Saturday, 29 June 2024

पांढरे वस्त्र

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_पांढरे वस्त्र_*

*_!! ॐ मणी पद्मे हूँ !!_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2024/06/blog-post_29.html

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

          _*बाबासाहेबांनी आपल्या समाजाला धर्मांतर करण्याच्या दिवशी पांढरे कपडे परिधान करून यायला सांगितले होते.* बाबासाहेबांनी सांगितले आणि त्यावेळच्या त्यांच्या अनुयायांनी केले नाही असं होऊ शकणार नव्हते. त्यावेळच्या अनुयायांनी बाबासाहेबांच्या आदेशाचे पालन करण्यासाठी स्वतः काबाडकष्ट करून एक - एक पै जोडून त्यांनी त्या आदेशाचे पालन केले. *स्वतः बाबासाहेबांनी १४ ऑक्टोबर ला कोरा करकरीत पांढरा लांब कोट, पांढरा सदरा, पांढरे धोतर परिधान करून दीक्षाभूमीवर आले होते.*_

 👉   _*पण आजचा सुशिक्षत समाज सन्मानिय अपवाद वगळता बाबासाहेबांचा हा आदेश मानायला तय्यार नाही आहेत. धार्मिक कार्यक्रमात बराच तरुण वर्ग पांढरे वस्त्र परिधान करीत नाहीत. तीच गोष्ट लग्नातील.... वधू वरांनी पांढरे वस्त्र परिधान करून यावे असं सांगूनही आजचे नव-विवाहित जोडपे फॅशनच्या नावाने पांढरे वस्त्र परिधान करण्यास नकार देतात आणि त्या विवाह मंडपात नियोजित बौद्धाचार्य किंवा भंतेजी यांच्यासोबत दोन्ही बाजूची मंडळी त्यावेळी वाद घालत बसतात.*_

_बाबासाहेबांनी पांढरे वस्त्र परिधान करण्याचा आदेश उगाचच दिला नव्हता. त्याला तशी कारणं ही होती. बौद्ध धम्म आणि पांढरे वस्त्र यांचा संबंध आहे, तो कसा ते आपण आत्ता पाहूया. त्रिपिटकात काही उदाहरणे आपल्याला वाचावयास मिळतात._

          _बुद्धांनी आपल्या भिक्खू संघासाठी वस्त्राच्या रुपाने केशरी रंगाच्या चिवराचे प्रयोजन केले होते. तसेच गृहस्थ उपासक-उपासिकां करिता पांढरा रंगाचा वापर सांगितला होता. यासाठी आपण त्रिपटकातील एक संदर्भ पाहू._

_हा संदर्भ आहे *खुद्दकनिकायातील, दोन भाऊ होते, महापंथक आणि चूलपंथक दोघांनी भगवंताकडून दीक्षा घेतली. चिवर घेतले व संघामध्ये सामील झाले.* एकदा दोघेही चारिकेसाठी त्यांच्या गावात जातात. *साधू / श्रमण समाजात आजही एक रित आहे की, गुरू आपल्या शिष्यांना त्यांच्या स्वतःच्या घरी एकदा तरी पाठवतात. ज्या घराचा त्याग करुन तो साधू बनतो, असे म्हणतात की, जो स्वतःच्या घरुन विचलित न होता भिक्षा घेऊन येतो तो खरा साधू होय. ही पद्धत बुद्धांच्या संघातून साधू समाजात आलेली आहे त्या संघात ही पद्धत होती की भिक्खू ला एकदा त्याच्या घरी चारीका करायला जावे लागे. (पिंडपात म्हणजे भिक्षा.)*_

              _महापंथक सुद्धा भिक्षेकरिता एकदा त्यांच्या घरी गेले. घरातल्या स्त्रिया आणि नातेवाईकांनी महापंथकाला घरातच थांबवण्याचा प्रयत्न केला, परंतु ते सफल झाले नाही, परंतु *चूलपंथकाचे चिवर त्याचे नातेवाईक व पत्नीने खेचून काढून टाकले आणि त्याला पांढऱ्या वस्त्रात लपेटले. यावरून हे दिसून येते की, बुद्धांच्या काळात विवाहाच्या वेळी वधूला पांढरे वस्त्र घातले जायचे.* हे लाल जोडी, रंगीबिरंगी सूटबूट याची प्रथा जवळजवळ दोनशे तीनशे वर्षात भारतीय समाजात रुढ झाली. *आसाम, बंगाल, अरुणाचल प्रदेश, लदाख येथील पारंपारिक बौद्ध समाजात उपासक-उपासिका लग्नाच्या वेळी आज सुद्धा पांढरे वस्त्र परिधान करतात. ख्रिश्चन समाजातील लग्नाच्या वेळी पांढऱ्या रंगाचा लांबलचक झगा घालण्याची परंपरा बौद्धांकडूनच आलेली आहे.*_

👉 _*प्रत्यक्षात पांढरे कपडे परिधान करणे पवित्रता आणि शांततेचे प्रतीक आहे.*_ 

           _आपण आजही बघतो की, ज्या दिवशी आपण पांढरे कपडे घालतो त्या दिवशी कपड्यांबद्दल जास्त सतर्क राहतो, घातलेले कपडे खराब व्हायला नको की, कुठे डाग लागायला नको._

👉 _*हीच सतर्कता जेव्हा चित्ताविषयी येते, तेव्हा आपण आपल्या मनाबद्दल सतर्क होतो. ते अस्वच्छ व्हायला नको, जेव्हा आपण सर्व एकाच वेळी पांढऱ्या वस्त्रांमध्ये असतो, वावरतो तेव्हा मन प्रयत्न न करता सहज शांत होते.*_

