Saturday, 1 March 2025

धम्मचक्कपवत्तनसुत्त-प्रवचन (भाग ४/४)

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

धम्मचक्कपवत्तनसुत्त-प्रवचन (भाग ४/४)

https://mikamblemahesh.blogspot.com/2025/03/blog-post.html

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

*_भगवानांच्या मुखातून निघालेले पहिले उदान_*

_जेव्हा कोणी व्यक्ती ध्यानाचे काम सुरु करते तेव्हा जी पहिली चार ध्यान आहेत ... त्यापैकी प्रथम ध्यानापासूनच ब्रह्मलोकाच्या व्हायब्रेशन सुरु होतात. सोळा ब्रह्मलोकांपैकी आम्ही कशा प्रकारचे ध्यान करीत आहोत? प्रथम ध्यानाच्या अवस्थेपर्यंत पोहोचतो तेव्हा प्रथम ध्यानाचा प्रयत्न करीत असतांनाच आमचा ब्रह्मलोकाशी संबंध झाला. दुसऱ्या ध्यानापासून आणखी त्यापेक्षा उच्च ब्रह्रालोकाशी संबंध झाला. तिसऱ्या, चौथ्या... अशाप्रकारे उच्चाहून उच्च ब्रह्मलोकाशी आमचा संबंध होत चालला. एक ब्रह्मलोक जो खूप उंचावर आहे आणि खूप सूक्ष्म आहे, तो आहे *'अविहा.'*_

_हा अविहा काय आहे? सगळ्या ब्रह्मलोकात अरुपब्रह्मलोकसुद्धा भवाग्र, लोकाग्रपर्यंत स्थापित आहे. ते सगळेच्या सगळे असे आहेत की तेथील वेळ समाप्त झाल्यानंतर पतन होणारच. खाली पडणारच, कारण आपल्या अंतर्मनातील सगळ्या भवसंस्कारांना काढले नाही. आठही ध्यान करणाऱ्या व्यक्तीने सुद्धा आपल्या अंतर्मनातील भव-संस्कारांची मुळे काढली नाहीत. क्लेश आहेत अजून. त्याने प्रथम ध्यानापासून आठव्या ध्यानापर्यंत ध्यान केले आहे म्हणून जसे-जसे ध्यान केले तसे तसे त्या-त्या लोकात त्याचा जन्म होईल, त्यांचे आयुष्य खूप दीर्घ असते. अनेक कल्पांचे आणि अशा सुख-शांतीचे की त्याची कोणाशीही बरोबरी नाही. बाकी दुसऱ्या लोकात तशी शांती मिळू शकत नाही, इतक्या सुखशांतीचे जीवन असते. परंतु मुळापासून विकार निघाले नाहीत, म्हणून जे काही त्या ध्यानाचे फळ त्याला मिळते ते त्याने तेथे सगळे भोगले. ते समाप्त झाल्याबरोबर कोणता ना कोणता दबलेला विकार जो अजून निघाला नाही, त्याने मृत्यूच्या वेळी डोके वर काढले. त्यामुळे कोणत्या तरी खालच्या लोकात आला. त्याचे भवचक्र चालतच राहिले, चालतच राहिले._

_*हा 'अविहा' असा ब्रह्मलोक आहे की तेथून पतन होत नाही. तो ब्रह्मलोकातच आहे पण ह्या लोकात येऊन पतन होत नाही. याचा अर्थ कोणती व्यक्ती येथे पोहोचेल? अशीच व्यक्ती जी अनागामी झाली. पुन्हा येणार नाही, स्रोतापन्न, सकृदागामीची अनुभूती करीत असतांना ती अनागामीची अनुभूती करेल. अनागामीची अनुभूती करेल तेव्हा चारही ध्यानात त्या व्यक्तीला परफेक्ट व्हावे लागेल, चारही ध्यानात परफेक्ट झाली तर मृत्यूच्या वेळी तिला हाच ब्रह्मलोक मिळेल. 'अविहा' कारण यातून आता ती व्यक्ती खाली पडणार नाही.*_

_*आता त्या अविहामध्ये जन्म घेतल्यानंतर त्याचा जेवढा वेळ आहे, जेवढा जीवनकाळ आहे तो पूर्ण झाल्यावर तेथेच अर्हत होऊन मुक्त होईल, म्हणून त्याला 'अविहा' म्हणतात.*_

