✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹
*_भिक्षुणी संघाचे विनय_*
https://mikamblemahesh.blogspot.com/2024/11/blog-post_12.html
✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹
_राजगृहातील वैभारगिरीच्या सप्तपर्णी गुहेत सम्राट अजातशत्रू यांच्या आश्रयाखाली महाकास्सप यांच्या अध्यक्षतेखाली ५०० अर्हंत भिक्खुंनी प्रथम धम्म संगितीचे आयोजन केले होते. ह्या संगितीत "विनय आणि धम्म" यांचे संगायान ७ महिने सुरू होते._
_आनंद सांगतात की, “शास्ता अंतिम वेळी मला आणि तुम्हाला उद्देशूनच म्हणाले होते-_
*_"ये वो आनंद ! मयाधम्मोच विनयोच, देसितो पञ्जतो सो वो ममच्चयेन सत्था' ति ।"_*
*_"आनंद ! मी तुम्हाला ज्या धम्म आणि विनयाचा उपदेश दिला, प्रज्ञाप्रकाश केला तोच माझ्या महापरिनिर्वाणानंतर तुमचा शास्ता असेल."_*
_महाकाश्यप इतर भिक्षुंशी चर्चा करतांना म्हणतात की, , "आवुसो ! भगवंतास आपणासाठी शिक्षाप्रज्ञप्ति (विनयपद) करण्याची आवश्यकता नव्हती. कारण आपला भिक्खू संघ स्वय स्वाभाविक, विमलतामयी स्थितीत होता. सुविसुद्ध शखलिखित बह्मचर्य भिक्खू संघात परिपूर्णतानुरूप मूर्तिमन्त होते किंवा आहे. पण काही वर्षांपूर्वी आपण पाहत आलो आहोत की, *भगवंताची अनुकपा साधून सधीसाधु, अयोग्य व्यक्तिपण प्रव्रजित होऊ लागले आणि म्हणून तथागतास संघीय नियमाची आवश्यकता भासली व त्यासाठी विनयपदाची निर्मिती झाली.*_
_ह्या *संगितित धम्म भंते आनंद आणि विनय भंते उपाली यांनी सांगितला होता.* त्यामधील भिक्षुंनी संघासाठी जे विनय सांगितला होता त्याची तोंडओळख आपण ह्या लेखात करणार आहोत._
_तथागतांनी भिक्खूणींसाठी ३११ विनय नियम बनवले होते._
१. पाराजिका -८
२. संघादिसेस-१७
३. निस्सग्गिय पाचित्तिय-३०
४. पाचित्तिय-१६६
५. पाटिदेसनिय-८
६. सेखिय-७५
७. अधिकरणसमथ-७
*_असे ३११ नियमांचे भिक्खूणींना पालन करावे लागत होते._*
*_१ पाराजिक_*
_हे आठ पाराजिक धर्म आहेत, अपराध आहेत, जे केल्यामुळे भिक्षुणी भिक्षुणी राहू शकत नाही. अशा भिक्षुणीला संघातून काढून देण्यात येते. ती प्रव्रजिताच्या योग्य राहत नाही. भिक्षुणी जीवनात पराजित होते._
_ते दोष आहेत -_
१. *मैथून*
२. *चोरी*
३. *मनुष्य हत्त्या*
४. *दिव्यशक्तीचा दावा करणे जी अंगी नसते*
५. *कामासक्तीचे कार्य*
६. *दोष लपविणे*
७. *संघातून काढून टाकल्यावरही त्याचे अनुगमन करणे*
८. *कामासक्तिने पुरुषाचा स्पर्श करणे.*
_हे आठ पाराजिक दोष म्हणविले गेले आहेत. *ह्यामधून एकही केल्यास भिक्षुणी भिक्षुणीसह राहू शकत नाही. ती भिक्षुणीच्या लायकीची राहत नाही, ती झाडाचा वरचा भाग छाटल्यासारखी होते.*_
*_२ संघादिसेस (९ ते २५)_*
हे १७ दोष संघादिसेस म्हणविल्या जातात. ह्या अपराधाच्या दण्डामुळे काही काळापुरते संघापासून वेगळे-एकटे रहावे लागते.
