Friday, 19 July 2024

धम्माने प्रज्ञेचा पुरस्कार केलाच पाहिजे

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_सद्धम्म म्हणजे काय?_*

_*(ब) धम्म सद्धम्म व्हावयाचा असेल तर धम्माने प्रज्ञेचा पुरस्कार केलाच पाहिजे !*_

*_(क्रमशः)_*

*_!! ॐ मणी पद्मे हूँ !!_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2024/07/blog-post_19.html

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_१ धम्माची देशना सर्वांकरिता मुक्त असेल, तेव्हा धम्म सद्धम्म होतो._*

_ब्राह्मणी सिद्धांत असा होता की, "सर्वच ज्ञान प्राप्त करू शकत नाही. ज्ञानप्राप्ती ही अनिवार्यरित्या सीमित लोकांपुरतीच मर्यादित असावी." त्यांनी ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य यांनाच फक्त ज्ञानप्राप्तीची अनुमती दिली. परंतु ही अनुमतीसुद्धा या त्रैवर्गियांपैकी फक्त पुरुषांनाच होती._

*_सर्वच महिला- त्या ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य वर्गातील असल्या तरीही आणि सर्वच शूद्र स्त्री-पुरुष यांना ज्ञान प्राप्तीसाठी प्रतिबंध करण्यात आला होता. एवढेच नव्हे तर त्यांना साक्षरताही प्रतिबंधित करण्यात आली होती._*

👉 *_बुद्धांनी या अत्यंत अन्यायी अत्याचारी सिद्धांताविरुद्ध विद्रोह केला. त्यांची देशना होती की, ज्ञानप्राप्तीचे मार्ग सर्वांना मुक्त असावे. पुरुष आणि महिला दोघांनाही समानपणे मुक्त असावे._*

_अनेक ब्राह्मणांनी बुद्धांच्या या सिद्धांताचे शास्त्रार्थ करून खंडन करण्याचा प्रयत्न केला. *लोहीच्च्य ब्राह्मणांशी बुद्धांचा झालेला शास्त्रार्थ त्यांच्या या मतावर बराच प्रकाश टाकतो.*_

_एकदा तथागत भिक्खू संघासमवेत कोशल जनपदात चारिका करीत असताना सालवाटिका येथे आले. सालवाटिका हे गाव साल वृक्षांनी वेढलेले होते. त्यावेळी सालवाटिकेत लोहीच्च्य ब्राह्मण वास्तव्याला होता. ही सालवाटिका जीवन परिपूर्ण होती. या सालवाटिकेत कुरणे, अरण्ये आणि धनधान्य विपुल होते. *हा भूप्रदेश कोशल नरेश प्रसेनजिताने लोहीच्च्य ब्राह्मणाला सर्वाधिकारासहित दान केला होता.* त्या गावावर त्या ब्राह्मणाचा राजासमच अधिकार होता._

👉 *_"श्रमण किंवा ब्राह्मणाने ज्ञान प्राप्त केल्यावर त्यांनी ते ज्ञान स्त्री शुद्रांना प्रक्षेपित करू नये," अशी लोहीच्च्य ब्राह्मणाची मान्यता होती."_*

_त्यानंतर तथागत सालवाटिकेत वास्तव्याला आहे ही वार्ता लोहीच्च्य ब्राह्मणाच्या कर्णी आली. ही वार्ता समजल्यावर त्याने भेसिक नापिताला बोलाविले. आणि तो ब्राह्मण त्या नापिताला म्हणाला, "हे भेसिका, यावे इकडे यावे. जेथे श्रमण गौतम वास करीत आहे तेथे जावे. तेथे गेल्यावर त्यांना वंदन करावे. माझे नाव घेऊन त्यांचे कुशलक्षेम विचारावे. त्यांना विचारावे तुमचे आरोग्य ठीक आहे ना. त्यांना विचारावे तुमचे प्रकृतिस्वास्थ्य उत्तम आहे ना. हे कुशलक्षेम विचारल्यावर त्यांना त्यांच्या भिक्खुसंघासमवेत उद्याच्या भोजनाचे निमंत्रण द्यावे. म्हणावे की त्यांना आणि भिक्खुसंघाला लोहीच्च्य ब्राह्मणाने आमंत्रित केले आहे."_