_*'इति हि तेन खणेन'* त्या वेळी, त्या क्षणी *'तेन मुहुत्तेन'* त्या मुहुर्तात *'याव ब्रह्मलोका सद्दो अब्भुग्गच्छि'* जसे ब्रह्मलोकापर्यंत ही गोष्ट पोहोचली की संसारात कोणी व्यक्ती सम्यक संबुद्ध झाली आहे. तिने धर्मचक्र प्रवर्तन केले (ही सामान्य गोष्ट नाही); जेव्हा ही तरंगे ब्रह्मलोकापर्यंत पोहोचली तेव्हा *"अयञ्च दससहस्सी लोकधातु सङ्कम्पि सम्पकम्पि सम्पवेधि...".*_

_कोणी जेव्हा सम्यक संबुद्ध होतो तेव्हा त्याच्या तरंगा दूर-दूरपर्यंत पसरतात. ही व्यक्ती सम्यक संबुद्ध झाली तर ती चार असंख्येय आणि एक लाख कल्पात पारमिता पूर्ण करुन सम्यक संबुद्ध झाली. जितके सम्यक संबुद्ध झाले त्यापैकी हा सर्वात लहान सम्यक संबुद्ध. सिद्धार्थ गौतम सगळ्यात लहान सम्यक संबुद्ध आहे. त्यांनी चार असंख्येय आणि एक लाख कल्पात पारमिता पूर्ण केल्या. काही सम्यक संबुद्ध होतात ते आठ असंख्येय काही होतात ते बारा असंख्येय काही होतात ते सोळा असंख्येय कल्पांपर्यंत पारमिता पूर्ण करता-करता सम्यक संबुद्ध होतात. जेवढ्या अधिक पारमितांचा संग्रह असेल तेवढ्या त्यांच्या धर्म तरंगा मोठ्या क्षेत्रापर्यंत प्रभावशाली होतात. ह्या गौतम नावाच्या सम्यक संबुद्धाच्या पारमितांचा इतका संग्रह आहे की त्यामुळे दहा हजार चक्रवालपर्यंत त्यांची व्हायब्रेशन्स जातात आणि त्या लोकांना प्रभावित करतात._

_जेव्हा ही घटना घडली तेव्हा दहा हजार चक्रवाल... हे चक्रवाल काय आहे? एक चक्रवाल आणि एक सौर मंडळ सूर्याभोवती अनेक ग्रह, उपग्रह फिरतात. चक्रवालांचे ह्या सूर्य-चंद्र इत्यादींशी देणे-घेणे नाही. हे जे एकतीस लोक आहेत ह्या एकतीस लोकांचे एक चक्रमंडळ आहे. अशा प्रकारची दहा हजार चक्रमंडळे, या दहा हजार चक्रमंडळात त्यांची तरंगे पोहोचली. ह्या दहा हजार चक्रमंडळात एक प्रकंपन झाले._

_*"अप्पमाणो च उळारो ओभासो लोके पातुरहोसि, अतिक्कम्म देवानं देवानुभावन्ति।"* हा जो देवांचा, ब्रह्मांचा प्रकाश पसरतो त्याच्या अनेकपट जास्त प्रकाश त्या वेळी ह्या दहा हजार चक्रवालात पसरला._

_*"अथ खो भगवा इदं उदानं उदानेसि"* ही घटना घडल्यानंतर भगवानांच्या तोडून हे उदान निघाले, हर्षाचे उद्‌गार निघाले. *जेव्हा हर्षाचे, धर्माचे उद्‌गार निघतात तेव्हा त्यांना त्या काळच्या भाषेत 'उदान' म्हणत असत.* हे उदान निघाले. कोणते उदान निघाले? त्या वेळी भगवानांची कोणती वाणी निघाली ?_