१. *पुरुषाबरोबर फिरणे*
२. *चोरटी किंवा वांझेला भिक्षुणी बनविणे*
३. *एकटीच कुठेही घुमो, गाव सोडून नदीवर रात्री, आपला साथीदार सोडून इत्यादी*
४. *संघातून निष्कासित भिक्षुणीबरोबर संघाच्या अनुमतीशिवाय मैत्री करणे*
५. *कामासक्तीने पुरुषाचे दान घेणे*
६. *कामासक्तीकडे जाण्याची प्रेरणा देणे*
७. *कुटीणी होणे*
८. *उगीचच एखाद्या भिक्षुणीला पाराजिकाचा दोष लावणे*
९. *नाराज मनाने पूर्वशत्रूता मनात ठेवून एखाद्या भिक्षुणीला पाराजिका दोषारोपण करणे*
१०. *धर्माचे प्रत्याख्यान करणे अथवा दुसऱ्या धर्माच्या श्राविकेबरोबर सहवास करणे*
११. *भिक्षुणी- भिक्षुणीत एकमेकींची निदा करणे*
१२. *निदित, बदनाम, दुराचारिणीच्या ससर्गात राहणे*
१३. *वाईट संसर्गात राहण्याची प्रेरणा देणे*
१४. *सघात फुट पाडणे*
१५. *धम्मभेद करणारी असूनही तिला धम्मभेदीनी न मानणे*
१६. *चांगली गोष्ट न ऐकणे*
१७. *कुळांना बिघडविणे*
_हे सतरा संघादिसेस आहेत *त्यातील नऊ प्रथम (बारहित) दोष मानले आहेत. आठ तीन वेळा म्हणून विचारल्यावर संघादिसेस दोष मान्य केल्या जातील.* ह्यातील कोणताही एक अपराध भिक्षुणी करील तर ती भिक्षुणी (भिक्षु भिक्षुणी) दोघेही पक्ष भर मानत्व करतील. *मानत्व पूर्ण झाल्यावर जिथे वीस भिक्षुणींचा भिक्षुंणी संघ असेल, त्या ठिकाणी जाऊन त्या संघात वीसला एक जरी कमी असेल आणि त्या संघाने त्या भिक्षुणीला अपराधमुक्त केले तरी ती भिक्षुणी मानल्या जाणार नाही आणि त्या संघातील सगळ्या भिक्षुणी निंदेच्या पात्र राहतील. ही ह्या दोषमुक्तीची योगक्रिया आहे.*_
*_३ निस्सग्गिय पाचित्तिय (२६ ते ५५)_*
_तीस (३०) अपराधांना निस्सग्गिय पाचित्तिय म्हणतात. ह्या तीस अपराधांना तीन भागांत विभाजित केले आहे._
१. _पहिला भाग *पत्त वग्ग* आहे. ह्या वग्गात भिक्षापात्राचा संचय करणे, चीवर घेऊन पुन्हा बदलणे, चीवराला समयानुसार न वाटणे, एका वस्तुला अगोदर मागून लगेच दुसऱ्या वस्तुलापण मागणे, असे १० अपराध ह्यात येतात._
२. _दुसरा भाग *चीवर वग्ग* आहे. ह्या वग्गात हिवाळ्यातील पांघरण्याच्या वस्त्रासाठी योग्य दाम न मागता जास्त मागणे, कठीण चीवराचे सर्वांना वाटप करून पुन्हा उरलेले चीवर आपल्याजवळ ठेऊन देणे यासारखे १० अपराध ह्यात येतात._
