🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_मल्लिकादेवीचे प्रश्न_*
*_!! ॐ मणी पद्मे हूँ !!_*
https://mikamblemahesh.blogspot.com/2024/06/blog-post_28.html
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
_*भगवान बुद्ध श्रावस्तीमधील जेतवनात असतांना राजा प्रसेनजिताची पत्नी महाराणी मल्लिका भगवंतांच्या दर्शनाला आली, अभिवादन करुन एका बाजूला बसली आणि मनातला प्रश्न भगवंतांना विचारला.*_
_१) भगवान ! काय कारण असेल की, एखादी स्त्री कुरुप, दिसायला खूप भयानक, गरीब आणि अप्रभावी, आकर्षित न दिसणारी, प्रभाव न पाडणारी असते?_
_२) भगवान ! काय कारण असेल की, एखादी स्त्री कुरुप, दिसायला भीतीदायक परंतु प्रचंड श्रीमंत तसेच समाजात मान-सन्मान मिळवणारी असते?_
_३) भन्ते! कोणत्या कारणाने एखादी स्त्री प्रचंड सुंदर, आकर्षक, गोऱ्या वर्णाची तसेच पाहताक्षणी आकर्षित करणारे रुप असलेली, परंतु गरीब, कमीत कमी ऐश्वर्याचा उपभोग घेणारी, तसेच प्रभावहीन असू शकते?_
_४) भगवान ! कोणते कारण असू शकते की, एखादी स्त्री देखणी, सर्वांना प्रिय तसेच प्रचंड संपत्तीची मालक, ऐश्वर्यसंपन्न आणि समाजात प्रभावशाली असण्याचे काय कारण असावे?_
_महाराणीचे चार प्रकारचे प्रश्न ऐकून भगवंतांनी तिच्या चार प्रश्नांची उत्तरं चार प्रकाराने देऊन समाधान केले._
_*१) मल्लिके! जेव्हा एखादी स्त्री नेहमीच रागवत असते, निष्काळजी असते, कोणी काही बोलते यावरुन त्या व्यक्तीबद्दल मनात अढी निर्माण करते, गाठ बांधते, राग-द्वेष करीत राहते, हट्टिपणा करीत राहते, वैरभाव मनात ठेवते आणि संशयी स्वभावाची असते, जेव्हा ती कोणत्याही साधू-समणांना अन्नदान, वस्त्रदान करीत नाही, अंथरुण-पांघरुण दान करीत नाही, तिचे हृदय मत्सर करणारे असते, इतरांना मिळालेला मानसन्मान सत्काराने ती हेवा करणारी असते, त्यांच्यासाठी मनात वाईट विचार करते, अशा प्रकारे त्या शरीरातून मरणोत्तर, पुन्हा स्त्री रुपाने जन्म घेते. त्या त्या ठिकाणी जन्म घेते तिथे दुर्बल, दिसायला कुरुप, तसेच गरीब अल्पसंपन्न निर्धन, कमी ऐश्वर्य भोगणारी तसेच समाजात प्रभाव नसलेली असते.*_
*_२) मल्लिके! जेव्हा एखादी स्त्री सतत रागवत असते, वाईट विचारांची, कोणी काही म्हटलं तरी मनात अढी ठेवणारी, गाठ बांधणारी असते, राग- द्वेष करणारी, हट्टी प्रत्येक वेळी रागावणारी, वैरभाव दुराग्रही तसेच संशयित स्वभावाची, परंतु साधू-समणांना भोजन, कपडे, वाहन, माळ-सुगंधीअत्तर फुले, उटणे, अंथरुण-पांघरुण त्याचे दान करते, परंतु जी मत्सर करणारी नसते, इतरांचा प्रति मनात मत्सर किंवा द्वेष करीत नाही, अशी स्त्री कायेतुन निघून ज्या ज्या ठिकाणी स्त्री जन्म घेते, ती दिसायला खूप वाईट परंतु त्याच वेळी ती ऐश्वर्यसंपन्न श्रीमंती उपभोगणारी असते, तसेच समाजाकडून मानसन्मान मिळवणारी असते._*
*_३) मल्लिके ! इथे एखादी स्त्री अशी सुद्धा असते की, ती रागवत नाही, वाईट चिंतीत नाही, इतरांबरोबर छोट्याश्या वादातून देखील मनात गाठ बांधून ठेवत नाही, राग-द्वेष करीत नाही, हट्टीपणा करीत नाही, पूर्वग्रह ठेवत नाही, अंधविश्वास किंवा शंका घेणारी नसते, परंतु ती कोणत्याही साधू- समणांना भोजनदान, अन्नदान, वस्त्रदान, हार-फुले-सुगंधी उटण्याचे दान, वाहन दान, तसेच अंथरुण पांघरुन याचे दान देत नाही स्वभावाने मत्सरी असते, इतरांना मिळणाऱ्या मानसन्मानाला मत्सराने बघते, अशी स्त्री मृत्यूनंतर ज्या ज्या ठिकाणी स्त्री म्हणून जन्म घेते ती दिसायला अतिशय देखणी, अप्रतिम सौदर्याची खाण परंतु धनसंपत्ती तसेच ऐश्वर्या याबाबत ती पूर्णता गरीब, दारिद्र्य असते तसे समाजात तिला मान सन्मान नसतो._*
