Wednesday, 26 February 2025

धर्मचक्रप्रवर्तन सुत्त प्रवचन भाग ३

 ✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

*_धम्मचक्कप्पवत्तनसुत्त प्रवचन (भाग ३)_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2025/02/blog-post_26.html

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

*_चार आर्यसत्यांचे पूर्ण ज्ञान झाले पाहिजे_*

_चार आर्यसत्यांच्या ह्या सगळ्याच्या सगळ्या चारही अवस्था अनुभूतीवर उत्तरल्या पाहिजेत. तेव्हा म्हणतात *'यावकीवञ्च मे, भिक्खवे, इमेसु चतूसु अरियसच्चेसु'* हि जी चार आर्यसत्य आहेत त्या प्रत्येक आर्यसत्याला 'तिपरिवट्ठं' तीन प्रकारांनी म्हणजे 'द्वादसाकारं' बारा प्रकारांनी ह्या सत्यांचे पूर्ण ज्ञान करायचे आहे. ह्या सत्यांचे पूर्ण ज्ञान झाले. ह्या बारामधून स्वतः गेलो. जो पर्यंत गेलो नाही तो पर्यंत *'यथाभूतं ञाणदस्सनं न सुविसुद्धं अहोसि'* माझे ज्ञान, माझे दर्शन शुद्ध झाले नाही. *सम्यक ज्ञानाशिवाय, सम्यक दर्शना (दार्शनिक मान्यता नाही) शिवाय कोणतीही व्यक्ती सम्यक संबुद्ध होणार नाही.* त्याची सगळी वाणी अशा प्रकारे कायम राहील पण बिघडून जाईल कारण अनुभूतीवर उतारण्याची बाबच विसरुन जातील. आमची मान्यताच सम्यक ज्ञान आहे, सम्यक दर्शन आहे._

_*सम्यक ज्ञान तेच असते जे आमच्या अनुभवावर उत्तरते. त्या अनुभवाने जे ज्ञान उदयास येते ते आमचे स्वतःचे ज्ञान, सम्यक ज्ञान आहे; खरेखुरे ज्ञान आहे; योग्य ज्ञान आहे. अनुभूतीने उदयास आलेले ज्ञान आहे, कोणी सांगितलेल्या ऐकलेल्या गोष्टीमधून नाही. असे ज्ञान, असे दर्शन तोपर्यंत विशुद्ध होत नाही, जोपर्यंत ते सम्यक होत नाही. सम्यक तोपर्यंत होत नाही जोपर्यंत स्वतःच्या अनुभूतीवर उतरत नाही.* तेव्हा म्हणतात *'यथाभूतं'* जसे आहे तसे. *"यथाभूतं ञाणदस्सनं न विसुद्धं अहोसि"* जोपर्यंत सुविशुद्ध झाले नाही तो पर्यंत *'नेव तावाहं'* मी ह्या गोष्टीचा दावा केला नाही की *'सदेवके लोके समारके सन्ब्रह्मके सस्समणब्राह्मणिया पजाय सदेवमनुस्साय 'अनुत्तरं सम्मासम्बोधिं अभिसम्बुद्धो 'ति पच्चञ्ञासिं।'* अशा संसारात ज्यामध्ये देवही आहेत. ब्रह्मही आहेत, मारही आहे, श्रमणही आहेत, ब्राह्मणही आहेत, ही सगळी प्रजा आहे. यांच्यामध्ये मी ह्या गोष्टीचा स्वीकार केला नाही की मला सम्यक संबोधी प्राप्त झाली. *त्या वेळी सुद्धा भारतात अनेक लोक होते, त्या पूर्वीही होते, जे केवळ बुद्धीच्या स्तरावर धर्म समजून ह्या गोष्टीचा दावा करीत होते 'आम्ही बुद्ध झालो. ही व्यक्ती म्हणते की जोपर्यंत माझ्या अनुभूतीवर ह्या चारही गोष्टी बारा प्रकारांनी उतरत नाहीत तो पर्यंत मी दावा केला नाही की मला ज्ञान प्राप्त झाले, मला सम्यक संबोधी प्राप्त झाली.* पुढे म्हणतात-_

*_'यतो च खो मे, भिक्खवे, इमेसु चतूसु अरियसच्चेसु एवं तिपरिवट्ठं द्वादसाकारं यथाभूतं ञाणदस्सनं सुविसुद्ध अहोसि,_*

_हि चारही आर्य सत्य तीन पद्धतींनी, बारा प्रकारांनी मी अनुभवली तेव्हा माझे ज्ञान आणि दर्शन सुविशुद्ध झाले. सगळ्या संसारात ज्या ठिकाणी देव आहेत, मार आहे. ब्रह्म आहे, श्रमण आहेत, ब्राह्मण आहेत, प्रजा आहे, मनुष्य आहेत तेव्हा ह्या गोष्टीचा मी स्वीकार केला की *'अनुत्तरं सम्मासम्बोधिं अभिसम्बुद्धो ति'* मला सम्यक संबोधी प्राप्त झाली. ह्या गोष्टीला मी स्वतः स्वीकारले आणि घोषणा केली *'ञाणञ्च पन में दस्सनं उदपादि'* आता खऱ्या अर्थाने ज्ञान उत्पन्न झाले, खऱ्या अर्थाने दर्शन उत्पन्न झाले. त्या अवस्थेचा अनुभव झाला ज्या ठिकाणी पोहोचणारा माणूस अनुभवतो की आता माझा पुनर्जन्म होणार नाही._

_*पुनर्जन्म होणार नाही ही अंधविश्वासाची गोष्ट नाही.* त्या अर्हत्वाच्या निरोध समापत्तीचा अनुभव करुन जेव्हा माणूस बाहेर येतो तेव्हा सगळ्या गोष्टी खूप स्पष्ट होतात. जेवढे जेवढे जन्म देणारे संस्कार होते, ते सगळे निघून गेले. एकही शिल्लक नाही आणि अशा प्रकारे जन्म देणारे नवे संस्कार आता बनू शकतच नाहीत. ही अवस्था प्राप्त झाली. ह्या अवस्थेला आपल्या अनुभवावर उतरवून जेव्हा दर्शन करतो तेव्हा म्हणतो *'अकुप्पा मे चेतोविमुक्ति'.* अरे, मला विमुक्ती प्राप्त झाली. *'अयमन्तिमा जाति'* हे माझे अंतिम जीवन आहे. *'नत्थिदानि पुनब्भवोति'* आता पुन्हा नवा भव, नवा जन्म होणार नाही._

_सत्य अनुभूतीवर उतरवून जी व्यक्ती असा दावा करते ती खरोखर मुक्त झाली. आणि सत्य अनुभूतीवर न उत्तरवितांना केवळ दार्शनिक मान्यतेच्या आधारावर दावा करतो तो बिचारा स्वतः गोंधळलेला आहे आणि इतरांनाही गोंधळात टाकतो._

_ही बुद्धांची संबोधी आहे की तो त्या अवस्थेवर पोहोचला. ह्या चारही आर्यसत्यांना तिन्ही प्रकारांनी आपल्या अनुभूतीवर उतरवून त्या अवस्थेवर पोहोचला जी मुक्त अवस्था आहे आणि, तेव्हा घोषणा करतो 'आता माझा पुनर्जन्म नाहीं' मी त्या अवस्थेचा स्वतः साक्षात्कार केला. भगवानांची ही वाणी ऐकून त्या पंचवर्गीय भिक्खुंचे मन खूप प्रसन्न झाले._

_आणखी एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की हे पाच भिक्षु भगवानांना विरोध करुन पळून गेले होते. कारण भारतात एक मान्यता अशाप्रकारे रुजली होती की शरीराला दंड दिल्याशिवाय मुक्ती मिळतच नाही आणि ह्या व्यक्तीने शरीराला दंड देण्याचे खूप काम केले. सहा वर्षापर्यंत दंड दिला. ह्यापूर्वी आठ ध्यान केली होती, तेव्हा अंतर्मनात पाहिले की शरीराला दंड देऊन जरासा सुद्धा लाभ झाला नाही म्हणून त्याचा त्याग केला आणि मध्यम मार्गाकडे गेला. जेव्हा त्याग केला तेव्हा पाच भिक्षू समजले की हा माणूस भ्रष्ट झाला. हा भ्रष्ट योगी आहे. हा कसा मुक्त होईल? म्हणून त्याला विरोध करुन सोडून गेले._

_आता जेव्हा तो येत आहे तेव्हा म्हणतात हा भ्रष्ट योगी आहे. आम्ही त्याची कोणतीही गोष्ट ऐकणार नाही, त्याचा सन्मान करणार नाही. तो राजपुत्र आहे. राजघराण्यातून आला आहे म्हणून बसण्यासाठी आसन जरुर देऊ, आणखी दूसरे काहीही करणार नाही. तेच लोक आता प्रसन्न मनाने ह्या सगळ्या गोष्टी स्वीकारतात कारण आता योग्य दृष्टीने पाहातात की अरे इतर सगळ्या गोष्टी आपल्या जागेवरच ठेवा. मुख्य गोष्ट ही आहे की दुःख आहे आणि पहा हे दुःखाचे कारण आहे. आणखी पहा हे दुःखाचे निवारण आहे आणि दुःख निवारण करण्याचा हा मार्ग आहे. आणि म्हणतो की ह्या चारही गोष्टींचा कोरा उपदेश नाही. मी यांना स्वतःच्या अनुभवावर उत्तरविले आहे. आता तुम्हाला समजविण्यास आलो आहे की आपल्या अनुभवावर उत्तरवा._

_हे पहिले धर्म-चक्र प्रवर्तन, पहिले धर्मचक्र प्रवर्तन तर खरोखर बोधी वृक्षाखाली झाले. आपल्या आत जे धर्मचक्र चालविले ते. लोकचक्रच चालत होते. प्रत्येक व्यक्ती आपल्या आत लोकचक्र, लोकचक्र, दुःखचक्र, दुःखचक्र हेच चालवितो, हे पहिल्यादांच आपल्या आत धर्मचक्र चालविले म्हणजे धर्म अनुभूतीवर उतरविला. जी गोष्ट मी कधीही ऐकली नव्हती ती आपल्या अनुभूतीवर उतरविली. *पुब्बे अननुस्सुतेसु धम्मेसु चक्खुं उदपादि.* धर्मचक्षु उघडले. जी गोष्ट पूर्वी कधी ऐकली नव्हती. धर्माच्या नावावर न जाणो काय-काय ऐकत राहिलो. आता धर्माच्या नावावर योग्य गोष्ट- हा कायदा आहे, हा नियम आहे, हे विधान आहे, ही प्रकृती आहे, ही नियती आहे. सगळ्या गोष्टी समजू लागल्या. *त्या सगळ्या गोष्टी आपल्या अनुभूतीवर उतरवतो तो सम्यक संबुद्ध होतो. जे धर्मचक्र आपल्या आत जागविले ते आता बाहेर चालो. व्यक्ती-व्यक्ती मध्ये धर्मचक्र प्रवाहीत होवो आणि ते दुःख-चक्राच्या बाहेर निघून जावोत. लोकचक्रातून बाहेर निघून जावोत. लोकांमध्ये धर्मचक्र जागविण्याचे पहिले काम केले म्हणून हा पहिला उपदेश आहे. लोकांसाठी धर्मचक्र प्रथमच जागले.*_

_आता जे पाच लोक बसले होते त्यांना सगळी बाब समजली. त्यांचे मन खूप प्रसन्न झाले. अरे, ही गोष्ट खूप चांगली सांगत आहे. आम्ही अशासाठी यांच्यापासून पळालो होतो की हा शरीराला दंड देत नव्हता. शरीराला दंड न देतासुद्धा या चारही गोष्टींचे दर्शन होऊ शकते, ही गोष्ट समजली._

_*'इमस्मिञ्च पन वेख्याकरणस्मिं भञ्ञमाने आयस्मतो कोण्डञ्ञस्स विरजं वीतमलं धम्मचक्खुं उदपादि 'यं किञ्चि समुदयधम्मं, सब्बं  निरोधधम्म' न्ति।'* पुढे जे वारंवार अनेक सूत्तांचे वाचन कराल, बुद्ध वाणीचा अभ्यास कराल, तेव्हा एक गोष्ट वारंवार अशी येत जाईल की आपल्या अडाणीपणामुळे मनात एक शंका निर्माण करेल, की ही कशी गोष्ट आहे? एकीकडे भगवान सांगतात *'एकायनो मग्गो'* आपल्या आत शरीर आणि चित्ताच्या अवस्थांचा अनुभव करीत असतांना, चार सतिपट्ठाण करीत असतांना मुक्त अवस्थेपर्यंत पोहोचू, भगवानांची इतकी मोठी घोषणा आहे आणि दुसरीकडे आम्ही पाहातो की वारंवार भगवान उपदेश देत आहेत आणि तो उपदेश समाप्त झाल्यानंतर इतके लोक स्रोतापन्न झाले, इतके लोक सकदागामी झाले, इतके लोक अर्हत झाले; अशा गोष्टी वारंवार वाचनात येतील. तेव्हा शंका येणारच. एकीकडे *'एकायनो मग्गो* आणि दुसरीकडे केवळ उपदेशच मार्ग झाला. म्हणजे सम्यक संबुद्धाचा केवळ उपदेश ऐकूनच मुक्त होऊ हा दुसरा मार्ग आहे ना. हा जास्त सरळ मार्ग आहे. मग कशाला त्यावर चालू? दोन्हीमध्ये विरोधाभास होईल._

_आता ही बाब समजून घेऊ या. साधक ध्यानाच्या खोलीत जाईल तेव्हा त्याला स्पष्ट समजेल की बुद्धासारखी व्यक्ती सांगत आहे, धर्माची गोष्टी समजावित आहे ती केवळ वाणी नाही. वाणीबरोबर धर्मधातू आहे, निर्वाण धातू आहे, मैत्री धातू आहे, तरंगे आहेत आणि जी जी व्यक्ती कोणत्या ना कोणत्या जन्मात त्यांच्याबरोबर राहिली आहे आणि आपल्या पारमिता पूर्ण करीत-करीत ह्या अवस्थेवर पोहोचली आहे, की ही व्यक्ती जेव्हा सम्यक संबुद्ध होईल तेव्हा याच्याबरोबर जन्म घेऊ आणि मुक्त अवस्थेपर्यंत पोहोचू. जे असे लोक आहेत, तेव्हा बुद्ध जे सांगतात, धर्म समजवितात, ते धर्म ऐकत आहे. तो धर्म ऐकता ऐकता आत तरंगे जागृत झाली. आत तरंगे जागत आहेत, अनित्य बोध समजू लागला. आत 'अनित्य आहे. अनित्य आहे' ही जाण आहे. तो उपदेश समाप्त होत नाही तोपर्यंत निर्वाणिक अवस्था प्राप्त झाली._

_काही लोकांना प्राप्त झाली, काही लोकांना प्राप्त झाली नाही. आतमध्ये चारही आर्यसत्यांची म्हणजे चारही सतिपट्ठाणांची आपोआप अनुभूती झाली म्हणून ही अवस्था प्राप्त झाली. केवळ उपदेशांनी होत नाही. तर *केवळ उपदेशांनी कोणी व्यक्ती अरहंत होईल ही मिथ्या धारणा मनातून काढून टाकली पाहिजे.*_

_त्या वेळी जेव्हा ह्या पाच व्यक्तींना सांगितले गेले तेव्हा त्यापैकी एकाला ही अवस्था प्राप्त झाली. *पाच ब्राह्मणांपैकी एकाला कौंडण्यला 'विरजं' जेथे रज नाही, रज म्हणजे आसक्ती नाही. 'वीतमलं' जेथे कोणता मळ नाही असे धर्म चक्षु उत्पन्न झाले. ही केवळ बुद्धिची गोष्ट नाही. सगळे सत्य त्याच्या अनुभूतीवर उतरले. कोणते सत्य अनुभूतीवर उतरले? 'यं किञ्चि समुदयधम्मं' जे जे उत्पन्न होणारे धर्म आहेत त्या सगळ्या अवस्था ज्यांना उत्पाद आहे 'सब्बं तं निरोधधम्मं' त्या सर्व निरोध होणाऱ्या स्वभावाच्या आहेत. उदय होणे व्यय होणे हा त्यांचा स्वभाव आहे.* विपश्यना करणारी प्रत्येक व्यक्ती जाणते, विपश्यनेची सुरुवातच येथून होते. पाहा उदय होत आहे, व्यय होत आहे. *'समुदयधम्मानुपस्सी विहरति, वयधम्मानुपस्सी विहरति'.*_

_निर्वाणिक अवस्थेची पहिल्यांदा अनुभूती होईल तेव्हा 'निरोधधम्मा', पहिल्यांदा निरोधाची अनुभूती झाली. हे जे उत्पन्न होते, व्यय होते, हे चक्र चालूच राहाते, परंतु एक अवस्था अशी येते जेथे निरोध होतो. जेथे त्याची उत्पत्तीच होत नाही. तेव्हा ही गोष्ट सांगितली गेली की त्या व्यक्तीला ह्या सगळ्या गोष्टी ऐकता ऐकता ही अवस्था प्राप्त झाली. असा धर्मचक्षु जागृत झाला म्हणजे विपश्यना आतून जागली आणि जागता-जागता स्रोतापन्न फळाची पहिली अवस्था *'यं किञ्चि समुदयधम्मं'* जे जे उत्पन्न होणारे सत्य आहे *'सब्बं तं निरोधधम्मं'-* त्यांच्या धर्माचा निरोध आहे हे त्याने अनुभवाने जाणले. म्हणजे पहिल्यांदा त्या व्यक्तीने निरोध अवस्थेचा साक्षात्कार केला. पहिल्यांदा निर्वाणाचा साक्षात्कार केला ती व्यक्ती स्रोतापन्न झाली. बाकी चार झाले नाहीत जरी पाचही जणांना धर्म शिकविला जात होता._

_*आणखी एक गोष्ट समजली पाहिजे की जी व्यक्ती सम्यक संबुद्ध होते ती मुक्तीदाता नसते. ती आम्हाला मुक्ती देऊ शकत नाही. ती आम्हाला मार्ग दाखविते. मुक्तीदाता स्वतः आपणच आहोत.* आम्ही अनेक जन्मापासून किती काम केले आणि सत्याचा मार्ग चालत असतांना आम्ही बरेचशे विकार पूर्वीच काढले आहेत. थोडेसेच राहिले आहेत आणि आता पध्दत मिळाली. तर आम्ही निरोध अवस्थेची ताबडतोब डुबकी मारु. आम्ही आमच्याजवळ भरपूर विकार एकत्र करुन ठेवलेले आहेत. तर आम्हाला मुक्त होण्यासाठी जास्त वेळ लागेल. परंतु काम आम्हालाच करावे लागेल. *जर तो मुक्तीदाता असता तर ह्या पाचही जणांना निर्वाणिक अवस्थेची अनुभूती करुन दिली असती. केवळ स्रोतापन्नचीच का? त्यांना अर्हत अवस्थेची अनुभूती करुन दिली असती. करु शकला नाही ना? तेव्हा ह्या भ्रमात राहू नका की कोणता गुरु आम्हाला तारुन नेईल किंवा कोणता देव, ईश्वर, ब्रह्मा तारुन नेईल. ह्यातून बाहेर पडले पाहिजे. आम्हालाच तरुन जायचे आहे. ह्या चारच्या चारही आर्यसत्यांचा साक्षात्कार आम्हाला करायचा आहे. ते ह्या विपश्यनाद्वारे होते. ही बाब समजून काम केले तर त्याच्या बाहेर निघून जाईल.*_

_*कोण्या व्यक्तीचे सम्यक संबुद्ध होणे सोपी गोष्ट नाही. न जाणो किती कल्पापर्यंत, असंख्य कल्पापर्यंत पारमिता वाढविता-वाढविता, पारमिता त्याच आहेत पण त्या खूप जास्त प्रमाणात वाढवाव्या लागतात, केवळ स्वतःलाच मुक्त व्हायचे असेल तर थोड्याशाच कल्पामध्ये तेवढ्याच प्रमाणात पारमिता वाढवून मुक्त अवस्थेपर्यंत पोहोचेल, पण ज्याला सम्यक संबुद्ध व्हायचे आहे ज्यामुळे इतरांनाही मुक्तीचा मार्ग दाखवू शकेल आणि अनेक लोकांच्या मुक्तीसाठी सहायक होऊ शकेल त्या अवस्थेपर्यंत पोहोचायचे आहे म्हणून असंख्य जन्म व कल्पापर्यंत काम करीत करीत पारमिता वाढीवेणे सोपी गोष्ट नाही. ह्या अवस्थेपर्यंत पोहोचणे स्वतःसाठी एक महत्वपूर्ण बाब आहे. ह्या अवस्थेपर्यंत पोहोचून आपल्यामध्ये धर्मचक्र चालविले तीच स्वतःसाठी खूप महत्वपूर्ण बाब आहे आणि जेव्हा हे धर्मचक्र लोकांसाठी, अन्य प्राण्यांसाठी चालविले ज्यामुळे अन्य प्राणीसुद्धा त्याचा लाभ घेऊन मुक्त अवस्थेपर्यंत निघून जातील, ही खूप-खूप मोठी महत्वपूर्ण घटना घडते. याचा प्रभाव सगळ्या ब्रह्मांडावर पडतो. सगळ्या विश्वावर पडतो.* त्याचे स्पष्टीकरण पुढे केले आहे._