३. _तिसरा भाग आहे *जातरूप वग्ग* ह्या वग्गात चांदी-सोनं, रुपये-पैशांचा व्यवहार करणे, क्रय-विक्रय करणे, नेहमी नेहमी भिक्षापात्र बदलत राहणे (जरी ते फुटले अथवा तुटले नसले तरीही), भैषज्य म्हणजे अर्थात रोगी भिक्षुणीच्या सेवनासाठी लागणारे पथ्य (भैषज्य म्हणजे तूप, लोणी, तेल, मधु (मध, खांड इत्यादी घेऊन) कमीत कमी एक आठवडाभर ठेवून खायला पाहिजे, पण त्यापेक्षा जास्त दिवस ठेवणे, स्वतः दुसऱ्या भिक्षुणीला चीवर देऊन नाराज होऊन ते चीवर हिसकावून घेणे, स्वतः सूत घेऊन विणकरा सुगत कडून चीवर विणून घेणे, त्याच भिक्षुणीला एखादा नवखा गृहस्थ किवा गृहिणी विणकराकडून चीवर विणून देत असेल तेव्हा ती भिक्षुणी त्या चीवराला घेण्याअगोदर विणणाऱ्या विणकराच्या घरी जाऊन चीवरात हेरफेर करायला लावणे._
_कार्तिकी, त्रैमासी, पौर्णिमा येण्यापूर्वी दहा दिवसात जर चीवर पाचाहून अधिक मिळाल्यास ते चीवर अधिक समजून घेऊन ठेवावे (चीवर कालपर्यंत) त्यापेक्षा जास्त वेळ ठेवल्यास *निस्सग्गिय पाचित्तियचा* अपराध होतो. ह्या वग्गात १० अपराध येतात._
_*संघासाठी दिलेल्या वस्तु आपणासाठीच परिवर्तित करून ठेऊन देणे सुद्धा निस्सग्गिय पाचित्तियचा अपराध होतो. हे अपराध स्वीकृती झाल्याबरोबरच त्याचे प्रायश्चित्त (पश्चात्ताप) करावे लागते. तसेच ज्या वस्तुबद्दल अपराध केलेला असतो, ती वस्तुपण त्या भिक्षुणीजवळून हिसकून घेतल्या जाते.*_
*_४ पाचित्तिय (५६ ते २२१)_*
_*हे एकुन एकशे सहाषष्ट (१६६) दोष आहे, ज्यांना 'पाचित्तिय' म्हणतात.* ह्या दोषात दोषी भिक्षुणीला प्रायश्चित्त (पश्चात्ताप) केल्यानंतर ती दोषमुक्त होऊ शकते. *एकशे सहाषष्ट (१६६) दोषाला सोळा भागात विभाजित केले आहेत. म्हणजे ते सोळा प्रकारचे आहेत.*_
१. _*ह्यात पहिला भाग 'लसूण वग्ग' आहे.* ह्या वग्गात एकपासून दहापर्यंत (१-१०) पाचित्तिय आहेत. ते सहा प्रकारचे आहेत._
(१) _लसूण खाणे_
(२) _कामासक्तीचे कार्य करणे_
(३) _भिक्षूची सेवा करणे_
(४) _कच्चे सुगत धान्य आणून शिजविणे_
(५) _लघवी आणि सण्डाससबधी-सडास कचऱ्यात किवा गवतात करणे_
(६) _नाच, गाणे, वाद्य पाहणे, ऐकणे_
२. _*दुसरा वग्ग आहे 'रत्तन्धकार वग्ग'* ह्यात १० पाचित्तिय आहेत. ते पाच प्रकारचे आहेत_
(१) _पुरुषाबरोबर रात्री अधारात उभे राहून बोलणे_
(२) _गृहस्थाच्या घरात जाऊन (कधीही) बसणे_
(३) _भिक्षुणीला दिक् करणे_
(४) _श्राप देणे (शाप)_
(५) _ऊर बडवून रडणे_
३. _*तिसरा 'नग्ग वग्ग' आहे ह्यात १० पावित्तिय दोष आहेत.* ते दोन प्रकारचे आहेत._
