Monday, 23 December 2024

शुद्ध धर्माची शिकवण

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

*_शुद्ध धर्माची शिकवण_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2024/12/blog-post_7.html

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

_भगवान बुद्धांनी आपल्या साठ धर्मपुत्रांना धर्मात परिपक्व करुन वेगवेगळ्या दिशांना पाठविले. त्यांनी सम्यक संबुद्धांच्या पावन शिकवणुकीला लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रथम धर्मदूतांचे काम केले._

_जसा भगवानांनी शिकविला तोच धर्म त्यांनी लोकांना शिकविला. *भगवानांनी कधीही आपल्या शिकवणुकीला बौद्धधर्म म्हटले नाही. जर असे झाले असते तर तो संप्रदाय बनला असता. भगवानांनी त्याला धर्म म्हटले आणि अनुयायांना धार्मिक म्हटले.* हे ६० धर्मदूत लोकांना धर्म शिकविण्याच्या कामास लागले. *जर ते बौद्धधर्म शिकवित असते तर लोक ह्यापासून दूर पळाले असते, कारण ह्याला परका धर्म समजले असते. धर्म वस्तुतः सर्वांचा असतो. सार्वजनिक, सार्वदेशिक, सार्वकालिक असतो. धर्म निसर्गाच्या नियमांना म्हणतात. विश्वाचे विधान अथवा प्रकृतीच्या नियमांना धर्म म्हणतात, जे सर्वांवर लागू होतात. कोणाचाही पक्षपात करीत नाहीत. जसे अग्नीचा धर्म आहे जळणे आणि जाळणे. जो त्याच्या संपर्कात येईल त्याला जाळेल. सूर्याचा धर्म आहे प्रकाश व उष्णता देणे. चंद्राचा धर्म आहे प्रकाश व शीतलता देणे. जे सर्वांसाठी समान रुपाने असते.*_

_त्यामुळे मला वाटते की ह्या कार्यात त्यांना फारशा अडचणी आल्या नसतील. ह्याचे एक कारण हे ही राहिले असेल की ते धर्माचा केवळ उपदेश देण्यासाठी निघाले नव्हते, तर त्याचा अभ्यास करवीत असत आणि जीवनात उतरवीत असत. केवळ उपदेश असता तर अशी पुष्कळशी मत-मतांतरे होती जी धर्माचा उपदेश देत होती, परंतु त्याला धारण करणे शिकवू शकत नव्हती. या उलट संबुद्धांच्या धर्मदूतांनी त्याचा व्यावहारिक पक्ष उजागर केला, ज्यामुळे लोकांना धर्म धारण करुन तत्काळ लाभ मिळेल._

_धर्माची तीन प्रमुख अंगे :-_

१. *_शील -_*

_धर्माची पहिली शिकवण होती शील, म्हणजे सदाचार. त्या वेळचे जे काही मत-मतावलंबी होते ते जवळपास सर्व शीलाचे महत्व स्वीकारीत असत._

_मी आपल्या अनुभवाने जाणतो कारण कट्टर हिंदू सनातनी घरात जन्मलो, वाढलो. मोठ्यांनी मला ईश्वरभक्तीचा पाठ शिकविला. पाठशाळेच्या गुरुदेवांनीही जी ईश-वंदना शिकविली त्यात आपल्या इष्टदेव ईश्वराला हीच प्रार्थना करणे शिकविले- 'लीजिये हमको शरण में, हम सदाचारी बनें।'_

_आमच्या पाठशाळेच्या आचार्यांनी आम्हाला समजाविले की शरीर व वाणीने कोणतेही असे कार्य करु नये ज्यामुळे अन्य प्राण्यांची हानी होईल, त्यांना कष्ट होतील. असे करणे दुराचार आहे आणि ह्यापासून वाचणेच सदाचार आहे. सर्व परंपरांमध्ये लहानपणापासूनच सदाचाराचा पाठ शिकविला जातो, ह्यामुळे मी अनुमान करु शकतो की जेव्हा भगवानांचे धर्मदूत त्यांच्या शिकवणुकीचा प्रचार करण्यासाठी निघाले, तेव्हा प्रथम पाऊल शीलाचेच असल्यामुळे कोणताही विरोध झाला नसेल. *ह्या धर्मदृतांनी लोकांना शिकविले असेल की सदाचार व दुराचार दोन्हीही प्रथम मनात जागतात. त्यानंतर वाणी अथवा शरीराच्या कर्माच्या रुपाने प्रकट होतात. कोणत्याही समजदार व्यक्तीला हे सत्य स्वीकार करण्यात कोणतीही अडचण आली नसेल. सदाचाराचे जीवन जगण्यासाठी शरीर व वाणीने तर दुराचार करण्यापासून वाचायचेच आहे, परंतु मनालाही दुराचरणापासून मुक्त करणे अत्यंत आवश्यक आहे आणि अत्यंत कठिण देखिल.*_

