Thursday, 19 December 2024

फलज्योतिषाचं थोतांड - १

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

*_फलज्योतिषाचं थोतांड_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2024/12/blog-post_19.html

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

*_भाग १_*

_अंधश्रध्दा निर्मूलनाच्या चळवळीमध्ये जोपर्यंत आम्ही भूत-भानामती, बुवाबाजी याच्याबद्दल बोलत असतो; तोपर्यंत लोक असं म्हणतात *'बुवा लेकाचे बदमाश असतात आणि ते लोकांना फसवतात. भूत अस्तित्वात नसतं आणि लोक उगाचच घाबरतात. भानामती म्हणजे खरं काय असतं हे अंधश्रद्धा निर्मूलनवाले शोधून काढतात, सिद्ध करतात हे चांगलेच आहे, गरजेचं आहे. मूठ मारणे, करणी, जादूटोणा असलं काही नसतं हे लोकांना कळायलाच हवं.* परंतु ज्यावेळेला आम्ही असं म्हणतो की, 'फलज्योतिष हे शास्त्र नाही. फलज्योतिष हे थोतांड आहे. त्यावेळेला लोक म्हणतात, 'आता तुमची चळवळ बिघडली. आणि मग वेगवेगळ्या प्रकारे ते पटवून देण्याचा प्रयत्न करतात की, फलज्योतिष हे शास्त्र कसं असू शकेल? त्यामध्ये तीन मुद्दे महत्त्वाचे असतात._

१. _एक तर फलज्योतिषाला भारतामध्ये आणि जगामध्ये फार मोठा इतिहास आहे. ते फार प्राचीन आहे._

२. _दुसरं म्हणजे दिल्लीपासून गल्लीपर्यंत सर्व लोक ज्योतिष बघतात_

३. _आणि तिसरा मुद्दा आहे की, तुमचा जर स्वतःचा ज्योतिषाचा अभ्यास नाही; तर फलज्योतिष हे शास्त्र आहे का नाही याच्यावर बोलण्याचा तुमचा अधिकारच काय?_ 

_आता तिन्ही मुद्द्द्यांचा थोडक्यात परामर्श घेतला, तर आपल्याला काय दिसेल?_

_*ज्योतिष समर्थकांचे तीन मुद्दे*_

_*आकाशस्थ ग्रहगोलांचं निरीक्षण करण्याची परंपरा खूप प्राचीन आहे. इ. स. पूर्व ४२०० वर्षापूर्वी बॅबिलॉन संस्कृतीमध्ये ग्रह-ताऱ्यांच्या भ्रमणाच्या नोंदी करणं चालू झालं.* शतकानुशतकं आकाशस्थ ग्रहगोलांचं निरीक्षण केल्यानंतर अमावास्या किंवा पौर्णिमा केव्हा येणार, ग्रहण केव्हा लागणार, धूमकेतू कधी दिसणार, आकाशामध्ये कोणत्या पद्धतीचे तारे दिसल्यानंतर ऋतू बदलणार याबद्दलचे काही निष्कर्ष त्या माणसांनी काढलेले होते. त्यामुळे आकाशामध्ये विशिष्ट ग्रहगोल दिसू लागले की त्याच्यानंतर थोड्याच दिवसांनी पाऊस पडेल, नाईल नदीचा सुपीक गाळ तिच्या दोन्ही तीरांवर पसरेल, पेरणीला अनुकूल अवस्था प्राप्त होईल, त्यामुळे शेतीच्या कामाला आता प्रारंभ करणे योग्य ठरेल असं त्यावेळचे ज्योतिर्विद्याविशारद लोकांना संगित असत. *म्हणजे शेकडो वर्ष ग्रहगोलांच्या केलेल्या निरीक्षणावरनं एक निर्माण झालेलं अनुमान या स्वरूपामध्ये ते त्यावेळेला होतं. कारण एकाच वेळेला फलज्योतिषामध्ये ॲस्ट्रॉनॉमी म्हणजे खगोलशास्त्र, मॅथेमॅटिक्स म्हणजे गणित, ॲस्ट्रॉलॉजी म्हणजे भविष्य या तिन्ही गोष्टी त्याच्यामध्ये होत्या.* परंतु जसजसा *मानवी संस्कृतीमध्ये विज्ञानाचा इतिहास वाढत गेला. तसतसं स्वाभाविकपणेच मानवी इतिहासामध्ये गणिताला पुढं शास्त्र म्हणून मान्यता मिळाली, खगोलशास्त्राला शास्त्राचा दर्जा मिळाला; परंतु फलज्योतिषाला तसा कोणताच आधार नव्हता. त्यामुळे त्याची पंचाईत झाली.* परंतु *तोपर्यंत ज्योतिषी आणि त्याचे हितसंबंधी तयार झाले होते आणि दुसऱ्या बाजूला दुबळ्या मनाला सतत लागणारा आधार पुरवण्यासाठी आभास निर्माण करण्यामध्ये ज्योतिषी यशस्वी झाले होते. यामुळे काही लोक स्वतःला ज्योतिर्विद्याविशारद म्हणत, काही ज्योतिर्भास्कर म्हणत, कोणी ज्योतिष्मती समजत.* ही सगळी माणसं वेगवेगळ्या प्रकारे भविष्य बघत असतात. काहीजण कुंडलीवरून, काहीजण हातावरून, काही अंगठ्याच्या ठशावरून, काही आकडेमोड करून तर काहीजण स्फटिकाच्या लोलकात, काजळाच्या डबीत बघूनही भविष्य सांगतात. अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे ज्योतिष सांगण्याची कला निर्माण झाली होती आणि या सगळ्यांना मजबूत आर्थिक फायदा आणि त्याबरोबर प्रतिष्ठा प्राप्त झालेली होती. स्वाभाविकच ज्योतिष या कलेमध्ये लोकांचे हितसंबंध तयार झाले होते._

