✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹
*_महासमय सुत्ताची व्याख्या_*
https://mikamblemahesh.blogspot.com/2025/01/blog-post_15.html
✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹
रंगून, १३-६-६८
प्रिय शंकर सीता! राधे ! विमला !
धर्मचारी बना !
_आज 'महासमय' दिवस आहे. आजच्या दिवशी भगवान बुद्धांनी महासमय सुत्ताची घोषणा केली होती._
_तुम्ही ऐकले असेल, बुद्धांच्या जीवनकाळात शाक्यवंशी क्षत्रियात व बुद्धांच्या आजोळचे कोलियवंशी क्षत्रिय यांच्यात नेहमी वैमनस्य राहत होते. *रोहिणी नावाच्या नदीच्या एका बाजूला शाक्य व दुसऱ्या बाजूला कोलिय क्षत्रिय वसलेले होते. आपसातील भांडणांचे एक खूप मोठे कारण ह्या नदीचे जल होते, जे दोन्ही बाजूंच्या शेतांना सिंचन करण्यासाठी वापरले जात होते.* कधी-कधी जेव्हा नदीतील पाणी कमी व्हायचे व उष्णतेमुळे दोन्ही बाजूंच्या शेतांना सिंचनाची खूप गरज असायची तेव्हा दोघांतील तणाव खूप वाढायचा. नदीत पाणी इतके नसायचे की दोन्ही बाजूंच्या शेतांना सिंचन केले जाऊ शकेल, तेव्हा कोणी किती पाणी घ्यावे यावर तक्रारी वाढायच्या._
_एकदा कडक उन्हाच्या दिवसात याचबाबीवर दोन्ही पक्षांचे भांडण इतके वाढले की म्यानातून तलवारी बाहेर निघाल्या. दोन्ही बाजूचे क्षत्रिय आपापल्या मागण्यांवर अडून बसले. सेना युद्धासाठी तयार झाली, युद्ध दुदुंभी वाजली._
_भगवानांनी आपल्या योगबळाने पाहिले की त्यांच्या वंशाचे लोक परस्परांचा जीव घेण्यासाठी तयार झालेले आहेत. ते तत्काळ युद्धस्थळी पोहोचले व दोन्ही बाजूंच्या योद्धांना समजवतांना म्हणाले की त्या तुच्छ नदीजलापेक्षा तुम्हा क्षत्रिय कुमारांच्या धमनीतील रक्त खूप अधिक मूल्यवान आहे. त्याला व्यर्थ जमिनीवर वाहवू नका. त्यानंतर दोन्ही दळांना शांत करतांना त्यांनी धर्म जागवणारा उपदेश दिला. सत्यवाणी ऐकूण ५०० युवा शाक्य व कोलिय राजपुत्र योद्धा यांना त्याच क्षणी धर्मसंवेग जागला व ते घरातून बेघर होऊन, प्रव्रज्या ग्रहण करून, बुद्धांच्या भिक्षुसंघात सामील झाले. *ह्या ५०० भिक्षुंनी बुद्धांकडून विपश्यना ध्यान शिकून अत्यंत उन्नत अरहंत फळाची अवस्था प्राप्त केली. आता ह्या ५०० तरुण तेजस्वी अरहंत भिक्षुंसोबत भगवान कपिलवस्तूपासून दूर हिमवंत प्रांताच्या महावन नावाच्या अरण्यात जाऊन थांबले.*_
*_भगवान म्हणाले जेव्हा कोणी (युवा ब्रह्मचारी) ब्रह्माचरणयुक्त व्यक्ती भिक्षु बनून अरहंत पद प्राप्त करते, तेव्हा ती आपल्या संपूर्ण चित्तमळांना नष्ट करून अशी प्रकाशित होते जसे निरभ्र आकाशात पौर्णिमेचा चंद्र चमकतो._*