_*'पवत्तिते च पन भगवता धम्मचक्के भुम्मा देवा सद्दमनुस्सावेसुं "एतं भगवता बाराणसियं इसिपतने मिगदाये अनुत्तरं धम्मचक्कं पवत्तितं अप्पटिवत्तियं समणेन वा ब्राह्राणेन वा देवेन वा मारेन वा ब्रह्युना वा केनचि वा लोकस्मि' न्ति।* भगवानांनी जेव्हा धर्मचक्र प्रवर्तन केले तेव्हा अनेक भोमियादेव पृथ्वीवर राहाणारे देव, अदृश्य प्राणी, सगळ्या विश्वात, सगळ्या सूर्यमालेत असे अनेक प्राणी आहेत की जे अनेक जन्मापासून मुक्तीच्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यापैकी अनेक असे आहेत की ज्यांच्यामध्ये धर्माचे बीज आहे. त्यांना जेव्हा धर्म तरंगे मिळाली, मुक्तीची व्हायब्रेशन मिळाली तेव्हा खूप आनंद झाला. ह्या आनंदामुळे ते ह्या गोष्टीची घोषणा करतात, "अरे, पहा भगवानांनी ऋषिपत्तन मृगदाय मध्ये हे अनुत्तर, या पेक्षा उच्च अवस्था नसते अशा धर्मचक्राचे प्रवर्तन केले. लोकात दुसरा कोणी प्राणी अशाप्रकारे धर्मचक्राचे प्रवर्तन करु शकत नाही ज्याने धर्मचक्र आपल्या आत जागवून मुक्त अवस्था प्राप्त केली तीच व्यक्ती धर्मचक्राचे प्रवर्तन करते. अरे, पहा. ह्या व्यक्तीने धर्मचक्राचे प्रवर्तन केले, असे आनंदाचे उद्‌गार त्या प्राण्यांच्या तोडूंन निघाले जे पृथ्वीवरचे देव होते._

_आणि हा जो आवाज निघाला तो पसरतो. हे व्हायब्रेशन पसरते *'भुम्मानं देवानं सहं सुत्वा'* हे पृथ्वीवरील देव, ह्या पृथ्वीवरील देवांचा आवाज ऐकून जो *चातुर्महाराजिक* देवलोक आहे त्या देवलोकातील प्राण्यांपर्यंत ही गोष्ट पोहोचली. त्यांनी खूप आनंदाने ह्या गोष्टीची घोषणा केली की कोणी व्यक्ती अशप्रकारे धर्मचक्र प्रर्तन करु शकत नाही. पहा असे धर्मचक्र प्रवर्तन ह्या सम्यक संबुद्धाने केले._

_आणि हा आवाज ह्या स्थूल पृथ्वीवरुन वर सुक्ष्मतेकडे जात आहे. चातुर्महाराजिक देवांचा आवाज *'तावंतिस'* देवलोकापर्यंत पोहोचला. त्यांच्या आनंदाची घोषणा *'यामा'* देवलोकापर्यंत पोहोचली. यामा देवतांच्या आनंदाची घोषणा *'तुषितं'* देवलोकापर्यंत पोहोचली. तुषित देवलोकातील जे प्राणी होते त्यांनी सुद्धा हीच घोषणा केली. त्यांच्या आनंदाची घोषणा *'निर्माणरत्ति'* देवलोकापर्यंत पोहोचली. त्यांचा आवाज ऐकून *'परिनिम्मितवसवत्ती'* देवलोकातील देवांनीसुद्धा ही घोषणा केली. अशा प्रकारे एकापेक्षा एक उच्च लोक, सूक्ष्माहून सूक्ष्म, 'सद्दननुस्सावेसुं' आणि त्याच्या वर असणाऱ्या ब्रह्मलोकांची पाळी आली. त्याच्यावर *ब्रह्मपरिषद* लोकातील लोकांनी 'सद्दमनुस्सावेसुं'. त्याच प्रकारे *ब्रह्मपुरोहिता* देवा सद्दमनुस्सायेसु हे सोळा ब्रह्मलोक आहेत. त्यामध्ये एक-एक करुन ब्रह्मपरिषद पासून ब्रह्मपुरोहित देवलोकात आणि अशा प्रकारे *महाब्रह्मलोकातील* जे प्राणी आहेत त्यांनीसुद्धा हा आवाज दिला. त्याचप्रकारे... *'परित्ताभा देवा सद्दमनुस्सावेसुं'.* तसेच परित्ताभानं देवानं सदं सुत्वा *अप्पमाणाभा* देवा सद्दमनुस्सावेसुं- ज्यांची आभा अपरिमित्त आहे त्या लोकातील लोकांनी ही घोषणा केली. तसेच *आभस्सरा* (आभाश्व देवलोकातील देवांनी), ब्रह्मलोकातील लोकांनी, त्याचप्रकारे *'परित्तसुभा'* (परिमित शुभ) ह्या देवलोकातील, ब्रह्मलोकातील लोकांनीही घोषणा दिली. त्याचप्रकारे *अपरिमितशुभ* ब्रह्मलोकातील देवांचीही घोषणा झाली. त्याचप्रकारे *सुभकिण्हिकानं'* (ज्या ठिकाणी शुभ्र प्रकारची किरणे निघतात अशा प्रकारे ब्रह्मलोकातील) लोकांचीही घोषणा झाली. त्याचप्रकारे *वेहप्फला* ... नंतर *अविहा देवा* ... हा अविहा. सोळा ब्रह्मलोकातील प्रत्येक बहालोक आला. उच्च, उच्च, उच्च अवस्था हे सगळे बहालोक, हे सगळे देवलोक काय आहेत? आमच्याच कर्मसंस्कारांची बैंक आहे. आमचे व्हायब्रेशंस त्याच प्रकारे तेथे जाऊन समरस होतात आणि मृत्यूच्या वेळी तसेच व्हायब्रेशंस जागले तर आम्ही ताबडतोब खेचल्याप्रमाणे तेथे जातो._

_*म्हणून आम्ही शरीर आणि वाणीने सत्कर्म करतो, दान देतो, शील पालन करतो, सेवा करतो, भले करतो, त्यांच्या ज्या व्हायब्रेशंस होतात त्या आम्हाला देवगतीकडे, (सहा देव लोक आहेत) एका पेक्षा एक सूक्ष्म व्हायब्रेशनसह समरस करीत घेऊन जातात आणि मृत्यूच्या वेळी तशाच व्हायब्रेशन जागल्या तर प्रकृती आम्हाला खेचून तेथेच घेऊन जाईल.......*_

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

*_लेखक :- कल्याणमित्र सत्यनारायण गोयन्का_*

_बुद्धवर्ष २५६१,श्रावण पौर्णिमा, ७ ऑगस्ट, २०१७, वर्ष १, अंक ५_

*_संकलन :- महेश कांबळे_*

*_दिनांक :-_* २७/०२/२०२५

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

Monday, 24 February 2025

धम्मचक्कप्पवत्तनसुत्त प्रवचन (भाग २)

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

*_धम्मचक्कप्पवत्तनसुत्त प्रवचन (भाग २)_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2025/02/blog-post_24.html

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

_*'सङ्खित्तेन पञ्चुपादानक्खन्धा दुक्खा'* संक्षेपात, थोडक्यात, सखोलतेने ही बाब समजते की हे पाच उपादान व या पाच उपादानांनी तयार झालेले हे पाच स्कंध आणि या पाच स्कंधांच्या प्रती जे उपादान आहे, जो लगाव आहे, जी आसक्ती आहे, ते दुःख आहे...._

_आम्हाला हा लोक मिळो की तो, ही योनी मिळो की ती, आमच्या दुःखांचा अंत होत नाही, कारण पाच उपादान आमच्या सोबत आहेत. तसेच सर्वात जास्त उपादान या 'मी' च्या प्रती, शरीराप्रती, चित्ताप्रती आहे. ही बाब साधना करत करत, सखोलतेत उत्तरत-उत्तरत समजू लागते. हे जन्मणे, मरणे, वृद्ध होणे... ही तर मोठी स्थूल-स्थूल दुःख आहेत. वस्तुतः दुःख तर पंच स्कंधांप्रती उपादानच आहे. तसे खुपदा या पंच स्कंधामुळे सुख जाणवते, खूप सुखद संवेदना येते, खूप सखोलतेत जाऊन शांतीही मिळते, परंतु उपादान कायम आहे- हा मी आहे, हे मला किती सुख मिळत आहे, ही मला किती शांती मिळत आहे !_

_हे हा मी आहे, माझे आहे, मी आहे, माझे आहे, खूप सूक्ष्म अवस्थेतही चालूच असते. जोपर्यंत स्थूल स्थूल दुःखालाच दुःख मानतो आणि दुःखाच्या बाहेर निघू इच्छितो, तर नाही निघू शकणार, हे जे सूक्ष्म स्तरावरील सुख आहे, ज्याला अज्ञान अवस्थेत जगातील सर्व लोक खूप सुख म्हणतात, खूप शांती म्हणतात, ते सुख नाही. कारण हे क्षेत्र अजूनही पंच स्कंधांचेच आहे, नाम व रुपाचेच आहे. त्या अवस्थेत कितीही सुखद संवेदना येत असो, कितीही प्रश्रब्धी जाणवत असो, अजून हे याच उपादानाचे क्षेत्र आहे. याचा अर्थ हा आहे की अजून भवचक्र आहे. ही तर अनित्य स्थिती आहे, नेहमी राहणारी नाही. तिच्या प्रती आसक्ती, म्हणजे, पंच स्कंधांची आसक्ती. *पंच स्कंधांच्या कोणत्याही अनुभूती प्रती आसक्ती होणे दुःखच दुःख आहे. असे समजू लागेल तर समजा सखोलतेने दुःख व त्याच्या सत्याला अनुभूतीवर उत्तरवून पाहिले.*_

_*'इदं खो पन, भिक्खवे, दुक्खसमुदयं अरियसच्चं।'* आता दुसरे आर्य सत्य समुदय- दुःखाचे उत्पन्न होणे, *'यायं तण्हा पोनोब्भविका नन्दिरागसहगता तत्रतत्राभिनन्दिनी।'*ही जी तण्हा आहे. तृष्णा आहे -ती दुःख आहे. ही का जागते ? कशी जागते ? म्हणण्यासाठी म्हणतात- दुःखाचे कारण काय आहे ? परंतु भगवानांचे आपले शब्द पाहाल, तर ते म्हणतात- दुःखाचा समुदय काय आहे ? दुःखाचा समुदय तृष्णा आहे. तृष्णा जागली तर दुःखच जागले. तृष्णेच्या सोबतच दुःखाचा उदय झाला. म्हणजे दुःखाचे कारणच नाही, तर तृष्णा स्वताच दुःख आहे._

_काय आहे तृष्णा? जे आहे त्यात संतुष्टी नाही, त्यात तृप्ती नाही, आणि जे नाही, त्यासाठी व्याकुळ आहे. ही स्थिती नेहमी कायम राहाते- हे नाही, हे नाही.... अशी स्थिती कधीही येत नाही की आता कोणताही अभाव नाही. कोणता ना कोणता अभाव नेहमी घेऊनच चालतो. सर्व काही झाले, पण हे तर नाही... अरे, हे कधीही मानणार नाही की 'आता काही नको. आता अजून पाहिजे, अजून पाहिजे.... यालाच तृष्णा म्हणतात. जसे गळा सुकतो पाण्याविना, तसेच तृष्णेचे जागणेच दुःखाचे जागणे आहे._

_कशी तृष्णा? *कामतण्हा* कामभोगांची तृष्णा, इच्छांची तृष्णा. हे व्हावे, हे व्हावे लागते. यातून निघतो तर अजून एक तृष्णा मागे लागते._

_*भव-तण्हा- भवाची तृष्णा-* काय ठेवले आहे या जगात? दुःखच दुःख आहे. परंतु भव तर जरुर असो, कोणत्याही प्रकारे मी तर कायम राहू. ही मी च्या प्रती, आत्मभावाच्या प्रती, किती सखोल आसक्ती. हा 'मी' कायम राहिलाच पाहिजे. ह्या दुःखाच्या जगातून सुटका होवो, परंतु एक अमर लोक तर पाहिजेच तर स्वर्ग लोक अमर आहे. मग कोणी म्हणेल, स्वर्गही अमर नाही, तेथेही मृत्यू येतोच. तर एखाद्या ब्रह्मलोकात जन्म व्हावा. मी अमर होईन. कोणी म्हणतो नाही, नाही, निर्वाण होईल, तेव्हा जाऊन अमर होऊ. तर मग माझे निर्वाण व्हावे, पण मी तर कायम राहावे, मी भवातच राहावे. कधीही अभवात न जावे. मी भवातच राहावे._

_अशा वेळी जेव्हा कोणी कानात म्हणते की बाकी सर्व काही नष्ट होणारे आहे, पण तू तर कायम राहशील. ही बाब खूप प्रिय वाटते. बाकी सर्व काही नष्ट होईल. पण मी तर कायम राहीनच, यालाच *भवतृष्णा* म्हटले. ही स्थिती कायम राहिली पाहिजे की मी कायम राहीन, या भवात राहीन अथवा त्या भवात राहीन, या लोकात राहीन, अथवा त्या लोकात राहीन परंतु मी कायम राहीन._

_*विभव-तण्हा- तसेच विभव तृष्णा.* दोन अंत आहेत. एक अंत तर भवात राहू इच्छितो, दुसरा विभवात. मला या साऱ्या भवचक्रातून मुक्त व्हावयाचे आहे. अरे, 'विभव-विभव'... ही पाहिजे- पाहिजेचा आजार आहे ना ! ही विभव तृष्णाही आम्हाला त्या अवस्थेत घेऊन जाणार नाही. ती तर मुक्तीची अवस्था आहे. अष्टांगिक मार्गावर चालू तर आपोआप भवचक्र तुटून जाईल आणि मुक्त होऊच. परंतु जोपर्यंत त्याची तृष्णा आहे, तोपर्यंत मुक्ती खूप दूर आहे._

_*'इदं खो पन, भिक्खवे, दुक्खनिरोधं अरियसच्चं।'* हे एक आर्य सत्य आहे, ज्यात दुःखाचा निरोध झाला. समाप्त झाले. पण कसे समाप्त झाले ? *'यो तस्सायेव तण्हाय असेसं'* जिथे तृष्णा असेस, म्हणजे शेष नाही. आता थोडीशीही तृष्णा नाही. *'असेस विरागं'* आसक्ती राहिली नाही जराशीही, तृष्णा राहिली नाही, आसक्ती मुळापासून निघाली, वीतराग अवस्था प्राप्त झाली तर 'निरोधो। निरुद्ध झाला. थोड्यावेळाकरीता न जागे एक बाब झाली. पण आतातर आसक्ती जागूच शकत नाही. अशा अवस्थेला प्राप्त झाला तेव्हा *'निरोधो'* आता सर्व सुटले. कोणात जी जी आसक्ती होती, आसक्तीचे आलंबन होते, ते सर्व सुटले. *'पटिनिस्सग्गो'* त्या सर्वातून निघून गेला. 'मुक्ती' ती मुक्त अवस्था आहे. *'अनालयो'* आता अजून काही ग्रहण करण्यासाठी कोणताही आलय नाही. कोणताच आधार नाही._

_सर्व आधार, सर्व आलंबनांना तोडून, जी अवस्था प्राप्त झाली ती निर्वाणाची अवस्था आहे. जोपर्यंत नाम आणि रुपाच्या क्षेत्रात, सहा इंद्रियांच्या क्षेत्रात विचरण करत आहे, तोपर्यंत ती अवस्था नाही. ही अवस्था या सर्वांच्या पलीकडे- निर्वाणिक अवस्था आहे. ही निर्वाणाची निरोध अवस्था, अर्हताची निरोध अवस्था, स्रोतापन्नाची निर्वाणिक अवस्था- आम्हाला मुक्तीकडे घेऊन जाण्यात सहायक झाली. एका अंशी आमची मुक्ती झाली. खालच्या अपाय लोकांतून आमची मुक्ती झाली. परंतु अजून लोकांपासून आम्हाला मुक्त व्हायचे आहे. असे होता-होता अर्हत अवस्थेची अनुभूती केली. त्याचा निरोध, म्हणजे, निर्वाणाच्या अवस्थेचा अनुभव केला, तर बिल्कुल मुक्त झाला. त्या अवस्थेसाठी म्हटले की आता यानंतर पकडण्यासाठी अजून काही नाही. एकदम मुक्त आहे. सर्व तृष्णा एकदम अशेष झाली, समाप्त झाली._

_*'इदं खो पन, भिक्खवे, दुक्खनिरोधगामिनीपटिपदा अरियसच्चं।'* आता हे चवथे आर्य सत्य. ही मध्यम मार्गाची प्रतिपदा, *दुक्खनिरोधगामिनी पटिपदा- 'अयमेव अरियो अट्ठङ्गिको मग्गो... सम्मादिद्वि... सम्मासमाधि... इत्यादि।'*हा त्या अवस्थेपर्यंत पोहोचण्याचा मार्ग आहे. ही चारही आर्यसत्य, हे धर्माचे प्रथम प्रकाशन आहे. याला समजले पाहिजे._

_काय विशेष बाब सांगितली ह्या मनुष्याने ? जी भिन्न-भिन्न मत कायम होती त्या वेळी तर, असे एखाद्या संप्रदायाच्या नेत्याशी चर्चा केली वा स्वतःला धर्माचा नेता म्हणणाऱ्याशी चर्चा केली तर ते सर्व हेच म्हणतील मुक्त अवस्थेपर्यंत पोहोचायचे आहे. पण कसे पोहोचायचे आहे? काय आहे मुक्त अवस्था? कोणाची मुक्ती? कशापासून मुक्ती? त्या सर्व बाबी गौण होतील आणि त्या मुक्त अवस्थेपर्यंत पोहोचायचे आहे या बाबीला घेऊन अशा जंजाळात पडतील की मुक्तीच्या विपरीत रस्त्यावर पळतील. परंतु जेव्हा शुद्ध धर्म जागेल तर इतर बिनाकामाच्या बाबी, ज्या बाबींचा आमच्या बंधनांशी, बंधनांच्या कारणांशी, आमच्या मुक्तीशी, मुक्तीच्या उपायाशी काहीही देणे-घेणे नाही- या सर्व बाबींना एका बाजूला ठेवू, व्यर्थ बाबी आहेत, बिनाकामाच्या बाबी आहेत, सोडा यांना, या दार्शनिक मान्यता आहेत, लोकांना गुंतवून ठेवतात धर्माच्या नावावर, अध्यात्माच्या नावावर, जणू काही या मान्यतेला मानण्यामुळेच मी मुक्त होईन. शुद्ध धर्मात या सर्वांना काहीही स्थान नाही._

_*'दुःख आहे'- व* एखाद्या मान्यतेला मानणारा असो, या संप्रदायात दीक्षित असो की त्या संप्रदायात, याला नाकारु शकत नाही दुःख तर आहेच. हे केवळ बौध्दांचे वा एखाद्या सम्यक संबुद्धांनी तयार केलेले सत्य नाही. कोणी सम्यक संबुद्ध बनला नाही तरीही दुःख तर आहेच. तसेच दुःखाचे कारण तर आहेच. दुःखाच्या कारणाला दूर करण्याचा उपाय तर आहेच. त्या उपायाला ग्रहण करुन दुःखाला संपूर्ण नष्ट करण्याच्या अवस्थेपर्यंत पोहोचायचे आहे._

_त्या सत्याला, प्रकृतीच्या त्या नियमांना, ज्यांना कालावधी जाता-जाता मानव समाज विसरत जातो आणि त्याऐवजी एखाद्या बिनाकामाच्या बाबीला पकडत जातो. हे दुःख कोणत्याही एका संप्रदायाचे, एका जातीचे, एका वर्णाचे, एका समाजाचे नाही. जीवनातले हे इतके मोठे सत्य आहे दुःख आहे._

_दुःखाचे कारण आहे, तृष्णा आहे, कोणत्याही एका जातीविशेष, वर्गविशेष, वर्णविशेष, देशविशेष वा समयविशेषची नाही. तृष्णा जेव्हा जागते, ज्याच्यात जागते दुःखाच्या सोबतच जागते. हा प्रकृतीचा आपला नियम आहे. शुद्ध धर्माला याच अर्थाने सद्धर्म म्हणतात, सत्य धर्म म्हणतात. हे जीवनाचे, प्रकृतीचे सत्य आहे तृष्णा जागली की दुःख जागले. तृष्णा दूर झाली, तर दुःख दूर झाले._

_तृष्णा दूर करण्यासाठी तृष्णा जिथे जागते तिथपर्यंत पोहोचले पाहिजे. तर प्रथम आमच्या शरीराची, वाणीची जी वरवरची काम आहेत, यांना सुधारुन शीलाला विशुद्ध करावे लागेल. त्यानंतर मनाला वश करुन, क्षण-प्रतिक्षण आपल्या मनाला अशा स्थितीत ठेवावे की त्यात विकार जागू नयेत, यासाठी समाधीचा अभ्यास करावा लागेल. अंतर्मनाच्या सखोलतेत जो विकारांचा संग्रह करुन ठेवला आहे, त्यांना दूर करण्यासाठी प्रज्ञेचा अभ्यास करावा लागेल._

_शुद्ध धर्म, निसर्गाचे नियम सार्वजनिक आहेत. या चारही बाबीत आम्ही पाहू की सखोलतेपर्यंत दुःखच दुःख, दुःखच दुःख, ज्याला आम्ही सुख म्हणतो वस्तुतः तेही दुःखच आहे. ही बाब आता अनुभूतींनी समजेल की दुःख का आहे? सुखद अनुभूतींची आसक्तीच आमच्या दुःखाचे कारण आहे. आम्ही दुःखद अनुभूती इच्छित नाही, आम्हाला सुखच पाहिजे, अशी सखोल आसक्ती आहे. वारंवार तसेच पाहिजे आणि तसे नेहमी होत नाही तर व्याकुळ होतो. अथवा झाले तर त्यापेक्षा जास्त सुख पाहिजे, अजून जास्त सुख पाहिजे. व्याकुळच व्याकुळ, व्याकुळच व्याकुळ, ही बाब समजली तर दुःख समजले. दुःखाचे कारण समजले. त्याला दूर करण्याचा मार्ग आहे. त्याला जाणायचे आहे पाहा कसे दुःख जागते आहे? माझ्या आत जिथे तृष्णा जागते तिथपर्यंत पोहोचायचे आहे. तिथपर्यंत पोहोचण्यासाठी मनाला शांत करावे लागते, एकाग्र करावे लागते. त्यानंतर अंतर्मनाच्या सखोलतेत जात-जात पाहा, तृष्णा जागली ना सुखद अनुभूती झाली तर आसक्ती जागली ना! दुःखद अनुभूती झाली तर द्वेष जागला ना ! ही बाब सर्वांनाच होते. सार्वजनिक बाब आहे. हा प्रथम उपदेशच या बाबीला सिद्ध करतो की ही व्यक्ती खरोखर सम्यक संबुद्ध आहे. याला कोणत्याही संप्रदायाशी घेणे-देणे नाही. याच्यासमोर एकच लक्ष आहे की कोणत्या प्रकारे सर्व लोक जे व्याकुळ आहेत. दुःखी आहेत आणि त्यांच्या दुःखाचे हे कारण आहे, त्याला दूर करोत. जसे मी आपल्या अनुभूतीने जाणले आणि आपल्या दुःखाचे निवारण केले, त्याच प्रकारे सर्व लोक आपल्या अनुभूतीने जाणून आपापल्या दुःखाचे निवारण करोत. यासाठी लोकांना शुद्ध धर्म वाटतो._

हा प्रथम उपदेशच आहे ज्याला ते आपल्या जीवनातील पंचेचाळीस वर्ष देत गेले. त्याचे जे स्वरुप समोर आले, ती आहेत चार आर्यसत्य....