_*"अञ्ञासि वत, भो, कोण्डोञ्ञो अञ्ञासि वत, भो, कोण्डोञ्ञो "ति।* अरे कोण्डञ्ञ जे जाणले. अरे किती हर्ष! कोणत्या गोष्टीसाठी निघाले? की सगळे लोक अंधकारात आहेत. त्यांना माहीत नाही की धर्म काय असतो? त्यांना माहीत नाही दुःख काय असते? दुःखाचे कारण काय असते, दुःखाचे निवारण काय असते? दुःखाच्या निवारणाची पद्धत काय असते? पहिल्या वेळी ज्या लोकांना समजविले, त्यावेळी ते समजवित असतांना एकाने निरोध अवस्था प्राप्त केली. अरे, याला ज्ञान मिळाले. एकाला सत्य ज्ञान मिळाले. भगवानांच्या तोंडून हे उद्‌गार निघतात *'अञासि वत, भो, कोण्डोञ्ञो....* अरे, हा कोण्डञ्ञ नावाचा ब्राहाण, त्याने खरोखर ज्ञान प्राप्त केले, कारण त्याला निरोध अवस्था प्राप्त झाली. भगवानांना माहीत झाले की याला निरोध अवस्था प्राप्त झाली, एकाला निरोध अवस्था प्राप्त झाली, सत्य ज्ञान प्राप्त झाले, सम्यक ज्ञान प्राप्त झाले, सत्य ज्ञान अनुभूतीवर उतरले." *'अञ्ञासि वत, भो, कोण्डोञ्ञो"ति।" "इति हिदं आयस्मतो कोण्डञ्ञस्स अञ्ञा कोण्डोञ्ञो त्वेव नामं अहोसि'ति"।* त्या नंतर ह्या कौंडञ्ञ ब्राह्मणाचे नाव 'अञ्ञाकोण्डञ्ञ' पडले ज्ञानी कोण्डञ्ञ, खऱ्या अर्थाने 'ज्ञानी कोण्डञ्ञ' आहे. जीवनभर लोक त्याला 'अञ्ञाकोण्डञ्ञ', 'ज्ञानी कोण्डञ्ञ' म्हणू लागले._

_हे भगवानांचे उद्‌गार. एखा‌द्या व्यक्तीला धर्म शिकविताना त्या व्यक्तीला धर्माची उपलब्धी झाली तर शिकविणाऱ्याला हर्ष होतो. हे पहिले धर्मचक्र आणि त्या धर्मचक्राच्या प्रवर्तनात एका व्यक्तीला स्रोतापन्न अवस्थेचा साक्षात्कार झाला. तिने आपल्या आत उदय-व्यय, उदय-व्यय, उदय-व्यय पाहून निरोध अवस्थेचा साक्षात्कार केला._

_त्यामुळे महत्वपूर्ण आहे की सगळे काम प्रॅक्टीकलच प्रॅक्टीकल. केवळ थिअरीची, सिद्धांताची गोष्ट नाही, केवळ उपदेशांची गोष्ट नाही._

_उपदेश सुरु आहे. त्या उपदेशाबरोबर एका माणसाने विपश्यना सुरु केली. विपश्यना करता-करता निरोध अवस्थेचा अनुभव केला. *सम्यक संबुद्धांची शिकवण हीच आहे की केवळ उपदेश ऐकून आसक्त होऊ नका.* खूप खुश व्हाल आणि गर्वाने म्हणू लागाल की अरे आमच्या सम्यक संबुद्धांचे काय सांगावे? खरोखर सम्यक संबुद्ध आहे. पाहा, किती सत्य गोष्ट सांगितली ! किती शुद्ध धर्म शिकविला! जेथे कोणताही खोटेपणा नाही, कोणत्याही प्रकारचे बंधन नाही. कोणतीही सक्ती नाही, किती शुद्ध धर्म! असे म्हणूण आम्हाला काहीही मिळाले नाही._

_जे काही सांगितले जात आहे, तसे आम्ही करीत आहोत, करीत आहोत, करीत आहोत. तीन प्रकारांनी ह्या चारही आर्य सत्यांचे दर्शन करीत आहोत. तेव्हा आमचे कल्याण होणारच. ही बाब अशाच प्रकारची झाली. धर्मचक्रच अशा प्रकारे चालले._

_*भवतु सब्ब मङ्गलं ।...*_

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

*_लेखक :- कल्याणमित्र सत्यनारायण गोयन्का_*

_बुद्धवर्ष २५६१, भाद्रपद पौर्णिमा, ६ सप्टेंबर, २०१७, वर्ष १ अंक ६_

*_संकलन :- महेश कांबळे_*

*_दिनांक :-_* ०१/०३/२०२५

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

No comments:

Post a Comment

कोलित सुत्त

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_कोलित सुत्त_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_41.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼  _'कोलित सुत...