🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_सद्धम्म म्हणजे काय?_*
_*अ) : सद्धम्माची कार्ये*_
*_(क्रमशः)_*
*_!! ॐ मणी पद्मे हूँ !!_*
https://mikamblemahesh.blogspot.com/2024/07/blog-post_18.html
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
_*१. अपवित्रतेपासून चित्ताची शुद्धता*_
एकदा तथागत श्रावस्ती येथे वास्तव्याला होते. कोशल नरेश प्रसेनजित तथागत वास करीत होते तेथे आले. आपल्या रथातून पायउतार होऊन आणि मोठ्या श्रद्धेने तथागतानिकट गेले._
_त्यांनी तथागतांना नगर प्रवेशाची आणि त्यांचे निमंत्रण स्वीकारून आतिथ्य ग्रहण करण्याची प्रार्थना केली. राजाने तथागतांनी नगर प्रवेश करावा आणि लोकांना सार्वजनिक धम्मोपदेश द्यावा अशीही प्रार्थना केली. *हेतू हा की सामान्यजनांना तथागतांचे दर्शन व्हावे. सामान्यजनांना तथागतांचा धम्म अवगत व्हावा आणि सामान्यजनांनी तो ग्रहण करावा.*_
_तथागतांनी प्रार्थना स्वीकारली. दुसऱ्या दिवशी तथागत नगरात प्रवेश करते झाले. त्यांच्यासह भिक्खूंचा मोठा समुदाय होता. ते सर्व नगरपथ आक्रमित नियोजित स्थळी पोहोचले. तथागत स्थानापन्न झाले. इतरांनीही आपले स्थान ग्रहण केले._
_अन्न ग्रहण केल्यावर राजाने तथागतांना प्रार्थना केली की, तथागतांनी चारही वाटा ज्याठिकाणी जुळतात त्या ठिकाणी सार्वजनिक धम्मोपदेश द्यावा. राजाने हे प्रवचन खुल्या प्रांगणातच आयोजित केले होते. मोठा जनसमुदाय त्या स्थळी उपस्थित होता._
त्या स्थानी दोन व्यापारीही बुद्धाचा धम्मोपदेश श्रवण करण्यास्तव उपस्थित होते.
१. _एकाने प्रतिक्रिया व्यक्त केली. "अशा प्रकारची सार्वजनिक सभा आयोजित करून, सार्वजनिक धम्मोपदेशाचे आयोजन करून राजाने खरेच सुज्ञपणाचा परिचय दिला आहे. ही धम्म देशना किती व्यापक आहे हा धम्मोपदेश किती गहन गंभीर आहे."_
२. _यावर दुसऱ्याने प्रतिक्रिया व्यक्त केली, "राजाने या माणसाला येथे सार्वजनिक धम्मोपदेश देण्यासाठी आमंत्रित केले हा राजाचा मूर्खपणाच नव्हे तर काय?"_
_"जसे गाडीला बांधलेली गाय जिकडे जाईल तिकडे तिचे वासरूही जाते. त्याचप्रमाणे हा बुद्ध राजाशी बांधलेला आहे आणि राजा जिकडे नेईल तिकडे जातो आहे." दोघाही व्यापाऱ्यांनी नगराचा निरोप घेतला आणि एका पथिकाश्रमात वास्तव्याला आले._
१. _*सुरापान करताना जो भला व्यापारी होता त्याला चतुर्दिक्कपालानी संयत राखले. त्याचे संरक्षण केले.*_
२. *_दुसऱ्या व्यापाऱ्याला दुष्ट प्रेतात्म्याने अतिरिक्त सुरापानाची प्रेरणा दिली. परिणामी तो अतिरिक्त सुरापानामुळे अचेतन अवस्थेला प्राप्त झाला. आणि पथिकाश्रमाबाहेरच्या वाटेवर जाऊन पडला._*
_दुसऱ्या दिवशी प्रातः समयी व्यापाऱ्यांच्या मालवाहू गाड्या त्या वाटेने जात होत्या. वाटेवर कोणी पडलेला आहे हे चालकांच्या ध्यानीही आले नाही आणि तो दुसरा व्यापारी त्या मालवाहू गाड्यांच्या चाकाखाली चिरडला गेला आणि मरणा पावला._
_पहिला व्यापारी दूरदेशी जाऊन पोहोचला. तेथे एका पवित्र अश्वाने त्याच्यापुढे गुडघे टेकले. याचा परिणाम म्हणून त्याला त्या देशाचा राजा म्हणून घोषित करण्यात आले आणि तो सिंहासनारूढ झाला._