- क्रमशः 

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

*_लेखक :- कल्याणमित्र सत्यनारायण गोयन्का_*

_बुद्धवर्ष २५६०, फाल्गुन पौर्णिमा, १२ मार्च २०१७, वर्ष ३ अंक १२_

*_संकलन :- महेश कांबळे_*

*_दिनांक :-_* २४/०२/२०२५

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

Thursday, 20 February 2025

धर्मचक्रप्रवर्तनसुत्त प्रवचन -१

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

*_धर्मचक्रप्रवर्तनसुत्त प्रवचन_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2025/02/blog-post_20.html

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

(हे सूत्र बुद्धवाणीच्या तीन पिटकापैकी दूसऱ्या म्हणजे सुत्त पिटकच्या पाच निकायामधील तिसऱ्या संयुक्तनिकायातील महावग्गाचे १०८२ वे सूत्र आहे. पूज्य गुरुजींनी सर्व साधकांच्या लाभासाठी जानेवारी १९९१ मध्ये धम्मगिरीवर या सुत्तांचे स्पष्टीकरण हिन्दी व इंग्रजीमध्ये करुन याला फार चांगल्या प्रकारे समजविले आहे. म्हणून पत्रिकेच्या माध्यमातून याला क्रमशः आपल्यापर्यंत पोहचवित आहोत)

*_नमो तस्स भगवतो, अरहतो, सम्मासम्बुद्धस्स !_*

धम्मचक्कप्पवत्तनसुत्तं- धर्मचक्रप्रवर्तन सूत्र. आज ज्या सुत्राचे पारायण करणार आहोत ते भगवानांच्या उपदेशातील एक अत्यंत महत्वपूर्ण सूत्रच नाही तर पहिलेच सूत्र असल्याने, पहिलाच उपदेश असल्याने शुद्ध धर्माच्या प्रकाशनाचे सूत्र आहे.

_जसे पहिल्यांदा दाट अंधकारात सूर्योदयाच्या वेळी प्रकाश किरणे पसरतात. त्यांना फार मोठे महत्व आहे. तसेच अंधकारात पडलेल्या लोकांना शुद्ध धर्म काय आहे, त्या संदर्भातील सर्व उपदेशः पंचेचाळीस वर्षात लोकांना जे काही शिकविले ते साररुपाने पहिल्या सूत्रात सांगितले आहे._

_*'एकं समयं भगवा वाराणसियं विहरति इसिपतने मिगदाये'*- एकदा भगवान वाराणसीमधील इसिपत्तन (ऋषिप्तन) च्या ज्या भागात विहार करीत होते त्याला मिगदाय (मृगदाय) म्हणत होते. *'इसिपतन' इसी म्हणजे ऋषी. पत्तन हा शब्द भारतातील खूप जुना शब्द आहे. भारतात पत्तनला बंदर म्हणत होते.* समुद्र किनाऱ्याच्या किंवा नदीकिनाऱ्या जवळचे शहर जसे सागरपट्टनं, सुप्पारकपट्टनं, विसाखापट्टनं इत्यादी. म्हणजे *बंदरासाठी हा पत्तन शब्द आहे. काय पत्तन ? ज्या ठिकाणी काही उतरविले जाते किंवा खाली सोडले जाते जहाजात सामान भरुन कोठून तरी आले आणि किना-यावर लागले, पोर्टवर लागले आणि उत्तरविले गेले म्हणून पत्तन.*_

_समुद्रकिनाऱ्यावरील शहरच नाही तर आतील नदी किनाऱ्यावरील शहरासाठीसुद्धा पत्तन हा शब्द उपयोगात आणला जात होता. कदाचित ह्या पत्तन (पट्टन) शब्दावरुनच आजचे 'पटना' नाव पडलेले असावे. हे 'इसिपत्तन' असेच एक पवित्र ठिकाण होते, आजही आहे. तेथे अनेक ऋषि येऊन तप करीत असत आणि मान्यता अशीही आहे की अनेक अशा व्यक्ती ज्यांना बोधी प्राप्त झालेली आहे. ऋषी लोक ज्या ठिकाणी एकत्र येऊन तप करतात, ज्या ठिकाणी ऋषी एकत्र येतात ते ऋषिपत्तन आणि ते ठिकाण ज्या वनात किंवा उपवनात, तेथे कोणत्याही पशूला कोणी मारु शकत नाहीत, त्यांना अभयदान मिळाले आहे तो मिगदाय मृगांना तेथे अभयदान मिळालेले आहे._

*_मृगचा एक अर्थ- हरीण आहे आजही असेच मानतात परंतु मृगचा जुना अर्थ सर्व पशू असा होता. कोणत्याही पशुला मृन म्हणत होते. म्हणून सिंहाला मृगराज म्हणतात. हरिणाचाच राजा नाही तर सर्व पशुंचा राजा आहे._*

_'शाखामृग' माकडाला शाखामृग म्हणत होते. तो पशू जो झाडाच्या फांदीवर राहातो. तर मृग शब्द सर्व जनावरांसाठी, सर्व चतुष्पाद प्राण्यांसाठी आहे. परंतु असे होऊ शकते की हरीण तेथे जास्त प्रमाणात होती आणि असेही होऊ शकते की त्या वेळीसुद्धा *'मृग' चा अर्थ केवळ 'हरीण' एवढाच प्रचलित झालेला असावा काहीही असो पशुंना अभयदान किंवा मृगांना अभयदान ह्या अर्थाने त्याचे नाव 'मृगदाय' पडले असावे. त्या ठिकाणी भगवान पोहोचले.*_

_सम्यक संबोधी प्राप्त केल्यानंतर सात आठवडे त्या बोधी वृक्षाखाली आणि त्याच्या आसापास निर्वाणाच्या सुखात घालविले त्यानंतर एकदा त्यांच्या मनात अत्ता विचार आला की जो हा एवढा गंभीर धर्म मला समजला आणि ज्याचा उपयोग करुन मी स्वतःला मुक्त केले, तो खूप गंभीर आहे. गोष्ट तर फार सरळ-सरळ, साधी सोपी आहे. तरीपण एवढी गंभीर आहे की संसारातील हे लोक भिन्न-भिन्न मान्यतांमध्ये एवढे अडकलेले आहेत, त्यांच्या डोळ्यावर एवढा जाड पडदा पडलेला आहे की माझी सर्व मेहनत निष्फळ होईल. ते काय समजू शकतील?_

_जेव्हा हा विचार त्यांच्या मनात आला की हे काय समजतील? तेव्हा एक ब्रह्मा जो पूर्वी एका सम्यक संबुद्धाच्या वेळी विपश्यना घेऊन ब्रह्मलोकात जन्मला होता, त्याने ही गोष्ट पाहिली. तर म्हणाला "असे झाले तर संसार धर्मापासून वंचित राहील. तेव्हा तो ब्रह्मलोकातून खाली उतरला आणि भगवानांना नमस्कार करुन म्हणाला, "महाराज. आपल्या मनात आत्ता विचार यायलाच नको, खरोखर, फार मोठा अंधकार आहे. लोकांच्या डोळ्यावर एवढा जाड पडदा पडलेला आहे की ते समजूच शकणार नाही. एवढा हा धर्म गंभीर आहे. पण महाराज. आपल्या बोधीनेत्रांनी पाहा. थोडेसे लोक असेही आहेत की त्यांच्या डोळ्यावर खूप पातळ झिरझिरीत पडदा आहे. त्यांनी थोडेसे काम सुरु केले की त्यांच्या डोळ्यावरचा पातळ पडदा दूर होईल आणि ते सर्व समजू लागतील. मोठे कल्याण होईल. शेवटी आपण अगणित जन्म घालविले ते ह्या गोष्टीसाठीच."_

_भगवानांनी स्मित केले. करुणा जागली, खूप करुणा. अरे खरोखर थोडेफार लोक तर समजणारे आहेत. चला, शिकवू त्यांना प्रथम कोणाला शिकविणार?_

_त्यांनी आपल्या बोधी नेत्रांनी पाहिले कोणाला शिकवावे? कृतज्ञतेचा भाव होता. ज्या व्यक्तीने मला सातही ध्यान शिकविली-आलार-कालामनेच तर शिकविली. त्यांनी पाहिले ते तर सात दिवसापूर्वीच मृत्युला प्राप्त झाले. आणि सात ध्यानांचा धनी असल्यामुळे मृत्युनंतर अरुप ब्रह्मलोकात जन्मले. चार ध्यानापर्यंत रुप ब्रह्मलोकात जन्म होतो. चार ध्यानांच्या पुढील पाचव्या ते आठव्या ध्यानापर्यंत तो अरुप ब्रह्मलोकाशी जोडला जातो. अरुप ब्रह्मलोकात रुप नसते, शरीर नसते. शरीर नाही तर तो विपश्यना कशी करील? तो करुच शकत नाही. म्हणून त्याला शिकवू शकत नाही. दुसरा उद्दक रामपुत्र. ज्याने आठवे ध्यान शिकवले. अरे, तो सुद्धा काल रात्रीच मृत्यू पावला व तो सुध्दा अरूप ब्रह्मलोकात जन्मला. नाही शिकवू शकत. मग आता कोणाला शिकविणार ?_

_त्यांना आपल्या पाच मित्रांची आठवण झाली, ज्यांनी सहा वर्षापर्यंत बरोबर राहून खूप सेवा केली होती. ते कोठे आहेत? आपल्या बोधी नेत्रांनी पाहिले की ते ऋषिपत्तन मृगदायमध्ये आपले काही ध्यान करीत आहेत. तेथे जाऊन पहिल्यांदा हा शुद्ध धर्म त्यांना शिकवावा. त्या पाच भिक्षुंना हा धर्म शिकवावा म्हणून त्यांनी बोधगयाच्या त्या बोधी वृक्षापासून ऋषिपत्तन पर्यंतचा प्रवास केला._

_*'तत्र खो भगवा पञ्चवग्गिये भिक्खू आमन्तेसि'* तेथे भगवानांनी ह्या *पञ्चवग्गिये भिक्खू'* ह्या पाच भिक्षुंना आमंत्रित केले. प्रथम ह्या पाच भिक्षुंना धर्म मिळाला म्हणून पुढे नेहमी हे पंचवग्गिय भिक्खूच्या नावाने ओळखले जात होते. पंचवर्गीय भिक्षू- एक असा वर्ग ज्यामध्ये हे पाच भिक्षु सामील आहेत. *'आमन्तेसि* त्यांना धर्म ऐकण्यासाठी, धर्म शिकण्यासाठी आमंत्रित केले, बोलाविले आणि उपदेश सुरु केला-_

_*'द्वेमे, भिक्खवे, अन्ता पब्बजितेन न सेवितब्बा'।* दोन अंत असे आहेत जे प्रव्रजिताला, ज्याने घरा-दाराचा त्याग केला आहे, ज्याला मुक्त अवस्थेपर्यंत पोहोचायचे आहे, त्याला ह्या दोन अंतापासून दूर राहायचे आहे. त्याने ह्या दोन अंतांचे सेवन करु नये. *'कतमें द्वे?'* कोणते दोन ? *'यो चायं कामेसु कामसुखल्लिकानुयोगो हीनो गम्मो पोथुज्जनिको अनरियो अनत्थसंहितो'.* एक असा आहे की कामभोगाच्या, भोगविलासाच्या, शारीरिक सुखाच्या जीवनात जो लोळतो, डुबून जातो, अशी व्यक्ती *'हीन'* वाया गेलेली आहे. *'गम्मो' गवार आहे.* गावात राहाणारा खेडवळ नाही. जसे आजकाल गवार म्हणतात निरक्षराला, मूर्खाला, ह्या अर्थाने गवार नाही._

_*'पोथुज्जनिको'- पृथग्जन आहे,* म्हणजे जो मुक्तीचा, धर्माचा मार्ग आहे त्यापासून वेगळा झाला. त्याला शुद्ध नाही की तो काय करीत आहे ? त्याची सर्व काम धर्मापासून पृथक झाली. अशी व्यक्ती पृथग्जन. जो पर्यंत एखादी व्यक्ती स्रोतापन्न अवस्था प्राप्त करीत नाही तो पर्यंत तो पृथग्जनच आहे. परंतु जे लोक स्रोतापन्न अवस्था प्राप्त करण्याचा प्रयत्न करीत आहेत, योग्य प्रयत्न करीत आहेत ते पृथग्जन असुनही ते कल्याण पृथग्जन आहेत कारण त्यांनी कल्याणाचा मार्ग धरला आहे. अजून त्यांना मुक्तीचा, निर्वाणिक अवस्थेचा खरा अनुभव झाला नाही. ह्या अर्थाने पृथक आहेत पण कल्याण पृथग्जन आहेत आणि असे लोक जे बिलकूल मूर्ख आहेत, ते मूर्ख पृथग्जन, ज्यांना हा मार्ग जाणण्याचीही इच्छा होत नाही. ते त्या मार्गावर चालतच नाहीत. त्यांचा मार्ग बिलकूल भिन्न आहे म्हणजे योग्य मार्गावर चालण्याचा कोणताच प्रयत्न करीत नाहीत. तेव्हा जे अशाप्रकारे कामभोगातच मशगूल राहातात असे लोक पृथग्जन आहेत हा एक अंत झाला._

_आणि दुसरा अंत *'यो चायं अत्तकिलमथानुयोगो'- 'किलमथ' क्लेश, 'अत्त' म्हणजे स्वतःला, स्वतःला दुःख देत आहेत.* शरीराला कष्ट देत आहेत आणि समजतात की मुक्त होऊ. *'अत्तकिलमथानुयोगो दुक्खो अनरियो अनत्थसंहितो', अशी व्यक्ती अनार्यच राहील. आर्य होऊ शकणार नाही.* ते स्वतःसाठी केवळ दुःखच दुःख, अकुशलाचा संग्रह करतील. अनर्थाचाच संग्रह करतील. कारण की ते अशा अंताला गेले की ज्या ठिकाणी मुक्तीशी काही देणे घेणे नाही. हे दोन अंत आहेत. *एक सांसारिक सुखोपभोगाच्या चिखलात मशगूल होणे आणि दुसरा ह्या शरीराला कष्ट देण्याच्या, देहाला शिक्षा देण्याच्या कामातच राहाणे आणि समजणे की ह्यामुळे मुक्त होऊ.*_

_एक सम्यक संबुद्ध उत्पन्न झाल्यानंतर शुद्ध धर्माचा, मुक्तीच्या मार्गाचा जो उपदेश सांगितला जातो तो कालांतराने समाप्त होतो. त्याची फक्त चर्चा राहाते. त्याचे फक्त शब्द राहातात. अनेक लोक वाईट उद्देश्याने नाही पण असमंजसपणामुळे, कारण की त्यांना धर्माचा गहिरेपणा समजला नाही म्हणून त्याच शब्दांचा उपयोग करतील, तेच उद्दीष्ट प्राप्त करण्याचे काम करतील. *शुद्ध धर्म आम्हाला आसक्ती विहीन करतो, द्वेष विहीन करतो, मोह विहीन करतो.* तेव्हा सर्व लक्ष्य हेच असेल की आम्ही आसक्ती विहीन कसे होऊ, द्वेष विहीन कसे होऊ, मोह विहीन कसे होऊ, पण तेथपर्यंत पोहोचण्याचा जो मार्ग होता तो तर विसरला गेला म्हणून भटकत भटकत कोणी ह्या अंताला जातो तर कोणी दुसऱ्या अंताला जातो._

_एका गोष्टीची तर आठवण राहिली की शेवटी मुक्त अवस्थेपर्यंत पोहोचण्यासाठी प्रव्रजित होणे आवश्यक आहे, घर-दार सोडणे जरुरीचे आहे. घर-दार तर सोडले पण त्यातील जे सुखोपभोग आहेत ते सोडले नाहीत, म्हणून ज्या प्रमाणे गृहस्थ जीवनात सोई-सुविधा असतात तशाच प्रकारच्या सोई-सुविधा ज्या ठिकाणी असे विहार आहेत, मठ आहेत त्या ठिकाणी निर्माण केल्या. आता घर-दार सोडून आम्ही आमचा पोशाख बदलला म्हणून आम्ही जरुर मुक्त होऊ. घर-दार सोडून वेश बदलून, आता ह्या कर्मकांडात लागले अथवा त्या कर्मकांडात. एक हा पोषाख परिधान केल्यामुळे समजतात की आम्ही मुक्त होऊ. दुसरे असे काही कर्मकांड करु लागले आणि समजू लागले की त्यामुळे आम्ही मुक्त होऊ. परंतु ज्या आसक्ती आहेत, वासना आहेत त्यापासून मुक्त होण्याचे जरा सुद्धा काम केले नाही. ते एका टोकाला निघून गेले. दुसरे भटकत भटकत अशा टोकाला गेले की आम्हाला ह्या कामवासनेशी काही देणे-घेणे नाही. आम्हाला ह्या सुखाशी कोणते देणे-घेणे नाही. प्रव्रजित तर झालो, घर-दार सोडले परंतु जेव्हा शरीराला पूर्णपणे दंड देऊ तेव्हाच मुक्ती मिळेल. ह्या शरीरामुळेच वारंवार नवीन नवीन शरीर मिळते. आम्ही भवचक्रातच परिभ्रमण करीत राहातो, आमच्या सर्व अंतर क्लेशांना दूर करण्यासाठी शरीराला दंड दिला पाहिजे. ह्या प्रवृत्तीमुळे ते अशा प्रकारचे काम करु लागले की ज्यामुळे शरीराला जास्तीत जास्त दंड दिला जाईल._

_आणि हळूहळू ही गोष्ट त्यांच्या मनावर अशा प्रकारे स्वार झाली की जी दुष्कर्म होतात ती शरीरामुळेच होतात. मनाला फार महत्व नाही. जेव्हा शरीरामुळे होतात तेव्हा सुधारणाही शरीरामुळेच होईल. अशा प्रकारच्या प्रवृत्तीमुळे शरीराला दंड दिला जातो. मधली गोष्ट पुन्हा विसरले._

_पुन्हा वेळ येते. खूप दीर्घ काळानंतर पुन्हा बोधी जागते कोणा एका व्यक्तीत आणि ती मध्यम मार्ग शोधून काढते. हे टोकही चांगले नाही, ते टोकही चांगले नाही. हा मध्यम मार्ग आहे. म्हणून म्हटले की जो प्रव्रजित झाला आहे त्याच्यासाठी हे दोन्ही अंत कल्याणकारी नाहीत, हानीकारक आहेत, यापासून दूर राहा. ह्या दोन्ही अतींमध्ये जाऊ नका._