_त्या काळातील कोणत्याही सामान्य व्यक्तीला हे समजण्यात अडचण आली नसेल की *मनोपुब्बङ्गमा धम्मा मनोसेट्ठा मनोमया म्हणजे साऱ्या कर्माच्या आरंभी मन जागते. पुढील सर्व प्रपंच मनाच्या आधारेच चालतो. म्हणूनच मनच श्रेष्ठ आहे, प्रमुख आहे. त्यामुळे सर्व प्रपंच मनोमयच आहे.* आपल्या स्वतःला सुधारण्यासाठी मनाला सुधारणे आवश्यक आहे. *मलिन चित्ताने केले गेलेले वाणी अथवा शरीराचे कर्म दुष्कर्मच असते, जे आपल्यासाठीही हानिकारक असते व इतरांसाठीही. ह्याच प्रकारे निर्मळ चित्ताने केले गेलेले कर्म सत्कर्मच असते, जे आपल्यासाठी सुखदायक असते व इतरांसाठीही. जर मन दूषित झाले तर शरीर व वाणीची कर्मे दूषितच होतील आणि त्यांचा परिणाम दुःखदच होईल. ह्याच प्रकारे जर मन निर्मळ असेल तर शरीर व वाणीची कर्मे आपोआप स्वस्थ होतील आणि त्यांचा परिणामही सुखदच होईल.* जसे की म्हटले आहे-_

*_मनसा चे पटुट्ठेन, भासति वा करोति वा।_* 

*_ततो नं दुक्खमन्वेति, चक्कंव वहतो पदं ॥_*

_जेव्हा कोणी व्यक्ती दुष्ट मनाने वाणी अथवा शरीराने कोणतेही काम करेल तर परिणामही दुःखदच होईल आणि दुःख त्याच्या मागे तसेच लागेल जसे की बैलगाडीची चाके बैलाच्या पायांच्या मागे-मागे लागतात.._

अशाच प्रकारे-

*_मनसा चे पसन्नेन, भासति वा करोति वा।_*

*_ततो नं सुखमन्वेति, छायाव अनपायिनी ॥_*

_जेव्हा कोणी व्यक्ती मनाला निर्मळ ठेवून वाणी अथवा शरीराने कोणतेही कर्म करते तेव्हा सुख तिच्या मागे तसेच लागते जसे की कधी साथ न सोडणारी आपली सावली._

_जेव्हा संबुद्धांच्या ह्या दूतांनी मनाला वश करुन सदाचारी बनणे शिकविले तेव्हा वाणी आणि शरीराची कर्मे आपोआप दुराचरणापासून मुक्त होऊन सदाचरणाकडे वळली._

२. *_समाधी -_*

_शरीर आणि वाणीच्या कर्माना सुधारण्यासाठी मनाला वश करणे आवश्यक आहे. मन ताब्यात असेल तरच तो दुराचरणापासून वाचू शकतो व सदाचरणाकडे वळू शकतो. ह्यासाठी समाधीचा अभ्यास करविला._

_त्या काळातील अधिकांश भारतवासी मनाला वश करण्याच्या सत्याला महत्य देत होते आणि ह्यासाठी अनेक उपाय करीत होते, ज्यापैकी काही आजही कायम आहेत. जसे की_

*_- सर्वांचे आपापले उपास्यदेव, लोक त्यांना प्रसन्न करण्यासाठी वारंवार त्यांच्या नावाचा जप करतात, ज्यामुळे ते प्रसन्न होऊन मनाला एकाग्र करुन देतील. परंतु हे आलंबन सार्वजनिक नाही, सांप्रदायिक आहे._*

_बुद्धपुत्रांनी त्यांच्या अशा मान्यतांचे खंडन करुन विवाद तर निर्माण केला नसेलच. परंतु हळूहळू लोकांच्या मनात हे सत्य स्थापित केले गेले असेल की आपली मुक्ती आपल्या हातात आहे. कोणातरी इतरांच्या सहाय्याने आपल्या चित्ताला एकाग्र करण्याच्या आणि निर्मळ बनविण्याच्या ऐवजी एक नवीन बाब समोर आली असेल की -_ 

*_अत्ता हि अत्तनो नाथो, को हि नाथो परो सिया। _*

_*म्हणजे व्यक्ती स्वतः आपला मालक आहे, दुसरा कोण मालक असेल बरे!* आपली सुगती अथवा दुर्गती स्वतः आपल्या हातात आहे- *अत्ता हि अत्तनो गति।* त्यामुळे आपली गती सुधारण्यासाठी स्वतःच प्रयल करावे लागतील._