_यानंतर घडलेल्या घटनांच्या विचित्रांवर विचार करीत तो मायदेशी परत गेला. त्याने बुद्धांना आमंत्रित केले आणि सामान्यजनांना धम्मदेशना देण्याची प्रार्थना केली._
_त्याप्रसंगी त्या जगद्वंद्य तथागतांनी त्या दुष्टप्रवृत्ती व्यापाऱ्याच्या मृत्यूचे कारण - घोषित केले अणि जो सुज्ञपणाने वागला त्या व्यापाऱ्याला जे ऐश्वर्य प्राप्त झाले त्याचे कारणही स्पष्ट केले. त्यांनी पुढील गाथा गायिली-
*_"चित्त सर्वांचे मूळ आहे. चित्तच स्वामी आहे. चित्तच निमित्त आहे."_*
_*"चित्तातच दुष्ट प्रवृत्ती उगम पावतात. त्यामुळे माणूस अकुशल वचन बोलतो. दुष्ट कर्म करतो. त्याच्या या पापकर्माचे फळ म्हणून, ज्याप्रमाणे रथाची चक्रे रथ ओढणाऱ्या वारूच्या पाठोपाठ जातात, - त्याचप्रमाणे दुःखे त्या माणसाच्या पाठोपाठ येतात. त्याच्या वाट्याला येतात.*_
_*"चित्तच सर्वांचे मूळ आहे. चित्तच - सर्वांचा स्वामी आहे. चित्तच नियोजन करते, प्रयोजन करते."*_
*_"जर चित्तात कुशल विचार असतील तर त्याची वाणी कुशल असते. त्याचे कर्म कुशल असते. त्याचा परिणाम म्हणून वस्तूंच्या पाठोपाठ येणाऱ्या छायेप्रमाणे त्या कुशल कर्माचे फळ त्याला प्राप्त होते."_*
_हे कथन श्रवण केल्यावर राजा, त्याचे अमात्य आणि अगणित सामान्यजन धम्माची दीक्षा ग्रहण करते झाले. तथागतांचे अनुगामी झाले._
*_२. या इहलोकी धम्मराज्याची स्थापना_*
_धम्माचे प्रयोजन काय? विविध धर्मानी याची अनेकानेक उत्तरे दिली आहेत._
_या प्रश्नाचे, *माणसाला ईश्वरप्राप्तीच्या मार्गी लावणे आणि त्याला आत्म्याची मुक्ती, आत्म्याचा मोक्ष याचे महत्त्व विशद करून सांगणे हे एक सर्वसामान्य उत्तर आहे.*_
_बहुतांश धर्म तीन राज्यांविषयी बोलतात._
१. _एकाला ते स्वर्गाचे राज्य म्हणतात._
२. _दुसऱ्याला ते इहलोकीचे राज्य म्हणतात._
३. _तिसऱ्याला ते नरकाचे राज्य म्हणतात._
_स्वर्गाच्या राज्यात ईश्वराचे शासन आहे असे बोलले जाते. नरकाच्या राज्यात सैतानाचा एकाधिकार आहे असेही मानले जाते. पण इहलोकीच्या राज्यावर शासनासंबंधी मात्र स्थिती विवादास्पद आहे. इहलोकीच्या राज्यावर सैतानाचा अधिकार नाही त्याचवेळी या राज्यावर ईश्वराचा एकाधिकार आहे असेही मानले जात नाही. परंतु अशी आशा केली जाते की, एक ना एक दिवस या इहलोकी ईश्वराचे राज्य येईल._
_काही धर्म असे मानतात की, स्वर्गाचे राज्य हे धर्मराज्य आहे यात शंकाच नाही. कारण स्वर्गाचे राज्य हे प्रत्यक्षपणे ईश्वरीय शासनाधीन आहे._
_काही इतर धर्मानुसार स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करणे हाच मानवी जीवनाचा एकमेव हेतू आहे. आणि ते कसे साध्य व्हावे हे धर्माचे सार आहे._
*_"धम्माचा हेतू काय?" या प्रश्नाला बुद्धांनी दिलेले उत्तर सर्वथा भिन्न आहे."_*
_*त्यांनी लोकांना काल्पनिक स्वर्गाची प्राप्ती हाच मानवीय जीवनाचा एकमेव हेतू आहे हे सांगितले नाही. त्यांनी लोकांना अशी देशना दिली की, धम्माचे राज्य याच इहलोकी आहे आणि त्याची प्राप्ती धम्मप्रवण आचरणाने होऊ शकते.*_
_*त्यांनी लोकांना सांगितले की, तुम्हाला तुमच्या दुःखांचा अंत करावयाचा असेल तर, तुम्हाला इतर मनुष्यमात्रांसोबत धम्मसंगत, न्यायसंगत व्यवहार करावा लागेल. तेव्हाच या इहलोकी धम्मराज्याची स्थापना होईल.*_
_अन्य सर्व धर्माच्या तुलनेने तथागतांच्या धम्माचे हे आगळेवेगळे वैशिष्ट्य आहे._
