि आपल्या दुःखाचे निवारण केले, त्याच प्रकारे सर्व लोक आपल्या अनुभूतीने जाणून आपापल्या दुःखाचे निवारण करोत. यासाठी लोकांना शुद्ध धर्म वाटतो._

हा प्रथम उपदेशच आहे ज्याला ते आपल्या जीवनातील पंचेचाळीस वर्ष देत गेले. त्याचे जे स्वरुप समोर आले, ती आहेत चार आर्यसत्य....

- क्रमशः 

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

*_लेखक :- कल्याणमित्र सत्यनारायण गोयन्का_*

_बुद्धवर्ष २५६०, फाल्गुन पौर्णिमा, १२ मार्च २०१७, वर्ष ३ अंक १२_

*_संकलन :- महेश कांबळे_*

*_दिनांक :-_* २४/०२/२०२५

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

No comments:

Post a Comment

कोलित सुत्त

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_कोलित सुत्त_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_41.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼  _'कोलित सुत...