_"ठीक आहे महोदय" तो नापित उत्तरला. लोहीच्य ब्राह्मणाच्या आज्ञेप्रमाणे तो भेसिक नापित तथागतांकडे गेला. त्या ब्राह्मणाने त्याला जे सांगितले होते तेच त्याने तथागतांना कथन केले. तथागतांनी मौन राहूनच ती प्रार्थना स्वीकारली._ 

_दुसऱ्या दिवशी प्रातःकाळी तथागताने चीवर पात्र धारण केले आणि भिक्खुसंघासमवेत सालवाटिकेकडे प्रस्थान करते झाले._

_लोहीच्च्य ब्राह्मणाने भेसिक नापितालाच तथागतांस आणण्यासाठी पाठविले होते. तो नापित तथागतांपाठोपाठच एक एक पाऊल टाकीत मार्गक्रमणा करीत होता. वाटेत त्याने तथागतांना त्या लोहीच्च्य ब्राह्मणाची ही मिथ्या धारणा कथन केली की, "श्रमण ब्राह्मणांनी स्त्री शुद्रांना ज्ञानदान करू नये. विद्यादान करू नये."_ 

_"भेसिक हे शक्य आहे. भेसिक हे शक्य आहे." तथागत उत्तरले. आणि तथागत लोहीच्च्य ब्राह्मणाच्या निवासस्थानी पोहोचले. त्यांच्यासाठी मांडलेल्या आसनावर तथागत आसनस्थ झाले. लोहीच्च्य ब्राह्मणाने  भिक्खुसंघप्रमुख तथागतांना आणि - भिक्खुसंघाला स्वहस्ते मृदु मधुर अन्नदान  केले. त्याने त्यांना आग्रहपूर्वक भोजन - दिले. जेव्हा त्यांनी नकार दिला तेव्हाच तो थांबला._

_तथागतांनी आपले भोजन संपविले. तथागतांनी आपले कर आणि - पात्र धुवून स्वच्छ केले. लोहीच्च्य ब्राह्मणाने आपल्यासाठी एक कनिष्ठ आसन आणले. आणि तो तथागतांनिकटच आसनस्थ झाला._

_अशाप्रकारे आसनस्थ झालेल्या - *लोहीच्च्य ब्राह्मणास तथागत म्हणाले, "लोहीच्य लोक असे म्हणतात की, श्रमण आणि ब्राह्मणांनी शुद्रांना किंवा महिलांना ज्ञानदान करू नये, विद्यादान करू नये. - अशी तुझी मान्यता आहे. हे खरे आहे काय?"*_

 _"होय श्रमण गौतमा, ते खरे आहे" लोहीच्च्य ब्राह्मण उत्तरला._

_"लोहीच्च्य, तुला काय वाटते? काय तू सालवाटिकेत नांदत नाहीस?" होय गौतमा, हे खरे आहे._

 _"आणि समजा लोहीच्च्य कोणी असे म्हणत असेल की, लोहीच्च्य ब्राह्मणाचा सालवाटिकेवर अधिकार आहे. म्हणून त्यानेच सालवाटिकेतून प्राप्त सर्व आगमाचा (मिळकतीचा) आणि उत्पादाचा उपभोग घ्यावा. त्याने इतरांना काहीही देऊ नये. अशी धारणा व्यक्त करणारी व्यक्ती जे तुझ्यावर आश्रित आहेत त्यांना संकटात टाकणारी आहे, असे तुला वाटत नाही काय?"_ 

_"होय श्रमण गौतमा, मी त्या व्यक्तीला माझ्या आश्रितांकरिता संकटाचा निर्माताच मानणार."_ 

_"तर असा संकटाचा निर्माता तुझ्या आश्रितांचा हितचिंतक मानला जावा काय??"_

_"नाही, तो. त्यांचा हितचिंतक मानला जाणार नाही. त्यांचा कल्याणकर्ता मानला जाणार नाही. श्रमण गौतमा," लोहीच्च्य उत्तरला._

_"जर ती व्यक्ती त्यांच्या हिताची चिंता करणारी नाही तर ती व्यक्ती त्यांची मित्र होईल की शत्रू?"_ 

_"ती व्यक्ती त्यांची शत्रूच होईल. श्रमण गौतमा."_ 

_"तर मग जो सिद्धांत एकाला दुसऱ्याचा शत्रू घोषित करतो तो सिद्धांत तू योग्य मानशील की अयोग्य??"_