_ह्या ५०० ओजस्वी अरहंतांसोबत जेव्हा भगवान हिमवंताच्या महावनात विहार करीत होते, तेव्हा विभिन्न देवलोकात याची चर्चा सुरू झाली व दहा लोकांचे अनेक देवगण बुद्ध-प्रमुख चंद्रासमान चमकत्या नव भिक्षूंच्या दर्शनासाठी या महावनात एकत्रित झाले. वेगवेगळ्या चक्रवालांतील व वेगवेगळ्या देव, ब्रम्ह लोकांतील आकाश व जमिनीवरील देवांपैकी अनेकांनी उल्हासाने भरपूर अशी गाणी गायली -_
*_तत्र भिक्खवो सम्मादहंसु, चित्तमत्तनो उजुकं अकंसु।_*
*_सारथीव नेत्तानि गहेत्वा, इन्द्रियानि रक्खन्ति पण्डिता ।।_*
*_(- दी.नि. २.७.३३२, महासमयसुत्तं)_
*_भिक्षुगण आपल्या चित्ताला सरळ करून एकाग्रचित्त आहेत, ध्यानमग्न आहेत, जसे ज्ञानीजन कुशल सारथ्याप्रमाणे इंद्रियरूपी घोड्यांच्या लगामांना ओढून वश करतात._*
_अनेक वर्ण व अनेक आकार-प्रकाराच्या, दिव्य वस्त्राभूषणांनी अलंकृत देवतांना ह्या नवीन भिक्षूंबद्दल व बुद्धांप्रती विपुल श्रद्धावान होऊन प्रसन्नता व हर्ष प्रकट करतांना पाहून भगवानांनी भिक्षूंना त्या देवतांबाबत सांगितले. ते देवता पृथ्वीच्या वेगवेगळ्या भागातून, पर्वतांच्या गुहेमधून व अंतरिक्ष स्थित देवलोकातून आले होते. ते सिंहासमान दृढ, निर्भय, रोमांचरहित, पवित्र मनाचे, शुद्ध, प्रसन्न, निर्दोष व ध्यानारूढ होते._
_*भगवानांना वाटले की या भिक्षंनीही या देवतांना पाहावे, त्यामुळे त्यांनी भिक्षूंना दिव्य चक्षु प्राप्त करण्यासाठी योग्य ध्यान मार्ग शिकवला. थोड्याशा प्रयासाने सर्वांनी उत्साहपूर्वक प्रयत्न करत दिव्य चक्षु प्राप्त केले. त्यांना देवतांना पाहण्यायोग्य ज्ञान उत्पन्न झाले.* त्यापैकी काही भिक्षुंनी शंभर देवतांना, काहींनी हजारांना, काहींनी सत्तर हजारांना, काहींनी लाख देवतांना पाहिले. काही-काहींनी तर सर्व दिशांना असंख्य देवतांनी भरलेले पाहिले. (दी.नि. २.७.३३४, महासमयसुत्तं)_
_जेव्हा सर्व भिक्षु या प्रकारे देवदर्शी झाले, तेव्हा भगवानांनी त्या एकत्रित देवतांपैकी अनेकांचा परिचय करतांना म्हटले की हे सर्व अशा चित्तमळरहित, काळीमारहित, चंद्रासमान महानाग रूपी भगवान बुद्ध व त्यांच्या भिक्षूंचे दर्शन करण्यासाठी आलेले आहेत, जे भिक्षु पुढील जन्मांपासून मुक्त झालेले आहेत, आसक्ती, द्वेष व मोहापासून सुटलेले आहेत व भवबाधांच्या पार गेलेले आहेत. त्यानंतर या देवतांच्या नाव-गावाची घोषणा करतांना भगवानांनी यांच्या रंगीबेरंगी असण्याचा उल्लेख केला व जवळपास सर्वांसाठी असे म्हटले -_
*_इद्धिमन्तो जुतिमन्तो, वण्णवन्तो यसस्सिनो।_*
*_मोदमाना अभिक्कामुं, भिक्खूनं समितिं वनं ।।_*
*_(- दी.नि. २.७.३४०, महासमयसूत्तं)_*
