🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_सद्धम्म म्हणजे काय?_*
_*२) धम्म देशना ग्रहण करणे एवढेच पर्याप्त नाही*_
*_(क्रमशः)_*
*_!! ॐ मणी पद्मे हूँ !!_*
https://mikamblemahesh.blogspot.com/2024/07/blog-post_19.html
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
_धम्म सद्धम्म व्हावयाचा असेल तर, *धम्म देशना ग्रहण करणे एवढेच पर्याप्त नाही. फक्त धम्म देशना ग्रहण केल्याने माणूस नियमांचा, कर्मकांडांचा दास होतो, अशी शिकवण अपरिहार्य आहे.*_
_एकेसमयी बुद्ध कोसम्बीच्या सुस्वर विहारात वास करीत होते. बुद्ध तेथे उपस्थित लोकांना धम्मोपदेश देत असे. त्याच समयी कोसम्बी येथे एक ब्राह्मण ब्रह्मचारी वास्तव्याला होता. त्याच्यासारखा शास्त्रांचा ज्ञाता कोणीही दुसरा नाही. म्हणून तो जेथे जात असे तेथे हाती एक पेटती मशाल घेऊन जात असे._
_एकदा एका नगरीतील बाजारपेठेत एका माणसाने त्याला हाती मशाल घेऊन पाहिले. त्याने त्याला हाती पेटती मशाल धारण करण्याचे कारण विचारले. तो उत्तरला._
_"संसार अंध:कारमय आहे. लोक पथभ्रष्ट आहेत. माझ्या क्षमतेनुसार त्यांच्या पथप्रदर्शनासाठी, त्यांचा पथ आलोकित करण्यासाठी मी ही मशाल धारण केली आहे."_
_बुद्धांनी हे जाणिले आणि त्या ब्राह्मणाला बोलावणे पाठविले आणि विचारणा केली, "अरे ही मशाल कशासाठी? ही मशाल घेऊन तू का भ्रमण करतो आहे?"_
_तो ब्रह्मचारी उत्तरला, "सामान्यजन अज्ञान आणि अंधःकाराने ग्रस्त आहेत. त्यांच्या पथप्रदर्शनासाठी, त्यांचा पथ आलोकित व्हावा यासाठी मी ही मशाल धारण केली आहे."_
_नंतर तथागतांनी त्याला पुनरपी विचारणा केली. "तर खरेच तू विद्वान आहेस काय? धर्मग्रंथात उल्लेखीत शब्दविद्या, नक्षत्रविद्या आणि युद्धविद्या, या विद्यांचा तू ज्ञाता आहेस काय?"_
_खूप आग्रह केल्यावर त्या ब्रह्मचाऱ्याला हे मान्य करावे लागले की, त्याला या विद्या अवगत नाहीत. त्याने ती मशाल फेकून दिली. तेव्हा बुद्ध पुढे म्हणाले,_
_*जर कोणी माणूस विद्वान असो अथवा नसो, स्वतःला इतका महान समजतो की, तो दुसऱ्याप्रती घृणा करू लागतो. तेव्हा तो हाती मशाल घेतलेल्या अंधासम होय. तो स्वतः आंधळा आहे पण दुसऱ्याचे पथ आलोकित करू इच्छितो.*_
*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_संकलन - महेश कांबळे_*
*_दिनांक :- २१/०७/२०२४_*
*_संदर्भ :-_*
_*१) भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म, तिसरा खंड भाग ५*_
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
No comments:
Post a Comment