_दुसरा आक्षेप असा की, दिल्लीपासून गल्लीपर्यंत लोक ज्योतिष बघतात, ते खोटे कसे? आता एखादी गोष्ट लोक दिल्लीपासून गल्लीपर्यंत करतात, म्हणजे ती चांगली किंवा योग्यच असं थोडंच सिद्ध होतं? दिल्लीपासून गल्लीपर्यंत लोक प्रचंड प्रमाणात गुटखा खातात; म्हणून गुटखा हा आरोग्याला उपकारक आहे, असं होत नाही. आणि सगळीकडं दिल्लीपासून गल्लीपर्यंत मद्यपान करतात; म्हणून मद्याचा फायदा शरीराला होतो, असा त्याचा अर्थ निघत नाही. *सर्वच लोक आहारी गेले म्हणून 'ज्योतिष हे शास्त्र आहे' असा कुठलाच संकेत प्राप्त होत नाही. एखादी गोष्ट शास्त्र आहे का नाही याचे वेगळे नियम असतात. आणि ते निकष ज्यावेळेला ज्योतिष पार पाडेल, त्याचवेळी ज्योतिष हे शास्त्र आहे की नाही हे मान्य करण्याबाबत ठरेल.*_

_मग तिसरा मुद्दा पुढं केला जातो. एखादा डॉक्टर असेल आणि त्यानं एका विशिष्ट रोगाचं निदान सांगितलं. आपण ते मानतो. याचं कारण त्याला वैद्यकीय शास्त्राचा अनुभव असतो. आपल्याला जर वैद्यकीय शास्त्रातलं काही कळत नसेल, तर आपण त्याच्याबद्दल बोलू नये. - हे जसं खरं; तसंच आपल्याला जर किंवा तुम्हाला जर फलज्योतिष या शास्त्रातलं काही कळत नसेल, तर तुम्ही त्याबद्दल का बोलता? हा वरवर बिनतोड वाटणारा मुद्दा आहे. आपण लक्षात हे घेतलं पाहिजे की हा मुद्दा अजिबात बरोबर नाही. याचं कारण असं की, ज्योतिष हे शास्त्र आहे हा यातला गृहीत भाग. यातलं पहिलं विधान मुळात खरं नाही. उद्या तुम्ही मला असं विचारलं, *'करणी करणं, मूठ मारणं, जादूटोणा करणं, भानामती करणं याच्याबद्दल तुम्ही बोलत असता, त्याला आव्हान देत असता; परंतु ही एक प्रकारची काळी जादू आहे. Black Magic आणि तुमचा तिचा अभ्यास नाही, तर तुम्ही त्याला कशाच्या आधारे आव्हान देता?' आम्ही त्याला आव्हान देतो; कारण आम्हांला स्पष्ट दिसतं की विज्ञानाचे सारासार असलेले नियम एका बाजूला आणि या स्वरूपाची काळी विद्या दुसऱ्या बाजूला याच्यामध्ये कोणताच ताळमेळ असू शकत नाही. जसा फलज्योतिषाच्या बाबतीत देखील दावा करणारे ज्योतिषी दाखवू शकत नाहीत. याच्यामुळे या तीन गोष्टींच्यासाठी आपल्याला फलज्योतिष शास्त्र का नाही हे अधिक तपशीलाने समजावून घ्यावे लागते.*_