_*बुद्धांनी धम्मात पंचशीलांवर भर दिला आहे, अष्टांगिक मार्गावर भर दिला आहे आणि पारमितांवर भर दिला आहे.* बुद्धांनी या सर्वांना आपल्या धम्माचे आधार म्हणून का स्वीकारले? *कारण ते सर्व मिळून एक अशी जीवनप्रणाली आहेत की, त्यांचा स्वीकार करूनच माणूस धम्मप्रवण होऊ शकतो. सदाचरणी होऊ शकतो.*_
_माणसाचा माणसांप्रती भेदभाव, माणसाची माणसांप्रती असमानता याचाच परिणाम म्हणून माणूस दुःखी होतो. माणसाच्या वाट्याला दुःखे येतात. *केवळ धम्माचरणानेच माणसा- माणसातील असमानता, माणसामाणसातील हा अनुचित भेदभाव दूर होऊ शकतो आणि त्याचा परिणाम म्हणून उत्पन्न दुःखाचा क्षय होतो.*_
_म्हणूनच बुद्ध म्हणतात की, *धम्माचे काम केवळ देशना देणे हे नाही. धम्माचे प्रथम उत्तरदायित्व हे आहे की, दैनंदिन आचरणात धम्माचरण आणि सदाचरण यांची आवश्यकता आणि महत्त्व, धम्माने माणसाच्या चित्ती बिंबवावे, रुजवावे. माणसाच्या चित्ती धम्माचरण आणि सदाचरण यांची आवश्यकता आणि महत्त्व रुजविण्यासाठी, धम्माने काही इतर कार्येही करणे आवश्यक आहे.*_
१. *_कुशल कर्म कोणते आणि त्यापासून कसे परावृत्त व्हावे याची देशना धम्माने माणसाला द्यावी._*
२. *_अकुशल कर्म कोणते आणि त्यापासून कसे परावृत्त व्हावे याची देशना धम्माने माणसाला द्यावी._*
_धम्माच्या या दोन हेतुशिवायही त्यांनी धम्माचे दुसरे दोन अत्यंत महत्त्वपूर्ण उद्देश कथन केले आहेत._
१. _प्रथम म्हणजे *माणसाची प्रकृती आणि प्रवृत्ती यांना प्रशिक्षित करणे हे प्रशिक्षण, हे प्रार्थना करण्यापेक्षा भित्र आहे. व्रतवैकल्यापासून भिन्न आहे. यज्ञयागापासून भिन्न आहे.*_
_*देवदह सुत्तात* जैनधर्माची चर्चा करताना बुद्धांनी हा विषय स्पष्ट केला आहे. *जैन धर्माचे संस्थापक महावीर यांची अशी धारणा होती की, माणूस जे काही सुख किंवा दुःख अनुभवतो ते त्यांच्या पूर्वजन्मीच्या कर्माचा परिणाम होय.*_
_असे होत असल्याने गतजन्मीच्या अकुशल कर्माचे विवेचन आणि या जन्मी अकुशल कर्म न करणे यामुळे भविष्यासाठी अकुशल कर्माचा क्षय होतो. अकुशल कर्माचा क्षय होतो तेव्हा दुःखाचा क्षय होतो. जेव्हा दुःखाचा क्षय होतो तेव्हा संवेदना क्षय पावते. जेव्हा संवेदना क्षय पावते तेव्हा सर्व दुःखांचा मूलोच्छेद होतो. दुःख लयास जाते. *हीच जैन धर्माची देशना होती.*_
_*यावर बुद्धांनी असा प्रश्न केला की, "काय तुम्ही जाणता की, येथेच आणि याच क्षणी अकुशल प्रवृत्तींचा क्षय झाला आहे आणि येथेच आणि याच क्षणी कुशल प्रवृत्तीची स्थापना झाली आहे."*_
_याला "नाही" असेच उत्तर आहे._
*_तेव्हा बुद्ध विचारणा करतात, "मग गतजन्मीच्या अकुशल कर्माचे विरेचन करण्याचे प्रयोजनच काय? आणि या जन्मी नवीन अकुशल कर्म न करण्याचे प्रयोजनच काय?" जर चित्ताला अकुशल प्रवृत्तींना कुशल प्रवृत्तीत परिवर्तीत करण्याची साधना साधली नसेल तर या सर्वांचे काहीही प्रयोजनच नाही."_*
_*त्यांच्या मते धर्मातील हाच सर्वात महत्त्वाचा दोष होता. "शुभप्रवृत्ती आणि शुभसंस्कार हेच माणसाच्या चिरस्थानी चांगुलपणाचे अधिष्ठान आणि हमी आहेत."*_
_*म्हणूनच बुद्धांनी चित्ताच्या साधनेला प्रथम स्थान दिले आहे. चित्ताची साधना याचाच अर्थ प्रकृती आणि प्रवृत्तीचे कुशल मार्गावर परिवर्तन.*_
