Tuesday, 23 July 2024

प्रज्ञा आणि शील यांच्यासमवेत करुणाही आवश्यक आहे

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_सद्धम्म म्हणजे काय?_*

_*(क) धम्म मैत्रीचा पुरस्कार करतो तेव्हा धम्म सद्धम्म होतो*_

*_२. प्रज्ञा आणि शील यांच्यासमवेत करुणाही आवश्यक आहे_*

*_(क्रमशः)_*

*_!! ॐ मणी पद्मे हूँ !!_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2024/07/blog-post_23.html

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

_*प्रज्ञा आणि शील यांच्यासमवेत करुणाही आवश्यक आहे अशी शिकवण असेल तरच धम्म सद्धम्म होतो.* बुद्धांच्या धम्माचे अधिष्ठान काय ? यासंबंधी मतभिन्नता आहे. *काय फक्त प्रज्ञाच बुद्धांच्या धम्माचे अधिष्ठान आहे? काय फक्त करुणाच त्यांच्या धम्माचे अधिष्ठान आहे?*_

_या वादामुळे बुद्धानुगामी दोन शाखात विभाजित झाले._

१. *एका शाखेचे मत असे की फक्त प्रज्ञाच बुद्धांच्या धम्माचे अधिष्ठान आहे.

२. *तर दुसरी शाखा म्हणते की फक्त करुणाच बुद्धांच्या धम्माचे अधिष्ठान आहे.*

_या दोन शाखा अद्यापही एकमेकांपासून विभाजित आहेत. विलग आहेत. *बुद्ध वचनांच्या आधारावरच यांचे परीक्षण केले तर या दोन्ही शाखा चूक आहेत असे वाटते.*_

_बुद्धांच्या धम्माच्या दोन आधारस्तंभां- पैकी *एक आधारस्तंभ प्रज्ञा आहे यात वादच नाही.* पण वादाचा मुद्दा हा आहे की, *काय करुणा ही धम्माचा आधारस्तंभ आहे.?*_

_करुणा ही धम्माचा आधारस्तंभ आहे ही बाब वादातीत आहे. याच्या समर्थनार्थ बुद्ध वचनांनाच उद्धृत करता येते._

_प्राचीन काळी गांधार देशात भयानक रोगाने पीडित असा एक भिक्खू होते. ते ज्या ठिकाणी उठत बसत असे ती जागा घाण होत असे. ते एका अशा विहारात वास्तव्याला होते की, तेथे त्यांची सहायता कोणीही करीत नव्हते._

_एकदा बुद्ध आपल्या पाचशे अनुगामींसह तेथे गेले. त्यांनी आपल्यासोबत आवश्यक ती पात्रे आणि पाणी घेतले. त्या सर्वांनी ते भिक्खू जेथे होते त्या स्थानाला भेट दिली._

_त्या ठिकाणी एवढी भयानक दुर्गंधी होती की त्या सर्व भिक्खूंना त्या भिक्खूविषयी घृणा वाटू लागली. परंतु त्या जगद्वद्य तथागतांनी स्वहस्ते त्या भिक्खूस स्नान घातले आणि आजारावर उपचार करण्यास प्रारंभ केला._

_तेव्हा राजा, त्याचे अमात्य, स्वर्गदेवता (देव आणि नाग) सर्व त्या ठिकाणी उपस्थित झाले. त्या सर्वांनी बुद्धांची पूजा बांधली. त्यांची वंदना केल्यावर त्या सर्वांनी जगद्वंद्याला उद्देशून प्रश्न केला, "आपण श्रेष्ठ, आपण थोर असूनही या निम्नस्तरावर उतरून एवढे हलके काम का करावे?" यावर बुद्धांनी आपल्या कृतीचे स्पष्टीकरण केले ते असे._

_*"तथागतांचा या इहलोकी येण्याचा हेतूच हा की, जे दरिद्री आहेत, जे असहाय आहेत. जे असुरक्षित आहेत त्यांचे मित्र होणे. ज्यांना कायिक पीडा आहे त्यांची सेवा सुश्रूषा करणे. ते श्रमण असोत अथवा कोणत्याही धर्माची माणसे असोत त्यांची सेवा करणे. दरिद्रींना, अनाथांना, वृद्धांना मदत करणे आणि इतरांनी असेच करावे याकरिता प्रवृत्त करणे हाच तो हेतू होय."*_

*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 

*_संकलन - महेश कांबळे_*

*_दिनांक :- २४/०७/२०२४_*

*_संदर्भ :-_*

_*१) भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म, तिसरा खंड भाग ५*_

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 

No comments:

Post a Comment

कोलित सुत्त

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_कोलित सुत्त_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_41.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼  _'कोलित सुत...