Saturday, 21 December 2024

आवश्यक उचित उत्तर आणि दंडही

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

*_आवश्यक उचित उत्तर आणि दंडही_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2024/12/blog-post_4.html

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

_महाराणी मांगडियाने आपल्या दूतांना पाठवून भगवानांना ह्या शिव्या देवविल्या "श्रमण गौतम, तू चोर आहेस ! मूर्ख आहेस ! अविवेकी आहेस ! उंट आहेस ! बैल आहेस ! गाढव आहेस ! पशू आहेस ! नरकगामी जीव आहेस ! तुमची सुगती होणार नाही! दुर्गतीच होईल!"_

_भगवानांनी ह्याचे कोणतेही उत्तर दिले नाही. कारण त्या सर्वांना पैशांनी विकत घेतलेले होते, आपल्या मालकिणीचे गुलाम होते. तिच्या इच्छेप्रमाणे त्यांनी शिव्यांच्या शब्दांचा वापर केला._

*_भगवानांनी त्यांच्या म्हणण्याचा विरोध केला नाही तसेच त्यांना समजाविण्याचा थोडासाही प्रयत्न केला नाही. कारण ते अज्ञानी होते. कोणाचे गुलाम होते. ते काय समजणार ?_*

_*परंतु ह्याचा अर्थ असा नाही की भगवान कोणालाही उत्तर देत नव्हते. उलट सत्य हे आहे की जेव्हा कोणी त्यांना अपशब्द म्हणायचे आणि ते जाणायचे की हा धर्माच्या सत्याला समजू शकेल, तेव्हा त्याला उचित उत्तर अवश्य द्यायचे.*_ 

उदाहरणार्थ :-

*_(१) अग्गिक भारव्दाज_*

_एके दिवशी सकाळी भगवान भिक्षेसाठी निघाले. त्या वेळी अग्गिक भारव्दाज ब्राम्हणाच्या घरी यज्ञाची तयारी सुरू होती. भगवान घरोघरी भिक्षा मागीत जसे त्याच्या घरासमोर पोहोचले, तो भडकून उठला. त्याला वाटले ह्या नीच व्यक्तीच्या येण्यामुळे त्याचा पावन यज्ञ दूषित होईल. त्यामुळे त्याने भगवानांना रागावित म्हटले- "हे मुंडक, तिथेच थांव! हे श्रमण, तिथेच थांब! हे वृषल (शूद्र), तिथेच थांब!_

_ह्यावर भगवानांनी त्याला योग्य पात्र जाणून वृषल व वृषलकारक कर्मांना समजाविले. भगवान म्हणाले-_

*_"जो नर क्रोधी व वैरी आहे, पापी व ईर्ष्याळू आहे. मिथ्यामतधारी व मायावी आहे, जो योनिज वा अंडज प्राण्यांची हिंसा करतो; ज्याला प्राण्यांच्या प्रती दया नाही; जो गाव व लहान शहरांना घेरतो व नष्ट करतो, जो अत्याचाऱ्याच्या रूपाने कुख्यात आहे; जो गाव अथवा अरण्यात दुसऱ्यांच्या संपत्तीची चोरी करतो; जो ऋण घेऊन मागितल्यावर हे म्हणून पळतो की 'मी तुझा ऋणी नाही'; जो एखाद्या वस्तुच्या इच्छेने मार्ग चालणाऱ्या व्यक्तिला मारुन टाकतो. जो धनाच्या इच्छेने खोटी साक्ष देतोः जो जबरदस्तीने वा प्रेम भावाने भाऊ-बंदाच्या अथवा मित्रांच्या स्त्रियांसोबत रहातोः जो समर्थ असूनही वृध्द झालेल्या आई-वडिलांचे पालन-पोषण करीत नाही; जो आई-वडील, भाऊ-बहीण अथवा सासूला मारतो वा क्रोधित होऊन कटू वचन बोलतोः जो चांगला सल्ला विचारल्यावर वाईट सल्ला देतो आणि गोष्टींना मुद्दाम फिरवून सांगतो; जो दुष्कर्म करून लपवितो की लोकांनी माझ्या पाप कर्मांना जाणू नयेः जो दुसऱ्यांच्या घरी जाऊन स्वादिष्ट भोजन करतो. परंतु आपल्या घरी ते आल्यावर त्यांचा आदर-सत्कार करीत नाहीः जो ब्राम्हण, श्रमण अथवा एकाद्या भिकाऱ्याला खोटे बोलून धोका देतोः जो भोजनाच्या वेळी आलेल्या ब्राम्हण वा श्रमणाला क्रोधित होऊन रागावितो व काहीही देत नाही; जो मोहामध्ये गुंतुन एखादी वस्तु मिळविण्यासाठी खोटे बोलतोः जो स्वतःची बढाई मारतो व इतरांची निंदा करतो. अशा प्रकारे अभिमानाने पतित झाला आहे: जो क्रोधी, कंजूष, वाईट इच्छा असणारा, ढोंगी व असंकोची आहे; जो वाईट कर्म करण्यात लाज-भय वाळगित नाहीः जो अरहंत नसतांनाही स्वतःला अरहंत म्हणवितो, तो मिथ्याभाषी अधमच आहे. तो वृषलाधम आहे. हे ब्राम्हणा, मी तुम्हाला इतके वृषल सांगितले आहेत._*