(१) _नग्न होऊन अंघोळ करणे_
(२) _चीवरासबंधी अयोग्य वेळी वापरणे_
४. _*चौथा 'तुवट्ठ वग्ग' आहे ह्यात १० पाचित्तिय दोष आहेत* ते पाच भागात वाटले आहेत_
(१) _एका खाटेवर दोघीजणी (भिक्षुणी) झोपणे_
(२) _हैराण करणे (त्रास देणे)_
(३) _रोगी शिष्याची सेवा न करणे_
(४) _उपाश्रय देऊन काढणे_
(४) _पुरुष ससर्ग करणे_
(५) _एकटीच कुठेही विचरण करणे_
५. _*पाचवा 'चित्तागार वग्ग' आहे. ह्यात १० पाचित्तिय दोष असून त्याचे सहा प्रकार आहेत.*_
(१) _तमाशा पाहणे_
(२) _खुर्ची किंवा पलंगाचा वापर करणे_
(३) _सूत कातणे_
(४) _गृहस्थासारखे काम करणे_
(५) _गृहस्थाला भोजन देणे_
(६) _विहारातील चीवराची बेपर्वा करणे_
६. _*सहावा 'आराम वग्ग' आहे. ह्यात १० पाचित्तिय दोष आहेत व त्याचे आठ प्रकार आहेत.*_
(१) _भिक्षुच्या आरामात (झोपण्याचे ठिकाण) प्रवेश करणे_
(२) _निंदा करणे_
(३) _जेवण करून तृप्त झाल्यावर पुन्हा जेवण करणे_
(४) _गृहस्थाचा द्वेष करणे_
(५) _भिक्षु नसेल तेथे वर्षावास करणे_
(६) _प्रवारणाचे नियम न पाळणे_
(७) _उपदेशाला ऐकायला किवा विचारावयास न जाणे_
(८) _पुरुषाकडून फोड फोडणे_
७. _*सातवा 'गाब्भिनी वग्ग' आहे ह्यात १० पाचित्तिय दोष आहेत व ते एकच प्रकारचे आहे, ज्यात भिक्षुणी कशी बनवावी ह्याबद्दल विवरण आहे, तिच्या प्रतिचे कर्तव्य न पाळणे.*_
८. _*आठवा 'कुमारिभूत वग्ग' आहे. ह्यात १३ पाचित्तिय दोष आहेत आणि ते नवक कुमारी भिक्षुणी बनविणे व तिच्या प्रतिचे कर्तव्य न पालन करणे.*_
९. _*नववा वग्ग 'छत्त वग्ग' आहे आणि त्यात १३ पाचित्तिय दोष असून ते चार प्रकारचे सांगितले आहेत.*_
(१) _छत्री, जोडा (जूता) आणि सवारीबद्दल आहेत_
(२) _आभूषण, श्रृंगार आणि नटण्या-थटण्याने आहेत_
(३) _भिक्षुपुढे आसनावर बसणे आणि प्रश्न विचारणे_
(४) _चोळी न वापरता गावात फिरणे_
१०. _*दहावा 'मुसावाद वग्ग' आहे आणि त्यात १० पाचित्तिय दोष असून ते सहा प्रकारचे सागितले आहेत.*_
(१) _भाषणाची अनियमता_
(२) _उपसंपन्न भिक्षुणीबरोबर एकसाथ झोपणे_
(३) _धर्मोपदेशात अनियमितता_
(४) _दिव्य शक्तिप्रदर्शन करणे_
(५) _अपराध प्रकाशन_
(६) _जमीन खणणे_
११. _*अकरावा 'भूतगाम वग्ग' हत्रात १० पाचित्तिय दोष असून ते पाच प्रकारचे आहेत.*_
(१) _वृक्ष तोडणे_
(२) _संघाच्या विचारल्यावर चूप राहणे_
(३) _निंदा व बदनामी करणे_