*_ऋद्धिमान, प्रकाशमान, तेजस्वी वर्णाचे व यशस्वी देवता प्रसन्न होऊन या वनात भिक्षूंच्या या संमेलनाला पाहण्यासाठी आले आहेत._*
_तेव्हा भगवानांनी सांगितले की इंद्र व ब्रह्मासहित या अनेक देवतांच्या आगमनामुळे दुष्ट मारदेवही आपल्या मार सेनेसहित आला व येताच माराने भयंकर आवाजात हल्ला केला -_
*_एथ गण्थ बन्धथ, रागेन बद्धमत्थु वो।_*
*_समन्ता परिवारेथ, मा वो मुञ्चित्थ कोचि नं ।।_*
_*- 'या ! पकडा ! बांधा सर्वांना आसक्तीच्या बंधनात अडकवा वश करा! कोणीही वाचता कामा नये* या प्रकारे मेघासमान गरजत व विजेप्रमाणे कडकडाट करत मार आपल्या भयंकर सेनेसह पोहोचला. भगवानांनी भिक्षूंना संबोधित करत म्हटले -_
*_मार सेना अभिक्कन्ता, ते विजानाथ भिक्खवो।_*
*_(- दी.नि. २.७.३४२-३४३, महासमयसुत्तं)_*
*_- हे भिक्षूंनो ! जाणून घ्या, समजून घ्या की ही मार सेना आलेली आहे._*
_बुद्धांची घोषणा ऐकून सारे वितरागी भिक्षु परिश्रमपूर्वक जागृत झाले व या प्रकारे ती मार सेना पराभूत होऊन पळून गेली. या भिक्षूंचा एक केसही वाकडा करू शकली नाही. *नेसं लोमापि इञ्जयें।* सर्व संग्राम जिंकलेले निर्भय व यशस्वी बुद्ध श्रावक प्रसन्न झाले._
_जे लोक या शक्तींच्या अस्तित्वाला स्वीकारतात, त्यांच्यासाठी एक-दोन बाबी अजून लक्ष देण्यायोग्य आहेत. आम्ही पाहातो की बुद्धांद्वारे शिकवल्यावर व स्वतः प्रयत्न केल्यावर सर्व ५०० अरहंतांनी दिव्यदृष्टी प्राप्त केली, ज्यामुळे ते या अदृश्य प्राण्यांना स्वतः पाहू शकतील. स्पष्ट आहे की *दिव्यदृष्टी प्राप्त करणे ही एक प्रकारची साधना आहे, जिला योग्य गुरूच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्नशील सुपात्र शिष्य प्राप्त करू शकतो.* दुसरी महत्वपूर्ण बाब ही आहे की ह्या अरहंतांपैकी काहींनी दहाच्या संख्येत, काहींनी शेकडोंच्या संख्येत, काहींनी हजारोत व काहींनी लाखोंच्या संख्येत या यक्ष-देवांना पाहिले, काहींनी तर सर्व दिशा या देव-ब्रह्मांनी भरलेल्या पाहिल्या, म्हणजे त्यांना अगणित संख्येत पाहिले._
_आम्ही आपल्या आश्रमातही पाहिले आहे की ज्या-ज्या लोकांनी दिव्यदृष्टी प्राप्त केली आहे त्यांची शक्ती एकसारखी नाही. एक दिव्य-दृष्टीधारी आपल्यासमोर शंभर देवांची परिषद बसलेली पाहतो, तर दुसरा हजारची व तिसरा त्यापेक्षा कितीतरी अधिकची. परंतु ज्या शंभर देवांना प्रथम द्रष्टा पाहतो व ज्या रूपात पाहतो, त्यांना त्याच रूपात अन्य द्रष्टाही पाहतात. फरक हाच आहे की ते पहिल्या द्रष्ट्यापेक्षा काही जास्त पाहू शकतात. त्यांची दिव्यदृष्टी अधिक तीक्ष्ण आहे. ते अधिक दूरद्रष्टा आहेत. दिव्यदृष्टीचा साधक एखाद्या खोट्या कल्पनेत तर वाहत जात नाही, यासाठी दोन द्रष्टांद्वारे पाहिल्या गेलेल्या दृश्यांची वेगवेगळी माहिती घेऊन सत्याची तपासणी केली जाते. तेव्हाच ते मान्य होते._
