🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_सद्धम्म म्हणजे काय?_*
_*(ड) धम्माने सर्व सामाजिक भेदभावांना मूठमाती दिली तरच धम्म सद्धम्म होतो*_
_*३. धम्म माणसामाणसात समता वाढविण्याची शिकवण देतो तेव्हाच धम्म सद्धम्म होतो*_
*_(समाप्त)_*
*_!! ॐ मणी पद्मे हूँ !!_*
https://mikamblemahesh.blogspot.com/2024/07/blog-post_27.html
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
_माणसे असमानच जन्माला येतात. काही धष्टपुष्ट असतात तर काही दुर्बल असतात. काही अधिक बुद्धिमान असतात. काही कमी बुद्धिमान असतात. तर काहींना बुद्धीच नसते. काहींची क्षमता अधिक असते तर काहीची क्षमता न्यून असते. काही संपन्न असतात तर काही विपन्न असतात._
_परंतु सर्वांनाच ज्याला जीवनसंघर्ष म्हणतात त्यात प्रवेश करावाच लागतो. या जीवनसंघर्षात असमानता ही जीवनाची स्वाभाविक स्थिती म्हणून स्वीकारली तर जे दुर्बल आहेत त्यांना या जीवनसंघर्षात काहीही स्थान असणार नाही. ते नेहमीच शेवटी राहतील. *या असमानतेच्या नियमाला जीवनाचा स्वाभाविक नियम म्हणून स्वीकारले जावे काय?*_
_काही या नियमाला जीवनाचा स्वाभाविक नियम म्हणून स्वीकारतात. त्यांचा तर्क असा की या नियमामुळेच जो जीवनसंघर्षात टिकून राहण्यास योग्य आहे तोच टिकून राहील._
_*"प्रश्न असा आहे की, जीवन संघर्षात जो टिकून राहण्यास समर्थ आहे ; काय तोच समाजाच्या दृष्टीनेही श्रेष्ठतम आहे?" याला कोणीही सकारात्मक उत्तर देऊ शकला नाही.*_
_*हा संदेह आहे म्हणूनच धम्म समानतेची देशना देतो. कारण या समानतेच्या सिद्धांतामुळेच समाजाच्या दृष्टीने जे श्रेष्ठतम आहे ते जीवनसंघर्षात जिवंत राहण्यास समर्थ नसले तरीही ते जिवंत राहील.*_
_समाजाला श्रेष्ठतम हवे आहे. समर्थतम नको. म्हणून याच प्राथमिक कारणास्तव धम्म समानतेचा समर्थक आहे, धम्म समानतेचा पुरस्कार करतो._
_*हाच बुद्धांचा दृष्टिकोन होता आणि याच कारणास्तव बुद्धांचा तर्क असा होता की, जो धर्म समानतेचा पुरस्कार करीत नाही तो धर्म माणसासाठी स्वीकारण्यायोग्य धर्मच नव्हे.*_
_*जो धर्म एकाच्या सुखासाठी दुसऱ्याचे जीवन दुःखी करतो किंवा दुसऱ्याच्या सुखासाठी स्वतःचे जीवन दुःखी करतो किंवा स्वतःचेही जीवन दुःखी करतो आणि इतरांचेही जीवन दुःखी करतो काय तुम्ही अशा धर्माचा आदर करणार? काय तुम्ही अशा धर्मावर श्रद्धा ठेवणार?*_
_*जो धम्म स्वतःच्या सुखासोबत इतरांच्याही सुखात वृद्धी करतो आणि कोणत्याही प्रकारचा अत्याचार सहन करीत नाही काय असा धम्म अधिक योग्य धम्म नाही काय?*_
_जे ब्राह्मण समानतेच्या तत्त्वाचे विरोधी होते त्यांना बुद्धा़ंनी असे काही विशेष महत्त्वाचे प्रश्न विचारले._
*_बुद्धांचा धम्म हा माणसाच्या सद्-प्रवृत्तीतून उद्भवणारा न्यायप्रधान असा श्रेष्ठतम धम्म आहे._*
*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_संकलन - महेश कांबळे_*
*_दिनांक :- २८/०७/२०२४_*
*_संदर्भ :-_*
_*१) भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म, तिसरा खंड भाग ५*_
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
No comments:
Post a Comment