_*'एते खो, भिक्खवे, उभो अन्ते अनुपगम्म'* ह्या दोन्ही अतींच्या मागे न जाता, त्या मार्गाने न जाता *'मज्झिमा पटिपदा तथागतेन अभिसम्बुद्धा चक्खुकरणी जाणकरणी उपसमाय अभिञ्ञाय सम्बोधाय निब्बानाय संवत्तति'.* हे दोन्ही मार्ग सोडून जो सम्यक संबुद्ध होतो तो *'मज्झिमा पटिपदा'* मधल्या मार्गाचा स्वीकार करतो. असा मधला मार्ग जो आम्हाला तेथे पोहोचवतो जो *'चक्खुकरणी'* आमच्या आत धर्माचे चक्षु जागृत करतो म्हणजे आपल्या अनुभूतीवर धर्म उतरवितो. कोणी व्यक्ती ह्या दोन अतींमध्ये जाते तेव्हा तिच्या अनुभूतीवर धर्म उतरत नाही. त्याच्या अनुभूतीवर तर त्याची मान्यता, त्याच्या परंपरा, त्याची कर्मकांडच राहातात. पण जेव्हा धर्माच्या मार्गावर चालतो तेव्हा तो मध्यम मार्गावर चालत आहे याचा अर्थ असा की अनुभूतीच्या मार्गावर चालत आहे. धर्माला निसर्गाच्या नियमांना, विश्वाच्या विधानाला, नियतीच्या नियमांना, प्रकृतीला आपल्या अनुभूतीने समजतो आहे, अनुभूतीने समजतो तेव्हा धर्माचे चक्षु जागृत होतात. म्हणजे धर्माला आपल्या अनुभूतीवर उत्तरवित आहे जी *'चक्खुकरणी' चक्षु* निर्माण करणारी आहे._

_*'ञाणकरणी'* जेव्हा धर्म चक्षु जागतात म्हणजे सत्य गोष्ट अनुभूतीवर येऊ लागते ती '*'ञाणकरणी'* म्हणजे जे ज्ञान होते ते केवळ बौद्धिक ज्ञान नसते, आपल्या अनुभूतीने जाणलेले योग्य ज्ञान असते, सम्यक ज्ञान असते, तेव्हा असे सम्यक ज्ञान निर्माण करणारा हा मधला मार्ग. (मध्यमा प्रतिपदा)_

_*'उपसमाय'* आपल्या आत जेवढे क्लेश आहेत, अनेक जन्मापासून ज्या क्लेशांचा संग्रह केलेला आहे, त्या क्लेशांच्या उपशमनासाठी, त्यांच्या क्षयासाठी, त्यांच्या नाशासाठी हा मार्ग मिळतो मध्यमा प्रतिपदा ।._

_*'अभिञ्ञाय'* खूप श्रेष्ठ ज्ञान. ज्यामुळे सर्व गोष्टी समजू लागतात. ह्या मार्गावरुन चालता चालता त्या अवस्थेपर्यंत पोहोचतो ज्या ठिकाणी मुक्ती प्राप्त केल्यामुळे सर्व गोष्टी समजू लागतात की कशाप्रकारे हे दुःखचक्र चालते आणि कशाप्रकारे ह्यातून बाहेर पडू शकतो._

_*'सम्बोधाय'* संबोधी प्राप्त करण्यासाठी *'निब्बानाय'* निर्वाण प्राप्त करण्यासाठी. हा सगळा मार्ग ह्या सर्व कामासाठी आहे आणि ह्या मार्गावर चालून चालून येथपर्यंत येऊन पोहोचतो._

_*'कतमा च सा, भिक्खवे, मज्झिमा पटिपदा तथागतेन अभिसंबुद्धा चक्खुकरणी ञाणकरणी उपसमाय अभिञ्ञाय सम्बोधाय निब्बानाय संवत्तति' ?-* हा कोणता मधला मार्ग आहे ज्याला कोणी सम्यक संबुद्ध आपल्या अनुभवाने प्राप्त करतो जो चक्षू देणारा आहे, ज्ञान देणारा आहे, उपशमन करणारा आहे, अभिज्ञा देणारा आहे, संबोधी देणारा आहे. निर्वाण देणारा आहे आणि ज्याचा अनुभव सम्यक संबुद्ध करतो तो काय आहे? कोणता मध्यम मार्ग आहे? ते स्वतःच प्रश्न करतात आणि स्वतःच उत्तर देऊन समजवितात._

_*'अयमेव अरियो अट्ठङ्गिको मग्गो'* हा जो आठ अंगाचा मार्ग आहे तोच मध्यम मार्ग आहे. *'सेय्यथिदं'* तो काय आहे? *"सम्मादिट्ठि, सम्मासङ्कप्पो, सम्मावाचा, सम्माकम्मन्तो, सम्माआजीवो, सम्मावायामो, सम्मासति, सम्मासमाधि"* काय आहे हे? ही जी आठ धर्माची अंग आहेत. बस, हाच मध्यम मार्ग आहे. ह्या मार्गावर चालणारी व्यक्ती कोणत्याही अंताकडे झुकत नाही. दोन्ही अंतांना स्वतः सोडून देते आणि केवळ सरळ, *सम्यक म्हणजे सत्याच्या मार्गावर चालते.* मार्गाचे केवळ वर्णनच करीत राहील. *मार्गाबद्दल केवळ चिंतनच करीत राहील किंवा विवादच करीत राहील, मार्गाच्या मान्यतेचाच स्वीकार करील तर तो सम्यक झाला नाही, खरोखर अनुभूतीवर उतरला पाहिजे, धर्माची ही जी आठ अंग आहेत ती खरोखर अनुभूतीवर उतरतात तेव्हा ती सम्यक होतात, नाहीतर ती सुद्धा असत्य होतील. त्यांची केवळ चर्चा राहील, केवळ संभाषणच राहील. तर काम होणार नाही. ही आठ अंग अनुभूतीवर उतरतात तेव्हा ती 'सम्मा' होतात तर ही आठ अंग सम्यक होवोत.*_

_*'अयं खो सा, भिक्खवे, मज्झिमा पटिपदा तथागतेन अभिसंबुद्धा चक्खुकरणी ञाणकरणी उपसमाय अभिञ्ञाय सम्बोधाय निब्बानाय संवत्तति'* हा आहे मध्यम मार्ग जो कोणी सम्यक संबुद्ध स्वतःच्या अनुभवाने शोधून काढतो._

_*'इदं खो पन, भिक्खवे, दुक्खं अरियसच्चं'।* आता समजवतात की चार आर्य सत्य काय आहेत? मध्यम मार्गावर अशासाठी चालायचे आहे की ही चार आर्य सत्य अनुभूतीवर उत्तरली पाहिजे, उतरतीलच. मध्यम मार्गावर चालणारी व्यक्ती, आर्य अष्टांगिक मार्गावर चालणारी व्यक्ती, ह्या चार आर्य सत्त्यांना अनुभूतीवर उतरवणारच. त्यावर चालणार नाही, त्याला सम्यक करणार नाही तर अनुभूतीवर उतरवणार नाही. मग तो हजार वेळा सांगत राहो आम्ही तर मध्यम मार्गी आहोत, आम्ही मध्यम मार्गाचा स्वीकार केला आहे. आम्ही सम्मादिट्ठि इत्यादी इत्यादीचा स्वीकार केला आहे. पाहा यामध्ये एवढे गुण आहेत, एवढे लाभ आहेत. ज्याला चार आर्य सत्यांचा साक्षात्कार होईल आणि त्यावर एकेक पाऊल चालेल त्याला ही चार आर्य सत्य आपोआप प्रकट होतील._

_काय आहेत ही चार आर्य सत्य? *'इदं खो पन, भिक्खवे, दुक्खं अरियसच्चं* एक तर दुःख स्वतःच आर्य सत्य आहे. आर्य कोणत्या अर्थाने ? की ज्या सत्याचा साक्षात्कार केल्याने अनार्य व्यक्ती आर्य होते. *'अरियो अट्ठङ्गिको मग्गो'* ज्या मार्गावर चालून अनार्य व्यक्ती आर्य झाली म्हणजे निर्मळ झाली, संत झाली. ती *आपल्या मनातील विकारांना काढून टाकेल. अशा व्यक्तीला त्या काळी आर्य म्हणत होते आणि जो विकारांनी भरलेला आहे, विकारांना बाहेर काढण्याचे कोणतेही काम करीत नाही अशा व्यक्तीला त्या काळी अनार्य म्हणत होते.* अनार्य व्यक्तीला आर्य होण्यासाठी अष्टांगिक मार्गावर चालावे लागते. *अष्टांगिक मार्गावर चालत असतांना दुःखाचा साक्षात्कार झाला तर ते पहिले आर्य सत्य. हा साक्षात्कारच आम्हाला आर्य होण्याच्या दिशेकडे घेऊन जाईल.*_

_दुःख ह्या सत्याचा केवळ भोग भोगणे आम्हाला अनार्यच ठेवेल. दुःखाचे सत्य असे कोणते सत्य नाही ज्याचा केवळ काही लोकांना अनुभव होतो. हे तर जीवनातले फार मोठे स्थूल सत्य आहे. प्रत्येक व्यक्ती आपल्या जीवनात कोणत्या ना कोणत्या कारणाने दुःखी राहाते. परंतु ती आर्य होत नाही कारण ती दुःखाचा भोग भोगते म्हणजे व्याकुळ होते. दुःख समोर आल्याबरोबर व्याकुळ होते. ह्याच दुःखाला साक्षीभावाने, तटस्थ भावाने पाहू लागली, त्याच्या ख-या स्वभावाला पाहू लागली तर त्या दुख सत्याच्या आधाराने आर्य होण्याचा मार्ग सापडतो. तेच दुःख आर्य सत्त्य होते. तेव्हा समजू लागेल की दुःख काय आहे ?_

_*"जातिपि दुक्खा, जरापि दुक्खा, व्याधिपि दुक्खो, मरणम्पि दुक्खं, अप्पियेहि सम्पयोगो दुक्खो, पियेहि विप्पयोगो दुक्खो, यम्पिच्छं न लभति तम्पि दुक्खं, सङ्खित्तेन पञ्चुपादानक्खन्धा दुक्खा"।* जन्म होणे दुःख आहे, म्हातारपण येणे दुःख आहे, आजारी पडणे दुःख आहे, मरणे दुःख आहे, अप्रियचा संयोग होणे दुःख आहे, प्रियचा वियोग होणे दुःख आहे, एखादी इच्छित वस्तू, व्यक्ती, स्थिती, घटना प्राप्त न होणे दुःख आहे. ह्या मार्गावर चालणाऱ्याला आणखी खोलात जाता जाता अनुभूतीने गोष्ट समजू लागेल की *'सङ्खित्तेन पञ्चुपादानक्खन्धा दुक्खा* संक्षेपाने, थोडक्यात, खूप खोलपर्यंत ही गोष्ट समजू लागेल की ही पाच उपादान आणि ह्या पाच उपादानामुळे तयार झालेले हे पाच स्कंध, ह्या पाच स्कंधाप्रती जे उपादान आहे, आकर्षण आहे, आसक्ती आहे ते दुःख आहे. काय आहेत हे पाच स्कंध? एक हा रुप स्कंध, हा परमाणूंचा समूह, ज्याला 'मी' 'मी' 'माझा' 'माझा' करीत आहे आणि ज्याच्याप्रती एवढी घट्ट आसक्ती, एवढे घट्ट उपादान निर्माण केले आहे. आणि मनाचे हे चार स्कंध विज्ञान, संज्ञा, वेदना, संस्कार. ह्या चौघांना 'मी' 'मी' 'माझा' 'माझा' म्हणून त्याच्याप्रती एवढी घट्ट आसक्ती निर्माण केली. ह्या आसक्तीमुळे ह्या पाच स्कंधांची उत्पत्ती होतच राहाते. जेवढी जेवढी आसक्ती होईल तेवढे तेवढे आम्ही ह्या पाच स्कंधाचे निर्माण करीत राहू. एका जन्मापासून दुसऱ्या जन्मापर्यंत, एका जन्मापासून दुसऱ्या जन्मापर्यंत, जेवढे जेवढे ह्या पाच स्कंधाचे निर्माण होत जाते तेवढी तेवढी त्याच्याप्रती आमची आसक्ती आणखी वाढत जाते. दोन्ही एकमेकांना बळ देतात आणि आमच्या दुःखाचा संसार वाढतच जातो, वाढतच जातो..._

क्रमशः...

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

*_लेखक :- कल्याणमित्र सत्यनारायण गोयन्का_*

_बुद्धवर्ष २५६०, भाद्रपद पौर्णिमा, १६ सप्टेंबर, २०१६, वर्ष ३ अंक ६_

*_संकलन :- महेश कांबळे_*

*_दिनांक :-_* २०/०२/२०२५

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

Monday, 17 February 2025

बौद्धांनी लग्नात ‘ हळद ‘ लावावी, की लावू नये….? (एक चिंतन )

*_बौद्धांनी लग्नात ‘ हळद ‘ लावावी, की लावू नये….? (एक चिंतन )_*

https://dainikjagrutbharat.com/?p=21536

_बौद्ध म्हणून मिरवणाऱ्यांनी कोणत्याही गोष्टींचा अतिरेकी विरोध करण्याचा आटापिटा करण्यात खरेच काहीही अर्थ नसतो. एकतर, जे बौद्ध म्हणवून घेतात, परंतु त्यांचा बौद्ध धम्माविषयी अभ्यास तर काडीचीही नसतो, अशांच लोकांमध्ये हा धार्मिक कडवेपणा दिसून येतो. फक्त बौद्धांमध्येच हा प्रकार नाही, तर हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन इ. धर्माच्या लोकांमध्येही हाच प्रकार आढळून येतो. विशेष म्हणजे, जे लोक धर्मांतरीत झालेले आहेत, भलेही मग ते सुशिक्षित असोत, की अशिक्षित, त्यांच्यातच हे अति कडवेपणाचे दोष ठासून भरलेले आढळतात. त्याचे कारण म्हणजे 'फक्त आम्हीच या धर्माचे नीती-नियम काटेकोरपणे आचरणात आणतो, बाकी कोणीच नाही' हे दाखवून श्रेष्ठत्व मिरवण्याचा पोकळ दांभिकपणा होय...._

_आणि, याचे उत्तम उदाहरण म्हणजे *'बौद्ध धम्मात लग्न समारंभात हळद लावत नाहीत, आणि बौद्धांनी ती लावू नये' हा एक असाच कडवा व कट्टर गैरसमज होय.*_

_आता, *हळदीचा आणि एखाद्या कोणत्याही धर्माचा काय आणि कसला संबंध येतो....? लग्नविधीत हळद लावणे, ही काय एखाद्या विशिष्ट धर्माचीच काय ती मक्तेदारी आहे काय....? तर असे मुळीच नाही. हळद या देशात हिंदूंप्रमाणेच शिख, जैन, बौद्धच काय, अगदी मुसलमानांमध्येही लावतात. तशीच ती आदिवासी जन-जमातींमध्येही विवाहप्रसंगी लावली जाते. 'विवाह प्रसंगी हळद लावणे ' हे कुठलेही धार्मिक विधीशी संबंधित कार्य नाही, तर तो एक सांस्कृतिक प्रकार आहे, जो येथे अगदी पूर्वापार चालत आलेला आहे.* त्याचे महत्त्वाचे कारण असे, की ' हळद ' ही जंतुनाशक व बुरशीनाशक आहे. तसेच हळदीमध्ये ' अँटिसेप्टिक 'हा गुणधर्म असल्याने, हळद ही शरीरावरील जखमा, त्वचारोग बरे करण्यास उपयोगी ठरते. तसेच, ती हाडांना लागलेला मुकामार व सूज देखील कमी करते. पूर्वीच्या काळात आजच्यासारखी सुधारित जीवनपद्धती व आधुनिक औषधोपचार अस्तित्वात नव्हते. त्यामुळे अनेक आजारांवर गावठी उपचार म्हणून औषधी वनस्पती, त्यांची मुळे, झाडपाला, काष्ठौषधी, व हळदीचाच प्रामुख्याने वापर केला जात असे. ग्रामीण भागातील जनजीवन हे खडतर असे. पाणी देखील नदीवरून किंवा विहिरीवरून, दूर अंतरावरूनच आणावे लागत असे. भांडीकुंडी जास्त नसल्यामुळे, पाण्याचा साठाही मर्यादितच असे. त्यामुळे, अगदी रोजच्या रोज, नित्यनेमाने सर्वच जण अंघोळ करून रोजच कपडेही कोणी धूवत नसत. शारीरिक स्वच्छतेच्या अभावी बहुतांश स्त्रिया -पुरुषांना व बालकांना देखील खरुज, नायटा, इसब, गजकर्ण इ. त्वचारोगांनी कायमच ग्रासलेले असे. अगदी वीस-पंचवीस वर्षांपूर्वी पर्यंत खेड्यापाड्यांतील बहुतांश लोक या समस्येने हैराण असत. त्यामुळे, मग साहजिकच *नवरी किंवा नवरदेव या पैकी कोणासही, किंवा दोघांनाही एकमेकांपासून अशा त्वचारोगांचे संक्रमण होऊ नये, किंवा असल्यास ते नष्ट व्हावे, तसेच, घाम व इतर कारणांमुळे येणारी शरीराची दुर्गंधी नष्ट व्हावी, या उदात्त हेतूनेच लग्नामध्ये 'हळद लावणे ' हा प्रकार रुढ झाला. शिवाय, हळदीचा आणखी एक महत्त्वाचा उपयोग म्हणजे, हळद लावल्याने, काळासावळा रंगही अगदी तजेलदार होतो, व तो उठून दिसतो. " पी हळद, अन् हो गोरी..." हा वाक्प्रचार देखील याच संदर्भात प्रसिद्ध आहे. म्हणून, 'लग्न समारंभात नवरा व नवरीचे सौंदर्य खुलून दिसावे', म्हणूनही हळदीचा उपयोग करण्यात येऊ लागला.*_

_म्हणून, अगदी प्रकर्षाने सांगावेसे वाटते, की *'लग्नात हळद लावणे ' ही काही कोणा एका धर्माची मक्तेदारी नाही. तर ती येथे सर्वत्र प्रचलित असलेली एक सांस्कृतिक परंपरा आहे, आणि ती येथे सर्वत्र प्रचलित असलेली एक सांस्कृतिक परंपरा आहे, आणि ती अनेक शतकांपासून येथील समाजात चालत आलेली आहे. प्रथा-परंपरांचे स्वरूप हे कधीही संकुचित असता कामा नये, हे या गोष्टींना विरोध करणाऱ्यांनी ध्यानात घ्यावे....."*_ 

*_- अशोक नगरे_*

आपल्या स्वतःला कसे जाणावे ?