_एक अन्य बाब जी या देवांच्या विषयी लक्ष देण्याची आहे, ती ही आहे की यांच्या प्रशंसेत खोटी अतिशयोक्ती केली गेलेली नाही, जवळपास सर्वांसाठीच म्हटले गेले आहे-_
*_महब्बलाः इद्धिमन्तो जुतिमन्तो वण्णवन्तो यसस्सिनो।_*
*_(- दी.नि. २.७.३३६, महासमयसुत्तं)_*
*_म्हणजे ते महाबलशाली आहेत, ऋद्धिमान आहेत, प्रकाशवान आहेत, तेजस्वी आहेत व यशस्वी आहेत._*
_*बलवान व ऋद्धिमान असणे जवळपास सर्व अदृश्य देव-यक्षांचा सामान्य गुण आहे.* मनुष्याच्या तुलनेत हे अधिक बलवान आहेत व अधिक ऋद्धिमान आहेत, तसेच वायवीय शरीर असल्यामुळे अशी काम करू शकतात जी मनुष्यांसाठी पूर्णपणे असंभव आहेत. आपल्या पूर्व जन्मांच्या सुकर्मांमुळे काही-काही मूलतः प्रकाशवान नसतांनाही कमी वा अधिक प्रकाशवान व ज्योर्तिमयही आहेत. *काही-काही सद्धर्माची विपश्यना भावना शिकून प्रकाशवान व वर्णवान झाले आहेत. असे आपल्या इथेही नेहमी होते. काही-काही निम्न कोटीचे प्राणी जेव्हा गुरुच्या संपर्कात येऊन ध्यान शिकणे आरंभ करतात तेव्हा त्यांची आकृती भयानक व रंग खूप काळा असतो, परंतु तेच ध्यानाच्या उच्च स्तरावर पोहोचता पोहोचता अत्यंत प्रकाशवान, तेजस्वी व वर्णवान होतात.*_
_हे अदृश्य देव आमचे रक्षण तेव्हाच करतात जेव्हा आम्ही सद्धर्माच्या मार्गावर चांगल्या प्रकारे चालतो, शील-संयम धारण करतो, चित्त एकाग्र करून विपश्यनेच्या ध्यानात बसतो. तेव्हा आमच्या आतून जे भाव-तरंग उत्पन्न होतात, त्यामुळे प्रसन्न होऊन ते सारे देव, जे ह्या ध्यानमार्गाचे अवलंबी आहेत, प्रमोदित होऊन आमच्या आस-पास येऊन बसतात व ध्यानात आमची सोबत करतात. या प्रकारे अनेक अदृश्य साधकांची उपस्थिती वातावरणाला अधिक शांत व निर्मळ बनवते. आमचे ध्यान अधिक दृढ होत जाते, चित्तमळाचा लवकर क्षय होतो व विशुद्ध अवस्था लवकर प्राप्त होते. या प्रकारे हे सम्यक देव आमचे रक्षण करतात. धर्मपालनात आम्हाला आधार देतात. परंतु *हे सर्व तेव्हाच होते, जेव्हा आम्ही स्वतः धर्ममार्गावर चालतो.* अन्यथा न कोणी देव जवळ येईल, न कोणतीही दैवी सद्वृत्ती अशा सम्यक सन्मार्गी देवांच्या प्रती आदरभाव ठेवण्यात कोणताही दोष नाही, तसेच जसे एखाद्या सत्पुरुष, संत मानवाप्रती आम्ही आदरभाव ठेवतो, बस यापेक्षा अधिक नाही._
