🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_सद्धम्म म्हणजे काय?_*
_*(क) धम्म मैत्रीचा पुरस्कार करतो तेव्हा धम्म सद्धम्म होतो*_
*_१ प्रज्ञेला शीलाची जोड असलीच पाहिजे_*
*_(क्रमशः)_*
*_!! ॐ मणी पद्मे हूँ !!_*
https://mikamblemahesh.blogspot.com/2024/07/blog-post_22.html
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
👉 *_१ फक्त प्रज्ञाच पर्याप्त नाही. प्रज्ञेला शीलाची जोड असलीच पाहिजे, अशी शिकवण असेल तरच धम्म सद्धम्म होतो._*
_*प्रज्ञा आवश्यक आहे. परंतु शील त्यापेक्षा अधिक महत्त्वाचे आहे. शीलाविना प्रज्ञाही धोकादायक आहे. फक्त प्रज्ञा ही धोकादायक आहे. प्रज्ञा ही माणसाच्या हाती असलेल्या तलवारीसारखी आहे.*_
_*शीलवान माणसाच्या हाती असली तरच तो प्रज्ञेचा उपयोग संकटात सापडलेल्या माणसाच्या रक्षणासाठी करू शकेल. पण शीलहीन माणूस त्याच प्रज्ञेचा उपयोग एखाद्याच्या विनाशासाठीही करू शकेल.*_
*_म्हणूनच प्रज्ञेपेक्षा शील महत्त्वाचे आहे._*
_प्रज्ञा हा विचारधम्म होय. सम्यक विचार करणे म्हणजे प्रज्ञा. शील हा आचारधम्म होय. सम्यक आचरण म्हणजे शील._
*_बुद्धांनी पाच मूलतत्त्वांचा उल्लेख केला आहे._*
१. *एक तत्त्व हे जीवहिंसेसंबंधी आहे.*
२. *दुसरे तत्त्व चौर्यकर्मासंबंधी आहे.*
३. *तिसरे तत्त्व कामभोगासंबंधी, मिथ्याचाराशी संबंधित आहे.*
४. *चवथे तत्त्व मिथ्या कथनाशी संबंधित आहे.*
५. *पाचवे तत्त्व सुरापानाशी संबंधित आहे.*
_या पाच मूलतत्त्वांसंबंधात तथागतांनी सामान्यजनांना हिंसा न करणे, चौर्यकर्म न करणे, मिथ्या कथन न करणे, कामभोगासंबंधी मिथ्याचार न करणे, आणि सुरापान न करणे, अशी देशना दिली आहे._
*_बुद्धांनी विद्येपेक्षा शीलाला अधिक महत्त्व देण्याचे कारण स्पष्ट आहे._*
_*विद्येचा उपयोग माणसाच्या शीलावर अवलंबून आहे. शीलाशिवाय विद्येलाका हीही मोल नाही ही बुद्धांची देशना आहे. अन्य प्रसंगी बुद्ध म्हणतात, "शीलासमान या इहलोकी दुसरे काहीही नाही." शील हा आरंभबिंदू आहे. शील हे शरणस्थल आहे. शील हेच सर्व कुशलांची जननी आहे. सर्व उत्तम अवस्थांत शील ही सर्वोत्तम अवस्था होय. म्हणून आपले शील शुद्ध असावे.*_
*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_संकलन - महेश कांबळे_*
*_दिनांक :- २३/०७/२०२४_*
*_संदर्भ :-_*
_*१) भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म, तिसरा खंड भाग ५*_
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
No comments:
Post a Comment