२. _*ज्या दुसऱ्या विषयाला बुद्धाने महत्त्वपूर्ण स्थान दिले तो विषय म्हणजे, "माणूस एकटा असला तरीही त्याने साहसपूर्वक श्रेष्ठत्तम मार्गाचे अनुसरण करावे." हा होय.*_
_*सल्लेखसुत्तात* बुद्धांनी हा विषय आग्रहपूर्वक प्रतिपादित केला आहे. ते असे म्हणतात की,_
१. _"आपल्या चित्ताला निर्मल राखण्या-साठी तुम्ही असा संकल्प करावा की, दुसऱ्यांनी माझी हानी केली तरी मी मात्र कोणाचीही हानी करणार नाही."_
२. _*"इतरांनी हिंसा केली तरी मी मात्र हिंसा करणार नाही."_
३. _"इतरांनी चौर्यकर्म केले तरी मी मात्र चौर्यकर्म करणार नाही."_
४. _"इतरांनी श्रेष्ठ जीवनाचा मार्ग स्वीकारला नाही तरी मी मात्र श्रेष्ठ जीवनाचा मार्गच अनुसरणार._
५. _"इतरांनी मिथ्या कथन केले. चहाडी केली, कटु वचन वदले, अथवा व्यर्थ बडबड केली तरी मी मात्र हे सर्व काही करणार नाही."_
६. _"इतरांनी लोभ केला तरी मी मात्र लोभ करणार नाही."_
७. _"इतरांनी द्वेष केला तरी मी मात्र द्वेष करणार नाही."_
८. _"इतर मिध्यादृशी, मिथ्या संकल्प, मिथ्या वाणी, मिथ्या कर्मान्त, मिथ्या समाधी यांचे आचरण करीत असोत मी मात्र (आर्य अष्टांगिक मार्गाचेच) सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाणी, सम्यक कर्मान्त, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी याच मार्गाचे अनुसरण करणार."_
९. _"इतर सत्याविषयी अपलाप करीत असतील, मुक्तीविषयी अपलाप करीत असतील तरी मी मात्र सत्याविषयी आणि मुक्तीविषयी योग्य मार्गाचाच अवलंब करणार._
१०. _"इतर जरी आलस्य आणि जडतायुक्त असतील तरी मी मात्र आलस्य आणि जडतामुक्त असेन."_
११. _"इतर जरी उदंड स्वभावाचे असले तरी मी मात्र विनम्र स्वभावाचाच असेन."_
१२. _"इतर जरी विचिकित्सायुक्त असले तरी मी मात्र विचिकित्सामुक्त असेन."_
१३. _"इतर जरी क्रोधी, दुष्टबुद्धी. द्वेषी, ईर्षाग्रस्त, कृपण, लोभी, दांभिक, कपटी, निर्बुद्ध, उदंड, आगाऊ, दुष्टसंगत करणारे, आलस्ययुक्त, अश्रद्ध, निर्लज्ज, सत् आणि असत् विवेकांचा अभाव असलेले, अविद्याग्रस्त, निष्क्रिय, जड, सुज्ञतेचा अभाव असलेले असतील तरी मी मात्र या सर्वांच्या विरुद्ध आचरण करणार._
१४. _"इतर जरी लौकिक वस्तूंवर आसक्त असले, त्यांच्यावरील आपली माया किंचितही कमी होऊ देणार नसले तरी मी मात्र अशा वस्तूंवर आसक्त असेन ज्या भौतिक नाहीत, लौकिक नाहीत. मी परित्यागशील आचरणच करणार."_
_*"माझी अशी धारणा आहे की, चेतना शक्ती विकसित झाल्याने वाणी आणि कर्मच नव्हे तर विज्ञान (जाणीव) सुद्धा प्रभावित होते.* म्हणून हे चुंद, माणसाने करावयाचे संकल्प हे मी वर कथन केल्यानुसार असावेत. तसे संकल्प करावयाचे असतील तर त्यासाठी आवश्यक चेतनाशक्ती विकसित करावयास पाहिजे."_
_*बुद्धांच्या मतानुसार धम्माचा उद्देश हा असा आहे.*_
*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_संकलन - महेश कांबळे_*
*_दिनांक :- १९/०७/२०२४_*
*_संदर्भ :-_*
_*१) भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म, तिसरा खंड भाग ५*_
_*२) धम्मपद*_
*_३) देवदह सुत्त_*
*_४) सल्लेख सुत्त_*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
No comments:
Post a Comment