_या महासमय सुत्ताच्या शेवटी आम्ही पाहतो की जेथे इतके देव-ब्रह्मा एकत्रित झाले आहेत तेथे दुष्ट देव मारही आपल्या सनेसह येऊन उपस्थित झाला. *या माराचा एकच स्वभाव आहे ज्याची घोषणा करत तो प्रवेश करतो 'या! पकडा! बांधा! सर्वांना आसक्तीच्या वशात करा चोहीकडून घेरुन टाका. कोणीही वाचता कामा नये! आपल्या स्वभावानुसार त्याला यात सुख मिळते की जास्तीत जास्त लोक आसक्ती, द्वेष व मोहाच्या जाळ्यात अडकून राहोत. यातून बाहेर निघण्याचा प्रयत्न करणारा प्रत्येक प्राणी त्याला अप्रिय वाटतो. तो प्रत्येक संभाव्य प्रकाराने, उपाय साधनांनी त्यांना बांधण्याचा प्रयत्न करतो,* याच मार देवाला आम्ही यम देव म्हणू शकतो. यम देव म्हणजे मृत्यूचा देव म्हणजे मृत्यूच्या साम्राज्याचा अधिपती. जेव्हा कोणी मृत्यूच्या चक्रातून निघून खरोखर अमर अवस्था प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा त्याच्या भुवया वर चढतात, त्याला राग येतो. आपल्या गुलामाला कोण मुक्त करेल बरे ?_
_*मुक्ती मार्ग अवलंबणा-या विपश्यी साधकांना या मारापासून सदैव सतर्क राहिले पाहिजे. याला जिंकण्याचा उपाय खूप सोपा आहे आणि तो हा आहे की प्रतिक्षण सतर्क राहावे.* जागृत झाल्याबरोबर मार सेना विलीन झाली. या चोराला पाय नसतात. घराचा मालक जागला की चोर पळाला. खूप सोपा उपाय आहे. *कोणीही प्रयोग करून पाहू शकतो. जेव्हा कधी मनात प्रबळ काम वासना जागेल, तेव्हा केवळ क्षणभरासाठी मनुष्य सतर्क होऊन केवळ या तथ्याला जाणेल की ओह माझ्यात ही काम वासना जागत आहे. बस केवळ इतके पाहणे-जाणणे झाले की काम वासना लाजाळूच्या पानांप्रमाणे लपली. जशी नव्हतीच. हीच दशा क्रोधाची आहे, अहंकाराची आहे, ईर्षेची आहे. जसे जागे होतील तसेच पाहा. हे तिथेच विलुप्त होतील. परंतु लोक पाहातात कुठे ? जसा कोणताही विकार जागतो, तसे त्या विकाराच्या अधीन होतात आणि त्या वेळेस तर जागरूकतेचे नावनिशाणही नसते. बस केवळ तो विकारच डोक्यावर चढून बसतो व डोके त्या विकाररूपी पाण्याखाली बुडलेले असते. खूप वेळ गेल्यानंतर जेव्हा शुद्ध येते तेव्हा मनुष्य त्या विकाररूपी माराच्या अधीन असतांना केलेल्या मूर्खपणाचे स्मरण करून पश्चाताप करतो. परंतु तेव्हा काय होईल? हे जागरूकतेचे हत्यार तेव्हाच कामात येते जेव्हा वैरी हल्ला करुन आपला ताबा घेत असेल. त्यानंतर पश्चाताप करणे बिल्कुल निरर्थक आहे.*_
_त्यामुळे या, या मार-बंधनातून मुक्त होऊ व धर्म-साधनेच्या मार्गावर चालत आपले मंगल साधू. यातच सर्वांचे कल्याण सामावले आहे._
✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹
*_लेखक :- कल्याणमित्र सत्यनारायण गोयन्का_*
_विपश्यना साधक, बुध्दवर्ष २५५८, आश्विन पौर्णिमा, ८ ऑक्टोबर, २०१४ वर्ष १ अंक ६_
*_संकलन :- महेश कांबळे_*
*_दिनांक :-_* १५/०१/२०२५
✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹
No comments:
Post a Comment