🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_कोणाच्या चित्तात राग शिरत नाही?_*
https://mikamblemahesh.blogspot.com/2024/03/blog-post_18.html
*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_यथागारं दुच्छन्नं वुट्ठि समतिविज्झति ।_*
*_एवं अभावितं चित्तं रागो समतिविज्झति ॥_*
*_अर्थ - नीट न छावलेल्या घरातून पावसाचे पाणी जसे आत शिरते त्याप्रमाणे ध्यान भावना रहित चित्तात राग शिरतो._*
_भगवंतांचे बंधू नंद भगवंताच्या मागे मागे जाऊन भिक्षु संघात प्रवज्जित झाले. पण ते आपल्या पूर्व आयुष्याला विसरले नव्हते. आपले पूर्व आयुष्य आठवून आठवून ते भिक्षु जीवनात उदास राहू लागले. तथागतांनी जेव्हा धंद्याची मनस्थिती जाणली तेव्हा त्यांनी आपल्या ईद्धी बलाने नंदास देवलोकात नेऊन अप्सरांना दाखवून म्हणाले "नन्द ! तुला जर हव्या असतील तर ब्रह्मचर्याचे पालन कर, त्याची जामिन मी घेतो." भिक्षुंना जेव्हा हे कळले तेव्हा ते नानाप्रकारे नन्दास लज्जित करू लागले - "आयुष्यमान नंन्द अप्सरांच्या लोभापोटी चाकरी करीत आहे. अप्सरांनी त्याला खरेदी केले आहे." आयुष्यमान नन्द त्यांच्या टोमण्यांनी अत्यंन्त लज्जित झाले आणि समथ-विपश्यना प्रारंभ करून अर्हत झाले._
_एके दिवशी या संबंधी भिक्षुंनी तथागताला विचारले. तथागत म्हणाले भिक्षुंनो ! प्रारंभीच्या काळात नन्दाचे जीवन नीट न छावलेल्या घराप्रमाणे होते, परंन्तु आता नीट छावलेल्या घरा प्रमाणे झाले आहे. त्याने अर्हतपद प्राप्त केले आहे." ह्या संबंधी ही गाथा सांगताना त्यांनी सांगितले की, मनावर संयम नसेल तर आसक्तीचा शिरकाव होतो._
*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*
*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_संकलन - महेश कांबळे_*
*_दिनांक :-१९/०३/२०२४_*
*_संदर्भ :-_*
_*१) धम्मपद - यमकवग्ग, अट्ठकथा*_
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
No comments:
Post a Comment