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

*_आपल्या स्वतःला कसे जाणावे ?_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2025/02/blog-post_17.html

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

_*आपल्या स्वतःला जाणण्यासाठी पंजाबचा एक मुस्लीम संत म्हणतो- अरे, संत-संत असतो, काय मुस्लीम, काय हिंदू, काय शिख, काय बौद्ध, काय जैन ? ज्याने आपले चित्त निर्मळ केले, शांत केले, तो संत झाला.* तर हा संत म्हणतो -_

*_'हाशिम तिण्हा रब्ब पछाता, जिण्हा अपणा आप पछाता'।_*

_ज्याने आपल्या स्वतःला ओळखले, त्याने रब्बला ओळखले, परमात्म्याला ओळखले. *परमात्मा काय असतो ? त्या निर्मळ चित्ताच्या सत्याचा साक्षात्कार व्हावा! अरे, मग अजून काय पाहिजे ? पण कसा व्हावा ? आपल्या आत सत्यांना पाहातांना. म्हणून प्रथम काम चित्ताला काबूत तर करावे. मन आमच्या आज्ञेनुसार चालेल, आम्ही मनाच्या आज्ञेनुसार चालू नये. मन आमचे गुलाम व्हावे, आम्ही मनाचे गुलाम नसावे.* त्यामुळेच अनेक विद्यांपैकी एक अशा विपश्यनेने ही कल्याणकारी विद्या दिली की आपल्या श्वासाप्रती जागरुक होणे शिका ! कारण ? कारण तुमच्या श्वासाचा, तुमच्या मनाच्या विकारांशी खूप सखोल संबंध आहे. ध्यान करता-करता आपोआप अनुभव होऊ लागतो की किती सखोल संबंध आहे._

_जेव्हा कोणी विपश्यनेच्या शिबिरात येतो, तेव्हा प्रथम काम हेच की श्वासाला पाहा, येतो-जातो, आपल्याबाबत हे सत्य प्रकट झाले. आपल्या स्वतःला जाणायचे आहे, मी काय आहे ? ज्याला मी-मी-मी म्हणतो ते काय आहे. ज्याला माझे-माझे-माझे म्हणत आहे. ते काय आहे ? हे शरीर 'मी' आहे 'माझे' आहे की हे चित्त 'मी' आहे, 'माझे' आहे ? अथवा या दोन्हींच्या पलीकडे काही आहे जे 'माझे' आहे ? अनुभूतीवर उतरावे. पुस्तकात लिहिलेले आहे, म्हणून मानायचे नाही. आमची परंपरा म्हणते, म्हणून मानायचे नाही. आमचे गुरु महाराज म्हणतात, म्हणून मानायचे नाही. सत्य ते जे अनुभूतीवर उतरते. तेव्हा ते 'आमचे सत्य' झाले. अन्यथा पुस्तकांचे सत्य आहे. गुरु महाराजांचे सत्य आहे.... एखाद्या अन्यचे सत्य आहे, आमचे सत्य नाही. जोवर आमचे सत्य नाही, तोवर आमचे कल्याण नाही._

_आपल्याबाबत कसे जाणायचे? डोळे बंद करुन, मांडी घालून बसलो. तोंड बंद आहे. वाणी अथवा शरीराने कोणतेही काम करत नाही. आता पाहा, आपल्याबाबत काय सत्य प्रकट होते आहे? प्रथम सत्य हे प्रकट होईल की हा श्वास आत येतो आहे. श्वास बाहेर जात आहे. बस, येथूनच सुरु करा. सत्याने सुरु करा. कल्पनेने नाही. जिथे कोणती कल्पना जोडली की त्या कल्पनेच्या सहाय्याने एखाद्या मोठ्या कल्पनेत बुडून जाल. दूर व्हाल सत्याच्या. सत्याचा साक्षात्कार, परम सत्याचा साक्षात्कार खूप दूर राहील._

_कल्पना वा कोणतीही मान्यता जवळ येऊ नये. अनुभूतीसह - श्वास येत आहे, जात आहे, हे सत्य आहे. याचा मी अनुभव करत आहे. बस, येथूनच काम सुरु केले. करता-करता एक दिवस गेला, दोन दिवस, तीन दिवस.... जस-जसे मन थोडे-थोडेही एकाग्र होणे सुरु होईल, तस-तसे सूक्ष्म व तीक्ष्ण होत जाईल, संवेदनशील होत जाईल. तेव्हा आपल्या शरीर व मनाबाबत अजून सत्य प्रकट होत जाईल. तीन दिवसांपर्यंत मनाला नाकाच्या या खालच्या छोट्याशा स्थानावर लावून ठेवले. मन पळत राहिले, पुन्हा लावले, पुन्हा पळाले, पुन्हा लावले; प्रयत्न करत राहिलो, परिश्रम करत राहिलो. करत-करत मन थोडेसे शांत झाले, एकाग्र झाले, तेव्हा पाहिले की या स्थानावर काही संवेदना होत आहे.... काही ना काही जाणवते आहे. अरे, संपूर्ण शरीरात प्रतिक्षण काही ना काही होत राहाते._

_परंतु आमचे मन वर-वरचाच हा खेळ खेळत राहाते. कधी आत पाहातच नाही. त्याला माहीतच नाही की काय होत आहे. कोणती ना कोणती जीव-रासायनिक (biochemical) प्रतिक्रिया प्रतिक्षण सर्व शरीरात होत राहाते, येथेही होत राहाते. तर प्रथम येथे माहीत होऊ लागले- काही खाजवल्यासारखे, गुदगुलीसारखे, सरसर चालल्यासारखे, झनझनाटासारखे, काही धडकल्यासारखे होते. साधारण बाबी आहेत, पण शरीरात जे होते, त्यालाच जाणायचे आहे जाणा, काय होत आहे या शरीरात._

_बस, नाकाखाली एवढ्याश्या अंतरात जाणता जाणता चवथ्या दिवशी जाणवते की डोक्यापासून पायापर्यंत सर्व शरीरात काही ना काही होत आहे. काय होत आहे? परिवर्तन होत आहे. प्रतिक्षण हे शरीर बदलत आहे, बदलत आहे. यासोबतच हे चित्त बदलत आहे. चित्ताच्या या परिवर्तनशील स्वभावाला पाहू लागलो. काय मिळाले याला पाहून ? हे काही कर्मकांड नाही, वैज्ञानिक विधी आहे. जसे श्वासाला का पाहू लागलो ? कारण श्वासाचा आमच्या मनाच्या विकारांशी खूप सखोल संबंध आहे. याचप्रकारे आमच्या शरीरात ज्या भिन्न-भिन्न प्रकारच्या संवेदना (body sensations) होतात, त्यांचा आमच्या मनाशी व मनाच्या विकारांशी खूप सखोल संबंध आहे._

_भारताचे जुने ऋषी 'ऋत'चा तपास, शोध करायचे. आपल्या आत निसर्गाचे नियम कसे काम करतात, याचा शोध घ्यायचे, म्हणूनच ऋषी म्हणवले गेले. भारताच्या या सुपर वैज्ञानिक महापुरुषानेही खूप जुनी विद्या शोधून काढली. सर्व बाबी वैज्ञानिक पद्धतीने शोधल्या. त्याने खूप सखोलतेने सत्यांना पाहिले, तेव्हा सर्व बाबी समजल्या. विश्वाचे सर्व रहस्य उलगडले. अरे, काय होते, का होते, कसे होते, का दुःखी होतो, कसे दुःखाच्या बाहेर निघू शकतो, सर्व रहस्य समजले. तेव्हा समजले की *मनात कोणताही विकार जागला, तर शरीरावर संवेदना आणल्याविना जागू शकत नाही. विकार जागेल व त्यासोबत संवेदना जागेल. क्रोध जागला, तर शरीरात गर्मी जागेल, धडधड वाढेल, तणाव येईल, शरीरात काही ना काही होऊ लागले. Mind and matter चे इतके strong relation आहेत की वेगळे करता येत नाहीत. दोन्ही एक दुसऱ्याला प्रभावित करतात.*_

_एक अजून मोठी बाब की आतील शुद्ध नाही, यामुळे मी क्रोध जागवला तर आतल्या आत खूप अप्रिय संवेदना होऊ लागल्या, गर्मी झाली, घडघड वाढली, तणाव वाढला, हे सर्व चांगले कसे वाटेल ? खूप अप्रिय अनुभूती झाली तर अजून क्रोध करतो. अजून क्रोध करतो तर अजून अप्रिय अनुभूती होते. अरे, कसे दुष्चक्र (vicious circle) सुरु झाले. बाब कुठून सुरु झाली होती ? कोणीतरी आमचा अपमान केला, त्यामुळे मी क्रोध जागवला आणि आता काय होत आहे ? या क्रोधाचे संवर्धनच संवर्धन करीत आहे. आपल्या दुःखाचे संवर्धन करत आहे. आत पाहातच नाही की काय होत आहे, काय करु लागलो आपल्या देशाचा हा महावैज्ञानिक या सखोलतेत गेला व जाणले की जसाही मनात कोणता विकार वा विचार जागतो, त्याच्यासोबत एक आश्रवही जागतो. *आश्रवाचा एक अर्थ होतो वाहणे.* ह्या ज्या रक्ताच्या शिरा आहेत, नाड्या आहेत, त्यात रक्तासोबतच एक जीव-रसायन (bio-chemical) अजून चालू लागते. ते glandular ही असू शकते व non glandular ही, ग्रंथीतूनही निघते व ग्रंथीविनाही निघते._

_क्रोध निर्माण करताच जे रसायन (आश्रव) निर्माण होईल, ते वाहणे सुरु होईल व शरीरात खूप बेचैनी येईन. बेचैनी येईल व आपल्या वेडेपणात अजून क्रोध वाढवेल. अजून क्रोध वाढवेल, आश्रय अजून बाढेल.... तासंतास पेटतच राहील, तासंतास दुःखच दुख. मी स्वतः जबाबदार आहे ना ! कारण मी कधी आपल्या आत पाहिलेच नाही._

_*आश्रवाचा अजून एक अर्थ आहे नशा, आसव जसे द्राक्षासव. मदिरेसारखी नशा असते.* आता नशा आली, आसक्ती झाली, माहीत आहे की दुःख आहे. तरीही म्हणतील असे दुःख तर होईलच ? पुन्हा तेच करतील पुन्हा करतील, आसक्ती झाली त्याच्याशी. एखाद्याला कोड झाले, आपल्या स्वतःतच खूप दुखदायी. खाजवतो, दुःखी होतो. तरीही राहिले जात नाही, पुन्हा खाजवत्तो.... अरे, आसक्त झाला ना ! आपल्या दुःखांप्रती आसक्त झाला. याला वाढवत जात आहे, वाढवत जात आहे._

_विपश्यना करत-करत ही शुद्ध येऊ लागते. अरे भाऊ, एकदा विकार जागवल्यावर ही जी दुःखद अनुभूती आत होऊ लागली, बस, आता जागवणार नाही. तर काय कराल? संवेदना जी खूप दुःखद होती, तिला साक्षीभावाने पाहू, द्रष्टाभावाने, तटस्थभावाने तिच्या स्वभावाला पाहू. काय स्वभाव आहे ? एक तर व्याकुळ बनवण्याचा स्वभाव आहे तो तर आहेच, दुसरा स्वभाव आहे की उत्पन्न होते व काही कालावधीनंतर समाप्त होते. ही अनंत काळापर्यंत राहात नाही. *शरीरावर होणारी कोणतीही संवेदना, कोणतीही अनुभूती अनंत काळापर्यंत राहात नाही. उत्पन्न होते, काही कालावधीनंतर समाप्त होते. अरे, अनित्य आहे, नश्वर आहे, भंगुर आहे, परिवर्तनशील आहे.* आता अनुभवाने जाणत आहोत, पुस्तकांमधील बाब नाही. गुरु महाराजांची, बुद्धांची, महावीरांची वा गीतेतील बाब नाही. आपल्या अनुभवाने जाणत आहोत हे अनित्य आहे! आपल्या स्वभावाने नष्ट होणारी आहे, होत आहे, तिच्याप्रती काय प्रतिक्रिया करु मी ? काय react करु, पाहा तिला! बस, हे vicious circle तुटले._

_*जेव्हा हे दुष्चक्र चालले की क्रोध आला तर तासंतास क्रोधात पेटत राहिलो, वासना जागली तर तासंतास वासनेत पेटत राहिलो, अंहकार जागला.... आता तुटले तर त्यापासून मुक्ती मिळू लागली. ह्यासाठी संवेदना पाहातात, शरीराप्रती प्रेम जागवण्यासाठी नाही. मन व शरीराचा जो सखोल संबंध आहे, त्याला जाणण्यासाठी पाहात आहोत.* पाहाता-पाहाता सारे रहस्य एका साधारण साधकालाही उलगडत जाते. एखाद्याला एका शिबिरात, एखाद्याला दोन, एखाद्याला तीन शिबिरात, सांगू शकत नाही अवलंबून आहे किती काम करतो, कोणत्या प्रकारे काम करतो. पण काम करता-करता कितीतरी बाबी स्वतः समजू लागतातः प्रथम तर शरीरात मोठ-मोठ्या स्थूल-स्थूल संवेदना होतील. कुठे जडपणा आहे, कुठे दुखते, कुठे दबाव आहे. होईलच पण त्यांना पाहाता-पाहाता विरघळू लागल्या, कुठे स्थूलपणा वा भरीवपणा राहिला नाही. सर्व शरीर केवळ तरंगच तरंग. सारा मार्ग सत्याचे दर्शन करण्याचा आहे. हा भरीवपणाही एक सत्य आहे, परंतु यापेक्षा सखोल सत्य हे आहे की सर्व शरीर परमाणूंनी बनलेले आहे. लहान-लहान परमाणू आहेत, ज्यात भरीवपणा नाही आहे. वस्तुतः काहीही भरीव नाही. ते छोटे-छोटे परमाणूही तरंगाप्रमाणे उत्पन्न होतात, नष्ट होतात. त्यामुळे सारे शरीर केवळ तरंगच तरंग आहे. जे मृणमय मातीसारखे वाटत होते, चिन्मय झाले, सारे शरीर चेतन झाले._

_आता पुष्कळशा बाबी अजून सखोलतेने समजल्या. दहा दिवसांचे शिबिर करा, वीस दिवसांचे, तीस दिवसांचे वा अधिक दिवसांचे करा, सारे रहस्य उलगडू लागेल. कानाजवळ पोहोचला, तर तरगंच तरंग, अरे, तरंगाशिवाय अजून काही नाही. एखादा शब्द ऐकू आला व तो कानात पोहोचला तर तरंगच तरंग, डोळ्याजवळ पोहोचला, एखादे रुप, रंग, प्रकाश पाहिला तरंगच तरंग. नाकाजवळ पोहोचला, एखादा गंध तरंगच तरंग. जिभेने एखादा पदार्थ चाखला-तरंगच तरंग. मनात पोहोचला तरंगच तरंग, मनात एखादा छोटासाही विचार जागला तरंगच तरंग._

_आता काय होत आहे ? पाहतो की कानात शब्द ऐकू आला, तरंगाने तरंगाला टक्कर दिली. पूर्वी येथे एक तरंग चालला होता, आता बाहेरचाही एक तरंग येऊन त्याने या तरंगाला टक्कर दिली, तर एक नवीन प्रकारचा तरंग सुरु झाला. जसे एखाद्या घंटीला वाजवले. आत्ता त्यात एक तरंग सुरु झाला आणि जिथे वाजवले तिथेच नाही, तर संपूर्ण घंटीत तरंग सुरु झाले. तसेच कानात शब्द ऐकू आला, की डोळ्याने रुप दिसले, की नाकाने गंध आला, की जिभेने रस चाखला, की शरीराला काही स्पर्श झाला, की मनात काही विचार आला, सर्वत्र तरंगच तरंग._

_*मनाचे चार हिस्से आहेत अथवा असे म्हणा चेतनेचे चार भाग आहेत. मनाचा प्रथम भाग डोके वर काढून म्हणेल, अरे काय झाले ? कानात काही ऐकू आले रे असेच डोळ्याने, नाकाने.... या सहा इंद्रियांपैकी ज्या दरवाज्यावर काही खटखट झाली, मनाचा हा भाग, केवळ हेच म्हणेल- काही झाले! एवढ्यात मनाचा दुसरा भाग आपले डोके वर काढेल काय झाले? हा काय आवाज आला? तो आपल्या जुन्या अनुभूतींच्या, जुन्या आठवणींच्या भरवश्यावर त्याला ओळखेल. काय शब्द आला ? अरे, शिवीचा शब्द आहे अथवा प्रशंसेचा शब्द आहे ? त्याने ओळखले, हेच काम आहे त्याचे. एक काम अजून केले की ओळखून मूल्यांकन केले. शिवीचा शब्द आहे, अरे, खूप वाईट आहे ! प्रशंसेचा शब्द आहे, खूप चांगला आहे. एवढ्यात मनाचा तिसरा भाग आपले डोके वर काढेल शिवी आहे, खूप वाईट आहे, तेव्हा पाहील की सर्व शरीरात जे neutral तरंग सुरु होते, ते खूप दुःखद झाले. प्रशंसा आहे. खूप चांगली, तेव्हा पाहील की सा-या शरीरात जे तरंग आले ते खूप सुखद, खूप सुखद, म्हणजे मनाच्या तिस-या भागाने शरीरावर होणा-या या तरंगाना, या संवेदनांना जाणण्याचे काम केले. एवढ्यात मनाचा चौथा भाग आपले डोके वर काढेल. तो प्रतिक्रिया करेल शिवी आहे, खूप अप्रिय वाटली, मला नको! तिचा द्वेष करेल. प्रशंसा आहे, खूप प्रिय वाटली, हो-हो, अजून पाहिजे ! हे तर अजून पाहिजे ! तिच्या बद्दल आसक्ती जागवेल. या सर्व प्रपंचाला पाहात आहोत की कशी आसक्ती जागते, कसा द्वेष जागतो, कसे विकार जागतात व आम्हाला शुद्ध राहात नाही, तर वाढत जातात, वाढत जातात. आम्हाला शुद्ध असली तर आम्ही वाढू देणार नाही. आम्ही त्याला पाहात राहू. पाहात राहू तर त्या बिचा-याला ताकद मिळणार नाही, नवीन आहार मिळणार नाही, बलवान होणार नाही, निर्बळ होत होत समाप्त होईल.*_

_आता हे कोणीही करा ना भाऊ! काय फरक पडतो? जो करेल त्यालाच परिणाम मिळेल. *भारताने एकच धर्म दिला व तो हाच की तुझ्या आत पाहा. विकार जिथे जागतो तिथे त्याला समाप्त कर. पुढे वाढू देऊ नकोस. तर हळूहळू विकार जागवण्याचा स्वभाव बदलेल.* भारताची ही सार्वजनिक विद्या, कोणत्याही एका संप्रदायाची नाही, कोणत्याही एका समाजाची नाही, कोणत्याही एका देशाची नाही, संपूर्ण विश्वाची आहे, त्यामुळेच सर्व विश्वात पसरली, जोरात पसरली. आता ती याच कामासाठी पुन्हा जागो. सर्वांचा रोग सार्वजनिक आहेत, त्याचा इलाजही सार्वजनिक आहे._

_भारताची महानता होती की या सखोलतेने सार्वजनिक धर्माला उजागर केले व संपूर्ण विश्वात पसरवले. आता पुन्हा जागण्याची वेळ आली आहे. यात जर अजून काही जोडले तर अडचणी निर्माण होतील. ज्या बाबी जोडल्या जाणार आहेत त्यांना एका बाजूला ठेवा, ज्या मान्यता आहेत त्यांना एका बाजूला ठेवा आणि आत सत्य पाहात जा, पाहात जा. पाहात जाल तर स्थूल-स्थूल वाटणाऱ्या या शरीराचे हे सारे क्षेत्र अनुभूतीवर उतरत जाईल की केवळ परमाणूच परमाणू आहेत. आणि तेही तरंगच तरंग, अजून काही नाही. हे मन जे घनीभूत होऊन येते, एखादा विकार आला तर खूप घनीभूत होऊन येतो, आता तुकडे-तुकडे होऊन तरंगच तरंग. *"सब्बो पज्जलितो लोको...".*_

_*बुद्धांनी म्हटले - सर्व काही तरंगच तरंग आहे, अजून काहीही नाही. आजचा पश्चिमेचा वैज्ञानिकही म्हणतो There is no solidity in the material word, only wavelets and wavelets...* बाब तर तीच आहे. त्यांनी अनूभूतीने सांगितले व हे आपल्या उपकरणांनी सांगत आहेत. आपल्या अनुभूतीने जाणता जाणता साधक जाणू लागेल की सर्व जागी तरंगच तरंग आहेत. होता होता एका स्थानावर पोहोचेल की इथे तर भरीवपणा वाटल. भाऊ, हे तर नित्य असेल, शाश्वत असेल, ध्रुव असेल. नाही, मानायचे नाही, त्यालाही पाहात जा. तर पाहाता-पाहाता बघाल की त्याचेही तुकडे होऊ लागले. कारण *प्रकृतीचा नियम आहे, शरीर व चित्ताचे क्षेत्र असेल तर ते अनित्यच असेल. जरी आम्हाला भ्रांती निर्माण करत असेल की हे तर नित्य आहे, शाश्वत आहे, ध्रुव आहे.* काही नाही.... पाहात जा, पाहात जा. तर या क्षेत्रात प्रथम मुठी एवढी जागा, मग अजून तुकडे होत-होत आंगठ्याएवढी जागा, ज्याला म्हटले अंगुष्ट प्रमाण. त्याचेही तुकडे होता-होता एका तिळाएवढी जागा. त्याचेही तुकडे होत होत एका केसाएवढी. अजून तुकडे झाले तर छिदन्ति हृदय ग्रन्थि, भिन्दन्ति सर्व संशयः._

_या हृदय ग्रंथीचे तुकडे झाले तर सर्व संशय दूर झाले. सर्व बाब समजली. आता काय संशय असेल ? काय शंका असतील ? तेव्हा काय झाले ? त्याच्या पलीकडचा साक्षात्कार झाला. शरीर व चित्ताचे हे जे क्षेत्र आहे ते अनित्याचे क्षेत्र आहे, जे प्रतिक्षण उत्पन्न व नष्ट होत राहाते आणि आम्ही आहोत की आपल्या बावळटपणात याच्याप्रती आसक्ती निर्माण करत जात आहोत, द्वेष निर्माण करत जात आहोत. या आसक्ती-द्वेषापासून मुक्त होऊ. विकारांपासून मुक्त होऊ, तेव्हा याच्या पलीकडे जी अवस्था येईल, ती नित्य आहे, शाश्वत आहे, ध्रुव आहे. ती एकरस आहे. अरे, तिला वाटेल त्या नावाने उच्चारा, परंतु तिचा साक्षात्कार झाला पाहिजे. तिची अनुभूती झाली पाहिजे._

_ती तर झाली नाही आणि भांडत आहोत. तुम्ही याला मानता, आम्ही याला मानत नाही.... अरे, बाबा! काय मिळाले रे? जाणले तर काहीही नाही ना ! जाणा, आणि जाणाल स्वानुभूतीने, मानाल अंधविश्वासाने. आमची परंपरा म्हणते त्यामुळे मानत आहोत. आमची दार्शनिक मान्यता ठीक आहे यासाठी मानत आहोत. अरे, तुम्हाला ज्ञान कुठे झाले ? नाही झाले ना! आता अनुभूती करा. जाणाल तर सांगू शकणार नाही. मुक्याचा गुळ आहे काय बोलेल ? ती इंद्रियांच्या पलीकडची अवस्था आहे, जिथे इंद्रिय काम करत नाहीत. ही त्या पलीकडची अवस्था आहे. ती मिनिटभर राहू शकते, दहा मिनिट राहू शकते, तासभर राहू शकते, पाच तास ही राहू शकते. पुन्हा इंद्रिय जगात आलात. पुन्हा त्याच प्रकारे काम करु लागलात. आता मनुष्य एकदम बदलला. कारण विकारांपासून मुक्त होऊन आला. आता त्याची काय व्याख्या करेल ? कसे समजवेल ती काय अवस्था आहे. मुक्याचा गुळ आहे._

*_जाणे तो सांगु न शके, सांगे तो न जाणत ।_* 

*_मुक्याची साखर आहे, चाखत जातो हसत ।।_*

_काय म्हणेल ? जो सांगतो, समजले पाहिजे की त्याला अनुभव झाला नाही. म्हणूनच लांबलचक गोष्ट करतो नित्याची, शाश्वताची, ध्रुवाची. सर्व जीवन अनित्यच्या क्षेत्रात घालवत आहात. आमची दार्शनिक मान्यता, तुमची....._

