Wednesday, 31 July 2024

पराप्राकृतिक शक्तीवर श्रद्धा म्हणजे अधम्म

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_अधम्म म्हणजे काय?_*

_*१. परप्राकृतिक शक्तीवर श्रद्धा म्हणजे अधम्म*_

*_(क्रमशः)_*

*_!! ॐ मणी पद्मे हूँ !!_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2024/07/blog-post_31.html

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

               _जेव्हा केव्हा एखादी घटना घडते तेव्हा ती कशी घडली? ती घडण्याचे कारण काय? हे जाणून घेण्याची जिज्ञासा ही माणसाची स्वाभाविक प्रवृत्ती आहे. बरेचदा कारण आणि फलित होणारे कर्म एक दुसऱ्याच्या इतके निकट असतात की, त्या कर्माचे कारण जाणून घेणे फारसे कठीण जात नाही. परंतु काही वेळा कारण आणि फलित होणारे कर्म एक दुसऱ्यापासून इतके दूर असतात की, कर्माचे कारण जाणून घेणे कठीण होते. सकृतदर्शनी या परिणामाचे कारणच नाही असे वाटते._ 

_*तेव्हा प्रश्न उपस्थित होतो की, ही घटना कशी घडली त्याचे सर्वसामान्य उत्तर असे की, ही घटना परप्राकृतिक कारणांचा परिणाम होय. यालाच बरेचदा चमत्कार म्हटले जाते.*_

_बुद्धांच्या पूर्ववर्तीनी या प्रश्नांची विविध उत्तरे दिली._

१. _पक्कुद कच्चान म्हणतो, प्रत्येक कार्याला कारण असतेच असे नाही. त्याच्या मते घटना कारणाविना स्वतंत्रपणे घडत असतात._

२. _मख्खली घोषाल हे मान्य करतो की, घटनेला कारण असते, परंतु तो असा प्रचार करीत होता की, हे कारण दैव यासारख्या घटकात शोधले पाहिजे._

*_बुद्धांनी या सिद्धांताचे खंडन केले. त्यांनी हे ठामपणे प्रस्थापित केले की, प्रत्येक घटनेला कारण असतेच. हे कारण नैसर्गिक प्राकृतिक नियमांचा परिणाम तरी असते किंवा मानवीय कर्माचा परिणाम तरी असते._*

_काल, प्रकृती आणि आवश्यकता इत्यादींना घटनांचे कारण म्हणून स्वीकारण्यास त्यांचा विरोध होता. त्याचे स्पष्टीकरण असे. जर काल, प्रकृती, आवश्यकता आदी तत्त्वे घटना घडण्याचे एकमात्र कारण असतील तर आम्ही कोण आहोत? आमचे प्रयोजन काय ? मनुष्य काल, प्रकृती, आकस्मिकता, ईश्वर, देव, आवश्यकता आदींच्या हातातील केवळ कळसूत्री बाहुली आहे काय ?_

*_मानव मुक्त नसेल तर त्याच्या अस्तित्वाचे प्रयोजनच काय? परप्राकृतिक कारणावर त्याची श्रद्धा असेल तर त्याच्या बुद्धिवंत होण्याचे प्रयोजन काय?_*

_जर मानव मुक्त असेल तर प्रत्येक घटना ही त्याच्या कृतीत परिणाम असावयास पाहिजे. कोणतीही घटना अशी असू शकत नाही की, त्याला परप्राकृतिक कारण असेल. ही शक्यता आहे की, *एखादी घटना घडल्यानंतर त्या पाठीमागचे खरे कारण शोधणे माणसाला शक्य झाले नसेल. परंतु मनुष्य बुद्धिवंत असेल तर एक ना एक दिवस त्या कारणांचा शोध घेईलच.*_

_परप्राकृतिक वादाचे खंडन करण्यात बुद्धांचे तीन हेतू होते._ 

१. _त्यांचा प्रथम हेतू माणसाला विवेक पथावर अग्रेसर करणे हा होता._

२. _त्यांचा द्वितीय हेतू माणसाला सत्य शोधण्यासाठी मुक्त करणे हा होता._ 

३. _त्यांचा तृतीय हेतू मिथ्या विश्वास, अंधश्रद्धेच्या प्रमुख कारणांचा समूळ उच्छेद करणे हा होता. कारण मिथ्या विश्वास, अंधश्रद्धा या मानवाच्या सत्य शोधण्याच्या प्रवृत्तीची हत्या करतात._

*_याला बुद्ध धम्मात कर्म सिद्धांत किंवा हेतुवाद म्हणतात. कर्म सिद्धांत किंवा हेतुवाद हा बौद्ध धम्माचा केंद्रीय सिद्धांत आहे. हा सिद्धांत विवेकवादाचा पुरस्कार करतो आणि बौद्धधम्म म्हणजे विवेकवादाशिवाय दुसरे काहीही नाही. म्हणून परप्राकृतिक शक्तीची उपासना म्हणजे अधम्म होय._*

*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 

*_संकलन - महेश कांबळे_*

*_दिनांक :- ०१/०८/२०२४_*

*_संदर्भ :-_*

_*१) भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म, तिसरा खंड भाग ४*_

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 

No comments:

Post a Comment

कोलित सुत्त

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_कोलित सुत्त_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_41.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼  _'कोलित सुत...