             _आपण शाळेतील विद्यार्थ्यांना बघतो की, जेव्हा सर्व विद्यार्थी एकाच गणवेशात असतात तेव्हा एक सारखेच दिसतात. सर्वजण गणवेशात आहेत आणि एक किंवा दोघे विद्यार्थी-विद्यार्थिनी रंगीत पोशाखात असतील तर, नजर परत परत त्यांच्याकडे स्थिरावते, ते मनाला अस्वस्थ करते._

👉 _*बुद्धांच्या काळात सुद्धा जेव्हा उपासक-उपासिका विहारात पूजेसाठी एकत्र येत होते, तेव्हा सर्वजण पांढऱ्या वस्त्रात असत. तसेच बौद्ध ग्रंथांमध्ये बौद्ध उपासक-उपासिकांना पांढरे वस्त्र परिधान करण्यास सांगितले आहे. पांढरे वस्त्र शुभ्रता व चांगले मन याचे प्रतिक आहे, मात्र विकृत स्वरुपाने ही परंपरा भारतीय समाजात आजही जिवंत आहे.*_

            _आज बौद्ध देशात आणि आपल्या ही विहारात कार्यक्रमांमध्ये आपण धम्मध्वज किंवा बुद्धिस्ट फ्लॅग पाहत असतो. *धम्मध्वजातील सहा रंगांचा अर्थ पुढील प्रमाणे, बौद्ध ग्रंथांमध्ये असा उल्लेख सापडतो की, भगवान बुद्धांच्या शरीरातून सहा रंगांचा प्रकाश परावर्तित होत होता. निळा, पिवळा, लाल, पांढरा, केशरी आणि सहा रंगांचा मिश्रण असलेला एक रंग ज्याला प्रभास्वर म्हणतात. हे सहा रंग बुद्धत्व आणि धम्माच्या पूर्णत्वाचे प्रतीक, प्रतिकात्मक लक्षण आहे. बौद्धांना आठवण ठेवण्याकरीता, स्मरणपत्रासारखे आहेत.* यापैकी प्रस्तुत विषयाला अनुसरून आपण हीते फक्त पांढरा किंवा सफेद रंगाचे किंवा प्रभास्वराचे महत्व पाहणार आहोत._

👉 _*पांढरा किंवा सफेदः - बुद्धांचे दात, नखे, अस्थी धातूपासून पांढरा रंग प्रसारीत होतो. हा रंग शुद्धतेचे व पावित्र्याचे प्रतीक आहे. बुद्धांच्या शिकवणुकीचे प्रतीक आहे. अकालिकता, म्हणजे बुद्धांची शिकवण वेळेनुसार कालातीत होत नाही उलट नवनवीन होत राहते. ते काल जेवढे सत्य होते, तेवढेच आज सुद्धा आहे, व पुढे सुद्धा राहणार.*_

_हे सर्व पाहता बाबासाहेबांनी बौद्ध परंपरेला अनुसरून जे काही सांगितले ते बौद्ध समाजातील प्रत्येक व्यक्तीचं आद्य कर्तव्य आहे की, त्यांनी त्याचे तंतोतंत पालन केले पाहिजे आणि आपल्या कोणत्याही धार्मिक कार्यक्रमात पांढरे वस्त्र परिधान करायलाच हवे. *धार्मिक कार्याकरिता बाबासाहेबांनी आपल्या समाजाला पोशाक दिला तो परिधान करून जेंव्हा आपण विहारात किंवा कोणत्या समारंभात जातो तेंव्हां वर जे शाळेतले उदाहरण दिले त्याप्रमाणे सर्वांचे चित्त कोणतेही अधिक प्रयत्न न करतातच स्थिर होऊन जाईल आणि आपले संपूर्ण लक्ष फक्त न फक्त त्या धार्मिक कार्यक्रमातच राहील, ते अन्य कुठेही भरकटणार नाही.*_

_*विवाह प्रसंगी वधू - वर यांनी कोणते वस्त्र परिधान करावे यासाठी बाबासाहेबांचे विचार पाहू. श्री कर्डक, प्राध्यापक, सिद्धार्थ कॉलेज, मुंबई यांनी स्वतःचा विवाह विधी बौद्ध पद्धतीने करण्याचे ठरविले आणि त्या विधिबद्दलची माहिती बाबासाहेबांना पत्राद्वारे दिनांक २६/०९/१९५६ रोजी विचारले. त्या पत्राला उत्तर बाबासाहेबांनी ०४/१२/१९५६ लिहिले त्यात त्यांनी बौद्ध विवाह विधी कश्याप्रकारे करायची हे सांगताना ते लिहितात Both brid and bridegroom should wear white clothes (वधू आणि वर यांनी पांढरे कपडे घालावेत).* या पत्रावरून आत्ताच्या पिढीने बाबासाहेब काय सांगत आहे याचा बोध घ्यावा आणि विवाहाच्या वेळी फॅशनेबल कपडे न घालता पांढरे कपडे परिधान करावे जेणेकरून कपड्यांवरून बौद्धाचार्य आणि विवाह करण्यासाठी आलेल्या कुटुंबात वाद होणार नाही._ 

*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*

*_!!ॐ मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 

*_संकलन - महेश कांबळे_*

*_दिनांक :- २९/०६/२०२४_*

*_संदर्भ :-_*

_*१) खुद्दक निकाय*_

_*२) मैत्री संपूर्ण धम्म आहे - लेखक राजेश चंद्रा*_

*_३) डॉ बाबासाहेब आंबेडकर चरित्र खंड - १२_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 

No comments:

Post a Comment

कोलित सुत्त

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_कोलित सुत्त_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_41.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼  _'कोलित सुत...