🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_सद्धम्म म्हणजे काय?_*
_*३. सर्वप्रथम प्रज्ञा आवश्यक आहे अशी शिकवण असेल तरच धम्म सद्धम्म होतो*_
*_(क्रमशः)_*
*_!! ॐ मणी पद्मे हूँ !!_*
https://mikamblemahesh.blogspot.com/2024/07/blog-post_21.html
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
_*ब्राह्मणांना विद्या (ज्ञान, विद्या) विद्या म्हणूनच अमोल वाटते. एखादा माणूस विद्वान आहे, विद्यावान आहे एवढ्याच कारणास्तव तो त्यांच्याकरिता पूजनीय आहे. तो माणूस शीलवान आहे अथवा नाही हा प्रश्न त्यांच्याकरिता अप्रस्तुत आहे.* त्यांच्या मते राजा आपल्या देशातच पूजला जातो. परंतु विद्वान मात्र सर्वत्र पूजला जातो. यातून त्यांना एवढेच सुचवावयाचे आहे की, विद्वान राजापेक्षा श्रेष्ठ आहे._
_*बुद्धांनी विद्या आणि प्रज्ञा यात भेद केला आहे. हा भेद म्हणजे ज्ञान आणि सुज्ञता यामधील भेद होय.*असेही म्हटले जाऊ शकते की ब्राह्मणांनीही विद्या आणि प्रज्ञा यात भेद केला आहे. हे कदाचित सत्य असेलही. परंतु *ब्राह्मणांना अभिप्रेत प्रज्ञा आणि बुद्धाला अभिप्रेत प्रज्ञा यात महदअंतर आहे.*_
_बुद्धांनी हा भेद *अंगुत्तर निकायमध्ये* उल्लेखित एका प्रवचनात सुस्पष्टपणे मांडला आहे. एकेसमयी तथागत राजगृही जेथे खारींना दाणे भरवीत त्या वेळूवनात वास्तव्याला होते. त्यावेळी मगध राजाचा अमात्य *वर्षकार ब्राह्मण* तथागतांच्या भेटीला आला. त्याने तथागतांना वंदना केली. परस्परांचे कुशलक्षेम विचारल्यावर त्याने बाजूलाच आसन ग्रहण केले. अशाप्रकारे आसनस्थ झाल्यावर तो वर्षकार ब्राह्मण तथागतांना वदला,_
_"श्रमण गौतमा, *जेव्हा एखाद्याच्या अंगी आम्ही ब्राह्मण चार गुण पाहतो तेव्हा त्याला आम्ही श्रेष्ठ विद्वान म्हणून घोषित करतो.* ते चार गुण असे._
_*"श्रमण गौतमा, तो विशेषज्ञ असतो. तो जे ऐकतो त्याचक्षणी त्याला त्याचा अर्थ ज्ञात होतो. तो असे म्हणतो की या कथनाचा हा अर्थ आहे. त्याचप्रमाणे त्याची स्मरणशक्ती तीव्र असते. तो फार पूर्वी घडलेली घटना किंवा कथन केलेली घटना स्मरणात ठेवू शकतो. तो ती पुनरुक्त करू शकतो."*_
_*"तो आपल्या गृहकार्यात कुशल असतो, दक्ष असतो. तो हे जाणतो की, काय करणे उचित आहे. कोणती व्यवस्था करणे उचित आहे."*_
_"हे श्रमण गौतमा, *एखादा माणूस या चार गुणांनी युक्त असतो तेव्हा आम्ही त्याला सुज्ञ माणूस, विद्वान माणूस म्हणून घोषित करतो.* जर श्रमण गौतमाला, या गुणांच्या आधारे माझी प्रशंसा कराविशी वाटत असेल तर, त्याने माझी प्रशंसा करावी किंवा मला दोष द्यावासा वाटत असेल तर त्याने मला दोष द्यावा."_
_"हे ब्राह्मणा, यास्तव मी तुझी प्रशंसाही करणार नाही किंवा तुला दोषही देणार नाही. मी सुद्धा ज्या माणसात पुढील चार गुण आहेत त्याला विद्वान म्हणून घोषित करतो. परंतु पुरस्कारिलेले चार गुण हे तू व्यक्त केलेल्या गुणांपेक्षा सर्वथा भिन्न आहेत."_