(४) _संघाच्या वस्तुची बेपर्वा करणे_
(५) _गाळलेले पाणी न पिणे_
१२. _*बारावा 'भोजन वग्ग' आहे ह्यात दहा पाचित्तिय दोष असून ते भोजनासंबधी आहेत.*_
१३. _*तेरावा 'चरित्त वग्ग' आहे. ह्यात १० पाचित्तिय दोष आहेत आणि ते तीन प्रकारचे आहेत.*_
(१) _सैनिक तमाशा पाहणे_
(२) _मद्यपान करणे_
(३) _हसी-मजाक करणे_
१४. _*चौदावा 'ज्योति वग्ग' आहे. ह्यात ९ पाचित्तिय दोष आहेत आणि ते सहा प्रकारचे आहेत.*_
(१) _आग तापणे_
(२) _स्नानाचे नियम तोडणे_
(३) _चीवर पात्राचे नियम तोडणे_
(४) _प्राणिहिंसा करणे_
(५) _झगडा वाढविणे_
(६) _चोराबरोबर यात्रा करणे_
१५. _*पंधरावा 'दिठ्ठि वग्ग' आहे. ह्यात ११ पाचित्तिय दोष असून ते सहा प्रकारचे सांगितले आहेत.*_
(१) _वाईट धारणा धरणे_
(२) _धार्मिक गोष्टीला अस्वीकारणे_
(३) _पातिमोक्षातील नियमांचे उल्लघन करणे_
(४) _मारणे किंवा धमकी देणे_
(५) _संघादिसेसाचे दोषारोपण करणे_
(६) _भिक्षुणीची दिक् करणे (सदेह करणे)_
१६. _*सोळावा 'धम्मिक वग्ग' आहे ह्यात १० पाचित्तिय दोष आहेत व ते सहा प्रकारचे सांगितले आहेत.*_
(१) _मताचा दुरुपयोग करणे_
(२) _सांघिक लाभ आपलाच म्हणणे (स्वार्थी होणे)_
(३) _मौलिक वस्तु हडपणे_
(४) _सूचीघराला तोडणे_
(५) _अयोग्य चौकी किंवा चारपाई तयार करणे_
(६) _वस्त्राचा दुरुपयोग करणे_
*_५. पाटिदेसनिय (२२२ ते २२९)_*
_*आठ दोषाला पाटिदेसनिय दोष म्हणतात. खाण्याच्या वस्तुला विशेषकरून मागून खाणे*_
१. _*जी भिक्षुणी निरोगी असून तूप मागून खाते, तिला प्रतिदेशना करावयास पाहिजे.*_
२. *_जी निरोगी असून दही, तेल, मध, लोणी, मासळी, मांस, दूध मागून खाते, तिला प्रतिदेशना करावयास पाहिजे.*_
_त्या भिक्षुणीने सर्वांसमोर म्हणावयास पाहिजे आर्ये! मी निंदनीय, अयुक्त, प्रतिदेशना करण्यासारखे कार्य केले आहे, म्हणून मी त्यासाठी प्रतिदेशना करते. आर्यानो ! हे आठ पाटिदेसनिय दोष म्हणविल्या जातात._
*_६ सेखिय (२३० ते ३०४)_*
_*हे पंचाहत्तर (७५) सेखिय म्हणजे शिकण्यासारख्या गोष्टी आहेत. हे सात वग्गात विभाजित केल्या आहेत.*_
१. _*परिमंडळ वग्ग-* ह्यात चीवर कसे वापरावे ह्याबद्दल शिकविले आहे. तसेच गृहस्थाच्या घरी कसे जायचे, बसायचे, पहायचे हे शिकविले आहे._
२. _*उज्जग्धिक वग्ग* ह्या वग्गात गृहस्थाच्या घरात गेल्यावर न मोठमोठ्याने हासत जाणे, न चूपचाप जाणे यासारखे १० शिकवणूकीच्या गोष्टी आहेत._