_अरे, बावळट माणसा, कुठे गुंतलास रे! तू साक्षात्कार कर त्याचा आणि साक्षात्कार केल्यावर काय बोलशील! एक जण संताच्या मागे लागला की सांग भाऊ, बाब काय आहे? तर काय सांगेल बिचारा ?_

_तो म्हणतो *'रुप ना, रंग ना, श्वेत ना श्याम जी ! तिथले ना काही रुप आहे, ना रंग आहे. न ते पांढरे आहे, न काळे आहे. आणि तुम्ही म्हणता आमचा परमात्मा काळ्या रंगाचा आहे की पांढ-या रंगाचा आहे.... काही नाही.... 'तुम्ही सदा एक रस, राम जी, राम जी !'*_

_काय सांगेल बिचारा ? ती एकरसाची अवस्था आहे, अनुभूतीवर उतरेल तर कल्याण होईल. तेव्हा धर्म धारण करण्याचे जे फळ मिळाले पाहिजे ते फळ मिळेल. नाही तर कोऱ्या गप्पाच होतील._

_*धर्माची केवळ चर्चाच होऊन राहिली, धर्माला केवळ मनोरंजनाचा विषय समजून राहिलो, तर भाऊ खूप काही गमावले. या प्रकारच्या धर्मसभेत येणे वाईट नाही, परंतु जर हा मनोरंजनाचा विषय झाला- चला आज यांना ऐकले, उद्या त्यांना ऐकू, परवा त्यांचे ऐकू..... ऐकतच राहाल सर्व जीवनभर. करणार काहीही नाही. ज्या दिवशी हे जाणाल की मला करायचे आहे! मला सत्याला अनुभूतीवर उतरवून स्वतः पाहायचे आहे की माझा विकार कोठे जागतो? कसे संवर्धन होते ? त्याला कसे थांबवता येते? कसे मुळापासून दूर केले जाऊ शकते ? बस, कल्याणाचा मार्ग मिळाला.*_

_भारताचा एक महान संत म्हणतो मी चारही बाजूला ज्याला पाहातो, तो खूप बोलतो. बोलणाऱ्याला बोलण्याचे व्यसन लागले, बोलतच आहे. खूप खूश होतो, पाहा इतके लोक ऐकत आहेत मला. पाहा मी किती चांगला वक्ता आहे, कसा चांगला धर्मगुरु आहे. हेच व्यसन लागले. ऐकणाऱ्यांनाही हे व्यसन लागले की आज तर खूप चांगले ऐकले, अरे, आजतर धर्म इतके चांगले ऐकला, इतके चांगले ऐकला. दोन्ही आपापल्या मस्तीत आहेत. तर म्हणतो की बाबा, *'कथे न होई'* बोलण्याने काहीही होत नाही, *'सुने न होइ'* केवळ ऐकल्यामुळे काहीही होत नाही. तर कशामुळे होते ? तर म्हणतो *'कीये होई !!* करण्यामुळे होते._

_करण्यामुळे होईल बाबा. काम करायचे आहे - मनुष्याचे जीवन मोठे अनमोल जीवन, अनमोल जीवन यासाठी की हे काम कोणी पशू करु शकत नाही. कोणी पक्षी करु शकत नाही, कोणी प्रेत-प्राणी करु शकत नाही, कोणी कीट-पतंग करु शकत नाही. हे काम केवळ मनुष्य करु शकतो. प्रकृतीने किंवा म्हणा परमात्म्याने इतकी मोठी शक्ती मनुष्याला दिली आहे की तो अंतर्मुखी होऊन आपल्या विकारांच्या उद्गम क्षेत्रात जाऊन, त्यांचे निष्कासन करु शकतो, त्यांना काढू शकतो, भवापासून मुक्त होऊ शकतो. अरे, असे अनमोल जीवन आणि बाह्य बाबीत घालवावे ? नाही, आता शुद्ध आली पाहिजे. अंतर्मुखी होऊन सत्याचे दर्शन करा आणि खऱ्या अर्थाने आपले कल्याण करा, खऱ्या अर्थाने आपले मंगल करा ! धर्मसभेत जे-जे आले, ते पुण्यशाली आहेत, पुण्याचे बीज आहे, त्यामुळेच धर्मसभेत आले, नाही तर न जाणे कुठे सिनेमात गेले असते वा मौज-मजा करायला गेले असते. धर्माचे बीज तर आहे, परंतु बीजच राहू नये, ते अंकुरित व्हावे, प्रस्फुटित व्हावे आणि फळ देऊ लागावे. खूप मंगल होईल ! खूप कल्याण होईल !_

_या धर्मसभेत जे-जे आले सर्वांचे मंगल होवो ! सर्वांचे कल्याण होवो ! सर्वांची स्वस्ती मुक्ती होवो !_

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

*_लेखक :- कल्याणमित्र सत्यनारायण गोयन्का_*

_बुद्धवर्ष २५६०, श्रावण पौर्णिमा, १८ ऑगस्ट, २०१६, वर्ष ३ अंक ५_

*_संकलन :- महेश कांबळे_*

*_दिनांक :-_* १७/०२/२०२५

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

Friday, 14 February 2025

मनाचे विकार कसे दूर होतील?

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

*_मनाचे विकार कसे दूर होतील?_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2025/02/blog-post_14.html

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

(पूज्य गुरुदेव श्री. सत्यनारायण गोयन्काजी द्वारा पश्चिम महाराष्ट्राच्या प्रसिद्ध नाशिक शहरातील रमाबाई आंबेडकर गर्ल्स हायस्कूलच्या प्रांगणात सन १९९८ मध्ये दिलेल्या तीन दिवसांच्या प्रवचन मालिकेतील तिसऱ्या दिवसाच्या प्रवचनाचा पहिला भाग)

नाशिक धर्मभूमीच्या प्रवुद्ध नागरिकांनो, धर्मप्रेमी सज्जनांनी आणि आदरणीय महिलांनो-

_परवा आपण असे समजण्याचा प्रयत्न केला की धर्म काय आहे. धर्माच्या नावावर न जाणो किती धोका चालतो, किती भ्रम चालतो. त्यामुळे मनुष्य गोंधळात पडतो. सर्व जीवन ह्या गोंधळात, ह्या धोक्यात घालवतो की मी मोठा धार्मिक आहे. मोठा धार्मिक आहे आणि असे असू शकते की त्या विचाऱ्यात धर्माचे नाव- निशाणसुद्धा नसते. तरीही किती मोठा धोका._

_भिन्न भिन्न परंपरेत आपले आपले सण-उत्सव, व्रत-उपवास, कर्म-कांड असतात आणि आपल्या आपल्या वेगवेगळ्या दार्शनिक मान्यता असतात, यांचा धर्माशी दुरान्वयेही संबंध नाही. तरी त्यांना पूर्ण करुन आम्ही समजतो की आम्ही फार मोठे धार्मिक आहोत. असे कां होते? अशासाठी की मानव जातीत जेव्हा शुद्ध धर्म जागतो तेव्हा लोक समजू लागतात की अरे, धर्म तर शुद्ध चित्ताच्या आचरणाला म्हणतात. आणि जेव्हा माझे चित्त शुद्ध नाही, माझे आचरण चित्त शुद्धीवर आधारित नाही तेव्हा भाऊ मी धार्मिक कसा झालो. केवळ हे असे असे कर्मकांड केल्याने कसा धार्मिक झालो? असे कपडे परिधान केल्याने, असे व्रत केल्याने, हे सण-उत्सव साजरे केल्याने धार्मिक झालो? किंवा एखाद्या दार्शनिक मान्यतेचा स्वीकार केल्यामुळे धार्मिक झालो? कसा झालो? माझ्या मनाचे विकार तर गेले नाहीत ना._

_जेव्हा पाहावे तेव्हा मनात क्रोध जागतो, द्वेष जागतो, ईर्षा जागते, अहंकार जागतो, वासना जागते, भिन्न भिन्न प्रकारचे विकार जागत राहतात आणि ह्या विकारांमुळे मी माझ्या मनाची समता हरवून बसतो, मनाचे संतुलन हरवून बसतो, मनाची शांती हरवून बसतो, मनाचे सुख हरवून बसतो. थोड्या वेळासाठी आपल्या मनाला एखाद्या दुसऱ्या गोष्टीत लावून मनावर असा भ्रम निर्माण करतो की मला शांती आहे. नाही भाऊ ती खरी शांती नाही. जोपर्यंत विकारांचा संग्रह घेऊन चालत आहोत तोपर्यंत कोणता ना कोणता विकार जागतच राहातो, जागतच राहातो आणि आम्हाला व्याकुळ करीतच राहातो. यामुळे कोणती हीन भावना जागृत करण्याची आवश्यकता नाही. सत्याचा स्वीकार करायचा आहे की आता धार्मिक होण्यात कमी आहे. मला प्रयत्न करायचा आहे की मी ह्या विकारांपासून कसा मुक्त होईन. विकारांपासून मुक्त झाल्याशिवाय मी धार्मिक नाही. जेवढ्या जेवढ्या विकारांपासून जेवढा जेवढा मुक्त झालो तेवढा-तेवढा धार्मिक झालो. बस हा एकच माप-दंड. दुसरा माप-दंड नाही. तेव्हा धोका राहाणार नाही. आपल्या-आपल्या समाजातील, आपल्या आपल्या संस्थेतील, आपल्या-आपल्या परंपरेतील जे काही उपवास, व्रत आहेत, सण-उत्सव आहेत ते सर्व साजरे करु. हे पारिवारिक आणि सामाजिक मौज-मजेसाठी आहेत. व्हायलाच पाहिजेत, वाईट गोष्ट नाही. पण तपासत राहिले पाहिजे की माझ्या मनाच्या स्वभावात काही फरक पडला की नाही, क्रोध कमी झाला की नाही. माझा द्वेष, माझी आसक्ती, माझी वासना, माझा अहंकार, ममंकार कमी झाला की नाही; हे तपासत राहू._

_जेवढे जेवढे विकार कमी होतील तेवढा तेवढा मी धार्मिक झालो, दुःखापासून मुक्त झालो, भारताच्या जुन्या परंपरेत, जुन्या मान्यतेत जसे त्या दिवशी सांगितले धर्म काय आहे, त्याचे लक्षण, स्वभाव काय आहे? धर्माचे लक्षण हेच आहे की जर धर्म माझ्यामध्ये उतरला तर मला अशांती येऊ शकत नाही, दुःख येऊ शकत नाही, बेचैनी येऊ शकत नाही. हे अशक्य आहे की प्रकाश आणि अंधार दोघेही एकत्र चालतील, असे होऊच शकत नाही. प्रकाश आला की अंधार स्वतः निघून जातो. त्याला सांगावे लागत नाही की तू येथून बाहेर जा. प्रकाश आला तर तो निघूनच जाईल. धर्म जागला तर बेचैनी निघूनच जाईल. अशांती, दुःख निघूनच जातील. एकच माप-दंड आहे._

_ज्या दिवशी स्वतःला ह्या माप-दंडाने मोजू लागतो त्या दिवशी इतर सर्व सामाजिक कर्म-कांड करीत असतांनाही किंवा न करतानांही आपण एका मोठ्या कामाला लागतो, ते म्हणजे मला माझ्या मनाचे विकार दूर करायचे आहेत. केवळ वरवरच्या मनाचे विकार नाही, अंतर्मनाच्या खोल कण्यात जो विकारांचा एवढा मोठा संग्रह करुन ठेवला आहे, असा स्वभाव बनविला आहे की अंतर्मनात थोडीसुद्धा सुखद अनुभूती झाली की आसक्तीच आसक्ती, लोभच-लोभ, आणि थोडीसुद्धा दुःखद अनुभूती झाली की द्वेषच द्वेष, दुर्भावनाच दुर्भावना. जेव्हा आसक्ती जागवतो, द्वेष जागवितो, दुर्भावना जागवितो तेव्हा तत्काळ आपल्या चित्ताची समता, चित्ताचे चे संतुलन हरवून बसतो आणि चित्ताचे संतुलन हरविले की व्याकुळ होतो. हा निसर्गाचा नियम आहे. कोणी हरवून बघा, कोणी जरा विकार जागवून बघा की अंतर्मनात काय अनुभव करीत आहे? आत पाहाणेच विसरलो. तर काय पाहाणार?_

_आत पाहाणे शिकाल तर पाहाल की विकार जागताच व्याकुळता जागली, विकार जागला की दुःख जागले. धर्म तर फार दूर आहे. आता प्रयत्न करेल की विकारांपासून मुक्ती कशी मिळेल? आपल्या अंतर्मनाच्या खोल कप्प्यात पाहातो की एक गाठ बांधली गेली आहे. मन आपल्या स्वभावाच्या एका मजबूत पकडीत बंदी झालेले आहे. त्यातून आपण बाहेर पडूच शकत नाही. थोडीसुद्धा नको असणारी घटना घडली की केवढी चिडचिड, मनासारखी घटना घडण्यात अडचण आली की केवढी चिडचिड. तरीही स्वतःला धार्मिक समजतो, कां? कारण आज सकाळी मी अमूक एक कर्म-कांड पूर्ण केले. माझी परंपरागत वेश-भूषा अशी केली की मी मोठा धार्मिक आहे. धर्माच्या नावावर केवढा मोठा धोका. त्यात धर्माची नाव-निशाणी कोठेच नाही. हे कर्म-कांड केले, हे पर्व-सण साजरे केले म्हणून धार्मिक आहे. आणखी एक मोठा धोका. मी अशी दार्शनिकता मानणारा किंवा जे जे अशी दार्शनिकता मानणारे आहेत ते सर्व धार्मिक आणि जे जे ही दार्शनिकता मानत नाहीत ते मोठे अधार्मिक._

_काय माप-दंड बनविला आम्ही. कसे आम्ही धर्माच्या क्षेत्रात विचार करण्याचेच बंद केले. योग्य दिशेने विचार करणेच बंद केले. कसा अंधार पसरला धर्माच्या नावावर, धर्म आहे आणि सुख-शांती नाही, धर्म आहे आणि जेव्हा पहावे तेव्हा व्याकुळता जागते, बेचैनी जागते तर हा धर्म नाही भाऊ! धर्माच्या नावावर धोका आहे. सर्वांच्या मनाचा तोच स्वभाव. *विकार जागवितो तेव्हा व्याकुळ होतो. विकारापासून मुक्त होतो तेव्हा सुखी होतो, मोठी शांती अनुभवतो.* ही गोष्ट सर्वांना लागू आहे. धर्म सर्वांचा आहे. सर्वांची कर्म-कांड, दार्शनिक मान्यता....  इत्यादी वेग-वेगळे राहोत. त्याला कोणताच विरोध नाही. त्यांच्याशी कोणते भांडण नाही. पण धर्म कोठे? माझ्यात धर्म आला की नाही ?_

_रोगी माणसाला सर्वात आवश्यक गोष्ट अशी आहे की ह्या रोगापासून मुक्त कसा होईन ? रोगी आहे म्हणून खूप व्याकुळ राहातो. खूप दुःखी राहातो. कोणता मार्ग असेल, कोणती अशी औषधी असेल जी मला ह्या रोगापासून मुक्त करेल. हीच माझ्या कामाची गोष्ट आहे. रोगापासून मुक्त होण्यासाठी औषधाचे सेवन करणार नाही पण ज्या ज्या गोष्टींचा रोगाशी दुरान्वयेही संबंध नाही, कोणते देणे-घेणे नाही अशा अप्रासंगिक गोष्टींना डोक्यावर चढवून ठेवेल आणि आपल्या रोगापासून मुक्त होण्यासाठी कोणताच उपाय करणार नाही. तेव्हा बाबा यापेक्षा मोठे दुर्भाग्य काय असेल ?_

_धर्माची पोकळ चर्चा करीत राहातो. धर्माची खूप प्रशंसा करीत राहातो पण धारण करीत नाही ही मोठी दुर्भाग्याची गोष्ट आहे. एक तहानलेला माणूस आहे. तहानेने त्याचा घसा कोरडा पडत आहे. जवळच पाण्याने भरलेली कळशी आहे आणि तो पाण्याची प्रशंसा करतो. अरे, पाणी, तुझे काय सांगणे. तुला प्राशन करताच तहान शांत होते. केवढा तुझा हा मोठेपणा. केवढा तुझा हा मोठेपणा.... केवळ त्याची प्रशंसाच करीत राहीन पण पाणी पिणार नाही. त्याच्यापेक्षा मोठा अभागी माणूस कोण असेल ह्या दुनियेत? भुकेला माणूस आहे. भोजन जवळच आहे. एक घास घेऊन खात नाही आणि भोजनाची प्रशंसा करेल की आमच्या परंपरेचे भोजन असे, आमच्या मान्यतेचे भोजन असे, पण खाणार नाही. त्याच्यापेक्षा अभागी माणूस कोण असणार?_

_रोगी माणूस रोगामुळे व्याकुळ आहे. औषध आहे पण तो औषधाची प्रशंसा करतो, औषध देणाऱ्या वैद्याची प्रशंसा करतो. अरे, आमचा वैद्य असा, आमचा वैद्या असा, त्याने असे औषध दिले, असे औषध दिले, परंतु औषध घेणार नाही. त्यापेक्षा आणखी मोठे दुर्भाग्य काय असेल?_

_*प्रत्येक व्यक्तीने विचार केला पाहिजे की मला माझ्या रोगातून बाहेर निघायचे आहे. हा जो भव-रोग पाठीमागे लागला, व्याकुळतेचा रोग पाठीमागे लागला, बेचैनीचा रोग पाठीमागे लागला त्याच्या बाहेर निघायचे आहे. त्यातून बाहेर निघण्यासाठी काही काम करावे लागेल. काम हेच करावे लागेल की मनाची मलिनता कशी दूर करावी. मनाच्या दृढमूळ स्वभावाला कसे बदलविणार, असा स्वभाव जो केवळ विकारच निर्माण करण्याचे जाणतो, विकारावर विकार, विकारावर विकार हा स्वभाव झाला. त्या स्वभावापासून कशी मुक्ती मिळेल. बाकी सर्व गोष्टी गौण, त्यांना महत्व नाही. तो एका समाजात राहातो म्हणून समाजाला साथ देतो, परिवाराला साथ देतो. मौज-मजेचा एक प्रसंग आहे. चांगली गोष्ट आहे. ते सर्व करतो पण मुख्य गोष्ट अशी आहे की मी आपल्या विकारांपासून कसे मुक्त होईन.*_

_बस, कमीत कमी धारण करण्याचा एक संकल्प तर आठवला. धोका दूर झाला की हे कर्म-कांड इत्यादी करून मी मोठा धार्मिक आहे. मनातून हे तर निघाले की मी धार्मिक नाही. माझे विकार ज्या दिवसापासून निघणे सुरु होतील, जेवढे निघतील तेवढा-तेवढा धार्मिक. एकच व्यक्ती सकाळपासून संध्याकाळ पर्यंत न जाणो किती वेळा धार्मिक होईल, न जाणो किती वेळा अधार्मिक होईल. जेव्हा जेव्हा विकार जागतील तेव्हा तेव्हा अधार्मिक आहे आणि जेव्हा जेव्हा विकार दूर होतील तेव्हा-तेव्हा धार्मिक आहे. विकार मुळीच जागले नाहीत तर अधार्मिक मुळीच नाही. धार्मिकच धार्मिक._

_ह्याच मापदंडाने मोजत राहू की माझा रोग दूर होत आहे किंवा नाही, किती होत आहे! मुळापासून हा रोग बाहेर निघत आहे की नाही! बस, मार्ग मिळाला. मुक्तीचा मार्ग मिळाला. विकारांपासून मुक्तीचा मार्ग म्हणजे दुःखापासून मुक्तीचा मार्ग. आता सर्व भव-दुःखापासून मुक्त होत जाईल._

_कसे बाहेर काढावे विकारांना? मनात मळ आहे तेव्हा कसे बाहेर काढावे त्याला. *मलिनता तर मनात आहे आणि बाहेर जाऊन हे कर्म-कांड केले, ते कर्म-कांड केले आणि समजलो की माझी मलिनता निघून गेली. अरे, मळ तर आत आहे! आतील यात्रा कर, आत जाऊन पाहा. कसा मळ जागतो, कसे विकार जागतात, कसे त्याचे संवर्धन होते? जाणणार नाहीस तर त्याला दूर कसे करणार?* कोणी सांगितले की शेजारच्या खोलीत खूप घाण आहे. ती खोली स्वच्छ करायची आहे. हो स्वच्छ तर करायची आहे पण त्या खोलीत जाणार नाही. बाहेरची आणखी दहा कामे करीत राहीन पण ती खोली स्वच्छ करणार नाही. आणि इच्छा आहे की ती स्वच्छ व्हावी. अरे, कशी होईल?_