१. *_"ब्राह्मणा, जो माणूस बहुजनांचा हितैषी आहे. बहुजनांचा कल्याणकर्ता आहे, त्याच्यामुळेच बहुजन कल्याणमयी हितकारी आर्य पथाचे अनुगामी झाले आहेत."_*
२. *_"तो ज्या विचारात रममाण होऊ इच्छितो त्याच विचारात रममाण होतो. तो ज्या विचारात रममाण होऊ इच्छित नाही, त्या विचारात रममाण होत नाही."_*
३. *_"तो चित्तात ज्या संकल्पाची कामना करतो, तोच संकल्प करतो. तो ज्या संकल्पाची कामना करीत नाही तो संकल्प तो करीत नाही. अशाप्रकारे त्याने आपले चित्त, विचार संयमित, नियंत्रित केले आहेत."_*
४. *_तो आपल्या इच्छेने विनासायास, विना कष्टाने चार लोकोत्तर ध्यानात मग्न होतो. ही चार ध्याने याच जगी याच जीवनी सुखाची साधने आहेत._*
_*"आणि हे ब्राह्मणा, त्याने याच इहलोकी याच जन्मी आपल्या अस्तित्वाचा क्षय केला आहे. त्याने चित्ताची विमुक्ती प्राप्त केली आहे. त्याने प्रज्ञेद्वारा विमुक्ती प्राप्त केली असून तो त्यात विहार करतो आहे.*_
_"हे ब्राह्मणा, मी तुझी प्रशंसाही करणार नाही आणि तुला दोषही देणार नाही. परंतु *मी या चार गुणांनी युक्त माणसाला विशेषज्ञ माणूस, सुज्ञ माणूस म्हणून घोषित करेन."*_
_"श्रमण गौतमा, हे अद्भुत आहे. हे आश्चर्यजनक आहे. श्रमण गौतमांनी याची किती सुंदर व्याख्या केली आहे."_
_"मला असे जाणवते की, श्रमण गौतम या चार गुणांनी युक्त आहे. खरोखरच श्रमण गौतमांनी स्वतःला बहुजन हितार्थ समर्पित केले आहे. त्याने बहुजनांच्या कल्याणार्थ स्वतःला समर्पित केले आहे. श्रमण गौतमामुळेच बहुजन कुशल हितकर अशा आर्यपंथात प्रस्थापित झाले आहेत. प्रतिष्ठित झाले आहेत."_
_"खरेच श्रमण गौतम ज्या विचारात स्वतःला रममाण करू इच्छितात त्याच विचारात ते रममाण होतात. याप्रकारे त्यांनी आपले विचार आपले चित्त संयमित केले आहे, नियंत्रित केले आहे."_
_"खरेच श्रमण गौतम स्वेच्छेने विनासायास, विनाप्रयास चार लोकोत्तर ध्यानात मग्न होऊ शकतात. निश्चितच श्रमण गौतमाने आपल्या अस्तित्वाचा याच जन्मी क्षय केला आहे. आस्त्रव क्षयाचे ज्ञान त्यांना प्राप्त झाले आहे. त्यांचे चित्त विमुक्त आहे. त्यांनी प्रज्ञेद्वारा चित्ताची विमुक्ती प्राप्त केली आहे आणि ते त्यात विहार करत आहे."_
_या ठिकाणी बुद्धांची प्रज्ञा आणि ब्राह्मणाची प्रज्ञा यातील भेद निःसंदिग्धपणे, सुस्पष्टपणे मांडण्यात आला आहे._
_*याच ठिकाणी बुद्ध प्रज्ञेला विद्येपेक्षा अधिक महत्त्वाचे का मानतात, असंदिग्धपणे, सुस्पष्टपणे मांडण्यात आले आहे.*_
*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_संकलन - महेश कांबळे_*
*_दिनांक :- २२/०७/२०२४_*
*_संदर्भ :-_*
_*१) भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म, तिसरा खंड भाग ५*_
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
No comments:
Post a Comment