*_४) मल्लिके! इथे कुणी एखादी स्त्री अशी ही असते जी स्वभावाने शांत असते. राग-द्वेष करीत नाही, वैरभाव पाळत नाही, स्वभावाने संशयी नसते, सोबत साधूसंतांना अन्नदान-वस्त्रदान-वाहनाचे दान हार-फुले-सुगंधी अत्तर- उटणे तसेच अंथरुण-पांघरुण याचे दान करते, जी मत्सर-द्वेष करणारी नसते, इतरांचा मान सन्मान केल्याने तिला हेवा वाटत नाही, जी आपल्या मनाला स्वच्छ ठेवते, ती मृत्यूनंतर जिथे जिथे स्त्री रुपाने जन्म घेते तेव्हा ती अत्यंत देखणी, आकर्षक, सौंदर्यवान, लोकांना प्रिय तसेच प्रचंड श्रीमंती धन-ऐश्वर्य उपभोगते तसेच समाजात मान सन्मान मिळवणारी असते._*
*_मल्लिके ! कोणत्याही स्त्री चे सौंदर्य आणि समृद्धी तसेच ऐश्वर्य आणि गरीबीची ही काही कारणे तसेच काही उद्देश असतो._*
_भगवंतांच्या उद्देशाने समाधान झाल्यावर महाराणी मल्लिकाने शेवटी प्रामाणिकपणे स्विकार केला- भगवान! नक्कीच कधीतरी मी अत्यंत वाईट व्यर्थ चिंता करणारी, लोकांच्या बोलण्याची मनात गाठ बांधून ठेवणारी, राग-द्वेष करणारी असेल, इतरांवर विनाकारण संशय घेणारी असेल, म्हणून याच कारणाने मी आज अशाप्रकारे कुरुप, दिसायला भयानक आहे, तसेच हे सुद्धा नक्की आहे की, मी कधी तरी अन्नदान-वस्त्रदान-वाहनदान, हार- फुले-सुगंधित उटणे, दान केल्याचा प्रभावने मी प्रचंड धनसंपत्तीची मालक व वैभवशाली आहे, त्याचप्रमाणे भन्ते! मी कधीकधी मत्सर प्रवृत्तीची नसून, इतरांच्या लाभ-सन्मानाने मी आनंदी होत असेल, त्या सगळ्यांच्या चांगल्या प्रभावाने मी समाजात आज पूजनीय, मानसन्मान मिळवणारी आहे. हे भगवान ! माझ्या राजवाड्यातील क्षत्रिय, ब्राह्मण, श्रीमंत यांच्या मुली आहेत ज्यांच्यावर माझ्या ऐश्वर्या मुळे प्रभाव पाडते._
*_निर्भयपणे स्वतःचे दोष स्विकार करणे हा देखील एक मोठा गुण आहे. उलट अध्यात्मिक सौंदर्याचे एक लक्षण आहे, असे म्हणायला हरकत नाही._*
_*असे सुद्धा नाही की, भगवंतांनी सौंदर्य व समृद्धी बाबत स्त्रियांसाठी केलेले वर्णन स्त्रियांसाठीच नसून पुरुषांना देखील लागू पडते.*_
_*महाराणी मल्लिका तिच्या धाडसाने स्विकारच करत नाही तर त्याहीपेक्षा धैर्याने म्हणते की, भगवान आजपासून मी हा दृढ निश्चय करते की माझ्या राजकुळातील क्षत्रिय, ब्राह्मण, श्रीमंतांच्या मुलींप्रति मी राग-द्वेष करणार नाही, त्यांच्याबद्दल मनात तिरस्कार करणार नाही, त्यांच्याकरिता मनात काहीही वाईट विचार करणार नाही, त्यांच्यावर कधी रागवणार नाही, साधुसंतांना सर्वप्रकारे अन्नदान-वस्त्रदान वाहनदान, फुले-हार-सुगंधित द्रव्य, अंथरुण-पांघरुण वस्त्रे, यांचे दान नेहमीच करीत राहील, मनातील सर्व वाईट विचार, मत्सर भावन मुळासकट काढून टाकणार, लोकांच्या मानसन्मानाचा मत्सर करणार नाही.*_
_*महाराणी मल्लिका श्रद्धेने, भक्तिभावाने म्हणते- भगवान ! मला सर्वोत्तम उत्कृष्ट उपदेश दिला, ज्याप्रमाणे भरकटलेल्याला रस्ता मिळाला, अंधारात दिवा उजळला, झाकलेले उघड झाले, उलटे सरळ झाले, लपलेले वर आले, आंधळ्याला डोळे प्राप्त झाले. भन्ते! तुम्ही याप्रमाणे उपदेश केला आजपासून शेवटपर्यंत मी तुमची उपासिका झाले.*_
_*किंबहुना तिन रत्नांना शरणागती म्हणजे सुख समृद्धीच्या सर्व प्रकाराला शरण जाणे सौंदर्य समृद्धीचे कारण होय.*_
*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*
*_!!ॐ मणी पद्मे हूँ !!_*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_संकलन - महेश कांबळे_*
*_दिनांक :- २८/०६/२०२४_*
*_संदर्भ :-_*
_*१) अंगुत्तर निकायमधील महावग्गातील मल्लिका सुत्त*_
_*२) मैत्री संपूर्ण धम्म आहे - लेखक राजेश चंद्रा*_
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
No comments:
Post a Comment