 _"लोहीच्च्य, तुला काय वाटते? काशी आणि कोशल जनपदावर राजा प्रसेनजिताचा अधिकार नाही काय?"_

_"होय श्रमण गौतमा, या जनपदांवर राजाचाच अधिकार आहे."_

_"लोहीच्च्य, जर कोणी असे म्हणत असेल की, कोशल नरेश प्रसेनजित काशी आणि कोशल जनपदाचा स्वामी आहे. त्याने काशी आणि कोशल जनपदातील सर्व आगम आणि उत्पाद यांचा उपभोग घ्यावा. अन्य कोणालाही त्याने त्या उपभोगात सहभागी होऊ देऊ नये. असे प्रतिपादन करणारी व्यक्ती जे राजा प्रसेनजितावर आश्रित आहेत. तू आणि अन्य लोक- त्यांच्याकरिता त्यांना संकटात लोटणारी होय असे तू मानशील अथवा नाही?"_ 

_"होय श्रमण गौतमा, ती व्यक्ती त्या आश्रितांकरिता संकटाची निर्माताचं होय."_

_"आणि अशा संकटाचा निर्माता त्यांचा हितचिंतक होऊ शकतो काय?"_

_"नाही श्रमण गौतमा, तो त्यांचा हितकर्ता होऊच शकत नाही."_

_"जर तो त्यांचा हितकर्ता नाही तर त्याच्या चित्तात त्यांच्याविषयी प्रेम असेल की वैर असेल."_

_"निश्चितच त्याच्या चित्तात त्यांच्या-विषयी वैर असेल श्रमण गौतमा."_

_"मग असा सिद्धांत एकाला दुसऱ्याचा शत्रू घोषित करतो तो सिद्धांत योग्य मानावा की अयोग्य मानावा?"_

_"तो सिद्धांत अयोग्यच मानावा श्रमण गौतमा."_

_*"मग लोहीच्च्य, जो असे म्हणतो की, सालवाटिकेवर तुझे स्वामित्व आहे म्हणून तूच सालवाटिकेचा सारा आगम आणि उत्पाद यांचा उपभोग घ्यावा. इतरांना काहीही देऊ नये. आणि कोणी असे म्हणत असेल की, राजा प्रसेनजित काशी आणि कोशल जनपदाचा स्वामी आहे म्हणून राजा प्रसेनजितानेच काशी आणि कोशल जनपदातील सर्व आगम (मिळकतीचा) आणि उत्पाद यांचा उपभोग घ्यावा. इतरांना काहीही देऊ नये. तर असा माणूस त्या सर्वांकरिता जे तुझ्यावर आश्रित आहेत. आणि तुझ्यासहित त्या सर्वांकरिता जे कोशल नरेशावर आश्रित आहेत त्या सर्वांना संकटात टाकणाराच ठरणार आणि जो दुसऱ्यांना संकटात टाकतो तो त्यांचा हितचिंतक होऊच शकत नाही. आणि जो हितचिंतक नाही तो शत्रूच असतो. आणि जो सिद्धांत एकाला दुसऱ्याचा शत्रू घोषित करतो तो अयोग्य होय. तू हे मान्य करतोस."*_

 👉 *_"त्याचप्रमाणे हे लोहीच्च्य, जो माणूस असे म्हणतो की, श्रमण आणि ब्राह्मणांनी शूद्र आणि महिलांना ज्ञानदान करू नये, विद्यादान करू नये तो सुद्धा त्याच माणसासारखा आहे."_*

👉 *_"असे म्हणणारा माणूस दुसऱ्याच्या मार्गात अडचणी उभ्या करतो. तो त्यांचा हितचिंतक नसतो. आणि जो हितचिंतक नाही तो शत्रूच होय. अशाप्रकारे जो माणूस दुसऱ्याचा हितचिंतक नसल्याने तो त्यांचा शत्रू होतो तेव्हा असा सिद्धांत एकाला दुसऱ्याचा शत्रू घोषित करतो तो सिद्धांत अयोग्य सिद्धांत होय."_*

*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 

*_संकलन - महेश कांबळे_*

*_दिनांक :- २०/०७/२०२४_*

*_संदर्भ :-_*

_*१) भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म, तिसरा खंड भाग ५*_

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 

No comments:

Post a Comment

कोलित सुत्त

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_कोलित सुत्त_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_41.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼  _'कोलित सुत...