*_क्रमशः_*

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

*_संदर्भ :- श्रद्धा आणि अंधश्रद्धा_*

*_लेखक :- डॉ नरेंद्र दाभोलकर_*

*_संकलन :- महेश कांबळे_*

*_दिनांक :-_* १९/१२/२०२४

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹




फलज्योतिषाची तीन गृहितकं


शास्त्र म्हणजे काय? शास्त्र म्हणजे तर्काला धरून केलेलं एखादं विधान. जे निरीक्षण, परीक्षण, काटेकोर तर्क, गणित, प्रत्यक्ष प्रचिती, प्रयोग याच्याआधारे सिद्ध करता यावं लागतं. हे जे मुक्त तर्काला धरून केलेलं विधान असतं याला आपण 'गृहीत कृत्य, हायपोथेसिस' असं म्हणतो. कुठलंही विधान तुम्ही करू शकता. हे करण्याचा तुम्हाला अधिकार आहे. मात्र ते विधान तुम्हाला सिद्ध करावं लागतं. फलज्योतिषाचं गृहीत काय आहे? असं तुम्ही जर ज्योतिषांना विचारलं, तर ते तुम्हांला कधीच सांगणार नाहीत. कारण त्यांना ते माहीतच नाही. परंतु फलज्योतिषाचं गृहीतक काय असावं, हे मी तुम्हाला सांगतो. आणि हे मी तुम्हाला एक शास्त्राचा विद्यार्थी म्हणून सांगतो. ते तुम्हाला पटेल, याची मला खात्री आहे. तीन गोष्टी या गृहीतकामध्ये गृहीत धरल्या आहेत. पहिली गोष्ट आकाशस्थ ग्रहगोलांचा परिणाम मानवी जीवनावर सतत होत असतो, दुसरी गोष्ट माणसाच्या जन्मवेळेवर तो परिणाम अवलंबून असतो आणि तिसरी गोष्ट याच्यामुळे माणसाचं भविष्य ठरतं किंवा बदलतं. म्हणजे तीन गोष्टींच्या आधारे ज्योतिष बघितलं जात असतं. यापैकी प्रत्येक गोष्ट जर आपण तपासली, तर शास्त्र म्हणून ज्योतिषाला जो दर्जा दिला जातो किंवा दिला जावा असा आग्रह धरला जातो, त्यापुढची वस्तुस्थिती स्पष्ट होईल.


ग्रहगोलांबाबत वस्तुस्थिती


आकाशस्थ ग्रहगोलांचा आपल्या जीवनावर अखंड परिणाम होत असतो, असे मानले जाते. आपला जो सूर्य ग्रह आहे या सूर्य ग्रहाचा विशेष परिणाम आपल्यावर होत असतो. या सूर्यकुलामध्ये असलेल्या ग्रहांचा जास्त आणि नंतर आकाशस्थ असलेली नक्षत्रं, राशी यांचा प्रभाव होत असतो. यांच्याआधारे व्यक्तीचं भविष्य वर्तवता येतं, अशी कल्पना आहे. आता ज्या ग्रहगोलांच्याबद्दल ही चर्चा केली जाते त्या ग्रहगोलांची परिस्थिती काय आहे?


खरं म्हटलं तर त्याच्यापैकी चंद्र हा ग्रह नाहीच. तो उपग्रह आहे पृथ्वीचा. आणि तो उपग्रह असताना जर त्याला आपल्या सूर्यकुलात स्थान असेल तर मग आपल्या

No comments:

Post a Comment

कोलित सुत्त

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_कोलित सुत्त_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_41.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼  _'कोलित सुत...