🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_कोणाचे वैर शांत होत नाही ?_*
https://mikamblemahesh.blogspot.com/2024/03/blog-post_16.html
*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_परे च न विजानन्ति मयमेत्थ यमामसे ।_*
*_ये च तत्थ विजानन्ति ततो सम्मन्ति मेधगा ॥_*
*_अर्थ - अज्ञ लोकांना हे कळत नाही की आपणा सर्वांना येथुन जावे लागणार आहे. ज्यांना हे कळले त्यांचे सर्व कलह मिटतात._*
_कौशाम्बीचा घोषितारामात पाचशे विनयधर आणि पाचशे धर्मकथित भिक्षु राहत होते. एकदा त्यांच्यात विनयाच्या शुल्लक कारणावरून वाद झाला आणि त्यांच्यात दोन गट पडले. तथागतांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला पण ते काही ऐकले नाही. काही दिवसांनी त्यांना त्यांचा दोष कळुन आला. त्यांनी परस्परांची क्षमा मागुन ते दोन्ही गट तथागतांकडे गेले._
_तथागतांनी - भिक्षूंनो! तुम्ही लोकांनी फार मोठा अपराध केला. तुमच्या सारखे अपराधी तुम्हीच आहात. तुम्ही माझ्याकडुन प्रव्रजित होऊन तुमचा मिलाप होऊनही तुम्ही एक झाले नाही. समजावुनही समजले नाही. असा उपदेश देतांना त्यांनी वरील गाथा सांगितली._
*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*
*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_संकलन - महेश कांबळे_*
*_दिनांक :-१५/०३/२०२४_*
*_संदर्भ :-_*
_*१) धम्मपद - यमकवग्ग, अट्ठकथा*_
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
No comments:
Post a Comment