🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_स्त्रिया आणि अंधश्रद्धा निर्मूलन_*
*_डॉ. नरेंद्र दाभोलकर_*
https://mikamblemahesh.blogspot.com/2024/04/blog-post_9.html
*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_भाग १२_*
*_मासिक पाळी अपवित्र?_*
_आपल्याला माहिती आहे की, *स्त्री कितीही सुशिक्षित असली, तरी आजही मासिक पाळीमध्ये देवाची पूजा करण्यासाठी स्त्री स्वतःला योग्य समजत नाही.* आता खरं म्हटलं तर जसे डोळ्यातले अश्रू, जशी तोंडामधली लाळ, तसाच स्त्रीच्या गर्भाशयामधनं येणारा रक्ताचा स्राव. हा रक्ताचा स्राव हीच स्त्रीला मातृत्वाच्या मांगल्याकडे नेणारी बाब आहे. *जर एका विशिष्ट कालावधीमध्ये गर्भधारणा झाली, तर त्या गर्भाचं पालनपोषण करण्यासाठी गर्भाशयाची आतली त्वचा तयार होते. मात्र जर त्या विशिष्ट कालावधीमध्ये गर्भधारणा झाली नाही, तर निसर्गक्रमाने ती त्वचा बाहेर टाकली जाते. याला 'मासिक पाळी' म्हणतात. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये काहीही अपवित्र नाही. विनोबांनी एके ठिकाणी म्हटलेलं आहे की, 'माणसची शरीरं ही मलमूत्राची गटारं आहेत. आपण रोज मलमूत्र विसर्जन करतो'. त्यांनी असंही म्हटलेलं आहे की, ज्याच्या शरीरात ही गटारं अहोरात्र वाहतात, तो पुजारी अंघोळ करतो आणि असं मानतो की, 'आता मी देवाची पूजा करायला पवित्र झालो आहे. मग जी बाई स्वतः मुलांना जन्म देते, मातृत्वाचं जे मांगल्य तिला निसर्गक्रमाने प्राप्त होतं, त्या मासिक पाळीमध्ये ती स्वतःला अपवित्र का मानते ?'*_
_एकदा माझं हे सगळं प्रतिपादन ऐकल्यानंतर तीन बायकांनी ठरवलं की, 'आपण मासिक पाळीमध्ये देवळात जायचं' तिघी जणींनी हिंमत बांधली. त्या जायला निघाल्या; परंतु एकीचा निर्धार देवळात पोहोचेपर्यंत गळून पडला आणि त्याच्यामुळे ती परत फिरली. दुसऱ्या दोघी जणी गाभाऱ्यापर्यंत पोहोचल्या, पण त्यांच्यातल्या एकीला गाभाऱ्यात गेल्यानंतर भीती वाटायला लागली; चक्कर आल्यासारखं वाटायला लागलं आणि तीही परत वळली. तिसरीने गाभाऱ्यात जाऊन देवाचं दर्शन घेतलं. त्याची पूजा करायचं ठरवलं; पूजा केलीही, पण तिला असं वाटलं की, नेहमी देवाची मूर्ती ज्या प्रेमळ नजरेने तिच्याकडे पाहायची, त्याऐवजी अत्यंत क्रोधित नजरेने ती मूर्ती तिच्याकडे पाहत होती. म्हणजे, *आजदेखील या विषयावर बोललं, तर जणूकाही 'संस्कृतीवर आघात झाला', 'धर्म भ्रष्ट केला' या पद्धतीने विचार केला जातो आणि त्यासाठी समर्थन काय दिलं जातं ? -श्रद्धेने मनःस्वास्थ्य लाभतं; बुद्धीने उद्ध्वस्त व्हायला होतं. खरं पाहता, जे मनःस्वास्थ्य लाभतं, ते गुंगी आणलेलं मनःस्वास्थ्य आहे का, याचा विचार करायला पाहिजे._
_खरं म्हटलं तर गुलामीची जाणीव करून दिल्यानंतर गुलामाची, म्हणजे समस्त स्त्री वर्गाची, या गुलामीतून मुक्तता करायची असेल, तर केवळ धर्माने लाभलेलं गौणत्व, केवळ तिची शारीरिकता, तिची मानसिकता, रूढीपरंपरा एवढ्याच गोष्टींमधून तिची मुक्तता करणं पुरेसं नाही, असं आम्हांला वाटतं. तर मी ज्याचा मगाशी 'जीवनव्यापी गौणत्व' म्हणून उल्लेख केला, समाजातल्या त्या सर्व ठिकाणी बाई आज गौणच आहे. राजकारणामध्ये तिला ५० टक्के जागा द्याव्यात, याची नुसतीच चर्चा चालू आहे. आजही विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये महिलांची संख्या ५० टक्के असताना प्रत्यक्षामध्ये मात्र खासदार आणि आमदार असलेल्या महिला पाच टक्केदेखील नाहीत. अर्थकारणाच्या दृष्टीने विचार केला, तर लग्न करून बाई सासऱ्याच्या घरी गेली की, ना त्या घरावर तिचं नाव लागतं, ना त्या शेतावर तिचं नाव लागतं. आजही भरभरून वाहणाऱ्या ज्या जाहिराती आहेत, त्यांमध्ये बाईचा 'देहच' 'वापरला' जातो. आजही 'भ्रूणहत्येमुळे घसरणारी लोकसंख्या' हा देशापुढचा एक अत्यंत गंभीर प्रश्न बनलेला आहे. आणि धार्मिकतेचा विचार करता, विधवा असलेली बाई आजही अपवित्रच मानली जाते._
*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*
*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_संकलन - महेश कांबळे_*
*_दिनांक :-०३/०४/२०२४_*
*_संदर्भ :-_*
_*१) स्त्रिया आणि अंधश्रद्धा निर्मूलन - लेखक डॉ नरेंद्र दाभोळकर*_
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
No comments:
Post a Comment