_आपल्या मनाला वश करण्यासाठी त्यांनी सार्वजनिक उपाय सांगितला. येणाऱ्या जाणाऱ्या सहज स्वाभाविक श्वासाची जाणीव ठेवत राहा. मन जसे भटकेल, तसे त्याला पुन्हा श्वासाच्या जाणीवेवर घेऊन या. श्वासासोबत कोणताही शब्द जोडू नका, कोणतीही काल्पनिक मान्यता जोडू नका. जो श्वास नैसर्गिक रुपाने येत आहे, जात आहे, बस त्याला तसेच जाणा._

_*काही लोकांनी स्वावलंबनाच्या ह्या विद्येचा स्वीकार केला असेल, परंतु अनेकांनी पूर्वकालापासून चालत आलेल्या परावलंबनासच महत्व दिले असेल, ज्यांनी प्रचलित परावलंबना ऐवजी स्वावलंबनाचे सहाय्य घेतले असेल, ते प्रज्ञेकडे वळले असतील.*_

३. *_प्रज्ञा-_*

_*सहज स्वाभाविक श्वासाच्या आधाराने सम्यक समाधी पुष्ट होऊ लागते तेव्हा नासिकेच्या द्वारांच्या आसपास कोणती-ना-कोणती संवेदना मिळू लागते. त्यानंतर ती साऱ्या शरीरात पसरते. ह्यामुळे सत्याची जी जाणीव होते ती कोणा इतराची देणगी नसते, उलट स्वतःच्या आपल्या पुरुषार्थाची देणगी असते. म्हणूनच हे परोक्ष ज्ञान नाही, प्रत्यक्ष ज्ञान आहे. म्हणूनच प्रज्ञा म्हणविले जाते.*_

_काम करता-करता प्रज्ञेची देखिल तीन अंगे चांगली समजून येऊ लागली असतील -_

१ _*श्रुतमयी प्रज्ञा* म्हणजे ते ज्ञान जे कोणाकडून ऐकले आणि श्रद्धेमुळे स्वीकारले._

२ _पुढचे पाऊल त्यावर चितंन मनन करुन ते बुद्धीच्या स्तरावर स्वीकारले. ती *चिंतनमयी प्रज्ञा* म्हणविली जाते. त्या दोन्हीही खऱ्या अर्थाने प्रज्ञा नाहीत._

३ _योग्य प्रज्ञा आहे *भावनामयी प्रज्ञा.* ते ज्ञान जे स्वतः आपल्या अनुभूतीमुळे जागेल. म्हणजे कोणाचे ऐकून अथवा अध्ययनाद्वारे स्वीकारले अथवा त्या पुढे जाऊन चिंतन मननाद्वारे त्याच्या सत्याला तर्काच्या कसोटीवर कसून स्वीकारले, तर ही खरी प्रज्ञा नाही. *खरे ज्ञान ते आहे जे स्वतः आपल्या अनुभूतीमुळे जागेल. ते परोक्ष ज्ञान नाही, तर प्रत्यक्ष आपले ज्ञान आहे. त्यामुळे हीच खरी प्रज्ञा आहे.*_

_अशा प्रकारे ध्यान करीत करीत लोकांनी पाहिले असेल की त्यांच्या मनात खूप सुधारणा होऊ लागल्या आहेत. कोणी व्यक्ती दुराचारी होता, तो सदाचारी झाला, चारित्र्यवान झाला. जो मद्यपी होता त्याचे नशापान सुटले. जुगाऱ्यांचा जुगार सुटला. व्यभिचाऱ्यांचा व्यभिचार सुटल्य. अशा प्रकारे लोकांना विद्येचा लाभ मिळू लागला. अनेक लोक दुराचारापासून मुक्त होऊन सदाचार करू लागले. लोकांना बुद्धपुत्रांची ही शिकवण तत्काळ फलदायक वाटू लागली. *परंतु हिचे फळ प्राप्त करण्यासाठी परिश्रम तर स्वतःच करावे लागतात. कोणी मार्ग अवश्य सांगेल, परंतु चालावे तर स्वतःलाच लागते. इतर कोणाचे सहाय्य नाही, भरोसा नाही.*_

_तरीही काही लोक पुरातन परंपरेत बांधले गेल्यामुळे हिच्याकडे झुकले नसतील. परंतु जेव्हा इतरांना लाभान्वित झालेले पाहिले असेल तेव्हा त्यांच्या मनातही हिच्या प्रती आकर्षण जागले असेल._