_तेथे पोहोचले पाहिजे ना भाऊ. ज्या ठिकाणी अंतर्मनातील खोल कप्यात विकारांचा संग्रह आहे विकारांची एक वाईट सवय आहे, एक वाईट स्वभाव आहे तेथे पोहचले पाहिजे आणि तेथे त्याला बदलविण्याचा अभ्यास केला पाहिजे. मेहनत घ्यावी लागेल. श्रम करावे लागतील, कोणाच्या कृपेने होणार नाही. हजार आशा घेऊन बसून राहातो, आमच्यावर याची कृपा होईल, तो तर आम्हाला मुक्त करेलच, तो दुःखापासून पैलतीरावर नेईलच. सर्व जीवन असे म्हणून निघून जाईल. विकारांना दूर करण्याचे काम करणार नाही आणि आशा करु की कोणी दुसरा करेल. जरा विचार करुन पाहा. विचार करणेच बंद केले हीच एक अडचण आहे. धर्माच्या नावावर बुद्धीला एकीकडे ठेवले, धर्मात बुद्धीला स्थान नाही. अरे, बुद्धी नसलेला धर्म काय झाला भाऊ ! *जी गोष्ट तर्क-संगत नाही, बुद्धीसंगत नाही, युक्तीसंगत नाही तिला धर्म कसे मानणार?* तेव्हा धर्माची गोष्ट अशी आहे की बुद्धीने समजून घ्या की मला विकार दूर करायचे आहेत. नंतर समजून घ्या की विकार कोठे आहेत? कसे उत्पन्न होतात? कसे त्यांचे संवर्धन होते? तेथपर्यंत पोहोचलो म्हणजे योग्य मार्ग मिळाला. नाहीतर धोकाच धोका. ह्या धोक्यातून बाहेर यायचे आहे._

_भारताची ही फार जुनी परंपरा आहे. हजारों वर्षे जुनी असलेली ही परंपरा ह्याच कामासाठी जागते, शतकानुशतके चालते, सामान्य लोक तिचा लाभ घेतात. पण नंतर ती अशा वेड्या लोकांच्या हातात पडते की जे तिच्यावरोवर कर्म-कांड जोडतात, दार्शनिक मान्यता जोडतात, कोणते व्रत-उपवास जोडतात आणि म्हणतात चांगले आहे, मनही स्वच्छ करा, पण हे सुद्धा करा, हे सुद्धा करा. तेव्हा हे-हे प्रमुख झाले. कारण ते करणे सोपे आहे. *कर्म-कांड करणे फार सोपे आहे. वेश-भूषा बदलणे फार सोपे आहे. एखाद्या मान्यतेचा स्वीकार करणे फार सोपे आहे. उलट अंतर्मुखी होऊन मन निर्मळ करण्याचे काम कठीण आहे. अशा प्रकारे हळू हळू मन निर्मळ करण्याचे काम लुप्त होत जाते आणि फक्त वरवरच्या गोष्टीच राहतात.*_

_हा महाराष्ट्र प्रदेश या विद्येत भारताचाच नव्हे, तर एके काळी साऱ्या विश्वाचे खूप मोठे केंद्र होता. घरा-घरात ही विद्या पसरली. त्याचा लोकांना खूप लाभ झाला. जसे मी काल सांगितले की पहिल्यांदा ही विद्या २६०० वर्षापूर्वी ह्या देशात आली. नंतर ह्या प्रदेशात आली आणि पसरु लागली. ३०० वर्षानंतर सम्राट अशोकाने विपश्यनेच्या काही आचार्यांना भारतात आणि भारताबाहेर चहुकडे पाठविले. अरे एवढी कल्याणकारी विद्या, या विद्येमुळे माझे एवढे कल्याण झाले, माझ्या प्रजेचे एवढे कल्याण झाले. अरे, सर्वांचे कल्याण झाले पाहिजे. वाटा, ही विद्या सर्वांना वाटा._

_*यासाठी "महाधर्मरक्षित" आणि "महारक्षित" नावाचे दोन विपश्यना आचार्य भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर आले. त्यांनी फार मोठे काम केले. ह्या प्रदेशात, प्रदेशाबाहेर आणि विदेशातही विपश्यना कशी जाईल? त्या वेळी ह्या किनाऱ्यावर महत्वपूर्ण बंदरे होती. त्यापैकी नाला-सोपारा मध्ये सुपारक नावाचे फार मोठे बंदर होते. ते हजारो वर्षे आंतरराष्ट्रीय व्यापाराचे जुने केंद्र होते, जशी आज मुंबई आहे. तसेच कच्छमध्ये ज्याला आज भरुच म्हणतो ते सुद्धा फार मोठे व्यापारी केंद्र होते. येथून भारतातील लोक बाहेर विदेशात जात होते, जे विपश्यना शिकलेले आहेत ते सुद्धा जात होते. ते बाहेरील लोकांना संदेश देत होते की एक विद्या आमच्या देशात अशी आहे की ज्यामुळे मनाचे विकार दूर होतात, मोठी शांती मिळते. ह्या दोघांपैकी एक माणूस यवन होता, तो ग्रीकचा होता. म्हणजे कसे बाहेरचे लोक येथे येऊन विद्येत परिपक्व होत होते आणि परिपक्व झाल्यानंतर इतर लोकांना शिकवण्यास लायक होत होते. केवळ येथीलच नाही तर बाहेरील लोकांना सुद्धा शिकवित होते. ही विद्या पश्चिमेकडील देशात आणि आसपासच्या देशात येथूनच गेली.*_

_ह्या इतिहासाचे जेव्हा संशोधन होईल तेव्हा होवो. पण एक गोष्ट प्रत्यक्षात दिसून येते की *सम्राट अशोकचा मुलगा महेंद्र आणि त्याची मुलगी संघमित्रा हे दोघे श्रीलंकेत ही विद्या घेऊन गेले.* त्यांनी चांगले काम केले. *मला वाटते की फार मोठ्या संख्येने ह्या महाराष्ट्र प्रदेशातील लोकसुद्धा तेथे गेले, त्यांनीही तेथे मोठे काम केले. एवढे मोठे काम केले की महाराष्ट्राची संस्कृती त्यांच्यामध्ये सामावली गेली. मी तेथे जाऊन थक्क झालो. ज्या लोकांशी बोलतो, भेटतो, त्यांचे नाव विचारतो तेव्हा निम्म्यापेक्षा अधिक लोक आपले नाव सांगत होते सेनानाइके, रतवत्ते, तिलकरत्ने इत्यादी. ह्या नावामागे रतने 'एकारांत" कोठून आला? महाराष्ट्रातून आला भाऊ, येथून लोक गेले. येथे सुद्धा हीच प्रथा आहे-'एकारांत'ची पुष्कळ नावे 'ए' ने समाप्त होतात जसे हजारे, फुले, वाघमारे इत्यादी इत्यादी. अरे, हे या गोष्टीचे प्रमाण आहे की येथून एवढ्या मोठ्या संख्येने लोक ही विद्या घेऊन गेले आणि त्या देशातील लोकांबरोबर समरस झाले. नाहीतर कसे समरस होतील? कोणी राज्य करण्यासाठी तेथे गेले नाहीत. काही घेण्यासाठी गेले नाहीत, देण्यासाठी गेले. आमच्याजवळ एवढी मोठी विद्या आहे. करुन तर पाहा, करुन तर पाहा भाऊ!*_

_हा प्रदेश जगाचे फार मोठे केंद्र होते. चढउतार येत राहतात. प्रकृतीचा नियम आहे. वसंत ऋतू येतो नंतर पानगळ येते. दिवस उगवतो नंतर रात्र होते. परत दिवस उगवतो. परत वसंत ऋतू येतो. तेव्हा भाऊ ही हरवलेली विद्या या देशात परत आली आहे आणि देशातील समंजस लोकांनी हिचा स्वीकार केला आहे. बुद्धीवान लोकांनी हिचा स्वीकार करणे सुरु केले आहे. देशासाठी ही कल्याणाची बाब झाली. समाजासाठी कल्याणची बाब झाली._

_*विद्या खूप सरळ आणि वैज्ञानिक आहे. मोठी युक्तिसंगत आहे. कोठेही अंधविश्वासाला जागा नाही. काम करा म्हणजे परिणाम समोर येतील. काम करा आणि परिणाम समोर आले तर स्वीकारा नाहीतर स्वीकारु नका. कोणता अंधविश्वास नाही.* लोक करुन पाहातात. मेहनत तर करावी लागतेच. कोणी असे समजेल की गुरुमहाराजांच्या कृपेने मी बिलकूल निर्विकार होईन, अरे, असे होत नाही. कोणाची कृपा काम करीत नाही. कृपा कोणाची एवढीच आहे की जर तो त्या मार्गाने चालला असेल तर सांगेल की भाऊ हा असा मार्ग आहे, मी चाललो आहे. मला लाभ झाला. चल, तू पण चालून पाहा. मी असा अभ्यास केला, मला लाभ झाला. तू सुद्धा करुन पाहा. बस फार मोठी कृपा झाली आणि यापेक्षा अधिक कृपेच्या फेऱ्यात पडू नका. काम करावे लागेल._

_*मनाला मलिन करण्याची जबाबदारी कोणाची ? कोण जबाबदार ? आमच्या मनाने असा घाणेरडा स्वभाव बनविला आहे की जेव्हा पाहाल तेव्हा व्याकुळ राहाते. असा स्वभाव कोणी बनविला? कोण्या देवी-देवताने, कोण्या ईश्वर-ब्रह्माने, कोण्या संतमहापुरुषाने कोणत्या गुरु महाराजांनी, नाही. अरे, का बनवेल कोणी असा स्वभाव ? ते तर मनाला निर्मळ करण्याची गोष्ट शिकवतील. मी माझ्या असावधानीने, माझ्या अज्ञानाने माझ्या मनाला मलिन करीत करीत असा स्वभाव बनविला की जेव्हा पाहाल तेव्हा मन मलिनच ठेवीन, जेव्हा पाहाल तेव्हा व्याकुळच राहीन. तेव्हा मी जबाबदार झालो ना. आता ते सुधारण्याची जबाबदारी माझी आहे. मलाच सुधारावे लागेल. सुधारण्याच्या कामाला विसरुन गेलात?* आमचे कपड़े मळले तर अरे मळलेले कपड़े कसे परिधान करु? ताबडतोब धुऊन टाकतो, नवीन कपड़े परिधान करतो. मळलेले कपडेच नाहीत तर हाताला मळ लागता, शरीर मलिन झाले तेव्हा आम्ही आंघोळ करतो, हात धुतो, स्वच्छ करतो. मळ कोणाला आवडतो? आणि *मन मलिन झाले, ते स्वच्छ करण्याची गोष्ट कोणी करणार नाही.*_

_काय करणार? असे तर होतच असते. तो असे म्हणाला म्हणून क्रोध येतोच. त्याने माझा अपमान केला म्हणून मनात द्वेष आला. किंवा तो तुम्हाला काही बरे-वाईट बोलला तर तुम्ही रोगी कां बनलात? *रोगी तर तो आहे. जो माणूस तुमच्याशी दुर्व्यवहार करतो त्यापेक्षा मोठा दुसरा रोगी नाही. मनात विकार जागविल्याशिवाय कोणी कोणाबरोबर दुर्व्यवहार कसा करेल? अरे, बिचाऱ्याने मोठा विकार जागविलारे. हा मोठा दुःखी आहे. त्या बदल्यात मी ही दुःखी होऊ ? हा तर दुःखी आहेच मी सुद्धा दुःखी होऊ ?*_

_नासमजूतीला एक मर्यादा असते. त्या मर्यादेबाहेर निघून गेलो. कोणी आमचा शत्रू आहे, आम्हाला दुःखी बनवू इच्छितो. म्हणून त्याने शिवी दिली, अपमान केला, आम्ही म्हणतो तू आम्हाला दुःखी बनवू इच्छितोस, स्वतः मी दुःखी राहीन. तू खुश राहा. त्याच्या शिवीचा स्वीकार करुन आम्ही स्वतःला आणखी दुःखी करु लागलो._

_समजतच नाही की है काय करीत आहोत. कां नाही समजत ? कारण आपल्या अंतर्मनातील सत्य पाहाण्याची विद्या हरवून बसलो. जेव्हा पाहाल तेव्हा बाहेरच्या गोष्टीबद्दलच मन विचार करीत असते. तो असे म्हणाला, त्याने असे केले, ही गोष्ट अशी झाली. ती तशी झाली. बाहेरच्या ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्या चांगल्या नाहीत तर त्यांना अवश्य सुधारले पाहिजे. पण आपल्या मनाला बिघडवून कसे सुधरवशील भाऊ ? आपल्या मनाला न बिघडविता आम्ही बाहेरच्या गोष्टी सुधारल्या तर जगणे आले. बस, *विपश्यना हेच शिकविते की बाहेर कशीही घटना घडली, कितीही नको असणारी गोष्ट घडली की आम्ही ताबडतोब आपल्या अंतर्मनात पाहू. मी व्याकुळ तर झालो नाही! मी माझी समता तर हरवली नाही! मी माझे संतुलन तर हरवले नाही! आता जे काय करायचे ते करु आणि जे करू ते चांगलेच होईल. त्याचा परिणाम चांगलाच होईल कारण आम्ही स्वस्थ चित्ताने काम करीत आहोत.*_

_*स्वस्थ काय आहे? जो स्वयंमध्ये स्थित झाला तो स्वस्थ झाला. स्वतःमध्ये स्थित झाला. तेव्हा स्वतःला जाणल्याशिवाय स्वतःमध्ये स्थित कसे होऊ ? कल्पना करुन थोडेच होणार आहे. तेव्हा स्वतःला जाणणेच विपश्यना आहे. आपल्याबद्दल जे सत्य आहे त्याला अनुभूतीच्या स्तरावर जाणायचे आहे. बस, समजा दुःखापासून दूर होऊ लागलात. आपोआप दूर होऊ लागलात.*_

(क्रमशः ...)

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

*_लेखक :- कल्याणमित्र सत्यनारायण गोयन्का_*

_बुद्धवर्ष २५६०, आषाढ पौर्णिमा, १९ जुलै, २०१६, वर्ष ३, अंक ४_

*_संकलन :- महेश कांबळे_*

*_दिनांक :-_* १५/०२/२०२५

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

Monday, 10 February 2025

मनाला वश कसे करावे?

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

*_मनाला वश कसे करावे?_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2025/02/blog-post_10.html

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

(पूज्य गुरुदेव श्री सत्यनारायण गोयन्काजीद्वारा पश्चिम महाराष्ट्राच्या प्रसिद्ध नाशिक शहरातील 'रमाबाई आंबेडकर गर्ल्स हायस्कूलच्या प्रांगणात सन १९९८ मध्ये दिलेल्या तीन दिवसांच्या प्रवचन मालिकेतील दुसऱ्या प्रवचनाचा दुसरा भाग.)

_खूप पद्धती असतात मनाला वश करण्याच्या. भारत तर आध्यात्माचा इतका जुना देश आहे, किती प्रकारच्या विद्या या देशात जन्मल्या, वाढल्या, विकृत्त झाल्या, नष्ट झाल्या. एक खूप सरळ व बहुप्रचलित प्रकार आहे एखाद्या शब्दाला पुन्हापुन्हा म्हणणे. हे घड्याळ बांधले आहे तर वारंवार घड्याळ-घड्याळ, घड्याळ-घड्याळ, घड्याळ-घड्याळ असे म्हणत जा, मन एकाग्र होत जाईल. जसे आई बाळाला अंगाईगीत ऐकवते राजा बाळा झोप रे, राज बाळा झोप रे आणि हे ऐकत ऐकत तो खरोखर झोपतो. त्याचे मन झोपी गेले, तसेच आपल्या मनाचे होते. *पण कोणी घड्याळ-घड्याळ कसे म्हणेल, त्यात काय रस आहे ? तेव्हा आमच्या येथील संत म्हणाले, बरे भाऊ! ज्या देवीत. इष्टदेवात, ईश्वरात, परमात्म्यात, संत पुरुषात वा गुरुत, ज्याच्यावर तुमची श्रद्धा आहे त्याचे नाव पुन्हापुन्हा घ्या. त्यासोबतच हेही सांगितले की याचे नाव वारंवार घ्याल तर मुक्त व्हाल.*_

_कोणत्याही शब्दाला वारंवार म्हणाल तर मन एकाग्र होणे सुरु होईल. एकाग्र होईल तर त्याला सुधारण्याचे पुढचे पाऊल उचलाल. ही एक पद्धत आहे जी जुन्या काळापासून चालत आहे, आजही चालते. मनाला एकाग्र करण्याची अजून एक पद्धत आहे एखाद्या वस्तूला पाहावे, मग डोळे बंद करावेत. पुन्हा पाहावे, पुन्हा डोळे बंद करावेत. काही दिवसानंतर असे होऊ लागते की बंद डोळ्यांसमोर ती वस्तू प्रकट होऊ लागते. तर *समजवणाऱ्यांनी समजावले की ज्या देवी, देवता. ईश्वरामध्ये... तुमची खूप श्रद्धा आहे त्याची मूर्ती समोर ठेवा व पाहात जा, मग डोळे बंद करा, असे करत करत ती मूर्ती बंद डोळ्यासमोर येऊ लागेल. बस, ध्यान करण्याचा मार्ग मिळाला.* अजून एक पद्धत होती जोरात एखादी मोठी घंटा वाजवा, त्याचा आवाज येईल. आवाजाला ऐकत राहा, ऐकत राहा. आवाज बंद झाल्यावर पुन्हा घंटा वाजवा, पुन्हा ऐकत राहा. अरे, या प्रकारची पुष्कळ आलंबन असतात ज्यांच्या आधारे मनाला एकाग्र केले जाऊ शकते._

_परंतु भारताची जुनी विद्या विपश्यना या आलंबनांचा स्वीकार करत नाही. कारण चित्ताला एकाग्र करणे व याला निर्विचार करणेच हिचे अंतिम लक्ष नाही. *हिचे अंतिम लक्ष आहे चित्ताला निर्विकार करणे.* निर्विचार होणे चांगले आहे, आम्हाला खूप लाभकारक होईल, परंतु अंतिम लक्ष निर्विकार होणे आहे, ज्यामुळे विकारांपासून चित्त पूर्णपणे निर्मळ होईल तिथे पोहोचण्यासाठी आम्हाला असे आलंबन पाहिजे जे आम्हाला त्या अवस्थांपर्यंत पोहोचवेल, जिथे विकार उत्पन्न होतात. त्यांच्या मुळांपर्यंत पोहोचवेल. ज्यामुळे विकारांपासून सहजपणे आमची सुटका होईल. त्यामुळे या विद्येत जे आलंबन दिले गेले ते आपल्या सहज स्वाभाविक श्वासाचे._

_*श्वासाची कसरत नाही, बस जसा येत आहे, जात आहे, तटस्थभावाने त्याला जाणावयाचे आहे. जोरात असेल तर त्याला हळू करावयाचे नाही, खोल असेल तर उथळ करायचा नाही, उथळ असेल तर खोल करायचा नाही. त्याच्यात कुठलाही हस्तक्षेप करायचा नाही. जसा असेल तसच जाणायचा.*_

_हे आलंबन चित्ताला एकाग्रही करेल व चित्ताला त्या अवस्थेपर्यंत पोहोचवेल जिथे विकारांची उत्पत्ती होते. कसे पोहोचवेल ? काम करत-करत खूप समजेल, कारण सर्व मार्ग आपल्या आत काय होत आहे, याला समजण्याचा आहे. आम्ही आपल्या मनाला एखाद्या भ्रमात ठेऊन एकाग्र करु, एखाद्या काल्पनिक आलंबनात नेऊन एकाग्र करु तर चांगले होईल, वरवरचे मन शांत होईल, परंतु आत अंतर्मनाच्या सखोलतेत जो स्वभाव बनला, behavior pattern बनला, त्याला कसे तोडायचे ? तिथपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला असे साधन पाहिजे ज्याचा संबंध आमच्या मनाच्या सखोलतेपर्यंत असेल. त्यामुळे श्वास जसा येत असेल, तसाच त्याला जाणा. आला तर आला, गेला तर गेला. करायचे काहीच नाही. न श्वासाची कसरत करायची, न प्राणायाम, न कोणताही अन्य उपक्रम. बस जसा येतो-जातो आहे, आम्ही तटस्थभावाने पाहतो आहोत. जणू आम्ही तटावर बसलो आहोत, तटावर स्थित आहोत व नदी वाहत आहे. नदीच्या प्रवाहात आम्ही हस्तक्षेप करत नाही. आम्ही तिला न जोरात करतो. न हळू करतो, जशी आहे तशी आहे, आम्ही तटावर बसून पाहात आहोत._

_आम्ही आपल्या मनाला इथे लावले व पाहात आहोत, अनुभव करत आहोत. श्वास येत आहे, जात आहे. दीर्घ आहे, छोटा आहे... अरे, यापेक्षा सोपे काम अजून कोणते असेल? हा तर आमच्या सोबत नेहमी राहातो. जेव्हापासून जन्मलो आहोत, जेव्हापर्यंत मृत्यू येत नाही, तोपर्यंत हे आलंबन आमच्या सोबत आहे. जेव्हा इच्छा असेल तेव्हा श्वासाला जाणणे सुरु करा. खूप चांगले आहे, कोणतीही मेहनत नाही, परिश्रम नाहीत. जेव्हा कधी हिंमत करुन, निर्णय करुन १० दिवसांसाठी एखाद्या विपश्यना शिबिरात याल तेव्हा पाहाल, अरे, हे तर खूप कठीण काम आहे बाबा. केवळ श्वास येत आहे, जात आहे यालाच जाणायचे होते आणि हेही इतके कठीण, दोन श्वासही पाहू शकणार नाही की मन पळून जाईल. मग शुद्ध येईल, अरे कुठे पळाले. तुला श्वास पाहायला बसवले होते बाबा, श्वास पाहा ना, यात काय अडचण आहे तुला, अजून काहीही करायचे नाही._