*_"कोणी जातीने वृषल होत नाही व जातीने ब्राम्हण होत नाही. कर्माने वृषल होतो, कर्माने ब्राम्हण होतो. जे वेदपठण करणाऱ्यांच्या घरात जन्मले आहेत. आणि वेद-मंत्रांचे पाठ-पठन करतात, त्यापैकीही कित्येक नित्य पाप कर्मांत संलग्न दिसतात. अशा व्यक्तीची ह्या जन्मात देखील निंदा होते आणि परलोकातही ते दुर्गतीला प्राप्त होतात. त्यांचा जन्म त्यांना दुर्गती व निदेपासून वाचवू शकत नाही._*

_ह्या प्रकारे जो योग्य पात्र होता त्याने भगवानांना शिव्या देऊनही भगवानांनी त्याला मैत्री आणि करूणापूर्वक धर्म समजाविला. हे ऐकून उच्च जातीत उत्पन्न होण्याची त्याची भ्रांती दूर झाली. तो समजला की *जन्माने नाही, तर कर्मानेच कोणीही श्रेष्ठ अथवा नीच होऊ शकतो.*_

*_न जच्चा बसलो होति, न जच्चा होति ब्राह्मणो।_*

*_कम्मुना वसलो होति, कम्मुना होति ब्राह्मणो ॥_*

*_जन्माने कोणी वृषल नसतो व जन्माने ब्राम्हण होत नाही. कमनिच वृषल होतो व कमनिच ब्राम्हण होतो."_*

_भगवानांच्या ह्या उद्गारांनी भारद्वाज ब्राम्हणाचे कल्याण झाले. तो अत्यंत श्रध्दाळू होऊन त्यांचा शिष्य झाला. भगवानांची वरील गाथा लोक प्रसिध्द झाली आणि लोकांमध्ये खरी जागृती झाली._

*_(२) कसि भारव्दाज_*

_त्या दिवसात भगवान बुध्द एकनाला ब्राम्हण गावात विहार करीत होते. ते सकाळच्या वेळी भिक्षाटणासाठी निघाले आणि कसि भारव्दाजाच्या शेताजवळील त्याच्या कार्य-स्थानावर पोहोचले. त्यावेळी तेथे भोजन वाढले जात होते._

_जेव्हा त्यांना तेथे उभे पाहिले, तेव्हा *शेताचा मालक कसि भारव्दाज मोठ्या गर्वाने म्हणाला, "हे श्रमण! मी नांगरतो, पेरतो. नांगरून-पेरून खातो. तुम्हीही नांगरा व पेरा. नांगरुन-पेरूनच खा."*_

_ह्यावर भगवान म्हणाले "हे ब्राम्हण! मी ही नांगरतो, पेरतो. नांगरून-पेरूनच खातो."_

_-"हे श्रमण! तुम्ही कसे कृषक आहात? कुठे आहे तुमची शेती व शेतीचे सामान ?"_

*_-"हे ब्राम्हणा! श्रध्दा माझे बीज आहे, तप वृष्टी आहे, प्रज्ञा माझा नांगर आहे. लज्जा नांगराचा दंड आहे, मन वेसण आणि स्मृती फाळ आहे. मी शरीराने, वाणीने संयमित आहे. भोजनाच्या प्रती संयमी आहे. मी सत्याने निदंणी करतो. अर्हत्व प्राप्ती माझे पिक कापणे आहे. वीर्य माझा बैल आहे. निर्वाणाची माझी गाडी आहे. जी तिथे पोहोचवते जेथे शोकाचे नांवनिशाण नाही. ही शेती अमृतफलदायिनी असते, सर्व दुःखांतुन मुक्त करणारी असते."_*

_ब्राम्हण बुध्दिमान होता, पूर्व पारमीता संपन्न होता. त्याला शुध्दधर्म समजायला वेळ लागला नाही. तो म्हणाला, "आपण खरे शेतकरी आहात. आपली शेती खरेच अमृतफलदायिनी आहे." असे म्हणून त्याने भगवानांना खीर अर्पण केली. भगवानांनी तिचा अस्वीकार केला._

*_धर्मोपदेश करण्यामुळे प्राप्त भोजन अभोज्य आहे. नादान लोक भोजन दानाला धर्मोपदेशाची किंमत समजतील, ह्या उलट धर्मोपदेश अनमोल असतो. त्याचे मूल्यांकन केले जाऊ शकत नाही._*

_*कसि भारव्दाज ब्राम्हण भगवानांच्या अमृतवाणीने अतिशय प्रभावित होऊन त्यांचा अनुगामी बनला. त्याला भगवानांकडून प्रव्रज्या मिळाली, उपसंपदा मिळाली. विपश्यना करीत त्याला अरहंत अवस्था प्राप्त झाली. भाग्यशाली भारव्दाज ब्राम्हण धन्य झाला!*_