३. _*खम्भक वग्ग* ह्या वग्गात भिक्षान्न आणि जेवण कसे करावयाचे ते शिकविले आहे. सत्कारपूर्वक, पात्राकडे लक्ष ठेऊन, मतानुसार जेवण करणे._
४. _*सक्कच्च वग्ग* ह्या वग्गातही जेवण्याबद्दलच शिकविले आहे._
५. _*कबळ वग्ग* हयातही जेवण्याच्या पद्धती शिकविल्या आहेत. जसे मचमच तोंड न वाजवणे, मोठे तोड न फाडणे, जेवण करता न बोलणे, तोड भरून न खाणे, उष्टे न टाकणे, जीभ न चाटणे इत्यादी._
६. _*सुरू सुरू वग्ग* हयात जेवण आणि उपदेश ह्याबद्दल शिकविले आहे. जसे फुरका मारून न खाणे, हात व बोटे चाटून न खाणे, पात्र चाटून-पुसून न खाणे, ओठ चाटून न खाणे, उष्ट्या हाताने पाणी न पिणे, पात्र न धुऊ देणे तसेच उपदेशाबद्दल सागितले आहे की, हातात छत्री, दंडा, शस्त्र, आयुध धारण करून निरोगी व्यक्तिला धर्म न सांगणे._
७. _*पादुका वग्ग* ह्यात खडाऊ घालून, जोडे घालून, सवारीवर बसलेल्या अंथरूणावर पडलेल्या, पालथी मारून बसलेल्या, डोके बांधून टोपी घालून, आसन उंच असलेल्या निरोगी व्यक्तिला धर्माचा उपदेश न करणे तसेच निरोगी भिक्खुणीने उभ्याने लघवी व संडास करू नये, गवतात लघवी करू नये, पाण्यात लघवी अथवा संडास करू नये._
*_७ अधिकरण समथ (३०५ ते ३११)_*
_*वेळोवेळी निर्माण होणाऱ्या भांडणाच्या निवारणासाठी हे सात अधिकरण समथ सांगत आहे.*_
*_भांडण मिटविण्याचे उपाय_*
१) _सन्मुख विनय दिला पाहिजे._
२) _स्मृति विनय दिला पाहिजे._
३) _अमूढ विनय दिला पाहिजे._
४) _प्रतिज्ञाकरण (स्वीकार) केले पाहिजे._
५) _यद्भूयसिक._
६) _तत्पापियसिक_
७) _तिणवत्थारक_
सारांश रुपाने
१. _(१ ते ८) आठ पाराजिक दोष आहेत._
२. _(९ ते २५) सतरा संघादिसेस दोष आहेत._
३. _(२६ ते ५५) तीस निस्सग्गिय पाचित्तिय दोष आहेत._
४. _(५६ ते २२१) एकशे सहाषष्ठ पाचित्तिय दोष आहेत._
५. _(२२२ ते २२९) आठ पाटिदेसनिय दोष आहेत._
६. _(२३० ते ३०४) पचाहत्तर सेखिय गोष्टी आहेत._
७. _(३०५ ते ३११) सात अधिकरण समथ आहेत._
✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹
*_लेखन :- महेश हरिश्चंद्र कांबळे_*
*दिनांक :-* १३/११/२०२४
*_संदर्भ:-_*
१. *विनय पिटक - पातिमोक्ख - भिक्खुणी पातिमोक्ख*
🙏🙏🙏 *_भवतु सब्ब मङ्गलं_*🙏🙏🙏
🙏🙏🙏 *_नमो बुद्धाय_*🙏🙏🙏
✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹
No comments:
Post a Comment