_जसे कोणी तटावर बसून पाहात आहे, नदी वाहत आहे, तसेच येथे तुम्हाला श्वासाचा प्रवाह पाहावयाचा आहे. पण पाहू शकणार नाही. दोन श्वासही पाहिले नाही की पळून जाईल. पुन्हा पळेल.... तर बिचारे नवीन-नवीन साधक, नवी-नवी साधिका घाबरते. ते आपल्या मार्गदर्शकाकडे जातात काय करावे, मन टिकतच नाही. तेव्हा शिकवणारा म्हणतो - नाही, व्याकुळ व्हायचे नाही._

_आपल्या मनावरच क्रोध करु लागलात, अरे, कसे मन आहे ? श्वास पाहायचा आहे, तोही पाहू शकत नाही. कसे हे मन? अरे नाही, आपल्या मनावर क्रोध नाही करायचा, क्रोध कराल तर व्याकुळ व्हालच, मग क्रोध स्वतःवर कराल अथवा इतरांवर, या स्थितीचा स्वीकार करा. या वेळेचे सत्य हे आहे की माझे मन भटकले. बस, पुन्हा सुरु करा. पुन्हा श्वासावर आणा. पुन्हा भटकले, पुन्हा स्वीकारले.... या प्रकारे काम करता-करता पुष्कळशी रहस्य उलगडतात स्वतः बाबतची. लक्ष हेच आहे की आपल्या स्वतःला जाणा._

_बाहेरच्या सत्यांना पाहात राहाल तर आपल्या स्वतःला जाणू शकणार नाही. आपल्या स्वतःला जाणू शकणार नाही तर सर्व जीवन भ्रम, भ्रांतीत निघून जाईल. त्यामुळेच भारताचा एक संत म्हणतो-_

*_बाहर भीतर एको सच है, यह गुरु ज्ञान बताई रे।-*

_कोणी सदगुरु असेल तर तो हेच ज्ञान सांगेल की बाहेर व आत सत्य एकच आहे. निसर्गाचा जो नियम बाहेर काम करतो तोच आत काम करतो. परंतु,_

*_जनि नानक बिन आपा चीड़े, कटे न भ्रम की काई रे।_*

_नानक समजला, पुस्तक वाचून बोलत नाही, प्रवचन ऐकून वा केवळ चिंतन-मनन करून म्हणत नाही. आपल्या अनुभूतीने जाणले. तेव्हा म्हणतो *जनि नानक विन आपा चीद्धे* आपल्या स्वतःला ओळखल्याविना भ्रम संपणार नाही, भ्रांती संपणार नाही. सर्व जीवन भ्रांतीत निघून जाईल._

_*आपल्या स्वतःला यासाठी जाणणे आवश्यक आहे की आत विकारांची उत्पत्ती कशी होते व संवर्धन होत होत कसे हे विकार आमच्या डोक्यावर चढतात. हे सारे काही का होते, कसे होते व याच्या बाहेर कसे निघता येईल? या सर्वांना पाहाण्यासाठी अंतर्मुखी होत आहोत.*_

_श्वास पाहाता पाहाता सत्य प्रकट होऊ लागेल. मन पळाले तर कोठे पळाले ? अरे, जितक्या बाबीत, जितक्या विषयात पळेल त्याचा हिशोब कुठपर्यंत ठेवाल? परंतु खूप ध्यानपूर्वक पाहाल तर दोन क्षेत्र खूप स्पष्ट दिसून येतील. त्याच्याजवळ पळण्यासाठी तिसरे क्षेत्र नाही. दोनच क्षेत्र आहेत एक तर भूतकाळात पळेल असे झाले होते, असे झाले होते वा भविष्यकाळात असे होईल, असे होईल, असे करीन, असे करणार नाही, याच बाबीत घुटमळत राहील._

_हे भूतकाळात रमण करते अथवा भविष्यकाळात. आता आपल्या मनाच्या स्वभावाला समजू लागलात. आम्हाला आपल्या मनाबाबत, आपल्या शरीराबाबत, मनात जागणाऱ्या साऱ्या विकारांबाबत पूर्ण माहिती प्राप्त करायची आहे. तेव्हा सुटका होईल, अन्यथा कशी सुटका होईल ?_

_प्रथम बाब तर ही लक्षात येईल की हे वर्तमानात जगणे जाणत नाही आणि जगावे लागते वर्तमानात. भूतकाळात कसे जगू? जो क्षण गेला, तो नेहमीसाठी गेला, जगातली सारी संपत्ती देऊनही मी तो क्षण जगू शकेन हे असंभव आहे. तसेच भविष्य जेव्हा वर्तमान बनेल तेव्हाच त्यात जगता येईल. त्यामुळे जगायचे तर आहे वर्तमानात._

_*या मनाचा स्वभाव पाहा, जेव्हा पाहाल तेव्हा भूतकाळात रमण करते किंवा भविष्य काळात रमण करते. त्यामुळे त्याला हे शिकवीत आहोत की वर्तमानात जगणे शिक!* वर्तमान सत्य हे आहे की श्वास येत आहे, कल्पना नाही, सत्य आहे. अनुभूतीवर उतरत आहे ही बाब. श्वास येत आहे, श्वास जात आहे. या सत्यावर राहणे शीक. ते मानत नाही, पुन्हा पळते. कधी भूतकाळात कधी भविष्यकाळात._

_त्यानंतर साधक खूप लक्षपूर्वक पाहातो की हे भूतकाळात वा भविष्यकाळात जाते तेव्हा कोणत्या प्रकारचे चिंतन चालते, कोणत्या प्रकारचे विचार चालतात ? अरे न जाणे किती विचार चालतात. कुठपर्यंत त्याचा हिशोब ठेवाल, पण दोन गोष्टी खूप चांगल्या प्रकारे समजतात. भूतकाळात असो वा भविष्यकाळात, जो विचार चालला तो खूप प्रिय वाटला भूतकाळात एखादी घटना अशी घडली जी खूप चांगली वाटली, त्याचेच चिंतन होत राहाते तर खूप प्रिय वाटते. अथवा मग स्वप्न पाहातो भविष्यात असे व्हावे... खूप प्रिय विचार, अथवा भूतकाळ वा भविष्यकाळाचा एखादा अप्रिय विचार अरे, हे तर खूप वाईट झाले, भविष्यात कधी असे होऊ नये._

_तर जे-जे प्रिय आहे ते खूप सुखद वाटते. पाहातो आपल्या स्वतःला, तपासतो, एका वैज्ञानिकाप्रमाणे आपली analytic study करुन पाहातो. विश्लेषणात्मक अध्ययन करतो. काय होत आहे माझ्या आत. जेव्हा-जेव्हा कोणताही प्रिय विचार येतो, भूतकाळाचा असो वा भविष्यकाळाचा, खूप सुखद वाटतो. तसेच जेव्हा जेव्हा अप्रिय विचार येतो, तेव्हा तेव्हा खूप दुःखद वाटतो. सत्त्य आहे, सर्वांची हीच तऱ्हा आहे. तेव्हा पाहतो की माझ्या मनाचा एक हिस्सा प्रतिक्रिया करु लागला. सुखद विचार येताच, असे तर वारंवार होवो, हे तर कायम राहो, खूप वाढो. प्रिय आहे ना तर पाहिजे-पाहिजेची मागणी सुरु करतो. अप्रिय विचार आला, दुःखद वाटला, तर मनाचा तोच हिस्सा प्रतिक्रिया करतो अरे, नाही पाहिजे, असे पुन्हा होऊ नये. मनाचा स्वभावच आहे. अशा स्वभावाच्या पकडीत जखडले आहे._

_*ही जी पाहिजे पाहिजेची मागणी चालते, भारताच्या जुन्या भाषेत तिलाच राग म्हणायचे. इथे तर आम्हाला सांगितले गेले की मराठीत रागाचा अर्थ क्रोध होतो, परंतु भारताच्या जुन्या भाषेत राग म्हणजे आसक्ती.* त्याच्याप्रती चिपकाव होऊ लागला व जे नको त्याप्रती द्वेष होऊ लागला. प्रतिक्षण माझ्या मनात काही ना काही विचार चालतो, तो सुखद असेल तर मी आसक्ती जागवतो, दुःखद असेल तर द्वेष जागवतो. अरे, कोणत्या स्वभावाच्या पकडीत जखडलो गेलो ? *आसक्ती वा द्वेष जागवताच मन व्याकुळ झाले, म्हणजे, ते आपल्या व्याकुळतेकडे पुढे-पुढे जात आहे. आता समजले की व्याकुळतेचा उगम, विकारांचा उगम कोठे होतो !*_

_*एक दिवस जातो, दोन दिवस जातात, तीन दिवस जातात. आता अजून सत्य प्रकट होऊ लागते. तेव्हा लक्षात येते की आमच्या देशाच्या महापुरुषांनी, सद्‌गुरुंनी हा शुद्ध श्वासाचा अभ्यास करणे का शिकवले, ह्यामागे काय रहस्य आहे?* कारण विद्याच नष्ट झाली, आम्ही विसरलो. *आता समजले की पाहा मनात जसाही विकार जागला क्रोध जागला, की द्वेष जागला, की ईर्ष्या जागली, कोणताही विकार जागला, जागताच प्रथम काम हे होते की हा श्वास आपली स्वाभाविकता गमावतो. श्वास स्वाभाविक राहाणार नाही. थोडासा जोरात होईल अथवा थोडासा जड होईल आणि जसा विकार दूर झाला, पुन्हा स्वाभाविक होईल.*_

_*आमच्या श्वासाचा आमच्या मनाच्या विकारांशी इतका सखोल संबंध आहे हे कधी जाणतच नव्हतो.* आम्हाला तर आपल्या मनाच्या विकारांपर्यंत पोहोचायचे आहे, कारण त्यांना दूर करायचे आहे. लक्ष्य आमचे निर्विकार बनण्याचे आहे. लक्ष्य आमचे चित्ताला निर्मळ करायचे आहे. सध्या तर हेही जाणत नाही की विकार उत्पन्न कसे होतात तर त्यांना दूर कसे करणार? वरवर दूर करणे खूप सोपे आहे. मनाला एखाद्या बाबीत गुंतवा. एखाद्या अन्य बाबीत गुंतवा. वरवरचे चित्त ज्याला *concious mind* म्हणतात, चेतन चित्त म्हणतात, ते सुधारेल._

_चांगले आहे, तेवढे तर सुधरते, कल्याण झाले. परंतु मुळापासून स्वभाव कसा सुधारेल ? स्वभाव तर हा झाला आहे की सुखदच्या प्रती आसक्ती निर्माण करा, दुःखदच्या प्रती द्वेष निर्माण करा, दुर्भाव निर्माण करा. असा स्वभाव अंतर्मनाच्या खोलीत मुळांपर्यंत रुजला आहे. कसे बदलावे याला ? आता या श्वासाच्या साहाय्याने काम करता-करता हे सारे रहस्य उलगडत जाईल._

_*अजून पुढे जाऊ तर अनेक रहस्य उलगडत जातील. आपल्याबाबत, या प्रकृतीच्या नियमांबाबत न जाणे किती रहस्य उलगडतील. ही काही कल्पना नाही. अंधविश्वासाची बाब नाही. संपूर्ण मार्ग वैज्ञानिक, mind व matter च्या interaction ला आम्ही अनुभवाने अध्ययन करत जाणत आहोत, आपल्या अनुभवाने समजत आहोत.* मनात एखादा विकार जागला, तर एकीकडे श्वासाच्या गतीत फरक पडला व दुसरीकडे शरीरात काही ना काही उपद्रव सुरु झाला. *क्रोध जागताच पाहाल की सर्व शरीर गरम होऊ लागले, सर्व शरीर तणावाने भरले, हृदयाची धडधड वाढली. हे सर्वांना होते, हिंदू, मुसलमान, बौद्ध, भारतीय, ब्रह्मी, अमेरिकन कोणीही असो, मनुष्य मनुष्य आहे. हा प्रकृतीचा नियम आहे की जसे मनात काही विकार जागला दोन गोष्टी एकत्र होऊ लागतात, एक तर श्वासाची गती बदलेल व शरीरावर काही अशा प्रकारची संवेदना जागेल, जिचा त्या विकाराशी सखोल संबंध आहे. ही सारी विद्या आम्हाला त्या अवस्थांपर्यंत पोहोचवण्यासाठी आहे की जिथे विकारांचा उगम झाला व आम्हाला त्याचा संकेत (symbol) माहीत होऊ लागला.* आता त्याला दूर करण्याचा मार्ग माहीत होऊ लागेल. प्रथम तिथपर्यंत पोहचू तर._

_*ज्याला आम्ही अचेतन म्हणतो, ते अचेतन नाही, खूप चेतन आहे, परंतु या वरच्या चित्तात, ज्याला भारताच्या भाषेत परित्त चित्त म्हटले, परिमित चित्त, खूप छोटेसे चित्त आहे. यात आम्ही शांती निर्माण केली, थोड्या वेळासाठी मळही दूर केला, परंतु यात व त्याच्या खाली असणा-या मोठ्या चित्तात खूप जाड-जाड भिंत आहे. यामुळे खालच्या चित्ताला काही कळतच नाही.*_

_*या ज्या कोठे धर्माच्या बाबी ऐकता, वाचता वा चिंतन-मनन करता, त्याचा प्रभाव केवळ वरवरपर्यंत राहातो. अंतर्मनाच्या सखोलतेत पोहचू शकत नाही, कारण ही जाड भिंत तुटत नाही. त्यामुळे आमच्या देशाच्या महापुरुषांनी ती विद्या शोधून काढली ज्यामुळे ही भिंत तुटावी, ज्यामुळे सर्व चित्त सखोलतेपर्यंत, मुळापर्यंत चेतन व्हावे. तेव्हा आतील चित्ताला माहीत होईल की विकार जागला व जागताच पाहा काय होत आहे ? शरीरात कोणत्या प्रकारच्या संवेदना sensation सुरु झाल्या. शुद्ध राहात नाही, तेव्हा काय होते ? क्रोध जागला तर असे वाटले की क्रोध आम्हाला एखाद्या बाहेरच्या घटनेवर जागला, परंतु पाहाल की बाहेरची घटना तर एकदाच झाली, संपली. कोणी मला शिव्या दिल्या, माझा अपमान केला, तो निघून गेला. त्याच्या शिव्यांमुळे मी एकदा दुःखी झालो, परंतु मी तिथे दुःख संपवत नाही. तासन्तास त्या बाबीची आठवण करतो. त्याने मला शिव्या दिल्या, त्याने माझा अपमान केला व जेव्हा-जेव्हा आठवण करतो तेव्हा तेव्हा क्रोध उत्पन्न होतो, क्रोध उत्पन्न होतो, अजून व्याकुळ होतो. अरे आपल्या स्वतःला व्याकुळ बनवत आहोत. त्याने मला शिवी दिली एकदा व्याकुळ बनवण्यासाठी आणि मी म्हणतो की मी तासन्तास व्याकुळ राहीन. कधी-कधी म्हणतो की माझा असा अपमान झाला की जन्मभर विसरणार नाही, कोणावर उपकार करतोस बाबा? जन्मभर या संतापात, या व्याकुळतेत व्याकुळ राहाल, सात जन्मांपर्यंत विसरणार नाही. काय कराल सात जन्मांपर्यंत ? आपल्या स्वतःला व्याकुळच बनवत राहाल. अरे, शुद्धच नाही. कारण आपल्या आत पाहाण्याची विद्याच विसरलो.*_

_*आपल्या स्वतःला मी व्याकुळ बनवत आहे. ज्याने मला शिवी दिली, क्रोध जागवला, अरे, खूप दुःखी आहे. निसर्गाच्या नियमांना समजणारा मी त्याच्यासोबत दुःखी का बनू ? आपल्या दुःखाला तो भोगत राहो. आम्ही त्याला दुःखाबाहेर काढू शकलो तर काढू. पण आपल्या स्वतःला तर दुःखात टाकणार नाही. आम्ही बदल्यात क्रोध करणार नाही. तेव्हा काय कराल ?*_

_ही विद्या शिकवेल, अशी अवस्था येईल, तेव्हा काय कराल? दगडाच्या मूर्तीप्रमाणे बसून राहाणार नाही. एखाद्या भाजीपाल्याप्रमाणे बसले आहोत, कोणीही यावे आम्हाला कापून जावे. आम्ही तर विपश्यनावाले आहोत, आम्ही काहीही म्हणत नाही. नाही नाही-नाही! *जर कुठे कठोर व्यवहार करायचा आहे, समजलो की हा मनुष्य कोमल भाषा समजत नाही, कठोर भाषाच समजेल, तर कठोराशी कठोर व्यवहार करु, वाणीनेही, शरीरानेही. परंतु प्रथम आपल्या स्वतःला तपासू, माझ्या मनात कुठे क्रोध तर जागला नाही? माझ्या मनात कुठे द्वेष-दुर्भावना तर जागली नाही? नाही तर मी आजारी झालो. एक आजारी मनुष्य दुसऱ्या आजारी मनुष्याला कसा सुधारेल? एक लंगडा मनुष्य दुसऱ्या लंगड्या मनुष्याला कसा आधार देईल? एक आंधळा मनुष्य दुसऱ्या आंधळ्या मनुष्याला कसा रस्ता दाखवेल ? त्यामुळे प्रथम आपल्या स्वतःला सांभाळू.*_

_या विद्येने आपल्या स्वतःला सांभाळेल. बस काही क्षण, काही seconds, जशी बाहेर घटना घडली, आपल्या आत पाहिले, अरे, क्रोध जागला, तर ही संवेदना जागली, श्वास जोरात झाला, त्याला पाहता-पाहता तो शांत झाला. आता जे करायचे ते करेल. आता जे करेल ते कल्याणकारीच होईल. आपल्या स्वतःसाठी व इतरांसाठी ही. आपल्यासाठीही मंगलकारी, इतरांसाठीही मंगलकारी, न आपली हानी केली, न इतरांची हानी केली. अरे, तर जगणे आले ना!_

_*धर्म तर जगण्याची कला आहे, कसे सुखपूर्वक जगावे. कसे शांतीपूर्वक जगावे, त्यासाठी श्वासाचा आधार घेतला. पुष्कळ आलंबन आहेत, परंतु श्वासाच्या आलंबनापासून पुढे जात-जात आम्ही त्या अवस्थांपर्यंत पोहोचू, जिथे आम्ही mind व matter च्या interaction ला खूप चांगल्या प्रकारे पाहू शकू. अनुभवाद्वारे हे जाणू शकू की मन व शरीराचा जो एक दुसऱ्याला प्रभावित करण्याचा स्वभाव आहे, त्याचे फळ काय येते ! कसे विकार जागतात, कसे त्यांचे संवर्धन होते व कसे आमच्या डोक्यावर चढतात. आम्हाला शुद्ध राहात नाही. शुद्ध आली तरच याच्या बाहेर निघू. आधीच शुद्ध आली तर ते डोक्यावर चढू शकणार नाहीत. ही विद्या आपल्या स्वतःला सुधारण्याची विद्या आहे. आपल्या स्वतःला जाणू लागलो तर दुःखाच्या बाहेर निघू लागलो.*_

*_आपा जाणे, आपो आप, रोग न व्यापे तीनों ताप ।_*

_जिथे आपल्या स्वतःला जाणू लागलो, सर्व भवरोग दूर झाले, सर्व संताप-ताप दूर झाले. तेव्हा खूप शांतीचे जीवन जगू लागला, खूप सुखाचे जीवन जगू लागला. हे काम प्रवचन ऐकण्यामुळे होत नाही, शास्त्रांना वाचण्यामुळे होत नाही, केवळ चिंतन-मनन करण्यामुळे होत नाही. यासाठी अनुभव करावा लागतो, अभ्यास करावा लागतो व त्याचेच नाव आहे 'विपश्यना' कसे आम्ही आपल्या आतील सत्यांना अनुभवाच्या स्तरांवर जाणू व कसे आपल्या मनाच्या चुकीच्या स्वभावाला उलटवून त्याला योग्य बनवू, ज्यामुळे आपलेही कल्याण होईल, इतरांचेही कल्याण होईल, आम्हीही सुखशांतीचे जीवन जगू व इतरही सुखशांतीचे जीवन जगतील. बस, हाच धर्म आहे व धर्मात पुष्ट होण्याची ही भारताची जुनी कल्याणकारी विद्या आहे. हिचा स्वीकार करुन जीवनात धारण करावयाची आहे._

_आजच्या धर्मसभेत जे-जे आले, त्यांनी याला केवळ वाणीविलास व बुद्धीविलासाचा विषय बनवू नये. ही प्रेरणा जागो की आम्हीही आपल्या आत अंतर्मुखी होऊन सत्याला पाहू व पाहून आपल्या विकारांपासून मुक्त होऊ. ज्यामुळे आमचेही मंगल होवो व इतरांचेही मंगल होवो ! खूप धर्म जागो, सर्वांचे मंगल होवो, सर्वांचे कल्याण होवो, सर्वाची स्वस्ती मुक्ती होवो, सर्वांची स्वस्ती मुक्ती होवो !_

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

*_लेखक :- कल्याणमित्र सत्यनारायण गोयन्का_*

_बुद्धवर्ष २५६०, जेष्पौठ र्णिमा, २० जुन, २०१६, वर्ष २३ अंक ३_

*_संकलन :- महेश कांबळे_*

*_दिनांक :-_* ११/०२/२०२५

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

कोलित सुत्त

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_कोलित सुत्त_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_41.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼  _'कोलित सुत...