_अशा प्रकारे सत्यावर आधारित स्वावलंबनाची ही विद्या त्वरित फळ देणारी असल्यामुळे लोकांना आकर्षित करु लागली. भगवानांचे हे प्रथम धर्मदूत भिन्न-भिन्न मार्गाने चारिका करीत लोकांना ही विद्या शिकवू लागले आणि लोक आकर्षित व लाभान्वित होऊ लागले. अशा प्रकारे विद्येचा आरंभ ह्या साठ धर्मदूतांनी केला. परंतु पुढे जाऊन अन्य अनेक पुण्यलाभी लोक ह्या रस्त्याने चालून केवळ स्वतःच लाभान्वित झाले नाहीत तर इतरांनाही ह्या योग्य विद्येचे प्रशिक्षण देऊ लागले. ह्या प्रकारे भगवानांची ही विद्या उत्तर भारताच्या शहरी-शहरी, गावागावांत पसरु लागली आणि लोकांचे कल्याण करु लागली._

_प्रारंभिक ६० धर्मदूतांपैकी ५ ब्राम्हण परिवाराचे होते आणि ५५ व्यापारी परिवाराचे. त्यांचा व्यापारी समाजाशी संपर्क असल्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये धर्म जोरात पसरला. *व्यापारी आपल्या काम - धंद्यासाठी दूर दूरवर यात्रा करायचे, त्यामुळे जेथे जात तेथे बुद्धांच्या शिकवणूकीची स्तुती करायचे. त्यांच्या माध्यमाने बुद्धांची शिकवणूक दूर-दूरपर्यंत पसरु लागली.*_

_अशाच प्रकारचा *एक समूह गंधारदेशाच्या राजधानीत तक्षशिलेत, राजा पुक्कुसातिकडे पोहोचला. जेव्हा त्याने बुद्धांच्या शिकवणुकीबाबत ऐकले व जाणले की बुद्ध ह्या वेळी राजगीरमध्ये वास करीत आहेत, तेव्हा तो हे ऐकून अत्यंत रोमांचित झाला आणि भगवानांना भेटण्यासाठी उत्सुक झाला. आपल्या पूर्व पारमीमुळे राज्यकारभार सोडून तो भगवानांना भेटण्यासाठी व त्यांची शिकवण ग्रहण करण्यासाठी राजगीरकडे निघाला.* तो खूप प्रजावत्सल होता त्यामुळे त्याला महाल सोडून जातांना पाहून, त्याची प्रजा क्षुब्ध झाली आणि त्याच्या मागे मागे चालू लागली. त्याने खूप अडविले पण ती मानायला तयार नव्हती. शेवटी त्याने दृढतापूर्वक म्हटले की जर तुम्ही मला आपला शासक मानता तर मी ही रेष ओढतो, ह्यापुढे एकही पाऊल ठेऊ नका. प्रजा निराश होऊन परत गेली. *तो एकटा पायीच निघाला. दूरवरची यात्रा पूर्ण करुन जेव्हा राजगीरला पोहोचला तेव्हा संध्याकाळ झाली होती. नगराचे दरवाजे बंद झाले होते. त्यामुळे त्याने बाहेरील एका कुंभाराच्या धर्मशाळेत मुक्काम केला. संयोगाने तेथेच भगवानही मुक्कामाला होते. त्यामुळे त्यांच्याकडून त्याला तिथेच शुद्ध धर्माची शिकवण मिळाली आणि तो तत्काळ अनागामी अवस्थेला पोहोचला. भगवान म्हणाले, सकाळ झाल्यावर नगरात जाऊन एखाद्याकडून चीवर मागून आण, तेव्हाच तुला उपसंपदा मिळेल. तो नगरात जातच होता की एका दुर्घटनेचा बळी झाला. एका बैलाच्या शिंगांद्वारे मारला गेला. अशा प्रकारे भिक्षू बनू शकला नाही आणि उपसंपदेपासून वंचित राहिला.*_

_हे एक केवळ उदाहरण आहे की संबुद्धांची शिकवण सुदूर गंधार देशात आणि शाल (क्वेटा) पर्यंत जाऊन पोहोचली होती. ज्या देशात पोहोचली, तेथील लोकांच्या मनात तिच्याप्रती आकर्षण जागले. लोकांनी तिचा स्वीकार केला आणि लाभान्वित झाले. ह्या प्रकारे धर्मचक्राचा प्रकाश उत्तर भारतात दूरवर पसरला. आपणही ह्यापासून प्रेरणा घेऊ आणि आपले कल्याण साधू. ह्यातच सर्वांचे मंगल आहे, कल्याण आहे._

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

*_लेखक :- कल्याणमित्र सत्यनारायण गोयन्का_*

*_संकलन :- महेश कांबळे_*

*_दिनांक :-_* २४/१२/२०२४

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

No comments:

Post a Comment

कोलित सुत्त

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_कोलित सुत्त_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_41.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼  _'कोलित सुत...