_भगवानांच्या समोर जेंव्हा कधी अंध-विश्वास व अंध-मान्यतांचे प्रसंग आले तेव्हा त्यांना दूर करण्याचाही त्यांनी सफल प्रयोग केला. जसे-_

*_(३) नदी स्नानाने पाप स्वच्छ होत नाहीत_*

_भगवानांच्या जवळ बसलेल्या सुंदरिक भारव्दाज ब्राम्हणाने जेव्हा भगवानांना हे म्हटले, "आपण गौतम! स्नानासाठी बाहुका नदीवर चलाल काय?"_

_-"ब्राम्हण! बाहुका नदीपासून काय मिळेल? बाहुका नदी काय करेल ?"_

*_-"हे गौतम! बाहुका नदी लोकमान्य आहे, खूप लोकांतर्फे पवित्र समजली जाते. पुष्कळशे लोक बाहुका नदीत आपल्या केलेल्या पापांना वाहवून देतात."_*

_तेव्हा भगवान सुंदरिक भारव्दाज ब्राम्हणाला म्हणाले *"बाहुका, गया व सुंदरिका मधेः सरस्वती, प्रयाग व बाहुमती नदीमध्येः पाप कर्म करणारा मुर्ख जरी रोज स्नान करीत असला तरी शुध्द होणार नाही. काय करेल सुंदरिका, बाहुलिका आणि प्रयाग? त्या पापकर्मी दुष्ट नरांना शुध्द करू शकत नाहीत. शुध्दकर्मीसाठी नेहमीच फाल्गून आहे, नेहमीच उपोसथ आहे. शुध्द व चांगली कर्म करणाऱ्यांची व्रते नेहमीच पूर्ण होत रहातात."*_

_भगवानांची ही शिकवण त्यांच्या जीवन काळातच साधकात प्रचलित झाली होती जी पुढे जाऊन अनेक शतकांपर्यंत संतांना प्रोत्साहित करीत राहिली. तेव्हाच समाजात ही म्हण चालू झाली *"मन चंगा तो कठौती में गंगा"..*_

_त्यांच्याबद्दल अपशब्द म्हटले गेल्यावर भगवान मौन रहायचे. परंतु जेव्हा योग्य असेल तेव्हा करूणापूर्वक त्याला धर्माचा अर्थ समजवायचे._

*_(४) पाराजिक दोष_*

_हे सर्व असतांनाही *भिक्षूसंघाच्या प्रती त्यांचे अनुशासन अत्यंत दृढ होते. अनुशासन भंग करणाऱ्यांना ते कठोर दंड द्यायचे. कारण की संघाची शुध्दता टिकवून ठेवणे आवश्यक होते.* असे कित्येक भिक्षू झाले ज्यांनी संघाच्या नियमांचे उल्लंघन केले. भगवानांनी त्यांच्या प्रती कठोर आदेश दिले. त्यांना संघातून कायमचे काढून टाकण्यात आले. *असे कार्य जे महादोष-पूर्ण होते, त्यांना पाराजिक दोष म्हटले गेले. आणि अशा दोषी व्यक्तींना कायमचे संघातून निष्कासित केले गेले.* कांही अशा दोषी भिक्षु व भिक्षुणिंनासुध्दा संघातून कायमचे ह्यामुळे काढून देण्यात आले, कारण ते ह्या अवस्थेत पोहोचल्या शिवायच स्वतःला श्रोतापन्न आणि सकदागामी घोषित करू लागले होते. *जी व्यक्ति पाराजिक दोषाची भागीदार असेल, ती संघातुन काढून टाकल्यावर कधीही भिक्षु अथवा भिक्षुणी बनू शकत नव्हती.*_

*_(५) संघादिसेस दोष_*

_तेरा प्रकारचे दोष संघादिसेस दोष म्हटले जात होते. काही भिक्षु व भिक्षुणींनी संघाच्या नियमांना तोडीत छोटे दोष केले. अशा वेळी त्यांना संघादिसेस दंड दिला गेला. परंतु आपली चूक स्वीकारल्यावर आणि क्षमा मागितल्यावर पुन्हा अशी चूक करणार नाही असे आश्वासन दिल्यावर त्यांना पुन्हा संघात घेतले जात होते. कधी कधी असेही होत होते की संघदिसेसाच्या दोषीला काही निश्चित कालावधीसाठी संघाच्या बाहेर ठेवले जात असे. त्या कालावधीत त्याने दंड भोगल्यावर त्याला परत घेतले जात असे._

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

*_लेखक :- कल्याणमित्र सत्यनारायण गोयन्का_*

*_संकलन :- महेश कांबळे_*

*_दिनांक :-_* २२/१२/२०२४

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

No comments:

Post a Comment

घट सुत्त

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_घट सुत्त_*  *_(संयुक्त निकाय)_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_47.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼...